সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, October 29, 2015

माजी सभापतींमध्ये धक्काबुक्की!

माजी सभापतींमध्ये धक्काबुक्की!

चंद्रपूर - स्थायी समितीच्या माजी सभापतींनी एक-दुसर्‍यांवर शिव्यांची लाखोळी वाहत धक्काबुक्की केल्याचा प्रकार बुधवार, २८ ऑक्टोबरला मनपाच्या आमसभेत घडला. यावेळी अन्य नगरसेवकांनी मध्यस्थी करीत दोन्ही सभापतींची समजूत काढल्याने प्रकरण निवळले. मात्र, या प्रकारामुळे सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Saturday, October 17, 2015

द्धाने केला पत्नाी, भाचाचा खून

द्धाने केला पत्नाी, भाचाचा खून

नागपूर-चारित्र्यावरील संशयातून ६० वर्षीय वृद्धाने पत्नाी आणि मेहुण्याच्या मुलाचा कुर्हाडीचे घाव घालून खून केल्याची घटना जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तक्षशीलानगर येथे शुक्रवारच्या रात्री ३ च्या सुमारास घडली. या घटनेमुळे वस्तीमध्ये शोककळा पसरली आहे. पोलिसांनी आरोपी शरनू उर्फ अन्नाजी कांबळे यास अटक केली आहे.
गोपीबाई शरनू उर्फ अन्नाजी कांबळे (५०) आणि चेतन मधुकर रामपुरे (१०) अशी मृतकांची नावे आहेत. अन्नाजी कांबळे यास दारुचे व्यसन असून तो हातमजुरीचे काम करतो. तर गोपीबाई बाजारांमध्ये भाजीपाला विकण्याचा व्यवसाय करायची. त्यांना तीन मुली असून तिघिंचेही लग्न झाले आहे. त्यांच्या तीनही मुली पुणे येथे राहतात. घरात दोघेच म्हातारे असल्याने गोपीबाई यांनी त्यांचा भाऊ मधुकर रामपुरे रा. उमरगांव (उस्मानाबाद) यांचा मुलगा चेतन यास दोन वर्षांपूर्वी नागपुरात आणले. तो नारी वस्ती येथील महापालिकेच्या उच्च प्राथमिक शाळेत चौथ्या वर्गात शिकत होता. अन्नाजी हा दररोज दारु पिऊन दररोज घरी यायचा आणि गोपीबाई यांच्याशी भांडण करायचा. काल शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास गोपीबाई भाचा चेतनसोबत वस्तीतील दुर्गादेवीच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. त्यानंतर ते घरी परतले असता अन्नाजी याने गोपीबाईशी भांडण केले. आज पहाटे पाचच्या सुमारास शेजारचे काही परिवार कोराडी येथील देवीच्या दर्शनाला जाणार होते. त्यांच्यासोबत गोपीबाई ‘ाा चेतनला घेऊन जाणार होत्या. त्याची माहिती रात्रीच अन्नाजीला दिली होती. त्यामुळे अन्नाजी हा गोपीबाईवर रागावलेला होता. दरम्यान पहाटे तीन वाजेच्या सुमारास सर्वजन झोपेत असताना अन्नाजीने गोपीबाईच्या मानेवर कुर्हाडीचे घाव घातले. त्यामुळे गोपीबाई किंचाळली असता चेतन झोपेतून उठला. त्यानंतर चेतनही किंचाळून दरवाजा उघडून बाहेर पळण्याचा प्रयत्ना करीत असताना अन्नाजीने त्याच्यावरही कुर्हाडीने वार केला. कुर्हाडीच्या घावाने दोघेहीजण जागीच ठार झाले. गोपीबाई आणि मुलाच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून शेजारचा अमित गणेश भगत (२५) आणि त्याच्या घरातील सदस्य उठले. त्यांनी गोपीबाईचा दरवाजा ठोठावला असता अन्नाजीने दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच अमित हा घरात शिरला असता त्याला गोपीबाई आणि चेतन जमीनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते आणि अन्नाजीच्या हातात कुर्हाड होती. अन्नाजी अशात अवस्थेत घराच्या उंबरठ्यावर बसून काही वेळ बसून होता. त्यानंतर अमितने ताबडतोब जरीपटका पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून खुनाचा गुन्हा नोंदविला आणि अन्नाजीला अटक केली. गोपीबाईच्या मुली, जावई आणि चेतनचे आईवडिल रात्री उशीरा नागपुरात पोहोचले. तोपर्यंत त्यांचे मृतदेह मेयो रुग्णालयाच्या शवविच्छेदन केंद्रातच पडून होते.
चंद्रपूर दारूबंदीचा निर्णय एका महिन्यात

चंद्रपूर दारूबंदीचा निर्णय एका महिन्यात

चंद्रपूर - राज्य शासनाने चंद्रपूर जिल्हा दारूबंदीची घोषणा केली. त्यानंतर येथील जिल्हा लिकर असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. 16) सुनावणीदरम्यान दारूबंदी निर्णयाला स्थगिती देण्यास नकार देत एका महिन्यात या संदर्भात निर्णय घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाला दिले. त्यामुळे दारूबंदीचा चेंडू आता उच्च न्यायालयात पोहोचला.

