সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, April 23, 2010

200 झोपड्यांवरून जाणार रिंगरोड

200 झोपड्यांवरून जाणार रिंगरोड

सकाळ वृत्तसेवा
Thursday, April 22, 2010

चंद्रपूर - शहराच्या बाहेरून होऊ घातलेल्या रिंगरोडमुळे नेहरूनगर परिसरातील सुमारे 200 झोपड्या हटविण्यात येणार आहेत. या रस्त्याचे बांधकाम सुरू झाले असून, या परिसरात खोदकाम करण्यात येत आहे. दरम्यान, या झोपड्या हटविण्यासंदर्भात कोणतीही सूचना पालिकेने दिलेली नाही. त्यामुळे येथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांना बेघर होण्याची पाळी आली आहे.

औद्योगिक क्षेत्रातून होणारी जडवाहतूक शहरातून असल्याने अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. त्यावर प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने शहराबाहेरून रिंगरोड निर्मितीचा प्रस्ताव मागील चार वर्षांपूर्वी आखण्यात आला. मात्र, कंत्राटदार काम सोडून पळाल्याने रस्त्याचे बांधकाम अर्धवट राहिले. गेल्या महिन्यापासून ते पूर्ववत करण्यात आले असून, विधी महाविद्यालय ते वनराजिक महाविद्यालयापर्यंत रस्ता बांधकाम केला जात आहे. नेहरूनगरातून जाणारा हा रस्ता अगदी झोपडपट्टीतून जातो. त्यामुळे येथील सुमारे 200 झोपड्यांना हटविल्याशिवाय पर्याय नाही. येथे असलेल्या नाल्यावर पूल उभारण्यात येणार आहे. त्यामुळे झोपड्या उद्‌ध्वस्त होतील, हेही तितकेच सत्य आहे. मोलमजुरी, घरकाम आणि भांडीधुणी अशी कामे करून उदरनिर्वाह करणारी सुमारे 200 कुटुंबे नेहरूनगरात आहेत. कुडामातीने बांधलेल्या झोपड्यांमध्ये ते गेल्या 11 वर्षांपासून जीवन जगत आहेत. गृह, पाणी आणि वीज या करांचा भरणाही गेल्या तीन वर्षांपासून पालिकेकडे केला जातो. मात्र, येथे कोणत्याही मूलभूत सुविधा आलेल्या नाहीत. रस्ता, वीज आणि पाणी यापैकी कोणतीही व्यवस्था येथे करून देण्यात आलेली नाही. असे असतानादेखील येथील नागरिक जीवन जगण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातच हा रिंगरोड झोपड्यांना उद्‌ध्वस्त करणार आहे. त्यामुळे राहायचे तरी कुठे? असा प्रश्‍न येथील लक्ष्मण ठाकरे, गुलाब डुकरे, श्रीधर पेंदोर, शंकर बोरकर, उत्तम साखरकर, ऋषी नागोसे यांना पडला आहे. झोपड्या पाडण्यात येणार असल्याचे सत्य असले तरी झोपडपट्टीवासीयांना कोणतीही लेखी सूचना पालिकेने दिली नाही. केवळ कंत्राटदाराच्या तोंडी सूचनेतून त्यांना घर खाली करण्याचे बजावले जात आहे. यासंदर्भात येथील नागरिकांनी वॉर्डाचे नगरसेवक विठ्ठल डुकरे यांच्याकडे धाव घेतली. मात्र, त्यांनीही दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे.
ताडोबा वाचवायचे असेल,तर...

ताडोबा वाचवायचे असेल,तर...

ताडोबा वाचवायचे असेल,तर...
Thursday, April 22, 2010
माहिती संकलन प्रमोद काकडे, चंद्रपुर

उन्हाळ्यामध्ये ताडोबा अभयारण्याकडे पर्यटकांची रीघ लागते. येथील दाट झाडी असलेले जंगल, फुले व फळांचे विविध प्रकार, अनेक जातींचे पक्षी व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे येथील वाघ हे पर्यटकांचे आकर्षण. मात्र, ताडोबाचे जंगल, वाघ, तेथील आदिवासी व वनाधिकारी अनेक समस्यांना सामोरे जात आहेत. अभयारण्यातील या प्रत्येक घटकाच्या आजच्या स्थितीचा व भवितव्याचा हा आढावा...

वनरक्षकांच्या समस्याही महत्त्वाच्या!
वनरक्षकांच्या प्रयत्नांमुळे जंगलातील वाघ सुरक्षित.
जंगलामध्ये लागणाऱ्या वणव्यांवर नियंत्रणासाठी प्रयत्न.
शिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवल्याने वाघांचे संरक्षण.
आदिवासींना कायदा समजावून सांगत जंगलाचे रक्षण करण्याचा प्रयत्न.

साधनसामग्री अपुरी
संरक्षणास पुरेसे कर्मचारी नाहीत.
वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांचा अनुशेष.
अंतर्गत भागात काम करण्यास चांगल्या अधिकाऱ्यांची तयारी नाही.
अभयारण्यात राहण्यास वन कर्मचारी धजावत नाहीत. या कर्मचाऱ्यांचा मुलांच्या शिक्षणाचा प्रश्‍न.
गस्ती पथके पुरेशी नाहीत.
ताडोबातील जखमी वन्य जीवांवर उपचारासाठी सोय नाही. पशुवैद्यकीय अधिकारी नाही.
वेळप्रसंगी हिंस्र जनावरांना बेशुद्ध करून ताब्यात घेण्यासाठी "टर्नाक्‍युलायझर' नाही.
ताडोबा व्यवस्थापनाकडे वणव्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नाही.

काय करायला पाहिजे?
वनरक्षकांना अधिक अधिकार.त्यांच्या कुटुंबीयांना सर्व सोयी.
वणव्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठीची अद्ययावत यंत्रणा.
गस्ती पथकांच्या व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संख्येत वाढ.

वाघ वाचला, तरच...
२००७च्या प्रगणनेनुसार ४३ पट्टेदार वाघ, २२ बिबटे.
वाघांच्या वाढीसाठी बांबूचे वन उपयुक्त. त्यामुळे त्यांची संख्या टिकून.
जंगलामध्ये मोठे चढ-उतार नसल्याने वाघ सहज दृष्टीस पडतात व हेच पर्यटकांचे आकर्षण.

... पण शिकार येते मुळावर
वाघांच्या संख्येच्या मानाने खाद्याचे प्रमाण कमी.
शिकारीमुळे तृणभक्षक जनावरांची संख्या कमी होत आहे. याचा थेट परिणाम वाघांवर.
जंगलातील नैसर्गिक जलसाठे कोरडे पडल्यावर शिकार आणि पाण्यासाठी वाघ मानवी वस्तीकडे येतात.
पाणवठ्यांवर अधिकार गाजविण्याच्या प्रयत्नात मानव आणि वाघांचा संघर्ष.
अभयारण्यातील पाणवठे कोरडे पडतात, त्या काळात वाघ पाण्यासाठी कोठे येऊ शकतात, याचा शिकारी टोळ्यांना अंदाज. त्यामुळे शिकारींत वाढ.

काय करायला पाहिजे?
शिकाऱ्यांपासून वाघांच्या संरक्षणासाठी प्रयत्न.
वर्षभर पाणी मिळण्यासाठी पाणवठे वाढविणे.
मनुष्याचा हस्तक्षेप होणार नाही यासाठी प्रयत्न.

