काव्यशिल्प Digital Media: नागपूर

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label नागपूर. Show all posts
Showing posts with label नागपूर. Show all posts

Saturday, February 09, 2019

नागपूर:बलात्कार प्रकरणात दोन आरोपींना अटक

नागपूर:बलात्कार प्रकरणात दोन आरोपींना अटक

वाडीतील मतिमंद युवतीवर बलात्कार प्रकरणातील आरोपींना अटक;सात दिवसाची पोलीस कोठडी
वाडी ( नागपूर ) /अरूण कराळे:

जवळच्या नात्याला काळिमा फासत पाहुणे म्हणून नातेवाईकाकडे आलेल्या दोन आरोपीनी मुलीच्या मतिमंदपणाचा फायदा घेत सतत शारीरिक संबंध प्रस्थापित करून बलात्कार केल्याची घटना वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आठवा मैल परिसरात घडली होती.

यातच मतिमंद मुलगी गर्भवती राहली,परंतु आपण याला दोषी नाहीत म्हणून फरार झालेले आरोपी रामूगोपाल बोई वय (२६)रा.गणेश नगर,सोलापूर रोड, उस्मानाबाद व व्यंकटेश कलराज पलस्पेटी वय(३२) यांना वाडी पोलिसांनी दोन पथक तयार करून वेगवेगळ्या ठिकाणावरून आठ दिवसात आरोपी रामू बोई ला उस्मानाबाद येथून तर व्यंकटेश ला करनुल, तेलगांना येथून अटक केली.

यांच्यावर कलम ३७६,२ एफ जे एल एन ३७६(ड),५०६(३४) व सामाजिक बहीष्कार कायदा कलम४,५ (२),६,७ या अंतर्गत कार्यवाही करुन आरोपीना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात  दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली.आरोपी व्यंकटेश हा चैन स्कॅनिंग प्रकरणातील आरोपी असल्याची माहिती पुढे आली आहे.

          उपरोक्त प्रकरणाची चौकशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल टाकसांडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत देशमुख,दिलीप आडे,गोपी राठोड,सूनील डगवाल,विजय पेंदाम,गिते यांनी यशस्विरित्या पार पाडली.
खनिज क्षेत्रातील उद्योगांच्या क्लस्टर उभारणीवर भर देणार

खनिज क्षेत्रातील उद्योगांच्या क्लस्टर उभारणीवर भर देणार

उद्योग मंत्री सुभाष देसाई
‘मिनकॉन कॉनक्लेव्ह’चे आयोजन
राज्यातील सर्व खाणपट्टयांचे डिजीटलायजेशन
खनिज क्षेत्रातील उद्योगांसाठीही वीजदरात सवलत

नागपूर, दि. 9 :  राज्यात खनिजउद्योग क्षेत्रात वाढीच्या विपुल संधी उपलब्ध आहेत. खनिज क्षेत्रातील उद्योगांच्या क्लस्टर उभारणीवर भर देण्यात येणार असून ज्या ठिकाणी खनिजसंपदा आढळते तेथेच त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग व मूल्यसंवर्धन उद्योग उभारण्यात येणार आहेत. यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळही भरीव सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.
उद्योग आणि खनिकर्म विभाग, ‘एमएसएमसी’, विदर्भ इकॉनामिक डेव्हलपमेंट कौन्सिल (वेद) यांच्या सहकार्याने हॉटेल सेंटर पॉईंट येथे दोन दिवसीय ‘मिनकॉन कॉनक्लेव्ह’चे आयोजन करण्यात आले. यावेळी  केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ ‘एमएसएमसी’चे अध्यक्ष आशिष जयस्वाल, खासदार कृपाल तुमाने, उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सतिश गवई, व्यवस्थापकीय संचालक एस. राममुर्ती, देवेंद्र पारेख, सुधीर पालिवाल तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. 
यावेळी ‘एमएसएमसी’ आणि खनिज क्षेत्रातील विविध उद्योग समुहांमध्ये सामंजस्य करार करण्यात आले. ‘महासँड’ आणि खनिज क्षेत्रातील उद्योग संधी यासंदर्भातील ध्वनीचित्रफितीचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 
उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले, वनसंपदा आणि खनिज संपदेच्या बाबतीत विदर्भ समृध्द प्रदेश आहे. खनिजउद्योग क्षेत्रात विपुल संधी उपलब्ध असून या परिषदेच्या आयोजनामुळे या क्षेत्रातील संधींसंदर्भात साकल्याने विचारमंथन होईल. खनिजपदार्थ उत्त्खननातून शासनाला महसूल प्राप्त होतो. महत्वाच्या खनिजातून मिळणाऱ्या महसूलात वाढ होण्याची आवश्यकता आहे. पर्यावरणपूरक आणि संवर्धक असे खनिज उद्योग वाढले पाहिजेत यावर भर देण्यात येत आहेत. वनसंपदेला धोका पोहचू न देता खनिज उत्त्खनन करण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. उद्योगांसाठी कोळसा उपलब्ध करुन देवून यावर आधारित उद्योग वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. उद्योगांना वीजदरात सवलत देण्यात आली असून खनिज क्षेत्रातील उद्योगांच्या क्लस्टरलाही वीजदरात सवलत देण्यात येणार आहे. रोजगार निर्मितीचे आव्हान पेलतांना खनिज क्षेत्रातील उद्योग यामध्ये महत्वाची भूमिका बजावू शकतील. खनिज क्षेत्रातील उद्योगांनाही भरीव सवलती उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. यासाठी या क्षेत्रातील उद्योगांनी सूचना द्याव्यात. त्यांचा नक्कीच सकारात्मतेने विचार करण्यात येईल. राज्यातील सर्व खाणपट्टयांचे डिजीटलायजेशन करण्यात आले असून महाराष्ट्र हे असे एकमेव राज्य असल्याचे श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले, गौण खनिज आणि मुख्य खनिजांपासून महसूल प्राप्त होतो. खनिज क्षेत्रातील उद्योगांसाठी विदर्भात मोठ्या संधी उपलब्ध आहेत. तसेच याद्वारे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीही शक्य आहे. वन आधारित आणि खनिज क्षेत्रातील उद्योगांसाठी विशेष धोरण व सवलती देण्यावर भर देण्यात येत आहे. सर्व भागांचा समतोल विकास साधण्याची आवश्यकता असून विदर्भात मॅगनिजवर आधारित उद्योग वाढीस मोठी संधी आहे. विदर्भातील बंद पडलेल्या कोळसा खाणी सुरु करुन तेथे कोळशापासून युरिया तसेच मिथेनॉल अशी इतर उत्पादने निर्मिती करण्याचे उद्योग उभारणीवर भर देण्याची आवश्यकता आहे. मिथेनॉलवर चालणाऱ्या ट्रक आणि बसेस आगामी काळात सुरु करण्यात येणार आहेत. विदर्भातील कोळशाला त्याच्या दर्जानुसार भाव मिळाला पाहिजे, असेही श्री. गडकरी यांनी सांगितले.
पर्यावरण संवर्धनासंदर्भात श्री. गडकरी म्हणाले, खनिज क्षेत्रातील उद्योगांच्या वाढीबरोबरच पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा विचारही करणे गरजेचे आहे. मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या वृक्षलागवडीमुळे राज्याच्या वनक्षेत्रात वाढ झाली आहे. नालाखोलीकरणाच्या कामातून निघणारी माती व मुरुम यांचा उपयोग रस्ते उभारणीसाठी करण्यात येत आहे. बायोडिझेलवर विमानांचे उड्डाण यशस्वी करण्यात येत आहे. बांबूपासून इंधन निर्मितीचे प्रयोगही यशस्वी होत आहेत. विदर्भ हे आगामी काळात जैवइंधनाचे ‘हब’ म्हणून विकसित होवू शकते. उद्योगांच्या विकेंद्रीकरणावर भर देण्यात येत असून यासाठी पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येत असल्याचेही श्री. गडकरी यांनी सांगितले. 
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, विदर्भातील खनिजक्षेत्रात उद्योग उभारणीची मोठी संधी असून विदर्भ खनिज समृध्द प्रदेश आहे. राज्यात विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत असून राज्यातील उद्योग क्षेत्रात वाढ होत असल्याचेच हे सकारात्मक चिन्ह आहे. सौरऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रातही क्रांतीकारक बदल होत आहे.  फ्लायॲश संदर्भात स्वतंत्र धोरण असून फ्लायॲश क्लस्टरची उभारणी नागपूर व चंद्रपूर येथे होत आहे. कोळसा उद्योगाला प्रोत्साहन देण्यात येत असून खनिज क्षेत्रातील उद्योगांसाठीही वीजदरात सवलत उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. खनिज क्षेत्रातील उद्योगांसाठी एक्सप्रेस फिडरद्वारे मुबलक वीज उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही श्री. बावनकुळे यांनी सांगितले.
‘एमएसएमसी’चे अध्यक्ष आशिष जयस्वाल म्हणाले, वने, पर्यटन आणि खनिजसंपदा ही विदर्भाची बलस्थाने असून खनिज क्षेत्रातील उद्योगांच्या वाढीसाठी जाणिवपूर्वक प्रयत्न कण्यात येत आहेत. या क्षेत्रातील उद्योगांना आता अधिक सुविधा व सवलती उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. खनिज क्षेत्रातील प्रक्रिया उद्योग व मुल्यवर्धीत उद्योग विदर्भातच निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. कोळशाचे उत्पादन विदर्भात मोठ्या प्रमाणात होते. या  क्षेत्रात आगामी काळात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढविण्यात येणार आहे. खनिजाच्या रॉयल्टीतून मिळणाऱ्या निधीतून काही भाग संबंधित जिल्हयाच्या विकासासाठी वापरण्याचे धोरण त्या जिल्हयांसाठी उपयुक्त ठरत असल्याचे श्री. जयस्वाल यांनी सांगितले.
अतिरिक्त मुख्य सचिव सतिश गवई म्हणाले, खनिज क्षेत्रातील उद्योग व्यवसायांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होत असून विदर्भाचे या क्षेत्रात मोठे योगदान आहे. अर्थव्यवस्थेला आणि उद्योगक्षेत्राला चालना देणे गरजेचे आहेच परंतु त्याबरोबरच पर्यावरणाप्रती आपली जबाबदारी असून खनिज उत्त्खननाबरोबरच पर्यावरणाचे जतन व संवर्धनाचा विचारही करणे गरजेचे आहे. खनिज क्षेत्रातील उद्योगांसाठी सकारात्मक पाऊले उचलण्यात येत असल्याचे श्री. गवई यांनी सांगितले.
देवेंद्र पारेख म्हणाले, आपला देश विविध खनिज संपत्तीचे विपुल भांडार असून या क्षेत्रातील उद्योगांमध्ये वाढीच्या आणि विकासाच्या संधी आहेत. या क्षेत्रातील उद्योगात आता प्रक्रिया उद्योग आणि मुल्यसंवर्धन उद्योगांची वाढ होणे गरजेच आहे. ‘मिनकॉन’ कॉनक्लेव्हद्वारे खनिज क्षेत्रातील उद्योगांच्या वाढीसाठी सर्वांगिण विचारमंथन होईल, असेही श्री. पारेख यांनी सांगितले.
रिना सिन्हा, अतुल ताजपुरिया यांनी सुत्रसंचालन केले. शिवकुमार राव यांनी आभार मानले.
· एक लाख ५७ हजार मतदारांनी केले व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक

· एक लाख ५७ हजार मतदारांनी केले व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक

  • - व्हीव्हीपॅटमुळे मतदानामध्ये अधिक पारदर्शकता  - अश्विन मुदगल
  • - उच्च न्यायालय येथे व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिक


नागपूर, दि. 8 : येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्रासह प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर होणार असून, मतदान करताना झालेल्या मतदानासंदर्भातील माहिती सात सेकंदापर्यंत प्रत्यक्ष पाहता येणार आहे. व्हीव्हीपॅटमुळे मतदान प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असून, केलेले मतदान सुरक्षित असल्याची भावना मतदारांमध्ये निर्माण होणार असल्याची ग्वाही जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ येथील सभागृहात मतदार जागृती अभियानांतर्गंत इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्र व व्हीव्हीपॅटच्या वापरासंबंधीचे सादरीकरण व प्रात्यक्षिक बार असोशिएशन व जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी हायकोर्ट बार असोशिएशनचे अध्यक्ष ॲङ अनिल किलोर, तसेच बार असोशिएशनच्या श्रीमती वेंकटरमन, प्रफुल्ल कुबाळकर, जयदीप चांदूरकर, मुख्य सरकारी वकील सुमंत देवपुजारी, पुरुषोत्तम पाटील तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती राजलक्ष्मी शहा तसेच बार असोशिएशनचे सर्व पदाधिकारी यावेळीउपस्थित होते.

निवडणुकांसाठी इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्राचा वापर प्रारंभी केरळ राज्यातील पारावूर विधानसभा मतदारसंघात करण्यात आला होता. त्याच्या उपयुक्ततेमुळे भारत निवडणूक आयोगाने ‘भेल’ व ‘इसीआयएल’ या शासनाच्या कंपन्यांमार्फत इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्राच्या निर्मितीला सुरुवात केली असून, 15 मार्च 1989 पासून संपूर्ण राज्यात निवडणुकांमध्ये या यंत्रांचा वापर करण्यात येत असल्याचे सांगताना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल म्हणाले की,नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघात या यंत्रासोबतच प्रथमच व्हीव्हीपॅटचासुद्धा वापर करण्यात येत आहे. ही संपूर्ण यंत्रणा अत्यंत सुरक्षित असून, मतदानापूर्वी सर्व मशीनची तपासणी व मॉक पोल नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीसमोर करण्यात येत असल्याचे यावेळी सांगितले.

मतदानासाठी वापरण्यात येणारे इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट मशीन मतदानाच्या ४८ तासापूर्वी रॅडमायझेशन करुन पाठविण्यात येत असल्यामुळे मतदानकेंद्रांवर पाठवण्यात येणाऱ्या मशीनची पूर्वकल्पना कुणालाही असूच शकत नाही. तसेच प्रत्यक्ष मतदानापूर्वी राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीसमोर मॉक पोल घेण्यात येत असल्यामुळे आपले मतदान सुरक्षित आहे, याची ग्वाही या संपूर्ण प्रक्रियेमार्फत देण्याचा निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पार पाडल्या जाते. प्रत्यक्ष निवडणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिंग एजंट, मायक्रो ऑब्झर्व्हर, वेब कॉस्टींग, सीसीटीव्ही, सेक्टर ऑफिसर तसेच मीडियाचे प्रतिनिधी यांच्या देखरेखीखाली ही संपूर्ण प्रक्रियेनंतर अत्यंत सुरक्षिततेतर्गंत स्ट्राँगरुममध्ये मतमोजणीपर्यंत सर्व मशीन ठेवण्यात येतात.

यावेळी जिल्हा‍धिकारी अश्विन मुदगल यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीनबाबत विविध शंका उपस्थित करण्यात येत असल्या तरी भारतीय निवडणूक आयोगाने सर्व शंकांचे समाधान केले असून, आतापर्यंत देशातील विविध उच्च न्यायालयात 37 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 30 याचिकांचा निकाल हा भारतीय निवडणूक आयोगाच्या बाजूने लागला आहे. तर 7 याचिकांवर सुनावणी सुरु आहे. इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्राद्वारे होणारे मतदान अत्यंत सुरक्षित असल्यामुळेच संपूर्ण देशात ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेबद्दल संभ्रम असल्यास तात्काळ आपले मत नोंदविण्याची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करुन दिली आहे.


गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, नागालँड, मेघालय, त्रिपुरा, आणि कर्नाटक या राज्यात झालेल्या सर्वसाधारण निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटचा यशस्वी वापर करण्यात आला असून, देशभरात 5हजार 626 कोटी रुपये किमतीच्या 40 लाख युनिटचा वापर करण्यात आला आहे.

नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर होत असल्यामुळे जनतेला मतदान प्रक्रियेची माहिती देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात 4 हजार 832 मतदान केंद्र असून, सर्वच मतदान केंद्रांपर्यंत जनजागृती करण्यात येत आहे. या अंतर्गंत जिल्ह्यातील आतापर्यंत 1 लाख 56 हजार 696 नागरिकांनी व्हीव्हीपॅटवर प्रत्यक्ष मतदानाची माहिती घेतली आहे. ही जनजागृती मोहिमेतर्गंत चित्ररथासह विविध माध्यमांचा प्रभावी वापर सुरु असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

प्रारंभी हायकोर्ट बार असोशिएशनच्या श्रीमती वेंकटरमन यांनी प्रास्ताविकात या उपक्रमाची माहिती दिली. तर ॲङ पुरुषोत्तम पाटील यांनी आभार मानले. इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट मतदान प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करुन झालेल्या मतदानाची माहिती यावेळी सर्व उपस्थितांनी घेतली.
आदिवासी महोत्सवाचे उद्घाटन थाटात

आदिवासी महोत्सवाचे उद्घाटन थाटात

नागपूर/प्रतिनिधी:

आदिवासी समाजाला पुरातन संस्कृतीसह शौर्याचा इतिहास लाभला आहे. बदलत्या युगात आदिवासी समाजाने आपल्या कर्तृत्वाच्या बळावर प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे. मात्र प्रगतीचे शिखर गाठताना आपल्या पुरातन संस्कृतीचे जतन होणेही आवश्‍यक आहे. आपल्या येणाऱ्या प्रत्येक पिढ्रयांना हा इतिहास अवगत व्हावा यासाठी आदिवासी महोत्सवाद्वारे संधी उपलब्ध करण्यात आली आहे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.   

