काव्यशिल्प Digital Media: वरोरा

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label वरोरा. Show all posts
Showing posts with label वरोरा. Show all posts

Tuesday, June 19, 2018

चिमूर-वरोरा मार्ग ठरत आहे धोकादायक

चिमूर-वरोरा मार्ग ठरत आहे धोकादायक

Chimur-Worora route dangerous | चिमूर-वरोरा मार्ग धोकादायकचिमूर/प्रतिनिधी:
 चिमूर- उमरेड ते चिमूर- वरोरा या मुख्य रस्त्याच्या चौपदरीकरणाचे बांधकाम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. यासाठी चिमूर- वरोरा मार्ग पूर्णत: खोदून ठेवण्यात आला. मात्र, पर्यायी रस्त्यावर माती टाकल्याने गिट्टी अस्ताव्यस्त झाली. या मार्गावरून वाहन चालविणे धोकादायक झाले आहे.
चिमूर विधानसभा क्षेत्र राष्ट्रीय महामार्गावर आले आहे. त्यामुळे चिमुरला जोडणाऱ्या उमरेड, वरोरा या राष्ट्रीय महामार्गाचे काम कंत्राटदाराकडून सुरू आहे. मात्र या रस्त्याचे काम सुरू असल्याने चिमूर वरोरा हा रस्ता खोदून ठेवला आहे. कंत्राटदाराने पर्यायी रस्ता तयार केला आहे. या पर्यायी रस्त्यावर माती व मुरूम टाकण्यात आले. अशातच पाऊस आल्याने या रस्त्यावर चिखल झाले. त्यावर उपाय म्हणून कंत्राटदाराने या रस्त्यावर गिट्टी टाकली आहे. मात्र त्यावर रोडरोलर फिरविला नाही. रस्त्यावरून वाहने जावून गिट्टी सर्वत्र विखुरली. वाहनधारकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे.
उमरेड- चिमूर व वरोरा मार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होण्यास आणखी बराच कालावधी लागणार आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहने धावतात. पण, रस्ता योग्य नसल्याने प्रचंड त्रास होत आहे. पावसाळ्यात अनेक अडचणी येणार असून मोठा अपघात होवू शकतो. त्यामुळे पर्यायी मार्ग मजबूत करण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने पुढाकार घ्यावा, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.
दुचाकी चालकांची कसरत रस्त्यावर माती व मुरूम टाकल्याने मोठ्या प्रमाणात घुळ पसरली आहे. त्यामुळे दुचाकीने प्रवास करताना वाहनधारकांचे हाल होतात. तोंडाला रूमाल नसल्यास चेहरा ओळखणे कठीण जाते. पाऊस आल्यानंतर चिखलात दुचाकी घसरते. दररोज या घटना घडत आहेत. मार्गावर गिट्टी टाकण्यात आली. पण ती धोेकादायक असल्याने दुचाकी कशी चालवायची, असा प्रश्न वाहनचालकांना अस्वस्थ करीत आहेत.
एकाच दिवशी तीन ट्रक उलटले.
चिमूर ते वरोरा मार्गावर जड वाहतुक सुरू असते. कोळसा, सिमेंट वाहतुक करणाºया वाहनांची संख्या सर्वाधिक आहे. रस्त्यावर माती टाकल्याने शेडगाव व बोथलीजवळ एकाच दिवशी तीन ट्रक उलटल्याची घटना घडली होती.

