काव्यशिल्प Digital Media: वडेट्टीवार

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label वडेट्टीवार. Show all posts
Showing posts with label वडेट्टीवार. Show all posts

Saturday, October 27, 2018

विधायक वडेट्टीवार की मौजुदगी में सिंदेवाही पंस की समिक्षा बैठक

विधायक वडेट्टीवार की मौजुदगी में सिंदेवाही पंस की समिक्षा बैठक

सिंदेवाही/प्रतिनिधी:
 विधायक विजय वडेट्टीवार की मौजूदगी में सिंदेवाही पंचायत समिति में समीक्षा बैठक का आयोजन किया गया. सभा में विविध विकास कार्यों का जायजा लिया गया. बैठक में जलसंकट पर नियोजन व उपाययोजना आदि पर जायजा लिया गया व जलसंकट निर्माण नहीं होने के लिए उचित उपाययोजना करने के निर्देश विधायक वडेट्टीवार ने दिए.
इस वर्ष बारिश के कमी के चलते जलस्तर की कम हुआ है. जिससे जलसंकट की ओर ध्यान देने की सुचना दी गई तथा विविध विभाग के माध्यम से चलाए जा रहे योजनाओ का लाभ लाभार्थियों को पहुंचाने तथा किसी भी लाभार्थियों पर अन्याय नहीं हो इस पर ध्यान देने की सूचना की गई. तहसील के जन्म व मृत्यु दर पर गंभीरता से नजर रखने के निर्देश स्वास्थ, शिक्षा व बालकल्याण विभाग को ध्यान रखने के आदेश दिए गए.
सभा को सिंदेवाही पंस सभापति मधुकर मडावी, सिंदेवाही पंस के उपसभापति बालबुद्धे, जिप सदस रूपा सुरपाम, सिंदेवाही तहसील कांग्रेस अध्यक्ष रमाकांत लोधे, राहुल पोरेड्डीवार, शिला कन्नाके, कुंभरे, इल्लूरकर, सरपंच, ग्रामसेवक व विविध विभाग के अधिकारी उपस्थित थे.

Monday, October 01, 2018

तेंदुए के हमले मे बाल बाल बची बच्ची कि जान

तेंदुए के हमले मे बाल बाल बची बच्ची कि जान

ब्रम्हपुरी:
.तहसील के चिचगांव डोर्ली में शनिवार की रात करीब 8.30 बजे जो हुआ, उससे पूरा गांव सहमा हुआ है. गांव की एक 8 वर्षीय बालिका पर तेंदुए ने घर के सामने ही हमला कर लिया. उसे अपने जबड़े में फांस लिया, लेकिन वहीं खड़े बालिका के पिता ने तुरंत तेंदुए के पैरों को पकड़ लिया. तभी आसपास के लोग भी वहां पहुंचे. शोरशराबा और लोगों को देखकर तेंदुए ने बच्ची को छोड़ दिया और जंगल भाग गया. बच्ची को तुरंत अस्पताल में भर्ती कराया गया. इस घटना के बाद पूरी रात गांव के लोग दहशत के मारे सो नहीं पाए. वहीं जब यह खबर विधायक विजय वडेट्टीवार को मिली, तो उन्होंने वन विभाग से तुरंत तेंदुए का बंदोबस्त करने की मांग की. 2 दिन पूर्व ही तहसील में एक तेंदुए ने एक दूसरी कक्षा के छात्र को अपना शिकार बनाया था.
गांव की बिजली आपूर्ति खंडित होने से गर्मी से बचने के लिए घर के बाहर आंगन में थे. अंधेरे का लाभ उठाकर शिकार की तलाश में आये तेंदुए ने रात करीब 8.30 बजे ऐश्वर्या पर हमला किया
घटना की जानकारी मिलने पर वन विभाग के कर्मचारी ग्रामीण अस्पताल पहुंचे. घायल ऐश्वर्या पर उपचार किया गया. वह खतरे से बाहर है. इस दौरान क्षेत्र के विधायक विजय वडेट्टीवार एक कार्यक्रम के सिलसिले में ब्रम्हपुरी आये हुए थे. उन्होंने घटना की जानकारी मिलने पर तत्काल ग्रामीण अस्पताल पहुंचकर ऐश्वर्या के उपचार और उसकी हालत की जानकारी हासिल की. अच्छे उपचार के लिए ऐश्वर्या के पिता राजेश्वर को तत्काल आर्थिक सहायता दी. इस समय उपस्थित वन विभाग के अधिकारी को तेंदुए का तत्काल बंदोबस्त करने, जंगल से सटे क्षेत्र में उगी घास को निकालकर वन्य प्राणियों के छिपने के स्थान को नष्ट करने के निर्देश दिए. इस समय वन परिक्षेत्र अधिकारी आशा चौहान, नायगमकर ने घायल का उपचार खर्च वन विभाग द्वारा वहन करने और उग आयी जंगली घास को हटाने की कार्रवाई तत्काल करने के भी निर्देश दिए. इस समय जिप सदस्य प्रा. राजेश कांबले, प्रमोद चिमूरकर, पूर्व नगरसेवक विलास विखार, प्रा. श्याम करंबे आदि उपस्थित थे.

