সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, July 29, 2010

भोंदू साधूनेही केले लैंगिक शोषण?

भोंदू साधूनेही केले लैंगिक शोषण?

Friday, August 06, 2010 AT 12:00 AM (IST)

Tags: crime, sexual harassment, chandrapur, vidarbha
चंद्रपूर - राज शहा याच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण गाजत असतानाच आज (ता. पाच) शहरातील एका पीडित तरुणीने वृत्तपत्रांच्या कार्यालयात निनावी पत्र पाठवून खळबळ उडवून दिली आहे. शहरातीलच एक महाराज (भोंदू साधू) याने आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप तिने या पत्रातून केला आहे.
गेल्या 15 दिवसांपासून लग्नाचे आमिष देऊन लैंगिक शोषण आणि अश्‍लील चित्रीकरण केल्याचे प्रकरण शहरात गाजत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी राज शहा, त्याचा मित्र पिंटू रॉय आणि एक मैत्रीण अशा तिघांच्या सेक्‍स स्कॅंडल नेटवर्कचा पर्दाफाश झाला. या प्रकरणाची कसून चौकशी सुरू असतानाच आज वृत्तपत्रांच्या कार्यालयात टपाल कार्यालयातून एक निनावी पत्र आले. त्यात पीडित तरुणीने राज शहाप्रमाणेच ढोंगीबाबाच्या कृत्याचा पर्दाफाश करण्याची विनंती पोलिस आणि प्रसारमाध्यमांना केली आहे. हिंदी भाषेत लिहिलेल्या या पत्रातून तिने राज शहाचे प्रकरण उघडणाऱ्या तरुणींच्या धाडसाचे अभिनंदन केले आहे. मात्र, पत्रामध्ये ती ढोंगीबाबाच्या वासनेला कशी बळी पडली, याचा पाढाही वाचला आहे. तिने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, हा ढोंगीबाबा शहरातील एका प्रतिष्ठित मंदिरात राहतो. धर्म, पूजा आणि मानवसेवेच्या नावाखाली गेल्या अनेक वर्षांपासून त्याने तरुणींची शिकार केली आहे. शारीरिक, मानसिक आणि भावनात्मक शोषण केल्याचा आरोपही तिने केला आहे. केलेल्या कृत्यांचे संपूर्ण पुरावे असल्याचा दावाही तिने केला आहे

** ** ** * *** * * ** * ** *** * ** * * ** * * *  ****  ** **************
अखेर "नीतू' कोठडीत


Thursday, August 05, 2010 AT 12:00 AM (IST)

Tags: crime, chandrapur, vidarbha
चंद्रपूर - लैंगिक शोषणाच्या प्रकरणात मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी प्रमुख भूमिका निभावणाऱ्या "नीतू'ला अखेर पोलिसांनी आज (ता. चार) दुपारी दीडच्या सुमारास अटक केली. लगेच तिला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने 15 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत तिची रवानगी केली. दरम्यान, तिच्या अटकेसाठी महिला संघटनांनी पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले होते.
बंगाली कॅम्प येथील एक पोल्ट्री व्यावसायिक शहा यांचा मुलगा राज याने तब्बल सहा तरुणींना लग्नाचे आमिष देऊन लैंगिक शोषण केल्याचा प्रकार एका पीडित तरुणीच्या माध्यमातून उघडकीस आला. या पीडित तरुणीने लग्नास नकार मिळाल्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. गेल्या आठवडाभरात या प्रकरणातील अनेक बाबी उघड झाल्याने राज शहा याच्यासह पिंटू रॉय यास अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले. दरम्यान, या प्रकरणात मुलींना जाळ्यात ओढण्याची प्रमुख भूमिका नीतू नामक 22 वर्षीय तरुणीने निभावल्याचे पीडितांनी दिलेल्या तक्रारीतून स्पष्ट झाले. मात्र, आठवडा लोटूनही तिला ताब्यात घेण्यात आले नव्हते. मध्यंतरी एक-दोनदा पोलिस ठाण्यात बोलावून तिची विचारपूस करण्यात आली. मात्र, तिने राज शहा हा मानसभाऊ असल्याचे सांगून पोलिसांच्या खाकीतून अलगद बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या प्रकरणात नीतूची भूमिका महत्त्वाची होती. त्यामुळे लैंगिक शोषणाच्या प्रकरणात नेमके काय घडले, याची चौकशी करण्यासाठी नीतूच्या अटकेचीही मागणी भाजप आणि मर्दानी महिला आस्था मंचाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना भेटून केली. चार-पाच दिवस उलटल्यानंतर पोलिसांनी आज दुपारी दीडच्या सुमारास तिला अटक केली. लागलीच तिला न्यायालयात हजर करण्यात आले.

'राज'ने दाखविले सहा मुलींना लग्नाचे आमिष!
Sunday, July 25, 2010 AT 12:00 AM (IST)
चंद्रपूर - बंगाली कॅम्प येथील एका पोल्ट्री व्यावसायिकाच्या मुलाने तब्बल सहा तरुणींना लग्नाचे आमिष देऊन फसविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यातीलच एका पीडित 18 वर्षीय मुलीने प्रेमविरहातून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या संदर्भात तक्रार दाखल होऊनही रामनगर पोलिसांनी आरोपी "राज' यास अटक केलेली नाही.
बंगाली कॅम्प येथील रहिवासी असलेल्या एका सुशिक्षित कुटुंबातील 18 वर्षीय युवती नागपूर मार्गावरील कॉन्व्हेंटमध्ये बारावीचे शिक्षण घेत आहे. तीन महिन्यांपूर्वी एका मैत्रिणीच्या माध्यमातून राज या 24 वर्षीय तरुणासोबत ओळख झाली. या तीन महिन्यांत या दोघांमध्ये प्रेमसंबंधही जुळले. यादरम्यान राजने तिला लग्न करणार असल्याचे भासवून संबंध ठेवले. एकाच समाजातील असल्याने लग्नाला कुटुंबीयांकडून विरोध होणार नाही, असेही तरुणाने तिला सांगितले. मात्र, काही दिवसांनंतर लग्नाचे आमिष देणारा राज या युवतीशी मोबाईलवर बोलण्यास आणि भेटण्यास टाळाटाळ करू लागला. आजपर्यंत त्याने तब्बल सहा तरुणींना लग्नाचे आमिष दिल्याची माहिती मिळाली. दरम्यान, पीडित युवतीच्या कुटुंबीयांनी एका मध्यस्थीमार्फत राजचे वडील असलेल्या पोल्ट्रीफार्मच्या मालकाकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवला. तेव्हा त्यांनीही उडवाउडवी करून प्रकरण दाबण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडित युवतीने फिनॉईल प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला डॉ. अमल पोद्दार यांच्या रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचारानंतर ती बरी झाली असून, आज (ता. 24) ती प्रथमच प्रसिद्धिमाध्यमांपुढे आली. घटनेची सर्व हकिगत तिने सांगितली.

