काव्यशिल्प Digital Media: MSEB

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label MSEB. Show all posts
Showing posts with label MSEB. Show all posts

Wednesday, February 06, 2019

 नागपुरात म.रा.वि.मं.अधिकारी संघटनेचे ४२ वे राज्यस्तरीय अधिवेशन

नागपुरात म.रा.वि.मं.अधिकारी संघटनेचे ४२ वे राज्यस्तरीय अधिवेशन

ऊर्जामंत्र्यांचे हस्ते उद्घाटन
वीज क्षेत्र वाटचाल व आव्हाने यावर मार्गदर्शन
नागपूर/प्रतिनिधी:

महावितरण,महानिर्मिती,महापारेषण आणि सूत्रधारी कंपन्यांमध्ये कार्यरत वित्त व लेखा, महसूल,मानव संसाधन, औद्योगिक संबंध, माहिती तंत्रज्ञान, वैद्यकीय, जनसंपर्क, सुरक्षा व अंमलबजावणी आणि विधी अश्या अतांत्रिक अधिकाऱ्यांचे विविध प्रश्न/समस्या सोडविण्याकरीता म.रा.वि.मं.अधिकारी संघटना नेहमीच पुढाकार घेत असते. यंदा संघटनेच्या ४२ व्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे यजमानपद नागपूर परिमंडळाकडे आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांचे शुभहस्ते म.रा.वि.मं.अधिकारी संघटनेच्या ४२ व्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून महावितरणचे कार्यकारी संचालक(माहिती तंत्रज्ञान) योगेश गडकरी, प्रभारी कार्यकारी संचालक(मानव संसाधन) चंद्रशेखर येरमे, प्रभारी कार्यकारी संचालक(मानव संसाधन) महापारेषण सुगत गमरे, प्रभारी प्रादेशिक संचालक महावितरण नागपूर दिलीप घुगल, मुख्य महाव्यवस्थापक सूत्रधारी कंपनी संदेश हाके, मुख्य महाव्यवस्थापक महावितरण स्वाती व्यवहारे, मुख्य अभियंता कोराडी वीज केंद्र अभय हरणे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. 


राज्यभरातील सुमारे ४०० वीज अधिकारी ह्या अधिवेशनाला उपस्थित राहणार असून अधिवेशनाचे आयोजन आमदार निवास, सिव्हील लाईन्स, नागपूर येथे करण्यात आले आहे. 

वीज क्षेत्रात झपाट्याने होत असलेले बदल, आव्हाने, ग्राहकाभिमुख उत्तमोत्तम सेवा, अधिकाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न, वीज क्षेत्र विषयक भविष्यकालीन उपाययोजना याबाबत सदर अधिवेशनात तपशीलवार चर्चा होणार आहे. शनिवार ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता उद्घाटन सोहळा तर दुपारच्या सत्रात वीज कंपन्या व संघटनेची भविष्यकालीन वाटचाल व आव्हाने यावर मान्यवर अतिथी मार्गदर्शन करणार आहेत. रविवार १० फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता पत संस्थेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. 

म.रा.वि.मं.अधिकारी संघटनेचे अध्यक्ष सतीश तळणीकर, सरचिटणीस दिलीप शिंदे, संघटन सचिव प्रवीण बागुल यांच्या कुशल नेतृत्वाखाली हे अधिवेशन संपन्न होणार आहे. अधिवेशनाच्या यशस्वितेसाठी नागपूर परिमंडळाचे अध्यक्ष प्रवीण काटोले, सचिव राजेश कुंभरे तसेच शरद दाहेदार, सौ.सविता झरारीया, सौ.तृप्ती मुधोळकर, प्रमोद खुळे,नंदकिशोर पांडे,वैभव थोरात, निलेश जुमळे, राधेश्याम उईके, नागपूर परिमंडळातील संघटनेचे समस्त पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहेत.

Monday, February 04, 2019

 अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ग्राहक सेवांमुळे महावितरण देशात सर्वोत्तम:सीएमडी श्री.संजीव कुमार

अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ग्राहक सेवांमुळे महावितरण देशात सर्वोत्तम:सीएमडी श्री.संजीव कुमार

मुंबई/प्रतिनिधी:

महावितरणकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्यात येत आहेत. त्यामुळे देशात वीज वितरण क्षेत्रात महावितरण सर्वोत्तम कंपनी आहे आणि याच कारणांमुळे महावितरणच्या विविध योजनांची अंमलबजावणी देशातील इतर कंपन्यांकडून केली जाते, असे प्रतिपादन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी केले.

मुंबईस्थित गोरेगाव येथील एक्झीबिशन सेंटरमध्ये इंडियन इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्यावतीने (ईमा) आयोजित आंतरराष्ट्रीय प्रदर्शनीच्या उद्घाटनप्रसंगी श्री. संजीव कुमार बोलत होते. वितरण कंपन्यांसमोरील 'आव्हाने आणि संधी' या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. 

महावितरणने मागील तीन वर्षांत बहुतांश ग्राहकसेवा ऑनलाईन केल्या आहेत. ग्राहकांना वीजबिलाचा तपशील, खंडित वीजपुरवठ्याबाबतची माहिती, वीजपुरवठा खंडित असल्याबाबतची पूर्वसूचना, इत्यादी माहिती एसएमएसद्वारे दिली जाते. वीजखरेदीचे योग्य नियोजन केल्यामुळे मागील वर्षी महावितरणची मोठ्या प्रमाणात बचत झाली आहे. सौर ऊर्जेवर आधारित सौरकृषी फिडरमुळे कृषीग्राहकांचे वीजदर कमी होऊन अंतिमत: घरगुती ग्राहकांच्या वीजदराचे प्रमाणही कमी होण्यास मदत होईल. राज्यातील ४१ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे वीज देण्यासाठी महावितरणद्वारे विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. केंद्रीकृत वीजबिलींगमुळे ग्राहकांना वेळेत वीजबील मिळत असून यात ग्राहकांना वीजबील तयार होताच एसएमएस जात असल्यामुळे वीजबील सुधारण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. महावितणमधील सर्वच कंत्राटदारांना ईसीएसच्या माध्यमातून देयक अदा करण्यात येत आहेत. महावितरणच्या कर्मचाऱ्यांना डॅशबोर्डमुळे माहिती उपलब्ध झाल्याने उपविभागीय पातळीवरील अधिकाऱ्यांनाही व्यवस्थापन निर्णय प्रक्रियेत सहभागी होता येत आहे. प्रभावी ऊर्जा अंकेक्षण व उपकेंद्राचे संनियंत्रण यामुळे महावितरणच्या यंत्रणेवरील खर्चात बचत करणे शक्य होत आहे. या सर्व विविध उपाययोजनांमुळे महावितरणची वीज वितरण हानी विद्युत नियामक आयोगाने निश्चित केलेल्या प्रमाणापेक्षा कमी आहे, अशी माहिती श्री. संजीव कुमार यांनी दिली. 

यावेळी सीईएससी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. देबाशिस बॅनर्जी, केंद्रीय ऊर्जा मंत्रालयातील संचालक श्री. विशाल कपूर, एमएसएमईचे सहसंचालक श्री. सुधीर गर्ग, केंद्रीय अवजड उद्योग विभागाचे सचिव श्री. ए.आर. सिहाग यांच्यासह ईमाचे श्री. हरिश अग्रवाल, श्री. सुनिल सिंघवी आणि श्री. आर. के. चुग प्रामुख्याने उपस्थितीत होते. 
महावितरणच्या स्टॉलला मान्यवरांची भेट 

ईमाच्या प्रदर्शनीत महातिरणच्यावतीने स्टॉल उभारण्यात आला आहे. उद्घाटन कार्यक्रमानंतर या स्टॉलला मान्यवरांनी भेट दिली. यावेळी त्यांना महावितरणच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. महावितरणच्या माहिती तंत्रज्ञान व देयक वसुली विभागाचे कार्यकारी संचालक श्री. योगेश गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्टॉल उभारण्यात आला आहे. तसेच या प्रसंगी श्री. संजीव कुमार यांच्या हस्ते विविध स्टॉलचे उद्घाटनही करण्यात आले.
  बुधवारी नागपूरच्या या भागातील वीज पुरवठा राहणार बंद

बुधवारी नागपूरच्या या भागातील वीज पुरवठा राहणार बंद

नागपूर/प्रतिनिधी:

अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीसाठी तसेच मेट्रो रेल्वेच्या कामासाठी बुधवार दिनांक ६ फेबुवारी रोजी दक्षिण आणि पश्चिम नागपुरातील काही भागात वीज पुरवठा बंद राहणार आहे. 

