काव्यशिल्प Digital Media: सुधीर मुनगंटीवार

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label सुधीर मुनगंटीवार. Show all posts
Showing posts with label सुधीर मुनगंटीवार. Show all posts

Wednesday, December 19, 2018

कापडी पिशव्‍यासाठीनिधी उपलब्‍ध करणार

कापडी पिशव्‍यासाठीनिधी उपलब्‍ध करणार



  • महिला आर्थिक विकास महामंडळाला नाविन्‍यपूर्ण योजनेअंतर्गत 
  • नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा महत्‍वपूर्ण निर्णय


 राज्‍य शासनाने प्‍लास्‍टीकबंदी संदर्भात घेतलेल्‍या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्‍यासाठी तसेच कापडी पिशव्‍या बनविण्‍यापासून महिलांना रोजगार निर्मीती हा बहुउद्देशीय कार्यक्रम साध्‍य करण्‍याकरिता जिल्‍हा वार्षीक योजनेअंतर्गत नाविन्‍यपूर्ण योजनेकरिता उपलब्‍ध 3.5 टक्‍के निधी मधून प्रायोगिक तत्‍वावर 34 जिल्‍हयांमध्‍ये प्रत्‍येक एक युनिट करिता   रू.20,50,000 इतका निधी महिला आर्थिक विकास महामंडळाला उपलब्‍ध करून देण्‍याचा निर्णय वित्‍त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे.


महिला व बालविकास विभागाने याबाबतचा प्रस्‍ताव नियोजन विभागाला सादर केला असून या प्रस्‍तावाला नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मान्‍यता दिली आहे. प्‍लास्‍टीकबंदी च्‍या निर्णयानंतर पर्यावरण विभागाकडून सर्वत्र समाजप्रबोधन करण्‍यात येत असून प्‍लास्‍टीक पिशव्‍यांना पर्याय म्‍हणून कापडी पिशव्‍यांचा वापर करणे आता अनिवार्य झाले आहे. परिणामी कापडी पिशव्‍यांकरिता विशेषतः शहरी क्षेत्रात मोठया प्रमाणावर बाजारपेठ उपलब्‍ध झाली आहे. सदर बाब लक्षात घेता महिला आर्थिक विकास महामंडळाकडून गरीब व गरजू महिलांना उपजिवीकेसाठी व्‍यवसाय उपलब्‍ध करणे व पर्यावरणाचा समतोल राखण्‍यासाठी कापडी पिशव्‍या महिला बचतगटांच्‍या माध्‍यमातुन व्‍यापक प्रमाणावर तयार करून प्‍लास्‍टीकबंदी मोहीमेचा प्रचार व प्रसार  करण्‍यासाठी बहुउद्देशिय कार्यक्रम जिल्‍हा स्‍तरावर हाती घेण्‍याचे निश्‍चीत करण्‍यात आले आहे. या माध्‍यमातुन गरीब व गरजू महिलांना रोजगार उपलब्‍ध करून देणे हा योजनेचा मुख्‍य उद्देश आहे. यासाठी प्रत्‍येक जिल्‍हयात एक यंत्र युनिट स्‍थापन करण्‍यात येणार आहे. यामध्‍ये साधारणतः 25 ते 30 महिला काम करतील. या युनिटमध्‍ये शिलाई मशीन, कापड कटींग मशीन, ओव्‍हरलॉक मशीन, प्रिटींग मशीन यांचा समावेश असेल तसेच जागेचे भाडे, विजेचे बिल व इतर देखभाल खर्च यासह एक कापडी पिशवी उत्‍पादन केंद्र उभारण्‍याकरिता भांडवली गुंतवणुक व आवर्ती खर्च अंदाजे रू. 20,50,000 उपलब्‍ध करून देण्‍यात येणार आहे. नाविन्‍यपूर्ण योजनेअंतर्गत निधीच्‍या उपलब्‍धतेनुसार प्रस्‍तावाला प्रशासकीय मान्‍यता देण्‍यात येणार असून या माध्‍यमातुन महिलांना रोजगार उपलब्‍ध करून देत पर्यावरणाचा समतोल साधत सदर महिला केंद्रीत उपक्रम राबविण्‍यासाठी जिल्‍हा नियोजन समितीचे भक्‍कम पाठबळ उपलब्‍ध करून देण्‍याचा नियोजन विभागाचा मानस असल्‍याचे नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे. 

Saturday, December 01, 2018

बांबु हॅन्‍डीक्राफ्ट अॅन्‍ड आर्ट युनिट साठी 25 सीटर बस होणार उपलब्‍ध

बांबु हॅन्‍डीक्राफ्ट अॅन्‍ड आर्ट युनिट साठी 25 सीटर बस होणार उपलब्‍ध

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुभारंभ सोहळयात दिलेला शब्‍द केला पूर्ण
Image result for 25 seaters busचंद्रपूर/प्रतिनिधी:
बल्‍लारपूर तालुक्‍यातील विसापूर येथे बांबु हॅन्‍डीक्राफ्ट अॅन्‍ड आर्ट युनिट या संस्‍थेच्‍या उदघाटन समारंभात अर्थ व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सदर युनिटला भेट देण्‍यास येणा-या लोकांसाठी, संशोधकांच्‍या प्रवासासाठी तसेच महिला कामगारांची ने-आण करण्‍यासाठी 25 सीटर बस बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्‍ली या संस्‍थेला उपलब्‍ध करून देण्‍याचे आश्‍वासन दिले होते.
सदर आश्‍वासनाची पूर्तता झालेली असून बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्‍ली या संस्‍थेला आमदार स्‍थानिक विकास कार्यक्रमांतर्गत 25 सीटर बस उपलब्‍ध करण्‍यासाठी विशेष बाब म्‍हणून मान्‍यता देण्‍यात आली आहे. नियोजन विभागाने दिनांक 29 नोव्‍हेंबर 2018 रोजी च्‍या पत्रान्‍वये जिल्‍हाधिकारी चंद्रपूर यांना तत्‍संबंधाने सुचना दिल्‍या आहेत. दिनांक 14 सप्‍टेंबर 2018 रोजी विसापूर येथे बांबु हॅन्‍डीक्राफ्ट अॅन्‍ड आर्ट युनिट चा शुभारंभ वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला होता. या शुभारंभ सोहळयात वनमंत्र्यांनी दिलेल्‍या आश्‍वासनाची पूर्तता झाली असून विशेषतः महिला कारागीरांमध्‍ये यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Friday, October 12, 2018