 -----------------------------------------------
सकाळ वृत्तसेवा

Thursday, July 29, 2010 AT 12:22 AM (IST)
चंद्रपूर - पोल्ट्री फार्म व्यावसायिक शहा यांचा मुलगा राज याने लग्नाचे आमिष देऊन शारीरिक शोषण केल्याच्या प्रकरणात आज (ता. 28) आणखी एक पीडित तरुणी प्रसारमाध्यमांसमोर आली. तिनेही राजच्या कृत्यांचा पर्दाफाश केल्याने प्रकरणातील गुंतागुंत आणखीच वाढली आहे.
बंगाली कॅम्प येथील एका 18 वर्षीय तरुणीने प्रेमविरहातून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर राज शहा याचे वासनाकांड उघड झाले. तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करणे, अश्‍लील चित्र बाळगणे या आरोपाखाली राज यास पोलिसांनी नुकतीच अटक केली. राजच्या कृत्याची माहिती देताना आज एका युवतीने सांगितले की, सरदार पटेल महाविद्यालयातील "नीतू' नामक मुलीने राज याच्याशी ओळखी करून दिली. पहिल्याच भेटीत त्याने लग्न करू असे आश्‍वासन दिले होते. आकाशवाणीजवळील "राजनूर' या निवासीसंकुलातही त्याने तीनदा बोलाविले. अनेकदा दारू पिऊन असायचा. त्याच्याकडे वेगवेगळ्या कंपनीचे तीन महागडे मोबाईल होते. काही दिवसानंतर लग्नाचे आमिष देणारा राज मोबाईलवर बोलण्यास टाळाटाळ करू लागला. मोबाईलही नवीन आलेल्या तरुणीला दिला. 17 एप्रिलनंतर त्याची कधीही भेट झाली नाही. दरम्यान, सुरवातीला तक्रार करणारी तरुणी 28 एप्रिलपासून राजच्या संपर्कात आली. तेव्हापासूनच आपण त्याच्यापासून दूर गेल्याचेही तिने सांगितले. या प्रकरणात आतापर्यंत चार तरुणींनी आपले म्हणणे पोलिसांना सांगितले. मात्र, पोलिसांकडून ठोस कारवाई केलेली नाही. ज्या दिवशी बंगाली कॅम्प येथील तरुणीने विष प्राशन केले. त्यावेळी ती रुग्णालयात भरती असताना अन्य मुलीही भेटायला आल्या होत्या. त्या राजच्या सांगण्यावरूनच आल्याचेही उघड झाले आहे. मुलींना राजशी ओळख करून देणारी "नीतू' ही राजकडून पैसे घेऊन काम करीत होती, असे तक्रारकर्त्या दोन्ही तरुणींनी सांगितले. या दोघींनीही पोलिस अधीक्षक डॉ. मनोज शर्मा यांची भेट घेऊन सविस्तर माहिती दिली.

मुलींवर बलात्कार करणाऱ्या नराधमास अटक

Monday, July 26, 2010 AT 02:42 PM (IST)
चंद्रपूर - लग्नाचे आमीष दाखवून मुलींवर बलात्कार करणाऱ्या नराधमास पोलिसांनी सोमवारी अटक केली. राज शहा (वय २२, रा. चंद्रपूर) असे त्याचे नाव आहे.

चंद्रपूरमध्ये राहणाऱ्या एका मुलीबरोबर शहा याने गेले काही महिने शारीरिक संबंध ठेवले होते. तिच्याबरोबर लग्न करण्याचे आमीष त्याने दाखविले. अखेर गेल्या आठवड्यात त्याने लग्नास नकार दिल्यानंतर संबंधित मुलीने पोलिस ठाण्यात शहाविरुद्ध तक्रार दाखल केली. त्या दिवसापासून शहा फरार होता. पोलिसांनी त्याच्या निवासस्थानी धाड टाकली. त्यामध्ये अनेक अश्‍लिल मासिके आणि अन्य आक्षेपार्ह साहित्य आढळून आले.
शारीरिक संबंधांच्या चित्रीकरणाचा संशय

Monday, July 26, 2010 AT 12:31 AM (IST)
चंद्रपूर - लग्नाचे आमिष देऊन तरुणीशी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या राजच्या निवासी संकुलात पोलिसांनी छापा घातल्यानंतर प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. त्याच्या बेडरूममधील काही साहित्यांवरून शारीरिक संबंधांचे चित्रीकरण झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. यातील पीडित 18 वर्षीय मुलीने या सर्व प्रकाराचा भांडाफोड केला आहे.
बंगाली कॅम्प येथील रहिवासी असलेले पोल्ट्री फार्म व्यावसायिक प्रकाश शहा यांचा मुलगा राज याने 18 वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केले. मात्र, काही दिवसांनंतर लग्नाचे आमिष देणारा राज या युवतीशी मोबाईलवर बोलण्यास आणि भेटण्यास टाळाटाळ करू लागला. या प्रेमविरहात 18 वर्षीय युवतीने फिनाईल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्नही केला. त्यानंतर तिने पोलिसांना तक्रार देऊन राजने केलेल्या कृत्याची माहिती दिली. तिने दिलेल्या माहितीत आजपर्यंत त्याने तब्बल सहा तरुणींना लग्नाचे आमिष दिले असून, शारीरिक संबंध ठेवले होते. एका मैत्रिणीच्या माध्यमातून अन्य तरुणीशी ओळखी करून शारीरिक संबंध प्रस्थापित करतो. अशा नवनव्या तरुणींना गाठून फसविल्याचे तक्रारीत म्हटले होते. या प्रकरणाचा भांडाफोड करण्यासाठी पीडित तरुणी आज (ता. 25) स्वतः पोलिस अधीक्षक डॉ. मनोज शर्मा आणि अधिकाऱ्यांना घेऊन गेली. या पोलिस चौकशीत अनेक नवीन बाबी उघड झाल्या. इरई नदीच्या काठावर त्याच्या मालकीचे "राजनूर' नावाचे निवासी संकुल आहे. पहिल्याच माळ्यावर त्याची आलिशान खोली असून, तिथे सर्व व्यवस्था आहे. पोलिसांनी तपासणी केली असता त्याच्या फ्रिजमध्ये 10 बिअर बॉटल्स, आक्षेपार्ह साहित्य, चित्रीकरण करण्यासाठी वापरण्यात आलेली यंत्रणा आढळून आली. पोलिस अधीक्षक डॉ. मनोज शर्मा यांनी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची तपासणी केली. आरोपी राजचे वडील प्रकाश शहा यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. या प्रकरणात राजला सहकार्य करणाऱ्या पिंटू आणि कपिल नामक दोन तरुणांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

Tuesday, July 27, 2010

ताडोबामध्ये नव्या कोळसा खाणी?