सकाळी १० ते दुपारी १ वेळेत रामकृष्ण नगर,अजनी चौक, देवनागरी,सावर्करनागर, विकास नगर,साई मंदिर परिसर, दंतेश्वरी, सुरेंद्र नगर, नेहरू नगर,संताजी कॉलेज परिसर, जयताळा, दुबे ले आऊट,दाते ले आऊट, प्रगती नगर,संघर्ष नगर ,शिवाजी नगर, हिल रोड,शंकर नगर, दीनदयाल नगर, पडोळे हॉस्पटिल, प्रताप नगर,गोपाळ नगर, गिट्टीखदान ले आऊट, सुभाष नगर,हिंगणा रोड, शास्त्री ले आऊट, जीवन छाया सोसायटी, रवींद्र नगर,हुडकेश्वर,चंदन शेष नगर, नरसाळा ,दुर्गधामणा,सुराबर्डी,वडधामना येथील वीज पुरवठा बंद राहील. 

सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत नागपूर विद्यापीठ परिसर, हिल टॉप, देवतळे ले आऊट, वर्मा ले आऊट,उत्तर अंबाझरी मार्ग, पांढराबोडी अंबाझरी टेकडी, बजाज नगर,माधव नगर,श्रद्धानंद पेठ, डाग ले आऊट, कार्पोरेशन कॉलनी येथील वीज पुरवठा बंद राहील. सकाळी ९ ते १२ या वेळेत अजनी रेल्वे सॅटिन, मेडिकल कॉलनी, धंतोली येथील वीज पुरवठा मेट्रो रेल्वेच्या कामासाठी बंद राहील. याच वेळेत भेंडे ले आऊट, पन्नासे ले आऊट, सोनेगाव,जयप्रकाश नगर,राजीव नगर येथील वीज पुरवठा बंद राहील. सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत रामदास पेठ परिसरातील वीज पुरवठा बंद राहील.
 कामठीत वीज वाहिनीचे लोकार्पण

कामठीत वीज वाहिनीचे लोकार्पण

नागपूर/प्रतीनिधी:
कामठी शहराला नागपूरचे उपनगर म्हणून विकसित करीत असल्याने या परिसरात सक्षम वीज वितरणसह अन्य विकास कामे मोठ्या प्रमाणात होत असून याचा लाभ येथील जनतेला मोठ्या प्रमाणात होणार आहे. असे उद्गार राज्याचे ऊर्जा,नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे काढले. 
  ड्रॅगन पॅलेस येथील येथील वीज उप केंद्रात नव्याने उभारण्यात आलेल्या
 १० एमव्हीए क्षमतेच्या रोहित्राचे लोकार्पण करताना ना. बावनकुळे
महावितरणच्या वतीने कामठी शहरात उभारण्यात आलेल्या नवीन वीज वाहिनीचे लोकार्पण आणि भाजी मंडी-कोळसा टाल या नवीन वाहिनीच्या कामाचे तसेच ड्रॅगन पॅलेस येथील येथील वीज उप केंद्रात नव्याने उभारण्यात आलेल्या १० एमव्हीए क्षमतेच्या रोहित्राचे लोकार्पण ना. बावनकुळे यांच्या हस्ते झाले. ड्रॅगन पॅलेस वीज उपकेंद्रात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे तर कामठी नगर परिषद अध्यक्ष मो. शहाजहाँ शफाअत अन्सारी, उपाध्यक्ष मतीन खान, जिल्हा विद्युत नियंत्रण समितीचे अध्यक्ष प्रा. गिरीश देशमुख, कामठी तालुका विदुयत नियंत्रण समितीचे अध्यक्ष मोबीन पटेल विशेष उपस्थित होते. 

ड्रॅगन पॅलेस मुळे कामठी शहराची जगात ओळख निर्माण झाली आहे. येथे मोठ्या प्रमाणात भाविक येतात. येथील वीज वितरणाचे जाळे मजबूत होत आहे. सोबतच पथ दिवे आणि पाणी पुरवठ्यासाठी साधारण २ मेगा वॅट विजेची गरज भासणार आहे यासाठी नगर पालिकेने जागा दिल्यास हा सौर ऊर्जा प्रकल्प सुरु करता येईल यासाठी शासनाकडून १२ कोटी रुपयांचा निधी देण्याची तयारी यावेळी दाखवली. 

कामठी परिसरात भूमिगत वीज वाहिनीची कामे करतेवेळी वॉर्ड पातळीवर कामाचे नियोजन करून ती पूर्ण करण्याची सूचना ना. बावनकुळे यांनी यावेळी महावितरण अधिकारी वर्गास केली. कामठी ड्रॅगन पॅलेस येथील वीज उपकेंद्रात २० एमव्हीए क्षमतेचे २ रोहित्र उभारण्यात आल्याने परिसरास दर्जेदार वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे. अशी माहिती नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी संचालक दिलीप घुगल यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली. यावेळी अधीक्षक अभियंता (पायाभूत आराखडा)उमेश शहारे, नागपूर ग्रामीण मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, मौदा विभागाचे कार्यकारी अभियंता अमित परांजपें उपस्थित होते. 


महावितरणच्या शिकाऊ उमेदवार यादीत घोळ;आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप

महावितरणच्या शिकाऊ उमेदवार यादीत घोळ;आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप

ITI विध्यार्थी धडकले महावितरण कार्यालयावर


ललित लांजेवार/नागपूर
चंद्रपूर येथील महावितरण तर्फे काढण्यात आलेल्या शिकाऊ उमेदवार यादीत आर्थिक व्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.शनिवारी ITI उतीर्ण व शिकाऊ उमेदवारांची यादी जाहिर करण्यात आली या यादीवर अनेकांनी आक्षेप घेत महावितरण कार्यालयाबाहेर आंदोलन केले.

यानंतर सोमवारी मनसेच्या महिला शहर अध्यक्षा प्रतिमा ठाकूर यांच्या नेतृत्वात शेकडो विध्यार्थी महावितरण कार्यालयावर धडकले,या वेळी महावितरण कार्यालय चंद्रपूर येथील विद्युत भवन येथे ITI उतीर्ण विध्यार्थ्यांसाठी शिकाऊ उमेदवार भरतीची यादीला घेवून चांगलाच गोंधळ उळाला. जाहीर करण्यात आलेल्या यादीत कमी टक्केवारी असलेल्या अनेक विध्यार्थ्यांचा या यादीत समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या विध्यार्थ्याना६० -६५ टक्के आहेत अश्या विध्यार्थ्यांचे या यादीत नाव आले आहे, मात्र ७०-८० टक्के हून अधिक असणाऱ्या या विध्यार्थ्यांचे नाव यादीत नसल्याने विद्यार्थ्यांनी चंद्रपूर अधीक्षक अभियंता अशोक मस्के यांच्या कार्यालयात गोंधळ घातला.




 हि संपूर्ण यादी तयार करतांना विद्यार्थ्यांकडून २० हजारा पासून ते ६० हजारापरीयंत एका उमेदवारासाठी आर्थिक व्यवहार झाल्याचे विद्यार्थ्यात कुजबुज सुरु आहे. सोमवारी विद्यार्थ्यांनी अधीक्षक अभियंता अशोक मस्के यांना संपूर्ण टक्केवारी नुसार लावल्या गेलेल्या यादीचा तपशील मागितला,त्यात कमी टक्केवारीच्या विध्यार्थ्यांचे नाव असल्याचे समोर आले .त्यामुळे लवकरच सुधारित यादी लावण्याचे लेखी आश्वासन यावेळी विध्यार्थ्यांना देण्यात आले, महावितरणात सुरु आल्याचे या काळ्या कारभारात कोण कोणत्या अधिकाऱ्यांचे खिसे गरम झाले आहेत,व वरिष्ठ अधिकारी यांचेवर काय कारवाई करतात ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे.



