সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, February 08, 2018

चंद्रपूर मनपाने घेतली काव्यशिल्पच्या बातमीची दखल;उखडलेला सिग्नल दुसऱ्याच दिवशी लागला

चंद्रपूर/प्रतिनिधी: 

मंगळवारी काव्यशिल्प डिजिटल मीडियाने वाहतूक सिग्नल निद्रावस्थेत ;पालिकेचे दुर्लक्ष या माथड्याखाली बातमी प्रकशित केली होती,त्या बातमीची दखल घेत चंद्रपूर वाहतूक विभाग व चंद्रपूर शहर महानगर पालिकेने दखल घेतली आहे, व दुसऱ्याच दिवशी १५ दिवसांपासून बंद असलेला सिग्नल सुरु करून नागरिकांच्या सेवेत दाखल केला आहे.  गेल्या दीड- दोन वर्षा आधी गंजलेले वाहतूक सिग्नल काढून नवीन सिग्नल बसविण्यात आले होते .हा  नवीन सिग्नल बसविण्याचा कार्यक्रम टप्प्या टप्प्याने पूर्ण करण्यात आला होता . मात्र शहरातील बंगाली कॅम्प परिसरात नवीनच लागलेला  उभा असलेला सिग्नल गेल्या १५ दिवसांपासून गाड झोपलेल्या अवस्थेत दिसून येत होते,  त्यामुळे शहरातील अत्यंत दळवळीच्या ठीकानीची सुरक्षा हि वाऱ्या असलेल्याचे चित्र समोर येताच काव्याशिल्पने बातमी प्रकाशित केली होती,याच बातमीची दखल शहर प्रशासनाने घेतली.
बंगाली कॅम्प परिसर हा चंद्रपूर शहरातील अत्यंत वर्दळीचा मार्ग म्हणून ओळखला जातो,  या सिग्नलवर  दिवसातून जळपास १२ तास मार्ग सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांची आवश्यकता असते, हाच मार्ग चंद्रपूर जिल्ह्यातून चौफेर जातो.त्यामुळे या चौकाची सुक्षेवर अत्यंत कटाक्षाने लक्ष असणे आवश्यक आहे, अन्यथा अपघात घडून येण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. मात्र गेल्या १५ दिवसांपासून या चौकातील सिग्नल हा पडलेल्या अवस्थेत असल्याने याकडे वाहतूक पोलीस व महानगर पालिकेच्या देखरेख विभागाचे लक्ष नसल्याचे दिसत आहे.हा चौक अत्यंत वर्दळीचा असल्याने नेहमी या ठिकाणी जीवघेणे अपघात घडत असतात त्यामुळे इतके दिवस उलटून सुद्धा याकडे वाहतूक पोलीस व महानगर पालिकेच्या मेंटनन्स विभागाचे लक्ष गेले नव्हते . 
मनपाने व वाहतूक विभागाने काव्यशिल्पच्या माध्यमातून तत्काळ दखल घेतल्याने सिग्नल नागरिकांच्या सेवेत दाखल झाला आहे.त्यामुळे  बंगाली कॅम्पच्या नागरिकांनी काव्यशिल्पचे धन्यवाद व्यक्त केले आहे.
अगोदर पडलेल्या अवस्थेत असलेला खांब  

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.