काव्यशिल्प Digital Media: eco- pro

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label eco- pro. Show all posts
Showing posts with label eco- pro. Show all posts

Thursday, September 27, 2018

गोंङकालीन इतिहासाची महती ऐकून भारावले भामरागङचे आदिवासी

गोंङकालीन इतिहासाची महती ऐकून भारावले भामरागङचे आदिवासी

रानावनातील आदिवासी बांधवांनी पहिल्यांदाच बघितला पूर्वजाचा किल्ला
जागतिक पर्यटन दिन - लोकबिरादरी प्रकल्प व इको-प्रो चा उपक्रम
चंद्रपुर/प्रतिनिधी:
 शिक्षणाचा गंध नाही, इतिहासाची कल्पना नाही, विकासाचा पत्ता नाही.... बदलत्या जगाच्या घडामोडीपासून कोसोदूर राहिलेल्या या भामरागडसारख्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातील आदिवासी बांधवांनी पहिल्यांदा चंद्रपूर शहर बघितले. इतकेच नव्हे तर गोंडकालीन त्यांच्याच पूर्वजांनी बांधलेला किल्ला आणि वास्तू बघून मन भारावून गेले होते. इतिहासाची माहिती जाणून घेताना आपल्याच पूर्वजांनी येथे राज्य केल्याचा अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
Image may contain: 2 people, people standing, sky and outdoorआज जागतीक पर्यटनदिनाचे औचित्य साधत गडचिरोली जिल्हयातील हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प अंतर्गत आदीवासी बांधवाची इको-प्रो संस्थेच्या माध्यमाने चंद्रपूर शहरातिल ऐतिहासिक गोंडकालीन किल्ला व इतर वास्तु स्थळी भेट देण्यात आली.इको-प्रो संस्थेचे गोंडकालीन ऐतिहासिक वारसा असलेला किल्लाचे स्वच्छता अभियान सुरू असुन सोबतच आदीवासीचा वारसा असलेला गोंडकालिन इतिहासाचे साक्षीदार अनेक वास्तु येथे आहेत. आज जागतीक पर्यटन दिनाचे औचित्य साधत गडचिरोली जिल्हातिल डाॅ. प्रकाश आमटे यांचे कार्यस्थळ असलेले लोकबिरादरी प्रकल्प येथिल आदीवासी बांधव तसेच आजुबाजच्या गावातील गावकरी यांची आज सहल चंद्रपूर शहरात किल्ला पर्यटनासाठी आलेली होती. यांसदर्भात इको-प्रोच्या पुरातत्व विभागच्या वतीने या सर्व आदीवासी बांधवाना चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक वारसा आणी त्यांचा इतिहासाची माहीती यावेळी देण्यात आली.
Image may contain: 6 people, including Harish Sasankar, people standing and outdoor
चंद्रपूर पर्यटनासाठी आलेल्या आदीवासी बांधवाना चंद्रपूर शहराचा वैभवशाली गोंडकालीन इतिहास आणी विवीध गोंडराजे यांची माहीती पठाणपुरा गेट, अंचलेश्वर गेट, जटपुरा गेट, विर बाबुराव पुलेश्वर शेडमाके, गोंडराजे राजमहल-कारागृह, बगड खिडकी जवळील देखना बुरूज, गोंडराजे समाधीस्थळ, पुरातन विहीर, अंचलेश्वर मंदीर व महाकाली मंदीर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देत या संपुर्ण वास्तुचा इतिहास इको-प्रो चे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी सर्व उपस्थित आदीवासी बांधवाना सांगीतला. हा संपुर्ण इतिहास ऐकुन आदीवासी बांधव हरकुन गेले. त्यांनी उपक्रमाचे मनापासुन स्वागत केले. इतके वर्षापासुन हा वारसा असुन आम्ही अजुन बघितला नव्हता यांची खंत सुध्दा व्यक्त केली.
या उपक्रमाचे आयोजन लोकबिरादरी प्रकल्पाचे अनिकेत आमटे आणी इको-प्रो चे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी केले होते. यामुळे चंद्रपूरचा ऐतिहासिक वारसा हेमलकसा सारख्या दुर्गम भागातील आदीवासी बांधवाना जवळुन बघता आला, अनुभवता आला. यावेळी लोकबिरादरी प्रकल्पाचे मनोहर अंपलवार, मुंशी दूर्वा, राहुल भसारकर, जोगा गोटा इको-प्रो संस्थेचे अनिल अडगुरवार, अमोल उटटृलवार, हरीश मेश्राम, अक्षय खनके सहभागी होते.

Sunday, September 23, 2018

पांढरकवङा वाघिण प्रश्नावर NGO ची वनमंत्र्याशी भेट

पांढरकवङा वाघिण प्रश्नावर NGO ची वनमंत्र्याशी भेट

चंद्रपूर - मागील दोन वर्षात 13 बळी घेणाऱ्या हल्लेखोर वाघिणीला जेरबंद करण्यासाठी पांढरकवडा येथे वनविभागाची चमू दाखल झाली आहे. शिकारीचे गुन्हे दाखल असलेल्या नवाब शूटरऐवजी वाघिणीला नागरिकांच्या हितासाठी बेशुद्ध करून पकडण्याच्या मागणीवर चंद्रपूर येथील इको प्रो संस्थेसह विविध स्वयंसेवी संस्थांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन चर्चा केली.
मागील दोन वर्षात 13 बळी घेणाऱ्या या वाघिणीला करण्याचे आदेश वन विभागाने दिले होते. त्या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्यानंतर  न्यायालयाने हल्लेखोर वाघीण धोकादायक असल्याने तिला योग्य असल्याचा निर्वाळा दिला होता. त्याविरुद्ध काही संस्थांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणात ठार करण्याचे आदेश दिले. त्यामुळे संघटना रस्त्यावर उतरलेल्या आहेत. दोन दिवसापूर्वीच नागपूर येथील काही संघटनांनी संविधान चौकात चेहऱ्यावर वाघाचे रेखाटने करून निदर्शने केली.
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील वाघीण प्रकरणात मोठा गदारोळ झाल्यानंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे.  वनविभागाचे अख्ख्ये मुख्यालय पांढरकवडा येथे दाखल झाले असून,  त्यांच्या आदेशानुसार वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करण्यात येणार आहे.
केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांचा हस्तक्षेप झाल्यावर हैदराबादचा शूटर नवाब अली खान व मध्य प्रदेशातून आली टिम परत गेल्याने सुरू असलेल्या या मोहिमेविषयी संभ्रम निर्माण झाला होता. प्रधान मुख्य वनसंरक्षक मिश्रा यांनी वन्यजीव विभागाचे अपर मुख्य संरक्षक सुनील लिमये सोबत पांढरकवडा येथे दौरा केला आहे.

Thursday, September 20, 2018

जुनोना- जलमहलची झाली वाताहत

जुनोना- जलमहलची झाली वाताहत

जुनोना- जलमहलचे व्हावे सौंदयीकरण
पुरातत्वीय दृष्टया संवर्धन करून पर्यटन विकास करण्याची इको-प्रोची मागणी


चंद्रपूरः गोंडराजे खांडक्या बल्लाळशाह यांच्या काळात बांधकाम झालेले जुनोना गावाच्या तलावाच्या काठावरील जलमहल आहे. या जलमहल अजुनही पुरातत्व विभागाचे लक्ष न गेल्याने वाताहत झाली आहे. वेळो-वेळी इको-प्रो व्दारा ‘जलमहल’ परिसराची स्वच्छता अभियान राबविण्यात आलेले आहे. चंद्रपूर शहरालगत असलेल्या जुनोना तलाव परिसरातील निसर्गरम्य परिसरात बांधण्यात आलेले ऐतिहासिक गोंडकालिन ‘जलमहल’ पुरातत्व विभागाने ताब्यात घेऊन त्याचे संवर्धन करण्याची तसेच सौदर्यीकरन करून पर्यटनदृष्टया विकसीत करण्याची मागणी इको-प्रोच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी केलेली आहे.



चंद्रपूर शहर आणी जिल्हा ऐतिहासिक गोंडकालिन अनेक वास्तु करिता ओळखला जातो. चंद्रपूरसह विदर्भाच्या भुप्रदेशावर 500 अधिक वर्ष राज्य करणारे गोंडराजे यांनी आपल्या कार्यकाळात किल्ले, मंदीरे, समाध्या, बावडया अशा अनेक वास्तुचे बांधकाम केलेले आहे. त्यापैकीच एक या जलमहल वास्तुची पुरातत्व विभागाने नोंद घेऊन त्याचे संवर्धन व संरक्षणाच्या दृष्टीने कार्य करण्याची गरज आहे. तसेच सदर परीसर निसर्गरम्य असल्याने ऐतिहासिक व निसर्गरम्य अशा पध्दतीचे चंद्रपूर शहरानजिक चांगले पर्यटन स्थळ विकसीत करता येईल. सदर मागणीचे निवेदन श्री हंसराज अहीर, के्रद्रीय गृह राज्यमंत्री व श्री सुधिरभाऊ मुनगंटीवार, मंत्री, अर्थ नियोजन व वने तथा पालकमंत्री यांना देण्यात आलेले आहे. नुकतेच चंद्रपुर किल्ला-परकोट व शहरातील ऐतिहासिक वास्तु संवर्धनाच्या अनुषंगाने ना. अहिर यांच्या पुढाकारातुन दिल्ली येथे पार पडलेल्या या खात्याचे मंत्री व अधिकारी यांच्या बैठकीत सुध्दा या विषयी माहीती मांडण्यात आलेली होती.

