काव्यशिल्प Digital Media: धुळे

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label धुळे. Show all posts
Showing posts with label धुळे. Show all posts

Saturday, February 09, 2019

कढरे येथे अनुलोमच्या माध्यमातून गॅस वितरण

कढरे येथे अनुलोमच्या माध्यमातून गॅस वितरण

खबरबात / गणेश जैन ( धुळे)*

बळसाणे  :  ता. ८ रोजी कढरे तालुका साक्री येथे अनुलोम सामाजिक संस्थेच्या माध्यमातून 26 महिला लाभार्थ्यांना प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचा वाटप करण्यात आले , शासकीय योजना तळागाळातील वंचित घटकांपर्यंत पोहोचाव्या आणि त्याचा लाभ जनतेला व्हावा यासाठी अनुलोम सामाजिक संस्था शासकीय योजनांचा प्रचार प्रसारासाठी संपूर्ण महाराष्ट्रात मा मुख्यमंत्री साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करते , या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील वंचित लाभार्थ्यांना योजना मिळवून देण्यासाठी सहकार्य मिळत असते त्याचाच भाग म्हणून अनुलोम सामाजिक संस्थेच्या स्थान मित्रांच्या मदतीने गावात महिलांना गॅस जोडणी मोफत देण्यात आले , या कार्यक्रमाला गावातील माजी सरपंच श्री जगतसिंग राजपूत , स्थान मित्र रावसाहेब गिरासे , श्री जगदीश माळी , सामाजिक कार्यकर्ते श्री जितू गिरासे गॅस एजन्सीचे श्री संदीप वाघ आदी उपस्थित होते शासकीय योजना व त्यात जनतेचा सहभाग व उज्ज्वला योजनेचे फायदे याविषयात अनुलोम भाग जनसेवक निलेश राजपूत यांनी मार्गदर्शन केले , गॅस कसा वापरावा यासाठी संदीप वाघ यांनी माहिती दिली , योजनेचा लाभ गावातील जनतेला व्हावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते श्री प्रदीप राजपूत यांनी सर्व कागदपत्र अनुलोम सामाजिक संस्थेच्या माध्यमातून एजन्सीकडे सोपवली होती , या कार्यक्रमासाठी गावातील महिला व पुरुष उपस्थित होते , साक्री येथील शुभंकर गॅस एजन्सीचे सहकार्य लाभले

Thursday, February 07, 2019

बळसाणेत शालेय गरजू विद्यार्थ्यांना गणवेश  वाटप

बळसाणेत शालेय गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

खबरबात, गणेश जैन, धुळे

बळसाणे : साक्री तालुक्यातील बळसाणे येथील कै.एन.पी.जी.विद्यालयात  हुशार , होतकरू व गरजू मुला, मुलींना नुकतेच ६५० शालेय गणवेश मोफत वाटपाचा कार्यक्रम नुकताच झाल्याचे महावीर जैन यांनी सांगितले. 

शिक्षण म्हणजे जीवन जगण्याची कला पण हीच कला काही दिवसांनी संपण्याच्या मार्गावर आहे  बळसाणेसह माळमाथा भागात शेतकऱ्यांची व सर्व साधारण कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने शिक्षण अर्धवट च राहून जात आहे व बळसाणेसह माळमाथा परिसरात बहुतांश ठिकाणी अशीच परिस्थिती आहे गेल्या दोन ते तीन वर्षापासून जैन समाजाने दुष्काळ ग्रस्त भागातील शालेय विद्यार्थ्यांना शालेय पोषाखा पासून ते स्कूल बँग्स , वह्या , कंपास , वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे गेल्या वर्षी बळसाणे विद्यालयात बावीशे रजिस्टर नोटबुक्स वाटपाचा कार्यक्रम मुंबई च्या प्रेम स्पर्श मार्फत झाला त्याच प्रमाणे महावीर जैन यांनी विश्वकल्याणकाचे ट्रस्ट गण यांना सांगितले की बळसाणे गावात दुष्काळ परिस्थिती असल्याने विद्यार्थी शालेय जीवनात लागणाऱ्या साहित्यास खरेदी करावयास मोठी अडचण भासत असल्याने असे विद्यार्थी शिक्षणापासून अलिप्त होताना दिसून येत आहे यासाठी आपण शालेय विद्यार्थ्यांना गणवेश भेट द्यावे अशी अपेक्षा महावीर जैन यांनी केली जैन यांच्या सांगण्याप्रमाणे धुळे येथील कमलेश गांधी यांनी मुंबई येथील दानशूर चंद्रहास वोरा यांना बळसाणे येथील विद्यार्थी पैसे अभावी शिक्षणाला तऱ्हे देत आहे तरी आपण आपल्या इच्छा शक्तीनुसार शालेय गणवेश देण्यात यावे त्याचप्रमाणे मुंबई चे चंद्रहस वोरा यांच्या वतीने कै. एन.पी.जी.विद्यालयाला साडे सहाशे विद्यार्थ्यांना गणवेश भेट देण्यात आले नियमितपणे समाजकार्यासाठी जैन समाज खरोखरच पुढे येत असल्याचे सरपंच दरबारसिंग गिरासे यांनी मनोगतातून सांगितले व कमलेश गांधी म्हणाले की आमच्या संस्था कायम सामाजिक उपक्रमास अग्रेसर राहत असल्याची ग्वाही गांधी यांनी दिली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेंद्र टाटीया होते याकामी विश्वकल्याणकाचे ट्रस्टचे संचालक विजय राठोड, कमलेश गांधी , सुरेंद्र टाटिया  , सुरेंद्र भंसाली , पत्रकार गणेश जैन ,चंदन टाटीया व महावीर जैन व प्रमुख पाहुणा म्हणून दरबारसिंग गिरासे यांच्या उपस्थितीत शालेय गणवेश मुप्त वाटप करण्यात आले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आर.बी.पटेल व आभार प्रा.एस.बी. मोहने यांनी केले तसेच

कार्यक्रम यशस्वीसाठी शाळेचे प्राचार्य , उपप्राचार्य यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले

Monday, February 04, 2019

सिम धारकांची अडवणूक : इनकमिंग फोनसाठी पैसे

सिम धारकांची अडवणूक : इनकमिंग फोनसाठी पैसे


  • मोबाईल वापरणाऱ्यांमध्ये होतेय फसवणूकीची भावना
  • रिचार्ज बँलेंसकरिता लागतोय पैसा , ग्राहकातून संताप


खबरबात / धुळे
बळसाणे ( गणेश जैन )  वारे वा कंपनी वालो काय तुमची फसवेगिरी एकाबाजूने मोबाईल टू मोबाईल फ्री तसेच इंटरनेट सेवा फ्री अशी सेवा उपलब्ध असतांना काही मोबाईल कंपन्यांनी लाईफटाईम इनकमिंग सिमकार्ड खरेदी केलेल्या ग्राहकांना पुन्हा मोबाईल बँलेंस टाकण्याबाबत कंपनीकडून मेसेज पाठविण्यात आले आहेत कंपनीने ठरवलेल्या रक्कमेचा बँलेंस टाकला नाही तर पुन्हा कंपनी सिम बंद करण्याचा इशारा देत असल्याकारणाने कंपनीच्या सिमधारकांकडून संतापाची लाट निर्माण होत आहे उर्वरीत ग्राहकांचे तर मोबाईल च बंद पडले असून याबाबतीत जराशी ही कल्पना नसल्याने अशा ग्राहकांना ३५ रुपयांचा बँलेंस टाकण्याचा सल्ला दिला जात आहे ही ग्राहकांची फसवणूक असल्याचे ग्रामीण भागातील ग्राहकांकडून चर्चा होत आहे व कंपनीने लाईफटाईम इनकमिंग चे पैसे परत द्यावेत नाहीतर पहिलीच योजना सुरू करण्यात यावी अशी मागणी विविध कंपनीच्या सिम धारकांकडून होत आहे मोबाईल च्या क्रांती नंतर सुरु चा कालखंड सोडल्यावर टेलीकाँम कंपन्यांनी मुप्त सेवा देण्याची सवय लावून ग्राहक तयार केले फ्री सेवा व आकर्षक रिचार्ज ने कंपनीने इंटरनेट ची आवड निर्माण केली एका प्रकारे मोबाईल धारकांना फ्री इंटरनेट चे व्यसन च लागले यातून च ग्राहक कंपनीच्या कचाट्यात सापडले गेलेत अजून कंपन्यांनी फोर जी सेवा सुरू केली कमीत कमी रिचार्ज मध्ये मोफत हायस्पीड इंटरनेट , मोबाईल ची सेवा देण्यात आली मात्र सध्याच्या परिस्थितीत काही टेलीकाँम कंपन्यांनी इनकमिंग काँलवर शुल्क आकारणी सुरु केली आहे एक हजार रुपयापर्यंतचे लाईफटाईम इनकमिंग काँलचे बँलेंस टाकल्यानंतरही परत दरमहा ग्राहकांना ३० , ३५ , ६५ , ९५ मोबाईल बँलेंस टाकावे लागणार आहे अचानकपणे घेतलेल्या निर्णयामुळे मोबाईल ग्राहकातून संताप उसळत आहे खाजगी कंपन्यांनी ग्राहकांना कुठल्याही प्रकारची पूर्वमाहिती न देता काही ग्राहकांची फोन येण्या जाण्याची सेवा बंद केली याकाणाने मोबाईमधील बँलेंस च्या नावाखाली रिचार्ज कंपन्या साधारण ग्राहकाची मोठ्या प्रमाणात फसवणूक व लूट करीत असल्याचा सूर ग्राहकातून निघत आहे

