সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, December 27, 2012


शिकूही नये आणि विकूही नये....

काही दिवसांपूर्वी स्थानिक खुटाळा या गावी संतप्त विद्याथ्र्यांनी एस. टी. महामंडळाच्या स्कूल बसच्या काचा ङ्कोडल्या. महामंडळाच्या अधिकाèयांनी पोलिसांत तक्रार करून गुन्हे दाखल करण्याची तयारी केली. काही वरिष्ठ नागरिकांच्या पुढाकाराने मध्यस्थी झाली. प्रत्येक विद्याथ्र्याकडून ३०० रुपये घेऊन महामंडळाला पाच हजार रुपये देण्यात आल्यानंतर प्रकरण मिटले. दररोज ये-जा करणाèया विद्याथ्र्यांसाठी बस थांबत नाही, हे आमचे रडगाणे आहे. अनेक वर्षांपासून या समस्येवर शासन तोडगा काढत नाही, हे वास्तव आहे.
मसकाळङ्कने शहर बससेवेचा ठेवलेला प्रस्ताव अभिनंदनीय आहे. घुग्घुस, वणी, नकोडा, मुकुटबन या बसगाड्यांमध्ये यशवंतनगर, पडोली, खुटाळा, एमआयडीसी, qचचाळा येथील प्रवाशांचा सर्वाधिक भरणा असतो. इयत्ता पाचवीपासून ते अकरावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर, व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणारे शेकडो विद्यार्थी तासन्तास बसची वाट पाहतात. सकाळी लवकर तयारी केली, तरी बस १२ ते एक वाजेपर्यंत मिळत नाही. घुग्घुसकडून येणारी बस थांबतच नाही. विद्यार्थी आणि नागरिकांनी काय करावे. याच प्रकाराला चिडून संतप्त विद्याथ्र्यांनी बसच्या काचा ङ्कोडल्या होत्या. यात विद्याथ्र्यांचा दोष काय? या भागात राहणाèया गरीबवर्गाला बसशिवाय दुसरा पर्याय नाही. सध्या सुरू असलेल्या घुग्घुस बसमध्ये पाय ठेवायला जागा राहात नाही. रात्री उशिरापर्यंत मुली, महिला चंद्रपूरच्या बसस्थानकावरती रेंगाळत राहतात. त्यांच्या सुरक्षेचे काय? बस थांबत नाही म्हणून या भागातील विद्यार्थी चंद्रपूरला खोली करून राहतात. ज्या विद्याथ्र्यांचे २०० रुपयांच्या पासमध्ये येणे- जाणे होते. त्या गरीब विद्याथ्र्यांना नाहक दीड ते दोन हजार रुपयांचा महिन्याचा खर्च सोसावा लागतो. ग्रामीण भागातील विद्याथ्र्यांनी शिकायचे नाही काय?
घुग्घुस बसचा कंडक्टर ग्रामीण भागातील लोकांकडून तिकिटाचे पैसे घेतो. पण, तिकीट देत नाही. दररोज किती कंडक्टरसोबत भांडायचे. घुग्घुस बसमध्ये खूप गर्दी राहात असल्याने जवळच्या गावातील लोकांचे गाव येईपर्यंत तिकीट दिले जात नाही. अनेकदा प्रवासी उतरायच्या वेळेस कंडक्टर पैसे घेतो; पण तिकीट देत नाही.
ग्रामीण भागातील शेतातील भाज्या, शेंगा, दही विकणाèया महिलांना बघितले की, बसच थांबत नाही. या महिलांनी उदरनिर्वाह कसा करायचा? इतकी साधी, सरळ समस्या दूर करण्यास आतापर्यंत एकाही लोकप्रतिनिधीला वेळ मिळाला नाही. एसटी महामंडळाला विद्यार्थी व नागरिकांनी शेकडो पत्रे लिहिली. मात्र, बस काही थांबत नाही. यावरचा एकमेव उपाय म्हणजे चंद्रपूर शहर बससेवा सुरू करणे, हा होय. यशवंतनगर, पडोली, खुटाळा, एमआयडीसी, लहूजीनगर, qचचाळा, दाताळा, कोसारा, मोरवा, या गावांपर्यंत शहर बससेवा सुरू झाल्यास निश्चितच महसूल वाढेल.