Thursday, January 31, 2019

पाच वर्षांत सर्वच शेतकऱ्यांना सौर ऊर्जेतून वीज:ऊर्जामंत्री बावनकुळे

पाच वर्षांत सर्वच शेतकऱ्यांना सौर ऊर्जेतून वीज:ऊर्जामंत्री बावनकुळे

नाशिक/प्रातिनिधी:

गेल्या चार वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाने विजेच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली असून केंद्र व राज्य सरकारच्या योजनांमुळे महाराष्ट्र आज देशात अव्वल आहे. स्मार्ट मीटर, मोबाईल अँप, प्रीपेड मीटर तसेच तंत्रज्ञानाच्या वापरातून वीज क्षेत्राला आधुनिकीकरणाकडे नेण्याचा प्रयत्न झाला आहे. आता एक ग्रीड एक राष्ट्र ही महत्वपूर्ण संकल्पना येत आहे. 

एक लाख मेगावॅट वीज निर्मिती क्षमतेमुळे महाराष्ट्र भारनियमनमुक्त झालाच आहे. पण अपारंपरिक उर्जेला प्रोत्साहन देतांना येत्या ५ वर्षात राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना सौर ऊर्जेतून दिवस वीज देण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी व मुख्यमंत्री सौर कृषिपंप या योजना राबविण्यात येत आहेत. राज्यातील ग्रामीण भागात असलेले ७०० फिडरचे विलगीकरण केल्यानंतर ग्रामीण कृषी वाहिनीवर असलेल्या वीज ग्राहकांना अखंडित वीज देता येणे शक्य आहे. त्यासाठी २ हजार कोटी रुपयांची आवश्यकता असून केंद्र सरकाकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर एका वर्षात वाहिनी विलगीकरणाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे श्री. बावनकुळे यांनी सांगितले.
मार्चअखेर संपूर्ण देश होणार भारनियमनमुक्त:आर.के.सिंग

मार्चअखेर संपूर्ण देश होणार भारनियमनमुक्त:आर.के.सिंग

क्षेत्रीय परीक्षण प्रयोगशाळेचे भूमिपूजन 
नाशिक/प्रतिनिधी:

गेल्या साडेचार वर्षांत देशाच्या वीजनिर्मिती क्षमतेत तब्बल एक लाख मेगावॅटने वाढली असून सर्व राज्यांमधील शहरांमधील भारनियमन संपुष्ठात आले आहे. आता मार्च 2019 पर्यंत संपूर्ण देश भारनियमन मुक्त होणार, असे प्रतिपादन केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री आर. के. सिंग यांनी केले.

नाशिक जवळच्या शिलापूर परिसरात केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थेच्या क्षेत्रीय परीक्षण प्रयोगशाळेच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर राज्याचे ऊर्जामंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे, खासदार श्री. हेमंत गोडसे, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती शीतल सांगळे, आमदार श्रीमती देवयानी फरांदे, आमदार योगेश घोलप, आमदार श्री. राजाभाऊ वाजे, माजी मंत्री श्री. बबनराव घोलप, माजी खासदार श्री. समीर भुजबळ, माजी आमदार जयवंत जाधव, अनुसंधान संस्थेचे महासंचालक व्ही. एस. नंदकुमार, ऊर्जा मंत्रालयाचे आर्थिक सल्लागार राज पाल यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. सिंग म्हणाले, ऊर्जा विभाग निरंतर विजेचे स्वप्न साकारत असून देशभरातील सर्वच ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करण्यात येणार आहे. यात खंड पाडणाऱ्या वीज पुरवठादारांना खंडित कालावधीसाठी दंड आकारून त्याचा लाभ वीज ग्राहकांना देण्याचा धोरणात्मक निर्णय मार्चनंतर लागू करण्यात येईल. देशभरातील 1 लाख 80 हजार किलोमीटरची वाहिनी एका ग्रीडला ओडून 'एक राष्ट्र एक ग्रीड' ही संकल्पनाही प्रत्यक्षात आणली आहे. एक हजार दिवसांच्या आत देशातील प्रत्येक गावात वीज पोहचविण्यात आली. तर वीजजोडणीपासून वंचित प्रत्येक घरात वज पोहचविण्याचे उद्दिष्टही जानेवारी अखेर पूर्ण होईल. सौभाग्य योजनेतून जोडणी देण्यासाठी राज्याला दोन टप्प्यात 800 कोटी रुपयांचा निधी दिला. ऊर्जामंत्री श्री. बावनकुळे यांच्या मागणीनुसार वाहिनी विलगीकरणासाठी 2 हजार रुपये महाराष्ट्राला देण्याचे आश्वासन श्री. सिंग यांनी दिले. देशात ऊर्जा क्षेत्रात गेल्या साडेचार वर्षात झालेल्या कामांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक होत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

खासदार श्री. गोडसे म्हणाले, शिलापूरमध्ये साकारत असलेल्या प्रयोगशाळेमुळे नाशिकची ओळख 'इलेक्टिक हब' म्हणून होणार आहे. तर प्रास्ताविक करताना राज पाल यांनी 115 कोटी रुपये निधीतून येत्या 18 महिन्यात प्रयोगशाळेचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती दिली. 


 बुटीबोरीसाठी नवीन वीज आराखडा तयार करा- प्रा. देशमुख

बुटीबोरीसाठी नवीन वीज आराखडा तयार करा- प्रा. देशमुख

नागपूर/प्रतिनिधी:

बुटीबोरी परिसरात येणारे नवीन उद्योग आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन या परिसरासाठी विजेची वाढत्या मागणीनुसार नवीन विजेचा आराखडा तयार करण्याची सूचना नागपूर जिल्हास्तरीय विदुयत नियंत्रण समितीचे अध्यक्ष प्रा. गिरीश देशमुख यांनी केली आहे.

प्रा. गिरीश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बुटीबोरी येथील महावितरण कार्यालयात हिंगणा तालुका विदुयत नियंत्रण समितीची बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार समीर मेघे होते. बुटीबोरी परिसराचा विकास वेगाने होत असून याठिकाणी दर्जेदार आणि शाश्वत वीज पुरवठा करण्यासाठी नवीन आराखडा करणे गरजेचे आहे. असे यावेळी प्रा. देशमुख यांनी सांगितले. यावेळी वीज अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वारसास नुकसान भरपाई म्हणून श्रीमती नितु भगत यांना ३ लाख ८० हजार रुपये देण्यात आले. यावेळी बुटीबोरी परिसरात मागील ५ वर्षात महावितरण मार्फत करण्यात आलेल्या कामाची माहिती देण्यात आली. यात बुटीबोरी विभागात पायाभूत आराखडा -२ योजनेत ३ नवीन नवीन उपकेंद्राची उभारणी आणि २ उपकेंद्राची क्षमता वाढ यांचा समावेश आहे. सोबतच दीनदयाल ग्राम ज्योती योजनेत ३ उपकेंद्राचे काम पूर्ण झाले असून २ उपकेंद्राचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती यावेळी जिल्हास्तरीय विदुयत नियंत्रण समितीचे अध्यक्ष आणि आमदार मेघे यांना देण्यात आली.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी शाखा कार्यालय आणि उपविभागीय कार्यालयात सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच जवाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देश यावेळी प्रा. देशमुख यांनी दिले. तसेच शेतकऱ्यांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी सौर कृषी पम्पाचे प्रात्यक्षिक करून दाखवावे अशी सूचना आमदार समीर मेघे यांनी यावेळी महावितरण अधिकारी वर्गाला केली. बैठकीला हिंगणा तालुका विदुयत नियंत्रण समितीचे सदस्य चंद्रशेखर पिसे, रवींद्र वानखेडे, सूचित चिमोटे,विकास दाभेकर, संजय दोडरे, प्रकाश वानखेडे, अधीक्षक अभियंता मनीष वाठ , कार्यकारी अभियंता दिलीप घाटोळ बुटीबोरी विभागातील सर्व उपविभागीय अधिकारी आणि शाखा अभियंता उपस्थित होते.

