काव्यशिल्प Digital Media: अहिर

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label अहिर. Show all posts
Showing posts with label अहिर. Show all posts

Friday, October 19, 2018

 हंसराज अहीर यांच्या हस्ते प्लास्टीक चाचणी केंद्र व कॅड केंम लॅबचे उद्घाटन

हंसराज अहीर यांच्या हस्ते प्लास्टीक चाचणी केंद्र व कॅड केंम लॅबचे उद्घाटन

चंद्रपूर/प्रतिनिधी: 
सेंट्रल आॅफ प्लास्टीक इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नोलाॅजी (सिपेट), रसायन आणि उर्वरक विभाग, रसायन आणि खते मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत चालणारे राष्ट्रीय दर्जाचे केंद्र असुन ISO 9001:2008 QMS,ISO/IEC 17025,ISO/IEC 17020 प्रत्यायनाने प्रमाणित आहे. 
सिपेट संस्था प्लास्टीक अभियांत्रिकी आणि तंत्राज्ञान क्षेत्रात 1968 मध्ये स्थापन झाली आणि आता भारतातील 32 शहरा मध्ये कार्यरत आहे. सिपेट संस्था ही शैक्षणिक, तंत्रा सहायक सेवा, संशोधन आणि संबंधित उद्योगांच्या विकासासाठी समर्पित आहे. 
सिपेट चंद्रपूर हा प्रकल्प उभारण्यासाठी भारत सरकार कडून रू. 51.32 कोटी मंजूर करण्यात आले आहे. ज्यामध्ये भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने 50ः50 शेअर आधारावर संस्थेचे बांधकाम आणि तांत्रिक उभारणीकरिता मजूरी मिळाली आहे. 
महाराष्ट्र शासनाकडून औद्योगिक क्षेत्रातील चंद्रपूर येथे सिपेटचे केंद्र स्थापेनसाठी 15 एकर जमीन विनामूल्य मिळाली आहे आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाद्वारे 25.66 कोटी रूपयांची तरतूद केली आहे. 
सद्यस्थितीत सिपेटचे प्रशिक्षण कार्य प्लाॅट नं. 107/43, चैहान काॅलनी, तीर्थरूप नगर, वेकोलि क्वार्टर, चंद्रपूर येथे भाडयाने घेतलेल्या जागेवर प्रगतीपथावर सुरू आहे. संस्थेत उच्चस्तरीय साॅफ्टवेअर असलेल्या कॅटीया, युनिग्राफिक्स, मास्टरकॅम इत्यादीसह परिष्कृत प्लास्टीक चाचणी यंत्राणा आणि संगणक सहाय्यक डिझाइन प्रयोगशाळेसह प्लास्टीक चाचणी प्रयोगशाळेचे उद्घाटन आज दि 18 आॅक्टोंबर 2018 रोजी नवमी व दसरा पूजनाचे निमित्त साधून मा. हंसराज अहीर, केंद्रीय गृह राज्यमंत्राी, भारत सरकार यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, नगरसेवक संदीप आवारी, सुनिल डोंगरे, रवि गुरनुले, श्रीकांत भोयर आदी उपस्थित होते. 
यावेळी मा. मंत्राी महोदयांनी सिपेट चंद्रपूर येथे डिप्लोमा या कोर्सेला प्रशिक्षण घेणाÚया प्रथम बॅचच्या विद्याथ्र्यांशी संवाद साधला. त्यांनी विद्याथ्र्यांना प्लास्टीक डिप्लोमा कोर्स निवडल्याबद्दल आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी सिपेट चंद्रपूर येथे प्रशिक्षण आणि तांत्रिक सेवांसाठी तयार केलेल्या पायाभूत सुविधांचे कौतुक केले. डिप्लोमाच्या विद्याथ्र्यांनी सिपेट चंद्रपूर येथे आपले मत व्यक्त केले. 
सिपेट चंद्रपूर येथे 2016-17 पासून 1800 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षित झालेले आहेत व सध्या 180 प्रशिक्षणार्थी विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रशिक्षण घेत आहेत तसेच प्लेसमेंट टक्केवारी 83 टक्के इतकी आहे. उद्घाटन समारंभाच्या दरम्यान श्री. प्रविण बच्छाव, व्यवस्थापक (प्रकल्प), सिपेट चंद्रपूर यांनी मुख्य पाहुणे व इतर प्रतिष्ठीत अतिथी आणि मान्यवर आणि विद्याथ्र्यांचे स्वागत केले. तसेच सिपेट चंद्रपूरच्या कार्यकलापांची माहिती दिली आणि अखेरीस प्रतिष्ठीत अतिथींचे आभार मानले.

Thursday, October 18, 2018

लालपेठ येथे बतुकम्मा महोत्सवाचे यशस्वी आयोजन

लालपेठ येथे बतुकम्मा महोत्सवाचे यशस्वी आयोजन

बेटी बचावो, बेटी बढाओ’ ही आमची प्राथमिकता व जबाबदारी:हंसराज अहीर
चंद्रपूर/प्रतिनिधी:
तेलगू भाषीक बांधवांचा अत्यंत महत्वपूर्ण सण बतुकम्मा महोत्सवाचे आयोजन डाॅ. शामाप्रसाद मुखर्जी तेलुगू हायस्कुल, लालपेठ काॅलरी, चंद्रपूर येथे दि. 16 आॅक्टोंबर 2018ला बतुकम्मा महोत्सव कमीटीच्या वतीने करण्यात आला. 
बतुकम्मा महोत्सवात उपस्थिती तेलुगू भाषिक बंधु-भगीनींना संबोधित करतांना केंद्रीय गृह राज्यमंत्राी ना. हंसराज अहीर यांनी मान. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही केलेली घोषणा केवळ घोषणा नसुन आम्हा सर्वांची प्राथमिकता व जबाबदारी आहे. मुलींच्या सुरक्षेसोबतच सर्वच क्षेत्रात मुलींची प्रगती व्हावी म्हणून आम्ही सतत प्रयत्नरत राहू. 
भारतीय जनता पार्टीने तेलंगना प्रदेशाची प्रभारी म्हणून जबाबदाीर दिल्यावर मला तेथील संस्कृती जवळून पाहण्याचा योग आला व त्यातुनच या बतुकम्मा महोत्सवाचे भव्य आयोजन करण्याची प्रेरणा मिळाल्याचे प्रतिपादन ना. अहीर यांनी केले. चंद्रपूर क्षेत्रात लाखोंच्या संख्येने तेलुगू भाषीक वास्तव्यास असून तेलगू भाषीक भगीनींचा हा सण दरवर्षी साजरा करणार असल्याची घोषणाही त्यांनी याप्रसंगी केली. 
तेलंगणाचे आमदार किशन रेड्डी यांनी आपल्या भाषणात तेलुगू भाषीकांसाठी इतक्या तळमळीने या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल ना. अहीर यांचे आभार मानत आम्ही हैदराबाद मध्ये देखील इतका भव्य व सुंदर कार्यक्रम बतुकम्मा महोत्सव आयोजित करू शकत नसल्याची कबुली दिली. त्यांनी उपस्थित तेलुगू महिलांना बतुकम्मा महोत्सवासाठी आणखी तयारी करण्याचे आवाहन करीत पुढील वर्षी तेलंगणातुन महिलांचा बतुकम्मा समुह व फिल्म इंडस्ट्रीजची सेलीब्रिटी आण्याचे आश्वासन दिले. 
या कार्यक्रमात आ. नानाजी शामकुळे यांनी देखील तेलुगू भाषीकांना प्रोत्साहन पर भाषण देत बतुकम्मा महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्यात. या प्रसंगी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, महापौर अंजलीताई घोटेकर, जिल्हाधिकारी डाॅ. कुणाल खेमणार, पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी इत्यादी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. 
या कार्यक्रमास उपमहापौर अनिल फुलझेले, श्रीधर रेड्डी, दिनकर पावडे, मोहन चैधरी, नगरसेविका कल्पना बागुलकर, ज्योती गेडाम, माया उईके, शिला चव्हाण, निलम आक्केवार, नगरसेवक संदीप आवारी, उपक्षेत्रिय प्रबंधक हलदर, गणेश गेडाम, जितेंद्र धोटे, सतिश तिवारी, दिनकर पावडे, बतुकम्मा कमेटीचे अध्यक्ष तथा मनपा झोन सभापती श्याम कनकम, सदस्य संजय मिसलवार, राजेश तिवारी, श्रीनिवास रंगेरी, राजू कामपेल्ली, रामलु भंडारी, राजेश कोमल्ला, रामस्वामी पुरेड्डी, श्रीनिवास येरकल, श्रीनिवास झुनझुल, कुमार इदनुरी, रमेश मोकनपेल्ली, क्रिष्णा कारंगल, राजेश मिष्ठा, तिरूपती बुडदी, भुमन्ना दोम्मटी, गट्टया जुपाका, सारया पोटला, सुनिल मिसलवार, सीनु मेकला, महादेव अरेनार, तेजा सिंग, सुरेश गोलीवार, नरेश पुजारी, भानेष चिलमील, कृणाल गुंडावार, पराग मलोडे, संदीप आगलावे, आकाश लख्खाकुला, शैलेश दिंडेवार व लालपेठ परिसरातील बहुसंख्य तेलुगूभाषीक नागरिकांची उपस्थिती होती.

