काव्यशिल्प Digital Media: किल्ला

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label किल्ला. Show all posts
Showing posts with label किल्ला. Show all posts

Sunday, May 20, 2018

चंद्रपूरच्या त्या किल्ल्यासाठी चार दिवस चालले युद्ध

चंद्रपूरच्या त्या किल्ल्यासाठी चार दिवस चालले युद्ध

नागपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूरच्या वैभवावर ब्रिटिशांची नजर होती. तह झाल्यानंतरही किल्ला न मिळाल्याने ब्रिटिशां नी हल्ला चढविला. चार दिवस युद्ध झाले. किल्ल्याला खिंडार पडले आणि चंद्रपूरच्या किल्ल्यावर पठाणपुरा गेटवर ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकला. या ऐतिहासिक युद्धात अनेक सरदार, सैनिक धारातीर्थ पडले होते. या युद्धाच्या संबंधातील स्मारक, समाधी अस्तित्वात असून ते या घटनेची साक्ष देतात. या घटनेला आज, रविवारी दोनशे वर्षे पूर्ण होत आहेत.   
चंद्रपूरच्या  वैभवशाली किल्ल्यावर सर्वांचीच वक्रदृष्टी होती. भोसल्याचे राज्यसुद्धा इंग्रजांच्या ताब्यात गेले होते. त्यानी १८१६मध्ये तैनाती फौजेचा तह करून स्वाक्षरी केल्या होत्या. पुढे जानेवारी १८१८च्या तहानुसार चंद्रपूरचा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात द्यावा असे ठरले असतानाही तो देण्यात आला नव्हता. तेव्हा इंग्रज फौजेनी चंद्रपूरच्या किल्ल्यास ९ मे, १८१८ रोजी वेढा दिला. भोसलेच्या फौजांनीही तोफांनी प्रतिहल्ला चढविला. सलग चार दिवस हे युद्ध सुरू होते. परंतु किल्ला भक्कम आणि मजबूत असल्याने शक्य झाले नाही. १९ मे रोजी किल्ला भंगला, त्याला खिंडार पडले आणि २० मे १८१८ रोजी या खिंडारातून सैनिक शहरात आत शिरले. यावेळी भोसले राजांनीसुद्धा आपले सैनिक तयार ठेवले होते. मात्र इंग्रजांच्या रणसाहित्यापुढे इलाज चालला नाही. ब्रिटिशांचा चंद्रपूरच्या किल्ल्यावर झेंडा फडकला.
किल्लेदार गंगासिग जाटचे शौर्य
आप्पासाहेब भोसल्यांचा गंगासिंग जाट हे चंद्रपूर येथील विश्वासू किल्लेदार होते. जातीने जाट व त्यांचे आडनांव दिघ्वा होते. येथे मराठा-इंग्रज सैनिकांत तुंबळ युद्ध सुरू झाले. गंगासिह विराप्रमाणे लढून शहीद झाले. अली खान पठाण तोपची या गोलदांजाने मेजर कोरहॅम या इंग्रज अधिकार्यास मारल्याचे ज्येष्ठ इतिहास अभ्यासक अशोकसिंग ठाकूर यांनी सांगितले. यापैकी गंगासिह यांची समाधी जटपुरा गेटबाहेर तर मेजर कोरहॅम यांची समाधी पठाणपुरा गेटबाहेर पाटील यांच्या फुलांच्या वाडीत आजही आहे. त्यावर तत्कालीन युद्धाचा उल्लेखही आहे. 
                                      इको-प्रो चे 'हेरिटेज वॉक'
'इको-प्रो'चे चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियान सुरू असून ते अंतिम टप्प्यात आले आहे. आज, रविवारी या अभियानास ४२५ दिवस पूर्ण होत आहेत. इंग्रजासोबतच्या युद्धास २०० वर्षे पूर्ण होत असल्याने या निमित्ताने घटनास्थळी भेट देवून इतिहास जाणून घेण्याच्या दृष्टीने या सर्व स्थळावर हेरीटेज वॉकचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बंडू धोतरे यांनी दिली.
-----------------------------------------------------------------------             
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).

Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 
कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo

Tuesday, February 13, 2018

इको-प्रोच्या किल्ला स्वच्छतेचा पालकमंत्र्यांकडून आढावा

इको-प्रोच्या किल्ला स्वच्छतेचा पालकमंत्र्यांकडून आढावा

चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियानाचा 332 वा दिवस
चंद्रपूर/प्रतिनिधी:
इको-प्रो च्या वतीने सुरू असलेल्या किल्ला स्वच्छता अभियानास सोमवारीअर्थमंत्री सुधीरभाऊ मुनंगटीवार यांनी भेट देऊन स्वच्छता अभियानाची पाहणी केली.चंद्रपूर शहरातील ऐतीहासीक गोंडकालीन किल्ल्याचे स्वच्छता अभियान 1 मार्च 2017 पासुन सुरू करण्यात आले असुन रोज नियमित संस्थेच्या स्वंयसेवकाच्या मदतीने श्रमदानाच्या माध्यमातुन चंद्रपूर किल्ला परकोट स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. आज अभियानास 332 दिवस पुर्ण झालेले आहे. 
या अभियानाची पाहणी करण्यासाठी बगड खिडकी परीसरातील सर्वात सुंदर असलेल्या बुरूज क्रमांक 4 वर आज जिल्हयाचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, मंत्री, अर्थ, नियोजन व वने यांनी भेट दिली. यादरम्यान गोंडराजांनी बांधलेला भक्कम आणी मजबुत किल्ला कसा दुरावस्थेत होता आणी स्वच्छतेनंतर यात कसा फरक पडला आहे, किल्ला स्वच्छता अभियान राबविण्यापुर्वी आणी नंतरची स्थिति दर्शविनारे फोटोग्राफ दाखवित किल्ला अभियान ची सवीस्तर माहीती दिली. रामाळा तलाव पर्यटन विकास करतांना किल्ल्यास लागुन बांधण्यात आलेला रामाळा तलाव ते बगड खिडकी हा रस्ता वापरात नसल्याने मोठया प्रमाणात झाडी झुडपे वाढल्याने बंद झाला असल्याने त्याची साफसफाई सुरू असुन या रस्ताची पुर्वीप्रमाणे बांधकाम करण्याची गरज, शहरातील ऐतीहासीक पर्यटन विकासाच्या दृष्टीने हेरीटेज वाॅक आयोजित करण्याची, किल्लास लागुन होत असलेला संरक्षण भिंतीचे बांधकाम नंतर आतील भागाचा वापर ‘पाथ वे’ व 'सायकल ट्रेक' म्हणुन विकसित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावी अशी मागणी इको-प्रो चे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी केली. 
यावेळी पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी बुरूज क्रमांक 4, 5 आणी किल्लावरून चालण्याकरीता असलेल्या पादचारी मार्गावरून फिरून माहीती जाणून घेतली. किल्ला स्वच्छता अभियान यशस्वी करण्यास धडपणारयां सर्व इको-प्रो संस्थेच्या स्वंयसेवकाचे कौतुक केले. यावेळी शहराच्या सौदर्यकरणाच्या दृष्टीकोनांतुन किल्लाचे महत्व असुन याकरीता अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी पालकमंत्री यांचे सोबत विशेष कार्य अधिकारी डाॅ विजय इंगोले, पुरातत्व विभागचे वरीष्ठ संरक्षण सहायक प्रशांत शिंदे, प्रकाश धारणे, उज्वल धामनगे उपस्थित होते.
यादरम्यान इको-प्रोचे अध्यक्ष बंडु धोतरे, इको-प्रो पुरातत्व संवर्धन विभाग प्रमुख रवींद्र गुरनुले, नितीन बुरडकर, अनील अडगुरवार, संजय सब्बनवार, ओम वर्मा, अभय अमृतकर, सुजीत घाटे, सुमीत कोहळे, अमोल उटट्लवार, जितेंद्र वाळके, हरीदास कोराम, सचिन धोतरे, वैभव मडावी, प्रतीक मुरकुटे, रोशन धोतरे, जयेश बैनलवार आदी इको-प्रो चे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.