সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, October 31, 2018

वेगळा विदर्भ की अखंड महाराष्ट्र?

वेगळा विदर्भ की अखंड महाराष्ट्र?

विदर्भ हवा कि महाराष्ट्र

वेगळा विदर्भ की अखंड महाराष्ट्र?

वाचनीय पुस्तकासाठी खाली क्लिक करा


<a target="_blank" href="https://www.amazon.in/gp/product/B00P96V9B4/ref=as_li_tl?ie=UTF8&camp=3638&creative=24630&creativeASIN=B00P96V9B4&linkCode=as2&tag=kavyashilp-21&linkId=46e43f3e3c38c0149e4baeeb54e8dd06"><img border="0" src="//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?_encoding=UTF8&MarketPlace=IN&ASIN=B00P96V9B4&ServiceVersion=20070822&ID=AsinImage&WS=1&Format=_SL250_&tag=kavyashilp-21" ></a><img src="//ir-in.amazon-adsystem.com/e/ir?t=kavyashilp-21&l=am2&o=31&a=B00P96V9B4" width="1" height="1" border="0" alt="" style="border:none !important; margin:0px !important;" />
चंद्रपुर पोलीस अधीक्षक कार्यालयात आंतरराज्य पोलीस समन्वय बैठक

चंद्रपुर पोलीस अधीक्षक कार्यालयात आंतरराज्य पोलीस समन्वय बैठक

 चंद्रपूर/प्रतिनिधी:
सीमावर्ती राज्याची सुरक्षा कायम राहावी,व राज्याच्या पोलीस विभागाने एकमेकांना सहकार्य करावे यासाठी 
चंद्रपुर पोलीस अधीक्षक कार्यालयात आंतरराज्य पोलीस समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
राज्याच्या सीमेवर विशेष लक्ष दिले जाईल तसेच नक्षली हिंसेला आऴा घालण्याकरीता छत्तीसगढ, मध्यप्रदेश आणि तेलंगणा राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून असल्याने या राज्यातील सीमेवरील जिल्ह्ये नक्षल प्रभावीत असल्याने नक्षल गतिविधीबाबत चर्चा करत एकमेकांना सहकार्य करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत आसिफाबाद (तेलंगाना) यांनी आपआपल्या जिल्हयाची भौगोलिक, राजकीय, सामाजिक,सिमावर्ती भागातील पोलीस स्टेशन, पोलीस चौक्या, आंतरराज्य तसेच राज्य महामार्गाची माहिती, नदया, जोडणारे पुल, रेल्वे मार्ग , दळणवळणाची साधने, आंतरराज्य गुन्हेगार टोळया व त्यांची कार्य पध्दतीची माहिती याबाबत सादरीकरणाद्वारे बैठकीमध्ये माहितीचे आदान प्रदान केले. तसेच घरफोडी, जबरी चोरी, दरोडा करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती व त्यांची कार्यपध्दती, हरविलेले इसम, अनोळखी मृतक, अंमली पदार्थ तस्करी याबाबतची सुध्दा माहिती एकमेकाना आदान व्हावी तसेच चंद्रपूर जिल्हयात १ एप्रील २०१५ पासुन महाराष्ट्र शासनाने चंद्रपूर जिल्हा दारूबंदी केलेली असुन तेलंगाना राज्यातील सिमावर्ती भागातुन दारूची तस्करी करणाऱ्या इसमांवर कार्यवाही करून प्रतिबंध करण्याकरीता एकमेकांशी समन्वय व संपर्क साधून नाकाबंदी लावण्याबाबत तसेच सर्व प्रकारचे तपास कामात एकमेकांशी योग्य समन्वय ठेवून सर्व प्रकारची मदत करण्याबाबत एकमत झाले.कारवाया बाबतची माहिती संकलीत करून एकमेकांना आदानप्रदान करण्याबाबत तसेच सिमावर्ती भागातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी सतत एकमेकांच्या संपर्कात राहुन योग्य समन्वय ठेवण्याबाबत मा. विषेश पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र नागपूर यांनी उपस्थित दोन्ही राज्याच्या सिमावर्ती पोलीस अधिकाऱ्याना मार्गदर्शन केले.
दिनांक 30/10/2018 रोजी मा. श्री. के. एम. एम. प्रसन्ना, विषेश पोलीस महानिरीक्षक, नागपुर परिक्षेत्र नागपूर यांचे अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर येथील मंथन हॉल मध्ये आंतरराज्य समन्वय बैठक संपन्न झाली.
सदर बैठकीमध्ये चंद्रपूर जिल्हयातील पोलीस अधिकारी व तेलंगाना राज्यातील आदिलाबाद, आसिफाबाद जिल्हयातील वरिष्ठ पोलीस अधिकारी हे प्रामुख्याने हजर होते.

सदर बैठकीला डॉ. श्री. महेष्वर रेड्डी पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री. एम. व्ही. इंगवले पोलीस उपअधिक्षक (गृह) चंद्रपूर, श्री. सुशिलकुमार नायक उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर, श्री. प्रताप डी. पवार उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा, श्री.प्रशांत परदेशी, उपविभागीय पोलीस अधिकारी, ब्रम्हुपरी, डॉ श्री. विशाल हिरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, मुल, श्री. शेखर देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा, श्री.
विलास यामावार, उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचांदूर, श्री. अमोल मांडव परीविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक चंद्रपूर,तसेच तेंलगांना राज्यातील श्री. विश्णु एस. वारीयर पोलीस अधीक्षक आदिलाबाद,श्री. मल्ला रेड्डी पोलीस अधीक्षक, आसिफाबाद ,श्री. एन. व्यंकटेश उपविभागीय पोलीस अधिकारी उटनुर जि. आदिलाबद ,श्री. सी. एच.हान्क पोलीस निरीक्षक, पो. स्टे. नारनुर , श्री. व्ही. वेनुगोपाल राव, मंडळ पोलीस निरीक्षक,
वांकडी (आसिफाबाद वांकडी), श्री. सुभाराव,पोलीस उपनिरीक्षक पो. स्टे. गटटीगुडा (आदिलाबाद) हे प्रामुख्याने हजर होते.

भाजपातर्फे सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी

भाजपातर्फे सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी

शिरपूर/प्रतिनिधी:
 भारताचे माजी उपपंतप्रधान लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची दि.31/10/2018 रोजी 143 वी जयंतीनिमित शिरपुर येथील वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करुन आदरांजली वाहिली.या कार्यक्रमास भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी,जिल्हा चिटणीस संजय आसापुरे,जिल्हा कोषाध्यक्ष आबा धाकड,भाजपा भटक्या विमुक्त आघाडी जिल्हा उपाध्यक्ष बापु लोहार,शहराध्यक्ष रविंद्र भोई,भाजपा अल्पसंख्याक जिल्हा चिटणीस जाकीर तेली आदींची उपस्थिती होती


शेतमाल तारण योजनेचा लाभ घेण्याचे आव्हाहन

शेतमाल तारण योजनेचा लाभ घेण्याचे आव्हाहन

Image result for धान बाजार समितीमूल/प्रतिनिधी:
सध्यास्थितीत धान या शेतमाला चा कापणी हंगाम सुरू असून शेतकऱ्यांना पैशाची गरज व घरी शेतमाल साठवणुकी करीता पुरेशा जागेच्या अभाव यामुळे त्यांना मिळेल त्या भावात माल विक्री करावे लागत आहे. नवीन शेतमाल निघण्याच्या आणि विक्रीचा हंगाम सुरू झाले आहे. येथील बाजार समिती मध्ये नवीन शेतमालाची आवक वाढल्याने शेतकऱ्यांना भाव कमी मिळण्याची शक्यता आहे. यात शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्या करीता मूल क्रुषि उत्पन्न बाजार समितीने शेतमाल तारण योजना सुरू केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना आपला शेतमाल तारण ठेवून एकुण किमतीच्या 75 टक्के पर्यंतची रक्कम नाममात्र व्याजदरावर कर्ज रुपात दिली जाते. बाजार समिती आवारात शेतमालाला योग्य भाव मिळाल्यास शेतकरी तारण योजनेत उचल केलेल्या कर्जाचा भरणा करून आपला माल विक्री करू शकतो. या योजनेमुळे शेतकऱ्यांची आर्थीक अडचण दूर होऊन त्यांना त्यांचा शेतमालाच्या योग्य मोबदला मिळेल. तारण योजनेत सहभागी होण्यासाठी चालू वर्षाचा पीक पेरा उल्लेख असलेला सातबारा,आधार कार्डची,बँकखाते पासबुकचा पहिल्या पानाची झेरॉक्स,100 रुपयाचे स्टम्प पेपर आदी कागदपत्रांसह कर्ज मागणी प्रस्ताव बाजार समितीकडे सादर करणे आवश्यक आहे. शेतकरी बांधवांनी आपला उत्पादीत शेतमाल इतरत्र कुठेही न विकता बाजार समिती आवारात विक्री करीता आणावा असे आवाहन घनश्याम येनुरकर यांनी केले.
बाजार समितीने केला शेतकऱ्यांचा सत्कार

बाजार समितीने केला शेतकऱ्यांचा सत्कार

मुल/प्रतिनिधी:
विक्रीसाठी प्रथम आणणाऱ्या  शेतकऱ्यांचा समितीचे सभापती घनश्याम येनुरकर यांचे हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी उपसभापती संदीप कारमवार, संचालक संजय मारकवार,राकेश रत्नावार, शांताराम कामडे, राजेंद्र कन्नमवार, अखिल गांगरेड्डीवार, किशोर घडसे, मारोती चिताडे, रमेश गोयल, बाजार समितीचे सचिव चतुर मोहूर्ले यांची  उपस्थिती होती. मूल बाजार समिती शेतकऱ्यांच्या हिताचे कार्य करीत असून अधिक भाव मिळविण्याकरीता शेतकऱ्यांनी आपला शेतमाल बाजार समीतीमध्येच आणावा असे आवाहन सभापती येनुरकर यांनी या प्रसंगी केले.
आमचा अधिकार हक्काने दया अन्यथा संघर्षातून मिळवू: जोरगेवार

आमचा अधिकार हक्काने दया अन्यथा संघर्षातून मिळवू: जोरगेवार

चंद्रपूर/प्रतिनिधी:
घरकूल लाभार्थ्यांना घरे द्या तथा नजूलच्या जागेवर वास्तव्यास असलेल्यांना कायमस्वरुपी पट्टे द्या, या मुख्य मागणीकरिता किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात शेकडो नागरिक मोर्चाच्या स्वरुपात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.