Tuesday, January 29, 2019

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना:वीजजोडणीसाठी ८६८५ शेतकऱ्यांचे अर्ज

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना:वीजजोडणीसाठी ८६८५ शेतकऱ्यांचे अर्ज

मुंबई/प्रतिनिधी:
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत मार्च २०१९ अखेरपर्यन्त ५० हजार शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्याचे महावितरणचे उद्दीष्ट असून या योजनेस राज्यातील शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. महावितरणने पोर्टल सुरु केल्यानंतर केवळ दहा दिवसात सौर कृषिपंपाच्या वीजजोडणीसाठी 8 हजार 685 शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.

शाश्‍वत जलस्त्रोत उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना पारंपारिक वीजजोडणी मिळण्यात अडचणी आहेत. अशा भागात वीजजोडणीची मागणी करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना प्राधान्याने सौर कृषिपंप देण्यात येणार आहेत. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महावितरणने या योजनेच्या संदर्भात शेतकऱ्यांकडून वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न व त्यांची उत्तरे असलेली मार्गदर्शन पुस्तिका तयार केली असून या पुस्तिकेचे वितरण सर्वत्र करण्यात येत आहे. याशिवाय योजनेची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी महावितरणतर्फे मोठ्याप्रमाणात व्हॉट्स ॲपचा वापर करण्यात येत असून क्षेत्रीयस्तरावरील मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता सोशल माध्यमांद्वारे शेतकऱ्यांसोबत संवाद साधत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

शेतकऱ्यांना कृषिपंपाकरिता वीजजोडणी घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले असून त्याचा लाभ घेत दि. 29 जानेवारी 2019 पर्यन्त राज्यातील सुमारे 8 हजार 685 शेतकऱ्यांनी सौर कृषिपंपासाठी अर्ज केले आहेत. विशेषत: मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडून या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असून मागील दहा दिवसात 5 हजार 446 शेतकऱ्यांनी आपले अर्ज या पोर्टलवरून भरले आहेत. तरी या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे
 बुधवारी नागपूरच्या या भागातील वीज पुरवठा राहणार बंद

बुधवारी नागपूरच्या या भागातील वीज पुरवठा राहणार बंद

नागपूर/प्रतिनिधी:

अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीसाठी उद्या दिनांक ३० जानेवारी रोजी खामला, पांडे ले आऊट, स्नेह नगर येथील वीज पुरवठा बंद राहणार आहे. सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत वरील भागासह योगक्षेम ले आऊट, मालवीय नगर,गोकुळपेठ बाजारपेठ, जयताळा,प्रसाद नगर, दुबे ले आऊट, अमर-आशा, दाते ले आऊट, शारदा नगर,घरकुल सोसायटी, प्रगती नगर,अष्टविनायक नगर,संघर्ष नगर येथील वीज पुरवठा बंद राहील. 

सकाळी ६ ते ९ या वेळेत भगवाघर,काचीपुरा, लेंड्रापार्क, रामदासपेठ कॅनॉल रोड,सकाळची १० ते ११ या वेळात राणी झाशी चौक परिसर,संगम चाळ, जानकी टॉकीज, तेलीपुरा,हनुमान गल्ली, अभ्यंकर रोड, येथील वीज पुरवठा बंद राहील. सकाळी १० ते दुपारी १२ या वेळात वसंत नगर आणि डॉ. आंबेडकर महाविद्यालय परिसर, सोमलवाडा, राजीवनगर,सावित्री विहार, वर्धा रोड, मुळक कॉम्प्लेक्स, विदर्भ प्रीमियर सोसायटी, इंद्रप्रस्थ सोसायटी, पाटील ले आऊट, पन्नास ले आऊट, सोनेगाव वस्ती, सहकार नगर,गजानन धाम, जयप्रकाश नगर, चिंतामणी नगर,तपोवन कॉम्प्लेक्स ,राहुल नगर,नार केसरी ले आऊट येथील वीज पुरवठा बंद राहील. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत धरमपेठ,खरे टाउन, धरमपेठ टांगा स्टॅन्ड, वेस्ट हाय कोर्ट रॊड, अलंकार सिनेमा, जीवन छाया शंकर नगर, दीनदयाल नगर,स्वावलंबी नगर,पडोळे कॉर्नर, त्रिमूर्ती नगर,लोकसेवा नगर,ब्लॅक डायमंड सोसायटी, कापसे ले आऊट, शहाणे ले आऊट, सुर्वे नगर, भांगे विहार, चंदनशेष नगर,कृष्णन नगरी, बेस, नरसाळा येथील वीज पुरवठा बंद राहील.

Monday, January 28, 2019

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी  विदर्भातील १५७१ शेतकऱ्यांचे  अर्ज

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी विदर्भातील १५७१ शेतकऱ्यांचे अर्ज

वाशीम जिल्ह्यातून सार्वधिक अर्ज 

  भंडारा जिल्ह्यातून २०० अर्ज 


नागपूर/प्रतिनिधी:

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत सहभागी होण्यासाठी विदर्भातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऑनलाईन अर्ज केले आहेत. आज दिनांक २८ जानेवारीपर्यंत नागपूर जिल्ह्यातील ७९ तर वर्धा जिल्ह्यातील ६७ शेतकऱ्यांसह राज्यातील ७,२०४  शेतकऱ्यांनी  मागील दहा दिवसात अर्ज केले आहेत. नागपूर परिक्षेत्रात येणाऱ्या सर्व जिल्ह्यात १,५७१   शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. 

महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार वाशीम जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ६५६ अर्ज महावितरणकडे मागील दहा दिवसात करण्यात आले आहेत. त्यानंतर भंडारा जिल्ह्यातील १९३ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. मार्च- २०१९ पर्यन्त आपल्या शेतात सौर कृषी पंप लागावा यासाठी शेतकरी ऑनलाईन अर्ज करतो आहे किंवा महावितरणच्या जवळच्या कार्यालयात माहितीसाठी जातो आहे. 

शेतकऱ्यांना सौर कृषिपंपासाठी अर्ज करणे सोयीचे व्हावे व वीजजोडणीच्या प्रक्रियेत पारदर्शकता असावी, या उद्देशाने महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईटवर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. या पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना सौर कृषिपंपासाठी अर्ज करणे, अर्जासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय या वेबपोर्टलवर मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेची संपूर्ण माहिती, ऑनलाईनद्वारे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सौर कृषिपंपाची क्षमता ठरविणे, अर्जाची सद्यस्थिती बघणे आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सोबतच शेतकरी बांधवाना या योजनेमध्ये सौर कृषिपंपासाठी कंत्राटदार निवडण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली असून शेतकरी या पोर्टलद्वारे कंत्राटदाराची निवड करून त्या कंत्राटदाराकडून सौर कृषीपंप बसवून घेऊ शकतात.

या सौर कृषीपंप योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार असून अपारंपारिक ऊर्जेमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. तसेच शेतकऱ्यांचा वीजबिलांचा खर्च वाचेल. शेतकऱ्यांच्या शेतात दोन एलईडी बल्ब, मोबाईल व बॅटरी चार्जिंगकरिता ईलेक्ट्रीक सॉकेट बसवून देण्यात येणार असल्यामुळे शेतातील वस्तीमध्ये शेतकऱ्यांना राहण्याची सुविधा उपलब्ध होणार असून हिंस्त्र पशू, प्राण्यांपासून स्वत:चे संरक्षण करणे शक्य होईल. अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली. 

