সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, March 30, 2014

नरेंद्र मोदी- नांदेळ

नरेंद्र मोदी- नांदेळ

-श्री चिदंबरम Nirbhaya फंड वर राष्ट्र उत्तर द्या: नांदेड मध्ये नरेंद्र मोदी
मोदी: अंतिम बजेट शासकीय Nirbhaya फंड,
महिलांसाठी सुरक्षा सुधारण्यासाठी खर्च नसतो एकच पैसा सह अप आले, ते दिशाभूल लोक आहेत

आप मुझे मौका दो, कला धन आएगा और इसको गरीब लोगों की भलाई में लगा दूंगा - श्री
काँग्रेस दिल्लीला बलात्काराची राजधानी बनवत आहे: नरेंद्र मोदी
काळा पैसा ज्यांच्याकडे नैसर्गिकरित्या काळा पैसा यायचं करू नका. भारत काळा पैसा परतावा मागणी:
काळा पैसा परत किंवा नाही यावे. प्रत्येक पैसा परत आणला पाहिजे:
दोषी नेत्यांवर कारवाई करताना सत्ताधारी आणि विरोधक असा भेदभाव करणार नाही-
दिल्ली मध्ये शासकीय त्या पैसे परत आणण्यासाठी नाराज आहेत
सात जणांचा मृत्यू

सात जणांचा मृत्यू

अमरावती शहरातील परतवाडी येथील टीळक चौकातील एका कपड्याच्या दुकाणाला रात्री उशीरा आग लागून एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला आहे.

Saturday, March 29, 2014

गारपीटग्रस्त मुंडलवासीयांना मैत्रेयचा मदतीचा हात

गारपीटग्रस्त मुंडलवासीयांना मैत्रेयचा मदतीचा हात

गारपीटग्रस्त मुंडलवासीयांना मैत्रेयचा मदतीचा हात

प्रत्येक कुटूंबाला तीन शेळ्यांची मदत. ६३ कुटूंबांना मिळणार याचा लाभ

यवतमाळ - यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुका येथे मुंडल गाव आहे. इथले गावकरी शेतमजूरी करून आपला ऊदरनिर्वाह करतात. विदर्भातील यवतमाळ जिल्हयाला सदैव दुष्काळाने ग्रासलेले आहे. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ आपले भीषण रूप घेउनच उभा ठाकत असतो. यंदा अवकाळी पाऊस आणि
गारपीटीने शेतकरी, शेतमजूर हवालदिल झाले आहेत. गारपीटीत अनेक जनावरे, कोंबड्या, शेळ्यांचा जीव
गेला. अनेक समस्यांना सामोरे जाणा-या या गावाची मुलभूत गरज ओळखून मैत्रेय फाऊन्डेशन,
समन्वयीत कृषी विकास प्रकल्प (कृषी समृद्धी) आणि छखथउधऊ नागपूर यांच्या पुढाकाराने यवतमाळ
मधील मुंडल गावात दुभत्या शेळ्या अल्पदरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आधूनिक भारतातील
या गावाची ही हलाखीची परिस्थिती लक्षात घेऊन मैत्रेय फाऊन्डेशनने हे गाव दत्तक घेतले आहे. या दत्तक
योजनेच्या शुभारंभी गावातील प्रत्येक कुटूंबाला तीन दुभत्या शेळ्या देण्यात आल्यात. प्रत्येक शेळीचा विमा
काढलेला आहे. तसेच दहा दिवसात शेळी अनावधानाने का असेना मरण पावली तर त्या बदली दुसरी शेळी
त्या कुटूंबाला देण्यात येईल. दत्तक योजनेचा शुभारंभ कार्यक्रम आज दि. २८ मार्च रोजी मुंडल येथे झाला. कार्यक्रमाला यवतमाळ जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अधिकारी प्रभाकर सुरेश मिश्रा, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया ब्रँच व्यवस्थापक साहू, सेंद्रिय शेतीचे तज्ञ श्रीकांत बयंकरम म्हैसूर. प्रामुख्याने उपस्थित होते. मैत्रेय विदर्भ प्रतिनिधी पांडुरंग बंडगर, गुरूदत्त शेणॉय, मैत्रेय फाऊन्डेशनच्या प्रतिनिधी अनिता खुडे आणि समस्त गावकरी कार्यक्रमाला उपस्थिती होते. गावाची एकूण परिस्थिती लक्षात घेऊन शेळी पालन व्यवसाय गावक-यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देणारा आहे. 
मल्हार सेनेचे कोणालाच समर्थन नाही

मल्हार सेनेचे कोणालाच समर्थन नाही

चंद्रपूर, : येत्या लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात धनगर समाजाचे मत निर्णायक ठरणार आहे. आजवर सरकारने धनगर समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्षच केले आहे. ही बाब लक्षात घेवून धनगर समाज जय मल्हार सेनेने अजूनपर्यंत कोणत्याही पक्षाला पाठींबा दिलेला नाही, असे जय मल्हार सेनेचे प्रदेश सरचिटणीस संजय कन्नावार यांनी कळवले आहे.
आज जारी केलेल्या एका पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, जय मल्हार सेनेला आजवर सर्वच पक्षांनी आश्वासने दिली. आम्ही आमदारांच्या घरासमोर धरणे आंदोलन केले. हिवाळी अधिवेशनावर समाजाचा मोर्चाही काढण्यात आला. मात्र आमच्या समाजाला अनुसूचित जातींच्या सवलती मिळाव्या यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाने प्रयत्न केले नाही असा आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भात जय मल्हार सेनेच्या कार्यकत्र्यांच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी या पत्रकात म्हटले आहे.

Friday, March 28, 2014

गडचिरोलीतील आदिवासींना शिक्षण सुविधा- राहुल गांधी

गडचिरोलीतील आदिवासींना शिक्षण सुविधा- राहुल गांधी

गडचिरोली- गुजरात मॉडेल'पेक्षा महाराष्ट्राच्या विकासाचे मॉडेल अधिक पटीने चांगले आहे, गडचिरोलीतील आदिवासींना शिक्षण सुविधा देवू असे कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (शुक्रवार) येथे म्हटले आहे. 

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) पंतप्रधानपदाचे उमेदवार व गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, "देशात सध्या गुजरातच्या विकासाचे मार्केटिंग सुरू आहे. परंतु, 'गुजरात मॉडेल'पेक्षा महाराष्ट्राचे विकासाचे मॉडेल अधिक चांगले आहे. महाराष्ट्रात परकीय गुंतवणुकीची टक्केवारी गुजरातपेक्षाही अधिक असून, महाराष्ट्राची प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.' 
सन 2004 व 2009 मध्ये नागरिकांनी 'भाजप'च्या मार्केटींगचा फुगा फोडला आहे. यावेळीही नागरिक नक्कीच 'भाजप'च्या सध्या सुरू असलेला 'गुजरात मॉडेल'चा फुगा फोडून कॉंग्रेसला पसंती देतील, असा विश्वासही राहुल गांधी यांनी व्यक्त केला. 
ते पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विकासासाठी प्रयत्न केले आहेत. कॉंग्रेसने 'मनरेगा' सारखी महत्त्वपूर्ण योजना राबवून खेड्यातील गरीब जनतेचे रोजगाराचे प्रश्ने सोडविले. मात्र, दुसरीकडे 'भाजप'कडून विकासाच्या नावे जनतेच्या डोळ्यात धूळफेक सुरू आहे.'

Thursday, March 27, 2014

पक्ष, उमेदवार  आणि चिन्ह

पक्ष, उमेदवार आणि चिन्ह

पक्ष, उमेदवार  आणि चिन्ह 

  1. हंसराज गंगाराम अहिर, भारतीय जनता पार्टी (कमळ),
  2.  हंसराज गुलाब कुंभारे, बहुजन समाज पार्टी (हत्ती),
  3.  संजय वामनराव देवतळे, इंडियन नॅशनल काँग्रेस (हात).
  4.  अशोक विठोबाजी खंडाळे, रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (पतंग),
  5. कुरेशी म.इकलाख म.युसूफ, सोशालिस्ट पार्टी (इंडिया) (बॅटरी टॉर्च),
  6. रोशन जांबुवंतराव घायवन, रिपब्लीकन पार्टी (खोरीप) (शिवणयंत्र), 
  7. वामनराव सदाशिव चटप, आम आदमी पार्टी (झाडू),
  8. नितीन वंसत पोहाने, लोकभारती (पाटी), 
  9. नंदकिशोर गंगाराम रंगारी, आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया (कोट),
  10. पंकजकुमार अजाबलाल शर्मा, ऑल इंडिया तृणमुल काँग्रेस (फुले व गवत),
  11. फिराज उस्मान खान पठाण, बहुजन मुक्ती पार्टी (खाट), 
  12. सिद्धार्थ रमेशचंद्र राऊत, प्रबुद्ध रिपब्लीकन पार्टी (दूरदर्शन).
  13. अतुल अशोक मुनगीनवार (नारळ),
  14. कार्तीक गजानन कोडापे (करवत),
  15. नामदेव मानिक शेडमाके (ॲटोरिक्शा), 
  16. प्रमोद मंगरुजी सोरते (बॅट),
  17. विनोद दिनानाथ मेश्राम (छताचा पंखा) 
  18. संजय निळकंठ गावंडे (कपबशी) 

--------------------
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघ

  1. भारतीय जनता पार्टीचे अशोक महादेवराव नेते, 
  2. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नामदेव आनंदराव कन्नाके,
  3. इंडियन नॅशनल काँग्रेसचे डॉ. नामदेव दल्लुजी उसेंडी, 
  4. बहुजन समाज पक्षाचे रामराव गोविंदा नन्नावरे, 
  5. आम आदमी पार्टीचे डॉ. गजबे रमेशकुमार बाबुरावजी, 
  6. बहुजन मुक्ती पार्टीचे दिवाकर पेंदाम, 
  7. आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाचे देवराव मोनबा नन्नावरे,
  8. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ॲड. प्रभाकर महागुजी दडमल, 
  9. समाजवादी पार्टीचे विनोद अंकुश नन्नावरे,
  10. ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसचे सतीश गोकुलदास पेंदाम 
  11. अपक्ष दांडेकर बाबुराव लक्ष्मण
मांसाहार व शाकाहार जेवणाची लज्जत वाढवणारा सफेद कांदा विक्रीसाठी बाजारात दाखल झाला आहे.
PHOTO, samir molade
उदरनिर्वाहासाठी मिळाल्या हक्काच्या शेळ्या