Saturday, August 04, 2018

 आ.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी सावली तालुक्यातील निमगाव व दाबगाव नहराची केली पाहाणी

आ.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी सावली तालुक्यातील निमगाव व दाबगाव नहराची केली पाहाणी

चंद्रपूर/प्रतिनिधी:
आज दि. 04/08/2018 ला मा. आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी निमगाव व दाबगाव नहराचे अति प्रमाणात खोली झाल्याने पिकांना पाणी मिळतं नाही अशी तक्रार शेतकऱ्यांची होती ही मागणी लक्षात घेऊन मा.आमदार साहेबानी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन नहराची पाहाणी केली. व   संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे सूचना दिल्या. मा. आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांच्या कामाचे निराकरण केले यामुळे शेतकरी समाधानी झाले. यावेळी प्रामुख्याने वैशालिताई शेरकी जी. प. सदस्य, दिनेश भाऊ चिटणुरवार महाराष्ट्र काॅग्रेस सदस्य , यशवंत बोरकुटे अध्यक्ष तालुका काॅग्रेस कमेटी सावली, राजु ठाकरे निमगाव , नरेंद्र तांगडे, ईश्वर गंडाटे, व सर्व कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
 

Monday, July 16, 2018

 कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा:वडेट्टीवार

कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा:वडेट्टीवार

  विजय वडेट्टीवार यांची रस्ता अपघातात मृत पावलेल्या कुटुंबियांच्या घरी सांत्वनपर भेट
चंद्रपूर/प्रतिनिधीं:
नंदाताई प्रमोद बहेरम वय 58 वर्ष वडगाव वार्ड चंद्रपूर हया भवनजीभाई हायस्कूल चंद्रपूर येथे शिक्षिका होत्या त्यांना सेवानिवृत्ती करिता 4 महिने बाकी असतांना 7 दिवसापूर्वी शाळेत जातांना ट्रॅफिक ऑफीस समोर असलेल्या        खड्डयात गाडी ने पडल्याने त्या जागीच ठार झाल्या.
तसेच चंद्रपूर बंगाली कॅम्प प्रभाग क्र. 4 येथील कु. काजल उत्तम पाल वय 19 वर्ष ही मुलगी बंगाली कॅम्प चौकातुन शाळेत जात असताना खड्डे असल्याने त्या खड्डयात टू व्हाईलरगाडी जाऊन पडली व मागून येणाऱ्या ट्रक ने त्या मुलीला चिरडल्याने ती जागीच मृत्युमुखी पडली.
अवघ्या 7 दिवसात चंद्रपूर शहरातील रस्त्यावर व हायवेवर खड्डे पडले असल्याने निष्पाप लोकांचे बळी जात आहे. 25 वर्षांपासून दरवर्षी पावसाळा आला की गड्ड्यात पडून कित्येक घटना प्रत्येक वर्षी होत असतात. याबाबत प्रशासनाला अजूनही जाग आलेली दिसून येत नाही यावरून प्रशासन किती निष्क्रिय आहे हे दिसून येते. या चंद्रपूर जिल्ह्यात 2 मंत्री असूनसुद्धा रस्ता अपघातात मृत्यू पावलेल्या कुटूंबियांना भेट दिली नाही. याची माहिती मा. आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांना होताच त्यांनी वडगाव व चंद्रपूर बंगाली कॅम्प येथील मृत पावलेल्या कुटूंबियांच्या घरी जाऊन सांत्वन पर भेट दिली. 
व यावेळेस प्रशासनांनी खड्डे का बुजवली नाही याची माहिती घेऊन शासन स्तरावरून मुख्यमंत्री सहायता निधीतून कुटुंबाला 5 लाख रुपयाची मदत देण्याकरिता शासनाला भाग पाडू व यामध्ये जो कोणी अधिकारी दोषी असेल त्याला धारेवर धरून हा प्रश्न पावसाळी अधिवेशनात लावून धरल्याशिवाय राहणार नाही असे आश्वासन मा. आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी दिले. यावेळी प्रामुख्याने प्रकाशभाऊ देवतळे अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी, नादुभाऊ नागरकर शहर अध्यक्ष चंद्रपूर, सेवादलचे अध्यक्ष सूर्यकांत खनके, सुनिताताई लोढिया नगरसेवक, करीमभाई शहर अध्यक्ष बल्लारशा, अमजद अली नगरसेवक, शिवा राव युथ काँग्रेस अध्यक्ष, राजेश अडूर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

