সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, April 29, 2014

नायब तहसीलदार एसीबीच्या जाळय़ात

नायब तहसीलदार एसीबीच्या जाळय़ात

कोरपना -
स्वस्त धान्य व शेत फेरफारात गोरगरीब धान्य दुकानदार अन् शेतकर्‍यांकडून लूट करणार्‍या येथील महसूल विभागाची मोठी कडी वर्धा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी तोडली. शेतीचा फेरफार करण्यासाठी गरीब शेतकर्‍याला तब्बल २ लाख रुपयांची लाच मागून त्रास देणार्‍या कोरपना येतील नायब तहसीलदार माने यांना ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली. मागील वर्षात चंद्रपूर येथील तहसीलदारालाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते.

येथील तहसील कार्यालयात कार्यरत नायब तहसीलदार माने हे अनेक दिवसांपासून शेतीपयोगी कामासाठी येणार्‍या बर्‍याच शेतकर्‍यांकडून लाच स्वीकारल्याशिवाय कागद टेबलावरून सरकवत नव्हते. अशी ओरड तालुक्यातील शेतकर्‍यांकडून वारंवार होत असे. एका कामासाठी तालुक्यातील ग्रामीण भागातून येणार्‍या शेतकर्‍यांना बर्‍याच हेलपाट्या मारूनही काम होत नव्हते. तालुक्यातील शेरज हेटी येथील रहिवासी मिराबाई डोलकर यांच्या शेतातील शेत सर्व्हे क्र. १0६ आराजी २.९७ चा वाद राजुरा येथील दिवाणी न्यायालयात सुरू होता. या शेतीच्या वादाचा निकाल मिराबाई डोलकर यांच्या बाजूने लागला. न्यायालयाच्या आदेशानुसार सदर शेतीचा फेरफार करण्यासाठी मिराबाई यांचे पुतणे अरविंद डोलकर यांनी नायब तहसीलदार माने यांच्याकडे काही दिवसांपूर्वी अर्ज सादर केला. अर्ज सादर करून बरेच दिवस लोटल्यानंतरही डोलकर कुटुंबीयांचा कागद टेबलावरून सरकलाच नाही. ल्ल



गुंठेवारी प्रकरणात तलाठी राजेंद्र अतकरे निलंबित

गुंठेवारी प्रकरणात तलाठी राजेंद्र अतकरे निलंबित

ब्रम्हपुरी -
गुंठेवारी प्रकरणात गुंठेवारी अधिनियम २00१ चा चुकीचा अर्थ लावित कृषक जमीन अकृषक केल्याप्रकरणी तत्कालीन तलाठी राजेंद्र अतकरे यांना उपविभागीय अधिकारी दीपा मुधोळ यांनी निलंबित केले.

नागभीड मार्गावर साई पेट्रोलपंप असून पेट्रोलपंपाची जमीन विधवा महिला कुंदा मोहन रामटेके हिच्या मय्यत पतीला रवी भैसारे, रामू मेहर व आनंद लांबट यांनी संगनमत करून जमीन हडपली. सदर जमीन भूमापन क्र. ६४/१ आराजी 0.६२ पैकी आराजी 0.१२ हेक्टर आर धोखाधडी करून विकल्या गेली. या प्रकरणात तत्कालीन तलाठी राजेंद्र अतकरे यांनी वरिष्ठ महसूल अधिकार्‍यांचा आदेश नसताना चुकीचा अर्थ लावित आपल्या मजिर्ने जमिनीचा चुकीचा फेरफार केला. तसेच चुकीची आकारणी लावली. या प्रकरणी हा वाद न्यायालयात सुरु होता. अर्जदान कुंदा रामटेके यांनी ब्रम्हपुरी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली होती. त्यानुसार ब्रम्हपुरी उपविभागीय अधिकारी दीपा मुधोळ यांनी प्रकरणाची शहानिशा केली असता दोषी आढळून आलेले तत्कालीन तलाठी राजेंद्र अतकरे यांना २४ एप्रिलला आदेश देवून निलंबित केले. राजेंद्र अतकरे हे सध्या नागभीड येथे तलाठी म्हणून कार्यरत आहेत. या आधीही गुंठेवारी प्रकरणात अनेक अधिकारी नगरपरिषद अधिकारी, बिल्डर यांना अटक व निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील फर्निचरसह संगणक संच जप्त !

जिल्हाधिकारी कार्यालयातील फर्निचरसह संगणक संच जप्त !



*१४ वर्षे चालला न्यायालयीन संघर्ष

चंद्रपूर- दिंडोरा प्रकल्पात अधिग्रहित करण्यात आलेल्या ५ एकर शेत जमिनीचा वाढीव मोबदला मिळावा म्हणून न्यायालयात धाव घेतलेल्या शेतकर्‍याला २ कोटी ८३ लाख ५७ हजार ७४९ रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने प्रशासनाला दिले होते. मात्र, वर्ष लोटूनही वाढीव मोबदल्याची रक्कम संबंधित शेतकर्‍याला मिळाली नसल्याने वरोडा दिवाणी न्यायालयाने जिल्हाधिकारी कार्यालयातील साहित्य जप्त करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार सोमवार, २८ एप्रिल रोजी जप्तीसाठी आलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकर्‍याने जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर हे कार्यालयात उपस्थित नसल्याने त्यांच्या स्वीय सहायकांच्या खुर्ची, टेबलसह १० संगणक संच असा एकूण १.६० लाखाचा ऐवज जप्त केला. या कारवाईने प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

वरोडा तालुक्यातील पवनी येथील प्रदीप रामराव ताजने या शेतकर्‍याची ५ एकर शेती दिंडोरा प्रकल्पासाठी १९९७ मध्ये अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानंतर १९९९ मध्ये १८९४ च्या भूमी अधिग्रहण कायद्यानुसार संबंधित शेतकर्‍याला २२ हजार रुपये प्रति एकर यानुसार मोबदला देण्यात आला. या जमिनीवर सागवानची झाडे असूनही जमिनीचा मोबदला अत्यल्प देण्यात आल्याने प्रदीप ताजने यांनी सन २००० मध्ये दिवाणी न्यायालयात धाव घेत वाढीव मोबदल्याची मागणी केली होती.

तब्बल १४ वर्षे न्यायालयीन संघर्ष चालला. अखेर, ३१ ऑक्टोबर २०१२ रोजी दिवाणी न्यायालयाने २ कोटी ८३ लाख ५७ हजार ७४९ रुपये संबंधित प्रकल्पग्रस्त शेतकर्‍याला द्यावे, असे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानंतर प्रदीप ताजने यांनी संबंधित शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजविले. परंतु, त्यांना वाढीव मोबदल्याची रक्कम मिळाली नाही.

वर्ष लोटूनही वाढीव मोबदला मिळाला नसल्याचे त्यामुळे प्रदीप ताजने यांनी न्यायालयाला कळवताच वरोडा दिवाणी न्यायालयाचे वरिष्ठस्तर न्यायाधीश मा. सी. गणोरकर यांनी २६ एप्रिल २०१३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील साहित्य जप्त करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सोमवारी प्रकल्पग्रस्त शेतकरी प्रदीप ताजने, ऍड. सातपुते, भाजपाचे ओमप्रकाश मांडवकर, राहुल सराफ, धनंजय पिंपळशेंडे, शेखर चौधरी, सुनील देवतळे, शेख जुम्मन रिजवी, विकास खटी आदींनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. परंतु, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर उपस्थित नसल्याने त्यांनी जिल्हा भूसंपादन अधिकारी यांचेकडे वाढीव मोबदल्याची रक्कम देण्याची मागणी केली. परंतु, एवढी मोठी रक्कम देण्यास त्यांनी असमर्थता दर्शविल्यानंतर प्रकल्पग्रस्त शेतकर्‍याने जिल्हाधिकारी कार्यालय १.६० लाखाचा ऐवज जप्त केला.

Sunday, April 27, 2014

ब्रह्मपुरीत पारा ४४ अंशावर

ब्रह्मपुरीत पारा ४४ अंशावर

ब्रह्मपुरी :
 ब्रह्मपुरीच्या भौगोलिक परिस्थितीमुळे शहराचे तापमान दरवर्षी कमाल अंशापेक्षा जास्त पटीने वाढत असते. उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद ब्रह्मपुरीत घेतल्या गेली आहे. काल २५ एप्रिलला ४४ अंश तापमानाची नोंद तर आज २६ एप्रिलला ४३ अंश एवढी नोंद घेण्यात आली आहे. उन्हाच्या काहिलीने नागरिकांनी दुपारच्या वेळेस घराबाहेर निघणे बंद केले आहे. त्यामुळे दुपारी रस्ते ओस पडल्याचे चित्र पहावयास मिळाले.
शहराची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता ब्रह्मपुरी शहर कणखर अशा मुरमाळी दगडावर वसलेले आहे. त्यामुळे पडणार्‍या सुर्यकिरणांनी दगड लवकर तापते. दुपारच्या वेळेस सूर्यकिरणे सरळे रेषेत पडत असल्यामुळे तापमान अधिकच प्रखरपणे जाणवते. शहराच्या सभोवताल पसरलेल्या अनेक राईस मिलमधून निघणारा धूर व कोंढय़ाचे बारीक कण यामुळे वातावरण दूषित होते. त्यामुळेही तापमानात अधिक वाढ होते. 
यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान २५ एप्रिलला ४४ अंश तर आज २६ एप्रिलला ४३ अंश एवढी नोंद करण्यात आली. वाढलेल्या तापमानामुळे शहरातील नागरिकांचे हाल होत आहे.

Wednesday, April 23, 2014

 सहा जणांवर निलंबन; नेतृत्वाचे काय ?

सहा जणांवर निलंबन; नेतृत्वाचे काय ?


चंद्रपूर-चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार संजय देवतळे यांच्या विरोधात प्रचार केल्याबद्दल चंद्रपूरमधील पदाधिकाऱ्यांना फक्त निलंबित केले आहे. जिल्ह्यातील सर्व नेत्यांशी चर्चाकरून ​निलंबित केलेल्यांना सहा वर्षांसाठी बडतर्फ करण्याचा निर्णय येत्या गुरुवारी राज्यातील मतदान आटोपल्यानंतर घेण्यात येणार आहे. मात्र हि पक्ष विरोधी कृत्य करण्यासाठी ज्यांनी प्रवृत्त केले त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे उमेदवारी मिळालेले पर्यावरण व सांस्कृतिक कार्य मंत्री संजय देवतळे यांच्या विरोधात माजी खासदार नरेश पुगलिया गट सक्रिय झाला होता. इतकेच नव्हे तर, त्यांच्या आशीर्वादाने 'आप'चे कार्यालय सुरू झाले. निवडणुकीचा प्रचार ऐन भरात असताना देवतळे यांना स्वपक्षीयांच्या विरोधाला सामोरे जाण्याची वेळ आली. हा विरोध थोपवण्यासाठी प्रदेश काँग्रेसकडे तक्रार केल्यानंतर १० एप्रिलला मतदानादरम्यान शहर अध्यक्ष गजानन गावंडे, महापौर संगीता अमृतकर यांच्यासह ८ जणांना निलंबित करण्यात आले. काँग्रेसने पुगलिया गटाला हा जबर धक्का दिला आहे.
ही कारवाई करताना काँग्रेसने अतिशय गुप्तता बाळगली. आता ही कारवाई उघड होताच, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गजानन गावंडे, महापौर संगीता अमृतकर, स्थायी समिती अध्यक्ष रामू तिवारी, नगरसेवक अशोक नागापुरे, प्रवीण पडवेकर, उषा धांडे, बल्लारपूर नगरपालिकेच्या अध्यक्ष रजनी मूलचंदानी, बल्लारपूर तालुका अध्यक्ष घनश्याम मूलचंदानी या सर्वांना पक्षातून निलंबित करण्यात येत असल्याचे पत्र सरचिटणीस अॅड. गणेश पाटील यांनी जारी केले.
नरेश पुगलिया व त्यांचे पुत्र राहुल यांना दोन वेळा अपयश पदरी पडले. असे असतानाही देवतळे यांच्याविरुद्धचे वैर चव्हाट्यावर आले. सहा महिन्यांपूर्वी प्रकाश देवतळे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती होताच त्यांच्या समर्थकांनी थेट माणिकराव ठाकरे यांच्यावर आरोप लावले. राहुल गांधी यांच्या दौऱ्यात देवतळे यांच्या निष्क्रियता मांडण्यात आली. यानंतरही पुगलिया यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न केले. मात्र, त्यांच्या उमेदवारीला मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांचा तीव्र विरोध होता.
चंद्रपुरातील काँग्रेस शहर अध्यक्ष आणि महापौरांसह अन्य आठ पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पक्ष विरोधी कारवाया करणाऱ्यांना नरेश पुगलिया यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
पर्यावरणप्रेमी बंडू धोतरे @ बिबट थरार

पर्यावरणप्रेमी बंडू धोतरे @ बिबट थरार

आंतरराष्टीय प्रसारमाध्यमांनीही  घेतली दखल

सविस्तर बघण्यासाठी क्लिक करा

पर्यावरणप्रेमी बंडू धोतरे @ बिबट थरार

Tuesday, April 22, 2014

पक्षविरोधी कारवाई -महापौर  निलंबित

पक्षविरोधी कारवाई -महापौर निलंबित

पक्षविरोधी कारवाई -महापौर  निलंबित

चंद्रपूर- चंद्रपूरच्या महापौर संगीता अमृतकर, बल्लापूरच्या नगराध्यक्ष रजनी मुलचंदानी यांच्यासह तीन नगरसेवक आणि दोन पदाधिका-यांना निलंबित करण्यात आले आहे. चंद्रपूर मनपाच्या स्थायी समितीचे सभापती रामू तिवारी, नगरसेवक अशोक नागपुरे, नगरसवेक प्रवीण पडवेकर, नगरसेवक उषा धांडे, बल्लारपूर काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष घनश्याम मुलचंदानी आणि चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गजानन गावंडे यांना निलंबित करण्यात आले. 

Monday, April 21, 2014

बंडू धोतरे रुग्णालयात भरती-

बंडू धोतरे रुग्णालयात भरती-

बिबट्याने मागून पंजा मारला

बल्लारपूर येथे बिबट घरात घुसला .. त्याला पकडण्यासाठी इको प्रो धावून गेली। बिबट्याच्या जेरबंदीत मानद वन्यजीव रक्षक बंडू धोतरे जखमी । बिबट्याने मागून पंजा मारल्याने धोतरे यांच्या कमरेला गंभीर दुखापत झाली आहे. या गावात एक बिबटआज पहाटे थेट एका घरात घुसला अन् एकचदहशत पसरली होती. त्याला पकडण्यासाठी बंडू धोतरे प्रयत्न करीत असतांना बिबट्याने मागून पंजा मारला. बंडू धोतरे यांना चंद्रपूर  रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. 

Saturday, April 19, 2014

गारपीटग्रस्तांना 71.41 कोटींचे वाटप

गारपीटग्रस्तांना 71.41 कोटींचे वाटप

 शेतकऱ्यांनी बँक खात्याची माहिती द्यावी : आयुक्ताचे आवाहन



नागपूर : यावर्षी फेब्रुवारी व मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे नागपूर विभागातील 2 लाख 5 हजार 471 शेतकऱ्यांच्या पिकांचे तसेच फळबागाचे नुकसान झाले होते. या अपादग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज निधी अंतर्गत 25 मार्च रोजी 80 कोटी रुपये व 5 एप्रिल रोजी 20 कोटी असे 100 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. या निधीतून 81 हजार 640 शेतकऱ्यांना 71.41 कोटी रुपयांचा निधी 19 एप्रिल पर्यंत वाटप करण्यात आला. बाधीत सर्व शेतकऱ्यांना पुढच्या आठवड्यापर्यंत 100 टक्के वाटप करण्याचा निर्धार विभागीय आयुक्त अनूपकुमार यांनी केला असून अपादग्रस्त शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती तलाठी, मंडळ अधिकारी किंवा तहसीलदार यांना देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

अपादग्रस्त शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना गारपीट व अवेळी आलेल्या पावसामुळे मदतीचे वाटप करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहीत याचिका दाखल करण्यात आली होती. त्या अनुषंगाने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असली तरी शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरीत करुन अहवाल देण्याचे शासनाने कळविले होते. या संदर्भात विभागीय आयुक्तांनी विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधून नुकसानीची माहिती घेऊन शासनाकडून मिळालेल्या मदत निधीचे वाटप त्वरीत करण्याच्या सूचना केल्या होत्या. या संदर्भात जिल्ह्याचे पालकसचिव यांनीही 3 ते 5 एप्रिल दरम्यान जिल्ह्यांना भेटी देऊन नुकसानीची माहिती व निधी वाटपासंदर्भात आढावा घेऊन आयुक्तांना आवश्यक सूचना केल्या होत्या.

