काव्यशिल्प Digital Media: चिमूर

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label चिमूर. Show all posts
Showing posts with label चिमूर. Show all posts

Monday, January 14, 2019

 दुर्बलांच्या हितासाठी टायगर ग्रुपची चिमुरात स्थापना

दुर्बलांच्या हितासाठी टायगर ग्रुपची चिमुरात स्थापना

रोहित रामटेके/चिमूर:

  तालुक्यामध्ये अनेक लहान मोठ्या संघटना कार्यरत आहेत, कोनत्या संघटना शासकीय तर कोणत्या खाजगी स्वरूपात अनेक संघटना दिसतात. कोणत्या संघटना शेतकऱ्यांच्या हिताच्या आहेत कोणत्या संघटना कामगारांच्या अशा अनेक आहेत. पण चिमुरात टायगर ग्रुप अशा नावाने तरुण तडपदार युवकांची संघटना स्थापन करण्यात आले आहे.
 यामध्ये विशाल बारापात्रे,पियुष गोपाले, शुभम बाळचने, शुभम पसारकार,अंकित गरमळे,आयुष बांगडे,प्रणय मेश्राम,रोहन नंन्नावरे,हिमांशू झालवडे,अक्षय शेंडे,अंकित वाडई,ओमकार पांडे,लखनभाऊ चटपकार, अजय केशकर, पवन डोंगरावर,आदित्य कडू,अभिषेक कोलपलवार,अजय ढगे, मिथुन शेषकर या सर्व सदस्यांचा समावेश या संघटनेत आहे. या संघटनेचे कार्य हे वंचित, दुर्बल आणि अडलेल्या अनेक गरीब जनतेसाठी, शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी या संगटनेची स्थापना आज हुतात्मा स्मारक चिमूर येथे अनेक मान्यवरांच्या हस्ते या टायगर ग्रुप चे उदघाटन करण्यात आले.
 त्यामध्ये मान्यवर मा. श्री.अनिल जाधव शेगाव,मा.श्री.मनोज एगलवार सिंदेवाही,मा.श्री.विलास राठोड बल्लारशा, मा.श्री.सलीम पठाण गुजगव्हान, मा.श्री.तुषार येरमे वरोरा,मा.शुभम समुद चंद्रपूर,मा.श्री.नितीनभाऊ कटारे जिल्हाध्यक्ष हिंदू क्रांती सेना. आदी मान्यवर उपस्थित होते.

Sunday, December 30, 2018

दत्त जयंती व हनुमान जयंती निमित्त गोपालकाल्याचे आयोजन

दत्त जयंती व हनुमान जयंती निमित्त गोपालकाल्याचे आयोजन

चिमूर/रोहित रामटेके:

चिमूर तालुक्यातील कोटगाव येथे दोन दिवसीय दत्त जयंती व हनुमान जयंती निमित्त गोपालकाल्याचे आयोजन श्री गुरुदेव भजन मंडळ कोटगाव व नामदेव महाराज महिला भजन मंडळ कोटगाव यांच्या तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला गावातील लोकांचे सहकार्य व नवयुवक तरुणाचे सहकार्य मोलाचे लागले.
दत्त जयंती व हनुमान जयंतीच्या कार्यक्रम दोन दिवसीय कार्यक्रमाची सांगता २७ डिसेंबर ला झाली. यामध्ये २६ डिसेंबर ला घटस्थापना ह.भ.प. श्रीराम कापसे महाराज व ह.भ.प. खेमराज कापसे महाराज याच्या हस्ते करण्यात आली. कार्यक्रमाला आजूबाजूच्या गावा खेड्यातून महिलांचे तसेच पुरुषाचे भजन मंडळांना आमंत्रित करून २६ डिसेंबर ला रात्रभर जागृती करण्यात आली. २७ डिसेंबर ला सकाळी गावातून रामधून काढून व नंतर हनुमान देवस्थान कोटगाव (हेटी) या देवस्थानामध्ये गेली. ह. भ.प.शरद महाराज वैद्य कीर्तनकार याचे कीर्तनाच्या माध्यमातून कीर्तन करून गोपालकल्याचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाला उपस्थित चंद्रपुर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा कांग्रेस गटनेता मा.सतीशभाऊ वारजूकर तसेच प्रमुख पाहुणे चिमूर पंचायत समितीच्या सदस्या सौ भावनाताई बावणकर, चिमूर नगर परिषदचे नगरसेवक विनोद ढाकुणकर,चिमूर पंचायत समितीचे माजी सदस्य राजुभाऊ कापसे आदी उपस्थित होते.

Tuesday, December 11, 2018

 धक्कादायक;डॉक्टरावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

धक्कादायक;डॉक्टरावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

नागपूर/ललित लांजेवार:
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालूक्यातील भिसी येथील डॉ . रामेश्वर भलमे यांचेवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला. यामुळे परिसरात खळबळ माजली असून सध्या हे डाॅक्टर फरार असल्याचे समजते आहे.                 



डाॅ. भलमे यांचे मुलीच्या मैत्रीणीवर वाईट नजर होती.  गेल्या दिड दोन वर्षोपासून तिच्यावर सतत लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार डॉक्टर भलमे कडून घडला, सदर प्रकरणाची कुठे माहीती अथवा कुणाजवळ या प्रकरणाची वाच्यता केल्यास तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याने भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत दि. १० डिसेंबर  रोज सोमवारला रात्रौ गून्हा दाखल करण्यात आला .                  
प्राप्त माहीतीनुसार पिडीत मुलगी डॉ. रामेश्वर भलमे यांच्या मुलीसोबत नागपूरला शिक्षण घेत होती. त्यामूळे कधी-कधी ती भिसीला घरी सूद्धा यायची या संधीचा फायदा घेत डॉ. भलमे यांनी तिच्याशी जवळीक वाढविली, या संधीचा फायदा घेत गेल्या एक दिड वर्षापासून सतत तिच्यावर लैंगिक  अत्याचार करीत होता. सदर प्रकरणाची कुठे वाच्यता केल्यास तीला मारून टाकण्याची धमकी सुद्धा दिली. वाढत्या जाचाला कंटाळून पिडीत मुलीने भिसी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. त्यानूसार ठाणेदार एम .बी. काळे तपासी अधिकारी यांनी कलम ३७६, ५०६ नूसार गुन्हा दाखल केला आहे . सद्यस्थितीत आरोपी फरार असल्याची माहीती ठाणेदार यांनी  दिली .