जंगलाला दृष्ट लागतेय...
प्राणी वैज्ञानिकांना, वन्य जीव अभ्यासकांना, तसेच हौशी पर्यटकांनादेखील ताडोबा अभयारण्याचे आकर्षण.
भारतीय वन कायदा ७ अन्वये, फेब्रुवारी १८७९पासून "संरक्षित वन'.
१९९५पासून ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता.
अभयारण्याची व्याप्ती ५७८.५१ चौरस किलोमीटर (११६.५५ वर्ग किलोमीटर ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि ४६१.९६ वर्ग किलोमीटर अंधारी वन्य जीव अभयारण्य)
वन्य प्राण्यांची तृष्णा भागविण्यासाठी कोलसा येथील तलावाखेरीज १० तलाव.
उच्च दर्जाच्या बांबूची पैदास.
स्थानिक आदिवासींच्या मते, "तारू' नावाचा त्यांचा पूर्वज येथे वाघाशी लढताना मारला गेला. त्याच्या स्मरणार्थ या भागाचे नाव ताडोबा.
अभयारण्यातील नैसर्गिक जलाशयाच्या काठावर "तारू'चे मंदिर.

कशामुळे?
सध्या उपलब्ध क्षेत्र वन्य जीव व वाघांसाठी पुरेसे नाही.
मोठ्या प्रमाणात वनसंपदा आणि वन्य जीव असताना पर्यटनस्थळ म्हणून विकसित होऊ शकलेले नाही.
बांबू तस्करीत वाढ. त्यामुळे वाघांचे अस्तित्व धोक्‍यात.
पर्यटकांसाठी सोयींचा अभाव.
तीव्र उन्हाळ्यामध्ये पाण्याची उपलब्धता मर्यादित.

काय करायला हवे?
वन्य प्राण्यांच्या वावरासाठीची जागा वाढविणे.
जंगल वाढण्यासाठी प्रयत्न.
जंगलांना वणवे लागू नयेत यासाठी योजना.
बांबूची तस्करी रोखण्यासाठी प्रयत्न.
जलसाठा वाढविण्यासाठी योजना.

मूळ रहिवाशांवर अन्याय का?
ताडोबातील मूळ रहिवासी असल्याने जंगलावर अधिकार.
पैसा ही गरज नाही, तर शिकार करून मांस खाणे ही नैसर्गिक गरज.
जंगलावर प्रेम असल्याने जंगल वाचविण्यासाठी प्रयत्न.
जंगलावर आयुष्य अवलंबून असल्याने त्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न.

वन विभागाशीच वादाचे प्रसंग
१९९६मध्ये संरक्षित क्षेत्र घोषित झाल्याने आदिवासींना जंगलापासून दूर व्हावे लागले.
काम मागण्यासाठी गेलेल्या आदिवासींचे व्यावसायिकांकडून शोषण.
शाळा, वीजपुरवठा, रस्ते व पाण्यापासून वंचित.
रानमेवा मिळविण्यासाठी आदिवासी जंगलाला आगी लावतात. त्यामुळे बांबू व तृणभक्षक जनावरांसाठी आवश्‍यक झाडांची राखरांगोळी.
जंगलाला लागलेल्या आगींचा परिणाम तृणभक्षकांच्या वाढीवर व वाघांच्या संख्येवर.
ताडोबा अभयारण्य झाल्यानंतर परिसरातील आदिवासी आणि वन विभागाचा संघर्षात वाढ.
रानडुकरे व नीलगाईंमुळे पिकांचे नुकसान.
वनहक्क कायद्यानुसार आदिवासी आपल्या अधिकारांचा वापर करतात, तर याच कायद्याचा आधार घेऊन त्यांच्या नावाने इतरांकडून वनांचे नुकसान.याचा त्रास आदिवासींना. त्यामुळे आदिवासींमध्ये वन विभागाप्रती नेहमीच असंतोष.
रानमेव्यातून मिळणारी खनिजे कमी झाल्याने आदिवासींचे कुपोषण.

काय करायला पाहिजे?
आदिवासींच्या प्रगतीसाठी जंगलातील संपत्तीमध्ये त्यांना भागीदार करवून घेणे गरजेचे.
विस्थापित आदिवासींच्या प्राथमिक गरजा शासनाने पूर्ण कराव्यात.
जंगलातील संपत्तीवर आदिवासींचा हक्क हवा.
अभयारण्यासंदर्भातील कायद्यांची योग्य माहिती त्यांना द्यावी.
जनावरांमुळे पिकांची हानी झाल्यास त्वरित भरपाई मिळावी.
रानमेवा मिळणे अशक्‍य झाल्याने त्यांच्या पोषणासाठी सरकारने प्रयत्न करावेत.
पर्यटकांसाठी गाइड म्हणून काम करणे, वनातील फुले, फळे व मधासारख्या गोष्टी विकण्यासाठी सरकारने मदत करणे गरजेचे.

पर्यटक तर यायलाच हवेत..
सोयी, गैरसोयी
अभयारण्यामध्ये चढ-उतार नसल्याने वाघांना पाहणे सोपे.
ताडोबाचा प्रमुख जलाशय पक्षिनिरीक्षकांचे आवडते ठिकाण. संपूर्ण जलाशयाला परिक्रमा करता येईल, असा जीपने प्रवासयोग्य मार्ग.
ताडोबापासून १८ किलोमीटरवर असलेल्या मोहर्ली येथे काही खासगी रिसॉर्ट आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने राहण्याची व्यवस्था.
"मगर प्रजनन केंद्रा'तून सोडलेल्या मगरी काठावर पहुडलेल्या पाहायला मिळतात.
ताडोबाच्या आतील पर्यटकांसाठी असलेले रिसॉर्ट व्याघ्रसंरक्षणासाठी आता बाहेर.
खासगी रिसॉर्ट सामान्य पर्यटकांना परवडत नाही.
चंद्रपूर बस स्थानक आणि रेल्वे स्थानकापासून ताडोबाचे अंतर ४५ किलोमीटर. ताडोबाला जाण्यासाठी वन विभागातर्फे सोय नाही. राज्य परिवहन महामंडळाच्या दोन बस. त्यांच्या वेळा सकाळी आणि सायंकाळी. (ताडोबामध्ये पर्यटकांना सकाळी ६ ते ९ आणि दुपारी ३ ते ५ या वेळात प्रवेश.)
खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट.
ताडोबाच्या पर्यटकांसाठी सुरू केलेली डेक्कन ओडीसी ही रेल्वेसुद्धा सेवाग्रामपर्यंतच.
ताडोबाच्या आत पर्यटकांना फिरविण्यासाठी खासगी वाहने आहेत; मात्र त्यांचेही दर ठरलेले नाहीत.
व्यवस्थापनाने सर्वसामान्य पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वाहतूक आणि राहण्याचा प्रश्‍न प्रथम सोडविण्याची गरज.
बस आणि रेल्वे स्थानकांवरून पर्यटकांना ताडोबाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोचविण्याची व्यवस्था नाही.

... पण, हे तारतम्यही हवे
जंगलातील झाडे व फुलांना बाधा पोचवू नये.
वन्य प्राणी बिथरतील असे वर्तन करू नये.
मोठ्या हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा आदिवासींच्या सहवासात राहिल्यास त्यांना रोजगार मिळेल.
अभयारण्यामध्ये प्लास्टिकचा कचरा करू नये.

प्रश्‍न बफर झोनचा
ताडोबा अभयारण्य वाचविण्यासाठी व्याघ्रप्रकल्पाच्या कोअर झोनभोवती बफर झोन प्रस्तावित. हे ११०१.७७ चौ.कि.मी क्षेत्र राखीव. यात ७९ गावांचा समावेश.
व्याघ्रप्रकल्पाच्या प्रस्तावित क्षेत्रात मोठी खनिजसंपत्ती. या खाणी झाल्यास त्याचा परिणाम सरळ व्याघ्रप्रकल्पावर.
बफर झोन झाल्यास वन्य जीव सुरक्षित.