श्रीकांत घनश्याम साव
(विद्यार्थी, जनता शिक्षण महाविद्यालय)
भ्र. क्र. ९९२२७७५६९०

शहर बससेवेसाठी आयुक्तांचा पुढाकार

शहर बससेवेसाठी आयुक्तांचा पुढाकार


चंद्रपूर, ता. २६ : चंद्रपूर शहरात शहर बससेवेची अनिवार्यता आणि लोकांकडून होत असलेल्या मागणीच्या पाश्र्वभूमीवर मनपाचे आयुक्त प्रकाश बोखड यांनीही आता पुढाकार घेतला आहे. शहरात बीओटी तत्त्वावर बससेवा सुरू करण्यासंदर्भात एसटी महामंडळाचे मत जाणून घेण्यासाठी त्यांनी पत्रव्यवहार केला आहे. मनपाच्या अनेक नगरसेवकांनीही बससेवेसाठी अनुकूलता व्यक्त केली आहे.
चंद्रपूर शहराची लोकसंख्या आणि व्याप्ती वाढल्याने नागरिकांकडून शहर बससेवेची मागणी होते आहे. एसटी महामंडळाकडून सध्या ऊर्जानगर ते बल्लारपूर यादरम्यान शहर बसेवेची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. या सेवेचा दररोज चार हजार नागरिक लाभ घेत असून, महामंडळालाही दररोज दहा ते बारा हजार रुपयांचा नङ्का मिळत आहे. या सेवेची चंद्रपूर शहरात व्याप्ती वाढवावी qकवा मनपाने स्वत: पुढाकार घेऊन शहरात बससेवा सुरू करावी, अशी मागणी होत आहे. तथापि, यासाठी आतापर्यंत भरीव प्रयत्न केले नसल्याने हा विषय मागे पडला. चंद्रपूर नगरपालिकेला महानगरपालिकेचा दर्जा दिल्यानंतर या मागणीने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. सुमारे तीन लाख लोकसंख्येचे चंद्रपूर शहर आणि सुमारे ४० ते ५०  किलोमीटर परिघात येत असलेल्या गावांसाठी ही सेवा गरजेची असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होऊ लागले आहे. पंचशताब्दी निधीतून चंद्रपूर शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. यासोबतच सुमारे दहा ते बारा गावांपर्यंत हद्द वाढविण्याचा मनपाचा प्रस्ताव आहे. या बाबी शहर बससेवेसाठी अनुकूल ठरणाèया आहेत. सुमारे दोन ते अडीच हजार ऑटोंमुळे होणारे प्रदूषण आणि ऑटोप्रवासाचे वाढलेले दर सर्वांसाठीच डोकेदुखी ठरले आहे. या पाश्र्वभूमीवर शहर बससेवेची गरज अधिकच भक्कम मानली जात आहे. मसकाळङ्कने यासंदर्भात पुढाकार घेतल्यानंतर अनेक संघटनांसोबत विद्यार्थी, कर्मचारी यांनीही शहर बससेवेला पाqठबा दिला आहे. मनपाचे आयुक्त प्रकाश बोखड यांनीही जनभावनेचा आदर करीत बससेवेसाठी पुढाकार घेतला आहे. बीओटी तत्त्वावर एसटी महामंडळाचे मत जाणून घेण्यासाठी आयुक्तांनी पत्रव्यवहार केला आहे. खुद्द एसटी महामंडळाने शहर बससेवेसाठी पुढाकार घेतल्यास हा प्रश्न तातडीने सुटू शकतो, असा आशावादही नागरिकांकडून व्यक्त केला जाऊ लागला आहे.