चंद्रपूरातील खड्ड्यांनी एकाच आठवड्यात दोघांचा नाहक जीव घेतले. या घटनेला प्रशासनाचा दुर्लक्षितपणा व संबंधित कंत्राटदारासह लोकप्रतिनिधीही जबाबदार आहे. संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन प्रशासनाच्या चुकीचे प्रायश्चित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पीडित कुटुंबांना आर्थिक सहाय्य करून करावे, यासाठी हा मुद्दा स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून सोमवारी विधानसभेत मांडणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.



Saturday, June 16, 2018

 आमदाराची बदनामी केल्या प्रकरणी नगरसेवका विरुद्ध पोलिसात तक्रार

आमदाराची बदनामी केल्या प्रकरणी नगरसेवका विरुद्ध पोलिसात तक्रार

चंद्रपूर/प्रतिनिधी:
 काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधिमंडळाचे उपगटनेते व विधान सभेचे प्रदोत (राज्यमंत्री दर्जा) आमदार विजय वडेट्टीवार यांची सोशल मीडियावरून  बदनामी करणे दुसऱ्यांच्या नावाचा वापर करून बनावट प्रेस नोट काढून ई-मेल आयडीवरून पत्रकारांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करणे असे कृत्य करणाऱ्या नगरसेवक तथा प्रदेश सरचिटणीस,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (ओबीसी विभाग) देवेन्द्र बेले यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून तत्काळ कारवाई करण्यात यावी.अशा आशयाची तक्रार काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी रामनगर पोलिसात केली आहे.आमदार विजय वडेट्टीवार यांनी नांदेड येथे कृषी भूषण पुरस्कार प्राप्त धानाचे संशोधक स्वर्गीय दादाजी खोब्रागडे यांच्या घरी भेट देण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या खोब्रागडे यांना आदरांजली व शेतकरी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला नागरिकांनी हजेरी लावून यशस्वी सुद्धा केला. मात्र या कार्यक्रमामुळे काही जणांच्या पोटात कळ आल्याचा आरोप देवतळे यांनी केला आहे. त्यामुळे देवेन्द्र बेले यांनी या कार्यक्रमाचे आयोजक आमदार विजय वडेट्टीवार यांची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काँग्रेस पक्षाची बदनामी करण्यासाठी गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचून नगरसेवक अशोक नागापुरे यांचे नाव वापरून बनावट प्रेस नोट तयार करून स्वतःचा ई-मेल आयडी तयार करून यावरून अशोक नागापुरे यांची सही नसलेली प्रेस नोट सर्व वर्तमानपत्रात वृत्तवाहिन्यांच्या ई-मेल आयडीवर पाठवली प्रसारमाध्यमांची दिशाभूल केली.यांनी स्वतःच्या फेसबुक अकाउंटवरून आमदार विजय यांच्या नावाचा उल्लेख करून पोस्ट केल्याने त्यांची प्रतिमा मलिन केली आहे. याची गंभीर दखल काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी घेतली आहे.
बदनामीचे पडयंत्र रचणाऱ्या  देवेंद्र बेले यांच्यावर फौजदारी कारवाई करून तत्काळ अटक करावी. अश्या आशयाची तक्रार रामनगर पोलीस करण्यात आली आहे. त्यासोबत विविध पोलीस ठाण्यातही तक्रारी दाखल केल्या आहेत.