काय आहे ‘जलमहल’ चा इतिहास
चंद्रपूर राज्यांची स्थापना होण्यापुर्वी म्हणजे 500 वर्षापुर्वी गोंडराज्याची धुरा बल्लारपुरहुन सांभाळली जायची तत्कालिन गोंडराजे खांडक्या बल्लाळशहा (इ.स.1472 ते 1497) यांचे काळात ‘जुनोना तलाव’ व तलावाच्या काठावरिल ‘जलमहल’ चे बांधकाम करण्यात आले होते.
खांडक्या बल्लाळशहा याची प्रकृती लहानपणापासुन निरोगी नव्हती. त्यांना सर्व शरिरावर खांडके असल्याने त्याची प्रकृती नेहमीच खालावलेली असायची. त्यांची प्रकृती सुधारणेसाठी राणी हिताराणी हिने जुनोनाच्या जंगलात जुनोना तलाव बांधुन त्याचे काठावर ‘जलमहल’ बांधले. वर्षातिल काही महीने गोंडराजे खांडक्या बल्लाळशहा या जलमहल मध्ये राहत असत. राणी हिताराणी हिने प्रकृती सुधारावी म्हणुन मोकळया हवेत राहता यावे, शिकारीचा छंद सुध्दा लावला. यानंतर गोंडराजे यांनी आपली राजधानी चंद्रपूरला हलविल्यानंतर जुनोना येथील ‘जलमहल’ चा फारसा संदर्भ इतिहासात येत नाही. मात्र अजुनही सदर परिसर आणी जलमहल सुस्थितीत आहे. पुर्वी येथे खाजगी रिसोर्ट झाल्यानंतर पर्यटकांना यायची संधी निर्माण झाली होती. या जलमहल च्या आतील तळघर व त्याची दरवाजे बंद करण्यात आलेली होती. आता मात्र या जलमहल ची स्वच्छता करण्यात रस्ते खुले करण्यात आल्यास आजही हे ‘जलमहल’ गोंडकालीन ऐतिहासिक वारसा पर्यटकांना आकर्षीत करू शकते. कारण, जुनोना तलावाचे विहगंम दृष्य आणी घनदाट वनराई यामुळे या परिसराचे सोदर्य आणखीणच खुलुन येते.
जंगल, तलाव आणी ऐतिहासीक गोंडकालीन ‘जलमहल’ यांची योग्य सांगड घातल्यास चंद्रपूर शहरानजीक निसर्गरम्य असे पर्यटन केंद्र तयार होऊ शकते. सदर गोंडकालीन ऐतिहासिक वारसा 500 वर्ष प्राचीन असुन ब्रिटीशकाळात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या यादीत इ.स. 1920-21 दरम्यान नोंद घेण्यात आली असतांना सुध्दा नंतरच्या काळात यादीतुन वगळयात आले होते.

Thursday, September 13, 2018

‘ग्रिन गणेशा’ अभियान अंतर्गत पर्यावरणपुरक मुर्तीची स्थापना

‘ग्रिन गणेशा’ अभियान अंतर्गत पर्यावरणपुरक मुर्तीची स्थापना

इको-प्रो तर्फे मातीची व विना रंगाची मुर्ती बाबत जनजागृती  


चंद्रपूर/प्रतिनिधी:
 इको-प्रो ग्रीन गणेशा अभियान अंतर्गत मातीची व विना रंगाची मुर्तीची स्थापना करून पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे आज इको-प्रो कार्यालयातून मातीची आणि विना रंगाची मूर्ति गणेशभक्तानी घरी नेऊन स्थापना केली. 
दरवर्षी इको-प्रो संस्थेच्या पर्यावरण संरक्षण विभाग अंतर्गत ‘ग्रिन गणेशा’ हे अभियान पर्यावरणपुरक गणेशोत्सव कसा साजरा करावा याकरीता राबविण्यात येते. प्लास्टर आॅफ पॅरीस च्या मुर्ती पेक्षा मातीची मुर्ती तर रासायनीक रंगामुळे होणारे प्रदुषण टाळण्यास विना रंगाची मुर्ती योग्य पर्याय असल्याने मागील काही वर्षापासुन संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे, इको-प्रो कार्यालय व इतर सदस्य आपल्या घरी मातीची व विना रंगाची मुर्तीची स्थापना करतात, तसेच मुर्तीचे विसर्जन घरीच करतात तसेच घरी जमा झालेले निर्माल्यापासुन घरीच एका कुंडीत खत निर्मीती करीत असतात. शहरात बरेच नागरीक पारंपारीक पध्दतीने मातीच्या मुुर्तीस घरीच शेंदुर फासुन घरी स्थापना करीत असतात. आपली गणेशोत्सवाबाबत प्रथा पंरपरा निसर्गास हितावह असतांना सुध्दा सुंदर आणी सुबकता याचे आहारी जाऊन गणेशोत्सवास सुध्दा प्रदुषण वाढविण्यास कारणीभुत ठरवित आहोत, हे टाळण्याच्या दृष्टीने मागील वर्षी पासून इको-प्रो संस्थेच्या कार्यालयात मातीची व विना रंगाची मुर्ती वितरण करण्याकरीता आणुन ठेवण्यात आलेल्या होत्या. संस्थचे सदस्य व नागरीकांनी पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्यास मातीची व विना रंगाची मुर्ती स्थापना करण्याचा संकल्प केला.
यंदाच्या गणेशोत्सवा करीता आज इको-प्रो कार्यालयातुन अशा पर्यावरणपुरक गणेशाच्या मुर्ती गणेश भक्तानी नेण्यात आले त्यात श्री रमेश मुलकलवार, निवृत्त विस्तार अधिकारी (शिक्षक), श्री हरीश ससनकर, शिक्षक, परीक्षीत सराफ, सुजीत घाटे, सुमीत कोहळे, नीलेश मड़ावी आदीचा समावेश होता तर काहीनी मुर्तीकारांकडे विना रंगाची मुर्तीची मागणी केलेली होती. या अभियानात सहभागी होत अनेकांनी पर्यावरणपुरक गणेशाची स्थापना केलेली आहे. पुढील वर्षी सदर ग्रिन गणेशा अभियान अंतर्गत कुंभार बांधवाच्या मातीच्या व विना रंगाच्या मुर्ती नागरीक कशा पध्दतीने जास्तीत जास्त प्रमाणात घेतील यावर भर दिला जाणार आहे. जेणेकरून गणेशोत्सवा दरम्यान होणार प्रदुषण टाळता येतील. घरीच्या घरी गणेशा विसर्जन व निर्माल्याचे खत तयार करण्यास नागरीकांचा प्रतीसाद वाढत असल्याने दरवर्षी एक कंुडीत एक झाड आणी तयार झालेले खत यातुन दरवर्षीच्या गणेशाचे स्मृती जपण्याची कल्पना नागरीकांना आवडली आहे. संस्थेतर्फे याचा प्रचार आणी प्रसार पुढील वर्षीपासुन मोठया प्रमाणात केला जाणार आहे.
सदर ग्रिन गणेशा अभियान राबविण्याकरीता पर्यावरणमीत्र तथा संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे यांचे मार्गदर्शनात इको-प्रो संस्थेच्या ‘पर्यावरण विभागचे प्रमुख’ नितीन रामटेके, उपप्रमुख प्रज्ञा सराफ, अमोल उत्तलवार, वैभव मडावी, सुमीत कोहळे, हरीश मेश्राम यांचे सह इको-प्रो चे सदस्य सहकार्य करीत आहेत.

Wednesday, September 12, 2018

 ऐतिहासिक किल्ल्यावर जाहिरात कराल तर होईल कारवाई

ऐतिहासिक किल्ल्यावर जाहिरात कराल तर होईल कारवाई


चंद्रपूर किल्ल्याच्या भिंतीवर जाहिरात पेन्टीग करणा-यावर गुन्हे दाखल
चंद्रपूर/प्रतिनिधी
शहरातील ऐतिहासीक गोंडकालीन किल्लाच्या भिंतीवर जाहीरातीची पेंन्टीग करण्यात आल्याचे प्रकरण नुकतेच समोर आलेले होते. यासंदर्भात आज पुरातत्व विभागाच्या चंद्रपूर शहरातील कार्यालयाकडुन स्थानीक शहर पोलीस स्टेशनला भारतीय पुरातत्व संरक्षण कायदया अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
चंद्रपूर शहरातील ऐतिहासीक किल्ला परकोटाची स्वच्छता मागील 500 दिवसापासुन सुरू आहे. खंडहर प्राप्त किल्लाचे गतवैभव प्राप्त करण्याच्या दृष्टीने तसेच पर्यटनाच्या विकास दृष्टीने स्वरूप बदलण्याचे महत्वपूर्ण कार्य इको-प्रो संस्थेच्या माध्यमाने सुरू आहे. एकीकडे स्वच्छता होत असतांना मात्र याच किल्ल्याच्या भिंतीवर जाहीरात पेन्टींगचे काम सुरू असल्याची माहीती स्थानीक नागरीकांनी इको-प्रो ला दिली त्याची दखल घेत इको-प्रोचे बंडू धोतरे यांनी याची माहीती पुरातत्व विभागाच्या अधिकारी वर्गाला दिली. सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी इको-प्रो कडून करण्यात आली होती. त्याची त्वरीत दखल घेत संपुर्ण प्रकरणाची तपासणी पुरातत्व विभागाने केली.
आज स्थानीक शहर पोलीस स्टेशन ला श्री प्रशांत शिंदे, वरिष्ठ संरक्षण सहायक, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, चंद्रपूर उपमंडळ, चंद्रपूर यांनी ‘भारतीय प्राचीन स्मारक व पुरातत्व स्थळ अवशेष अधिनिअम 1958 व सुधारीत कायदयानुसार ‘संशोधन आणि विधीमान्यकरण अधिनिअम 2010 च्या कलम 30 (1) नुसार आज गुन्हा दाखल केलेला आहे. यात जाहीरात केलेल्या शहरातील स्थानीक व्यवसायीक प्रतिष्ठाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास शहर पोलीस स्टेशन करित आहे.