चंद्रपूर जिल्हाची ओळख अतिशय शांतप्रिय जिल्हा म्हणून आहे.त्यामुळे आमच्यावर अन्यायकारक निर्णय लादण्याची चुक करु नका, आमचा अधिकार हक्काने दया अन्यथा रस्त्यावर उतरुन संघर्षातून मिळवु असा ईशारा किशोर जोरगेवार यांनी दिला. जैन भवन जवळून निघालेल्या या मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. यावेळी पुढे बोलतांना जोरगेवार म्हणाले की, घरकुल योजनेच्या नावावर शासनाने २१७९५ हजाराहून नागरिकांडून अर्ज भरुन घेतले यातील १९ हजार ७६४ अर्ज पात्र ठरवीण्यात आले आहे. तर ०२ हजार २२२ अर्ज अपात्र ठरवीण्यात आले आहे. मात्र यात लाभार्थी ठरलेल्यांपैकी अदयाप घराचा लाभ मिळालेला नाही. त्यामूळे घरकुल लाभार्थी असूनही हक्काच घर प्रत्येक्षात साकार झालेल नाही. ही या लाभार्थ्यांची एक प्रकारे थट्टा असून शासनाने नागरिकांना फक्त घराचे स्वप्न दाखवून त्यांची फसवणुक केली आहे. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांनमध्ये रोष आहें. एकीकडे योजनेतील हक्काच्या घरापासून वंचित ठेवल्या जात आहे. तर दुसरी कडे असलेल घरही नजूलच्या जागेवर असल्याचे कारण समोर करुन त्यांना बेघर करण्याचे काम प्रशासनाकडून केल्या जात आहे. असे असतांनाही चंद्रपूकर शांत आहे. हा त्यांचा संयम आहे. मात्र त्यांचा संयम आता तुटत असून आपल्या हक्कासाठी संघर्ष करायला चंद्रपूरकर सज्ज झाला आहे. याचीच साक्ष देणारा आजचा हा अभुदपुर्व मोर्चा असून हा संघर्ष यापूढेही असाच सुरु ठेवत आणखी तिव्र करु असा ईशाराही त्यांनी यावेळी बोलतांना दिला.

हक्काच घर मिळालाच पाहिजे असा नारा बुलंद करत हा भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला यावेळी मोर्चाच्या मार्गावरील महात्मा गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर, बॅ. राजाभाऊ खोब्रागडे, इंदिरा गांधी यांच्या पुतळयाला जोरगेवार यांनी माल्यार्पण केले. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचताच जोरगेवार यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हाधिका-यांची भेट घेत आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिका-यांना दिले. घरकुल योजनेतील सर्व लाभार्थ्यांना तात्काळ घरकुल बांधून देण्यात यावे, या योजनेतील अटी शीथील करुन अपात्र ठरलेल्या अर्जंदारांनाही घकुलाचा लाभ देण्यात यावा, या योजनेची नोंदनी प्रक्रिया पुन्हा सुरु करुन अधिकाधिक नागरिकांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा, नजूलच्या जागेवर घरे बांधून राहत असलेल्या नागरिकांना स्थायी स्वरुपी पट्टे देण्यात यावे, आदि मागण्यांचा या निवेदणात समावेश आहे. या मागण्यांचे गांभिर्य लक्षात घेता जिल्हाधिका-यांनीही याबाबत तात्काळ बैठक लावण्याचे आश्वासन जोरगेवार यांना दिले. यावेळी विनोद अनंतवार, सुनील पाटील, अमोल शेंडे, देविदास बानबले, इरफान शेख, सलीम मामू, कांबळेजी, संजय बुटले, वैष्णवी मेश्राम, वंदना, हातगावकर, संतोषी चव्हाण, रजनी चिंचोळकर, शांता धांडे, माला तुरारे, सुजाता बल्ली, विजया बच्छाव, नितीन नागरिकर, टिकाराम गावंडे, आनंद इंगळे, विनोद दुर्गे, रुपेश पांडे, राशीद हुसैन, ईमरान खान, दीपक पद्मगिरीवार, किशोर बोल्लमवार, सुधीर माजरे, मुन्ना जोगी, गोपी, सुरज चव्हाण, दिलीप बेंडले, अजय सिद्धमशेट्टीवार, राहुल मोहुर्ले, नसीब गेडाम, शंकर दंतुलवार, कुणाल जोरगेवार, विजय वरवडे, यांच्यासह आदिंची उपस्थिती होती.

Tuesday, October 30, 2018

चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सेवा दलातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सेवा दलातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

चंद्रपुर/प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सेवा दलातर्फे दिनांक 31 ऑक्टोबर 2018 रोजी श्रद्धेय लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल माजी गृहमंत्री भारत सरकार यांची जयंती व माजी पंतप्रधान प्रियदर्शनी भारतरत्न स्वर्गीय इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी निमित्त व्यापक स्वरूपात रक्तदान शिबिराचे आयोजन मातोश्री सभागृह  तुकूम चंद्रपूर येथे सकाळी 11ते 5 वाजेपर्यंत करण्यात येत आहे. 

       या कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार विजय भाऊ वडेट्टीवार उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी,कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत खनके जिल्हाध्यक्ष काँग्रेस सेवादल, प्रमुख उपस्थिती माजी आमदार सुभाष भाऊ धोटे,मा.प्रकाश देवतळे जिल्हा अध्यक्ष,काँग्रेस कमिटी माननीय नंदू भाऊ नागरकर शहर जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी,चित्राताई डांगे महिला अध्यक्ष काँग्रेस कमिटी, डॉ.विजय देवतळे, डॉ.आसावरी देवतळे सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी,विनायक बांगडे, वीरेंद्र(बल्लू)गोहोकार,सुभाष गौर, नंदाताई अल्लुरवार, हरीश कोत्तावार युवक जिल्हाध्यक्ष चंद्रपूर जिल्हा काँग्रेस,सुनिता अग्रवाल महिला शहर अध्यक्ष,सुनिता लोढिया सदस्य,स्वप्निल तिवारी एम यु सी आय अध्यक्ष उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमाचे आयोजन चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सेवादल तर्फे करण्यात येत आहे. असे शिरीष तपासे अध्यक्ष, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस सेवा दल यांनी कळविले. तरीही या रक्तदान शिबिराला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित होऊन रक्तदानास सहकार्य करावे असे आवाहन शिरीष तपासे यांनी केले आहे.

Sunday, October 28, 2018

वर्धा जिल्ह्यात दुष्काळ घोषित करा

वर्धा जिल्ह्यात दुष्काळ घोषित करा

Declare drought in entire district | संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ घोषित करावर्धा/प्रतिनिधी:
शासनाने जिल्ह्यातील कारंजा (घाडगे), समुद्रपूर व आष्टी तालुक्यांमध्ये दुष्काळ केला आहे. मात्र हा दुष्काळ वर्धा  जिल्ह्यातील तीनच तालुक्यातील नसून संपूर्ण जिल्ह्याची परिस्थिती हि बिकट आहे. यंदा सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ सदृष्य स्थिती आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. कमी झालेले पर्जन्यमान यामुळे वर्धा जिल्हयामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यापैकी वर्धा हा एक जिल्हा असून पाणी टंचाईमुळे परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते परिणामी सामान्य नागरिक व शेतकरी संकटात सापडलेला आहे.राज्यातील तालुक्यांच्या यादीमध्ये वर्धा जिल्हयातील वर्धा, सेलू, देवळी, हिंगणघाट व आर्वी तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यामध्ये समावेश करावा, सोबतच संपुर्ण वर्धा जिल्हयात दुष्काळ जाहीर करावा अशी विनंती खासदार रामदास तडस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

Saturday, October 27, 2018

सलग ५ दिवस बँका बंद

सलग ५ दिवस बँका बंद

खबरबात/ऑनलाईन:
दसरा संपल्यानंतर आता नागरिकांना दिवाळीचे वेध लागले आहेत. सणासुदीचे दिवस म्हटले की, खरेदी ही आलीच. घर खर्च तसेच दिवाळी खरेदीचे आर्थिक नियोजन करायचे असल्यास बँकेतून लवकरात लवकर पैसे काढून घ्या. कारण ऐन दिवाळीत चार दिवस बँक बंद राहणार आहेत. त्यामुळे दिवाळी खरेदीसाठी पैशांची जुळणी करायची असेल तर त्याचे नियोजन नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्याआधी करून घ्या.
ऐन दिवाळीत चार दिवस बँकांना सुट्टी असल्याने नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. बुधवारी, ७ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन, गुरुवारी ८ नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडवा असे दोन दिवस बँका बंद असतील. त्यानंतर शुक्रवारी येणाऱ्या भाऊबीजेनंतर शनिवारी, ९ नोव्हेंबर व रविवार ११ नोव्हेंबर अशी दोन दिवस सुट्टी असेल.

