काव्यशिल्प Digital Media: जोरगेवार

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label जोरगेवार. Show all posts
Showing posts with label जोरगेवार. Show all posts

Wednesday, October 31, 2018

आमचा अधिकार हक्काने दया अन्यथा संघर्षातून मिळवू: जोरगेवार

आमचा अधिकार हक्काने दया अन्यथा संघर्षातून मिळवू: जोरगेवार

चंद्रपूर/प्रतिनिधी:
घरकूल लाभार्थ्यांना घरे द्या तथा नजूलच्या जागेवर वास्तव्यास असलेल्यांना कायमस्वरुपी पट्टे द्या, या मुख्य मागणीकरिता किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात शेकडो नागरिक मोर्चाच्या स्वरुपात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.

चंद्रपूर जिल्हाची ओळख अतिशय शांतप्रिय जिल्हा म्हणून आहे.त्यामुळे आमच्यावर अन्यायकारक निर्णय लादण्याची चुक करु नका, आमचा अधिकार हक्काने दया अन्यथा रस्त्यावर उतरुन संघर्षातून मिळवु असा ईशारा किशोर जोरगेवार यांनी दिला. जैन भवन जवळून निघालेल्या या मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. यावेळी पुढे बोलतांना जोरगेवार म्हणाले की, घरकुल योजनेच्या नावावर शासनाने २१७९५ हजाराहून नागरिकांडून अर्ज भरुन घेतले यातील १९ हजार ७६४ अर्ज पात्र ठरवीण्यात आले आहे. तर ०२ हजार २२२ अर्ज अपात्र ठरवीण्यात आले आहे. मात्र यात लाभार्थी ठरलेल्यांपैकी अदयाप घराचा लाभ मिळालेला नाही. त्यामूळे घरकुल लाभार्थी असूनही हक्काच घर प्रत्येक्षात साकार झालेल नाही. ही या लाभार्थ्यांची एक प्रकारे थट्टा असून शासनाने नागरिकांना फक्त घराचे स्वप्न दाखवून त्यांची फसवणुक केली आहे. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांनमध्ये रोष आहें. एकीकडे योजनेतील हक्काच्या घरापासून वंचित ठेवल्या जात आहे. तर दुसरी कडे असलेल घरही नजूलच्या जागेवर असल्याचे कारण समोर करुन त्यांना बेघर करण्याचे काम प्रशासनाकडून केल्या जात आहे. असे असतांनाही चंद्रपूकर शांत आहे. हा त्यांचा संयम आहे. मात्र त्यांचा संयम आता तुटत असून आपल्या हक्कासाठी संघर्ष करायला चंद्रपूरकर सज्ज झाला आहे. याचीच साक्ष देणारा आजचा हा अभुदपुर्व मोर्चा असून हा संघर्ष यापूढेही असाच सुरु ठेवत आणखी तिव्र करु असा ईशाराही त्यांनी यावेळी बोलतांना दिला.

हक्काच घर मिळालाच पाहिजे असा नारा बुलंद करत हा भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला यावेळी मोर्चाच्या मार्गावरील महात्मा गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर, बॅ. राजाभाऊ खोब्रागडे, इंदिरा गांधी यांच्या पुतळयाला जोरगेवार यांनी माल्यार्पण केले. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचताच जोरगेवार यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हाधिका-यांची भेट घेत आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिका-यांना दिले. घरकुल योजनेतील सर्व लाभार्थ्यांना तात्काळ घरकुल बांधून देण्यात यावे, या योजनेतील अटी शीथील करुन अपात्र ठरलेल्या अर्जंदारांनाही घकुलाचा लाभ देण्यात यावा, या योजनेची नोंदनी प्रक्रिया पुन्हा सुरु करुन अधिकाधिक नागरिकांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा, नजूलच्या जागेवर घरे बांधून राहत असलेल्या नागरिकांना स्थायी स्वरुपी पट्टे देण्यात यावे, आदि मागण्यांचा या निवेदणात समावेश आहे. या मागण्यांचे गांभिर्य लक्षात घेता जिल्हाधिका-यांनीही याबाबत तात्काळ बैठक लावण्याचे आश्वासन जोरगेवार यांना दिले. यावेळी विनोद अनंतवार, सुनील पाटील, अमोल शेंडे, देविदास बानबले, इरफान शेख, सलीम मामू, कांबळेजी, संजय बुटले, वैष्णवी मेश्राम, वंदना, हातगावकर, संतोषी चव्हाण, रजनी चिंचोळकर, शांता धांडे, माला तुरारे, सुजाता बल्ली, विजया बच्छाव, नितीन नागरिकर, टिकाराम गावंडे, आनंद इंगळे, विनोद दुर्गे, रुपेश पांडे, राशीद हुसैन, ईमरान खान, दीपक पद्मगिरीवार, किशोर बोल्लमवार, सुधीर माजरे, मुन्ना जोगी, गोपी, सुरज चव्हाण, दिलीप बेंडले, अजय सिद्धमशेट्टीवार, राहुल मोहुर्ले, नसीब गेडाम, शंकर दंतुलवार, कुणाल जोरगेवार, विजय वरवडे, यांच्यासह आदिंची उपस्थिती होती.