ताडोबामध्ये नव्या कोळसा खाणी?

ताडोबा Tiger project
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र अभयारण्यातील वाघांच्या भ्रमंती परिसरातील आगरझरी आणि लोहारा येथील कोळसा खाणी रद्द करण्याचा निर्णय होऊन अवघे काही दिवस झालेत. या पार्श्वभूमीवर, याच अभयारण्याला लागून असलेल्या प्रदेशात नव्याने काही कोळसा खाणींना मंजुरी मिळावी म्हणून केंद्र सरकार दरबारी धाडण्यात आलेल्या प्रस्तावांना मंजुरी मिळू लागली आहे. त्यापैकी अभिजीत ग्रुपच्या बन्दर कोल कंपनीला २९ मे २००९ रोजी मंजुरी देण्यात आल्याचे उघडकीस आले.
चिमूर तालुक्याच्या बाजूने मेळघाट अभयाण्याशी जोडणारा हा भाग असून ताडोबा अभयारण्याच्या बाजूस कोळसा पट्टा दिल्याने व्याघ्र अभयारण्याला धोका निर्माण झाल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.

New mining threat near Tadoba
CHANDRAPUR: Even as the ministry of environment and forests (MoEF) has de-allocated the Lohara and Agarzari coal blocks which pose threat to the tiger corridors of Tadoba Andhari Tiger Reserve (TATR), the abode of around 45 tigers now faces a fresh threat from a couple of other mines proposed very close to the buffer zone boundary. The coal block allocated to Bander Coal Company Private Limited (BCCPL) in Chimur tehsil to the north of the tiger reserve threatens to cut off the only corridor connecting TATR to Melghat tiger landscape.
यासंबंधातील ताज्या उपलब्ध माहितीनुसार , ब्रह्मपुरी वन विभागाकडे बांदेर कंपनीने प्रस्ताव दिला असून तेथील वन संरक्षक संजय ठाकरे यांनी तो राज्याच्या मुख्य वनसंरक्षकांकडे धाडला आहे. बांदेर कोळसा कंपनीने खाणकाम करण्यास परवानगी मागितली होती. त्यातील एक ओपन कास्ट आहे. कंपनीला खोदकाम करण्यासाठी या क्षेत्रात १,६०४.६७ हेक्टरची जमीन हवी आहे. या जमिनीत खाजगी मालकांची ३९५.६७ हेक्टर , महसूल खात्याची ३८.८४ हेक्टर तर वन खात्याची १,१७०.६० हेक्टर जमीन आहे.
चंद्रपूरचे लढाऊ कार्यकर्ते बंडू धोत्रे म्हणाले की , या कोळसा पट्टयात नागपूर , वर्धा आणि बोर अभयारण्य येते. शिवाय , हे सर्व भाग मानवी वस्तीचे आहेत. तेथे शेतीही केली जाते. रस्त्यांनी ते परस्परांशी जोडलेले आहेत म्हणूनही ते पर्यावरणीयदृष्टया संवेदनशील आहेत.
                            Bandu Dhotre
धोत्रे म्हणाले की , बांदेर कंपनीला देऊ केलेला कोळसा पट्टा ताडोबा अभयारण्याच्या १० कि. मी. च्या हद्दीत येतो. या अभयारण्याच्या मुख्य भागापासून पुढे केवळ ७.५ कि. मी. चा भाग बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. हा कोळसा पट्टा बफर झोनच्या बाहेर येत असला तरी कोळसा खाणीची सीमा बफर झोनला लागून आहे. ओपन कास्ट खाणकाम तेथून नऊ कि. मी. वर होणार आहे. हा पूर्ण भाग १० कि. मी. च्या आत येतो. सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक तत्वानुसार अभयारण्याचा संपूर्ण संवेदनशील भाग म्हणजे १० कि. मी. ची सीमा असली पाहिजे.
सरकारने अजून संवेदनशील भाग किती आहे , हेच जाहीर केलेले नाही , असे सांगून ते म्हणाले की , याउपरही अशा संवेदनशील भागात खाणकामांना परवानगी देता कामा नये. ताडोबातील वन्यजीवांवर विपरित परिणाम होतील म्हणून वने आणि पर्यावरण मंत्रालयाने याआधी १९९९ मध्ये याच कोळसा खाणीचा प्रस्ताव फेटाळला होता. आता १० वर्षांनंतर व्याघ्र भ्रमंतीचा मार्गच संकुचित झाला आहे. अशा स्थितीत प्रस्ताव फेटाळण्यात आलेल्या कोळसा खाणीला परवानगी देणे अयोग्य आहे.
कोळसा खाणीचा हा पट्टा मुळात ब्रह्मपुरी वन विभागात येतो. हा भाग प्राणी आणि मनुष्य यांच्यातील संघर्षासाठी ओळखला जातो. खाणींमुळे प्राण्यांवर संकट येऊ शकते. ताडोबा अभयारण्य व्यवस्थापनाने हा भाग धोकादायक बनल्याचे म्हटलेले आहे. एका आराखडयाअंतर्गत त्याचे नव्याने संवर्धनही व्यवस्थापनाने सुरू केले आहे. वनेमंत्री जयराम रमेश यांच्या ध्यानात ही बाब अलीकडच्या दिल्ली भेटीत आपण आणून दिल्याचेही धोत्रे यांनी सांगितले. आपणास अद्यापपर्यंत कंपनीकडून पर्यावरणविषयक मंजुरीसाठी कोणताही प्रस्ताव आलेला नाही , असे त्यांनी म्हटले आणि पर्यावरणाला मारक कोणत्याही प्रकल्पाला मंत्रालयाकडून परवानगी दिली जाणार नसल्याचे आश्वासन त्यांनी दिले , असेही धोत्रे म्हणाले.