Monday, September 03, 2018

इको-प्रोच्या ध्येयवेढ्यांचे स्वच्छतेचे 500 दिवस

इको-प्रोच्या ध्येयवेढ्यांचे स्वच्छतेचे 500 दिवस

अभियानाच्या तिसऱ्या टप्पाचे श्रमदानास सुरूवात
तलावास लागुन असलेल्या किल्ला भिंतीवरील झाडी-झुडपे काढण्याचे काम
चंद्रपूर/प्रतिनिधी:
 चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियानास अखंड 500 दिवस पुर्ण झाले असुन या अभियान अंतर्गत आता तिसऱ्या टप्पाच्या श्रमदानास सुरूवात करण्यात आलेली आहे. 
चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक गोंडकालीन किल्ला परकोटाची स्वच्छता करण्यास ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत 1 मार्च 2017 रोजी सुरूवात करण्यात आलेली होती. या अभियान अंतर्गत ज्या दिवशी इको-प्रोच्या सदस्यांनी श्रमदान केले तेच दिवस मोजीत आज अभियानाचा प्रत्यक्ष श्रमदानाचे 500 दिवस पुर्ण केले आहे. आज अभियानाचा 501 वा दिवस होता आज अभियानाचा तिसरा टप्पा सुरूवात करण्यात आली आहे. रामाळा तलावास लागुन असलेले किल्ल्याची भिंत व यामधुन निघालेली झाडे यामुळे किल्लास ठिकठिकाणी तडे जात आहे. तलावाच्या बाजुस असल्याने किल्ल्यास अधिक धोका होण्याची शक्यता अधिक असल्याने हि झाडे-झुडपे काढण्याचे अत्यंत जिकरीचे कामास इको-प्रो च्या सदस्यांनी आज सुरूवात केली आहे.
खाली रामाळा तलावाचे पाणी, उंच किल्लाची भिंत अशा जिकरीच्या कामात इको-प्रो च्या 'अॅडव्हेचंर टिमचे' सदस्य यांनी साहसीक कार्यात वापरली जाणारी साहित्य, दोरी, हारनेस, कॅरीबेनरचा वापर करीत स्वतःला हवेत लटकवुन घेत ही झाडे-झुडपे काढण्याचे काम सुरू करण्यात केले आहे. अत्यंत जिकरीचे मात्र तितकेच सुरक्षा बाबीचा विचार करून या कामास सुरूवात करण्यात आले.
सदर किल्ल्याचे हि झाडी-झुडुपे निघाल्यास रामाळा तलाव मधुन लेजर लाईटचा प्रकाश किल्लाच्या भितींवर मारल्यास रामाळा तलावाच्या किनार्यावरून यादिशेने बघितल्यास थोडया वेळासाठी आपण वेगळया शहरात असल्यास भास नक्कीच निर्माण करेल अशी आशा आणी सोंदर्याकरणाची मागणी असलेल्या इको-प्रो ने उत्साहाने या कामास सुरूवात केलेली आहे.
सदर अभियान अंतर्गत बरीच मजल मारलेली आहे. दुसÚया टप्पात किल्ला पर्यटनास सुरूवात करण्यात आलेली होती त्यानुसार नागरीकांनी सुध्दा प्रतिसाद दिला तरी पावसाळयानंतर परत किल्ला पर्यटनास सुरूवात करण्यात येणार आहे. या स्वच्छता अभियान सोबत किल्ल्याची डागडुजी, संरक्षण भिंतीचे बांधकाम व सोदर्याीकरण याबाबत शासन प्रशासन आता सकारात्मक पावले उचलत असल्याने इको-प्रो च्या सदस्यामध्ये उत्साहाचे आणी आंनदाचे वातावरण आहे. नागरीकांनी याउपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन इको-प्रो चे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी केले आहे.
आज सुरू झालेल्या तिसऱ्या टप्पाच्या श्रमदानात संस्थेचे रवि गुरनुले, नितीन बुरडकर, नितीन रामटेके, अनिल अडगुरवार, बिमल शहा, राजु काहीलकर, अमोल उटटलवार, सुमीत कोहळे, जयेश बैनलवार, सचिन धोतरे, जितेंद्र वाळके, हरीश मेश्राम, अतुल रांखुडे, प्रमोद मलीक, धर्मेद्र लुनावत, कपील चैधरी, प्रतीक बदद्लवार, सुनील पाटील, पुजा गहुकार, सारीका वाकुडकर, कोमल उपरे आदी सदस्य सहभागी झाले होते.

Sunday, September 02, 2018

गोंङकालीन इतिहास शालेय अभ्यासक्रमात समावेश व्हावा

गोंङकालीन इतिहास शालेय अभ्यासक्रमात समावेश व्हावा



                                     अनुसूचित जमाती कल्याण समिती अध्यक्षांकड़े मागणी
गोंड़कालीन वास्तुचे संवर्धन करण्याची मागणी
समिती अध्यक्ष डॉ. अशोक उइके यांचे प्रयत्न करण्याचे आश्वासन
चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्हा हा गोंडकालीन इतिहास आणी ऐतिहासिक वास्तूसाठी ओळखला जातो. चंद्रपूरसह विदर्भ आणि छत्तीसगडपर्यतच्या भुप्रदेशावर या आदिवासी गोंड राज्यांनी तब्बल 550 वर्ष राज्य केले. त्याची ओळख नव्या पिढीतील विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्याची गरज आहे. आदिवासी गोंड़कालीन इतिहास शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याची तसेच गोंड़कालीन ऐतिहासिक वारसा संवर्धन करण्याची मागणी इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी अनुसुचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष तथा आमदार डॉ. अशोक उइके यांच्याकड़े केली. यावेळीा त्यांनी सर्वोतोपरी प्रयत्न करन्यात येईल, असे आश्वासन दिले.
देशात आणि जगातसुध्दा आदिवासी राज्यकर्त्यानी एखादया भुप्रदेशावर प्रदीर्घ काळ राज्य केल्याचे ऐकिवात नाही. चंद्रपूर जिल्ह्यांत गोंङराज्य होते. या गौरवपुर्ण इतिहासाचे साक्षीदार असणारे किल्ले, परकोट, समाध्या व मंदीरे आजही भक्कम स्थितीत आहेत. विशेष म्हणजे विदर्भातील ‘चंद्रपूर’ शहरांची निर्मीती 550 वर्षापुर्वी तर 300 वर्षापुर्वी ‘नागपुर’ शहरांची निर्मिती या गोंडराज्यांनी केली होती.
मात्र आदिवासी राज्यांच्या गोंडकालीन इतिहासाची साक्षीदार 'किल्ले' आणि अनेक 'वास्तु' दुर्लक्षीत आणी उपेक्षीत आहेत. सोबतच प्रगल्भ इतिहास असतांना सुध्दा स्थानिक नागरिक सुध्दा हा गोंडकालीन इतिहास विसरत चालले आहेत. आदिवासी गोंडराजे हे या प्रदेशाचे राजे होते म. हे सुध्दा आज आम्हाला माहीती नाही ही शोकांतिका आहे. सदर गोंडकालीन इतिहास विद्यार्थ्यांच्या शालेय अभ्यासक्रमात येणे अत्यंत गरजेचे आहे. शालेय अभ्यासक्रमात देश आणि जगाचे राजे, त्यांचा कालखंड अभ्यासला जातो. मात्र स्थानिक पातळीवरील इतिहास सांगितला जात नाही. प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक पातळीवरील इतिहास अभ्यासक्रमात असणे गरजेचे आहे.
एका मोठया भुप्रदेशावर राज्य करणारे गोंडराजे, त्यांचा पराक्रम, त्यांच्या जगविख्यात वास्तु, राणी हिराईचा राज्यकारभार, बांधलेली मंदिरे, समाधीस्थले अशाप्रकारे कायम दुर्लक्षित ठेवल्यास इतिहासजमा होईल. येथील गोंडराजे हे या प्रदेशाचे राजे होते, याचा इतिहास नव्या पिढींसमोर आला पाहिजे. कायम वनात राहणारे आदिवासी समुदाय संघटित होऊन आपले राज्य निर्माण करतात. दिल्लीच्या बादशहाची सुद्धा या राज्यांवर नजर होती, भक्कम किल्ले-परकोटाचे व वास्तुचे बांधकाम करतात, 500- 550 वर्ष सतत राज्य करतात ही ऐतिहासिक दृष्टया मोठी बाब आहे.
शहीद वीर बापूराव पुलेश्वर शेडमाके
1857 मधे देशात इंग्रजी सत्तेविरुद्ध अभूतपूर्व उठावनी झाली होती. त्याच धर्तीवर चंद्रपुर परिसरात सुद्धा इंग्रज सत्तेविरुद्ध बापूराव शेडमाके यांनी बंड पुकारले होते. सैन्य जमवून युद्ध पुकारले होते. शेवटी कपटनितिने पकडून त्यांचेवर खटला चालवुन 1858 मधे फाशी देण्यात आली होती. चंद्रपुर च्या इतिहासातील ही एक मोठी घटना आहे.
गोंडराजे यांचा बालेकिल्ला-राजवाड़ा
गोंड़कालीन इतीहास आजही विदर्भातील अनेक नागरिकांना माहीती नाही. यासोबतच महत्वाचे आणि दुर्देवी बाब म्हणजे या गोंडराज्यांचा ‘बालेकिल्ला- राजमहल’ ब्रिटीशकाळापासून कैदाचे ‘कारागृह’ ठेवण्यात आले असून, स्वांतत्रप्राप्तीनंतरही येथे कारागृहच असून येथे विविध गुन्हातील कैदी शिक्षा भोगत आहेत. सदर बालेकिल्ला खाली करून ‘जिल्हा कारागृह’ इतरत्र स्थानांतरण करण्याची गरज असून अशी इको-प्रो ची मागणी आहे. तसेच गोंडकालीन इतिहास संवर्धनासाठी या प्रदेशातील ऐतिहासिक वास्तुचा, स्थळांचा पर्यटन विकास करण्याची गरज आहे. त्याकरिता राज्यसरकारने पावले उचलण्याकरीता मागणी लावून धरण्याची विनंती इको-प्रो कडून केली आहे. सोबत सुरु असलेल्या किल्ला स्वच्छता अभियान ची सचित्र माहिती देण्यात आली, यावेळी या अभियानाची माहिती पुस्तिका सुद्धा भेट देण्यात आली.