Sunday, May 13, 2018

 हिरव्या मंडपापाई तुटले लग्न;चंद्रपूर येथील धक्कादायक प्रकार

हिरव्या मंडपापाई तुटले लग्न;चंद्रपूर येथील धक्कादायक प्रकार

नागपूर/विशेष प्रातिनिधी:
आजवर आपण मुलगा किंवा मुलगी पसंत न आल्याने किंवा अगदी फिल्मी स्टाइल वधू किंवा वर लग्नाच्या दिवशी पळून गेल्याने लग्न तुटल्याच्या ऐकले किव्हा वाचले असाल मात्र हिरव्या मंडपापाई लग्न तुटल्याचे तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल.  
               चंद्रपुरातील वरोरा शहरात हिरव्या मंडपामुळे लग्न तुटल्याचे समोर आले आहे.नवरा मुलगा आणि नवरी मुलगी दोघेही उच्चशिक्षित मुलगा मुंबईत रेशनिंग अधिकारी तर मुलगी छत्तीसगड राज्यात शिक्षिका म्हणून कार्यरत आहे,काही महिन्यांपूर्वी दोघांचा साखरपुडा झाला आणि १२ मे ला लग्न ठरले,आधल्या दिवशी दोघांना हळदही लागली. सगळीकडे आनंदाचे वातावरण होते, नवरदेवाने आधल्या दिवशी नवरीला फोन वरून गोंडी रिवाजानुसार हिरवा मंडप घालण्याचा आग्रह केला. आणि लग्न हे हिरव्या मांडवात होणार असल्याचे सांगितले,हे ऐकून नवरीने नवरदेवाच्या या शुल्लक मागणीवरून चक्क नकार देत लग्नच तोडून टाकले.
चंद्रपुर जिल्ह्यातील पोंभूर्ण्यापासून सात किमी. अंतरावर असलेल्या चिंतलधाबा येथे चार दिवसांपूर्वी सोयाम आणि आत्राम कुटुंबाच्या लग्नाची बातमी देशभर चर्चेचा विषय ठरली.या कुटुंबियांच्या निर्णयाने अनेकांनी त्यांचे कौतुकही केले.  नवरी ऑक्सिजनवर दवाखान्यात भरती असतांना दोन्ही पक्षाने एकमेकांना धीर देऊन मधला मार्ग काढत चक्क अॅम्ब्युलन्स मांडवात आणली आणि आलेल्या वऱ्हाडी परत जाऊ नये,व लग्नाला वेगळे वळण लागू नये म्हणून मुला-मुलीचा विवाह सोहळा पार पडला. मात्र त्याच चंद्रपुरातील वरोरा शहरात हिरव्या मंडपाच्या शुल्लक कारणावरून लग्न तुटल्याची संतापजनक घटना घडली. या घडलेल्या प्रकारामुळे दोन्ही परिवारांची चांगलीच बदनामी झाली.हे प्रकरण इथेच थांबले नाही तर थेट वरोरा पोलिसात पोहचले.पोलिसांनी व जेष्ठ मंडळींनी दोन्ही बाजू ऐकून घेतली व तोडगा काढायचा प्रयत्न केला. मात्र एक दिवस आधी आम्ही शहरात हिरव्या मंडळाची मागणी कशी पूर्ण करणार असे सांगत वधूने लग्नास नकार दिला. शिवाय हि अट पूर्ण केली असती तर अशीच मागण्यांची मालिका सुरू राहिली असती त्यामुळे आपण लग्नाला ठाम नकार दिल्याची प्रतिक्रिया वधुने दिली आहे. तर दुसरीकडे नवरदेवाने आपण कुठलीच डिमांड केले नसल्याने आणि फक्त आदिवासी प्रथेप्रमाणे हिरव्या मंडप घालण्यास सांगितले असल्याचे म्हटले आहे. हिरवा मंडप हा आदिवासी समाजात प्रतीकात्मक आहे मात्र मुलीकडच्या पक्षाने याचा बाहू केला आणि प्रकरण पोलिस स्टेशन पर्यंत नेले. असा आरोप नवरदेवाने केला या संपूर्ण प्रकारामुळे आमची बदनामी झाली असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.
यात नवरदेवाने आपल्या सोबत आणलेल्या पाहुण्यांना स्वताकडून वेळेवर जेवण दिले.यावेळी आम्हाला आर्थिक तसेच मानसिक त्रास झाला असल्याचे त्यांनी सांगितले.नवरीच्या या निर्णयामुळे ना-ना विविध शंका निर्माण होत आहे.उच्चशिक्षित लोकच जर असा निर्णय घेतली तर अनाडी लोकांनी काय करावे असाच प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे.  
ps-warora-640
-----------------------------------------------------------------------
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:९१७५९३७९२५ या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).