Friday, February 01, 2019

इंदव्यात लांडग्याचा धुमाकूळ : शेळ्या, मेंढ्या केल्या फस्त

इंदव्यात लांडग्याचा धुमाकूळ : शेळ्या, मेंढ्या केल्या फस्त

माळमाथा परिसरात लांडग्याची दहशत : शेतकऱ्यांत भितीचे वातावरण

खबरबात, गणेश जैन , धुळे

बळसाणे - साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील वाघापूर येथे सहा मेंढ्या ठार व तीन जखमी या घटनेला काही दिवस उलटत नाही व शेतकऱ्यांना यागोष्टीचा विसर पडत नाही तितक्याच इंदवे येथे दोन लांडग्यांनी हल्ला चढविला 

   माळमाथा परिसरात लांडग्याचा उपद्रव वाढला आहे रात्री अपरात्री जंगलातील , वाड्या , कोठड्यातील शेळ्या मेंढ्या लांडग्याकडून फस्त केल्या जात आहे त्यामुळे वाघापूर व इंदवे गावासह माळमाथा परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे वनविभागाने या लांडग्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती साक्री तालुक्यातील माळमाथा भागात जंगल मोठ्या प्रमाणात असल्याने झाडझुडप्यांमुळे कुत्रे , कोल्हे , लांडगे , तरस या हिंस्र प्राण्यांबरोबरच ससे , घोरपड याही प्राण्यांचा वावर असल्याचे परिसरातील शेतकऱ्यांतून चर्चा होत आहे या प्राण्यांचे खाद्य प्रामुख्याने कोंबड्या , शेळ्या , मेंढ्या , कोवळे गवत प्रसंगी शाडूची माती देखील खावी लागते त्याचप्रमाणे लांडगे , कोल्हे , ससा , घोरपडी यांना देखील खाद्य म्हणून फस्त करतात यावर्षी माळमाथा परिसरात पावसाने ओढ दिल्याने भागात खाद्याची व पाण्याची कमतरता भासू लागल्याने लांडग्याचा मनुष्य वस्तीत वावर वाढला आहे लांडग्यांनी शेतकऱ्यांच्या शेळ्या मेंढ्यावर हल्ले करून त्या फस्त करण्याचा सपाटा लावला आहे साधारणपणे आठ ते दहा लांडग्यांची टोळीच गावभागाच्या परिसरातून रात्री व दिवसादेखील फिरत असल्याचे प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी सांगितले *नुकतेच इंदवे येथील शेतकरी नंदू युवराज भदाणे या शेतकऱ्याची बंद वाडग्यात मध्यरात्री साधारणतः दोन ते अडीच वाजता घुसून १७ शेळ्या , मेंढ्यावर हल्ला चढवीत जागेवर च ठार केल्या याबाबत वनपाल अवसरमल , वनरक्षक जेलवाडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून रितसर पंचनामा केला लांडग्याचा मुगमास असल्याचे साक्री चे वनक्षेत्र पाल पी.जे.पाटील यांना सांगून सदर शेतकऱ्यास भरपाई मिळेल असे नमूद केले आहे* या कळपातील लांडगे माणसाच्या अंगावर धावून येत आहेत अर्थिक नुकसानी बरोबरच मानवी जीवालाही धोका निर्माण होवू शकतो विशेषतः म्हणजे लहानली मुले , महिला यांच्यात घबराट पसरली आहे

Sunday, January 27, 2019

परमपूज्य बसंतजी महाराजांचे शिरपूरच्या सुवर्णनगरीत जल्लोषात आगमन

परमपूज्य बसंतजी महाराजांचे शिरपूरच्या सुवर्णनगरीत जल्लोषात आगमन

हजारो तारणतरण दिगंबर जैन समाजाची उपस्थित

 

khabarbat.in

धुळे/मनिषा कोचर, खबरबात /

शिरपूर  शिरपूर येथील तारणतरण जैन दिगंबर मंदिराचे श्री जिनवाणी अस्थाप कलश व कलशारोहण बेदी प्रतिष्ठा तिलक महोत्सवाची सुरुवात (ता.२९ ते ३१ जानेवारी या तीन दिवसीय चालणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमा निमित्ताने तारततरण जैन धर्मियांचे गुरुवर्य परमपूज्य बसंतजी महाराज यांचे (ता. २६ ) रोजी दुपारी साडेचार वाजता रामसिंग नगर येथील अमरचंदजी , अजयचंदजी जैन यांच्या निवासस्थानी आगमन झाल्यावर तेथून सायंकाळच्या आहार ग्रहण केल्यानंतर परमपूज्य बसंतजी महाराज यांची सवाद्य वाजंत्रीत रामसिंग नगर येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली यावेळी तारततरण समाजातील नवयुवक मंडळ व कन्यामंडळ तसेच महिलांसह पुरुष वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते बसंतजी महाराज आए है , नई रोषणी लाऐ है , आज का दीन कैसा है , सुन्ने से भी मेंगा है अशा विविध घोषणांनी शहर दुमदुमून गेले होते.

 शहरातील मुख्य मार्गावर स्वगताच्या कमानी लावलेल्या दिसूत येत होत्या शोभायात्रा रामसिंग नगरातील मुख्य बाजार पेठेतून विजयास्तंभा मार्गाने पारधीपुरा येथील तारणतरण जैन दिगंबर मंदिरात समारोप करण्यात आली 

   *जैन दिगंबर मंदिराच्या बेदी प्रतिष्ठा प्रसंगी आत्मार्थी साधक युवा रत्न श्रध्देय बा.ब्र.श्री आत्मानंदजी महाराज , श्रध्देय बा.ब्र. श्री परमानंदजी महाराज , श्रध्देय बा.ब्र. श्री मुक्तानंदजी महाराज , इतिहास रत्नाकर आध्यात्मरत्न बा.ब्र.श्रध्देय श्री बसंतजी महाराज , श्रध्देय बा.ब्र.श्री चिदानंदजी महाराज व साध्वीत बा.ब्र. अभयश्रीजी बहिणजी , बा.ब्र.जिनश्री बहिणजी , बा.ब्र.समयश्री बहिणजी , बा.ब्र. ममलश्री बहिणजी , बा.ब्र.विंदश्री बहिणजी , बा.ब्र.सरला बहिणजी , बा.ब्र. सुषमा बहिणजी यांच्या सह आदी महाराजांचे व साध्वीश्रीजी मार्गदर्शन लाभणार असून कार्यक्रमात प्रवचन ऐकण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सकल तारणतरण जैन समाजाने केले आहे तीन दिवसीय कार्यक्रमा प्रसंगी महाराष्ट्र , मध्यप्रदेश , गुजरातसह विविध प्रांतातून भाविक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. कार्यक्रमा यशस्वीसाठी सकल तारततरण दिगंबर जैन समाज कामाला लागले आहे. 

Friday, January 25, 2019

माळमाथा परिसरात दुष्काळाची दाहकता

माळमाथा परिसरात दुष्काळाची दाहकता

khabarbat.in


  • शेतीची अनिश्चितता मिळेल ते काम करण्यावर भर
  • युवकांचा रोजगारासाठी शहरांकडे वाढतोय कल


खबरबात/धुळे, गणेश जैन

बळसाणे :  उत्तम शेती मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी असे पुर्वजनांकडून ऐकायला मिळायचे त्याचप्रमाणे खेड्यांकडे चला असे राष्ट्र पिता महात्मा गांधींचे म्हणणे होते परंतु सध्या खते , बियाणे , मजूरी यासारख्या भांडवली खर्चाचे दर आकाशाला पोहचल्याने त्यामानाने शेतीमालाचे दर पूर्णतः गडगडले आहेत यामुळे अडचणीत येणाऱ्या बेभरवशाच्या शेती व्यवसायावर युवा पिढी चा भरवसा राहिला नाही अश्या स्थितीत माळमाथा भागात निर्माण होत असून तरुणांचा मिळेल ते काम करण्याकडे कल वाढला आहे 