परंपरागत आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवार (ता. ८) आयोजित आदिवासी महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून महापौर नंदा जिचकार बोलत होत्या. मंचावर महोत्सवाचे उद्घाटक राष्ट्रीय जनजाति आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार शाय, प्रमुख ‍अतिथी म्हणून आमदार सुधाकर देशमुख, महोत्सवाच्या आयोजक राष्ट्रीय जनजाति आयोगाच्या सदस्या माया इवनाते, आयोगाचे सदस्य हरीकृष्ण दामोद, सत्ता पक्षनेते संदीप जोशी, धरमपेठ झोन सभापती प्रमोद कौरती, सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, नगरसेवक संदीप जाधव, नगरसेविका रूतिका मसराम, गोंड राजमाता राजश्रीदेवी उईके,‍ शिवाणी दाणी, दिगंबर चौहाण, श्री. पंजवानी आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, आज आदिवासी समाजातील प्रतिभावंतांनी विविध क्षेत्रात लौकिक प्राप्त केले आहे. या समाजाने इतिहासात केलेल्या शौर्याची महतीही प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा महोत्सवाचे आयोजन महत्वाचे ठरते. प्रत्येक समाजबांधवाने आपली संस्कृती न विसरता या संस्कृतीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे, असेही महापौर नंदा जिचकार म्हणाल्या.

राष्ट्रीय जनजाति आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार शाय म्हणाले, देशासाठी बलिदानात आदिवासी समाजाचे मोठे योगदान आहे. मात्र देशासाठी आपले शौर्य पणाला लावणाऱ्या या महावीरांच्या कार्याला हवा तो सन्मान मिळू शकला नाही.‍ देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना योग्य सन्मान ‍मिळावा, लुप्त पडलेल्या इतिहासाचा अध्याय पुन्हा लिहीला जावा यासाठी राष्ट्रीय जनजाति आयोगाद्वारा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय जनजाति आयोगाच्या सदस्या व महोत्सवाच्या आयोजक माया इवनाते यांनी केले.

नागपुर का राजा’चे सादरीकरण शनिवारी

महोत्सवाच्या समारोप प्रसंगी सायंकाळी ५.३० वाजता ‘नागपुर का राजा’ या महानाट्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. यावेळी आयोजित समारोप कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय जनजाति आयोगाच्या सदस्या माया इवनाते उपस्थित राहतील. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महापौर नंदा जिचकार भूषवतील. 

Friday, February 08, 2019

मातंग समाजांचा सामुहिक विवाह सोहळा १९ फेब्रुवारीला

मातंग समाजांचा सामुहिक विवाह सोहळा १९ फेब्रुवारीला

श्रीक्षेत्र मुक्तापूर पेठ येथे समाज मेळावा व सामुहिक विवाह सोहळा
नागपूर/ अरूण कराळे :


श्री संत दौलत महाराज संगमेश्वर शिवमंदिर सामाजिक संस्था मुक्तापूर पेठ (जलालखेडा) येथे दरवर्षी प्रमाणे माघ् पौर्णिमा उत्साहाच्या पावन पर्वावर सोमवार १८ फेब्रुवारी व मंगळवार  १९ फेब्रुवारी रोजी मातंग समाजांचा सामुहिक विवाह सोहळा, मातंग समाज मेळावा व सामाजिक सत्कार सोहळा संस्थेच्या वतीने व माजी राज्यमंत्री अनिल देशमुख, खासदार कृपाल तुमाने यांच्या प्रमुख  उपस्थितीत आयोजित केलेला आहे.
 श्री संत दौलत महाराज संगमेश्वर सामाजिक संस्था मुक्तापूर पेठ (जलालखेडा, तालुका नरखेड) येथे आयोजित १८ फेब्रुवारी रोजी दुपारी संस्थान परिसरात ग्राम स्वच्छता अभियान  राबविण्यात येईल. तर सायंकाळी सहा वाजता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व सामुदायिक प्रार्थना होईल. नंतर रामभाऊ निमकर यांचे शहनाई वादन तर हरिनाम व सामाजिक किर्तन ह .भ.प. रामचंद्र महाराज काळबांडे यांचे होईल. गितगायन मुक्ताताई, श्रीराम जोंधळकर, भक्तीमय संगीत संजय तिळके, सुगम गायन पुजा किशोर वानखेडे, वंदना खंडारे अन्य समाजातील कलावंताचे प्रबोधन, गायन करण्यात येईल.


      १९ फेब्रुवारीला दुपारी १ ते २  मातंग समाजांचा सामुहिक विवाह सोहळा, समाज मेळावा व सामाजिक सत्कारमुर्तीचे स्वागत समारोहाचे औचित्य साधून अरुण गायकवाड यांच्या शहनाई वादनासह महाराष्ट्र शासन समाजभुषन पुरस्कृत संजय ठोसर,शंकर ठोसर प्रस्तुत स्वररंग म्युजिकल ग्रुप नागपूरच्या वतीने अभंगवाणीचे सादरीकरण मनवर ठोसरसह क्रिष्णा गायकवाड यांचे राहील. गोपालकाल्याचे किर्तन ह .भ .प .रामचंद्र काळबांडे, संगीतमय समाज प्रबोधन अशोक वानखेडे व संच  अंजनसिंग जि.अमरावती यांचे राहील.
     मातंग समाजातील इच्छुक वधु-वरांनी आपली नावे आयोजक समीतीच्या श्रीसंत दौलत महाराज संगमेश्वर सामाजिक संस्था मुक्तापूर पेठ यांचेकडे  रविवार १० फेब्रुवारी  पर्यंत निःशुल्क नोंद नोंदविली जाईल. तसेच मातंग समाज बांधवानी या संधीचा लाभ घ्यावा. व जास्तीतजास्त संखने उपस्थित राहवे असे आवाहन श्रीसंत दौलत महाराज संगमेश्वर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष बालकदास खंडारे, उपाध्यक्ष अशोक डोके, सचिव नत्थु अडागळे, सहसचिव रामदास खडसे, कोषाध्यक्ष अरुण गायकवाड, संपर्क सचिव संजय ठोसर यांनी केले आहे .
      संस्थान परिसर श्रीक्षेत्र मुक्तापूर पेठ या मंगलमय कार्यक्रमास लाभणारे सत्कारमुर्ती माजी राज्यमंत्री अनिल देशमुख, खासदार कृपाल तुमाने,माजी जि.प.सदस्य डॉ.आनंद खडसे, जि.प.उपाध्यक्ष शरद डोनेकर, जि .प. माजी अध्यक्ष बंडोपत उमरकर, जि.प.शिक्षण सभापती उकेश चव्हाण, पं.स. सभापती राजेंद्र हरणे, मुक्तापूर पेठ सरपंचा द्वारकाबाई नाखले, जेष्ठ समाजसेवक डॉ .अशोक कांबळे, लहानु इंगळे, महादेव जाधव, केशव कांबळे, रविंद्र खडसे, सुनिल सोनवाने, साहेबराव वानखेडेसह पदाधिकारी व सदस्यगण यांच्या उपस्थितीत मंगलमय विवाह सोहळा कार्यक्रम होणार आहे.


Thursday, February 07, 2019

राष्ट्रपतींनी घेतली जुन्या पेन्शनच्या लढाईची दखल

राष्ट्रपतींनी घेतली जुन्या पेन्शनच्या लढाईची दखल



🔵 विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाच्या निवेदनाची दखल

🔵 जुनी पेन्शन व शिक्षण हितार्थ एकीने लढण्याचे मिलिंद वानखेडे यांचे आवाहन



नागपूर - देशभरात जुन्या पेन्शनच्या मागणीचा आवाज सर्वदूर घुमत आहे. हा आवाज विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूरने थेट राष्ट्रपतीं पर्यंत पोहोचविला. राष्ट्रपतींनी या निवेदनाची दखल घेतली असून संबंधित कार्यालयांना यात लक्ष घालण्याचे कळविले असल्याचे पत्र संघटनेला पाठविले आहे.

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी आपसी मतभेद विसरून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षक नेते व विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूरचे संस्थापक मिलिंद वानखेडे यांनी केले आहे.

राज्य सरकारने एक नोव्हेंबर 2005 पासून लागलेल्या कर्मचार्‍यांना 1982-84 ची पेन्शन योजना बंद केली. त्याऐवजी खासगी कंपनीच्या धोरणावर अवलंबून असलेली फसवी नवीन अंशदाय पेंशन योजना (DCPS /NPS) लागू केली आहे. या योजनेत कर्मचार्‍यांचे कुठलेही संरक्षण नसल्याने मृत्यू पश्चात किंवा निवृत्ती नंतर कुटुंबाची वाताहत करणारी हि योजना आहे. राज्यात आजमितीस 3500 कुटुंबावर हा डोंगर कोसळला असून त्यातून गोंडस पेन्शन योजनेचे दुष्परिणाम दिसून येत आहे. राज्यात अत्यंत आक्रमक पध्दतीने महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेतर्फे मोठे आंदोलन सुरू आहे.