उदरनिर्वाहासाठी मिळाल्या हक्काच्या शेळ्या

मैत्रेयच्या पुढाकाराने मनाडीवासीयांना 
उदरनिर्वाहासाठी मिळाल्या हक्काच्या शेळ्या

अकोला - अकोल्यापासून अवघ्या २० किलोमीटर अंतरावर असलेले मनाडी गाव स्वातंत्र्याच्या साठ वर्षाच्या काळानंतरही मुलभूत सोयीसुविधांपासून उपेक्षीतच असावे ही खरोखरच शोकांतीकाच म्हणावी. त्यातच यंदाच्या गारपीटीने शेतक-यांना मोठं नुकसान भोगावं लागतंय. गारपीटीत अनेक जनावरे, कोंबळ्या, शेळ्यांचा जीव गेला. अनेक समस्यांना सामोरे जाणा-या या गावाची मुलभूत गरज ओळखून मैत्रेय फाऊन्डेशन, समन्वयीत कृषी विकास प्रकल्प आणि छखथउधऊ नागपूर यांच्या पुढाकाराने अकोल्यातील मनाडीवासीयांना दुभत्या शेळ्या अल्पदरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या गावात एकूण चाळीस कुटूंबांचे वास्तव्य आहे. येथे ना पाण्याची सोय, ना शाळा, ना पक्की घरे. शेतमजूरी करणारी ही कुटूंब कसाबसा दिवस काढत जगतात. आधूनिक भारतातील या गावाची ही हलाखीची परिस्थिती लक्षात घेऊन मैत्रेय फाऊन्डेशनने हे गाव दत्तक घेतले आहे. या दत्तक योजनेच्या शुभारंभी गावातील प्रत्येक कुटूंबाला तीन दुभत्या शेळ्या देण्यात आल्यात. प्रत्येक शेळीचा विमा काढलेला 
आहे. तसेच दहा दिवसात शेळी अनावधानाने का असेना मरण पावली तर त्या बदली दुसरी शेळी त्या कुटूंबाला देण्यात येईल. दत्तक योजनेचा शुभारंभ कार्यक्रम काल दि. २६ मार्च रोजी मनाडी येथे झाला. कार्यक्रमाला महिला आर्थिक विकास महमंडळचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय संगेकर, अकोला जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक प्रशांत गावंडे, मैत्रेय फाऊन्डेशनच्या प्रतिनिधी अनिता खुडे, पत्रकार सुर्यकांत 
भारतीय यांनी यावेळी गावक-यांना मार्गदर्शन केले. चाळीस कुटूंबाच्या या गावी प्रत्येक कुटूंबाला तीन शेळ्या देण्यात आल्या. अशा एकशे वीस शेळ्यांचे वाटप करण्यात आले. गावातील प्रत्येक 
कुटूंबातील स्त्री ही वेगवेगळ्या बचतगटाला जुडलेली आहे. बचतगटातील महिलेनीच त्यांची ही गरज स्थानीक अधिका-यांकडे व्यक्त केली आणि मैत्रेय फाऊन्डेशन आणि स्थानिक अधिका-यांच्या पुढाकाराने गावक-यांना त्यांच्या हक्काच्या मुलभूत सुविधा पुरविण्याचे योजले.गावाची एकूण पकरिस्थिती लक्षात घेऊन शेळी पालन व्यवसाय मनाडीवासीयांना आर्थिक स्थैर्य मिळवून देणारा आहे असे दिसते. मनाडी गावातील प्रमिला वासुदेव इंगळे यांचा नवरा शेतमजुरी करतो. कसंबसं दोन वेळची भ्रांतही निघणं कठीण. परंतू जवळ असलेल्या दोन शेळ्यांमुळे त्यांना थोडीशी मदत झाली. प्रमिलातार्इंनी शेळ्यांच्या सहाय्यानेच मुलीचं लग्न, मोठ्या मुलाचं डी एड आणि लहान मुलाचही शिक्षण त्या करू शकत आहेत. दोन्ही मुलं विज्ञान शाखेतून दरवर्षी प्रथम येण्याचाच मान पटकावित आलेत. लहान अमर सध्या १२ वी ला शिकतोय 
पुढे त्याला उच्च शिक्षणं घेण्याचं स्वप्न आहे मात्र परिस्थितीने त्याचा तो स्वप्न पाहण्याचाही अधिकार हिरावून घेतलाय. शासनाकडे त्याने मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. कार्यक्रमाला समस्त गावकरी, मैत्रेयचे चंद्रकांत सानप शेगाव, अमोल बैस इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते. 

Wednesday, March 26, 2014

क्षयरोग  दिन

क्षयरोग दिन

क्षयरोग  दिन  कार्यक्रम  दिनांक  २४  मार्च  रोजी  आयोजित  सिकलसेल  शिबीर , विशेष  रोगनिदान  शिबीर  (गरोदर  माता , स्तनदा  माता , कुपोषित  बालकांच तपासणी ) या  आयोजित  कार्यक्रमाला  बालरोग  तज्ञ  ड. भावेश  मुसळे   डा   कविता  गांधी , हे  प्रामुख्याने  उपस्थित  होते  यांच्या  उपस्थीत  येथील  रुग्णांची  तपासणी  करण्यात  आली .
या  कार्यक्रमाला  एकूण   रुग्ण  २०४ , तर  गरोधार  माता  ३८ , 27  लहान  बालकांची  तपासणी  करण्यात  आलि.
कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी  आणि  उद्घाटक  मानून  बालविकास  आरोग्य  अधिकारी  संगीता  भांगरे  तर  प्रमुख  पाहुणे  मानून  कोउशल्ल्य  आडवाणी  ह्या  उपस्थित  होत्या , कार्यक्रमाच्या  याश्श्वितेसती  दुर्गापू र  आरोग्य  केडरचे  प्रमुख  द्र.  माधुरी मेश्राम ,  डा  प्रफुल हुल्के  & कर्मचारी  वृन्दानी  अथक  परिश्रम  घेतले. 

Tuesday, March 25, 2014

ज्येष्ठ अभिनेत्री बेबी नंदा यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेत्री बेबी नंदा यांचे निधन



मुंबई, दि. २४ मार्च सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री बेबी नंदा यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ७५ वर्षांच्या होत्या. मास्टर विनायक यांच्या कन्या असलेल्या बेबी नंदा यांनी आपल्या अदाकारीने qहदी सिनेसृष्टीत स्वतःचा असा एक वेगळा ठसा उमटवला होता. बालकलाकार म्हणून नंदा यांनी चंदेरी दुनियेत पाऊल ठेवले आणि शेवटपर्यंत त्यांना ङ्कबेबीङ्क या नावानेच ओळखत होते.

बेबी नंदा यांचा एका मराठी कुटुंबात जन्म झाला होता. त्यांचे वडील विनायक दामोदर कर्नाटकी मराठी सिनेमाचे दिग्दर्शन करत असते. लहानपणी वडील वारल्यानंतर त्यांनी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी उचलली. बेबी नंदा १२ वर्षांच्या असताना ङ्ककुलदैवतङ्क या सिनेमातून नायिका म्हणून झळकल्या. या सिनेमानंतर त्यांनी मराठीत सहा सिनेमे केले. त्यानंतर काका व्ही. शांताराम यांनी त्यांना qहदीमध्ये ब्रेक दिला. बेबी नंदा यांनी बालकलाकार म्हणून मंदिर, जग्गू, शंकराचार्य, अंगारे, जगद्गुरू आदी सिनेमा महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. नंदा अभिनेत्री म्हणून चमकल्या त्या ङ्कतुफान और दियाङ्क या सिनेमातून २५ आठवडे चाललेल्या या सिनेमाने नंदाची कारकीर्द बहरली. मग ङ्कछोटी बहनङ्क, ङ्ककालाबाजारङ्क, ङ्कलक्ष्मीङ्क, ङ्कदुल्हनङ्क, आणि ङ्कभाभी..भाभीङ्क हे सिनेमे ५० आठवडे बॉक्स ऑफिसवर चालले. त्यानंतर अभिनेत्री, बहिणीच्या रुपात, पत्नीच्या रुपात, आईच्या आणि खलनायिका म्हणूनही त्या प्रेक्षकांसमोर आल्या. पण त्यांची ही ओळख चाहत्यांच्या मनात कायमच घर करून राहिली. एवढंच नाहीतर ङ्कभैया मोरे राखी के बंधन को निभानाङ्क सारख्या गाण्यांनी तिला बहिणीच्या भूमिकेमध्ये जखडून टाकले. त्यानंतर ङ्कधूल का फूलङ्क, ङ्कआंचलङ्क, ङ्कप्रेमरोगङ्क यांसारख्या सिनेमात अभिनय केला. राज कपूरसोबत ङ्कआशिकङ्कमध्ये तर राजेश खन्नासोबत ङ्कइत्तेफाकङ्क मध्ये तिने रंगविलेल्या खलनायिकाही प्रेक्षक अजून विसरलेले नाहीत. विविध नायकांसोबत काम करताना बेबी नंदा यांनी त्यांचे घरही सांभाळले. अभिनयासाठी बेबी नंदा यांना अनेक फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाले.



सनीच्या ङ्करागिणी एमएमएस २ङ्क करतोय बॉक्स ऑफिसवर धमाल

पहिल्या आठवड्यात २४.५ कोटींची कमाई

मुंबई, दि. २४ मार्च (qह.स.)ः बॉलिवूडमधी पोर्नस्टार सनी लिओनचा ङ्करागिणी एमएमएस२ङ्क सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली असून पहिल्या आठवड्यात २४.५ कोटीं रुपयांचा आकडा पार केला आहे. एकीकडे क्रिकेट टी-२० विश्वचषक सुरू असताना आणि टीम इंडिया फॉर्ममध्ये असतानाही सनीची जादू त्यावरही भारी पडताना दिसत आहे. तसेच सलग तीन आठवडे चालणारा कंगना रानावतचा ङ्कक्वीनङ्क अजून बॉक्स ऑफिसवर कमाई करत आहे. तिसèया आठवड्यात या सिनेमाने ४७ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे सनीचा ङ्करागिणी एमएमएस २ङ्क कंगणाच्या सिनेमाला टक्कर देत ४७ कोटींचा रेकाँर्ड तोडू शकेल का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

२१ मार्चला ङ्करागिनी एमएमएस २ङ्कसह ङ्कआँखो देखीङ्क, ङ्कगँग ऑफ घोस्टङ्क हे सिनेमे प्रदर्शित झाले होते. परंतु सनीच्या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर शानदार ओपqनग मिळाली. सिनेमाने पहिल्या आठवड्यात २४ कोटींहून अधिक कमाई केली आहे. अभिनयाशी फारसे देणेघेणे नसलेल्या सनीने तिच्या बोल्ड रुपाला शोभणारी व्यक्तीरेखा साकारली आहे. त्यामुळे सिनेमागृहाबाहेर हाऊस फुलचा बोर्ड पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवशी ८.४३ कोटी, दुसèया दिवशी ७.२९ आणि तिसèया ८.७८ कोटी रुपयांची दणदणीत कमाई या सिनेमाने केली आहे. तर एकाच दिवशी प्रदर्शित झालेला दिग्दर्शक सतीश कौशिक यांचा ङ्कगँग ऑफ घोस्टङ्क हा हॉरर सिनेमा तीन दिवसात जेमतेम एक कोटींचा आकडा पार करू शकला आहे. शिवाय रजत कपूर यांच्या ङ्कआँखो देखीङ्क या सिनेमाने अधिक परिश्रमानंतर बॉक्स ऑफिसवर फक्त १५ लाख रुपयांचा पल्ला गाठू शकला आहे.

Monday, March 24, 2014

गडचिरोलीत नक्षलवादामुळे उमेदवारांचा प्रचार झाला हायटेक !

गडचिरोलीत नक्षलवादामुळे उमेदवारांचा प्रचार झाला हायटेक !

गडचिरोली, दि. २४ मार्च
नक्षलवाद्यांच्या प्रभावामुळे दुर्गम भागात प्रचार करू शकणाèया गडचिरोलीतील उमेदवारांना हेलिकॉप्टर देण्याचा निर्णय काँग्रेस व भाजपने घेतला आहे. यामुळे राज्यात सर्वात मागास असलेल्या या मतदारसंघातील प्रचार मात्र हायटेक होणार आहे.

