সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, December 28, 2014

आंबेडकरी साहित्य संमेलन घुग्‍घुस येथे

आंबेडकरी साहित्य संमेलन घुग्‍घुस येथे

घुग्‍घुस - अ.भा. आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाचे बारावे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन चंद्रपूर ‌जिल्ह्यातील घुग्‍घुस येथे १६ ते १८ जानेवारीदरम्यान आयोजित करण्यात आले आहे. प्रसिद्ध आंबेडकरी नाटककार आणि लेखक प्रा. अविनाश डोळस हे या साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्‍थानी राहणार आहेत. हिंदीचे प्रसिद्ध आंबेडकरी लेखक मोहनदास नैमिशराय हे या संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते नरेन गेडाम यांची उपस्थिती राहणार आहे. संमेलनादरम्यान तीन परिसंवाद, एक विधान चर्चा, अनुभव कथन, कविसंमेलन, पथनाट्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार अहेत.

Tuesday, December 23, 2014

बेरोजगारीला कंटाळून तरुणीची आत्महत्या

बेरोजगारीला कंटाळून तरुणीची आत्महत्या

 नागपूर : सुशिक्षित असूनही रोजगार मिळत नसल्याच्या कारणाने तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली. ज्योती विजय गायकवाड (वय 25) असे मृत तरुणीचे नाव आहे.
दत्तवाडी येथील गजानन मंदिराजवळील समर्थ गजानन सोसायटीत राहणारी ज्योतीने एम.कॉमचे शिक्षण घेतले होते. ती पहिल्या माळ्यावरील खोलीत नेहमीप्रमाणे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायची. मंगळवारी (ता. 23) दुपारी जेवण करून नेहमीप्रमाणे अभ्यासाला गेली. आत्महत्येपूर्वी तिने एका कागदावर "आई, बाबा, ताई मला माफ करा. मी शिकूनही अजून मला चांगला जॉब मिळाला नाही. त्यामुळे मी स्वत: आत्महत्या करीत आहे. यासाठी कुणीही जबाबदार नाही.' असे लिहून ठेवले होते. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पंचनामा करण्यात आला.

Saturday, December 20, 2014

बंदीस्त बिबटयांना मोठया पिंजज-यात ठेवा

बंदीस्त बिबटयांना मोठया पिंजज-यात ठेवा

इको-प्रोची मागणी-
चंद्रपूरः जिल्हयातील वनक्षेत्रालगतच्या गावात बिबट-मानव संघर्षा दरम्यान पकडण्यात आलेल्या बिबटयांना छोटया ‘ट्रॅप केज’ मधुन मोठया पिंज-यात ठेवण्याची मागणी इको-प्रो चे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी वनविभागाकडे केली आहे.
चंद्रपुरात आज तुकडोजी महाराज साहित्य संम्मेलन

चंद्रपुरात आज तुकडोजी महाराज साहित्य संम्मेलन

 चंद्रपुर- श्री गुरूदेव सेवा मंडळ आणि भारतीय विचार मंच, विदर्भ प्रांताच्या संयुक्त विद्यमाने येत्या २१ डिसेंबरला चिमूर तालुक्यातील नेरी येथे  श्रीतुकडोजी महाराज साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या विदर्भस्तरीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी गुरूकुंज मोझरी येथील अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे उपसर्वाधिकारी रुपराव वाघ असणार आहेत. संमेलनाचे उद्घाटन रविवार (२१ डिसेंबर)ला सकाळी १० वाजता राष्टÑसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांच्या हस्ते होणार आहे. तर यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अ.भा. श्री गुरूदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ, सरचिटणीस जनार्दनपंत बोथे उपस्थित राहतील. दु. ४ वाजता होणाºया समारोप समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून संस्कार भारतीचे विदर्भ प्रांत अध्यक्ष तथा साहित्यीक डॉ. राजन जयस्वाल, भारतीय विचार मंच, विदर्भ प्रांताचे संयोजक प्रा. डॉ. सुभाष लोहे उपस्थित राहणार आहेत. २१ डिसेंबरला सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडी निघणार आहे. सकाळी ९ ते १० वाजेपर्यंत प्रतिनिधी नोंदणी, ९ वाजता राष्टÑसंत छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन ‘राष्टÑसंतांचे अध्यात्मचिंतन व आध्यात्मिक कार्य’ या विषयावर पहिला परिसंवाद होईल. या परिसंवादाचे अध्यक्ष म्हणून अमरावती येथील प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख असणार आहे. तर नागपूरचे प्रा. डॉ. कृष्णा साकुळकर, डॉ. संजय येल्लुरे, चंद्रपूरच्या प्रा. डॉ. पद्मरेखा धनकर व नेरीचे प्रा. राम राऊत हे वक्ते असतील. संचालन प्रा. प्रफुल्ल बन्सोड करतील. दु. १२.१५ वाजता दुसरा परिसंवाद ‘राष्टÑसंतांचे ग्रामचिंतन आणि समाजकार्य’ या विषयावर होईल.

Friday, December 19, 2014

दवलामेटीतील खून प्रकरणी दोघांना अटक

दवलामेटीतील खून प्रकरणी दोघांना अटक

नागपूर - वाडी -दवलामेटी येथे जिवानीशी ठार मारणा-या आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून संतोष दिलीप परतेकी वय 27 वर्ष, दीपक तुकडूदास भैसारे 26 वर्ष यांना अटक करण्यात आली.
दि. 18 डिसेंबर रोजी प्रशांत परतेकी , संतोष दिलीप परतेकी वय 27 वर्ष, दीपक तुकडूदास भैसारे 26 वर्ष सर्व रा. रामजी आंबेडकर नगर, आठवा मैल, नागपूर यांनी संगनमत करुन उमेश व्यंकट इंगळे वय 27 वर्ष रा. रामजी आंबेडकर नगर, तक्षशीला बौध्द विहारासमोर, आठवा मैल, वाडी, नागपूर यास पोस्टे वाडी हद्यीत वार्ड नं. 4, सुभाष गडेकर यांचे घरासमोर, रामजी आंबेडकर नगर येथे अज्ञात कारणावरुन त्याच्या डोक्यावर, हातावर प्राण घातक शस्त्राने वार करुन जिवानीशी ठार केले. याप्रकरणी फिर्यादी व्यंकट चिंतामण इंगळे वय 55 वर्ष यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोस्टे वाडी येथे सपोनि शिंदे यांनी आरोपीविरुध्द कलम 302,34 भादंवि अन्वये गुन्हा नोंदवून आरोपी २ आरोपींना अटक केली आहे.
चंद्रपुरात विदेशी पक्ष्यांचे आगमन

चंद्रपुरात विदेशी पक्ष्यांचे आगमन


फेसेस संस्थेने केले पक्षी निरीक्षण व अभ्यास 

हिवाळा  प्रारंभ होताच युरोप,बुल्चीस्थान,सायबेरिया,मंगोलिया,अश्या विविध देशातून भारतात येणाऱ्या विविधरंगी स्थलांतर पक्ष्यांचे आगमन चंद्रपूर जिह्यात झाले आहे.फेसेस या संस्थेच्या वतीने जिह्यातील विविध तलावांवर तसेच पान्स्थालाना भेटी देत तेथील स्थ्लान्तारीय पक्ष्यांचे निरीक्षण व अभ्यास केला.
                 हिवाळ्यात पृथ्वीवर उत्तर गोलार्धात मोठ्या प्रमाणात बर्फ पडते.त्याळेस तेथील पक्षी खाद्य व निवाऱ्याच्या शोधात उष्ण भागाकडे प्रयाण करतात.या काळात भारतासारख्या देशात थंडी असली तरी ,फार तीव्र नसते,त्यामुळे भारतात मोठ्या संख्येने स्थलांतर पक्षी येतात,संथेने केलेल्या पाहणीत,बर हेडेड गुज हा जगातला सर्वात उंचावरून उडणारा पक्षी आहे,तो माउंट एवरेस्ट ८८४८ मीटर{२९०२९ फुट}याच्या वरून उडतांना आढळलेला आहे, सररुची{पिन टेल डक},लालसरी{पोचार्ड},चक्रवाक{भ्राम्हनी डक},गडवाल,भुवई{गार्गेणी},थापट्या{शावेलर},दलदल ससाणा{मार्श ह्यारिअर},स्पोट बिल डक,तसेच देशांतर्गत स्थलांतर करणारे शेकटे{ब्लेक विंग स्तील्त},चमचा बाज{स्पून बिल},रंगीत करकोचा{पेंटेड स्टोर्क},सुंदर बटवा{कॉमन टील},आदी दुर्मिळ स्थलांतरीत पक्षी आढळले,सध्या जिह्यातील विविध तलावांवर दुर्मिळ स्थलांतरित पक्षी आले असून त्यांच्या संरक्षणाची गरज असल्याचे मत संस्थेने व्यक्त केले.या संस्थेच्या उपक्रमात पक्षी अभ्यासक शैलेश उपरे,दिनेश खाटे,जितेंद्र नोमुलवार,विकी पेटकर,निखिल मडावी,जुबी शेख,प्रसाद चट्टे,जतिन स्वान,आदींचा समावेश होता. 

Thursday, December 18, 2014

सावनेरचे एसडीओ, तहसीलदार निलंबित

सावनेरचे एसडीओ, तहसीलदार निलंबित

सावनेर,: रामाडोंगरी परिसरातून बेकायदेशीररित्या वाळू उपशासाठी परवानगी दिल्याप्रकरणी सावनेरचे उपविभागीय अधिकारी विनोद हरकंडे, तहसीलदार श्री. माने यांना महसूल मंत्र्यांच्या आदेशावरून निलंबिल करण्यात आले. 
मित्रांनी केली हत्या

मित्रांनी केली हत्या

नागपूर  : वाडी परिसर रामजी आंबेडकर नगरातील वॉर्ड क्रमांक पाच येथे चाकूने भोसकून तरुणाची हत्या झाली. उमेश व्यंकट इंगळे (वय 27) असे मृताचे नाव आहे. आरोपी घटनेनंतर पसार झाले. 
अंबाझरी आयुध निर्माणीत ठेकेदारी करणारा उमेश व्यंकट इंगळे हा टाटा एस हे वाहन चालवितो. गुरुवारी तो वाहन पासिंग करण्यासाठी आरटीओ कार्यालयात गेला होता. त्यानंतर मित्र दीपक समुद्रे, प्रशांत परतेकी यांच्यासोबत दारू पिण्यासाठी गेला. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तिघेही रामजी आंबेडकर नगरात आले. दीपक समुद्रे याच्या घराजवळ आल्यानंतर इंगळे याचे प्रशांत आणि दीपकसोबत भांडण झाले. त्या दोघांनी इंगळेच्या पोटात चाकू भोसकला. डोक्‍यावर जबर मारहाण केली. त्यामुळे तो गंभीररीत्या जखमी झाला. घटनेनंतर दोघेही पसार झाले. नागरिकांना इंगळे याला दत्तवाडी येथील आशा हॉस्पिटलमध्ये भरती केले. मात्र, त्याचा मृत्यू झाला.

Friday, December 12, 2014

राज्यपाल शनिवारी जिल्ह्यात

राज्यपाल शनिवारी जिल्ह्यात

चंद्रपूर, महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव हे येत्या 13 डिसेंबरला दोन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून प्रशासनातील अधिकारी कामाला लागले आहेत. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे सकाळी साडेदहा वाजता चंद्रपूर औष्णिक वीजकेंद्रात आगमन होईल. त्यानंतर साडेदहा वाजता वाहतूक शाखेत आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांच्या बैठकीस उपस्थित राहील. साडेअकरा वाजता प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात आयोजित कार्यक्रमास ते हजेरी लावतील. दुपारी 1 ते 2.50 वाजेपर्यंतची वेळ राखीव राहील. त्यानंतर दुपारी 3 ते 4.15 वाजता राजुरा तालुक्‍यात येत असलेल्या लक्कडकोट येथील सम्राट अशोक हायस्कूल येथे आयोजित सुवर्णजयंती राजस्व अभियान कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर ते चंद्रपुरात परत येतील. रविवारी सोईनुसार राज्यपाल नागपूरकडे रवाना होतील.
आमची माती, आमची माणसं

आमची माती, आमची माणसं

सध्याच्या बोचऱ्या थंडीत  शेतकऱ्यांची धान काढण्याची लगबग सुरू झालीय. 
तांबड फुटताना बळीराजा शेतात हजर होतोय. हुडहुडी भरवणारी थंडी बाजूला सारत 
धान कापणी करताना मोत्याची रास आता घरी येणार, याचा आनंद आहे . 
                                                                                      फोटो देवानंद साखरकर चंद्रपूर

 

                                                                                                                         
 
                                                                                                                                        
                                                                                                                                        
                                                                                                                         

Thursday, December 11, 2014

केंद्राचे दुष्काळी पथक रविवार पासून राज्याच्या दौऱ्यावर

केंद्राचे दुष्काळी पथक रविवार पासून राज्याच्या दौऱ्यावर


राज्यातील खरीप पिकांचे झालेले नुकसान पाहण्यासाठी केंद्र सरकारच्या दहा विविध मंत्रालयाच्या जेष्ठ अधिकाऱ्यांचे पथक दिनांक १४ ते १७ डिसेंबर दरम्यान राज्यातील विविध दुष्काळी स्थितीचा मराठ वाडा आणि विदर्भ परी सरा चा प्रातिनिधिक स्वरुपात पाहणी दौरा करणार आहे. या भेटीत मराठवाडा ते विदर्भ दरम्यान दहा अधिकाऱ्यांची दोन पथके दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करुन आपला अहवाल केंद्र सरकारला सादर करतील.