 पोंभुर्णा पोल्‍ट्री प्रोडयुसर्स कंपनी माझ्या भगिनींची कंपनी असल्‍याचा अभिमान:मुनगंटीवार

पोंभुर्णा पोल्‍ट्री प्रोडयुसर्स कंपनी माझ्या भगिनींची कंपनी असल्‍याचा अभिमान:मुनगंटीवार

चंद्रपूर/प्रतिनिधी:
 नवरात्र हा आदिशक्‍ती, मातृशक्‍तीचा उत्‍सव आहे. मातृशक्‍ती सुदृढ व सशक्‍त करायची असेल तर महिलांचे सक्षमीकरण अत्‍यंत गरजेचे आहे. पोंभुर्णा येथे आदिवासी महिलांद्वारे संचालित कुक्‍कुटपालन प्रकल्‍प हा दुर्गम भागातील महिला सक्षमीकरणाचे प्रभावशाली उदाहरण आहे, असे कौतुकोदगार राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी काढले. हा प्रकल्‍प माझ्या मतदार संघातला त्‍यातही माझ्या भगिनींचा आहे. याचा मला सार्थ अभिमान असल्‍याचेही ते यावेळी बोलताना म्‍हणाले.
12 ऑक्टोंबर रोजी पोंभुर्णा येथे आदिवासी महिलांद्वारे संचालित कुक्‍कुटपालन संस्‍थेच्‍या पहिल्‍या वार्षीक सर्वसाधारण सभेत ना.सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्‍हणाले, साधारणतः कंपनी असे म्‍हटले तर टाटा, बिर्ला अशी मोठी नावे डोळयासमोर येतात. पोंभुर्णा महिला पोल्‍ट्री प्रोडयुसर्स कंपनी लिमी. ही कंपनी माझ्या भगिनींची कंपनी आहे. याचा मला खरोखर अभिमान आहे, असेही ते म्‍हणाले.
या मतदार संघात रोजगार व स्‍वयंरोजगाराला चालना देणारे अनेक प्रकल्‍प आपण राबवित आहोत. चिचपल्‍ली येथील बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्राची दखल सिंगापूरच्‍या प्रसार माध्‍यमांनी घेतली आहे. मत्‍स्‍यपालन, दुग्‍धव्‍यवसाय आपण या भागात राबविणार आहोत. 15 नोव्‍हेंबर पर्यंत टुथपिक तयार करण्‍याचा प्रकल्प आपण कार्यान्‍वीत करणार आहोत. पोंभुर्णा येथे मॉडेल पंचायत समिती आपण उभारत आहोत. युवक-युवतींना स्‍पर्धा परिक्षांच्‍या तयारीसाठी साहित्‍य उपलब्‍ध करण्‍याच्‍या दृष्‍टीने अद्ययावत वाचनालय उभारत आहोत. पोंभुर्णा येथे पोलिस प्रशिक्षण केंद्र निर्माण होत आहे. शेतक-यांचे उत्‍पन्‍न वाढविण्‍याच्‍या दृष्‍टीने मुल आणि पोंभुर्णा तालुक्‍यात टाटा ट्रस्‍टच्‍या सहाय्याने सधन शेतकरी प्रकल्प आपण राबवित आहोत. पोंभुर्णा येथे सुसज्‍ज अशी ग्रामीण रूग्‍णालयाची इमारत उभी होत आहे. चिचडोह सिंचन प्रकल्‍प आपण पूर्ण केला आहे. लवकरच हा प्रकल्‍प शेतक-यांच्‍या सेवेत रूजु होणार आहे. विशेष बाब म्‍हणून मुल व पोंभुर्णा तालुक्‍यातील शेतक-यांना विहीरी आपण उपलब्‍ध करून दिल्‍या आहेत, असेही त्‍यांनी सांगीतले. 
पंतप्रधानांसमोर आपल्‍या प्रकल्‍पाचे निर्भीडपणे सादरीकरण करणा-या श्रीमती कुंतीबाई धुर्वे यांचे कौतुक करत ना.सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, मिशन शक्‍तीच्‍या माध्‍यमातुन जिल्‍हयातील आदिवासी विद्यार्थ्‍यांनी माऊंट एवरेस्‍टवर झेंडा फडकविला. 28 आणि 29 ऑक्‍टोंबरला बल्‍लारपूर येथे युथ एमपॉवरमेंट समीट आपण आयोजित करीत आहोत. त्‍या माध्‍यमातुन मिशन सेवा, मिशन स्‍वयंरोजगार, मिशन कौशल्‍य विकास, मिशन फॉरेन सर्विसेस, मिशन सोशल वर्क, मिशन उन्‍नत शेती या सहा मिशनची सुत्री आपण अमलात आणत आहोत. हा जिल्‍हा रोजगार व स्‍वयंरोजगारयुक्‍त व्‍हावा हेच आपले ध्‍येय असल्‍याचे ना.सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले.
यावेळी जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे, पोंभुर्णा पंचायत समितीच्‍या सभापती अल्‍का आत्राम, नगर पंचायत अध्‍यक्षा श्‍वेता बनकर, गजानन गोरंटीवार, अविनाश परांजपे, जि.प. सदस्‍य राहूल संतोषवार, न.प. उपाध्‍यक्ष रजिया कुरैशी, जिल्‍हा परिषद सदस्‍य गौतम निमगडे, पंचायत समिती उपसभापती विनोद देशमुख, न.प. सदस्‍य अजित मंगळगिरीवार, ईश्‍वर नैताम, माजी सरपंच राजू मोरे, पोंभुर्णा महिला पोल्‍ट्री प्रोडयुसर्स कंपनी लिमी. च्‍या अध्‍यक्षा यमुना जुमनाके, कुंतीबाई धुर्वे, तहसिलदार श्रीमती टेमकर आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