 

Monday, January 21, 2019

 मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेला उत्सफूर्त प्रतिसाद

मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेला उत्सफूर्त प्रतिसाद

सात दिवसात पोर्टलवर विदर्भातील १६० शेतकऱ्यांचे अर्ज
नागपूर/प्रतिनिधी:
संग्रहित 
मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेतून कृषिपंपाकरिता वीजजोडणी घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या स्वतंत्र पोर्टलचा लाभ घेत मागील सात दिवसात विदर्भातील १६० शेतकऱ्यांसह राज्यातील सुमारे ७२४ शेतकऱ्यांनी सौर कृषिपंपासाठी अर्ज केले आहेत.यात नागपूर जिल्ह्यातील ११ तर वर्धा जिल्ह्यातील ७ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

ऊर्जामंत्री ना.श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते नुकतेच सुरू करण्यात आलेल्या या पोर्टलमुळे शेतकऱ्यांना सौर कृषिपंपासाठी अर्ज करणे सोयीचे झाले आहे. तसेच या पोर्टलवर शेतकऱ्यांना सौर कृषिपंपासाठी अर्जासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने शेतकऱ्यांकडून या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

या वेबपोर्टलवर मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेची संपूर्ण माहिती, ऑनलाईनद्वारे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सौर कृषिपंपाची क्षमता ठरविणे, अर्जाची सद्यस्थिती बघणे आणि शेतकऱ्यांकडून नेहमी विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची माहिती, याशिवाय मराठी व इंग्रजी या भाषेतील ऑडिओ-व्हीडीओ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच या पोर्टलवर योजनेअंतर्गत सौर कृषिपंपासाठी कंत्राटदार निवडण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या पोर्टलद्वारे कंत्राटदाराची निवड करून त्या कंत्राटदाराकडून सौर कृषीपंप बसवून घेता येईल. या पोर्टलचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

Saturday, January 19, 2019

उत्कृष्ट अध्यापना बद्दल महावितरणचे PRO योगेश विटणकर यांचा गौरव

उत्कृष्ट अध्यापना बद्दल महावितरणचे PRO योगेश विटणकर यांचा गौरव

नागपूर/प्रतिनिधी: 

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादीत आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2018-19 मध्ये घेण्यात आलेल्या ‘ग्राम विद्युत व्यवस्थापक’ या अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षण वर्गात उत्कृष्ट अध्यापन केल्याबद्दल कार्यकारी संचालक (मानव संसाधन) चंद्रशेखर येरमे यांच्या हस्ते प्रादेशिक कार्यालय नागपूरचे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश नरहरी विटणकर यांचा गौरव करण्यात आला. 
राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभहस्ते झालेल्या या कार्यक्रमात हा अभ्यासक्रम यशस्विरित्या पुर्ण करणा-या नागपूर जिल्ह्यातील 153 प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. यावेळी नागपूर जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, कार्यकारी संचालक (मानव संसाधन) चंद्रशेखर येरमे, नागपूर जिल्हा विदुयत सनियंत्रण समितीचे अध्यक्ष गिरीश देशमुख, कामठी तालुका विदुयत सनियंत्रण समितीचे अध्यक्ष मोबीन पटेल, ग्राहक सल्लागार गौरी चंद्रायण, नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल, नागपूर जिल्हा परिषद सभापती उकेश चव्हाण, अधीक्षक अभियंता उमेश शहारे, नारायण आमझरे, मनीष वाठ, विदुयत निरीक्षक उमाकांत धोटे, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे सहायक संचालक प्रवीण खंडारे आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यातील २३ हजार युवकांची ग्राम विदुयत व्यवस्थापकपदी नियुक्ती करणार:चंद्रशेखर बावनकुळे

राज्यातील २३ हजार युवकांची ग्राम विदुयत व्यवस्थापकपदी नियुक्ती करणार:चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर/प्रतीनिधी:

ग्रामिण भागातील वीजेसंदर्भातील तक्रारींचे त्वरीत निराकरण व्हावे यासाठी दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय प्रमाणपत्र असणाऱ्या राज्यातील २३ हजार युवकांना आगामी काळात ग्राम विदुयत व्यवस्थापक पदावर नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. 

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ग्राम विद्युत व्यवस्थापकाचे
प्रशिक्षण यशस्वीरित्या पुर्ण केल्याचे प्रमाणपत्र स्विकारतांना प्रशिक्षणार्थी.
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरण आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्राम विद्युत व्यवस्थापकाचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पुर्ण केलेल्या नागपूर जिल्ह्यातील उमेदवारांना शनिवारी (दि .19) ऊर्जामंत्रांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. ग्राम विदुयत व्यवस्थापकाच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण भागात असणाऱ्या बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून त्यांच्या मार्फ़त ग्रामीण भागात महावितरणच्या कामासोबतच ग्रामपंचायत क्षेत्रातील गावांतील वीज दुरुस्तीची कामे करता येणार आहेत. नियुक्त करण्यात येणा-या ग्राम विदुयत व्यवस्थापकांना महावितरणशी निगडित वितरण हानी कमी करणे, वीज चोरीला प्रतिबंध घालणे या स्वरूपाची कामे करावी लागणार आहेत. सोबतच आगामी काळात सौर ऊर्जेचे महत्व लक्षात घेता शाळा, शासकीय कार्यालये, आरोग्य केंद्र या ठिकाणी यंत्रणा लावण्यासाठी पाठपुरावा करणे. शेतकरी, घरगुती वीज ग्राहकामध्ये सौर ऊर्जेसाठी जागृती करण्याची जावबदारी ग्राम विदुयत व्यवस्थापकाची राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ग्राम विदुयत व्यवस्थापक हा महावितरण आणि वीज ग्राहक यांना जोडणारा दुवा आहे. तुमचे काम जोखमीचे असल्याने काम करतेवेळी पुरेशी खबरदारी घेण्याची कळकळीची सूचनाही बावनकुळे यांनी उपस्थित सर्व ग्राम विदुयत व्यवस्थपकांना केली. ग्राम पंचायतीच्या हद्दीत काम करतेवेळी ग्राम विदुयत व्यवस्थापकाच्या कामाचे मुल्यांकन स्थानिक शाखा अभियंत्यांमार्फत करण्यात येऊन त्याअनुषंगाने विद्युत सहाय्यकांच्या पदभरतीवे वेळी त्यांच्यासाठी काही जागा राखीव ठेवण्याच्या सुचनाही ऊर्जामंत्री यांनी यावेळी केल्या. 

यावेळी प्रशिक्षण देण्यात आलेल्या १५३ ग्राम विदुयत व्यवस्थपकांना प्रमाणपत्र देण्यात आले. नागपूर प्रशिक्षण केंद्रात सप्टेंबर-२०१८ पासून ७ तुकड्यामध्ये निवड झालेल्या उमेद्वारांना २०० तासांचे प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी दिली. व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, कार्यकारी संचालक (मानव संसाधन) चंद्रशेखर येरमे, नागपूर जिल्हा विदुयत सनियंत्रण समितीचे अध्यक्ष गिरीश देशमुख, कामठी तालुका विदुयत सनियंत्रण समितीचे अध्यक्ष मोबीन पटेल, ग्राहक सल्लागार गौरी चंद्रायण, जिल्हा परिषद सभापती उकेश चव्हाण, अधीक्षक अभियंता उमेश शहारे, नारायण आमझरे, मनीष वाठ, विदुयत निरीक्षक उमाकांत धोटे, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे सहायक संचालक प्रवीण खंडारे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन उपमुख्य औदयोगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे यांनी केले.