    एकीकडे रासायनिक खते , बियाणे , औषधे यांच्या दरात होणारी वाढ शेतातील नुकसानीमुळे मजूरांना मिळणारी अपुरी मजूरी तसेच या स्थलांतराने कमी मनुष्यबळामुळे शेतीकामाकरिता मजूरांचा तुटवडा अधूनमधून ओढवणारी आस्मानी संकटे व दुसरीकडे शेतात राबराबवून मोठ्या कष्टाने पीकवलेल्या मालाचे नियमितपणे होणारी घसरण यामुळे शेतकऱ्यांचे व विशेष म्हणजे तरुण पिढींचे मनोधैर्य खचत असल्याचे परिसरात दिसून येत आहे याकाणानेच सध्याची युवा पिढी स्वतः ची शेती करणे सोडून व कोणी तर चक्क शेती विकण्याचाच निर्णय घेऊन गावाबाहेर पुणे , औरंगाबाद , नासिक , मुंबई व गुजरात , मध्यप्रदेश राज्यात जाऊन स्थायिक होत दिन जावे पगार मिळावे असे म्हणत मिळेल ते काम अगदी कमी मोबदल्यात का होईना पण बिन भांडवली धंदा करण्यात च धन्यता मानत आहेत गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल दाम मिळत आहे *रात्रीचा दिवस करत उन्हातान्हात काबाडकष्ट करून देखील आणलेले पीके बाजारात अल्पदराने विकले जाते आहे त्यावर लागलेले खर्च ही वसूल होत नसल्याचे शेतकऱ्यांमधून आपसात चर्चा होत आहे भांडवली खर्च तर सोडाच साधा तोडणीचा खर्च निघणेही कठीण झाले आहे यामुळे शेतकऱ्यांनी आपली उभी पीके सोडून दिल्याचे चित्र पहावयास मिळत आहे एकूणच सगळ्या बाजूने शेतीची पडझड झाल्याने अनिश्चित च युवा पेढी शेतीकडे कानडोळा करीत होते शेती काम सोडून नोकरी व व्यवसायात पसंती करीत आहेत.

बळसाणेत ऐन दुष्काळात गरजू कुटुंबांना मोफत Gas कनेक्शन

बळसाणेत ऐन दुष्काळात गरजू कुटुंबांना मोफत Gas कनेक्शन

khabarbat.in


खबरबात/धुळे, गणेश जैन

बळसाणे  : माळमाथा भागातील बळसाणे येथे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत नुकतेच गरजू  व दारिद्रयरेषेखालील ३१ महिलांना मोफत गँस कनेक्शन वाटप करण्यात आले याप्रसंगी शुभंकर गँस एजन्सी चे व्यवस्थापक संदीप वाघ तसेच बळसाण्याचे भाजपातर्फे गँस संच वाटपाचा कार्यक्रम पदधीकाऱ्यांनी हाती घेतला होता

 बळसाणे येथील लोकनियुक्त सरपंच दरबारसिंग गिरासे , उपसरपंच सुदाम खांडेकर व पो.पा. आनंदा हालोरे तसेच ग्रा.पं.सदस्य देवीदास लोणारी , नाना सिसोदे , विकास दाभाडे यांच्या हस्ते गँस कनेक्शन संच वाटप करण्यात आले व्रुक्षतोड केल्याने परिसरात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे याकाणाने मानवी आरोग्य धोक्यात येत आहे या परिसरात स्वंयपाकासाठी झाडे तोडली जात असल्याने ते लाकडी स्वयंपाक घरात उपयोग पडत असल्याने त्यांच्या वापर केला जाते यामुळे वायुप्रदूषण मोठ्या प्रमाणावर तयार होते तसेच महिलांचाही आरोग्यावर विपरीत परिणाम होतो लाकूड तोड कमी करण्यासाठी व महिलांना आरोग्य संपन्न जिवन जगता यावे याकरिता प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेतून साक्री तालुक्यातील बळसाणे येथील दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांना गँस कनेक्शन वाटप करण्यात आले याकामी सरपंच दरबारसिंग गिरासे , उपसरपंच सुदाम खांडेकर , पो.पा. आनंदा हालोरे व गरजू कुटुंब उपस्थित होते सदर कार्यक्रमासाठी एच.पी. गँस एजन्सी चे व्यवस्थापक संदीप वाघ यांचे सहकार्य लाभले

Saturday, January 19, 2019

बँक खाते नंबर , एटीएम नंबर फेकू फोनला देवू नका

बँक खाते नंबर , एटीएम नंबर फेकू फोनला देवू नका


रोजचे येतात बँकेच्या ग्राहकांना झोल फोन
त्यातून होते ग्राहकाची फसवणूक

धुळे/गणेश जैन
बळसाणे : शिरपूर शहरात वास्तव्यास असलेल्या बळसाणे येथील पत्रकार गणेश जैन यांना ता. १८जानेवारी रोजी दुपारी साधारणपणे ३:४५ वाजता एक *फेकू काँल  आला जैन यांनी *७०३३६५०७८१* आलेला इसमाचा मोबाईल रेसिव्ह केला *फेकू काँल : सरजी नमस्कार मै स्टेट बँकेसे बोल रहा हुँ आपका एटीएम बंद करवाने है ? या चालू* गणेश जैन : आप कोणसी शाखा से बोल रहे हो *फेकू काँल : स्टेट बँके की मुख्य शाखा से बोल रहा हुँ सरजी*
गणेश जैन : शिरपूर की शाखा से बोल रहे हो  *फेकू काँल* : हा जी पण एवढी चर्चा करीत असतांना मात्र स्वतः चे नाव होवून न सांगता गणेश जैन यांनी आपका शुभ नाम *फेकू काँल* : *श्रावण शर्मा बोल रहा हुँ सरजी* गणेश जैन ठिक है मै कुछ ही मिनीटो मे शिरपूर शहर की स्टेट बँके की शाखा मे पहुँच रहा हुँ पर मेरे अकाऊंट मे बँक बँलेस कितना है , *फेकू काँल : रुपये पाँच हजार  शिल्लक है बताओ क्या करणा चालू रखना या बंद* गणेश जैन : सरजी ऐसे फोन बहोत चल रहे है आजकाल विश्वास नाम की चिज नही रही है इस दुनिया मे , मै शिरपूर स्टेट बँके के व्यवस्थापक से मिलकर आपको बोलता हुँ  *फेकू काँल : मै आपका एटीएम बिलकुल बंद कर रहा हुँ आपका जो बँक बँलेंस है वह सिधा सरकार के खाते पर जमा कर दिया जाऐंगा * गणेश जैन : याबाबतीत न घाबरता जैन हे शिरपूर शाखेतील स्टेट बँकेच्या मुख्य व्यवस्थापाकाला भेटण्याची परवानगी घेतली परंतु साहेबांच्या आँफिसात कोणी प्रमुख लोक बसल्याने अर्धा तास थांबावे लागले या अर्ध्या तासात बाहेरील बँकेचे सिक्युरिटीज गार्ड व बँक कर्मचाऱ्यांना झालेल्या घटना बद्दल सविस्तर माहिती सांगितली त्यांनी मला विचारले तुम्ही अकाऊंट नंबर व एटीएम बद्दल काय माहिती दिली का ? नाही सरजी , मग तो फेकू काँल आहे बरे झाले महत्त्वाचे नंबर दिले नाही तर तुमचे खातेतील पैसे गायब झाले असते कुठलीही बँक शाखा असले फोन वर विचारणा करत नाही अशी चर्चा करीत असतांनाच अजून *पुन्हा* त्याच नंबरावरून  अजून *फेकू काँल आला * : *सरजी नमस्कार , मै स्टेट बँक का ? मुख्य प्रबंधक बोल रहा हुँ* गणेश जैन : सरजी मै बँक शाखा मे पहुँचा हुँ आप बोलिए तेथील स्टेट बँकेच्या कर्मचारी सोबत बोलणे झाल्यावर* जैन बोलत असतांनाच मोबाईल वरून गालिच्छ भाषेतून शिवीगाळ केल्यावर संबंधित फेकू काँलने फोन कट केला स्टेट बँकेचे मुख्य व्यवस्थापकांना सविस्तर माहिती दिली त्यांना झालेल्या फेकू फोनच्या संभाषणाची रेकॉर्ड क्लीप ऐकवली त्यांनी परत असाच प्रश्न केला तुम्ही अकाऊंट नंबर वैगरा दिला नाही ना , बरे झाले वाचले तुम्ही हा जो प्रकार घडला हा फेकू काँल राहतो बँक शाखा कधीही कुणाला स्वतः हून फोन करत नाही ते लोक आपल्यासोबत गोड भाषेत बोलूण ते शंभर शब्द बोलतात त्यातून आपल्याला काही शब्द खरोखरच वाटतात आणि आपण यगदम साध्या आणि सोप्या पध्दतीने  आपण सहज फेकू फोन ला पुर्ण माहिती देतो आणि बँकेत जावे तर रक्कम शिल्लक राहत नाही असे अनेकदा घटना घडतात तरी देखील बँकेचे गिऱ्हाईक दक्षता बाळगत नाही बँके तर्फे सुचना राहते कुणाला ही बँके बाबत फेकू काँल आला तर फेकू काँल ला बँकेची कुठल्याही प्रकाराची माहिती न देता संबंधित बँके शी विचारणा करावे असे अनेकदा आवाहन केल्याचे शिरपूर स्टेट बँंकेचे मुख्य प्रबंधक *संजय दिवाण* यांनी सांगितले तुम्ही रितसर पोलिसात गुन्हा नोंदवा बँकेकडून तुम्हाला योग्य पाठिंबा असल्याचे दिवाण यांनी सांगितले