Wednesday, December 10, 2014

शेतकरयांच्या आत्महत्या- उपाय योजना एक चिंतन

शेतकरयांच्या आत्महत्या- उपाय योजना एक चिंतन

१९७२ पेक्षाही जास्त तीव्रता असणारी दुष्काळी परिस्थितीचे वादळ सध्या मराठवाडा परीसरात घोंगावत आहे. फेब्रुवारी-मार्च नंतर परिस्थीती आणखी बिकट होणार आहे. न उगवलेले पीक, पाण्याची टंचाई, डोक्यावरील कर्ज, परीवाराचे ओझे यासर्व कारणांमुळे शेतकरी बांधव आत्महत्या करत आहे. या आत्महत्या थांबविण्यासाठी कायम स्वरुपी काय उपाय योजना करता येतील यासाठी माझ्या अल्प बुद्धीला सुचलेले काही उपाय.
१) नौकरी - खेडयातील अल्प भुधारक शेतकरयांच्या प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी द्यावी. पोलीस भरती, सैन्य भरती, नगर पालिका, महानगरपालिका, जिल्हा परीषद अशा ठिकाणि कित्यक जागा शिल्ल्क आहेत त्या जागा दुष्काळ ग्रस्त भागातून भराव्यात.
२) रोजगार निर्मिती - दुष्काळी परिस्थिती मध्ये शेत बंधारे खोदणे, शेत तळे खोदणे, शेताभोवती चरे खोदणे, तलावातील गाळ काढणे, तलावाची खोली वाढविणे, नवीन तलावांची निर्मीती, नद्यांचे पुनर्जीवन, रस्तांची कामे, वनीकरणाची कामे अशा स्वरुपाच्या भ्रष्टाचार मुक्त कामाचे नियोजन करुन प्रत्येक कुटुंबाला काम मिळेल अशी व्यवस्था करणे आवश्यक आहे. याचे दोन फायदे होतात एक कामकरयांच्या हातात पैसे येतो व जलसंधारणाची कामे झाल्यामुळे पाऊस पडल्यावर जमीनीमध्ये पाणी मुरुन भविष्यातील पाण्याची पातळि वाढेल.
३) शेतकरयांवर असलेले कर्ज माफ करावे किंवा कर्जाच्या परतफेडीची मुदत वाढवावी, शेतकरयावर असलेले कर्ज बिनव्याजी करावे.
४) जनावरांसाठी लवकरात लवकर भ्रष्टाचार मुक्त चारा छावण्या उघडाव्यात.
५) सरकारी दवाखान्यात योग्य आरोग्य सेवा पुरवावी.
६) अन्न सुरक्षा कायद्याद्वारे मोफत किंवा अल्पदरातील अन्नाचा सुरळीत पुरवठा होईल याकडे लक्ष द्यावे.
७) आरोग्यविषयक समुपदेशन करावे किंवा मानसरोग तद्यांची मदत घेऊन वैफल्य ग्रस्त, व्यसनी व्यक्तींची तपासणी करुन त्यांना समुपदेशाची व्यवस्था करावी
८) सर्वात महत्वाचे दुष्काळ ग्रस्त भाग संपुर्ण पणे व्यसन मुक्त करावा. सर्व दारु दुकाने, पानटपरया वरील विडी-सिगारेट-तंबाखु विक्री बंद करावी.
डॉ. पवन लड्डा
लातूर
०२३८२ २२१३६४
मो. ०९३२६५११६८१
मित्रांनो आपल्याही काही सुचना असतील तर शेअर कराव्यात.

Sunday, December 07, 2014

भद्रावतीत दोन गटात तलवारने वार

भद्रावतीत दोन गटात तलवारने वार

तलावाच्या वादातून भोई समाजात हाणामारी 
चंद्रपूर, : न्यायालयीन प्रक्रियेतील तलावाच्या वादाचा निर्णय विरुद्ध गटाच्या बाजूने लागल्याने संतापलेल्या भोई समाजाच्या दुसऱ्या गटाने डोळ्यात तिखट फेकून मारहाण केली. त्यानंतर दोन्ही गटातील महिला-पुरुषांमध्ये चाकू, तलवार आणि कुऱ्हाडीने हाणामारी चालली. यात दोन्ही गटातील 11 जण जखमी असून, त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. ही घटना भद्रावती तालुक्‍यातील विजासन येथे घडली. रात्री अकराच्या सुमारास सर्व जखमींना चंद्रपूरात हलविण्यात आले होते.जखमीत माणिक पचारे (वय 52), गिरीजा सुनील मांढरे (वय 52), आनंद मांढरे (वय 49, वसंता मांढरे (वय 70), महेश मांढरे (वय 25), सुनील मांढरे (वय 42) यांच्यासह आणखी पाच जणांचा समावेश आहे. रात्रीउशिरापर्यंत पोलिस कारवाई सुरू होती. 

Friday, December 05, 2014

रामाळा तलावात इकाॅर्नीया

रामाळा तलावात इकाॅर्नीया

   रामाला तलावास पुन्हा इकाॅर्निया चे ग्रहण 
रामाला तलाव स्वच्छता अभियानाची गरज

चंद्रपूरः शहरातील ऐतीहासीक रामाळा तलावात पुन्हा ‘इकाॅर्नीया’ वनस्पतीने थैमान घातले आहे. या वनस्पतीने पुन्हा संपुर्ण तलावाचा भाग व्यापलेला आहे. वर्ष 2009 प्रमाणे तलावाचे दुषीत पाणी सोडुन इकाॅर्नीया वनस्पतीपासुन तलाव मुक्त करण्याची मागणी इको-प्रो चे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी जिल्हाधिकारी दिपक म्हैसेकर यांचेकडे एका निवेदनातुन केली आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या

शेतकऱ्यांच्या आत्महत्या

राज्यातील आपद्ग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी
सिंचन योजनावर रु.२,१७७ कोटी, तर कर्जमाफीसाठी रु.७३८ कोटी खर्च


मुंबई दि.५ डिसेंबर : राज्यातील आपद्ग्रस्त शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नयेत म्हणुन पंतप्रधान पॅकेजमधुन २१७७ कोटी रुपये सिंचन योजनावर खर्च केले. तर, ८३७ कोटी रुपये कर्ज माफीसाठी देण्यात आले आहेत. याखेरीज, राज्य शासनाच्या पॅकेजमधून बैलजोडी, पंपसेट इत्यादी खरेदी करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यास रु.२५ हजार याप्रमाणे ६० हजार शेतकऱ्यांना १३० कोटी रुपये आणि शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी एकूण ३० कोटी रुपये आतापर्यंत वितरीत करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे महसूल आणि मदत व पूनर्वसन मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली.
केंद्राचे पथक दोन दिवसांत येणार

केंद्राचे पथक दोन दिवसांत येणार

महाराष्ट्रातील दुष्काळाची पहाणी 

नवी दिल्ली, : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्‍यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने राज्यातील दुष्काळग्रस्त भागाची पहाणी करण्यासाठी केंद्रीय पथक येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रात येणार आहे, असे आज राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज नवी दिल्ली येथे सांगितले.

Sunday, November 30, 2014

25 हजार लेते निरीक्षक फंसा एसीबी के जाल में

25 हजार लेते निरीक्षक फंसा एसीबी के जाल में

चंद्रपुर एक बिजली ठेकेदार से मनपा के निरीक्षक द्वारा 22 लाख 71 हजार 44 रुपये के बिल पास कराने के एवज में 25 हजार की रिश्वत मांगी गई. इसकी शिकायत के उपरांत निरीक्षक काले को रंगेहाथ गिरफ्तार कर लिया गया. इस कार्यवाही से कुछ पलों के लिए चंद्रपुर मनपा में हड़कम्प मच गया.

चंद्रपूर जिल्हा ३ डिसेंबरपासून दारूबंद

चंद्रपूर जिल्हा ३ डिसेंबरपासून दारूबंद

सुधीर मुनगंटीवार : व्यसनमुक्तीच्या प्रसार प्रसिद्धीसाठी चार कोटींची तरतूद

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा ३ डिसेंबरपासून दारूबंद करणे हा समाजाच्या हिताचा निर्णय असून यासाठी सर्व जिल्हावाशियांच्या सहकार्याची गरज आहे. जिल्ह्यात दारूबंदी सोबतच व्यसनमुक्त करण्याचा निर्धार असल्याचे मत अर्थ नियोजन व वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

Friday, November 28, 2014

अथर्व गिते  अबैकस नेशनल चैम्पियनशिप ट्रॉफी

अथर्व गिते अबैकस नेशनल चैम्पियनशिप ट्रॉफी

चंद्रपुर: सिप अबैकस के तत्वावधान में 23 नवम्बर 2014 को मैनफो कंवेंशन सेंटर बेंगलुरू में आयोजित 14वां नेशनल अबैकस स्पर्धा में अथर्व रवि गिते ने नेशनल चैम्पियनशिप ट्रॉफी जीत ली। विभिन्न राज्य से 6 हजार विद्यार्थियों ने इस स्पर्धा में भाग लिया। स्मार्ट किड्स प्रताप नगर में अबैकस में प्रशिक्षण लेने वाले अथर्व गिते ने स्कूल ऑफ स्कॉलर्स वानाडोंगरी जि. नागपुर का 6 ठे क्लास का विद्यार्थी है।
‘श्रुती दर्पण’ या ग्रंथाचा प्रकाशन शनिवारी

‘श्रुती दर्पण’ या ग्रंथाचा प्रकाशन शनिवारी

नागपूर- पद्मविभूषण बाबा आमटे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रुद्र प्रकाशनाच्यावतीने, येत्या २९ नाव्हेंबरला शनिवारी सायंकाळी ६ वाजता, अमरावती रोडवरील विनोबा विचार केंद्राच्या सभागृहात महाराष्टÑातील विख्यात बांसरीवादक अविनाश पटवर्धन यांनी अथक परिश्रमातून निर्माण केलेल्या ‘श्रुती दर्पण’ या शोधग्रंथाचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. प्रख्यात समाजसेवक डॉ. विकास बाबा आमटे आणि पद्मश्री डॉ. प्रकाश बाबा आमटे या बंधुद्वयाच्या उपस्थितीत ‘श्रुती दर्पण’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
भारतीय संगीतात कारुण्याचा ओलावा निर्माण करणाºया ‘बांसरी’ च्या स्वरतंत्राचा सूक्ष्म शोध घेण्याचा प्रयत्न या ग्रंथात करण्यात आला आहे. संपूर्ण देशभर पायपीट करून विविध प्रांतातील बांसरी वादकांशी चर्चा करीत, अविनाश पटवर्धन यांनी शास्त्रशुुद्ध बांसरी बनविण्याचे तंत्र विकसित केले आहे. प्राणातून निघालेला कोणताही स्वर माणसाचे अंत:करण एकदुसºयाशी जोडू शकतो, हा आत्मविश्वास घेऊन अविनाश पटवर्धन गेली अनेक वर्षे बांसरीतून माणूस जोडण्याचे अभियान चालवित आहेत. पद्मविभूषण बाबा आमटे यांच्यासमवेत राष्टÑजागृती अभियानाच्या निमित्ताने देशभर फिरताना, ‘बांसरी’च्या माध्यमातून राष्टÑीय एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्नही त्यांनी केला आहे. प्राचीन भारतीय स्वरशास्त्रातील श्रुतींचा सखोल अभ्यास करून मांडलेली तथ्ये भारतीय संगीतशास्त्रात महत्त्वपूर्ण ठरावीत. यावर देशातील अनेक मान्यवरांनी दिलेले अभिप्राय याची साक्ष देतात. या कार्यक्रमाकरिता शहरातील संगीतप्रेमी, रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन रुद्र प्रकाशनातर्फे करण्यात आले आहे.
भिसीत आज "दोन घास सुखाचे' नाट्यप्रयोग

भिसीत आज "दोन घास सुखाचे' नाट्यप्रयोग

डॉ. प्रकाश आमटे चित्रपटातील कलावंतांचा सत्कार


भिसी (जि. चंद्रपूर), : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या "डॉ. प्रकाश आमटे' चित्रपटातील कलावंतांचा सत्कार सोहळा शाहीर दादाजी भोयर फाउंडेशनच्या वतीने उद्या ता. 29 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजता भिसी येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमानंतर अनिरुद्ध वनकर लिखित, खेमराज भोयर दिग्दर्शित लोकजागृती वडसा निर्मित "दोन घास सुखाचे' या नाटकाचा प्रयोग सादर होईल.
या वेळी मान्यवरांच्या हस्ते कादर शेख, अहमद शेख, अनिरुद्ध वनकर, कुणाल गजभारे, नयना सोनवणे, खेमराज भोयर यांचा सत्कार होईल.
भिसी येथील आदर्श जनता विद्यालयाच्या रंगमंचावर होणाऱ्या या नाटकात अनिरुद्ध वनकर, फिल्म आशियाना व डॉ. प्रकाश आमटे चित्रपटातील कुणाल गजभारे, नयना सोनवणे, महेंद्र गोंडाणे, खेमराज भोयर, मा. संजीव, मंगेश मेश्राम, क्राईम पेट्रोलमधील कुणाल कपूर, ज्योती खुणे, कु. दीपाली, सौ. भारती (नागपूर), बालकलावंत शेषराज जिभकाटे, अंजली गोंडाणे यांचा समावेश आहेत, अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक यशवंत भोयर यांनी दिली.