Monday, December 24, 2012

 लग्नाचे आमिष दाखवून केला अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून केला अत्याचार

महिला अत्याचाराची चर्चा देशभर सुरु असताना चंद्रपुरातही अल्पवयीन मुलीवर बलात्कार -
 राजधानी नवी दिल्लीत बस मध्ये झालेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेने गदारोळ उडाला असताना महिला अत्याचाराबाबत कायदे कडक होण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. अशातच चंद्रपुरात एका शाळकरी मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली असून पोलिसांनी या प्रकरणी २१ वर्षीय युवकाला ताब्यात घेतले आहे.
 चंद्रपूरच्या मित्रनगर भागात आपल्या काकाकडे राहते हि शाळकरी मुलगी. हि मुलगी घरी वादविवाद झाल्याने मानसिक तणावात होती. याच भागात राहणा-या व मूळचा चंद्रपूर जिल्ह्यातील केळझर गावचा रहिवासी असलेल्या २१ वर्षीय विनीत लाकडे या युवकाने या मुलीला मानसिक आधार देण्याच्या बहाण्याने या युवकाने पिडीत मुलीला आश्रय दिला. या युवकाने तिच्यासोबत लग्नाचे आमिष दाखवून सतत अत्याचार केला. दरम्यान मुलीच्या आईने या प्रकरणाची तक्रार पोलिसात केली. पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने कारवाई करत विनीत लाकडे या युवकाला अटक केली. आरोपी युवकाविरोधात कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल करून तपास चालविला जात आहे. महिला अत्याचाराच्या घटनांविरोधात त्वरित कारवाई करण्याचे धोरण अवलंबिल्यास गुन्ह्यास आळा बसून आरोपीना कडक शासन होण्यास मदत होणार आहे. कायदे कडक होऊन खटले मर्यादित वेळेत निकाली निघाल्यास कायद्याचा धाक स्थापित होण्यास मदत होणार आहे.

Sunday, December 23, 2012

सचिन रमेश तेंडुलकर

सचिन रमेश तेंडुलकर


सचिन रमेश तेंडुलकर (एप्रिल २४, १९७३:मुंबई)  हा क्रिकेटविश्वात डॉन ब्रॅडमन याच्यानंतर जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानला जाणारा भारतीय क्रिकेटपटू आहे. इ.स. २००२ मध्ये, कारकिर्दीच्या बाराव्या वर्षीच, विस्डेनने डॉन ब्रॅडमन याच्यानंतर सार्वकालिक दुसरा सर्वोत्तम कसोटी फलंदाज म्हणून तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील व्हिव रिचर्ड्स याच्यानंतरचा दुसरा सार्वकालिक सर्वोत्तम फलंदाज म्हणून सचिन तेंडुलकरची निवड केली होती.[१] २०११ च्या विश्वचषकविजेत्या भारतीय संघात तेंडुलकरचा समावेश होता. २००३ मधील क्रिकेट विश्वचषकात तो मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडला गेला होता. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतकांचे शतक करणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे. २० नोव्हेंबर २००९ रोजी त्याने कारकिर्दीतील ३०,००० आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा पार केला.
पद्म विभूषण आणि राजीव गांधी खेलरत्न या पुरस्कारांनी तो सन्मानित केला गेला आहे. भारतीय विमानदलाने त्याला ग्रुप कॅप्टन हा गौरवात्मक हुद्दा प्रदान केलेला आहे. असा मान मिळालेला तो पहिला खेळाडू आणि विमानोड्डाणाची पार्श्वभूमी नसलेला पहिला माणूस आहे. राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसने आणि म्हैसूर विद्यापीठाने सचिनला मानद डॉक्टरेट पदव्या प्रदान केलेल्या आहेत. ६ नोव्हेंबर २०१२ रोजी सचिनला मुंबईत मेंबर ऑफ दी ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा गौरव प्रदान करण्यात आला.
सध्याच्या भारतीय कसोटी व एकदिवसीय संघातील अनुभवसंपन्न मध्यवर्ती व्यक्ती असण्यासोबत सचिन तेंडुलकर राज्यसभेचा खासदारही आहे.

सुरुवातीचे दिवस                          

सचिन तेंडुलकरचा जन्म मुंबईमध्ये एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला. सचिनच्या कुटुंबीयांचे आवडते संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मन ह्यांच्या नावावरून त्याचे सचिन असे नाव ठेवण्यात आले. सचिनने त्याच्या शारदाश्रम विद्यामंदिर ह्या शाळेत क्रिकेटचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर ह्यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. शाळेत असताना त्याने आपला मित्र व सहखेळाडू असलेल्या विनोद कांबळीबरोबर हॅरीस शील्ड सामन्यात ६६४ धावांची अजस्र भागीदारी रचली. १९८८/१९८९ साली तो आपल्या पहिल्यावहिल्या प्रथम श्रेणी सामन्यामध्ये १०० धावांवर नाबाद राहिला. त्यावेळी तो मुंबई संघामधून गुजरातसंघाविरुद्ध खेळत होता. तेव्हा त्याचे वय १५ वर्षे २३२ दिवस होते, आणि त्यावेळी हा विक्रम करणारा (पहिल्या सामन्यात शतकी खेळी) तो सर्वांत तरुण खेळाडू होता.