प्रतिक्रिया

हे फेकू काँल राहत असल्याने कुणी ही आपल्या महत्त्वाचे बँकेतील एटीएम अकाऊंट नंबर कुणाला ही देवू नये आलेला फेकू फोन गोड भाषेतून बोलतात त्यावेळी नेमकी आपली फसवणूक होते सदर टोळी मोठी आहे असे फेकू काँल अनेकांना येतात आणि अनेक लोकांची फसवणूक होते याबाबतीत बँकेतील ग्राहकांनी जाग्रुत राहून कुणालाही आपल्या बँकेच्या कामाचे नबर देवू नये असा विषय घरातल्या सर्वच सदस्यांचा कानावर टाकावा व स्वतः बँकेत जाऊन सदर फोनबद्दल विचारणा करावी असे आवाहन केले आहे सानप यांची प्रतिक्रिया भ्रमणध्वनी वर घेतल्याचे व पोलिसात गुन्हा दाखल न केल्याचे जैन यांनी सांगितले
- संजय सानप
  पोलिस निरीक्षक, शिरपूर

Wednesday, December 26, 2018

 चिमठाणे व 35 गाव पाणीपुरवठा ग्रीड योजनेला मंजूरी

चिमठाणे व 35 गाव पाणीपुरवठा ग्रीड योजनेला मंजूरी


सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेच्या
भु-संपादनासाठी शंभर कोटीचा निधी उपलब्ध करून देणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·       दुष्काळी परिस्थितीतील उपाययोजना संवेदनशिलतेने राबवा
·    धुळे शहराला मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना पुर्ण करणार
·       पात्र झोपडपट्टी धारकांना हक्काचे घर उपलब्ध करून देणार
·       दुष्काळी भागातील कामांचे निकष शिथील करून शेतीपुरक कामांचा समावेश करण्यासाठी केंद्राला प्रस्ताव सादर करणार

   

धुळे, दि. 26 : धुळे जिल्ह्याला नवसंजीवनी ठरणाऱ्या सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेचा बळीराजा जलसंजीवनी योजनेत समावेश करण्यात आला असून या योजनेची कामे लवकरात लवकर पुर्ण व्हावे या करिता भुसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. याकरिता केंद्र शासनाकडून 56 कोटी तर राज्य शासनाचा 44 कोटी रुपयांचा हिस्सा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात धुळे जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठक मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, रोजगार हमी योजना व पर्यटनमंत्री जयकुमार रावल, ग्रामविकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री दादा भुसे, खासदार डॉ.हिना गावीत, आमदार अमरिश पाटील, कुणाल पाटील, अनिल गोटे, डी.एस.अहिरे, काशिराम पावरा, शिरीष चौधरी, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.गंगाथरण, महापालीकेचे आयुक्त सुधाकर देशमुख आदि उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, राज्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर असल्याने राज्य शासनाने दुष्काळाच्या सवलती लागू केल्या असून दुष्काळी परिस्थितीत राबवावयाच्या उपाययोजना प्रशासकीय यंत्रणेने संवेदनशील राहून राबवाव्यात. जिल्ह्यातील जलाशयांमध्ये केवळ44 टक्के पाणीसाठी उपलब्ध असल्याने नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले. जिल्ह्यातील उपाययोजनांसाठी जिल्हा प्रशासनाने 429 लक्ष रुपयांचा कृती आराखडा तयार केला असून यामध्ये 67 गावांसाठी 73 उपाययोजना मंजूर करण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर जिल्ह्यातील 10 गावांसाठी 8 टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे, तर 52 गावांसाठी 60 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे वैरण विकास योजनेतंर्गत चारा बियाण्यांचे वाटप करण्यात येत आहे. त्याच बरोबर गाळपेरा क्षेत्रावर चारा लागवड करण्यासाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. तसेच अपुर्ण व बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर सुरु करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. त्याच बरोबर पिण्याच्या पाण्यासाठी चिमठाणे व 35 गावे पाणी पुरवठा ग्रीड योजनेला मंजूरी देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

धुळे शहराची हद्द वाढ झाल्याने शहराला मुबलक पाणी पुरवठा होण्यासाठी अक्कलपाडा धरणातुन प्रस्तावित अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना पुर्णत्वास नेण्यात येणार असून त्यासाठी 142 कोटी रुपयांचा प्रारुप प्रस्तावास मान्यता देण्यात येईल. नागरिकांना हक्काची घरे उपलब्ध होण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतील पात्र लाभार्थ्यांना हक्काची घरकुले उपलब्ध करून देण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे. धुळे जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना, रमाई, शबरी व पारधी घरकुल योजनेतंर्गत जिल्ह्याला 19 हजार 174 घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी 13 हजार821 घरकुले पुर्ण झाली व अपुर्ण घरकुलांची कामे लवकरात लवकर पुर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. पंडीत दिनदयाल उपाध्याय योजनेतंर्गत स्वमालकीची जागा नसलेल्या लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे. शहरी भागातील पात्र लाभार्थ्यांना घरकुले उपलब्ध करून देण्यासाठी नगरपालिकांनी प्रकल्प विकास आराखडा तातडीने मंजूरीसाठी पाठवावा, यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

धुळे शहरातील अधिकाधिक पात्र झोपडपट्टी धारकांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत 850 घरांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्याचबरोबर नगरपालिका क्षेत्रातील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातील रस्ते, भुयारी गटार व पाणी पुरवठ्याच्या योजनांची कामे सुरु आहेत. जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातंर्गत सर्व गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली आहेत सन2017-18 मध्ये 95 गावांमध्ये 1520 कामे प्रस्तावीत असून त्यापैकी 1424 कामे पुर्ण झाली आहेत, तर उर्वरित कामे प्रगतीपथावर असून या कामांच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठा जलसाठा होण्यास मदत होत आहे. मागेल त्याला शेततळे योजनेचे उद्दिष्ट पुर्ण करावे, त्याचबरोबर दुष्काळी परिस्थितीमुळे गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानातंर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कामांचे नियोजन करावे. तसेच वन विभागाच्या हद्दीतील पाझर तलावांमधील गाळ शेतकऱ्यांना नेता यावा यासाठी जलसंधारण विभागांच्या सचिवांनी वन विभागाच्या सचिवांसोबत बैठक घेऊन याबाबतची नियमावली तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मनरेगा अंतर्गत जिल्ह्यात शेल्फवरील कामे सुरू करून नागरिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यात 27 कोटी 94 लाख रुपयांची 37 योजनांची कामे सुरु असून 22 योजनांची कामे पुर्ण झाली असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यात 26 योजनांची कामे सुरु असून 9 योजनांची कामे पुर्ण झाली आहेत या योजनांच्या अंमलबजावणीत जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असल्याने मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.

आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेतंर्गत जिल्ह्यातील लाभार्थ्यांकडून प्राप्त झालेली प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले तर डिबीटी योजनेतंर्गत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटपही लवकरात लवकर करावे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेतंर्गत जिल्ह्यातील 2 लाख 44 हजार खातेधारकांना 481 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले असून 465 कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत जिल्ह्यात 650 कि.मी. लांबीच्या रस्त्यांच्या कामांना मंजूरी देण्यात आली असून 208 कि.मी. लांबीच्या रस्त्यांची कामे पुर्ण झाली आहेत.

त्याच बरोबर महाराष्ट्र सुवर्ण जयंती राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेतंर्गत धुळे शहरातील मुख्य रस्त्यांचे मजबुतीकरण, डांबरीकरण, गटारी,दुभाजक, पथदिवे आदि 40 कोटी रुपयांची कामे पुर्ण झाली आहेत. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतंर्गत अधिकाधिक क्षेत्र हे सिंचनाखाली येण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून यात सुक्ष्मसिंचनाला प्राधान्य देण्यात येत आहे.

यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते पशुसंजीवनी ॲप, टपाल व फाईल ट्रॅकींग सेवेचा, ऑनलाईन बालस्वास्थ कार्यक्रम तसेच ग्रामपंचायतीचे महा ई-सेवा केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शासनाच्या विविध महत्वाकांक्षी योजनांचा आढावा घेतला तर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्यातील विविध विकास कामांचे सादरीकरण केले.
दोंडाईचा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधी उपलब्ध करुन देणार

दोंडाईचा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधी उपलब्ध करुन देणार



 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दोंडाईचा- वरवाडे नगरपरिषदेच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा
धुळे, दि. 26 : दोंडाईचा नगरपरिषदेच्या सुसज्ज इमारतीमुळे आता नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या असून प्रभावीपणे आणि गतिशील काम करून नागरिकांची अपेक्षापूर्ती करणे आवश्यक आहे. त्यासाठी शहर विकासासाठी राज्य शासनाकडून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

दोंडाईचा- वरवाडे नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा, नागरी सुविधा केंद्राचे उद्घाटन, विविध सभागृहांचे उद्घाटन आणि फिरता दवाखाना सुविधेचा प्रारंभ मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यानंतर दादासाहेब रावल स्टेडिअममध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ. हीना गावित, आमदार शिरीष चौधरी, नगराध्यक्षा नयनकुंवरताई रावल, जिल्हा परिषद सदस्य कामराज निकम,दोंडाईचा बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, उद्योगपती सरकारसाहेब रावल आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, दोंडाईचा शहराच्या पाणीपुरवठा योजनांसाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. सांडपाणी पुनर्वापर आणि घनकचरा व्यवस्थापनाकडे नगरपरिषदेने लक्ष देऊन स्वच्छ व सुंदर शहर करावे. त्यासाठी आवश्यक मदत राज्य शासन करेल, असा शब्द त्यांनी दिला. राज्यातील नगर विकास विभागाच्या विविध योजनांच्या पूर्ततेसाठी 21 हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. याशिवाय जुन्या काळातील योजना पूर्ण करण्यासाठी आठ हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. सध्या त्यापैकी 100 योजना पूर्ण झाल्या असून मार्चपर्यंत उर्वरित योजना पूर्ण करणार असल्याचे ते म्हणाले.

सरकारी जमिनीवर अतिक्रमण करुन राहणाऱ्यांना त्या जागेचा पट्टा त्यांच्या नावावर करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. तसेच घरकुल योजनेत घरेही दिली जाणार आहेत. दोंडाईचा शहरासाठी मागेल तेवढ्या घरांना मंजुरी दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. सन 2022 पर्यंत‘सर्वांना घरे’ या संकल्पानुसार राज्य शासन काम करीत असून दोंडाईचा मध्ये त्यासाठी मंत्री श्री. रावल यांनी पुढाकार घ्यावा असे ते म्हणाले.

दुष्काळी भागातील नागरिकांसाठी बीपीएल प्रमाणेच एपीएल शिधापत्रिका धारकांना गहू व तांदूळ देण्यात येणार असून त्यासाठी केंद्र सरकारकडे अतिरिक्त मागणी नोंदविल्याची माहिती श्री. फडवणीस यांनी दिली. राज्य शासनाने 31 ऑक्‍टोबर रोजी दुष्काळ घोषित केला त्यानंतर केंद्रीय पथकाने पाहणी केली. नुकतेच आपण केंद्रीय कृषिमंत्री, केंद्रीय गृहमंत्री आणि प्रधानमंत्री यांची भेट घेतली असून राज्य शासनाला केंद्रातून मोठ्या प्रमाणात मदत मिळेल, असा विश्वास असल्याचे ते म्हणाले. गेल्या दोन वर्षात रोजगार हमी योजना मंत्री श्री. रावल यांनी नरेगाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू केली. विहिरी, कंपार्टमेंट बंडिंग, अशी कामे मोठ्या प्रमाणात झाली. सिंचन प्रकल्पांसाठी तसेच त्यासाठी निधी दिल्याचे ते म्हणाले. राज्यातील बारा बलुतेदारांसाठी ही विविध योजना कार्यान्वित करून त्यांच्या उद्योग- व्यवसायांना चालना दिली जाईल. कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना अधिकाधिक पारंगत करण्याचे काम केले जाईल, असे ते म्हणाले. राज्य शासनाने कांदा पिकासाठी दोनशे रुपये अनुदान जाहीर केले आहे. केंद्र शासनाने अधिक मदत दिली, तर ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली, जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री श्री. रावल म्हणाले, धुळे व नंदुरबार जिल्ह्यासाठी दोंडाईचा हे शहर मध्यवर्ती ठिकाण आहे. दोंडाईचा येथे अपर तहसील कार्यालय कार्यन्वित झाले आहे. त्याच प्रमाणे कोषागार, उपनिबंधक कार्यालयासह विविध सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. सुलवाडे-जामफळ योजनेच्या भूसंपादनाला गती मिळावी, तसेच दोंडाईचा रेल्वे स्थानकावर जलदगती गाड्यांना थांबा मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी नगरपालिकेचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इमारतीची ठळक वैशिष्टे• रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या संकल्पनेतून साकारली इमारत
• एकूण 31632 चौरस फुट बांधकाम असलेली तीन मजली इमारती
• भव्य असे अध्यक्ष दालन, उपाध्यक्ष दालन
• सभागृह, समिती सभागृह, सभापती दालन, विभाग निहाय दालने
• नागरी सुविधा केंद्र, स्वच्छता गृह, अग्निशमन व्यवस्था
• सीसीटीव्ही कॅमेरा व सुसज्ज अशी फर्निचर व्यवस्था
• सुमारे 4.80 कोटी खर्चाची भव्य इमारत
राजुर प्रदर्शनात ईगतपुरीचा वळु ठरला चँम्पियन !

राजुर प्रदर्शनात ईगतपुरीचा वळु ठरला चँम्पियन !


खबरबात प्रतिनिधी/विष्णू तळपाडे
दि.२५डिसें राजुर येथील संकरीत जनावरांच्या प्रदर्शनात ईगतपुरी तालुक्यातील धामणी गावच्या अकुंश भोसले यांच्या वळुने चँम्पियनचा मान पटकविला. डांगी व संकरीत जनावरांची पशुवैद्यकीय अधिकारी समितीने आ.वैभवराव पिचड ,तहसिलदार मुकेश काबंळे,पंचायत समिती सभापती सौ.रंजना मेंगाळ,गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे,सरपंच हेमलता पिचड,आदीच्या उपस्थित निवड करण्यात आली.

राजुर प्रदर्शनात २५-३० हजारांच्या संख्येने जनावरे दाखल झाली असली तरी कोट्यावधी रुपयाची जनावरांची खरेदी-विकरी झाली असल्याची माहिती मिळते.हे प्रदर्शन राजुर ग्रामपंचायत व आदिवासी प्रकल्प कार्यालय यांच्या संयुक्त विद्यामाने भरविण्यात आले होते.ह्या प्रदर्शनात डांगी आदत२,४आणि६ दाती बैलजोडी,डांगी गायी आशा जातीवंत निवडक जनावरांची निवड करुन बक्षीस दिले जाते .

या प्रदर्शनात गायीच्या किमंती ५०हजारापर्यत गेली व बैलाच्या किंमती ह्या ८०-९०हजार पर्यत गेली .या ठिकाणी धामणी गावच्या रतन भोसले यांच्या वळुची उपचँम्पियन म्हणून निवड करण्यात आली.तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
जैताणे-लांडग्यांच्या हल्ल्यात 12 मेंढ्या ठार

जैताणे-लांडग्यांच्या हल्ल्यात 12 मेंढ्या ठार

धुळे- जैताणे गावात कल दि(25) रात्री श्री दादाभाई रघुनाथ पगारे रा जैताणे(साक्री)यांच्या शेतात त्यांच्या 22 मेंढ्यावर रात्री लांडग्यांच्या कळपाने केलेल्या हल्ल्यात तब्बल 12 मेंढ्या ठार तर दोन मेंढ्या गंभीर जखमी झाल्याची घटना जैताणे गावात घडली त्यात दादाभाई पगारे यांच्या पशुधनाचे तब्बल 80 ते 90 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. 
यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने विहिरींनी तळ गाठला आहे शेती पूर्णपणे पडली असून अश्या परिस्थितीत उदरनिर्वाहाचे साधन म्हणून व शेती पुरक जोडधंदा म्हणून श्री दादाभाई पगारे व त्यांचा मुलगा गोपाल दादाभाई पगारे यांनी 22 मेंढ्या विकत घेऊन मेंढी पालन व्यवसाय सुरू केला होता. पण काल रात्री घडलेल्या घटनेमुळे त्यांची स्थिती आणखीच बिकट झाली. मेंढ्या विकत घेऊन त्यांचे पालन पोषण करून दुष्काळात आपल्या उत्पन्न चे साधन म्हनून या कडे लक्ष दिले तजात होते. आपल्या कांद्याच्या चाळीत दररोज ते आपल्या 22 मेंढ्या रात्री सुरक्षिततेसाठी ठेवायचे परंतु काल रात्री लांडग्यांच्या कळपाने सामूहिक हल्ला करून चाळीची जाळी कोरून खालून त्यांनी तब्बल तीन मेंढनर व नऊ मेंढ्या ठार केल्या

वनविभागाचे कर्मचारी घटना स्थळी दाखल
सदर घटनेची माहिती वन विभागाला दिली असता वन विभागाचे अधिकारी पी ए जगताप वनपाल कोंडाईबारी व त्यांचे कर्मचारी तात्काळ घटना स्थळी उपस्थित झाले व घटनेची पाहणी करून पंचनामा केला