Thursday, November 27, 2014

गोळी लागून जखमी

गोळी लागून जखमी

हिंगणा: राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ)च्या फायरिंग रेंज मैदानावर सराव करणाऱ्या तुकडीतून एका बंदूकीतून गोळी लागल्याने मुकेश शेषराम शेंडे (वय 25)  जखमी झाला.  सुदैवाने गोळी शरिरातून गेली नाही. ती दाताजवळच थांबल्याने किरकोळ दुखापत झाली. त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून लता मंगेशकर रुग्णालयात हलविण्यात आले.

प्रकल्प अहवालास वस्त्रोद्योग विभागाची मंजूरी

प्रकल्प अहवालास वस्त्रोद्योग विभागाची मंजूरी

आदिशक्ती मुक्ताई सहकारी सुत गिरणी,च्या सुधारीत

प्रकल्प अहवालास वस्त्रोद्योग विभागाची मंजूरी


- एकनाथराव खडसे, मंत्री महसुल



मुंबई, दि.२७ :- आदिशक्ती मुक्ताई सहकारी सुतगिरणी ही आठव्या पंचवार्षिक योजना काळातील सहकारी सुत गिरणी असून या सुतगिरणीची आठव्या पंचवार्षिक योजनेच्या काळात अर्थसहाय्यासाठी निवड करण्यात आलेली आहे.
शासनाने दिनांक 30/6/2011 च्या शासन निर्णयान्वये राज्यातील सहकारी सुत गिरण्याच्या सुधारीत प्रकल्प अहवालाची किंमत रुपये 6174.24 कोटी इतकी निश्चित केलेली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ, मुंबई यांचेकडून 25,200 चात्यांचा सुधारीत प्रकल्प अहवाल तयार करुन शासनाच्या मंजूरीस सादर केलेला होता. संचालक, वस्त्रोद्योग, म.रा. यांनी सुधारीत प्रकल्प अहवाल दिनांक 15/2/2014 व दिनांक 31/7/2014 अन्वये सुकाणु समितीच्या मंजूरीसाठी शासनाकडे सादर केला.
25 वर्षांनी ग्रामीणला मिळाले "लॅब्राडोर'

25 वर्षांनी ग्रामीणला मिळाले "लॅब्राडोर'

नवे श्‍वानपथक : रॅम्बो, ब्रुनो, सिझर, मायकेल, जॅक्‍शन करणार गुन्ह्यांचा तपास

नागपूर, : ग्रामीण पोलिस मुख्यालयात श्‍वानपथक कार्यरत नव्हते. त्यामुळे श्‍वानपथकाचे कामकाज नागपूर रेल्वे पोलिस दलाच्या मार्फतीने करण्यात येत होते. आता ही उसनवारी बंद होणार आहे. तब्बल 25 वर्षांनी नागपूर ग्रामीणला रॅम्बो, ब्रुनो, सिझर, मायकेल, जॅक्‍शन हे नवे श्‍वान दाखल झाले आहेत.
वननिरिक्षक नोकरी सोडण्याच्या मार्गावर

वननिरिक्षक नोकरी सोडण्याच्या मार्गावर

आठ महिन्यांपासून वेतनच नाही : ताडोबातील 24 कर्मचाऱ्यांवर उपासमारी

देवनाथ गंडाटे : सकाळ वृत्तसेवा
नागपूर, ता. 26 : वाघांच्या शिकारीला प्रतिबंध आणि त्यांच्या संरक्षणासाठी व्याघ्र प्रकल्पात असलेल्या गावांतील तरुणांना घेऊन व्याघ्र संरक्षण दल स्थापन करण्यात आले. मात्र, सेवेलाआठ महिने उलटूनही या वननिरीक्षकांना (फॉरेस्ट वॉचर्स) एकही वेतन देण्यात आलेला नाही. त्यामुळे हे सर्व वननिरिक्षक नोकरी सोडण्याच्या मार्गावर आहेत.
वाघांच्या वाढत्या शिकारींनी प्रतिबंध घालण्यासोबत त्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. या प्राधिकरणाने गतवर्षी महाराष्ट्र शासनासोबत सामंजस्य करार केला. या करारांतर्गत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पांत व्याघ्र संरक्षण दल स्थापन करण्यात आले. वाघांच्या संरक्षणाच्या दृष्टीने काही पदांची निर्मितीही करण्यात आली. व्याघ्र प्रकल्पातील तीन वनक्षेत्रपालांच्या तुकडीप्रमाणे 24 वन निरिक्षकांची पदे भरण्यात आली. यात सहा महिलांचाही समावेश आहे.
व्याघ्र संरक्षण दलामध्ये वन निरीक्षकांचे काम जोखमीच असते. त्यामुळे जंगल, वन्यजीवांचा अनुभव असणाऱ्यांनाच प्राधान्य देण्यात आले. व्याघ्र प्रकल्पामुळे विस्थापित झालेले तसेच कोअर व बफर क्षेत्रात राहणाऱ्यांना जंगलाचा चांगला अभ्यास असल्याने स्थानिक तरुणांना सेवेत रूजू करून घेण्यात आले होते. हे सर्व वन निरिक्षक 10 मार्च 2014 रोजी सेवेत रुजू झाले. गरिबीमुळे उसनवारी करून वनप्रशिक्षण घेतले. बेरोजगारीमुळे हतबल झालेल्या या आदिवासी तरुणांना नोकरीमुळे नवी आशा मिळाली होती. मात्र, पहिल्या महिन्यापासूनच वेतनाचा पत्ता नाही. आता आठ महिने होऊनही एकही मासिक वेतन मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आहे. या थकीत वेतनासाठी कर्मचाऱ्यांनी ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यालयात वारंवार चकरा मारल्या. निवेदन, विनंती अर्ज दिले. मात्र, अधिकाऱ्यांनी तांत्रिक कारणे सांगून त्यांना आठ महिन्यांपर्यंत विनावेतन ठेवले आहे. त्यामुळे नोकरी सोडण्याचा निर्धार हे वननिरिक्षक करू लागले आहेत.


   वननिरिक्षक पदाचे सर्व कर्मचारी नवीन आहेत. वेतनासाठी त्यांच्या नावाची नोंद बजेट ड्युटीबशन सिस्टममध्ये करण्यात आली आहे. सर्व आठ महिन्यापासूनचे थकीत वेतन शुक्रवारपर्यंत देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
- श्री. घुरे, सहायक वनसंरक्षक
मंत्रीमंडळ विस्तारात तेली समाजाला प्रतिनिधीत्व

मंत्रीमंडळ विस्तारात तेली समाजाला प्रतिनिधीत्व

बावनकुळे, खोपडेंच्या नावाची चर्चा



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा २९ किंवा ३० नोव्हेंबरला विस्तार होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात आहे. या विस्तारात ५ कॅबिनेट आणि १५ राज्यमंत्री शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे़ सरकारमध्ये मित्र पक्षांनाही स्थान दिले जाणार आहे.
विशेष म्हणजे नागपूरचे कृष्णा खोपडे, कामठीचे आमदार चंद्रशेखर बावणकुळे, यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. हे दोन्ही आमदार तेली समाजाचे  प्रतिनिधीत्व करतात हे विशेष.
१० वर्षीय बालकास पळविले

१० वर्षीय बालकास पळविले

नागपूर  कळमणा हद्यीत प्लाॅट नं. 113, भगत नगर, भरतवाडा रोड, नागपूर येथे राहणारे फिर्यादी नंदलाल डोलीचंद बिसेन वय 36 वर्ष यांचा मुलगा विशाल नंदलाल बिसेन वय 10 वर्ष यास कोणीतरी अज्ञात आरोपी इसमाने फुस लावून पळवून नेले. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून व मा. सर्वोच्च न्यायालयाचे निर्दशानुसार पोस्टे कळमणा येथे सपोनि ठाकरे यांनी आरोपीविरूध्द कलम 363 भादंवि अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

Tuesday, November 25, 2014

कोयला प्लाॅटोपर कोयले मे भारी मीलावट

कोयला प्लाॅटोपर कोयले मे भारी मीलावट

घुग्घुस : घुग्घुस और चंद्रपुर परीसर के क्षेत्र मे कोयले मे भारी मीलावट करके क्षेत्र को प्रायवेट एवं सरकारी कंपनीयो को बेचा जाने का प्रमाण मील रहा है। इस वजह से परीसर की कंपनीयो को भारी नुकसान हो रहा है।

Sunday, November 23, 2014

महिला अत्याचार विरोधात  सोमवारी  कँडल मार्च

महिला अत्याचार विरोधात सोमवारी कँडल मार्च

जिल्ह्यात  १० महिन्यात बलात्कार ७९, विनयभंग १६८, छेडछाड ६० 


चंद्रपूर - जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महिलांवरील होत असलेल्या अत्याचारा विरोधात तसेच याबाबत प्रस्थापित सरकार व स्थानिय पोलिस प्रशासनाला सद्बुध्दी मिळण्याबाबत दि. २४ नोव्हें. ला चंद्रपूर विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने स्थानिय गांधी चौक ते जटपुरा गेट पर्यंत सायं. ७ वा. कँडल मार्च काढण्यात येत असल्याची माहिती आज आयोजित पत्रपरिषदेत युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आली. 
मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर ३० नोव्हें.ला  ठिया आंदोलन

मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर ३० नोव्हें.ला ठिया आंदोलन

शेतकरी संघटनेचे आंदोलन

चंद्रपूर - केंद्र व राज्य सरकारने सत्तेत येण्यापूर्वी भाजपाने कापूस, धान व सोयाबिन याला योग्य भाव तसेच कर्जमुक्ती व वीज बिल मुक्तीची भूमिका मांडली होती. परंतु प्रत्यक्षात केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर यावर आतापर्यंत कोणतीही कारवाई झाली नसल्याने ३० नोव्हें. २०१४ ला नागपूर येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे घरासमोर सदर मागणीच्या पुर्ततेसाठी दु. १२ वाजेपासून ठिया आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे माजी आम. अ‍ॅड. वामनराव चटप, रवि गोखरे, रमेश नळे, कपिल इद्दे आदींनी दिली.
अमृतकरच्या अध्यक्ष पदाला स्थगिती

अमृतकरच्या अध्यक्ष पदाला स्थगिती

चंद्रपूर -  अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा शोभा ओझ यांनी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा कमलताई व्यवहारे यांना चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाला स्थगितीचे आदेश दिले. गेल्या काही  दिवसापूर्वी माजी महापौर संगीता अमृतकर यांची अध्यक्ष पदी निवड झाली होती 
त्याकरीता नविन महिला जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा वनमाला राठोड व महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या सचिव सिमा भुरे यांनी निरीक्षक म्हणून सोमवार दि.२४ नोव्हेंबर २०१४ रोजी दुपारी २.०० वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे येणार आहे. तरी चंद्रपूर जिल्हा महिला काँगे्रस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ता लव महिला काँग्रेस प्रेमी यांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आव्हान सुनिता वि. लोढीया यांनी केले आहे.

Saturday, November 22, 2014

साहेबांच्या आदेशानंतरही मनसेचा फलकराज

साहेबांच्या आदेशानंतरही मनसेचा फलकराज

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी वाढदिवसाचे फलक लावु नका अन्यथा  तर पक्षातून हकालपट्टी करू , असा दम भरला. मात्र, यां आदेशाचे  मनसे कार्यकर्त्यांनी पालन केलेले नाहीं। साहेबांच्या आदेशानंतरही मनसे चा फलकराज चंद्रपुरात सुरु आहे 
महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षांना वाढदिवसाच्या शुभेच्छाचे फलक शहरात दिवसभर  होते. साहेबांचा आदेश दूरचित्रवाणी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला. काहींनी आदेश येताच शुभेच्छा फलक हटविलेसुद्धा. मात्र, गायकवाड यांना आपले शुभेच्छा फलक लागेल, याची कल्पना नसावी. त्यामुळे दिवसभर शहरातील मुख्य चौकांत त्यांना शुभेच्छा देणारे फलक लागले होते. पक्षांतर्गत विरोधकांनी वरिष्ठांकडे या शुभेच्छा फलकांचे छायाचित्र सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचते केले. 
पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड आहेत. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून त्या पक्षातर्फे रिंगणात उतरल्या होत्या. गायकवाड यांना केवळ दोन हजारांच्या आसपास मते मिळाली. त्यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या समर्थकांनी शहरात त्यांना शुभेच्छा देणारे फलक लावले आहेत. दरम्यान, आज राज ठाकरे यांनी पुणे येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना यापुढे चमकोगिरी बंद करण्याचा आदेश दिला. विशेषत: चौकाचौकांत लावल्या जाणाऱ्या पक्षाच्या नेत्यांच्या शुभेच्छा फलकांवर त्यांचा विशेष आक्षेप होता. 
डॉ. प्रकाश आमटेंना "चंद्रपूरभूषण'

डॉ. प्रकाश आमटेंना "चंद्रपूरभूषण'

चंद्रपूर, लोकाग्रणी ऍड. बळवंतराव राघव उपाख्य बाबासाहेब देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा "चंद्रपूरभूषण पुरस्कार' यंदा पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांना जाहीर झाला आहे. 30 नोव्हेंबरला आयोजित कार्यक्रमात तो प्रदान केला जाणार आहे. चंद्रपूरभूषण पुरस्काराचे हे बारावे वर्षे आहे. या पुरस्कारात शाल, श्रीफळ, मानपत्र, सन्मानचिन्ह व रोख 11 हजार रुपयांचा समावेश आहे.