Tuesday, July 31, 2018

जागतीक व्याघ्र दिनी इको-प्रो ची जुनोना गावांत जनजागृती

जागतीक व्याघ्र दिनी इको-प्रो ची जुनोना गावांत जनजागृती

इको-प्रो, संयुक्त वनव्यवस्थापन समीती चा उपक्रम 
चंद्रपूर/प्रतिनिधी:

 आज जागतीक व्याघ्र दिनानिमीत्त जंगलव्याप्त जुनोना गावात इको-प्रो व संयुक्त वनव्यवस्थापन समीती, जुनोना च्या माध्यमाने गावात रॅली काढुन जनजागृती करण्यात आली.
इको-प्रो वन्यजीव विभाग, इको-प्रो जुनोना शाखा व संयुक्त वनव्यवस्थापन समीती च्या वतीने आज जागतीक व्याघ्र दिनाचे औचित्य साधुन शाळकरी विदयाथ्र्यासोबत गावातुन जनजागृती रॅली काढण्यात आली. तसेच ग्रामंपयाच भवन येथे कार्यक्रमातुन उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जुनोना ग्रामपंचायतीच्या संरपचा मालतीताई कुळमेथे, बंडु धोतरे, इको-प्रो चे अध्यक्ष तथा मानद वन्यजीव रक्षक शाम पेटकुले, अध्यक्ष संयुक्त वनव्यवस्थापन समीती, विजय विमलवार, वनरक्षक प्रामुख्याने उपस्थित होते.
गावातील शाळकरी विदयार्थी यांना सोबत घेऊन इको-प्रो संस्थेचे कार्यकर्ते व जुनोना संयुक्त वनव्यवस्थापन समीतीचे सदस्य यांनी गावातुन जनजागृती रॅली काढली. विदयाथ्र्याच्या ‘वाघ वाचवा, जंगल वाचवा’ च्या घोषणा आणी वाघाचे ड्रेस परिधान केल्याने गावातील नागरीकांचे लक्ष वेधुन घेत होते. हे पाहुन बरेच छोटे मुले-विदयार्थी सुध्दा या रॅलीत सहभागी झाले. रॅली नंतर जुनोना ग्रामपंचायत मध्ये छोटेखाणी कार्यक्रमातुन जनजागृती बाबत बंडु धोतरे, मानद वन्यजीव रक्षक यांनी आजच्या दिवसाचे महत्व सांगत जिल्हयातील वाघ-मानव संघर्षाची कारणे व उपाययोजना म्हणुन आपण काय करावे, काय करू नये याबाबत माहीती दिली. तसेच पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने वाघाचे महत्व विषद करीत वाघ-मानव संघर्ष टाळण्याच्या दृष्टीने सर्व पातळीवरून कार्य करण्याची गरज विषद केली. सोबतच भविष्यात ग्रामपंचायत, संयुक्त वनव्यवस्थापन समीती व इको-प्रो जुनोना शाखा मिळुन गांव विकासासाठी, वन-वन्यजीव संरक्षणसाठी, गांव स्वच्छतेसाठी, निसर्ग पर्यटन विकास या दृष्टीने काम करण्याची संधी असुन सर्वानी एकत्रीत येत कशा पध्दतीने गावासाठी कार्य करता येईल याची माहीती दिली.
यावेळी संयुक्त वनव्यवस्थापन समीतीचे सदस्य सुभाष टिकेदार, सविता वेलादी, मायाबाई बोरूले, मीनाताई मुदद्लकर. इको-प्रो जुनोना शाखाचे सदस्य किशोर पेटकुले, गुरूदास भोयर, शैलेश मुडपल्लीवार, अनिकेत जेगठें, प्रशांत मांढरे, सोनाली पेंदाम, दिनेश कन्नाके, संजय वाढई तसेच चंद्रपूर इको-प्रो पदाधिकारी बिमल शहा, राजु काहीलकर, हरीश मेश्राम, सुधीर देव, सुनिल लिपटे, वैभव मडावी, आशिष मस्के, अतुल राखंुडे, आयुषी मुल्लेवार, सारीका वाकुडकर उपस्थित होते.

Saturday, July 21, 2018

किल्ला स्वच्छता अभियान पाहण्यासाठी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांना निमंत्रण

किल्ला स्वच्छता अभियान पाहण्यासाठी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांना निमंत्रण

चंद्रपूर/प्रतिनिधी:
राज्यातील गड-किल्ले स्वच्छता संदर्भात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातुन लवकरच शासननिर्णय घेण्यात येणार असल्याने इको-प्रो चे शिष्टमंडळ आज विधानभवन येथे पर्यटन मंत्री यांची भेट घेण्यास आली असताना नानाभाऊ शामकुले यांनी पुढाकार घेत पर्यटन मंत्री यांची भेट घेतली. चंद्रपुर येथील। किल्ला स्वच्छ्ता अभियान बाबत माहिती दिली। इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे संपूर्ण अभियानाची माहिती असलेली सचित्र पुस्तिका देऊन किल्ला स्वच्छता अभियानाची माहिती दिली।
चंद्रपुर येथील किल्ला स्वच्छता अभियान राज्यातील किल्ला स्वच्छता मोहिमेसाठी मॉडल ठरेल असे मत यावेळी पर्यटन मंत्री यांनी व्यक्त केले.
चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक गोंडकालिन किल्ला परकोट स्वच्छता अभियान मागील दिड वर्षापासुन सुरू आहे. अकरा किलोमिटरचा भव्य परकोट असलेला पण आता पडझड आणि अतीव घाण झालेला चंद्रपूरस्थित किल्ला ‘इको-प्रो’ या स्वंयसेवी संघटनेनं अपार श्रमांनी जवळपास पुर्ण स्वच्छ केला आहे. या अभियानात ‘इको-प्रो’ चे कार्यकर्ते दररोज नियमीत श्रमदान करीत आलेत. आज या अभियानास 465 दिवस पुर्ण होत असुन अधिक जोमाणे अजुनही कार्य सुरू आहे.
चंद्रपूर येथील किल्ला स्वच्छता अभियानाची खुद्द पंतप्रधानांनी ‘मन की बात’ मध्ये आमच्या कामाचा जाहीर गौरव केला. कृपया आपण वेळात वेळ काढुन चंद्रपूर शहरास भेट देऊन या किल्ला स्वच्छता अभियानाची पाहणी करावी तसेच पर्यटन विकासाच्या दृष्टीने योग्य सहकार्य करन्यासंदर्भात निवेदन सादर करण्यात आल.
यावेळी इको-प्रो च्या शिष्टमंडळत बंडू धोतर; सुमित कोहले, हरीश मेश्राम, सुनील मिलाल, सुनील लिपटे सहभागी होते.

Monday, June 18, 2018

भल्या पहाटे चालले चंद्रपूरकर

भल्या पहाटे चालले चंद्रपूरकर

इको-प्रोची सोशल मीडियातून हाक
चंद्रपूरकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद...
चंद्रपूर/प्रतिनिधी:
इको-प्रोतर्फे फेसबुक-व्हॉटस्अपच्या माध्यमातून चंद्रपूर किल्ला पर्यटनासाठी येण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार नागरिकांनी प्रतिसाद देत भल्या पहाटे उठून किल्ला पर्यटन- हेरीटेज वॉकमध्ये सहभाग घेतला.
मागील 1 मार्च 2017 पासून सुरू असलेल्या चंद्रपूर किल्ला परकोट स्वच्छता अभियानाला आज 446 दिवस पूर्ण झाले. किल्ला स्वच्छता अभियान सोबतच दुस-या टप्पाचे काम सुरू झाले आहे. याव्दारे चंद्रपूर किल्ला पर्यटनास चालना देण्यासाठी ‘हेरीटेज वॉक’ सारख्या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली असून, याला नागरीकांचा उत्तम प्रतीसाद मिळत आहे. चंद्रपूर किल्ला स्वच्छतेचे अभियान अंतीम टप्पात आलेले असताना आता इको-प्रो च्या वतीने चंद्रपूरकर नागरिकांत जनजागृती व्हावी, आपला ऐतिहासिक वारसा सुध्दा जवळून पाहावा, इतिहास जाणून घेता यावा, पर्यटनाच्या दृष्टीने विकास व्हावा, 
 चंद्रपूर शहराची एक वेगळी ओळख निर्माण व्हावी या दृष्टीने प्रयत्न केले जात आहे.
सोशल मीडिया फेसबुक व वॉट्सअॅप वरून या हेरीटेज वॉक साठी येण्याचे आवाहन करण्यात आले होते. विशेष की, सदर हेरीटेज वॉक मध्ये सहभागी होण्यासाठी पहाटे 5ः30 वाजता दाखल होत नागरिकांना किल्ला पर्यटनासाठी सुध्दा उत्साह दाखविला. असा प्रतीसाद म्हणजे इको-प्रोच्या मेहनतीला आलेले फळ असून, हा सहभाग संपूर्ण इको-प्रो टिमचा उत्साह वाढविणारा असल्याचे मत यावेळी इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी व्यक्त केले. सध्या कुठलीही विशेष तयारी न करता, आहे त्या परिस्थितीत किल्ला पर्यटन सुरू करण्यात आले असून या स्थितीत सुध्दा नागरीकांच्या प्रतिक्रिया उत्साहवर्धक आहे. याकडे हवे तसे लक्ष पुरातत्व विभाग व प्रशासनाने दिल्यास किल्ला पर्यटन विकास योग्य पध्दतीने करणे सोईचे होणार आहे.
अगदी सकाळी सहभागी झालेल्या चंद्रपूरकर पर्यटक नागरीक, जेष्ठ मंडळी, लहान मुले यांना चंद्रपूरचा वैभवशाली गोंडराज्यांचा इतिहास, ऐतिहासिक वास्तुची माहिती, मंदिराची माहीती तसेच किल्लाच्या इतिहास सांगून किल्लाची दुरवस्था आणि राबविण्यात येत असलेले स्वच्छता अभियान याची माहीती सचित्र देण्यात आली. यांनतर किल्लावरून फेरफटका मारीत किल्ला आणी इतिहासाची माहीती देण्यात आली. यावेळी बुरूज 4, 5, 6, 7, 8, व 9 वरून फिरविण्यात आले. या प्रवास दरम्यान अंचलेश्वर गेट, बगड खिडकी, मसन खिडकी, गोंडराजे समाधीस्थळ व अंचलेश्वर मंदी आदी ठिकाणी माहीती देण्यात आली.आलेल्या पर्यटक नागरिकांनी ही उत्तम संधी प्राप्त झाली असून, अनेक वास्तू आणी इतिहास कळला यापुढे होणा-या अशा उपक्रमाना अनेक नागरिकांना आम्ही सोबत घेउन येऊ असे सांगून आजच्या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले. यावेळी इको-प्रो चे बंडू धोतरेसह रविंद्र गुरनुले, नितीन बुरडकर, नितीन रामटेके, बिमल शहा, धमेंद्र लुनावत आदी सदस्यांनी आलेल्या सर्व नागरीकांना माहीती दिली.
यावेळी आलेल्या चंद्रपूरकर नागरीकांमध्ये प्रामुख्याने हनुमंत नागापुरे, राजेश सज्जनवार, दिलीप रिंगणे, मेघा रामगुंडे, प्रणाली लभाणे, अनिल आवळे, प्रज्वल रिंगणे, संगम शेलकर, प्रशांत रामटेके, विवेक पत्तीवार, माधुरी पत्तीवार, हर्षल मुळे, राजु पाउनकर, विना बुरडकर, प्रियंका सज्जनवार, सायली बुरडकर, पी एस झाडे, प्रदीप पडोळे, नितीन भाग्यवंत, सतिष चव्हाण, ज्योजी चव्हाण, आशीष घोरपडे, प्रवीण चवरे, काव्या गोरघाटे, जिज्ञासा झाडे, गंगाराम मोरे, अलका गुरूवाले, अक्षय भोयर आदी सह अनेक नागरीक सहभागी झाले होते. सोबत इको-प्रो चे अनेक सदस्य यावेळी सहभागी होते.