Friday, December 07, 2018

चिमुर येथे नोकरी संदर्भात मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

चिमुर येथे नोकरी संदर्भात मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

चिमूर/रोहित रामटेके:
चिमूर क्रांतिभुमी मधील विद्यार्थ्यांसाठी आणि बेरोजगार युवकांसाठी आज हुतात्मा स्मारक येथे नोकरी शोधनाऱ्यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन प्रगती फाउंडेशन तर्फे करण्यात आले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्या पर्यंत नोकरीच्या संधी पोहचत नाहीत, व ग्रामीण भागात राहणाऱ्या बेरोजगारांना मुलाखत कोणत्या पद्धतीने घेतात त्या बद्दल मार्गदर्शन करण्यासाठी मा.श्री.राहुल हरडे सर मुख्य मार्गदर्शक होते.या मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून अनेक बेरीजगारांना मुलाखत कोणत्या पद्धतीने घेतात याचे थेट प्रक्षेपण करून दाखवले.
        कार्यक्रमाचे मुख्य आयोजक प्रगती फाऊंडेशन च्या संथापक हिमानी वारजूकर यांनी सम्पूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले.
सतिशभाऊ वारजूकर यांचे कडून आजार ग्रस्थाला मदतीचा हात

सतिशभाऊ वारजूकर यांचे कडून आजार ग्रस्थाला मदतीचा हात

चिमूर/रोहित रामटेके:

          चिमूर चंद्रपूर जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा गटनेता सतिशभाऊ वारजूकर हे नेहमी सर्व सामन्यांमध्ये राहणारे , सर्वसामान्याचे समस्या नेहमी जाणून घेत असतात त्यांना कुणीही हाक दिली की तात्काळ दखल  घेत ते नेहमी जनसामान्यांच्या मदतीला धावत असतात,  आणि अशातच त्यांनी  चिमुर तालुक्यातील हेटी (बोडधा) येथील  रहिवाशी मिनाक्षी अमोल धापर्डे ह्या आजाराने ग्रस्त आहेत ,त्यांची परस्थिती हालाकीची असल्यामुळे उपचार करणे शक्य नव्हते,त्यांनी आपली समस्या घेऊन लोकनेते मा.डॉ.सतिशभाऊ वारजूकर यांच्या कडे धाव घेतली व आपली समस्या सांगितली सतिशभाऊनी त्यांची समस्येचे गांभीर्याने लक्ष वेधून त्यांना पुढचे उपचार कसे करायचे याच नियोजन करून दिले बलदेव खिरटकर यांच्या हस्ते आर्थिक मदत केली त्या वेळी,विलास एलशेट्टीवार, विक्की मानकर उपस्थित होते,

Thursday, December 06, 2018

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली

चिमूर/ रोहित रामटेके:

भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनव निमित्त अभिवादन कार्यक्रमात भाजप तालुका अध्यक्ष डॉ दिलीप शीवरकर  ,महिला तालुका अध्यक्ष गीता लिंगायत ,भाजप शहर अध्यक्ष सचिन फरकाडे ,नप गट नेते छाया कनचलवार , आशा मेश्राम ,जयंत गौरकर विनोद अढाल , नगरसेवक संजय खाटीक ,विकी कोरेकर , सूरज नरुले ,सुभाष बैंलनवार , समद बाबू,सुधीर राऊत , डाहुले ,झिरे संजय कुंभारे  प्रिया जयकर मनीषा कावरे आदी उपस्थित होते.
 यावेळी डॉ दिलीप शिवरकर म्हणाले की  भारत रत्न डॉ बाबा साहेब आंबेडकर यांनी संपूर्ण जगाला मानवतेचा संदेश दिला असून देशाला सर्वांगीण विकासासाठी घटना निर्माण केली भाजप च्या शासन काळात दिलेल्या घटनेचे विश्लेषण करून गोर गरीब जनतेच्या विकासासाठी  योजना आखल्या जात आहे आंबेडकरी जनतेचा ओघ भाजप वळत असून प्रवाहात सहभागी होण्याचे आवाहन केले संचालन जयंत गौरकर यांनी केले डॉ बाबासाहेब आंबेडकर अमर रहे च्या घोषणा देण्यात आल्या.

Saturday, December 01, 2018

राकाचे राजू मुरकुटे विविध समस्या घेऊन पोहचले  मंत्रालयात

राकाचे राजू मुरकुटे विविध समस्या घेऊन पोहचले मंत्रालयात

चिमूर/रोहित रामटेके:

चिमुर तालुक्यातील वन विभाग ,सामाजिक वनीकरण, राजनांदगाव वरोरा टॉवर ने शेतकऱ्यांवर केले अन्याय,रोजगार सेवक ना रुजू न करणे , एम आर इ जी एस ,या  गंभीर प्रश्न घेऊन न्याय मिळविण्यासाठी राष्ट्रवादी कांग्रेस जिल्हा उपाध्यक्ष राजू मुरकुटे यांनी अखेर मुंबई मंत्रालयात धाव घेऊन संबंधित मंत्री महोदयां ना व विरोधी पक्ष नेते धनंजय मुडे यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली
    एफडीसीएम खडसगी कार्यालय अंतर्गत कक्ष क्रमांक २५ उरकुडपार क्षेत्र २५ हेकटर कक्ष  क्रमांक १२६ गदगाव क्षेत्र २० हेकटर वृक्ष लागवडी करीता सन २०१८ मध्ये राखीव ठेवला असता शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड करण्याच्या ध्येय धोरण असताना सदर कक्षात काही हेकटर मध्ये खड्डे न खोदता वृक्ष लागवड केली नाही तेव्हा शासनाच्या परिपत्रकाची पुरेपूर अमलबजावणी झालेली नसल्याचे लक्ष्यात येत आहे यावरून या गैरप्रकाराची चौकशी करून कारवाई करण्यासाठी वन मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांना दिले आहे .
     तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून राजनांद गाव वरोरा टॉवर लाईन चे काम झालेले असताना त्या तथाकथित शेतकऱ्यांना शासकीय परिपत्रकानुसार मोबदला मिळाला नाही तसेच उभ्या पिकात पोलीस संरक्षण घेऊन काम सुरू केले परंतु मोबदला दिला नाही यासाठी महसूल मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांना निवेदन दिले आहे .
  चिमूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या कळमगाव येथील गणेश चौधरी हा रोजगार सेवक असून पस प्रशासने पत्र देऊन कामावरून काढले होते ग्रामीण विभाग चंद्रपूर यांनी सदर रोजगरसेवकास रुजू होण्याचे पत्र दिले असताना ही जिल्हाधिकारी कार्यलयात मात्र फाईल धूळखात पडली आहे न्याय मिळण्यात यावा यासाठी ग्रामीण मंत्री पंकजाताई मुंडें यांना निवेदन दिले आहे .
अश्या प्रकारे चिमूर तालुक्यातील समस्या सोडवण्यासाठी  राका जिल्हा उपाध्यक्ष राजू मुरकुटे यांनी मुबंई मंत्रालयात धाव घेऊन मंत्री महोदयांना निवेदन दिले तसेच विधान परिषद चे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांना निवेदन देऊन मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून न्याय मिळविण्यासाठी निवेदन दिले
  निवेदन देत असताना राका जिल्हा उपाध्यक्ष राजू मुरकुटे,किशोर कुंभारे,कालिदास पाल ,प्रफुल चन्ने,  एकनाथ बांगडे आदी उपस्थित होते.
चिमूर येथे श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव

चिमूर येथे श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव

चिमूर/रोहित रामटेके:

नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत नगाजी महाराज यांचा जन्म कार्तिक शुद्ध ५,शके १६७६ ला झाला, त्यांनी अश्विन वद्य २,शके १७६६ ला पारडी येथे समाधी घेतली, त्या प्रित्यर्थ महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव श्री संत नगाजी महाराज सामाजिक सेवा समिती, चिमूर चे वतीने मागील दोन दशकापासून अविरत सुरू आहे, याही वर्षी २१ वे वर्ष असून रविवार दि २ ते मंगळवार दि ४ डिसेंम्बर २०१८ ला श्री संत नगाजी महाराज मंदिर (पावसी आंबा)चिमूर येथे विविध कार्यक्रमाने संपन्न होत आहे .
         दरम्यान दिवाकर पुंड यांचे हस्ते 'श्री'ची घटस्थापना तसेच हभप धर्माजी बारसागडे महाराज, नीलकंठ जमदाडे महाराज पिंपळनेरी,चन्ने महाराज, पांडुरंग जुनारकर महाराज घुग्गुस, यांचे कीर्तन ,महाराजांची शोभायात्रा, महिलांची रांगोळी स्पर्धा, तसेच समाजातील वैचारिक मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे, या होणाऱ्या कार्यक्रमास नाभिक समाजातील सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आव्हान समितीचे अध्यक्ष देवेंद्र कडवे, सचिव अरुण चिंचुलकर तथा समस्त सदस्य गणांनी केली आहे .

Monday, November 26, 2018

  इंदिरा नगर वासियांना मालकी हक्काचे पट्टे द्या-सुरेश डांगे

इंदिरा नगर वासियांना मालकी हक्काचे पट्टे द्या-सुरेश डांगे

चिमूर/रोहित रामटेके:
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या इंदिरा नगर या लोकवस्ती ला मालकी हक्काचे पट्टे देण्यात यावे , अशी मागणी कस्टकरी जन आंदोलन चे प्रमुख संयोजक सुरेश डांगे यांनी केली आहे, सुरेश डांगे या बाबतीत म्हणाले, गेल्या चाळीस वर्षांपासून एकसे पन्नास कुटुंब आपली घरे बांधून राहत आहेत, यात शेतकरी, शेतमजूर, रिक्षा चालक,विधवा महिला ,राहत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मालकी हक्कांचे पट्टे देण्यात यावे या मागणी करिता निवेदन, धरणें आंदोलन, मोर्चे करण्यात आले , हाती काहीच मिळाले नाही, प्रत्येक निवडणूक काळात राजकीय नेते यांचेकडून खोटे आस्वानाशिवाय काहीच मिळालें नाही, तत्कालीन ग्राम पंचायत व विदमान नगर परिषद भोगवटा कर लावला, या ठिकाणी रस्ता, नाल्या, वौयकीक शौचालय दिले, इंदिरा नगर येथील नागरिकांना महसूल विभागाने अतिक्रमण बाबतीत दंड आकारला, तो दंड जनतेनी जमा करून पावत्या घेतल्या आहेत, चिंमूर पटवारी हलका क्रमांक सहा मधील खसरा नंबर एकसे त्रेचाळीस मध्ये 1.61(चार एकर) मध्ये ही वस्तीत 150 चे वर कुटुंब राहतात, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी पट्टे देण्यात यावे,अन्यता भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा कायदा व महात्मा गांधी यांची अहिंसा या मार्गाने आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती सुरेश डांगे यांनी दिली.

Tuesday, July 03, 2018

आमदार भांगडिया यांना रेती तस्कराची ट्रकने उडविण्याची धमकी

आमदार भांगडिया यांना रेती तस्कराची ट्रकने उडविण्याची धमकी

 नागपूर - रेती तस्कराने चिमुरात महसूल कर्मचाऱ्यास पेटविण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त ताजे असतानाच चिमूर तालुक्यातील भिसी येथील रेती माफियाने चक्क आमदारांनाच ट्रकने उडवून टाकण्याची धमकी दिली असल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. चिमूरचे आमदार बंटी उर्फ कीर्तिकुमार भांगडिया यांनाच ही जीवे मारण्याची धमकी रेती माफियाने दिली आहे.
 चिमूर विधानसभा मतदारसंघाचे तरुण तडफदार आमदार बंटी उर्फ कीर्तिकुमार भांगडिया यांनी  निवडून आल्यावर आपल्या मतदारसंघात विकासकामांचा धडाका सुरू केला आणि यासोबतच अवैध धंदेवाईकांविरुद्ध एल्गार पुकारला. आमदार भांगडिया आपल्या मतदारसंघात जनसंपर्क दौऱ्यावर असताना ११ व १२  मेच्या मध्यरात्री त्यांना कानपा ता. नागभीड येथे अवैध खनन करीत रेतीची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली.
शासनाच्या महसुलाची चोरी थांबविण्याच्या दृष्टीने त्यांनी चंद्रपूर व भंडारा जिल्हा पोलिस अधीक्षकांना तत्काळ दुरध्वनीवरून सुचना दिली. चंद्रपूर पोलिस अधिक्षकांनीही  लगेच दखल घेत ब्रम्हपुरीचे पोलिस उपअधिक्षक परदेशी यांना  कारवाईच्या सुचना केल्या. त्यांनी कारवाई करीत तेव्हाच १५ ते २० ट्रकसह अवैध खणलेली रेती मुद्देमाल जप्त केला. या घटनेनंतर हा संदर्भ देत रेती कंत्राटदार धनराज मुंगले (रा. भिसी) यांनी आमदार भांगडिया यांचे सहकारी मुंतझीर लखानी (ब्रम्हपुरी) यांच्याकडे ‘आमदारांनी रेती तस्कराच्या तक्रारी करू नये, त्यांचे चिमूर-नागपूर जाणे-येणे असते त्यांना रस्त्यातच ट्रकने उडवून टाकू’ असे सांगून आमदारांना समजाविण्याचा सल्ला दिला.
मुंगले एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी रविवारी १ जुलै रोजी लोकशाही वार्ताचे संपादक भास्कर लोंढे यांना भेटल्यावर पुनश्च तीच धमकी दिली व आमदारांना समजाविण्याचा सल्ला दिला.
धनराज मुंगले यांनी रेतीचे अवैध खनन केल्याने मार्च  २०१८ मध्येही चंद्रपूर जिल्हाधिकाºयांनी कारवाई करून त्यांची पोकलँड मशिन जप्त केली होती. मुंगले यांचा रेतीच्या तस्करीत हात असल्यामुळेच त्यांनी माझ्या सहकाºयांमार्फत धमक्या दिल्या असून यामुळे माझ्या जीवीताला धोका निर्माण झाल्याची तक्रार आमदार बंटी भांगडिया यांनी आज २ जुलैला चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. तसेच या गंभीर प्रकाराची माहिती महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही कळविली आहे.
राज्य विधानसभेचे पावसाळी अधिवेशन ४ जुलैपासून नागपुरात होत असून या पार्श्वभूमीवर या प्रकरणी शासन काय पावले उचलते, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Sunday, July 01, 2018

चिमूर नपला मिळाले चार अधिकारी

चिमूर नपला मिळाले चार अधिकारी

  • नगर परिषदच्या सत्ता बदलानंतर यश 


 चिमूर/प्रतिनिधी
          चिमूर नगर परिषद च्या  स्थापनेला अडीच वर्षाच्या कार्यकाळात भाजप ची सर्वच स्तरावर सत्ता असताना सुद्धा कायमस्वरूपी ,अनुभवी अधिकारी पद स्थापना रिक्त होती त्यामुळे कामे होण्यास दिरंगाई होत होती परंतु अडीच वर्षाच्या सत्ता बदला नंतर कांग्रेस ची सत्ता आल्यावर वरीष्ठ प्रशासकीय स्तरावरून प्रयत्न पत्र व्यवहार करून अखेर चार अधिकारी शासना ने पद स्थापणेवरून भरली आहे
      चिमूर नगर परिषद ची सत्ता भाजप च्या काळात असताना अनेक पद स्थापणेची पदे रिक्त होती परंतु ढिसाळ शासन कार्यकाळ असल्याने पदे भरण्यात किवा शासना कडून रिक्त पदे भरण्यास असफल झाले त्या मुळे शासकीय योजना हया नगर परिषद मार्फत न होता सार्वजनिक बांधकाम विभाग कडून होत होत्या  अडीच वर्षांनंतर सत्ता परिवर्तन होऊन कांग्रेस ची सत्ता चिमूर नगर परिषद वर येताच एका महिन्याच्या कार्यकाळात पत्रव्यवहार करून शासन प्रशासन ने दखल घेत अखेर चार अधिकारी आले त्यात लेखा परीक्षक,संगणक अभियंता विद्युत अभियंता व आरोग्य विभाग चे अधिकारी पदे भरण्यात आले आहे
 कांग्रेसचे    जिप गट नेते डॉ सतीश वारजूकर याचे मार्गदर्शनात व नगराध्यक्ष गोपाल झाडे यांचे नेतृत्वात नगर परिषद मधील इतर शिल्लल्क अधिकारी  आणण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे सांगत चिमूर चा सर्वांगीण विकास हेच ध्येय असल्याचे नगरसेवक विनोद ढाकुंनकर यांनी सांगितले

Wednesday, June 27, 2018

चिमूरच्या नगराधक्षांच्याच प्रभागात पाण्याची भिषण टंचाई

चिमूरच्या नगराधक्षांच्याच प्रभागात पाण्याची भिषण टंचाई

नगर परिषद चिमूर यांचे दुर्लक्ष नगर परिषदेवर महिलांचा धड़क मोर्चा
चिमूर/ तालुका प्रतिनिधी:
चिमूर नगर परिषद मध्ये येत असलेल्या नवीन वस्ती पिंपळनेरी प्रभाग क्रमांक २ मध्ये गेल्या ६ वर्षे पासून पिण्याच्या पाण्याचा नाहक त्रास जनतेला होत असून या संबंधित कित्येक वेळा नगर सेवकाशी तोंडी तक्रारी केल्या व नगर परिषद येथे लेखी तक्रारी महिला पुरुष यांच्या स्वाक्षरी दिल्या गेल्या असून या पाण्याच्या समस्या अजून पर्यत सोडविण्याचा प्रयत्न नगर परिषद करीत नसून याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे महिन्यातून एकदा टँकर येत असून समस्त नागरिकांना पाण्याचा पुरवठा होत नाही व या ठिकाणी असलेली सार्वजनिक विहीर हि जुन्या काळातील असून ती ५ वर्षयागोदार खसली असून या विहिरीतील गाळ उपसून पक्या दर्जाचे काम करून देण्यात यावे याकरिता अगोदर ग्रामपंचायत मध्ये अनेक तक्रारी व ग्रामसभेत चर्चा करण्यात आल्या परंतु सरपंच व सचिव यांनी कुठलाही तोडगा या विषयावर काढला नसून मागील अडीच वर्षे पासून पिंपळनेरी हे गाव नगर परिषदेमध्ये समाविष्ट करण्यात आले असून या समस्सेकडे नगर सेवक व नगराध्यक्ष तसेच मुख्याधिकारी ,पाणी पुरवठा विभाग यांचे दुर्लक्ष होतांना दिसून आले असून या समस्या सोडविण्यात याव्यात याकरिता पिंपळनेरी प्रभाग क्रमांक . २ मधील ३० महिलांनी मिळून मुख्याधिकारी नगर परिषद कार्यालय चिमूर येथे पिण्याच्या पाण्याच्या समस्से विषयी निवेदन देण्यात आले .
    चिमूर नगर परिषद मध्ये कांग्रेस चे गोपाल झाडे हे नगराध्यक्ष असून त्यांच्या स्वतः च्या प्रभागात भीषण पाणी टंचाई असताना मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याने महिला वर्गात त्रीव संताप ची लाट पसरली आहे विशेष सत्तेतील एका नगरसेवक अब्दुल कदिर शेख यांनी नारू ची समस्या तसेच आठवडी बाजार ची व्यवस्था बाबत आवाज उठवून घरचा अहेर दिला होता नगराध्यक्ष गोपाल झाडे हे कोणती कारवाई करून समस्या सोडविते या कडे लक्ष लागले असून नगराध्यक्ष वर लक्ष ठेवून पाठी मागून कारभार करणारा तो नगरसेवक कोण याची सुद्धा चर्चा रंगत आहे.