Thursday, September 06, 2018

३३३ रिक्त पदे भरण्यास वेकोलीची मंजुरी

३३३ रिक्त पदे भरण्यास वेकोलीची मंजुरी

नागपूर सि.एम.डी. कार्यालयावरील जोरगेवारांच्या आंदोलनाला यश

नागपूर/प्रतिनिधी;
   २०१६ पासून वेकोली तर्फे भरण्यात न आलेल्या माईनिंग सरदार आणि ओव्हरमेंन यांच्या जागा तात्काळ भरण्यात याव्यात या मागणीसाठी नागपूर येथील सिएमडी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या किशोर जोरगेवार यांच्या आंदोलनाला अखेर यश आले असून वेकोलीच्या नागपूर विभागातील ३३३ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यामुळे माईनिंग सरदार आणि ओव्हरमेंन चे प्रशिक्षण घेतलेल्यांना रोजगार मिळणार आहे.

वेकोली मध्ये नौकरी लागेल या आशेने नागपूर विभागातील विद्यार्थ्यानी मायनिंग सारख्या महागड्या विभागात शिक्षण घेतले मात्र नागपूर विभागातील वेकोली कडून २०१६ पासून माईनिंग सरदार आणि ओव्हरमेंन यांच्या जागा भरण्यात आलेल्या नव्हत्या. त्यामुळे या विभागातील माईनिंग मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी हे जागा निघण्याच्या प्रतीक्षेत होते. परंतु तीन वर्षाचा काळ लोटत आला तरी जागा निघत नसल्याने त्यांच्यावर नौकरीपासून वंचित राहण्याची वेळ आली होती. त्यामूळे या रिक्त जागा तात्काळ भरण्यात याव्यात अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. या मागणीच्या पुर्तेसाठी १८जुलै २०१८ ला नागपूर येथील सी.एम.डी. वेकोली कार्यालयासमोर किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. त्यानंतर या मागणीसाठी जोरगेवार यांनी सतत पाठपूरावा करत अधिका-यांची बैठका केल्या होत्या. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून वेकोलीच्या नागपूर विभागाच्या वतीने माईनिंग सरदार आणि ओव्हरमेंन यांच्या ३३३ जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. तशी जाहिरातही त्यांच्या कडून प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता उत्तीर्ण होऊनही तिन वर्षापासून रोजगाराच्या प्रतिक्षेत असलेल्या चंद्रपूरातील या युवकांना रोजगार मिळणार असून त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे.

Sunday, July 29, 2018

परंपरागत गुरूंचे समाज घडविण्यात मोठे योगदान:किशोर जोरगेवार

परंपरागत गुरूंचे समाज घडविण्यात मोठे योगदान:किशोर जोरगेवार

विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य करणा-या ४० गुरुवर्यांचा सत्कार
स्व. प्रभाताई जोरगेवार चॅरिटेबल ट्रस्टचे आयोजन
चंद्रपूर/प्रतिनिधी:
प्राचीन काळापासूनच समाजात गुरुला विशेष स्थाण देण्यात आले आहे. मनुष्य जन्मापासूनच त्यांच्यावर प्रत्यक्ष अप्रक्ष रित्या विविध क्षेत्रातील अनेक गुरुंचे संस्कार होत असते मात्र हे गुरु दुर्लक्षित झाले आहे परंतु त्यांच्याकडून झालेल्या संस्कारातुमच उत्तम समाज घडू शकतो त्यामुळे उत्तम समाज घडवीण्यात परंपरागत गुरूंचे मोठे योगदान असल्याचे मत किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केले. स्व. प्रभाताई जोरगेवार चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने आज परंपरागत गुरुंच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. मातोत्री सभागृहात आयोजीत या सत्कार सोहळयात कार्यक्रमाच्या उद्घाटीका म्हणून उषाताई हजारे, प्रमुख पाहुणे प्रा. सुर्यकांत खनके, नगरसेवक सुरेश पचारे, विशाल निंबाळकर, बबनराव फंड, विमल काष्टीया, किशोर पडगेलवार, आशा बुरडकर, दादाजी नंदनवार, किशोर तळवेकर, प्रमिला गटलेवार, नंदा जोशी, वंदना हातगावकर, संतोशी चव्हाण आदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना जोरगेवार म्हणाले की, आजवर धनादय, सर्वपरिचीत अश्या व्यक्तींचाच सत्कार केल्या जात होता. मात्र या समाजात असेही गुरु आहेत त्यांनी आपआपल्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करत अणेक विदयार्थी घडवीले. आज या गुरुंमुळे अणेकांना रोजगार मिळाला आहे. असे असले तरी या गुरुकडे आजवर दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या कार्याची पावती म्हणून जिल्ह्यात प्रथमच अश्या अनोख्या सत्कार सोहळयाचे आयोजन केल्या गेल्या असल्याचे त्यांनी यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलतांना सांगीतले.
या सत्कार सोहळ्यात ड्राइंग चित्रकार चंदु पाठक, चित्रकार सुदर्शन बारापात्रे, पोलीस मार्गदर्शक रामदास खुजे, मूर्तीकार वामन बोरसरे, मल्लखांब प्रशिक्षक किशोर पडगेलवार, संगीत शिक्षक किशोर तळवेकर, आखाडा प्रशिक्षक महादेव बेले, कारपेंटर प्रशिक्षक वासुदेव वनकर यासारख्या परंपरागत गुरूंचा सत्कार करण्यात आला यांनी अनेकांना घडविले त्यातून त्यांना स्वयंरोजगार प्राप्त करून दिले त्याबद्दल यांचा विशेष सत्कार संस्थे द्वारे करण्यात आला.
विकलांग सेवा समितीचे अध्यक्ष श्रीराम पान्हेरकर हे नेहमी संस्थेच्या माध्यमातून अंध – अपंगांची मदत करत असतात आजपर्यंत त्यांनी अनेक विकलांग यांना शिलाई मशीन असो किव्हा तीनचाकी सायकल यासारखे अनेक साहित्य वाटप करून त्यांना स्वताच्या पायावर उभे करून त्यांना
 सक्षम केले त्यामुळे त्यांचे समाजात उत्तम योगदान असल्याने त्यांचा सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला. 

