बचत गट म्हटले की, ग्रामीण भागातील महिलांचे चित्र व त्यांची एकूणच संस्कृती डोळ्यापुढे उभी राहते. चंद्रपूरात झालेल्या बचत गटाच्या प्रदर्शनीत मॉडर्न फॅशनचे दागीणे मात्र या प्रदर्शनीत वेगळा ठसा उमटवून गेले. बरं, हे दागीणे ही काही यंत्रांनी बनविलेले नाहीत, तर एक महिलेने घरी तयार केलेले आहेत. आधुनिक फॅशनच्या बाजारात भूरळ पाडणारं जे काही मेट्रो सिटी मध्ये उपलब्ध आहे, ते थोडंफार या प्रदर्शनीत आणण्याचं श्रेय जात अबोली महिला बचत गटाच्या मिनाक्षी वाळके-सोनटक्के यांना.
मिनाक्षी जी सांगतात, शासनाने ही प्रदर्शनी लावून माझ्यासारख्या कित्येकींना वाव देण्याचं मोठ काम केलय. अनेक महिलांना मोठा आधार दिला. आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्याची प्रेरणा आणि प्रोत्साहनाची मोठी थाप पाठीवर ठेवल्यानेच महिलांचा आत्मविश्वास वाढला आहे. मी पहिल्यांदाच येथे आली आणि चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे माझा आत्मविश्वास दुणावला आहे. शासनाचे आभार मानने क्रमप्राप्त आहे. शिवाय आता राजुरा येथे बचत गटाचा पहिला मॉल येतोय, हे शासनाचे बचत गटांना मिळालेले मोठे वरदानच आहे. लोकप्रतिनिंधींनी बोललेला शब्द पूर्ण केला आणि प्रशासनाने त्याला आपल्या कृतीची योग्य जोड दिल्यानेच आज या ठिकाणी बचत गटांचा महोत्सव झाल्याचे कृतज्ञोक्ति मिनाक्षी यांनी केली.
मिनाक्षी यांची पाश्र्वभूमि ग्रामीण असतांनाही मॉडर्न ज्वेलरीची प्रेरणा मिळाली कशी? ते तयार करण्याचं कौशल्य शिकवलं कुणी? या प्रश्नांची उत्तरे प्रेरक आहेत. एक तर त्यांना कुणी शिकवले नाही, तसे प्रशिक्षणही त्यांना परवडणारे नव्हते. राजुरा येथील स्वाती गादेवार या आपल्या भाची कडे गेली असता तीने काही सजावटी च्या वस्तु दाखविल्या त्या बघून आणि माध्यमांतून प्रेरणा मिळाली. आणि आधुनिक तंत्रज्ञानाची साथ घेवून त्या घरीच प्रयोगशिल झाल्या. महिलांचे दागीणे, सणा-वाणाच्या वस्तू, पुजेची आकर्षक थाळी, कुंकवाचे करंडे, पेपर फ्लावर्स, टेडी बियर, पेपर बॉल, मॉडर्न रेडिमेड रंगोली, कुशन आणि डिझाईन्सच्या दुनियेत जे-जे म्हणून दिसतं ते सारंच तयार करण्याची क्षमता मिनाक्षी यांच्या मध्ये आली. त्यातूनच शिवप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट शी जुळून शेतक-यांच्या विधवा, गरिब-वंचित मुली आणि तरुणींसाठी योगदान देण्याचा संकल्प त्यांनी केलाय. म्हणजे आपला, स्वकष्टाने उभारलेला स्वयंरोजगार इतरांच्याही कामी यावा, ही भावना घेवून त्यांची कर्मयात्रा सुरु आहे. इच्छुकांना आपण मोफत शिकवू, त्यांना प्रोत्साहन देवू, गरज पडल्यास त्यांना कामही देवू या उदारभावनेतून चाललेलं हे कलाविश्वाचं आगळं काम निश्चितच प्रेरणा देणारं म्हणावं. घरच्यांनी अभियांत्रिकीच्या शिक्षणास नकार दिला. बाहेरगांवी शिक्षणास मज्जाव केला. पुढे विवाहाने प्राणिशास्त्रातील पदवी ही घेता आली नाही. त्यामुळे आलेली जळमटे झटकून नव्या उमेदीने अडिच वर्षाच्या लेकराला सांभाळत उभं केलेलं हे कलाविश्वाचं आकाश अथांगच म्हटलं तर नवल नव्हे!
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
Why is health insurance important?