आंतरराष्ट्रीय कारकिर्द                        

सचिनने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना १९८९ साली Flag of Pakistan (bordered).svg पाकिस्तानविरुद्ध कराची येथे खेळला. त्या सामन्यात त्याने वासिम अक्रमइम्रान खानअब्दुल कादिर आणि वकार युनूससारख्या दिग्गज गोलंदाजांचा सामना केला. सचिनची आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सुरुवात निराशाजनक झाली. वकार युनूस, ज्याचा सुद्धा हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना होता, त्याने सचिनला १५ धावांवर त्रिफळाचीत केले. याचे उट्टे सचिनने फैसलाबाद येथील कसोटी सामन्यात आपले पहिले अर्धशतक झळकावून काढले. सचिनची आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमधील सुरुवातही खराब झाली. डिसेंबर १८ला झालेल्या आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात खाते उघडण्यापूर्वीच (पुन्हा) वकार युनूसने त्याला बाद केले. वरील मालिकेनंतर न्यूझीलंडच्या दौऱ्यात त्याचे पहिले कसोटी शतक १२ धावांनी हुकले. त्या सामन्यात (नंतर भारताच्या प्रशिक्षकपदी आलेल्या) जॉन राईटने सचिनचा झेल पकडला ज्यायोगे सचिन जगातला सर्वात तरूण शतकी खेळी करणारा खेळाडू बनण्यापासून वंचित राहिला. अखेर १९९० सालच्या इंग्लंडच्या दौऱ्यात सचिनने आपले पहिले कसोटी शतक झळकवले. परंतु ह्या काळात त्याच्याकडून फारश्या लाक्षणिक खेळ्या झाल्या नाहीत. तेंडुलकरला खरा सुर त्याच्या १९९१-९२ सालच्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात गवसला, ज्यात त्याने पर्थमधील वेगवान आणि उसळत्या खेळपट्टीवर सुंदर शतकी खेळी केली. सचिनला आत्तापर्यंत कसोटी सामन्यांमध्ये ११ वेळा सामनावीराचा बहुमान मिळाला आहे व २ वेळा तो (बॉर्डर-गावसकर चषकामध्ये ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाविरुद्ध) मालिकावीर राहिला आहे.
सचिनने आपले पहिले एकदिवसीय सामन्यांमधील शतक सप्टेंबर ९इ.स. १९९४ साली कोलंबोश्रीलंका येथे, ऑस्ट्रेलियाविरुद्ध नोंदवले. त्याला पहिले आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक नोंदवण्यासाठी ७९ सामने वाट पहावी लागली.
सचिन हा एकमेव असा खेळाडू आहे की ज्याने रणजी चषक, दुलिप चषक आणि इराणी चषकाच्या आपल्या पहिल्या सामन्यांमध्ये शतक झळकावले.
१९९७ साली विस्डेनने सचिनला त्या वर्षीचा सर्वोत्तम वार्षिक क्रिकेटपटू घोषित केले. ह्याच वर्षी सचिनने पहिल्यांदा १००० कसोटी धावा केल्या. ह्याची सचिनने १९९९, २००१ आणि २००२ साली पुनरावृत्ती केली.
तेंडुलकरच्या नावे एका वर्षात १००० धावा करण्याचा विक्रम आहे. हा पराक्रम त्याने सहा वेळा केलेला आहे (१९९४, १९९६, १९९७, १९९८, २०००, २००३). १९९८ साली त्याने १८९४ एकदिवसीय धावा केल्या. हा त्याचा विक्रम अजून कोणीही मोडू शकलेला नाही.