या कालावधीत बँकांचे व्यवहार बंद असल्याने पैशाची कमतरता निर्माण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांना आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. रोखीच्या पैशासाठी नागरिक मोठ्या प्रमाणातून एटीएममधून पैसे काढण्यावर भर देण्याची शक्यता असल्याने एटीएममध्येही रोख पैशाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो.




या कंपनीत कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसमध्ये मिळते Car,Fd,आणि Flat गिफ्ट

या कंपनीत कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसमध्ये मिळते Car,Fd,आणि Flat गिफ्ट

काव्यशिल्प/ऑनलाईन:
दिवाळ सण आला की प्रत्तेक कर्मचा-यांनाब बोनसची उत्सुकता लागते दिवाळी सणांत कर्मचा-यांना बोनस सोबत भेटवस्तूही दिल्या जातात. पण सूरतमधले प्रसिद्ध हिराव्यापारी सावजी ढोलकीया मात्र आपल्या कर्मचा-यांना दिवाळीचा बोनस म्हणून सदनिका किंवा गाड्या देतात. दिवाळी आली की सावजी ढोलकिया चर्चेत येतात. यंदा दिवाळी भेट म्हणून त्यांनी आपल्या कार आणि एफडी गिफ्ट दिले आहे.
गुजरातच्या या हिरे व्यापाऱ्याने सलग चौथ्या वर्षी कर्माचऱ्यांना बंपर बोनस दिला आहे. प्रसिद्ध हिरे व्यापारी सावजी ढोलकीया यांनी बोनस म्हणून त्यांच्या सहाशे कर्मचाऱ्यांना कार आणि नऊशे कर्मचाऱ्यांना बॅंकेत एफडी (फिक्स्ड डिपॉझिट) भेट म्हणून दिली आहे. कर्मचाऱ्यांना दिवाळी भेटआणि बोनस देण्यासाठी त्यांनी ५० कोटी रुपये खर्च केले आहेत. 
‘हरे कृष्ण एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचे संस्थापक सावजी ढोलकीया हे त्यांच्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्याबाबत नेहमीच चर्चेत असतात.सावजी काका या टोपण नावाने ते हिरा व्यापाऱ्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कंपनीत सुमारे साडेपाच हजार कर्मचारी काम करतात. कंपनीची वार्षिक उलाढाल वर्षाला सहा हजार कोटी रुपये आहे. त्यांची कंपनी सुमारे ५०देशांमध्ये हिऱ्याची निर्यात करते.
त्यांनी सहाशे कर्मचाऱ्यांना मारुति सोलानो आणि रेनॉल्ट क्विड मॉडेल भेट म्हणून दिले आहे. त्यांच्या तीन व्यवस्थापकांना त्यांनी मर्सिडिज कारही दिली आहे. त्यांची किंमत प्रत्येकी एक कोटी रुपये आहे. २०१७मध्ये ढोलकिया यांनी बाराशे कर्मचाऱ्यांना कार दिल्या होत्या. दिवाळीतील बोनस म्हणून ५१ कोटी रुपये खर्च केला होता.
विधायक वडेट्टीवार की मौजुदगी में सिंदेवाही पंस की समिक्षा बैठक

विधायक वडेट्टीवार की मौजुदगी में सिंदेवाही पंस की समिक्षा बैठक

सिंदेवाही/प्रतिनिधी:
 विधायक विजय वडेट्टीवार की मौजूदगी में सिंदेवाही पंचायत समिति में समीक्षा बैठक का आयोजन किया गया. सभा में विविध विकास कार्यों का जायजा लिया गया. बैठक में जलसंकट पर नियोजन व उपाययोजना आदि पर जायजा लिया गया व जलसंकट निर्माण नहीं होने के लिए उचित उपाययोजना करने के निर्देश विधायक वडेट्टीवार ने दिए.
इस वर्ष बारिश के कमी के चलते जलस्तर की कम हुआ है. जिससे जलसंकट की ओर ध्यान देने की सुचना दी गई तथा विविध विभाग के माध्यम से चलाए जा रहे योजनाओ का लाभ लाभार्थियों को पहुंचाने तथा किसी भी लाभार्थियों पर अन्याय नहीं हो इस पर ध्यान देने की सूचना की गई. तहसील के जन्म व मृत्यु दर पर गंभीरता से नजर रखने के निर्देश स्वास्थ, शिक्षा व बालकल्याण विभाग को ध्यान रखने के आदेश दिए गए.
सभा को सिंदेवाही पंस सभापति मधुकर मडावी, सिंदेवाही पंस के उपसभापति बालबुद्धे, जिप सदस रूपा सुरपाम, सिंदेवाही तहसील कांग्रेस अध्यक्ष रमाकांत लोधे, राहुल पोरेड्डीवार, शिला कन्नाके, कुंभरे, इल्लूरकर, सरपंच, ग्रामसेवक व विविध विभाग के अधिकारी उपस्थित थे.
 रा.यु.काँग्रेसने केला जिल्हा शल्यचिकित्सकांचा घेराव

रा.यु.काँग्रेसने केला जिल्हा शल्यचिकित्सकांचा घेराव

Image may contain: 6 people, people sitting, table and indoorचंद्रपूर/प्रतिनिधी:-
मागील काही दिवसांपूर्वी चंद्रपूर च्या शासकीय रुग्णालयात चार महिन्यात एकूण 125 हून अधिक नवजात बालकांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे उघडकीस आले होते. सरकारी दवाखान्यातील मृत्यूच्या सरासरी पेक्षा हि आकडेवारी जास्त असल्यामुळे सरकारी दवाखान्यातील भोंगळ कारभाराचा विषय चव्हाट्यावर आला होता. त्यातच भर म्हणून की काय एक धक्कादायक बाब समोर आली असून *दसऱ्याच्या दिवशी तब्बल सहा नवजात बालकांचा मृत्यू झाल्याचे घटना उघडकीस आली आहे. या गंभीर विषयासंदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या नेतृत्वात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना घेराव करण्यात आला. 
चंद्रपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले असून या महाविद्यालयामुळे उच्चशिक्षित व आधुनिक तंत्रज्ञानामुळे जिल्ह्यातील रूग्णांना उत्तम दर्जाची सेवा मिळेल अशी सर्व सामान्य नागरिकांची अपेक्षा होती परंतु रूग्णालयातील भोंगळ कारभारामुळे व बालमृत्यू सारख्या गंभीर गैर प्रकारामुळे सर्व सामान्य जनतेच्या अपेक्षांचा भंग झालेला आहे. या रूग्णालयात जवाबदारी असलेल्या अनेक डॉक्टरांचे स्वतःचे शहरात दवाखाने असल्याने येथील सेवेत दुर्लक्ष करून स्वतः च्या दवाखान्यातील रूग्णांकडे जास्त वेळ व लक्ष देतात यामुळे सुध्दा सामान्य रुग्णालयातील रुग्णांचे हाल गंभीर आहे. 
व म्हणून आजारी झालेल्या रूग्णालयाच्या स्थितीकडे तातडीने लक्ष देण्यासह बालमृत्यू ला जवाबदार असणार्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळाने शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना घेराव केला. 


सदर शिष्टमंडळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, माजी जिल्हाध्यक्ष सुनील दहेगावकर, विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, शिक्षक सेलचे शहर अध्यक्ष निमेश मानकर, पंचायत समिती सदस्य पंकज ढेंगारे, माजी सरपंच अमोल ठाकरे, मागासवर्गीय सेलचे शहर अध्यक्ष महेंद्र लोखंडे, रा.वि.का.शहर अध्यक्ष सुजित उपरे, जिल्हा उपाध्यक्ष प्रदिप रत्नपारखी, जिल्हा सरचिटणीस संजय ठाकूर, प्रतिक भगत, जेष्ठ पदाधिकारी किसनराव झाडे, युवा नेते राहूल आवळे व सिंहल नगराळे, पवन बंडिवार, प्रफुल कूचनकर, संजय रामटेके, बिट्टू ढोरके, आशु मत्ते, राहूल भगत सह पदाधिकारी उपस्थित होते..
 चंद्रपूर मे शराब तस्करी के 6 आरोपियों को 3 वर्ष की कैद

चंद्रपूर मे शराब तस्करी के 6 आरोपियों को 3 वर्ष की कैद

चंद्रपूर/संवाददाता:
कोर्ट निर्णय साठी इमेज परिणाम
 चंद्रपुर जिले में शराबबंदी के बावजूद शराब की तस्करी करने वाले 6 आरोपियों को चिमूर न्यायालय ने 3-3 वर्ष कैद और 25-25 हजार रुपये जुर्माने की सजा सुनाई. 1 अप्रैल 2015 से चंद्रपुर जिले में संपूर्ण शराबबंदी की घोषणा की गई. इसके बावजूद शराब तस्कर अनेक हथकंडे अपनाकर शराब की तस्करी कर रहे हैं. 16 अप्रैल 2017 को तत्कालीन थानेदार दिनेश लबडे को गुप्त सूचना मिली थी कि शराब लाई जा रही है. इस आधार पर थानेदार ने सुधाकर माकोड़े, किशोर बोढे, राजू बावने, प्रवीण तिराणकर, शंकर उरकुड़े के साथ योजना बनाकर कार्रवाई की. जिसमें सेंट्रो कार क्र. एमएच-31 बीबी-5109 से विदेशी कम्पनी की 144 बोतल तथा संयज साठोने के घर से आफिसर च्वाइस कम्पनी की 288 बोतल शराब जब्त की थी.
कार्रवाई में पुलिस ने कुल 3,73,100 रुपए का माल जब्त कर चिमूर निवासी इब्राहिम युसूफ शेख, संजय साठोने, सोमेश्वर साठोने, और नागपुर निवासी राहुल शिमले, अमोल राऊत, तुषार बेतवार को धर दबोचा. चिमूर पुलिस ने आरोपियों के खिलाफ मामला दर्ज कर न्यायालय में चार्जशीट दाखिल की. न्यायाधीश एस.एस. छलानी ने गवाहों के बयान और सबूत के आधार पर संजय साठोने ,सोमेशवर साठोने इब्राहिम शेख, राहुल शिमले, अमोल राऊत, तुषार बेतवार को 3-3 वर्ष कैद और 25-25 हजार रुपये जुर्माने की सजा सुनाई है. जुर्माना नहीं भरने पर 6 महीने अतिरिक्त सजा का प्रावधान रखा है. इसके पूर्व सुरेश खोब्रागड़े, प्रमोद खोब्रागड़े, राजकुमार चाचरकर, राजू झाड़े, अविनाश पोईनकर को भी न्यायालय ने सजा सुनाई थी. सामूहिक शराब तस्करी मामले में न्यायालय ने पहली बार सजा सुनाई है.
चंद्रपूर के नागरीकोंनो राष्ट्रीय एकता दौड़ में हिस्सा लेने की अपील