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर तर्फे 27 सप्टेंबर 2018 रोजी थेट राष्ट्रपतींना 1700 पोस्टकार्ड व 80 पानाचे सविस्तर निवेदन जिल्हाधिकारी नागपूर यांच्या मार्फत पाठविण्यात आले होते. या आंदोलनाची राष्ट्रपतींनी दखल घेतली असून या विषयावर गांभीर्यपूर्वक निर्णय घेण्यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालयाकडे पाठविले आहे. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आजमितीस संपूर्ण देश एकवटला आहे. नवी दिल्ली येथे NMOPS च्या माध्यमातून अटेवा बंधू यांनी पाच लाख कर्मचार्‍यांच्या उपस्थित शंखनाद फुंकला आहे.

कर्मचारीवर्गाच्या हितार्थ जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे धाडस दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दाखविले. मात्र राज्यातील राज्यकर्ते आताही केवळ अभ्यास करीत असल्याच्या थापा मारून कर्मचार्‍यांना मुर्ख बनविण्याचा प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेतर्फे No Pension - No Vote चा बिगुल फुंकला असून जुन्या पेन्शनसाठी वेगवेगळ्या मंचावर लढाई लढणा-या सर्व शासकीय कर्मचारी संघटनेने एकजुटीनं जुनी पेन्शनचा आवाज बुलंद करावा, असे आवाहन विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर तर्फे माजी शिक्षण मंडळ सदस्य व शिक्षक नेते मिलिंद वानखेडे यांनी केले आहे.

राष्ट्रपतींना 1700 पोस्टकार्ड पाठविण्याच्या आंदोलनात विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे राजेंद्र खंडाईत, खिमेश बढिये, गणेश खोब्रागडे, गणेश उघडे, रविकांत गेडाम, समीर काळे, भिमराव शिंदेमेश्राम, संजय धरममाळी, सुरेश धारणे, राजु हारगुडे, गोंदिया जिल्हा संघटक बालकृष्ण बालपांडे, प्रणाली रंगारी, रिना टाले, आत्माराम बावनकुळे, राजु भस्मे, गौरीशंकर साठवणे, अरविंद घोडमारे, आशा कास्त्री,सारिका पैडलवार यांच्यासह शिक्षक, वनविभाग, ग्रामसेवक, टपालसेवक, आरोग्य विभागाचे कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Wednesday, February 06, 2019

 नागपुरात म.रा.वि.मं.अधिकारी संघटनेचे ४२ वे राज्यस्तरीय अधिवेशन

नागपुरात म.रा.वि.मं.अधिकारी संघटनेचे ४२ वे राज्यस्तरीय अधिवेशन

ऊर्जामंत्र्यांचे हस्ते उद्घाटन
वीज क्षेत्र वाटचाल व आव्हाने यावर मार्गदर्शन
नागपूर/प्रतिनिधी:

महावितरण,महानिर्मिती,महापारेषण आणि सूत्रधारी कंपन्यांमध्ये कार्यरत वित्त व लेखा, महसूल,मानव संसाधन, औद्योगिक संबंध, माहिती तंत्रज्ञान, वैद्यकीय, जनसंपर्क, सुरक्षा व अंमलबजावणी आणि विधी अश्या अतांत्रिक अधिकाऱ्यांचे विविध प्रश्न/समस्या सोडविण्याकरीता म.रा.वि.मं.अधिकारी संघटना नेहमीच पुढाकार घेत असते. यंदा संघटनेच्या ४२ व्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे यजमानपद नागपूर परिमंडळाकडे आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांचे शुभहस्ते म.रा.वि.मं.अधिकारी संघटनेच्या ४२ व्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून महावितरणचे कार्यकारी संचालक(माहिती तंत्रज्ञान) योगेश गडकरी, प्रभारी कार्यकारी संचालक(मानव संसाधन) चंद्रशेखर येरमे, प्रभारी कार्यकारी संचालक(मानव संसाधन) महापारेषण सुगत गमरे, प्रभारी प्रादेशिक संचालक महावितरण नागपूर दिलीप घुगल, मुख्य महाव्यवस्थापक सूत्रधारी कंपनी संदेश हाके, मुख्य महाव्यवस्थापक महावितरण स्वाती व्यवहारे, मुख्य अभियंता कोराडी वीज केंद्र अभय हरणे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. 


राज्यभरातील सुमारे ४०० वीज अधिकारी ह्या अधिवेशनाला उपस्थित राहणार असून अधिवेशनाचे आयोजन आमदार निवास, सिव्हील लाईन्स, नागपूर येथे करण्यात आले आहे. 

वीज क्षेत्रात झपाट्याने होत असलेले बदल, आव्हाने, ग्राहकाभिमुख उत्तमोत्तम सेवा, अधिकाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न, वीज क्षेत्र विषयक भविष्यकालीन उपाययोजना याबाबत सदर अधिवेशनात तपशीलवार चर्चा होणार आहे. शनिवार ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता उद्घाटन सोहळा तर दुपारच्या सत्रात वीज कंपन्या व संघटनेची भविष्यकालीन वाटचाल व आव्हाने यावर मान्यवर अतिथी मार्गदर्शन करणार आहेत. रविवार १० फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता पत संस्थेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. 

म.रा.वि.मं.अधिकारी संघटनेचे अध्यक्ष सतीश तळणीकर, सरचिटणीस दिलीप शिंदे, संघटन सचिव प्रवीण बागुल यांच्या कुशल नेतृत्वाखाली हे अधिवेशन संपन्न होणार आहे. अधिवेशनाच्या यशस्वितेसाठी नागपूर परिमंडळाचे अध्यक्ष प्रवीण काटोले, सचिव राजेश कुंभरे तसेच शरद दाहेदार, सौ.सविता झरारीया, सौ.तृप्ती मुधोळकर, प्रमोद खुळे,नंदकिशोर पांडे,वैभव थोरात, निलेश जुमळे, राधेश्याम उईके, नागपूर परिमंडळातील संघटनेचे समस्त पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहेत.
वाडीत सापडला  युवकाचा मृतदेह

वाडीत सापडला युवकाचा मृतदेह

वाडी(नागपूर )/अरूण कराळे 
मृतदेह साठी इमेज परिणाम
येथील संत ज्ञानेश्वर ले आउट येथील हनुमान मंदिराच्या बाजूला असलेल्या ट्रांन्सपोर्टच्या छतावर तरुणांचा मृतदेह मिळाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे .प्राप्त माहितीनुसार मृतक संजय उर्फ चांड्री रत्तीराम धारणे वय३० हा अमरावती महामार्गावरील एम एन चिकन सेंटर मध्ये मजुरीचे काम करायचा.
परंतु तो दारूच्या व्यसनाधीन झाल्यामुळे दिवसभर मजुरीचे काम करून रात्री त्याचे राहण्याचे ठिकाण स्थिर नव्हते त्यामुळे जिथे कुठे जागा मिळेल तिथे झोपायचा. बुधवार ६ जानेवारी रोजी त्याचा मृतदेह ट्रांन्सपोर्टच्या छतावर आढळला.मृतकाची बहीण फूलमती महाजन ही दाभा येथे राहत असून पोलिसांनी तिला घटनेची माहिती दिली असता माझा व त्याचा काहीही संबंध नसून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास तिने नकार दिला. घटनेचे तपास कार्यवाहक वरिष्ठ पो.निरीक्षक अनिल टाकसांडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पो.निरीक्षक शामराव कावनापूरे,हेडकॉन्स्टेबल विनोद बूके करीत आहे.