Wednesday, July 21, 2010

"श्रुजला श्रवंती' धरणाचा मुद्दा ऐरणीवर

"श्रुजला श्रवंती' धरणाचा मुद्दा ऐरणीवर

Tuesday, July 20, 2010 AT 09:15 AM (IST)

Tags: chandrababu naidu, chandrapur, vidarbha, dam, babhali dam

चंद्रपूर - आंधप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या "बाभळी' प्रकरणानंतर गोंडपिंपरी तालुक्‍यातील प्राणहिता नदीवरील "डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राणहिता श्रुजला श्रवंती' या धरणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या धरणामुळे आंधप्रदेश सीमेला लागून असलेली या तालुक्‍यातील हजारो हेक्‍टर शेतजमीन व शेकडो गावे पाण्याखाली येणार आहेत. त्यामुळे आधीच या धरणाविषयी शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. या पार्श्‍वभूमीवर नायडू यांच्या घुसखोरीनंतर सीमावर्ती भागात या धरणाचा वाद उफाळून येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.
गोंडपिंपरी तालुका हा महाराष्ट्र आंध्र सीमेवर आहे. या तालुक्‍यातील शिवणी या गावाजवळ वर्धा व वैनगंगा या नद्यांचा संगम आहे. या संगमातून पुढे वाहणाऱ्या नदीला प्राणहिता म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र व आंधप्रदेशाला जोडणारी ही नदी आहे. याच नदीवर शिवणी गावाजवळ "डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राणहिता श्रुजला श्रवंती' हे महाकाय धरण होत आहे. याचे अंदाजपत्रक 38 हजार कोटी रुपयांचे आहे. आंधप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी याची महत्त्वाकांक्षी योजना होती. तेलंगणामधील आदिलाबाद, करीमनगर, निजामाबाद, मैदक या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी हे धरण वरदान ठरणार आहे. सोबतच रंगोरेड्डी व हैद्रराबाद या आंध्रातील प्रमुख शहरांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा याच धरणातून होणार आहे. साधारणत: वर्षभरापूर्वी प्राणहिता नदीवर आंधप्रदशेचे तत्कालीन मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांच्या हस्ते या धरणाचे भूमिपूजन झाले. उत्सुकतेपोटी महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील नागरिकही गेले होते. ते परत आल्यानंतर या धरणाविषयी चर्चा सुरू झाली.
दरम्यान, हे धरण झाल्यास महाराष्ट्रातील नदीकाठावरील शेकडो गावे व हजारो हेक्‍टर शेतजमीन बुडेल, अशी भीती व्यक्त होऊ लागली. यानंतर जिल्ह्यातील नेत्यांनी विविध पातळ्यांवर याचा विरोध सुरू केला. भूमिपूजनस्थळी जाऊन आंदोलने केलीत. जलसंपदा व ऊर्जामंत्री अजित पवार यांनीही हा मुद्दा नागपूर येथील अधिवेशनात उपस्थित केला होता. तेव्हा धरण बांधण्यासाठी आंधप्रदेश सरकारने महाराष्ट्र शासनाची परवानगीच घेतली नसल्याची बाब समोर आली होती. गाव आणि शेतजमीन बुडेल हीच भीती घेऊन या परिसरातील नागरिक धरणाचे काम बघत आहे.


जमीन अधिग्रहणाचे काम जोरात
राजशेखर रेड्डीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याने कामाला गती आली होती. मात्र, रेड्डी यांचे अपघाती निधन झाले आणि कामाची गती मंदावली. या धरणासाठी आवश्‍यक जमिनी अधिग्रहणाचे काम आंध्रात जोरात सुरू आहे. जमिनीला योग्य भाव द्यावा, या मागणीसाठी तेथील शेतकरी आंदोलन करीत आहेत.


धरणाचा निवडणुकीत फटका

या धरणाचा फटका आंध्रातील सिरपूर टाऊनचे माजी आमदार कोनेरू कोनप्पा यांनाही बसला. ते याच मुद्द्यावरून मागील विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. आंध्राच्या सीमावर्ती भागात महाराष्ट्रातील प्राणहिता नदीवर असलेल्या कार्तिक स्वामींचे भक्त मोठ्या संख्येत राहतात. मागील विधानसभा निवडणुकीत कोनेरू कोनप्पा यांच्या विरोधकांनी धरण बांधल्यानंतर महाराजांचे वास्तव्य असलेले मंदिर बुडेल, असा प्रचार केला. या धार्मिक मुद्द्याचा फटका कोनेरू कोनप्पा यांना बसला. ते पराभूत झाले. दरम्यान, या पार्श्‍वभूमीनंतर येणाऱ्या पोटनिवडणुकीच्या हेतूने माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी बाभळी धरणाला भेट देऊन वाद उपस्थित केल्यानंतर पुन्हा आता प्राणहिता धरणाचा मुद्दा समोर आला आहे.



दरम्यान, याबाबत राजशेखर रेड्डी याचे निकटवर्तीय व या धरणाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणारे सिरपूर टाऊनचे माजी आमदार कोनेरू कोनप्पा यांच्याशी संपर्क साधला असता धरणामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नुकसान होणार नसल्याचे सांगितले. मात्र, तेलंगणात हरितक्रांती होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. धरणाच्या कामाला सुरवात झाली आहे. जमीन अधिग्रहणाचे काम सुरू आहे. संबंधित कंपन्यांशी धरण बांधकामासंदर्भात करार झाला आहे. यासाठी पाचशे कोटी रुपये या कंपन्यांना देण्यात आले आहे. या धरणासंदर्भात केंद्र शासनाची जलव्यवस्थापन समिती व आंध्र सरकारचा करार आहे. प्राणहिता नदीवरील 360 टीएमसी एवढ्या पाण्याचा आंध्र वापर करू शकतो, असे कोनेप्पा म्हणाले. सध्या 165 टीएमसी पाणी वापरण्याची योजना आहे.
पेरणी आटोपली, रोवणी सुरू

पेरणी आटोपली, रोवणी सुरू

Sunday, July 18, 2010 AT 12:00 AM (IST)

