সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, November 28, 2015

राज्यात दारू विक्रीवर बंदी होणार नाही : शासन

राज्यात दारू विक्रीवर बंदी होणार नाही : शासन

मुंबई - दारू विक्रीवर कधीही लवकरच  बंदी होणार नाही, असे राज्य सरकारने म्हटले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमध्ये दारू बंदी घोषणा केल्यानंतर एकसमान बंदी महाराष्ट्रातील लागू करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अभय बंग, शिवसेना आमदार नीलम गो-हे, भाजपचे आशिष देशमुख यांनी केली होती
तथापि, महाराष्ट्र सरकारने दारू विक्रीतून सशक्त महसूल मिळतो म्हणून राज्यात अंमलबजावणी होण्याची शक्यता नाही, असे सांगितले आहे.

"राज्य फक्त दारू विक्रीतून सुमारे Rs18,000 कोटी महसूल प्राप्त करतो. सरकारने दारू विक्री बंदी साठी म्हणून, शक्य होणार नाही. महसूल पर्यायी स्रोत आढळल्यास दारू विक्री प्रतिबंध शक्य असल्याचे "राज्याचे महसूल आणि अबकारी मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले.

बिहार सरकारने 1 एप्रिल पासून राज्यातील दारू बंदी निर्णय घेतला. मात्र चालू आर्थिक वर्षात किमान, तो बंदी शक्य होणार नाही, "ते म्हणाले. राज्य आर्थिक स्थिती अतिशय नाजूक आहे. "
चंद्रपूर, वर्धा व गडचिरोलीत गेल्या काही वर्षांपासून दारू विक्री प्रतिबंधित आहे. ती कायम राहणार आहे
अबकारी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दारू विक्रीवर राज्य व्यापी बंदी लागू करण्यासाठी प्रस्ताव आली नाही असे स्पष्ट केले.
तथापि, गाव पातळीवर दारू विक्रीवर घालण्यात आलेली बंदी स्थानिक संस्था मध्ये एक ठराव पास करता येते. महिला सक्षम करण्यासाठी प्रक्रिया सोपी करण्यासाठी प्रशासन निर्देश दिले. महिला बहुसंख्य या ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर दारू विक्री गावांमध्ये बंदी घातली जाईल.