पार पडलेल्या सत्कार सोहळयात विविध क्षेत्रातील जवळपास ४० गुरुवर्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संगीत क्षेत्रात काम करत असतांना अणेकांना संगीताचे धडे देऊन त्यांच्यातील कलाकरांना मंच उपलब्ध करुन देणा-या बंडु देठे यांचे ४४ व्या वर्षात पदार्पण झाल्याने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात उषाताई हजारे, प्रा. सुर्यकांत खनके, सुरेश पचारे, विमल काष्टीया, बंडू देठे, किशोर तळवेकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक ईरफान शेख यांनी केले तर संचालन एकता बंडावार यांनी केले. या कार्यक्रमाला विविध संघटणांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निलेश बेलखेडे, अमोल शेंडे, पंकज गुप्ता, दर्शन बुरडकर, विनोद गरडवा, सुधीर माजरे, प्रकाश चंदनखेडे, विनोद अनंतवार, हर्षद कानमपल्लीवार, नितीन नागरिकर, मुन्ना जोगी, शंकर दंतुलवार, विजय वरवाडे, राशेद हुसैन, लोकेश कोटरंगे, शांताबाई धांडे, रजनी चिंचोळकर, बबलू मेश्राम, दिलीप बेंडले, रवी करमरकर, सुरज चव्हाण, गौरव जोरगेवार यांची उपस्थिती होती.

Tuesday, July 03, 2018

पशुसंगोपन कार्यशाळेला ग्रामवासियांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

पशुसंगोपन कार्यशाळेला ग्रामवासियांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

चंद्रपूर/प्रतिनिधी:
शेतकरी तथा बेरोजगार युवकांना शेतीपूरक जोडधंद्याच्या माध्यमातून आर्थीकरित्या सक्षम करण्यासाठी स्व. प्रभाताई जोरगेवार चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने वेंडली येथे आयोजीत केलेल्या चार दिवसीय पशुसंगोपन अभियानाला बेरोगार व शेतक-यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत तीन दिवसात जवळपास 380 मुलांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला आहे. गुरुवारी या कार्यशाळेचा समारोप होणार आहे. 
निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षी शेतकरी संकटात सापडत असतो. यातून मार्ग काढत त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने या चार दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार पासून सुरु झालेल्या या कार्यशाळेला ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळत असून या तीन दिवसात शास्त्रोक्त शेळीपालन व्यवसाय, कुक्कुटपाल व्यवसाय आणि मत्स्य व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तर कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी गुरुवारला दुग्ध व्यवसाया बाबत प्रशिक्षण दिल्या जाणार आहे. शहरात दुध, शेळी, मासे, यांची मोठी मागणी आहें. ही मागणी पुर्ण करण्यासाठी बाहेर राज्यातून मासे आणि शेळ्या चंद्रपूरात पुरवील्या जातात ही बाब लक्षात घेता शहराला लागुन असलेल्या ग्रामीण भागात शेती पूरक जोडधंदे केल्यास येथील शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊ शकतो तसेच येथील बेरोजगार युवकांना त्यांचा हक्काचा रोजगार मिळू शकतो या उद्देशाने स्व. प्रभाताई जोरगेवार चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने आणि किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने या चार दिवसीय पशुसंगोपन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून दत्ता इंस्टियुट ऑफ कृषी तंत्रज्ञान व पशुसंगोपन संवर्धन प्रशिक्षण विभाग नागपुर येथील तज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे.