Tags: rain, chandrapur, vidarbha


चंद्रपूर - जून-जुलैच्या महिनाभरात जिल्ह्याच्या सर्व भागातील पेरणीची कामे आटोपण्याच्या मार्गावर असून, भातपट्ट्यात रोवणीला वेग आला आहे. मूल, सावली, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, नागभीड आणि चिमूर या तालुक्‍यात भाताच्या रोवणीला सुरवात झाली आहेत.
जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मॉन्सूनने हजेरी लावल्यानंतर भात, कापूस, सोयाबीनची पेरणी सुरू झाली. भातपट्ट्यात चांगला पाऊस असल्याने शेतकरी समाधानी आहे. या पावसात तलाव, जलाशये भरली नसली तरी पेरणीयोग्य पाऊस झाला. जून-जुलै महिन्यात 404.1 मिमी पावसाची अपेक्षा होती. प्रत्यक्षात 94.2 टक्के पाऊस झाला. जूनअखेरपर्यंत 142.4 मिमी पाऊस झाल्याने निम्म्यापेक्षा जास्त पेरणीची कामे आटोपली. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. 17 जुलैपर्यंत 238.3 मिमी इतका पाऊस झाला असून, दोन्ही महिन्यांत 380.7 मिमी पाऊस झाला. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस असल्याने पेरणी आणि रोवणी वेळेत सुरू झाली आहे. सुरवातीला वरोरा तालुक्‍यातील अंजनगाव, महालगाव, खांबाडा येथे उंटअळीचा प्रादुर्भाव आढळून आला. गेल्या तीन दिवसांपासून पावसाने रजा घेतल्याने रोवणी जोरात आहे. मूल, सावली, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, नागभीड आणि चिमूर या तालुक्‍यात भाताची रोवणी सुरू आहे. मूल तालुक्‍यात भात रोवणीचे क्षेत्र 14 हजार 500 हेक्‍टर असून, यंदा 18 हजार 200 हेक्‍टरवर लागवड होण्याची अपेक्षा आहे. सद्य:स्थितीत एक हजार 638 हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. भात पऱ्ह्याचे क्षेत्र एक हजार 450 हेक्‍टर असून, एक हजार 15 हेक्‍टरवर पेरणी करण्यात आली. सोयाबीन पेरणी दोन हजार 110 हेक्‍टरवर असून, 20 हेक्‍टरवर कापूस आहे. याशिवाय 16 हेक्‍टरवर मका, 280 हेक्‍टरवर तूर, 40 हेक्‍टरवर भाजीपाल्याची लागवड करण्यात आली. मूल तालुक्‍यात एकूण 15 हजार 500 हेक्‍टर आर सरासरी क्षेत्र पिकाचे असून, यंदा 22 हजार 585 अपेक्षित क्षेत्रापैकी आतापर्यंत चार हजार 143 हेक्‍टरवर पेरणी झाली आहे.
चिमूर तालुक्‍यात एक हजार 250 हेक्‍टरवर कापसाची पेरणी झाली. भाताच्या 30 हजार 300 हेक्‍टरपैकी 10 हजार 300 हेक्‍टरवर रोवणी सुरू आहे. 25 हजार 440 हेक्‍टरवर सोयाबीनची पेरणी आहे. भिसी परिसरात भाताची रोवणी जोरात सुरू असून, मजुरांचे दर 120 रुपये प्रतिदिन आहे. मागील सहा दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांना रोवणी करण्यास सोयीचे ठरले आहे.
सिंदेवाही तालुक्‍यात पाऊस कमी झाल्याने तलाव अद्यापही कोरडेच आहेत. पेरणीची कामे पूर्णत: आटोपली. मात्र, पाण्याअभावी रोवणी थांबली आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत.

Monday, July 19, 2010

Contact No.

Contact No.

ZILLA PARISHAD CHANDRAPUR


Office Designation Contact No. Office

Chief Executive Officer 07172-256401, Fax-250671

07172-255868

ADD. Chief Executive Officer 07172-258122 07172-252517

DY. Chief Executive Officer, General 07172-250660 07172-257691

DY. Chief Executive Officer, PANCHAYAT 07172-251300 07172-255351

Agriculture DEVELOPMENT OFFICER 07172-253019 07172-252230

District Health Officer, DHO 07172-253275 07172-252281

District Officer, 07172-260177 07172-258082

Education Officer , High School 07172-255013 07172-261863

Education Officer , Primary 07172-252560 07172-258083

project Director, DRDA 07172-255849,253408 07172-256510

Other Important Numbers

Executive Engineer PWD, Chandrapur 07172-250518 07172-252269

Executive Engineer Irrigation Chandrapur 07172-252873

CAFO Chandrapur 07172-250273

BLOCK DEVELOPMENT Officers

Chandrapur 07172-250231

Balharshah 07172-250273

Pomburna 07171-250273

Gondpipri 07171-220024

Mul 07174-220208

Saoli 07174-274539

Warora 07176-282052

Bhadrawati 07176-266031

Chimur 07170-265535

Rajura 07173-222124

Korpana 07173-236717

Bramhpuri 07177-272038

Nagbhir 07179-240029

Sindhewahi 07178-288224

Tuesday, July 13, 2010

Tadoba-Andhari

Tadoba-Andhari

बच्चे जैसे उल्लास की भावना को बुलबुले जब एक कुछ है कि केवल एक या पढ़ा है के बारे में सुना है, या टेलीविजन पर देखा हाजिर जाता है. एक शानदार धारीदार जानवर देखा, एक बाघ Tadoba के घने जंगलों में, कोई अपवाद नहीं था.



एक सप्ताहांत पलायन के लिए हमारी खोज हमें बनाया Tadoba-Andhari टाइगर रिजर्व पर ठोकर, मुंबई से दूर नहीं है. महाराष्ट्र के चंद्रपुर जिले में स्थित है, एक जगह के इस छिपा गहना हमारे लिए एक का इलाज किया जा वन्यजीव प्रेमियों साबित कर दिया. नागपुर के लिए एक उड़ान और तीन घंटे Tadoba करने के लिए ड्राइव के बाद, हम एमटीडीसी रिसॉर्ट में पहुंचे. आगमन पर, हम एक खुली जीप में एक दोपहर खेल ड्राइव पर बंद सेट, हमारे ड्राइवर और एक गाइड के साथ.

वन: आकर्षण भीषण गर्मी में घने पेड़ों के कवर के माध्यम से ड्राइविंग हम एक वृक्ष की शाखाओं पर बैठा langurs के एक परिवार पर ठोकर खाई. आधा और आधा उत्सुक डर हमारे प्रयास में उनके प्राकृतिक निवास में उन चित्रों को क्लिक करने के लिए, पूरे समूह के लिए बाहर राहत का एक झोंका जाने लग रहा था के रूप में हम दूर कर दिया है. उत्सुक एक बाघ की एक झलक पकड़ने के लिए, हम एक जानवर से frequented मार्ग पर बंद सेट, के रूप में वन अधिकारियों द्वारा की सूचना दी. एक कठिन इंतजार के तीस मिनट के बाद, निराशा में सेट के रूप में कोई शाही जानवर के निशान थे शुरू किया.


किसी भी अधिक समय बर्बाद नहीं पर निर्णय लेना है, हम पास झील है, जहां हम एक दूरी से देखा सुस्ती बर्दाश्त करने के लिए नीचे चलाई. जैसा कि हम आगे निकले, हिरण के तीन अलग अलग प्रजातियों हमें अपनी उपस्थिति के साथ शोभा बढ़ाई है, अर्थात् भौंकने हिरण, सांभर और हिरण देखा. महान भारतीय गौर चराई देखा था, यह चारों ओर शोर से बेफिक्र है, जबकि जंगली boars डर scurried में दूर के रूप में हमारे पास वाहनों को आकर्षित किया.