चंद्रपूर जिल्हा दारूबंदीची घोषणा करून 1 एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. शासनाच्या या निर्णयाविरोधात चंद्रपूर जिल्हा लिकर असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात उच्च याचिका दाखल केली. तथापि, उच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली नाही. त्यामुळे लिकर असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र, या संदर्भातील सुनावणी दोन-तीन महिने लांबणीवर गेल्याने दारूविक्रेत्यांसह जिल्ह्यातील जनतेचे न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष लागले होते. शुक्रवारी दारूबंदी याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या वेळी ऍड. सुब्रमण्यम यांनी जिल्हा लिकर असोसिएशनची बाजू मांडली. न्यायालयाने दारूबंदी निर्णयाला स्थगिती देण्यास नकार देत या संदर्भात एका महिन्यात निर्णय घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाला दिले.

Thursday, October 08, 2015

 नातीसमोरच आजीची हत्या

नातीसमोरच आजीची हत्या

नागपूर-  घरात चिमुकल्या नातीसोबत असलेल्या एका आजीची अज्ञात मारेकर्‍याने गळा आवळून हत्या केली. ही अंगावर शहारे आणणारी घटना प्रतापनगर पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्‍या तात्या टोपे नगरातील प्लॉट नं. २६ गुरुकृपा अपार्टमेंट येथे बुधवार ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास घडली.
वसुंधरा आनंद बाळ (वय ६९ वर्षे) रा. तात्या टोपेनगर असे मृत आजीचे नाव आहे. नीरीत शास्त्रज्ञ म्हणून कार्य केलेल्या डॉ. आनंद बाळ यांच्या त्या पत्नी होत्या. डॉ. आनंद बाळ यांच्या निधनानंतर वसुंधरा बाळ या त्यांचा मुलगा आदित्य आनंद बाळ, सून नीलम आदित्य बाळ व ९ महिन्याची आद्या नावाच्या नातीसोबत गुरुकृपा अपार्टमेंटमध्ये राहत होत्या. त्यांचा दुसरा मुलगा पत्नीसह मुंबईत राहतो. तर आदित्य बाळ हा बुटीबोरी येथील एका खाजगी कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. तर त्याची पत्नी नीलम ही मारुती सेवा शोरूममध्ये नोकरी करते. घटनेच्या दिवशी नेहमीप्रमाणे आदित्य आणि त्याची पत्नी कामावर निघून गेले. त्यावेळी घरी वसुंधरा आनंद बाळ आणि त्यांची नात उपस्थित होती. चिमुकली नात नेहमीच आजीला आवडती होती म्हणून वसुंधरा बाळ तिच्यासोबत खेळत मग्न व्हायच्या. बुधवारला सकाळी १०.१५ च्या सुमारास आदित्य बाळ यांच्याकडे घरकाम करणारी शीला इंगळे आली. तेव्हा घराचा दरवाजा बंद होता. तिने आवाज दिला परंतु घरातून कोणीही प्रतिसाद दिला नाही. म्हणून शीलाने ग्रीलमधून हात टाकला आणि दरवाजा उघडला. आता नेहमीचेच घर असल्याने शीला बिनधास्त घरात घुसली आणि आता काम करायचा विचार करीत होती. पण आत गेल्यावर वसुंधरा बाळ किचनरूम ते बेडरूमच्या पॅसेजमध्ये निपचित पडून दिसल्या. तर चिमुकली नात आजीला अशी निपचित पडल्याचे पाहून ओक्साबोक्सी रडत असल्याचे दिसले. ते दृश्य पाहून शीलाच्या पायाखालची जमीनच सरकली आणि भेदरलेल्या अवस्थेत तिने आजूबाजूच्या लोकांना बोलावले. तातडीने बाळ यांच्या फॅमिली डॉक्टरला सांगण्यात आले. तेव्हा प्रतापनगर पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली.

Friday, October 02, 2015

विकासकामावरून भाजपा-कॉंग्रेस आमने-सामने

विकासकामावरून भाजपा-कॉंग्रेस आमने-सामने

राजुरा शहरातील समस्या व विकास कामावरून आजी-माजी आमदारांत आरोप प्रत्यारोप बघायला मिळत आहे. शहर कॉंग्रेस कमेटी व राजुरा भारतीय जनता युवा मोर्चाने लावलेल्या बॅनरमुळे सध्या शहरात राजकीय वातावरण  तापले आहे.