गोलंदाजी                                               

तेंडुलकर हा नियमितपणे गोलंदाजी करत नसला तरी त्याने १३२ कसोटी सामन्यांमध्ये ३७ बळी आणि ३६५ एकदिवसीय सामन्यांमध्ये १४२ बळींची कामगिरी केली आहे. ज्यावेळेस महत्त्वाचे गोलंदाज अपयशी ठरत असतात त्यावेळेस सचिनला गोलंदाजी देण्यात येते. आणि बऱ्याच वेळेस तो बळी मिळविण्यात यशस्वी ठरतो. जरी त्याची गोलंदाजीची सरासरी ५० च्या वर असली, त्याला 'जम बसलेली फलंदाजांची जोडी फोडण्याचा हातगुण असणारा गोलंदाज' समजण्यात येते.[२][३][४]
अनेक वेळा[५] सचिनने घेतलेल्या बळींचा भारताच्या विजयामध्ये महत्त्वपूर्ण वाटा राहिला आहे. खालील सामन्यांमध्ये सचिनच्या गोलंदाजीची नोंद घेता येईल,
  • १९९७-९८ सालच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या[६] मालिकेत कोची येथे ५ बळींची कामगिरी. २६९ धावांचे लक्ष्य समोर असताना ३१ व्या षटकात ऑस्ट्रेलियाची २०३/३ अशी मजबूत स्थिती होती. सचिनने १० षटकात केवळ ३२ धावा देऊन एम.जी.बेवन, एस.आर.वॉ, डी.एस.लेमन, टी.एम.मुडी आणि डी.एम.मार्टीन ह्यांना बाद करून सामना भारताच्या बाजूने वळवला
  • १९९३ सालचे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातील हिरो कप उपांत्य सामन्यामधील शेवटचे षटक. दक्षिण आफ्रिकेला सामना जिंकण्यासाठी एक षटक शिल्लक असताना ६ धावांची गरज होती. सचिनने त्या सामन्यात एकही धाव न देता तीन चेंडू टाकले व संपूर्ण षटकात केवळ तीन धावा देऊन भारताला सामना जिंकून अंतिम सामन्यात पोहोचण्यास मदत केली.[७]
  • शारजामध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध[८] १० षटकांत ४/३४ ची कामगिरी केली. त्यामुळे विंडीजचा डाव १४५ धावांत आटोपला.
  • आय सी सी १९९८ मधील उपांत्यपूर्व फेरीमध्ये ढाक्कामध्ये त्याने १२८ चेंडूंत १४१ धावा केल्यावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ बळी मिळवून भारताचा उपांत्य फेरीमध्ये पोहोचण्याचा मार्ग सुकर केला.


कसोटी क्रिकेट

धावाप्रतिस्पर्धीठिकाण (वर्ष)निकाल
११९ नाबादइंग्लंडमँचेस्टर (१९९०)अनिर्णित
१४८ऑस्ट्रेलियासिडनी (१९९१-९२)अनिर्णित
११४*ऑस्ट्रेलियापर्थ (१९९१-९२)ऑस्ट्रेलिया
१२२ईंग्लंडबर्मिंगहॅम (१९९६)ईंग्लंड
१६९दक्षिण आफ्रिकाकेप टाऊन (१९९६-९७)दक्षिण आफ्रिका
१५५ नाबादऑस्ट्रेलियाचेन्नई (१९९७-९८)भारत
१३६पाकिस्तानचेन्नई (१९९८-९९)पाकिस्तान
१५५दक्षिण आफ्रिकाब्लूमफॉँटेन (२००१-०२)दक्षिण आफ्रिका
१७६वेस्ट इंडीझकोलकाता (२००२-०३)अनिर्णित
२४१ नाबादऑस्ट्रेलियासिडनी (२००४)अनिर्णित
१५४ नाबादऑस्ट्रेलियासिडनी (२००८)ऑस्ट्रेलिया
* १८ वर्षाचा असताना वाकाच्या उसळत्या खेळपट्टीवर खेळल्या गेलेल्या या खेळीला स्वतः तेंडुलकर आपली सर्वोत्त्कृष्ट खेळी मानतो.