Tuesday, June 12, 2018

वडेट्टीवारांच्या देखरेखीत राहुल गांधीच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु

वडेट्टीवारांच्या देखरेखीत राहुल गांधीच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु

Arrangements for Rahul Gandhi's tour is going on for a war-footing | राहुल गांधी यांच्या दौऱ्यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू
चंद्रपूर/प्रतिनिधी:
एचएमटीचे तांदळाचे जनक दादाजी खोब्रागडे यांच्या परीवाराच्या सांत्वन भेटीसाठी व शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्यासाठी बुधवारी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे बुधवारी चंद्रपूर जिल्ह्यातील नांदेड या गावी येत आहेत. या कार्यक्रमाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. राहुल गांधी यांच्या या दौर्यासाठी दिल्लीच्या एसपीजी कार्यालयातील अधिकारी या तयारीवर लक्ष ठेवून आहेत.
राहुल गांधी दिल्लीवरून नागपूरला आल्यानंतर ते हेलीकॉप्टरने नांदेड येथे येणार आहेत. त्यासाठी हेलीपॅडची निर्मिती करण्यात येत आहे. ज्या जागेवर हेलीपॅड तयार करण्यात आले ती जागा यासाठी योग्य आहे की नाही याची ट्रायल आज हेलीकॉप्टर उतवून घेण्यात आली. हेलीकॉप्टरचा आवाज ऐकताच हेलीपॅडच्या दिशेने  परिसरातील नागरिकांनी चांगलीच गर्दी केली.मात्र पोलीस दल त्याठिकाणी असल्याने नागरिक मुकाट्याने एका ठिकाणी राहून बघत होते. दादाजींच्या कुटुंबीयांच्या भेटीनंतर राहुल गांधी शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. हि संपूर्ण कार्यक्रमाची तयारी  आमदार विजय वडेट्टीवार, माजी आमदार अविनाश वारजूकर यांच्या निगराणी खाली सुरू आहेत.
कार्यक्रमादरम्यान कुठलाही गोंधळ उडू नये म्हणून ५०० हून अधिक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात येणार आहे. या सर्व तयारीवर चंद्रपूरच्या जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर लक्ष ठेवून आहेत.