चंद्रपूर के नागरीकोंनो राष्ट्रीय एकता दौड़ में हिस्सा लेने की अपील

संबंधित इमेजचंद्रपुर/संवाददाता:
 भारत के लौह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल ने भारत के स्वतंत्रता आंदोलन में पश्चात अखंड भारत के निर्माण के लिए दिए महत्वपूर्ण योगदान दिया. उनके कार्य से जनता को प्रेरणा मिलने के उद्देश्य से राष्ट्रीय एकता सप्ताह के तहत 31 अक्टूबर की सुबह 6.30 बजे एकता दौड़ का आयोजन किया गया है. स्पर्धा पुरुष खुला गट व महिला खुला गट में होगी. दौड़ जिला खेल संकुल से शुरू होगी. जनता महाविद्यालय, वरोरा नाका, प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह से वापस वरोरा नाका से जिला क्रीड़ा संकुल पहुंचेगी. जिले के नागरिक, विद्यार्थी, युवक व खिलाड़ियों को बड़ी संख्या में शामिल होने की अपील जिला खेल अधिकारी अनंत बोबडे ने की है
कांग्रेस के प्रोजेक्ट शक्ति से जुड़े कई युवा

कांग्रेस के प्रोजेक्ट शक्ति से जुड़े कई युवा

कांग्रेस के प्रोजेक्ट शक्ति से जुड़े कई युवाचंद्रपुर/संवाददाता:
 जिला शहर कांग्रेस कमेटी की ओर से शहर के 17 प्रभागों में नए मतदाता पंजीयन व प्रोजेक्ट शक्ति पंजीयन अभियान चलाया गया. अभियान के दौरान प्रभारी किशोर गजभिये ने प्रभाग में लगाए गए बूथ को भेंट देकर पंजीयन अभियान का जायजा लिया. अभियान के दौरान 2,000 से अधिक मतदाताओं ने पंजीयन किया. सैकड़ों युवाओं शक्ति एप द्वारा कांग्रेस से जुड़े.

कांग्रेस पार्षद सुनीता लोढिया, अमजद अली इराणी, संगीता भोयर, अनिल सुरपाम, हरिदास लांडे, राजू दास, गौतम चिकाटे, नितिन नंदिगमवार, अजय खंडेलवार, विकास टिकेदार, दीपक काटकोजवर, प्रकाश अधिकारी, सुरेश आत्राम, बंडू लांजेवार, मनोज वासेकर, अशपक शेख, राजेंद्र वाघाड़े, विट्ठल धांदरे आदि ने प्रयास किया. प्रभारी गजभिये ने रेस्ट हाउस में सभी कांग्रेस पदाधिकारियों के साथ नए मतदाता पंजीयन व प्रोजेक्ट शक्ति पंजीकर को लेकर समीक्षा बैठक ली. इस अवसर पर सुभाषसिंह गौर, महिला कांग्रेस जिलाध्यक्ष चित्रा डांगे, महिला शहराध्यक्ष सुनीता अग्रवाल, शिवाराव, राजू रेड्डी, हरीष कोत्तावार, राजेश अड्डूर, विनोद दत्तात्रय, महेश मेंढे, शालिनी भगत, संजय रत्नपारखी, रूचित दवे, बंडोपंथ तातावार, वंदना भागवत, अरविंद मडावी, एजाज, युसूफ, केशव रामटेके, श्याम राजुरकर, अनिता चवरे आदि उपस्थित थे.

Thursday, October 25, 2018

सेल्फी स्ट्रीक

सेल्फी स्ट्रीक

मोबाईलवर सेल्फी काढताय. अनेकदा धोका होऊ शकतो. सेल्फीने घेतला जीव अशा बातम्या आपण नेहमीच वाचल्या असतील. हा धोका टाळण्यासाठी सेल्फी स्ट्रीक selfie stickचा वापर करा.
खालील छायाचित्रावर क्लिक करा बघा वेगवेगळे मनपसंद
selfie stick



Wednesday, October 24, 2018

चंद्रपुरात एकाच घरातील दोघांचा खून

चंद्रपुरात एकाच घरातील दोघांचा खून

आजी आणि नातनीची गळा दाबून हत्या

 घटनेने चंद्रपूर हादरलं 
चंद्रपुर/प्रतिनिधी:
चंद्रपूर शहरातील बालाजी वार्ड येथे आजी आणि नातनीची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे.या घटनेने चंद्रपूर हादरलं गेलं आहे.सुशीला पिंपळकर असे मृत आजीचे नाव असून यात तिच्या पाच वर्षीय नातीची सुद्धा हत्या करण्यात आली आहे.या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत,उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, ठाणेदार भगत यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. हत्येचे कारण अजूनही समजले नसून पुढील तपास चंद्रपूर पोलीस करीत आहे

Tuesday, October 23, 2018

फँड्री’आणि‘सैराट’च्या यशानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार "नाळ"

फँड्री’आणि‘सैराट’च्या यशानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार "नाळ"


एका छोट्या मुलाचं भावनिक विश्व उलगडणारा सिनेमा "नाळ"
खबरबात /वेब टीम:
फँड्री’ आणि ‘सैराट’च्या अभूतपूर्व यशानंतर पुन्हा एकदा झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे आणखी एक मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. ‘नाळ’ असे या सिनेमाचे नाव असून त्याची निर्मिती स्वतः नागराज मंजुळे करत आहेत. या सिनेमाचा टीजर नुकताच सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आला.‘सैराट’चे कॅमेरामन सुधाकर रेड्डी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमाच्या निमित्ताने नागराज निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकत आहेत. ‘सैराट’चे कॅमेरामन सुधाकर रेड्डी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.आई मला खेळायला जायचं .जाऊ दे न व ...या ३ मिनिट ४४ सेकंदाच्या टीजरने सिनेमाच्या कथेविषयी उत्सुकता वाढवली आहे..या निव्वळ चार दिवसात या विडीओला जवळपास १४ लाख लोकांनी बघितले असून प्रत्येकाच्या मोबाईलचा हा विडीओ स्टेटस बनत चालला आहे.

Saturday, October 20, 2018

चंद्रपूर प्रेस क्लब येथे संदर्भ ग्रंथालयाचे उद्घाटन

चंद्रपूर प्रेस क्लब येथे संदर्भ ग्रंथालयाचे उद्घाटन

Inauguration of reference library at Chandrapur Press Club | चंद्रपूर प्रेस क्लब येथे संदर्भ ग्रंथालयाचे उद्घाटनचंद्रपूर/प्रतिनिधी:
 चंद्रपूर प्रेस क्लबच्या संदर्भ ग्रंथालयाचे उद्घाटन गुरूवारी जिल्हा परिषदचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून विदर्भ साहित्य संघाच्या केंद्रीय कार्यकारिणी समिती सदस्य तथा लेखिका डॉ. पद्मरेखा धनकर वानखेडे, भाजपाचे जिल्हा महासचिव रामपाल सिंग, शहर कॉंग्रेस अध्यक्ष नंदू नागरकर, चंद्रपूर प्रेस क्लब अध्यक्ष संजय तायडे मंचावर उपस्थित होते.
पत्रकारिता प्रगल्भ व्हावी यासाठी ग्रंथालयाचे मोठे योगदान असते. पत्रकारांना विविध संदर्भासाठी ग्रंथाची गरज असते आणि म्हणून आणि म्हणून चंद्रपूर प्रेस क्लबमध्येही संदर्भ ग्रंथालय तयार व्हावे अशी इच्छा व्यक्त करीत, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ग्रंथालयासाठी पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले. शिवाय लवकरात लवकर हे ग्रंथालय सुरू करा, असे क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आणि अवघ्या तीन- चार दिवसात या गं्रथालयाचे उदघाटनसुध्दा झाले, हा शुभसंकेत आहे. पुढेही शासन निधीतून या ग्रंथालयासाठी मोठी मदत केली जाईल, असे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यानी दिली. याप्रसंगी नंदू नागरकर यांनी ग्रंथालयाला नगरसेवक निधीतून एक लाखांची पुस्तके उपलब्ध करून देण्याची घोषणा केली.
याप्रसंगी रामपालसिंग यांचेही येथोचित भाषण झाले. या प्रसंगी वर्तमानपत्राचे वितरक बंटी चोरडिया यांचा देवराव भोंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. पुस्तक हे वैचारिक भुकेचे पोषण करणारे तत्व आहे. सोशल मिडियावर बातम्या पाहता येतात. पण दुसºया दिवशीच्या वर्तमानपत्राची आतुरतेने वाट बघतोच. पुस्तकही अशीच अनुभूती देते. ग्रंथालयाच्या माध्यमातून विचारांचे आंदान प्रदानही होते, असे विचार डॉ. पद्मरेखा धनकर- वानखेडे यांनी व्यक्त केले.