एकदिवसीय क्रिकेट

धावाप्रतिस्पर्धीठिकाण (वर्ष)निकाल
९० [९]ऑस्ट्रेलियामुंबई (१९९६ वि.च.+)ऑस्ट्रेलिया
१०४झिम्बाब्वेबेनोनी (१९९७)भारत
१४३ऑस्ट्रेलियाशारजाह (१९९८)ऑस्ट्रेलिया
१३४ऑस्ट्रेलियाशारजाह (१९९८)भारत
१२४झिम्बाब्वेशारजाह (१९९८)भारत
१८६ नाबादन्यूझीलँडहैदराबाद (१९९९)भारत
९८पाकिस्तानसेंच्युरीयन (२००३ वि.च.)भारत
१४१पाकिस्तानरावळपिंडी (२००४)पाकिस्तान
१२३पाकिस्तानअमदावाद (२००५)पाकिस्तान
९३श्रीलंकानागपूर (२००५)भारत
२०० नाबाददक्षिण आफ्रिकाग्वाल्हेर (२०१०)भारत
११४बांगलादेशमिरपूर (२०१२)**भारत
+वि.च.-विश्वचषक **आंतरराष्ट्रीय सामन्यांतील १००वे शतक

कसोटी क्रिकेट                                             

तेंडुलकरच्या कसोटी कारकिर्दीतील ठळक कामगिरी,
  • विस्डेनतर्फे दुसऱ्या क्रमांकाच्या (डॉन ब्रॅडमननंतरच्या) सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा बहुमान [१][१०]
  • सर्वाधिक कसोटी शतकांचा (३५) विक्रम, जो आधी सुनील गावसकरच्या नावे होता (३४ शतके). हा विक्रम सचिनने दिल्लीमध्ये २००५ सालीश्रीलंकेविरुद्ध खेळताना नोंदवला.
  • सर्वाधिक क्रिकेट मैदानांवर खेळाचा विक्रम: सचिन आत्तापर्यंत ५२ मैदानांवर कसोटी क्रिकेट खेळलेला आहे. हा आकडा मोहम्मद अझहरुद्दीन(४८), कपिल देव (४७), इंजमाम उल-हक (४६) आणि वसिम अक्रम (४५) पेक्षा जास्त आहे.
  • सर्वात जलद १०००० धावा कसोटी सामन्यांमध्ये करण्याचा विक्रम: हा विक्रम ब्रायन लारा आणि सचिन ह्या दोघांच्या नावे आहे. दोघांनीही हा विक्रम १९५ डावांमध्ये केला.
  • एकूण कसोटी धावांमध्ये पहिला क्रमांक .
  • सर्वोच्च फलंदाजीची सरासरी: ५५.७९. ही सरासरी कोणत्याही १०,००० धावा केलेल्या फलंदाजापेक्षा जास्त आहे.
  • सचिन हा १०,००० पेक्षा जास्त कसोटी धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज आहे.
  • त्याच्या नावे ३७ कसोटी बळी आहेत (डिसेंबर १४२००५).
  • दुसऱ्या क्रमांकाचा जलद ९,००० धावा करणारा फलंदाज. (ब्रायन लाराने ९००० धावा १७७ डावांमध्ये केल्या, सचिनने १७९ डावांमध्ये ती कामगिरी केली).