Monday, June 11, 2018

वडेट्टीवार धडकले अहिरांच्या संसदग्राम चंदनखेड्यात

वडेट्टीवार धडकले अहिरांच्या संसदग्राम चंदनखेड्यात

नागरिकांनी समस्येचा वाचला पाढा 
चंद्रपूर/ विशेष प्रतिनिधी:
ग्रामीण भागातील खेड्यांचा लवकरात लवकर विकास व्हावा या अनुशंघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१४ रोजी प्रत्येक खासदाराने आपल्या कार्यक्षेत्रातील एक गाव दत्तक घेऊन ते २०१६ सालापर्यंत आदर्श करून दाखवयाचे होते. शिवाय २०१९सालापर्यंत दोन गावे आदर्श केली असावीत असा आदेश देशातील सर्व खासदारांना दिला होता. या अभियानाला ११ ऑक्टोबर २०१४ ला सुरवात देखील झाली. मात्र तब्बल ४  उलटूनही ‘अच्छे दिन’ असल्याची भाषा करणाऱ्या मोदी सरकार मधील केंद्रीय गृहराज्यमंत्री यांनी घेतलेल्या भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा गावल नागरिकांना मुलभूत सोई सुविधान पासून वंचित असल्याची बाब काँग्रेसचे उपनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी रविवारी पत्रकारांसमक्ष गावाची पाहणी केली असता पुढे आली. 
  हंसराज अहीर यांनी सांसद आदर्श गाव योजनेअंतर्गत २०१४ साली भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा हे गाव दत्तक घेतले.या गावात काँग्रेसचे उपनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी भेट दिली व त्या गावाची दत्तक गाव योजने अंतर्गत केलेल्या कामाची पाहणी केली असता पाणी, वीज रस्ते, घरकुल, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच स्वच्छतेबाबत येथील स्थानिक नागरिकांनी जणू पाढाच वाचला.   
गावात डॉक्टर नाही. पाणी, वीज रस्ते, घरकुल, प्राथमिकआरोग्य केंद्र आरोग्य सुविधा नाही,४०० रूपये भरून पाण्याचे एटीएमसुद्धा काढले मात्र पाणी नाही,सातबारा काढण्यासाठी पटवारी गावात येत नाही,बस फेऱ्या  अपुऱ्या आहेत.येथील ग्रामपंचायत सदस्य वैशाली दडमल म्हणाल्या, ना. अहीर गावात आलेच नाही. समस्यांबाबत आमदार बाळू धानोरकर यांना सुद्धा सांगितले तरीही काहीच होत नसल्याची खंत व्यक्त केली.
चंदनखेडामध्ये पायाभूत व मुलभूत सुविधांचा अभाव असल्याने याला आदर्श गाव कसे म्हणता येईल. ना. अहीर यांनी दत्तक घेतलेल्या चंदनखेडा या गावाची अशी दैना असेल तर इतर गावांची काय अवस्था असावी याचा अंदाजही व्यावेळी व्यक्त करण्यात आला. 
हि तर चंदनखेडाची थट्टा- आ. वडेट्टीवार
फक्त फलकावर आदर्श चंदनखेडा गाव लिहिले आहे. मात्र गाव बघितले तर भकास .चार वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील गाव काय आहे ते पाहायला चंदनखेडा गावात आलो असता खासदारांना मिळणाऱ्या निधीतून गावासाठी एक रूपयाही दिला नाही व आदर्श गाव चंदनखेडासाठी विशेष निधीही आणला नाही.केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी चंदनखेडा गाव दत्तक घेऊन गावाची व नागरिकांची थट्टा केली आहे. असा  गंभीर आरोप विधानसभेतील कॉंग्रेसचे उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केला. यावेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, डॉ. विजय देवतळे उपस्थित होते.

Sunday, May 13, 2018

सामूहिक विवाह होणे काळाची गरज:आ.विजय वडेट्टीवार

सामूहिक विवाह होणे काळाची गरज:आ.विजय वडेट्टीवार

१२जोडप्यांचे लागले लग्न ५ हजार समाज बांधवांची उपस्थिती 
 चिमूर प्रतिनिधी:
      चिमूर विधानसभा क्षेत्र हे माझे पूर्वी चे क्षेत्र असून अजून हि सलोख्याचे संबंध जनतेशी आहे सामूहिक  विवाह मेळाव्यातून सामाजिक विचारांची देवाण घेवाण होत असून  माना जमातीतील अरविद सांदेकर हे युवा  नेतृत्व समोर आले असून त्यान्च्या पुढाकारातून सामूहिक मेळावा आयोजित केल्याचे स्वागत करीत पुढे म्हणाले की यंदा शेतकऱ्यांची मोठया प्रमाणात नापिकी झाली आहे शेतकरी कर्ज बाजरी होऊ नये समाज बांधवांनी सामूहिक मेळाव्यात विवाह करावे जेणेकरून आर्थिक बचत होते सामूहिक विवाह मेळावे या पुढे हि होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन विधान सभा उप नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले>
      जांभुळ घाट येथील डॉ रमेश कुमार गजभे कला म्हाविद्यालयात  माना आदिम जमात मंडळ मुबई द्वारा पुरस्कृत तालुका शाखा चिमूर व माना आदिम जमात समनव्य समिती यांचे संयुक्त विधमानाने आयोजित  माना आदिम जमाती चा सामूहिक विवाह मेळाव्यात विधान सभा उप नेते आमदार विजय वडेट्टीवार बोलत होते
 या सामूहिक विवाह सोहळ्याचे अध्यक्षस्थानी माना आदिम जमात मंडळ मुबई चे अध्यक्ष वासुदेव धारने राहणार असून उदघाटक माना आदिम समनव्य समिती अध्यक्ष डॉ रमेश कुमार गजभे तर प्रमुख अतिथी विधान सभा उप नेते ,आमदार विजय वडेट्टीवार माजी आमदार डॉ रमेशकुमार गजभे ,जी प गट नेते डॉ सतीश वारजूकर ,जी प सदस्य गजानन बुटके,जी प सदस्य ममता डुकरे पस सभापती विद्या चौधरी उप सभापती शांताराम सेलवटकर , पस सदस्य  रोशन ढोक ,दामोदर केदार, भाऊराव गजभे, मधुकर ढोक ,शालीकरांम सोनवणे,भाष्कर गायकवाड,विजय घरत   सूर्यकांत जीवतोडे,कमलिनी जीवतोडे, शांताराम चौखे  यशवंत घोडमारे आदी उपस्थित होते.
 या वेळी  प्रास्ताविक करताना  कार्यध्यक्ष अरविद सांदेकर म्हणाले की माना समाज मोठया संख्येने राहत असून समाज आदिवासी असताना सुद्धा शासन दर्जा देत नाही यंदा नापिकी झाल्याने समाज बांधव कर्ज बाजरी होऊ नये या साठी समाज संघटनेच्या माध्यमातून विवाह सोहळा आयोजीत केलेले आहे सदर  सामूहिकविवाह सोहळा लोक वर्गणीतून होत असल्याची माहिती दिली संचालन डॉ गोविद् राव चौधरी,डॉ दिनकर चौधरी तर आभार भाष्कर गायकवाड यांनी केले.
 सामूहिक विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी माना जमात समनयव्य समिती कार्याध्यक्ष अरविंद सांदेकर, गडचिरोली जिल्हा सचिव वामन सावसाकडे ,भाऊराव दांडेकर,सूर्यकांत जीवतोडे तसेच माना आदिम जमात मंडळ शाखा चिमूर चे प्रमुख वासुदेव श्रीरामे ,माना आदिम जमात समनव्य समिती चे कार्याध्यक्ष अरविद सांदेकर ,पुरुषोत्तम गायकवाड, खेमराज गुडध्ये ,रमेश दांडेकर, बबन गायकवाड, शामराव धारने, नानाजी दडमल, राजेंद्र बारेकर,रामचंद्र श्रीरामे, पत्रू दडमल ,मोहन दोडके अनिल करपाते माया ननावरे,सुनीता जांभुळे आदींनी केली आहे. दरम्यान प्रवीण  सांदेकर यांनी वर वधू ना वस्त्र भेट  दिले ५ हजार समाज बांधव उपस्थित होते.