Thursday, April 05, 2018

अवैध सावकारी करणाऱ्या प्रॉपर्टी डीलरच्या घरावर सहकार विभागाची धाड

अवैध सावकारी करणाऱ्या प्रॉपर्टी डीलरच्या घरावर सहकार विभागाची धाड

अवैध सावकारी करणाऱ्याचे धाबे दणाणले
वरोरा/प्रतिनिधी:
वरोरा शहरातील नामांकित प्रॉपर्टी डीलर  सिद्धार्थ ढोके यांच्या तीन प्रतीष्ठानावर व घरावर अवैध सावकारी विरुद्ध सहकार विभागाने गुरुवारी सकाळच्या सुमारास धाड टाकली.मिळालेल्या माहिती नुसार येथील एका शेतकऱ्याने सहकार विभागाला ही तक्रार केल्याने हे सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर कारवाई केली.  सावकारी पनाचा कोणताही  परवाना नसतांना व्याजाने रक्कम देण्याचे काम येथील प्रॉपर्टी डीलर  सिद्धार्थ ढोके   करत होते. व्याजाने पैसे देऊन त्यावर व्याज आकाराची तक्रार व परस्पर विक्रीच्याही तक्रारी सहकार विभागाला मिळाल्याने  जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांचे मार्गदर्शनाखाली ही धाड भद्रावती,वरोरा ,बल्लारपूर येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्थायांचे कडून चोख पोलीस बंदोबस्तात सदर धाड टाकण्यात आली.
यात चौकशी अधिकाऱ्यांनी सही घेतलेले कोरे मुद्रांक पेपर यासह काही आक्षेपार्ह विक्रिपत्र देखील आढळून आल्याने चौकशीला आणखी वेग येणार असल्याचे समजते ,  या आधीही सिद्धार्थ ढोके यांच्यावर कलम ४२० अंतर्गत वरोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल असल्याच समजते . या तक्रारी अंतर्गत सहकार पथकाला आक्षेपार्ह कागदपत्रे मिळाले असून त्याचा पुढील तपास चंद्रपूर येथे करण्यात येणार असल्याची माहिती आहे. गरजू शेतकऱ्यांच्या जमिनी हडपण्याचा प्रकार मागील काही वर्षापासून वरोरा शहरामध्ये फोफावत होता.पैश्याची आवश्यकता असलेल्या गरजू शेतकऱ्यांच्या जमिनी कमी भावात ठेऊन घेऊन त्यावर विक्री करून घेत असल्याचा प्रकार सुरु होता. व पैस्याची परतफेड करायला आलेल्या शेतकऱ्यांकडून जास्त पैस्याची मागणी करत होता.व तेवढी रक्कम नसल्यास  पेपरवर लिहिलेली मुदत संपल्याने ती जमीन हडप केल्या जात होती. असा आरोप करण्यात आला होता.  या पद्धतीचे बरेचसे कागदपत्र सहकार विभागाच्या हाती लागल्याने अवैध सावकारी करणाऱ्या सिद्धार्थ ढोके यांची कसून चौकशी करण्यात आली.
पुढील अहवाल सहकार विभागातर्फे  पोलीस विभागाला देऊन कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे  चौकशी अधिकारी सुनील नवघरे सहाय्यक निबंधक यांनी सांगितले.या कारवाईमुळे जिल्ह्यातील अशा अवैध सावकारी करणाऱ्याचे धाबे दणाणले असून यात बरेच मोठे मासे फसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.यात सहकार विभागाला कोणते कागदपत्र मिळाले आहे हे मात्र अद्यापही समजू शकले नाही. 

Monday, March 26, 2018

ए.टी.एम फोडून २३ लाख ६२ हजाराची रक्कम लंपास

ए.टी.एम फोडून २३ लाख ६२ हजाराची रक्कम लंपास

atm hayjak साठी इमेज परिणामवरोरा/प्रतीनिधी:
महिनाभरापुर्वी आनंदवन चौकात  असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ए.टी.एम मधून २३ लाख ६२ हजार रुपये लंपास केल्याची घटनातबब्ल महिनाभरानंतर आज उघडकीस आली .
मिळालेल्या महितिनुसार  ९ मार्च २०१८ या कालावधीत मशीन मध्ये छेडछाड झाल्याची माहिती समोर आली पण ए.टी.एम मशीनचे एक्सपर्ट उपलब्ध नसल्याने वरोरा शाखेच्या बँक अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना या बाबत माहिती दिली. आणि तब्बल १ महिन्या नंतर सॉफ्टवेअर एक्सपर्ट  वरोरा येथे आले असता त्यांनी मशीन खोलून बघताच    ए.टी.एमचे लोक हायज्याक करून २३ लाख ६२ हजाराची रक्कम लंपास झाल्याचे सांगितले .त्यावरून वरोरा पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.मात्र हे काम एक्सपर्ट माणसाने केले असून यात बँकेच्या कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांचा हात तर नाही ना अशी चर्चा आता शहरात रंगू लागली आहे

Tuesday, January 16, 2018

पोलिसांनी सिनेस्टाईलने पाठलाग करून पकडली 48 पेटया अवैध दारू.

पोलिसांनी सिनेस्टाईलने पाठलाग करून पकडली 48 पेटया अवैध दारू.

वरोरा/प्रतिनिधी:
वरोरा उपविभागीय पोलीस पथकाने आज (मंगळवारी) सकाळी अवैधरित्या दारू पुरवठा करणाऱ्यांचा सिनेस्टाइल पाठलाग करून तब्ब्ल 48 पेट्या दारू जप्त केली आहे. यात एका आरोपीस अटक करण्यात आली असून एक फरार झाला आहे.
वरोरा उपविभागीय पोलीस विशेष पथकाला शहरात एका लक्झरी वाहनातून अवैध दारू आणली जाणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीवरून सापळा रचला गेला. शहरातून नागपुर चंद्रपूर मार्ग जातो. पोलिसांणी इशारा देऊनही गाड़ी न थांबवता भरधाव वेगाने पुढे या वाहनाचा विशेष पथकाने पाठलाग केला. दरम्यान गाड़ी शेतशिवारातून टाकली मात्र पुढे निघने अशक्य झाल्याने तितक्याच तिसऱ्या पोलिस पथकाने आरोपिस पकड़ले यात  महिंद्रा  x u v mh.20.cs.7194 गाड़ीतुन 48 पेटया देशी विदेशी दारू जप्त केली. 