Saturday, June 16, 2018

 जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेत इको-प्रोचे रक्तदान

जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेत इको-प्रोचे रक्तदान

चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपुर शासकीय रक्तपेढ़ी, सामान्य रुग्णालय मधे रक्ताचा तूटवडा निर्माण झालेला आहे. ही बाब लक्षात घेऊन आज इको-प्रो तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 
वर्षभरात बरीच संस्था-संघटना, राजकीय पक्ष, महाविद्यालय यांचे वतीने रक्तदान होत असते. मात्र, दरवर्षी मे-जून आणि दिवाळीच्या महिन्यात रक्तपेढ़ी मधे रक्ताचा तुटवड़ा निर्माण होन्याची समस्या निर्माण होत असते. कारण, या काळात रक्तदान शिबिर संख्या कमी असल्याने, रक्तसाठा कमी असतो. परन्तु मागणी कायम असल्याने रक्ताच्या कमतरते मुळे हा काळ शाशकीय रक्तपेढीस कठिन जातो. 
कारण, दर दिवशी रक्ताची गरज असतेच. सिकलसेल, थैलसीमिया, अनीमिया, टीबी रुग्ण, सामान्य रुग्णालयात प्रसूती साठी भरती असलेल्या ग्रामीण महिला, अपघात ग्रस्त रुग्ण यांना त्वरित रक्त देण्याची गरज असते. ही मागणी मोठी असते आणि या काळात रक्तदान शिबिर किंवा रक्तदाते कमी असल्याने मागणी नुसार पूर्तता करणे अडचनीचे असते. अश्यावेळी रुग्णाला रिप्लेसमेंट म्हणजे आवश्यक ग्रुप चा रक्तदाता आणावे लगते, ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णाच्या परिवारास रक्तदाता शोधणे सहज शक्य होत नाही. 
वाढदिवस किंवा विशेष दिवसा निमित्त वर्षभरात अनेक शिबिरांचे आयोजन केले जाते. या दिवसांचे औचित्य आहेच मात्र, अश्या शिबिरांची खरी गरज संकटकाळात महत्वाची ठरते. चंद्रपुर शहरात बरेचदा शिबिरातुन विक्रमी रक्तदान केले जाते, इतके की संख्या हजारात असते. मात्र या विपरीत मे-जून आणि ऑक्टो-नोव्हे महिन्यात दरवर्षी रक्ताचा तुटवडा असतो. या महिन्यात सुद्धा विविध संस्था-संघटना, राजकीय पक्ष आणि महाविद्यालये यांनी वर्षात में-जून आणि दिवाळीच्या काळात सुद्धा मोठ्या संख्येने रक्तदान शिबिरे आयोजित करण्याची गरज असते. आज रुग्णाची रक्ताची गरज लक्षात घेऊन इको-प्रो तर्फे शनिवार 16 जून रोजी सामान्य रुग्णालय, शाशकीय रक्तपेढ़ी मधे रक्तदान शिबीर आयोजित केले होते. या शिबिरातून जवळपास ३० पेक्षा अधिक रक्तदातेनी रक्तदान केले. या शिबिर मधून मिळणारे रक्त फार तर 1-2 दिवस ची गरज पूर्ण करेल, तेव्हा चंद्रपुर शहरातील सर्व संस्था-संघटनानी सुद्धा रक्तदान शिबिर चे आयोजन करून या संकटकालीन परिस्थितीत सहकार्य करण्याचे आवाहन इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी केले आहे. 
आज झालेल्या शिबिरातून इको-प्रो चे बंडू धोतरे, योजना धोतरे, नितिन बुरडकर, रवि गुरनले, बिमल शहा, वैभव मडावी, कपिल चौधरी, हरिदास कोराम, जीतेन्द्र वालके, सावन कालीवाले, राजेश व्यास, जयेश बैनलवार, हरीश मेश्राम, सह्याद्रि प्रतिष्ठान चे दिलीप रिंगने, इरफान शेख, प्रशील ढोके, हर्षल मुठे, विशाल मराठे, संघम सेलकर, रुपेश केळझरकर, आलोक गोविदवार, सचिन सारडा, नितेश वाढई, प्रमोद गड़पल्लीवार, प्रतिक कडुकर, निखिल आक्केवार, सुमित कोहले, वनपाल किरण धानकुटे, वनरक्षक देवीदास बेरड़ आदिनी रक्तदान करून सहकार्य केले.

Friday, June 01, 2018

 इको-प्रोचा ४२ किमीची पैदल यात्रा;निवेदनातून केली अंडर ब्रिजची मागणी

इको-प्रोचा ४२ किमीची पैदल यात्रा;निवेदनातून केली अंडर ब्रिजची मागणी

The bear, Chital killed in the accident, injured the leopard | अस्वल, चितळ अपघातात ठार, बिबट जखमीचंद्रपूर/प्रतिनिधी:
 जिल्ह्यातील चंद्रपूर- मूल महामार्गावरील भरधाव वाहनांमुळे वन्यजीवांचे बळी जात आहेत़ मागील महिन्यापासून अपघाताची मालिकाच सुरू असून १५ दिवसांत दोन अस्वल, एका चितळाचा जागीच मृत्यू झाला. तर एक बिबट गंभीर जखमी झाला आहे. या मार्गावरील जंगलग्रस्त भागात वन्यजीवांच्या कायमस्वरुपी सुरक्षेसाठी उपाययोजना करावी, अशी मागणी इको-प्रो संस्थेने केली. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवार दि. ३१ जून रोजी मूल ते चंद्रपूरपर्यंत पायी यात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती वनसंरक्षक विजय शेळके यांना दिलेल्या निवेदनातून दिली आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन शेजारून जाणारा मूल-चंद्रपूर हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झाला आहे. बांधकामाला सुरूवात झाली. दोन्ही बाजूने विस्तीर्ण घनदाट जंगल असल्याने वाघ, बिबट्यांसह तृणभक्षी प्राण्यांचा अधिवास वाढतच आहे. सध्या या रस्त्याच्या काही भागात कामे सुरू आहेत. तर काही ठिकाणी चारपदरी सिमेंट रस्त्याचे बांधकाम केले जात आहे. या बांधकामामुळे वाहने एकाच बाजूने वळविण्यात येत आहेत. शिवाय रात्रीच्या वेळी मालवाहू वाहने भरधाव दामटल्या जाते. अशावेळी हा मार्ग ओलांडून जाणाऱ्या वन्यजीवाचा अपघात होत आहे. वाहनांची गती आणि लख्ख दिव्यांचा प्रकाशही कारणीभूत ठरत आहे. वाहन पुढे आले तर कुठे पळावे, हे वन्यजीवांना कळत नाही़ यापूर्वी या मार्गावर वाघ, बिबट, अस्वलाचा मृत्यू झाला.
हा मार्ग ताडोबा ते दक्षिणेकडे इंद्रावती व्याघ्र प्रकल्प व तेलंगणा वनक्षेत्राला जोडणारा वन्यप्राणी भ्रमणमार्ग आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांना हा मार्ग ओलांडून पुढे जाण्यासाठी सुरक्षित मार्ग तयार करणे गरजेचे आहे. मात्र, महामार्ग निर्माण करण्याच्या प्रस्तावात 'वाइल्ड लाइफ मिटिगेशन'बाबत कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. मागील १५ दिवसांत घडलेल्या घटनांमुळे वन्यजीवप्रेमी चिंताग्रस्त असून भविष्यात कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय निर्णय घ्यावा अन्यथा भरधाव वाहनांना निष्पाप बळी पडणाºया मुक्या वन्यप्राण्यांची संख्या पुन्हा वाढण्याचा धोका आहे, याकडेही इको- प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी लक्ष वेधले.
वन्य प्राण्यांचे अधिवास आणि भ्रमणमार्ग लक्षात घेवून रस्त्याचे बांधकाम करावे, या मागणीसाठी मूल ते चंद्रपूर शहरापर्यंत 'पायदळ यात्रा काढण्यात येईल. त्यामध्ये नागरिक सहभागी होतील, अशी माहिती धोतरे यांनी दिली. या निवेदनाची प्रत ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक मुकुल त्रिवेदी, विभागीय वनअधिकारी सोनकुसरे यांनाही पाठविण्यात आली आहे.