Saturday, August 18, 2018

चंद्रपूरमध्ये आदिवासी मुलींच्या 360 क्षमतेच्या अद्यावत वसतिगृहाचे लोकार्पण

चंद्रपूरमध्ये आदिवासी मुलींच्या 360 क्षमतेच्या अद्यावत वसतिगृहाचे लोकार्पण

मुलींनो ! ज्ञानार्जनातून जगाचे नेतृत्व करा : ना.सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर/प्रतिनिधी:
  पूर्वी ज्याच्याकडे ताकद होती, तो जगावर राज्य करायचा. त्यानंतर ज्याच्याकडे पैसा होता. तो जगावर राज्य करायचा. मात्र आता ज्याच्याकडे ज्ञान आहे. तोच जगावर राज्य करू शकतो. मुलींनो ज्ञानार्जनातून जगाचे नेतृत्व करा. चंद्रपूरचे नाव जगभर पोहोचवा, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आदिवासी आश्रम शाळेच्या विद्यार्थिनींना वस्तीगृहाची अद्यावत इमारत लोकार्पित करताना केले. चंद्रपूरमध्ये 360 क्षमतेच्या अद्यावत वसतिगृहामध्ये आठवडयात मुली निवासी जाणार आहेत.
15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर चंद्रपूर येथील आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह क्रमांक एक व दोनचे लोकार्पण विद्यार्थिनींच्या हस्ते रिबन कापून करण्यात आले. सद्या खासगी जागेत राहणा-या मुलींना उदघाटन करताना नव्या वसतीगृहात राहण्याचा आनंद ओसंडून वाहत होता. या लोकार्पण सोहळ्याला वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, आमदार नानाभाऊ शामकुळे, महापौर अंजलीताई घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी केशव बावनकर, अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे आदी उपस्थित होते.
  जगावर सद्या राज्य ज्ञानाचे आहे. ज्ञान मिळवण्यासाठी कठोर परिश्रमाची आवश्यकता असते. भारतामध्ये विशेषत महाराष्ट्रात मुलींनी गुणवत्ता क्षेत्रात भरारी मारली आहे. डॉक्टर मुली आणि कंपाउंडर मुले अशी स्थिती अनेक ठिकाणी झाली आहे. महाराष्ट्रामध्ये मुलींच्या गुणवत्तेतील भरारीने मुलांपेक्षा जास्त मुलींच्या वसतिगृहांची आवश्यकता झाली आहे. कोणत्याही क्षेत्रात मुलींचे अस्तित्व ठळकपणे उमटत आहेत. त्यामुळे 360 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची निर्मिती पूर्ण झाल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मार्गदर्शन करतांना त्यांनी पुस्तकातून मिळणारे ज्ञान हे केवळ स्वतःसाठी न वापरता हा देश, हा समाज जगाचं नेतृत्व करणारा झाला पाहिजे, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. आदिवासी मुली कुठेही कमी नाहीत हजारो वर्षांपूर्वी एकलव्यानेही बाब सिद्ध केली होती. ही एकलव्याची भूमी आहे. त्यामुळे चंद्रपूरची गुणवत्ता जागतिक पातळीवर उमटेल अशा पद्धतीने अभ्यास करा, असे आवाहनही त्यांनी केले. आदिवासी मुलामुलींना शिक्षण व शैक्षणिक क्षेत्रासोबतच आता औद्योगिक व व्यापारी क्षेत्राकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले. चंद्रपूरमध्ये लवकरच कौशल्य विकास विद्यापीठाची स्थापना केली जाणार आहे. यामुळे या भागातील सर्व घटकातील विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फायदा होईल, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी आमदार नानाभाऊ शामकुळे यांनी देखील संबोधित केले. ना.सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे आदिवासी समूहाला मुख्य प्रवाहात आणण्याचे विविध क्षेत्रात कार्य गेल्या काही वर्षात घडत असून त्याचे दृश्य परिणाम दिसून येत असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सुषमा साखरवाडे यांनी 18 महिन्यात पूर्ण करण्यात आलेली ही इमारत अभ्यासाला पूरक अशा सर्व सोयीसुविधांनी युक्त असल्याचे सांगितले.


भाऊंनी 72 तासात पुस्तके विद्यार्थिनींना पुरविली : या कार्यक्रमाचे संचालन करणारे सहायक अधीक्षक अभियंता मनोज जुनोनकर यांनी संचालन करताना नव्या इमारतीमध्ये अद्यावत अभ्यासिकेची देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने निर्मिती केली आहे. याठिकाणी फर्निचर व आवश्यक सुविधा देखील केल्या आहेत. मात्र पुस्तके नाहीत. पालकमंत्र्यांनी या जिल्ह्यांमध्ये गेल्या चार वर्षात पुष्पगुच्छ ऐवजी पुस्तके देण्याची परंपरा लावली आहे. त्यामुळे नवी नाहीतर भाऊंकडे जमा झालेली चांगली पुस्तके या मुलींना वाचायला मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात मुलींना अभ्यासाची आणि सामान्य ज्ञानाची पुस्तके देण्याचे अभिवचन दिले. त्यानंतर 72 तासातच नव्या वसतीगृहात मुली जाण्यापूर्वीच सध्या राहत असलेल्या त्यांच्या वसतिगृहावर आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी केशव बावनकर, विशेष कार्याधिकारी डॉ.विजय इंगोले, पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक सुहास अलमस्त, लोकमान्य टिळक स्मारक मंडळाचे सचिव दत्तप्रसन्न महादनी, राज चंदेल यांनी सध्या मुलीच्या खाजगी ठिकाणी वसतिगृहामध्ये राहतात. त्या ठिकाणी ही पुस्तके पोहोचू न दिली. आदिवासी वस्तीगृहातील मुलींनी या पुस्तकांसाठी पालकमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