अवैध धंद्याला पाठबळ देणाऱ्या ६ पोलिसांचे निलंबन

अवैध धंद्याला पाठबळ देणाऱ्या ६ पोलिसांचे निलंबन

नागपूर/प्रतिनिधी:
 मध्य भारतातील सर्वात मोठा ड्रग्ज माफिया आबू याला आठवड्यांपूर्वी गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली होती.याला साथ देणाऱ्या चार पोलीस उपनिरीक्षकासह सहा जणांना मंगळवारी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी त्याची गंभीर दखल घेत नीलेश पुरभे, मनोज ओरके, शरद सिकने आणि साजीद मोवाल या चार पोलीस उपनिरीक्षकांच्या तसेच कर्मचारी जयंता शेलोट आणि श्याम मिश्राच्या निलंबनाचे आदेश जारी केले. 
पोलीस निलंबित साठी इमेज परिणाम

या घटनेमुळे महाराष्ट्र पोलिसात चांगलीच खळबळ उडाली आहे, ड्रग्सच्या काळ्या कारभारात काही पोलीस अधिकारी कर्मचारी यांचा समावेश असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या कानावर आली असता त्यांनी या घटनेची दखल घेत.हि कारवाई केली.पोलीस कर्मचारी जयंता शेलोटचे आबूच्या फोनवर चक्क ८०० कॉल्स आढळले.जयंताला यापूर्वीही अनेकदा निलंबित करण्यात आले आहे.
या घटनेमुळे आणखी अवैध धंद्याला साथ देणाऱ्या प्रशासनातील अधिकार्याचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

Tuesday, February 05, 2019

पोलीस निरीक्षकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

पोलीस निरीक्षकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

नागपूर/प्रतिनिधी:


पतीपासून विभक्त झालेल्या महिलेला (वय ४२) लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या आणि नंतर तिचे घर हडपून तिलाच धमकी देणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकाविरुद्ध अखेर हुडकेश्वर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.राजेंद्र आनंदा मकदुम (वय ४२) असे गुन्हा दाखल झालेल्या सहायक पोलीस निरीक्षकाचे (एपीआय) नाव असून, ते सध्या सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी ठाण्यात नियुक्त आहेत. 
हा गुन्हा दाखल व्हावा म्हणून पीडित महिला गेल्या चार वर्षांपासून पोलीस अधिकारी, सामाजिक संस्था संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडे पायपीट करीत होती.अखेर चार वर्षानंतरच्या तिच्या संघर्षाला यश मिळाले आणि हुडकेश्वर ठाण्यात एपीआय सावंत यांनी सोमवारी मकदुमविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल होण्याची १५ दिवसांतील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी वाडीतील पोलीस अधिकाऱ्याविरुद्धही बलात्काराचा गुन्हा दाखल झाला.
 पशुपक्षी प्रदर्शनात नागपुरी म्हशीचा पहिला नंबर

पशुपक्षी प्रदर्शनात नागपुरी म्हशीचा पहिला नंबर

नागपूर/प्रतिनिधी:

जालना येथे झालेल्या २ ते ४ फेब्रुवारीदरम्यान अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शनात नागपुरी म्हशीला संकरित व जातिवंत म्हैस म्हणून प्रथम क्रमांक मिळाला आहे. तर बेरारी जातीच्या शेळीला सुद्धा प्रथम क्रमांक मिळाला आहे.
या प्रदर्शनात देशातील प्रत्येक राज्यातून संकरित जातिवंत पशुधन शेतकऱ्यांसाठी ठेवण्यात आले होते. नागपूर जिल्ह्यातून पाच नागपुरी जातीच्या म्हशी, बेरारी शेळ्यांचा गट पाठविण्यात आला होता. काटोल तालुक्यातील कातलाबोडी येथील बाबाराव लक्ष्मण भड यांनी नागपुरी म्हैस प्रदर्शनात ठेवली होती. तर नागपूर तालुक्यातील शिवा गावातील देवराव माळू राऊत यांनी बेरारी जातीच्या शेळ्या प्रदर्शनात ठेवल्या होत्या. संकरित आणि जातिवंत पशुधनाच्या निकषानुसार नागपुरी म्हशीने प्रथम क्रमांक पटकाविला. बाबाराव भड यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एक लाख रुपये रोख पारितोषिक देण्यात आले. तर बेरारी जातीच्या शेळ्यांचे संगोपन करणारे देवराव राऊत यांना २५ हजार रुपये रोख पारितोषिक प्रदान करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. उमेश हिरुळकर यांनी दिली.(लोकमत)


मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेस भरघोस प्रतिसाद;२८ हजार शेतकऱ्यांचे अर्ज

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेस भरघोस प्रतिसाद;२८ हजार शेतकऱ्यांचे अर्ज

विदर्भातील ५ हजार २२३,नागपूर जिल्ह्यात ३२५ शेतकऱ्यांचे अर्ज
नागपूर/प्रतिनिधी:

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत मार्च २०१९ अखेरपर्यन्त ५० हजार शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्याचे महावितरणचे उद्दीष्ट असून या योजनेस राज्यातील शेतकऱ्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळत असून महावितरणने पोर्टल सुरु केल्यानंतर केवळ पंधरा दिवसात सौर कृषिपंपाच्या वीजजोडणीसाठी सुमारे २८ हजार शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.
संबंधित इमेज
शाश्‍वत जलस्त्रोत उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना पारंपारिक वीजजोडणी मिळण्यात अडचणी आहेत. अशा शेतकऱ्यांना प्राधान्याने सौर कृषिपंप देण्यात येणार आहेत. महावितरणच्या पोर्टलवरून अर्ज केलेल्या २६ हजार शेतकऱ्यांपैकी २ हजार शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा सर्व्हे करण्यात आलेला असून २ हजार २९३ शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत. याशिवाय अर्ज भरतांना काही त्रुटी असलेल्या ४१९ अर्ज सध्या नामंजूर करण्यात आले असून या शेतकऱ्यांनी अर्जातील माहिती दुरूस्त करून आपले अर्ज पुन्हा महावितरणच्या पोर्टलवरून भरावेत.

योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महावितरणने या योजनेच्या संदर्भात शेतकऱ्यांकडून वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न व त्यांची उत्तरे असलेली मार्गदर्शन पुस्तिका व व्हॉट्स ॲप अशा माध्यमांचा वापर करण्यात येत असून क्षेत्रीयस्तरावरील सर्व कर्मचारी व अभियंते सोशल माध्यमांद्वारे शेतकऱ्यांसोबत संवाद साधत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

शेतकऱ्यांना कृषिपंपाकरिता वीजजोडणी घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले असून त्याचा लाभ घेत दि. २ फेब्रुवारी २०१९ पर्यन्त राज्यातील सुमारे २८ हजार शेतकऱ्यांनी सौर कृषिपंपासाठी अर्ज केले आहेत. विशेषत: मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडून या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असून मागील पंधरा दिवसात १६ हजार ९६० शेतकऱ्यांनी आपले अर्ज या पोर्टलवरून भरले आहेत. तरी या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. 

योजनेत विदर्भातील ५ हजार २२३ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. यातील ४१७ शेतकऱ्यांना महावितरणकडून मागणी पत्र दिल्या गेले आहे. विदर्भात सर्वाधिक अर्ज वाशीम जिल्ह्यातून आले आहेत. येथे १,५६८ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत.यातील १७० शेतकऱ्यांना महावितरणकडून मागणी पत्र वितरित करण्यात आले. नागपूर जिल्ह्यात ३२५ शेतकऱ्यांनी अर्ज केले असून यातील ११९ जणांना मागणीपत्र दिल्या गेले आहे. आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून येतो आहे. येथून ६०२ अर्ज आले आहेत. भंडारा जिल्ह्यातून ५४० अर्ज आले असून ४३ जणांना मागणी पत्र महावितरणकडून देण्यात आले आहे.

Monday, February 04, 2019

ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ७ फेब्रुवारीपासून

ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ७ फेब्रुवारीपासून



विविध आंतरराष्ट्रीय चित्रपटांची मेजवानी
 मनपा, ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशन, रातुम नागपूर विद्यापीठाचे आयोजन 
नागपूर/प्रातिनिधी:
ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव साठी इमेज परिणाम
नागपूर महानगरपालिका, ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने तिस-या ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या चित्रपट महोत्सवात नागपूरकरांना विविध आंतरराष्ट्रीय चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे, अशी माहिती ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन सचिव डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी दिली. 

पत्रकार परिषदेमध्ये अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, उपायुक्त राजेश मोहिते, सहायक आयुक्त विजय हुमने, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे उपकुलसचिव अनिल हिरेखन, डॉ. उदय गुप्ते, विकास मानेकर, अजय गंपावार आदी उपस्थित होते.

७ ते १० फेब्रुवारी दरम्यान आयोजित ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे गुरुवारी (ता.७) गायत्री नगर आयटी पार्क येथील पर्सिस्टंट सिस्टीम लिमीटेड येथील कविकुलगुरू कालीदास सभागृहामध्ये राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सायंकाळी ५ वाजता उद्घाटन होईल. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मनपा आयुक्त अभिजीत बांगर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, सुप्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन सचिव डॉ. चंद्रशेखर मेश्राम उपस्थित राहतील. उद्घाटनप्रसंगी ‘माय ओन गुड’ हा चित्रपट दाखविण्यात येणार असल्याचेही महोत्सवाचे आयोजन सचिव डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी सांगतिले. 