एक बाघ राह पर:, इस बार हम अगली सुबह एक जल्दी शुरू किया था के रूप में हम जंगल के लिए फिर से नेतृत्व में एक अलग रास्ता ले. इसे उगते सूरज की रोशनी में देखा और सुंदर अजीब चुप था. के रूप में हम के माध्यम से दिया, सांभर हिरण की चौंकाने कॉल गाइड सतर्क किया. हमें बताया गया है कि हिरण द्वारा इस तरह के कॉल आसपास के क्षेत्र में एक बाघ की मौजूदगी signified है, और वे शायद ही कभी गलत थे. उत्साह घुड़सवार के रूप में हम कहते हैं, जो गाइड द्वारा अनुमान लगाया गया था के बारे में 5 बड़ी बिल्ली से दूर मीटर की दिशा में नेतृत्व किया. हमारे इंजन बंद स्विच हम एक कोने में हमारी जीप खड़ी, bated सांस के साथ इंतजार कर.

हमारे विशाल प्रसन्न करने के लिए, राजसी जानवर अपनी waterhole कुछ मीटर दूर रास्ते पर नहीं बल्कि अहंकार द्वारा strolled, और एक आलसी बिल्ली झपकी के लिए नीचे बसे.


फिर जंगल beckons: दोपहर सफारी हमारे साथ शुरू langurs और खूब में हिरण का एक और परिवार में bumping. हम एक और शेर है, जो शिकार की तलाश में छोटा सा जंगल में glided जगह में कामयाब रहे. हम बाघ शावक के साथ एक परिवार के बारे में कहा गया था, वापस महीने की एक जोड़ी देखा. कुछ समय पहले चला, हम एक मुर्गा जंगल की झलक पकड़ा, मोर और मधु बजर. हमारे पिछले सफारी एक बाघ राह पर हमें फिर से सेट है, हम इसके साथ एक आधे घंटे दर्शक था, जब तक इसे दूर एक पानी के टैंकर से भयभीत था.

Sunday, July 11, 2010

adani

adani

चंदा स्थिति की तरह सूखे की चपेट में
यह चंद्रपुर जिले लगता है असीम संकट मिला है. पहले अल्प वर्षा, तो भारी कीट हमले और अब टूटेंगे क्षेत्रों एक सूखे जैसी स्थिति के लिए अग्रणी. दृष्टि में कहीं बारिश के साथ जिला परिषद के कृषि विभाग ने निष्कर्ष निकाला है कि चंद्रपुर जिले है "वास्तव में भयंकर सूखे जैसी स्थिति से जूझ रहा है". चंद्रपुर जिला परिषद के कृषि समिति इस संबंध में एक विस्तृत रिपोर्ट भेजी है और राज्य सरकार से कहा कि चंद्रपुर जिले के सूखा प्रभावित घोषित कर दिया.

"जिले के कम से कम इस साल औसत वर्षा प्राप्त हुआ है, इसलिए एक सूखे जैसी स्थिति का सामना करना पड़ रहा है. एक परिणाम के मौसम गर्म और आर्द्र है, जो वास्तव में और अधिक कीट हमले के लिए अतिसंवेदनशील है बदल गया है के रूप में. कम वर्षा किसानों के धान की नर्सरी और फसलों के विकास का प्रत्यारोपण रोक करने के लिए मजबूर कर दिया है मंद किया गया है

, पी एस Bhakte, जिला परिषद कृषि विभाग के परियोजना अधिकारी ने कहा कि इस गंभीर स्थिति के प्रकाश में कृषि समिति ने सर्वसम्मति से एक समापन कि जिले सूखे से प्रभावित है प्रस्ताव पारित किया. उन्होंने कहा, "एक ही कृषि समिति द्वारा पारित संकल्प 4 अगस्त को कर दिया गया है राज्य सरकार को भेजा, urging यह जिला सूखा प्रभावित घोषित करने के लिए".

कम वर्षा भी आतंक बटन ट्रिगर है. "जून जिले में दर्ज वर्षा के दौरान औसत वर्षा 62 सिर्फ% थी. जुलाई औसत वर्षा की केवल 64% को देखा गया. यह सब पर जुलाई के बाद से बारिश नहीं हुई जिले में 28 /. , Bhakte कहा स्थिति बदतर अगर एक हफ्ते या इतने में यह नहीं करता है बारिश हो जाएगा ". उन्होंने कहा कि सामान्य रूप से 100% बुवाई संचालन 15 अगस्त से पूरा कर रहे हैं. लेकिन, इस साल केवल 31% (64053 हेक्टेयर में धान प्रत्यारोपण और धान नर्सरी की) अब तक पूरा हो चुका है.
"हालांकि, 100% बुवाई सोयाबीन के मामले में किया गया है (देश के 1,78,651 हेक्टेयर में) और कपास (53,438 हेक्टेयर) है, लेकिन इन संवेदनशील फसलों पर प्रतिकूल भुगतना अगर वे आने वाले दिनों में पर्याप्त बारिश नहीं प्राप्त कर सकते हैं. , Bhakte ने कहा कि इसके अलावा कीट हमले का खतरा हमेशा वहाँ है, "उन्होंने कहा," बारिश की कमी सिर्फ खरीफ की फसल को बर्बाद कर देगा नहीं बल्कि रबी फसल के लिए एक गंभीर खतरा मुद्रा.
जिले में विभिन्न सिंचाई परियोजनाओं में पानी के भंडार की स्थिति भी चिंताजनक स्थिति का द्योतक है. नौ जिले में सिंचाई परियोजनाओं में से कोई भी अधिक है कि बरसात के मौसम के रूप में भी 40% शेयर आधे से अधिक है. विभिन्न सिंचाई परियोजनाओं में पानी की स्थिति के रूप में: Asolamendha - परियोजना 28.86 (16.25 एमएमसी)%, Pakadigudam परियोजना - 12.33 (1.56 एमएमसी)%, Dongargaon परियोजना - 12.57 (1.56 एमएमसी)%, Ghodazari परियोजना - 32.27% (13.93 निम्नलिखित एमएमसी) है , Naleshwar - परियोजना 35% (3.62 एमएमसी), Chandai नाले - परियोजना 37.50 (4 एमएमसी)%, Chargaon परियोजना - 15.34 (3 एमएमसी)%, Labhansarad परियोजना - 5.66% (0.49 एमएमसी) और Amalnala परियोजना - 17.51% (4.28 एमएमसी ).
तथ्य यह है कि जिले में लगभग सभी तहसीलों आने वाले दिनों में पेयजल संकट बदतर सामना कर सकते हैं के प्रकाश में, जिला प्रशासन संबंधित विभाग को निर्देश दिया है करने के लिए अगले आदेश तक सिंचाई के उद्देश्य के लिए किसी भी पानी नहीं रिलीज.
-------------------------------------------------- ------------------------------