आता मोबाईलवर येणार वीज मीटर रिडींगची माहिती

आता मोबाईलवर येणार वीज मीटर रिडींगची माहिती



मीटरच्या रिडींगची फोटोपध्दत बंद
नागपूर/प्रतिनिधी:

महावितरणकडून वीजग्राहकांना वीजबिलाबाबत तसेच मीटर रिडींगबाबतची अद्ययावत माहिती एसएमएसद्वारे ग्राहकांच्या अधिकृत मोबाईलवर दिली जाते. तसेच एसएमएस दाखवून वीजबील भरण्याची सुविधा महावितरणने ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे महावितरणने दि. १ फेब्रुवारी २०१९ पासून वीजबिलावरील मीटररिडींगचा फोटो देण्याची पध्दत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वीजबिलाबाबतची तसेच इतर महत्वाची माहिती मिळविण्यासाठी ग्राहकांनी आपल्या अधिकृत मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

वीज ग्राहकांना वीज मीटरच्या रिडींगची अचूक माहिती मिळावी म्हणून देशात महावितरणने सर्वप्रथम वीजबिलावर मीटर रिडींगचा फोटो छापण्याची पध्दत सुरू केली होती. या निर्णयाचा ग्राहकांना मोठा फायदाही होत होता. मात्र यात बील तयार झाल्यानंतर ग्राहकांना मीटरच्या रिडींगचा फोटो उपलब्ध होत होता. परंतु आता महावितरणकडून ज्या ग्राहकांनी आपल्या अधिकृत मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली आहे, अशा ग्राहकांना महावितरणसंबंधीच्या विविध सेवांची अद्ययावत माहिती एसएमएसद्वारे दिली जाते. त्यामुळे मोबाईल नोंदणी केलेल्या ग्राहकांना वीजबील मिळण्यापूर्वीच मीटर रिडींग घेताच त्याची माहिती तात्काळ उपलब्ध करून दिली जाते. परिणामी ग्राहकांना आपले मीटर रिडींग पडताळणीसाठी उपलब्ध राहील. तसेच मीटर रिडींगमध्ये काही तफावत आढळल्यास ती टोल फ्रि क्रमांक अथवा नजिकच्या कार्यालयात संपर्क साधून दुरूस्त करता येणे शक्य होईल.

फोटो मीटर रिडींग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरीही ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून ग्राहकांना चालू महिन्यातील मीटरचा फोटो पाहण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर सुविधा उपलबध करून देण्यात येईल. तसेच मीटरचा फोटो न छापल्यामुळे रिक्त राहणाऱ्या जागेवर ग्राहकांना वीजबिलासंबंधी पुरक माहिती देण्यात येईल.
महावितरणच्या 9225592255 या क्रमांकावर 'एसएमएस'द्वारे वीजग्राहकांना स्वतःच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय आहे. नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून 9225592255 क्रमांकावर MREG(स्पेस) (बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून 'एसएमएस' केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होते. याशिवाय 24x7 सुरु असणार्‍या कॉल सेंटरचे 1912 किंवा 18001023435 आणि 18002333435 हे टोल फ्रि क्रमांक उपलब्ध आहे. याशिवाय www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाईल अ‍ॅपद्वारे मोबाईल क्रमांक नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे.
सर्व वर्गवारीतील सुमारे दोन कोटी सात लाखापेक्षा अधिक वीजग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केलेली आहे. उर्वरित वीजग्राहकांनीही महावितरणच्या वीजसेवेचा लाभ घेण्यासाठी मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Wednesday, January 16, 2019

२ वर्षात ३२०० मेगावॅटचे सौरऊर्जा प्रकल्प उभारणार:चंद्रशेखर बावनकुळे

२ वर्षात ३२०० मेगावॅटचे सौरऊर्जा प्रकल्प उभारणार:चंद्रशेखर बावनकुळे

इन्फ्रा-2, आयपीडीएस, दिनदयाल उपाध्याय,एचव्हीडीएस योजनेची 
कामे मार्च पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश

 ग्रामपंचायतींसह सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर येणार

मुंबई/प्रतिनिधी:

येत्या दोन वर्षात महावितरण द्वारे राज्यात 3200 मेगावॅट सोलार प्रकल्प उभारण्यात येतील अशी माहीती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मंत्रालयत झालेल्या एका बैठकीत दिली. या बैठकीत महावितरणच्या 16 झोन मधील प्रत्येक मुख्य अभियंताकडून 200 मेगावॅट सोलर प्रकल्प उभारण्याबाबत निर्देश देण्यात आले. या बैठकीस ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार, विश्वास पाठक उपस्थित होते.
राज्यातील सर्व नळयोजना, उपसासिंचन योजना (खाजगी व शासकीय) तसेच ग्रामपंचायत मधील सर्व शासकीय इमारती (शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत भवन, आरोग्य केंद्रे) सौर ऊर्जेवर आणाव्यात या बाबत ऊर्जामंत्री यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत ऊर्जा संवर्धन धोरणा अंतर्गत या योजना राबवण्यात याव्या तसेच या योजनेकरीता 500 कोटीचे बजेट तयार करून मंत्रीमंडळा समोर सादर करण्याचे निर्देशही ऊर्जामंत्री यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ऊर्जासंवर्धन धोरणा अंतर्गत पहिल्या टप्प्यात महावितरण कडून या योजना राबविण्यात येतील. 

या बैठकीत एचव्हीडीएस, इन्फ्रा - 2, दिनदयाल उपाध्याय व आय‍पीडीएस योजनेबाबतही आढावा घेण्यात आला. मार्च 2019 पर्यंत इन्फ्रा 2, दिनदयाल उपाध्याय तसेच आयपीडीएस योजनेचे काम पूर्ण करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री यांनी महावितरणला दिले. मुंबई, नवीमुंबई, पनवेल, कल्याण, औरंगाबाद, चंद्रपूर, ठाणे व नांदेड विभागात आयपीडीएसची कामे महानगर पालिकेद्वारे रस्ता पुर्नस्थापना दर मान्य न केल्यामुळे पूर्ण झाली नाहीत ती पूर्ण कराव्यात तसेच एचव्हीडीएस योजनेत ज्या भागात विद्युत वाहक यंत्रणा पोहचणे शक्य नाही त्या भागात सोलार कृषी पंप देण्याचे निर्देशही बावनकुळे यांनी दिले.
राज्यात 750 मेगावॅट सोलार प्रकल्प महाजनकोद्वारे राबवण्यात येणार आहेत. यापुढे सौर ऊर्जेचे छोटे प्रकल्प महावितरण कडून तर महाजनको कडून मोठे प्रकल्प पूर्ण करण्यात येतील.
महावितरण संचालक (प्रकल्प) पदी भालचंद्र खंडाईत यांची निवड

महावितरण संचालक (प्रकल्प) पदी भालचंद्र खंडाईत यांची निवड

नागपूर/प्रतिनिधी:

महावितरणचे संचालक (प्रकल्प) या पदावर भालचंद्र खंडाईत यांची निवड झाली आहे. त्यांनी मंगळवारी दि. १५ जानेवारी २०१९ रोजी पदभार स्वीकारला. यापूर्वी ते नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालक म्हणून कार्यरत होते. गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात सौभाग्य योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. 

भालचंद्र खंडाईत हे भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यांतील सानगडी येथील रहिवासी असून त्यांनी तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात दि. २३ ऑगस्ट १९८९ रोजी चंद्रपूर परिमंडलातील नवरगाव वितरण केंद्रात कनिष्ठ अभियंता म्हणून आपल्या कार्यकाळाला सुरुवात केली. त्यानंतर कार्यकारी अभियंता म्हणून ते दि. २३ एप्रिल २००७ रोजी काटोल विभागात रुजू झाले. दि. २२ फेब्रुवारी २००८ ते दि. ५ मे २०११ पर्यंत कार्यकारी अभियंता म्हणून काँग्रेसनगर विभाग येथे कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात कॉग्रेसनगर विभागाने राज्यातील पहिल्या तीन विभागात स्थान पटकाविले होते, यादरम्यान त्यांनी कॉग्रेसनगर विभागात पायाभुत सुविधा उभारण्याचे कार्य मोठ्या प्रमाणात केले. 