प्रत्येक घरात सैनिक जन्मावा

प्रत्येक घरात सैनिक जन्मावा

सन्मित्र सैनिकी विद्यालयातील शस्त्रापुजन समारंभात 
केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांचे प्रतिपादन 
चंद्रपूर/प्रतिनिधी:
 जिजामातेमुळे शिवाजी घडले, असे प्रत्येक घरात सैनिक घडावा स्वातंत्रावीर सावरकर म्हणत असत की, प्रत्येक नागरिकाने सैनिकी शिक्षण घ्यावे. ‘सैन्यात सामिल व्हा’ हे सावरकरांचे आवाहन आजही तितकेच लागू आहे. शालेय शिक्षणाबरोबरच देश रक्षा करण्याच्या आपल्या कर्तव्याचेही शिक्षण मुलांना दिले पाहिजे. शस्त्रापुजनाची भारताची प्राचीन परंपरा आहे, जी आजतागायत सुरू आहे. देशरक्षा करतांना आम्ही तर एकप्रकारे रोजच शस्त्रापुजन करतो. रणावीण तर स्वातंत्रयही मिळाले नाही. पोलीस व पोलीसखात्याशी संबंधित व्यवस्थाही आपल्याला माहित हव्या, या शब्दात सन्मित्रा सैनिकी विद्यालयातील शस्त्रापुजनाच्या कार्यक्रमात केन्द्रीय गृहराज्यमंत्राी ना. हंसराज अहीर यांनी आपले विचार व्यक्त केले. 
सन्मित्रा सैनिकी विद्यालयात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शस्त्रापुजन समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने झाली. विद्यालयात यावेळी भारतमाता नवरात्रोत्सव सुरू असून दीपप्रज्वलनानंतर केन्द्रीय गृह राज्यमंत्राी ना. हंसराज अहीर यांच्यासह मंचावर उपस्थित तरूण भारतचे पत्राकार संजय रामगीरवार, सन्मित्रा मंडळाचे उपाध्यक्ष डाॅ. विजय धनकर, सचिव अॅड. निलेश चोरे, कमांडंट सुरींदरकुमार राणा व प्राचार्य मनोज अलोणी यांनी भारतमातेची आरती केली. शस्त्रापुजनानंतर अॅड. निलेश चोरे यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्राी ना. अहीर यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व ग्रंथगुच्छ देवून सत्कार केला. याप्रसंगी संजय रामगीरवार यांनी भारतमाता नवरात्रोत्सवाविषयी आपले विचार व्यक्त केले. 
निखील महाकाली याने ‘वेदमंत्राहून आम्हा वंद्य वन्दे मारतम्’ हे वैयक्तिक गीत सादर केले. भारतमाता नवरात्रोत्सवात घेतल्या गेलेल्या वादविवाद स्पर्धेत विजयी झालेले सूचित भोगेकर, दिनेश शेवाळे, अजित पिंपळशेंडे, यश मोडक, तुषार खारकर यांना व भारताचे बोलके चित्रा रांगोळीतून सादर करणाÚया आदित्य पारधी, विवेक बोंडे, रजत कायरकर, पीयूष भाजे, अक्षय मोहितकर, वैभव गिरटकर, छविलशाह आत्राम, सुचित भोगेकर, नैतिक पाल, सौरभ धांडे, प्रशिल धांडे, निखील चैके, रितीक गिरसावळे, निखील महाकाली या सर्व कलाकारांचा गौरव करण्यात आला. 
सर्वांनी घेतलेल्या देशरक्षेच्या प्रतिज्ञेनंतर मंगेश देऊरकर यांनी गायलेल्या वन्दे मातरम्ने कार्यक्रमाची सांगता झाली.

Saturday, September 29, 2018

 अपघात प्रवण क्षेत्रावरील अपघाताचे प्रमाण कमी करा:हंसराज अहीर

अपघात प्रवण क्षेत्रावरील अपघाताचे प्रमाण कमी करा:हंसराज अहीर

चंद्रपूर/प्रतिनिधी:
 चंद्रपूर जिल्हयातील वाहनांची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे. हे एक ऐतिहासिक शहर असून या ठिकाणी रस्त्यांच्या काही भागात मर्यादा पडतात. त्यामुळे शहरातील वाहन व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी अपघात प्रवण क्षेत्राची (ब्लॅक स्पॉट) निवड करण्यात यावी व त्या ठिकाणी अपघात होणार नाही, अशा पध्दतीच्या उपाय योजना करण्यात याव्यात यावी, अशी सूचना केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर यांनी केली.
केंद्र सरकारच्या अधिसुचनेनुसार जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्षपद जिल्हयाचे लोकसभा सदस्य म्हणून ना. हंसराज अहीर यांच्याकडे आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक आज 28 सप्टेंबर रोजी पोलीस मुख्यालय, चंद्रपूर येथे पार पडली. 
जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष म्हणून पहिल्या सभेचे कामकाज पार पाडतांना अधिका-यांना अपघात प्रवण क्षेत्रा (ब्लॅक स्पॉट) निवडलेल्या ठिकाणी तातडीच्या उपाययोजना दोन महिन्यांत करून अपघाताचे प्रमाण कमी करण्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहीर यांनी निर्देश दिले. 
यावेळी महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, मनपाचे आयुक्त संजय काकडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंबर शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंत्या सुषमा साखरवडे, कार्यकारी अभियंता मनोज जयस्वाल व एस.आर.जाधव, राष्ट्रीय महामार्गाचे सहाय्यक अभियंता व अन्य अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. 
समोर आलेल्या माहितीनुसार सन 2015 ते 2017 या वर्षात चंद्रपूर जिल्हयात अपघात व मृत्यू यांचे प्रमाण सतत वाढत आहे. भारतात वर्षाला दीड लक्ष लोकांचा अपघाती मृत्यू होत आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी करण्याची गरज भासली असून यावर उपाययोजना म्हणून जिल्हयात एकुण 28 ठिकाणी अपघात पवण क्षेत्रा म्हणून अभ्यासपूर्ण निवड परिवहन विभागाने केली असून त्यावर उपाययोजना सुचविलेल्या आहेत. बैठकीत काही उपाययोजना दोन महिन्यांच्या कालावधीत तर काही दोन महिन्यांच्या कालावधीत होण्यासारख्या असल्याने दोन महिन्यात काम पूर्ण करण्याचे ना. अहीर यांनी निर्देश दिले. महानगराच्या महापौर अंजली घोटेकर यांनी वाहतूक नियमनासाठी स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांची विनामुल्य मदत घेण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यावर ना.अहीर यांनी दुजोरा देवून असा प्रयोग करता येईल अशा सुचना केल्या. 
जिल्हयात अवैध बस वाहतूक, वेकोलि व सिमेंटच्या ओवरलोड ट्रक व त्यांच्यामुळे होणारे प्रदुषण याकडे सभेचे लक्ष वेधून त्यावर चर्चा केली व अशा वाहतुकीवर कडक कार्यवाही करावी असे निर्देश दिले. चंद्रपूर जिल्हयात 5 लक्ष 74 हजार वाहने असून त्यात दुचाक्या 4 लक्ष 70 हजार इतक्या आहेत. इतक्या मोठया प्रमाणात वाहणे असल्याने परिवहन नियमन करणे जिकरीचे होत आहे. जिल्हयातून 107 कोटी इतका मोठा महसुल परिवहन विभागाकडून राज्य सरकारला जात असल्याने परिवहन विभागाचे सक्षमिकरण दर्जोन्नती करण्यावर यापुढे भर देण्यात येईल असे श्री. अहीर यांनी सांगितले. 
साधारणपणे ही बैठक तीन महिन्यातुन एकदा घ्यावयाची असली तरी ब्लॅकस्पाॅटवर करावयाच्या उपाययोजना व अपघाताचे प्रमाण कमी तातडीने उद्दीष्टय डोळयासमोर असल्याने पुढील बैठक दोन महिन्यांच्या आत घेण्यात येईल असे विभागास सांगून तोपर्यंत सर्व विभागाने दोन महिन्यांच्या आत सोपविलेली कामे पूर्ण करावीत असे सक्त निर्देश दिले.
  सर्जिकल स्ट्राईकच्या समर्थनार्थ शौर्यदिन कार्यक्रमाचे आयोजन

सर्जिकल स्ट्राईकच्या समर्थनार्थ शौर्यदिन कार्यक्रमाचे आयोजन

serjical strike साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी:
  29 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय सैन्य दलाने पाकिस्तान हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईक करून अतिरेक्यांचा खात्मा केला. भारतीय जवानांची ही अभिमानास्पद कामगीरी जनतेपर्यंत पोहचविण्याकरिता 29 सप्टेंबर हा शौर्य दिवस पूर्ण भारतात साजरा करण्यात येत आहे. या शुरवीर सैनिकांच्या सन्मानार्थ चंद्रपुरातही शौर्य दिवस दि. 29 सप्टेंबर 2018 रोजी आयएमए हाॅल, गंजवार्ड येथे सायं. 5.00 वाजता साजरा होणार आहे. या कार्यक्रमास भारताचे केंद्रीय गृह राज्यमंत्राी मा.ना.श्री. हंसराजजी अहीर, महाराष्ट्र राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्राी मा.ना.श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार, आमदार श्री. नानाभाऊ शामकुळे, महापौर अंजलीताई घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, जिल्हाधिकारी श्री. कुणाल खेमणार, जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. महेश्वर रेड्डी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पापडकर, आयुक्त श्री. संजय काकडे आदी मान्यवर सदर कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे. 
या कार्यक्रमाला सर्व मनपा सदस्य, जि.प. सदस्य, पं.स. सदस्य, न.प. सदस्य तसेच सर्व चंद्रपूर शहरातील नागरिकांनी शौर्यदिन कार्यक्रमास उपस्थित राहून शुरवीर भारतीय जवानांच्या कार्याचा सन्मान करण्यास उपस्थित रहावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजकानी प्रसिध्दीस दिलेल्या पत्राकातून केले आहे. 