Wednesday, November 18, 2015

दगड घालून खून

दगड घालून खून


आज सकाळी सोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्रिमूर्तीनगरच्या मागच्या बाजूला असलेल्या बाजारपेठेत जुगार, दारु आणि पैशाच्या वादातून दोन युवकांच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. रवि प्रकाश डुले (२६) रा. गोपालनगर आणि बंटी उर्फ संदीप शरद आटे (२९) अशी मृतकांची नावे आहेत. या प्रकरणात पोलीसांनी आरोपी मनोज भारद्वाज (२५) यास अटक केली आहे. रवि हा बर्डीवर ऑटोरिक्षा चालवितो. तर आरोपी मनोज आणि बंटी हे सेन्ट्रींगचे काम करतात. काही दिवसांपूर्वी मनोजने रविकडून हिरो प्लेजर कंपनीची दुचाकी मागितली होती. रविने आपल्या नातेवाईकाची दुचाकी मनोजला दिली. परंतु मनोजने रविकडून घेतलेली दुचाकी स्वत:च्या फायद्याासाठी दुसºयाकडे तारण ठेवली होती. याची माहिती मिळताच रवि हा मनोजला दुचाकी परत करण्याचे किंवा दुचाकी सोडविण्यासाठी पैशाची मागणी करीत होता दरम्यान काल, मंगळवारच्या रात्री ९ च्या सुमारास रवि हा बंटी, मनोज आणि इतर पाच ते सहा मित्रांसह इंद्रप्रस्थनगर परिसरातील बाजाराच्या ठिकाणी विदेशी दारु पित आणि जुगार खेळत बसला होता. रात्री ११.३० पर्यंत ते दारु पित होते. त्यानंतर एक-एकजण घरी जाऊ लागले. त्या सुमारास त्यांची दारुही संपली. शेवटी रवि, बंटी आणि मनोजच त्या ठिकाणी थांबले होते. तिघांनाही पुन्हा दारुची आवश्यकता होती. त्यामुळे दारु कोण आणणार याच्यातून रवि आणि मनोजमध्ये वाद झाला. या वादातून दुचाकीचा मुद्दा आला असता मनोजने दुचाकी आणली आणि रविला दिली. परंतु त्यानंतरही भांडण सुरुच होते. त्यामुळे ११.३० च्या सुमारास मनोजने दारुच्या नशेत शेजारचे सिमेंटचे पत्रे घेऊन रविच्या डोक्यावर मारले. यात रवि रक्तबंबाळ झाला असता बंटी आरडाओरड करु लागला. त्यामुळे मनोजने बंटीच्या डोक्यातही दगड घातला. यानंतर रवि आणि बंटी गतप्राण झाले असता मनोजने त्याना संपविण्याच्या उद्देशाने पुन्हा त्यांच्या डोक्यात दगड घातले. रवि आणि बंटीचा मृत्यू झाल्यानंतर मनोज हा दुचाकी घेऊन घटनास्थळावरुन पळून गेला. सकाळी नैसर्गिक क्रियेसाठी जाणाºया रहिवाशांना बाजारपेठच्या रस्त्यांवर रक्ताचा सडा दिसला आणि काही अंतरावर दोन मृतदेह पडले होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी प्रचंड गर्दी केली होती. गर्दीतील एका युवकाने नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करुन खुनाविषयी माहिती दिली. यानंतर सकाळी ६ वाजता सोनेगाव, राणाप्रतापनगर येथील पोलीस घटनास्थळी पोहाचले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले. त्यानंतर मृतदेहांची ओळख पटविण्यात आली आणि आरोपी मनोजला सकाळी ९.३० च्या
सुमारास त्याच्या घरुन अटक केली. मनोजने एकट्यानेच खून केला की त्याच्यासोबत कुणी होते, याचा तपास पोलीस करीत आहेत. त्यांच्यासोबत दारु पिणाºया काहींना पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. परंतु मनोजने आपण एकट्यानेच दोघांनाही संपविल्याची कबुली पोलीसांना दिली.