पर्यावरण एवं वन मंत्रालय आधिकारिक Nagzira पर अदानी संयंत्र प्रभाव का अध्ययन करने के लिए
अगर 625 वर्ग किमी Tadoba-Andhari टाइगर रिजर्व (TATR) जा रहा है प्रस्ताव Lohara कोर जोन में अदानी कोयला खानों द्वारा हिट करने के लिए, 163 वर्ग किमी   गोंदिया जिले में Nagzira वन्यजीव अभयारण्य भी अदानी के थर्मल पावर प्लांट द्वारा निर्माण जिनमें से Tiroda पर कार्य प्रगति पर है प्रभावित हो जाएगा.
वन विभाग सूत्रों ने बताया कि पर्यावरण एवं वन (पर्यावरण एवं वन मंत्रालय) के मंत्रालय के एक अधिकारी ने 7 अगस्त को Nagzira दौरा है. एके राणा, वनों के प्रमुख संरक्षक (CCF), भोपाल में आधारित है, MIDC Tiroda में गोंदिया जिले में Nagzira और अदानी पावर महाराष्ट्र लिमिटेड के प्रस्तावित संयंत्र की निकटता में आसपास के क्षेत्रों का निरीक्षण साइट आचरण करेंगे.

सूत्रों ने बताया कि गोंदिया के क्षेत्र में क्षेत्रीय अधिकारियों और वन्य जीवन
डिवीजनों के लिए साइट निरीक्षण के दौरान उपस्थित होने के लिए कहा गया है. अदानी पावर महाराष्ट्र लिमिटेड वन भूमि की 164.84 हेक्टेयर के 1980 मेगावाट कोयला आधारित ताप विद्युत संयंत्र की स्थापना के लिए Tiroda में मोड़ के लिए एक प्रस्ताव प्रस्तुत किया है.
राणा जंगल के प्रधान मुख्य संरक्षक Nagzira अभयारण्य पर प्रस्तावित संयंत्र के प्रतिकूल असर पर (PCCF) सीएस जोशी और मुख्य वन्यजीव वार्डन एके जोशी और पकड़ चर्चा मिलेंगे. पर्यावरण एवं वन मंत्रालय पाया गया है कि इस परियोजना क्षेत्र के कुछ भागों को 10 किमी के दायरे के भीतर हैं Nagzira के पर्यावरण के प्रति संवेदनशील क्षेत्र है और इसलिए एक वन्यजीव शमन करने के लिए बिजली परियोजना या वन्यजीव निवास की प्रतिकूल प्रभावों को कम करने की योजना तैयार करने की जरूरत है यानी हो सकता है.
संरक्षणवादी प्रफुल्ल Bhamburkar भारतीय वन्यजीव ट्रस्ट (डब्लूटीआई) के सहायक प्रबंधक के मुताबिक, अदानी पावर प्लांट को Kachewani और Tiroda खिंचाव जो अमीर जंगलों और जंगली जानवरों के लिए एक तकिया के रूप में कार्य करता है के बीच आ रही है. बिजली संयंत्र से फ्लाई ऐश जंगली जानवरों और इसलिए पर्यावरण एवं वन मंत्रालय के लिए विनाशकारी साबित क्षेत्र में बिजली संयंत्र की अनुमति नहीं चाहिए होता है, उन्होंने कहा.
-------------------------------------------------- ------------------------------
अदानी खानों पर Mungantiwar राज्य को अल्टीमेटम
भारतीय जनता पार्टी (भाजपा) चंद्रपुर से विधायक सुधीर Mungantiwar राज्य सरकार को एक अल्टीमेटम दिया था पर अपना रुख स्पष्ट प्रस्तावित Lohara में अदानी कोयला ब्लॉकों, पास Tadoba-Andhari टाइगर रिजर्व (TATR) के लिए.
"मैं सरकार से पूछा विशेष रूप से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (राकांपा) के नेता और वन मंत्री Babanrao Pachpute है, के लिए अदानी खानों पर 9 अगस्त से पहले अपने रुख स्पष्ट है, अन्यथा एक निर्णायक आंदोलन सरकार और खनन परियोजना," Mungantiwar के खिलाफ शुरू किया जाएगा ने कहा.
विधायक नागपुर में पत्रकारों को बताया कि Adanis, एक अग्रणी कोयला आयातक, Tiroda में बिजली संयंत्र के लिए गोंदिया जिले में आयातित कोयले का उपयोग करना चाहिए. कंपनी के सभी दलों के कड़े विरोध का सामना करना है अगर यह उसके लिए बाहर Tadoba खनन के पास ले जाने की योजना में परिवर्तन नहीं किया जाएगा. राकांपा के चंद्रपुर इकाई सहित सभी दलों, खनन परियोजना के खिलाफ थे, उन्होंने कहा.
जब खनन गतिविधि के क्लस्टर के बारे में पूछा Tadoba पास आ धमकी, Mungantiwar अदानी ने कहा कि वह अकेला नहीं था, लेकिन वह (पूर्व) Lohara और महाराष्ट्र राज्य खनन निगम (MSMC) के मुरली एग्रो अनुग्रह के Agarzari में परियोजनाओं का विरोध किया गया था और साथ ही दूसरों .
Lohara कोयला खनन परियोजना के 1750 हेक्टेयर जो 1573.56 हेक्टेयर के घने आरक्षित और डम्पिंग और पल्ला झुकना के निपटान (ओ) के लिए 500 हेक्टेयर के अतिरिक्त अन्तर जंगल है की एक न्यूनतम अन्तर है. इस प्रकार आरक्षित वन्य जीवन के साथ अमीर जंगल की 2073 हेक्टेयर की कुल खो जाएगा. इसके अलावा अतिरिक्त वन क्षेत्र के दृष्टिकोण सड़कों, रेलवे साइडिंग और श्रम कालोनियों, Mungantiwar आगाह इमारत की तरह से नष्ट होने की संभावना है.