Wednesday, September 19, 2018

 मुक्तीसंग्राम लढ्यातील हुतात्म्याचे बलीदान वाया जावु देणार नाही :हंसराज अहीर

मुक्तीसंग्राम लढ्यातील हुतात्म्याचे बलीदान वाया जावु देणार नाही :हंसराज अहीर

जिवती व कोरपना येथे ना. अहीर यांच्या हस्ते ध्वजारोहन 
चंद्रपूर/प्रतिनधी:
1947 साली देश स्वतंत्र झाला असला तरी नांदेड, हैद्राबाद सह चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, कोरपना व जिवती तालुके हे निजाम साम्राज्याचे भाग होते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल 13 महिन्यांनी म्हणजेच 17 सप्टेंबर, 1948 रोजी हा भाग स्वतंत्र झाला. या लढ्याला बराच मोठा इतिहास साक्षीदार असुन तत्कालीन गृहमंत्री लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकारातून ’आॅपरेशन पोलो’ राबवुन राजुरा तालुक्यातील निझामाच्या तावडीतून मुक्त करण्यात आले. या लढ्यात अनेकांना हुतात्म्य पत्कारावे लागले. हे बलीदान कायम लक्षात ठेवुन देशाच्या विकासात सर्वसामान्याने सहभाग घेणे गरजेचे असल्याचे मत केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले.
जिवती व कोरपना येथे आयोजीत राजुरा मुक्तीसंग्राम दिन ध्वजारोहन कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते. राजुरा उपविभागतील राजुरा, कोरपना व जिवती येथे ’राजुरा मुक्तीसंग्राम दिन’ मोठ्या उत्साहात साजरा होत असतो.
  यानिमीत्त जिवती येथे बस स्थानक चैकात तर कोरपना येथे मुख्य चैकात ध्वजारोहन समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दोन्ही तालुक्यात ना. हंसराज अहीर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहन करण्यात आले. प्रसंगी भाजपाचे राजुरा विधानसभा प्रमुख तथा लोकसभा विस्तारक खुशाल बोंडे, जिल्हा सचिव अरून मस्की, जि.प. सभापती गोदावरी केंद्र, जि.प. सदस्या कमलाबाई राठोड, किसान आघाडी जिल्हा राजु घरोटे, जिवतीचे पं.स. सभापती सुनिल मडावी, उपसभापती महेश देवकते, तालुका अध्यक्ष केशव गिरमाजी, नगराध्यक्षा पुष्पा नैताम, सुरेश केंद्रे, कोरपनाचे तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर, मध्यवर्ती बॅंकेचे संचालक विजय बावणे, पं.स. सदस्य नुतन जिवने, संगायोचे अध्यक्ष संजय मुसळे, नगरसेवक सतीश उपलेंचवार, रमेश मालेकर, कवडु जरिले, सचिन डोहे यांसह प्रमुख पदाधिकाÚयांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
हा देश शेतकÚयांचा असुन सरकार कडुन शेतकरी हिताच्या अनेक योजना राबविण्यात येत आहे. प्रत्येक घराला शुध्द पाणी, गॅस, घर देण्याचा सरकारचा मानस असुन त्यादृष्टीने सकारात्मक प्रयत्न शासन करित आहे. जिवती तालुक्यातील वन पट्ट्याच्या प्रकरणात शासन सकारात्मक कार्य करित आहे. आणि हे वन पट्टे मिळवुन देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्नरत असल्याचे यावेळी ना. अहीर यांनी सांगीतले. केंद्र सरकार कडुन ’स्वच्छता ही सेवा’ अभियान 15 सप्टेंबर ते 02 आॅक्टोंबर पर्यंत राबविले जात आहे. यात सर्वानी सहभाग नोंदवुन आपला गांव, आपला परिसर स्वच्छ करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन ना. हंसराज अहीर यांनी याप्रसंगी केले.
’नागरी महाराष्ट्र हागणदारी मुक्त’ संकल्पपुर्तीमध्ये जिवती नगरपंचायतीच्या योगदानाबद्दल महामहिम राष्ट्रपती कडुन सन्मान करण्यात आला. या अभियानात चांगले कार्य केल्याबद्दल जिवती नगर पंचायतच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाÚयांसह मुख्याधिकारी डाॅ. विशाखा शेरकी यांचा ना. हंसराज अहीर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या समारोहासाठी जिवतीचे राजेश राठोड, दत्ता राठोड, येमले तर कोरपनाचे पुरूषोत्तम भोंगळे, अरूण मडावी, राकेश राठोड, जुबेर भाई, रामभाऊ होरे आदींची उपस्थिती होती.

Sunday, September 16, 2018

चंद्रपुरच्या ऐतिहासिक वारसा संवर्धनसाठी केंद्र सरकार गंभीर:हंसराज अहीर

चंद्रपुरच्या ऐतिहासिक वारसा संवर्धनसाठी केंद्र सरकार गंभीर:हंसराज अहीर

हंसराज अहिर यांची केंद्रीय मंत्री डाॅ. महेश शर्मा यांचे सोबत सकारात्मक चर्चा
चंद्रपूर/प्रतिनिधी:
 चंद्रपुर चा ऐतिहासिक वारसा जतन करण्यास केंद्र सरकार गंभीर असून ना. हंसराज अहीर यांच्या पुढाकाराने केंद्रीय सांस्कृतीक व पर्यटन मंत्राी डाॅ. महेश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय पुरातत्व विभागाचे केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात महत्वाची बैठक पार पडली. चंद्रपुर मधील ऐतिहासिक वारसा संवर्धन करण्यास नागरिकांचा पुढाकार उल्लेखनीय असून सरकार सर्वोतोपरी सहकार्य करणार असे आश्वासन ना. डाॅ. महेश शर्मा यांनी दिले.
चंद्रपुर जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाची ठरलेल्या या बैठकीत चंद्रपुर किल्ला परकोट, गोंडराजे समाधी स्थळ सौंदर्यीकरण, ऐतिहासिक गोंडराजे राजमहल सद्याचे जिल्हा कारागृह, सराय इमारत, रामाळा तलाव, पुरातत्व विभागाचे संग्रहालय, जूनोना जलमहल, भद्रावती विजासन लेणी, संसद आदर्श ग्राम चंदनखेड़ा येथील किल्ला आदि विषयावर सकारात्मक निर्णय झाले.
चंद्रपुर येथील 500 दिवसा पासून सुरु असलेल्या किल्ला स्वच्छता अभियानाच्या अनुषंगाने तुटलेल्या किल्ला भिंत व बुरुजे यांची त्वरित दुरस्ती करण्याकरिता टप्पा-टप्पाने बांधकाम करण्याचे निर्देश देण्यात आले, किल्ल्याच्या सभोवताल सुरु असलेले संरक्षण भिंतीचे बांधकामास गति देण्यास दोन टप्प्यात 34 कोटिचा निधि मंजूर करण्यात आल्याचे यावेळी सांगितले, किल्ला व संरक्षण भिंत यामधुन पाथ वे , सायकल ट्रैक चा प्राकलन तयार करण्याच्या सूचना ही देण्यात आल्या, गोंडराजे समाधी स्थळ येथे उद्यान आणि लाइट, साउंड शो करिता आवश्यक कामे विभाग करेल व गरज असल्यास इतर संस्थेस काम करण्यास परवानगी देण्यात येईल असेही या बैठकीत ठरले. शहरातील कारागृह इतरत्रा हलवून गोंडराजे राजमहल संवर्धन करून पर्यटन दृष्टया संपूर्ण परिसर विकास करण्याबाबत लवकरच केंद्रीय समिति पाहणी करणार आहे, सोबतच ही समिती इको-प्रो किल्ला स्वच्छ्ता अभियान, जटपुरा गेट, जूनोना जलमहल, सराय इमारत, संग्रहालय पाहणी करेल. जूनोना जलमहल विभागाकड़े घेणे आणि सौंदर्यीकरण करणे, सराय इमारतीच्या जतन करण्यास तांत्रिक सहकार्य भारतीय पुरातत्व विभाग देणार असे ठरले. पुरातत्व विभागाचे बांधकाम करण्यात येणार असल्याचे संग्रहालयाच्या कामास गती देण्याचे निर्देश देण्यात आले.
विशेषतः चंद्रपुर मधील गोंड़कालीन ऐतिहासिक वारसा संवर्धन करिता या महत्वपूर्ण बैठकीस ना. हंसराज अहीर यांचेसह सांस्कृतिक पर्यटन मंत्राी डाॅ. महेश शर्मा, खात्याचे सचिव, भारतीय पुरातत्व विभाग च्या महानिदेशक डाॅ. उषा शर्मा, इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे, बिमल शहा, जानबीज शर्मा, जाॅइंट डायरेक्टर, टी जे अलोने, निदेशक, स्मारक, नागपुर सर्कल पुरातत्व अधीक्षक डाॅ. इजराइल हाशमी, प्रशांत शिंदे उपस्थित होते.