मदतीची रक्कम प्रत्यक्ष अपादग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावयाची असल्याने अपादग्रस्त शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती गावचे तलाठी, मंडळ अधिकारी किंवा तालुकाच्या तहसीलदारांना उपलब्ध करुन देण्याचे आवाहन श्री.अनूपकुमार यांनी केले आहे. याशिवाय संयुक्त खातेदार असलेल्या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी संयुक्त खातेदारांपैकी एका खातेदाराच्या बँक खात्याची माहिती देऊन सर्व खातेदाराचे ना हरकत प्रमाणपत्र तलाठ्याकडे देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी बँक खात्याची माहिती उपलब्ध करुन दिल्यास 100 टक्के निधीचे वाटप आठवड्याभरात करण्यात येईल, असे आयुक्तांनी कळविले आहे.
सूर्यांश साहित्य मंचचे पुरस्कार जाहीर

सूर्यांश साहित्य मंचचे पुरस्कार जाहीर

ना.गो.थुटे, श्रीपाद जोशी, प्रशांत मडपूवार, डॉ. जयश्री कापसे-गावंडे, शेखर डोंगरेॅ


चंद्रपूर- सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंचातर्फे साहित्य क्षेत्रातील योगदानाबाबत देण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले. साहित्य व कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या साहित्यिकांना हे पुरस्कार चंद्रपुरातील सूर्यांश संस्थेद्वारे सहा वर्षांपासून देण्यात येत असून हे पुरस्कार सन्मानाचे समजले जातात.
यंदाच्या सूर्यांशच्या पुरस्कारात विशेष साहित्य गौरव पुरस्कार ना. गो. थुटे, साहित्य सन्मान श्रीपाद प्रभाकर जोशी, नवोन्मेष पुरस्कार प्रशांत मडपूवार, स्व. दिलीप बोढाले स्मृती कलायात्री पुरस्कार डॉ. जयश्री कापसे-गावंडे आणि प्रा. शेखर डोंगरे यांना जाहीर करण्यात आला आहे.
डॉ. श्याम मोहरकर यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या दोन सदस्यीय निवड समितीने ही निवड केली असून मे महिन्यात दुसर्‍या आठवड्यात संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. ना. गो. थुटे झाडीपट्टीतील नामवंत कवी व लेखक असून त्यांची जवळपास चाळीस पुस्तके प्रकाशित झालीआहेत. विविध साहित्य संमेलनात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. तीस वर्षांपासून ते सातत्याने लेखन करीत आहेत. श्रीपाद प्रभाकर जोशी चंद्रपुरातील प्रख्यात कवी व नाटककार असून त्यांच्या आकाश शोधतांना या नाटकाचा व एडका ए या कवितेचा समावेश विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. राज्य नाट्य स्पध्रेत त्यांच्या नाटकांना पुरस्कार प्राप्त झाले असून जोशी यांच्या 'चितपट' या नाटकाला नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकरांनी 'घर अण्णा देशपांडेचे' या नावाने व्यावसायिक रंगभूमीवर आणले. नाट्य लेखनासाठी व अभिनयासाठी त्यांना स्मिता पुरस्कारासहीत विविध पुरस्कार प्राप्त झाले आहे.
प्रशांत मडपूवार यांचा 'चार ओळी तुझ्यासाठी' हा चारोळी संग्रह, मन इंद्रधनु हा कवितासंग्रह प्रकाशित असून मन बावरे ही गीतध्वनीमुद्रिकाही प्रकाशित आहे. नाट्य अभिनयासाठी मडपूवार यांना पुरस्कार प्राप्त झाला आहे. विविध नियतकालिकांमधून त्यांच्या कविता सतत प्रकाशित होतात. प्रा. डॉ. जयश्री कापसे-गावंडे ज्येष्ठ नाट्यकर्मी असून विविध नाटकातील त्यांच्या भूमिका रसिकप्रिय आहेत.
नुकत्याच त्यांनी दिग्दर्शित केलेल्या 'चिंधी बाजार' या नाटकाने राज्य नाट्य स्पध्रेत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. प्रा. शेखर डोंगरे झाडीपट्टीतील ख्यातकीर्ती नाट्य कलावंत व नाटककार असून त्यांनी अनेक नाटकातून भूमिका साकारली आहे. तसेच नाटकांचे दिग्दर्शनही केले आहे. सूर्यांशच्या या कार्यक्रमाला या सर्व पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या चाहत्यांनी व साहित्य रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सूर्यांशचे सचिव मिलिंद बोरकर व बाबा खनके यांनी केले आहे. ल्ल

Friday, April 18, 2014

दारूबंदी आंदोलनाची ४६ महिने

दारूबंदी आंदोलनाची ४६ महिने

दारूबंदी आंदोलनाची ४६ महिने

श्रमिक एल्गार व गुरुदेव सेवा मंडळाने श्रीमती पारोमिता गोस्वामींच्या नेतृत्वाखाली काढलेला चंद्रपूर जिल्ह्याच्या दारूबंदी मागणीसाठी २०१० च्या डिसेंबर महिन्यात नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान चिमुरातून  एक मोर्चा निघाला. महिलांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी काढलेल्या  मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तेव्हापासून आजवर दर दिवशी दारूबंदीचा मुद्दा चर्चेत असतो. या आंदोलनाची खरी सुरवात ५ जून २०१० रोजी झाली.  जुबली शाळेत पहिली सभा झाली आणि पुढे सहा महिन्याच्या कालावधीत आंदोलनाची रणनीती आखण्यात आली.
श्रमिक एल्गारच्या पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात राष्ट्रसंतांची कर्मभूमी चिमूर येथून पाच डिसेंबरला पदयात्रेला सुरवात झाली. भद्रावतीपासून तर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणांहून एकत्र आलेल्यांनी दारूबंदीचे नारे देत पदयात्रा पुढे गेली. भिसी मार्गावरून चिंचाळा या गावात पहिला मुक्काम झाला. महिला आपली दिवसांची रोजीरोटी सोडून या पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या. सुमारे ५००० ग्रामीण स्त्रिया व पुरुष, चिमूर ते नागपूर तब्बल १३५ किमी अंतर पार करून पोहचले. या प्रवासात मोर्चेकरूचे मळलेले कपडे, हिवाळ्याच्या थंडीत घामाच्या धारा निघत असतानाही मोठ्या  उत्साहात आंदोलन सुरु करण्यात आले.
दारूच्या झळा सोसलेल्या सामान्य महिला आपल्या व्यथा तिथे मांडत होत्या. अड. पारोमिता गोस्वामी, डॉ. राणी बंग यांनी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण यांना  मागणी समजावून सांगितली . तेव्हा  मुख्यमंत्र्यांनी त्यांना २ महिन्यात निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. चंद्रपूर जिल्ह्यातील महिलांच्या तीव्र आंदोलनाची दखल घेत पालकमंत्री संजय देवतळे यांचे अध्यक्षतेखाली राज्य सरकारने दारूबंदीची शिफारस करण्यासाठी समिती नेमली. त्यामुळे दारू विक्रेत्यांच्या पायाखालची वाळू  सरकली.
वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. मात्र, तिथे आज सर्वाधिक अवैध दारू विकली जाते. मग दारूबंदीचा उपयोग काय? संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी करा, अशी  मागणी दारूविक्रेत्यांनी शासनाला केली. जिल्ह्यात दारूबंदीचे आंदोलन जोरात असताना त्याला विरोध करण्यासाठी दारूविक्रेत्यांसह या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारोंच्या गर्दीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आपल्या भावना शासनदरबारी मांडल्या.  दारूबंदीची झाल्यास जिल्ह्यातील दारूविक्रेते व या व्यवसायावर अवलंबून असलेले कामगार आपल्या कुटुंबासह रस्त्यावर येतील, असा युक्तिवाद करीत दीपक जैस्वाल यांच्या नेतृत्वात दोनदा मूक मोर्चा काढण्यात आला.
चंद्रपूर जिल्ह्यात शासनमान्य  १०९ देशी दारू दुकाने, २४ वॉईन शॉप, ३२० वॉईन बार व १० बियर शॉपी आहेत. या व्यवसायावर तब्बल ४० हजार कुटुंबे अवलंबून आहेत. जिल्ह्यात दारूबंदी झाल्यास या सर्व कुटुंबांवर बेरोजगारीचे संकट कोसळणार आहे. परिणामी हे सर्व कामगार अवैध व्यवसायात गुंतून वाईट मार्गाकडे वळतिल. सध्या जिल्ह्यातील देशी व विदेशी दारूच्या माध्यमातून शासनाला २६० कोटी रूपयांचा महसूल मिळत आहे. यात दरवर्षी १० टक्क्यांनी वाढ होत आहे. जर दारू दुकाने बंद झाली तर शासनाला दरवर्षी मिळणारा हा महसूल बंद होइल. जर शासनाला दारूबंदी करायची असेल तर अवघ्या महाराष्ट्रात दारूबंदी करावी किंवा दारूचे कारखाने बंद करावे, अशी मागणीही चंद्रपूर डिस्ट्रीक्ट लिकर असोसिएशनतर्फे जयस्वाल यांनी केली.

यामुळे बंदी आणि बंदीच्या मागणीचा विरोध असे २ गटवाद सुरु झाले. समितीने या दोन्ही घटकाची बाजू एकूण घेतली. समितीत संजय देवतळे, समाजसेवक डा. विकास आमटे, व्यंग चित्रकार प्रा. मनोहर सप्रे, साहित्यिक मदन धनकर,  प्राचार्य जे. ए. शेख , राज्य उत्पादन शुल्क अधिकारी  यांचा सामावेश होता.
प्रारंभी ३ महिने आणि त्यानंतर ३ महिने मुदत वाढ घेतल्यानंतर समितीने अहवाल सादर केला.  १५ मार्च २०१३ रोजी राज्य उत्पादन शुल्क मंत्र्यांनी अहवालाची छाननी सुरु असल्याचे सांगितले होते.

चंद्रपूर जिल्हयातील ८४७ पैकी ५८८ ग्रामपंचायतींनी दारूबंदीचा ठराव केला असल्याचे दारूबंदी समितीच्या अहवालात नमुद असल्याची माहिती लेखी उत्तरात राज्य उत्पादन शुल्क मंत्र्यांनी दिली होति. मात्र, दोन अडीच वर्षे उलटून गेल्यानंतरही  जिल्ह्यात दारूबंदी करण्याच्या मागणीबाबत समितीने शासनाला सादर केलेल्या अहवालावर शासनाने कोणतीही  कार्यवाही केली नाही. त्यामुळे ‘दारू दुकाने हटलीच  पाहिजे दारूची बाटली फुटलीच पाहिजे ‘ अशा घोषणा देत पुन्हा आंदोलन सुरु करण्यात आले. चंद्रपूर जिल्हा दारूमुक्त करण्याचा निर्णय एका महिन्यात घेण्यात येईल , असा शब्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी  दिला होता . परंतु एका महिन्यात नाहीच नाही, ४६ महिने उलटूनही दारूबंदी झाली नाही . त्यामुळे चंद्रपुरात आंदोलकत्र्यांनी सत्याग्रहाची शपथ घेतली.
२६ जानेवारीला चंद्रपुरात जेलभरो आंदोलन केले. त्यात तिनशेवरम हिला व पुरूषांनी स्वतःला अटक करुन घेतली. अ‍ॅड . गोस्वामी व त्यांच्यासह अटक केलेल्या ९७ महिलांना नागपुरातील मध्यवर्ती कारागृहातठेवण्यात आले . ८७ पुरूषांना चंद्रपुरातील कारागृहात ठेवण्यात आले . त्यांची नंतर जामीनावर सुटका  करण्यात आली. येत्या एक महिन्यात दारूबंदीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात येईल , असा निरोप पाठविला . त्यानंतरही निर्णय झाला नाही.
दारूबंदीबाबत समितीचा अहवाल  तपासून या जिल्ह्यात लवकरच दारूबंदीचा निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिल्यानंतर दारुबंदी  तीन टप्प्यात करण्याची सूचना विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिली होती. सा-या  सूचना, आश्वासने देवूनही निर्णय घेण्यास अशी कोणती माशी आडवी येत आहे, हे अद्याप समजले नाही.

आता लोकसभा निवडणूक सूर असताना श्रमिक एल्गारच्या महिलांनी नेत्यांच्या सभेमध्ये गोंधळ घालणे सुरु केले होते. एकूणच या आंदोलनाला वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीने उग्र रूप देण्यात आले. पण, शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही. एकूण ४६ महिने लोटून गेली. पण, तीव्रता कमी होण्याऐवजी वाढतच आहे.
या समितीचा अहवाल शासनाला प्राप्त होवून साडे तीन वर्षाचा मुहूर्त  होत असतांनाही, शासन ढिम्म असल्यांने महिलांत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आता केवळ विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णय घेऊ असे  आश्वासन दिले आहे. आता बघूया ते कितपत खरे होते ते.
                  * देवनाथ गंडाटे

( आगामी विषय - दारूबंदी की व्यसनमुक्ती)
यावर आपल्या सूचना पाठवू शकता …….

Thursday, April 17, 2014

३५ पोलिस अधिका-यांना  सन्मानचिन्ह

३५ पोलिस अधिका-यांना सन्मानचिन्ह

नक्षलगग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी धैर्याने सामना करून कर्तव्य बजावणा-या ३५ पोलिस अधिका-यांना राज्याचे पोलिस महासंचालकाचे सन्मानचिन्ह आज जाहीर करण्यात आले आहे. ५ उपविभागीय, अधिका-यांचा त्यात समावेश आहे.
जिमलगट्टा येथील पोलिस उपविभागीय अधिकारी यशवंत काळे, धानोरा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी बापु बांगर, भामरागड येथील पोलिस उपविभागीय अधिकारी विशाल ठाकुर, एटापल्ली येथील पोलिस उपविभागीय अधिकारी विवेक मिसाळ तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पाटील, सुधाकर बावकर, विठ्ठल पवार, कृष्णा घरडे, कौशलधर दुबे, पोलीस उप-निरीक्षक समाधान वाघ, गणेश क-हाड, अतुल तवाडे, अतुल अव्हाड, सुजित कांबळे, रqवद्र पारखे, पोलीस हवालदार प्रभुदास पांडुरंग दुग्गा, शंकर तुकारा बावनथडे, मनोजकुमार भोर, संजय संतोषवार, रमेश ङ्कमडावी, बळीराम मजांगी, पोलीस नाईक सुधाकर वेलादी, विनायक अतकर, काशिनाथ ज्जी, योगेश धायंदे, किशोर उसेंडी, आनंदराव खोब्रागडे, गिरीधर आत्राम, राजु सिडाम, अशोक घाटघुमर, शामनदास उईके, रामा कुडामी, बापुराव भोसले पोलीस शिपाई ओमप्रकाश यांचा समावेश आहे.
मनपाचे अग्निशमन वाऱ्यावर

मनपाचे अग्निशमन वाऱ्यावर

- गोविल मेहरकुरे
चंद्रपूर - साडेतीन लाख लोकसंख्या असलेल्या शहरातील मनपाच्या अग्निशमन विभागाला रिक्त पदे आणि वाहनांचा आजार जडला आहे. इतकी मोठी लोकसंख्या असताना केवळ तीन वाहने आणि अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा भरणा असल्याने आग विझविताना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागत आहे. 

नगर परिषदेचे मनपात रूपांतर झाले. यामुळे मनपाची अग्निशमन व्यवस्था अजून मजबूत होईल, अशी आशा होती. मात्र, मनपा स्थापनेला वर्ष लोटूनही गेल्यावरही अग्निशमन यंत्रणा कोलमडली असल्याचेच चित्र आहे. शहराची लोकसंख्या साडेतीन लाखांच्या घरात आहे. आजूबाजूलाही छोटी-मोठी गावे आहेत. चंद्रपूर आणि आसपासच्या गावी आगीच्या घटना उन्हाळ्याच्या दिवसांत घडतात. मार्च महिन्यात आगीच्या दहा घटना घडल्या. या घटना बघता अग्निशमन वाहनांची संख्या वाढविणे गरजेचे असते. मात्र, ही संख्या कित्येक वर्षांपासून तीनच्या पुढे कधी सरकलीच नाही. या विभागातील कर्मचारीवर्गही प्रशिक्षित नाही. त्यामुळे आगीच्या घटना नियंत्रित आणतेवेळी या कर्मचाऱ्यांची त्रेधातिरपीट उडते, हे आजवरच्या कित्येक घटनांहून स्पष्ट झाले आहे. महानगरपालिका पंचशताब्दी महोत्सवात शहराचा विकास केल्याचा दावा करीत आहे. दुसरीकडे साडेतीन लाख लोकसंख्येच्या मागे तीन अग्निशमन वाहने आहेत. त्यातच अपुरे कर्मचारी यामुळे हा विभागच वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे. वरिष्ठ अधिकारी या विभागात सध्या नाहीत. याच विभागातील वरिष्ठ अधिकारी एम. एन. नन्नावरे हे नगरपालिका असतानाच सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांच्या जागी कोणताच अधिकारी या विभागाला भेटला नाही. नगरपालिका असताना अग्निशमन यंत्रणेचे कार्यालय त्याच कार्यालयाखाली होते. मात्र, या विभागासाठी आता स्वतंत्र कार्यालय पाण्याच्या टाकीसमोर उभारण्यात आले आहे. या विभागात कर्मचारी आणि अग्निशमन वाहने कमी असल्याने हे कार्यालयदेखील ओस पडले आहे. चंद्रपूर शहराचे क्षेत्रफळ मोठे आहे. आसपासच्या तालुक्‍यात घडणाऱ्या आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी येथून वाहने पाठविली जातात. त्याचदरम्यान शहरात आगीच्या घटना घडल्या. मनपाकडे पर्यायी व्यवस्थाच नसते. त्यामुळे वाहन आणि कर्मचाऱ्यांची संख्या न वाढविल्यास मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागण्याची शक्‍यता आहे. 

