काव्यशिल्प Digital Media: ahir

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label ahir. Show all posts
Showing posts with label ahir. Show all posts

Sunday, November 04, 2018

निवडणुकांमध्ये बुथ व शक्तीकेंद्र प्रमुखांची भुमिका महत्वाची:अहीर

निवडणुकांमध्ये बुथ व शक्तीकेंद्र प्रमुखांची भुमिका महत्वाची:अहीर

जिवती व कोरपना येथे बुथ व शक्तीकेंद्र प्रमुखांचा अभ्यास वर्ग संपन्न
चंद्रपूर/प्रतिनिधी:-
राजकीय क्षेत्रात कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असुन कार्यकर्त्यांच्या मेहनतीवरच निवडणुकांना समोर जाणे शक्य आहे. तसेच बुथ व शक्तीकेंद्र प्रमुख हे निवडणुकीत अत्यंत महत्वाची भुमिका बजावत असुन त्यांच्या बळावर निवणुकामध्ये यष संपादन अवलंबुन असते. आगामी निवडणुकींना सामोरे जात असतांना सरकार कडुन अनेक लोकाभिमुख योजना राबविण्यात येत आहे. त्या समाजातील वटच्या घटकापर्यंत पोहविण्याची जबाबदारी आपल्या पदाधिकारी व कार्यकत्र्यांची असल्याचे मत केंद्रीय गृह राज्यमंत्री ना. हंसराज अहीर यांनी कोरपना व जिवती येथे आयोजित भाजपा बुथ प्रमुख व शक्तीकेंद्र प्रमुख अभ्यास वर्गादरम्याण व्यक्त केले.
कोरपना येथील ओम मंगल कार्यालय व जिवती तालुक्यातील टेकाअर्जुनी शिवमंदिराजवळ भाजपा बुथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख व पदाधिकारी यांचा अभ्यास वर्ग संपन्न झाला. या वर्गाला केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, राजुरा विधानसभेचे आमदार अॅड. संजय धोटे, भाजपा पुर्व विदर्भ प्रभारी (अभ्यास वर्ग) श्रीकांत देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वर्गाला लोकसभा विस्तारक खुशाल बोंडे, जिल्हा महामंत्री राहुल सराफ, विधानसभा विस्तारक सतीश दांडगे, आदीवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष वाघुजी गेडाम यांनी पक्षाचा अजेंड्याबद्दल उपस्थितींना संबोधित केले.
राज्य व केंद्र सरकार शतक-यांच्या हिताचे अनेक निर्णय या सरकारने घेतले असुन गृहीनीना चुलीपासुन मुक्त करण्यासाठी उज्वला योजना, प्रत्येक घरात विज कनेक्षन पोहचावे यासाठी सौभाग्य योजना, गरजुंना स्वस्त दरात औषध उपलब्ध व्हावेत यासाठी अमृत योजना यांसारख्या अनेक योजना यषस्वी सुरू आहेत. या योजना समाजाच्या शेवट पर्यंत पोहचाव्या यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करण्याची आवश्यकता असल्याचेही ना. अहीर यांनी सांगितले.
अभ्यास वर्गाला जिवतीचे तालुका अध्यक्ष केव गिरमाजी, कोरपनाचे तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर, जि.प. सभापती सौ. गोदावरी केंद्रे, जिवती पं.स.चे सभापती सुनिल मडावी, उपसभापती महेश देवकते, जि.प.सदस्या कमला राठोड, जिवतीच्या नगराध्यक्ष पुश्पा नैताम सोयाम, गटनेते अमर राठोड, कोरपना प.स. सदस्य नुतन जिवणे, नगरसेवक सतिश उपलेंचवार, सुरेष केंद्रे, रमेष मालेकर, सचिन डोहे, राजेश राठोड, संजय मुसळे, कवडु जरिले, अरून मडावी, जया धारणकर, सविता पेटकर, हितेश चव्हाण, विषाल गज्जलवार, गोपिनाथ चव्हान आदींसह बुथ व शक्तीकेंद्र प्रमुखांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.
रेल्वे स्थानकांच्या अत्याधुनिक कामांना गती द्या:अहीर

रेल्वे स्थानकांच्या अत्याधुनिक कामांना गती द्या:अहीर

नागपूर येथे रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिका-यांसोबत बैठक संपन्न
चंद्रपूर/प्रतिनिधी:- 
भारतीय रेल्वे सेवा प्रवास सेवेतील एक प्रमुख सेवा आहे. यात दररोज लाखो लोक प्रवास करत असुन त्यांच्या योग्य सोयीसुविधांची व सुरक्षीततेची जबाबदारी ही रेल्वे प्रषासनाची आहे. रेल्वेत व स्थानकावर अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्याचे काम सुरू असुन त्या कामांना गती देत कामे तात्काळ पुर्ण करण्याचे निर्देष केंद्रीय गृह राज्यमंत्री ना. हंसराज अहिर यांनी दिले.