Friday, October 19, 2018

वणी-चंद्रपूर मार्गेने दारू तस्करी;एकाला अटक

वणी-चंद्रपूर मार्गेने दारू तस्करी;एकाला अटक

  गाडीत विशेष खप्पा तयार करून करण्यात येत होती दारू तस्करी 
                                   १० लाखांचा मुद्देमाल जप्त

चंद्रपूर/प्रातिनिधी:
वणी-चंद्रपूर मार्गेने दारू तस्करी करणाऱ्या दारू तस्कराला चंद्रपूर
 स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली अटक


चंद्रपूर येथील रयतवारी कॉलरी परिसरात करण्यात आली कारवाई
 रणजीत खरवार असे दारू तस्कराचे नाव  

 गुप्त माहितीच्या आधारे केली पोलिसांनी कारवाई 
 स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर अंभोरे  यांच्या नेतृत्वात  सहायक पोलिस निरीक्षक सुधीर बोरकुटे, दौलत चालखुरे, कुंदन सिंग बावरी, प्रांजल झिलपे यांनी छापा टाकण्यात आला. 
  चालक रणजीत खरवार याला ताब्यात घेण्यात आले. तर दोघे पसार झालेत. 

यावेळी पोलिसांनी दारूसाठा, व वाहन असा एकूण दहा लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.  
-------------------------------------------------------------------
शहर पोलीस कारवाई 
1400 नग देशी दारू किं अंदाजे 1, 40,000/- चा माल व एक मोपेड गाडी किं अंदाजे 30, 000/- असा एकूण 1,70,000/-  रु चा माल आरोपी नामे अक्षय देविदास बारस्कर वय 20 वर्ष रा. लालपेठ जुनी वस्ती चंद्रपूर  व इतर एका आरोपीस अटक 
Api देवेंद्र ठाकूर,  अमोल गिरडकर ड्राइवर रामटेके यांची कारवाई 


 चंद्रपुरात धारधार शस्त्राने युवकाची हत्या

चंद्रपुरात धारधार शस्त्राने युवकाची हत्या

बल्लारपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे युवकाची धारधार शस्त्राने हत्या 
शिवीगाळ केल्याने करण्यात आली हत्या 
खून साठी इमेज परिणामबल्लारपूर शांती नगर येथील गणेश बंडु दाडंगे (17) हा गेल्या २ ते ३ दिवसापासून नगर परिषद समोर असणाऱ्या भंगार व्यवसाईक आरिफ मो. शरिफ शेख (30) याला शिवीगाळ करत असल्याने मनात राग धरून दसर्याच्या दिवशी संध्याकाळी पेपर मिल मागे बल्लारपूर-विसापूर मार्गावर चाकूने गळा कापून हत्या केली.या  हत्येनंतर आरोपीनेच बल्लारपूर पोलिसांना घटनेची माहिती देत स्वताला पोलिसांच्या स्वाधीन केले.लगेच आरोपीच्या सांगण्यावरून त्याला अटक करण्यात आली.घटनेनंतर अप्पर पुलिस अधीक्षक हेमराजसिंह राजपुत यांनी घटनास्थळी भेट दिली.या संपूर्ण खून प्रकरणात आणखी काही आरोपी असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्रातील सर्वाधिक देखणे पोलीस स्टेशन असलेले शहर म्हणून बल्लारपूर पोलीस स्टेशनचे राज्याचे वित्त नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन झाले.या नंतर एका आठवड्यातच येथे खुनाची घटना घडली.
दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा

आवाळपुर/प्रतिनिधी :-
समाजऋनातून उतराई होण्याचा छोटासा प्रयत्न म्हणून जवाहरलाल नेहरु विद्यालय आवालपूर ता. कोरपना येथील सेवानिवृत्त प्राचार्य आदरणीय डाहूले गुरुजी यांची नात तथा गडचांदूर नगरीतील प्रसिध्द मेडिकल व्यावसायिक विजुभाऊ डाहूले यांची कन्या कु. आर्या चा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरले व त्यासाठी त्यांनी जिवती तालुक्यातील आदिवासी बहुल व अतिदुर्गम अशा सितागुडा या शाळेतील मुलासोबत साजरा करण्याचा मानस विजुभाऊ यांनी त्यांचे परम बालमित्र व सितागुडा शाळेचे मुख्याध्यापक मोहन वाभीटकर यांचेकडे व्यक्त केला व त्यांचा या हेतूला मूर्त रूप देण्याचे ठरले. 
डाहूले परिवाराने आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून सहपरिवार सीतागुडा शाळेत येऊन शालेय मुलासोबत मोठ्या आनंदाने वाढदिवस साजरा केला व सितागुडा शाळेतील मुलांना शालेय दप्तर, नोटबुक व शालेय उपयोगी साहित्य कु. आर्या हिचे हस्ते वितरित करून अनोख्या पद्धतीने साजरा करून समाजात एक आदर्श निर्माण केला व सामाजिक दृष्ट्या वंचित मुलांच्या मनात आनंदाचा क्षण आणला. सदर कार्यक्रमाला शा. व्य. स. सितागुडा चे अध्यक्ष तथा सर्व सदस्य, पालकवर्ग व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच मा. चंद्रकांत पांडे,प्रमोद गावंडे,मा.खुशाल वानखेडे , स.शिक्षक संतोष जुलमे , सौ. वाभीटकर उपस्थित होते. डाहूले परिवार व त्यांच्या कार्याला तसेच कल्पनेला मूर्तरूप देण्यासाठी प्रयत्न करणारे मोहन वाभीटकर व संतोष जुलमे मोलाचे कार्य केले.








 हंसराज अहीर यांच्या हस्ते प्लास्टीक चाचणी केंद्र व कॅड केंम लॅबचे उद्घाटन

हंसराज अहीर यांच्या हस्ते प्लास्टीक चाचणी केंद्र व कॅड केंम लॅबचे उद्घाटन

चंद्रपूर/प्रतिनिधी: 
सेंट्रल आॅफ प्लास्टीक इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नोलाॅजी (सिपेट), रसायन आणि उर्वरक विभाग, रसायन आणि खते मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत चालणारे राष्ट्रीय दर्जाचे केंद्र असुन ISO 9001:2008 QMS,ISO/IEC 17025,ISO/IEC 17020 प्रत्यायनाने प्रमाणित आहे. 
सिपेट संस्था प्लास्टीक अभियांत्रिकी आणि तंत्राज्ञान क्षेत्रात 1968 मध्ये स्थापन झाली आणि आता भारतातील 32 शहरा मध्ये कार्यरत आहे. सिपेट संस्था ही शैक्षणिक, तंत्रा सहायक सेवा, संशोधन आणि संबंधित उद्योगांच्या विकासासाठी समर्पित आहे. 
सिपेट चंद्रपूर हा प्रकल्प उभारण्यासाठी भारत सरकार कडून रू. 51.32 कोटी मंजूर करण्यात आले आहे. ज्यामध्ये भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने 50ः50 शेअर आधारावर संस्थेचे बांधकाम आणि तांत्रिक उभारणीकरिता मजूरी मिळाली आहे. 
महाराष्ट्र शासनाकडून औद्योगिक क्षेत्रातील चंद्रपूर येथे सिपेटचे केंद्र स्थापेनसाठी 15 एकर जमीन विनामूल्य मिळाली आहे आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाद्वारे 25.66 कोटी रूपयांची तरतूद केली आहे. 
सद्यस्थितीत सिपेटचे प्रशिक्षण कार्य प्लाॅट नं. 107/43, चैहान काॅलनी, तीर्थरूप नगर, वेकोलि क्वार्टर, चंद्रपूर येथे भाडयाने घेतलेल्या जागेवर प्रगतीपथावर सुरू आहे. संस्थेत उच्चस्तरीय साॅफ्टवेअर असलेल्या कॅटीया, युनिग्राफिक्स, मास्टरकॅम इत्यादीसह परिष्कृत प्लास्टीक चाचणी यंत्राणा आणि संगणक सहाय्यक डिझाइन प्रयोगशाळेसह प्लास्टीक चाचणी प्रयोगशाळेचे उद्घाटन आज दि 18 आॅक्टोंबर 2018 रोजी नवमी व दसरा पूजनाचे निमित्त साधून मा. हंसराज अहीर, केंद्रीय गृह राज्यमंत्राी, भारत सरकार यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, नगरसेवक संदीप आवारी, सुनिल डोंगरे, रवि गुरनुले, श्रीकांत भोयर आदी उपस्थित होते. 
यावेळी मा. मंत्राी महोदयांनी सिपेट चंद्रपूर येथे डिप्लोमा या कोर्सेला प्रशिक्षण घेणाÚया प्रथम बॅचच्या विद्याथ्र्यांशी संवाद साधला. त्यांनी विद्याथ्र्यांना प्लास्टीक डिप्लोमा कोर्स निवडल्याबद्दल आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी सिपेट चंद्रपूर येथे प्रशिक्षण आणि तांत्रिक सेवांसाठी तयार केलेल्या पायाभूत सुविधांचे कौतुक केले. डिप्लोमाच्या विद्याथ्र्यांनी सिपेट चंद्रपूर येथे आपले मत व्यक्त केले. 
सिपेट चंद्रपूर येथे 2016-17 पासून 1800 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षित झालेले आहेत व सध्या 180 प्रशिक्षणार्थी विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रशिक्षण घेत आहेत तसेच प्लेसमेंट टक्केवारी 83 टक्के इतकी आहे. उद्घाटन समारंभाच्या दरम्यान श्री. प्रविण बच्छाव, व्यवस्थापक (प्रकल्प), सिपेट चंद्रपूर यांनी मुख्य पाहुणे व इतर प्रतिष्ठीत अतिथी आणि मान्यवर आणि विद्याथ्र्यांचे स्वागत केले. तसेच सिपेट चंद्रपूरच्या कार्यकलापांची माहिती दिली आणि अखेरीस प्रतिष्ठीत अतिथींचे आभार मानले.
वेकोलि ठेकेदारों की 20 से बेमियादी हड़ताल