एक वाहन अन्‌ चार कर्मचारी 
आगीची घटना नियंत्रणात आणण्यासाठी चार कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता असते. मात्र, या विभागात कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे वाहकासोबत दोन कर्मचाऱ्यांना जावे लागते. त्यामुळे आग विझविताना कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. 

वाहनांची संख्या कधी वाढणार? 
साडेतीन हजार लोकसंख्येच्या शहराचे तीन झोन पडतात. प्रत्येक झोनमध्ये दोन अग्निशमन वाहने दिल्यास सहा वाहने व कार्यालयात दोन, अशा आठ वाहनांची गरज आहे. 

हवे प्रशिक्षित कर्मचारी चंद्रपूर अग्निशमन विभागात जवळपास तीस कर्मचारी आहेत. मात्र, यातील बहुतांशी कर्मचारी प्रशिक्षित आहेत. साऱ्यांनाच प्रशिक्षणाची गरज आहे. तसेच नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, असा सूर आता उमटत आहेत. 

हेल्पलाइनवर शिव्यांचा मारा
आगीच्या घटनांची माहिती देण्यासाठी 101 हा हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. दिवसभर या क्रमांकावर 40 ते 50 दूरध्वनी येतात. अनेकजण चुकीची माहिती देऊन शिव्या देतात. आग लागली नसतानाही माहिती देतात.
ताडोबा  व्यवस्थापनाचे मूल्यांकन

ताडोबा व्यवस्थापनाचे मूल्यांकन

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील व्यवस्थापनाचे मूल्यांकन करण्यासाठी तज्ज्ञ समिती येत्या
२३ व 24 एप्रिलला ताडोबा व्याघ्र प्रकल्पात येणार आहे.

व्यवस्थापन आराखड्यातील उद्देशपूर्तीसाठी केलेल्या कामाची किती व कसा प्रभाव झाला यांची पाहणी ते करणार आहेत. व्याघ्र प्रकल्पातील सद्य:स्थितीची पाहणी हे सदस्य करतील. व्याघ्र प्रकल्पातील व्यवस्थापन आराखड्यामध्ये जी कामे नेमून देण्यात आलेली आहेत. त्याचा वन्यप्राण्यांवर काय परिणाम झाला वन्यप्राण्यांसाठी असलेली योजना किती प्रभावीपणे राबविली गेली. यामध्ये वन्यप्राण्यांचा अधिवास, पाण्याची उपलब्धता, निसर्ग पर्यटन, व्याघ्र प्रकल्पातील गावांचे पुनर्वसन आदी कामांचा समावेश आहे.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणातर्फे आंध्र प्रदेशातील सेवानिवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) विजयकुमार सिथला यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठित करण्यात आली. या समितीत भारतीय वन्यजीव संस्थेचे सदस्य व्ही. के. पुनियाल, वरिष्ठ प्रकल्प अधिकारी नसीन अहमद अन्सारी, जागतिक वन्यजीव निधीचे प्रतिनिधी दीपांकर घोष यांचा समावेश आहे. या चमूसोबत अमेरिकेतील राष्ट्रीय उद्यान सेवेचे संचालक डेव्हिड मान्स्की हेसुद्धा असणार आहेत.
 मतदानाला सुरुवात

मतदानाला सुरुवात



देशात पाचव्या आणि राज्यात दुस-या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात


महाराष्ट्रातील १९ आणि संपूर्ण देशातील १२१ मतदारसंघात मतदानसुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, गोपीनाथ मुंडे या दिग्ग्ज नेत्यांचे भवितव्य आज मतदार ठरवणार » महाराष्ट्रात १९ मतदारसंघातून ३५८ उमेदवार रिंगणात » राज्यातील एकूण तीन कोटी २५ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार » एक कोटी ६९ लाख ५४ हजार ३९१ पुरुष तर एक कोटी ५३ लाख ७७ हजार ६०५ महिला मतदार » मनसे उमेदवार दिपक पायगुडे, अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी बजावला मतदानाचा हक्क » मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मतदान » कर्नाटकमध्ये २८ जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान » झारखंडमध्ये ६, ओदिशामध्ये ११, बिहारमध्ये ७, पश्चिमबंगालमध्ये ४, मणिपूरमध्ये १, छत्तीसगडमध्ये ३, मध्यप्रदेशमध्ये १०, जम्मू-काश्मीरमध्ये १, राजस्थानमध्ये २०, उत्तरप्रदेशमध्ये ११ जागांसाठी मतदान

Wednesday, April 16, 2014

चॅटऑन

चॅटऑन

सध्या व्हाट्स अॅपची जोरदार चलती आहे. त्यामुळे व्हाट्स अॅप खरेदीसाठी फेसबुकने मजल मारली. व्हाट्स अॅपबरोबरच लाईन, बीबीएम, वीचॅट आदीही अॅप्स आहेत. आता यात नव्याने चॅटऑनची भर पडली आहे.

सॅमसंगने आपल्या स्मार्टफोनधारकांसाठी चॅटऑन हे अॅप्स लाँच केले आहे. त्यामुळे नव्याने आणखी अॅप्सची भर पडली आहे. नवी दिल्लीत आज चॅटऑन लाँच केले. अभिनेत्री नर्गिस फाक्री आणि सॅमसंगचे दक्षिण आशियाई मीडिया सोल्युशन सेंटरचे तरुण मलिक यांच्या प्रमुख उपस्थित हे अॅप्स लाँच केले.

सॅमसंगचे 3.5 व्हर्जन अॅड्रॉईड, आयओएस, विंडोज आणि ब्लॅकबेरी यावर उलब्ध असणार आहे. त्यामुळे हे अॅप्स व्हाट्सअॅपला टक्कर देणार का, याची उत्सुकता आहे. अॅप्सला 1 जीबी पर्यंत फाईल शेरिंग करणे शक्य होईल. हिंदी आणि इंग्रजी भाषेत भाषांतर करणे शक्य आहे. या अॅप्सवर 1001 सदस्यांचा ग्रुप करणे सहज शक्य आहे. तसेच लोकेशन शेअरिंगची सुविधाही आहे.
बेपत्ता

बेपत्ता

शिल्पा शामराव वाघमारे 
चंद्रपूर येथील महाकाली यात्रेतून बेपत्ता झाली…. 
ती मुळची नांदेल येथील आहे। 
कुणाला काही माहिती मिळाल्यास दिगंबर याना ८३८०९८४०४१ वर फोन करून कळवावे 
चंद्रपूर गोंडकालीन तलावांत टोलेजंग इमारती

चंद्रपूर गोंडकालीन तलावांत टोलेजंग इमारती

चंद्रपूर गोंडकालीन तलावांत टोलेजंग इमारती
           
          श्रीकांत पेशट्टीवार   (www.facebook.com/shrikantpeshattiwar) 
पाणी व्यवस्थापनाच्या अनुषंगाने तीनशे वर्षांपूर्वी गोंड राजांनी चंद्रपूर शहरात पाच तलाव बांधले. पिण्याचे पाणी व शेती या दोन्ही बाबी डोळ्यासमोर ठेवून या तलावांची निर्मिती झाली. मात्र, कालौघात रामाळा तलाव सोडला, तर अन्य चार तलावांवर झोपड्यांचा पसारा वाढत गेला. प्रारंभी थोड्याबहुत प्रमाणावर असलेल्या या झोपड्यांचे रूपांतर आता मोठमोठ्या इमारतीत होऊ लागले आहे. गोंडकालीन पाणी व्यवस्थापनाचे तलाव काळाच्या उदरात गडप झाले. त्याठिकाणी आता टोलेगंज इमारती बघायला मिळत आहेत.                                                                          (सकाळ चंद्रपूर )
चंद्रपूर-गडचिरोली या जुळ्या जिल्ह्यात गोंडकालीन कार्यकाळात १२ हजार ३८ मोठ्या तलावांची निर्मिती झाली. इतिहासात मतलावांचा प्रदेशङ्क अशी या जुळ्या जिल्ह्यांची ओळख आहे. या तलावांच्या माध्यमातून जवळपास १ लाख ७४ हजार ४०० एकर जमीन qसचनाखाली होती, अशीही इतिहासात नोंद आहे. इतिहासकालीन या नोंदी आता कागदावरच आहेत. इ. स. १४९७ ते १५२२ मध्ये गोंड राजा हिरशहा होऊन गेला. त्याने आपल्या राज्यात लोकोपयोगी अनेक कामे केली. जमीनदारी आणि तुकुमची स्थापना त्याने केली. तुकुम या शब्दावरूनच तुकुम तलावाची निर्मिती करण्यात आली.
तळ्याच्या पाण्याने ओलित होणारी जमीन म्हणजे तुकुम असा त्याचा अर्थ होतो. पूर्वी राजे तळे बांधण्यास उत्तेजन देत. ते बांधून झाल्यावर तलाव बांधणाèया व्यक्तीस तुकूम म्हणजे त्या तळ्याच्या पाण्याने ओलित होणारी जमीन बक्षीस देत. मात्र, तुकुम तलावावरही आता अतिक्रमण झाले
आहे. अनेकांनी येथे झोपड्या बांधल्या आहेत. त्या प्रारंभीही हटविण्यात आल्या नाही. आताही तशीच स्थिती आहे. हा तलाव नष्ट झाला आहे.
राणी हिराईने शहराच्या वायव्य दिशेला हा तलाव बांधला. या तलावाच्या शेजारीच घोड्यांचा रियाला होता. घोडे या तलावाचे पाणी पीत होते.
त्यामुळे या तलावाचे नाव घोडतळे असे पडले. त्यानंतर पुढे घोटतळे आणि नंतर घुटकाळा असे नाव पडले. या तलावाजवळही आता लोकवसाहत झाली आहे. पंधराव्या शतकात गोंडराजा खांडक्या बल्लाळशहाने रामाळा तलाव बांधला. १५८ एकरात या तलावाचे बांधकाम करण्यात आले. ईशान्येस बांधण्यात आलेल्या या तलावातून चंद्रपूरकरांची तहान तेव्हा भागविली जात होती. या तलावाच्या ३० ङ्कूट पाण्याखाली ङ्करसबंदी होती. या तलावातून वाहत जाणारे पाणी अडविण्यासाठी एक तलावही बांधण्यात आला. या तलावाला मलेंडी तलाव असे नाव पडले. या तलावावर आता जलनगर वसले आहे. १६७२-१७३४ च्या कार्यकाळात रामाळा तलावाची डागडुजी गोंडराजा रामशहा याने केली. त्याने या तलावाची डागडुजी केल्यानंतर स्वतःचे नाव या तलावास देऊन टाकले. त्यामुळेच मरामाळाङ्क असे या तलावास नाव पडले. इ. स. १७९० मध्ये व्यंकोजी भोसल्यांनी या तलावाची डागडुजी केली. त्यानंतर इंग्रजांच्या कार्यकाळात या तलावाची डागडुजी करण्यात आली. पाच ङ्केब्रुवारी १९६४ रोजी चंद्रपूरच्या नगराध्यक्षपदी महादेवाqसग ठाकूर (दीक्षित) विराजमान झाले. नगर सुधारणेत त्यांनी रामाळा तलावाची दुरुस्ती केली. याला २२ हजार ३५६ रुपये खर्च आला. रामाळा आणि लेंडीगुडा तलावाचे व्यवस्थापन त्या काळात चांगल्या पद्धतीने झाले. मात्र, गेल्या काही वर्षांत या तलावाला लागूनच झोपड्या वसल्या. रेल्वेस्थानकाकडील भागातून तलावाकडे येणाèया मार्गावर मोठ्या व्यापारी इमारतीही बनत चालल्या आहेत. लेंडी तलावावर आता जलनगर वसले.


राजकीय दबाव
तलावावरीप झोपड्या हटविण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. मात्र, पालिकेत सत्ता असलेल्यांनी मव्होट बँकेङ्कच्या नावाखाली या झोपड्या कधीच हटवू दिल्या नाही. जेव्हा जेव्हा त्या हटविण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा अधिकाèयांवर दबाव टाकून ही कारवाई हाणून पाडण्यात आली. नागरिकांना पट्टेही मिळवून देण्याचे प्रयत्न कधीच झाले नाही. 
गोंडकालीन पाण्याचे नियोजन रामाळा तलाव बांधण्यात आल्यानंतर चंद्रपूर शहरात पाणीपुरवठ्याची उत्तम सोय गोंड राजांनी करून दिली होती. शहराला पाणी पुरविण्यासाठी, ठिकठिकाणी त्याच्या साठवणुकीसाठी हतनी बांधल्या. रामाळा तलावातून प्रत्येक हतनीपर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी मातीच्या पायल्या बसवून त्याद्वारे पाणीपुरवठ्याची सोय केली. काही हतनींना लागूनच काही हौद बांधले. त्या हौदांतून लोक पाणी भरत होते. आजही शहरातील दहाच्यावर हतनी इतिहासाची साक्ष देत आहेत. रघुवीर चौक, भानापेठ वॉर्डातील बडवाईक यांनीही ही प्राचीन हतनी सांभाळून ठेवली आहे. इतर ठिकाणच्या हतनीवर नागरिकांनी अतिक्रमण केले, तर काही काळाच्या ओघात नष्ट झाल्या. शहरात उरलेले हौद आणि हतनीची संवर्धन करणे आवश्यक आहे.

राजा खांडक्या बल्लाळशहाचा मुलगा राजा हिरशहा याने बालेकिल्ल्यातच पूर्व बाजूस राजकुटुंबातील खास मंडळींकरिता जलक्रीडा आणि स्नानासाठी एक हौद तयार केला. त्याला मकोहिनूरङ्क असे नाव देण्यात आले. येथे बांधलेल्या हौदाची लांबी ५२५ ङ्कूट आणि रुंदी २२४ होती. गोंडकाळात कोहिनूर तलाव शहराची शान होता. मात्र, या तलावाची आता वाईट अवस्था झाली आहे. एकेकाळी अंघोळीसाठी वापरण्यात येणाèया तलावात आता मनपा क्रीडा स्पर्धा घेत आहे. दरवर्षीच महानगरपालिका, विविध क्रीडा मंडळांच्या स्पर्धा येथे नित्यनेमाने होत आहेत. महाकाली देवीच्या यात्रा कालावधीत येथे भाविक राहतात. त्यांची वाहनेही येथे असतात. कोहिनूर तलावाजवळ अनेकांनी घरे बांधली आहेत. त्यांनीही तलावाची जागा हळूहळू गिळंकृत करणे सुरू केले आहे.

Tuesday, April 15, 2014

गत २४ तासातील घटना

गत २४ तासातील घटना

गत २४ तासातील घटना 

गडचिरोली : महाराष्ट्र व छत्तीसगड सीमेवर  भद्रकाली गावाजवळील नक्षल्यांचे शिबिर  उद्ध्वस्त केले

अकोला : शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील चौघांची बाळापूर तालुक्यातील बाखराबाद गावात सोमवारी हत्या करण्यात आली.

चंद्रपूर : येथील जुनोना चौक परिसरात हिंग्लाजभवानी वॉर्डातील मूकबधीर निवासी विद्यालयाच्या विद्यार्थ्याचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. 

यवतमाळ : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर असलेल्या जय गोविंद जिनिंगमध्ये सोमवारी दुपारी आग लागून सुमारे १0 लाख रुपयांचे नुकसान झाले.

यवतमाळ : तक्रारीवर कारवाई होत नसल्याने इसम विषारी औषध प्राशन करून पोलीस ठाण्यात पोहोचल्याची घटना घडली.

Monday, April 14, 2014

काळापलीकडच्या वेदनेचा अनुभव देणारी ‘तुळसा!

काळापलीकडच्या वेदनेचा अनुभव देणारी ‘तुळसा!

काळापलीकडच्या वेदनेचा अनुभव देणारी ‘तुळसा!

टपाल सिनेमा आता येत्या आठवड्यात प्रदर्षीत होणार आहे. या निमीत्ताने विणा जामकरची ही मुलाखत 

दक्षिण आफ्रिकेतील ‘इफ्साङ्कमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावणारी आणि अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनातही मान्यवरांच्या कौतुकास पात्र ठरलेली तरुण अभिनेत्री वीणा जामकर सध्या चर्चेत आहे ते ‘टपाल या चित्रपटातील तिच्या भूमिकेमुळे. तिच्याचकडून अधिक जाणून घेऊया ‘टपाल आणि त्यातील ‘तुळसाविषयी.