संकलन : प्रमोद काकडे संबंधित बातम्या
राज्यात वृक्षतोडीवर बंधन आणणार!
लोणारा येथील जंगलात वनाधिकाऱ्यांकडून अवैध वृक्षतोड!
वनहक्क कायद्याबाबतच्या अडचणी दूर करणार - वनमंत्री
बेसुमार वृक्षतोडीमुळे जंगले उजाड
वृक्षतोड रोखणाऱ्या वनरक्षकांना धक्काबुक्की

प्रतिक्रिया
On 4/22/2010 10:36 AM Jitendra Kulkarni said:
धन्यवाद प्रमोद... अतिशय माहितीपूर्ण आणि मुद्देसूद लेख आहे. मी ताडोब्याला गेली २५ वर्षे जात आहे आणि लेखातील सगळेच मुद्दे तेव्हापासून पाहत आहे. कदाचित त्याच्या हि आधी पासून ते तसेच असतील. माझा इ मेल सोबत दिला आहे. जर काही योजना ताडोब्या साठी आखली जात असेल तर कृपया संपर्क करणे हि विनंती.
On 4/22/2010 9:54 AM Dr.Manoj Prabhavat said:
थान्क्स प्रमोद ! हा लेख वाचून ताडोबा प्रकल्पाची पूर्ण कल्पना आली ! खरच वाघांना वाचावाय्साठी खूप काही करायचं आहे आणि मला वाटत कि सरकार ने ह्या बाबत लवकरच काही तरी उपाय करायला पाहिजेत.
On 4/22/2010 9:15 AM Bhagyesh Jain said:
धन्यवाद ! प्रमोद, यासाठी काही योजना आखल्या गेल्यास, आमच्यासारखी सर्व तरुण मंडळी या कार्यात सहभागी होण्यास उत्सुक आहेत.
On 22/04/2010 08:57 प्रशांत said:
वरील सुचविलेल्या उपायांपैकी काही उपाय सोपे आहेत कमीतकमी ते तरी पूर्ण व्हावेत एवढी सरकार कडून अपेक्षा आहे. मागील अंकात जंगल तोडी बद्दल ऐकून फार वाईट वाटले होते. मिझी सरकारला विनंती आहे कि माणसांची नाही तर कमीतकमी जंगली प्राण्यांची तरी काळजी घ्या. काही तरी निर्णय (दिल्लीला विचारून नाही) घ्या.
On 4/22/2010 8:14 AM Rupesh Pansare said:
खूप छान प्रोजेक्ट. सरकारने याकडे लक्ष्य द्यायला हवे.... धन्यवाद प्रमोद.
On 4/22/2010 5:26 AM atul kumthekar said:
ताडोबा प्रकल्प पुण्यात आणावा ! मग बिल्डर्स हळू हळू त्याचे कोन्क्रेतिज़तिओन करतील आणि पर फमिली एक वाघ पाळलाच पाहिजे असा नियम राष्ट्रवादी सरकार करेल !
On 4/22/2010 4:50 AM sandeep said:
धन्यवाद ! मुद्देसूद लेख वाचून लवकर व प्रखरपणे समजले.
On 4/22/2010 1:34 AM satish patil said:
केंद्रीय पर्यावरण मंत्र्याच्या पासून , झाड तोडणार्या गुन्हेगारापर्यंत ची भ्रष्टाचाराची लिंक नष्ट केली तरच भारतातले झाड वने विसरा झाड वाचेल . व्याघ्रप्रकल्प वागिरे लांबच्या गप्पा आहेत .

^^^^^^^^^^^^^^^^^^
'ताडोबा'चे संवर्धन होणे गरजेचे

चंद्रपूर - वनांचा होणारा ऱ्हास व त्यामुळे धोक्‍यात आलेले वन्यजीव यामुळे पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. वन्यजीव वाचले तर वने वाचतील. याच दृष्टीने "ताडोबा'चे संवर्धन होणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी आज (ता. 22) "सकाळ'जवळ व्यक्त केले.

सातपुडा फाउंडेशनेचे किशोर रिठे म्हणाले, ताडोबा हे केवळ वाघाचेच जंगल नाही, तर परिसरातील नागरिकांच्या जगण्याचा आधार आहे. ताडोबामुळे हवा, पाणी आणि आर्थिक स्रोत उपलब्ध होत आहेत. पिकांसाठी पोषक वातावरण असलेल्या ताडोबाला वाचविण्यासाठी तशी यंत्रणा राबविण्याची गरज आहे.
फ्रेंड्‌स ऑफ ताडोबा नेचर क्‍लबचे नीरज पोतदार म्हणाले,

माणसांमुळे वन्यप्राण्यांना त्रास होत असेल तर ताडोबातील गावांचे पुनर्वसन करण्याची गरज आहे. वन्यजीव क्षेत्रातील संवेदनशील भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता देण्यात यावा, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, शाळेचे विद्यार्थी आणि पर्यावरण अभ्यासकांना ताडोबातील प्रवेश नि:शुल्क करण्यात यावा. व्याघ्रप्रकल्प ताडोबा, मोहुर्ली, कोळसा अशा तीन क्षेत्रांत असल्याने पर्यटकांना एकाच वेळी पाहता येत नाही. त्यामुळे वाहनांची प्रवेशसंख्या वाढविण्यात यावी. जंगलाच्या सीमावर्ती भागातील रस्ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत. त्यामुळे वाहनांना त्रास होतो, त्यांची सुधारणा व्हावी. ताडोबातील पदभरती करताना स्वयंसेवी संस्थांमध्ये काम करणाऱ्या पर्यावरण अभ्यासकांना प्राधान्य दिल्यास वन्यजीवांच्या संरक्षणात मोलाची मदत होऊ शकते.

इको-प्रो.चे निखिल तांबेकर म्हणाले, उन्हाळ्याचे दिवस असल्याने ताडोबा व्याघ्रप्रकल्पात वाहनांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे वादविवाद होऊन कर्मचाऱ्यांना मारहाणीच्या घटना घडतात. आता वाहनांची संख्या 40 करण्यात आली. याच प्रकल्पातील कोळसा क्षेत्र पर्यटनाच्या दृष्टीने चांगले आहे. ही वाहने कोळशाकडे वळविल्यास विकास होईल. दरम्यानच्या काळात कोळसा प्रवेशद्वारावर प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे दूरवरून येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होतो. वाहने वापस पाठविण्यात येतात, ही प्रथा आता बंद केली पाहिजे.
ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे योगेश दुधपचारे म्हणाले,

ताडोबा व्याघ्रप्रकल्प वाचविण्यासाठी बफर झोन लागू करून प्रस्तावित कोळसा खाणींची हकालपट्टी करण्याची गरज आहे. त्यामुळे जंगलाचे रक्षण होऊन वाघांवर आलेली संक्रांत थांबेल.
बछड्यांना जन्म

बछड्यांना जन्म

दोन बछड्यांना जन्म

Friday, April 23, 2010

चंद्रपूर - पाथरी (ता. सावली) वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या मेहा (बुजरुक) बिटात एका मादी बिबट्याने दोन पिल्लांना जन्म दिला. मेहा-मंगरमेंढा मार्गावरील नाल्यात ती पिल्लांसह दोन दिवसांपासून आहे.

ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत येणाऱ्या पाथरी वनक्षेत्रात मेहा (बुजरुक) घनदाट जंगलाचे बीट आहे. जंगलातील पाणवठे आणि गावतलावही कोरडे पडले आहेत. त्यामुळे वन्यप्राणी गावाकडे येत असतात. या जंगलात वाघ आणि बिबट्याचे वास्तव्य आहे. गेल्या काही वर्षांपासून येथे वाघाचा धुमाकूळ सुरू असून, मनुष्यहानी झाली नसली, तरी शेकडो जनावरांचा बळी गेला आहे. जंगलात चरावयास जाणाऱ्या गुराढोरांवर हल्ले होण्याच्या घटना दररोज घडत असतात. मेहा बुजरुक बिटातील मंगरमेंढा मार्गावरील नाल्यात मादी दोन नवजात बछड्यांसह दिसून आली. दोन दिवसांपूर्वीच तिने पिल्लांना जन्म दिला असावा, असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. घटनास्थळी वनरक्षक मोडक आणि वनपाल चौधरी यांनी पाहणी केली. वनविभागाने पथक या बिबट्याच्या संरक्षणासाठी तळ ठोकून आहे. दरम्यान, बिबट्याने दोन बछड्यांना जन्म दिल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच तालुक्‍यातील नागरिकांची पाहण्यासाठी गर्दी होत आहे. मात्र, कोणतीही अनुचित घटना होऊ नये, म्हणून वनविभागाने बंदोबस्त लावला आहे. याच आठवड्यात ताडोबातील एका वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिला. वाघ-बिबट्यांच्या घटत्या संख्येबाबत चिंता व्यक्त होत असतानाच बछड्यांच्या जन्मामुळे वनविभागात आनंद व्यक्त केला जात आहे.

प्रतिक्रिया
On 4/23/2010 5:32 PM Rajesh S Jadhav said:
१४११+२=१४१३

------------------------
ताडोबात वाघिणीचा चार पिल्लांना जन्म
सकाळ वृत्तसेवा
Thursday, April 15, 2010
चंद्रपूर - ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोळसा वनपरिक्षेत्रात एका वाघिणीने चार पिल्लांना जन्म दिला. त्यांच्या सुरक्षेसाठी "कॅमेरा ट्रॅपिंग'द्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे.
बोटेझरी बिटात गुरुवारी सायंकाळी वनरक्षकांना एक वाघीण चार पिल्लांसह जंगलात दिसली. ताडोबाचे क्षेत्र संचालक संजय ठाकरे यांनी पिल्ल अडीच ते तीन महिन्यांचे असल्याचे सांगितले.
------------------------------------------

Thursday, April 15, 2010

जलस्रोत कोरडे

जलस्रोत कोरडे

अग्रो १ स्पेशल
ताडोबातील जलस्रोत कोरडे

चंद्रपूर - वनांतील नैसर्गिक जलस्रोत कोरडे पडल्याने वन्यप्राण्यांचीही पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. सध्या ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात नऊ टॅंकरद्वारे 86 पाणवठ्यांवर पाण्याचा पुरवठा केला जात आहे.
एकूण 625 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेल्या या प्रकल्पात वाघांशिवाय इतरही प्राण्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. 20 ते 25 चौरसमीटर वनक्षेत्रास पाण्याचे एक स्रोत गृहीत धरून प्रकल्पात पाणीपुरवठा केला जात आहे. या वर्षी सरासरी पावसाच्या तुलनेत 60 टक्केच पाऊस कोसळल्याने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात असलेले अनेक नैसर्गिक जलस्रोत जानेवारीपर्यंतच तग धरू शकले. त्यामुळे वनाधिकाऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यातच वन्यप्राण्यांसाठीच्या पाण्याचे नियोजन केले. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात ताडोबा, मोहर्ली आणि कोळसा ही तीन प्रमुख वनक्षेत्रे येतात. या क्षेत्रात अनुक्रमे 23, 13 आणि 23 असे एकूण 59 नैसर्गिक पाणवठे आहेत. याशिवाय ताडोबा क्षेत्रात पाच आणि कोळसा क्षेत्रात आठ पाणवठ्यांचे खोलीकरण करण्यात आले आहे. मोहर्ली क्षेत्राच्या सीमेवर असलेले आणखी पाच छोटे पाणवठे आहेत. सद्यःस्थितीत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात 77 नैसर्गिक पाणवठे आहेत. तथापि हे पाणवठे पुरेसे नसल्याने मागील काही वर्षांपासून टप्प्या टप्प्यांत एकूण 55 कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. यात ताडोबातील 21, तर मोहर्ली आणि कोळसा क्षेत्रातील प्रत्येकी 17 पाणवठ्यांचा समावेश आहे. जानेवारी महिन्यातच नैसर्गिक पाणवठे कोरडे पडू लागल्याने वनविभागाने या वर्षी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात 14 पाणवठे नव्याने तयार केले. सद्यःस्थितीत ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात 86 कृत्रिम पाणवठ्यांत सात टॅंकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. यासोबतच 60 नैसर्गिक पाणवठ्यांत वन्यप्राण्यांची तहान भागू शकेल, इतके पाणी आहे. 20 ते 25 चौरस किमी वनक्षेत्रास एक पाणवठा याप्रमाणे वनविभागाने पाण्याचे नियोजन केले आहे.

Monday, April 12, 2010

समाजाची शिकार बनलेलं जगणं!

समाजाची शिकार बनलेलं जगणं!

पारध्यांना अद्यापही किती भयानक परिस्थितीत जीवन जगावे लागते, याचं आणखी एक वास्तव चित्रण 'दर कोस दर मुक्काम' या कादंबरीच्या रूपाने अशोक पवार यांनी वाचकांपुढे सादर केले आहे. त्यांच्या 'बिराड' या आत्मकथन पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीसमवेत हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. 'बिराड'चा पुढचाच भाग म्हणजे 'दर कोस दर मुक्काम' आहे. 'बिराड' हे पवार यांचे आत्मचरित्र आहे, त्यात बेलदार जमातीचे चित्रण केलेलं आहे. चरितार्थासाठी दगड फोडण्याचे काम करणारे लोक या बेलदार जमातीचे आहेत. तीही भटकीच जमात आहे.

बेलदार जमातीप्रमाणेच पारध्यांनाही धड माणसांप्रमाणे नाही आणि जनावराप्रमाणेही नाही, अशा अत्यंत भयानक प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगावे लागते. दोन दिवस आश्रयाची सावली मिळेल या अपेक्षेने त्यांना एका गावांहून दुसऱ्या गावात आपला बिराडांचा मुक्काम हलवावा लागतो. परंतु, आश्रयाची सावली टप्प्यात येत नाही, तोच त्यांच्यावर अनेक आरोप करून त्यांना हुसकावून लावण्यात येते. माणसाने माणसाला केवळ माणूस म्हणून नव्हे तर जनावराप्रमाणे तरी आश्रय मिळावा, इतकीही अपेक्षा या पारधी समाजाला करता येत नाही. या समाजाने जगावे म्हटले तरी गावकरी, पोलीस, लोकप्रतिनिधी आणि मीडिया जगू देत नाहीत. शिक्षण व सुधारणा तर बाजूलाच राहिल्या.

लेखकाने पारध्यांवर होणाऱ्या अनेक अत्याचारांचे वर्णन कादंबरीच्या रूपाने चव्हाट्यावर आणले असून, ते वाचून वाचकांचे मन सुन्न होते. पारधी समाजातील चालीरीती, बायापुरुषांच्या मनातील स्पंदने त्यांच्याच भाषेत अचूक व्यक्त करण्यात लेखक यशस्वी झाला आहे.

तळेगावच्या गोदरीत असलेल्या पारध्यांच्या सातआठ बिराडांतील वडील माणूस, लकसीमन बुढा, हिवाळा आला म्हणून बिराडे हलविण्यास निघाला. तेव्हा बिराडातील नाम्यानं नव्या मुक्कामाच्या गावाबाबत शंका काढली, 'शाहर गाव हाय, तितं पोलिसाईचा तरास भारी असतुया. खेड्यापाड्यात चला, तितं पोलिसाईचा तरास नसतुया.'