Wednesday, November 19, 2014

मौद्यात भूखंड घोटाळा

मौद्यात भूखंड घोटाळा

शेकडो बांधकाम अर्ज प्रलंबित : अधिकाऱ्यांकडून कारवाईऐवजी खतपाणी


मौदा, ता. 14 : तालुक्‍यातील संपूर्ण भाग मेट्रो रिजनमध्ये समाविष्ट झाल्यानंतर अवैध व्यवहारांना आळा बसण्याऐवजी ते वाढताना दिसत आहेत. नागपूर सुधार प्रन्यासचा जवळपास 16 लाख रुपये प्रतिएकरी विकासशुल्क भरणे शक्‍य नसल्याने अवैध भूखंड विक्रीला उधाण आले आहे. यावर अनेक तक्रारी आल्यानंतरही अधिकाऱ्यांनी कारवाईऐवजी खतपाणी घालण्याचे काम सुरू केले आहे. अनाधिकृत भूखंडांना आळा घालण्यात न आल्याने बांधकाम मंजुरीच्या अनेक अर्जांचा गठ्ठा मौदा नगरपंचायतीमध्ये पडलेले आहेत.
मैफलीत बसलेल्या बगळ्यांचा विहिरीत घसरला तोल

मैफलीत बसलेल्या बगळ्यांचा विहिरीत घसरला तोल

एक शेत... शेतात ओलितासाठी विहीर... विहिरीच्या तोंडावर बांबूची काठी... काठीवर बगळ्यांची मैफल बसलेली... खेळण्यात रमलेली... पंख फडफडणं... हळूच उडणं - हळूच बसणं... सारं काही ऑल इज वेल... आणि तेवढ्यात एका बेसावध क्षणी... दांड्याच्या काठावरून घसरले... पन्नास-साठाच्या गर्दीने काहींना तोल सावरेना. उडता न येण्याने खोल साठ फूट विहिरीत पडले. ही घटना आहे हरदोली (नाईक) येथील शिवारातल्या शेतातील.
नागपूर जिल्ह्यातील वेलतूर निवासी लालाजी साठवणे, आकाश साठवणे व गोपाल साठवणे यांच्या शेतात सध्या ओलिताची कामे सुरू आहेत. मिरचीला पाणी व गव्हाच्या शेताला पेरणीपूर्वी भिजवून मशागत करण्याकडे शेतकऱ्यांचा जोर आहे. यादरम्यान शेतात मोठ्या प्रमाणात बगळ्यांची गर्दी होत असते. बगळे ओलिताच्या शेतात आपले अन्न शोधत फिरत असतात. अशा एका क्षणी विहिरीच्या तोंडावर ठेवलेल्या दांडीवर मैफल सजवून बसलेल्या बगळ्यांचा अपघात घडला आणि ते विहिरीत पडले. काही बगळे कसेतरी बाहेर निघाले. पण, एक-दोन नव्हे, तर सोळा बगळे तिथेच अडकले. त्या सोळा बगळ्यांना काही केल्या खोल विहिरीतून बाहेर पडता आले नव्हते.
आनंदवन दौरा

आनंदवन दौरा

ग्राहक कल्याण सल्लागार समितीच्या अध्यक्ष  21 नोव्हेंबर रोजी आनंदवनात 

चंद्रपूर दि.19- महाराष्ट्र राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष .सुर्यकांत गवळी हे 21 व 22 नोव्हेंबर 2014 रोजी चंद्रपूर जिल्हयाच्या दौ-यावर येत असून बाबा आमटे आश्रम आनंदवन वरोरा येथे भेट देणार आहे.
21 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय येथे चंद्रपूर जिल्हयातील सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांसमवेत बैठक. त्यानंतर दुपारी 1 वा.पत्रकार परिषद असून त्यांचा दुपारी 1.30 ते 2.30 वाजेपर्यंतची वेळ राखीव राहील. दुपारी 2.30 ते 3.30 पर्यंत बैठकीसाठी निमंत्रीत अधिकारी व ग्राहक चळवळीत काम करणा-या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधीसमवेत बैठक घेतील. त्यानंतर दुपारी 3.30 ते 4.30 पर्यंत जिल्हा ग्राहक मंचाची प्रत्यक्ष पाहणी, मंचाच्या अडीअडचणी व त्यावर उपाययोजना या संबंधी चर्चा करणार आहेत. त्यानंतर दुपारी 4.30 ते 5.30 पर्यत राखीव असून सांय.5.30 वा.बाबा आमटे आश्रम वरोराकडे प्रयाण कतील आणि वरोरा शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम राहील.
22 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 ते सायं.5.30 वाजेपर्यंत बाबा आमटे आश्रम आनंदवन वरोरा येथे भेट असून सांयकाळी 6 वाजता वरोरा येथून नागपूरकडे प्रयाण करतील.

Tuesday, November 18, 2014

राज्य कर्जमुक्त करण्यासाठी शासन बांधील :  सुधीर मुनगंटीवार

राज्य कर्जमुक्त करण्यासाठी शासन बांधील : सुधीर मुनगंटीवार


मुंबई दि. 18: राज्य कर्जमुक्त करण्यासाठी शासन बांधील असून विक्रीकर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महसूल वाढीसाठी अधिक जोमाने प्रयत्न करावेत, असे आवाहन वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

काल वित्तमंत्र्यांनी विक्रीकर विभागाला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी श्री. मुनगंटीवार यांचा विक्रीकर विभागातील अधिकारी व कर्मचारी संघटनांच्यावतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, विक्रीकर आयुक्त डॉ. नितीन करीर, विशेष विक्रीकर आयुक्त चंद्रशेखर ओक, मुख्य दक्षता अधिकारी विनय कारागावकर यांच्यासह विक्रीकर राजपत्रित अधिकारी संघटनेचे डॉ. अरूण बिराजदार, डॉ. महेश चंदूरकर, विक्रीकर कर्मचारी संघटनेचे मिलिंद सरदेशमुख, सुबोध किर्लोस्कर, गट ड कर्मचारी संघटनेचे पोपट कांबळे, मुकुंद पवार यांच्याासह विक्रीकर विभागातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विक्रीकर विभागाने सन 2013-14 या आर्थिक वर्षातील 70 हजार कोटी रुपयांच्या महसूल संकलनाचा लक्ष्यांक पूर्ण केल्याबद्दल विभागाचे अभिनंदन करून श्री. मुनगंटीवार म्हणाले की, विभागाने 2014-15 साठीचा 80 हजार कोटी रुपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट तर पूर्ण करावेच पण राज्याच्या आर्थिक सक्षमतेसाठी एक लाख कोटीचा टप्पा पूर्ण करावा. राज्याचा आर्थिक स्वातंत्र्याचा लढा आपण सर्वजण मिळून निर्धाराने यशस्वी करू असे सांगतांना वित्तमंत्र्यांनी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यासाठी मार्गदर्शनही केले.

कल्याणकारी राज्याच्या उभारणीमध्ये शासनाचे हात मजबूत करणारा हा विभाग असल्याचे सांगतांना त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रास्त व न्याय्य मागण्यांसदर्भात संघटनांबरोबर चर्चा करण्यात येईल व त्यांचे प्रश्न सकारात्मकदृष्टया सोडवले जातील असे त्यांनी सांगितले.

विक्रीकर विभागातील रिक्त पदे आणि पदोन्नत्यासंबंधीचे निर्णय डिसेंबर अखेरपर्यंत घेण्यात येतील, असे अपरमुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांनी यावेळी सांगितले.

राज्याच्या महसूल वाढीसाठी विक्रीकर विभागातील रिक्त पदे व पदोन्नत्यासंबंधीचे निर्णय लवकर घेण्यात यावेत असे प्रतिपादन करतांना विक्रीकर आयुक्त डॉ. नितीन करीर यांनी गेल्या दोन वर्षात प्रतिकूल परिस्थिती असतांनाही कामाचा निपटारा वेगाने करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव केला.
19 नोव्हेंबर रोजी  हौशी मराठी नाटय स्पर्धेची सुरुवात

19 नोव्हेंबर रोजी हौशी मराठी नाटय स्पर्धेची सुरुवात

चंद्रपूर दि.18- महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाच्यातर्फे आयोजित 54 व्या हौशी मराठी नाटय स्पर्धेचे आयोजन प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे करण्यात आले आहे. या नाटय स्पर्धेचे उदघाटन 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील व जेष्ठ कलावंत, लेखक श्रीपाद जोशी उपस्थित राहणार आहे. या सोहळयानिमित्त लोकमान्य टिळक कन्या विद्यालयाच्या 100 विद्यार्थींनी उपस्थित राहून रंगभूमिच्या वाढीसाठी मी रंगकर्मी अशि प्रतिज्ञा उपस्थित रंगकर्मी व प्रेक्षकांना यांना देण्यात येणार आहे. 19 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर पर्यंत चालणा-या या नाटय महोत्सवास चंद्रपूरातील नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन स्पर्धेचे समन्वयक सुशिल सहारे यांनी केले आहे.
सुस्तावलेली जिल्हा परिषद रविवारीही कामात

सुस्तावलेली जिल्हा परिषद रविवारीही कामात

जिल्हा परिषदेतील सुस्तावलेले वातावरण अलिकडे अचानकपणे बदललेले जाणवत आहे. कधी नव्हते ते तत्परता आता अधिकार्‍यांमध्ये दिसून यायला लागली आहे. जिल्हा परिषदेत जावे तेव्हा अधिकारी आपल्या टेबलवर काम करताना दिसत आहेत. एवढेच नाही तर, केवळ मार्च एंडिगच्या काळात रविवी सुरू राहणारी जिल्हा परिषद अलिकडे रविवारीही सुरू दिसत आहे. अधिकारी आपली पेंडिंग कामे रविवारी उरकून घेताना दिसत आहे. नेमका हा प्रभाव कशाचा असा प्रश्न अनेकांना पडला आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलिल यांची ततत्परता सर्वांना ज्ञात आहेत. त्यांनी अलिकडे सर्वांनचे कम टोचल्याने आणि दोन मंत्र्यांचीही भर जिल्ह्यात पडल्याने ही तत्परता असावी, असा कयास आहे.


जिल्हा परिषदेमध्ये अनेक अधिकार्‍यांकडे विविध विभागांचा कार्यभार देण्यात आला आहे. त्यामुळे अधिकारी सध्या त्रस्त आहे. पशुसंवर्धन विभागाचे डॉ. देशपांडे यांच्याकडे सामान्य प्रशासनचा कार्यभार आहे. डीआरडीचे अंकुश केदार यांच्याकडे अतिरिक्त मुख्य कार्यपालनचा कार्यभार आहे. प्राथमिक शिक्षण विभागाचे रविकांत देशपांडे यांच्याकडे माध्यमिकचा कार्यभार आहे. समाजकल्याणचे वाकुलकर यांच्याकडेही अतिरिक्त भार आहे. यांच्यासह अन्य अधिकार्‍यांवरही पदभार आहे. ज्यामुळे विविध कामावर याचा परिणाम पडत आहे.

Sunday, November 16, 2014

स्वच्छतेची सुरवात घरापासून करा- .हंसराज अहिर

स्वच्छतेची सुरवात घरापासून करा- .हंसराज अहिर

चंद्रपूर दि.16- स्वच्छ भारत अभियान स्वयंस्फूर्तपणे राबवून स्वच्छतेची सुरुवात प्रत्येकाने आपल्या घरापासून करावी असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री ना.हंसराज अहिर यांनी केले. झरपट नदी स्वच्छ करणे व स्वच्छ भारत विशेष अभियानातंर्गत आज झरपट नदी येथे जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेच्या वतीने मोहिम राबविण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. 

ना.हंसराज अहिर यांनी झरपट नदीमधील गाळ व गवत काढून झरपट नदी स्वच्छ करण्याच्या महानगरपालिकेच्या योजनेस सुरुवात केली. त्यानंतर नदीचा परिसर झाडूने स्वच्छ करण्यात आला. स्वच्छतेचा थेट संबंध आरोग्याशी असल्यामुळे चंद्रपूरकर नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छतेसह परिसर स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले. पर्यावरण संवर्धनासाठी प्लॉस्टिकचा वापर टाळावा असा सल्ला देतांना प्लॉस्टीकमुळे नाल्या तुबंतात व सर्वत्र घाण होते. ही बाब नागरिकांनी लक्षात घ्यावी व प्लॉस्टीकमुक्त चंद्रपूर ही संकल्पना राबविण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
हिरवा बांबू मोफत पुरवा

हिरवा बांबू मोफत पुरवा

बांबु कारागीरांची पुर्व विदर्भाची पहीली बांबू परीषद

चंद्रपूर- श्रमिक एल्गारचे वतीने पुर्व विदर्भातील बांबू कारागीरांच्या प्रश्नावर बांबु परीषद चंद्रपूर येथे घेण्यात आली. ‘विदर्भातील लोकांनी जंगल राखला असतांनाही त्यांचेकडुनच टॅक्स घेण्याचा अधिकार कोणी दिला असा सवाल परीषदेचे अध्यक्ष अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी करून बांबू मोफत मिळविण्यासाठी संघर्ष करण्याचे आवाहन केले.