‘मैत्रेय मास मिडियाचा पहिलाच चित्रपट ‘टपाल. या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच तब्बल नऊ आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. थर्ड आय एशियन फिल्म फेस्टीव्हल तसेच पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यामध्येही हा चित्रपट झळकला असून, गोव्यात झालेल्या ४४व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीव्हलमधील इंडियन पॅनोरमा विभागात हजेरी लावून ‘टपालङ्कने रसिकांची उत्स्फूर्त दादही मिळवली आहे. या चित्रपटाच्या संदर्भात आणखी एक गोष्ट लक्षणीय ठरली आहे ती म्हणजे तरुण अभिनेत्री वीणा जामकर हिने वठवलेली तुळसाची भूमिका. या तुळसाच्या भूमिकेसाठी वीणाला नुकताच ‘इफ्सा‘ अर्थात ङ्कइंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ साऊथ आफ्रिकाङ्कमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तिने साता समुद्रापार मिळवलेल्या या यशाबद्दल ९४ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार qशदे यांच्या हस्ते तिचा सन्मानही करण्यात आला.

वयाच्या सहाव्या वर्षापासून रंगभूमीवर पाऊल ठेवून सुरू झालेला वीणाचा अभिनय क्षेत्रातला प्रवास लक्षणीय चित्रपटांचे टप्पे सर करत आज ङ्कटपालङ्कपर्यंत येऊन पोहोचला आहे. सुधा करमरकरांकडून नाट्यकलेचं
प्रशिक्षण, सत्यदेव दुबेंकडून अभिनयाचं प्रशिक्षण आणि बिरजू महाराजांकडून कथ्थकचं नृत्यांग प्राप्त केलेली ही अष्टपैलू अभिनेत्री आज मुख्यत: ओळखली जाते ती तिच्या ङ्कहटकेङ्क भूमिकांसाठी. त्यात आता ‘टपालच्या निमित्ताने ती पुन्हा एकदा जगासमोर अधोरेखित होत आहे. या निमित्ताने तिच्याशी साधलेला हा मनमोकळा संवाद.

तुझ्या आजवरच्या भूमिका या नेहमीच वेगळ्या धाटणीच्या वाटत आल्या आहेत, काहीशा आर्ट
फिल्म्सच्या प्रकारात मोडणाèया. तुला व्यावसायिक सिनेमा करावासा नाही वाटला? की तू व्यावसायिक सिनेमांपासून स्वत:ला जाणीवपूर्वक दूर ठेवतेस?

नाही, असं अजिबात नाही. व्यावसायिक सिनेमांपासून दूर राहायचं असं मी कधी ठरवलं नव्हतं, आणि आताही तसा दृष्टीकोन नाही. मुळात कोणताच दिग्दर्शक वा निर्माता हा आर्ट qकवा व्यावसायिकतेच्या चौकटी पाहून स्वत:चा चित्रपट बनवत नसतो. काही चित्रपट हे थोडे वेगळ्या धाटणीचे असतात, ते प्रचलित व्यावसायिक चित्रपटांच्या चौकटीत बसत नाहीत म्हणून ते आपल्याला वेगळे वाटतात, इतकंच. खरं सांगायचं तर नेमका याच धर्तीवर ङ्कटपालङ्क इतर चित्रपटांपेक्षा वेगळा वाटतो. हल्ली आयटम साँग घातल्याने चित्रपट चालतो असं काही लोक मानतात. पण तसं न मानणारेही लोक आपल्याकडे आहेत जे असे निकष आपल्या चित्रपटांना लावत नाहीत. असे दिग्दर्शक आणि लेखक लोकप्रियतेसाठी चित्रपटाच्या दर्जाशी तडजोड करत नाहीत. ङ्कटपालङ्क हे याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. तसं पाहिलं तरटपाल कमर्शिअलच आहे, पण यात कथेशी प्रतारणा नाही. मला हे असे वेगळे चित्रपट करायला आवडतात.

वीणा, असं लक्षात येतं की बèयाचदा तुझ्या भूमिका या मध्यवर्ती भूमिकाच असतात असं नव्हे, पण तरी त्यात काहीतरी विशेष असतं, ज्यामुळे या छोट्या रोलनंतरही तू प्रेक्षकांच्या लक्षात राहतेस. नेमकं कायपाहून तू भूमिका स्वीकारतेस? भूमिकेतलं नक्की तुला काय भावतं?

आधी तर मी चित्रपटाची कथा ऐकते, एखाद्या निवेदनाप्रमाणे. प्रत्येक चित्रपटाची एक गोष्ट असते, ती आवडली तरच त्यातली भूमिका स्वीकारण्याचा प्रश्न येतो. मग त्या कथेत माझ्या भूमिकेचं स्थान काय आहे, तिचा कथेशी नेमका कसा संबंध आहे हे मी पडताळून पाहते. भूमिका मध्यवर्ती आहे की साईड रोल हा प्रश्नच मला निरर्थक वाटतो. भूमिका ही भूमिका असते, कथानकात तिचं स्वत:चं असं वेगळं स्थान असतं. ते स्थान नटाने पडताळून घ्यावं. त्यामुळे भूमिका निवडताना भूमिकेची लांबी, संवादांची लांबी हा निकष मी कधीच लावत नाही. ज्या भूमिकेमुळे माझ्यातल्या अभिनय कौशल्याचा कस लागणार असेल, काहीतरी आव्हानात्मक करण्याचा अनुभव मिळणार असेल अशा भूमिका मला स्वीकाराय ला आवडतात, कारण अशी आव्हानात्मक भूमिका वठवताना एक नट म्हणून आपला जो विकास होत जातो ती विकासाची प्रक्रिया मला अधिक महत्त्वपूर्ण वाटते.
टपालमध्ये तू ङ्कतुळसाङ्क नावाचं पात्र साकारलं आहेस. ही ङ्कतुळसाङ्क तुला का करावीशी वाटली? आज या ङ्कतुळसाङ्कने तुला दक्षिण आफ्रिकेतही मान मिळवून दिलाय. ङ्कतुळसाङ्क नावाच्या बाळाचे पाय तुला आधीच पाळण्यात दिसले होते?

अगदी असंच नाही, पण ङ्कतुळसाङ्कची ताकत मात्र तेव्हाच जाणवली होती हे नक्की. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर याने जेव्हा मला टपालची गोष्ट पहिल्यांदा ऐकवली तेव्हाच ही कथा मला मनोमन खूप आवडली होती. लक्ष्मण हा स्वत: एक चांगला निवेदक असल्याने त्याला दिग्दर्शक म्हणून जे सांगायचं होतं ते थेट माझ्यापर्यंत पोहोचलं. ७० च्या दशकातली, गावात राहणारी, मूलबाळ नसलेली आजवरच्या भूमिकांमध्ये वेगळ्याच ताकतीची वाटली. याचं एक कारण हेही होतं की, तिला फारसे संवाद नव्हते. त्यामुळे तिची व्यथा पडद्यावर केवळ अभिनयातून साकारण्याचं मोठं आव्हान मला स्पष्ट दिसत होतं त्यामुळे ही भूमिका मी स्वीकारली.
मग या आव्हानात्मक भूमिकेसाठी तू काय खास तयारी केलीस?
प्रांजळपणे सांगायचं तर काहीच नाही. कारण ‘टपालङ्कच्या आधीही मी अनेकदा ग्रामीण भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण पोशाख, वागणं-बोलणं पडद्यावर साकारणं हे काही माझ्यासाठी नवीन नव्हतं. पण मूल नसलेल्या स्त्रीचं दु:ख व्यक्त करणं हे एक मोठं आव्हान होतं. आणि गंमत म्हणजे ते शिकण्यासाठी खास अशा स्त्रियांचं निरिक्षण करण्याचीही काही सोय नव्हती. कारण मूल नसलेली बाई ही काही फार वेगळं वागत नसते. पण प्रत्येक क्षणी तिच्या मनात असलेली अपराधीपणाची भावना मात्र तिच्या वागण्या-बोलण्यातून व्यक्त होत राहते. ती इतरांसारखी हसेल, बोलेल पण त्यातही एक दु:खाची लकेर डोकावत असते. मला हे सगळं जाणवलं होतं, माझं तसं निरिक्षणही होतंच पण हे सर्व कोणत्याही प्रॅक्टिसशिवाय मला ‘ऑन द स्पॉट‘ अभिनयात आणावं लागलं. कारण भावना कशी व्यक्त करावी याचे ठोकताळे नसतात. त्यामुळे खरं तर मी भूमिकेसाठी कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करणं जाणीवपूर्वक टाळलं. प्रत्येक फ्रेम लावताना दिग्दर्शकाचा एक वेगळा दृष्टीकोन असतो तो ध्यानात घेऊन मी तुळसाच्या भावना व्यक्त करत गेले. पण हो, तुळसाला समजून घेण्यासाठी मला लक्ष्मणची खूप मदत झाली. प्रत्येक पात्राच्या बाबतीत दिग्दर्शकाच्या मनात काही ठराविक आडाखे असतात ते त्याने मला समजावून सांगितले. थोडक्यात, माझ्या आणि लक्ष्मणच्या मनातल्या तुळसाचा एक सुरेख मिलाप झालाय, जो सर्वांना लवकरच पडद्यावर पाहता येईल.

असं म्हणतात की, प्रत्येक चित्रपटाच्या टीममध्ये कॅमेèयामागे असलेली केमिस्ट्री ही कॅमेèयासमोरही
जाणवत असते. आजवर तू चित्रपटसृष्टीतल्या अनेक मातब्बर लोकांसोबत काम केले आहेस. त्या
पाश्र्वभूमीवर ‘टपाल‘च्या टीमसोबत काम करतानाचा अनुभव कसा होता?खूप सुंदर! संपूर्ण टीमशी मस्त ट्युqनग झालं होतं. नंदू माधव हे खूप सिनियर नट असूनही त्यांच्यासोबत काम करताना

कधी दडपण आलं नाही, अर्थात याचं श्रेय त्यांच्या स्वभावाला जातं. असूया, स्पर्धा, दबाव अशा गोष्टींना आमच्या सेटवर थारा नव्हता. अगदी रंगाची भूमिका करणारा लहानगा रोहित उतेकरसुद्धा बिनधास्त वावरायचा सेटवर. लहान मुलांसोबत काम करताना, त्यांच्यातला अवखळपणा खरंच सुखावतो. लक्ष्मणमुळे आम्हा सर्वांच्या मनात कामाबद्दल नेमकेपणा असायचा. ‘टपाल‘ची संहिता तर मला आवडली होतीच, पण सोबतीला लक्ष्मणचे संवाद म्हणजे तर ‘सोने पे सुहागाङ्क असल्यासारखंच वाटलं मला. यातल्या प्रत्येक पात्राची स्वत:ची अशी वेगळी भाषा आहे. ही खरं तर लक्ष्मणच्या गावची भाषा आहे. त्यामुळे ती समजून घ्यायला त्याने खूप मदत केली. मला आठवतं, एका सीनमध्ये  तुळसा रंगाला म्हणजे त्या छोट्या मुलाला सांगते की ‘जा घरी निरोप देऊन ये, की आज घरी यायला उशीर होईल.‘ आधी हा डायलॉग म्हणताना मी साध्या टोनमध्ये बोलत होते. पण मग लक्ष्मणने मला समजावून सांगितलं, की हा एक

साधा डायलॉग असला तरी त्यात तुळसाच्या नजरेसमोर दिसणारा खूप मोठा आनंद लपला आहे. तो तुला तुझ्या आवाजाच्या टोनमधून व्यक्त करायचाय. मग हे लक्षात घेऊन मी त्याप्रमाणे माझा टोन बदलला आणि डायलॉगमध्ये जिवंतपणा आला. अतिशय सूक्ष्म पातळीवरचं हे निरीक्षण आणि काम मला खूप समृद्ध करुन गेलंय. असं म्हणतात, की चांगली पटकथा असेल तर तिथेच चित्रपट निम्म यश संपादन करतो, ते काम मंगेशने केलं तर सोबतीला लक्ष्मणचे संवाद, दिग्दर्शन आणि आमच्या संपूर्ण टीमच्या उत्तम परफॉर्मन्सने दुधात साखरच टाकली.  आतापर्यंत ‘टपाल‘ने एकूण नऊ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव तर दोन राष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत आपला ठसा उमटवला आहे. यापैकी गोव्यातल्या ४४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झालेल्या  प्रदर्शनाच्या वेळी तू उपस्थित होतीस. प्रदर्शनाचा हा पहिलावहिला अनुभव कसा होता?
खूप स्पेशल अनुभव होता तो. वेगवेगळ्या देशांतले, वेगवेगळ्या भाषांचे प्रेक्षक तिथे चित्रपट पाहण्यासाठी आले होते. चित्रपट संपल्यावर काही मध्यम वयाच्या बायका हळूच माझ्याजवळ आल्या. त्यांचे डोळे पाणावलेले होते. त्यांनी काही क्षण फक्त माझा हात आपल्या हातात घेऊन माझ्याकडे डोळे भरुन पाहिलं. त्या काहीच बोलल्या नाहीत. खरं तर  काहीच बोलायची गरज उरली नव्हती. त्या नुसत्या स्मित करुन अव्यक्तपणे खूप काहीतरी सांगून निघून गेल्या. तेव्हा त्यांच्याशी शब्दांत संवाद साधणं निरर्थक ठरलं असतं, त्यांचा तो स्पर्शच मला सगळं काही सांगून गेला, खूप काही देऊन गेला. त्या क्षणी मला पटलं, की तुळसाच्या माध्यमातून, संवादाच्या पलीकडलं असं जे मला आणि ‘टपाल‘च्या टीमला सांगायचं होतं ते या बायकांपर्यंत थेट पोहोचलंय.
या पलीकडे एकूणच गोव्यातल्या रसिक प्रेक्षकांनी ‘टपाल‘ला अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं. समीक्षक, पत्रकार यांनी तर प्रशंसा केलीच पण सर्वसामान्य प्रेक्षकांनी दिलेली दाद मला महत्त्वाची वाटली. ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. श्रीराम लागू नेहमी सांगतात की प्रत्येक भूमिका ही कोणत्या ना कोणत्या प्रकारे नटाला समृद्ध करत असते.

वीणाला तुळसाने काय दिलं?
अगदी खरं आहे हे. नट हा खूप भाग्यवान असतो कारण त्याला एकाच आयुष्यात अनेक आयुष्यं जगण्याची संधी मिळते. मलाही तुळसामुळे ७० च्या काळातल्या खेड्यातल्या बाईची वेदना जगून पाहता आली. अन्यथा हे शक्य नव्हतं. कारण माझ्यासारख्या आजच्या पिढीतल्या, शहरात वाढलेल्या मुलीला मूल होणं qकवा न होणं या गोष्टीचं फारसं काही वाटतच नाही. त्यात आता तर मूल होऊ देणं qकवा न होऊ देणं हा सर्वस्वी दांपत्याचा निर्णय असतो हेही आपण मान्य करुनच चालतो. पण लग्नानंतर एखाद्या बाईला मूल न होण्याचं दु:ख, त्यात त्यासाठी तिलाच बोलणी खावी लागणं, तिनेही त्यासाठी स्वत:लाच दोष देणं, समाजाकडून ऐकावे लागणारे सततचे टोमणे हे साधारण ७० च्या काळातल्या स्त्रियांचं दु:ख मी तुळसामुळे समजू शकले, माझ्या मागच्या पिढ्यांशी समरस होऊ शकले. याचं श्रेयपूर्णपणे तुळसाला, पर्यायाने ‘टपाल‘ला जातं. स्त्रीचं अस्तित्व निव्वळ तिच्या प्रजनन क्षमतेशी जोडलं जाण्याचं दु:ख मी या निमित्ताने अनुभवू शकले. आपल्या आजच्या अनुभवांचा परिघ ओलांडून अधिक व्यापक अर्थाने मला स्त्रीचं दु:ख समजून घेता आलं. ही संधी मला तुळसाने दिली.

प्र: ‘टपाल‘मधला तुझा आवडता सीन कोणता?