"एक बार जब यह प्रस्ताव मंजूरी के floodgates अन्य खनन कंपनियां जो कोयला उत्खनन के लिए अनुमति के लिए TATR से सटे क्षेत्रों से इंतजार कर रहे हैं खुल जाएगा हो जाता है. अदानी खानों की परिकल्पना को प्रति दिन 55 टन विस्फोटक का इस्तेमाल करते हैं. नुकसान और अशांति ध्वनि प्रदूषण के कारण होता कंपन, धूल और हवा में ऊपर फेंक दिया विशाल होगा. उन्होंने कहा, हम अपने श्रमसाध्य लिए वन्य जीव संरक्षण के प्रयासों को त्याग किया जाएगा ".
विधायक ने कहा कि ओ बी खुदाई करने के लिए और कहीं और फेंक दिया पानी के प्रदूषण का कारण होगा. गाद से यह गतिरोध और नदियों क्षेत्र में नदियों होगा. इसके अलावा, दो झीलों Lohara-Junona जंगलों के भीतर स्थित भी दम घुट जाएगा मिल बेकार गाया होगा.
प्रवास TATR से वन्यजीव द्वारा इंद्रावती आरक्षित करने के लिए प्रयोग किया जाता गलियारे Lohara-Junona क्षेत्र के माध्यम से गुजरता है. खनन कार्य inbreeding और हानिकारक पीछे हटने का लक्षण के लिए जोखिम में एक ही परिणाम को नष्ट करेगा, उन्होंने कहा.
Mangantiwar चंद्रपुर बताया कि भारत में सबसे अधिक प्रदूषित शहरों में से एक थे और आगे खनन केवल प्रदूषण में वृद्धि होगी अनुमति देता है. यह पहले से ही अपने टोल ले जा रहा था और जिले में बच्चों के लगभग 40% एस्थमेटिक समस्याओं पीड़ित हैं.
भाजपा नेता ने कहा कि इसमें कोई संदेह नहीं, विद्युत उत्पादन के विकास के लिए और आवश्यक घंटे की आवश्यकता थी. उन्होंने कहा, "हम किसी विशेष कंपनी के खिलाफ नहीं हैं, लेकिन हम चाहते हैं कि कोयले की आवश्यकता को कुछ वैकल्पिक क्षेत्रों से मुलाकात की है कि पर्यावरण को नुकसान के कारण नहीं होगा."
Mungantiwar आगे कहा कोई भी वन्य जीवन के नुकसान के लिए क्षतिपूर्ति कर सकते हैं. "पैसा न तो वन को बहाल कर सकते हैं, न ही लाखों वर्ष प्रकृति द्वारा निर्मित वन्यजीव. उन्होंने कहा, एक ही मानव जीवन के लिए सच के रूप में अच्छी तरह से धारण.
-------------------------------------------------- ------------------------------

Thursday, July 01, 2010

17 कोटी 81 लाखांचा पीकविमा

17 कोटी 81 लाखांचा पीकविमा

सकाळ वृत्तसेवा

Tuesday, June 29, 2010 AT 12:00 AM (IST)

Tags: governance, chandrapur, vidarbha

चंद्रपूर - दुष्काळ आणि किडीच्या प्रादुर्भावामुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीत अर्थसाहाय्य मिळावे म्हणून गत खरीप हंगामात जिल्ह्यातील 27 हजार 409 शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या माध्यमातून पीकविमा काढला. त्यानुसार 17 कोटी 80 लाख 94 हजारांची रक्कम प्राप्त झाली, ती जुलैअखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, 

गेल्या काही वर्षांपासून विमा कंपन्यांकडून पीकविमा काढला जात आहे. यात राज्य शासनाचाही सहभाग असतो. गेल्या वर्षी खरिपातील पावसाचे प्रमाण 55 टक्‍क्‍यांनी घटल्याने दुष्काळसदृश स्थिती जाहीर करण्यात आली. तब्बल 1 हजार 400 गावांची आणेवारी 50 पैशांपैकी कमी झाली. सोयाबीन आणि धानाच्या उत्पादनात 40 ते 55 टक्के घट झाली. मागील वर्षाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील 27 हजार 409 शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या माध्यमातून पीकविमा काढला होता. यात सोयाबीनउत्पादक शेतकरी 4 हजार 922 असून, त्यांना 3 कोटी 88 लाख 50 हजार 842 रुपये; तर 22 हजार 487 भात उत्पादक शेतकऱ्यांना 13 कोटी 92 लाख 44 हजार 558 रुपयांची रक्कम मिळणार आहे. ही रक्कम येत्या जूनअखेर बॅंकेला प्राप्त होईल. त्यानंतर महिन्याभराच्या आत ती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल.
चंद्रपूरच्या आनंदने मिळविली अमेरिकेत 'हिऱ्याची अंगठी'

चंद्रपूरच्या आनंदने मिळविली अमेरिकेत 'हिऱ्याची अंगठी'

Thursday, July 01, 2010 AT 12:00 AM (IST)

Tags: anand gajbhiye, chandrapur, vidarbha

चंद्रपूर - मूळचा चंद्रपूरचा असलेला एक 24 वर्षीय विद्यार्थी अमेरिकेतील टेक्‍सास शहरातील ट्युम विद्यापीठात मास्टर इन सायन्समध्ये पहिला आला. आनंद धनराज गजभिये असे त्याचे नाव असून, त्याला विद्यापीठातर्फे 50 लाख किमतीची "हिऱ्याची अंगठी' समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
आदिवासीबहुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूरसारख्या शहरातून प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचे धडे घेऊन घराबाहेर पडलेल्या विद्यार्थ्याने विदेशात यशोशिखर गाठणे, ही सर्वांसाठी गौरवाची बाब आहे. शहरातील नगिनाबाग येथे धनराज गजभिये राहतात. त्यांचा मुलगा आनंद याने दहावीपर्यंतचे शिक्षण विद्यानिकेतन हायस्कूल येथून घेतले, तर बारावी नेहरू महाविद्यालयातून पूर्ण केले. बारावीच्या परीक्षेत तो गुणवत्ता यादीत झळकला होता. त्यानंतर त्याने मुंबईच्या व्हीजेआयटी विद्यापीठातून बीई केले. यातही तो प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाला. त्याच्या या यशाबद्दल विद्यापीठाने साडेतीन लाखांची शिष्यवृत्ती दिली. सिव्हिल इंजिनिअर पदवी घेतलेला आनंद शिक्षणात थांबला नाही. चक्क विदेशवारी करून त्याने अमेरिका गाठली. टेक्‍सास शहरातील ट्युम विद्यापीठात त्याने मास्टर इन सायन्समध्ये प्रवेश घेतला. हे विद्यापीठ जगातील नवव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. प्रथम वर्षी अव्वल आल्यानंतर जिद्द आणखीनच वाढली आणि यंदा तृतीय वर्षात त्याने विद्यापीठातून प्रथम येण्याचा मान मिळविला. हे यश त्याच्यासाठी उत्तुंग आहे. विद्यापीठाच्या वतीने त्याला लवकरच 50 लाख रुपये किमतीची हिऱ्याची अंगठी देणार असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले.



नकाशांची निवड

आनंदने तयार केलेली रचना आणि नकाशांची कोरिया देशात बांधण्यात येणाऱ्या एका नामांकित इमारतीसाठी निवड करण्यात आली आहे. आनंद सध्या सॅमसंग कंपनीत कार्यरत आहे.

प्रतिक्रिया

On 7/1/2010 11:58 AM swati said:

शाबास आनंद तू असच पुढे जात रहा आणि प्रगती करत रहा पण आपल्या लोकांना कधीही विसरू नको.