त्यावर लकसीमन बुढा, आपल्या अनुभवाचे बोल त्यांना सुनावतो, 'आता कितीभी नादर म्हणाल, तरी पोलीस तिवढ्यापुरता तरास दिनारच. पोलिसाची जात अन कुतऱ्याची जात सारखीच असतीया. कुतरं कवा भुकंल याचा नेम नसत, आन् पोलीस कवा आपली धरपकड करील, याचा नेम नसतं, हे ठाव न्हाई काय आपल्याला?'

पोलिसांबाबत आलेल्या अनुभवातून लकसीमन बुढा सर्वांना ऐकवतो व संपूर्ण कादंबरीत वाचकांनाही या सत्याचा प्रत्यय वारंवार येत जातो. एका खोट्या प्रकरणात पारध्यांना अडकवून पोलीस ठाण्यात नेत असताना लकसीमन बुढास पोलीस जीपमध्येच इतके मारहाण करतात, की तो बिचारा प्रवासात जीपमध्येच मरून जातो. मरण पावल्यावर पोलीस त्याचे प्रेत जंगलात फेकून देतात, आणि जीपमध्ये सांडलेले बुढाचे रक्त इतर कैद्यांना धुवून काढायला लावतात. इतकंच नाही तर कुठेही 'ब्र' न काढण्याचा त्यांच्याकडून शब्द घेतात.

दर कोस मुक्काम बदलत बिराडे फिरत असतात. मुक्कामच्या ठिकाणी उपजीविकेसाठी शिकार केली तर पोलीस व वनरक्षक पकडतात. अटक करण्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील छोटीमोठी शिकार लुटतात. भिक्षेसाठी दारोदार फिरणाऱ्या बायकांना कोणी दारापुढे उभे करीत नाहीत. इतरांप्रमाणे दारू बनवून विकली तर स्थानिक गावगुंड व लोकप्रतिनिधी फुकट दारू पितात. पैसे मागितले तर मारझोड करून उलट पोलिसांत तक्रार करतात, असे प्रसंगही कादंबरीत आहेत. हा अर्थातच पारध्यांचा नेहेमीचा अनुभव.

अशा या अत्याचारांत पिचून निघालेल्या पारध्यांना कांबळे नावाचा एकमेव पोलीस इन्स्पेक्टर देव म्हणून भेटतो. तो या पारध्यांवर होणाऱ्या अन्यायातून त्यांची सुटका करतो, पारध्यांच्या मुलांना आश्रम शाळेत प्रवेश मिळवून देतो. परंतु, गावगुंड व लोकप्रतिनिधी या इन्स्पेक्टवर पारध्यांकडून पैसे खाऊन त्यांना संरक्षण देत असल्याचा आरोप करून त्या इन्स्पेक्टरची गडचिरोलीला बदली करण्यास गृहखात्यास भाग पाडतात. त्यात स्थानिक आमदाराचा भाऊ आघाडीवर असतो. त्याने एका सहकारी बँकेचे लाखो रुपये बुडविलेले असतात, परंतु, कांबळे यांच्या जागी आलेले नवे इन्स्पेक्टर त्याला अभय देतात आणि पारध्यांवर तुटून पडण्याचा आदेश पोलिसांना देतात.

चोरीच्या खोट्या तक्रारीवरून पारध्यांना पकडणारे, रात्री त्यांच्या बिराडांवर छापे टाकून त्यांचे पाल उद्ध्वस्त करून, महिलांवर लैंगिक अत्याचार करणारे, पारध्यांना पिटाळून लावणारे पोलीस हे सर्व परिणामकारक चितारले आहे.

अशा प्रतिकूल परिस्थितीतही आश्रमशाळेत दहावीपर्यंत शिकून सुखाने जगण्याचं स्वप्न बघणाऱ्या गुलब्या या मुलाचे स्वप्नही पोलिस उद्ध्वस्त करतात.

स्वातंत्र्यानंतर सहा दशके उलटून गेली आहेत आणि पुरोमागित्वाचा टेंभा मिरवणारे आपले राज्य सुवर्णमहोत्सव साजरा करीत आहे. तरीही पददलित, भटक्या जमातीस किती उपक्षेने जगावं लागत आहे, याचे वास्तव दर्शन घडवण्यात लेखक यशस्वी ठरला आहे.

...जॉन कोलासो
.................................................................

बिराड : (चौथी आवृत्ती)

पाने : १८८ किंमत : १८०

दर कोस दर मुक्काम

पाने : १९६ किंमत : १९० रुपये

दोन्ही पुस्तकांचे लेखक : अशोक पवार

मनोविकास प्रकाशन, पुणे आणि मुंबई

Saturday, April 10, 2010

रक्तचिंब छिन्नविच्छिन्न मृतदेहांचा खच

रक्तचिंब छिन्नविच्छिन्न मृतदेहांचा खच

प्रमोद काकडे - सकाळ वृत्तसेवा
दंतेवाडा - शहीद जवानांचे मृतदेह ताब्यात घेत ते सुरक्षितस्थळी हलविण्याचे जिकरीचे काम सुरू झाले असून, रक्ताने भिजलेले 41 मृतदेह घटनास्थळापासून 70-80 किलोमीटरवरील सुकमा येथे नेण्यात आले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले उर्वरित छिन्नविच्छिन्न मृतदेह हेलिकॉप्टरने हलविण्याचे काम उशिरा रात्रीपर्यंत सुरू होते.

नक्षलवाद्यांनी केलेल्या रक्तपातानंतर परिसर दहशतीखाली असून, पोलिस यंत्रणा जोमाने मदतकार्यात लागली आहे. घटनास्थळावरून पोलिसांची सर्व शस्त्रे नक्षलवाद्यांनी पळविली असून, केवळ एकच रायफल पोलिसांना मिळाली. सुकमा परिक्षेत्रातील जंगलाचा विस्तार 3448 वर्ग किलोमीटर असून, पर्वतीय क्षेत्र असल्याने प्रामुख्याने मदतकार्य करण्यात अडचणी येत आहेत.

जखमींना जगदलपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत जवानांपैकी काहींची नावे कळली असून, यात सीआरपीएफचे असिस्टंट कमांडंट सत्यवानराव व बाबूलाल मीना यांचा समावेश आहे. सियाराम हा जवानही शहीद झाला आहे. उपचार सुरू असलेल्यांमध्ये हेडकॉन्स्टेबल राज बहादूर, सीमालाकर, आदित्य त्यागी, प्रमोद कुमार, अरविंदकुमार, बलजित, रमेश यांचा समावेश आहे. गेल्या आठवड्यात ओरिसात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात 13 जवान शहीद झाले होते. त्या घटनेनंतर पोलिस सतर्क झाले असले तरी आजच्या घटनेने पोलिस यंत्रणा चांगलीच हादरली आहे.