Monday, March 26, 2018

ब्रह्मपुरीत होणार अद्ययावत सांस्कृतिक सभागृह

ब्रह्मपुरीत होणार अद्ययावत सांस्कृतिक सभागृह

वडेट्टीवार साठी इमेज परिणामब्रह्मपुरी/प्रतिनिधी:
शैक्षणिक, सांस्कृतिक व नाट्यकलावंतांचे माहेरघर म्हणून ब्रह्मपुरीची ओळख आहे. मात्र सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी एकही सांस्कृतिक व नाट्य सभागृह या शहरात नव्हते. त्यामुळे आमदार विजय वडेट्टीवार यांनी पाठपुरावा करीत नगरविकास विभागाला वारंवार लेखी निवेदन देऊन चर्चा केली होती. तसेच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडेही निवेदन दिले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून शहरात सर्वसोयीयुक्त असे वातानुकुलीत सांस्कृतिक व नाट्य सभागृहासाठी चार कोटींच्या निधीची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
सांस्कृतिक व नाट्य सभागृहाच्या बांधकामाकरिता नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेंतर्गत ब्रह्मपुरी नगर परिषदेला चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निर्णयामुळे ब्रह्मपुरी क्षेत्रातील विद्यार्थी, पालक व नाट्य रसिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. सन १८७४ मध्ये ब्रह्मपुरी तालुक्याची निर्मिती करण्यात आली. शैक्षणिक, सांस्कृतिक व नाट्यकलावंतांचे माहेरघर म्हणून मागील कित्येक दशकापासून प्रसिद्ध आहे. दरवर्षी शहरात अनेक सांस्कृतिक व नाटकांचे कार्यक्रम होतात. काही नाट्य कलावंतांनी आमदार विजय वडेट्टीवार यांना भेटून यासंदर्भात निवेदन दिले असता आमदार वडेट्टीवार यांनी दोन वर्षाच्या आत सांस्कृतिक व नाट्य सभागृहाचे बांधकाम करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आमदार वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी, पालकमंत्री, प्रधान सचिव नगरविकास मंत्रालय मुंबई यांच्याकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा केला होता. जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून विदर्भ वैधानिक मंडळास देण्यात आलेली जागा त्यांच्या उपयोगी नसल्यामुळे ती जागा सांस्कृतिक व नाट्य सभागृहाच्या बांधकामासाठी देण्यात यावे, आणि ती जागा नगर परिषदेला हस्तांतरित करण्यात यावी, अशी मागणी केली होती. आता ती जागा नगर परिषदेला देल्याने सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
तारांकित प्रश्नातून वेधले होते लक्ष
जागेच्या पत्रासह आमदार वडेट्टीवार यांनी पुन्हा नगर विकास विभागाला लेखी निवेदन देवून सतत पाठपुरावा सुरू केला. विधानसभेत तारांकित प्रश्न, कपात सूचना सादर करून शासनाचे लक्ष वेधले. त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून सांस्कृतिक व नाट्य सभागृहाच्या बांधकामासाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाला प्रशासकीय मंजुरीसुद्धा प्राप्त झाली आहे.