Wednesday, September 12, 2018

प्रत्यक्षबाधीत 601 गावांपैकी निधी वाटपात

प्रत्यक्षबाधीत 601 गावांपैकी निधी वाटपात

एकही गाव व बाधीत शहरे सोडू नका 
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे निर्देश
चंद्रपूर/प्रातिनिधी:
 प्रधानमंत्राी खनिज क्षेत्रा कल्याण योजने अंतर्गत प्राप्त 313 कोटींचे वितरण करतांना ज्यांचा पहिला अधिकार आहे असे जिल्हयातील 601 गावांना नियमानुसार एकुण निधीच्या 66 टक्के निधी वितरीत करावा त्यात एकही गांव व बाधीत शहरे सुटता कामा नये असे स्पष्ट व सक्त निर्देश केंद्रीय गृह राज्यमंत्राी यांनी दि. 11 सप्टेंबर रोजी आयोजित प्रधानमंत्राी खनिज क्षेत्रा कल्याण योजना अंतर्गत जिल्हयाला प्राप्त निधीचा आढावा बैठकीच्या अनुषंगाने अधिकाÚयांना दिले. 
जिल्हयातील नगर आयुक्त, मुख्याधिकारी व ग्राम पंचायत सरपंचांनी याबाबतीत अत्यंत जागरूक राहून आपल्या हक्काचा निधी मिळविण्यासाठी गावाच्या गरजेनुसार आपले प्रस्ताव जिल्हाधिकाÚयाकडे अंदाजपत्राकांसह सादर करावे अशी सुचना ना. अहीर यांनी केली. बाधीत क्षेत्रामध्ये शुध्द पिण्याचे पाणी ही मोठी गरज असून आर.ओ. वाॅटर एटीएम बाधीत गावात लावण्याची गरज त्यांनी बोलून दाखविली. बाजार ओटयांचे सौदर्यीकरण, शाळा, ग्रा.पं., ग्रामीण पाणीपुरवठा यासारख्या स्थानिक उपक्रमात सोलार विद्यूत व्यवस्था करण्यास भर देण्यात यावा असेही त्यांनी सुचविले. पांदन रस्त्याचा मोठा प्रश्न असून खनिज विकास अंतर्गत पांदन रस्ते घेण्याची मोठी संधी बांधीत गावांना उपलब्ध आहे याची आठवन ना. अहीर यांनी करून दिली. 
हा निधी गावाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात दिल्यास प्रत्येक बाधीत व अप्रत्यक्ष बाधीत गावांना व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत निधी वाटप केल्यास तो न्यायोचित ठरेल असे मत बैठकीत व्यक्त केले. प्रधानमंत्रयांनी प्रधानमंत्राी खनिज क्षेत्रा कल्याण योजनेच्या माध्यमातून विकासाची मोठी संधी दिली असून त्याचा सर्वात जास्त लाभ चंद्रपूर जिल्हयाला होणार आहे. त्यामुळे अधिकाÚयांनी नियमानुसार आराखडयात कामे समाविष्ट करावीत असे निर्देश अधिकाÚयांना दिले. या बैठकीला आ. नानाजी शामकुळे, जिल्हाधिकारी श्री. खेमकर, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, अधीक्षक अभियंता, जिल्हा खनिकर्म अधिकारी कांबळे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Monday, September 03, 2018

केरळच्या पूरपिडीतांना चंद्रपूरकर देणार मदतीचा हात

केरळच्या पूरपिडीतांना चंद्रपूरकर देणार मदतीचा हात

चंद्रपुरात केरळ फ्लड रीलिफ फंड कमिटीची स्थापना
जिल्हावासीयांनी स्वयंस्फुर्तीने मदत करण्याचे हंसराज अहीर यांचे आवाहन 
चंद्रपूर/प्रतिनिधी:-
केरळ राज्यामध्ये पुराने थैमान घालीत प्रचंड प्रमाणात वित्त मनुष्य हानी झाली आहे. या राज्यातील पूरपिडीतांचे अश्रु पुसण्यासाठी त्यांना दुःखातून बाहेर काढण्यासाठी तसेच त्यांचे उद्ध्यस्त झालेले संसार पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांद्वारे मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य  देऊ केले आहे. अशा नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी चंद्रपूर जिल्यातील  नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने मदतीचा हात वेळोवेळी दिला आहे. आताही असेच योगदान देण्याच्या अनुषंगाने दि. 31 ऑगस्ट रोजी स्थानिक आय.एम.ए. हॉल येथे बैठकीचे आयोजन करून ’’केरळ फ्लड रीलिफ फंड कमिटी, चंद्रपूर’’ची स्थापना करण्यात आली. या कमिटीच्या माध्यमातून निधी संकलन करून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सदर निधी केरळ राज्यात पाठविण्यात येणार असल्याने जिल्हावासियांनी मानवीय दृष्टकोनातून जास्तीत जास्त मदत करावी असे आवाहन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले आहे.
या बैठकीत केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार नानाजी शामकुळे, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, मनपा गटनेते राहुल पावडे, मधुसुदन रूंगठा, विजय राऊत, दामोधर मंत्री, रामकिशोर सारडा, डॉ. गोपाल मुंधडा, डॉ. एम.जे. खान, जार्ज कुट्टी लोकोज, रितेश तिवारी, राजू पुथुवीट्ठील, प्रमोद लुनावत, रघुवीर अहीर यांचेसह मनपा नगरसेवक व विविध संस्था, संघटनांच्या पदाधिकारयांनी ची प्रमुख उपस्थिती होती.
केरळ फ्लड रीलिफ फंड कमिटी, चंद्रपूर या समितीचे गंगा टॉवरस्, अहीर कॉम्प्लेक्स, कस्तूरबा रोड, चंद्रपूर येथे कार्यालय सुरू करण्यात आले असुन या कार्यालयात मदत निधीचे संकलन करण्यात येणार आहे. केरळ राज्यातील नागरिकांना मदतीचा हात देवू इच्छितांनी या कार्यालयात आपली मदत निधी रोख व धनादेशाच्या माध्यमातून जमा करण्याचे यावेळी ठरविण्यत आले. हे कार्यालय पुढील 15 दिवस सुरू राहणार आहे. चंद्रपूर शहरवासीय याप्रसंगीही मोठ्या प्रमाणात निधी जमा करतील असा विश्वास ना. अहीर यांनी व्यक्त केला आहे.
या बैठकीस आएमए रोटरी क्लब, महेश सेवा समिती, रेल्वे यात्री संघर्ष समिती, एमआयडीसी असोसिएशन, लायन्स क्लब, जेसीस, चांदा को ऑपरेटीव इंडस्ट्रीयल इस्टेट, ट्रान्सपोर्ट असोसिएशन, ट्रॅव्हल्स असोसिएशन, हॉटेल असोसिएशन, चंद्रपूर व्यापारी मंडळ, चेम्बर ऑफ कॉमर्स, केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशन, विविध समाज संघटन, पुज्य सिंधी पंचायत, अयप्पा मंदिर कमेटी, अग्रसेन समाज, महावीर सेवा समिती, बोहरा समाज समिती, कृषि केंद्र असोसिएशन, कोळसा असोसिएशन, जिल्हा माहेश्वर संघटन तसेच अन्य क्षेत्रातील नागरिकांची प्रामुख्याने उपस्थिती होती.



Tuesday, August 21, 2018

 अटलबिहारी वाजपेयी यांना  23 आॅगस्ट रोजी सर्वपक्षीय श्रध्दांजली

अटलबिहारी वाजपेयी यांना 23 आॅगस्ट रोजी सर्वपक्षीय श्रध्दांजली

Image result for अटल श्रद्धांजलिचंद्रपूर/प्रतिनिधी:-
 देशाचे पूर्व प्रधानमंत्री भारतरत्न श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी यांचे नुकतेच देहवसान झाले असून भारतमातेच्या या महान सुपूत्रास श्रध्दांजली वाहण्यासाठी दि. 23 आॅगस्ट 2018 रोजी सायं. 7 वाजता सर्वपक्षिय श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
चंद्रपूर महानगरातील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात होत असलेल्या या सर्वपक्षीय श्रध्दांजली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देशाचे पूर्व अर्थराज्यमंत्राी शांतारामजी पोटदुखे राहणार असून या कार्यक्रमास केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर, चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्राी सुधीर मुनगंटीवार, काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते पूर्व खासदार नरेश पुगलीया, राज्य वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, राजूराचे आमदार अॅड. संजय धोटे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक तुषार देवपुजारी, पूर्व नगराध्यक्ष गयाचरण त्रिवेदी, शिवसेनेचे विधानसभा प्रमुख किशोर जोरगेवार, रिपाईचे ज्येष्ठ नेते व्ही.डी. मेश्राम, रिपाई (आ.)चे जिल्हाध्यक्ष अशोक घोटेकर, मनसे नेते, जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार आदी प्रभृतींची याप्रसंगी उपस्थिती लाभणार आहे. 
या सर्वपक्षीय श्रध्दांजली कार्यक्रमास राजकीय सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील तसेच विविध समाजातील बुध्दीजीवी व नागरिकानी बहुसंख्येने उपस्थित राहून देशाच्या पूर्व प्रधानमंत्राी तथा महान विभुतींच्या स्मरणार्थ आपली श्रध्दांजली अर्पित करावी असे आवाहन आ. नानाजी शामकुळे व चंद्रपुरच्या महापौर अंजली घोटेकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्राकातून केले आहे.