पशुवैद्यकीय अधिकारीतसेच पशुधन अधिकारी वर्ग 1 पंचायत समिती साक्री भाग निजामपूर याना वनविभागाने शवविच्छेदन करण्यास अहवाल पाठवण्यात आला आहे *वनपाल क्षेत्रअधिकारी कोंडाईबारी यांना विनंती अर्ज श्री दादाभाई रघुनाथ पगारे यांनी केला आहे त्यांच्या मालकीच्या कोंडलेल्या 22 मेंढ्या वर लांडग्यांच्या कळपाने मेंढ्यावर हल्ला केला असून त्यात बारा मेंढ्या मृत झाल्या आहेत तर दोन मेंढ्या जबर जखमी झाल्या आहेत तरी शासकिय नियमानुसार नुकसान भरपाई मिळावी अश्या स्वरूपाचा अर्ज वनक्षेत्रपाल कोंडाईबारी यांना केला आहे. 80 ते 90 हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती श्री दादाभाई रघुनाथ पगारे व त्यांचा मुलगा गोपाल दादाभाई पगारे यांनी दिली आहे

Thursday, December 20, 2018

वह्या पुस्तकांच्या रुपाने जपल्या वडीलांच्या स्मृती

वह्या पुस्तकांच्या रुपाने जपल्या वडीलांच्या स्मृती

  • निमगाव भोगीतील कोठावळे परिवाराचा स्तुत्य उपक्रम
  • प्रथम पुण्यस्मणानिमित्त अवाजवी खर्च टाळुन विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
निमगाव भोगी (ता.शिरुर ) येथील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश कोठावळे , सरपंच सुमन जाधव, अंकुश इचके मुख्याध्यापक फक्कड थोरात , विद्यार्थी व मान्यवर 

अण्णापूर (वार्ताहर ) आपल्या सर्वांच्या जीवनात आईवडीलांचं स्थान अनन्यसाधारण आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरणारी आहे. मात्र अलिकडच्या काळात हे प्रसंगही मोठे इव्हेंट म्हणुन साजरे केले जातात. फ्लेक्सबाजी , जाहिराती भोजनाच्या मोठमोठया पंगती उठविल्या जातात. मात्र हा अवाजवी खर्च टाळुन सामाजिक बांधिलकी जपत वडीलांच्या स्मृती वेगळ्या पद्धतीने जतन करण्याचा प्रयत्न निमगाव भोगी (ता.शिरुर) येथील कोठावळे परिवाराकडुन झाला आहे. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश प्रेमराज कोठावळे यांनी आपल्या वडीलांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त वरील सर्व खर्च टाळत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला त्यांच्या भगिनी मंगल व लता तसेच घरचे सर्व नातेवाईक यांनी पाठींबा देत या निर्णयाचे स्वागत केले.
त्यानंतर अंगणवाडी व प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वह्या तसेच ग्रंथालयासाठी पुस्तके उपलब्ध करुन देत सर्वांना खाऊचेही वाटप केले. गणेश कोठावळे व त्यांच्या भगिनी आणि नातेवाईक यांनी सामाजिक बांधिलकी जपत वह्या पुस्तकांच्या रुपाने वडीलांच्या स्मृती जपत समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे समाजातुन कौतुक होत आहे. या कार्यक्रम प्रसंगी निमगाव भोगीच्या सरपंच सुनंदाताई जाधव, उपसरपंच सुनंदाताई पावशे, माजी सरपंच अंकुश इचके, सबाजी सांबारे, लक्ष्मण सांबारे ,विकास सोसायटीचे चेअरमन उत्तम व्यवहारे, ग्रामपंचायत समितीचे सदस्य दिपक राऊत, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भानुदास इचके , उपाध्यक्ष बाळासाहेब राऊत,ज्ञानेश्वर रासकर, निमगाव भोगी गावचे शिवसेना अध्यक्ष सुरेश फलके, प्रदिप राऊत, शाळेचे मुख्याध्यापक फक्कड थोरात , मालन गायकवाड , मिना थोरात , मंगल तळोले, यांच्यासह अनेक ग्रामस्थ तसेच गणेश कोठावळे यांचे मित्र परिवार उपस्थित होते, कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच अंकुश इचके , सुत्रसंचालन मुख्याध्यापक फक्कड थोरात यांनी केले. उपस्थित सर्वांचे आभार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश कोठावळे यांनी मानले.

Tuesday, December 18, 2018

सर्व सामान्यांना आरोग्य सेवा मिळणे झाले कठीण

सर्व सामान्यांना आरोग्य सेवा मिळणे झाले कठीण

दुसाण्याला वैद्यकीय अधिकारी कधी 




गणेश जैन/धुळे, खबरबात बळसाणे : माळमाथा परिसरातील दुसाणे हे मुख्य बाजारपेठेचे गाव म्हणून ओळखले जाते आणि दुसाणे गावातच प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याकारणाने सर्वसाधारण नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या दुसाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या अनेक महिन्यांपासून नियमितपणे वैद्यकीय अधिकारी स्थानिक पातळीवर राहत नसल्याची नाराजगी रुग्णांच्या नातेवाईकांसह माळमाथा परिसरातील ग्रामस्थांनी केली होती शिवाय दुसाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात डाँक्टर तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सेवा मिळणे कठीण झाले आहे त्यामुळे माळमाथा परिसरातील दुसाणे आरोग्य केंद्राला वैद्यकीय अधिकारी मिळणार तरी कधी असा प्रश्न माळमाथा परिसरातील जनतेकडून विचारला जात आहे शिवाय या भागात दुष्काळी परिस्थिती उदभवल्याने त्यात थंडीचा कहराने साथीच्या आजाराने जणूकाय मुक्काम च ठोकला आहे यामध्ये थंडी तापात असलेल्या सर्व साधारण कुटुंबातील रुग्णाला खासगी वाहनातुन दुसाणे आरोग्य केंद्र गाठावे लागते नेमके अशा परिस्थिती वैद्यकीय अधिकारी राहत नाही हजर असलेल्या कर्मचाऱ्यांमार्फत जेवढी आरोग्य सेवा त्या रुग्णाला पुरवली जाते तेवढेच काम कर्मचाऱ्याकडून केले जाते सर्दी , डोके दुखणे , पोट दुखणे , आंगपाठ दुखणे असले सर्वसाधारण आजारांना स्थानिक कर्मचारी सेवा बजावत असतात अशा किरकोळ आजार असलेल्या रुग्णांकरिता वैद्यकीय अधिकारी आदल्या दिवशी ही आला तरी रुग्णांचे भाग्य बलाढ्य समाजणे महत्त्वाचे आहे पण कदाचित रात्री अपरात्री बाळंतपण करिता किंवा परिसरात लहान मोठा अपघात झाल्यास तसेच पोटातील अँपेंडीक्स ची समस्या उदभवल्यास किंवा श्वानाने चावा घेतल्यास अशावेळी दुसाणे आरोग्य केंद्रात रुग्णाला खासगी वाहनातून आणले जाते आणि अशा प्रसंगी नेमणूकीत असलेले डॉक्टर शहारात वास्तव्याला राहतात उपस्थित कर्मचारी प्राथमिक उपचार करून निजामपूर , साक्री रुग्णाची परिस्थिती गंभीर राहिली तर जिल्हारुग्णालयात रवानगी करत असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जाते आणि रुग्णाच्या तब्येतीचे बरे वाईट झाल्यास यास जबाबदार कोण राहिल असा प्रश्न सर्वसामान्यांतून होत आहे

माळमाथा भागातील दुसाणे हे आरोग्य केंद्र महत्त्वाचे मानले जाते या केंद्राकरिता १ पद डाँक्टराचे , १ पद प्रयोगशाळा तंत्रज्ञ , २ पद रेग्युलर ( ANM) , ४ आरोग्य सेवक आणि १ स्लिपर ईत्यादी रिक्त पदे मंजूर असूनही पदांची नियुक्ती करण्यात आली नाही परंतु गेल्या काही वर्षांपासून मंजुरी असलेल्या रिक्त पदांना राज्य आरोग्य विभागातून सपशेल दुर्लक्ष केले जाते आहे दुसाणे आरोग्य केंद्र जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असले तरी राज्य आरोग्याकडून रिक्त पदांची नियुक्ती केली जाते परंतु जिल्हा परिषद प्रशासन व राज्य आरोग्य विभाग यांच्याती असमन्वयामुळे दुसाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी यांच्या सह इतर पदे नियुक्त करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे

या प्राथमिक आरोग्य केंद्रांर्तगत सात उपकेंद्राचा समावेश असून एकूण २९ गावे येतात त्या गावांची एकूण संख्या साधारणपणे साठ हजाराच्या आसपास आहे तसेच दुसाणे आरोग्य केंद्रासह जैताणे आरोग्य केंद्राचा अतिरिक्त भार एकाच डाँक्टरावर सोपविण्यात आला असून याच डाँक्टराला एका हप्त्यातून चार ते पाच दिवस कुटुंब नियोजन च्या कँम्प ला जावे लागत असल्याने सदर डाँक्टराला अजून एका डाँक्टराची खरोखर गरज असून उच्चशिक्षित डाँक्टरासह इतर पदे तात्काळ भरण्याची मागणी दुसाणे ग्रामस्थांसह माळमाथा परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे सद्याच्या स्थितीत ७ ते ८ कर्मचारी सेवा बजावत असल्याचे सांगितले व दुसाणे आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यासह इतर पदे नियुक्ती न झाल्यास आंदोलनाचा देखील इशारा दिला आहे

Sunday, December 16, 2018

विश्वकल्याणक येथे अनोखा प्रयोग

विश्वकल्याणक येथे अनोखा प्रयोग

लिटरभर पाण्याने रोपट्यांना मिळतय जीवदान  : विजय चांडक

खबरबात , धुळे/ गणेश जैन
बळसाणे  :  साक्री तालुक्यातील बळसाणे येथील विश्वकल्याणक या तीर्थावर पदधिकारयांनी मोठ्या प्रमाणावर विश्वकल्याणक परिसरात वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची रोपटे लावली परंतु यावर्षी अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने साक्री तालुक्यातील बळसाणेसह माळमाथा परिसरात पाणी टंचाईचे चटके बसू लागले आहेत दरम्यान विहिरीत व बोअरवेल ला थोडेफार पाणी असून त्या तीन हजार लहान रोपट्यांना रोज पाणी घालणे अवघड होत असल्याचे कर्मचारी वर्गाकडून बोलले जात होते
  गोंदूर येथील चांडक फाँर्म हाऊसचे संचालक विजय चांडक हे सोमवार रोजी विश्वकल्याणक येथे दर्शनासाठी आले असता स्थानिक कर्मचारी एक एक झाडांना बकेटद्वारे पाणी घालत होते दोन तीन झाडांना पाणी घालणे ठिक होते परंतु तीन हजार झाडांना पाणी घालणे म्हणजे एका प्रकारे अवघडच होते चांडक यांनी सदर द्रुश्य पाहिल्यावर त्यांनी विश्वकल्याणकाचे ट्रस्टगणांना मोलाचा सल्ला दिला एक लिटराची कुठल्याही कंपनीची खाली पाण्याची बाटली भरून त्या बाटलीत सुतळीची वात तयार केली आणि अशोका च्या लहानश्या झाडाला लहान दगडाच्या वरती भरलेली एक लिटराची पाण्याची बाटली ठेवून त्या बाटलीचे पाणी एक एक थेंब मातीत मुरत होते झाडाच्या जागेवर ओलावा तयार झाला आणि ते पाणी झाडाच्या मुळापर्यंत गेल्यावर ठेवलेली पाण्याची बाटली तीन दिवसापर्यंत खाली होत नसल्याचे म्हणाले तीन दिवस पर्यंत रोपट्याला पाणी पोहचल्यामुळे आठ दिवसापर्यंत त्या रोपट्याला पाणी नाही घातले तरी चालते चांडक यांनी एका झाडावर प्रयोग करून यशस्वी केला फक्त तुम्ही जेवढे रोपटे तेवढ्या रिकाम्या झालेल्या पाण्याच्या बाटल्या घ्या आणि प्रत्येक रोपट्याजवळ पाण्याने भरलेल्या बाटल्या ठेवा तीन दिवसापर्यंत रोपट्यांना पाणी पुरेल आणि आठ दिवस पाणी घालू नका त्याचप्रमाणे रोपटे ही जिवंत राहील व कर्मचाऱ्यांचा वेळही वाचेल व पाण्याची बचत होईल असे विजय चांडक यांनी सांगितले त्याच दिवशी कमलेश गांधी यांनी दोनशे रोपट्या जवळ पाण्याची बाटली ठेवून व अनोखा प्रयोग यशस्वी झाल्याचे समाधान विश्वकल्याणकाच्या पदधिकारयांना झाले तसेच त्याच्या प्रयोगाची दिवसभर चर्चा होत होती  यावेळी भागचंद कोचर ,  कमलेश गांधी , विजय राठोड , सुरेंद्र भंसाली , पारस कवाड , महावीर कोचर , गणेश कोचर , दिपक जैन , रमेश कोचर व जैताण्याचे उपसरपंच अशोक मुजगे , बाजीराव पगारे , बापू भलकारे , भुरा पेंढारे , गणेश न्याहळदे आदी उपस्थित होते

Wednesday, December 05, 2018

दुष्काळी भागात चारा छावण्या सुरू कराव्यात*  : महावीर जैन

दुष्काळी भागात चारा छावण्या सुरू कराव्यात*  : महावीर जैन

खबरबात, धुळे/गणेश जैन

बळसाणे  :  साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरात गंभीर स्वरूपाचा दुष्काळ निर्माण झाला असून अशा भयानक परिस्थीतीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन टाळाटाळ करत आहे पिण्याच्या पाण्याबरोबर च आपल्या पाळीव प्राणांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे या परिसरात सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना पशूधन वाचविणे किंवा त्यांचे पोषण करणे अवघड झाले आहे माळमाथा भागात तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात किंवा चाऱ्यासाठी थेट अनुदान सरकारने द्यावे अशी मागणी शिवसेनेचे साक्री तालुका उपप्रमुख महावीर जैन यांनी केली*
  माळमाथा परिसरात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे वाढत्या पाणी टंचाई ने बहुतांशी गावांवर दुष्काळाची छाया गडद झाली आहे पाण्याअभावी शेतातली पीके करपली आहेत येत्या काही दिवसात पिण्याच्या पाण्याची गंभीर प्रश्न उदभवेल असे चिन्हे दिसत आहे राज्यसरकार कडून धुळे जिल्ह्यातील काही तालुके दुष्काळ म्हणून जाहीर करण्यात आले आणि साक्री तालुक्यातील उर्वरीत भाग  दुष्काळी यादीत समावेश झाल्याची घोषणा करण्यात आली पण दुसाणे सर्कल अजून दुष्काळाच्या यादीत नाही तरी दुसाणे सर्कलातील गावांना दुष्काळी यादीत सामावून घ्यावे व पाळीव प्राण्यांकरिता चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी छावण्या सुरु कराव्यात अशी मागणी बळसाणे येथील शिवसेना तालुका उपप्रमुख महावीर जैन यांनी केली आहे

Monday, December 03, 2018

उज्वलाने आणले गृहिणीच्या डोळ्यात पाणी

उज्वलाने आणले गृहिणीच्या डोळ्यात पाणी

पुन्हा चुल पेटू लागल्या : उज्ज्वला योजनेतून गँस जोडणी मिळूनही महागाईने केली अडचण



गणेश जैन/धुळे
बळसाणे (खबरबात)  :  केंद्र शासनाने सुरू केलेल्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेतून माळमाथा भागातील अनेक सर्वसामान्य व गरिब कुटुंबांना अल्प किमतीत घरगुती वापराच्या गँस जोडण्या दिल्या सुरुवातीला यासोबत भरलेले सिलेंडर मिळाले मात्र ते संपल्यावर त्यासाठी भरावी लागणारी रक्कम जवळपास *एकहजाराच्या घरात गेल्याने ती रक्कम गरीब परिवाराला जमा करणे परिस्थितीच्या बाहेर गेल्या चे चित्र दिसून येत आहे*
  शासनाने मोफत गँस जोडणी दिल्या नंतर ही वाढत्या महागाईच्या कचाट्यात अडकलेल्या बहुतांश कुटुंबीयांनी गँस चा वापर बंद केला आहे *घरात गँस जोडणी असल्याने राँकेल मिळणे बंद झाले आहे यामुळे माळमाथा परिसरात जुने ते सोने असे म्हणत स्वयंपाकासाठी घरातील चुल पेटवायला लागले आहेत* त्यामुळे या योजनेचा हेतू असफल ठरल्याचे महिलावर्गाकडून सांगितले जाते आहे
  एकेकाळी आगाऊ नोंदणी करून वर्षानुवर्षे गँस जोडणीचे वाट पहावी लागत होती मात्र गेल्या दहा ते पंधरा वर्षात झालेल्या सुधारणेमुळे  मोठ्या प्रमाणात याची मुबलकता वाढली मागेल त्याला तत्काळ या जोडण्या मिळू लागल्या शहरीभागाप्रमाणेच ग्रामीण भागात देखील गँस जोडणीचा वापर वाढू लागला *सहज होणारी उपलब्धता व आवक्याबाहेरील किंमत यामुळे मध्यवर्गासह सामान्य कुटुंबातही चुली ऐवजी गँस वर स्वयंपाक शिजू लागला*
   केंद्र सरकारने दोन वर्षापूर्वी *पंतप्रधान उज्ज्वला  योजना सुरु केली स्वयंपाकासाठी इंधन म्हणून लाकडाचा होणारा वापर कमी होऊन जंगल तोड कमी व्हावी व चुलींवर स्वयंपाक करतांना महिलांना होणारा त्रास कमी व्हावा या उद्देशाने ही योजना सुरू झाली*
यासाठी २०११ मध्ये झालेल्या अर्थिक व जातनिहाय गणनेतून पुढे आलेल्या यादीतून कुटुंबाची निवड करण्यात आली नोंदणीसाठी नाममात्र रक्कम घेऊन या जोडण्या जवळपास मोफत देण्यात आल्या सुरुवातीला या सोबत सिलेंडर देण्यात आले यात *निवड झालेली बहुतांश कुटुंबे दारिद्रयरेषेच्या खालील , अल्पभूधारक शेतकरी मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारी आहेत*
  प्रथमतः च घरात गँस शेगडी जोडणी आल्यावर घरात महिनाभर आनंद होत होता *ते पहिले सिलेंडर संपल्यावर नवीन आणून त्याचा वापर केला मात्र अनुदानित सिलेंडर चा दर दिवसेंदिवस वाढत असल्याने इतकी मोठी रक्कम एकाच वेळी जमा करणे सर्वसाधारण कुटुंबाला आता अशक्य झाले आहे सध्या सिलेंडर साठी ९५० रुपये अगोदर भरावे लागतात यापैकी काही रक्कम नंतर अनुदान म्हणून बँकेत खात्यावर जमा होते तरीही हातावर खाणाऱ्यांना व मोलमजुरी करणाऱ्यांना एवढी रक्कम जमा करणे आवक्याबाहेर आहे त्यामुळे माळमाथा परिसरातील बहुतांश ठिकाणी गँस चा वापर बंद करून चुलीवर स्वयंपाक शिजवीत आहेत*