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये यंदा भारतीय चित्रपटामध्ये उत्कृष्ट योगदानाबद्दल प्रसिद्ध चित्रपट निर्माते जाहनु बरुआ यांना ‘ऑरेंज सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल‘ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तर प्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त यांना ‘ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शहरातील पर्सिस्टंट सिस्टीम लिमीटेड येथील कविकुलगुरू कालीदास सभागृह व आयनॉक्स जयवंत तुली मॉल येथे चार दिवस सकाळी ९ वाजतापासून सायंकाळी ६ वाजतापर्यंत ३३ चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. सर्वसामान्य नागरिकांना या चित्रपटांचा लाभ घेता यावे यासाठी चार दिवसांसाठी ५० रुपये नाममात्र शुल्क आकारण्यात येणार आहे. झाशी राणी चौकातील विदर्भ साहित्य संघामध्ये प्रवेशिका उपलब्ध करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना नि:शुल्क चित्रपट पाहता येणार आहे. देशातील विविध प्रसिद्ध चित्रपटांचे दिग्दर्शक यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहणार असल्याचेही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन सचिव डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी सांगितले.
 नगराध्यक्ष चषक कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात सप्तरंग क्रीडा मंडळ अव्वल

नगराध्यक्ष चषक कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात सप्तरंग क्रीडा मंडळ अव्वल



महीला गटात नेहरू क्रीडा मंडळ अव्वल 
वाडी ( नागपूर ) / अरूण कराळे

वाडी नगर परिषदच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नगराध्यक्ष चषक स्पर्धा अंतर्गत नागपूर जिल्हास्तरीय पुरुष गटातील कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत नागपूरातील नदंनवन मधील सप्तरंग क्रीडा मंडळाने अव्वल स्थान पटकावले . 

त्यांनी नागपूरातील सक्करदरामधील जयहिंद क्रीडा मंडळावर मात करून स्व . लालचंद गर्ग यांच्या स्मृती प्रित्यर्थ आकाश गर्ग यांच्या तर्फे रोख २५ हजार रूपयांचा प्रथम पुरस्कार व नगराध्यक्ष चषक पटकावला . उपविजेत्या संघाला स्व . नारायणराव थोराने स्मृती प्रित्यर्थ शैलेश थोराने यांच्या तर्फे रोख १५ हजार रुपयांचा द्वित्तीय पुरस्कार व नगराध्यक्ष चषक देण्यात आला . तृतीय पुरस्कार सुभाष क्रीडा मंडळ नागपूर व जय बजरंग क्रिडा मंडळ सोनेगाव (निपाणी ) यांना स्व .मातादिनलाल जैस्वाल स्मृती प्रित्यर्थ गौरव जैस्वाल यांच्या तर्फे रोख ७ हजार रुपये व नगराध्यक्ष चषक देण्यात आला . महीला गटात नेहरू क्रीडा मंडळ सक्करदरा नागपूरच्या निरामय क्रीडा मंडळावर मात करुन स्व .पार्वती झाडे यांच्या स्मृत्ती प्रित्यर्थ प्रेम झाडे यांच्या तर्फे रोख १५ हजार रूपयांचा प्रथम पुरस्कार व नगराध्यक्ष चषक पटाकाविला उपविजेत्या संघाला स्व . मंजुळा बारई स्मृत्ती प्रित्यर्थ अनिल बारई यांच्या तर्फे रोख १० हजार रूपयांचा द्वितीय पुरस्कार व नगराध्यक्ष चषक देण्यात आला . 

तृतीय पुरस्कार त्रीरत्न क्रीडा मंडळ कामठी संघाला स्व .रंजन केचे स्मृती प्रित्यर्थ संतोष केचे यांच्या तर्फे रोख ५ हजार रूपयांचा पुरस्कार व नगराध्यक्ष चषक देण्यात आला . वाडी विभाग शालेयस्तरावरील वर्ग ४ ते ७ विद्यार्थी गट प्रथम क्रमांक जिंदल पब्लीक स्कूल वाडी , द्वितीय क्रमांक जि.प. उच्च प्राथमिक शाळा वाडी .विद्यार्थीनी गट प्रथम क्रमांक प्रबोधनकार ठाकरे स्मृती माध्यमिक विद्यालय वाडी , द्वितीय क्रमांक जिंदल पब्लीक स्कूल वाडी . वर्ग ८ ते १० विद्यार्थी गट जिंदल पब्लिक स्कूल वाडी , द्वितीय क्रमांक केंद्रीय विद्यालय डिफेन्स .विद्यार्थीनी गट लिटील स्टार कॉन्व्हेंट वाडी . द्वितीय क्रमांक प्रबोधनकार ठाकरे स्मृती माध्यमिक विद्यालय वाडी . वर्ग ११ वी १२ प्रथम क्रमांक केंद्रीय विद्यालय डिफेन्स .

 द्वितीय क्रमांक जवाहरलाल नेहरू विद्यालय व महाविद्यालय वाडी यांनी प्राप्त केला .बक्षीस वितरण समारभांत भाजपाचे जिल्हा अध्यक्ष डॉ . राजीव पोतदार , आ .गीरीश व्यास , आ . समीर मेघे, नगराध्यक्ष प्रेम झाडे ,उपनगराध्यक्ष राजेश थोराने, माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक नरेश चरडे , मुख्याधिकारी राजेश भगत ,सभापती नीता कुनावार , सभापती मीरा परिहार,सभापती कल्पना सगदेव, सभापती शालिनी रागीट , उपसभापती आशा कडू , नगरसेवक राजेश जयस्वाल , नरेंद्र मेंढे,केशव बांदरे , अभय कुणावार, संतोष केचे ,दिनेश कोचे , सरीता यादव , अस्मिता मेश्राम ,मंजुळा चौधरी,प्रज्ञा झाडे,राकेश मिश्रा ,सतीश जिंदल, पुरुषोत्तम रागीट ,मानसिंग ठाकूर, अखील पोहनकर , रूपेश झाडे , ज्ञानेश्वर भोयर,अभय कुणावार,संजय जीवनकर , जनकताई भोले,ज्योती भोरकर, आंनदबाबू कदम, आशीष पाटील , शऋघ्नसिंह परिहार, रुपेश झाडे , राजकुमार बोरकर , दुर्योधन ढोणे , प्रकाश कोकाटे , अश्विन बैस, राजेंद्र चौधरी , अॅड . श्रीराम बाटवे प्रामुख्याने उपस्थित होते. 

स्पर्धेचे पंच म्हणून सचिन सूर्यवंशी,धनंजय चवळे,राजेश बालपांडे,अक्षय ठवकर,विजय- मसराम,नितीन खरे,राजू विश्वकर्मा यांनी जबाबदारी सांभाळली त्यांचाही सत्कार करण्यात आला .
प्रास्ताविक मुख्याधिकारी राजेश भगत,संचालन उपमुख्याधिकारी आकाश सहारे, आभारप्रदर्शन नगरसेवक केशव बांदरे यांनी केले.आयोजनासाठी जय क्रीडा मंडळ सोनेगाव व वाडी नगर परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले .










2 Attachments





















ReplyForward





































 गट ग्रामपंचायत चांपा तर्फे आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद

गट ग्रामपंचायत चांपा तर्फे आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद

अनिल पवार/उमरेड:

गट ग्रामपंचायत चांपा यांच्यावतीने आयोजित मकरसंक्रांत निमित्ताने हळदी-कुंकुच्या कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला.
मकरसंक्रांत ते रथ सप्तमी या दिवसांत ठिकठिकाणी वैयक्तिक, तसेच सार्वजनिक स्तरावर हळदीकुंकू समारंभ साजरे केले जातात.यानिमित्ताने आज चांपा ग्रामपंचायत द्वारा आयोजित हळदीकुंकू समारंभ या दिवसांतच साजरे करण्याचे महत्त्व आहेत तसेच आज चांपा येथे आज हळदी कुंकू व महिला मिळावा यानिमित्ताने वाण वाटप कार्यक्रम करण्यात आला .
ग्रामपंचायत भवन च्या सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला .संपुर्ण ग्रामपंचायत भवन व पटांगण महिलांनी खचाखच भरून गेले होते .यावेळी चांपा येथिल महिलांनी हळदी कुंकू च्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .सावित्री बाई फुले यांच्या फोटो ला माल्यार्पण करून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हापरिषद अध्यक्षा मा .निशाताई सावरकर यांचे सरपंच अतीश पवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व उपसरपंच अर्चना सिरसाम यांच्या हस्ते हळदी कुंकू व वाण वाटप करण्यात आले .

जिल्हापरिषद अध्यक्षा मा .सौ निशाताई सावरकर यांच्या उपस्थितीत महिलांचा मेळावा घेण्यात आला .यावेळी महिलांना मार्गदर्शन करतेवेळी महिलांच्या विकास व आर्थिक द्रुष्टीने सबलीकरण करावा व महिला बचत गट मार्फत विविध योजनांचा लाभ बचत गट व तनिष्का गट च्या माध्यमातून गावाचा विकास करावा असे या विषयी महिलांना च्या सबलीकरण च्या संबंधित मार्गदर्शन केले .

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा .सुषमाताई सावरकर तनिष्का व्यासपीठ समन्वयक दै. सकाळ उपस्थित होत्या .व कुही पोलिस उपनिरीक्षक मा .प्रमोद राऊत व सकाळ चे विदर्भ सहयोगी संपादक मा प्रमोद काळबांडे , तनिष्का सकाळ चे अतुल मेहरे , प.स क्रुषि अधिकारी मा नागरकर यांच्या उपस्थितीत महिलांच्या सबलीकरण व आर्थिक द्रुष्टीने मार्गदर्शन करण्यात आले .