-
Health Insurance In today’s world, maintaining good health is a top
priority for each one of us. Day by day, medical expenses are rising
rapidly, makin...
शहरात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू
-
जनप्रतिनिधींचे मागणीवर महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : शुक्रवारी रात्री
९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती नागपूर,
ता. १६...
पोळ्याच्या दिनी 'झडत्या'ची लोकसंस्कृती शेतकर्यांचे वैभव असलेला बैलांचा दिवस म्हणजे पोळा. वर्षभर राबणार्या बैलांची पिठोरी अमावश्येच्या दिवशी पूजा करून कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सण उत्साहाने साजरा केला जातो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांच्या खांदे शेकणीचा कार्यक्रम असतो. बैलांचे खांदे तूप किंवा तेल, हळद लावून शेकतात. 'आज आवतन घ्या अन् उद्या जेवायला या' या शब्दात बैलांना पोळ्याचे आमंत्रण दिले जाते. 'वाटी रे वाटी खोबर्याची वाटी, महादेव रडे दोन पैशासाठी, पारबतीच्या लुगड्याले छप्पन गाठी, देव कवा धावला गरिबांसाठी' एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव'. एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव | Har Har Mahadev Khabarbat™ https://www.khabarbat.in › 2013/09 एक नमन गोरा पार्वती , हर बोला हर - हर महादेव | Har Har Mahadev ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप बदलत चालले असले तरी ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी झडत्यांची लोकसंस्कृती आजही काय...
परमात्मा एक मानव धर्म पावडदौणा, मौदा मौदा येथे महानत्यागी बाबा जुमदेवजीचे भव्य आश्रम मौदा येथे बाबांचे भव्य असे परमात्मा एक सेवक मानव धर्म आश्रम बनविण्यात आले आहे. याची स्थापना दि. २१ जून १९९८ ला २५ एकर जागेमध्ये करण्यात आली. या आश्रमाचे महात्मेय व उद्दीस्त बघून महाराष्ट्र शासनाने दि. १३ नोव्हेंबर २००९ रोजी राज्य निकष समिती, मंत्रालय मुंबई यांच्या बैठकीत झालेल्या ठरावाप्रमाणे तसेच ग्रामविकास व जलसंशाधन विभाग मंत्रालय मुंबई यांचे दि १७ डिसेंबर २००९ पत्र क्र. तीर्थवी २००९ प्र. क्र. ५३ योजना ७ नुसार राज्यस्तरीय तीर्थ क्षेत्र ब वर्ग स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे महापरिनिर्वानंतर मंडळाच्या वतीने मानव धर्माचा प्रचार व प्रसार करण्यात येत असून त्याच्या महान समाज कार्याला विनम्र अभिवादन करून त्याच्या समाज कार्याचा वारसा पुढे चालविण्याकरिता व त्याच्या सामाजिक कार्याच्या स्मुर्ती जागविण्याकरिता वर्षातून एक दिवस मानव धर्माचे सर्व सेवक बांधव एकत्रित यावे म्हणून बाबांच्या आदेशानुसार प्...
अनिल पवार/उमरेड: गट ग्रामपंचायत चांपा यांच्यावतीने आयोजित मकरसंक्रांत निमित्ताने हळदी-कुंकुच्या कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला. मकरसंक्रांत ते रथ सप्तमी या दिवसांत ठिकठिकाणी वैयक्तिक, तसेच सार्वजनिक स्तरावर हळदीकुंकू समारंभ साजरे केले जातात.यानिमित्ताने आज चांपा ग्रामपंचायत द्वारा आयोजित हळदीकुंकू समारंभ या दिवसांतच साजरे करण्याचे महत्त्व आहेत तसेच आज चांपा येथे आज हळदी कुंकू व महिला मिळावा यानिमित्ताने वाण वाटप कार्यक्रम करण्यात आला . ग्रामपंचायत भवन च्या सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला .संपुर्ण ग्रामपंचायत भवन व पटांगण महिलांनी खचाखच भरून गेले होते .यावेळी चांपा येथिल महिलांनी हळदी कुंकू च्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .सावित्री बाई फुले यांच्या फोटो ला माल्यार्पण करून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हापरिषद अध्यक्षा मा .निशाताई सावरकर यांचे सरपंच अतीश पवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व उपसरपंच अर्चना सिरसाम यांच्या हस्ते हळदी कुंकू व वाण वाटप करण्यात आले . जिल्हापरिषद अध्यक्षा मा .सौ निशाताई सावरकर यांच्या उपस्थितीत महिलांचा मेळावा घेण्य...