तुळसा मंदिरात जाते तेव्हा आधी गावातल्या दोन बायका तिला टोचून बोलतात. मग मंदिरातून परतताना गावातल्या  पाटलाची बायको तिला खास अडवून काही सांगते. तेव्हा तुळसा कोणालाच काही प्रत्युत्तर देत नाही. ती फक्त आतल्या आत घुसमटत राहते. काहीच न बोलता तिची ही घुसमट पडद्यावर दाखवणं हे माझ्यापुढचं खरं आव्हान होतं. त्यामुळे हा सीन मला सर्वात जास्त आवडतो. त्या व्यतिरिक्त ‘दोन दिसांची सावलीङ्क हे गाणं मला फार आवडतं. या गाण्याचं चित्रीकरण खूपच सुरेख झालंय.
 बेरीज वजाबाकी

बेरीज वजाबाकी

 बेरीज वजाबाकी

लोकसभा निवडणुकीतील मतदानाची प्रक्रिया आटोपल्याने गेल्या महिना-दोन महिन्यांपासून सतत धावपळीत असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते आता रिलॅ्नस झाले असलेतरी ‘तांची गोळाबेरीज सुरूच आहे. कोणत्ङ्मा विधानसभा क्षेत्रातून किती मते बेरीज वजाबाकी सुरू झाली आहे. तर दुसरीकडे येणारा निकाल काय असेल? या शंकेने जीव अद्यापही टांगणीला आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याच्या पूर्वीपासूनच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामाला लागले होते. गावागावांत कार्यकारिणी तयार करणे, कार्यकर्त्यांचा गोतावळा जमविणे, पक्षाचा प्रचार आणि प्रसार करणे, वेगवेगळ्या उपक्रमांबरोबरच लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी धावपळ करणे, मेळावे आणि कार्यक्रम घेणे यात कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांचा वेळ जात होता. सत्ताधारी आघाडीचे पदाधिकारी भूमिपूजन आणि उद््घाटनात व्यस्त होते तर विरोधक आंदोलनात. निवडणुकीबरोबरच उमेदवार निश्‍चित झाले आणि या कार्यकर्त्यांचे टेन्शन वाढू लागले. या वेळी प्रचाराला कमी अवधी मिळाल्याने अनेकांची दमछाक झाल्याचेही दिसून आले. मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत होता तसतशी पदाधिकार्‍यांची धडकन वाढत होती. मतदानाच्या दोन दिवस आधी तर बूथवरच्या नियुक्त्या, थैल्या आणि पेट्यांचे वाटप, एरिया पलटवून टाकण्यासाठीची पळापळ यामध्ये पदाधिकारी क्षणाचीही उसंत घेत नव्हते. मतदानाच्या दिवशीही त्यांच्या डोक्यावर सार्‍या विश्‍वाचा भार असल्यागत चित्र होते. सायंकाळी ६ वाजता एकदाचे मतदान आटोपले आणि पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सुटकेचा नि:श्‍वास टाकला. आपल्यावर जबाबदारी असलेल्या भागात आपण मतदान कसे पलटवून टाकले.. मतदारांचे मत कसे परिवर्तन केले.. ढाई हजार थे, डेढ को तो पलटा दिया. अशा सुरस कथा हे कार्यकर्ते रात्री उशिरापर्यंत 'भाऊ' आणि 'साहेबांना' ऐकवीत होते.

दरम्यान, गेल्या महिना-दोन महिन्याचे टेन्शन मतदानानंतर कमी झाले असले तरी, क्षेत्रनिहाय मतदानाची आकडेवारी आणि लोकचर्चेतून कार्यकर्ते आपापल्या उमेदवाराच्या विजयाचे गणित मांडू लागले आहेत. येत्या १६ मे रोजी मतमोजणी होणार असून, आपले गणित जमेल की बिघडेल? या शंकेनेही त्यांना ग्रासले आहे. आपला उमेदवार विजयी झाल्यास ठीक, पण पराभवाचा झटका बसल्यास? तोंड कसे लपवायचे, याचीही चिंता या कार्यकर्त्यांना आहेच. असे असले तरी, मतमोजणीला अद्याप महिनाभराचा अवधी असल्याने पुढचे काही दिवस निवांतपणे घालवायचे म्हणून, अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते रिलॅक्स होण्यासाठी बाहेरगावी जाण्याच्या तयारीला लागले आहेत. काहींचे आरक्षणही झाले आहे. अर्थात, त्यासाठी येणार्‍या खर्चाची तरतूद या पदाधिकार्‍यांनी निवडणूक काळातच करून ठेवली असणार एवढे निश्‍चित.
सलग सुट्टय़ांमुळे अनेक कर्मचार्‍यांनी मारली बुट्टी

सलग सुट्टय़ांमुळे अनेक कर्मचार्‍यांनी मारली बुट्टी

निवडणूक धामधुमीचा मिळाला फायदा

सलग सुट्टय़ांमुळे अनेक कर्मचार्‍यांनी मारली बुट्टी

सुट्टय़ांमुळे शासकीय कार्यालये पडली ओस

तीन दिवसांच्या सुट्यांनी सरकारी कर्मचारी खूश

लागोपाठ आलेल्या तीन दिवसांच्या सुट्यांमुळे कर्मचारी चांगलेच खूश आहेत.संपूर्ण विदर्भात १0 एप्रिलला लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. निवडणुकीनिमित्त कर्मचार्‍यांवर असलेल्या शासकीय व निमशासकीय कर्मचारी उशिरापर्यंत कामावर असल्याने त्यांना ११ एप्रिलला सुटी देण्यात आली. १२ एप्रिलला दुसरा शनिवार, १३ एप्रिल रविवार तर १४ एप्रिलला भारतर▪डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सलग तीन दिवस सुटी येत असल्याने असा योग नेहमी येणे नाही म्हणून काही कर्मचार्‍यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत शेगाव, शिर्डी दर्शनासाठी बाहेर जात आहे तर काही तरुण कर्मचारी उन्हाळय़ाची दाहकता कमी करण्यासाठी चिखलदर्‍याला जाणार असल्याचे कळते. सलग तीन दिवसांची सुटी मिळाल्याने काही कर्मचारी घरीच आराम करणार असल्याचे बोलून दाखविले. मात्र सलग तीन दिवसांची सुटी मिळाल्याने शासकीय कर्मचारी मात्र जाम खूश आहेत.


रविवार ६ एप्रिलपासून दर दोन-तीन दिवसाआड येत असलेल्या विविध सणांमुळे शासकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांसाठी सुट्यांचा जणू सुकाळ आहे. त्यामुळे शासकीय कार्यालये ओस पडली असून सलग सुट्टय़ांमुळे अनेकांनी बुट्टी मारून एकप्रकारे उन्हाळ्याच्या सुटीचा आनंद घेणे सुरू केले आहे. त्यात लोकसभा निवडणुकीच्या कामाची भर पडली असून जे निवडणुकीच्या कामात नव्हते त्यांनीही काम असल्याचे यात हात धुऊन घेतला आहे. 

१0 एप्रिल रोजी जिल्ह्यात लोकसभेची निवडणूक पार पडली. या मतदान कामासाठी अनेक अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती केली होती. त्यांना वगळले असता इतर कर्मचारी व अधिकारी यांना मात्र कार्यालयाचीच जबाबदारी होती. मात्र त्यांनीही निवडणुकीचा व सततच्या सुट्टीचा आनंद घेण्याचा प्रय▪केल्याने अनेक कार्यालये आजही ओस पडली आहेत. विशेष म्हणजे ६ एप्रिल रोजी रविवार असल्याने शासकीय सुट्टी तर ७ एप्रिल रोजी सोमवारी कार्यालय होते. त्यानंतर ८ एप्रिल रोजी मंगळवारी रामनवमीची सुट्टी तर ९ एप्रिल रोजी कार्यालय होते. कार्यालय असले तरी इतर कर्मचारी व अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने या कर्मचार्‍यांना विचारणारा कोणीही नसल्याने मात्र ९ एप्रिललाही अनेकांनी बुटीच मारल्याचे निदर्शनास आले. पुन्हा १0 एप्रिलला मतदानाची सुट्टी तर ११ रोजी कार्यालय होते. मात्र १२ एप्रिलला दुसरा शनिवार, १३ एप्रिलला रविवार व १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हनुमान जयंती दिनानिमित्त कार्यालयांना सुटी. नंतर तीन दिवस कार्यालये असले तरी १८ एप्रिलला गुडफ्रायडे, त्यानंतर शनिवार आणि पुन्हा रविवारची सुटी आल्याने या सततच्या सुटीचा आनंद घेण्यासाठी अनेकांनी कार्यालयाला बुट्टी मारल्याचे चित्र आहे. 

गेल्या आठवडाभरात फक्त एक किंवा दोन दिवस कर्मचार्‍यांनी कार्यालयात पाऊल ठेवले असल्याने जनसामान्यांची कामे खोळंबली आहेत. हे चित्र सर्वत्र शासकीय कार्यालयात अनुभवास मिळत आहे. जिल्हा परिषद हे लोकप्रतिनिधींच्या नियंत्रणाखाली असते. मात्र मागील महिनाभरापासून जिल्हा परिषदेचे अधिकारीही आपल्या प्रचारकार्यात व्यस्त असल्याने त्यांच्या कार्यालयातील कर्मचार्‍यांचेही चांगलेच फावले. शासकीय कार्यालयात फेरफटका मारला असता एकही कर्मचारी या पदाधिकार्‍यांच्या कार्यालयात हजर नव्हते. पदाधिकारीच नसल्याने येथील कर्मचार्‍यांना कोणतीच बंधने नसल्याने त्यांना मोकळे रान मिळाले आहे. हे चित्र मागील महिनाभरापासून पाहावयास मिळत असले तरी आता मात्र २१ एप्रिलपासून पूर्ववत अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे आगमन झाल्यानंतर त्यांच्या स्वच्छंदाला आळा बसण्याची शक्यता आहे, पण गेल्या दोन आठवड्यांपासून असलेल्या सुट्यांमुळे आलेला आळस लवकर निघणार नाही हेही तितकेच खरे.
चंद्रपुरात रक्ताचा तुटवडा

चंद्रपुरात रक्ताचा तुटवडा

चंद्रपुरात रक्ताचा तुटवडा 
राज्य शासनाने मोठा गाजावाजा करून सुरू केलेली "ब्लड ऑन कॉल' ही योजनाही सध्या अडचणीत सापडली आहे. रक्ताचा तुटवडा असल्याच्या पार्श्‍वभूमीवर ही योजना राबविताना जिल्हा रुग्णालयाच्या रक्त संक्रमण विभागातील अधिकाऱ्यांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. 
गंभीर रुग्णांना तातडीने रक्त मिळावे, त्यांना खासगी रक्तपेढ्यांच्या चकरा मारण्याची वेळ येऊ नये, यासाठी राज्य शासनाने "ब्लड ऑन कॉल' ही योजना सुरू केली. योजनेनुसार रक्त हवे असल्यास त्याने 104 क्रमांकावर संपर्क साधावा. हा दूरध्वनी पुणे येथील आहे. तेथून मग ज्याला रक्ताची गरज आहे; त्याला ते तातडीने देण्याची व्यवस्था जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्त संक्रमण विभागाची चमू करते. यासाठी खर्चही फक्त पन्नास रुपये येतो. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात "ब्लड ऑन कॉल' योजनेतून जवळपास दीडशे-दोनशे बॉटल रक्त गरजूंना देण्यात आले होते. आता अशी परिस्थिती राहिली नाही. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयातच रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. मार्च, एप्रिल, मे आणि जून महिन्यांचा काळ सुट्यांचा असतो. उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे शाळा, महाविद्यालयेही बंद असतात. त्यामुळे रक्तदान शिबिरांची संख्या कमी झाली आहे. हे रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याचे प्रमुख कारण आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्त संक्रमण विभागात महिन्याकाठी 600 ते 700 बॉटल असतात. मात्र, सुट्यांमुळे हा स्टॉक आता 60 ते 70 बॉटलवर आला असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्त संक्रमण विभागाचे अधिकारी डॉ. अनंत हजारे यांनी दिली. 

खासगी रक्तपेढ्यांची चांदी जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याचा सर्वाधिक फायदा खासगी रक्तपेढ्यांना होत आहे. खासगी रक्तपेढ्याचालक मोठ्या रकमा रक्ताच्या बॉटलसाठी घेत असल्याचे एका रुग्णाने सांगितले. 
अरुण शिंदे - आरोप सिद्ध

अरुण शिंदे - आरोप सिद्ध

विभागीय चौकशीचे आदेश

चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यपालन अधिकारी व विद्यमान अकोला जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांच्यावर येथील जिल्हा परिषद सदस्यांनी सामूहिकपणे लावलेले आरोप शासनातर्फे नियुक्त केलेल्या समितीच्या चौकशी अहवालात सिद्ध झाले. आणि न्यायालयाने शिंदेंवर कारवाई करण्यासाठी विभागीय चौकशीचे आदेश आयुक्तांना दिले. 

येथील जि. प. मुख्य कार्यपालन अधिकारी अरुण शिंदे यांचा कार्यकाळ त्यांच्या गैरव्यवहारामुळे बराच विवादित राहिला. त्यामुळे जि. प. सदस्य आणि शिंदे अनेकदा आमने-सामने आले. सर्व सदस्यांमार्फत अविश्‍वास प्रस्ताव दाखल करण्याचा प्रसंग त्यांच्यावर ओढावला. जि. प. सदस्य विनोद अहीरकर यांनी जि.प. प्रशासनातील अनेक प्रकरणे जनतेसमोर आणून शिंदेंच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. अहीरकरांच्या तक्रारीत सत्यता आढळल्यानंतर हे प्रकरण आणखीच चर्चेत आले. शिंदे यांच्यावर आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरू असताना जिल्हा परिषदेतून झालेल्या एकूण २0 व्यवहारासंदर्भात चौकशी समितीने शिंदेच्या गैरव्यवहारावर शिक्कामोर्तब केले. यात प्रामुख्याने २0११ मध्ये 'जागतिक हातधुवा' कार्यक्रमात ५0 लाखांचा गैरव्यवहार, अनुसूचित जाती जमातीच्या मुलींना सायकल वाटप, अवकार निरीक्षण कक्ष स्थापन करण्यात व डीकलोरिडीकेशन करण्यात ८३.८0 लाखांचा गैरव्यवहार, एम. बी. साबळे यांच्या मदतीने १५.१७ लाखांचा गैरव्यवहार व रिश्‍वतखोरी, सर्व शिक्षा अभियानांतर्गत नियमबाह्य खरेदी करून ५८.३७ लाखांचा गैरव्यवहार, औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून औषधी खरेदी करण्याकरिता शासनाकडून मिळालेल्या रकमेत ३६४.२१ लाख रुपयांचा गैरव्यवहार, शिक्षकांचे समायोजन करून शासनाच्या तिजोरीवर ५0.४0 लाख रुपयांचा भुर्दंड बसवून त्यात गैरव्यवहार, तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतकरिता नियमबा संगणक खरेदी करण्यात शासनाच्या ५५.८0 लाख रुपयांच्या निधीचा गैरवापर, सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्रयोगशाळेचे बांधकाम, शालेय पोषण आहार २0१0-११ अंतर्गत पुरवठादार कंत्राटदारास ६१ लाख ६ हजार ६१ चे जादा रकम देणे, वाहनाच्या पेट्रोलची बनावट देयके तयार करून लाखो रुपये उचलणे, इलेक्ट्रिसिटी मेंटेनन्सच्या नावाखाली बनावट देयके तयार करून पैसे उचलणे, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेच्या निधीचा गैरव्यवहार करणे, एमपीईजीएस अंतर्गत प्राप्त ३ कोटी निधीचा गैरव्यवहार, अशा एकूण २१ प्रकरणांचा यात समावेश होता. जि.प. सदस्यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर या सर्व प्रकरणांची चौकशी होवून या प्रकरणी शिंदेंना शासनातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीने दोषी ठरविले. आणि न्यायालयाने शिंदे आणि संबंधित दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांना दिले. ही चौकशी तत्कालिन वर्धा जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर चóो यांनी पूर्ण केली होती. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर आता शिंदे आणि अन्य दोषी अधिकार्‍यांविरोधात दोषारोप करून शासनास पाठविण्याची तयारी सुरू झाली आहे. या कारवाईमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. त्यामुळे अकोल्याचे जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांच्यावर आता काय, कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Saturday, April 12, 2014

मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते 'चंदेरी सोनेरी' चे प्रकाशन

मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते 'चंदेरी सोनेरी' चे प्रकाशन

सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते काल दि, ११ एप्रिल २०१४ रोजी मैत्रेय प्रकाशनाच्या 'चंदेरी सोनेरी' या ललिता ताम्हणे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. चंदेरी सोनेरी' पुस्तकाच्या प्रकाशनवेळी (डावीकडून) माणिक वर्मा यांची कन्या राणी वर्मा, मैत्रेय उद्योग समूहाच्या सीएमडी वर्षा सत्पाळकर, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, ज्येष्ठ मेकअप मन पंढरीनाथ जूकर, पुस्तकाच्या लेखिका ललिता ताम्हणे आणि मैत्रेय प्रकाशनाच्या संपादिका जयश्री देसाई.
प्रकाशनानंतर 'जीवनगाणे'तर्फे पुस्तकात समाविष्ट मीनाकुमारी ते माधुरी दीक्षित या व्यक्तिरेखांवर आधारित 'चंदेरी-सोनेरी - कलाकार मुलाखतीपलीकडचे' हा सांगीतिक कार्यक्रम सादर झाला.
मेधा पाटकर, राजू शेट्टी, खोत यांना अण्णांचा आशीर्वाद

मेधा पाटकर, राजू शेट्टी, खोत यांना अण्णांचा आशीर्वाद

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी महायुतीचे हातकणंगले मतदारसंघातील उमेदवार राजू शेट्टी, आम आदमी पार्टीच्या ईशान्य मुंबईतील उमेदवार मेधा पाटकर आणि माढा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सदाभाऊ खोत  यांना आशीर्वाद दिला आहे 
भूसुरुंग स्फोटात बाराजण ठार

भूसुरुंग स्फोटात बाराजण ठार

छत्तीसगडमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी माओवादी नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात बाराजण ठार झाले. मागील तीन दिवसांत गडचिरोली-छत्तीसगड पट्ट्यात झालेला हा तिसरा नक्षलवादी हल्ला आहे.
एक संदेश

एक संदेश

23 दिसंबर 2013 को लोक बिरादरी प्रकल्प ने अपनी 40 साल की  यात्रा पूरी की. माडिया एक आदिम जनजाति के उत्थान , देखभाल और विकास के लिए मानवीय, महान सामाजिक कार्यकर्ता बाबा और साधनाताई  आमटे द्वारा शुरू किया गया था,  जो इस परियोजना के बाद से कई गुना विस्तार किया गया है . आज हम एक अस्पताल, आवासीय स्कूल और 60-70 परिवार के सदस्यों के होने जंगली जानवर अनाथालय के माध्यम से सेवा करते हैं ! ऐसे बांस शिल्प, सिलाई , डेयरी , पोल्ट्री और बेकरी के रूप में वोकेशनल प्रशिक्षण गतिविधियों को भी शुरू कर दिया गया है .
 आधुनिक सुविधाओं हमें बेहतर सेवा करने का मौका देने के साथ एक नई इमारत का निर्माण कार्य शुरू कर दिया है .  बाबा आमटे  के शताब्दी वर्ष के उपलक्ष में २६ दिसंबर 2014 , पर अस्पताल का उद्घाटन करने की योजना है, हम उसी को पूरा करने की कोशिश कर रहे हैं .
 हम आप की तरह उदार शुभचिंतकों से आशीर्वाद , प्यार और विश्वास के साथ अपने लक्ष्य को प्राप्त कर सकते हैं कि सुनिश्चित कर रहे हैं .