Tuesday, May 29, 2018

इको-प्रोचे ३१ मे रोजी मूल ते चंद्रपूर 'पैदल मार्च' सत्याग्रह

इको-प्रोचे ३१ मे रोजी मूल ते चंद्रपूर 'पैदल मार्च' सत्याग्रह

रखरखत्या उन्हात निघेल़ ४२ किलोमीटरची ही पायदळ यात्रा 
चंद्रपूर/प्रतिनिधी:
जिल्ह्यातील चंद्रपूर- मूल महामार्गावरून भरधाव आणि बेदरकारपणे जाणाऱ्या वाहनांमुळे वन्यजीवांचे निष्पाप बळी जात आहेत़ मागील महिन्यापासून अपघाताची मालिकाच सुरू असून, अवघ्या १५ दिवसांत २ अस्वल, एका चितळाचा जागीच मृत्यू झाला तर बिबट गंभीर जखमी आहे़ महामार्गावरील जंगलग्रस्त भागात वन्यजीवांच्या कायमस्वरुपी सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात यावी, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी इको-प्रोच्या वतीने ३१ मे रोजी मूल ते चंद्रपूर 'पैदल मार्च' सत्याग्रह काढण्यात येणार आहे़ सुमारे ४२ किलोमीटरची ही पायी यात्रा रखरखत्या उन्हात निघेल़ भरधाव वाहनांना निष्पाप बळी पाडणा-या मुक्या प्राणीमात्रांसाठी वन्यप्रेमींनी सहभागी होण्याचे आवाहन इको- प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी केले आहे़,
ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन शेजारून जाणारा मूल-चंद्रपूर हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग ९३०  म्हणून घोषित झाला असून, त्याचे बांधकाम सुरू आहे़ दोन्ही बाजूने विस्तीर्ण घनदाट जंगल आहे़ त्यामुळे येथे वाघ-बिबट्यासह तृणभक्षी प्राण्यांची संख्या मोठी आहे़ काही भागात जुन्या रोडचा पोत सुधारणा करण्यात येत आहे, तर काही ठिकाणी चारपदरी सिमेंट काँक्रीट रोडचे बांधकाम करण्यात येत आहे़ या बांधकामामुळे वाहने एकाच बाजूने वळविण्यात येत आहे़ शिवाय रात्रीच्या वेळी मालवाहू वाहने भरधाव असतात़ अशवेळी मार्ग ओलांडून जाणाऱ्या वन्यजीवांच्या अपघाताला मोठ्या वाहनांची गती आणि लख्ख प्रकाशदिवेही कारणीभूत ठरत असतात़ थेट वाहन पुढे आले की कुठे पळावे, हे वन्यजीवांना कळत नाही़ यापूर्वी या मार्गावर वाघ, बिबट, अस्वल यांचा मृत्यू झालेला आहे़ हा मार्ग ताडोबा ते दक्षिणेकडे इंद्रावती व्याघ्र प्रकल्प व तेलंगाना वनक्षेत्र यांना जोडणारा महत्वाचा वन्यप्राणी भ्रमणमार्ग आहे़ त्यामुळे वन्यप्राण्यांसाठी अंडर पासेस तयार करण्याची गरज आहे़ मात्र, या बांधकाम प्रस्तावात कुठेही 'वाइल्डलाइफ मिटिगेशन' बाबत उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत़ मागील १५ दिवसांत घडलेल्या घटनांमुळे वन्यजीवप्रेमी चिंताग्रस्त असून, भविष्यात कायम तोडगा काढण्याच्या दृष्टीने या पैदल मार्चच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे़.


Friday, May 25, 2018

चंद्रपूर जिल्ह्यातील स्मारक, वास्तू इको-प्रोला दत्तक

चंद्रपूर जिल्ह्यातील स्मारक, वास्तू इको-प्रोला दत्तक


  •  भारतीय पुरातत्व सर्वेक्षण व स्वयंसेवी संस्थेत करार 


नागपूर : राष्ट्रीय स्मारक आणि प्राचिन वास्तुंमध्ये स्वच्छ भारत अभियान राबवून पर्यटनास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या अडॉप्ट अ मॉन्युमेंट व स्वच्छ भारत अभियान अंतर्गत चंद्रपूर येथील इको- प्रो स्वयंसेवी संस्थेसोबत गुरुवारी करार करण्यात आला.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांची केंद्रीय संरक्षित स्मारक / स्थळांवर स्वच्छता आणि मुलभूत पर्यटन सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी "स्मारकाची दत्तक परियोजना" हा महत्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील २१ केंद्रिय संरक्षित स्मारक/स्थळ आणि परिसरात स्वच्छ भारत अभियान राबविण्याच्या दृष्टीने २४ मे रोजी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि चंद्रपूर येथील इको-प्रो बहुउद्देशिय संस्था याच्यात करार झाला. करारानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील ऐतिहासिक स्मारके स्वच्छ भारत अभियान राबविण्यास इको-प्रो संस्थेस दत्तक देण्यात आलेले आहे.

नागपूर येथील पुरातत्व भवन येथे आयोजित कार्यक्रमात पुरातत्व विभागच्या वतीने अधीक्षक पुरातत्त्व शास्त्रज्ञ डॉ. आय. ए. हाश्मी, इको-प्रो संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी या करारावर स्वाक्षरी केल्या.

यावेळी मुंबईचे प्रादेशिक निदेशक डॉ़ एम़ नंबीराजन, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिश शर्मा, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, इको-प्रो संवर्धन विभागाचे प्रमुख रविंद्र गुरनुले, भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या सहायक पुरातत्व शास्त्रज्ञ डॉ. शिल्पा जामगडे, इको-प्रो चे नितिन बुरडकर, अनिल अद्गुरवार, हरीश मेश्राम, वैभव मडावी, अमोल मेश्राम, सिनेट सदस्य समीर केने, बल्लारपूरचे नगरसेवक विकास दुपारे, नगर अभियंता संजय घोडे यांची उपस्थिती होती़



स्वच्छ भारत अभियान राबवून पर्यटनास मिळणार प्रोत्साहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाचा उद्देश यशस्वी करण्याच्या उद्देशाने जगभरातील पर्यटकांना देशभरातील पर्यटन स्थळांकडे आकर्षित करण्याच्या दृष्टीने स्मारक दत्तक योजना राबविण्यात येत आहे़ विशेष म्हणजे या संस्थेने यापूर्वीच किल्ला स्वच्छता अभियान राबविीले होते़ मागील एक मार्च २०१७ पासून अविरतपणे ११ किमी लांबी चंद्रपूर येथील गोंडकालीन किल्ला स्वच्छ करण्याचे काम अखंडित सुरू आहे़ त्यास आज ४२९ दिवस पूर्ण झालीत़ त्याची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या "मन की बात" या कार्यक्रमात संस्थेच्या कायार्चा आणि चंद्रपूर शहराचा गौरवपूर्ण उल्लेख केला होता़

Wednesday, March 07, 2018

यंदाचे 19 वे विदर्भ पक्षीमित्र संमेलन चंद्रपूरात

यंदाचे 19 वे विदर्भ पक्षीमित्र संमेलन चंद्रपूरात


http://www.pakshimitra.org
यजमानपद जिल्हयातील इको-प्रो संस्थेस

चंद्रपूर/प्रतिनिधी:
2018 चे 19 वे विदर्भ पक्षीमित्र संमेलन चंद्रपूरात आयोजन करण्यात येणार असुन याचे यजमान पद यंदा इको-प्रो संस्थेस देण्यात आलेले आहे.
मागील वर्षी 2017 चे 18 वे विदर्भ पक्षीमित्र संमेलन यवतमाळ येथे कोब्रा एडव्हेंचर क्लब या संस्थेच्या यजमानपदाखाली आयोजन करण्यात आलेले होते. यंदा डिसंेबर महीन्यात होणारे विदर्भ पक्षीमित्र संमेलन चंद्रपूर शहरात होत असुन याचे यजमानपद जिल्हयातील पर्यावरण व वन्यजीव क्षेत्रातील अग्रणी असलेली इको-प्रो या संस्थेस देण्यात आलेले आहे. या संदर्भातील महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेकडुन नुकतेच एक पत्र इको-प्रो चे अध्यक्ष बंडु धोतरे यांना प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष तथा विदर्भ पक्षीमित्र संमेलन आयोजन समीतीचे संयोजक डाॅ जयंत वडतकर यांनी सदर पत्राव्दारे या संमेलनाचे आयोजनाबाबत कळविले आहे.
महाराष्ट्र पक्षिमीत्र तर्फे आजवर 31 राज्यस्तरीय संमेलने राज्यात पार पडली असुन 25 पेक्षा जास्त विभागीय संमेलनांचे आयोजन पार पडले आहे, यामध्ये विदर्भ नेहमीच अग्रेसर राहीला असुन यातील 19 वे संमेलन चंद्रपूर येथे आयोजित होत आहे. या संमेलनात विदर्भातील 200 प्रतिनीधी उपस्थीत राहणे अपेक्षीत असुन या दोन दिवस चालणा-या संमेलनात अभ्यासकांची मार्गदर्शन व सादरीकरण सुध्दा होतील तसेच नवोदितांचे सादरीकरणस सुध्दा संधी राहणार आहे. उत्कृष्ठ निवास व्यवस्था, छायाचित्र प्रदर्शन, स्मरणीका प्रकाशन, शालेय विदयाथ्र्याना सहभागी करून घेण्यासाठी काही स्पर्धा ई. कार्यक्रम या दरम्यान घेण्याचे ठरविले करून तयारी सुरू करण्यात येणार असल्याची माहीती इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी एका पत्रकाव्दारे कळविले आहे.