Friday, February 23, 2018

भाजपा सरकार केवळ घोषणाबाज:विजय वडेट्टीवार

भाजपा सरकार केवळ घोषणाबाज:विजय वडेट्टीवार



सावली प्रतिनिधी:

              भाजपा सरकार केवळ घोषणाबाज आहे. आश्वासनांची पूर्तता करण्यात ते अपयशी ठरले आहे, असा आरोप आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला. उपरी काँग्रेसच्या वतीने बुधवारी आयोजित शेतकरी, शेतमजूर व बेरोजगार मेळाव्यात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे तर प्रमुख पाहुणे म्हणून गडचिरोली जि.प. सदस्य अ‍ॅड. राम मेश्राम, माजी सभापती दिनेश चिटनुरवार, तालुका अध्यक्ष यशवंत बोरकुटे, महिला तालुकाध्यक्ष उषा भोयर, माजी उपसभापती राकेश गड्डमवार, सावलीच्या नगराध्यक्ष रजनी भडके, उपाध्यक्ष विलास यासलवार, विजय मुत्यालवार, पं.स. सदस्य विजय कोरेवार, भाष्कर गड्डमवार, विलास भांडेकर, शंकर बोदलकर, जि.प. सदस्य वैशाली शेरकी, सरपंच शिला म्हशाखेत्री आदी उपस्थित होते.
आ. वडेट्टीवार म्हणाले, भाजप सरकारने महाराष्ट्रातील जिल्हा परिषदच्या १३०० शाळा बंद करून गरीब मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा घाट घातला आहे. कर्जमाफीच्या नावावर अनेक जाचक अटी लावून शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफी दिली नाही.
जनतेच्या पैशाची केवळ उधळपट्टी केली जात आहे. कोरगाव भीमा येथे जातीय दंगली घडविणाऱ्या संभाजी भिडे व विनायक एकबोटे यांना अटक करण्याचे सोडून संरक्षण देण्याचे काम करीत आहे.जातीय तेढ निर्माण करणारे व शेतकरी, शेतमजूरविरोधी सरकार असल्याने येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदारांनी जागा दाखवा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. श्रीमंतावर मेहरबान आणि गरीबांवर अन्याय हेच सुरू असल्याची टीका त्यांनी मेळाव्यात केली. गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी आणून बारमाही सिंचनाची व्यवस्था केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. यासाठी ३५० कोटींची निविदा मंजूर करण्याचे काम येत्या काही दिवसात होणार असल्याचेही आ. वडेट्टीवार यांनी नमूद केले. यावेळी अन्य पदाधिकाऱ्यांनीही विचार मांडले.
 उपरी येथील सरपंच तथा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आशिष मनबत्तुनवार आणि भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्ष बळकट करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचे आश्वासन कार्यकर्त्यांनी दिले.

संचालन प्रविण गेडाम यांनी केले.आभार यशवंत बोरकुटे यांनी मानले. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सावली मध्ये मेळावा सुरु असताना नजीकच्या गावातच एका इसमाचा कॅन्सरच्या आजाराने मृत्यू झाल्याची दुर्दैवी बातमी कानावर आली.बातमी ऐकून मी तातडीन त्यां इसमाच्या पत्नी विद्याराजू मेश्राम यांना मेळाव्यात बोलावून घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि लगेच त्यांना रुपये 5000/- ची तत्काळ मदत केली.