Friday, November 14, 2014

त्रिमुर्ती इस्पात कंपनीत स्फोट : सात कामगार जखमी

त्रिमुर्ती इस्पात कंपनीत स्फोट : सात कामगार जखमी

कळमेश्‍वर,: येथील औद्योगिक वसाहतीतील त्रीमूर्ती इस्पात कंपनीत मध्यरात्री 12च्या सुमारास फर्निशमध्ये स्क्रप लोखंड टाकताच मोठा स्फोट झाला. गरम लोखंडाचा लाव्हा रस कामगारांवर उडाल्याने सात कामगार जखमी झाले. यातील दोन कामगार गंभीर असून, त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले.
त्रिमूर्ती इस्पात कंपनीत 14 ते 15 कामगार काम करतात. केवळ एकाच पाळीमध्ये रात्री सहा ते 10 पर्यंत स्क्रॅप लोखंडापासून अँगल गॉर्ड बनविण्याचे काम चालते. रात्री 12 च्या सुमारास फर्निशमध्ये स्क्रॅप लोखंड टाकताच भयंकर मोठा स्फोट झाला. त्यात लोखंडी लाव्हा रस कामगारांच्या अंगावर उडाला. त्यामुळे इथे उपस्थित कामगार भाजले. यातील दोघाजणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी तातडीने भरती करण्यात आले. यात सुशील श्रीधर उपाध्याय (वय 35), कमलाकर शालिक झाडे (वय 35), सूरज विनायक उईके (वय 20) रा. तांदूळवाणी, भादू पांडू भलावी (वय 35, रा. सिंदेवाही, ता. काटोल), ज्ञानेश्‍वर सोनबा गोरले (वय 30 रा. वरोडा), महिंद्र गिरीधर शर्मा (वय 30, ब्राह्मणी), सुखदेव उईके (वय 35), यांचा समावेश आहे.

Wednesday, November 12, 2014

 'आपले सरकार' नावाची वेबसाईट आणि अॅप बनवण्याची घोषणा

'आपले सरकार' नावाची वेबसाईट आणि अॅप बनवण्याची घोषणा

 'आपले सरकार' नावाची वेबसाईट आणि अॅप बनवण्याची घोषणा करीत राज्यपाल  सी. विद्यासागर राव यांनी मराठीतून नव्या सरकारला शुभेच्छा देत  आपल्या भाषणाची सांगता केली.
  • ते म्हणाले, मराहाष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमाभागातील जनतेच्या प्रश्नांकडे विशेष लक्ष देणार, २५० आणि ५०० लोकसंख्या असलेल्या खेड्यांना पंतप्रधान ग्राम सडक योजना लागू करु 
  • २०१५ साली होणा-या कुंभ मेळ्याकरता २२ खाती सज्ज असून योग्य तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल - व्याघ्र प्रकल्पाकडे आणि जंगल पर्यटनाकडे आम्ही विशेष लक्ष देऊ -
  •  ई- टेंडरींग अनिवार्यकरण्यावर आमचा भर असेल -  
  • मच्छीमारांच्या विकासासाठी नव्या जेट्टी व हार्बर निर्माण करणार - 
  • उद्योगांसाठी असलेल्या जाचक अटी रद्द करण्यास आमचे सरकार प्रयत्नशील राहिल  
  •  सिंचनाचे रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यास विशेष तरतूद केली जाणार - 
  •  शिवाजी महाराजांचा अरबी समुद्रातील पुतळा आणि इंदू मिल मध्ये डॉ. आंबेडकरांचे स्मारक बांधणार 
  •  पोलिसांना चांगली निवासस्थाने आणि त्यांच्यामुलांच्या शिक्षणा करता सुविधा 
  • दलित हत्याकांडांतील तपासासाठी विशेष पोलीस पथक 
जिल्हाधिका-यांकडून सामान्य रुग्णालयाची पाहणी

जिल्हाधिका-यांकडून सामान्य रुग्णालयाची पाहणी


चंद्रपूर दि.12- जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे आज जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर यांनी भेट देवून पाहणी केली. रुग्णालयाची स्वच्छता, रुग्णसेवा व नवीन इमारत याविषयीची पाहणी करुन रुग्णांशी संवाद साधला.
जिल्हाधिका-यांनी महिला वार्ड, शिशु वार्ड, सामान्य वार्ड, बर्न वार्ड, नेत्र विभाग, स्वयंपाक गृह, भांडार गृह, सिटी स्कॅन, आयसीयू व नवीन इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली. रुग्णालयाकरीता नवीन सिटी स्कॅन मशीन तसेच एक्सरे मशीनची मागणी करावी अशा सूचना जिल्हा शल्य चिकित्सकांना दिल्या. रुग्णालयातील लिफ्ट त्वरीत कार्यान्वित करावी व स्वच्छतेविषयी विशेष काळजी घ्यावी असे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद सभापतींना खातेवाटप

जिल्हा परिषद सभापतींना खातेवाटप

चंद्रपूर : जिल्हा परिषद सभापतींना खातेवाटप तसेच समिती सदस्यांची निवड दीर्घ कालावधीनंतर सोमवारी पार पडली.
सभापतींच्या खातेवाटपामध्ये देवराव भोंगळे यांना बांधकाम, तसेच शिक्षण खाते मिळाले आहे. ईश्वर मेश्राम यांना आरोग्य खाते देण्यात आले आहे. उपाध्यक्ष कल्पना बोरकर कृषी सभापतिपद देण्यात आले आहे. तर नीलकंठ कोरांगे यांना समाजकल्याणचा भार देण्यात आला आहे. सविता कुडे यांना महिला बालकल्याण खाते मिळाले आहे.
समिती सदस्यांची अविरोध निवड करण्यात आली. माजी पदाधिकाऱ्यांपैकी संदीप गड्डमवार यांची जलव्यवस्थाप समिती सदस्य, संतोष कुमरे यांची अर्थ समिती, गुणवंतराव कारेकर शिक्षण समिती, अमृता सूर यांची बांधकाम समिती सदस्यपदी निवड करण्यात आली.
पीक बंदोबस्तासाठी वाघाची विष्ठा

पीक बंदोबस्तासाठी वाघाची विष्ठा

नागपूर   : डुकरांच्या हैदोसापासून आपले पीक व शेत वाचविण्यासाठी व त्याच्या बंदोबस्तासाठी वेलतूर व परिसरातील शेतकरी सध्या वाघाची विष्ठा मिळविण्याच्या प्रयत्न सुरू केला आहे. या विष्टेसाठी शेतकरी जंगल पालथे घालत असल्याची विश्‍वसनीय माहिती आहे.
जंगलातल्या वाघाची विष्ठा आणायची. शेताच्या चारही बाजूला शिवरात ठिकठिकाणी थोडी थोडी टाकायची आणि डुकरांच्या हैदोसापासून मुक्त व्हायचे. हा उपाय केल्यास डुकरे कित्येक दिवस नव्हे, तर महिनोमहिने शेताकडे फिरकत नाहीत, असा अजब सल्ला कुणीतरी शेतकऱ्यांना दिला. तेव्हापासून शेतकऱ्यांनी वाघाच्या विष्ठेचा शोध सुरू केला आहे.
जंगली डुकरांच्या बंदोबस्तासाठी परिसरातील बहुतेक शेतकरी दरवर्षी जिवाचे रान करत असतो. दिवस-रात्र जागल करतात. फटाके फोडणे, धूर करणे, आग लावणे, नाही ते आवाज करणे, विषारी पदार्थ मांडून त्याची फवारणी करणे, कुंपण घालणे, कुंपणातून वीजप्रवाह सोडण्यासारखे जिवघेणे व अमानवीय प्रयोगही केले जातात. परंतु, डुकरे नुकसान करतातच. मात्र, यावर्षी शेत बचावासाठी शेतकऱ्यांनी वेगळाच प्रयोग सुरू केला आहे. परिसर जंगलव्याप्त असून, जंगलात जंगली प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. वाघाचेही वास्तव्य असल्याने जंगलात जाणाऱ्या शेतकऱ्यांना धोका होऊ शकतो.
अल्पसंख्याक दर्जा प्राप्त संस्थांच्या ऑनलाईन माहिती प्रणालीचे उदघाटन

अल्पसंख्याक दर्जा प्राप्त संस्थांच्या ऑनलाईन माहिती प्रणालीचे उदघाटन

अल्पसंख्याक संस्थांची प्रवेशप्रक्रिया होणार अधिक पारदर्शक

मुंबई, दि. 11 : राज्यातील भाषिक व धार्मिक अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शैक्षणिक संस्थांची प्रवेशप्रक्रिया आणि कारभार आता अधिक पारदर्शक होणार असून यासाठी mddtrust.mahaonline.gov.in या अद्ययावत वेबपोर्टलचा आज मंत्रालयात राज्याचे महसूल तथा अल्पसंख्याक विकास विभागाचे मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त मंत्रालयात आज श्री. खडसे यांच्या दालनात हा कार्यक्रम झाला.

Sunday, November 09, 2014

केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर

केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर

  • हंसराज  अहिर
  • जन्म ११ नोव्हेंबर, १९५४
  • नांदेड, महाराष्ट्र
  • कार्यकाळ
  • इ.स. २००४ – इ.स. २००९
  • मतदारसंघ  - चंद्रपूर
  • राजकीय पक्ष - भारतीय जनता पक्ष
  • पत्नी - लता हंसराज अहिर
  • अपत्ये - २ मुलगे
  • निवास - चंद्रपूर, महाराष्ट्र

  • कोण आहेत …

Saturday, November 08, 2014

नवी उमेद

नवी उमेद

वादळ, अतिवृष्टी, गारपीट निसर्गातील सर्व संकटे झेलत आयुष्य जगणा-या शेतक-याच्या बैल गाडीची चाके मात्र थांबत नाहीत. पुन्हा नवी उमेद घेऊन शेताकडे निघालेली गाडी । छायाचित्र देवानंद साखरकर, चंद्रपूर  

Friday, November 07, 2014

Thursday, November 06, 2014

महाराष्ट्रातही दारूबंदी लागू करावी

महाराष्ट्रातही दारूबंदी लागू करावी

केरळ आणि गुजरातच्या धर्तीवर संपूर्ण महाराष्ट्र व्यसनमुक्त करण्यासाठी महाराष्ट्रातही दारूबंदी लागू करावी, अशी मागणी पर्यावरण व निसर्ग संस्थेच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आली. संस्थेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिले.

दारूच्या आहारी गेल्यामुळे अनेक परिवार उद्ध्वस्थ झाले. याबाबत सविस्तर भूमिका मांडण्यासाठी आपण चर्चेलाही तयार असल्याचे संस्थेने मुख्यमंत्र्यांना कळविले. शिष्टमंडळात सचिव मधुकर सुरवाडे, राजेश सोनटक्के, जितेन वासनिक, विजय मेश्राम, के. टी. तिवाडे, डी. यू. इंदूरकर, प्रदीप हजारे, मनोज फुलपाटील, संजय मानकर आदींचा समावेश होता.
पेट्रोलिंगसाठी दोन गॅंगमन पाठविणार

पेट्रोलिंगसाठी दोन गॅंगमन पाठविणार

रेल रोकोच्या आंदोलनाची घेतली दखल

वरोरा
 - मध्य रेल्वेच्या वरोरा विभागात नाइट पेट्रोलिंगसाठी एक गॅंगमन पाठविणार असल्याचे सांगताच नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने रेल रोको आंदोलनाचा इशारा दिला. याची दखल घेत रेल्वे प्रशासनाने दोन गॅंगमन पाठविण्याचा निर्णय घेतला. 