 
ग्रामीण भागात सर्व साधारण कुटुंबाला मोफत केंद्र शासनाकडून गँस जोडण्या दिल्या आहेत गँस कधी पेटवता आला नाही गँस पेटवतांना भय लागायचे चुलीवर स्वयंपाक करीत असताना जो घरात धुर व्हायचा ते बंद झाले पण आम्ही मजूरी करतो आणि सिलेंडर संपला की एकाच वेळी एक हजार जमा करणे हे आमच्या परिस्थिती चा बाहेर आहे बँकेत सपसिडी मिळते परंतु दुष्काळाची झळ असल्याने एकावेळी सिलेंडर ला ९५० रुपये देणे परिस्थिती च्या बाहेर आहे पहिले चुलीवर स्वयंपाक करायची राँकेल देखील भरपूर मिळायचे पण गँस जोडण्या बहुतांशाच्या घरी झाल्याने घरातील चुल , लाकडे व राँकेल विसरले होते परंतु आता त्यांना च आमंत्रण द्यावे लागते आहे सकाळचे अंघोळीसाठी गरमपाणी व स्वयंपाक चुलीवर च उरकावे लागते आहे
   सौ.कमाबाई मालाजी सोनवणे ,  उभरांडी ( ग्रुहीणी )

Sunday, November 25, 2018

128 वी महात्मा फुले पुण्यतिथी व समता पुरस्कार वितरण सोहळा

128 वी महात्मा फुले पुण्यतिथी व समता पुरस्कार वितरण सोहळा


धुळे, प्रतिनिधी
 बुधवार दि 28 नोव्हेंबर 2018 स्थळ समता भूमी महात्मा  फुले स्मारक पुणे या ठिकाणी मा प्रतिभा पाटील  माजी राष्ट्रपती भारत सरकार यांच्या शुभहस्ते मा शरद पवार माजी कृषिमंत्री भारत सरकार याना या वर्षाचा समता पुरस्कार देण्यात येणार आहे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा श्री उपेंद्र कुशवाह मानव संसाधन राज्यमंत्री भारत सरकार व मा ना गिरीश बापट पालकमंत्री पुणे जिल्हा हे उपस्थित असतील

 तसेच मा ना विजय शिवतारे जलसंपदा राज्यमंत्री म राज्य,मा ना दिलीप कांबळे समाजकल्याण राज्यमंत्री म राज्य ,मा सौ मुक्ता टिळक ,महापौर पुणे,व मा श्री राहुल जाधव महापौर पिपरी चिंचवड यांची सन्माननीय उपस्थित राहणार आहे
राज्याचे  माजी उपमुख्यमंत्री व अखिल भारतीय समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री छगनरावजी भुजबळ यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे तरी धुळे जिल्ह्यातील सर्व समता सैनिकांनी व भुजबळ समर्थकांनी  पुणे येथे होणाऱ्या  समता पुरस्कार वितरण सोहळ्याला हजरोच्या संख्येने  उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे धुळे जिल्हाध्यक्ष आबासाहेब राजेश बागुल यांनी केले आहे
शिवसेनेच्या महाआरतीला बळसाणे ग्रामस्थांची गर्दी

शिवसेनेच्या महाआरतीला बळसाणे ग्रामस्थांची गर्दी



गणेश जैन/ धुळे, खबरबात
बळसाणे - शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व महाराष्ट्र राज्यातील हजारो शिवसैनिक अयोध्या ला रवाना झालेत प्रभू श्रीराम मंदिरा चे बांधकाम लवकर सुरू व्हावे व मंदिराची पहिली विट रचण्याचे आमंत्रण शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांना मिळाल्याने राज्यभर शिवसैनिकांमध्ये जल्लोष पूर्ण वातावरण तयार झाले आहे म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासह शिवसैनिक अयोध्या ला गेले आहेत.

शिवसेनेच्या वतीने श्रीराम मंदिरात महाआरती

हिंदू धर्मियांच्या अस्मितेचा आदर सन्मान व्हावा यासाठी दुसाणे सर्कल मधील बळसाणे येथील श्रीराम मंदिरात  (ता.२४) रोजी सायंकाळी ६ वाजता श्रीराम मंदिरात श्रीराम प्रभू चरणी शिवसेने तर्फे महाआरती करण्यात आली*
   गावातील मुख्य चौकात उभारलेल्या श्रीराम मंदिरात शिवसैनिक व ग्रामस्थांमार्फत महाआरती करून *श्रीराम जय राम जय जय राम या नावाचा मोठ्या ने जयघोष करण्यात आला* याप्रसंगी श्रीराम मंदिरात बळसाणे ग्रामस्थ व शिवसेना पक्षाचे पदधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या महाआरती चे आयोजन साक्री तालुक्याचे *शिवसेना उपतालुका प्रमुख बळसाणे येथील महावीर जैन यांनी केले होते*

Saturday, November 24, 2018

धनगर आरक्षणविषयक 'एल्गार महामेळावासाठी सभा

धनगर आरक्षणविषयक 'एल्गार महामेळावासाठी सभा


धुळे/ गणेश न्याहलदे, खबरबात
जैताणे गावात मनमाड येथे होत असलेल्या ,एल्गार महामेळाव्याच्या'निजोजन करण्यासाठी व माहिती संदर्भात धनगर समाज आरक्षण कृती समिती जिल्हा नाशिक चे पदाधिकारी मा श्री मच्छिन्द्र जी बिडगर, श्री राजाभाऊ खेमनार,श्री भगवान शेरमाने, तसेच श्री झुलाल आण्णा पाटील यांनी जैताणे येथील समाज बांधवांनी बैठक घेतली या बैठकीचे आयोजन जैताणे ग्रामपालिकेचे माजी उपसरपंच व जैताणे गावातील धनगर समाजाचे नेते श्री अशोक मुजगे यांनी केले
दि 30/11/2018 रोजी उत्तर महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या सर्व लोकांसाठी धनगर समाज आरक्षण कृती समिती जिल्हा नाशिक च्या वतीने मनमाड ता नांदगाव जि नाशिक येथे धनगर समाजाचे नेते मा श्री गोपीचंद जी पडळकर व श्री उत्तमराव जी जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत एल्गार महामेळाव होणार आहे त्या संदर्भात निजोजन करण्यासाठी या महामेळाव्याची माहिती देण्यासाठी विठ्ठल मंदिर जैताणे या ठिकाणी मोठी बैठक पार पडली। श्री अशोक मुजगे यांनी प्रास्ताविक करताना जैताणे गावातील समाज बांधवांनी आत्ता पर्यंत आरक्षण अंमलबजावणी साठी केलेल्या विविध आंदोलनाची माहिती प्रमुख उपस्थिताना दिली
व श्री मच्छिन्द्र बिडगर यांनी सांगितले की धुळे ,जळगाव ,नंदुरबार ,नाशिक,या चारही जिल्ह्यातील सर्वात मोठा धनगर समाज या जैताणे गावात राहतो म्हणून या मेळाव्यात या गावाची उपस्थित सर्वात जास्त प्रमाणात असली पाहिजे, या मेळाव्या प्रसंगी श्री बापू भलकारे,बाजीराव पगारे,पंकज पगारे,सागर बोरसे,किरण पगारे,जितेंद्र पेंढारे ,गणेश न्याहळदे,व सर्व धनगर समाज बांधव उपस्थित होते