Saturday, August 04, 2018

चंद्रपूर जिल्ह्यातील गावांना मिळणार भरीव निधी:अहिर

चंद्रपूर जिल्ह्यातील गावांना मिळणार भरीव निधी:अहिर

गावाला पायाभूत सुविधांसाठी निधी : सरपंच करणार नियोजन
चंद्रपूर /प्रतिनिधी:
 जिल्ह्यातील पंधराशेच्यावर गावांना प्रधानमंत्री क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत विविध आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी थेट निधी मिळणार आहे. हा निधी थेट ग्रामपंचायतीला मिळणार असून यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्ह्यातील सरपंचांच्या भरगच्च मेळाव्यात केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहिर यांनी आज केले. 
चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवनात आज झालेल्या जिल्हाभरातील सरपंचांच्या मेळाव्यामध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहिर यांनी प्रधानमंत्री क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत गावागावांना मिळणाऱ्या निधीबाबतची माहिती उपस्थित सरपंचांना दिली. लक्षावधीचा निधी थेट ग्रामपंचायतला मिळणार आहे. या कार्यक्रमाला शेकडोच्या संख्येने सरपंच उपस्थित होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आ.म.यादव, जिल्हा परिषद सभापती ब्रिजभूषण पाझारे, अर्चना जिवतोडे, वरोरा पंचायत समिती सभापती रोहिणी देवतळे, भद्रावतीच्या सभापती विद्या कांबळे, पोंभूर्णाच्या सभापती अल्का आत्राम, गोंडपिपरीचे सभापती दिपक सातपूते, जिल्हा परिषद सदस्य प्रविण सुर, राजू गायकवाड, मारोती गायकवाड आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये सरपंचांनी आपल्या गावाच्या समस्या मांडल्या. याशिवाय काही प्रलंबित विषयावरही यावेळी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. 
केंद्र शासनाने देशातील सर्व राज्यांमधील खनिज विकास प्रतिष्ठान मार्फत क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी ही योजना आखली आहे. ही योजना बाधीत क्षेत्रातील (खाणीमुळे बाधीत झालेली गावे) सामाजिक विकास व मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी लोकसंख्या व बाधित क्षेत्र, स्थानिक गरजा लक्षात घेऊन कार्यान्वित करण्यात आली आहे. या क्षेत्राचा विकास करण्यासाठी विविध प्रकल्प कार्यक्रम राबवताना व त्यानंतर झालेल्या कृतीमुळे तेथील जनतेवर झालेले पर्यावरण, आरोग्य व सामाजिक व आर्थिक परिस्थिती वरील आघात कमी करणे, क्षेत्रातील व्यक्तींना दीर्घमुदतीचे शाश्वत उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देणे, यासाठी या निधीचा वापर करण्याचे दिशा निर्देश केंद्र शासनाने दिलेले आहे. महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर हा सर्वाधिक खनिज बाधित जिल्हा आहे. त्यामुळे सर्वात जास्त निधी या योजनेअंतर्गत चंद्रपूरला मिळाला आहे.
यासंदर्भात मार्गदर्शन करताना केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहिर यांनी या योजनेत प्रत्येक गावाला लक्षावधी रुपये मिळणार असल्याचे स्पष्ट केले. या रुपयांचा विनियोग योग्य कामांसाठी झाला पाहिजे, असे आवाहन उपस्थित सरपंचांना केले. यावेळी त्यांनी खर्च करण्यासाठी सर्वाधिक प्राथमिकता त्या गावातील शुद्ध पेयजलासाठी प्रत्येक गावाने स्वतःच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था निर्माण करताना एटीएम आरो मशीन लावावे, असे आवाहन त्यांनी केले. याशिवाय सर्व बाधित गावाच्या क्षेत्रात येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुद्धा शुद्ध पेयजल पुरवणाऱ्या आरो मशीनचे एटीएम लावण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली. गावांमध्ये शाळा, ग्रामपंचायती, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी सोलर यंत्राद्वारे शाश्वत वीजपुरवठा यालाही प्राधान्य देण्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच प्रत्येक गावाच्या शेजारील नाल्याला खोलीकरण करण्यासाठीही या निधीचा खर्च करण्यात यावा,असे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रत्येक सरपंचाने ग्रामस्थांना गावाच्या विकासाचा कृती आराखडा सादर करावा व यामध्ये प्राथमिकता पेयजल व शाश्वत ऊर्जा स्त्रोत निर्माण करण्याला देण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले. या योजनेअंतर्गत कुठले काम घेतले जाऊ शकते. याबाबतचे सादरीकरण जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ.जी.डी.कांमडे यांनी केले. यावेळी सरपंचांनी केंदीय गृहराज्य मंत्र्यांशी विविध विषयावर चर्चा केली
प्रत्येक सरपंचाने स्वच्छ सर्वेक्षणात आपल्या गावाचे योगदान द्यावे:अहिर

प्रत्येक सरपंचाने स्वच्छ सर्वेक्षणात आपल्या गावाचे योगदान द्यावे:अहिर

चंद्रपूर जिल्ह्यातील स्वच्छता अभियानासाठी तयार
 राहण्याचे जिल्हा परिषदेचे आवाहन
चंद्रपूर /प्रतिनिधी:
भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने देशातील सर्व जिल्ह्यांचे स्वच्छता अभियानांतर्गत गुणांकन ठरविण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2018 हा देशव्यापी सर्वेक्षणाचा कार्यक्रम 1 ते 31 ऑगस्टपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक गावाच्या सरपंचाने यामध्ये आपले योगदान द्यावे, असे आव्हान केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहिर यांनी आज येथे केले. 
चंद्रपूर येथे नियोजन भवनात आयोजित करण्यात आलेल्या प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना अंतर्गत कार्यक्रमांमध्ये उपस्थित सरपंचांना या संदर्भातील माहिती त्यांनी दिली. देशव्यापी सर्वेक्षणाचा कार्यक्रम सुरू झाला असून ऑगस्ट महिन्यात यासंदर्भातील यंत्रणा कधीही आपल्या गावामध्ये येऊ शकते. त्यामुळे गावातील सार्वजनिक स्थळे, शाळा अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, बाजाराची ठिकाणे या सर्व ठिकाणची स्वच्छता पुढील काळात अद्यावत राहील यासाठी सतर्क रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या सर्वेक्षणानंतर 50 लाख ग्रामस्थांकडून प्रत्यक्ष व ऑनलाईन सहभाग नोंदवून घेतला जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणच्या निरीक्षणाचा देखील यामध्ये समावेश आहे. गाव स्तरावर सरपंच, ग्रामसेवक, स्वच्छ आग्रही, ग्रामपंचायत सदस्य, निगराणी समिती सदस्य, अंगणवाडी कार्यकर्ता, आशा आणि शिक्षक यांच्या देखील प्रतिक्रिया घेतल्या जाणार आहेत. या प्रतिक्रिया देताना गावातील स्वच्छता अभियानातील लक्षणीय उपलब्धी, संबंधित सर्वेक्षण करणाऱ्यांच्या लक्षात आणून द्यावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. गावातील प्रतीष्ठीतांकडूनही ही समिती प्रतिक्रिया घेणार आहे. गाव स्तरावर वेगवेगळ्या ठिकाणी सर्वेक्षण संस्थेच्या प्रतिनिधी सोबतही बैठकी करणार आहेत. केंद्र सरकारने विकसित केलेल्या मोबाईलवरील ॲपद्वारे नोंदवलेल्या प्रतिक्रिया सुद्धा याबाबत विचारात घेतल्या जाणार आहेत. वैयक्तिक शौचालयाची उपलब्धता व वापर, सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतागृहांची उपलब्धता व वापर, घनकचरा व्यवस्थापनासाठी गाव स्तरावर करण्यात आलेल्या सुविधा, स्वच्छतेबाबत गावातील प्रत्येकाला असणारी माहिती, त्यादृष्टीने त्यांचे असणारे वर्तन, या आधारे हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी गावागावात योग्य प्रकारे सूचना देण्याबाबतही या बैठकीत सरपंचांना सांगण्यात आले. या सर्वेक्षणामध्ये सर्वाधिक गुण स्वच्छताविषयक सद्यस्थितीला देण्यात आले असून यासाठी 35 गुण ठेवण्यात आले आहे. तर चर्चेद्वारे व ऑनलाईनद्वारे नागरिकांचे मते जाणून घेण्यासाठी 35 गुण ठेवण्यात आले आहेत. यासोबतच सार्वजनिक जागेवरील स्वच्छतेसाठी 30 गुण ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे या सर्वेक्षणासाठी येणाऱ्या पाहणी चमूला योग्य प्रतिसाद द्यावा व त्या पद्धतीने गावागावांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात यावे, असे आवाहनही ना.अहिर यांनी यावेळी केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी देखील सरपंचांनी यासंदर्भात ग्राम सचिवांना देण्यात आलेल्या सूचना नुसार गावांमध्ये स्वच्छतेच्या उपाययोजना होत आहेत अथवा नाही याबाबत तपासणी करावी. गावामध्ये स्थानिक स्तरावर या उपक्रमाबाबत जनजागृती होईल यासाठी स्वतः पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी कोणत्या प्रकारासाठी किती गुण आहेत व कोणती खबरदारी घ्यावी याबद्दलचे सादरीकरण केले.

Wednesday, July 25, 2018

गोंडवाना विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवुणक थांबवा

गोंडवाना विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवुणक थांबवा

गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची होत असलेली आर्थिक पिळवुणक थांबवा अन्यथा तिव्र आंदोलन , अभाविप शिष्टमंडळाने कुलगूरू यांनी सादर केले निवेदन




