Thursday, January 31, 2019
सांगवी ग्रामपंचायत मध्ये गोंधळाचे वातावरण
सांगवी ग्रामपंचायत मध्ये गोंधळाचे वातावरण !
अकोले (अहमदनगर) खबरबात/प्रतिनिधी
-विष्णु तळपाडे
सांगवी ग्रामसभा ताणतणावात पार पडली.सत्ताधारी प्रश्न सोडवत नाहीत,असे विरोधक व ग्रामस्थ यांचे म्हणणे आहे.सांगवी-दगडवाडी गावचा प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून यावर ग्रामपंचायतीचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याचे आज पहावयास मिळते.ह्या ग्रामपंचायतीला आज मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असून देखील विकास कामानकडे दुर्लक्ष केले जाते.ह्या ग्रामसभेत फक्त नि फक्त गडबड आणि गोंधळ होताना पहायला मिळत आहे.अनेक कामं ग्रामसभेत माडली जातात,परंतु विरोध, हमरी-तुमरी यामध्ये राहुन जातात.
मागे घरकुलाचा सव्हे केला;त्यावेळी प्रत्येक सरव्हे मागे प्रतिव्यक्ती 100 रु.घेण्यात आले.याशिवाय नोंदणी होणार नाही,असे सांगून फक्त नि फक्त कमवण्याचे साधन म्हणून लक्ष दिले.हा सर्व्हे विनामुल्य होता.गावच्या विकासाच्या दृष्टीने ही ग्रामपंचायत अपयशी असल्याचे बोलले जाते.याठिकाणी कोणत्याच प्रश्नांनवर सविस्तर चर्चा होत नाही.
मासिक सभा महिला सभा ह्या आज पर्यत होतात हे कोणत्याही गावकर्याना माहित नाहीत याचे कारण ह्या सभा फक्त कागदोपत्री दाखवल्या जातात.त्यामुळे महिलाच्या समस्या पडून राहतात. हलक्या प्रतिची कामे करून एक प्रकारे निधी लाटण्याचा प्रकार समोर येताना दिसतोय. यावेळी या ठिकाणी ग्रामसेवक श्री साबळे ,सरपंच नंदु तळपाडे,जि.प.प्रा. शाळेचे शिक्षक,वायरमन,वाचमन, शिपाई , अरोग्य सेविका, सदस्य आणि गावकरी मोठ्या संख्या नी उपस्थित होते.
Friday, January 25, 2019
#krushimahotsav प्रारंभ
-८व्या कृषीमहोत्सवाचे जानेवारी २०१९चे आयोजन श्री स्वामी समर्थ कृषीविकास विरुध्द संधदान धर्मादाय ट्रस्ट,नाशिक येथे २५-२९जानेवारी रोजी ग्लोबल अँग्रीकल्चर एक्झिबिशन२०१९अंतर्गतआयोजित केले जात आहे.तरीही या कार्यक्रमाचे ठिकाण-डोगरे वस्तिगृह मैदान,गंगापुर रोड,नाशिक( महाराष्ट्र )या ठिकाणी आयोजित केलेला आहे.तरीही याठिकाणी खालील कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहेत,राष्ट्रीय कृषी प्रदर्शन,शेतीची चांगली निर्मिती,आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती,नवीकरणीय आणि निरनिराळ्या प्रकारच्या निर्यातीसाठी आपण कंपोस्ट ,साधने,शेतीविषयक औषधे,यंत्रसामग्री,जैवतंत्रज्ञान,विविध शेती विज्ञान आणि आधुनिक कृषि विज्ञान यांच्या विविध उपयोगांचे प्रदर्शन करणाऱ्या भारतीय व विदेशी कंपन्या यांच्या भेटी संपूर्ण ऊर्जा वैविध्यपुर्ण प्रदर्शन आणि शेतीचा वारसा,कृषीपर्यटन आशा निरनिराळ्या उत्सवांचे साप्ताहिक आधारित पशुधन व पशुजन्य उपचारांनविषयी मार्गदर्शन,दुर्मिळ वनस्पती व आरोग्य संगोपन या विषयी माहिती प्रदान करण्यात येणार आहे.
शेती पर्यटन या प्रदर्शनात अँग्रो टुरिझम असे विशेष वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत.हा शेतकऱ्यांना पर्यायी दुय्यम पर्याय आहे,म्हणूनच रोजगार निर्मिती भारतीय संस्कृतीचा प्रचार,पर्यावरणाची स्थिरता आणि उपनिषद माहिती ही कृषी महोत्सवाचे वैशिष्ट्ये आहेत .