चंद्रपुरात महसूल कर्मचाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न

चंद्रपुरात महसूल कर्मचाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न

चिमूर (जि. चंद्रपूर):
वाळूतस्करीत जप्त केलेले ट्रॅक्‍टर घेऊन येताना वाळूतस्कराने महसूल कर्मचारी आणि ट्रॅक्‍टरवर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, नायब तहसीलदार वेळेत पोहोचल्याने अनर्थ टळला. ही घटना येथील तहसील कार्यालयासमोर सोमवारी (ता. २५) रात्रीच्या सुमारास घडली.महसूल कर्मचाऱ्यांना वाळूची अवैध तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. नायब तहसीलदार श्रीधर राजमाने, चालक दत्तात्रय देवराव कडपे यांनी गांधी चौक गाठले. वाळूची तस्करी करणारे ट्रॅक्‍टर थांबविले. मात्र, ट्रॅक्‍टरचालक घटनास्थळावरून पळून गेला. महसूल कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून ट्रॅक्‍टर जप्तीची कारवाई केली. चालक देवराव कडपे जप्त केलेले ट्रॅक्‍टर तहसील कार्यालयात नेण्यासाठी निघाले. तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर वाळूतस्कर मनोज खुशाल नागपुरे आणि त्याच्या एका सहकाऱ्याने ट्रॅक्‍टर अडविले. सोबत आणलेले पेट्रोल ट्रॅक्‍टर आणि चालक कडपे यांच्यावर ओतले आणि आगीची काडी फेकली. मात्र, तेवढ्यात नायब तहसीलदार राजमाने आणि इतर महसूल कर्मचारी धावून आल्याने मोठा अनर्थ टळला.
चालक दत्तात्रय कडपे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून वाळूतस्कर मनोज नागपुरे आणि त्याच्या सहकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वृत्तलिहिस्तोवर वाळूतस्कराला अटक झाली नव्हती.

बिबट्याने दिली झोपलेल्या युवकाच्या कानाखाली

बिबट्याने दिली झोपलेल्या युवकाच्या कानाखाली

बिबट साठी इमेज परिणामचंद्रपूर/चिमूर:
 रामदेगी येथे झाडाशेजारी झोपलेल्या युवकाच्या कानशिलात बिबट्याने पंजा मारून जखमी केले. ही आज, मंगळवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास घडली. जखमी युवकाचे नाव पद्माकर नामदेव रामटेके आहे. रामदेगी हे पर्यटनस्थळ आहे. येथेच पद्माकरचे छोटेसे दुकान आहे. सोमवारी रात्री त्याला उशीर झाला. त्यामुळे त्याने दुकानाशेजारी असलेल्या झाडाच्या आडोशाचा आसरा घेत अंथरून टाकले. पहाटे चार वाजताच्या सुमारास बिबट्याने त्याच्या कानशिलात पंजा मारला. त्याने आरडाओरड केली. त्यामुळे आजूबाजूचे दुकानदार जागे झाले. त्यानंतर बिबट्याने तेथून पळ काढला. सकाळी जखमी पद्माकरला वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती केले आहे.

Tuesday, June 19, 2018

चिमूर-वरोरा मार्ग ठरत आहे धोकादायक

चिमूर-वरोरा मार्ग ठरत आहे धोकादायक

Chimur-Worora route dangerous | चिमूर-वरोरा मार्ग धोकादायकचिमूर/प्रतिनिधी:
 चिमूर- उमरेड ते चिमूर- वरोरा या मुख्य रस्त्याच्या चौपदरीकरणाचे बांधकाम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. यासाठी चिमूर- वरोरा मार्ग पूर्णत: खोदून ठेवण्यात आला. मात्र, पर्यायी रस्त्यावर माती टाकल्याने गिट्टी अस्ताव्यस्त झाली. या मार्गावरून वाहन चालविणे धोकादायक झाले आहे.
चिमूर विधानसभा क्षेत्र राष्ट्रीय महामार्गावर आले आहे. त्यामुळे चिमुरला जोडणाऱ्या उमरेड, वरोरा या राष्ट्रीय महामार्गाचे काम कंत्राटदाराकडून सुरू आहे. मात्र या रस्त्याचे काम सुरू असल्याने चिमूर वरोरा हा रस्ता खोदून ठेवला आहे. कंत्राटदाराने पर्यायी रस्ता तयार केला आहे. या पर्यायी रस्त्यावर माती व मुरूम टाकण्यात आले. अशातच पाऊस आल्याने या रस्त्यावर चिखल झाले. त्यावर उपाय म्हणून कंत्राटदाराने या रस्त्यावर गिट्टी टाकली आहे. मात्र त्यावर रोडरोलर फिरविला नाही. रस्त्यावरून वाहने जावून गिट्टी सर्वत्र विखुरली. वाहनधारकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे.
उमरेड- चिमूर व वरोरा मार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होण्यास आणखी बराच कालावधी लागणार आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहने धावतात. पण, रस्ता योग्य नसल्याने प्रचंड त्रास होत आहे. पावसाळ्यात अनेक अडचणी येणार असून मोठा अपघात होवू शकतो. त्यामुळे पर्यायी मार्ग मजबूत करण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने पुढाकार घ्यावा, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.
दुचाकी चालकांची कसरत रस्त्यावर माती व मुरूम टाकल्याने मोठ्या प्रमाणात घुळ पसरली आहे. त्यामुळे दुचाकीने प्रवास करताना वाहनधारकांचे हाल होतात. तोंडाला रूमाल नसल्यास चेहरा ओळखणे कठीण जाते. पाऊस आल्यानंतर चिखलात दुचाकी घसरते. दररोज या घटना घडत आहेत. मार्गावर गिट्टी टाकण्यात आली. पण ती धोेकादायक असल्याने दुचाकी कशी चालवायची, असा प्रश्न वाहनचालकांना अस्वस्थ करीत आहेत.
एकाच दिवशी तीन ट्रक उलटले.
चिमूर ते वरोरा मार्गावर जड वाहतुक सुरू असते. कोळसा, सिमेंट वाहतुक करणाºया वाहनांची संख्या सर्वाधिक आहे. रस्त्यावर माती टाकल्याने शेडगाव व बोथलीजवळ एकाच दिवशी तीन ट्रक उलटल्याची घटना घडली होती.