Thursday, July 19, 2018

घुग्घूस येथील वेकोलिच्या राजीव रतन हाॅस्पीटलला केंद्रीय रूग्णालयाची मान्यता

घुग्घूस येथील वेकोलिच्या राजीव रतन हाॅस्पीटलला केंद्रीय रूग्णालयाची मान्यता

मार्च २०१९ पर्यंत अत्याधुनिक केंद्रीय रूग्णालय रूग्णांच्या सेवेत
चंद्रपूर/प्रतिनिधी:
 घुग्घूस येथील वेकोलिच्या राजीव रतन या क्षेत्रिय रूग्णालयाचे उन्नयन (अपग्रेडेशन) करून केंद्रीय रूग्णालयात परावर्तीत करण्यात यावे यासाठी केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर सातत्याने प्रयत्नरत होते. याकरिता त्यांनी केंद्रीय कोळसा मंत्राी, यांचेसोबत अनेक बैठका घेतल्या. या दरम्यान झालेल्या चर्चेमध्ये या क्षेत्रिय रूग्णालयाचे उन्नयन करून या रूग्णालयाचे केंद्रीय रूग्णालयात परिवर्तन करण्यास अनुकूलता दर्शविण्यात आली होती. आता राजीव रतन हाॅस्पीटलचे केंद्रीय रूग्णालयामध्ये रूपांतरण करण्याचा केंद्र शासनाकडून निर्णय घेण्यात आला असून ना. हंसराज अहीर यांच्या प्रयत्नांना या निर्णयामुळे यश प्राप्त झाले आहे. 
दि. 20 जुलै रोजी केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी नागपुरात वेकोलि विश्रामगृह येथे या संदर्भात वेकोलि मुख्यालयाच्या  अधिकाऱ्यान सोबत बैठक घेतली त्यावेळी वेकोलिच्या या क्षेत्रिय रूग्णालयाच्या अपगे्रडेशन संदर्भात माहिती घेतली. राजीव रतन हाॅस्पीटलला केंद्रीय रूग्णालयाचा दर्जा प्राप्त झाल्याने या जिल्हयातील तसेच यवतमाळ जिल्हयातील वेकोलि अधिकारी, कर्मचारी, कामगार व त्यांच्या कुटूंबियांसाठी अत्याधुनिक आरोग्य सोयी-सुविधा उपलब्ध होणार असल्याने वेकोलि कामगारांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. 
दरम्यान या संदर्भात दि. 30 डिसेंबर 2017 रोजी वेकोलिचे अध्यक्ष तथा प्रबंध निदेशक यांना बैठकीस पाचारण करून या रूग्णालयाच्या उन्नतीकरण संदर्भात केंद्रीय गृह राज्यमंत्राी ना. हंसराज अहीर यांनी चर्चा केली होती. सध्याच्या 50 बेड ऐवजी आता केंद्रीय रूग्णालयामुळे 110 बेडची क्षमता राहणार आहे. याबरोबरच अतिदक्षता विभाग, नवजात गर्भधारणा अतिदक्षता विभाग, पुनप्राप्ती कक्ष (रिकव्हरी रूम) यासारख्या सुविधा अपग्रेडेशन मुळे उपलब्ध होणार आहेत व सध्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्यानची संख्या वाढवून ती 25 पर्यंत होणार आहे व इतरही स्टाॅफ मध्ये या अपग्रेडेशनमुळे वाढ होणार आहे. आज पार पडलेल्या केंद्रीय गृह राज्यमंत्रयांसमवेतच्या बैठकीमध्ये वेकोलिचे अध्यक्ष तथा प्रबंधन निदेशक राजीव रंजन मिश्रा, कार्मिक निर्देशक डाॅ. संजीव कुमार यांची उपस्थिती होती. यावेळी सदर केंद्रीय रूग्णालयाच्या शुभारंभासाठी तसेच सोयी-सुविधांसाठी युध्द पातळीवर कार्य केले जाईल असे वेकोलि अधिकारी यांनी  या बैठकीत सांगितले. 
राजीव रतन क्षेत्रिय हाॅस्पीटल सोबतच छिंदवाडा येथील पटकाई हाॅस्पीटल, नागपुरातील जवाहरलाल नेहरू हाॅस्पीटलासुध्दा केंद्रीय रूग्णालयाचा दर्जा प्राप्त झाला असून अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त असणारे सदर रूग्णालय मार्च 2019 पर्यंत सुरू होण्याचे संकेत केंद्रीय कोळसा मंत्रालयाच्या सुत्रांकडून देण्यात आले आहेत. दि. 27 जुलै रोजी प्रस्तावित केंद्रीय रूग्णालयासंदर्भात वेकोलिच्या बोर्ड मिटींग आयोजित करण्यात आली असल्याचे कळते.

Monday, July 16, 2018

  ‘त्या’ शेतजमिनीचे  वेकोलिने अधिग्रहण करावे:हंसराज अहीर

‘त्या’ शेतजमिनीचे वेकोलिने अधिग्रहण करावे:हंसराज अहीर

सेक्शन 4 नोटीफिकेशनच्या मान्यतेकरिता मुख्यालयास अहवाल पाठविण्याची सुचना
चंद्रपूर/प्रतिनिधी:
 वेकोलि सास्ती एक्सपान्शन प्रकल्पामुळे कायमस्वरूपी पुराचा धोका निर्माण झालेल्या बाबापूर, कोलगांव, सास्ती या गावांना पुर स्थितीपासून संरक्षण देण्याकरिता नाल्यांचे खोलीकरण व रूंदीकरण करण्यात यावे, ओवरबर्डनच्या डम्पींगमुळे ही समस्या अधीकच गहन बनल्याने वेकोलिने या ओबीची विल्हेवाट लावावी तसेच रस्त्याअभावी शेतीची कास्त करण्यास अशक्य झालेल्या शेतकÚयांच्या जमिनी संपादीत करण्यासाठी वेकोलि मुख्यालयाकडे अहवाल सादर करावा अशा सुचना केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी तालुका प्रशासन व वेकोलि व्यवस्थापनास संयुक्तपणे केल्या आहेत. 
दि. 14 जुलै रोजी वेकोलि बल्लारपूर क्षेत्राच्या विश्रामगृहात पार पडलेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीस भाजपा नेते खुशाल बोंडे, जिल्हा उपाध्यक्ष अरूण मस्की, किसान आघाडीचे महामंत्राी राजू घरोटे, मधुकर नरड, तहसिलदार डाॅ. रविंद्र होळी, क्षेत्रिय महाप्रबंधक बी.सी. सिंग, जि.प. सदस्य सुनिल उरकुडे, बादल बेले, अॅड. प्रशांत घरोटे, पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, विस्तारक सतिश दांडगे, सचिन डोहे, बंडू बोढे, दिलीप गिरसावळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 
सास्ती, कोलगांव, बाबापूर, मानोली या गावातील शेतकÚयांनी ना. हंसराज अहीर यांची भेट घेवून वेकोलिच्या ओ.बी. डम्पमुळे शेतात मशागत करण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसल्याची तक्रार केली होती. तहसिलदारांनी या ठिकाणी रस्ता उपलब्ध करणे शक्य नसल्याची बाब मंत्राी महोदयांच्या निदर्शनास आणुन दिली. यावेळी ना. अहीर यांनी वेकोलि व्यवस्थापनाने शेतकÚयांच्या अडचणीची दखल घेत त्यांचे मशागत होत नसल्याने होत असलेले आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सेक्शन 4 नोटीफिकेशनकरिता अहवाल सादर करून मुख्यालयाची मान्यता प्राप्त करून घ्यावी असे निर्देश क्षेत्रिय महाप्रबंधकांना दिले. शेतकÚयांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची दक्षता प्राधान्याने घ्यावी अशी सुचना केली. 
वाहिती करण्यास अडचण निर्माण झालेल्या अंदाजे शंभर एकर जमिनीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी. अधिग्रहणाशिवाय पर्याय नसतांना वेकोलि व्यवस्थापन या प्रश्नाकडे गांभीर्याने बघत नसल्याबद्दल ना. अहीर यांनी तीव्र शब्दात नापसंती व्यक्त केली. 
या बैठकीमध्ये वेकोलि सास्ती वसाहतीतील समस्या व मुलभुत प्रश्नांबाबतही चर्चा झाली. वसाहतीमधील अनेक महिलांनी ना. हंसराज अहीर यांची भेट घेवून त्यांचेकडे तक्रार निवेदन सादर केले होते. या वसाहतीमध्ये स्ट्रीटलाईटची व्यवस्था नसल्याचे तसेच गटारे तुंबून असल्याचे व पाण्याचा निचरा होत नसल्याने परिसरात गंदगी व अस्वच्छतेचे वातावरण निर्माण होवून येथील रहिवास्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. सर्वत्रा डुकरांचा हैदोस माजला असून रोगराईची शक्यता वाढली असल्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्यात आल्यानंतर ना. हंसराज अहीर यांनी येत्या आठवडाभरात या सर्व तक्रारीचे निवारण करण्यात यावे असे निर्देश देवून कार्यवाहीचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सुचना क्षेत्रिय महाप्रबंधकास दिल्या. या बैठकीत पं.स. सदस्या नयना परचाके, कोलगांवचे सरपेच पुरूषोत्तम लांडे, ग्रा.पं. सास्तीचे सदस्य कृष्णाअवतार संबोज, पुरूषोत्तम हिंगाणे, मारोती जेनेकर, सुनिल वांढरे, महिला आघाडीच्या सदस्या भावना भोयर व बहुसंख्य महिला उपस्थित होत्या
राजूरा येथील श्रेणीवर्धीत उपजिल्हा रूग्णालय इमारत बांधकामाची ना. अहीर यांचेकडून पाहणी

राजूरा येथील श्रेणीवर्धीत उपजिल्हा रूग्णालय इमारत बांधकामाची ना. अहीर यांचेकडून पाहणी

चंद्रपूर/प्रतिनिधी:
 राजुरा येथील श्रेणीवर्धीत शंभर खाटांच्या अद्ययावत उपजिल्हा रूग्णालयाच्या नवनिर्मित इमारत बांधकाम स्थळी दि. 14 जुलै रोजी केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी भेट देवून पाहणी केली. सदर कामास गती देवून या इमारतीचे बांधकाम कालबध्द वेळेत पूर्ण करण्याची सुचना संबंधित अधिका-यांनी केली. 
राजुरा उपविभागातील तालुक्यातील रूग्णांसाठी हे रूग्णालय वरदान ठरणार असल्याने आरोग्य सेवा तातडीने उपलब्ध होण्यासाठी या इमारतीचे बांधकाम शिघ्रगतीने व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करून निधी अभावी हे काम रंेगाळणार नाही याची दक्षता घेतली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी राजुराचे आ. अॅड. संजय धोटे, खुशाल बोंडे, अरूण मस्की, उपविभागीय अभिंयता पाचपोर, शाखा अभियंता वैभव जोशी, जि.प. सदस्य सुनिल उरकुडे, डाॅ. लहुजी कुळमेथे, महादेव तपासे, किशोर जयपुलकर, यांची उपस्थिती होती.