Wednesday, June 06, 2018

 गंगुबाई जोरगेवार ‘मातोश्री’ पुरस्काराने सन्मानित

गंगुबाई जोरगेवार ‘मातोश्री’ पुरस्काराने सन्मानित

टोपल्या विकून मुलाबाळांचा सांभाळ ;पुणे येथे रंगला सत्कार सोहळा
चंद्रपूर/प्रतिनिधी:
किशोर जोरगेवार यांच्या आई गंगुबाई जोरगेवार यांना ‘मातोश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे हा सत्कार सोहळा नुकताच पार पडला आहे या सत्कार सोहळ्यात शिवसेना नेते तसेच बुरुड समाजाचे भूषण खा. चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन गंगुबाई जोरगेवार यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. अखिल बुरुड समाज महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, महापौर मुक्ता टिळक, संस्थेचे अध्यक्ष विकास नागे, महिला आघाडीच्या अध्यक्ष वैजंतीताई खैरे, सरचिटणीस एम.बी.साळुंखे, विदर्भ प्रांत बुरुड समाज अध्यक्ष किशोर जोरगेवार, विकास सूर्यवंशी, सुभाष सूर्यवंशी, राजेंद्र सूर्यवंशी या मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती. 
महिलांनी जेव्हा जेव्हा बंड पुकारला तेव्हा तेव्हा एक नवी क्रांती घडली हा या देशाचा इतिहास आहे. असाच एक परिस्थिती विरोधातील संघर्ष चंद्रपुरातील गंगुबाई जोरगेवार यांनी पतीच्या निधनानंतर आजपासून २५ वर्षापूर्वी सुरु केला विपरीत परिस्थिती असली तरी जिंकण्याचि जिद्द उराशी बाळगून टोपल्या विकण्याचा छोटासा व्यवसाय सुरु केला. आणि यातून मिळेल त्या अल्प पैश्यातुन ३ मुली व २ मुलांचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या या संघर्षाला आज मोठे फलित आले असून आज जिल्ह्यातील प्रतिष्ठीत घराणे म्हणून जोरगेवार घराणे समोर आले आहे. त्यांचा एक मुलगा किशोर जोरगेवार यांनी राजकारणात ठसा उमटवला असून त्यांची समाजासाठी मोठे कार्य सुरु आहे. तर लहान मुलगा हा उत्तम व्यावसायिक बनला आहे. गंगुबाई यांच्या या संघर्षाचे मोठे यश असून त्यांच्या या संघर्षाचि पावती म्हणून त्यांचा अखिल बुरुड समाज महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे ‘मातोश्री’ पुरस्कार देऊन पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांचे सुपुत्र, किशोर जोरगेवार, प्रशांत जोरगेवार, सुना, कल्याणी जोरगेवार, रंजिता जोरगेवार, नातवंड कोमल जोरगेवार, कामिनी जोरगेवार, प्रसाद जोरगेवार, यथार्थ जोरगेवार यांची उपस्थिती होती. आज जोरगेवार घराण्याची परिस्थिती बदलली असली तरी ‘गरिबी आली तर लाजायचं नाही आणि श्रीमंती आली तर माजायचं नाही’ या उक्ती प्रमाणे गंगुबाई आजही मनपा समोर फुटपाथ वर टोपल्या विक्रीचा व्यवसाय नित्य नियमाने करीत आहे हे विशेष.