राज्याच्या टोकावर असलेल्या गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात नक्षलवाद्यांच्या प्रभावामुळे निवडणूक घेणे प्रशासकीय यंत्रणेसाठी नेहमीच जोखमीचे काम होऊन बसले आहे. निवडणूक प्रक्रियेत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्नसुद्धा त्यांच्याकडून होतो. यावर उपाय म्हणून दुर्गम भागातील मतदान केंद्रावर कर्मचारी व इतर सामुग्री पोहोचवण्यासाठी प्रशासनाकडून हेलिकॉप्टरचा वापर केला आहे. आता तोच कित्ता राजकीय पक्षांनीसुद्धा गिरवण्याचे ठरवले आहे. या मतदारसंघातील अहेरी, गडचिरोली, वडसा व आमगाव या चार विधानसभा मतदारसंघात नक्षलवाद्यांचा सर्वाधिक प्रभाव आहे. निवडणूकीतील उमेदवार हा धोका टाळण्यासाठी दुर्गम भागात प्रचारासाठी जातच नाहीत. येथे काँग्रेसकडून आमदार डॉ. नामदेव उसेंडी, तर भाजपकडून अशोक नेते रिंगणात आहेत. या वेळी खर्च मङ्र्मादा वाढवण्यात आल्याने हेलिकॉप्टरचा वापर करणे श्नय झाले आहे, असे या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सांगितले.
एकाच ठिकाणी मिळणार निवडणुकीच्या सर्व सुविधा

एकाच ठिकाणी मिळणार निवडणुकीच्या सर्व सुविधा

चंद्रपूर, लोकसभा निवडणूकीसाठी लागणा-या सर्व परवानग्या एकाच ठिकाणी देण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी चंद्रपूर यांच्या काङ्र्मालयात सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या कक्षाचे कामकाज सुरू झाले आहे.

निवडणूक आयोगाने निवडणूकीची कामे सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हास्तरावर एक खिडकी योजना सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार चंद्रपूर येथे जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांच्या नेतृत्वात स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. त्यांच्यासोबत विविध विभागाचे आठ अधिकारी नेमण्यात आले आहेत. राजकीय पक्षाच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी निवडणूकीसाठी लागणाèया परवानग्यांसाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात येईल, असे सांगितले होते. त्यादरम्यान निवडणूक आयोगाने एक खिडकी योजना सुरू करण्याचे निर्देश दिले. या कक्षात सहाय्यक मोटार निरीक्षक सुहास कट्टे, राज्य विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता नगराळे, महानगरपालिकेचे शहर अभियंता बारई, जिल्हा विशेष शाखेचे सहाय्यक उपनिरीक्षक अकबर अली, आरोग्य विभागाचे एन. बी. ङ्कुलझेले इत्यादींची यावेळी नेमणूक करण्यात आली आहे.
निवडणूकांवर नक्षलवाद्यांची गडद छाया

निवडणूकांवर नक्षलवाद्यांची गडद छाया


गडचिरोली, नक्षलदृष्ट्या संवेदनशील असलेल्या गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात येत्या १० एप्रिल रोजी होणाèया लोकसभा निवडणूकीवर नक्षली कृत्यांची छाया राहणार आहे. २००९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये एकंदरीत ५५ घटना घडल्या होत्या.

गत लोकसभा निवडणूकीचा विचार केल्यास नक्षली प्रत्येक निवडणूकीच्या वेळी पोलिस विभागाला आपले लक्ष्य बनविण्याचा प्रयत्न करीत असतात. २००४ च्या लोकसभा निवडणूकीच्या दरम्यान नक्षल्यांनी पोलिस पथकावर १२ हल्ले केले होते. एक हत्या झाली होती. २००४ च्या लोकसभा निवडणूकीत एकंदरीत २३ qहसात्मक घटना पडल्या होत्या. २००४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीच्या दरम्यान एकंदरीत १९ qहसात्मक घटना घडल्या होत्या. या निवडणूकीदरम्यान पोलिस पथकावर हल्ला करण्याच्या १२ घटना घडल्या होत्या. २ जणांची हत्या झाली होती. तसेच इतर ३ qहसात्मक घटना घडल्या होत्या. २००९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान एकंदरीत ५५ qहसात्मक घटना घडून आल्या होत्या. या निवडणूकी दरम्यान पोलिस पथकावर हल्ल्याच्या १३ घटना घडल्या होत्या. २००९ च्या लोकसभा निवडणूकी दम्यान नक्षली हल्ल्यात ३ पोलिस शहीद झाले होते. ९ व्यक्तींच्या हत्या करण्यात आली होती. इतर स्वरूपाच्या १० qहसात्मक घटना घडल्या होत्या. २००९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणूकीदरम्यान एकंदरीत ५७ qहसात्मक घटना घडून आल्या होत्या. पोलिस पथकावर हल्ल्याच्या १२ घटना घडल्या होत्या. यामध्ये १७ पोलिस जवान ठार झाले होते. तसेच ४ पोलिस जवान जखमी झाले होते. या कालावधीत ७ इतर घटना घडल्या होत्या.
चंद्रपुरात कांग्रेसजणांची नाराजी उघड

चंद्रपुरात कांग्रेसजणांची नाराजी उघड

चंद्रपूर, काँग्रेसकडून माजी खासदार नरेश पुगलिया यांना तिकीट न देता मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्याच विरोधात काम करणाèया संजय देवतळे यांना उमेदवारी दिल्याचा आरोप केला जात आहे. बल्लारपूर नगर परिषदेच्या अध्यक्षा रजनीताई मुलचंदानी यांच्यासह १३ नगरसेवकांनी काँग्रेस सदस्यत्व व पदाचा राजीनामा पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पाठविला आहे. चंद्रपूर मनपातील नगरसेवकांच्या पाठोपाठ आता बल्लारपूरच्या नगरसेवकांनीही राजीनामा अस्त्र उगारल्याने चंद्रपूर बल्लारपूर क्षेत्रात काँग्रेसअंतर्गत खळबळ उडाली आहे.

बल्लारपूर नगर परिषदेत कांग्रेसची सत्ता आहे. येथे पुगलिया समर्थकांची चलती असल्याने पुगलिया गट सत्तेत आहे. आता लोकसभा निवडणूकीसाठी पक्षाकडून पुगलिया यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांचे समर्थक पक्षनिर्णयाविरोधात उघडपणे बंड करू लागली आहेत. बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी यांनीही पक्षाध्यक्षाकडे नाराजीचे निवेदन पाठविले असून बल्लारपूर पंचायत समितीचे सभापती हरीष गेडाम व पंचायत समिती सदस्य जनकेश्वर मेश्राम यांनीही आपला पदाचा राजीनामा पक्षाध्यक्षांकडे पाठविला असल्याची विश्वसनीय माहिती प्राप्त झाली आहे. काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नावाने बल्लारपूरच्या नगरसेवकांनी एक निवेदन पाठविले. त्या निवेदनात संजय देवतळे यांना उमेदवारी देण्याचा पक्षाचा निर्णय चुकीचा असल्याचे नमूद करण्यात आले. मागील २००९ च्या निवडणुकीत संजय देवतळे यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या चंद्रपूरच्या सभेत गैरहजेरी लावली व त्यानंतर त्यांना पक्षाकडूनच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. याचा उल्लेख करण्यात आला असून पक्षविरोधी कारवाया करणाèया व्यक्तीला उमेदवारी देण्याचा निर्णय त्वरित बदलविण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
विदर्भातील सर्वात श्रीमंत उमेदवार

विदर्भातील सर्वात श्रीमंत उमेदवार

 पटेल दांपत्याकडे नाही स्वत:ची गाडी !

भंडारा भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातील राष्ट्रवादीचे उमेदवार प्रफुल्ल पटेल हे विदर्भातील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. ते आणि त्यांच्या पत्नी वर्षा पटेल यांच्या नावाने १९५.९६ लाख ८४ हजार ७७९ रुपङ्मे एवढी संपत्ती असून एकट्या प्रफुल्ल पटेलांच्या नावे ७१ कोटी ५९ लाख ३२ हजार ४४६ रुपयांची संपत्ती असल्याचे समजते. असे असले तरी, प्रफुल्ल पटेल qकवा वर्षा पटेल यांच्यापैकी कुणाकडेही दुचाकी qकवा चारचाकी वाहन नसल्याचे स्पष्ट होते. कोणत्याही प्रकारे वाहन नसलेले हे पटेल दाम्प्त्ङ्म मात्र कोट्यधीश आहेत हे विशेष. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात असलेल्या प्रफुल्ल पटेलांनी उमेदवारी अर्ज सादर केला. या अर्जासोबत जोडण्यात आलेल्या संपत्ती संदर्भातील शपथपत्रातून अनेक गोष्टी स्पष्ट होतात. पटेलांनी ते आणि त्यांच्या पत्नीच्या नावाने असलेल्या संपत्तीचा हिशोब शपथपत्रात दिला आहे

सन २०१२-१३ मध्ङ्मे प्रफुल्ल पटेल यांची एकूण नगदी आवक ४ लाख ३ हजार ९३० रुपङ्मे, तर वर्षा पटेल यांची एकूण नगद आवक ३ कोटी ५७ लाख ४७ हजार ८८० रुपङ्मे आहे. प्रफुल्ल पटेल यांच्याजवळ ३ हजार रुपङ्मे नगदी, २७ लाख ८० हजार ७४ रुपङ्मे बंकेत जमा राशी, २ कोटी ८० ल ाख ४९ हजार ७२० रुपयांचे बंधपत्रे, ऋणपत्रे आणि शेअर्स अशी गुंतवणूक आहे. २१ लाख २४ हजार ४४ ऋणकोकडून इतर प्राप्त देणी व रक्कम १ कोटी २६ लाख ५५ हजार ८७५ रुपयांचे दागिने, ४ कोटी ५६ लाख १२ हजार ७१४ रुपयांची चल संपत्ती आणि ६७ कोटी ३ लाख १९ हजार ७५० रुपयांची अचल अशी एकूण ७१ कोटी ५९ लाख ३२ हार ४४६ रुपयांची संपत्ती पटेलांनी स्वतःच्या नावाने घोषित केली आहे. वर्षा पटेल यांच्या नावे नगदी ४६३० रुपङ्मे ८० लाख २ हजार ८९१ रुपयांची बँकेत जमा रक्कम, १ कोटी ५५ लाख ४८ हजार ९५८ रुपयांचे बंधपत्रे, ऋणपत्रे आणि शेअर्स अशी गुंतवणूक ६ कोटी ४२ लाख ६३ हजार ८१८ ऋणकोकडून इतर प्राप्त देणी व रक्कम, २ कोटी ५० लाख ४२ हजार ५१८ रुपयांचे दागिने, ११,कोटी २८ लाख ६२ हजार ८१५ रुपयांची चल संपत्ती व ११३ कोटी ८ लाख ९० हजार ५०० रुपयांची अचल संपत्ती अशी एकूण १२४ कोटी ९६ लाख ८५ हजार ७७९ रुपयांची संपत्ती असल्याचे घोषित करण्यात आली आहे.
नरेंद्र मोदीनंतर आता राहुल गांधी वर्धेत!

नरेंद्र मोदीनंतर आता राहुल गांधी वर्धेत!

वर्धा, वर्धा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस व मित्र पक्षाचे उमेदवार सागर मेघे यांच्या प्रचारार्थ दि. २८ मार्चला अ. भा. काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांची जाहीर सभा स्थानिक लोक महाविद्यालयामागील जुन्या आरटीओ मैदानावर आयोजित करण्यात आली आहे.