Wednesday, May 16, 2018

टॅन्करच्या पाण्याने भागवली जात आहे वन्य प्राण्यांची तहान

टॅन्करच्या पाण्याने भागवली जात आहे वन्य प्राण्यांची तहान

चिमुर/प्रतिनिधी: 
४७ अंशापेक्षा जास्त तापमान असेलल्या चंद्रपूर जिल्ह्यात बहुतांश जंगलाच्या परिसरातील पाणवठे आटले असल्याने टॅन्करच्या पाण्याने वन्य प्राण्यांची तहान भागवली जात असल्याचे चित्र समोर आले आहे, जिल्ह्यातील
चिमुर, शंकरपुर वन परिक्षेत्र व डोमा बिट अंतर्गत येत असलेल्या जंगलातील खोद तलावाचे संपुर्ण पाणी या वर्षीच्या उष्णतेने आटले आहे. त्यामुळे वन्य आपली ठाण भागविण्यासाठी आपला मोर्चा हा गावाकडे वळवीला आहे. या वन्य प्राण्यांकडून मानवी जीवास धोका निर्माण होवु नये व वन्य प्रान्यांची भटकंती होवु नये म्हणुन शंकरपुर येथील तरूण पर्यावरण मंडळाने पुढाकार घेवुन खोद तलावात टॅन्करने पाणीपुरवठा करण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे टॅन्करच्या पाण्याने वन्य प्राण्यांची तहान भागवली जात आहे,
          होत सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील डोमा बिटाला लागुनच असल्यामुळे वन्य प्राण्यांचा वावर सुरु आहे ,एप्रील, मे महीन्याच्या उष्णतेने मानवा बरोबरच वन्य प्राण्यांच्या अंगाची लाहीलाही होते. अशातच डोमा बिटातील जंगलातील पानवटे आटल्यामुळे  वन्य प्राण्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती ही बाब तरुण पर्यावरण मंडळ शंकरपुरच्या सदस्याच्या लक्षात आली त्यांनी उपवनसंरक्षक कुलराज सिह यांच्यासी चर्चा करून टॅन्करने खोद तलावात पाणी पुरवठा करन्याची परवानगी दिली.
           तरूण पर्यावरण मंडळ शंकरपुर व ब्रम्हपुरी वन विभाग यांच्या संयुक्त संकल्पनेतुन खोद तलावात टॅन्करने दररोज पाणी पुरविण्यात येणार आहे. मंगळवारपासुन तलावात पाणी टाकन्यास सुरवात झाली आहे त्यामुळे डोमा बिटा अंतर्गत येनाऱ्या परिसरातील वन्यप्रान्यांना दिलासा मिळनार असून आता टॅन्करच्या पाण्याने वन्यप्राणीची तहान भागनार आहे. त्यामुळे मानव जिवीतहानी व वन्य प्राण्यांची होणारी भटकंती आता थांबनार आहे.

 -----------------------------------------------------------------------
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
.Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 
कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo

Sunday, April 15, 2018

 चिमुरात २४ तास पाणी पुरवठा

चिमुरात २४ तास पाणी पुरवठा

24-hour water supply scheme for the Chimuras | चिमूरवासीयांसाठी २४ तास पाणी पुरवठा योजनाचिमूर/प्रतिनिधी:
 चिमूर नगरपालिका नवनिर्मित असून दोन-अडीच वर्षाच्या काळात वेगवेगळ्या योजना व विविध माध्यमातून मिळालेल्या विकास निधीतून शहराचा विकास सुरू आहे. येथे २४ तास पाणी पुरवठ्याची योजना मंजूर झाली आहे. लवकरच ही योजना कार्यान्वीत होणार आहे. एटीएम थंड वाटर फिल्टर मशीनच्या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहील. या योजनेचा प्रत्येकानी लाभ घ्यावा, असे आवाहन आ. कीर्तीकुमार भांगडिया यांनी केले.
चिमूर येथे संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार यांच्या ७०१ व्या पुण्यतिथी निमित्त येथील कुंभार मोहल्ल्यात आयोजित पुण्यतिथी महोत्सवादरम्यान एटीएम वॉटर फिल्टर मशीनचे लोकार्पण व सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन आमदार कीर्तीकुमार भांगडीया यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजपचे जेष्ठ नेते वसंत वारजूकर, भाजप तालुकाध्यक्ष डॉ. दिलीप शिवरकर, महामंत्री विनोद अढाल, स्थायी समिती सभापती छाया कंचलवार, बकाराम मालोदे, बंडू जावळेकर, नारायण चौधरी, प्रफुल्ल कोलते, रमेश कनचलवार, कैलास धनोरे, समीर राचलवार, संजय कुंभारे, मनीस नाईक, शरद गिरडे, गोलू भरडकर, एकनाथ थुटे आदी उपस्थित होते. शासनाने कुंभार समाजासाठी मातीकला बोर्डाची घोषणा केली, त्याबद्दल आ. कीर्तीकुमार भांगडीया यांचा कुंभार युवा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. संचालन व आभार गणपत खोबरे यांनी केले.