दि. ९ मे २०११ रोजी त्यांची अधीक्षक अभियंता पदावर मुंबई मुख्यालयात बढती झाली. त्यानंतर गणेशखिंड शहर मंडल कार्यालय येथे ते अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत होते. मुंबई मुख्यालयात प्रारंभी मुख्य अभियंता (वितरण) आणि त्यानंतर मुख्य अभियंता (वाणिज्य) या दोन्ही पदांची जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली. दि. १६ मे २०१७ रोजी त्यांची प्रादेशिक संचालक म्हणून नागपूर येथील प्रादेशिक कार्यालयात निवड झाली. 

प्रादेशिक संचालक म्हणून कार्यरत असताना सौभाग्य योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील ऐटापल्ली आणि भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम भागांना त्यांनी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी तेथील गावकऱ्यांसोबत चर्चा करून ऊर्जीकरणाची कामे नियोजित वेळेपूर्वी पूर्ण करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. तसेच राज्यात एचव्हीडीएस योजनेचे काम सर्वप्रथम नागपूर विभागात त्यांच्याच कार्यकाळात सुरू झाले.

Thursday, January 10, 2019

महावितरणच्या “गो-ग्रीन” वीजबिलाला ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद

महावितरणच्या “गो-ग्रीन” वीजबिलाला ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद

महावितरणच्या “गो-ग्रीन” वीजबिलाला 
ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद
नागपूर/प्रतिनिधी:

वीजबील भरण्यासाठी छापील वीजबिलाऐवजी ई-मेल व एसएमएसचा पर्याय स्विकारणाऱ्या ग्राहकांना प्रती वीजबील १० रुपये सवलत महावितरणने १ डिसेंबर २०१८ ला जाहीर केली होती.  मागील एका महिन्यात राज्यातील सुमारे २१ हजार ग्राहकांनी या सवलतीचा लाभ घेतला आहे. नागपूर परिमंडलात येणाऱ्या नागपूरात ६३० आणि वर्धा जिल्ह्यात२२० अश्या एकूण ८५० वीज ग्राहकांनी प्रतिसाद देत " गो ग्रीन" अंतर्गत नावाची नोंदणी केली . अन्य ग्राहकांनीही या सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

वीजबील ऑनलाईन पाहण्यासाठी महावितरणने ग्राहकांना मोबाईल ॲप व www.mahadiscom.in या संकेतस्थळावर विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या सर्व सुविधा उपलब्ध असतानाही महावितरणतर्फे ग्राहकांना छापील वीजबीलही उपलब्ध करून देण्यात येते. परंतू जे ग्राहक गो-ग्रीन सुविधेचा पर्याय निवडतात, अशा ग्राहकांना छापील बिलाऐवजी ईमेल व एसएमएसद्वारे वीजबील उपलब्ध करून दिले जाते. अशा सर्व ग्राहकांना     १ डिसेंबर  २०१८ पासून प्रतीबील १० रुपये सवलत दिली जात आहे. गो-ग्रीनचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी आपल्या वीजबिलावरील गो-ग्रीन क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे अथवा महावितरणच्या संकेतस्थळावर https://billing.mahadiscom.in/gogreen.php येथे जाऊन करावी, असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात येत आहे.

गो-ग्रीनचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना तातडीने वीजबील मिळणार असून संदर्भासाठी वीजबिलाचे जतन करणेही त्यांना सोपे ठरणार आहे. गो-ग्रीनचा पर्याय पर्यावरण संवर्धनालाही हातभार लावणारा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वीजग्राहकांनी कागद विरहीत गो-ग्रीन सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  संजीव कुमार यांनी केले आहे.
आजपासून विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन

आजपासून विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन

नागपूर/प्रतिनिधी:
वीज ग्राहक आणि विज कर्मचा-यांमध्ये विद्युत सुरक्षेप्रती जागरुकता निर्माण व्हावी, ग्राहकांना अपघातविरहीत वीज पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातर्फ़े येत्या दि. 11 ते 17 जानेवारी दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाचा शुभारंभ राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे शुभहस्ते शुक्रवार 11 जानेवारी रोजी चिटणविस सेंटर, सिव्हील लाईन्स, नागपूर येथे सकाळी 11.00 वाजता करण्यात येईल. विजेमुळे होणा-या अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि राष्ट्रीय संपत्तीचे जतन करणे या प्रमुख उद्देषाने दरवर्षी या सप्ताहाचे आयोजन करण्यात येते.

यावेळी ऊर्जा राज्यंत्री मदन येरावार, महापौर नंदा जिचकार, खासदार डॉ. विकास महात्मे, खासदार  कृपाल तुमाने, हे प्रामुख्याने उपस्थीत राहणार आहे. याशिवाय आमदार नागो गाणार, आमदार प्रकाश गजभिये, आमदार जोगेंद्र कवाडे, आमदार अनिल सोले, आमदार गिरीष व्यास आमदार सुनील केदार, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार सुधाकर देशमुख, आमदार सुधीर पारवे, आमदार मिलींद माने, आमदार सुधाकर कोहळे, आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर आदी मान्यवर उपस्थित राहतील. याप्रसंगी “विदुयत तरंग” या स्मरणिका - 2019 आणि विदुयत कंत्राटदार संघटना, नागपूर यांचे दैनंदिनीचे विमोचन ऊर्जामंत्री यांचे हस्ते करण्यात येईल. या स्मरणिकेत विद्युत सुरक्षा सप्ताह 2016 ते 2018 मधील विविध कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला आहे. याप्रसंगी आयोजित प्रदर्शनात विदुयत अपघात कश्या प्रकारे घडतात या संबंधी स्वयंचलीत मॉडेल्स सादर करण्यात येणार आहेत. अपघातविरहीत वीजपुरवठा हे राज्य शासनाचे ध्येय असून यासाठी वीज ग्राहकांची साथ अत्यंत मोलाची आहे. दैंनंदिन आयुष्यात लहान-सहान गोष्टी विचारात घेतल्यास विजेमुळे होणारे अपघात हमखास टाळता येणे शक्य आहे, यादृष्टीने या सप्ताहादरम्यान ग्राहक प्रबोधन करण्यात येणार आहे.

या सप्ताहादरम्यान सर्वत्र विदुयत सुरक्षेबाबत कार्यशाळांसोबतच नागपूर शहरातील प्रत्येक चौकातील एल.सी.डी. स्क्रीनवर विदुयत सुरक्षीततेबाबत सुरक्षा संदेश प्रदर्शित करण्यात येणार आहे. शहरातील एफ.एम.चॅनलवर सुध्दा विदुयत सुरक्षीततेबाबत सुरक्षा संदेश प्रसारीत करण्यात येणार आहे. जयस्तंभ चौक, व्हेरायटी चौक, महानगर पालीका मुख्य इमारत, मेडीकल चौक, रेल्वे स्थानक, मध्यवर्ती बसस्थानक या शहराच्या प्रमुख ठिकाणी विद्युत सुरक्षेबाबतचे पोस्टर्स/बॅनर्स लावण्यात येणार आहे. तसेच रवी भवन, टी पॉईंट मॉरीस कॉलेज चौक, कळमना मार्केट, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, कामठी, मेडीकल चौक, रेल्वे स्थानक, मध्यवर्ती बसस्थानक येथे विदुयत सुरक्षेबाबतचे होर्डींग्स् लावण्यात येणार आहे. स्थानिक शाळा, शैक्षणिक संस्था, उद्योग, तंत्रनिकेतन, प्रशिक्षण संस्था येथे पोस्टर, स्लोगन स्पर्धा आयोजीत करण्यात येणार आहे. शहराच्या स्लम भागातही विदुयत सुरक्षीततेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच विदुयत निरीक्षण विभागातील अभियंते जिल्हयातील ग्रामीण भागातील शाळामध्ये विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षेचे महत्व व विजेचा सुरक्षीत वापर या बाबत मार्गदर्शन करणार आहेत. विदुयत सुरक्षा सप्ताहाच्या उपक्रमांव्दारे राज्यात होणारे विदुयत अपघात कमी व्हावे असा प्रयत्न विदुयत  निरीक्षण विभाग, नागपूर व राज्यातील सर्व विदुयत निरीक्षणालय, उद्योग, उर्जा व कामगार विभाग करीत आहे.