एकदिवसीय क्रिकेट                                                               

तेंडुलकरच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीतील ठळक कामगिरी:
  • सर्वात जास्त एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम.
  • सर्वाधिक (५०) वेळा सामनावीर बनण्याचा विक्रम.
  • सर्वाधिक (८९ वेगवेगळ्या) मैदानांवर खेळण्याचा विक्रम.
  • सर्वाधिक धावा (मार्च २४२०११ पर्यंत १८,००८ धावा).
  • सर्वाधिक शतके (४९).
  • पुढील संघांविरुद्ध सर्वाधिक शतके: ऑस्ट्रेलियादक्षिण आफ्रिकान्यू झीलंडश्रीलंका आणि झिम्बाब्वे.
  • १०,०००, ११,०००, १२,०००, १३,००० आणि १४,०००, १५,०००, १६,०००, १७,०००, १८,००० धावांचे लक्ष्य प्रथम आणि सर्वात जलद ओलांडणारा फलंदाज.
  • एकदिवसीय सामन्यांमध्ये १४,००० धावांचा टप्पा पार करणारा एकमेव फलंदाज.
  • १०० डांवांमध्ये ५० अथवा अधिक धावा करणारा एकमेव फलंदाज.
  • १०० हून अधिक बळी (मार्च २४२०११ पर्यंत १५४ बळी).
  • १०,००० पेक्षा अधिक धावा केलेल्या फलंदाजांमध्ये सर्वाधिक फलंदाजीची सरासरी (मार्च २४२०११ पर्यंत).
  • भारतीय फलंदाजांमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावांचा विक्रम (१९९९ साली न्यू झीलँडविरुद्ध केलेल्या १८६ धावा)
  • एका वर्षात १,००० अथवा जास्त धावा करण्याची कामगिरी सर्वाधिक वेळा करण्याचा विक्रम. ही कामगिरी त्याने आत्तापर्यंत सहा वेळा केलेली आहे - १९९४, १९९६, १९९७, १९९८, २००० आणि २००३.
  • १९९८ साली त्याने १,८९४ एकदिवसीय धावा केल्या. हा विक्रम आत्तापर्यंत कोणीही मोडू शकलेला नाही.
  • १९९८ साली त्याने ९ एकदिवसीय शतके झळकवली. इतकी शतके आत्तापर्यंत कोणत्याही फलंदाजाने व कोणत्याही एका वर्षात केलेली नाहीत.
  • फेब्रुवारी २०१० मध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्ध ग्वाल्हेरमध्ये एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच २०० धावा फटकावण्याचा विक्रम.
विश्वचषक

आय.पी.एल.

तेंडुलकर इंडियन प्रीमियर लीगच्या मुंबई इंडियन्स संघाकडून त्यांचा आयकॉन प्लेयर म्हणून खेळतो. २००८च्या आय.पी.एल. मोसमात पहिल्या तीन सामन्यात त्याला दुखापतीमुळे खेळता आले नाही.

इतर

  • सचिन तेंडुलकर हा तिसऱ्या पंचाकडून धावचीत केला गेलेला पहिला फलंदाज आहे. हा निर्णय १९९२ साली दक्षिण आफ्रिकेमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना देण्यात आला.
  • सचिन हा (१९९२ साली) यॉर्कशायर क्रिकेट काउंटी क्लबमध्ये खेळणारा पहिला परदेशी फलंदाज आहे.
  • विशेष म्हणजे, विस्डेनने सचिनच्या एकाही कामगिरीची नोंद सर्वोच्च १०० फलंदाजीच्या खेळ्यांमध्ये केलेली नाही.



व्यक्तिगत माहिती
पूर्ण नावसचिन रमेश तेंडुलकर
उपाख्यमास्टर ब्लास्टर, लिटल मास्टर, तेंडल्या, क्रिकेटचा ईश्वर
जन्म२४ एप्रिलइ.स. १९७३ (वय  ३९)
मुंबई,भारत
उंची५ फु ५ इं (१.६५ मी)
विशेषताफलंदाज
फलंदाजीची पद्धतउजखोरा
गोलंदाजीची पद्धतउजव्या हाताने लेग ब्रेक/ऑफ ब्रेक/मध्यमगती
आंतरराष्ट्रीय माहिती
एकदिवसीय शर्ट क्र.१०
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्षसंघ
१९८८सीसीआय
१९९२यॉर्कशायर
१९८८–सद्यमुंबई
२००८-सद्यमुंबई इंडियन्स
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.प्र.श्रे.लि.अ.
सामने१८३४६३२९२५५१
धावा१५,४७०१८४२६२४३८९२१९९९
फलंदाजीची सरासरी५५.४४४४.८३५८.६२४५.५४
शतके/अर्धशतके५१/६२४९/९६७८/१११६०/११४
सर्वोच्च धावसंख्या२४८*२००*२४८*२००*
चेंडू४१३२८०४४७५३९१०२३०
बळी४५१५४७०२०१
गोलंदाजीची सरासरी५३.६८४४.४०६१.९५४२.१७
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळीn/an/a
सर्वोत्तम गोलंदाजी३/१०५/३२३/१०५/३२
झेल/यष्टीचीत१०५/–१३५/–१७४/–१७५/–