Monday, April 30, 2018

वाढीव पाणी पुरवठा योजनेची जोरगेवार यांचे कडून पाहणी

वाढीव पाणी पुरवठा योजनेची जोरगेवार यांचे कडून पाहणी

चंद्रपूर/प्रतिनिधी:
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी १७ एप्रिल २०१८ ला मुंबई येथे पालकमंत्री यांच्या समवेत चंद्रपूर येथील पाणी समस्येवर बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीमध्ये ज्या अधिकार्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं कि आम्ही चंद्रपूरचा पाणी पुरवठा सुरळीत ठेऊ असे त्यावेळी बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले होते. म.जी.प्र.चे अधीक्षक अभियंता जगदाळे यांनी २४ एप्रिल २०१८ पासून वाढीव पाणी पुरवठा सुरु करू असही त्या बैठकीमध्ये सांगण्यात आले होते पण अजूनपर्यंत २४ तारीख हि लोटूनही अद्याप वाढीव पाणी पुरवठा चालू झालेला नाही. म्हणून आज शिवसेना नेते किशोर जोरगेवार  यांनी धानोरा नदीवरील वाढीव पाणी पुरवठा योजनेचे सुरु असलेल्या कामाची पाहणी केली असता येथील नदीमधील पाण्याची व सुरु असलेल्या कामाची परिस्थिती लक्षात घेता संपूर्ण काम पूर्ण होण्यासाठी १ महिना कालावधी लागणार आहे अस त्यावेळी निदर्शनास आले. यावेळी नगरसेवक विशाल निंबाळकर, अमोल शेंडे, इरफान शेख, हर्षद कानमपल्लीवार, राशीद हुसैन, विलास सोमलवार, विनोद अनंतवार, शंकर दंतुलवार, अशपाक खान, बादल हजारे, बबलू मेश्राम, यांची उपस्थिती होती.
           सुरु असलेल्या कामाची पाहणी करत असताना म.जी.प्र.चे अधीक्षक अभियंता जगदाळे  यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधला असता त्यांनी सुद्धा पूर्णपणे माहिती दिली नाही आणि त्यांनी सांगितलं आम्ही आतापर्यंत ६ kmकिमी अंतर पर्यंत पाण्याची टेस्टिंग केली आहे. नदीच्या पात्रामध्ये पाणी नाही पात्र पान्याअभावी पूर्णपणे कोरडे पडलेले आहे, नदीतच पाणी नाही आहे तर चंद्रपूर येथील जनतेला कुठून पाणी देणार असा प्रश्न या ठिकाणची प्रत्यक्ष पाहणी केल्यावर जोरगेवार यांनी उपस्थित केला. इतक्या मोठ्या वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम याठिकाणी नदीवर चालू आहे पण कामाच्या ठिकाणी एकही अधिकारी किव्हा कंत्राटदाराचे सुपरवायजर, इंजिनिअर कोणीही त्याठिकाणी नाही ते काम चंद्रपुरकरांची दिशाभूल करण्यासाठी रामभरोसे चालू आहे. असा आरोप जोरगेवार यांनी केला. केवळ चार ते पाच कामगारांच्या भरोशावर काम चालू आहे. चंद्रपूर येथील जनतेच्या जीव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे पाणी असून सुद्धा येथील लोकप्रतिनिधी व प्रशासन उदासीन आहे हे दिसत आहे. बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांना आकडेवारी सांगीतल्याप्रमाणे त्यांनी त्या बैठकीमध्ये १५ जूनपर्यंत शहरातील जनतेला पाणी पुरेल असा अंदाज लावत समोर आढावा बैठकीचे आयोजन केले. पण प्रत्यक्ष पाहता येथील पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. याठिकाणी पाण्याच्या बाबतीमध्ये चंद्रपूरकरांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. इरई धरणात सुद्धा पाणी नाही आहे आणि वाढीव पाणी पुरवठा च्या माध्यमातून जे पाणी मिळण्याची आशा होती ती आशा सुद्धा पूर्ण होणार नाही अस याठिकाणी दिसत आहे. चंद्रपूरच्या जनतेला जर जून महिन्यापर्यंत पाणी मिळाले नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरेल व पाणी द्यायला प्रशासनाला भाग पाडेल वेळ प्रसंगी जर सी.टी.पी.एस. चे जर वीजनिर्मिती संच बंद करण्याची वेळ आली तर ते बंद करू असा इशारा जोरगेवार यांनी दिला आहे.

Saturday, April 21, 2018

चंद्रपूरातील शाळा,महाविद्यालय,कॉन्व्हेंट बंद करा:किशोर जोरगेवार

चंद्रपूरातील शाळा,महाविद्यालय,कॉन्व्हेंट बंद करा:किशोर जोरगेवार

निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन
चंद्रपूर/प्रतिनिधी:
 मागील चार ते पाच दिवसापासून चंद्रपुरातील तापमान हे देशात पहिल्या क्रमांकाचे ठरले आहे. या चार दिवसात ४४ ते ४६ अंश से. इतके तापमान चंद्रपूर मध्ये नोंदविण्यात आले असून हे देशातील नव्हेच तर जगातील सर्वाधिक तापमान ठरले आहे. असे असतानाही चंद्रपुरातील शाळा, महाविद्यालय, कॉन्व्हेंट सुरूच असून या तापत्या उष्णतेचे दुष्परिणाम या विध्यार्थ्यांच्या आरोग्यावर होण्याची दाट श्यक्यता आहे त्यामुळे दुपारून सुरु असलेल्या शाळा, महाविद्यालय, कॉन्व्हेंट ला सुट्या देण्यात याव्या अशी मागणी किशोर जोरगेवार यांनी केली असून या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांना देण्यात आले आहे.  यावेळी नगरसेवक विशाल निंबाळकर, दीपक पद्मगीरीवार, विलास सोमलवार, विनोद गोल्लजवार, अशोक खडके, विनोद अनंतवार यांची उपस्थिती होती                         
 चंद्रपूर शहराची राज्यात तापमान शहर म्हणून ओळख आहे. नेहमी एप्रिल आणि मे मध्ये या वाढलेल्या तापमानामुळे जिल्ह्यात उष्माघाताचे बळी जात असतात. आणि सध्या तर चंद्रपुरचे तापमान हे जगातील १ ल्या क्रमांकाचे असल्याने येथील शाळा, महाविद्यालय, कॉन्व्हेंट मध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांना इतक्या भर उन्हामध्ये शिक्षण घेण्यासाठी जावे लागत आहे. त्यामुळे त्यांना प्रचंड उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे त्यांना उष्माघात या सारख्या असंख्य आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची जीवित हानी होण्याच्या अगोदर शहरातील संपूर्ण शाळा, महाविद्यालय, कॉन्व्हेंट तात्काळ बंद करण्यात याव्या अशी मागणी किशोर जोरगेवार यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. प्रत्येक वर्षी उन्हाळा लागण्याच्या आधी शिक्षणाधिकारी व संपूर्ण शाळांचे मुख्याध्यापक यांना बोलाऊन मार्च महिन्यामध्येच मिटिंग घेऊन एप्रिल महिन्याच्या प्रथम आठवडयामध्येच शाळा, महाविद्यालय, कॉन्व्हेंट बंद करण्याच्या संदर्भात उपाययोजना कराव्यात असे यावेळी जोरगेवार यांनी सांगितले. याची तत्काळ दखल घेत निवासी उपजिल्हाधिकारी यांनी शिक्षणाधिकारी यांना सांगून ज्या शाळा, विद्यालय, महाविद्यालय, कॉन्व्हेंट ११ च्या नंतर सुरु असतात त्यांना बंद करण्यात यावे असे नोटीस संपूर्ण शाळांना देण्याचे आदेश दिले आहे.