सदरची कारवाई वरोरा उपविभागीय पोलिस अधिकारी प्रताप पवार यांच्या मार्गदर्शनात प्रदीप पाटील ,अनिल बैठा, सचिन थेरे, संतोष निषाद, निखिल कौरासे यांनी केली असून पुढील कारवाई वरोरा पोलिस करत आहेत .








Monday, January 15, 2018

कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या


वरोरा/प्रतिनिधी: 
रोगराईने पिके नष्ट झाल्याने तसेच कर्जाचे डोंगर असल्याने कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेत असणाऱ्या एका शेतकऱ्याने जंगलातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वरोरा तालुक्यातील ताडगव्हाण येथे घडली. सदानंद दादाजी सूर वय ४४ असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
सध्या शेतकऱ्यांच्या पिकांवर अनेक रोगांनी घात घातला असून शेतकरी आस्मानी संकटात सापडला आहे. 
वरून शेतीसाठी कर्ज घेतलेले परत कसे करायचे यामुळे ते अस्वस्थ असायचे. त्यातच पिकांवर अनेक प्रकारची लागण झाल्याने संपूर्ण पीक नष्ट झाले होते याच विवंचनेत गेल्या काही दिवसांपासून सदानंद हे चिंतेत असायचे .सोमवारी सकाळी उठून शेताकडे गेले व परिसरातील जंगलात झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. या घटनेची माहिती शेगाव पोलिसांना मिळताच घटनेचा पंचनामा केला व आकस्मित मृत्यूची नोंद केली.

Friday, December 08, 2017

संपूर्ण कर्ज देऊन सातबारा कोरा करा

संपूर्ण कर्ज देऊन सातबारा कोरा करा


वरोरा : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज देऊन सातबारा कोरा करण्यासोबतच इतर काही मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवारी उपविभागीय कार्यालयावर प्रहार जनशक्ती पक्षाच्याच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी धडक दिली.
शासनाने संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केली. परंतु अंमलबजावणी केली नाही. त्यातच परतीचा पाऊस, गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन व तूर पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण कपाशीचे पीक नष्ट झाले आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून सातबारा कोरा करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या कपाशीवरील बोंडअळीची पाहणी करून नुकसान भरपाई देण्यात यावी. दिवसभर १२ तास तीन फेज वीज पुरवठा देण्यात यावा, स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावा.आदी मागण्या लावून धरण्यात आल्या. मोर्चाची सुरुवात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व अ औषध फवारणीत मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करून झाली. त्यानंतर शिष्टमंडळाद्वारे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेचे महादेव ताठे, शेतकरी माधव जीवतोडे प्रहारचे गणेश उराडे, प्रशांत चौखे, संदीप वासेकर, निलेश ढवस, संदीप झाडे, रवी झाडे, विनोद वाटेकर, रामू डांगे, राजू वर्मा, गुड्डू एकरे, कन्हेैया सालोरकर, नितीन नागरकर, सुशील पिंपळकर व परिसरात बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

Thursday, November 30, 2017

शहीद योगेश डाहूले यांना श्रद्धांजली

शहीद योगेश डाहूले यांना श्रद्धांजली


वरोरा/भद्रावती(प्रतिनिधी) वरोरा येथील
शहीद हुतात्मे  योगेश वसंतराव डाहूले यांना दिनांक ३०/११/२००४ ला आपले कर्तव्य बजावत असताना वीरमरण प्राप्त झाले त्या प्रीत्यर्थ आज दिनांक ३०/११/२०१७ नगर परिषद वरोरा स्वच्छता विभाग  व शहीद हुतात्मे योगेश डाहुले  यांचा आई वडील , नातेवाईक व शहरातील सन्माननीय नागरिकांनी त्यांचा अदम्य साहसाबद्दल त्यांना श्रद्धांजली अर्पित केली. यावेळी शहीद योगेश डाहूले   यांच्या आई ,वडील  श्री वसंतराव डाहूले व सौ पार्वतीताई डाहुले , जेष्ठ कवी व साहित्यिक नागथुटे सर , श्री ठेंगणे सर ,व नगर परिषद च्या वतीने आरोग्य सभापती श्री छोटू भाई शेख , अभियंता संकेत नंदवंशी, स्वच्छता निरक्षक भूषण सालवटकर , तसेच कर्माचारी सुनील नकवे , भारत नकवे  व शहरातील इतर नागरिकांच्या उपस्थितीत श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.