Monday, March 05, 2018

अपघातात ‘रानगव्याचा मृत्यु

अपघातात ‘रानगव्याचा मृत्यु

चंद्रपूरः वन्यप्राणी संरक्षणाच्या दृष्टीने पद्मापूर-मोहर्ली या वनक्षेत्रातुन ताडोबा साठी जाणाÚया रोड वर ठिकठिकाणी ब्रेकर्स तयार करण्याची मागणीइको-प्रो संस्थेच्या वन्यजीव विभागाचे विभाग प्रमुख नितीन बुरडकर यांनी केलेली आहे.

आज सकाळी मोहर्ली रोड रानगवा मृत अवस्थेत आढळला, त्याचा रोड अपघातात मृत्यु झालेला आहे. सदर रोड हा वनक्षेत्रातुन जात असल्याने या रस्त्यावर ब्रेकर्स ची अत्यंत गरज असल्याने इको-प्रो तर्फे ताडोबा व्यवस्थापनास निवेदन देउन मागणी करण्यात आलेली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा जगविख्यात झालेला आहे. कोर झोन सोबतच बफर झोन मध्येही पर्यटन सुरू झालेले आहे. बफर झोन मधे सुध्दा पर्यटकांची प्रचंड गर्दी होत असते. याव्यतीरिक्त मोहर्ली वनक्षेत्रात बोटीग, बटरफलाय गार्डन आदी पर्यटकांना आकर्षण निर्माण झालेले आहे, यामुळे या भागात पर्यटकांची वाहनासह ये-जा सतत सुरू असते. तसेच बफर झोन अंतर्गत येणाÚया पद्मापूर ते मोहर्ली या रोडचे बांधकाम झाल्याने या रस्त्याने होणारी वाहतुक सुध्दा वाढलेली आहे. सदर रस्ता चांगला असल्याने या रस्ताने जाणारी वाहनांची गती सुध्दा अधीक असते. त्यामुळे नेहमीच वन्यप्राण्यांकडुन रस्ता ओंलाडतांना अपघाताचा धोका असतो. संदर्भीय घटनेनुसार आणी यापुर्वी सुध्दा या रोडवर वन्यप्राण्यांचे अपघात झालेले आहेत. वन्यप्राण्यांसोबत मनुष्यांना सुध्दा अपघातात जख्मी व्हावे लागले आहे.

सदर पद्मापुर ते मोहर्ली हा रस्ता वन्यप्राण्यांच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असुन यापुढील घटना टाळण्याच्या दृष्टीने त्वरीत कार्यवाही अपेक्षीत आहे. तसेच पर्यटकांच्या वाहनांची गती नियत्रीत राहावी यावर उपाय म्हणुन या रोडवर ठिक-ठिकाणी ब्रेकर्स, रंबल स्ट्रिप तयार करण्याची गरज आहे. इको-प्रो संस्थेच्या वतीने मागणी करण्यात येत आहे की सदर ब्रेकर्स लवकरात लवकर लावण्यात यावे. तसेच पद्मापुर गेटवरील सिसिटीवी कॅमेरा पुर्वव्रत सुरू करण्यात यावे याकरीता आज इको-प्रो च्या वन्यजीव विभागातर्फे ताडोबाचे क्षेत्रसंचालक मुकुल त्रिवेदीआणी बफरचे उपसंचालक गजेंद्र नरवणे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नितीन बुरडकर, प्रमुख, इको-प्रो वन्यजीव विभाग, अमोल उटट्लवार व रोशन धोतरे उपस्थित होते.

Thursday, March 01, 2018

इको-प्रोच्या किल्ला स्वच्छता अभियानास 1 वर्ष पुर्ण

इको-प्रोच्या किल्ला स्वच्छता अभियानास 1 वर्ष पुर्ण

                                                  मागील वर्षभरात कार्यकर्त्यांचे 348 दिवस श्रमदान
चंद्रपूर प्रतिनिधी:
 इको-प्रो संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या चंद्रपूर शहरातील ऐतीहासीक गोंडकालीन किल्ला-परकोट स्वच्छता अभियानास आज 1 वर्ष पुर्ण झालेले आहे. यानिमीत्त आज एक छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 `
चंद्रपूर शहर ऐतीहासीक गोंडकालीन किल्ला, समाध्या व मंदीरे साठी ओळखला जातो. या शहरात जवळपास 500 वर्ष जुना गोंडकालीन किल्ला-परकोट असुन आजही भक्कम स्थितीत उभा आहे. या परकोटाची लांबी जवळपास 11 किमी लांब असुन 4 दरवाजे 5 खिडक्या आणी 39 बुरूजे आहेत. याकडे बरीच वर्ष दुर्लक्ष झाल्याने यावर मोठी-मोठी झाडे, वृक्ष-वेली, झाडी-झुडपे वाढल्याने याला खंडहर स्वरूप प्राप्त झालेले होते. संपुर्ण परकोटावर अस्वच्छता व घाणीचे साम्राज्य पसरले होते. हा संपुर्ण किल्ला-परकोट स्वच्छ व साफ करण्याच्या दृष्टीने 1 मार्च 2017 रोजी इको-प्रो संस्थेच्या कार्यकत्र्यानी चंद्रपूर किल्ला-परकोट स्वच्छता अभियानाची सुरूवात केली होती. आज 1 मार्च 2018 रोजी या अभियानास एक वर्ष पुर्ण झाले असुन या वर्षभरात एकुण 348 दिवस प्रत्यक्ष श्रमदान करून किल्ला स्वच्छ करण्याचा प्रयत्न सुरू ठेवलेला आहे.
किल्ला स्वच्छता अभियानास एक वर्ष पुर्ण झाल्याचे निमीत्त साधुन आज किल्ला-परकोटावरील विठोबा खिडकी ते बिनबा गेट मधील बुरूज क्रं. 25 वर आज छोटेखानी कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेला होता. यात प्रमुख उपस्थिती शहरातील जेष्ठ इतीहास अभ्यासक आचार्य टी टी जुलमे उपस्थिती होती. सोबत इको-प्रो चे बंडु धोतरे, प्रा डाॅ योगेश दुधपचारे, प्रा डाॅ मिलींद जांभुळकर, संदीप जेउरकर, रवी झाडे, धनजंय शास्त्रकार आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी अभियानास 1 वर्ष पुर्ण झाल्याचे निमीत्ताने यावेळी केक कापण्यात आला. यांनतर उपस्थित पाहुणे आणी जनता महाविदयालयाचे विदयाथ्र्याना किल्लाचा परीसराची फेरी म्हणजेच ‘हेरीटेज वाॅक’ करवुन किल्लाची माहीती देण्यात आली. या अभियान अंतर्गत कशा पध्दतीने श्रमदान करून स्वच्छता राबविण्यात आली याची माहीती देण्यात आली. इको-प्रोच्या अनेक कार्यकत्र्याच्या सातत्यपुर्ण योगदानामुळे सदर अभियान यशस्वी होत असल्याची माहीती यावेळी देण्यात आली.
सदर अभियान आता फक्त किल्ला स्वच्छतेकरीता मर्यादीत न राहता यापुढे या अभियानाचे स्वरूप चंद्रपूर शहरातील पर्यटन विकास व सुंदर चंद्रपूर च्या दृष्टीने सुध्दा महत्व वाढलेले आहे. या अभियानात स्थानीक नागरीक, प्रशासन व शासनाचे सहकार्य सुध्दा प्राप्त होत आहे. पुरातत्व विभाग कडुन या किल्लास दोन्ही बाजुस संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. यामुळे किल्ला व संरक्षण भिंत यामधुन पाथ वे, सायकल ट्रॅक करीता विकसीत करण्यात यावा याकरीता संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच गोंडराजे समाधीस्थळ येथे लाईट व साॅउड च्या माध्यमातुन गोंड राज्यांचा गौरवपुर्ण इतीहास नागरीकांसमोर यावे याकरीता प्रयत्न सुरू आहेत. एकदंरीत स्वच्छता अभियान पुढे-पुढे शहराच्या एकंदरीत सौदर्यात कशी भर पडेल यादिशेने प्रयत्न सुरू असुन सर्व नागरीकांनी सुध्दा यापुढे किल्ला स्वच्छ-सुंदर राहीला पाहीजे याकरीता प्रयत्नशील असण्याची गरज आहे. याकरीता किल्ला परीसरात ठिक-ठिकाणी जनजागृती सुध्दा केली जात आहे.

आजच्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इको-प्रो चे रविद्र गुरनुले, नितीन बुरडकर, नितीन रामटेके, बिमल शहा, अनिल अडगुरवार, राजु काहीलकर, संजय सब्बनवार, अमोल उटट्लवार, सुधीर देव, हरीदास कोराम, किशोर वैदय, हरीश मेश्राम, वैभव मडावी, रोशन धोतरे, विनोद दुधनकर, सुमीत कोहळे, आशीष मस्के, विशाल रामेडवार, प्रतीक बदद्लवार, सचिन धोतरे, हेमंत बुरडकर, कपील चौधरी आदीनी सहकार्य केले.