Wednesday, March 07, 2018

ग्रामगीता महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र

ग्रामगीता महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र

चिमुर तालुका प्रतिनीधी:
        मॉर्डन परस्पेक्टीव्ह ऑफ लाईफ या विषयावर ग्रामगीता महाविद्यालय चिमुर राष्ट्रपिता महात्मा गांधी कला विज्ञान महाविद्यालय नागभीड, मोहनसिनभाई जव्हेरी कलावाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वडसा यांच्या संयुक्त विद्यमाने व महाराष्ट वन विभाग बिरबल सावीत्री सहानी फाँडेशन लखनौ यांच्या सहकार्याने दोन दिवसीय चर्चासत्राचे आयोजन दिनांक ९ व १० मार्च ला करन्यात आले आहे.
         जिवन विज्ञानाच्या आधुनिक दृष्ट्रीक्षेपावर प्रकाश टाकणाऱ्या या चर्चासत्रासाठी मुख्य अतिथी म्हणुन सेमाना विद्या व वन प्रशिक्षण मंडळगडचिरोली चे माजी राज्यमंत्री व आम.ब्रम्हपुरी विधान सभा क्षेत्र चे विजय वडेट्टीवार, किशोर वनमाळी अध्यक्ष मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळ आरमोरी, जैनुद्धीन जव्हेरी बल्लारपुर सेवा समिती बल्लारपुर डॉ.एन एस कोकोडे,अधीष्ठाता विज्ञान विभाग गोंडवाणा विद्यापीठ गडचिरोली हे कार्यक्रमाला उपस्थित राहनार असून कुलसचिव डॉ.एन व्ही कल्याणकर यांच्या हस्ते सदर परिसंवादाचे उद्घाटन होनार आहे यावेळी मानद पाहूने म्हणुन आयएआरआय नवी दिल्ली चे प्रा. सि डी माई, चंद्रपुर मुख्य वन संरक्षक डॉ व्हि एस शेळके पर्यावरण मंत्रालय भारत सरकार चे आरइसी सदस्य डॉ सुरेश चोपणे उपस्थीत राहणार आहेत.
        तोडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कुशीत वसलेल्या चिमुर तालुक्यातील बहुतेक गावांना निर्सगाचा वारसा लाभ लेला आहे. त्याअनूसंघाने तालुक्यातील संशोधन करनाऱ्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना लाभ मिळावा या उदात्त हेतुने चिमुर येथे राष्ट्रीय विज्ञान परिषदेचे आयोजन केले असल्याची माहिती ग्रामविचे प्राचार्य डॉ अमीर धम्मानी यांनी दिली. यावेळी आरएमजी कॉलेज नागभीड चे प्राचार्य डॉ अनिल कोरपेनवार, एम झेड कॉलेज देसाईगंज प्राचार्य सुरेश रेवतकर, हे उपस्थित राहनार आहेत.
        सहभागी होनाऱ्या विद्यार्थी व शिक्षकांना त्यांचे शोधप्रबंध सादर करन्याची अंतीम तारीख १ मार्च होती त्याकरीता जवळपास शंभर शोध प्रबंधकाची नोंदणी झाली असून चिमुर तालुक्यातील होतकरू व वैद्यज्ञानीक विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरनारी मोलाची संधी प्राप्त झाली आहे. सदर चर्चासत्रातुन विद्यार्थी व शिक्षकांना आपल्या योजना, मते, दृष्टीकोन, संसोधन सादर करनेही प्रमूख संकल्पना आहे. यामुळे राष्ट्र बांधनीसाठी वैद्यज्ञानिक नवा व्यासपीठ उभा ठाकनार आहे.त्याही पलीकडे जिवनात येनाऱ्या नावीन्यपूर्ण संकल्पनासाठी हा उपक्रम युवकांसाठी मैलाचा दगड ठरनार आहे.

 जैवविवीधता (बायोडावरसीटी ) अॅन्थो बॉटनी, (बाह्यवनस्पतीशास्त्र) पॉलीओबॉटनी ( रूपीकी ) पालीनोलॉजी बहुजैवशास्त्र, मायक्रोबियल  (सुक्ष्मजैवविवीधता ) ,फुड अन्ड इंडस्ट्रीयल मायक्रोबायलाजी (अन्न व औद्योगिक शुक्ष्मजिवशास्त्र ), इंवांरमेन्टल मायक्रोबायलाजी ( पर्यावरण सुक्ष्म जिवशास्त्र ), अॅग्रीकल्चर मायक्रोबायलाजी ( कृषी सुक्ष्म जिवशास्त्र ) मेडीकल मायक्रोबायलाजी ( वैद्यकीय सुक्ष्मजीवशास्त्र ) आणी रोग प्रतीकारशास्त्र, पर्यावरण प्रदुषण, आपत्ती नियोजन ग्रीन इकानॉमी आदी विषयावर संशोधनपर पोष्टर प्रदर्शनीचे आयोजन आले असुन उत्कृष्ठ तीन पोष्टरना पारीतोशिक देन्यात आहे. त्याचबरोबर सहभागी शिक्षक व विद्यार्थांना प्रमानपत्र व विजेत्यांना पारीतोशीक देन्यात येनार आहे.
      यामध्ये पेपर पब्लीश, पोष्टर पब्लीश प्रेजेंटेशन होनार असुन ग्रामीन संशोधक विद्यार्थ्यांना लाभ मिळनार आहे पत्रकार परिषदेला प्राचार्य धम्मानी, प्राचार्य डॉ अनिल कोरपेनवार, प्राचार्य डॉ सुरेश रेवतकर, डॉ जि डी देशमुख, डॉ ए एस नागपुरे, प्रा. उमेश आनंदे, डॉ संदीप सातव, डॉ.आर जी रूळे,डॉ संदीप मेश्राम, प्रा. वरदा खटी, प्रा सी बी रूळे प्रा. राजु रामटेके आदी उपस्थित होते.

Sunday, February 25, 2018

अखेर त्या वाघाचा मृत्यू

अखेर त्या वाघाचा मृत्यू

चंद्रपूर (ललित लांजेवार) :
गेल्या चार दिवसांपासून  चिमूर वन परिक्षेत्रातील मुरपार उपक्षेत्रा अतंर्गत येणाऱ्या भान्सुली बिट कक्ष क्रमांक ५ मधील जखमी वाघाचा रविवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास अखेर मृत्यू झाला.