Friday, March 30, 2018

महाकालीच्या दर्शनाकरिता येणा-या भाविकांसाठी जोरगेवार सरसावले:यात्रेकरूंनी मानले आभार

महाकालीच्या दर्शनाकरिता येणा-या भाविकांसाठी जोरगेवार सरसावले:यात्रेकरूंनी मानले आभार

चंद्रपूर/प्रतिनिधी:
                 सध्या चंद्रपूर शहरात माता महाकालीच्या यात्रेची धुम चालू आहे. यात्रेकरिता बाहेर जिल्ह्यातून भक्त येतात पण याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यात्रेकरूंना इथे अतिशय अल्पशी सोय महानगर पालीकेकडून करून देण्यात आली आहे. या माता महाकाली मंदिरा लगत ठिकाणी पवित्र असलेली झरपट नदी आहे. त्या नदीच्या पात्रामध्ये लाखो भाविक स्नान करून मातेच्या दर्शनाकरिता जातात. भाविक उघड्यावर स्नान करतात पण त्यांना तिथे पुरेशी अशी स्नानगृहाची व्यवस्था सुद्धा मनपाप्रशासनाकडून करून देण्यात आलेली नाही. काल शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांनी महाकाली मंदिर परिसर गाठून भाविकांशी संवाद करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व यात्रेकरूंची पाहणी केली असता झरपट नदीच्या पात्रामध्ये लाखो महिला भाविक उघड्यावर स्नान करत होते त्यांना मनपा प्रशासनाकडून स्नान गृह सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले नाही त्यासाठी जोरगेवार यांनी ताबडतोब त्या ठिकाणी महिलांसाठी तात्पुरते स्नानगृह उपलब्ध करून दिले. त्यासाठी यात्रेकरूंनी किशोर जोरगेवार यांचे आभार मानले.
              मातेच्या दर्शनाकरिता येणारे यात्रेकरू दुषित पाण्यामध्ये स्नान करतात ते पाणी सुद्धा मनपा कडून स्वच्छ करून देण्यात आले नाही. त्याचप्रमाणे यात्रेकरूंना शौचालयाची सुद्धा व्यवस्था करून देण्यात आलेली नाही उघड्यावर शौचास बसाव लागत आहे हे दुर्दैव आहे. दर्शनाकरिता येणा-या महिलांना आपली आब्रू उघड्यावर टाकून इथे राहावे लागत आहे. यात्रेसाठी येणा-या माता भगिनीच्या आब्रुचे सुद्धा रक्षण मनपा करु शकत नाही असे जोरगेवार म्हणाले . एकीकडे आपण चंद्रपूर शहराचा विकास होत आहे कुठलाही निधी जिल्ह्यासाठी कमी पडू देणार अस म्हणतो हे विकासाच एक दृश्य येथील महाकाली मातेच्या यात्रेसाठी येणा-या भाविकांना दिसत आहे. हागणदारी मुक्त मनपा कडून बोलल्या जाते त्याचप्रमाने शहरात ठिकठीकाणी स्वच्छतेचे फलक लावण्यात आले पण या नदीच्या पात्रामध्ये कच-याचे ढिगारे दिसत होते. त्या धीगा-याचे सुद्धा काही विल्हेवाट मनपा कडून करण्यात आले नाही असा आरोप जोरगेवारांकडून करण्यात आला .  .

Friday, March 09, 2018

चंद्रपूरच्या हाती भोपळा:किशोर जोरगेवार

चंद्रपूरच्या हाती भोपळा:किशोर जोरगेवार

किशोर जोरगेवार साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी:
राज्याचे अर्थमंत्री हे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि हा त्यांचा विधानसभा मतदार संघ असल्याने येथील जनतेच्या या अर्थसंकल्पातून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र त्यांच्या अपेक्षा भंग झाल्या असून या अर्थसंकल्पात चंद्रपूर जिल्ह्याच्या हाती भोपळा लागला आहे. एकेकाळी रोजगार देणारा जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख होती. जिल्ह्यातील अनेक उद्योग बंद झाले असल्याने बेरोजगारीचे मोठे संकट जिल्ह्यापुढे आहे. या अर्थसंकल्पात जिल्ह्यातील रोजगारांच्या दृष्टीने बंद उद्योग धंदे सुरु करण्याबाबत निधीची तरतुदीची अपेक्षा होती. मात्र बेरोजगार युवकांचीही या अर्थसंकल्पातून निराशा झाली आहे. तसेच चंद्रपूर जिल्हा हा प्रदुषणाच्या बाबतीत देशात ४ थ्या क्रमांकाचा जिल्हा आहे. त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी काही उपाययोजना या अर्थसंकल्पात ठेवल्या जातील अशी अपेक्षा अर्थमंत्र्यांकडून होती. मात्र त्याबाबत कुठलीही तरतुद करण्यात आली नाही त्यामुळे चंद्रपूरच्या हाती भोपळा लागला आहे.