Monday, February 26, 2018

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

मानव वाघ संघर्ष सुरूच 

चंद्रपूर/ललित लांजेवार

मानव वाघ संघर्ष दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.चंद्रपूर शहरालगत लागून असेलल्या चंद्रपूर परिक्षेत्रातील एपीजे अब्दुल कलाम बगीच्याच्या मागील बाजूला सोमवारी सकाळी मंजुळा केराम वय (३५ वर्षे) याच्यावर वाघाने हल्ला केला या हल्यात त्या जागीच ठार झाल्या. एपीजे अब्दुल कलाम बगीच्याच्या मागील बाजूस कंपाउंड नंबर 484 येथे हा अमृतदेह आढळून आल्याने परिसरात चांगलीच खडबड उडाली.हा मृतदेह याच परिसरातील हिंग्लज भवानी वार्डात राहणाऱ्या महिलेचा असल्याचे सांगितल्या जात आहे. सोमवार सकाळी लाकूड गोळा करण्यासाठी सदर महिला गेली असता वाघाने मागून तिच्यावर हमला केला. या हल्यात महिला जागीच ठार झाली आहे.हा परिसराला जुनोना जंगल लागून असल्याने इथे मागील 5,ते 6 दिवसापासून वाघ फिरत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.मिळालेल्या माहिती वरून वनविभागाचे अधिकारी व स्थानिक पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई सुरु असल्याचे सांगितले जात आहे.नुकताच उन्हाळा सुरु झाला आहे.त्यामुळे शिकार आणि पाण्याच्या शोधात वाघ सर्वत्र फिरत असतो,त्यामुळे अश्यावेळी माणसाचे जंगलात जाणे म्हणजे मुठीत जीव घेऊन सरपण आजम करणे असेच आहे,या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.                     

Sunday, February 18, 2018

किल्ला स्वच्छता अभियानमुळे चंद्रपुर चा ऐतिहासिक वारसा नव्याने समोर - जिल्हाधिकारी सलिल

किल्ला स्वच्छता अभियानमुळे चंद्रपुर चा ऐतिहासिक वारसा नव्याने समोर - जिल्हाधिकारी सलिल


चंद्रपूरः पूर्वी चंद्रपुर शहराची काही गेट पुरती असलेली ओळख आता संपूर्ण परकोट आणि इतर गेट, खिडक्या आणि बुरुज करिता होऊ लागली आहे. जो वारसा चंद्रपुरकर विसरले होते तो गोंड़कालीन वारसा या स्वच्छता अभियान मुळे सर्वांच्या समोर आलेला आहे. सतत 338 दिवस अविरत श्रमदान म्हणजे यात अभियना चे यश आहे. इको-प्रो च्या सैनिकांच्या या एनर्जी चे गुपित सर्वाना सांगितले पाहिजे जेणेकरून विविध क्षेत्रातील लोकांना यासारखे कार्य करता येईल. चंद्रपुर शहराचा चेहरा-मोहरा बदलन्यास आवश्यक ती मदत करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी सहभाग सोहळा निमित्ताने केले.


यावेळी मंचावर भारतीय पुरातत्व विभागाचे डॉ इजहार हाशमी, अधीक्षक पुरातत्वविद, नागपुर सर्किल, डॉ निखिल दास, अधीक्षक पुरातत्वविद, इको-प्रो के अध्यक्ष बंडू धोतरे उपस्थित होते. यावेळी डॉ हाशमी यांनी, चन्द्रपुर किल्ला स्वच्छता अभियान सोबत संरक्षण भिंतिचे काम सुद्धा पुरातत्व विभाग ने सुरु असल्याची माहिती दिली। या संरक्षण भिंतिचे पुढील बांधकाम आणि सौंदर्यीकरण चा प्रस्ताव सरकार कड़े पाठविन्यात आलेला होता तो मंजूर होणाच्या मार्गावर आहे. स्थानिक पातळीवर पुढील आवाहन करिता स्थानिक प्रशासनाची मदतीची आवश्यकता असल्याचे मत मांडले.


यावेळी प्रस्ताविक करताना इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी सहभाग सोहळा आयोजनाचे माहिती दिली, चंद्रपुरकर नागरिकांना किल्ला स्वच्छता पुढे संरक्षण भिंतिचे बांधकाम, संरक्षण भिंत बांधकाम दरम्यान नागरिकांचे सहकार्य, शहरातील ऐतीहासीक पर्यटन विकासाच्या दृष्टीने हेरीटेज वाॅक आयोजित करण्याची, किल्लास लागुन होत असलेला संरक्षण भिंतीचे बांधकाम नंतर आतील भागाचा वापर ‘पाथ वे’ व 'सायकल ट्रेक' म्हणुन विकसित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज स्पष्ट केली, आणि अभियानबाबत सविस्तर माहिती दिली.


चंद्रपूर शहरातील ऐतीहासीक गोंडकालीन किल्ल्याचे स्वच्छता अभियान 1 मार्च 2017 पासुन सुरू करण्यात आले असुन रोज नियमित संस्थेच्या स्वंयसेवकाच्या मदतीने श्रमदानाच्या माध्यमातुन चंद्रपूर किल्ला परकोट स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. आज अभियानास 338 दिवस पुर्ण झालेले आहे.


कार्यक्रम स्थळी गोंडराजांनी बांधलेला भक्कम आणी मजबुत किल्ला कसा दुरावस्थेत होता आणी स्वच्छतेनंतर यात कसा फरक पडला आहे, किल्ला स्वच्छता अभियान राबविण्यापुर्वी आणी नंतरची स्थिति दर्शविनारे फोटोग्राफ चे बैनर तयार करून प्रदर्शनी लावण्यात आलेली होती.


यावेळी सहभाग सोहळा करिता उपस्थित चंद्रपुरकर नागरिक यांनी बुरूज क्रमांक 4, 5, 6 आणी किल्लावरून चालण्याकरीता असलेल्या पादचारी मार्गावरून फिरून माहीती जाणून घेतली. हा छोटा हेरिटेज वॉक सर्वानी फिरून बघितला. या सहभाग सोहळा मधे आणि हेरिटेज वॉक मधे शहरातील गणमान्य व्यक्ति सहभागी झालेली होती. यात प्रामुख्याने अशोकसिंह ठाकुर, adv विजय मोगरे, adv अभय पाचपोर, डॉ जयंत वडतकर, अमरावती, विजय चंदावार, रमेश मुलकलवार, हरीश ससनकर, adv सिरपुरकर, डॉ देवईकर, डॉ पालीवाल, दीपक जेउरकर, सदानंद खत्री, सुरेश चोपणे, योगेश दुधपचारे, प्रा शाम धोपटे, प्रदीप अड़किने, प्रशांत आर्वे, प्रा. विजय बदखल,पो. नि प्रदीप सिरस्कार, पो नि. संपत चव्हाण, पो नि वर्षा खरसाने, मनोहर टहलियानी, सुभाष शिंदे, अनिल दहगावकार, धनंजय तावड़े, उमाकांत धांडे याशिवाय शहरातील अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे संचालन प्रशांत आर्वे यांनी केले तर आभार बंडू धोतरे यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता संस्थेच्या सदस्यानी सहकार्य केले.

Thursday, February 15, 2018

विद्यार्थिनींनी घेतले बिरशहा समाधीचे दर्शन

विद्यार्थिनींनी घेतले बिरशहा समाधीचे दर्शन


चंद्रपूर : इको-प्रो आणि एफईएस गर्ल्स महाविद्यालयाच्या वतीने गोंडराजे बिरशहा यांच्या समाधीस पुष्प अर्पण करून व्हॅलेन्टाईन दिन साजरा करण्यात आला.
गोंडराणी हिराई यांनी पतीच्या आठवणीसाठी ही समाधी बांधली़ 'प्रेमाचे प्रतीक' म्हणून राजा बिरशहा यांच्या स्मारकाकडे पाहले जाते. राणी हिराईने राजा बिरशहा यांच्या मृत्युनंतर स्मारक उभारण्यासोबतच चंद्रपूर नगरीत शेकडो विधायक उपक्रम सुरू केले़ परिणामी, त्यांचे कार्य अजरामर झाले़ या कार्याची माहिती आजच्या युवा पिढीला माहीत व्हावे आणि क्षणभंगुर प्रेमाच्या मागे न लागता, प्रेमाचा खरा अर्थ कळावा, याकरिता हा उपक्रम राबविण्यात आला यंदा इको-प्रो आणि एफईएस महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विद्यार्थिनींनी गोंड राजे बिरशहा यांच्या समाधीवर पुष्प अर्पण केले़
अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रभु चोथवे, इको-प्रोचे अध्यक्ष बंडु धोतरे, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. आनंद वानखेडे, रवींद्र गुरनुले, नितिन रामटेके, डॉ. सुखदेव उमरे, डॉ. प्रमोद रेवतकर, डॉ. सचिन बोधाने आदी उपस्थित होते. प्राचार्य चोथवे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. राजा बिरशहा यांची समाधी राणी हिराईने बांधून त्यांच्याप्रती असलेले प्रेम स्वत:च्या कार्यातून सिद्ध केले़ त्यामुळे राणी हिराईच्या कार्याचा इतिहास विद्यार्थ्यांनी समजून घेणे काळाची गरज आहे़ बिरशहा यांची समाधी म्हणजे निरागस प्रेमाचे प्रतीक असून या ऐतिहासिक वस्तुचे जतन करण्यासाठी शासनाने विशेष लक्ष द्यावे, असे मत प्राचार्य चोथवे यांनी मांडले़
बंडू धोतरे म्हणाले, युवकानी क्षणभंगुर प्रेमाच्या मागे न लागता विविध नात्यातील प्रेम व्यक्त करण्याकरिता विशिष्ट दिवसांची गरज नाही. तर, कार्यातून व्यक्त व्हायला पाहिजे, यावेळी अनिल अल्लूरवार, बिमल शहा, राजू काहिलकर, अमोल उट्टलवार, हरीश मेश्राम, वैभव मड़ावी, अतुल राखुंडे आणि इको-प्रो नगर संरक्षक दलाचे कार्यकत तसेच बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.