Wednesday, November 05, 2014

14 ते 19 नोव्हेंबर स्वच्छ भारत विशेष अभियान

14 ते 19 नोव्हेंबर स्वच्छ भारत विशेष अभियान

जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर

चंद्रपूर दि.05- केंद्र व राज्य सरकारने स्वच्छ भारत अभियान प्राधान्याने राबविण्याचा निर्णय घेतला असून त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्हयात 14 ते 19 नोव्हेंबर दरम्यान स्वच्छ भारत विशेष अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिली. ते विविध विभागाच्या खाते प्रमुखांच्या बैठकीत बोलत होते. अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे, उपजिल्हाधिकारी दामोधर नान्हे, पंकज चौबळ व विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.
वनरक्षक भरती प्र्रक्रीया रद्द करा - बंडु धोतरे

वनरक्षक भरती प्र्रक्रीया रद्द करा - बंडु धोतरे

वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचेकडे मागणी - 
वनरक्षक पदाकरिता 12 विज्ञान गणीतसह उत्तीर्ण अटीचा विरोध


चंद्रपूरः चंद्रपूर सह इतरही जिल्हयात वनविभागातील वनरक्षक पदाकरिता भरती प्रकीया सुरू आहे. वनरक्षक पदाकरिता शैक्षणीक पात्रता 12 विज्ञान गणीत विषयासह उत्तीर्ण होण्याची अट घातली गेली आहे. ही शैक्षणीक अट मागे घेण्यात यावी व सुरू असलेली भरती प्रक्रीया रद्द करण्याची मागणी इको-प्रो चे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी राज्याचे वनमंत्री मा. सुधीर मुनगंटीवार यांचेकडे निवेदनातुन केली आहे.
एक महिन्यात दारूबंदी- सुधीर मुनगंटीवार

एक महिन्यात दारूबंदी- सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर-  जिल्ह्यात दारुबंदीचा निर्णय इथल्या महिलांनी घेतला आहे. 816 ग्रामपंचायतींपैकी 600 ग्रामपंचायतींनी दारुबंदीचा ठराव घेतला आहे. त्यामुळं दारुबंदी करण्याला माझं प्राधान्य राहिल, एक महिन्यात दारूबंदी झालेली दिसेल असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

महाराष्ट्र टोलमुक्त करू, अशी निवडणुकीपूर्वी घोषणा करणाऱ्या भाजपनं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता भूमिका बदलल्याचा आरोप ेकॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केला. या प्रश्‍नावर पत्रकारांनी छेडले असता, मुनगंटीवारांनी केवळ कंत्राटदारांच्या हितासाठी राज्यात ठिकठिकाणी टोल उभारण्यात आले आहेत. यात सर्वसामान्य जनतेची आर्थिक लूट होत आहे. जे टोल कंत्राटदारांच्या भल्यासाठी उभारलेत, ते निश्‍चितपणे बंद केले जातील, असे प्रत्युत्तर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

Tuesday, November 04, 2014

दक्षिण आफ्रिकेमध्ये रक्षा खडसे यांचे भाषण

दक्षिण आफ्रिकेमध्ये रक्षा खडसे यांचे भाषण

मंबाथो दि. 4 : राष्ट्रकुल युवा संसद सदस्यांच्या अधिवेशनामध्येरावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी "भारतीयलोकशाही आणि सुशासन" या विषयावर आपले विचार मांडले.
याअधिवेशनाची सुरुवात काल दि. 2 नोव्हेंबर, 2014 रोजी दक्षिण आफ्रिकेच्यावायव्य प्रांताच्या "मंबाथो" येथील विधिमंडळ सभागृहात झाली. यावेळीवायव्य प्रांताच्या विधिमंडळाच्या अध्यक्षा सुसाना रिबेका तसेच विविधराष्ट्रकुल देशांच्या संसद तसेच विधिमंडळातून आलेले युवा संसद तसेचविधिमंडळ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार रक्षा खडसे यांनी"भारतीय लोकशाही व सुशासन" या विषयावर आपले विचार मांडतानाजगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशातील संसद सदस्य तसेच विधिमंडळसदस्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्यासदस्यांची निवड प्रक्रिया यावर सविस्तर विवेचन केले. भारतीय राज्यघटनेप्रमाणे भारतासारख्या मोठ्या व खंडप्राय देशामध्ये सुशासनराहण्यासाठी राजकीय व्यवस्था, कार्यकारी व प्रशासकीय व्यवस्था,न्यायपालिका व प्रसिध्दी माध्यमांची भूमिका कशी महत्वाची आहे, याबाबतविस्तृतपणे माहिती दिली. केंद्र आणि राज्य यांच्यामधील संबंध तसेचकायदा करण्याची प्रक्रिया याबाबत उपस्थितांना संबोधित केले. भारतामध्येपंचायती राज व्यवस्थेतील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणिग्रामपंचायत या त्रिस्तरीय रचनेमधील राजकीय पक्षांची व प्रशासनाचीभूमिकेचे महत्व विशद केले. भारतातील राजकीय व प्रशासकीयव्यवस्थेमध्ये सुशासन आणण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्यासुधारणांबाबतही आपले मत व्यक्त केले.
rakshatai.jpg प्रदर्शित करत आहे

Tuesday, October 28, 2014

फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

भारतीय जनता पार्टी (भाजपा) चे विद्यमान प्रदेश अध्यक्ष 
देवेंद्र गंगाधरराव फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री …………. 

 विद्वत्ता आणि लोकप्रियतेचा मिलाप साधणारे एक दुर्मिळ राजकीय व्यक्तिमत्त्व.
नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी व्यवसाय व्यवस्थापनात स्नातकोत्तर पदवी व डी. एस. ई., बर्लिन येथून प्रकल्प व्यवस्थापनाच्या पद्धती व तंत्र या विषयात पदविका मिळविली. नव्वदीच्या दशकात राजकारणात प्रवेश केल्यानंतर अल्पावधीतच त्यांनी मोठा जनाधार प्राप्त केला.
देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या जनतेचे प्रतिनिधित्त्व करत असतानाच पक्षांतर्गत विविध स्तरांवर नेतृत्त्व केले. नागपूर महानगरपालिकेतून ते सलग दोनदा (१९९२ व १९९७) निवडून आले. नागपूरचे महापौर पद त्यांनी भूषविलेले असून भारतातील आजवरचे दुसरे सर्वात तरुण महापौर अशी त्यांची ख्याती आहे. महापौर पदी पुन्हा निवडून येऊन महाराष्ट्रातून ‘मेअर इन काऊन्सिल’ चा मान मिळविणारे ते पहिलेच.
१९९९ पासून सलग तीन वेळा ते विधानसभेवर निवडून आले आहेत. १३ वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून जनतेचे प्रतिनिधित्त्व करीत असताना विविध समित्यांवर काम केले आहे. त्यामध्ये अंदाज समिती, नगर विकास व गृहनिर्माणावरील स्थायी समिती, नियम समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासंदर्भात नेमलेली समिती यांचा समावेश आहे.
देवेंद्र फडणवीस हे अनुभवी लोकप्रतिनिधी असून राजकीय बुद्धिचातुर्य व कौशल्य यासाठी त्यांना विविध व्यासपिठांनी गौरविलेले आहे. त्यांच्या कार्य-कर्तृत्त्वाची दखल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली गेलेली असून राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने दिला जाणारा ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तसेच जागतिक संसदीय फोरमच्या सचिव पदी ते कार्यरत आहेत.
आर्थिक धोरणांसह विविध विषयांचा व्यासंग व विश्लेषण यासाठी देवेंद्र फडणवीस यांची ख्याती आहे. केंद्रीय अर्थसंकल्पावरील त्यांच्या विश्लेषणाची दरवर्षी आतुरतेने वाट पाहिली जाते. आर्थिक विषमता दूर करण्यासंदर्भातील त्यांचे विचार व त्यांच्या कल्पनांचे तज्ञांनीही कौतुक केलेले आहे. इंधन / ऊर्जा सुरक्षितता व वातावरणातील बदल अशा विषयांवर बोलण्यासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय परिसंवादामध्ये निमंत्रित केले गेले आहे.

विचारसरणी

देवेंद्र फडणवीस यांचा ‘बोले तैसा चाले’ या विचारावर ठाम विश्वास आहे. हाती घेतलेले काम ते तडीस नेतातच आणि ते काम अधिकाधिक चांगल्या रितीने करतात. मदत मागणारा कोणीही असो, दिवसरात्र कोणतीही वेळ असो किंवा आव्हान कितीही कठीण असो, जनतेची सेवा करताना देवेंद्र फडणवीस जराही बिचकत नाहीत. नागपूर विद्यापीठातून त्यांनी विशेष गुणवत्तेसह कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी पदवीनंतर व्यवस्थापनशास्त्राची पदवी मिळविली. त्यांनी डीएसई बर्लिन या जर्मनीतील संस्थेमध्ये डिप्लोमा इन मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट हा डिप्लोमा मिळविला. उच्च शिक्षण असले तरी सदैव जनसामान्यांशी संपर्क ठेवून उत्साहाने लोकाभिमुख कामे करण्याचे त्यांचे वैशिष्ट्य आहे. हाती घेतलेले काम तडीस नेईपर्यंत अथवा समस्या सुटेपर्यंत त्यांना स्वस्थ बसवत नाही. त्यांचे नेतृत्व हे नैतिकतेच्या भक्कम पायावर उभे असलेले पारदर्शी नेतृत्व आहे.

लोकप्रतिनिधित्व

  • १९९९ ते आतापर्यंत – सलग तीनवेळा महाराष्ट्र विधानसभा सद्स्य
  • १९९२ ते २००१ – सलग दोन टर्म नागपूर महापालिकेचे सदस्य, दोनवेळा नागपूरचे महापौर, मेयर इन कॉन्सिल पदावर फेरनिवड, असा सन्मान मिळणारे राज्यातील एकमेव

राजकीय टप्पे

  • २०१३ – प्रदेश अध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश
  • २०१० – सरचिटणीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेश
  • २००१ – राष्ट्रीय उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा
  • १९९४ – प्रदेश उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा
  • १९९२ – अध्यक्ष, नागपूर शहर भारतीय जनता युवा मोर्चा
  • १९९० – पदाधिकारी, नागपूर शहर पश्चिम
  • १९८९ – वॉर्ड अध्यक्ष, भाजयुमो

विधिमंडळातील कार्य

  • अंदाज समिती
  • नियम समिती
  • सार्वजनिक उपक्रम समिती
  • महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
  • नगरविकास व गृहनिर्माणाविषयी स्थायी समिती
  • राखीव निधीविषयी संयुक्त निवड समिती
  • स्वयंनिधीवर आधारित शाळांबद्दलची संयुक्त निवड समिती

सामाजिक योगदान

  • सचिव, ग्लोबल पार्लमेंटेरिअन्स फोरम ऑन हॅबिटाट फॉर एशिया रिजन
  • नागरी पायाभूत सुविधांसाठीचा वित्तपुरवठा आणि राजकीय व्यवस्थापनाच्या मुद्द्यांबाबत रिसोर्स पर्सन
  • संयुक्त राष्ट्रांची मान्यता मिळालेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, मुंबई या संस्थेच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य
  • नाशिक येथील सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी (भोसला मिलिटरी स्कूल) चे उपाध्यक्ष
  • नागपूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य

आंतरराष्ट्रीय ठसा

  • होनोलुलू, अमेरिका येथे इंटरनॅशनल एनव्हायरमेंट समिटमध्ये सहभाग आणि सादरीकरण, १९९९
  • अमेरिकेतील वॉशिंग्टन व नॅशविले येथे यू. एस. नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट लेजिस्लेचर्स, २००५
  • स्वित्झर्लंडमध्ये दावोस येथे आयडीआरसी – युनेस्को – डब्ल्यूसीडीआर यांनी आयोजित केलेल्या ‘डिझास्टर मिटिगेशन अँड मॅनेजमेंट इन इंडिया’ या विषयावरील आंतराष्ट्रीय शिखर परिषदेत सादरीकरण, २००६
  • चीनमध्ये बीजिंग येथे डब्ल्यूएमओ – ईएसएसपी यांनी आयोजित केलेल्या ग्लोबल एनव्हायरमेंटल चेंज काँग्रेसमध्ये ‘नॅचरल डिझास्टर्स मिटिगेशन – इश्युज ऑन इकॉलिजिकल अँड सोशल रिस्क’ या विषयी सादरीकरण
  • डेन्मार्कमध्ये कोपेनहेगेन येथे आशिया व युरोपमधील तरूण राजकीय नेत्यांच्या आसेम परिषदेत भारताचे प्रतिनिधीत्व, २००७
  • अमेरिकेच्या संघराज्य शासनाच्या ईस्ट – वेस्ट सेंटरतर्फे आयोजित न्यू जनरेशन सेमिनारमध्ये ‘एनर्जी सिक्युरिटी इश्युज’ या विषयावर शोधनिबंध सादर, २००८
  • ऑस्ट्रेलिया, न्यूझिलँड आणि सिंगापूरला गेलेल्या कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोशिएशनच्या उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळाचे सदस्य, २००८
  • रशियात मॉस्को येथे भेट देणार्‍या इंडो रशिया चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाचे सदस्य, २०१०
  • युरोपमध्ये क्रोएशिया येथे ‘ग्लोबल पार्लमेंटरियन फोरम ऑन हॅबिटाट’मध्ये सहभाग, २०११
  • मलेशियामध्ये ‘जीपीएच एशिया रिजनल मीट’मध्ये सहभाग, २०१२
  • केनियातील नैरोबी येथे ‘युनायटेड नेशन्स हॅबिटाट’ने निमंत्रित केलेल्या शिष्टमंडळाचे सदस्य, २०१२

पुरस्कार

  • कॉमनवेल्थ पार्लमेंटेरियन असोसिएशनतर्फे वर्ष २००२ – २००३ साठीचा सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार
  • राष्ट्रीय आंतर विद्यापीठ वादविवाद स्पर्धेत सर्वोत्कृष्ट वक्ता पुरस्कार
  • रोटरीचा मोस्ट चॅलेंजिंग यूथ विभागीय पुरस्कार
  • मुक्तछंद, पुणे या संस्थेतर्फे स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार
  • नाशिक येथील पूर्णवाद परिवारतर्फे राजयोगी नेता पुरस्कार

युवा नेतृत्व

भारत हा तरुणांचा देश आहे. देशातील सुमारे ५४ टक्के लोकसंख्या पंचवीसपेक्षा कमी वयाची आहे तर ३५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण ७२ टक्के आहे. आपल्याला लोकशाही अर्थपूर्ण बनवायची असेल तर अधिकाधिक युवकांनी सक्रीय होण्याची आणि निर्णयाच्या आणि बदलाच्या प्रक्रियेत भाग घेण्याची गरज आहे. देशातील युवकांना वाटते की त्यांच्या आकांक्षांनुसार आणि स्वप्नांनुसार देशाने झटपट विकास करावा व प्रगत बनावे. तसे घडण्यासाठी हा मुद्दा समजून युवकांच्या आकांक्षांशी एकरूप होणार्‍या नेतृत्वाची गरज आहे.