Monday, March 05, 2018

वळणमार्गाच्या मागणीसाठी जोरगेवार यांच्या समवेत अनेक संघटनांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

वळणमार्गाच्या मागणीसाठी जोरगेवार यांच्या समवेत अनेक संघटनांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

चंद्रपूर/प्रतिनिधी:
जटपुरा गेटवर होत असलेल्या सततच्या वाहतुक कोंडीमूळे जिल्ह्यातील तसेच शहरातील जनता त्रस्त झाली आहे. चंद्रपूरातील मूख्य समस्यांपैकी एक समस्या असलेल्या जटपुरागेटच्या वाहतूक कोंडीमुळे चंद्रपूरकरांना या मार्गावरुन वाहणे चालवीतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याच मार्गावर (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय) जिल्हासामान्य रुग्णालय तसेच ईतर खाजगी रुग्णालये असल्याने रुग्णवाहीकांनाही या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करत प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या वाहतूक कोंडीमुळे रुग्णांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे. ही समस्या सोडविण्या एवजी आता येथे नवीनच सौदर्यीकरन करण्याचे नियोजन करून काम सुरु करण्यात आले आहे. या कामासाठी २.५० कोटीहून अधिकचा निधी खर्च करण्यात येणार असून जटपूरा गेटवर थिम लायटींक लावण्यात येणार आहे. मात्र या सौंदर्यीकरणामुळे येथील वाहतुकीचा प्रश्न सुटणार नाही तर अधिक जटीत होणार आहे.
म्हणून या विषयाचे गांभीर्य लक्षात घेत जटपुरा गेटवर होत असलेली वाहतूक कोंडी कशी कमी करता येईल यासंदर्भात जिल्ह्यतील अनेक संघटनांना जोरगेवार यांनी एकत्रित करून आज जिल्हाधिकारी यांना निवेदनासह आराखडा देण्यात आले. यात संपूर्ण सामाजिक संघटनांनी या आराखड्याप्रमाणे फक्त १ महिन्यासाठी प्रायोजिक तत्वावर वळण मार्ग करण्यात यावे असे जिल्हाधिकारी यांना सांगण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी शिष्टमंडळाची दाखल घेत चार लोकांची समिती गठीत केली त्यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, पोलीस निरीक्षक संपत चव्हाण, शहर अभियंता मनपा तसेच उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.१ यांची समिती गाठीत करण्यात आली असे यावेळी सांगण्यात आले व येत्या २ दिवसात या विषयावर तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विजय चंदावार, सिटीजन फारम चे अध्यक्ष रमणिक चव्हाण, सदानंद खत्री, जिल्हा बार असोसिएशन चे अध्यक्ष अँड.रमेश टिपले, जे.सी.आय. चे अध्यक्ष प्रशांत जाजू, ऑटो संघटनेचे अध्यक्ष बळीराम शिंदे, पतंजली सेवा समितीचे अध्यक्ष अनिल दिकोंडवार, विध्यार्थी व बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष विशाल साव, दीपक दापके, अजय जैस्वाल, दिलीप कपूर, दीपक पद्म्गीरीवार, विनोद अनंतवार, विनोद गोल्लजवार यांच्यासह अनेक संघटनाचे कार्यकर्ते पाधाधीकारी व सामजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

Sunday, February 25, 2018

जटपुरा गेटच्या समस्सेसाठी जोरगेवारांचे आज धरणे आंदोलन

जटपुरा गेटच्या समस्सेसाठी जोरगेवारांचे आज धरणे आंदोलन

जटपूरा गेटची वाहतुक कोंडीची समस्या मार्गी काढा नंतर सौंदर्यीकरण करा
चंद्रपूर/ललित लांजेवार:
 जटपुरा गेटवर होत असलेल्या सततच्या वाहतुक कोंडीमूळे जनता त्रस्त असली तरी येथील लोकप्रतिनीधींना गेटच्या सौंदर्यीकरणाचे वेड लागले आहे. त्यामूळे जनतेमध्ये रोष असून या विरोधातशिवसेना नेते किशोर जोरगेवार यांच्या वतीने उद्या सोमवारी जटपूरा गेट येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