Friday, July 13, 2018

गडचांदूर शहराच्या विकासात्मक कार्याचा केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांचेद्वारा आढावा

गडचांदूर शहराच्या विकासात्मक कार्याचा केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांचेद्वारा आढावा

चंद्रपूर/प्रतिनिधी:
 गडचांदूर शहराचा दिवसंेदिवस विस्तार होत असल्याने या शहराची व्याप्ती लक्षात घेवून शहर विकासाचा आराखडा तयार करण्यात यावा तसेच गडचांदूर नगरपरिषदेने या शहरातील नागरी सुविधांबाबतच्या उणीवा दूर करण्यासाठी आवश्यक पाऊले उचलावीत, येथील रस्ते, नाल्या व अन्य सोयी-सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्धतेकरिता पाठपुरावा करावा याकरिता सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी गडचांदूर येथील शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या बैठकीमध्ये दिले. 
दि. 11 जुलै रोजी गडचांदूर येथील दौ-यात ना. अहीर यांनी नगरपरिषदेच्या अधिकारी, पदाधिका-यांची बैठक बोलावून या बैठकीमध्ये गडचांदूरच्या विकासात्मक बाबींचा आढावा घेतला. न.प. द्वारा राबविण्यात येणा-या विविध विकास कामाची माहिती उपस्थित अधिका-यांकडून घेतली. यावेळी त्यांनी पालीका प्रशासनाच्या मोकळया जागेवर युवकांसाठी क्रीडांगण, बगीचा व ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्राची उभारणी करण्या संबंधातील प्रस्ताव तयार करून शासनाद्वारा निधीची उपलब्धता करावी असे सुचविले. 
गडचांदूर शहरातील विद्यूत विषयक समस्या तसेच लगतच्या गावातील व तालुका स्तरावरील कृषिपंप जोडणीचा अनुशेष भरून काढण्याकरिता मराविवि कंपनीच्या अधिका-यांनी नियोजनबध्द कार्यवाही करावी असे निर्देश मंत्राी महोदयांनी संबंधित विभागाच्या अधिका-यांना दिले. गडचांदूरातील अनेक नागरिकांनी घरगुती मीटरकरिता डिमांड भरूनही त्यांना मीटरची उपलब्धता नसल्याचे कारणे सांगुन मीटर देण्यास टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारीची दखल घेत स्थानिक अधिका-यांनी वरीष्ठ कार्यालयाकडे मीटरची मागणी नोंदवावी याबद्दल मराविवि कंपनीच्या मुख्य अभियंता तसेच अधीक्षक अभियंत्यांना सुचित केले जाईल असेही त्यांनी या बैठकीत सांगितले. 
या बैठकीला गडचांदूरच्या नगराध्यक्ष सौ. विजयालक्ष्मी डोहे, शहर अध्यक्ष तथा भाजपा तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर, विस्तारक सतिश दांडगे, जिल्हा महामंत्राी किसान आघाडी राजू घरोटे, नगरसेवक सतिश उपलेंचवार, भाजयुमोचे रोहन काकडे, मुख्याधिकारी जाधव, म.रा.वि.वि.कंपनीचे उपविभागीय अभियंता इंदूरकर, रमेश मालेकर, रऊफ शेख, रामसेवक मोरे, हरिभाऊ घोरे, महादेव एकरे, महादेव जयस्वाल, राकेश अरोरा, सत्यजीत शर्मा, पुरूषोत्तम निब्रड, संजय मुसळे, सुरेश बेसुरवार, किशोर बावणे, रक्षक भांदककर, संदीप शेरकी, शंकर आकुलकर यांचेसह अनेकांची उपस्थिती होती.

Thursday, July 12, 2018

भर पावसात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केला प्रभावित गावांचा पाहणी दौरा

भर पावसात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केला प्रभावित गावांचा पाहणी दौरा

राजुरा व कोरपना तालुक्यातील  भेट व नुकसानीची पाहणी 
चंद्रपूर/प्रतिनिधी:
संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थीती उद्भलेल्या कोरपना व राजुरा या तालुक्यातील अनेक आपादग्रस्त गावांना दि. 11 जुलै रोजी या क्षेत्राचे खासदार तथा केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या  उपस्थितीमध्ये भेट दिली. याप्रसंगी त्यांनी संकटग्रस्त ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांच्या विविधांगी समस्या, अडचणी ऐकुण घेतल्या तसेच प्रशासकीय स्तरावरिल प्रश्न आस्थेने ऐकुण या प्रश्नांची सोडवणुक केली जाईल असे आश्वासन या भेटीदरम्यान दिले उपस्थित अधिकाऱ्यांना पूराची झळ बसलेल्या गावातील लोकांच्या अडचणी निस्तारतांनाच त्यांचे प्रशासकीय स्तरावरिल प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. 
कोरपना तालुक्यातील नाल्यांच्या पाण्यामुळे पूर प्रभावीत इंजापूर, वडगांव, आसन (खुर्द) व खिरडी तसेच राजुरा तालुक्यातील चंदनवाही व पांढरपोैनी या गावांना भेटी देवुन एकंदर परिस्थिती जाणुन घेतली लोकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणीसुध्दा केंद्रीय गृह राज्यमंत्रयांनी ऐकुण घेतल्या. त्यांच्या या दौÚयात राजुराचे तहसिलदार डाॅ. रविंद्र होळी व कोरपनाचे तहसिलदार गाडे, तलाठी तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. कोरपना तालुक्याचे भाजप तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर, रमेश मालेकर, राजु घरोटे, संजय मुसळे, कवडु जरिले, सतिश उपलंचीवार, रोहन काकडे, सतिश दांडगे, बेसुरवार, पुरूषोत्तम निब्रड, पुरूषोत्तम भोंगळे, हरिभाऊ घोरे व राजुरा तालुक्यातील सतीश धोटे, तालुका महामंत्राी दिलीप वांढरे, विजय धानोरकर, दिलीप गिरसावळे, फिरोज पठान, आशिष करमरकर, संदिप गायकवाड आदी भाजप पदाधिकारी व कार्यकत्र्यांची यावेळी उपस्थिती होती. 
ना. अहीर यांनी क्षतीग्रस्त जि.प. शाळांची केली पाहणी 
वडगांव व आसन (खु.) या गावातील जि.प. शाळांची दूरवस्था झाली असतांना जि.प. प्रशासन या शाळांच्या दुरूस्तीकडे अक्षम्य दुर्लक्ष करित असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याच्या बाबींकडे या दोन्ही गावांतील लोकांनी केंद्रीय गृह राज्यमंत्राी ना. अहीर यांचे लक्ष वेधले असता त्यांनी प्रत्यक्ष मोक्यावर जावुन या शाळांची पाहणी केली. त्यावेळी या दोन्ही शाळांची अवस्था अत्यंत वाईट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. शाळेच्या भिंतींना सर्वत्रा भेगा पडल्याचे तसेच स्लॅब गळती लागल्याचे चित्रा मंत्रयांनी प्रत्यक्ष बघीतले. आसन या गावातील शाळेचे छत नादुरूस्त असल्याचे या भेटीत आढळुन आले. सदर प्रकार विद्याथ्र्यांच्या जिवणाशी खेळणारा असुन जि.प. च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची तातडीने दखल घ्यावी व स्थानिक अधिकाÚयांनी या आशयाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करावा असे निर्देशीत केले. क्षतीग्रस्त झालेल्या या शाळांची इमारत निर्लेखीत करून नव्याने इमारत बांधकामाकरिता प्रस्ताव सादर करावा अशी सुचना त्यांनी या शाळांच्या मुख्याध्यापकांना केली.
पूरस्थितीला प्रशासकीय नियोजनशुन्यता कारणीभुत - ना. अहीर 
पावसाळ्यात दरवर्षी केवळ नाल्यांच्या कारणामुळे या प्रभावीत गावामध्ये पाणी घुसल्याने पूरस्थिती उद्भवत असली तरी स्थानिक प्रशासनाने वर्षोंनुवर्षे या बाबींकडे दुर्लक्ष केल्यामुळे संततधार पाऊस पडल्यानंतर नाल्याच्या बॅक वाॅटरमुळे अनेक गावात पूरसदृष्य स्थिती उद्भवते नागरिकांकडुन, स्थानिक लोकप्रतिनिधीकडुन सातत्याने या नाल्यांच्या खोलीकरण व सरळीकरणाची मागणी होत असतांना त्याची दखल अधिकारी घेत नाहीत व लोकांना या निष्क्रीयतेचा आर्थिक फटका बसुन मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावी लागते. याकडे लक्ष वेधत ना. अहीर यांनी पूरसदृष्यस्थितीस कारक ठरणाऱ्या या नाल्यांची तज्ञांकडुन पाहणी करावी व या नाल्यांच्या खोलीकरण, सरळीकरण तसेच नाल्यांची दिशा वस्तीकडे राहणार नाही अशा पध्दतीचे नियोजन करून स्थानिक स्तरावरून संबंधीत विभागाकडे प्रस्ताव सादर करावेत असे निर्देश ना. अहीर यांनी दिले.
संततधार पाऊस तसेच नाल्यांच्या अतीव दाबामुळे पाणी गावामध्ये शिरल्याने ज्या लोकांच्या घराचे नुकसान झाले आहे. घरातील सामान व अन्नधान्य पावसामुळे नष्ट झाले. अनेक कास्तकारांच्या शेतशिवारात पाणी साचुन ज्यांच्या हंगामाचे नुकसान झाले अशा सर्व लोकांच्या नुकसानीचा सर्वे करून त्यांना शासन स्तरावरून नुकसान भरपाई उपलब्धतेकरिता भरपाई विषयक प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर करावेत व नैसर्गीक आपत्तीमुळे घरांची पडझड झालेल्या प्रभावीत कुटूंबीयांना खावटी उपलब्ध करून द्यावी अशी सुचनाही यावेळी केली.
बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना  मदत न मिळाल्याच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी असल्याने सर्व पात्रा नुकसानग्रस्त शेतकरी या मदतीपासुन वंचित राहणार नाही याची दक्षता अधिकाऱ्यानी घ्यावी ज्यांना नुकसान होवुनही मदत मिळाली नाही त्यांच्या तक्रारी स्वीकारून मदत मिळवुन देण्याकरिता तालुका प्रशासनाने कार्यवाही करावी अशा सुचना ना. अहीर यांनी उपस्थित तहसिलदारांना केलीेे.