आपका
अनिकेत प्रकाश आमटे


निधी  लोक बिरादरी प्रकल्प हस्तांतरित करा :
खाते नाव : Maharogi सेवा समिति , Warora
( महाराष्ट्र , भामरागड शाखा बँक ) ,
बचत खाते क्रमांक : . 20244238823 IFSC : MAHB0001108
सर्व देणग्या भारतीय आयकर कायद्याच्या कलम 80 जी अंतर्गत सूट आहे .
पावती साठी - आम्हाला देणगीदारांचे , पत्ता आणि पं नाव ईमेल

Warm Regards,
Aniket Prakash Amte
Lok Biradari Prakalp,
At: Hemalkasa, Post & Taluka: Bhamragad,
District: Gadchiroli, Pin code: 442 710, M.S. India.
Mobile: 9423208802 / 7588772860



Website: www.lokbiradariprakalp.org

www.lbphemalkasa.org.in
आपलं सरकार

आपलं सरकार

आपलं सरकार

बोल बच्चन @ देवनाथ गंडाटे
----------------------------

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. त्यातच मुंबईच्या चित्रनगरीत सध्या एकच चर्चा चाललीय. ती म्हणजे पक्षप्रवेश आणि लोकसभा उमेदवार म्हणून नामांकन भरल्याची. सारेच उठसूठ राजकारणात जाऊ लागलेत. त्यामुळं दिग्दर्शक-निर्मात्यांना चित्रपटांची चिंता वाटू लागली आहे. सारेच राजकारणात गेले तर कसं होईल आपल्या फिल्म इंडस्ट्रीजचे, असा प्रश्न त्यांच्या मनात सतावू लागलाय. त्याचाच हा किस्सा.
एका चित्रपटाच्या अनुषंगाने एक दिग्दर्शक निर्मात्याला काही नायक-नायिका हव्या होत्या. त्यासाठी तो ड्रीमगर्ल हेमामालिनीकडे गेला. मॅडम, आपलं सरकार चित्रपटासाठी आपण भूमिका कराल काय? अशी विचारणा केली. मात्र, हेमाजींनी नकार देत, अभी तो मेरे पास टाईम नही, मोदीजीको पीएम बनाना है. निराश झालेल्या दिग्दर्शकाने मग, दिपाली सय्यद या मराठी अभिनेत्रीची भेट घेतली. चित्रपटाचे कथानक सांगितले. ऐकून ती भारावली. दिग्दर्शकही खूश झाला अन मन मे लड्डू फूटा. पण, झाले ते उलटे. दिपालीने आम आदमी पक्षाच्या तिकिटावर नगरची उमेदवारी मिळविली. निराश झालेल्या दिग्दर्शकाने फोन करून दिपालीला विचारले. का हो मॅडम. तुम्ही तर होकार दिला होता ना. मग, काय झाले?. त्यावर ती म्हणाली, तुम्हीच तर म्हणाले आपलं सरकारमध्ये काम करा. मग, सरकार बनण्यापूर्वी खासदार बनायला नको. हिरमुसल्या मनानं परतलेल्या दिग्दर्शकानं अभिनेत्रींचा नाद सोडला आणि अभिनेत्यांना शोधणे सुरू केले. परेश रावल यांची भेट घेतली. सारं समजावून सांगितलं. दोन दिवसांत कळवितो, असे रावल बोलले. पण, दुस-याच दिवशी वृत्तपत्रात परेश रावल भाजपचे उमेदवार म्हणून बातमी झळकली. दिग्दर्शकाने ओ मॉय गाड म्हणत डो्क्यावर हात ठेवला. पुढे, महेश मांजरेकर यांच्याकडे विनवणी सुरू केली. पण, काही फायदा झाला नाही. त्यांनीही मनसेच्या उमेदवारीत व्यस्त असल्याचे सांगत डॉ. कोल्हेंकडे जाण्याचा सल्ला दिला. बंगल्यातून चहा-पाण्याविना परतलेल्या दिग्दर्शकाने त्यांची जागा डॉ. अमोल कोल्हे भरून काढतील, या आशेनं त्यांच्याकडे गेले. पण, बघतात तर काय त्यांनी हातात शिवधनुष्य घेतला होता. शेवटचा पर्याय नंदू माधव होते. त्यांनी होकार दिला. हरकत नाही, असे सांगत त्यांनीही दिपाली सय्यदचा किस्सा गिरविला. आपलं सरकार आणू. पण आधी लोकसभा जिंकू. मग, या दिग्दर्शकाने राखी सावंतला गाठले. पण, तिची भाषाच निराळी. का, कशासाठी? असे टर्रकविणारे प्रश्न करीत राहील. आपलं सरकार ना. नक्कीच साकार करू. पण, ते राष्ट्रीय आम पक्षाच्या तिकिटावर. तिच्यापुढे काय बोलावे, तिला कसं समजवावं, हे त्या दिग्दर्शकाच्या नाकीनऊ आले होते. पण, ती हट्टी आणि जिद्दी स्वभावाची. या देशात दोनच गोष्टी मोठ्या. एक मीडिया आणि मी (राखी), अशी ती बडबडत होती. एक नंबरची ऑयटमबाज ही राखी एकदिवस दिल्लीतही गेली होती. मै दिल्ली की चाय पिने आयी हू, अशी जोराजोरानं ओरडत कमळाचं फूल मागत होती. काय म्हणावं या पोरीला.


या राजकारणामुळे वैतागलेल्या दिग्दर्शकानेही आपलं सरकार या चित्रपटाचा नाद सोडलाय म्हणे. पण, या अभिनेत्यांच्या डो्नयातील राजकारणाचं भूत उतरल्यावर चित्रपटाचे चित्रिकरण करणार असल्याचे समजते.
 नोटा देणार

नोटा देणार

नोट नाही घेणार
पण, नोटा देणार

उमेदवार पसंत नसेल, तर नोटाचा वापर करा, असा एक संदेश व्हॅट्सवरच्या
ग्रुपमध्ये आला आणि लगेच एका खेड्यातील एका तरुणाने त्यावर आपली कॉमेन्ट्स टाकली. अहो काय सांगता? नोटा घेऊन मतदान करणार नाही आम्ही. ते वाचून त्याच ग्रुपमधील अनेक फेरन्ड्सला हसू आले. इतक्यात एकाने "नया है वह"ची पोस्ट टाकली. नोटा घेऊन मतदान करणार नाही, ही त्याची कॉमेन्ट्स प्रामाणिक आणि जागृत मतदार म्हणून योग्य होती. पण, यातील नोटाचा अर्थ त्याला कळला नव्हता. म्हणून त्याची थोडी गोची झाली. यंदा लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच नोटाचा प्रयोग होणार आहे. यावेळी ईव्हीएममध्ये नन ऑफ द अबाऊ म्हणजेच नोटाचा पर्याय दिला आहे. जर मतदारांना कोणत्याही उमेदवाराला मतदान करायचे नसेल तर नोटाचा पर्याय त्यांच्यासाठी उपलब्ध राहणार आहे. एखाद्या मतदाराला नोटाचा उपयोग करायचा असेल तर एक फॉर्म भरुन द्यावा लागत असे; परंतु आता लोकसभा निवडणुकीत असा फॉर्म भरून देण्याची गरज भासणार नाही. 

लोकसभेचा गाजावाजा मोठा
साराच उमेदवारवर्ग खोटा 
मतदार राजा, तु नाही छोटा
पसंत नसेल, तर दाब नोटा 

या नोटाचा प्रचार काही सामाजिक
संस्था करीत आहेत. विदर्भात
वेगळ्या राज्याच्या मागणीला समर्थन न देणा-या उमेदवारांना पराभूत करा आणि नोटाची बटन दाबा असा प्रचार स्वाभिमानी विदर्भ संघटनेने सुरू
केला आहे. विदर्भ जनता पक्ष यांनी जोरदार मोहिम सुरू केली आहे. ठाणे मुंबई सीमेवरील कोपरी मुलुंड परिसरातले जवळपास २०,००० नागरिकांनी डंपिंग ग्राऊंडच्या मुद्द्यावर या निवडणुकीत नोटाचा पर्याय स्वीकारणार आहेत.
रत्नागिरी लोकसभा क्षेत्रातही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नोटाचा वापर करण्याचा आवाहन केले आहे.
उमेदवार पसंत नाही, असे सांगण्यासाठी पूर्ण फार्म भरून देण्याची पद्धत होती. मात्र, अनेक मतदारांना त्याची माहिती नव्हती. आता व्होटींग मशीनवर नोटाची बटn आल्याने आपला हक्क बजावता येणार आहे. निवडणूक कोणतीही असो. प्रचार, आश्वासने आणि मतदानाच्या दिवशी पैशाचा भडीमार चालतो. अमाप पैसा खर्च करून लोकप्रतिनिधी होण्याचे स्वप्न राजकारणात उतरलेल्या पुढा-यांचे असते. जनतेची सेवा करण्यासाठी अमाप पैसे खर्च करण्याची गरज आहे का?
मग, हे निवडून येणारे लोकप्रतिनिधी खरोखर विकासकामे करतील काय, याची कोणतीही शाश्वती राहिलेली नाही. म्हणूनच उशिरा का होईना, स्वातंत्र्यांच्या इत्नया वर्षानंतर परिवर्तनाची एक लाट देशात येवू पाहत आहे. मात्र, त्या लाटेला मनोटांफचा वापर करून परतवून ावण्याचे काम गर्भश्रीमंत राजकारणी करू पाहत आहेत. देशात सर्वात जास्त सत्ता काँग्रेसने भोगली. मात्र, नागरिकांच्या अपेक्षा आणि देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यात पाहिजे तसे यश आले नाही. दुसरीकडे काँग्रेसची सत्ता उलथून लावण्यासाठी अनेक पक्ष तयार झाले. देशात राष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक असे हजारो पक्ष स्थापन झालेत. एक ना धड भाराभर chiध्या झाल्या. एकाही पक्षाला देश सुधारण्यात यश आले नाही. आता अरvद केजरीवाल देश सुधारण्यासाठी निघालाय. पण, कोणतेही नियोजन नाही. केवळ भ्रष्टाचार...भ्रष्टाचाराविरुद्ध ओरडून देशाचा विकास करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण, ज्यांना एकावरही विश्वास नाही, अशांना नोटाची बटन दाबण्याची ही संधी आहे. विदर्भ जनता पक्ष आणि विदर्भ राज्य हलबा सेना यांना संपूर्ण नागपूर मध्ये वं इतर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद आहे
काँग्रेस शोधणार नवा दलित उमेदवार

काँग्रेस शोधणार नवा दलित उमेदवार


काँग्रेस शोधणार नवा दलित उमेदवार

शहरातील सफाई कामाच्या कंत्राटाचा धनादेश मंजूर करण्यासाठी १0 हजार रूपयांची लाच स्विकारल्याप्रकरणी येथील माजी नगराध्यक्ष बिता रामटेके यांना व त्यांचे पती घनश्याम रामटेके यांनाही शिक्षा सुनावली. २00४ मध्ये हे प्रकरण घडले होते. या प्रकरणामुले काँग्रेस प्रतिमा धुलीस गेली । गत विधानसभा निवड़णूकित त्या चंद्रपूर च्या उमेदवार होत्या । आता काँग्रेसला नवा उमेदवार शोधावा लागणार आहे । गत निवडणुकीत येथील भाजपचे उमेदवार नाना शामकुळे यांनी काँग्रेसच्या बीता रामटेके यांचा १५ हजार ४१० मतांनी पराभव केला. शामकुळे यांना ६७ हजार २५५ मते मिळाली आहेत. तर, रामटेके यांना ५१ हजार ८४५ मते मिळाली।

2009 च्या निवडणुकीत कॉंग्रेसतर्फे बिताताई रामटेके चंद्रपूर विधानसभेच्या उमेदवार होत्या. त्यांना पराभव पत्करावा लागला. याहीवेळी बिताताईच उमेदवार असतील, अशी चर्चा होती. मात्र, त्यांना आता न्यायालयाने दोषी ठरविल्यामुळे त्यांचे राजकीय प्रवास संपण्यात जमा आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने नुकताच आदेश दिला आहे. त्यामध्ये न्यायालयाने एखाद्या राजकीय व्यक्तीला जर शिक्षा दिली, तर ती व्यक्ती भविष्यात निवडणुकीला पात्र ठरणार नाही. यामुळे आता बिताताईला निवडणूक रिंगणात उभे राहता येणार नाही.
तत्कालिन नगराध्यक्ष बिता रामटेके यांच्या कार्यकाळात तुकूम आणि पोलीस लाईन येथील सफाईचे कंत्राट चंद्रपुरातील शितला माता सेवा सहकारी संस्थेला देण्यात आले होते. काम सुरू झाल्यावर काही रकमेचे बिल मंजूर करून धनादेश देण्यात आला. मात्र उर्वारित रकमेसाठी रामटेके यांनी टाळाटाळ करीत १0 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. अखेर या संस्थेच्या अध्यक्षा कविता महातव यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदविली. ठरल्यानुसार ३0 एप्रिल २00४ रोजी बिता रामटेके यांच्या निवासस्थानी कविता महातव यांनी ही रक्कम त्यांना दिली. त्यावेळी बिता यांचे पती घनश्याम रामटेकेही उपस्थित होते. लाचेची १0 हजारांची रक्कम त्यांनी आपल्या पतीकडे देण्यास सांगितली. त्यानुसार ही रक्कम स्विकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने त्या दोघांनाही रंगेहात अटक केली होती. याप्रकरणी विशेष न्यायालयात खटला सुरु होता. तब्बल १0 वर्षांंनी त्याचा निकाल लागला. विशेष न्यायाधीश ए.एस. भैसारे यांनी निर्णय देताना, बिता रामटेके यांना कलम ७ नुसार एक वर्षांंचा कारावास आणि ५00 रुपये दंड, कलम १३ नुसार दोन वर्षांचा कारावास आणि एक हजार रूपये दंडाची सजा सुनावली. या घटनेतील सहभागाच्या आरोपाखाली त्यांचे पती घनश्याम रामटेके यांनाही कलम १२ नुसार एक वर्षाची सजा आणि एक हजार रूपयांचा दंड ठोठावला. या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून संजय मुनघाटे यांनी काम सांभाळले.