अधिक माहितीसाठी www.krushimahotsav.org या वेबसाईटला भेट देऊ शकता..krushimahotsav
Saturday, January 19, 2019

संगमनेर;भीषण अपघातात दोघाचा जागीच मृत्यू
दि.१८जाने२०१९ लग्नासाठी पुण्याला जाणाऱ्या नाशिक येथील संत्रास व वाळेकर कुंटुंबीयांच्या कारला संगमनेर नजीक मालपाणी पार्किग गेट जवळ स्विफ्ट कारचा सकाळी ७:५७वाजता भीषण अपघात झाला.महामार्गावर मालट्रकला कार धडकल्याने दोन जण जागीच ठार झाले,तर४जण गंभीर जखमी झाले आहेत.मृतांनमध्ये पिंपळगाव बसवंत येथील तरुण व नाशिक येथील मुलाचा तर जखमीन मध्ये ३महिलाचा समावेश आहे.अपघात इतका भीषण होता की,कारचालकास पत्रा कापून बाहेर काढावे लागले.
अधिक माहिती अशी की,नाशिक येथील जयंतराव श्यामसुंदर सांत्रास हे नाशिक महापालिकेच्या अग्नीशमन विभागात सेवेत आहेत.त्याची बहिण उर्मिला सरडे ह्या पुण्यात राहतात,त्याच्या मुलीचे शनिवार दि.१९ रोजी लग्न असल्याने जयंतराव सांत्रास त्यांच्या पत्नी मोहिनी,मुलगा आर्यन तिघेही राहणार नाशिक शिंगाडा तलाव सारडा सर्कल-नाशिक येथील असून मुलगी देवयानी वाळेकर,जावाई भुषण वाळेकर रा.पिंपळगाव बसवंत आणि सासू उषा शरद लोहारकर हे सर्व स्विफ्ट कारने(MH15-DS-7665)शुक्रवारी सकाळी नाशिकहुन पुण्याकडे निघाले होते.संगमनेर शहराजवळ मालपाणी स्कवेअर जवळ मालट्रक GJ06Y8386 ही वळण घेत असताना कारने जोराची धडक देत धक्कादायक अपघात घडला.
Monday, January 14, 2019

अकोले तालुक्यात दुष्काळ जाहीर करा:आदिवासी बांधवांची मागणी
जिल्हा परिषद मराठी शाळांचा दर्जा उचावला:अशोकराव भांगरे
Thursday, December 27, 2018
बिबट्या गायीच्या आस-याला !
काल पासून अहमदनगर जिल्ह्यात थंडीने उच्चांक गाठला असला तरी प्रचंड प्रमाणात थंडीची लाट निर्माण झाली आहे.पशु ,पक्षी ,प्राणी कुठे तरी आपलाआस्रा शोधताना दिसतात .
अशाच प्रकारची घटना आश्वी ता.संगमनेर या ठिकाणी घडताना आपल्याला पहावयास मिळते. हा अदभुत क्षण थंडी पासून बचाव करण्यासाठी थेट बिबट्या गाईच्या गोठ्यातच गाईच्या आसर्याला बसलेला आपणांस पहावयास मिळतो.
Sunday, December 23, 2018
अंखड हरिनाम त्रीदिनी सप्ताहाची सांगता !
खबरबात प्रतिनिधी/विष्णु तळपाडे.अकोले (अहमदनगर)
ह्या तीन दिवसांपासून क्षेत्र दत्त आस्रम,सागवी धरणा जवळ,घाटाखालचीवाडी.याठिकाणी सालाबाद प्रमाणे ह्याही वर्षी अंखड हरिनाम ञिदिनी सप्ताह ह.भ.प.देवराम महाराज तळपाडे ह्याच्या पुढारकाराने व भाविक भक्तांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता.तरी त्याठिकाणी पहाटे४-६काकडा सायंकाळी ५-७हरिपाठ रात्री ७-९किर्तन आणि ९:30-१०.००पर्यत भोजन असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.याठिकाणी पंचकुर्शितील अनेकांनी ह्याचा लाभ घेतला ,तसेच काहीनी मोलाचे सहकार्यही केले.
या ठिकाणी महांळुगी,केळी,टाहाकरी, कोभांळणे,पाचपट्टा,पट्टेवाडी,ठाणगाव इत्यादी ठिकाण च्या ग्रामस्तानी आपल्या उपस्थितीनी शोभा वाढविली. आज दि.२३डिंसे रोजी ९-११ या वेळेत ह.भ.प.देवराम महाराज तळपाडे यांच्या काल्याच्या किर्तनानी अंखड हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली आणि त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला