সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, April 27, 2016

मंडळ अधिकारी कार्यालयांची निर्मितीस मान्यता

मंडळ अधिकारी कार्यालयांची निर्मितीस मान्यता

मुंबई दि.२६ एप्रिल : गेल्या ३० वर्षात महाराष्ट्रात वाढलेली लोकसंख्या, खातेदारांची संख्या, महसुली गावे, तलाठ्यांकडे वेळोवेळी मोठ्या प्रमाणात सोपविण्यात आलेली कामे इत्यादींमुळे राज्यातील तलाठ्यांवर मोठ्या प्रमाणात कामाचा बोजा वाढला आहे. त्या अनुषंगाने राज्यातील वाढीव तलाठी साझा व मंडळ अधिकारी कार्यालयांची निर्मिती करण्यास आज मंत्रिमंडळाने तत्वत: मान्यता दिली असल्याची माहिती महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज येथे दिली.

     खडसे पुढे म्हणाले की, तलाठी साझा पुनर्रचना समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने पुढील निर्णय घेण्यासाठी महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात यावी व या समितीचा अहवाल मंत्रिमंडळाच्या अंतीम निर्णयासाठी सादर करण्यात यावा, असाही आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

     महसूल विभाग लोकाभिमुख विभाग असून प्रशासकीय सुविधेसाठी राज्याचे एकूण सहा महसूली विभागात विभाजन करण्यात आले आहे. या विभागांच्या अधिनस्त एकूण ३६ जिल्हे, १८४ उपविभाग, ३५८ तालुके, २,०९३ मंडळ अधिकारी कार्यालये आणि १२,३२७ तलाठी साझे आहेत. तलाठी हा गाव पातळीवरील महत्वाचा कर्मचारी आहे. राज्यातील तलाठी साझा निर्मितीसाठी निकष निश्चित करण्याच्या उद्देशाने १९७४ साली डी.एन.कपूर समिती गठित करण्यात आली होती. या समितीने निश्चित केलेल्या निकषानुसार १९८३ साली तलाठी साझांची निर्मिती करण्यात आली. आजमितीस राज्यात १२,३२७ तलाठी साझे अस्तित्वात आहेत. मात्र, वर उल्लेख केल्याप्रमाणे तलाठ्यांवर कामाचा बोजा मोठ्या प्रमाणात वाढलेला असल्यामुळे तसेच यासाठी तलाठ्यांच्या संघटनेने तलाठी साझांची पुनर्रचना करावी अशी मागणी केली होती. त्या अनुषंगाने १८ फेब्रुवारी, २०१४ रोजी राज्य शासनाने नागपुरच्या विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तलाठी साझा पुनर्रचना समिती गठीत केली होती. या समितीने गेल्या ऑगस्ट मध्ये आपला अहवाल शासनास सादर केला होता. त्यानुसार नवीन तलाठी साझा निर्मितीबाबत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला.
वेंडर अॅक्टची अमंलबजावणीसाठी निर्देश

वेंडर अॅक्टची अमंलबजावणीसाठी निर्देश

केंद्रिय राज्यमंत्री हसंराज अहिर 

नागपूर - वेंडर अॅक्ट कायदयांची अमंलबजावणी करण्यांचे दृष्टीने तातडीने कारवाई करावे असे निर्देष केंद्रिय रसायन व खते राज्यमंत्री हसंराज अहिर यांनी नागपूर विभागीय आयुक्तांना दिले. श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी ना. अहिर यांची भेट घेवून, वेंडर अॅक्टची राज्यात अमंलबजावणी होत नसल्यांचे निदर्शनास आणून देत या कायदयाची अमंलबजावणी करण्यांची मागणी केली होती. या कायदयाची अमंलबजावणी होत नसल्यांने ना. अहिर यांनी नाराजी व्यक्त करीत, अमंलबजावणीच्या सुचना दिल्यात.
नाम. अहिर यांचे आदेश प्राप्त होताच, नागपूर विभागाचे आयुक्त तथा प्रादेशीक संचालक, नगर परिषद प्रशासन नागपूर यांनी त्यांचे क्षेत्रातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोलीचे जिल्हाधिकारी यांना दिनांक 17/3/2016 रोजी कार्यालयीन आदेश पाठवून, अमंलबजावणी करण्यांचे निर्देश दिले आहे.
देशात ‘द स्ट्रिट वेंडर्स प्रोटेक्षन आॅफ लाईव्हलीहूड अॅंड रेग्युलेशन आॅफ स्ट्रिट वेंडीग अॅक्ट 2014 पारित केले आहे. या कायदयामुळे देशातील फुटपाथवर किरकोळ व्यवसाय करणा—यास सरंक्षण देण्यात आले आहे. महानगर पालिका, नगर पालीका व नगर पंचायतीच्या क्षेत्रात हा कायदा लागू असून, प्रत्यक्षात मात्र हा कायदा अजूनही अमंलात आणल्या न गेल्यांने अनेक नगर पालीकाचे क्षेत्रात फुटपाथ हटावच्या नावाखाली किरकोळ व्यवसाय करणा—या गरीबांना हुसकावून लावले जात आहे. या पाष्र्वभूमीवर श्रमिक एल्गारने वेंडर अॅक्ट कायदयाची अमंलबजावणी करावी अशी मागणी लावून धरली असून, या कायदयाची सोप्या भाषेत माहिती देणारे पुस्तक प्रकाशीत केले व फुटपाथ व्यावसायीकांचा मेळावाही घेण्यात आला.
केंद्रीय राज्यमंत्री ना. हसंराज अहिर यांनी वेंडर अॅक्टच्या अमंलबजावणीसाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल श्रमिक एल्गारच्या अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी त्यांचे आभार मानून, यामुळे किरकोळ व्यावसायीकांना लाभ मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

Friday, April 22, 2016

तेलंगानात कामासाठी गेलेल्या युवकांची सुटका

तेलंगानात कामासाठी गेलेल्या युवकांची सुटका

- श्रमिक एल्गारच्या प्रयत्नाला यश

सावली -  युवक मागील 2—3 महीण्यापासुन तेलंगाना येथील कंपनीत कामावर गेले असता त्यांची मजुरी न देता परत येऊ देत नसल्याची तक्रार श्रमिक एल्गारच्या माध्यमातुन मजुरांच्या पालकांनी पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांचेकडे केली होती.त्यानंतर चंद्रपूर पोलीसांनी तेलंगाना पोलीसांशी संपर्क साधुन सर्व मजुरांची मजुरीसहीत सुटका होऊन घरी परतले
सावली तालुक्यातील चारगांव येथील चंद्रशेखर गजानन गावतुरे, समिर शामकुमार मडावी, जयपाल अरूण गेडाम, नागेश कपिल कुमरे, राकेश शांताराम गुरगुले, मोसम पत्रू आत्राम, शरद वेटे, रामा भैयाजी मोहुर्ले हे युवक 7 फरवरी 2016 पासून तेलंगानातील येमुलवाडा येथिल श्रीराम कोरी या दगडाच्या खदानीत काम करीत होते. 2 महीण्याचा कलावधी लोटल्यानंतरही मात्र मजुरांना गावाकडे परत येण्यासाठी मनाई केल्या जात होते, मजुरांचा छळ केल्या जात होते व मजुरीही दिल्या जात नसल्याने याबाबत पालकांनी श्रमिक एल्गारकडे तक्रार केली होती. नेहमीप्रमाणे मजुरांची अडचण लक्षात घेता ठेकेदाराचे तावडीतुन मजुरीसह सुटका करण्याचे निवेदन श्रमिक एल्गारचे माध्यमातून पालकांनी चंद्रपूरचे पोलीस उपअधिक्षक राजपूत यांचेकडे सादर केले. या प्रकरणाची दखल घेत राजपूत यांनी युवकांना सोडविण्यासाठी प्रयत्न करुन येमुलवाडा पोलीसांकडे संपर्क साधला यामुळे 8 मजूरांची सूटका होऊन 90 हजार रुपये मजुरीसह गावाकडे परत आले. यामुळे मजूर व पालकांनी श्रमिक एल्गार व चंद्रपूर पोलीसांचे आभार मानले आहे

Wednesday, April 20, 2016