वेकोलि ठेकेदारों की 20 से बेमियादी हड़ताल

हडताल साठी इमेज परिणामचंद्रपुर.
वेकोलि ठेकेदार एसोसिएशन ने अपनी विभिन्न मांगों को लेकर 20 अक्टूबर से बेमियादी हड़ताल पर जाने की चेतावनी दी है. जिससे वेकोलि की 6 क्षेत्रों में कोयला परिवहन, पर्यावरण रक्षा तथा वाहनों की आवाजाही जैसे कार्य बुरी तरह से प्रभावित होने की आशंका है. पत्रपरिषद में एसोसिएशन के अध्यक्ष रमेश सिंह तथा अन्य पदाधिकारियों ने बताया कि एसोसिएशन की विभिन्न मांगों को लेकर पदाधिकारियों की प्रशासन के साथ वेकोलि मुख्यालय नागपुर में अगस्त माह में एक महत्वपूर्ण बैठक हुई थी. बैठक में वेकोलि प्रशासन ने ठेकेदारों की मांगों पर सकारात्मक निर्णय लेने का आश्वासन दिया था. किंतु सिर्फ जीएसटी की एक मांग को छोड़कर अन्य मांगों को दरकिनार कर दिया गया. जिससे एसोसिएशन को अब मजबूरन बेमियादी हड़ताल पर जाने का निर्णय लेना पड़ा है.
कई मांगों पर अब तक निर्णय नहीं
उन्होंने बताया कि कई मांगों पर अब तक निर्णय नहीं लिया गया है. ठेकेदारों के यहां कार्यरत श्रमिकों का प्रोविडंट फंड का एक अंशदान नियमों के अनुसार वेकोलि के प्रशासन को भरना जरूरी होता है. किंतु वेकोलि प्रशासन यह अंशदान देने में आनाकानी कर रहा है. प्रशासन अंशदान का यह हिस्सा भी ठेकेदारों द्वारा अपने मुनाफे में से जमा करने के लिए दबाव डाल रहा है. श्रमिकों के संदर्भ में सभी आवश्यक जानकारी संबंधित ठेकेदारों द्वारा वेकोलि के पोर्टल पर अपलोड की जाती है. बावजूद इसके वेकोलि प्रशासन ठेकेदारों पर श्रमिकों का एलपीसी पेश करने के लिए बाध्य कर रहा है, जबकि ऐसी कोई प्रक्रिया रेलवे, लोकनिर्माण विभाग, जिला परिषद, एनआईटी जैसे आर्गनाइजेशन में अनिवार्य नहीं है. इसी तरह से श्रमिकों के लिए बायोमीट्रिक प्रणाली भी ठेकेदारों के लिए अनिवार्य की गई है, जो न केवल तकलीफदेह है, बल्कि समय की बर्बादी भी है.

प्रशासन नहीं दे रहा ध्यान
उन्होंने स्पष्ट किया कि ऐसी ही कई अन्य मांगें हैं, जिसके लिए एसोसिएशन निरंतर वेकोलि प्रशासन से संपर्क में है. लेकिन प्रशासन मांगों को स्वीकार करने में कोताही बरत रहा है. वेकोलि प्रशासन की यह सारी अन्यायपूर्ण नीतियों के चलते ठेकेदारों से अधिक श्रमिकों पर ही अन्याय हो रहा है. प्रशासन श्रमिकों का अधिकार छीनने का प्रयास कर रही है. गलत नीतियों के चलते ठेकेदार भी श्रमिकों को पिछले डेढ़ वर्ष से काम देने में अक्षम साबित हो रहे हैं. उन्होंने कहा कि 20 अक्टूबर से शुरू हो रही हड़ताल से वेकोलि के चंद्रपुर, बल्लारपुर, वणी, वणी नार्थ, माजरी क्षेत्र समेत सेंट्रल वर्कशाप ताडाली में कई ठेकेदारी कार्य ठप होने की स्थिति बनी है. पत्रपरिषद में राहुल त्रिपाठी, घनश्याम चतुर्वेदी, मनोज सिंह, उमाशंकर सिंह, कमलेश शुक्ला, संजय सिंह, बीरबहादुर सिंह, राकेश सिंह, घनश्याम सिंह, संजय दमाये प्रमुखता से मौजूद थे.
(नवभारत वृत्त)
पुण्यनगरी 

 नागपुरात शालेय विद्यार्थ्यांचे अपहरण करून खंडणी उखडणारी टोळी अटकेत

नागपुरात शालेय विद्यार्थ्यांचे अपहरण करून खंडणी उखडणारी टोळी अटकेत

नागपूर/प्रतिनिधी:


पैसे कमवायच्या लालसेपोटी शालेय विद्यार्थ्यांचे अपहरण करणाऱ्या टोळीचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कुटुंबीयांपासून लपून धूम्रपान करणाऱ्या किंवा इतर व्यसन करणारे शाळेतील, महाविद्यालयातील विद्यार्थी या टोळीचे सूत्रधार हे विध्यार्थ्यांवर लपून लक्ष ठेवत होते आणि विध्यार्थी व्यसन करतांना दिसला कि त्याला उचलून टोळीच्या सूत्रधाराच्या घरी नेण्यात येत होते.२६ सप्टेंबरला आरोपींनी खंडणीसाठी अयोध्यानगर येथील रहिवासी हिमांशु सुनील कातरे याचे अपहरण केले.व त्याला दमदाटी करून मारहाण केली.आरोपींनी हिमांशुला अधिक पैशांची मागणी करून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. हिमांशुचे फोटो त्याच्या वडिलांना पाठवून खंडणी मागितली. हिमांशुने रक्कम आणून देण्याचे आश्वासन दिले. तेथून तो पळून जाण्यात यशस्वी झाला. 
दोन दिवसांपूर्वी हिंमत करून पीडित कुटुंबीयांनी सक्करदरा पोलिसात तक्रार दाखल केल्यामुळे प्रकरणाचा खुलासा झाला. 
 भीतीपोटी कुणीच या टोळीविरुद्ध तक्रार करण्याची हिंमत दाखविली नसल्याने या टोळीतील सदस्यांचे चांगलेच फोफावत होते.त्यानंतर हिमांशु आणि त्याच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर सक्करदरा पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३९२, ३६३, ३८४, ३४ नुसार गुन्हा दाखल करून टोळीचा सूत्रधार बिट्टु, प्रज्ज्वल आणि फैजानला अटक केली. टोळीतील इतर सदस्य अद्यापही फरार आहेत.











Thursday, October 18, 2018

 महावितरण अभियंतापदासाठी २० आणि २१ रोजी ऑनलाईन परीक्षा

महावितरण अभियंतापदासाठी २० आणि २१ रोजी ऑनलाईन परीक्षा

संबंधित इमेजनागपूर/प्रतिनिधी:
महावितरणमध्ये पदवीधर अभियंता (प्रशिक्षणार्थी) आणि पदवीका अभियंता (प्रशिक्षणार्थी) या पदासाठी येत्या २० आणि २१ ऑक्टोबर २०१८ रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. पदवीधर अभियंता (प्रशिक्षणार्थी) पदासाठी दिनांक २० रोजी सकाळच्या सत्रात तर पदवीका अभियंता (प्रशिक्षणार्थी) पदासाठी २१ रोजी सकाळ आणि दुपार अश्या दोन सत्रात ही परीक्षा होईल. विदर्भातील नागपूर,चंद्रपूर आणि अमरावती येथील १३ केंद्रावर या परीक्षा होणार आहेत. 
पदवीधर अभियंता (प्रशिक्षणार्थी) आणि पदवीका अभियंता (प्रशिक्षणार्थी) या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना आवंटीत केलेल्या परीक्षा केंद्राची माहिती प्रवेश पत्रावर देण्यात आली आहे. उमेदवाराने त्याचे प्रवेशपत्रावर स्वतःचा फोटो चिटकवून सोबत प्रवेश पत्रावरील असलेल्या नावाचे मूळ ओळखपत्र (ओळखपत्राचा सविस्तर उल्लेख प्रवेशपत्रावर केला आहे.)त्याच्या छायाप्रतीसह परीक्षा केंद्रात हजर राहणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी सकाळच्या सत्रात सकाळी ९.१५ वाजेपूर्वी तर दुपारी १.१५ पूर्वी दाखल होणे आवश्यक आहे. उशिरा येणाऱ्या किंवा मूळ ओळखपत्र आणि सोबत त्याची छायाप्रत सोबत नसलेल्या उमेदवारांना केंद्राच्या आत प्रवेश करता येणार नाही. 
नागपूरातील ५ केंद्रावर पदवीधर अभियंता (प्रशिक्षणार्थी)पदासाठी २,६३२ तर कनिष्ठ अभियंता पदवीका अभियंता (प्रशिक्षणार्थी) या पदासाठी ३,९५४ उमेदवार परीक्षा देणार आहेत.अमरावती केंद्रावर १२५४ पदवीधारक तर २१७१ पदविकाधारक उमेदवार ४ केंद्रावर तर चंद्रपूर केंद्रावर ३८५ पदवीधारक ७६० पदविकाधारक उमेदवार ४ केंद्रावर परीक्षा देणार आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चंद्रपूर;विजयादशमी उत्सव