देशात लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस पक्षांतर्गत निवडणूक घेऊन उमेदवारी देण्यात आली. त्यामध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघाचाही समावेश होता. त्यामुळे हा मतदारसंघ संपूर्ण राज्यभरात चर्चेचा विषय ठरला.भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार व गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकताच २० मार्चला वर्धा येथून लोकसभा प्रचाराचा शुभारंभ केला.या सभेत मोदींनी काँग्रेसच्या धोरणांवर जोरदार हल्ला चढविला होता. परिणामी या सभेचीही चर्चा देशभरात झाली. या क्षेत्रातून भाजपाने माजी आमदार रामदास तडस यांना उमेदवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे महात्मा गांधी व विनोबा भावे यांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाèया सेवाग्राम वर्धा येथून मोदींच्या हस्ते निवडणूक प्रचाराचा शुभारंभ झाल्याने काँग्रेसला या सभेवर मात करण्यासाठी भव्य दिव्य सभा घेणे अत्यावश्क वाटू लागले होते. अखेर राहुल गांधी यांची जाहीर सभा घेण्याबाबत दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांनी होकार दर्शविल्याने खा. दत्ता मेघे, राज्यमंत्री रणजित कांबळे, काँग्रेसचे लोकसभा उमेदवार सागर मेघे व काँग्रेसच्या मित्र पक्षांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जय्यत तयारीला लागले आहेत. राहुल गांधी हे यापूर्वी सेवाग्राम येथे २४ जानेवारी २०१४ ला आले होते. मागील २००९ च्या लोकसभा निवडणुकीतही खा. दत्ता मेघे यांच्या प्रचारासाठी खा. राहुल गांधी यांची ऐतिहासिक सभा झाली होती.
१२ वी फेल चित्रपट लवकरच

१२ वी फेल चित्रपट लवकरच

नागपूर- नागपूरच्या कलावंताचा समावेश असलेला म१२ वी फेल हा hindi चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे. माहितीपट बनविणा-या ज्ञानेश्वर नाडेकर यांनी पहिल्यांदाच चित्रपट निर्मितीसाठी पुढाकार घेतला. या चित्रपटाचे ७० टक्के चित्रीकरण नागपुरात पूर्ण झाले असून उषा शिगणे यात मुख्य भूमिका साकारत आहे.

चित्रपट निर्मातीचे क्षेत्र म्हणून मुंबईचेच नाव सर्वांच्या पुढे ङ्मेते. मात्र आता नागपुरातील दिग्दर्शक-कलावंतांनी पुढाकार घेऊ नागपूरच्या लोकेशनवर चित्रपट निर्मितीचे काम हाती घेतले आहे. नागपुरातील सक्करदरा, नंदनवन, फुटाळा आदी ठिकाणी या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले. म१२ वी फेलफ या चित्रपटातून एका गरीब घराण्यातील मुलीची व्यथा मांडण्यात आली आहे. अभिनेत्री उषा qशगणेसह अभिनेता हरीश गवई, प्रशांत लिखार या चित्रपटात भूमिका साकारत आहेत. संजय समुद्रे यांनी या चित्रपटासाठी गाणे लिहिले असून संगीत चतुरसेन साखरकर यांचे आहे.

वारंवार बारावीत अनुत्तीर्ण होणा-या एका गरीब मुलीची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. तिच्या लग्नात ङ्मेणा-या अडचणी, त्यानंतर प्राध्यापकाच्या प्रेमात ती पडते. मात्र घरातून लग्नाला विरोध होतो. लग्न होऊ न शकल्याने तिच्या आङ्मुष्यात आणखी एक व्यक्ती होते . या प्रवासात तिला कोणकोणत्या मानसिक त्रासातून जावे लागते, याची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. महाराष्ट्र, मध्ङ्मप्रदेश आणि छत्तीसगड ङ्मेथे हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा मानस दिग्दर्शक नाडेकर यांनी व्ङ्मक्त केला आहे.
विदर्भातील दोन गावांना घेतले दत्तक

विदर्भातील दोन गावांना घेतले दत्तक

मैत्रेय फाऊन्डेशन


नागपूर : अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल झालेले आहेत तर विदर्भातील शेतक-याची दैनावस्था त्याहून भयावह आहे. ही जाणीव ठेऊन मैत्रेय फाऊन्डेशन तर्फे  शेतक-यांना मदत करता यावी याकरिता मैत्रेय फाऊन्डेशन ने अकोला मधील मनाडी हे गाव तर यवतमाळ मधील मूंडल हे गाव दत्तक घेतले आहे. या दोन्ही गावातील एकूण 100 कुटूंबांना दत्तक घेतले आहेत. या कुटूंबांना प्रत्येकी 3 दुभत्या शेळ्या देण्यात येणार आहेत. तर शेतक-यांच्या कल्याणार्थ विविध उपक्रम आणि अनेक योजना राबविण्याचा मैत्रेय फाऊन्डेशनचा मानस आहे. दत्तक योजनेचा शुभारंभ कार्यक्रम अकोल्यातील मनाडी येथे 26 मार्च 14 ला 40 कुटूंबांना तर, यवतमाळ मधील मूडल येथे 28 मार्च रोजी 60 कुटूंबांना होणार आहे. कार्यक्रमाला मैत्रेय इऊन्डेशनच्या संचालिका वर्षा सत्पाळकर उपस्थित राहणार आहे.
जातीय समीकरणामुळे पक्षाची बंधने तुटणार!

जातीय समीकरणामुळे पक्षाची बंधने तुटणार!

महेंद्र ठेमस्कर
चंद्रपूर 
(पुण्यनगरी )
...................

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात यावर्षी पहिल्यांदाच जातीय समीकरणावर निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट चित्र असून पक्षाची बंधने तोडून काही राजकीय पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते 'आता अस्मितेचा प्रश्न निर्माण झाल्याने साहेबांना जिंकून आणावेच लागेल', अशी कणखर भूमिका घेऊन कामाला लागल्याने सर्वांच्याच नजरा याकडे लागल्या आहेत. फुले, शाहू, आंबेडकर, टिळक, आगरकर यासारख्या थोर महात्म्यांच्या पुरोगामी म्हणवणार्‍या राज्यात जातीय समीकरणातून निवडणुकांची बेरीज-वजाबाकी केली जात असल्याने भविष्यकाळ कुठे आणि कसा शोधायचा? असा प्रश्न अनेकांसमोर निर्माण होणार आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निर्मितीपासून काँग्रेसने या मतदारसंघात आतापर्यंत कधीच कुणबी समाजाचा उमेदवार उभा केला नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी जवळीक असल्याने पालकमंत्री संजय देवतळे यांच्या रूपाने पहिल्यांदाच या समाजाचा उमेदवार टाकण्यात आला. आम आदमी पक्षानेसुद्धा अँड़ वामन चटप यांना उमेदवारी देऊन डाव मांडला. संजय देवतळे आणि वामन चटप हे बहुसंख्य असलेल्या कुणबी समाजाचे प्रतिनिधीत्व करीत असले तरी यांच्या पोटजाती वेगवेगळ्या असल्याने त्याचे चटके दोन्ही उमेदवारांना बसणार आहेत. संजय देवतळे हे खैरे कुणबी तर अँड़ वामन चटप हे धनोजे कुणबी समाजाचे आहेत. या लोकसभा मतदारसंघात धनोजे कुणबी समाजाची मतदारसंख्या पाच-साडेपाच लाख तर खैरे कुणबी समाजाची संख्या साधारणत: सव्वादोन-अडीच लाख असल्याचे सांगितले जाते. मराठा कुणबी समाजाचे मतदारही दीड लाखाच्या आसपास आहेत. या भागातील खैरे कुणबी समाज एकसंघ असून कोणत्याही निवडणुकीमध्ये आपल्या समाजाच्या उमेदवाराला झाडून मदत करीत असतो. मात्र, बहुसंख्य असलेला धनोजे कुणबी समाज हा आतापर्यंत कोणत्याच निवडणुकीत एकसंघ राहिला नाही. या समाजाची मते सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडे विभागली जात होती. महत्त्वाचे म्हणजे, मराठा कुणबी समाज हा नेहमीच खैरे कुणबी समाजाच्या बाजूने उभा राहिला आहे.

आमदार आणि पालकमंत्री म्हणूनही देवतळे यांची कारकीर्द निराशाजनक राहिली असली तरी या निवडणुकीमध्ये त्यांचा समाज त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे दिसतो. वरोरा विधानसभा मतदारसंघात देवतळे यांची मदार समाजाच्या भरवशावरच आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये सहा पट अधिक ताकद लागत असल्याने देवतळे यांच्यासमोरही जातीय समीकरणाचा मुद्दा उभा राहणार आहे. देवतळेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता धनोजे कुणबी समाजाच्या लोकांमध्येसुद्धा 'स्पिरीट' चढले आहे. त्यामुळे पक्षाची बंधने तोडून विविध राजकीय पक्षात काम करीत असलेले नेते आणि कार्यकर्ते आपापल्या समाजाच्या उमेदवारांसाठी मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. या दोन्ही समाजाचे नेते आणि कार्यकर्ते काँग्रेस आघाडी आणि भाजप महायुती, आम आदमी पक्षामध्ये विखुरलेले दिसत असले तरी आता प्रश्न जातीचा आहे. त्यामुळे साहेबांना निवडून आणण्याची जबाबदारी प्रत्येकावर आली असल्याचे सांगत फिरत आहेत.
चंद्रपूर तापू लागले

चंद्रपूर तापू लागले

चंद्रपूर : मागील दोन दिवसात सूर्याचा पारा चढला आहे. पुढील आठवड्यात हा पारा ४0 अंश सेल्सीअसच्या वर जाईल, अशी शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तविली आहे.
मागील वर्षी पावसाने कहरच केला. पावसाळ्याच्या अगदी प्रारंभीच पावसाचे आगमन झाले. पुढे सतत चार महिने पाऊस कोसळतच राहिला. आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड पावसाने त्यावेळी मोडीत काढले. सातत्याने पूरपरिस्थिती निर्माण होत राहिली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी तीन वेळा पूर आला. या अतवृष्टीत शेतकर्‍यांचे फार मोठे नुकसान झाले. अडीच-तीन लाख हेक्टरवरील खरीप पिके मातीमोल झाली. खुद्द मुख्यमंत्र्यांनाही जिल्ह्याचा दौरा करावा लागला होता. त्यानंतर हिवाळ्यातील काही महिने पाऊस आला नाही. मात्र उन्हाळ्याच्या तोंडावर पुन्हा अकाली पाऊस व गारपिटीने जिल्ह्याला झोडपून काढले. अनेक दिवस ढगाळ वातावरण कायम राहिले. त्यामुळे चंद्रपूरसारख्या 'हॉट' जिल्ह्यात यंदा उन्हाळा जरा विलंबाने सुरू झाला. एरवी फेब्रुवारीच्या दुसर्‍या पंधरवड्यापासूनच चंद्रपुरात उन्हाळ्याला प्रारंभ होतो. मार्च महिण्यात तर उन्हाची काहिली वाढली असते. होळीला आणखी तापमान वाढलेले असते. मागील वर्षी २१ मार्च रोजी ४१ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद झाली होती. मात्र यावेळी अकाली पावसामुळे फेब्रुवारी व मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात वातावरणात गारवाच होता. अगदी होळीच्या दोन दिवसापूर्वीपर्यंत पाऊसच कोसळत होता. 
आता होळीनंतर मात्र सूर्याचा पारा चढू लागला आहे. दुपारी उन्हाचे चटके असह्य होऊ लागले आहेत. आज रविवारी ४0 अंश सेल्सीयस तापमानाची नोंद झाली आहे. सुर्याचा पारा चढल्याने नागरिकांनी अडगळीत पडलेले कुलर्स बाहेर काढणे सुरू केले आहे. बाजारपेठेत, रस्त्यावर, चौकाचौकात शीतपेयाची दुकाने सजली आहेत. चंद्रपूर शहरासह ग्रामीण भागातही उन्हाची काहिली जाणवू लागली आहे. चंद्रपुरात दुपारी रहदारी सुरू असली तरी ती विरळ झाली आहे. नागरिक उन्हापासून बचाव म्हणून आतापासूनच सायंकाळी घराबाहेर पडणे पसंत करीत आहेत.
श्रीमंत आम आदमी उमेदवार

श्रीमंत आम आदमी उमेदवार

देवतळे : ५ कोटी
चटप :     ३ कोटी
अहीर :     १.५ कोटी


चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील काँग्रेसचे संजय देवतळे उमेदवार करोडपती असल्याचे त्यांच्या शपथपत्रावरून स्पष्ट होते. यात देवतळेंचा क्रमांक पहिला लागतो. त्या पाठोपाठ आपचे वामनराव चटप व नंतर हंसराज अहीर यांचा क्रमांक येतो. 