Friday, April 11, 2014

२ वर्षाची शिक्षा

२ वर्षाची शिक्षा

चंद्रपूर नगरपरिषद च्या तत्कालीन अध्यक्ष बीता रामटेके यांना लाच घेतल्या प्रकरणी २ वर्षाची शिक्षा सुनावली. शीतला माता बचत गटाच्या बिलासाठी घेतली होती रक्कम


३० जुलै रोजी नगराध्यक्ष बिता रामटेके व त्यांच्या पतीला १० हजारांची लाच स्वीकारताना भ्रष्टाचार निर्मूलन विभागाच्या अधिकार्‍यांनी मुद्देमालासह अटक केली. रात्री उशिरा प्रतिबंधक विभागाचे अधिकारी रामटेके यांना अटक .
 माता महाकाली देवीचे दर्शन

माता महाकाली देवीचे दर्शन

During the five days of the start candrapurata mother Mahakali devi darshan to the devotees around 20 to 25 thousand transplanted presence. Marathwada region for the devotees to enter the group has at least two thousand of devotees daily visit the Mahakali Mata are working. He earned a garava devotees from, for Mahakali Temple Trust has been cold. Sobataca for the devotees in the temple phavaryanci being cold.
Nanded district in Talegaon dream of a devakarani was the mother of Mahakali. Devi Darshan devakaranila was called for. It was for darshan. When the Yatra started from the real Mahakali, is a legend. Mahakali shrine today on behalf of the Committee ghatasthapana huge rush of devotees was .. paurnime the remains of the day duravaruna.
Nanded, Parbhani, Osmanabad, Beed, Aurangabad and andhrapradesatila devotees for darshan of the goddess have been. Caravanserai has been constructed for the devotees to stay at this. There are 46 rooms and two large halls dharmasaleta. Dharmasaleta can get in five to seven thousand devotees. The temple complex is well. Watch is kept in the temple during the Yatra sisitivhi kemeranca. It takes time for the first bhavakam of which the tin. LCD will be displayed in the area. Police deployed two caukyahi travel period and a 24-hour health service will be started. Darsanakarita that should not be possible inconvenience to the devotees, the devotees for special measures have been.
18 thousand devotees in the temple premises for the accommodation of the bailabajara skeara ft area for 10 thousand devotees accommodation has been constructed pavilion skeara feet. The temple for darshan to the devotees visit the rangekarita 18 thousand feet of mandapaci skeara has been given. Queued drinking water, hot and kular from garava facility is to pankhyaci.
They took the bull market in the area of ​​the temple devotees impossible to deal with every year. But, the government this year has akhkha clean. Jagojagi booth has been set up. Mutrigharaci the last three years the system has been closed and the toilet. If the watch is not the first time this year to facilitate all the devotees is getting.

Thursday, April 10, 2014

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर गोळीबार

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर गोळीबार


गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर गोळीबार केला आहे. 
या हल्ल्याला सुरक्षा रक्षकांनी चोख प्रत्युत्तर दिल्याने, निवडणूक निर्णय अधिकारी, कर्मचारी आणि मतपेट्या सुरक्षित आहेत. 
सुरक्षा रक्षकांना नक्षलवाद्यांचा हल्ला परतवण्यात यश आलं आहे. ही घटना गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील गडदेवाडा येथे घडली. नक्षलग्रस्त भागात फक्त 3 पर्यंत मतदानाची वेळ ठेवण्यात आली होती. मतदान संपल्यानंतर मतपेट्या परत नेतांना अधिकाऱ्यांवर हा हल्ला झाला आहे.
गडचिरोली - चिमूरमध्ये मतदान पूर्ण, नक्षलवाद्यांना न जुमानता उत्साही मतदान

गडचिरोली - चिमूरमध्ये मतदान पूर्ण, नक्षलवाद्यांना न जुमानता उत्साही मतदान

गडचिरोली: गडचिरोली-चिमूरच्या नक्षलग्रस्त भागात 3 वाजेपर्यंतच मतदानाची मुदत होती. त्यामुळे या संपूर्ण भागात मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
 नक्षलग्रस्त भाग असूनही या परिसरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 2009 मध्ये गडचिरोलीमध्ये तब्बल 65 टक्के मतदान झालं होतं. यावर्षीची आकडेवारी अजून हाती आलेली नाही.
 मात्र सकाळी 7 पासून मतदार केंद्रावर मोठ मोठ्या रांगा पाहायला मिळत होत्या. नक्षलवाद्यांच्या धमक्यांना न जुमानता नागरिकांनी मोठ्य़ा उत्साहात मतदान केलं.
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे 2 जवान ठार

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे 2 जवान ठार

छत्तीसगड:
लोकसभा निवडणुकीत अडथळे आणण्यासाठी नक्षलवादी कारवाया करत आहेत. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले आहेत. तर इतर 3 जवान जखमी झाले आहेत. राज्यात उद्या मतदान होणार आहे. मतदानाच्याचं पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी आज हल्ला केला असल्याचे सांगितले जात आहे.

Wednesday, April 09, 2014

मतदानासाठी पोलिंग पार्टी रवाना ; चंद्रपूर लोकसभेसाठी 1983 मतदान केंद्र

मतदानासाठी पोलिंग पार्टी रवाना ; चंद्रपूर लोकसभेसाठी 1983 मतदान केंद्र

मतदानासाठी पोलिंग पार्टी रवाना ; चंद्रपूर लोकसभेसाठी 1983 मतदान केंद्रबुधवार, ०९ एप्रिल, २०१४
चंद्रपूर : 10 एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी पोलिंग पार्टी मतदान साहित्यासह रवाना झाली असून गुरुवार 10 एप्रिल रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळात मतदान होणार आहे. मतमोजणी 16 मे 2014 रोजी सकाळी 8 वाजेपासून नवीन उद्योग भवन रेल्वे स्टेशन रोड चंद्रपूर या ठिकाणी होणार आहे.

चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील पोलिंग पार्टीला सहाय्यक निवडणूक अधिकारी संजय दैने व तहसिलदार गणेश शिंदे यांच्या उपस्थितीत 336 मतदान केंद्रासाठी ईव्हीएम मशिन व साहित्य वाटप करण्यात आले. साहित्यासह आज पोलिंग पार्टी आपआपल्या मतदान केंद्रावर रवाना झाल्या.

जिल्ह्यातील 70-राजूरा, 71-चंद्रपूर, 72-बल्लारपूर, 73-ब्रम्हपुरी, 74-चिमूर व 75-वरोरा या विधानसभा मतदारसंघासाठी तसेच 76-वणी व 80-आर्णी या मतदारसंघातही सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या उपस्थितीत साहित्य वितरित करुन पोलिंग पार्टी रवाना करण्यात आल्या. चंद्रपूर जिल्ह्याकरिता 1950 मतदान केंद्राध्यक्ष नियुक्त करण्यात आले असून 5850 मतदान अधिकारी आहेत. तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाकरिता 1983 मतदान केंद्र असून 1983 मतदान अधिकारी नियुक्त केले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा विधानसभा मतदारसंघात 350, चंद्रपूर 336, बल्लारपूर 340, ब्रम्हपुरी 312, चिमूर 305 व वरोरा 307 मतदान केंद्र आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 1950 मतदान केंद्रे असून चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 1983 मतदान केंद्र आहेत. 4081 बॅलेट युनिट व 2446 कंट्रोल युनिट उपलब्ध असून त्याचे वितरण करण्यात आले. तर वणी विधानसभा मतदारसंघाकरिता 676 बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट आणि आर्णी विधानसभा मतदारसंघाकरिता 756 बॅलेट युनिट व 378 कंट्रोल युनिट उपलब्ध आहेत.
रायगड लोकसभा मतदार संघातील निवडणुकीत आता 10 उमेदवार

रायगड लोकसभा मतदार संघातील निवडणुकीत आता 10 उमेदवार

रायगड लोकसभा मतदार संघातील निवडणुकीत आता 10 उमेदवारबुधवार, ०९ एप्रिल, २०१४
अलिबाग : 32-रायगड लोकसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी 5 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता 32-रायगड लोकसभा मतदार संघात 10 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

32-रायगड लोकसभा मतदार संघात आता 10 उमेदवार असून त्यांची माहिती व पक्ष पुढीलप्रमाणे आहेत.

अ.क्र. उमेदवारांची नावे, पक्ष, मिळालेले चिन्ह :

1.  अनंत गीते, शिवसेना, धनुष्यबाण
2. तटकरे सुनिल दत्तात्रय,  नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी , घड्याळ
3. यशवंत जयराम गायकवाड,  बहुजन समाज पार्टी,  हत्ती
4 . डॉ.अपरांती संजय यशवंत,   आम आदमी पार्टी , झाडू
5.  आजीज अब्दूल कादीर मुकादम,  समाजवादी पार्टी , सायकल
6.  डॉ.घोणे आदेश यशवंत,  बहुजन मुक्ती पार्टी , खाट
7.  रमेशभाई कदम , पीझंटस ॲण्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया,  कपबशी
8.  संदिप पांडूरग पार्टे,  हिन्दुस्तान जनता पार्टी,  शटल
9.  मुज्जफर जैनुदिन चौधरी उर्फ मोदी,  अपक्ष,  हॅट
10.  सुनिल तटकरे,  अपक्ष,  पेनाची निब सात किरणांसह
चंद्रपूर प्रचार थांबला : उद्या मतदान

चंद्रपूर प्रचार थांबला : उद्या मतदान

चंद्रपूर प्रचार थांबला : उद्या मतदान


१७,५0,७८१ मतदार बजावणार हक्क
१,९८३ मतदान केंद्र : ४९ संवेदनशिल
१९,९00 अधिकार्‍यांचा ताफा
एसटी बसेससह ५४५ वाहने तैनात
सुरक्षेसाठी ३,६७0 पोलिसांचे बळ
अधिक मतदानासाठी ग्रामपंचायतींना पुरस्कार


आजची रात्र वैर्‍याची : उमेदवारांची धडधड वाढली

Tuesday, April 08, 2014

18 उमेदवारांचे भाग्य आज मशीनबंद

18 उमेदवारांचे भाग्य आज मशीनबंद

गडचिरोली-चिमूर मतदार संघातही चोख सुरक्षा
चंद्रपूर :
१0 एप्रिल रोजी होणार्‍या लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मतदान केंद्रांवरील चमू साहित्यांसह गंतव्य स्थळी पोहोचली आहे. तर, १ हजार ९८३ राखिव कर्मचारी-अधिकार्‍यांची फळीही सज्ज आहे.
गुरूवारी सकाळी ७ वाजतापासून मतदानाला प्रारंभ होत आहे. सायंकाळी ७ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालेल. त्यानंतर ही प्रक्रिया बंद केली जाईल. तत्पूर्वी केंद्रांवर रांगेत असलेल्या सर्व मतदारांची नोंद करून त्यांना संधी दिली जावी, अशा सूचना मतदान केंद्राध्यक्षांना देण्यात आल्या आहेत.
चंद्रपूर विधानसभा मतदार संघात ३३६ मतदान केंद्रासाठी ईव्हीएम मशिन व साहित्य वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील राजुरा, चंद्रपूर, ७२ बल्लारपूर, ब्रह्मपुरी, चिमूर व वरोरा या विधानसभा मतदार संघासाठी तसेच वणी व आर्णी या मतदार संघातही सहायक निवडणूक अधिकार्‍यांच्या उपस्थितीत साहित्य वितरित करुन पोलींग पार्टी रवाना करण्यात आल्या. चंद्रपूर जिल्ह्याकरिता १ हजार ९५0 मतदान केंद्राध्यक्ष नियुक्त असून ५ हजार ८५0 मतदान अधिकारी आहेत. तर चंद्रपूर लोकसभा मतदार संघाकरिता १ हजार ९८३ मतदान केंद्र असून तेवढेच मतदान अधिकारी नियुक्त आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील जिल्हा उद्योग भवनात स्ट्राँग रूम तयार करण्यात आले आहे. मतदानानंतर परत आलेले सर्व बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट येथे जमा केले जाणार आहेत. त्यासाठी कडक सुरक्षा ठेवली जाणार आहे. पोलिसांसोबतच निवडणुकीच्या कर्तव्यावरील अधिकार्‍यांच्याही पाळ्या लावल्या जाणार आहेत. मतमोजणीच्या तारखेपर्यंत सतत २४ तास या स्थळाचे चित्रीकरण केले जाणार आहे.
राजुरा विधानसभा     ३५0
चंद्रपूर विधानसभा     ३३६
बल्लारपूर विधानसभा     ३४0
ब्रह्मपुरी विधानसभा     ३१२
चिमूर विधानसभा     ३0५
वरोरा विधानसभा     ३0७
चंद्रपूर जिल्ह्यात     १,९५0
चंद्रपूर लोकसभा मतदार संघ १,९८३ बॅलेट युनिट ५,५१३
■ जिल्ह्यातील मतदार संघात
४,0८१ बॅलेट युनिट व २,४४६ कंट्रोल युनिट
■ वणी विधान. मतदार संघात
६७६ बॅलेट युनिट
■ आर्णी विधान. मतदार संघात
७५६ बॅलेट युनिट व ३७८ कंट्रोल युनिट गडचिरोली-चिमूर मतदार संघातही चोख सुरक्षा ■ गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातही चोख सुरक्षा ठेवली जाणार आहे. नक्षलग्रस्त असलेल्या या मतदार संघातील १ हजार ७९४ मतदान केंद्रंपैकी १८४ केंद्र अतिसंवेदनशील आहेत. येथे संवेदनशील तालुक्यात मतदानाची वेळ दुपारी ३ वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे.
■ उमेदवार -११ ■ मतदार -१४, ६९, ६५0
■ मतदान केद्र -१,७९४ ■ संवेदनशिल केंद्र -१८४
■ निवडणूक कर्मचारी -९,000    ■ पोलीस बळ -११ हजार
१६ व्या लोकसभा निवडणुकीसाठी काऊंट डाऊन

१६ व्या लोकसभा निवडणुकीसाठी काऊंट डाऊन

१६ व्या लोकसभा निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून आता उमेदवारही काऊंट डाऊन करायला लागले आहेत. मतदारांची अंतीम यादी तयार झाली असून त्यात सुमारे ३0 हजार मतदारांची वाढ झाली आहे. १७ लाख ५0 हजार ७८६ मतदारांची संख्या असून त्यात स्त्री मतदार ८ लाख ३0 हजार ९८९ तर पुरूष मतदार ९ लाख १९ हजार ८९७ आहेत. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघामध्ये एक हजार ९५९ मतदान केंद्र असून सहाय्यकारी केंद्र ंमिळून ही संख्या एक हजार ९८३ झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, चंद्रपूर, बल्लारपूर आणि राजुरा या चार विधानसभा मतदार संघांमिळून ४ हजार ८१ बॅलेट युनिट आणि २ हजार १३६ कंट्रोल युनिटची व्यवस्था करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी आणि आर्णी या विधानसभा मतदार संघांमध्ये यवतमाळच्या जिल्ह्या प्रशासनाने आवश्यकतेनुसार इव्हीएम मशिनची व्यवस्था केली आहे.
जिल्ह्यातील ९ हजार २३६ कर्मचार्‍यांची निवडणूक कर्तव्यावर नियुक्ती करण्यात आली आहे. या सोबतच एक हजार ४३६ राखीव कर्मचारीही तैनात ठेवण्यात आले आहेत. ९ एप्रिलला मतदान केंद्राध्यक्ष आणि त्यांची चमू नियोजित मतदान केंद्रावर पोहोचणार आहे. त्यांच्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. या वाहनांतून मतदान यंत्र आणि निवडणूक कर्मचार्‍यांना केंद्रावर पोहचविण्याची आणि परत आणण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. 

Monday, April 07, 2014

प्रोबेशनरी ऑफिसर या पदांची जाहिरात

प्रोबेशनरी ऑफिसर या पदांची जाहिरात

भारतीय स्टेट बँकेने आज भारतातील आपल्या सर्व शाखांसाठी प्रोबेशनरी ऑफिसर या पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण १८३७ रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. यातील ७५८ पदे खुल्या वर्गासाठी असणार आहेत.   या पदासाठी संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवीप्राप्त असणे आवश्यक आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारांची परिक्षा घेण्यात येणार आहे. यातून निवड झालेल्या उमेदवारांना भारतातील स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत नियुक्ती केले जाईल.   प्रोबेशनरी ऑफिसरसाठी किमान वय २१ तर कमाल वयोमर्यादा ३० वर्ष असणार आहे. तर एससी आणि एसटी उमेदवारांना ५ वर्षे तर ओबीसी उमेदवारांना ३ वर्षांची सुट मिळणार आहे. या पदासाठी १ एप्रिल २०१४ चे वय ग्राह्य धरण्यात येईल.   या पदासाठी फक्त ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. यासाठीची लिंक आजपासून सुरू करण्यात आली आहे. २४ एप्रिल पर्य़त अर्ज करता येणार आहे. खुल्या आणि ओबीसी गटातील उमेदवारांसाठी ५०० रूपये फी असून एससी आणि एसटी उमेदवारांना १०० रूपये फी आहे.  

अधिक माहितीसाठी स्टेट बँकेची वेबसाईट
 http://www.sbi.co.in/user.html  किंवा https://www.sbi.co.in/webfiles/uploads/files/SBI_PO_RECRUITMENT_ADVERTISEMENT_ENGLISH.pdf
या लिंकवर क्लिक करा.

मंगळवारी प्रचार थांबणार

मंगळवारी प्रचार थांबणार

१६ व्या लोकसभेसाठी सुरू असलेल्या निवडणुकीची प्रक्रिया अंतीम टप्प्यात आली आहे. मतदानाला केवळ चार दिवस उरले आहेत. या अखेरच्या दिवसात उमेदवारांपासून तर राजकीय पक्ष आणि शासकीय यंत्रणेची आता अखेरच्या टप्प्यातील धावपळ सुरू झाली आहे. निवडणुकीतील जाहीर प्रचार मंगळवारी सायंकाळी ५ वाजता थांबणार आहे. त्यानंतरचे दोन दिवस सर्वांच्याच दृष्टीने महत्त्वाचे आहेत. यामुळे या काळात यंत्रणेवरचा ताण अधिकच वाढलेला राहणार आहे.