अतिक्रमणधारकांना नोटीस बजावल्या

अतिक्रमणधारकांना नोटीस बजावल्या

*चंद्रपूर-नागपूर महामार्गा बाजूचे सर्विस रोडवरील अतिक्रमण हटविण्याच्या नगरपरिषदेच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत.

*लवकरच कारवाईला सुरूवात

वरोरा/भद्रावती (प्रतिनिधी) :भद्रावती
नगरपरिषद क्षेत्रातील चंद्रपूर-नागपूर महामार्गाच्या बाजूला असलेल्या ले-आऊट मधील सर्विस रोडवर केलेले अतिक्रमण काढून टाकण्यासाठी मुख्याधिका-यांनी अतिक्रमणधारकांना नोटिस बजावल्या आहेत. नगरपरिषदेच्या या निर्णयाचे शहरात सर्वत्र स्वागत होत आहे.
                  महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 अन्वये तथा महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1966 अन्वये सदर नोटिसा बजावल्या गेल्या आहेत.
                 सदर नोटिस प्राप्त होताच सात दिवसाचे आंत कच्चे-पक्के अतिक्रमण काढुन सर्व्हिस रोड मोकळा करुन दयावा, अन्यथा कुठलीही पूर्वसूचना न देता, नगरपरिषदद्वारा अतिक्रमण काढुन घेण्यात येईल. या कार्यवाहीत झालेल्या नुकसानीची व तुटफुटीची जवाबदारी अतिक्रमणधारकांची असेल, व कारवाईसाठी लागणारा सर्व खर्च अतिक्रमणधारकांकडुन वसुल करण्यात येईल, असे नोटिसमधे नमूद केलेले आहे.
                  नागपूर-चंद्रपूर महामार्गाच्या दोन्ही बाजूचे अतिक्रमण फार जुने आहे. सदर अतिक्रमण कायमस्वरुपी हटल्यास शहराचा चेहरामोहरा बदलेल. अपघातांची शक्यता कमी होणार आहे. महामार्गाच्या बाजुच्या संताजी नगर, गुरुनगर, कुणबी सोसायटी, गौतमनगर ही ले-आऊट अतिक्रमणापासून मोकळी होतील. अतिक्रमणामुळे होणारे उपद्रव कमी होतील. पानठेले, खर्रा विक्री केन्द्र, बंद होतील. अवैध दारुविक्रीला आळा बसेल. रोडरोमीओंची संख्या कमी होईल. पैदल चालणा-यांना सुरक्षा मिळेल. महामार्गाशेजारची गर्दी व वर्दळ कमी होईल. शहर महामार्गाला लागुन असल्यामुळे शहराची ओळख बदलून महामार्गाने जाणा-यांचा शहराकडे पाहण्याचा द्रुष्टिकोण बदलेल.
                प्रभु गॅरेज ते पंचशील नगर, वांढरे फ्रुट्स स्टॉल ते होटल पैराडाईज, कोंबे यांचे घर ते बस स्टॉप पर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजुचा सर्व्हिस रोड मोकळा होण्यासाठी भद्रावतीकर वाट बघत आहे व नगरपरिषदेकडुन मोठी अपेक्षा लावुन बसले आहे. आता नगरपरिषदेच्या या निर्णयात कोणता अडथळा येवुन, अतिक्रमण हटविण्याचे काम थांबू नये, असे नागरीकांचे म्हणने आहे.
----------------------------------------
नगरपरिषदेने कोणतेही हितसंबंध न जोपासता, लहान-मोठे व्यवसायिक न बघता सगड्या अतिक्रमणधारकांना नोटिस पाठवुन न.प. निवडणुकीची आचारसंहिता लागण्याअगोदर अतिक्रमण हटवून सर्व्हिस रोड मोकळे करावे. -

मुश्ताक अली, व्यवसायिक, भद्रावती।

Sunday, November 26, 2017

विज्ञान प्रदर्शन

विज्ञान प्रदर्शन

वरोरा - येथे सेंटअनिस स्कुल येथे आयोजित तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी आयोजित केली असून या प्रदर्शनी बघण्यासाठी विध्यार्थी व पालकांनी प्रतिसात घेत आहे. या विज्ञान प्रदर्शनीत तालुक्यातील विविध विद्यालयातील विध्यार्थीनि स्पर्धेत सहभाग घेतला. यामध्ये कोणत्या विद्यालय प्रथम क्रमांक  पटकावेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