चंद्रपूरातील मूख्य समस्यांपैकी एक समस्या असलेल्या जटपुरागेटच्या वाहतूक कोंडीमुळे चंद्रपूरकरांना या मार्गावरुन वाहणे चालवीतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याच मार्गावर (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय) जिल्हासामान्य रुग्णालय तसेच ईतर खाजगी रुग्णालये असल्याने रुग्णवाहीकांनाही या वाहतूक कोंडीचा फटका जाणवत आहे. परिनामी या वाहतूक कोंडीमुळे रुग्णांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे. तसेच या ठिकाणी तासंनतास वाहणांना रेंगाळत कासवगतीने चालावे लागत असल्याने अतिरिक्त इंधन खर्च होत असून प्रदुषणाचा प्रश्नही निर्माण झाला आहे. असे असतांनाही या प्रश्नाकडे शासन-प्रशासनाचे जानीवपुर्ण दुर्लक्ष होत आहे. ही समस्या सोडविण्या एवजी आता येथे सौदर्यीकरन करण्याचे नियोजन शुन्य वेळ सत्ताधा-यांना लागले आहे. त्यासाठी २.५० कोटीहून अधिकचा निधी खर्च करण्यात येणार असून जटपूरा गेटवर थिम लायटींक लावण्यात येणार आहे.
मात्र या सौंदर्यीकरणामुळे येथील वाहतुकीचा प्रश्न सुटणार आहे का? असा प्रश्न किशोर जोरगेवार यांनी उपस्थित केला असून पहिले वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवा अशी मागणी करत या सौदर्यीकरणाला विरोध करत उदया सोमवारी जटपूरा गेट येथे धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे आंदोलन किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात सोमवारी दुपारी २ वाजता  होणार असून या आंदोलनाला शिवसैनिकांनी तसेच जनतेनी मोठयात-मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना चंद्रपूर शहराच्या वतीने करण्यात आले आहे.

Tuesday, February 13, 2018

महाशिवरात्री निमित्य शिवसेने तर्फे शिरा वाटप;भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

महाशिवरात्री निमित्य शिवसेने तर्फे शिरा वाटप;भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

चंद्रपूर/प्रतिनिधी:
दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा महाशिवरात्री निमित्य शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात शिवसेना चंद्रपूर विधानसभेच्या वतीने शहरातील प्रसिद्ध असलेले प्राचीन अंचलेश्वर मंदिर येथे महादेवाच्या दर्शनाकरिता येणा-या हजारो भाविकांसाठी आज शिरा वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 या महाप्रसादाला हजारो भक्तांनी शिरा प्रसाद म्हणून ग्रहण केला. यावेळी शिक्षक सेना जिल्हा अध्यक्ष राजेश नायडू, नगरसेवक विशाल निंबाळकर, उपजिल्हा प्रमुख माया पटले, संतोषी  चव्हाण, वंदना हातगांवकर, दुर्गा वैरागडे, किशोर बोल्लमवार, दिलीप बेंडले, विनोद अनंतवार, विनोद गोल्लजवार, लक्ष्मण टोकला, रुपेश पांडे, गौरव जोरगेवार, मोहित मोदी अक्षय कोटावार यांची उपस्थिती होती.
             महाशिवरात्रीला हजारो भाविक आजच्या दिवशी उपवास पाळतात उपाश्या पोटी महादेवाचे दर्शनाकरिता शहरातील अनेक मंदिरात जाऊन शिवलिंगाचे दर्शन घेतात. हि बाब लक्षात घेता आज शिवसेना चंद्रपूर विधानसभेच्या वतीने शहरातील प्राचीन प्रसिद्ध असलेले अंचलेश्वर गेट येथील शिवमंदिरात शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या  भाविकांनी या शिरा महाप्रसादाचा लाभ घेतला या प्रसंगी कार्यकर्ता, शिवसैनिक यांची  मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



Thursday, December 21, 2017

सत्ताधाऱ्यांचे बॅनर का हटवत नाही : जोरगेवार

सत्ताधाऱ्यांचे बॅनर का हटवत नाही : जोरगेवार

KISHOR JORGEWAR साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी: 
 तेली समाजाच्या बॅनर मनपाने काढल्याच्या वादात आता  शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख किशोर जोरगेवार यांनी उडी घेतली आहे.  तेली समाजाचे आराध्य  दैवत संत श्री शिरोमणी जगनाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरात विविध  ठिकाणी बॅनर लावण्याची परवानगी   तेली समाजातर्फे मागण्यात आली होती. शहराचे विद्रूपिकरण होते, असे कारण देत बॅनर लावण्यास मनपाने नकार दिला होता. त्यानंतरही लावलेले बॅनर मनपाने काढले. मात्र सत्ताधारी राजकीय पक्षाचे बॅनर शहरात ठिकठिकाणी लावले जात आहेत. हे मनपातील अतिकर्तव्यदक्ष अधिकारी आणि पदाधिकाऱ्याना दिसत नाही का? बॅनर लावण्यासाठी रितसर परवानगी मागुनही ती नाकारली. मात्र सत्ताधाऱ्यांचे बॅनर्स लावले जातात. यामुळे शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडत आहे का? असा प्रश्न करीत शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख किशोर जोरगेवार यांनी मनपाच्या धोरणाचा निषेध केला आहे.