संजय देवतळे यांच्या शपथपत्रानुसार, त्यांच्याकडे टोयोटाची क्वॉलिस, स्वीप्ट आणि इनोवा कार आहे. पत्नीच्या आणि मुलीच्या नावे प्रत्येकी एक अँक्टिवा दुचाकी आहे. संजय देवतळे यांच्या स्वत:कडे एक लाख ३८ हजार रुपये किमतीचे दागिने आहेत. पत्नीकडे १ लाख ७५ हजारांचे व दोन्ही मुलांकडे ४0 हजार ५00 रुपये किमतीचे दागिणे आहेत. वरोरा येथे असलेल्या घराशिवाय तीन प्लॉट, मुंबईतील आशीर्वाद सोसायटीे तसेच श्रद्धा बिल्डींगमध्ये फ्लॅट आहेत.

दुसर्‍या क्रमांकावर 'आप'चे वामनराव चटप आहेत. दोन लाख रूपये नगदी रक्कम असल्याचे त्यांनी म्हटले असून त्यांच्याकडे १३ लाख रुपये किंमतीचे सफारी वाहन आहे. त्यांच्या स्वत:कडे २५ ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत. तर, पत्नीकडे तीन लाख रूपयांचे १00 ग्रॅम दागिने आहेत. आपल्याकडे २४एकर जमीन असल्याचे चटप यांनी शपथपत्रात म्हटले असून त्याची किंमत सुमारे एक कोटी २५ लाख रूपये असल्याने त्यांनी म्हटले आहे. त्यांच्याकडे मुंबईत ४३ लाख 50 हजार रुपयांचा फ्लॅट असून राजुरा येथे घर असल्याचे म्हटले आहे. अशी एकूण तीन कोटी रूपयांची संपत्ती असल्याचे त्यांनी शपथपत्रात म्हटले आहे. 

भाजपाचे हंसराज अहीर यांचा लागतो. त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत आहे. शपथपत्रात त्यांनी आपल्याकडे ४८ हजार रूपयांची रोख रक्कम असल्याचे म्हटले आहे. विविध बँकेत २२ लाख ५0 हजार रूपये शिल्लक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एक कार आणि २२ लाख ५0 हजार रूपये किंमतीचे ७५0 ग्रॅमचे दागिणे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जुनोना आणि घोडपेठ येथे एकूण ८.३३ हेक्टर शेतजमीन असून त्याचे बाजारमूल्य ५२ हजार असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या संपत्तीचा आकडा दीड कोटी रूपयांच्या जवळपास जातो. 

तृणमूल कांग्रेसचे उमेदवार पंकजकुमार शर्मा यांनी स्वत:कडे ३७ हजार रूपये रोख व पत्नीकडे ५६ हजार रुपयांची रक्कम असल्याचे शपथपत्रात म्हटले आहे. त्यांच्या नावे बँकेत १२ लाख ५0 हजार ५00 रुपये तर, पत्नीच्या नावे २७ लाख ५0 हजार रुपये जमा आहेत. त्यांच्या नावे एक लाख ७९ हजार ३0२ रुपयांची एलआईसी पॉलिसी असून पत्नीच्या नावे ३ लाख ५५ हजार ५२0 रुपयांची पॉलिसी आहे.
त्यांच्या स्वत:कडे दोन लाख रुपये किमतीचे व पत्नीकडे तीन लाख रूपयांचे सोने असल्याचे त्यांनी दर्शविले आहे. त्यांच्या स्वत:च्या आणि पत्नीच्या नावे चंद्रपुरातील ओंकारनगर आणि नागपुरात सोमलवाडा येथे एक प्लॉट आणि फ्लॅट असल्याचे म्हटले आहे. पत्नीच्या नावे ४ लाख ५0 हजार रुपयांचे कर्जही आहे
.
बसपा उमेदवार हंसराज कुंभारे यांनी स्वत:कडे १५ हजार ५00 रुपयांची रोकड असल्याचे शपथपत्रात म्हटले आहे. सोबतच, ५0 हजार रूपयांचा डाक विमा असल्याचे म्हटले आहे. तसेच २ लाख ५0 हजार रूपयांचा विमा असून ८६ हजार ८00 रूपयांचे दागिने असल्याचे म्हटले आहे. आईच्या नावे 0.६ आर जमीन असल्याचेही त्यांनी शपथपत्रात नमूद केले आहे. 

       महागडी वाहने 
संजय देवतळे : शिक्षण बीई फायनल. 
बँक खाते - १0. शिल्लक ४८,६१,६१३ रूपये. पत्नीच्या नावे ३ खाते. शिल्लक ८,६३,५५७ रूपये. शेअर्स- २२,७0,२२२ रूपये. शेती- ४४.८३ एकर. पत्नीच्या नावे १२.८१ एकर. मुंबईत दोन फ्लॅट. एकूण संपत्ती - पाच कोटी. 

वामनराव चटप : शिक्षण एलएलबी. 
शेतजमीन- २४ एकर. (किंमत १.२५ कोटी). मुंबईत फ्लॅट - किंमत ४३,५0,000 रुपये. सफारी वाहन- किंमत १३ लाख. सोन्याचे दागिणे - २५ ग्रॅम. पत्नीकडे सोन्याचे दागिने- १00 ग्रॅम. नगदी रक्कम - २ लाख रूपये. एकूण संपत्ती - सुमारे ३ कोटी.

हंसराज अहीर : शिक्षण - दहावी. 
बँकेत शिल्लक -२२ लाख ५0 हजार. शेतजमीन- ८.३३ हेक्टर. भानापेठ व गोकूल वॉर्डात ३१ लाख रूपयांची जमीन. दागिने- ७५0 ग्रॅम. किंमत २२ लाख ५0 हजार. एकूण संपत्ती- १.५ कोटी
        कर्ज
देवतळे यांच्यावर जिल्हा मध्य. सह. बॅकेचे ९६ हजार ९00 रुपयांचे, महाराष्ट्र सह.बँकेचे १0 लाख ३६ हजार ३0६ रुपयांचे, इंडियन ओवरसीज बँकेचे ९ लाख ६२ हजार ५४0 रुपये आणि इतर १३ लाख३९ हजार ३६२ रुपयांचे असे मिळून ३४ लाख ३५ हजार रुपयांचे कर्ज आहे. वामनराव चटप यांच्यावर जिल्हा मध्य.बँकेचे १३ लाख रूपयांचे कर्ज आहे. हंसराज अहीर यांच्यावर ९९ हजार ५00 रूपयांचे कृषी कर्ज आहे. 

Sunday, March 23, 2014

श्रीमंत नागपुरी उमेदवार

श्रीमंत नागपुरी उमेदवार

लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून दिलेल्या माहितीनुसार भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी हे विदर्भातील लोकसभेचे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले. आम आदमीचा पक्ष घेऊन लढू बघणाऱ्या आपच्या उमेदवार अंजली दमानिया यांच्या परिवाराकडे तब्बल १९ कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे स्पष्ट झाले. 
          निवडणुकीच्या मैदानातील बड्या पक्षाचे सगळेच उमेदवार कोट्यधीशच असल्याची माहिती शनिवारी सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रांतून समोर आली. सर्वांत श्रीमंत उमेदवार ठरले आहेत, भाजपचे नितीन गडकरी. त्यांच्या वडिलोपार्जित मालमत्तेसह त्यांची संपत्ती २० कोटी २३ लाख इतकी आहे.
त्यांची श्रीमंती स्पष्ट झाली आहे. गडकरी यांच्याकडे २४ हजार ५०० रुपये इतकी रोख रक्कम आहे. बँक आणि वित्तीय संस्थेतील त्यांची गुंतवणूक २१ लाख, त्यांच्या पत्नीची १७ लाख इतकी आहे. धापेवाडा येथील शेती, महालातील घर, मुंबईतील फ्लॅट मिळून त्यांची संपत्ती २० कोटींच्या घरात जाते. पैकी २ कोटी ५२ लाख चल संपत्ती आहे, ६ कोटी ५८ लाख अचल तर पारंपरिक पध्दतीने आलेल्या मालमत्तेची किंमत ७ कोटी ८८ लाख आहे. अंजली दमानिया यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या परिवाराची चल संपत्ती ५ कोटी ६७ लाख तर अचल संपत्ती १३ कोटी ६३ लाख इतकी आहे. दमानियांकडे २५ हजार रुपये रोकड आहे. कर्जत, महागाव येथे शेतजमीन आहे. मुंबईतील गोरेगाव येथे फ्लॅट आहे.
भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी. गडकरींची संपत्ती वडिलोपार्जित मालमत्तेसह 20 कोटींहून अधिक आहे.
नितीन गडकरींची संपत्ती
  • मुंबईत फ्लॅट – 3 कोटी 87 लाख रुपये(सध्याची किंमत)
  • 86 लाख रुपये किमतीचे दागिने 
  • हिंदू अविभक्त कायद्यानुसार परिवाराची संपत्ती - 59 लाख 87 हजार रुपये
  • पत्नी कांचन गडकरीं यांच्याकडे 63 लाख 88 हजार रुपये किमतीचे दागिने
  • पोस्टल आणि एलआयसीमध्ये गुंतवणूक -1 लाख 55 हजार रुपये
  • पत्नीच्या नावे पोस्टल आणि एलआयसीमध्ये गुंतवणूक - 12 लाख 5 हजार रुपये
  • शेअर्समध्ये गुंतवणूक - 14 लाख 89 हजार रुपये
  • बँकांमध्ये असलेली शिल्लक - 21 लाख 18 हजार
  • रोख रक्कम - 24 हजार 500 रुपये
  • व्यावसायिक गुंतवणूक - 11 लाख 86 हजार
  • पत्नीच्या नावे व्यावसायिक गुंतवणूक - 18 लाख 40 हजार
२७ उमेदवारांचे नामांकन दाखल