Wednesday, August 15, 2018

  चंद्रपुरात बांबूपासून 50 हजार राख्यांची निर्मिती

चंद्रपुरात बांबूपासून 50 हजार राख्यांची निर्मिती

ना.मुनगंटीवार यांच्या हस्ते बीआरटीसीच्या प्रकल्पाचा शुभारंभ 
चंद्रपूर/प्रतिनिधी:
बांबूपासून सायकल, बांबूपासून कपडे, बांबूपासून घरातील शोभिवंत वस्तू, बांबूपासून गणरायाची मूर्ती ते बांबूपासून आता राखी बनविण्याचा नवा प्रकल्प चंद्रपूर येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रामार्फत (बीआरटीसी) राबविण्यात आला आहे. या प्रशिक्षण केंद्रात चक्क 50 हजार राख्या बांबूपासून तयार करण्यात आल्या असून राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या करकमलावर रक्षाबंधन करुन या केंद्राने राखी विक्रीस सुरुवात केली आहे. 
राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमध्ये चिचपल्ली येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची सुरुवात केली. त्यानंतर या केंद्रामार्फत विविध प्रयोग सुरु असून हे केंद्र हजारो बेरोजगारांना रोजगार देणारे केंद्र म्हणून पुढे येत आहेत. या संस्थेमार्फत बांबू आधारित विविध प्रकल्प पोंभूर्णा, मूल, बल्लारपूर तालुक्यात राबविण्यात येत आहेत. या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलाना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. 
नागपूर महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे व्यवस्थापकीय टि.एस. के रेड्डी यांनी चंद्रपूरच्या केंद्राने आता राखी निर्मिती करावी, अशी संकल्पना मांडली. त्यानुसार या केंद्राचे नेतृत्व करणारे तरुण आयएफएस अधिकारी संचालक राहुल पाटील यांनी या निर्मितीमध्ये या ठिकाणच्या प्रशिक्षित कर्मचा-यांना निर्देश दिले आणि हे केद्र बहीन भावाच्या पवित्र सणासाठी राखी बनवायला सिध्द झाले. 
बचत गटातील महिलांनी बांबूपासून बनवलेली ही अनोखी राखी पर्यावरण पुरक आहे. तशीच ती स्पर्धेतील राख्यांनाही मागे टाकणारी आहे. या सुंदर राख्यांच्या निर्मितीबद्दल या केंद्राचे संचालक राहुल पाटील यांच्या टिमचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी कौतुक केले आहे. चिचपल्ली येथे बांबू संशोधन केंद्राची संपूर्ण बांबूपासून तयार होणारी इमारत आकारास येत असून या इमारतीची दखल सिंगापूर सारख्या देशातील माध्यमांनी घेतली आहे. अशा प्रकारची भारतातील ही पहिलीच इमारत आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये बांबू संदर्भातील अभ्यासक्रमही सुरु करण्यात आले असून चंद्रपूर शहरामध्ये नागपूर रोडवर बांबूपासून तयार झालेल्या वस्तूंचे दालनही सुरु झाले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात या केंद्रात तयार झालेला तिरंगा पोहचला असून चित्रपट सुष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही बांबूपासून बनलेल्या वस्तूंचे कौतुक केले आहे. आगामी काळात या भागातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारे केंद्र म्हणून रोजगार निर्मितीची अपेक्षा या केंद्राकडून केली जात आहे. 
महिला आर्थिक विकास महामंडळ चंद्रपूर व बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली यांच्या संयुक्त विद्यामातून पोंभूर्णा व मुल तालुक्यातील सीएफसी केंद्रामध्ये बांबूपासून हस्तशिल्पाद्वारे घरसजावटी सोबत अनेक शोभेच्या वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण बचत गटातील महिलांना दिल्या जाते. बांबूपासून निर्मित पर्यावरण पूरक राखी ही यातीलच एक प्रयोग, ग्रामीण भागातील एक हजार गरीब व गरजू महिलांना या प्रशिक्षणाद्वारे शास्वत उपजीविकेचे साधन निर्मितीच्या उदेशाने बीआरटीसी व माविम हे शासकीय महामंडळ करारबद्ध झालेले आहेत. 
काल मंगळवारी नगरपरिषद बल्लारपूर येथे झालेल्या कार्यक्रमात बचत गटातील या महिलांनी ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्तकमलावर ही राखी बांधली व या राखीचे लोकार्पण समारंभ पार पडला. ना.मुनगंटीवार यांनी बचत गटातील महिला भगिनींनी बनवलेल्या या राखीची खरेदी करावी. पर्यावरण पूरक राखी रक्षाबंधनात वापरण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. आज घडीला एकंदरीत 50 हजार राख्यांची निर्मिती करण्यात आली आहे.
सदर कार्यक्रमात वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल,आमदार संजय धोटे,नगराध्यक्ष हरीश शर्मा, मीना चौधरी, उपविभागीय आधिकारी क्रांती डोंबे, मुख्याधिकारी श्री.विपिन मुदधा, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील, महिला आर्थिक विकास महामंडळाचे वरिष्ठ जिल्हा समन्वय आधिकारी नरेश उगेमुगे व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
 ‘मिशन शक्ती’ व ‘मिशन सेवा’मार्फत चंद्रपूरच्या नावलौकिकात भर घाला: ना.मुनगंटीवार