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चंद्रपूर;विजयादशमी उत्सव

चंद्रपूर/प्रतिनिधी:
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चंद्रपूर नगर चा विजयादशमी उत्सव दि २० /१०/२०१८ ठीक सायं ०६.३० वाजता. लोकमान्य टिळक विद्यालय सिविल लाईन, चंद्रपूर येथे आयोजीत केला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मा.प्राचार्य डॉ.अशोक जीवतोडे,सचिव, चांदा शिक्षक प्रसारक मंडळ, चंद्रपूर हे उपस्थित असणार आहे. प्रमुख वक्ते म्हणून विदर्भ प्रांताचे प्रांत सह-कार्यवाहक मा. अतुल मोघे, नागपूर हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. तरी चंद्रपूर शहरातील सर्व स्वयंसेवकानी व नागरीकांनी या जाहीर कार्यक्रमाला उपस्थित राहावे.असे आव्हान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, चंद्रपूर नगर तर्फे करण्यात येत आहे.
  नीता केळकर यांची मराविमं स्वतंत्र संचालक पदी नेमणूक

नीता केळकर यांची मराविमं स्वतंत्र संचालक पदी नेमणूक

 नागपूर/प्रतिनिधी:
श्रीमती नीता केळकर यांची मराविमं सूत्रधार कंपनीत स्वतंत्र संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली. संचालक मंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत त्यांची नियुक्ती करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते.
श्रीमती केळकर मुळच्या सांगलीच्या रहिवासी असून सिव्हील इंजिनियर आहेत. तसेच महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रमात सुध्दा त्यांचा सहभाग असतो.
श्रीमती केळकर यांच्या स्वतंत्र संचालक म्हणून केलेल्या नियुक्तीने मराविमं सूत्रधारी कंपनीत असलेली स्वतंत्र संचालकाची रिक्त जागा पुर्ण झाली आहे. संचालकांच्या बैठकीला ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावर, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार, महापारेषचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन नैनुटिया, सुनील पिंपळखुटे संचालक (वित्त), विश्वास पाठक, प्रकाश पागे व राजेंद्र गोयंका उपस्थित होते.
लालपेठ येथे बतुकम्मा महोत्सवाचे यशस्वी आयोजन

लालपेठ येथे बतुकम्मा महोत्सवाचे यशस्वी आयोजन

बेटी बचावो, बेटी बढाओ’ ही आमची प्राथमिकता व जबाबदारी:हंसराज अहीर
चंद्रपूर/प्रतिनिधी:
तेलगू भाषीक बांधवांचा अत्यंत महत्वपूर्ण सण बतुकम्मा महोत्सवाचे आयोजन डाॅ. शामाप्रसाद मुखर्जी तेलुगू हायस्कुल, लालपेठ काॅलरी, चंद्रपूर येथे दि. 16 आॅक्टोंबर 2018ला बतुकम्मा महोत्सव कमीटीच्या वतीने करण्यात आला. 
बतुकम्मा महोत्सवात उपस्थिती तेलुगू भाषिक बंधु-भगीनींना संबोधित करतांना केंद्रीय गृह राज्यमंत्राी ना. हंसराज अहीर यांनी मान. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही केलेली घोषणा केवळ घोषणा नसुन आम्हा सर्वांची प्राथमिकता व जबाबदारी आहे. मुलींच्या सुरक्षेसोबतच सर्वच क्षेत्रात मुलींची प्रगती व्हावी म्हणून आम्ही सतत प्रयत्नरत राहू. 
भारतीय जनता पार्टीने तेलंगना प्रदेशाची प्रभारी म्हणून जबाबदाीर दिल्यावर मला तेथील संस्कृती जवळून पाहण्याचा योग आला व त्यातुनच या बतुकम्मा महोत्सवाचे भव्य आयोजन करण्याची प्रेरणा मिळाल्याचे प्रतिपादन ना. अहीर यांनी केले. चंद्रपूर क्षेत्रात लाखोंच्या संख्येने तेलुगू भाषीक वास्तव्यास असून तेलगू भाषीक भगीनींचा हा सण दरवर्षी साजरा करणार असल्याची घोषणाही त्यांनी याप्रसंगी केली. 
तेलंगणाचे आमदार किशन रेड्डी यांनी आपल्या भाषणात तेलुगू भाषीकांसाठी इतक्या तळमळीने या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल ना. अहीर यांचे आभार मानत आम्ही हैदराबाद मध्ये देखील इतका भव्य व सुंदर कार्यक्रम बतुकम्मा महोत्सव आयोजित करू शकत नसल्याची कबुली दिली. त्यांनी उपस्थित तेलुगू महिलांना बतुकम्मा महोत्सवासाठी आणखी तयारी करण्याचे आवाहन करीत पुढील वर्षी तेलंगणातुन महिलांचा बतुकम्मा समुह व फिल्म इंडस्ट्रीजची सेलीब्रिटी आण्याचे आश्वासन दिले. 
या कार्यक्रमात आ. नानाजी शामकुळे यांनी देखील तेलुगू भाषीकांना प्रोत्साहन पर भाषण देत बतुकम्मा महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्यात. या प्रसंगी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, महापौर अंजलीताई घोटेकर, जिल्हाधिकारी डाॅ. कुणाल खेमणार, पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी इत्यादी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. 
या कार्यक्रमास उपमहापौर अनिल फुलझेले, श्रीधर रेड्डी, दिनकर पावडे, मोहन चैधरी, नगरसेविका कल्पना बागुलकर, ज्योती गेडाम, माया उईके, शिला चव्हाण, निलम आक्केवार, नगरसेवक संदीप आवारी, उपक्षेत्रिय प्रबंधक हलदर, गणेश गेडाम, जितेंद्र धोटे, सतिश तिवारी, दिनकर पावडे, बतुकम्मा कमेटीचे अध्यक्ष तथा मनपा झोन सभापती श्याम कनकम, सदस्य संजय मिसलवार, राजेश तिवारी, श्रीनिवास रंगेरी, राजू कामपेल्ली, रामलु भंडारी, राजेश कोमल्ला, रामस्वामी पुरेड्डी, श्रीनिवास येरकल, श्रीनिवास झुनझुल, कुमार इदनुरी, रमेश मोकनपेल्ली, क्रिष्णा कारंगल, राजेश मिष्ठा, तिरूपती बुडदी, भुमन्ना दोम्मटी, गट्टया जुपाका, सारया पोटला, सुनिल मिसलवार, सीनु मेकला, महादेव अरेनार, तेजा सिंग, सुरेश गोलीवार, नरेश पुजारी, भानेष चिलमील, कृणाल गुंडावार, पराग मलोडे, संदीप आगलावे, आकाश लख्खाकुला, शैलेश दिंडेवार व लालपेठ परिसरातील बहुसंख्य तेलुगूभाषीक नागरिकांची उपस्थिती होती.

प्रत्येक घरात सैनिक जन्मावा

प्रत्येक घरात सैनिक जन्मावा

सन्मित्र सैनिकी विद्यालयातील शस्त्रापुजन समारंभात 
केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांचे प्रतिपादन 
चंद्रपूर/प्रतिनिधी:
 जिजामातेमुळे शिवाजी घडले, असे प्रत्येक घरात सैनिक घडावा स्वातंत्रावीर सावरकर म्हणत असत की, प्रत्येक नागरिकाने सैनिकी शिक्षण घ्यावे. ‘सैन्यात सामिल व्हा’ हे सावरकरांचे आवाहन आजही तितकेच लागू आहे. शालेय शिक्षणाबरोबरच देश रक्षा करण्याच्या आपल्या कर्तव्याचेही शिक्षण मुलांना दिले पाहिजे. शस्त्रापुजनाची भारताची प्राचीन परंपरा आहे, जी आजतागायत सुरू आहे. देशरक्षा करतांना आम्ही तर एकप्रकारे रोजच शस्त्रापुजन करतो. रणावीण तर स्वातंत्रयही मिळाले नाही. पोलीस व पोलीसखात्याशी संबंधित व्यवस्थाही आपल्याला माहित हव्या, या शब्दात सन्मित्रा सैनिकी विद्यालयातील शस्त्रापुजनाच्या कार्यक्रमात केन्द्रीय गृहराज्यमंत्राी ना. हंसराज अहीर यांनी आपले विचार व्यक्त केले. 
सन्मित्रा सैनिकी विद्यालयात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शस्त्रापुजन समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने झाली. विद्यालयात यावेळी भारतमाता नवरात्रोत्सव सुरू असून दीपप्रज्वलनानंतर केन्द्रीय गृह राज्यमंत्राी ना. हंसराज अहीर यांच्यासह मंचावर उपस्थित तरूण भारतचे पत्राकार संजय रामगीरवार, सन्मित्रा मंडळाचे उपाध्यक्ष डाॅ. विजय धनकर, सचिव अॅड. निलेश चोरे, कमांडंट सुरींदरकुमार राणा व प्राचार्य मनोज अलोणी यांनी भारतमातेची आरती केली. शस्त्रापुजनानंतर अॅड. निलेश चोरे यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्राी ना. अहीर यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व ग्रंथगुच्छ देवून सत्कार केला. याप्रसंगी संजय रामगीरवार यांनी भारतमाता नवरात्रोत्सवाविषयी आपले विचार व्यक्त केले. 
निखील महाकाली याने ‘वेदमंत्राहून आम्हा वंद्य वन्दे मारतम्’ हे वैयक्तिक गीत सादर केले. भारतमाता नवरात्रोत्सवात घेतल्या गेलेल्या वादविवाद स्पर्धेत विजयी झालेले सूचित भोगेकर, दिनेश शेवाळे, अजित पिंपळशेंडे, यश मोडक, तुषार खारकर यांना व भारताचे बोलके चित्रा रांगोळीतून सादर करणाÚया आदित्य पारधी, विवेक बोंडे, रजत कायरकर, पीयूष भाजे, अक्षय मोहितकर, वैभव गिरटकर, छविलशाह आत्राम, सुचित भोगेकर, नैतिक पाल, सौरभ धांडे, प्रशिल धांडे, निखील चैके, रितीक गिरसावळे, निखील महाकाली या सर्व कलाकारांचा गौरव करण्यात आला. 
सर्वांनी घेतलेल्या देशरक्षेच्या प्रतिज्ञेनंतर मंगेश देऊरकर यांनी गायलेल्या वन्दे मातरम्ने कार्यक्रमाची सांगता झाली.