Friday, January 26, 2018

गांधीचौकातील ध्वजारोहणाचा मान नायब तहसीलदारांना

गांधीचौकातील ध्वजारोहणाचा मान नायब तहसीलदारांना

चंद्रपूर/प्रतिनिधी:  
जिल्हाभरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असताना गेल्यावर्षी १५ ऑगस्टला ध्वजारोहणावरून सुरु झालेल्या चंद्रपूर काँग्रेसच्या दोन गटातील वाद यंदा देखील कायम राहिल्याचे चित्र यंदाच्या २६ जानेवारीच्या ध्वजारोहण कार्यक्रमात दिसून आला, चंद्रपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गांधी चौकातील ध्वजारोहण पुन्हा एकदा प्रशासनातील नायब तहसीलदारांनी केले आहे. 

शहरात वडेट्टीवार आणि पुगलिया असे दोन गट आहे. १५ ऑगस्ट २०१७ ला हे दोन्ही गट चंद्रपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गांधी चौकातील ध्वजारोहण "आम्ही"करणार म्हणून आपापसात समोर आले होते, यात गेली सत्तर वर्ष सातत्यानं चंद्रपूरच्या गांधी चौकात जयस्तंभाजवळ काँग्रेसची अधिकृत झेंडावंदन रंपराच मोडीली गेली होती. 

 याच संदर्भात २४ जानेवारी २०१७ ला शहर पोलीस स्टेशन येथे वडेट्टीवार आणि पुगलिया या दोन्ही गटाची बैठक संध्याकाळी ६ वाजता बोलावण्यात आली होती. मात्र या बैठकीस पुगलिया गटावतीने मनपा गटनेते डॉ. महाकुलकर ,अविनाश ठावरी,देवेंद बेले प्रवीण पडवेकर, अशोक नागपुरे,सुधाकरसिंग गौर,प्रशांत दानव उपस्थित होते.मात्र वडेट्टीवार गटाचे एकही प्रतिनिधी उपस्थित नसल्याने दोन्ही गटात समन्वय होऊ शकला नाही.त्यामुळे पुगलिया गटाने आम्हाला ध्वजारोहन करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली होती , रात्री ९ वाजताच्या सुमारास वडेट्टीवार गटाकडून नंदू नागरकर,सुनिता लोढिया,मलक शाकिल, हे शहर पोलीस स्टेशन येथे उपस्थित झाले. व नंदू नागरकर यांनी मी शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष असल्याने आम्हालाच या गांधीचौक येथील प्रजासत्ताक दिनाची परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली. 

या दोन्ही गटात समन्वय नसल्याने याठिकाणी कोणत्याही एका गटाला परवानगी देणे पोलीस प्रशासनाला शक्य नव्हते. व त्यामुळे या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकत होता ,यातच चंद्रपूर उपविभागीय दंडाधिकारी मनोहर वसंत गव्हाळ यांनी आदेश देत उपविभागीय अधिकारी कार्यालय चंद्रपूरचे नायब तहसीलदार प्रमोद कुलटे यांना ध्वजारोहण करण्याची परवानगी दिली.तर शहर पोलीस निरीक्षक यांना ध्वजारोहणासाठी योग्यता व्यस्था करण्याचे आदेश दिले.या आदेशांनंतर देखील कोणताही अनुचित प्रकार जर त्याठिकाणी घडला तर भारतीय दंड संहितेच्या सलाम १८८ नुसार कारवाई करण्याचे आदेशही काढण्यात आले होते. 

स्वातंत्र्यदिनी व प्रजासत्ताकदिनी खरंतरं सारे रागलोभ दुरावे विसरून एकत्र येण्याचा दिवस असतो. मात्र चंद्रपूर काँग्रेसच्या नेत्यांना मात्र तसं काही वाटत नाही असे या उदाहरणावरून लक्षात येत . कारण ध्वजारोहण कुणी करायचं या वादात अडकलेल्या वडेट्टीवार आणि पुगलिया गटांनी काँग्रेसची ध्वजारोहणाची परंपरा मोडीत काढल्याने या नंतर देखील गांधीं चौकातील ध्वजारोहण हे प्रशासनाच्या मध्यस्तीनेच होणार हे मात्र नक्की झाले आहे.