Saturday, November 14, 2015

जटपुरा गेट, वाहतुकीची कोंडी

जटपुरा गेट, वाहतुकीची कोंडी

चंद्रपूर-  चंद्रपुरातील जटपुरा गेटच्या वाहतुकीची कोंडी फोडण्याचा श्रीगणेशा शेवटी शनिवारी गेटजवळच आयोजित जनसभेने झाला. राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत जटपुरा गेटची वाहतूक सुरळीत करण्याचे दीर्घकालीन, तसेच तात्पुरत्या स्वरूपाचे उपाय चर्चिले गेले. तात्पुरत्या उपायांवर लगेच कार्यवाही करण्याचे निर्देशही मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर आणि जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप दिवाण यांना दिले.
मुख्य रस्त्याचे पथमार्ग लहान करणे, रामनगरच्या वनवेबाबत विचार करून तशा सूचना मागवणे, नो पार्किंग झोन तयार करून पर्यायी वाहनतळ उपलब्ध करून देणे, शहरातून बाहेर पडणारे अन्य वळण मार्ग शोधणे, रस्त्याचे दुभाजक तोडून ते वाहतुकीला सुव्यवस्थित होईल, असे करणे आदी विषयांवर सूचना देण्यात आल्या. या सार्‍या बाबींवर विचार करण्यासाठी एक समिती गठित करण्यात आली. 
शिवाय दीर्घकालीन उपायायोजना करण्यासाठी पुरातत्व विभागाच्या प्रमुखांना येत्या सोमवारी जिल्हाधिकार्‍यांमार्फत पत्र लिहून त्यांना पाचारण करणे आणि प्रत्यक्ष जटपुरा गेट दाखवणे, त्यांच्यासोबत ही समस्या सोडविण्यासाठी चर्चा करणे, असे ठरले. 
सुधीर मुनगंटीवार हे स्वत: या कामासाठी पुढाकार घेणार आहेत. ते म्हणाले, जटपुरा गेट तोडणे हा काही शाश्‍वत मार्ग नाही. कारण किल्ला ही या शहराची ओळख आहे. या मार्गावरची वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी सारे मार्ग शोधून त्यावर काम करावे लागेल. रस्त्यांवरील विजेचे खांब काढून वाहिन्या भूमिगत कशा करता येईल, ते बघावे लागेल. 
तत्पूर्वी, चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे रमणिकभाई चव्हाण यांनी, गेटच्या शेजारची भिंत तोडण्यासाठी पुरातत्व विभागाला परवानगी देण्यास काही हरकत नसावी. कारण आम्ही या वास्तूचे विद्रुपीकरण करीत नसून, उलट त्याचे सौंदर्यीकरणच करणार आहोत. त्यामुळे लवकरात लवकर ती परवानगी घ्यावी, अशी सूचना केली. तर, डॉ. गोपाल मुंधड यांनी, जटपुरा गेटवरील वाहनांची कोंडी लक्षात घेता जटपुरा गेटची भिंत तोडावी आणि मनपाच्या मालकीच्या दुकानलाईनचा काही भाग तोडून त्या दुकानदारांना मागचा भाग देण्यात यावा, असे सूचवले. विनोद दत्तात्रय यांनी, अद्ययावत स्थापत्य तंत्रज्ञानाचा वापर करून तुकड्यामध्ये गेट उचलून बाजूला उभा करावा, जेणेकरून तो रस्त्याच्या मधे येईल आणि सुुंदरही दिसेल, असे सांगितले. मेघनाद जानी, तसेच सदानंद खत्री यांनी, जटपुरा गेटची भिंत तोडून दहा व चौदा फूट रुंदीचे दोन रस्ते तयार करावे. गेटच्या मधून चारचाकी जातील आणि उर्वरित रस्त्यावरून दुचाकी आणि ऑटो जातील, अशी व्यवस्था तयार करावी, असे सूचवले. रामनगर माार्गावरील अतिक्रमण हटविण्यात यावे आणि या मार्गाला वनवे करावे, अशीही सूचना आली. या सार्‍या सूचनेनंतर सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित अधिकार्‍यांसोबत प्रत्यक्ष गेट आणि रस्त्याची पाहणी केली.यावेळी आ. नाना श्यामकुळे, आ. संजय धोटे, महापौर राखी कंचर्लावार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रा. अतुल देशकर, जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर, पोलिस अधीक्षक संदीप दिवाण यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. 