प्रतिक्रिया
On 09/04/2010 01:01 Rk said:
लाज वाटावी आणि आपल्याच मूर्ख पणाची कीव करावी अशी हि गोष्ट आहे. ओरिसा काय किवा गडचिरोली काय सगळे एकाच. याला जबाबदार आहेत ते आपले नालायक राजकारणी. जे स्वत: च्या स्वार्थासाठी आणि राजकारणासाठी थेट लष्करी/निम लष्करी मोहीम करू देत नाहीत. नक्षल्वद संपवणे मनावर घेतल्यास एवढे अवघड नाही हे नक्कीच. मूढभर नक्षलवदि तेथील जनतेस व सरकारला जर एवढे जेरीस आणत असेल तर आपल्या शूर पोलिसांनी किवा लष्कराने बांगड्या भरल्या नाहीत. एकदाचे हे नक्षल्वदि संपवले तर परत हे होणार नाही. पण आपल्या राजकारण्यांनी बांगड्या भरल्यात
'वेलकम टू हेवन'च्या मागे दडला भेसूर चेहरा

'वेलकम टू हेवन'च्या मागे दडला भेसूर चेहरा

by Pramod kakade, Repoter(chandrapur)
सुकमा (जि. दंतेवाडा) - चिंतलगुफा घटनास्थळापासून 12 किलोमीटर अंतरावर केंद्रीय राखीव पोलिस दलाचा कॅम्प आहे. या कॅम्पच्या प्रवेशद्वारावरच "वेलकम टू हेवन' असे लिहिलेले आहे. इथून पुढे प्रवेश केल्यानंतर दुर्दैवाने येथील स्वर्गाऐवजी नरकसदृश स्थितीची कल्पना येते. निसर्गाची मुक्त उधळण असलेल्या या परिसराला नक्षलवादी आणि पोलिसांच्या वास्तव्याने अक्षरश: नरकाचे स्वरूप प्राप्त झालेले आहे.

मंगळवारला चिंतलनारपासून पाच किलोमीटर अंतरावरील मरकानाच्या जंगलात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या 76 जवानांचा नक्षलवाद्यांनी बळी घेतला. त्यानंतर हा परिसर निर्मनुष्य झाला. पोलिस आदिवासींकडे संशयाच्या नजरेने बघत आहेत. चिंतलगुफा येथील कॅम्पमध्येच काही दिवसांपूर्वी शहीद झालेल्या जवानांचे वास्तव्य होते. या घटनेनंतर या कॅम्पमधील वातावरणच बदलले. स्तब्ध झालेले प्रश्‍नार्थक चेहरे इथे बघायला मिळतात. याही परिस्थितीत ते आपले कर्तव्य बजावत आहेत. येथे येणाऱ्या प्रत्येक नव्या चेहऱ्याला संशयाने बघितले जाते. या कॅम्पच्या समोर एका दगडावर इंग्रजीत "वेलकम टू हेवन' असे लिहिलेले आहे. या दगडाच्या मागे तीन वर्षांपूर्वी माओवाद्यांशी लढताना शहीद 12 जवानांचा स्मृतिस्तंभ आहे. याला लागूनच मोठा तलाव आहे. तिथे शेकडो कमळे फुललेली आहेत. प्रथमदर्शनी कुणीही बघितले तर येथे नंदनवन असल्याचा साक्षात्कार होतो; मात्र तो फसवा आहे. याची कल्पना थोड्या दूर अंतरावर गेल्यावर लक्षात येते. ओबडधोबड रस्ते, तुटलेले पूल, जागोजागी नक्षलवाद्यांनी खोदलेले खड्डे याशिवाय येथे दुसरे काहीच नाही.

चिंतलगुफानंतर कांकेरलंका, पोलमपल्ली आणि शेवटचा चिंतलनार कॅम्प आहे. चितलनार कॅम्पमधील जवान शहीद झालेले आहेत. येथे भेट दिली असता जवानांच्या चेहऱ्यावरील संताप ओसंडून वाहत होता.

रस्ताही मृत्यूकडे नेणारा
"स्वर्गात या' म्हणून स्वागत करणाऱ्या चिंतलगुफा ते चिंतलनार यादरम्यान 12 किलोमीटरचा रस्ता "मृत्युमार्ग' झाला आहे. नक्षलवाद्यांनी जागोजागी भूसुरुंग पेरून ठेवलेला आहे. त्यामुळे कधी स्फोट होईल याचा नेम नाही. झाडांलगत प्रेशरबॉम्ब लावलेले आहेत. आज पोलिसांना चार जिवंत बॉम्ब मिळाले. त्यामुळे या मार्गावरून चालताना कधीही मृत्यू समोर उभा राहू शकतो, हे लक्षात घेऊनच गावकरी आणि जवान येणाऱ्यांना सावध करीत आहेत.

गाव की स्मशान?
या घटनेनंतर चितलगुफा, चिंतलनार, कांकेरलंका, पोलमपल्ली ही गावे अक्षरश: निर्मनुष्य झालेली आहेत. गावांत घरे होती; पण दिसत नव्हती ती माणसं. जनावरे मात्र रस्त्यावरच चरत होती. एखादंदुसरे लहान मूल दृष्टीस पडले तेवढेच. या चारही गावांनी हा थरार अनुभवला. पोलमपल्ली येथील लालूसिंग म्हणाले, "उभ्या आयुष्यात अशी घटना अनुभवलेली नाही. दिवाळीच्या फटाक्‍यांचे मोठे आवाज कानावर पडत होते. आम्ही मात्र घरात बसूनच हा थरार अनुभवला. मदत केली तर नक्षलवाद्यांचा त्रास होतो.
आता संशयित म्हणून पोलिसांचा त्रास सुरू होईल.' लालूसिंगशिवाय एकानेही अनोळखी व्यक्तीशी बोलण्याची हिंमत केली नाही.

जागोजागी खुणा
चितलगुफा ते चिंतलनार या मार्गावर नक्षलवाद्यांनी केलेल्या विध्वंसाच्या खुणा स्पष्टपणे जागोजागी दिसतात. रस्त्यावर बांधलेले पूल, शासकीय कार्यालये आणि शाळा स्फोटात छिन्नविच्छिन्न झाल्या आहेत. जमीनदोस्त झालेल्या या इमारती इथल्या नरकस्वरूप परिस्थितीची कल्पना देतात.

प्रथमच 'मोलोटीव-काकटेल'चा वापर
दंतेवाडा जिल्ह्यातील ताडमेटला येथे नक्षलवाद्यांनी पोलिसांवर हल्ला करताना प्रथमच "मोलोटीव-काकटेल' या नावाचे रसायन वापरल्याची माहिती समोर आली आहे.

ताडमेटला येथील नक्षल्यांच्या दलात 76 शहीद झाले होते. या हल्ल्यात नक्षलवाद्यांनी बंदूक, ग्रेनेड, तिरकमठ्यांचा वापर केला होता. मात्र, या जवानांचे मृतदेह हाती लागल्यानंतर त्यांच्या अंगावरील जखमा बघता या हल्ल्यात वेगळे काही वापरले असावे, अशी शंका व्यक्त केली जात होती. ज्या हेलिकॉप्टरने जवानांचे मृतदेह उचलण्यात आले, त्या पायलटच्या सेवेत असणाऱ्या छत्तीसगड पोलिस दलातील ओ. पी. साहू या शिपायाने मृतदेह प्रत्यक्ष बघितले. त्यांनीही यात हा प्रकार वेगळा असल्याचे "सकाळ'शी बोलताना सांगितले होते.
मोलोटीव काकटेल नावाच्या रसायन पेट्रोल आणि पेट्रोलियम जेलीपासून तयार केले जाते. काचेच्या बाटलीत भरून त्याला आग लावून हवेत फेकले जाते. याचा स्फोट होऊन अंगावर पडले की व्यक्ती भाजते. याचाच वापर नक्षलवाद्यांनी या हल्ल्यात केला. बहुतेक जवानांच्या शरीरावर पोळल्याच्या खुणा होत्या. संबंधित बातम्या
रक्तचिंब छिन्नविच्छिन्न मृतदेहांचा खच
निमलष्करी फौजा परत पाठवा
कोंदावाही जंगलात पोलिस-नक्षलवाद्यांत चकमक