२७ उमेदवारांचे नामांकन दाखल

  1. हंसराज अहीर भाजप 
  2. संजय देवतळे काँग्रेस 
  3. अँड. वामनराव चटप आप 
  4. हंसराज गुलाब कुंभारे बसप 
  5. नितीन पोहाणे - लोकभारती पक्ष 
  6. फिराज पठाण, बहुजन मुक्ती पार्टी 
  7. नंदकिशोर रंगारी (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया), 
  8. असदनखान पठान (इंडियन युनियन मुस्लिम लीग), 
  9. अशोक खंडाळे (रिपाइं), 
  10. विद्यासागर कासर्लावार (अपक्ष), 
  11. अतुल मुनगिनवार (अपक्ष), 
  12. कार्तिक कोडापे (गोंडवाना गणतंत्र पार्टी), 
  13. रोशन घायवन (रिपब्लिकन पक्ष खोरिपा), 
  14. अरविंद कुळमेथे (अपक्ष), 
  15. राजेश्‍वर जंगम (आंबेडकर समाज पार्टी), 
  16. गणेश रामटेके (अपक्ष), 
  17. विनोद मेश्राम (अपक्ष), 
  18. संजय गावंडे (अपक्ष), 
  19. प्रमोद सोरते (स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष), 
  20. महादेव डुंबरे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खो.), 
  21. विजय नगराळे 
  22. अनिल फाले (अपक्ष), 
  23. सिद्धार्थ राऊत (प्ररिपा), 
  24. नामदेव शेडमाके (गोंडवाना गणतंत्र पार्टी), 
  25. पंकजकुमार शर्मा (ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस) 
  26. कुरेशी महमद इखलाक म.युसूफ (सोशालिस्ट पार्टी इंडिया), 
  27. चरणदास जंगलू मेश्राम (अपक्ष)
-----------------------------
गडचिरोली-चिमूर लोकसभा

  1. नामदेव दल्लुजी उसेंडी - इंडियन नॅशनल काँग्रेस पक्ष
  2. रमेश गजबे- आम आदमी पार्टीतर्फे 
  3. अशोक महादेव नेते - भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुती 
  4. सतीश पेंदाम- तृणमुल काँग्रेस 
  5. रामराव नन्नावरे - बहुजन समाज पार्टी
  6. नामदेव कन्नाके - कम्युनिष्ट पार्टी ऑफ इंडिया 
  7. दडमल प्रभाकर -रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया
  8. दिवाकर पेंदाम - बहुजन मुक्ती पार्टी
  9. गुरुचरण उईके - लोकभारती पक्ष
  10. विनोद नन्नावरे -समाजवादी पार्टी 
  11. सतीश पेंदाम, अपक्ष 
  12. योगेश गोन्नाडे, अपक्ष 
  13. बाबुराव दांडेकर अपक्ष 

Saturday, March 22, 2014

डहाणूजवळ गॅस टँकरचा भीषण स्फोट, ७ ठार

डहाणूजवळ गॅस टँकरचा भीषण स्फोट, ७ ठार



मुंबई अहमदाबाद महामार्गावर डहाणूजवळ गॅस टँकरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत ७ जणांचा होरपळून मत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर मुंबई-अहमदाबाद महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

Thursday, March 20, 2014

२१ मार्चला जागतिक वन दिन

२१ मार्चला जागतिक वन दिन

‘वनांचे महत्त्व व त्यांचे संवर्धन’ याविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी २१ मार्चला जागतिक वन दिन (जागतिक वनिकी दिन) साजरा केला जातो. १९७१ मध्ये युरोपिअन कॉनफिडरेशन ऑफ अ‍ॅग्रिकल्चर च्या २३ व्या बैठकीत हा दिन साजरा करण्याची संकल्पना पुढे आली. या दिनानिमित्त वनिकी (Forestry) संदर्भातील उत्पादन, संरक्षण व रंजकता (recreation) या तीन महत्त्वाच्या घटकांबाबत जनजागृती करण्यात येते.

वनिकी (Forestry) हे वनव्यवस्थापन, वृक्षलागवड आणि संबंधित नैसर्गिक साधनसंपत्तीचे व्यवस्थापन करणारे शास्त्र आहे. वनांद्वारे पुरविल्या जाणार्‍या नैसर्गिक सुविधांचा शाश्वत पुरवठा करण्याच्या दृष्टीने वनांचे व्यवस्थापन करणे हा वनिकीचा मुख्य उद्देश आहे.

जंगल / वन म्हणजे केवळ झाडे नाहीत तर ती अनेक सजीव-निर्जीव घटकांनी बनलेली गुतांगुतीची परिसंस्था आहे. जंगल निरनिराळ्या प्रकारचे पक्षी, सस्तन प्राणी, वनस्पती, कीटक, सरपटणारे प्राणी यांनी समृद्ध असून हे सर्व घटक एकमेकांशी जोडलेले असतात. त्याचबरोबर अन्नघटकांचे पुनर्चक्रीकरण करण्याचे मह्त्त्वाचे कार्य करणारे स्मूक्षजीव व बुरशीवर्गीय जीव देखील वन-परिसंस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत.

Wednesday, March 19, 2014

निवडणूक खर्चावर बारकाईने लक्ष ठेवा - अतुलकुमार रस्तोगी

निवडणूक खर्चावर बारकाईने लक्ष ठेवा - अतुलकुमार रस्तोगी

निवडणूक खर्चावर बारकाईने लक्ष ठेवा - अतुलकुमार रस्तोगी

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीदरम्यान पक्ष आणि उमेदवारांकडून होणाऱ्या खर्चाचा तपशील बारकाईने नोंद करुन ठेवावा, अशा सूचना निवडणूक खर्च निरीक्षक अतुलकुमार रस्तोगी यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात व्हीडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे श्री. रस्तोगी यांनी सर्व सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत गडचिरोलीचे सहाय्यक निवडणूक अधिकारी पी. शिवशंकर, चामोर्शीचे सहाय्यक निवडणूक अधिकारी धर्मेंद्र सिंह, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, सर्व सहाय्यक निवडणूक खर्च निरीक्षक आदींची उपस्थिती होती.

श्री. रस्तोगी म्हणाले, जिल्हास्तरीय निवडणूक खर्च कक्षाशी सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी सातत्याने समन्वय ठेवावा. आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करतानाच निवडणुकीदरम्यान होणाऱ्या सभा, रॅली, बैठकांचे नियमित चित्रीकरण करुन त्याबाबतचा अहवाल दररोज जिल्हास्तरीय निवडणूक खर्च कक्षाला पाठवावा. प्रत्येक उमेदवाराचे शॅडो खर्चाचे रजिस्टर ठेवून खर्च स्त्रोतावर बारकाईने लक्ष ठेवावे.
----------------
टोल फ्री क्रमांक 07132-155212 कार्यान्वित

गडचिरोली : लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भातील आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास तसेच निवडणुकीसंदर्भातील इतर जनतेच्या     तक्रारी स्विकारण्यासाठी  जिल्हांधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला आहे. हा कक्ष चोवीस तास सुरु राहणार असल्यााची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हां निवडणूक अधिकारी रणजीत कुमार यांनी दिली. 

आचारसंहितेसंदर्भात तसेच निवडणुकीसंदर्भात नियंत्रण कक्षातील टोल फ्री क्रमांक 07132-155212 या दूरध्वनी क्रमांकावर आपली तक्रार नोंदविता येईल. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका शांततेत पार पाडण्यािसाठी सर्व मतदारांनी सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हारधिकाऱ्यांनी केले आहे.
निवडणूक खर्चावर चोख लक्ष ठेवा - बी.के. मीना

निवडणूक खर्चावर चोख लक्ष ठेवा - बी.के. मीना

चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीदरम्यान राजकीय पक्ष व उमेदवार यांच्याकडून होणाऱ्या खर्चावर चोख लक्ष ठेवण्याच्या सूचना निवडणूक खर्च निरीक्षक बी.के. मीना यांनी दिल्या.

जिल्हा परिषदेच्या कन्नमवार सभागृह येथे रविवारी आयोजित अधिकाऱ्यांच्या बैठकीत श्री. मीना बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, अप्पर जिल्हाधिकारी सी.एस. डहाळकर, उपविभागीय अधिकारी दीपा मुधोळ व उपजिल्हाधिकारी (निवडणूक) दामोधर नान्हे यावेळी उपस्थित होते.

सहाय्यक निवडणूक अधिकारी व निवडणूक नोडल अधिकारी यांची निवडणूक खर्चाबाबत विशेष बैठक श्री. मीना यांनी घेतली. जिल्हास्तरीय निवडणूक खर्च कक्षाशी सहाय्यक निवडणूक अधिकारी यांनी समन्वय ठेवून दररोज होणाऱ्या खर्चाचा आढावा सादर करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. निवडणुकीदरम्यान होणाऱ्या सभा, रॅली व बैठका यांचाही आढावा सादर करण्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर यांनी आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी म्हणाले, सभा, रॅली व बैठका पूर्व परवानगीशिवाय होत असल्यास कारवाई करा. स्थानिक स्तरावर प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्रांमधील तसेच केबलवरील जाहिरातींवर नियंत्रण ठेवा. सभा, रॅली व बैठकांचे नियमित चित्रीकरण करुन ते सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी स्वत: पहावे व तसा अहवाल पाठवावा. कुठलेही वाहन विनापरवानगीने फिरणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रत्येक उमेदवाराच्या शॅडो खर्चाचे रजिस्टर ठेवून खर्च स्त्रोतावर लक्ष ठेवावे.
व्हॉट्स‘आप’

व्हॉट्स‘आप’