Thursday, June 28, 2018

चंद्रपूर जिल्ह्याचे एव्हरेस्ट वीर राष्ट्रपतींच्या शुभहस्ते सन्मानित

चंद्रपूर जिल्ह्याचे एव्हरेस्ट वीर राष्ट्रपतींच्या शुभहस्ते सन्मानित

केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर व आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांची उपस्थिती
चंद्रपूर/प्रतिनिधी:
‘शौर्य मिशन’’ अंतर्गत एव्हरेस्ट शिखर सर करून चंद्रपूर या आदिवासी बहुल व ऐतिहासिक वारस्याचा धनी असलेल्या जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावत आपल्या या शौर्याचा नवइतिहास अखिल भारतीय स्तरावर पोहचविणाऱ्या आदिवासी विद्याथ्र्यांची दखल अखेर राष्ट्राची शान असलेल्या राष्ट्रपती भवनाने घेतली व महामहीमांच्या शुभहस्ते हे आदिवासी वीर सन्मानित झाल्याने चंद्रपूर जिल्ह्याच्या  शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तूरा खोवला गेला आहे. 
चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे खासदार देशाचे गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या विशेष उपस्थितीमध्ये एव्हरेस्ट वीर ठरलेल्या मनिषा धुर्वे, विकास सोयाम, प्रथमेश आडे, कवीदास काठमोडे, उमाकांत मडावी व इतरांचा राष्ट्रपती कोविंद यांनी भेटवस्तू देवून सन्मान केला. त्यांच्या असामान्य शौर्याचा गौरवपूर्ण शब्दात उल्लेख करून या विद्याथ्र्यांनी एव्हरेस्ट शिखर सर करून आदिवासींच्या शौर्याच्या इतिहासाला अजरामर केल्याची भावना या प्रसंगी व्यक्त केली. या शुरांच्या शौर्याची महती हा देश सदैव स्मरणात ठेवेल, लाखो युवक त्यांच्या या शौर्यातुन प्रेरणा घेतील असेही राष्ट्रपती कोविंद यांनी गौरवोद्गार काढले. 
आदिवासी या पे्ररणा व आनंददायी सोहळ्याला  आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, चंद्रपुरचे जिल्हाधिकारी आशुतोष सलील व एव्हरेस्ट सर करतांना माघार घ्यावी लागलेल्या इंदू कन्नाके, अक्षय आत्राम, शुभम पेंदोर यांचीही या विशेष सन्मान सोहळ्याला  उपस्थिती लाभली होती. राष्ट्रपती महोदयांशी हितगुज करतांना या वीर युवकांनी आपल्या एव्हरेस्ट चढाई प्रसंगीचे अनुभव कथन केले. आमच्यासाठी हा अत्यंत मौल्यवान ठेवा असल्याच्या भावना या विजयश्री संपादन केलेल्या आदिवासी एव्हरेस्ट वीरांनी व्यक्त करून आमच्या या यशात जिल्ह्यातील  व सहकार्याप्रती सदैव ऋणी राहू अशी भावना या सोहळा प्रसंगी व्यक्त केली.

Tuesday, June 26, 2018

चंद्रपूरच्या ४५ प्रकल्पग्रस्तांना नोकरीचे आदेश प्रदान

चंद्रपूरच्या ४५ प्रकल्पग्रस्तांना नोकरीचे आदेश प्रदान

प्रकल्पग्रस्तांना दिलेला शब्द पूर्ण केल्याचे समाधान:अहीर 
चंद्रपूर/प्रतिनिधी:
शेतकऱ्यांच्या   हिताचे रक्षण, त्यांच्या न्यायहक्काचे संरक्षण हे अग्रक्रमावरील कर्तव्य समजून वेकोलि प्रकल्पग्रस्तांच्या न्यायाचा लढा लढला हा आपल्या जीवनातील सर्वात मोठा लढा आहे. शेतकऱ्यांच्या  जमीनीला सार्थकी मोबदला मिळण्याकरिता केलेला संघर्ष राजकीय जीवनातील मोठी उपलब्धी असल्याची भावना व्यक्त करतांनाच दिलेला शब्द पूर्ण करू शकलो याचे समाधान वाटते. कोल इंडिया, वेकोलि प्रबंधनाला जमिनीच्या मोबदल्यासाठी व प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीकरिता बाध्य केले. वेकोलि दुर्गापूर उपक्षेत्राअंतर्गत सिनाळा येथील वेकोलि प्रकल्पग्रस्तांना 52 कोटी रूपयांचे वितरण होणार आहे. यापैकी आतापर्यंत 38 कोटी रूपयांचे वितरण झाले असून 274 प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. प्रकल्पग्रस्तांमध्ये या विषयाला घेवून जी अस्वस्थता होती ती आता दूर झाली ही आनंदाची बाब असल्याचे प्रतिपादन कंेद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी केले. 
दुर्गापूर उपक्षेत्राअंतर्गत दि. 26 जून 2018 रोजी 45 वेकोलि प्रकल्पग्रस्तांना नोकरीचे आदेशपत्रा वितरण प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास चंद्रपूरच्या महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस राहुल सराफ, सिनाळाच्या संरपंचा गीता वैद्य, उपसरपंच बंडू रायपुरे, जि.प. सदस्या रोशनी खान, पं.स. सदस्य संजय यादव, सुभाष गौरकार, विलास टेंभूर्णे, गंगाधर वैद्य, संतोष नरूले, राजू रत्नपारखी, किसान आघाडीचे राजू घरोटे, माजी पं.स. सदस्य लोकचंद कापगते, क्षेत्रिय महाप्रबंधक आभास सिंग, दुर्गापूरचे उपक्षेत्रिय अधिकारी प्रसाद, पोलीस पाटील सौ. नरूले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. 
ना. हंसराज अहीर यांनी प्रकल्पग्रस्त शेतकÚयांना आश्वस्त करतांना सांगितले की, 269 हे.आर. जमीनीचा पूर्वीचा मोबदला केवळ 2 कोटी होता त्यात 26 पट वाढ होवून तो आता 52 कोटी झालेला आहे. वेकोलि प्रकल्पग्रस्तांवर होणारा कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन केला जाणार नाही असे सांगत वेकोलिने सामाजिक दायित्वाच्या भावनेतून शक्य तेवढे सहकार्य करीत त्यांच्या समस्यांचे निवारण केले पाहिजे, विकास योजना राबविल्या पाहिजे. प्रकल्पप्रभावीत गावांना सर्व मुलभूत सोयी-सुविधांनी आदर्श करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. यासाठी आपण गांभीर्याने लक्ष घालू असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. 
आपल्या प्रास्ताविकातुन राहुल सराफ यांनी सांगितले की, केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी देशात सर्वप्रथम आमची जमीन आमचा भाव हा नारा दिला. वेकोलि प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी लढणारे एकमेव लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची लोकसभेत विशेष ओळख आहे. तब्बल 20 कोळसा खाण प्रकल्प त्यांनी रोखून धरत प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या हक्काचा भाव वाढवून दिला. राजकीय कारकीर्द पणाला लावत त्यांनी शेतकÚयांचे हित सर्वोपरी मानले. भाजपाचे लोकप्रतिनिधी सामाजिक जाणीवा ठेवून कार्य करणारे आहेत. विकास हा त्यांचा ध्यास आहे. त्यामुळे सर्वच बाबतील विकास सर्वत्रा दिसू लागला आहे. ना. हंसराजजी अहीर राज्याचे मंत्री सुधीरभाऊ सर्वसमावेशक भुमिका घेवून सर्वांना न्याय देत आहेत. 
या कार्यक्रमात 4.50 कोटी रूपयांचा मोबदला मिळालेल्या नाना बानकर तसेच 1 कोटी रूपयांचा मोबदला मिळालेल्या श्रीमती आत्राम व कुटूंबियांचा केंद्रीय गृह राज्यमंत्राी महोदयांच्या शुभहस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास सिनाळा येथील नागरिक व प्रकल्पग्रस्त बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. 
ना. हंसराज अहीर यांच्या शुभहस्ते गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार 
सिनाळा येथील इयत्ता दहावीत सुयश प्राप्त केलेल्या रोहित दुर्योधन, अंजली वैद्य, साक्षी रामटेके, श्रुती रायपुरे, संजीवनी रायपुरे, प्रज्वल रायपुरे तर 12वीच्या पायल मडावी, करीश्मा, रोहीनी रामटेके, ऋतिक मांडवकर या गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी या सर्व विद्याथ्र्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक कारकीर्दीच्या उज्वल यशाच्या शुभेच्छा दिल्या. सरकारच्या शैक्षणिक योजनांचा लाभ घेवून पालकांनी आपल्या मुलांचे भविष्य घडवावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.