Saturday, April 05, 2014

लोक बिरादरी

लोक बिरादरी

सप्रेम नमस्कार ……….
आदिवासी बांधवानकरिता विनामूल्य चालविण्यात येत असलेल्या लोक बिरादरी प्रकल्पाच्या सर्वोपचार दवाखान्याची जुनी इमारत मोडकळीस आली आहे. त्याच ठिकाणी नवीन इमारत उभारण्यात येत आहे. जवळपास रुपये ५ कोटी खर्च अपेक्षित आहे. अजूनही ५० लाख रुपये जमवायचे आहेत.

स्व. बाबा आमटेंचे हे जन्म-शताब्दी वर्ष. २६ डिसेंबर २०१४ रोजी नविन दवाखान्याच्या इमारतीचा लोकार्पण सोहोळा व्हावा असा संकल्प आहे. आमचे प्रयत्न सुरु आहेत.
आपणा सारख्यांच्या मदतीने व आशीर्वादाने आम्हा कार्यकर्त्यांचा कार्य करण्याचा उत्साह दुप्पटीने वाढतो. प्रकल्पाला भेट दिल्यास आनंद होईल.
सोबत जोडलेले माहिती पत्रक कृपया तुमच्या संपर्कांना पाठवावेत.
लोभ असावा.

अनेक शुभेच्छानसह,


Aniket Prakash Amte
Lok Biradari Prakalp,
At: Hemalkasa, Post & Taluka: Bhamragad,
District: Gadchiroli, Pin code: 442 710, M.S. India.
Mobile: 9423208802 / 7588772860
Website: www.lokbiradariprakalp.org & www.lbphemalkasa.org.in

Friday, April 04, 2014

देवी महाकालीच्या यात्रेला प्रारंभ

देवी महाकालीच्या यात्रेला प्रारंभ

चंद्रपूर : जिल्ह्याचे आराध्यदैवत असलेल्या देवी महाकालीच्या चैत्र नवरात्र उत्सव सोहळ्याला उद्यापासून सुरुवात होत आहे. यात्रा कालावधीत देवीच्या दर्शनासाठी स्थानिक भाविकांसोबत मराठवाड्यातील भाविक मोठय़ा संख्येने येतात. त्यांच्या सुविधांसाठी प्रशासनानेही आपली तयारी सुरू केली आहे. एकीकडे निवडणुकीची धामधूम सुरू आहे. दुसरीकडे हजारो भाविक चंद्रपुरात दाखल होणार आहेत. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ होत आहे.
देवी महाकालीच्या यात्रेला ५ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. जवळपास महिनाभर चालणार्‍या यात्रा कालावधीत देवीच्या दर्शनासाठी शेकडो भाविक हजेरी लावतात. त्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. भाविक प्रवासी वाहनांसह माल वाहतूक करणार्‍या वाहनातूनही येतात. आसन क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त प्रवासी वाहनातून बसून येत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अपघाताच्या घटनाही घडतात. यात्रा सुरक्षित पार पडावी, यासाठी अधिकृत प्रवासी वाहनातूनच प्रवास करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. जिल्ह्याचे आराध्य दैवत असलेल्या देवी महाकालीच्या दर्शनासाठी कोल्हापूर, नांदेड, सोलापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, बीड, परभणी, लातूर, आंधप्रदेशातील भाविकही हजेरी लावतात. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. अशावेळी भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. मात्र निवडणुकीची धामधूम सुरू असल्याने बहुतांश अधिकारी-कर्मचारी निवडणुकीच्या कामात गुंतले आहे. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे.
चंद्रपूर हि एक तीर्थ भूमी : नरेंद्र मोदी

चंद्रपूर हि एक तीर्थ भूमी : नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदींच्या भाषणातील मुद्दे
मी चंद्रपूरच्या या मातीशी संबंध ठेवून आहे . हे मला श्री मोहन भागवत याचे कडून  बाळकडू मिळाले. ते या जमीनिवारचे आहे . माझ्यासाठी  हि एक तीर्थ भूमी आहे. माता महाकाली यांचे आशीर्वाद घेवून मी इथे माझ्या सभेला प्रारंभ केला आहे .
 

शेतकर्याचे ते नांगर धरा तर या जमीन प्रगतीचे रंग दाखवू लागेल : नरेंद्र मोदी

शेतकरी आत्महत्या आहेत पण काँग्रेस सजग नाही . शेतकरी आपापसांत उत्पादकता वाढविण्यासाठी आवश्यक आहे . आमच्या अहिर जीनी कोळसा घोटाळा विरुद्ध लढाई केली. तो कॉंग्रेस चा चेहरे अंधकारमय झाला : अनेक वर्षे काँग्रेस ने फक्त मत मागितले. ते वगळता आदिवासीसाठी काय केले ? अटलबिहारीजी ने आदिवासी साठी एक मंत्रालयाने तयार केले. लातूर मध्ये काय घडले ते तंदूर केसपासून आहे , महिलांना काँग्रेस ' बांधिलकी अतिशय स्पष्ट आहे : मी महाराष्ट्रात आहे आणि आपण्च सांगू शकाल सध्या लातूर मध्ये काय झाले? एक युवक ने काँग्रेस महिल्या नेत्याची हत्या केली. ज्यांनी काँग्रेस लोकांच्या नजरेत धूळ फेकणे होईल. वेळ आली आता ते पुढे एक पाऊल गेले आणि ते मिरपूड स्प्रे ठेवले : सोनिया आपण खोट्या माहिती देत आहात. महिलांसाठी दिशाभूल केली जात आहे. नरेंद्र मोदी : टाप टेन 10 मध्ये दोन्हीपैकी भाजपा किंवा एनडीए राज्य आहेत . 

सोनिया मॅडम आपण एक स्त्री आहेत . पण आपण महिलांना दिशाभूल करीत आहेत . राष्ट्र काही विषयांवर उत्तरे इच्छित आहे: नक्षलवादी रक्त संद्वित आहेत.


एक आणि महाराष्ट्र EC प्रख्यात आहेत तर मला माहीत नाही . काँग्रेस नेते गडचिरोली भागात सुरक्षा कापू असे अभिवचन दिले आहे की एक बातमी आहे.

Wednesday, April 02, 2014

 मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतले प्रशिक्षण

मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतले प्रशिक्षण

गडचिरोली विधानसभा क्षेत्र
गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघांतर्गत गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या एकूण 1408 मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांचे निवडणूक कामकाजविषयक प्रशिक्षण आज पार पडले.

गडचिरोलीतील बसस्थानकाजवळील कारमेल विद्यालयात सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणूकविषयक प्रशिक्षण क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले. या प्रशिक्षणाची पाहणी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय धिवरे, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पी. शिवशंकर यांनी केली. यावेळी कुरखेडाचे उपविभागीय अधिकारी आर.जी. खजांची, तहसीलदार बी. जी. जाधव, नायब तहसिलदार एस.बी. राठोड यांची उपस्थिती होती.

कारमेल विद्यालयात एकूण 36 खोल्यांमध्ये राखीव मतदान प्रतिनिधींसह एकूण ३५२ पथकातील १४०८ मतदान अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणामध्ये इव्हीएम मशीन वापराबाबत संपूर्ण माहिती दिली. त्याचबरोबर मतदान केंद्रातील सुरक्षा व्यवस्था नेमून दिलेली कामे, मतदान प्रक्रिया, निवडणूक विषयक कागदपत्रे, मार्गदर्शक तत्त्वे आदींसह निवडणूक कामकाजाची माहिती देण्यात आली. निवडणूक कामकाजविषयक माहिती छापील मजकुरासह पॉवरपॉइंट आणि दृश्यस्वरूपातही प्रशिक्षणार्थींना देण्यात आली. प्रशिक्षणासाठी सर्व क्षेत्रीय अधिकारी, केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, कर्मचारी आदींची उपस्थिती होती.
कर्तव्य भावनेतून शंभर टक्के मतदान करा - डॉ. दिपक म्हैसेकर

कर्तव्य भावनेतून शंभर टक्के मतदान करा - डॉ. दिपक म्हैसेकर

चंद्रपूर : लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांना घटनेने मतदानाचा अधिकार दिला आहे. हा अधिकार नागरिक व युवकांनी कर्तव्य भावनेने वापरुन शंभर टक्के मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर यांनी केले.

जिल्हा निवडणूक अधिकारी व सरदार पटेल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृती कार्यक्रम सरदार पटेल महाविद्यालयात घेण्यात आला, त्यावेळी डॉ. म्हैसेकर बोलत होते. उपविभागीय अधिकारी संजय दैने, तहसिलदार गणेश शिंदे, उपप्राचार्य डॉ. एल.डी. शेंडे व डॉ. आर.पी. इंगोले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगाने देशभर अभियान सुरु केले असून या अभियानाचा भाग म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र मतदान वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले. 1 जानेवारी 2014 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुण तरुणींना 10 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानात सहभागी होता येईल. मतदान करणे हा आपला अधिकार असून तो प्रत्येकाने बजावावा, असेही त्यांनी सांगितले. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 58.59 टक्के मतदान झाले होते. 10 एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीत ही टक्केवारी 80 टक्क्यांवर जावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. मतदान वाढविण्यासाठी डॉक्टर व वकील यांची बैठक घेऊन त्यांना आवाहन केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

ज्यांचे नाव यादीत आहे त्यांना मतदान करता येईल, परंतु ज्यांचे नाव यादीत नाही अशा तरुण तरुणींना आपले कुटुंबीय, शेजारी व परिचित यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी आयोगाने मतदानाची वेळ एक तासाने वाढविली असून आता सकाळी 7 ते 6 या वेळेत मतदान करता येईल. या निवडणुकीत प्रथमच आयोगाने नोटा (यापैकी पसंत नाही) हा पर्याय उपलब्ध करुन दिला असून हा शेवटचा पर्याय आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थितांना मतदान करण्याची शपथ दिली.

श्री. दैने म्हणाले, सर्वांचे मत महत्त्वाचे असून हा अधिकार आपण जाणीवपूर्वक वापरला पाहिजे. जास्तीत जास्त मतदान होणे हे लोकशाहीच्या हिताचे असून मतदानाचा अधिकार वापरलाच पाहिजे असा आग्रह त्यांनी व्यक्त केला. मतदानाच्या दिवशी सहलीवर न जाता आधी मतदान करावे, असे आवाहनही श्री. दैने यांनी केले.

मतदानाचा अधिकार हा घटनेने दिलेला सर्वोच्च अधिकार असून मतदान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे व ते बजावावे, असे आवाहन डॉ. शेंडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. स्वप्नील माधमशेट्टीवार यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ.आर.पी. इंगोले यांनी मानले.
तर अण्णांचे प्रत्येकालाच आशीर्वाद.

तर अण्णांचे प्रत्येकालाच आशीर्वाद.

वाल्याचा वाल्मिकी होणार असेल,
तर अण्णांचे प्रत्येकालाच आशीर्वाद

अहमदनगर, दि. २.४.२०१४.
सध्या लोकशाहीचा निवडणुकीरूपी कुंभमेळा चालू आहे. या कुंभमेळात पवित्र होण्यासाठी हौसे-नवसे-गवसे-भ्रष्टाचारी-गैरव्यवहारात अडकलेले सर्वजण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी जात आहेत. खरेतर, वाल्यांचे वाल्मिकी होऊन सामान्य जनतेचे प्रश्न सोडविणार असतील तर, श्री. हजारे यांचे अशा प्रत्येक उमेदवाराला आशीर्वादच आहेत.
प्रत्येक लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभे राहणाèया बहुतांशी उमेदवारांना अचानक अण्णांची आठवण होते. त्यांचे आशीर्वाद घेण्याची गरज वाटते. एरवी हे उमेदवार अण्णांच्या देशहिताच्या कुठल्याही आंदोलनात कधीही सहभागी नसतात. तसेच अण्णांनी उपस्थित केलेल्या जनहिताच्या प्रश्नांशी या उमेदवारांना कुठलेही कर्तव्य नसते. ते संपुर्णत: आलिप्त असतात. ऐन निवडणुकीतच अशा उमेदवारांना अण्णांची आठवण होते. अण्णांची भेट घेऊन, फोटो काढून बातम्या छापुन आणण्यासाठी खटाटोप केला जातो. परंतु आता जनता जागृत झालेली आहे. असे ढोंगी उमेदवार त्यामुळे जनतेस फसवू शकत नाहीत. अण्णांच्या जनहिताच्या लढयात कधीही नसलेले हे संधीसाधू आता अण्णांची भेट घेण्याकरीता मिनतवारी करतांना दिसतात.
काही उमेदवार तर केवळ असे नाटकच करत नाहीत, तर मतदारांमध्येही अण्णांच्या पाqठब्याचा आभास निर्माण करतात. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे नगर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार खा. दिलीप गांधी. खा. गांधी यांनी नुकतीच अण्णांची भेट घेतली. याबाबत त्यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी सांगितले की, ‘अण्णा हजारे यांनी माझ्या कामाची चौकशी केली, तुम्ही चांगले काम केले आहे. तुम्ही या पुढेही चांगले काम करत रहा,ङ्क असे पत्रकारांना सांगितले. त्याच्या बातम्या वृत्तपत्रातून प्रसिध्द झाल्या. मंत्री आणि खासदार पद भुषिविलेल्या खा. गांधी यांनी निर्लज्जपणे किती खोटे बोलावे, आणि अण्णांच्या भेटीचे आणि त्यांनी न बोललेल्या वाक्यांचे कसे भांडवल करावे, याचा हा आदर्श वस्तुपाठ आहे. नगर अर्बन बँकेतल्या घोटाळयांविषयीचे सर्व तपशील आणि त्यातील खासदार महोदयांची मर्दुंमकी अण्णांना आणि सर्वांनाच ठाऊक आहे. या बाबत चौकशी आणि कारवाईसाठी अण्णांनी शासनाशी पत्रव्यवहारही केलेला आहे. इतकेच नव्हे तर भारतीय जनता पक्षाच्या विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, भाऊसाहेब तथा पांडुरंग फुंडकर व ईतर नेत्यांनी भ्रष्टाचाराबद्दल कारवाईची मागणी शासनाकडे केलेली आहे. श्री. हजारे यांच्यावर बेलगाम व खोटे आरोप करणारे जळगावचे माजी मंत्री सुरेश जैन व खा. गांधी यांची मैत्री सर्वश्रुत आहे. त्यावेळेस अ.नगर येथे खा. गांधी यांच्याकडेच सध्या भ्रष्टाचाराबद्दल तुरूंगवासी असलेल्या सुरेश जैन यांची उठबस होती. कुठल्याही पक्षाशी अथवा उमेदवाराशी आम्हाला काहीही घेणे देणे नाही. परंतू दिलीप गांधी वृत्तपत्रातून गैरसमज पसरविल्याने आधिक स्पष्टीकरणाकरिता आम्हाला हे सांगण्याची आवश्यकता वाटत आहे. वृत्तपत्रांशी बोलतांना खा. गांधी यांनी असेही सांगितले की, ‘ नरेंद मोदी यांना पाqठब्याबाबत अण्णा काहीही बोलले नाहीत. कदाचित मोदी स्वच्छ असतीलही परंतू भाजपने उमेदवारी दिलेले येडूरप्पा qकवा खा. गांधी यांसारखे उमेदवार जर निवडून आले तर मोदी भ्रष्टाचारमुक्त-समर्थ भारत कसा निर्माण करू शकतील, अशी शंका अण्णांनी वाटली.
खरेतर अशा उमेदवारांनी अण्णा यांची भेट घेऊन फोटो आणि कथित आशीर्वादाच्या बातम्या छापून आणण्याकरीता खटाटोप निरर्थक आहे. त्याऐवजी खèया अर्थाने लोकशाही रूजविण्याकरिता भ्रष्टाचार निर्मुलन, नागरीकांची सनद, नापसंतीचे मत नोंदविण्याबाबत, अकार्यक्षम लोकप्रतिनिधीला परत बोलविण्याचा अधिकार, ग्रामविकास, व्यवस्था परिवर्तन याकरिता सदर उमेदवार काय करणार आहेत, याची माहिती मतदारांना देणे गरजेचे आहे. तसेच हे उमेदवार अण्णांनी उपस्थित केलेल्या जनहिताच्या १७ मुद्यांबाबतही सोईस्कररित्या मौन बाळगुन आहेत. श्री. हजारे यांची भुमिका स्पष्ट असून उमेदवार कुठल्याही पक्षाचा अथवा गटातटाचा पुरस्कार अण्णा करीत नाहीत. तर जो उमेदवार चारित्र्यसंपन्न, आणि खèया अर्थाने सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याकरिता प्रयत्नशील असेल त्यास जनतेने निवडुन दयावे, असे अण्णांचे आवाहन आहे. ज्या मतदारसंघात मत देण्यायोग्य एकही उमेदवार नसेल तेथे नापसंतीचे मत नोंदवावे. परंतू राष्ट्रीय कर्तव्य असल्याने प्रत्येकाने मतदान आवश्य करावे, असे आवाहन अण्णांनी केले आहे.
‘‘सुर्य कुणाच्याही कोंबडयाच्या अरवण्याने उगवू दया,
परंतू तो आता उगवू दया.