Thursday, November 12, 2015

राज्य नाटय स्पर्धेत यंदा 13 नाटकं

राज्य नाटय स्पर्धेत यंदा 13 नाटकं

मेजवाणी 18 नोव्हेंबर पासुन प्राथमिक फेरीला प्रारंभ

शासनाच्या सांस्कत्रतिक कार्य संचालनालयच्या वतीने आयोजित 55 व्या हौशी मराठी नाटय स्पर्धाचे आयोजन दिनांक 18 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान होत असुन यंदा एकुण 13 नाटकं चंद्रपुर केंद्रावर, प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कत्रतिक सभागत्रहात सादर होत असुन दिनांक 18 नोव्हेंबर पासुन प्राथमिक
पफेरीला प्रारंभ होणार आहे.
येत्या 18 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत हि स्पर्धा रंगणार असुन रोज सायंकाळी 7 वाजता नाटकाचे प्रयोग होणार आहे. स्पर्धेचे वेळापऋाकाप्रमाणे दिनांक 18 नोव्हेंबर, बुधवार, सायंकाळी 7 वाजता श्री. सिध्दीविनायक प्रतिष्ठान, यवतमाळ या संस्थेचे नाटक १अभिनेऋाी२, लेखक - गिरीश जोशी, दिग्दर्शक - कल्पना जोशी, दिनांक 19 नोव्हेंबर, गुरफवार, सायंकाळी 7 वाजता समुत्कर्ष बहुउद/देशीय संस्था, गडचिरोजी या संस्थेचे नाटक १परिवर्तन२, लेखक, दिग्दर्शक - राजरतन देवीदास पेटकर, दिनांक 20 नोव्हेंबर, शुक्रवार, सायंकाळी 7 वाजता समुत्कर्ष बहुउद/देशीय संस्था, यवतमाळ या संस्थेचे नाटक १तप्त दाही दिशा२, लेखक
- डाॅ. राजेन्द्र धामणे, दिग्दर्शक - राजाभाउफ भगत, दिनांक 21 नोव्हेंबर, शनिवार, सायंकाळी 7 वाजता डाॅ. श्यामाप्रसाद सार्वजनिक वाचनालय, चंद्रपुर या संस्थेचे नाटक १हणम्याची मरीमाय२, लेखक - विजय खानविलकर, दिग्दर्शक - श्रीनिवास मुळावार, दिनांक 22 नोव्हेंबर, रविवार, सायंकाळी 7 वाजता कामगार मनोरंजन केंद्र, चंद्रपुर या संस्थेचे नाटक १देवाशपथ खोट सांगेन२, लेखक - डाॅ. मोहन पानसे, दिग्दर्शक - मोहन जोशी, दिनांक 23 नोव्हेंबर, सोमवार, सायंकाळी 7 वाजता कलावैभव नाटय व सांस्कत्रतिक संस्था, यवतमाळ या संस्थेचे नाटक १खेळ२, लेखक - अनिल दांडेकर, दिग्दर्शक - अविश वत्सल, दिनांक 24 नोव्हेंबर, मंगळवार, सायंकाळी 7 वाजता कलाश्रय ज्ञान व कला संवर्धन मंडळ, यवतमाळ या संस्थेचे नाटक १आसरफबा२, लेखक - सुनिल देशपांडे, दिग्दर्शक - प्रशांत गोडे, दिनांक 25 नोव्हेंबर, शनिवार, सायंकाळी 7 वाजता अस्मिता रंगायतन, यवतमाळ या संस्थेचे नाटक १माझाा खेळ मांडु दे२, लेखक - सई परांजपे, दिग्दर्शक - अशोक आष्टीकर, दिनांक 26 नोव्हेंबर, गुरफवार, सायंकाळी 7 वाजता पफुलोरा सामाजिक विकास
संस्था, वर्धा या संस्थेचे नाटक १घर तिघांचं हवं२, लेखक - रत्नाकर मतकरी, दिग्दर्शक - विकास पफटिंगे, दिनांक 27 नोव्हेंबर, शुक्रवार, सायंकाळी 7 वाजता नवोदिता, चंद्रपुर या संस्थेचे नाटक १ज्याचा त्याचा प्रश्न२, लेखक - अभीराम भडकमकर, दिग्दर्शक - डाॅ. जयश्री कापसे-गावंडे, दिनांक 28 नोव्हेंबर, बुधवार, सायंकाळी 7 वाजता कल्पतरफ बहुउद/देशीय संस्था, यवतमाळ या संस्थेचे नाटक १हीच तर प्रेमाची गंमत आहे२, लेखक - अशोक पाटोळे, दिग्दर्शक - विलास राखे, दिनांक 29 नोव्हेंबर, रविवार, सायंकाळी 7 वाजता अध्ययन भारती, वर्धा या संस्थेचे नाटक १श्रीकांत प्रभुणेची प्रेमकथा२, लेखक - श्याम पेठकर, दिग्दर्शक - चैतन्य आठले, दिनांक 30 नोव्हेंबर, सोमवार, सायंकाळी 7 वाजता आदिवासी लोकरंग कलामंच बहुउद/देशीय संस्था, वणी, जिल्हा यवतमाळ या संस्थेचे नाटक १कातरवेळ२, लेखक - डाॅ. माणिक वडयाळकर, दिग्दर्शक - आनंद गेडाम
तरी 18 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत स्पर्धा रंगणार असुन रसिकप्रेक्षकांनी मोठया संखेने आपली उपस्थिती दर्शवावी असे आव्हाहन महाराष्ट! शासनाच्या सांस्कत्रतिक कार्य संचालनालयच्या वतीने समन्वयक सुशील सहारे यांनी केले आहे.