कार्यक्रमाचे आयोजक मा .सरपंच अतीश पवार यांच्या मार्गदर्शनात हळदी कुंकु व महिला मेळावा आयोजित करण्यात आला , नवनिर्वाचित सरपंच यांच्या प्रयत्नाने हा उपक्रम पहिल्यांदाच चांपा ग्रामपंचायत मध्ये घेण्यात आला .यावेळी सकाळ च्या समूहासोबतच तनिष्का व्यासपीठ अंतर्गत प्रोजेक्टवर महिलांना तनिष्का विषयी वीडियो क्लिप द्वारे महिलांना आर्थिक द्रुष्टीने व महिलांना सबलीकरण करण्याच्या द्रुष्टीने चांपा येथिल नवनिर्वाचित मा सरपंच अतीश पवार यांच्या महिलां संबंधित हळदी कुंकू व महिला मेळावा हा उपक्रम पहिल्यांदाच चांपा ग्रामपंचायत मध्ये घेण्यात आला.
 अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ग्राहक सेवांमुळे महावितरण देशात सर्वोत्तम:सीएमडी श्री.संजीव कुमार

अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ग्राहक सेवांमुळे महावितरण देशात सर्वोत्तम:सीएमडी श्री.संजीव कुमार

मुंबई/प्रतिनिधी:

महावितरणकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्यात येत आहेत. त्यामुळे देशात वीज वितरण क्षेत्रात महावितरण सर्वोत्तम कंपनी आहे आणि याच कारणांमुळे महावितरणच्या विविध योजनांची अंमलबजावणी देशातील इतर कंपन्यांकडून केली जाते, असे प्रतिपादन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी केले.

मुंबईस्थित गोरेगाव येथील एक्झीबिशन सेंटरमध्ये इंडियन इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्यावतीने (ईमा) आयोजित आंतरराष्ट्रीय प्रदर्शनीच्या उद्घाटनप्रसंगी श्री. संजीव कुमार बोलत होते. वितरण कंपन्यांसमोरील 'आव्हाने आणि संधी' या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. 

महावितरणने मागील तीन वर्षांत बहुतांश ग्राहकसेवा ऑनलाईन केल्या आहेत. ग्राहकांना वीजबिलाचा तपशील, खंडित वीजपुरवठ्याबाबतची माहिती, वीजपुरवठा खंडित असल्याबाबतची पूर्वसूचना, इत्यादी माहिती एसएमएसद्वारे दिली जाते. वीजखरेदीचे योग्य नियोजन केल्यामुळे मागील वर्षी महावितरणची मोठ्या प्रमाणात बचत झाली आहे. सौर ऊर्जेवर आधारित सौरकृषी फिडरमुळे कृषीग्राहकांचे वीजदर कमी होऊन अंतिमत: घरगुती ग्राहकांच्या वीजदराचे प्रमाणही कमी होण्यास मदत होईल. राज्यातील ४१ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे वीज देण्यासाठी महावितरणद्वारे विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. केंद्रीकृत वीजबिलींगमुळे ग्राहकांना वेळेत वीजबील मिळत असून यात ग्राहकांना वीजबील तयार होताच एसएमएस जात असल्यामुळे वीजबील सुधारण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. महावितणमधील सर्वच कंत्राटदारांना ईसीएसच्या माध्यमातून देयक अदा करण्यात येत आहेत. महावितरणच्या कर्मचाऱ्यांना डॅशबोर्डमुळे माहिती उपलब्ध झाल्याने उपविभागीय पातळीवरील अधिकाऱ्यांनाही व्यवस्थापन निर्णय प्रक्रियेत सहभागी होता येत आहे. प्रभावी ऊर्जा अंकेक्षण व उपकेंद्राचे संनियंत्रण यामुळे महावितरणच्या यंत्रणेवरील खर्चात बचत करणे शक्य होत आहे. या सर्व विविध उपाययोजनांमुळे महावितरणची वीज वितरण हानी विद्युत नियामक आयोगाने निश्चित केलेल्या प्रमाणापेक्षा कमी आहे, अशी माहिती श्री. संजीव कुमार यांनी दिली. 

यावेळी सीईएससी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. देबाशिस बॅनर्जी, केंद्रीय ऊर्जा मंत्रालयातील संचालक श्री. विशाल कपूर, एमएसएमईचे सहसंचालक श्री. सुधीर गर्ग, केंद्रीय अवजड उद्योग विभागाचे सचिव श्री. ए.आर. सिहाग यांच्यासह ईमाचे श्री. हरिश अग्रवाल, श्री. सुनिल सिंघवी आणि श्री. आर. के. चुग प्रामुख्याने उपस्थितीत होते. 
महावितरणच्या स्टॉलला मान्यवरांची भेट 

ईमाच्या प्रदर्शनीत महातिरणच्यावतीने स्टॉल उभारण्यात आला आहे. उद्घाटन कार्यक्रमानंतर या स्टॉलला मान्यवरांनी भेट दिली. यावेळी त्यांना महावितरणच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. महावितरणच्या माहिती तंत्रज्ञान व देयक वसुली विभागाचे कार्यकारी संचालक श्री. योगेश गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्टॉल उभारण्यात आला आहे. तसेच या प्रसंगी श्री. संजीव कुमार यांच्या हस्ते विविध स्टॉलचे उद्घाटनही करण्यात आले.
 कोल माफीया शेख हाजीबाबा शेख सरवरला अटक

कोल माफीया शेख हाजीबाबा शेख सरवरला अटक

नागपूर :अग्निशस्त्र तस्करी प्रकरणी फरार चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथील कोल माफीया शेख हाजीबाबा शेख सरवर खान रा.नकोडा याला दहशतवाद विरोधी पथकाद्वारे अटक करण्यात आली आहे.त्याचे ताब्यातून एक अग्निशस्त्र जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येते. 
नक्षल्यांना अग्नीशस्त्रा पुरवठा करण्याच्या संशयावरून दहशतवाद विरोधी पथकाने २४ जानेवारी रोजी रात्री नागपूर येथील रेल्वे स्टेशन येथे संजय संदीपन खरे वय ४३ वर्ष रा.अशोकनगर वडगाव ता. वणी व सुपतसिंग वय ४१ वर्ष रा.लक्ष्मीपूर बिहार या दोघांना अटक करून त्यांच्या ताब्यातून दोन पिस्टल व २० जिवंत काडतुस जप्त करण्यात आले. सदर अग्निशस्त्राचा पुरवठा हाजीबाबास करण्यात येत होता. असे निष्पन्न झाल्यानंतर एटीएस ने हाजीवर नजर रोखली होती. परंतु तो फरार झाला होता.एटीएसने सात दिवसानंतर गिरड येथे त्याच्या मुसक्या आवळून आज (सोमवार) नागपूरला आणले आहे.
हाजीबाबा याचा कोळसा तस्करीचा व्यवसाय असून ,त्याची घुग्गुस भागात प्रचंड दहशत आहे.त्याने यापूर्वी नकोडी येथील उपसरपंच म्हणून पदभार सांभाळला आहे.त्याचे विरुद्ध चंद्रपूरजिल्ह्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.नागपूर येथील कुख्यात गुंड शेखू खान त्याचा प्रतिस्पर्धी असून त्याने पांच ते सहा वर्षापूर्वी घुग्गुस येथे जाऊन हाजीवर तुफान गोळीबार केला होता. हाजी यात थोडक्यात बचावला.हाजीला यापूर्वी नागपूर येथे लाहोरी बिअर बार येथील गोळीबार प्रकरणी अटक करण्यात आली होती.हाजी आणि शेखू एकाच वेळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात असताना आपसी दुष्मनीतून मोठी समस्या निर्माण झाली होती.हाजीचे काही नक्षल कनेक्शन आहे काय? याचा एटीएस व्दारे शोध घेण्यात येत आहे.

  बुधवारी नागपूरच्या या भागातील वीज पुरवठा राहणार बंद

बुधवारी नागपूरच्या या भागातील वीज पुरवठा राहणार बंद

नागपूर/प्रतिनिधी:

अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीसाठी तसेच मेट्रो रेल्वेच्या कामासाठी बुधवार दिनांक ६ फेबुवारी रोजी दक्षिण आणि पश्चिम नागपुरातील काही भागात वीज पुरवठा बंद राहणार आहे. 

सकाळी १० ते दुपारी १ वेळेत रामकृष्ण नगर,अजनी चौक, देवनागरी,सावर्करनागर, विकास नगर,साई मंदिर परिसर, दंतेश्वरी, सुरेंद्र नगर, नेहरू नगर,संताजी कॉलेज परिसर, जयताळा, दुबे ले आऊट,दाते ले आऊट, प्रगती नगर,संघर्ष नगर ,शिवाजी नगर, हिल रोड,शंकर नगर, दीनदयाल नगर, पडोळे हॉस्पटिल, प्रताप नगर,गोपाळ नगर, गिट्टीखदान ले आऊट, सुभाष नगर,हिंगणा रोड, शास्त्री ले आऊट, जीवन छाया सोसायटी, रवींद्र नगर,हुडकेश्वर,चंदन शेष नगर, नरसाळा ,दुर्गधामणा,सुराबर्डी,वडधामना येथील वीज पुरवठा बंद राहील. 

सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत नागपूर विद्यापीठ परिसर, हिल टॉप, देवतळे ले आऊट, वर्मा ले आऊट,उत्तर अंबाझरी मार्ग, पांढराबोडी अंबाझरी टेकडी, बजाज नगर,माधव नगर,श्रद्धानंद पेठ, डाग ले आऊट, कार्पोरेशन कॉलनी येथील वीज पुरवठा बंद राहील. सकाळी ९ ते १२ या वेळेत अजनी रेल्वे सॅटिन, मेडिकल कॉलनी, धंतोली येथील वीज पुरवठा मेट्रो रेल्वेच्या कामासाठी बंद राहील. याच वेळेत भेंडे ले आऊट, पन्नासे ले आऊट, सोनेगाव,जयप्रकाश नगर,राजीव नगर येथील वीज पुरवठा बंद राहील. सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत रामदास पेठ परिसरातील वीज पुरवठा बंद राहील.
 कामठीत वीज वाहिनीचे लोकार्पण

कामठीत वीज वाहिनीचे लोकार्पण

नागपूर/प्रतीनिधी:
कामठी शहराला नागपूरचे उपनगर म्हणून विकसित करीत असल्याने या परिसरात सक्षम वीज वितरणसह अन्य विकास कामे मोठ्या प्रमाणात होत असून याचा लाभ येथील जनतेला मोठ्या प्रमाणात होणार आहे. असे उद्गार राज्याचे ऊर्जा,नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे काढले. 
  ड्रॅगन पॅलेस येथील येथील वीज उप केंद्रात नव्याने उभारण्यात आलेल्या
 १० एमव्हीए क्षमतेच्या रोहित्राचे लोकार्पण करताना ना. बावनकुळे
महावितरणच्या वतीने कामठी शहरात उभारण्यात आलेल्या नवीन वीज वाहिनीचे लोकार्पण आणि भाजी मंडी-कोळसा टाल या नवीन वाहिनीच्या कामाचे तसेच ड्रॅगन पॅलेस येथील येथील वीज उप केंद्रात नव्याने उभारण्यात आलेल्या १० एमव्हीए क्षमतेच्या रोहित्राचे लोकार्पण ना. बावनकुळे यांच्या हस्ते झाले. ड्रॅगन पॅलेस वीज उपकेंद्रात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे तर कामठी नगर परिषद अध्यक्ष मो. शहाजहाँ शफाअत अन्सारी, उपाध्यक्ष मतीन खान, जिल्हा विद्युत नियंत्रण समितीचे अध्यक्ष प्रा. गिरीश देशमुख, कामठी तालुका विदुयत नियंत्रण समितीचे अध्यक्ष मोबीन पटेल विशेष उपस्थित होते. 

ड्रॅगन पॅलेस मुळे कामठी शहराची जगात ओळख निर्माण झाली आहे. येथे मोठ्या प्रमाणात भाविक येतात. येथील वीज वितरणाचे जाळे मजबूत होत आहे. सोबतच पथ दिवे आणि पाणी पुरवठ्यासाठी साधारण २ मेगा वॅट विजेची गरज भासणार आहे यासाठी नगर पालिकेने जागा दिल्यास हा सौर ऊर्जा प्रकल्प सुरु करता येईल यासाठी शासनाकडून १२ कोटी रुपयांचा निधी देण्याची तयारी यावेळी दाखवली. 

कामठी परिसरात भूमिगत वीज वाहिनीची कामे करतेवेळी वॉर्ड पातळीवर कामाचे नियोजन करून ती पूर्ण करण्याची सूचना ना. बावनकुळे यांनी यावेळी महावितरण अधिकारी वर्गास केली. कामठी ड्रॅगन पॅलेस येथील वीज उपकेंद्रात २० एमव्हीए क्षमतेचे २ रोहित्र उभारण्यात आल्याने परिसरास दर्जेदार वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे. अशी माहिती नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी संचालक दिलीप घुगल यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली. यावेळी अधीक्षक अभियंता (पायाभूत आराखडा)उमेश शहारे, नागपूर ग्रामीण मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, मौदा विभागाचे कार्यकारी अभियंता अमित परांजपें उपस्थित होते. 


प्रत्येक खेळाडूंनी आपल्या अंगी खिलाडूवृत्ती जोपासावी

प्रत्येक खेळाडूंनी आपल्या अंगी खिलाडूवृत्ती जोपासावी

वाडी पोलीस निरीक्षक नरेश पवार 
वाडीत जिल्हास्तरीय महिला-पुरुष कबड्डी स्पर्धा
वाडी(नागपूर) /अरुण कराळे: 

क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविल्यास त्याचा फायदा पुढे स्पर्धा परीक्षा,पोलीस विभाग,मिलिटरी,अशा प्रशासकीय सेवेत होतो,खेळात प्रामाणिक राहिल्यास आपले यश कोणीच हिरावू शकत नाही .खेळाडूनी विजयी झाल्यास त्याचा जास्त अतिरेकी विजय साजरा न करता पराभूत संघालाही तेवढ्याच आत्मयीतेने धीर दिला पाहिजे,पराभूत होऊनही आपल्या खिलाडूवृत्तीमुळे तो खेळ दीर्घकाळ समरणात राहतो,त्यासाठी प्रत्येक खेळाडुनी आपल्या अंगी खिलाडूवृत्ती जोपासावी असे मार्मिक मार्गदर्शन स्पर्धेचे उदघाटन प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांनी केले.
दत्तवाडी येथील गजानन सोसायटी क्रीडा मैदानावर नगर परिषद वाडी नगराध्यक्ष चषक अंतर्गत नागपूर जिल्हास्तरीय महिला-पुरुष व वाडी विभाग शालेयस्तर आयोजीत कबड्डी स्पर्धेचे उदघाटन वाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांचे हस्ते व नगराध्यक्ष प्रेमनाथ झाडे यांचे अध्यक्षतेखाली तसेच उपनगराध्यक्ष राजेश थोराने,मुख्याधिकारी राजेश भगत,क्रीडा व सांस्कृतिक सभापती मीरा परिहार,पाणी पुरवठा सभापती नीता कुनावार,महिला बालकल्याण सभापती कल्पना सगदेव,बसपा गटनेता अस्मिता मेश्राम यांच्या उपस्थितीत करण्यात आले .
यावेळी नगरसेवक केशव बांदरे,मंजुळा चौधरी,राकेश मिश्रा सामाजिक कार्यकर्ते सतीश जिंदल,मानसिंग ठाकूर, प्रणय मेश्राम ,दिलीप चौधरी,कमलेश बिडवाईक,ज्ञानेश्वर भोयर,अभय कुणावार,संजय जीवनकर,चंद्रशेखर निघोट, पीके मोहनन,जयप्रकाश मिश्रा,राजुताई भोले,ज्योती भोरकर, नंदा कदम,प्रमिला पवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
तीन दिवशीय स्पर्धेत पुरुष संघाकरिता स्व . लालचंद गर्ग यांच्या स्मृती प्रित्यर्थ आकाश गर्ग तर्फे रोख २५ हजार रुपयांचा प्रथम पुरस्कार,स्व .नारायणराव थोराने स्मृती प्रित्यर्थ शैलेश थोराने तर्फे रोख १५ हजार रुपयांचा द्वितीय रोख पुरस्कार,स्व .मातादिनलाल जैस्वाल स्मृती प्रित्यर्थ गौरव जैस्वाल तर्फे ७ हजार रुपयांचा तृत्तीय पुरस्कार तसेच महिला संघाकरिता स्व . पार्वती झाडे यांच्या स्मृत्ती प्रित्यर्थ प्रेम झाडे तर्फे रोख १५ हजार रुपयांचा प्रथम पुरस्कार,स्व . मंजुळा बारई स्मृत्ती प्रित्यर्थ अनिल बारई तर्फे १० हजार रुपयांचा रोख पुरस्कार तर स्व .रंजन केचे स्मृती प्रित्यर्थ संतोष केचे तर्फे ५ हजार रुपयांचा रोख पुरस्कार देण्यात येणार आहे.
स्पर्धेचे पंच म्हणून सचिन सूर्यवंशी,धनंजय चवळे,राजेश बालपांडे,अक्षय ठवकर,विजय मसराम,नितीन खरे,राजू विश्वकर्मा हे जबाबदारी सांभाळत आहे.जिल्ह्यातील २६ संघांनी आजपर्यंत नोंदणी केली आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी राजेश भगत,संचालन उपमुख्याधिकारी आकाश सहारे,तर आभार प्रदर्शन संदीप अढाऊ यांनी केले.