‘मिशन शक्ती’ व ‘मिशन सेवा’मार्फत चंद्रपूरच्या नावलौकिकात भर घाला: ना.मुनगंटीवार

लाल किल्यावरुन आदिवासी विद्यार्थ्यांचा;गौरव केल्याबद्दल प्रधानमंत्र्यांचे मानले आभार
पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते चंद्रपूरमध्ये मुख्य ध्वजारोहण
चंद्रपूर/प्रातिनिधी:
चंद्रपूरच्या आदिवासी आश्रमशाळेच्या मुलांनी एव्हरेस्ट सर केल्याच्या भीमपराक्रमाचा उल्लेख लाल किल्यावरुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भाषणात केल्याबद्दल राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांचे आभार मानले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या मुख्य ध्वजारोहण सोहळयामध्ये आगामी काळात जिल्हयामध्ये ‘ मिशन शक्ती ’ व ‘ मिशन सेवा ’ या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करुन चंद्रपूरच्या नावलौकिकात भर घालण्याचे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्रतच नव्हे तर भारतात प्रेरणादायी उपक्रमाचा जिल्हा म्हणून चंद्रपूरचे नावलौकिक वाढावे, यासाठी सिध्द व्हा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय स्वातंत्र्याचा 71 वा वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या भाषणाच्या सुरुवातीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या आजच्या भाषणात चंद्रपूर जिल्हयातील एव्हरेस्ट सर करणा-या 10 आदिवासी विद्यार्थ्यांचा गौरव केला. ‘एव्हरेस्ट शिखर अनेकांनी सर केले. मात्र संधी मिळाल्यानंतर चंद्रपूरच्या 10 शाळकरी मुलांनी देखील हा भीमपराक्रम केल्याचा इतिहासात कायम उल्लेख केला जाईल,’ असे प्रधानमंत्र्यांनी विषद केले. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या उल्लेखाला ऐतिहासिक संबोधले असून त्यासाठी त्यांनी प्रधानमंत्र्यांचे आभार मानले. येणा-या काळामध्ये भारतातील 712 जिल्हयामध्ये जात, पात, धर्म, वंश या सर्व भेदाच्या पलिकडे जावून गुणवत्तेच्या आधारावर जिल्हयाचा नावलौकिक वाढवायचा असून प्रेरणादायी जिल्हा म्हणून चंद्रपूरचे नाव देशात घेतले जाईल, यासाठी तत्पर होण्याचे आवाहन केले. 
आपल्या भाषणामध्ये त्यांनी ‘ मिशन शक्ती ’ व ‘ मिशन सेवा ’ या दोन महत्वपूर्ण उपक्रमाची घोषणा केली. मिशन शक्तीअंतर्गत चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील सर्वस्तरातील क्षमतावाण शंभर खेळाडूंना निवडण्यात येईल. त्या माध्यमातून सहा निवडक खेळामध्ये या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण दिले जाईल व 2024 मध्ये ऑलिम्पिकसाठी गुणवान खेळाडूंना तयार केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हयातील सर्व तालुक्याच्या ठिकाणच्या क्रीडा संकुलाला 25 डिसेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. चंद्रपूरमध्ये स्वातंत्रवीर बाबुराव शेडमाके यांच्या स्मृतीत भव्य क्रीडा संकुल उभारण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. आतापर्यंत ऑलिम्पिकच्या इतिहासात भारताला केवळ 28 मेडल प्राप्त झाले आहे. मात्र यासाठी कठोर मेहनत चंद्रपूर जिल्हा घेणार असून ऑलिम्पिक मेडल हे आमचे पुढील धेय्य असेल त्यांनी स्पष्ट केले. 
यासोबतच त्यांनी ‘ मिशन सेवा ’चीही घोषणा केली. चंद्रपूर, मूल व जिल्हयाच्या अन्य भागात मोठया प्रमाणात अभ्यासिका निर्माण होत आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये आयएएस, आयपीएस अशा महत्वपूर्ण सेवामध्ये चंद्रपूरच्या मुलांचे प्रतिनिधीत्व असले पाहिजे, कोणत्याही क्षेत्रात व प्रदेशात या भागातील मुले उच्चपदस्थ ठिकाणी असावीत, यासाठी प्रयत्नपूर्वक प्रशिक्षणाचे नियोजन आगामी काळात करण्यात येईल व ‘मिशन सेवा’च्या माध्यमातून सक्षम व चारित्र्यवान अधिकारी निर्माण करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी वेळी केली. 
यावेळी जिल्हयात सुरु असलेल्या वेगवेगळया योजना व उपक्रमांच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या जिवनात अमूलाग्र बदल आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. 
बांबू प्रशिक्षण केंद्रामार्फत रोजगार निर्मितीच्या उपक्रमाचे त्यांनी आपल्या भाषणात विशेष कौतुक केले. या प्रशिक्षण केंद्रामार्फत मोठया प्रमाणात महिला बचत गटांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. 50 हजार राख्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रामार्फत तयार झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले. सिंगापूरच्या कॉन्सीलर जनरलने आपल्याला त्यांच्या स्वातंत्र्य दिवसाच्या सोहळयाला आमंत्रित करुन बांबू संशोधन व प्रशिक्षणासंदर्भात आम्ही सुरु केलेल्या प्रयोगाची माहिती घेतली. बांबूमुळे अनेक देशाशी चंद्रपूरचा संबंध प्रस्तापित होत असल्याचा आनंद त्यांनी यावेळी व्यक्त केला. जिल्हयामध्ये येणा-या काळात अद्ययावत वैद्यकीय महाविद्यालय, सैनिकी शाळा, हजारो प्रजातींच्या वनसंपदा असणारे बॉटनिकल गार्डन, मध्य भारतातील सर्वात मोठे कॅन्सर हॉस्पिटल, जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत सर्व तालुक्यात बगिचे, अभ्यासिका, सांस्कृतिक केंद्र उभी राहत असल्याचे स्पष्ट केले. हा जिल्हा रोजगार युक्त जिल्हा करण्यासाठी कटीबध्द असल्याचेही त्यांनी सांगितले. 
यावेळी त्यांनी या देशासाठी बलिदान करणा-या स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन केले. भारत माता की जय म्हणतांना भारत मातेसाठी काही तरी करण्याचा हा संकल्प करण्याचा आजचा दिवस असल्याचे नमूद करुन प्रत्येकांनी यासाठी स्वयंप्रेरणेने योगदान देण्याचे आवाहन त्यांनी शेवटी केले.
त्यांच्या भाषणानंतर त्यांनी कृषी क्षेत्रातील अभिनव उपक्रमात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल दत्तात्रय गुंडावार यांचा सत्कार केला. उत्कृष्ट सेवेसाठी पोलीस महासंचालक पदक मिळवणारे उपपोलीस निरीक्षक संदीप मिश्रा तसेच महसूल विभागातील तहसिलदार राजेश सरवदे, नायब तहसिलदार आर.एन.कुळसंगे, आर.व्ही लक्कावार, विक्की गुप्ता, नितून मडावी, गुणवंत वाभीडकर, जयंवत मोरे, राजू मोरे, अमोल तोडावे या अधिकारी कर्मचा-यांचा विशेष कार्यासाठी सत्कार केला. याशिवाय माजी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत 50 हजार रुपयाचे एफडी प्रमाणपत्र 9 बालिकांना वाटप करण्यात आले. कार्यक्रमानंतर या ध्वजारोहणासाठी आलेल्या कला, क्रीडा व अन्य क्षेत्रातील मान्यवरांसोबत पालकमंत्री महोदयांनी चहापान केले. यावेळी आमदार नाना शामकुळे, महापौर अंजलीताई घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय काकडे, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, स्वातंत्र सैनिक, गणमान्य व्यक्ती व जिल्हा प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