‘चट’ पक्षांतर, ‘पट’ उमेदवारी

देवनाथ गंडाटे :
--------------------
लोकसभेचे वेळापत्रक जाहीर होताच निवडणुकीच्या रणधुमाळीने चांगलाच रंग घेतला आहे. होळीच्या पर्वावर अनेकांनी एकमेकांना शुभसंदेश आणि रंगपंचमीचा गुलाल पाठवून जवळीकता साधण्याचा प्रयत्न केला. त्यातही सोशल मिडियाच्या माध्यामा तून चांगलाच प्रचार सुरू केला आहे. मोबाईल एसएमएसपेक्षाही भारी वजन असलेल्या व्हॅॉट्सअपचा लाभ आम आदमी पक्षाने घेतला आहे. म्हणायला आम आदमी असलेतरी अनेकांजवळ महागडे मोबाईल आणि त्यात टूजी, थ्री जी कनेक्शन आहेत. त्यामुळे व्हॉॅट्सअॅपवर ‘आपचे अकाउंट सुरू झाले आहे.
चंद्रपूर सारख्या शहरातील अनेक नवतरुण माध्यमातून आपला उमेदवाराचा प्रचार सुरू केलेला आहे. शेतकरी संघटनेचे वामनराव चटप यांनी आम आदमी पक्षात ‘चट पक्षांतर, ‘पट उमेदवारी मिळविली. गत पाच वर्षांपासून लोकसभेसाठी तालीम करीत असलेल्या चटपसारखा चेहरा आपला मिळाल्याने विजयाची मोठी शाश्वती निर्माण झाली आहे.
तरुण, वयस्क , शेतकरी आणि महिला वर्गात चपटांचे नाव पोहोचविणसाठी गावातील प्रमुुख मोबाईल क्रमांक आणि अनेक ग्रुपमध्ये जुळून, नवीन क्रमांक शोधून एसएमएस पाठविले जात आहे. ‘ नया है वह टपोरी डॉलॉगला हाणून पाडण्यासाठी आता ही तरुण मंडळी कुछ करके दिखाना है, चटप को चुनके लाना है, अशी म्हण पुढे आणून प्रचाराची धुरा वेगात सुरू केली आहे.
आपल्या हातात असणारा, कान आणि डोळ्यांच्या माध्यमातून संपूर्ण मनोव्यापार आणि भाव विश्वाला व्यापणारा मोबाइल आता जणू शरीराचा एक भागच बनला आहे. अगदी खेड्याातील रोजंदारीवर काम करणा-या अशिक्षित तरुणांपासून तर फ़ेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅपमय जगणा-या शहरी माणसार्पंत पोहचणसाठी हे आम तरुण राजकारणाचा कोणताही गंध नसताना देखील रात्रंदिवस एक करीत आहेत.
ऑनलाइन कट्टयावर मात्र ‘पॉलिटिकल टिवटिव बहर येऊ लागला आहे. व्हॉट्सअॅॅपच्या एका ग्रुपवर सर्वपक्षीय मित्रपरिवार असल्याने अनेक वाद विवादसुद्धा वाचाला मिळत आहेत.
सोळाव्या लोकसभेचं रणशिंग सुरू झाल्या नंतर पोस्टर-बॅनरयुद्धाला सुरुवात झाली आहे.. मतदाराला आपले करण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत. कारण त्यांना ठाऊक आहे की, एक दिवसापुरता का होईना, तो ‘राजा’ असणार आहे म्हणून त्याला तसं भासवणं तरी भाग आहे. म्हणून सगळा आटापिटा चालला आहे. आरोप-प्रत्यारोपाची राजकीय धुळवड तर आधीपासून सुरू झाला आहे.
निवडणूक नुसती जाहीर झाली आणि गावागावातलं वातावरण बदलू लागले आहे. यंदा चटप आणि आपच उमेदवारीमुळे अचानक वेगळी हवा वाहू लागली आहे. एरवी निष्किय असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये एकदम चैतन्य दिसून येत आहे. तरुणांना बदल अपेक्षित आहे. विकासाच दृष्टीने नवा शिलेदारदेखील. त्यामुळे निवडणूक हा विषय सगळ्यांनी अतिशय गंभितेने घेतलेला दिसू लागला आहे. टीव्ही आणि न्यूज चॅनेलचं प्रस्थ असलेला काळात तरुण मंडळी कधी नव्हे यंदा निवडणुकीची चर्चा करू लागले आहे. गली पासून दिली पर्यंतचे विषय चर्चीले जात आहेत. प्रत्येक जण राजकारणातला तज्ज्ञ असल्यासारखा त्यात सह्भागी होऊ लागला आहे. पूर्वी उमेदवार जाहीर झाल्याचं वर्तमानपत्रांतून कळायचं आणि ख-या अर्थाने लगबग सुरू व्हायची. आता मात्र तसे राहिलेले नाही।फ़ेसबुकआणि व्हॅट्सअॅपमुळे क्षणात माहिती कळू लागली आहे.
व्हॉट्सअप-टेलिग्रामवरून मेसेजस पाठविण्यास सुरुवात झाली असली तरी या मेसेजेसमुळे काही ङ्गरक पडणार नाही, असा समज करून बसलेल विरोधी पक्षांचा निकाल 16 मे रोजी रखरखत्या उन्हात लागेल.
चिमणीचं घर राहून गेलं.....

चिमणीचं घर राहून गेलं.....

DSC_3569.jpg प्रदर्शित करत आहे
photo, Devanad Sakharkar, chandrapur

एक होती चिमणी, एक होता कावळा.
चिमणीचे घर होते मेणाचे, कावळ्याचे घर होते शेणाचे.
एक दिवस काय होतं, खूप धो-धो पाऊस येतो.
कावळ्याचं घर शेणाचं असल्यामुळे वाहून गेलं, चिमणीचं घर राहून गेलं.


ही कहाणी लहानपणी सर्वांनीच ऐकली असेल. परंतु, आता मात्र समेटच्या जंगलात चिऊताईचे अस्तित्व धोक्यात आले आहे. घरात येऊन आरशावर टक टक असा आवाज करणारी, घरातील ङ्कोटोच्या मागे गवत, काडीकच-यापासून घरटे बनविणारी चिमणी आज दिसेनाशी झाली आहे. अंगणात काही धान्य वगैरे वाळत घातलं की, थुई-थुई नाचत येणारी चिमणी आज दुर्मिळ झाली आहे. आपण झोपेतून उठतो तेव्हा पक्ष्यांचा चिवचिवाट कानी पडत नाही, तर गाड्यांचे आवाज कानावर आदळतात. त्यामुळे सध्या ज्या चिमण्या अस्तित्वात आहेत, त्या टिकवून ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी झाडावर मातीचे मडके बांधून त्यात पाणी ठेवावे व मिनरल वॉटरच्या बाटलीमध्ये खाऊ ठेवावा. त्यामुळे घराशेजारील परिसरामध्ये चिवचिव असा आवाज दरवळेल. असा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे. त्याप्रमाणे शाळा महाविद्यालयातील विद्याथ्र्यांनादेखील चिऊताईचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी काय उपाययोजना करणे आवश्यक आहे, याची विद्याथ्र्यांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. आधी चिऊताई घरामध्ये कच-याचे घरटे करीत होती. परंतु, आपल्या बदलत्या सवयीमुळे चिऊताईचे घरटे अनेकदा मोडत असतो. त्यासोबत उन्हाळ्यात पाण्यासाठी लाही- लाही होते. त्यामुळे पाण्याचे जलपात्र ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.

भारतात सर्वात जास्त संख्येने असणारा पक्षी म्हणून चिमणी परिचयाची आहे. नर चिमणीच्या कपाळाचा, शेपटीवरचा आणि पार्श्वभाग राखाडी, कानाजवळ पांढरा, चोच काळी, कंठ ते छातीच्या भागावर मोठा काळा भाग, डोक्यापासून खाली पोटाचा भाग पांढरा असून पाठीवर तपकिरी काळ्या तुटक रेषा असतात. मादी मातकट तपकिरी रंगाची असून तिच्या अंगावर काळ्या तपकिरी रंगाच्या तुटक रेषा असतात. तिची चोच फिकट तपकिरी रंगाची असते.
विविध घटनात एकूण १६ जणांचा मृत्यू, ५ अल्पवयीन , तर एक कर्जबाजारी शेतकरी

विविध घटनात एकूण १६ जणांचा मृत्यू, ५ अल्पवयीन , तर एक कर्जबाजारी शेतकरी

होळी व धुळवड चंद्रपूर जिल्ह्यासाठी काळ ठरली. जिल्हात विविध घटनात एकूण १६ जणांचा मृत्यू झाला आहे. यात ५ अल्पवयीन मुले तर एका शेतक-याचा समावेश आहे.
१) . भद्रावती शहरातील शिवाजीनगर भागात राहणारे ३ युवक रंगपंचमीनिमित्त रंग खेळून शहरालगतच्या चारगाव येथील वर्धा नदीवर स्नानांसाठी गेले असता त्यांचा खोल पाण्यात बुडून करून अंत झाला आहे. यात भद्रावतीच्या ग्रामीण रुग्णालयातील तरुण डॉक्टर संजय राजूरकर-३० यांचा समावेश आहे. डॉ. राजूरकर यांचा काहीच दिवसांआधी साखरपुडा झाला होता. तर त्यांचे मित्र औषध व्यावसायिक मित्र  ओंकार वघळे-२९ व शुभम ठाकरे-२० यांचा अन्य मृतांमध्ये समावेश आहे. 
२) चंद्रपूर जिल्ह्यातील मुल शहरात रंगपंचमी आटोपून उमा नदीवर स्नानासाठी भरधाव वेगाने निघालेल्या दुचाकीची समोरून येणा-या अन्य दुचाकीशी थेट धडक झाल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाला. चौघेही मुल शहरातील रहिवासी आहेत सुरज रणदिवे -२७, अक्षय खोब्रागडे-१९, अजय येडनुत्तलवार-३७, व गणेश गंधेवार यांचा मृतांमध्ये समावेश आहे.

३) चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात नेरी येथे मद्यपि मामा आटो चालवीत असताना नियंत्रण उलटून आटोतील आदित्य अनिल नगराळे -५ या चिमुकल्याचा आटोत अडकून मृत्यू झाला. 

४) चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात पैनगंगा नदीवर स्नानासाठी गेलेल्या निलेश विभूतीवार नामक १७ वर्षीय युवकाचा नदीत बुडून मृत्यू झालाय 
५) चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी गावात मद्यपि पतीच्या जाचाला कंटाळून पत्नी भारती सुरनकर हिने श्रावणी ६ व शिवम-५ या मुलांसह विहिरीत उडी घेतली. यात भारती बचावली तर २ चिमुकल्यांचा अंत झालाय. 
६) चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील वेळवा गावात शेतात असलेल्या विहिरीत पाणी आणण्यासाठी गेलेल्या लोकेश मुशेट्टी-१२ व अनुराग उमक -७ यांचा बुडून मृत्यू 
७) चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील बोरगाव येथे अभिमान काळे -५५ या कर्जबाजारी शेतक-याची नापिकीला कंटाळून शेतातच गळफास लावून घेत आत्महत्या 
८) चंद्रपूर शहरालगतच्या विसापूर येथे भरधाव वेगाने जाणा-या दुचाकीवरील मनोज धुर्वे-३०  याची वाहन नियंत्रण सुटून दुचाकी उलटल्याने मृत्यू 
९) चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील पेंढरी तलावात गुरे धुण्यासाठी गेलेल्या संभाजी लोडगे -५५ या महादवाडी निवासी शेतक-याचा तलावातील गाळात फसून मृत्यू 





Tuesday, March 18, 2014

भिवंडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कपिल पाटील यांचा भाजपात प्रवेश

भिवंडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कपिल पाटील यांचा भाजपात प्रवेश


IMG_9255 (1).JPG प्रदर्शित करत आहे

मुंबई दि. 18 - ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष कपिल पाटील यांनी आपल्या सहका-यांसह आज मुंबईत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्यालयात श्री.मुंडे यांनी यावेळी श्री.पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यावेळी भाजपाचे प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे व विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे आदी मान्यवर उपस्थित होते. 
निवडणुकीच्या तोंडावर ओबीसींचा एल्गार

निवडणुकीच्या तोंडावर ओबीसींचा एल्गार

गडचिरोली-  राज्य शासनाकडून राज्यातील ओबीसी बांधवांनी पिळवणूक सुरू असल्याचा आरोप करीत राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये आरक्षण कपात करण्यात आली आहे. हे आरक्षण पूर्ववत करण्यात यावे यासाठी राज्यस्तरावर ओबीसी महासंघाच्या वतीने यापूर्वी अनेक आंदोलने करण्यात आली होती. परिणामी निवडणुकीच्या तोंडावर ओबीसी महासंघाच्या तीने वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे ३० मार्च रोजी रेल रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनाचा परिणाम आगामी निवडणुकीत दाखविणार असल्याचे मत ओबीसी महासंघाच्या पदाधिकाèयांनी व्यक्त केले आहे. 

गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, धुळे, नंदूरबार, नाशिक व ठाणे या जिल्ह्यातील आरक्षण कपात करण्यात आली आहे. त्यामुळे या सात जिल्ह्यातील ओबीसी समाजबांधवांवर शासनाकडून कुरघोडी केली जात असल्याचा आरोप करीत ओबीसी महासंघाच्या वतीने अनेकदा आंदोलने करण्यात आली. तरीही शासनाने ही समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला नाही.