वकील

विशेष गुणवत्तेसह कायद्याची पदवी मिळविणार्‍या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कायद्याची असामान्य समज आहे व आपले हे ज्ञान नैतिक मार्गाने समाजात बदल घडविण्यासाठी वापरण्याची त्यांची क्षमता आहे. न्याय या मूल्याला ते सर्वाधिक महत्त्व देतात. तंत्रज्ञान व अर्थकारण याची आवड असलेला वकील असल्याने त्यांना या क्षमतेचा धोरणे ठरविताना व राबविताना खूप उपयोग होतो. संख्याशास्त्र व आकडेवारीचीही त्यांना समज आहे. या सर्वांमुळे ते कोणत्याही घटनेत भक्कम कायदेशीर, आर्थिक, तांत्रिक व मुख्य म्हणजे लोकहिताच्या दृष्टीकोनातून काम करतात.

लेखक आणि कवी

देवेंद्र फडणवीस यांच्या व्यक्तिमत्वाची एक हळुवार व संवेदनशील बाजूही आहे. जनतेबरोबर व्यवहार करताना त्यांचा हा पैलू दिसून येतो. सामान्य माणसाच्या वेदना आणि चिंता त्यांना समजतात व ते जनतेची गार्‍हाणी आस्थेवाईकपणे ऐकून घेतात. सर्वसामान्य माणसाच्या भूमिकेत शिरून त्याच्या नजरेतून विचार करणे त्यांना जमते. सर्वसामान्य माणसाच्या मनाचा ठाव घेऊन त्याच्या वेदना समजून घेत त्याच्या समस्येवर तोडगा काढणे हे त्यांचे कौशल्य आहे. अशा रितीने समस्येवर तोडगा काढला की, समोरच्या माणसाच्या चेहर्‍यावर हसू फुलते. अर्थकारणाचा रुक्ष विषय असो किंवा कविता असो ठिकठिकाणच्या त्यांच्या लेखनात त्यांची संवेदनशीलता प्रतिबिंबित होते. केंद्रीय अर्थसंकल्पाचे त्यांनी केलेले विश्लेषण ऐकण्याची दरवर्षी लोकांना उत्सुकता असते. ‘हाऊ टू अंडरस्टँड अँड रीड द स्टेट बजेट’ या अर्थसंकल्पावरील त्यांच्या पुस्तकाची राजकीय पंडित, अर्थविषयक पत्रकार आणि विद्यार्थ्यांकडून प्रशंसा झाली आहे.

वक्ता, वादविवादपटू, वैचारिक नेता

आर्थिक विषय, आपत्ती व्यवस्थापन किंवा कायदेशीर बाबी अशा कोणत्याही विषयावर बौद्धिक विश्लेषण आणि वैचारिक नेतृत्वाचे दर्शन घडविणार्‍या मांडणीबद्दल देवेंद्र फडणवीस यांची ख्याती आहे. गरीब आणि श्रीमंतांमधील आर्थिक दरी कशी भरून काढावी याबद्दलचे त्यांचे विचार आणि कल्पनांना जाणकारांकडून दाद मिळाली आहे. नोकरशाहीचे थर आणि वैयक्तिक लाभाच्या पलिकडे जाऊन सामान्य माणसाच्या गरजांना महत्त्व देण्यासाठी धाडसी निर्णय घेण्याचे श्रेय त्यांना आहे.
जेंव्हा देवेंद्र फडणवीस बोलतात त्यावेळी जग त्याची दखल घेते. राजकीय वर्तुळातील एक आघाडीचे वक्ते म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांची भाषणे मुद्देसूद व अर्थपूर्ण असतात आणि कोणताही आडपडदा न ठेवता ते बोलतात. त्यांना आकडेवारी तोंडपाठ असते. त्यांच्या भाषणांना सखोल संशोधनाचा आधार असतो आणि ते भाषणात कायद्याचा आणि आकडेवारीचा आधार देतात. केवळ बोलघेवडेपणा न करता कृतीवर भर देणारा आणि कधीकधी आधी काम करून मगच त्याबद्दल बोलणारा नेता त्यांच्या भाषणातून जनतेला, राजकीय सहकार्‍यांना आणि जगाला जाणवतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर भरगच्च सभागृहालाही त्यांनी सहजतेने संबोधित केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळातील भाषणे म्हणजे वादविवाद कौशल्य आणि अर्थपूर्ण मांडणीचा उत्तम नमुना असतो. संसदीय कामकाज आणि वादविवाद कौशल्य याबद्दल तरुण विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांच्या भाषणांचा उपयोग केला जातो.

शैक्षणिक पात्रता:

  • त्यांनी डी.एस.ई बर्लिन या जर्मनीतील संस्थेमध्ये डिप्लोमा इन मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट हा डिप्लोमा मिळविला. ‘
  • एल.एल.बी (नागपूर विद्यापीठ)
  • बोस प्राईझ इन हिंदू लॉ’ विजेता  

वैयक्तिक माहिती

  • वय :४३
  • पत्नी: श्रीमती अमृता फडणवीस
  • सुपुत्री : कु. दिविजा फडणवीस
  • कार्यालय/निवास्थान : २७६,राव साहेब फडणवीस पार्क, धरमपेठ, नागपूर -४४००१०

Sunday, October 26, 2014

गायीचा मृत्यू ...कोळशाची वाहतूक ठप्प

गायीचा मृत्यू ...कोळशाची वाहतूक ठप्प

मुंगोली खाण परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत मुंगोली येथील मारुती ठाकरे यांच्या गायीचा मृत्यू झाला. नुकसानभरपाईसाठी संतप्त मुंगोलीवासींनी तब्बल सहा तास मुंगोली-घुग्घुस मार्ग रोखून धरला. या चक्‍काजाम आंदोलनामुळे कोळशाची वाहतूक ठप्प होती.
जादूटोण्याच्या संशयावरून हत्या

जादूटोण्याच्या संशयावरून हत्या

जादूटोण्याच्या संशयावरून चंद्रपूर जिह्ल्यातील सिंदेवाही तालुक्‍यातील सावरगाटा येथे राजेंद्र नारायण ठाकरे ची हत्या करण्यात आली.सावरगाटा येथील राजेंद्र नारायण ठाकरे हा जादूटोणा करीत असल्याचा काही गावकऱ्यांना संशय होता. याच संशयावरून गावातील वासुदेव बापुची मुळे, होमराज वासुदेव मुळे, ईश्‍वर वासुदेव मुळे व रमेश धानुजी सहारे यांनी राजेंद्रला लाठीकाठीने बेदम मारहाण केली.
चंद्रपूर महापौरपदासाठी ३० ला निवडणूक

चंद्रपूर महापौरपदासाठी ३० ला निवडणूक

चंद्रपूर -३० ऑक्‍टोबरला होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. या पदासाठी कॉंग्रेसकडून राखी कंचर्लावार, सुनीता अग्रवाल, सुनीता लोढिया, तर भाजपच्या अंजली घोटेकर, राष्ट्रवादीच्या संगीता त्रिवेदी व विद्यमान महापौर संगीता अमृतकर प्रयत्नशील आहेत. सध्या राज्यात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. विद्यमान महापौर व उपमहापौरांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ ३० ऑक्‍टोबरला पूर्ण होत आहे. महापालिकेच्या ३३ प्रभागांसाठी ६६ नगरसेवक आहेत. कॉंग्रेस आघाडी व मित्रपक्षांचे ३८, भाजप १८, राष्ट्रवादी ४, शिवसेना ५ व मनसे १, असे नगरसेवकांचे संख्याबळ आहे.

Wednesday, October 22, 2014

मेयो अस्पताल चौक पर युवक की हत्या

मेयो अस्पताल चौक पर युवक की हत्या

नागपुर। मेयो अस्पताल चौक में एक युवक की अज्ञात आरोपी ने गला
चीरकर हत्या कर दी। मृतक का नाम आरिफ बताया गया है। गणेशपेठ के
थानेदार सुधीर नंदनवार ने बताया कि मृतक आरिफ का पूरा नाम नहीं मिल
पाया है। वह आस-पास की दुकानों में काम कर अपना उदर निर्वाह कर रहा
था। संभवत: वह मध्यप्रदेश का निवासी होगा। घटना बुधवार की शाम हुई।
सूत्रों के अनुसार बुधवार की शाम करीब 6.45 बजे पुलिस नियंत्रण कक्ष
को किसी ने सूचना दी कि मेयो अस्पताल चौक पर सड़क किनारे एक युवक
खून से लथपथ पड़ा है। कुछ समय बाद गणेशपेठ के थानेदार सुधीर नंदनवार
सहयोगियों के साथ घटनास्थल पर पहुंचे। पुलिस के पहुंचने से पहले वहां
भीड़ जुट गई थी। पुलिस को मृतक का पूरा नाम नहीं मिल पाया, योंकि वह
यहां की दुकानों में काम करके रात फुटपाथ पर सोकर गुजर बसर करता था।
किसी ने बताया कि उसका नाम आरिफ है। वह कुछ समय पहले नागपुर
आया। नागपुर आने के बाद वह मेयो अस्पताल चौक के पास एक शराब की
दुकान में कुछ समय तक काम किया। उसे इसी दुकान से शराब पीने की
आदत लग गई। उसके बाद उसकी कुछ शराबियों से दोस्ती हो गई। आरिफ
पहले जिस शराब की दुकान में काम करता था। उसी दुकान में जाकर गला
तर करने लगा। सूत्रों की मानें तो शराब की दुकान से नौकरी छोडऩे के बाद
आरिफ ने होटल, दवा की दुकानों में भी काम किया। वह शराब का सेवन
अधिक करने लगा, जिससे उसकी नौकरी छूट गई। इस गम में वह शराब
पीने के लिए नए दोस्त तलाशता था। उसकी इस नए दोस्त की तलाश ने
उससे उसकी जिंदगी छीन ली।
तीन अपक्ष आमदार  भेटले

तीन अपक्ष आमदार भेटले

  • नागपुरात नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांना भेटले तीन अपक्ष आमदार.
  •  
  • नागपुरात ग्रामीण पोलिसांनी घितला "सिंघम रिटर्न' हा हिंदी चित्रपट  
  •  
  • कन्हान येथे दोन गटात जिवे मारण्याचा प्रयत्न : दोन्ही गटातील आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल
18 वर्षीय युवतीवर  सामूहिक अत्याचार

18 वर्षीय युवतीवर सामूहिक अत्याचार

धानोरा तालुक्‍यातील निमगाव येथील एका 18 वर्षीय युवतीवर चौघांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. निमगाव येथील युवती 3 ऑक्‍टोबरला गावाबाहेर शौचास गेली असता चार जणांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला.
फटाक्यांची दुकाने लागली

फटाक्यांची दुकाने लागली

चंद्रपूर : चंद्रपुरात आझाद बाग, जटपुरा गेट परिसर, गोलबाजार तसेच प्रत्येक वॉर्डातील चौकाचौकात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची दुकाने लागली आहेत. मात्र यातील अनेक दुकानांमध्ये अपघात झाल्यास कोणतेही सुरक्षा साधन नाही. एवढेच नाही तर, अनेकांकडे फटाके विक्रीचा परवाना नसतानाही ते राजरोसपणे फटाके विक्री करीत आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्वत: दक्ष राहून स्वत:ची सुरक्षा स्वत: करणे गरजेचे आहे.

फडणवीस / मुनगंटीवार मुख्यमंत्री?

फडणवीस / मुनगंटीवार मुख्यमंत्री?

भारतीय जनता पार्टीला मुख्यमंत्रिपदासाठी  भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवारया दोन नावांपैकी एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

२७, २८ ऑक्टोबरला भाजपाची विधिमंडळ पक्षनेता निवडीची बैठक होण्याची शक्यता आहे. पक्षाचे महाराष्ट्रातील केंद्रीय निरिक्षक असणारे ओम माथूर यांनी सप्ष्ट केले की सरकार स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडे पुरेसे संख्याबळ आहे आणि ती प्रक्रिया दिवाळी नंतरच सुरु केली जाईल.  विधिमंडळ पक्षनेता निवडीच्या प्रक्रियेच्या दिवशीच मुख्यमंत्र्याच्या शपथविधीची शक्यता असून, ५ ते ७ नोव्हेंबर रोजी मंत्रिमंडळाची स्थापना केली जाण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.

