
चंद्रपुरात शाळेतील वाद पोहचला पोलीस ठाण्यात

गावापासून जगापर्यंतची खबरबात khabarbat.com
सिंदेवाही- तालुकास्तरीय KRA मुख्याध्यापक कार्यशाळा पंचायत समिती, सिंदेवाही -( बीट :- सिंदेवाही, गुंजेवाही अंतर्गत भारत विद्यालय , पळसगाव (जाट) येथे घेण्यात आली.
यावेळी बाबूपेठ येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षणचे प्राचार्य धनंजय चापले यांनी मार्गदर्शन केले.
KRA बाबत मुख्याध्यापकामध्ये मार्गदर्शन व चर्चा, NAS सर्वेक्षण बाबत विशेष मार्गदर्शन व महत्व विषद केले, ASER सर्वेक्षण बाबत आपल्या जिल्ह्याचे स्थान व आपली प्रगती कुठे आहे, यावरही मार्गदर्शन केले. गणितपेटीतील साहित्याची ओळख व घटकनिहाय वापर कसा करायचा याचे मार्गदर्शन केले.दि. 14 जुलै 2017 च्या जीआर चे वाचन सर्व मुख्याध्यापकांनी करून त्यानुसारच पायाभूत चाचणी व संकलित चाचणी-1 घेऊन गुणदान करावे, असे सूचित करण्यात आले.
कार्यशाळेत शिविअ केंद्रप्रमुख व सर्व विषय साधन व्यक्ती उपस्थित होते.
कार्यशाळेत मान. श्री. मेश्राम ( B.E.O. ), श्री. चहांदे, श्री. परचाके, बरगडे ( के. प्र. ) श्री. बोरकर मु.अ. भारत विद्यालय , पळसगाव श्री. भारत मेश्राम, श्री. बगडे, श्री. निकुरे, विषयतज्ञ उपस्थित होते. कार्यशाळेचे संचालन श्री. शेंडे ( के.प्र.) यांनी केले, तर आभार श्री. जनबंधू यांनी मानले.
नागपूर - शासनाचा विकास खरच पागल झाला आहे......शासनाला सर्व कामे, उपक्रम फुकट करून घ्यायची आहे....तोडा फोडा व झोडा अशीच स्थिती निर्माण करून शिक्षक संघटना मोडीत काढण्याचा प्रयत्न असून सरकारी जि प शाळा बंद करण्याचा घाट या सरकारने घातलेला आहे.
आजपर्यँच्या इतिहासात दरवर्षी बदल्या होतील असा GR निघाला नाही....पण आज 27/02 च्या GR मुळे घडणार आहे....कारण वास्तव्य कालावधी हा शाळा किंवा तालुका स्तरावरील गृहीत न धरता.....*जिल्ह्यातील एकूण 10 वर्षे सेवा झालेला शिक्षक हा बदलीपात्र ठरवून तो संवर्ग 1 किंवा 2 मध्ये येई पर्यंत दरवर्षी बदलीपात्र राहणार व दरवर्षी त्याच्यावर बदलीची टांगती तलवार राहणार......हे 100% सत्य👌
ऑनलाईन कामा संदर्भात कुठलीही पायाभूत सुविधा न पुरविता सर्व कामे शिक्षकांनी आपल्या स्वतःच्या खिशातून (वेतनातून) करावी ही शासनाची सक्ती म्हणजे आपल्याला आर्थिक गुलामगिरी कडे नेणारी बाब आहे...👌
शाळा A श्रेणी मध्ये आणावी तरच वरिष्ठ व निवड श्रेणी मंजूर हा तर शिक्षकांना न्याय हक्का पासून वंचित करण्याचा डाव आहे.....👌
गुणवत्ता वाढावी, शाळा सुंदर असावी यामध्ये कुणाचेच दुमत असण्याचे कारण नाही......पण दरवर्षी बदली पात्र शिक्षक राहणार असेल तर....गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा बँड वाजल्याशिवाय राहणार नाही.... हेही तितकेच खरे👌
विद्यार्थी म्हणजे यंत्र व शिक्षक म्हणजे कामगार अशी नेमकी घोडचूक शासन करीत असून 27/02च्या GR ने अस्थिरता निर्माण करीत आहे...👌
*सजीवांच्या आंतरक्रिया, भाव भावना यांचे नाते तोडून तांत्रिक बाबी यशस्वी (ऑनलाइन बदल्या) करण्याचा असीम अट्टाहास सुरू आहे.*
@ शरद भांडारकर
राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेना, नागपूर