छायाचित्र : शिरीष उगे, वरोरा

Saturday, November 25, 2017

Friday, November 24, 2017

वन्यप्राण्यांपासुन शेती वाचविण्याची शक्कल लढविणा-या विठ्ठलचा सत्कार

वन्यप्राण्यांपासुन शेती वाचविण्याची शक्कल लढविणा-या विठ्ठलचा सत्कार

           नगरपालिका व वनविभागाने घेतली दखल         

पंतप्रधान नरेन्द्र मोदींपर्यंत जाणार माहिती
वरोरा/भद्रावती (प्रतिनीधी) :
             साऊंडसिस्टममधे वाघ व कुत्रा या प्राण्यांचे आवाज वाजवून वन्यजीवांच्या हैदोसापासुन शेतीचे नुकसान टाळण्यासाठी विठ्ठल विधाते यांनी केलेल्या युक्तीची दखल भद्रावती नगरपालीका व वनविभागाने घेतली आहे. मुख्याधिकारी विनोद जाधव, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, वनपरीक्षेत्र अधिकारी महेशकर मैडम, क्रुषी अधिकारी ढवस यांनी विठ्ठलाचे कौतुक केले. विठ्ठलच्या या अभिनव प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होत असतांनाच नगरपरिषद प्रशासन व रोजंदारी कर्मचारी संघटना द्वारा सत्कार करण्यात आला.
             मांगली(रै) येथील विठ्ठल विधाते यांनी त्यांच्या शेतात केलेल्या उपक्रमाची माहिती नुकत्याच जिल्ह्याच्या भेटीवर आलेले जेष्ठ राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी त्यांची स्तुती केली व शासनाकडे विषय पोहोचवून सदर पॅटर्न कसा राबवता येईल याकरिता पाठ पुरावा करण्याची हमी दिली.
             विठ्ठल विधाते हा मांगली (रै.) या गावचा रहिवासी असून येथील नगरपालिकेत रोजंदारी कर्मचारी आहे. तुटपुंज्या पगारात कुटुंबाचे उदरभरण करणे कठिण जात असल्यामुळे विठ्ठलने नवरगांव (बिट) येथे चार एकर शेती ठेक्याने घेवुन शेतीव्यवसायाला सुरवात तर केली मात्र हा परिसर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागुन असल्याने जंगली डुक्कर, रोही, नीलगाय, हरण, कोल्हे, लांडगे, आदि जनावरांच्या हैदोसाचा रात्रीच्या वेळेस त्रास होवु लागला. या समस्येपासून सुटकारा मिळवण्यासाठी विठ्ठलने घरीच असलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा उपयोग केला. मोबाईलच्या जमान्यात आऊटडेटेड झालेल्या डेकला (साऊंड सिस्टम) पेनड्राईव्ह लावुन शेतात आणले. साऊंडबौक्सला पावसापासुन वाचविण्यासाठी टिनाच्या पिप्यात ठेवले. ईंटरनेटमधुन वाघ व कुत्रा या प्राण्यांचे आवाज डाऊनलोड करून पेनड्राईव्हमधे सेव्ह केले व   रोज रात्री मोठ्या आवाजात वाजवायला सुरवात केली. या आवाजाने भयभीत होवुन जंगली प्राणी शेतात यायला घाबरु लागले व पर्यायाने शेतपीक व वन्यप्राणी दोहोंचे संरक्षण झाले.
       विठ्ठलच्या या युक्तीने शेतक-यांसमोर आदर्श निर्माण झाला. वनविभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी महेशकर व वनविभागाचे अधिकारी तथा अनेकांनी प्रत्यक्षात शेतात जावुन पाहणी केली व विठ्ठलच्या या युक्तीचे कौतुक होवु लागले. विठ्ठलच्या या उपक्रमाची माहिती वनविभाग व नगरपालिका पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या पर्यंत पोहोचवणार आहे.
           विठ्ठलसारखे शेतकरी गांव व शेतीप्रगतीस चालना देतात, असे गौरवोदगार ना. शरद पवार यांनी काढले.
         माजी आमदार साळुंखे गुरुजी यांनी सदर विषयाचं महत्त्व ना. पवार यांचेपर्यंत आधीच पोहोचविले होते. पवार साहेबांनी या उपक्रमाचं कौतुक केलं. व सदर विषयाची दखल घेतली. यावेळी राजेन्द्र वैद्य उपस्थित होते.

Thursday, November 23, 2017

इम्रान खान यांची भाजयुमो जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती

इम्रान खान यांची भाजयुमो जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती

वरोरा/भद्रावती (प्रतिनिधी) :

भद्रावती शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय जनता पार्टिचे युवा नेतृत्त्व इम्रान अफजल रफीक खान यांची भारतीय जनता युवा मोर्चा, चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहीर, वित्त, वने आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री संजय देवतळे, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीष शर्मा, यांच्या मार्गदर्शनाखाली भाजयुमोचे जिल्हा अध्यक्ष ब्रिजभुषण पाझारे यांनी सदर नियुक्ती केलेली आहे.