  बल्लारपूर उत्तम नागरी सुविधांचे शहर म्हणून  नाव लौकिकास येईल: मुनगंटीवार

बल्लारपूर उत्तम नागरी सुविधांचे शहर म्हणून नाव लौकिकास येईल: मुनगंटीवार

नगर परिषद परिसरात रुग्णवाहिका, शववाहिका व घंटागाडीचे लोकार्पण
चंद्रपूर/प्रतिनिधी:

बल्लारपूर शहरात गेल्या चार वर्षात कोटयावधींची विकास कामे झाली असून येत्या काही दिवसात हे शहर उत्तम नागरी सुविधांचे महाराष्ट्रातील शहर म्हणून पुढे येईल, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी केले. नगर परिषद परिसरात आयोजित एका कार्यक्रमात आज त्यांनी आमदार निधीतून रुग्णवाहिका, शववाहिका व घंटागाडीचे लोकार्पण केले.
या ठिकाणी आयोजित लोकार्पण सोहळयामध्ये बोलतांना पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर परिसरात कोटयावधीच्या पायाभूत सुविधा उभ्या राहत असतांनाच या ठिकाणी राहणा-या नागरिकांना उत्तम नागरी सुविधा देण्यासाठी आपण कटिबध्द असल्याचे स्पष्ट केले. या कार्यक्रमाच्या व्यासपिठावर वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आमदार ॲड.संजय धोटे, बल्लारपूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष हरिष शर्मा, उपाध्यक्ष मिनाताई चौधरी, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, मुख्याधिकारी विपीन मुद्दा उपस्थित होते.
ना.मुनगंटीवार यांनी आज आपल्या विकास निधीतून 25 लक्ष किंमतीची अतिदक्षता रुग्णवाहिका, 13 लक्ष किंमतीचे शववाहिकेचे लोकार्पण केले. याशिवाय डब्ल्युसिएलच्या सामाजिक दायित्व निधीतून नगर परिषद परिसरात उभ्या राहणा-या एलईडी स्क्रिनचे देखील लोकार्पण करण्यात आले. स्वच्छ भारत अभियानातंर्गत घनकचरा व्यवस्थापन सविस्तर प्रकल्प अहवालातील तरतूदीनुसार घरोघरी कचरा संकलनाकरीता 64 लक्ष रुपयाच्या 14 ॲटो टिप्परचे लोकार्पण करण्यात आले. सोबतच वैशिष्टयपूर्ण निधीतून नगर परिषद इमारतीवर सौर ऊर्जाप्रकल्प राबविण्यासाठी 11 लक्ष 55 हजार रुपयाचा सुक्ष्म ऊर्जा निर्मिती प्रकल्प लोकार्पित करण्यात आला. या प्रकल्पातून दररोज 40 ते 80 युनिट विज निर्मिती होणार आहे. यामुळे दरमहा 20 हजार रुपयाची बचत होणार असून 5 वर्षात या प्रकल्पावरील खर्च वसूल होणार आहे. यावेळी त्यांनी स्वच्छ सर्व्हेक्षण मोहिमेतील सहभागासाठी नागरिकांचे अभिनंदन केले. स्वच्छ वार्ड स्पर्धाचे निकाल घोषित करण्यात आले. याशिवाय नगर परिषद कर्मचारी आरोग्‍य विमाचे स्मार्ट कार्ड प्राथमिक स्वरुपात वितरीत करण्यात आले. याचा लाभ 173 कर्मचा-यांना होणार आहे. 
यावेळी बोलतांना त्यांनी बल्लारपूर शहरासोबतच बल्लारपूर तालुका देखील नागरी सुविधांसाठी ओळखला जाईल, असे सांगितले. या वर्षभरात बल्लारपूर तालुक्यातील सर्व गावांमध्ये गॅस सिलींडरचा वापर सर्व महिला भगिनी करतील. हा तालुका महाराष्ट्रातील पहिला धूरमुक्त तालुका करण्याची आपली भूमिका असल्याचे सांगितले. बल्लारपूर नजिक अतिभव्य असे क्रीडा संकुल तयार होत असून या ठिकाणावरुन आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करण्याचा मिशन शक्ती अतंर्गत आपला संकल्प असून विसापूर जवळ भव्य सैनिकी शाळा उभी राहत असल्याचे त्यांनी सांगितले. 
बल्लारपूर नगर परिषदेच्या अंतर्गत पहिली मुलींची डिजीटल शाळा आकाराला येत आहे. महाराष्ट्रातील देखणे असे बसस्थानक निर्माण होत आहे. हे बसस्थानक देखील बल्लारपूरच्या रेल्वे स्थानकाप्रमाणे या शहराचे नाव देशभर करेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी गेल्या चार वर्षात राबविण्यात आलेल्या अनेक प्रकल्पाचा नामोल्लेख केला. 
यावेळी नगराध्यक्ष हरिष शर्मा यांनी बल्लारपूर शहरासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी दाखविलेल्या विशेष आपुलकीबद्दल आभार मानले. ना.सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे या शहराचा चेहरामोहरा बदलत असून या ठिकाणच्या प्रगतीपथावर असलेल्या सर्व प्रकल्पाची पूर्तता झाल्यावर महाराष्ट्रातील आधुनिक नगर परिषद म्हणून या शहराचा नावलौकिक होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला नगर परिषदेच्या कर्मचा-यासह बल्लारपूर शहरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Saturday, August 04, 2018