या सभेत ३० मार्च रोजी वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे रेल रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती देऊन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. या आंदोलनात जवळपास ५० हजार ओबीसी समाज बांधव सहभागी होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. आगामी लोकसभा निवडणुकीत ओबीसी समाजाच्या मतावर डल्ला मारणाèयांना घरचा मार्ग दाखविण्यात यावा यावर चर्चा करण्यात आली. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत कोणाच्या मागे ओबीसी समाज उभा राहील हे निश्चित झाल्यावरच संबंधित जिल्ह्यातील उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे हे निश्चित.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर उपाध्यक्षावर गोळीबार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर उपाध्यक्षावर गोळीबार

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्षांवर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाले आहेत. 
नरेंद्र मोदी २० मार्च रोजी यवतमाळ जिल्ह्यात

नरेंद्र मोदी २० मार्च रोजी यवतमाळ जिल्ह्यात

भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारासाठी दौ-यावर

नागपूर, दि. १८ - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी २० मार्च रोजी विदर्भात येणार असून या दौ-यात ते गारपीटग्रस्त शेतक-यांशी संवाद साधणार आहेत. 
वर्धा येथील भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारासाठी मोदी २० मार्च रोजी विदर्भ दौ-यावर येणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. वर्धा येथील सभेनंतर मोदी गारपीटग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील दाभाडी या गावाला भेट देणार आहेत. याच गावात 'चाय पे चर्चा'देखील पार पडेल असे फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, मोदी यांच्या विदर्भ दौ-यासाठी गुजरात पोलिसांचे विशेष पथक यवतमाळमध्ये दाखल झाले आहे. 
भेजगावात आपल्या मुद्दयांवर मतदान करण्याचा महिलांचा निर्धार

भेजगावात आपल्या मुद्दयांवर मतदान करण्याचा महिलांचा निर्धार

भेजगावात आपल्या मुद्दयांवर मतदान करण्याचा महिलांचा निर्धार

मूल - तालुक्यातील भेजगांव येथे महिलांनी आपल्या मुदयावर मतदान करण्याचा
निर्णय घेऊन गावात अॅॅड. पारोमिता गोस्वामी यांचे हस्ते फलकाचे उदघाटन व
कार्यक्रम घेतला.
भेजगाव येथे महिलांनी श्रमिक एल्गार संघटना स्थापन करून 8 मार्च श्रमिक
महिला मतदार अधिवेशनात सहभागी झाले. अधिवेशनात आपल्या मुदयांवर मतदान
करण्याचा निर्धार महिलांनी केला होता. त्याचा परीणाम भेजगांव येथील
महिलांमध्ये झाला. महिलांनी चंद्रपूर जिल्हा दारूबंदी कधी होणार, भेजगांव
येथील नदीवर पुल कधी होणार, निराधारांचे अनुदान 1500 रूपये कधी होणार,
बिपिएलचा घोळ कधी संपणार या मुदयांवर उमेदवारांने व पक्षाचे
कार्यकत्र्यांनी बोलावे असा फलक लावला. या फलकाचे उदधाटन अॅड. पारोमिता
गोस्वामी यांचे हस्ते उदघाटन झाले. यावेळी गावात सभा घेण्यात आली. सभेत
विजय सिध्दावार, विजय कोरेवार, अरूण जराते, गिता गणवीर आदींनी मार्गदर्शन
केले. गावात महिलांचा कार्यक्रम होउ नये यासाठी येथील पदाधिकारींनी अडथळा
निर्माण केला होता परंतु महिलांनी विरोध पत्कारून कार्यक्रम घेतला.
याकरीता रत्नमाला लेनगुरे, रंजना मोहुर्ले, छाया तेलावार, सुनिता
तेलावार, सुरेखा वाढई, कल्पना कावळे, लक्ष्मी चटारे, कवळाबाई निकोडे आदी
महिलांनी पुढाकार घेतला.

पुन्हा फलक लावावे लागले
मुल - तालुक्यातील भेजगांव येथे आमचे मत आमच्या मुदयांवर असा फलक
महिलांनी लावला परंतु गावातील विरोधक पदाधिकाÚयांनी हा फलक दुसÚया दिवशी
काढल्याने महिलांनी घेराव घालुन फलक लावण्यास भाग पाडले.
भेजगांव येथे आपल्या मुदयांवर महिलांनी गावात सार्वजनिक ठिकाणी फलक
लावला. परंतु महिला स्वता निर्णय घेत असल्याने, संघटीत होत असल्याने
येथील उपसरपंच अखिल गांगरेडीवार यांना खटकले. यांनी ग्रामपंचायतच्या
कर्मचायाकडुन फलक काढले. ही बाब महिलांना माहित होताच महिला एकत्र आल्या
व उपसरपंचाला जाब विचारीत चैकातच चार तास घेराव घातला. महिलांच्या
प्रश्नाचे भडीमारापुढे उपसरपंचाचे काहीच चालले नाही, यावेळी महिलांनी
गांगरेडीवार याचा शर्टही फाडला. शेवटी उपसरपंचालाच फलक त्याच जागेवर
लावावे लागले. यावेळी महिला शक्तीचा विजय झाला. गावातील लोकांनी गावात
प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे, बॅंक व्हावे, सब मायनर व्हावे हे मुदेही
घेण्यास सांगीतले

Saturday, March 15, 2014

सुधीर मोघे- निधन

सुधीर मोघे- निधन


ज्येष्ठ गीतकार सुधीर मोघे यांचं आज शनिवारी दीर्घ आजारपणात दु:खद निधन झालं आहे. अत्यंत मोठा कवी, संगीतकार आणि गुणी कलाकार महाराष्ट्रानं गमावल्याची खंत व्यक्त होत आहे. त्यांना मेंदूत रक्तस्त्राव झाल्यानं पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल केलं होतं. शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू होते, परंतु आज सकाळी त्यांची तब्येत ढासळली आणि अखेर मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने त्यांचे निधन झालं.
जीवनावर भरभरून प्रेम करणारा तो एक कलाकार होता आणि मला ज्या ज्यावेळी मदत लागली त्या त्यावेळी ते पाठिशी उभे राहिल्याची भावना कवी संदीप खरे यानं व्यक्त केली. कायम हसतमुख असलेल्या मोघेंना भेटल्यावर मनाची मरगळ दूर होऊन प्रफुल्लित व्हायला व्हायचं असे सांगतानाच माझ्या जडणघडणीत त्यांचा खूप मोठा वाटा असल्याचंही संदीप म्हणाला.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही सुधीर मोघे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. मोघे व आमचे अनेक वर्षांचे संबंध होते असे सांगत एक उत्तम गीतकार असलेले मोघे माणूसही तितकेच सज्जन होते, असे त्या म्हणाल्या. मी त्यांची अनेक गाणी गायली,ती सगळीच उत्तम होती. पण 'विसरू नको श्रीरामा मला' हे त्यांनी लिहीलेलं गाणं आपल्या विशेष आवडीचं गाणं असल्याचे त्या म्हणाल्या.

सुधीर मोघे यांचे साहित्यातील योगदान

कविता संग्रह 
- आत्मरंग
- गाण्याची वही
- पक्षांचे ठसे - ३हून अधिक आवृत्त्या
- लय - एकाहून अधिक आवृत्त्या
- शब्द धून
- स्वतंत्रते भगवती

गद्य 
- अनुबंध
- गाणारी वाट - एकाहून अधिक आवृत्त्या
- निरांकुशाची रोजनिशी- एकाहून अधिक आवृत्त्या

चित्रपट गीतकार 
सुमारे ५० हून अधिक चित्रपटांचे गीतलेखन त्यांनी केले. 
आत्मविश्वास
एक डाव भुताचा
कळत नकळत
चौकट राजा
जानकी
पुढचं पाऊल
राजू
लपंडाव
शापित
सूर्योदय
हा खेळ सावल्यांचा

सुधीर मोघे यांनी लिहिलेली रसिकप्रिय भावगीते आणि चित्रपट गीते 

अरूपास पाहे रूपी
आदिमाया अंबाबाई
आला आला वारा
एक झोका चुके काळजाचा
एकाच ह्या जन्मी जणू
काजल रातीनं ओढून नेला
कुण्या देशीचे पाखरू
गोमू संगतीनं माझ्या तू
जरा विसावू या वळणावर
झुलतो बाई रास-झुला
तपत्या झळा उन्हाच्या
तिथे नांदे शंभू
दयाघना का तुटले
दिसलीस तू फुलले ॠतू
दिसं जातील दिसं येतील
देवा तुला शोधू कुठं
दृष्ट लागण्याजोगे सारे
नवा डाव चल मांडायाला
निसर्गासारखा नाही रे
फिटे अंधाराचे जाळे
भेटशील केव्हा माझिया जिवलगा
मन मनास उमगत नाही
माझे मन तुझे झाले
माय भवानी तुझे लेकरू
मी सोडुन सारी लाज
रात्रीस खेळ चाले
विसरू नको श्रीरामा
शंभो शंकरा करुणाकरा
सखि मंद झाल्या तारका
सूर कुठूनसे आले अवचित
सांग तू माझाच ना
सांज ये गोकुळी सावळी सावळी
हे जीवन सुंदर आहे
हे नायका जगदीश्वरा

सुधीर मोघे यांनी संगीत दिलेली गीते 
अज्ञात तीर्थयात्रा
भन्‍नाट रानवारा मस्तीत शीळ
भेटशील केव्हा माझिया जिवलगा
माझे मन तुझे झाले
रंगुनी रंगात सा-या

संगीत दिग्दर्शन 
कशासाठी प्रेमासाठी : मराठी चित्रपट
सूत्रधार : हिंदी चित्रपट
स्वामी , अधांतरी, नाजुका : मराठी दूरदर्शन मालिका
हसरतें , डॉलर बहु , शरारतें : हिंदी मालिका
रंगमंचावरील कार्यक्रम: संकल्पनां, संहिता आणि दिग्दर्शन

कविता पानोपानी
नक्षत्रांचे देणे : कुसुमाग्रज यांच्या कवितांवर आधारित कार्यक्रम
नक्षत्रांचे देणे : शांता शेळके यांच्या कवितांवर आधारित कार्यक्रम
नक्षत्रांचे देणे : सुधीर फडके यांचे संगीत असलेल्या गाण्यांचा कार्यक्रम
मंतरलेल्या चैत्रबनात
स्मरणयात्रा
"उत्तररात्र" रॉय किणीकर-काव्यप्रयोग

सुधीर मोघे यांना मिळालेले पुरस्कार 
महाराष्ट्र राज्य पुरस्कार सर्वोत्कृष्ट गीतकार ४ वेळा
सूरसिंगार पुरस्कार सर्वोत्कृष्ट गीतकार २ वेळा
श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्यातर्फे कृतज्ञता पुरस्कार
गदिमा प्रतिष्ठानातर्फे चैत्रबन पुरस्कार
पहिल्या वर्षी सर्वोत्कृष्ट गीतकार मटा गौरव पुरस्कार
पहिल्या वर्षी सर्वोत्कृष्ट गीतकार अल्फा गौरव पुरस्कार
'मराठी कामगार साहित्य परिषदे 'तर्फे 'गदिमा पुरस्कार' - २००६
'महालक्ष्मी ' पुरस्कार - २००६
'महाराष्ट्र साहित्य परिषदे'चा 'कविवर्य ’ना.घ. देशपांडे' पुरस्कार - २००६
'दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान ' - प्रथम वर्ष 'शांता शेळके 'पुरस्कार - हस्ते श्रीमती लता मंगेशकर २००७
साहित्यकार 'गो. नी. दांडेकर 'स्मृती पुरस्कार - मृण्मयी पुरस्कार २००८
केशवसुत पुरस्कार २०११
’रोटरी क्लब’, डोंबिवली यांच्यातर्फे ‘व्होकेशनल एक्सलन्स’ पुरस्कार - (२०११-१२)
सोमण परिवार आणि कुटुंबीयांतर्फे शब्दस्वरप्रभू ’अजित सोमण’ पुरस्कार - (२० ऑगस्ट २०१३).