Tuesday, November 21, 2017

धनगर समाजाचा हिवाळी अधिवेशनावर हल्लाबोल मोर्चा

धनगर समाजाचा हिवाळी अधिवेशनावर हल्लाबोल मोर्चा

वरोरा/ भद्रावती (प्रतिनिधी) :  मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी निवडणु कीपूर्वी व निवडणूकी नंतर महाराष्ट्रात भाजपची सत्ता आल्यानंतर धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षनाची अमलबजावणी करण्याचे ठोस आश्वासन देऊनही त्यांची अजूनपर्यंत पूर्तता केली नाही. याउलट TISS ( टाटा इन्स्टिट्यूट ऑफ  सोशल सायन्सेस)  या संस्थेकडून सर्व्हेक्षण करून अहवाल मागविला आहे. त्याची गरज नसून समाजाचा विरोध आहे.  धनगर समाज राज्यातील अनुसूचित जमातीचे यादीत ३६ क्रमांकावर असून देखील धनगर समाजास सवलती पासून वंचित ठेवण्याचे महाराष्ट्र सरकारचे हे कटकारस्थान आहे . असे  नागपूर चेधनगर समाज जिल्हाध्यक्ष रमेश पाटील चंद्रपूर जिल्याच्या दवऱ्या दरम्यान वरोरा - भद्रावती बैठकीत बोलत होते.  करिता महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाचा एसटी आरक्षण अमलबजावणी समूहिक नेतृत्वात हल्लाबोल मोर्चाचे  आयोजन दि. ११ डिसेंबर२०१७ ला ११ वाजता हिवाळी अधिवेशनावर धडकणार आहे.  मोर्चा यशवंत स्टेडियम, नागपूर येथून निघणार असून या मोर्चा ला जिल्यातून जास्तीत जास्त धनगर समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन  माजी आमदार हरिदास भदे, अध्यक्ष रमेश पाटील, ज्ञानेश्वर घायवड, पुरुषोत्तम घायवड, देवराव ठमके, गुलाबराव चिडे, रमेश उरकुडे, अमित ठमके, पंढरीनाथ बोधे, श्रीहरी घोटकर, पुंजराम तुरके. यांनी केले.
दुचाकी अपघातात एक ठार एक गंभीर जखमी

दुचाकी अपघातात एक ठार एक गंभीर जखमी

वरोरा/भद्रावती (प्रतिनिधी)
आज दि. २०नोव्हेंबर सायं. ८:30 वाजता वरोरा वणी मार्गावर झालेल्या दुचाकी अपघातात एक ठार तर एक गंभीर जखमी आहे.
दुचाकी एम एच 34 ए क्यू 1860 सुधीर खापणे (३०)रा. चिकनी हा दुचाकी चालक जागीच ठार झाला तर स्वप्नील खापणे (१६) रा. व्होल्टाज कॉलनी वरोरा हा गंभीर जखमी आहे. स्वप्नीलला डोक्याला गंभीर दुखापत असल्याने  त्याला चंद्रपूर येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Saturday, November 18, 2017

सहाय्यक अभियंत्याने घेतली मुख्यालयावरून उडी

सहाय्यक अभियंत्याने घेतली मुख्यालयावरून उडी

वरोरा-भद्रावती/(प्रतिनिधी)
वेकोली वणी क्षेत्रातील भद्रावती तालुक्यायील ताडाळी( उर्जाग्राम) येथील मुख्यकार्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून सहाय्यक अभियंता अशोक नरडे (५६) रा. दुर्गापूर कॉलनी चंद्रपूर यांनी आत्महत्या केली. नरडे यांना मानसिक त्रासाला कंटाळले असल्याचे कडले. नरडे यांनी  आत्महत्या केल्याचे कळताच उर्जाग्राम परिसरात एकच खळबळ उडाली.