चंद्रपूर येथे जंगल सफारी डीपीआर तयार करण्यासाठी टाटा ट्रस्ट समवेत करार

चंद्रपूर येथे जंगल सफारी डीपीआर तयार करण्यासाठी टाटा ट्रस्ट समवेत करार

मुंबई/प्रतिनिधी:
 चंद्रपूर येथे जंगल सफारी स्थापित करण्यासाठी ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील पदमापूर येथे सल्लागार समितीने सुचविल्याप्रमाणे सफारीचे क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. या जंगल सफारीसाठी विकास आराखडा (डीपीआर) तयार करण्याचे काम टाटा ट्रस्ट ला सोपविण्यात आले आहे. काल यासंदर्भात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि टाटा ट्रस्ट यांच्यात सांमजस्य करार करण्यात आला. यावेळी वन विभागाचे सचिव विकास खारगे यांच्यासह टाटा ट्रस्टचे प्रतिनिधी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
वनसंवर्धन कायदा १९८० अंतर्गत ही सफारी तयार करण्यासाठी लागणारे प्रस्ताव तयार करून त्यास मान्यता घेण्याची कार्यवाही करावी, प्रकल्पातील जी कामे तत्काळ सुरु करता येतील त्या कामांचे अंदाजपत्रक तयार करून त्यास तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता घ्यावी, केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण यांच्याकडून मंजूरी प्राप्त करून घेण्यासाठी आवश्यक असलेले प्रकल्पाचे संकल्पचित्र आणि प्रकल्पाची माहिती देणारा प्रस्ताव तयार करावा, अशा सूचनाही वनमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

सात जिल्ह्यातील रोजगार संधींचे अर्थमंत्र्यांसमोर सादरीकरण

सात जिल्ह्यातील रोजगार संधींचे अर्थमंत्र्यांसमोर सादरीकरण

चंद्रपूर/प्रतिनिधी:
राज्यातील सात जिल्ह्यांच्या नैसर्गिक विकासाच्या क्षमता आणि तिथे असलेल्या आणि निर्माण करता येऊ शकतील अशा रोजगार संधींचा शोध घेण्यासाठी केपीएमजी आणि पीडब्ल्युसी या दोन कंपन्यांना नियुक्त करण्यात आले होते त्यांनी काल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर सादरीकरण केले.
सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीस कौशल्य विकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.निवडण्यात आलेल्या सात जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत या सात जिल्ह्यात गुंतवणूक वाढवतांना येथे व्यापक रोजगार संधी निर्माण करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण करतांना ते पर्यावरणस्नेही, भौगोलिक गरजांची पुर्तता करणारे आणि स्थानिकांच्या उत्पन्नात वाढ करणारे रोजगार असावेत, त्यादृष्टीनेही या सर्वेक्षणात अभ्यास केला जावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.या दोन संस्थांनी सादर केलेल्या सर्वेक्षणानंतर उत्तम रोजगार जे प्रत्यक्षात कार्यान्वीत होऊन स्थानिकांना अधिक लाभदायक, रोजगारक्षम ठरू शकतील अशा उद्योग- व्यवसायाच्या स्थापनेसाठी दिशादर्शक नियोजन करून ते प्रत्यक्षात अंमलात आणले जाणार आहे.
या दोन संस्थांनी सात जिल्ह्यातील नैसर्गिक आणि भौगोलिक परिस्थिती, सध्या तिथे असलेले रोजगार, त्यांचे स्वरूप आणि भविष्यातील विकासाच्या वाटा, त्यातून निर्माण होणारे रोजगार याचा अभ्यास केला आहे. या सात शहरात कृषी, पणन, वन, कृषीप्रक्रिया केंद्र, पशुसंवर्धन- दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय, पर्यटन, वनोपज, माहिती तंत्रज्ञान, निसर्ग पर्यटन यासह इतर सर्व संबंधित क्षेत्रातील रोजगारांचे सादरीकरण झाले. स्थानिकांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या उत्पादनांचा गुणात्मक विकास, पणन व्यवस्थेची साखळी विकसित करणे, उत्पादन प्रक्रिया राबवितांना त्यात स्वच्छता आणि गतिमानता आणणे, या रोजगार संधीच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची निर्मिती करणे, शासनाच्या विविध योजनांच्या समन्वयातून योजनांच्या अंमलबजावणीला गती देणे, यादृष्टीकोनातून करावयाच्या नियोजनबद्ध प्रयत्नांवरही आजच्या सादीकरणादरम्यान चर्चा झाली.

Saturday, February 03, 2018

वनोपजांच्या ‘आॅनलाईन’ विक्रीत महाराष्ट्र देशात आघाडीवर

वनोपजांच्या ‘आॅनलाईन’ विक्रीत महाराष्ट्र देशात आघाडीवर


नागपूर/प्रतिनिधी:
Maharashtra leads the way in the sale of forest produce online | वनोपजांच्या ‘आॅनलाईन’ विक्रीत महाराष्ट्र देशात आघाडीवरबिजा लाकडापासून तयार झालेला ग्लास हा आॅनलाईन विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला असून अशा आॅनलाईन पध्दतीने वनोपजाची विक्री प्रक्रियेत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे, असे प्रतिपादन अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे केले. 
वनामती येथे वरिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या परिषदेच्या उद्घाटन समारंभात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. या परिषदेच्या उद्घाटन समारंभाला वनविभागाचे राज्यमंत्री राजे अंबरीश आत्राम, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीभगवान, मग्रारोहयोचे आयुक्त नाईक यांच्यासह वनाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
वनमंत्री मुनगंटीवार पुढे म्हणाले, केंंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून ज्या घोषणा वनविभागासाठी करण्यात आल्या आहेत त्यांचा योग्य अभ्यास करून, अर्थसंकल्पात वनविभागाला मिळालेल्या बाबींचे योग्य विश्लेषण करून राज्याला त्याचा लाभ कसा मिळेल, जास्तीत जास्त निधी कसा उपलब्ध होईल यादृष्टीने प्रभावी पाठपुरावा करण्याची गरज आहे. चंद्रपूरच्या वनअकादमीमध्ये राष्ट्रीय कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याच्या मागणीसाठी मी नवी दिल्लीत केंद्रीय कौशल्य विकासमंत्र्यांची भेट घेतली असता त्यांनी कौशल्य विकासाचे विद्यापीठच स्थापन करण्याची भूमिका घेतली. आपला पाठपुरावा व सादरीकरण उत्तम असले तर त्यांचे फलित उत्तमच असेल, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व वन राज्यमंत्री राजे अंबरीश आत्राम यांच्या हस्ते सिव्हील लिस्ट २०१८, विकासाच्या हिरव्या वाटा, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना, माळढोक अभ्यारण्यातील पक्षी व इतर वन्यजीव, फाऊंड आॅफ जळगाव डिस्ट्रीक्ट, फ्लॉवर्स आॅफ जळगाव डिस्ट्रीक्ट , सिंधुवाणी, सागवेश्वर व राधानगरी अभयारण्य या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