आज अज्ञान किंवा अतिआत्मविश्वास, अतिउत्साहामुळे दरवर्षी वीज अपघातात शेकडो बळी जातात, तर अनेकांना कायमस्वरुपी अपंगत्व येत असते. शे-पावशे रुपयांच्या वीजचोरीसाठी लाखमोलाच्या जीवाची बाजी लावल्या जाते, वीज तारांमधे अडकलेला पतंग काढायला जीव धोक्यात घातला जातो. वीज वाहिनीखाली घरांचे बांधकाम केल्या जाते, वीजपुरवठा खंडीत झाल्यास तो पुर्ववत करण्याचा प्रयत्न केल्या जातो, ओल्या हाताने विद्युत उपकरणे हाताळली जातात, ह्या सा-या गोष्टी म्हणजे साक्षात मृत्यूलाच आमंत्रण असल्याने ह्या गोष्टी टाळून अपघातविरहीत वीजपुरवठ्याच्या ध्येयात सर्वांनी सोबत करण्याचे आवाहन आयोजकांतर्फ़े करण्यात आले आहे.

हे लक्षात ठेवा

विद्युत उपकरणे ओल्या हाताने हाताळू नका.
विज वाहिनीच्या खाली किंवा जवळ कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू नका.
अर्थीगची व्यवस्था असलेल्या थ्री-पीन असलेलीच उपकरणे वापरा.
परवाना धारक कंत्राटदाराकडूनच घरातील वीज वायरींग करून घ्या.
आयएसआय प्रमाणित वीज वायर्स, केबल्सचा वापर करा. 
अतिभार किंवा शॉर्टसर्कीटमुळे हानी होऊ नये याकरीता योग्य क्षमतेची एमसीईबी/ एमसीसीबी वापरा.
विद्युत खांब किंवा तणाव तारांना गुरेढोरे बांधू नका.
विद्युत प्रवाह शेतातील कुंपणात सोडू नका.
न्यूट्रल करीता उघड्या तारांचा वापर टाळून इन्सुलेटेड तारांचा वापर करा
तात्पुरते, लोंबकाळणारे वायर्स वापरू नका.
विजेचा अनधिकृत वापर टाळा.
विद्युत उपकरणे दुरुस्तीच्या वेळी, त्याचा वीजपुरवठा बंद करून प्लग काढला असल्याची खात्री करा.
कुलरमधे पाणी भरतांना स्लीपर्स घालाव्यात सोबतच कुलरचा प्लग काढला असल्याची खात्री करा.
वीज तारांखाली गुरे-ढोरे अथवा कापणी झालेले पीक ठेऊ नका.
कपडे वाळविण्यासाठी वीज तारांचा वापर करू नका.
विनाकारण वीज खांबावर चढू नका.
वीजेच्या तुटलेल्या तारा आढळल्यास महावितरण नजिकच्या कार्यालयाला किंवा 1912, 18002333435, 18001023435 या निशुल्क दुरध्वनी क्रमांकावर त्वरीत कळवा.

            उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
        प्रादेशिक कार्यालय, महावितरण, नागपूर

Wednesday, December 12, 2018

नागपूरच्या 11000  ग्राहकांचा  पुरवठा  केला  महावितरणने  खंडित

नागपूरच्या 11000 ग्राहकांचा पुरवठा केला महावितरणने खंडित

विजबिलांचा नियमित भरणा करण्याचे महावितरणचे आवाहन
नागपूर/प्रतिनिधी:

 पाठपुरावा करुनही वीजबिलांचा भरणा करण्यास टाळाटाळ करणा-या महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रातील तब्बल 11 हजार 18 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून ग्राहकांनी वीजबिलांचा नियमितपणे भरणा करून वीजपुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रात तीनशे रुपये व त्यावरील अधिक थकबाकी असलेले घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीतील तब्बल 1 लाख 62 हजार 133 वीज ग्राहकांकडे सुमारे 81 कोटी 14 लाख रुपयांची थकबाकी असून यापेकी बहुतांश ग्राहकांनी दोन महिन्यांपासून त्यांच्या वीजबिलांचा भरणा केलेला नाही, महावितरणने सप्टेबर महिन्यापासून संपुर्ण राज्यभर सुरु केलेल्या केंद्रीकृत बिलींग प्रणालीमुळे बिलींग़ची संपुर्ण प्रक्रीया महावितरणच्या सांघिक कार्यालयामार्फ़त राबविण्यात येत असून थकबाकीदार ग्राहकांवरही सांघिक कार्यालयाकडून विशेष लक्ष देण्यात येत आहे. थकबाकीचा वाढता बोझा लक्षात घेता महावितरणला आपला आर्थिक गाढा खेचणे तारेवरची कसरत ठरत आहे, वीज खरेदी, कर्मचा-यांचे वेतन, विविध विकास कामांसाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज देण्यात महावितरणची बहुतांश रक्क्म खर्च होत असल्याने देखभाल व दुरुस्ती यासाठी महावितरणकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने शंभर टक्के थकबाकी वसुलीसाठी महावितरण आग्रही आहे. ही वसूली करण्यासाठी नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या संपुर्ण विदर्भात थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची व्यापक मोहीम हाती घेण्यात आली असून या मोहीमेत आतापर्यंत 7865 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. शुन्य थकबाकीचे लक्ष्य निर्धारीत करीत ही मोहीम दिवसेंदिवस अधिक आक्रमक करण्याच्या स्पष्ट सुचना प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी सर्व क्षेत्रिय अधिका-यांना दिल्या आहेत.

महावितरणच्या या विशेष मोहिमेत आत्तापर्यंत एकूण 1 लाख 62 हजार 133 थकबाकीदार वीज ग्राहकांपैकी 46 हजार 162 ग्राहकांकडून 15 कोटी 5 लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे तर 7865 थकबाकीदारांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात आणि 3153 थकबाकीदारांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला असून उर्वरीत थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे काम सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरु आहे. पाच हजारावरील आणि एक हजारावरील थकबाकी असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यास प्राधान्य देत महावितरणने ही मोहीमेची अंमलबजावणी अधिक आक्रमकपणे राबविणे सुरु केले असून ग्राहकांनी नियमितपणे वीजबिलांचा भरणा करीत सहकार्य करावे आणि वीजपुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई टाळण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

वीजबिल भरण्याचे अनेक पर्याय आणि भरघोस सवलत

विदर्भातील बहुतांश ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली असल्याने वीजबिलांची अद्ययावत माहिती ग्राहकांना एसएमएसच्या माध्यमातून नियमितपणे उपलब्ध करून दिल्या जात आहे. हा एसएमएस वीज भरणा केंद्रावर दाखवून ग्राहकाला त्याच्या बिलाचा भरणा करणे शक्य असून एसएमएसच्या आधारे बील स्विकृतीस नकार देणा-या बील भरणा केंद्राची तक्रार नजीकच्या महावितरण कार्यालयाकडे करण्याची मुभाही ग्राहकाला देण्यात आली असून, त्यांच्या तक्रारीची शहानिशा करून संबंधित बील भरणा केंद्रांवर कारवाई करण्यात येत असल्याने आता वीजबिल घरी येण्याची वाट न बघता बिल भरणा केंद्रावर एसएमएस दाखवून किंवा ऑनलाईन पद्धतीनेही वीजबिल भरणा करण्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध आहे, याशिवाय ‘गो ग्रीन’ च्या माध्यमातून कागदी बिलाएवजी ईमेल च्या माध्यमातून वीज बिल स्वीकारण्याच्या पर्याय स्विकारल्यास ग्राहकाला दहा रुपयांची सवलतही देण्यात येत आहे, याशिवाय एसएमएस मिळताच वीजबिलाचा भरणा केल्यास ग्राहकाला प्रॉम्प्ट पेमेंट्च्या माध्यमातूनही सवलत देण्यात येत असल्याने ग्राहकांनी उपलब्ध पर्यायांचा लाभ घेत वीजबिलाचा भरणा करण्याचे आवाहनही महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.