28 आणि 29 ऑक्‍टोबर बेरोजगारांसाठी महामेळाव्‍याचे आयोजन

28 आणि 29 ऑक्‍टोबर बेरोजगारांसाठी महामेळाव्‍याचे आयोजन

21 ते 25 ऑक्टोबर या काळात ऑनलाईन नोंदणी अनिवार्य 

50 ख्यातनाम कंपन्यांकडून शेकडोंची जागेवरच होणार निवड 
चंद्रपूर जिल्‍हयातील सुशिक्षीत बेरोजगारांनी लाभ घेण्‍याचे आवाहन

चंद्रपूर/प्रतिनिधी:
Image may contain: 1 person, smiling
 राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने दिनांक 28 आणि 29 ऑक्‍टोबर 2018 रोजी चंद्रपूर जिल्हयातील युवकांसाठी युथ एम्‍पॉवरमेंट समीट अर्थात रोजगार महामेळाव्‍याचे आयोजन बल्‍लारपूर तालुक्‍यातील बामणी येथे करण्‍यात आले आहे. पारदर्शी निवड प्रक्रीयेचा आदर्श या मेळाव्यातून उभा राहिला पाहिजे. यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन, डिजीटल सर्टिफिकेट, जागेवरच अपाँईंटमेट लेटर आणि प्लेसमेंट प्रक्रीया पूर्ण केल्या जाईल. त्यामुळे या मेळाव्याच्या आयोजनाची शिस्त प्रत्येक कार्यकर्त्याने, विभागाने व आयोजकांनी पाळावी, असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केले.
स्थानिक हॉटेलमध्ये आयोजित बैठकीत ते आज बोलत होते. मार्गदर्शन, प्रशिक्षण, कार्यशाळा, मुद्रा कर्ज उपलब्धता, याशिवाय 50 प्रतिष्ठीत कंपन्याकडून शेकडो युवकांची निवड या ठिकाणी होणार आहे. या मेळाव्यात सहभागासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे. त्यामुळे 21 पासून सुरू होणाऱ्या या नोंदणी प्रक्रीयेवर तरुणांना लक्ष केंद्रीत करायला सांगा. ज्याच्यात प्रावीण्य असेल, कौशल्य असेल, गुणवत्ता असेल अशी तुमच्या व माझ्या जिल्हयातीलच मुलांची निवड होणार आहे. आपला जिल्हा रोजगार युक्त व्हावा, ही भावना ठेऊन यामध्ये सहभागी व्हा, आपल्या गावातील, तालुक्यातील, गटातील मुलांना मोठया कंपन्यांचे आकर्षक पॅकेज मिळावे. मुंबई, पुणे याप्रमाणे संधी मिळावी यासाठी कंपन्याच आपण हजार किलोमिटर अंतरावरील बल्लारपूरला आणल्या आहेत. या ठिकाणी फक्त नोकरीच भेटणार नसून ख्यातीप्राप्त मार्गदर्शक रोजगार, स्वयंरोजगार व अन्य क्षेत्रामध्ये करिअर घडवण्यासाठी मदत करणार आहे, जिल्हयाच्या कायम स्मरणात राहील असा हा मेळावा असेल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी नागपूर येथील फॉर्च्यून फाऊडेशनचे अध्यक्ष आमदार अनील सोले यांनी या मेळाव्यातून आपल्या मुलाला, नातेवाईकाला नोकरी लावायची नसून या जिल्ह्यातल्या हजारो युवकांना नोकरी देण्यासाठी हे आयोजन आहे. ऑनलाइन रजिस्ट्रेशन आणि प्रख्यात कंपन्यांना गुणवान मुलांची उपलब्धता करणे, त्यांना बल्लारपूरच्या आयोजन स्थळावर पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे व त्यासाठी संपूर्ण यंत्रणेने काम करावे. अतिशय पारदर्शी अशी निवड प्रक्रिया या ठिकाणी मुलांसमोरच केली जाणार आहे. राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री यांनी पुढाकार घेतल्यामुळे मुंबई, पुणे आणि औरंगाबाद येथील प्रख्यात कंपन्या चंद्रपूर सारख्या ठिकाणी येत आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून हजारो लोकांना आपला आयुष्य घडविण्याची संधी आम्हा सर्वांना या आयोजनातून मिळणार आहे हे लक्षात घ्या, असेही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना स्पष्ट केले.
यावेळी काही समित्यांचे गठन करण्यात आले. 21 तारखेपासून सुरू होणाऱ्या ऑनलाइन रजिस्ट्रेशनला सर्वाधिक महत्त्व देण्याचे आवाहन यावेळी आमदार सोले यांनी केले. आमदार सोले यांच्या नेतृत्वातील फॉर्च्यून फाउंडेशन हे या मेळाव्याच्या आयोजकांतर्फे एक आहे. याशिवाय जिल्‍हा कौशल्‍य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय चंद्रपूर, प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना, जिल्हा समन्वय समिती, चंद्रपूर यांच्‍या वतीने हे आयोजन करण्‍यात आले आहे.
चंद्रपूर जिल्‍हा रोजगारयुक्‍त बनविण्‍याच्‍या दृष्‍टीने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मिशन सेवा, मिशन स्‍वयंरोजगार, मिशन कौशल्‍य विकास, मिशन फॉरेन सर्विसेस, मिशन उन्‍नत शेती, मिशन सोशल वर्क हा सहा सुत्री कार्यक्रम हाती घेतला आहे. युथ एम्‍पॉवरमेंट समीट हा या सहा सुत्री कार्यक्रमाचा प्रमुख भाग आहे.

इयत्‍ता 10 वी पासुन पदवी, पदव्‍युत्‍तर, अभियांत्रीकी, आय.टी.आय. अशा सर्वच प्रकारचे शिक्षण घेतलेले चंद्रपूर जिल्‍हयातील तरूण-तरूणी या मेळाव्‍यात सहभागी होवू शकतील. यासाठी www.yeschandrapur.com /register.aspx या माध्‍यमातुन ऑनलाईन नोंदणी इच्‍छूक तरूण, तरूणी करू शकतील. दिनांक 21 च्या सकाळी 10 वाजतापासून ते 25 ऑक्‍टोबरच्या सायं.6 वाजेपर्यंत 5 दिवस ऑनलाईन नोंदणी सुरू राहणार आहे.

सेवानिवृत्ती वेतन धारकांना सूचना

सेवानिवृत्ती वेतन धारकांना सूचना

निवृत्त वेतनधारक साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी:
 चंद्रपूर कोषागारांतर्गत बॅकेद्वारे निवृत्तीवेतन घेणा-या सर्व निवृत्ती वेतन धारकांनी 1 नोव्हेबर 2018 रोजी हयात असल्याचे प्रमाणपत्र (life Certificate) सादर करण्याची यादी सबंधीत बॅकेत पाठविण्यात आलेली आहे. त्या यादीतील आपले नावाचे समोर 30 नोव्हेबर 2018 पूर्वी स्वत: उपस्थित होऊन स्वाक्षरी करावयाची आहे. त्या यादीत निवृत्तीधारकांनी स्वाक्षरी केल्यानंतर संबंधीत बँक ती यादी या कार्यालयाकडे सादर करणार असून त्या यादीनुसार निवृत्तीधारकांना डिसेंबर 2018 चे निवृत्तीवेतन बँकेकडे पाठविल्या जाईल.
तसेच जे निवृत्तवेतन धारक मनिऑर्डर द्वारे निवृत्तवेतन घेतात त्यांनी आपले हयात प्रमाणपत्र राजपत्रित अधिकाऱ्यांची स्वाक्षरी घेवून 15 डिसेबर 2018 पूर्वी कोषागारात सादर करावे. तसेच जे निवृत्तवेतन धारक कुटुंबनिवृत्तवेतन घेत आहेत. त्यांनी हयात असल्याचे प्रमाणपत्रासोबत शासकीय सेवेत असल्यास अथवा नसल्यास तसे प्रमाणपत्रावर निवृत्तवेतन व कुटुंबनिवृत्तवेतन घेणाऱ्यांनी दोन्ही ठिकाणी आपले नावाचे समोर स्वाक्षरी करावी.
हयात प्रमाणपत्र 15 डिसेबर 2018 पूर्वी कोषागारात प्राप्त न झाल्यास त्यांचे माहे डिसेबर 2018 पासूनचे निवृत्तीवेतन बॅकेकडे पाठविले जाणार नसल्याने याची कृपया नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी चंद्रपूर यांनी केले आहे.