शहर कॉंग्रेस कमेटीने काही दिवसांपूर्वी शहरात ‘कुठे नेऊन ठेवलाय राजुरा माझा?’ या शिर्षकाखाली शहरातील समस्यांना वाचा फोडली आहे. त्यामध्ये ‘पावसाचा थेंब जमिनीवर पडत नाही, तर लाईट जाते, झाडाच पान हालत नाही, तरी लाईट जाते’, ‘राजुरा ते बामणी फक्त ७ कि. मी. रस्ता परंतु सध्या तो इतका सुंदर आहे, की तो पार करायलाच अर्धा तास लागतो’, ‘वर्धा नदीवरील पूल, तर सध्या तेथील खड्ड्यांमुळे स्विमिंग पूल झाला आहे, मासे नदीत राहण्याऐवजी त्या पुलावरील खड्ड्यातच राहतात’, ‘रेल्वे ओवरब्रिज, तर विचारूच नका पूल बनवत आहे, की जगातल आठवा आश्‍चर्य हेच कळत नाही’, अशा वेगवेगळ्या विषयांना घेऊन शहरात महत्त्वाच्या चौकांमध्ये हे बॅनर लावले आहेत. कॉंग्रेसने या विविध समस्यांवर केलेल्या टिकात्मक प्रश्‍नांना भाजयुमोनेही बॅनरच्या माध्यमातूनच चोख उत्तर दिले आहे. त्यावर माजी आमदारांच्या कार्यकाळात त्यांनी खर्च केलेल्या ५०० कोटींच्या निधीवर आक्षेप घेतला आहे. ‘५०० कोटी खर्च केले असते, तर रस्त्याची ही हालत झाली नसती’ या शिर्षकाखाली चक्क माजी आमदारांच्या विकासकामांना आव्हान दिले आहे. राजुर्‍याची वाढती विज पुरवठ्याची मागणी लक्षात घेता फक्त राजुरा शहरासाठी वेगळे विद्युत केंद्र उभे केले असते, विद्युत अधिकारी व कर्मचारी दिले असते, तर वार्‍याने लाईन गेली नसती, असा टोला लगावला आहे. रस्ते दुरुस्ती व विजेची कामे आम्ही अवश्य करू असेही या बॅनरमध्ये नागरिकांना आश्‍वासन देण्यात आले आहे.

जेथे कॉंगेसने बॅनर लावले आहे, तेथे भाजपानेही आपले बॅनर लावले आहे. त्यामुळे बॅनरच्या माध्यमातून आजी-माजी आमदार आमने-सामने आल्याचे चित्र दिसत आहे. माजी आमदार सुभाष धोटे यांनी राजुरा शहर विकासासाठी १०० कोटींचा निधी २००९ ते २०१४ मध्ये खर्च केल्याचा दावा केला आहे. यामध्ये प्रामुख्याने ६६६ कुटुंबीयांना घरकुल मंजूरी, राजुरा-बल्लारपूर मार्गावरील रेल्वे उड्डाणपूल, राज्य सरोवर व संवर्धन योजनेंतर्गत न. प. राजुरा तलाव सौंदर्यीकरण, वनोद्यान सौंदर्यींकरण, प्रशासकीय इमारत बांधकाम, मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह बांधकाम, सोमेश्‍वर मंदिराचे जतन व दुरुस्ती, ११ खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, राजुरा शहराच्या विविध विकासकामांकरिता कोट्यवधीचा निधी तसेच राजुरा विधानसभेत ५०० कोटी निधींचा खर्च एवढे विकासकामे पाठिशी असूनही राजुरा विधानसभेत कॉंग्रेसला दुसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्या तुलनेत राजुरा विधानसभेत पहिल्यांदा सत्तेत आलेल्या भाजपाची कासवगतीने विकासकामांकडे वाटचाल होत आहे. कामांना गती देण्याचे आश्‍वासन पूर्णत्वास नेण्याचे आमदार ऍड. संजय धोटे यांचे म्हणणे आहे. सध्या शहरात मोठ्या प्रमाणात समस्या आहेत, त्यात कॉंग्रसने केलेल्या दाव्यात काही अंशी सत्यता असली तरी पहिल्यांदा सत्तेत आालेल्या भाजपाने या सर्व समस्या दूर करण्याचे आश्‍वासन दिले आहे.

एकूणच राजुरा विधानसभेत माजी आमदार सुभाष धोटे यांच्या विकासकामांचा झंझावात असताना अचानक सत्ता परिवर्तनानंतर समोर आलेल्या समस्यांमुळे रंगलेली ‘पोस्टर’वॉर सध्या शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. दुसरीकडे नुकत्याच सत्तेत आलेल्या भाजपाने कासवगतीने केलेली सुरुवात कॉंग्रेसच्या रडारवर आहे. त्यामुळे पुढेही अशीच ‘पोस्टर’वॉर मोठ्या प्रमाणात रंगणार असल्याची चर्चा शहरात जोमाने सुरू आहे.