Friday, November 17, 2017

वणी वरोरा मार्गावर भीषण अपघात 1 ठार,1गंभीर जखमी

वणी वरोरा मार्गावर भीषण अपघात 1 ठार,1गंभीर जखमी

वरोरा/भद्रावती (शिरीष उगे):
वरोरा वणी मार्गावर झालेल्या बस मारुती वॅन अपघातात एक जागीच ठार तर एक जखमी  झाले आहे . हि घटना आज दि. १७ ला ४:३० वाजता शुशगंगा पोलिटेक्निक महाविद्यालय जवळ घडली.  वरोरा- वणी मार्गावरील बस क्र. MH 20 BL 2312 वणी वरून वरोरा मार्गे येत होती तर विरुद्ध दिशेने येणाऱ्या  मारुती वॅन क्र. MH34 K 2355 ला जोरदार धडक दिली  त्यात वॅन मधील एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी आहे. मृतकाचे नाव  मोहम्मद कलाम अन्सारी (३५) असून  जखमीचे व्यक्तीचे नाव  मोहम्मद मोहबीन अन्सारी (३५) असे आहे .  दोघेही वरोरा येथील निवासी होते . धडक ऐवढि जोरदार होती की वॅन चे छत गाडी पासून पूर्णतः वेगळे झाले . जखमीला वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .

Thursday, November 16, 2017

20 बैलांचा चिरडून मृत्यू

20 बैलांचा चिरडून मृत्यू



  • चंद्रपूर : नागपूर-चंद्रपूर महामार्गावर वरोरा शहराजवळ बैल तस्करी करणारा ट्रक उलटला. 
  • वरोरा वरून 3 km अंतरावर हायवे वर चिनोरा गावाजवळ 
  • जवळपास 20 बैलांचा चिरडून मृत्यू
  • चालक घटनास्थळावरुन फरार
  • छायाचित्र - शिरिश उगे, वरोरा- भद्रावती प्रतिनिधी 
  •  



वरोरा : शहरापासून  3 km अंतरावर हायवे वर चिनोरा गावाजवळ देशपांडे पेट्रोल पंप नजीक नागपूर-चंद्रपूर महामार्गावर जनावरांची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाला असून या अपघातांमध्ये ट्रक मध्ये असणाऱ्या काही जनावरांचा मृत्यू झाला असून काही जनावरे हे गंभीर जखमी आहे प्राप्त माहिती नुसार .या ट्रक मध्ये एकूण २२ गायी व बैलकोंबून नागपुर वरून चंद्रपूरकडे नेत असल्याचे निदर्शनास आले असून या सदर ट्रकच्या झालेल्या अपघातांमध्ये १० ते १५ जनावर ट्रक पलटी झाल्यामुळे मृत झाल्याची शक्यता आहे हा ट्रक जनावरांची अवैध वाहतूक करून ते जनावरे कत्तलखान्यात नेत असताना
हा अपघात झाल्याची चर्चा परिसरातील नागरिक करीत असून ट्रक चालक हा ट्रक सोडून
पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे . पोलिसांनी जे.सी.बी. च्या माध्यमातून
ट्रकला सरळ केले आहे .पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.

Wednesday, November 15, 2017

नैसर्गिक आपत्तीचा निधी मिळाला शेतकऱ्याला

नैसर्गिक आपत्तीचा निधी मिळाला शेतकऱ्याला

 वरोरा/ प्रतिनिधी:
जामनी येथील शेतकरी श्री नथ्थु चतुर यांच्या शेतात अचानक वीज कोसळल्याने यांच्या मालकीचे शेतउपयोगी दोन बैल मृत पावले होते.त्या करिता शासनाची मदत निधी म्हणून आज आमदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या हस्ते नैसर्गिक आपत्ती निधीचा ५००००/- रुपयांचा चेक देण्यात आला. त्यामुळे त्या शेतकऱ्याला आणखी शेतीपयोगी वस्तू घेण्यास मदत होणार आहे मिळालेल्या  निधीने शेतकऱ्याने आमदार धारकऱ्यांची धन्यवाद व्यक्त केले
मदत निधी देतांना तहसीलदार गोसावी साहेब,प्रमोदभाऊ मगरे वाहतूक सेना जिल्हा प्रमुख ,मनीष जेठानी युवा सेना उपजिल्हा प्रमुख श्री कुमरे तलाठी मांगली साझा, मंडळ अधिकार भांदक्कर,सरपंच विजय दातारकर,तारानाथ पावडे,बबन चतुर शिक्षक व अनेक गावकरी उपस्तीत होते.

Tuesday, November 14, 2017

आ.धानोरकरांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

आ.धानोरकरांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे


वरोरा/प्रतिनिधी :
गेल्या सहा दिवसापासून साई वर्धा पॉवर जनरेशन कंपनी विरोधात पूर्व व्रत कामावर घेण्याच्या मागणी साठी ५० कामगार अन्नत्याग आंदोलनाला बसले होते . मात्र सहा दिवस लोटूनही कंपनी व्यवस्थापना पाझर न फुटल्याने आ .बाळू धानोरकर यांनी उपोषण स्थळ भेट कामगारांना उपोषण सोडण्यास सांगितले व कामगारांना न्याय मिळवून देण्याचे आश्वसन दिले त्या नंतर कामगारांनी उपोषण सोडले .