वाघाला रेडिओ कॉलर

वाघाला रेडिओ कॉलर

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोर झोनमधील नर व मादीला कॉलर लावल्यानंतर यश आले. वाघाला रेडिओ कॉलर लावण्यासाठी वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे तज्ज्ञ अभ्यासक डॉ. हबीब बिलाल, डॉ. पराग निगम, क्षेत्र संचालक डॉ. जी. पी. गरड, ताडोबा कोरचे कळसकर, मधुरा निलांजन आणि अनिल हे तज्ज्ञ प्रयत्न करीत होते.
नवख्यांसमोर आश्‍वासनपूर्तीचे आव्हान

नवख्यांसमोर आश्‍वासनपूर्तीचे आव्हान


वृत्तविश्‍लेषण
देवनाथ गंडाटे : सकाळ वृत्तसेवा


लोकसभेत जी भाजपची लाट होती, ती विधानसभेत येणार नाही, असे राजकीय जाणकारांसह ग्रामस्थदेखील बोलून दाखवित होते. मात्र, साऱ्यांचे गणित चुकवून ग्रामीण जिल्ह्यात यंदा नवे राजकीय समीकरण तयार झाले. जुण्याजाणत्या उमेदवारांना धूळ चारून नवख्यांनी दिवाळीपूर्वीचे राजकीय कुस्ती जिंकली. पहिल्यांदाच विधानसभेची पायरी चढणाऱ्या या नवख्या आमदारांसमोर आता आश्‍वासनपूर्तीचे आव्हान आहे.
हिंगणा विधानसभेत भाजपचे विजय घोडमारे यांची तिकीट कापून समीर मेघे यांना उमेदवारी देण्यात आली. माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचा राजकीय वारसा समीर यांना लाभला आहे. मतदारसंघात दांडगा जनसंपर्क असलेले मुरब्बी नेते रमेशचंद्र बंग यांच्याशी थेट लढत देण्यात टिकतील काय, अशी भीती अनेकांना होती. मात्र, नवख्या समीर मेघेंनी 84 हजारांवर मते घेऊन भाजपसह मेघे घराण्याची ताकद दाखवून दिली.
काटोल मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल देशमुख हे चारदा आमदार झाले. सलग 20 वर्षे त्यांनी मंत्री म्हणूनही मंत्रिमंडळात काम केले. त्यानंतरही भाजपचे उमेदवार डॉ. आशीष देशमुख यांच्यासमोर पराभव पत्कारावा लागला. या मतदारसंघात आजवर राष्ट्रवादीशिवाय अन्य मोठा पक्ष नव्हता. येथे शिवसेनेचे वर्चस्व असतानाही भाजपला मिळालेली मते परिवर्तनाची नांदीच म्हणावी.
रामटेक मतदारसंघात शिवसेना किंवा कॉंग्रेसशिवाय दुसऱ्या पक्षाचा उमेदवार निवडून येऊच शकत नाही, हा भ्रम भाजपच्या डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या विजयाने मोडीत काढला. रामटेक म्हणजे शिवसेनेचा गड समजला जायचा. याच लोकसभा मतदारसंघातून सेनेच्या तिकिटावर सुबोध मोहिते निवडून आले होते. मात्र, हा गड आता भाजपच्या ताब्यात गेला आहे. रेड्डी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण जनतेच्या अडीअडचणी समजून समाजसेवा सुरू केली होती. त्याचे फळ यानिमित्ताने हाती पडले.
जिल्ह्यातील सावनेर, कामठी आणि उमरेड या तिन्ही मतदारसंघांत जुन्यांना संधी देण्यात आली. सावनेर वगळता जिल्ह्यातील सर्व पाचही मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आली आहेत. राज्यात सत्ता स्थापन होत असल्याने सर्व भाजप आमदारांच्या आशा बळावल्या आहेत, तर ग्रामस्थ नवख्यांकडून विकासाच्या आश्‍वासनपूर्तीच्या अपेक्षेत आहेत.

बावनकुळेंना लालदिव्याची शक्‍यता?
कामठी मतदारसंघातून विजयाची हॅटट्रीक करून तिसऱ्यांदा आमदार झालेले चंद्रशेखर बावनकुळे यांना लालदिवा मिळण्याची शक्‍यता आहे. गेल्या 25 वर्षांपासून राजकारणात असलेले बावनकुळे यांनी जिल्हा परिषद सदस्य ते आमदार असा प्रवास केला आहे. भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि आता प्रदेश सचिव पदावर कार्यरत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जवळचे ते असून, त्यांनी बांधकाम खात्याच्या मंत्रिपदासाठी इच्छा बोलून दाखविल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Sunday, October 19, 2014

उमेदवारांना मिळालेल्या मतांची आकडेवारी

उमेदवारांना मिळालेल्या मतांची आकडेवारी

राजूरा

.क्र. .क्र.
उमेदवाराचे संपूर्ण नाव
पक्ष
मिळालेली मते
1
प्रभाकर विठ्ठलराव दिवे
स्वतंत्र भारत पक्ष
16439
2
हेमंत वैरागडे
शिवसेना
5912
3
सुभाष रामचंद्रराव धोटे
भारॉका
63945
4
संजय यादवराव धोटे
भाजपा
66223
5
सटवा केरवा थोरात
अपक्ष
837
6
सुदर्शन भगवानराव निमकर
रॉका
29528
7
विद्यासागर कालीदास कासर्लावार
अपक्ष
798
8
अरुण वसंतराव वासलवार
अपक्ष
1254
9
प्रेमदास फकरुजी मेश्राम
अपक्ष
1113
10
शोभाताई गजानन मस्के
अखिल हिंन्द फारवर्ड ब्लॉक
670
11
भारत कवडू आत्राम
बहुजन समाज पार्टी
8049
12
मदन रघुजी बोरकर
अपक्ष
1565
13
सुधाकर नारायण किनाके
गोंडवाना गणतंत्र पार्टी
7601
14
सुधाकर ताराचंद राठोड
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
3618
15
उध्दव पिठुजी नारनवरे
आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया
1251
16
प्रविण मारोती निमगडे
राष्ट्रीय बहुजन काँग्रेस पार्टी
505
( श्री.संजय धोटे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी घोषित )


चंद्रपूर


.क्र. .क्र.
उमेदवाराचे संपूर्ण नाव
पक्ष
मिळालेली मते
1
प्रकाश शंकर रामटेके
बहुजन मुक्ती पार्टी
552
2
मिलींद दहिवले
अपक्ष
418
3
रविंद्रनाथ माधव पाटील
आंबेडराईट पार्टी ऑफ इंडिया
413
4
अनिरुध्द धोंडू वनकर
भारिप बहुजन महासंघ
14683
5
नलबोगा नलबोगा चिन्नाजी
अपक्ष
1698
6
प्रफुल गजानन खोब्रागडे
अपक्ष
437
7
सुनिता भगवान गायकवाड
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
1288
8
अंकलेश नथ्थुजी खैरे
बहुजन समाज पार्टी
8357
9
महेश मारोतराव मेंढे
इंडियन नॅशनलीस्ट काँग्रेस
25140
10
किशोर गजानराव जोरगेवार
शिवसेना
50711
11
नानाजी सिताराम शामकुळे
भारतीय जनता पार्टी
81483
12
अशोक नामदेवराव नागापूरे
रॉका
7459
13
प्रमोद मंगरुजी सोरते
रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया ए.
227
( श्री.नानाभाऊ शामकुळे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी घोषित )


बल्लारपूर


.क्र. .क्र.
उमेदवाराचे संपूर्ण नाव
पक्ष
मिळालेली मते
1
रमेशचंद्र दत्तात्रय दहिवडे
कम्युनिष्ट पार्टी ऑफ इंडिया मा.
1571
2
राजु नेताजी मादांडे
बहुजन मुक्ती पार्टी
973
3
सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार
भाजपा
103718
4
संजय निलकंठ गांवडे
अपक्ष
628
5
केशवराव बेनीराम कटरे
शिवेसना
2555
6
वासुदेव परशुराम पिंपरे
अपक्ष
788
7
घनशाम घुशीमल मुलचंदानी
भारॉका
60118
8
ॲड.सौ हर्षल कुमार चिंपळुणकर
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
1964
9
राजेश दुर्गासिंग सिंग
बहुजन समाज पार्टी
10344
10
मनोज धर्मा आत्राम
गोंडवाना गणपतंत्र पार्टी
6838
11
वामन दाऊजी झाडे
रॉका
1867
12
आनंद सिकंदर लाकडे
आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया
750
13
प्रज्योत देविदास नळे
अपक्ष
1089
14
सौ.वंदना अजय चव्हाण
रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया
452
15
संतोष मुका रामटेके
रिपब्लीकन पक्ष (खोरिपा)
563
( श्री.सुधीर मुनगंटीवार भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी घोषित )


ब्रम्हपूरी


.क्र. .क्र.
उमेदवाराचे संपूर्ण नाव
पक्ष
मिळालेली मते
1
प्रकाश बळवंतराव बन्सोड
भारिप बहुजन महासंघ
790
2
अतुल देविदास देशकर
भारतीय जनता पार्टी
56763
3
संदिप वामनराव गड्डमवार
रॉका
44878
4
जयप्रकाश नागो धोंगडे
अपक्ष
198
5
विजय नामदेवराव वडेट्टीवार
भारॉका
70373
6
प्रकाश मारोतराव लोणारे
अपक्ष
538
7
प्रदीप टिकाराम महाजन
अपक्ष
376
8
हरीदास लहानुजी लाडे
अपक्ष
1500
9
महेन्द्र लालाजी साखरे
बहुजन मुक्ती पार्टी
283
10
विश्वनाथ सित्रुजी श्रीरामे
अपक्ष
990
11
सुखदेव गणपत प्रधान
अपक्ष
433
12
गिरीष सुधाकरराव जोशी
अपक्ष
370
13
योगराज कृष्णाजी कुथे
बहुजन समाज पार्टी
7631
14
विनोद रामदास झोडगे
कम्युनिस्ट पार्टी इंडिया
2385
15
विश्वास रंगराव देशमुख
महाराष्ट नवनिर्माण सेना
756
16
देविदास नारायण बाणबले
शिवसेना
1377
( श्री.विजय वडेट्टीवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार विजयी घोषित )




  चिमूर


.क्र. .क्र.
उमेदवाराचे संपूर्ण नाव
पक्ष
मिळालेली मते
1
दिपक शिवराम कोसे
अपक्ष
790
2
हरीराम पांडूरंग दहिकर
अपक्ष
956
3
विलास नामदेवराव दोनोडे
अपक्ष
911
4
दयाराम उरकुडा मुन
अपक्ष
397
5
किर्तीकुमार नितेश भांगडिया
भाजपा
87377
6
अरविंद आत्माराम सांदेकर
मनसे
7177
7
कुरेशी महमद इकलाख महम्मद युसुफ
सोशालिष्ट पार्टी (इंडिया)
1340
8
देवराव काशिनाथ बनसोड
आंबेडकररिष्ट रिपब्लीकन
450
9
लहुजी राजेश्वर पाटील
अपक्ष
349
10
हेंमत भिमराव भैसारे
आरपीआय ए
455
11
जितेंद्र आडकुजी राऊत
अखिल भारतीय मानवता पक्ष
367
12
विजय हिरामन इंदूरकर
अपक्ष
365
13
रमेश तुळशिराम नान्ने
अपक्ष
355
14
प्रभाकर कृष्णाजी सातपैसे
अपक्ष
306
15
गोंविदराव बाबुराव भेंडारकर
रॉका
2738
16
दामोधर लक्ष्मण काळे
अपक्ष
511
17
भगवान विठुजी नन्नावरे
आंबेडकरराईट पार्टी आँफ इंडिया
1287
18
गजानन तुकाराम बुटके
शिवसेना
12105
19
दिनेश दौलतराव मेश्राम
अपक्ष
387
20
परशुराम वारलुजी नन्नावरे
अपक्ष
279
21
भगवान आत्माराम वरखडे
बहुजन मुक्ती पार्टी
417
22
रमेशकुमार बाबुरावजी गजभे
अपक्ष
762
23
नरेंद्र नामदेवराव राजुरकर
अपक्ष
297
24
देवराव माधोराव भुरे
अपक्ष
594
25
अविनाश मनोहर वारजुकर
भारॉका
62222
26
विनोद लक्ष्मण देठे
भारीप
423
27
नरेंद्रकुमार गुलाबराव दडमल
बहुजन समाज पार्टी
9841
28
दयाराम शिवराम कन्नाके
गोंडवाना गणतंत्र पार्टी
700
29
बाबुराव लक्ष्मण दांडेकर
अपक्ष
384
( श्री.किर्तीकुमार भांगडिया भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी घोषित )



वरोरा

.क्र. .क्र.
उमेदवाराचे संपूर्ण नाव
पक्ष
मिळालेली मते
1
शेख रजाक शेख रसीद
अपक्ष
334
2
रुपेशकुमार अर्जुन घागी
अपक्ष
1127
3
दिलीप नारायण दरेकर
बहुजन मुक्त पार्टी
1151
4
सुरेश नारायण धानोरकर
शिवसेना
53877
5
अजय हिरन्ना रेड्डी
कम्युनिष्ट पार्टी ऑफ इंडिया
1611
6
केशव रामदास लोणारे
आंबेडकररिष्ट रिपब्लीकन पार्टी
406
7
जयवंत मोरेश्वर टेमुर्डे
रॉका
4720
8
सिध्दार्थ सुमन वारके
रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया
681
9
कु.तारा महादेव काळे
अपक्ष
428
10
विलास नामदेव परचाके
गोंडवाना गणतंत्र पार्टी
2015
11
डॉ.आसावारी विजय देवतळे
भारॉका
31033
12
दिनेश शिवराव पढाल
अपक्ष
2214
13
सुनील निळकंठ खोब्रागडे
भारीप बहुजन महासंघ
1262
14
भुपेन्द्र वामन रायपूरे
बहुजन समाज पार्टी
18759
15
संजय वामनराव देवतळे
भाजपा
51873
16
प्रदीप शामराव देशमुख
अपक्ष
1252
17
डॉ.अनिल लक्ष्मण बुजोने
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
7981
18
दुर्गा प्रशांत भडगरे
अपक्ष
439
(श्री.सुरेश उर्फ बाळु धानोरकर शिवसेनेचे उमेदवार विजयी घोषित)