प्रतिक्रिया
On 4/9/2010 2:45 PM मराठी मन said:
अशा घटना घडल्यानंतर काय करावं तेच कळतं नाही...आपले ७६ जवान शहिद झाले, वाटते आता तरी शासन जागे होऊन ठोस कार्यवाही करुन नक्षलवाद्यांचा बिमोड करेल....देशाचे रक्षण करण्यासाठी लष्करात भरती व्हायचे आणि देशातील या शक्तींशी सामना करतच मरायचे. आज ७६ तर उद्या १०० शहिद होतील, आपण फ़क्त ’आत्म्यांना शतश प्रणाम’ म्हणायचे आणि पुढील ’आत्म्यांना शतश प्रणाम’ म्हणण्यासाठी तयार व्हायचे. सरकार आश्वासन देत राहणार आपण ते घेत राहणार... बाकी काय! काय करणार...नुसतीच मत मांडून काहीच होणार नाही, काय करायला हवं?????
On 4/9/2010 12:02 PM PRADIP said:
सर्व शहीद जवानांना शतशः प्रणाम! शतशः प्रणाम! शतशः प्रणाम! शतशः प्रणाम!
On 4/9/2010 11:37 AM masum said:
मन सुन्न झालं हे सर्व वाचून ! communist ही आपल्या देशाला लागलेली कीड आहे.हिचा समूळ नायनाट होण आवश्यक आहे. अजून किती जवानांचे आम्ही बळी देणार आहोत?आणि कुठे कुठे?सर्व शहीद जवानांना शतशः प्रणाम!
On 4/9/2010 10:20 AM dipti said:
आमच्या पोलिसांना सलाम ज्यांनी तिथे आपला प्राण गमावला...नक्षल वादी लोक तुम्ही भ्याड आहात..आम्ही तुमचा धिक्कार करतो.....तुम्ही अशा निष्पाप लोकांचे बळी आणि शाप घेतल्यानंतर कधीही सुखी राहू शकणार नाही.
On 4/9/2010 8:47 AM Sachin Arvind Sonawane said:
do we have political will to get out of this mess, are we really going to help our troopers.
On 4/9/2010 4:19 AM aai said:
मन सुन्न झालाय.त्या सगळ्या जवानांच्य आत्म्यांना शतश प्रणाम.. त्या सर्वांच्या कुटुंबियाच्या दुख्खात आम्ही सामील आहोत.एकच वाटते व्यर्थ न हो हे बलिदान
On 09/04/2010 00:54 Ashish said:
काय प्रतिक्रिया देऊ, ह्या सरकारने देशाचे पूर्ण वाटोळा केला आहे. हे साध्या नक्षल् वाद्यांना नाही रोखू शकत, हे काय चीन आणी पाकीस्थान शी लढतील. स्वार्थाची पोळी भाजून झाली की झाले, कोणी मरो की जलो.... सांगा त्या ८३ विधवांना की आमच्या हातून काही चूक घडली ते... ह्यांना देश सांभाळता येत नाही म्हणूनच आज पर्यंत काश्मीर भारतात नाही आहे. देव ह्या देशाचे भला करो...
Thank you.
Your Comment will be published after Screening.
नक्षलवाद्यांच्या दहशतीत 'माटी तिहार'ची लगबग

नक्षलवाद्यांच्या दहशतीत 'माटी तिहार'ची लगबग

नक्षलवाद्यांच्या दहशतीत 'माटी तिहार'ची लगबग
प्रमोद काकडे - सकाळ वृत्तसेवा
सुकमा (जि. दंतेवाडा) - बस्तरच्या घनदाट जंगलातून जाताना रस्त्यात काय पेरलेले असेल, याचा नेम नाही. येथील प्रवास धोकादायक आहे. या प्रवासात वाटेत लाकडाचे ओंडके टाकून वाट अडविली तर..? या परिसरात येणाऱ्या कोणत्याही नवख्या माणसाच्या काळजाचा ठोकाच चुकेल; मात्र तो काही क्षणांसाठीच! कारण वाट अडविणाऱ्या आदिवासी तरुण-तरुणींच्या उत्सवाचा तो एक भाग आहे. याला 'माटी तिहार' या नावाने येथे ओळखले जाते. दोन-चार रुपये दिले की ते वाट मोकळी करून देतात. पैसे दिले नाहीतर दगडफेकीला सामोरे जावे लागते. नक्षलवाद्यांच्या दहशतीची छाया असताना मात्र त्यांच्या उत्साहात तिळमात्र फरक पडलेला नाही.

चार दिवसांपूर्वी सुकमापासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या ताडमेटला जंगलात माओवाद्यांनी 76 केंद्रीय राखीव पोलिस दलांच्या जवानांचा बळी घेतला. त्यानंतर या भागात "हाय अलर्ट' घोषित करण्यात आले आहे. रोजच मृत्यूला सामोरे जाणाऱ्या आदिवासींच्या लेखी या "अलर्ट'ला कवडीचीही किंमत नाही, ते आपल्याच मस्तीत जगत आहेत. येथील आदिवासींच्या उदरनिर्वाहाचे साधन मुख्यत: शेती आणि शिकार आहे. शेतीत प्रामुख्याने गव्हाचे पीक घेतले जाते. आता हंगाम संपलेला आहे. त्यानंतर "माटी तिहार' या उत्सवाला सुरवात होते. सामूहिक शिकार करायची किंवा त्यांच्या भागातून जाणाऱ्या व्यक्तींची वाट अडवून त्यांच्याकडून पैशाच्या स्वरूपात "कर' वसूल करायचा. त्यातून मिळणाऱ्या रकमेतून मौजमजा करायची, असे या उत्सवाचे एकूण स्वरूप आहे. या उत्सवाला प्राचीन अशी परंपरा आहे.

जंगलात आता केवळ आदिवासी शिल्लक आहेत. घनदाट जंगल असूनही चिटपाखरू दिसत नाही. त्यामुळे "सामूहिक शिकार' हा विषय आता मागे पडला. आदिवासी भागातून आता चांगले डांबरी रस्ते झाले आहेत. वर्दळीचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्‍वभूमीवर रस्त्यात ओंडके टाकून वाहने अडवून पैसे वसूल केले जातात. या कामात आदिवासींची मुले, तरुण-युवतींचा पुढाकार असतो. यावेळी ज्येष्ठ मंडळी मात्र रस्त्याच्या कडेला असलेल्या जंगलात लपून असतात. वाहन थांबले की आदिवासी तरुणी वाहनांभोवती फेर धरून नाचतात. या भागातील आदिवासी मुळातच लाजाळू असल्यामुळे पैशाची मागणी स्वत: करीत नाहीत. जेवढे हातावर ठेवाल तेवढ्यात ते समाधान मानतात. पैसे दिले की रानफुले देऊन पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देतात. मात्र, पैसे देण्यास नकार दिला की लपून असलेली आदिवासी ज्येष्ठ मंडळी वाहनावर दगडफेक करण्यासही मागेपुढे बघत नाही. पोलिसांनाही या भागातून जाताना पैसे द्यावे लागतात. जुन्या काळी राजाची वाट अडवून पैशाची मागणी केली जात होती. हा उत्सव शेतीचा हंगाम सुरू होईपर्यंतच असतो.

चहुबाजूंनी पोलिसांची गस्त आणि माओवाद्यांची छाया असताना त्यांच्या उत्सवाच्या उत्साहात काहीच फरक पडलेला नाही. या मार्गाने जाताना मात्र आदिवासींचे असे वेगळ्या प्रकारचे आदरातिथ्य मनावरील ताण हलका करण्यास हातभार लावते<

विश्रांतीसाठी नियमितपणे एकाच ठिकाणी येणे भोवले

प्रमोद काकडे - सकाळ वृत्तसेवा
सुकमा (जि. दंतेवाडा, छत्तीसगड) - मोठ्या घातपातासाठी ओरिसा-छत्तीसगडच्या सीमेवर नक्षली एकत्र आले आहेत, या गुप्तचरांच्या सूचनेकडे केलेले दुर्लक्ष आणि विश्रांतीसाठी जंगलात सातत्याने एकाच ठिकाणाची केलेली निवड या दोन ठळक चुकांमुळे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या 62 व्या बटालियनचे 76 जवान शहीद झाल्याचे बाब समोर आली आहे.

केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या 62 व्या बटालियनचे 82 जवान दंतेवाडा जिल्ह्यातील चिंतलनार ठाण्यात गत सहा महिन्यांपासून तैनात आहे. येथून 80 किलोमीटवर चितलनार आहे. रविवारी हे 82 जवान गस्तीवर निघाले होते. दोन दिवस गस्त घातल्यानंतर मंगळवारला ताडीमेटला या गावाच्या बाहेर विश्रांतीसाठी एकत्र आले. ज्या ठिकाणी हे एकत्र आले, ते खुले मैदान आहे. बाजूला दोनशे मीटर उंचीचे डोंगर आहे. या जवानांचे विश्रांतीचे हे नेहमीचेच ठिकाण होते. त्यामुळे नक्षलवाद्यांनी सुनियोजितरीत्या काल मंगळवारला (ता. 6) डाव साधला. डोंगरावर दबा धरून बसलेल्या जवळपास तीनशे नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर चारही बाजूनी अंदाधुंद गोळीबार केला. पहाटे साडेचारच्या सुमारास जवान विश्रांती घेत असताना हा अचानक हल्ला झाला. जवांनाना सावरायलाही वेळ मिळाला नाही. काही जवानांच्या बंदुकाही त्यांच्यापासून दूर ठेवलेल्या होत्या, तर काहींनी "लॉक' करून ठेवल्या होत्या. त्यामुळे सुरवातीला जवानांकडून नक्षलवाद्यांचा प्रतिकार होऊ शकला नाही. त्यामुळे अर्ध्याहून अधिक जवान काही वेळातच शहीद झाले. ज्यांनी स्वत:ला सावरत झाडाच्या मागे आडोसा शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही मृत्यूला सामोरे जावे लागले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे जवान झाडाच्या मागे आडोसा शोधतील, हे गृहीत धरूनच नक्षलवाद्यांनी आजूबाजूला प्रेशरबॉम्ब लावले होते. यामुळे बळींची संख्या आणखी वाढली. ग्रेनेड, हातबॉम्ब यासोबतच नक्षलवाद्यांनी तीरकमठ्यांनी बेसावध जवानांवर हल्ला चढविला.

काही जवानांकडून प्रत्युत्तरादाखल गोळीबार सुरू असतानाच काही जवानांनी चिंतलनार आणि चिंतागुफा या पोलिस ठाण्यात वायरलेसवरून संपर्क साधला. त्यानंतर या जवानांच्या मदतीसाठी भूसुरुंगरोधक वाहन पाठविण्यात आले. मात्र, चकमक सुरू असलेल्या घटनास्थळापासून पाच किमी अंतरावर स्फोट घडवून नक्षलवाद्यांनी हे वाहन उडविले. सुदैवाने यात केवळ चालक ठार झाला. दरम्यान, ताडीमेटला गावाजवळ जवानांना ठार केल्यानंतर नक्षलवाद्यांनी त्यांची शस्त्रे लुटली. केवळ एके-47 रायफल्स पोलिसांच्या हाती लागली. काही जखमी जवान ठार झाले, असे समजून त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने बोटावर मोजण्याइतके जवान या कारवाईत बचावले.

हालचालीचा सूक्ष्म अभ्यास
केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांच्या हालचालीचा सूक्ष्म अभ्यास केल्यानंतरच नक्षलवाद्यांनी कारवाईचे नियोजन केल्याचे घटनाक्रमावरून स्पष्ट होते. जवान विश्रांतीसाठी एकच ठिकाणी थांबतात, या एकाच सूत्राचा आधार घेऊन नक्षलवाद्यांनी कारवाईची आखणी केली. जवान मोकळ्या मैदानावर थांबत असल्याने सभोवताल असलेल्या भौगोलिक स्थितीचा नक्षलवाद्यांनी पुरेपूर लाभ घेतला. कारवाई सुरू केल्यानंतर जवानांपर्यंत मदत पोहोचू नये, यासाठी घटनास्थळापर्यंत पोचणारे मार्ग खोदून ठेवण्यात आले होते तसेच भूसुरुंग पेरून ठेवण्यात आले होते. पहाटे साडेचार ते सकाळी नऊ वाजेपर्यंत घटनास्थळाच्या पाच किलोमीटरच्या परिसरावर संपूर्णपणे नक्षलवाद्यांचे नियंत्रण होते. नक्षलवाद्यांचा मोठा डाव यशस्वी झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जवानाचा मृत्यू गस्तीवर असताना झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात जवान विश्रांती घेत असताना नक्षलवाद्यांनी हल्ला चढविला. त्यामुळेच मोठी जीवितहानी झाल्याचे घटनास्थळाला भेट दिल्यानंतर स्पष्ट होते.

कालच्या भीषण हल्ल्यामुळे या भागात संतापाचे वातावरण असून, आज कोटा, दोरनापाल, सुषमा या भागात लोकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला.

बस्तरमधील नक्षली घटना
14-15 मार्च 2008 - रानबोदली पोलिस कॅंपवर हल्ला - 55 जवान शहीद
9 जुलै 2008 - उत्पालमेटा पोलिस पथकावर हल्ला-22 जवान शहीद
9 मे 2009 - धमतरीरिसगाजवळ पोलिस पथकावर हल्ला- 12 जवान शहीद
11 जुलै 2009 - राजनांदगाव - मदनवाडा पोलिस मदत केंद्रावर हल्ला - 29 जवान शहीद
6 एप्रिल 2010 - ताडमेटला - सुरला जवानांवर हल्ला - 76 जवान शहीद संबंधित बातम्या
हल्ल्याचा सूत्रधार कटकम सुदर्शन?
नक्षलवाद्यांनी केली 76 जवानांची हत्या
अंगाला हळद लागण्यापूर्वीच हौतात्म्य
'सीआरपीएफ'ने केली पोलिस संरक्षणाची मागणी

प्रतिक्रिया
On 4/8/2010 1:40 PM Mihir said:
यात अटल मृत्यू होणार तो जंगल जपण्यार्या आदिवास्याचा.. आणि विजय होणार भांडवल-दरांचा.. हा प्रश्न फारच वेगळ्या पद्धतीने हाताळला पाहिजे.. या operation मध्ये आदिवासी एक तर मारल्या जातील, किवा भीतीने गाव सोडून शहरात पळतील आणि झोपडपट्टी करून राहतील... जे कि या मोठ्या companies ना हवय.. यात खरच कुणाचा विकास आहे का ?? असेल तर तो नक्कीच या मोठ्या विदेशी कंपन्या आणि इथल्या industrialist चा.....!!!!!!!
On 4/8/2010 1:34 PM Mihir said:
आताच्या घटनेत जे जवान मारले गेलेत , त्यांचे प्राण अमुल्यच आहेत , पण त्यांच्या वर झालेल्या या हल्ल्या मुळे इतर अधिकारी हाच विचार करणार.. कि या नक्षलवाद्यांना गावातल्या लोकांनी माहिती किवा मदत केली.. त्या मुळे निर्दोष आदिवास्यान बद्दल चीड निर्माण होऊन रागाने target केल्या जाणार. आणि दुसर्या बाजूस , जर जवानान कडून काही नक्षलवादी मारल्या गेलेत तर तेही या आदिवासी गवान वरच राग काढणार, या शंके ने कि तुम्हीच पोलीसा ना मदत केलीत.
On 4/8/2010 9:26 AM jaydeep said:
194 lives and counting... hopeless government still waiting for talks...