वनसंरक्षणासाठी भारतातील पहिली सुसज्ज ‘कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल’रुम
वनभवन येथे वनसंरक्षण व संवर्धनासोबतच वन्यजनावरांच्या संरक्षणासाठी तसेच नियंत्रणासाठी तयार करण्यात आलेल्या ‘कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल’ रुमचे उद्घाटन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले.
राज्यातील वन विभागामध्ये पारदर्शकता व गतिमानता आणण्यासोबतच वनसंरक्षण व संवर्धन तसेच प्रभावी नियोजनासाठी एकाच ठिकाणी सर्व माहिती उपलब्ध व्हावी यासाठी अत्याधुनिक तंत्राचा वापर असलेली आणि व्हिडिओ वॉल तसेच जीआयएस प्रणाली असलेली सर्वोत्कृष्ट ‘कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल’ तयार करण्यात आली आहे. यासाठी १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. १ जुलै ते ३० जुलैपर्यंतच्या वृक्षारोपण मोहिमेचे नियंयत्रण ‘कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल’ रुममधून करण्यासाठी व्यक्तीश: उपस्थित राहणार असल्याचे वनमंत्री मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील प्रधान मुख्य वनसंरक्षक, मुख्य वनसंरक्षक, उपवनसंरक्षक आदी कार्यालय थेट जोडण्यात आली आहेत. त्यामुळे प्रत्येक योजनांच्या तसेच आकस्मिक परिस्थिती हाताळण्यासाठी यापुढे शक्य होणार आहे.

Friday, November 17, 2017

37 हजार हेक्टर झुडपी जंगल क्षेत्र राखीव वन

37 हजार हेक्टर झुडपी जंगल क्षेत्र राखीव वन

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा  पुढाकार
 
नागपू/ प्रतिनिधी - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने नागपूर विभागातील 37 हजार हेक्टरहुन  अधिक झुडपी जंगल क्षेत्र राखीव वन म्हणून अधिसूचित करण्यात आले आहे.
नागपूर विभागातील झुडपी जंगल क्षेत्राबाबत केंद्र शासनाने गठीत केलेल्या उच्चाधिकार समितीच्या अहवालात 1,78,525 हेक्टर झुडपी जंगल क्षेत्रापैकी वनव्यवस्थापनास योग्य असलेले 92,116 हेक्टर क्षेत्र भारतीय वन अधिनियम, 1927 मधील कलम 4 व 20 अंतर्गत राखीव / संरक्षित वन म्हणून घोषित करण्याची शिफारस केली होती. भारतीय वन अधिनियम, 1927 मधील कलम 4 व 20 अंतर्गत राखीव वनक्षेत्र म्हणून अधिसूचित करण्याचे अधिकार राज्य शासनास आहेत. 

Wednesday, November 08, 2017

  मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने कटेझरी पोलीस मदत केंद्राच्या बांधकामासाठी २ हेक्टर वनजमीन वळती

मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने कटेझरी पोलीस मदत केंद्राच्या बांधकामासाठी २ हेक्टर वनजमीन वळती

Sudhir Mungantiwar


गडचिरोली/प्रतिनिधी:
गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील कटझेरी  येथे पोलीस मदत केंद्राच्या बांधकामासाठी २ हेक्टरची संरक्षित वनजमीन वळती करण्यास मान्यता देण्यात  आली असून  वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने  कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

या पोलीस मदत केंद्रामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास तसेच अवैध वृक्षतोड रोखण्यास मदत होणार आहे. पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयाने सार्वजनिक हिताच्यादृष्टीने  उपयुक्त पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ५ हेक्टरपर्यंतची वन जमीन वळती करण्याच्या प्रस्तावांना मान्यता देण्याचे अधिकार राज्य शासनाला सुपुर्त केले आहेत.  या अधिकाराचा वापर करून वनमंत्री म्हणून यासंबंधीच्या अटी आणि शर्तींचे पालन करत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
गडचिरोली हा केंद्र शासनाने देशातील ६० नक्षलग्रस्त प्रभावित जिल्ह्यांच्या यादीत समाविष्ट केलेला जिल्हा आहे. वळती करण्यात आलेली वनजमीन  ही या नक्षलग्रस्त भागातील जनतेच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने महत्वाच्या कामासाठी वापरण्यात येणार असल्याने त्यास मान्यता देण्यात आली आहे 

Monday, November 06, 2017

विसापूर येथे ‘हिरवाई’ बांबू स्वयंरोजगार केंद्र स्थापन

विसापूर येथे ‘हिरवाई’ बांबू स्वयंरोजगार केंद्र स्थापन


बांबु संषोधन व प्रषिक्षण केंद्रचा स्तूत्य उपक्रम

विसापूरः- बांबू संषोधन व प्रषिक्षण केंद्र, चिचपल्लीच्या सहकार्याने नुकतेच विसापूर येथे बांबु आधारीत रोजगाार व स्वयंरोजगारासाठी ‘हिरवाई’ बांबु स्वयंरोजगार केंद्र (काॅमन फॅसिलिटेषन सेंटर) स्थापन करण्यात आले.

Friday, April 17, 2015

हिरव्या सोन्याला नवी झळाळी...

हिरव्या सोन्याला नवी झळाळी...

हिरव्या सोन्याला नवी झळाळी...गुरुवार, १६ एप्रिल, २०१५
हिरव सोनं म्हणून ज्या गवताला ओळखलं जातं ते सोन्याचं गवत म्हणजे बांबू. शेती प्रधान असलेल्या आपल्या देशात बांबूचे उत्पादन आणि त्यावर आधारीत उभी राहणारी इंडस्ट्री खरं तर एका कृषी क्रांती इतकी महत्त्वाची. हीच बाब लक्षात घेऊन नवीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बांबू धोरणाला चालना दिली आहे. खास महान्युजसाठी त्यांच्याशी केलेली ही बातचीत.