हा वाघ मागील चार दिवसांपासून गाव तलावा शेजारी बसला होता,  त्याच्या  डोक्यावर व उजव्या पायाला जखमा असल्याचे आढळून आले होते,त्यामुळे अश्या जखमी वाघाची प्रकृती अतिशयखालावत असतानाही  वनविभागाकडून त्याच्यावर उपचार केला जात नसल्याने संताप व्यक्त केला जात होता.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पापासून २० किमी अंतरावरील भान्सुलीच्या जंगलात हा वाघ जखमी अवस्थेत होता. गुरूवारी वनाधिकाऱ्यांनी कॅमेरा ट्रपिंगच्या माध्यमातून  त्याच्या हालचाली टिपल्या गेल्या होत्या या जखमी वाघाची संपूर्ण माहिती  मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे पाठविण्यात आल्याचे वन विभागाकडे पाठविण्यात आले होते. हा वाघ दोन वाघाच्या जखमी झाला असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले होते,वाघावर उपचार करण्यासाठी वाघाला बेशुध्द करण्याची परवानगी पी.सी.सी.एफ. नागपूर यांच्याकडे  करण्यात आली होती मात्र चार दिवस लोटले तरीही वाघाला बेशुध्द करण्याची परवानगी देण्यात आलेली नसल्याने वन्यप्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
शुक्रवारी दुपारी घटनास्थळावर मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, सहायक उप वनसंरक्षक आर.एम.वाकडे, वन्यजीवप्रेमी अमोद गौरकार यांनी जखमी वाघाची पाहणी केली. जखमी वाघाच्या सुरक्षेसाठी ४० कर्मचारी पहारा ठेवला . मागील चार दिवसांपासून वाघाने काही खाल्ले नसल्याने तो अशक्त झाला होता. लवकर उपचार न झाल्यास वाघाचा मृत्यु होण्याची शक्यता वन्यजीव प्रेमींकडून वर्तविली जात आहे. वाघ जखमी असल्याने त्याला शिकार करणे शक्य नव्हते,त्यामुळे तो गेल्या ४ दिवसांपासून उपाशी होता, त्या जखमी वाघाचा रविवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास मृत्यू झाला.
या आधी चिमूर तालुक्यातील आमडी बेगडे शेतशिवारात शेतीच्या कुंपणात वीज प्रवाह सोडल्यामुळे ८ नोव्हेंबर  २०१७ ला  वाघाचा मृत्यू झाला होता.  गेल्या काही दिवसा अगोदर चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव बिटात दोन पट्टेदार वाघाच्या झुंजीत एक वाघ मृतावस्थेत आढळून आल्याची घटना घडली होती.याच घटने पासून तब्बल १०  दिवसातच तेथून जवळच असलेल्या तळोधी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या परिसरातील गंगासागर हेटी बिट जंगल परिसरात वाघिणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे वारंवार होत असलेल्या वाघांचा मृत्यू वनविभागाच्या चांगलाच जिव्हारी लागू शकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पर्यटकांना दिल खुलास दर्शन देऊन पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फेडणाऱ्याच वाघांचे एक-एक करून होणारे मृत्यू हा चिंतेचा विषय आहे.असा सुर येथे येणाऱ्या अनेक पर्यटकांन कडून ऐकायला मिळत आहे. मागील काही वर्षात वाघ दर्शनाच्या निमित्ताने येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत याठिकाणी बरीच वाढ झाली होती. यानिमित्तानं वाढता पर्यटकांचा ओघ पाहता वन विभागाने प्रवेश शुल्क आदीत ही दुपटीने वाढ केली होती. अश्यातच दिवसेंदिवस वाघांचा एकापाठोपाठ अरे मृत्यू चिंतेची बाब आहे

Monday, February 05, 2018

चिमूरचा दैनंदिन बाजार बेमूदत बंद

चिमूरचा दैनंदिन बाजार बेमूदत बंद

चिमूर/प्रतिनिधी:

 अंहिसा चौक ते नेहरू चौक परीसरात भरणारा दैनदिन भाजीपाला बाजार हुतात्मा स्मारक अभ्यंकर मैदान येथे हलविण्याकरिता नगर परीषदेने फर्माण काढले. आता भाजीपाला व्यावसायिकांना तेथे बळजबरीने नेले जात आहे. या जाचाला कंटाळून अखेर भाजीपाला विक्रेत्यांनी दैनदिन भाजीपाला गुजरी बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
चिमूर शहरातील दैनदिन गुजरी हुतात्मा स्मारक अंभ्यकर मैदान येथे अनेक वर्षांपासून भरत होती. मात्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी या परिसराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी प्रस्ताव मंजूर केल्याने तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासनाने ही गुजरी अहिंसा चौक ते नेहरू चौकात हलविली. तसेच यापूर्वी नेहमी यात्रा काळात नेहरू चौकापासून मुख्य रस्त्यावरच गुजरी भरायची. मात्र आता रहदारीला अडथळा होतो, या सबबीखाली नगर परिषदेने गुजरी अभ्यंकर मैदान येथे नेण्याचा घाट घातला आहे. व्यावसायिकांनीही अभ्यंकर मैदानात काही दिवस गुजरी भरविली. मात्र या ठिकाणी व्यवसाय होत नसल्याने पुन्हा भाजीपाला व्यावसायिक अहिंसा चौक ते नेहरू चौक येथेच परत आले. आता त्यांना पुन्हा अभ्यंकर मैदानात पाठविले जात आहे. २४ जानेवारीला भाजीपाला विक्रेत्यांना या संदर्भात नोटीस बजावली आहे. रोजच भाजीपाला विक्रेत्यांना नगरपालिकेच्या पथकाने उठविणे सुरू केले आहे. ३१ जानेवारीला तर या पथकाने व्यावसायिकांचा भाजीपाला जप्त करून कारवाई केली. रोजच्या या त्रासाला कंटाळून सर्व भाजीविक्रेत्यांनी शनिवारी तातडीची बैठक घेतली व रविवारपासून दैनंदिन भाजीपाला मार्केट बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
हा निर्णय त्यांनीच ध्वनीक्षेपकाद्वारे शहरात जाहीर केला. बाहेरगावावरून येणाºया भाजीपाला विक्रेत्यांनाही दुकान लावण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या संदर्भातील एक निवेदन भाजीपाला व्यावसायिकांनी मुख्याधिकारी यांना दिले आहे.
गृहिणींना चिंता
शहरातील भाजीमार्केटच बंद असल्याने गृहिणी चिंताग्रस्त झाल्या आहेत. शहरात कुठेही भाजीपाला मिळत नसल्याने घरगृहस्थी कशी चालवायची, यात्रा काळात घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार कसा करायचा, या विवंचनेत गृहिणी आणि नागरिकही दिसून येत आहेत.
Chimur's daily market closed | चिमूरचा दैनंदिन बाजार बेमूदत बंद