नागपूर येथील रवि भवनात नागपूर रेल मंडळाच्या वरिष्ठ अधिकार्यासोबत बैठक पार पडलेल्या बैठकीत मध्यरेल्वेचे मंडळ रेल प्रबंधक उत्पल दत्त व इतर रेल कमिटी सदस्य दामोधर मंत्री, श्रीनिवास सुंचूवार आदी उपस्थित होते.माजरी येथील स्थानक हे आदर्ष रेल्वे स्थानक निर्मीत करणे, बल्लारषहा स्थानकावर स्त्री व पुरूशांसाठी वेगवेगळे उच्च वर्ग प्रतिक्षालय, विषेश अतिथी कक्ष बांधकाम, सर्व रेल्वे फलाटावर आधुनिक दर्जाचे एल.ई.डी. कोच दर्षक बसविणे, प्रत्येक फलाटावर स्वतंत्र वाॅटर कुलर, बल्लारशाह रेल्वे स्टेशनवर अतिरिक्त फुट ओव्हर ब्रिज, चंद्रपूर व बल्लारशहा रेल्वे स्थानकांवर जुन्या फुट ओव्हर ब्रिज जवळ लिप्ट ची व्यवस्था, प्लाॅटफार्म सरफेस सुधारणा, यवतमाळ जिल्ह्यात वणी तालुक्यातील कायर व लिंगती येथे प्लॅटफार्म षेल्टर इत्यादी कामे मंजुर झाली असुन काही कामांना सुरूवात देखील झाली आहे.
चंद्रपूर स्थानकांवरील मालधक्का परिसराचे सिमेंट काॅंक्रीटीकरण करणे व प्रकाश वाढविण्यासाठी जास्त प्रकाश क्षमतेचे लाईट बसविण्यासाठी सुचित केले. चंद्रपूर स्थानकावरील साधारण तिकटी खिडकीच्या वेळेत बदल करून सकाळी 5.00 ते रात्रो 01.00 पर्यंत सुरू ठेवण्यासाठी च्या विशयावर चर्चा करून करण्यात आली. ’आनंदवन एक्सप्रेस’ (गाडी क्र. 22127) ही लोकमान्य टिळक टर्मीनल मुंबई येथुन दु. 03.00 वाजता सोमवार ऐवजी बुधवार किंवा गुरूवारला सोडण्याची सुचना यावेळी बैठकीत ठेवण्यात आली. नंदिग्राम एक्सप्रेसचे 06 डब्बे वाढवुन बल्लारषहा येथुन सुरू करण्यासाठी ना. अहीर यांचेकडुन सतत पाठपुरावा सुरू असुन सदर डब्बे वाढविण्यासाठी रेल्वे प्रषासनाकडुन सकारात्मकता दर्शवित लवकरच ही रेल्वे सेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले.
आरक्षण खिडकी पुर्णवेळ सुरू ठेवण्यासाठी विशयावर चर्चा करून रात्रो 10.00 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यासाठी रेल्वे प्रषासनाने तात्वीक मान्यता दिली आहे. चंद्रपूर रेल्वे स्थानक चांदा फोर्ट ला जोडण्यासाठी सर्वे पुर्ण झाला असुन लवकरच कामाला सुरूवात होणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून कडुन सांगण्यात आले. काजीपेठ - पुणे गाडीची वाढती प्रवासी संख्या बघता पुन्हा 06 डब्बे जोडण्यासाठी मुख्य व्यवस्थापक (मध्ये रेल) यांच्या स्तरावरून कार्यवाही सुरू असुन षिघ्र गतीने यावर कार्यवाही होणार असल्याचे उपस्थितीत अधिकाऱ्यांकडू आश्वासित करण्यात आले. चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील अनेक विषयांवर रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ना. हंसराज अहीर यांनी सकारात्मक चर्चा करून आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या सुचना ही दिल्या.

Friday, November 02, 2018

शासनाच्या योजनेचा लाभ गरजूंनी घ्यावा:अहीर

शासनाच्या योजनेचा लाभ गरजूंनी घ्यावा:अहीर

चंद्रपूर/प्रतिनिधी:
प्रधानमंत्राी उज्ज्वला गॅस योजने अंतर्गत कोरपना तालुक्यातील नांदगांव येथे दि. 1 नोव्हेंबर रोजी प्रधानमंत्राी एल.पी.जी. पंचायतीचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमात केंद्रीय गृह राज्यमंत्राी ना. हंसराज अहीर, राजुराचे आमदार अॅड. संजय धोटे, दिशा समिती सदस्य खुशाल बोंडे, वाघुजी गेडाम, संचालय बिरला मंूडा इंडेन गॅस एजन्सी, राजुरा, श्री. मिस्कील, जिल्हा पुरवठा अधिकारी, नुतन जिवने, पं.स. सदस्य, कोरपना, विजय सातदिवे, डी.जी.एम.नागपूर, अरविंद कुमार, एलपीजी सेल, वंदना बेरड, सरपंच, नांदगांव, नरेश सातपुते, सरपंच, कवठाळा यांचे हस्ते गोवरी, पोवनी साखरी (वा.), वरोडा, पेल्लोरा, मारडा, नांदगांव, कवठाळा, कोलगांव, निंबाळा, गाडेगांव, बोरगांव या ग्रामीण भागातील 63 महिला लाभाथ्र्यांना इंडेन गॅसचे वाटप करण्यात आले. 
या प्रसंगी ना. अहीर यांनी शासनाच्या विविध लोकाभिमुख योजना ज्यामध्ये प्रामुख्याने आयुष्यमान भारत तसेच प्रधान मंत्राी आवास (ग्रामीण) व शासनाच्या उत्तम धोरणामुळे शेतमालाला खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळत असल्याचा आवर्जुन उल्लेख केला. अंबुजा प्रकल्पातील नांदगांव, कवठाळा परिसरातील अधिग्रहीत जमीनीला हक्काचा भाव मिळवून देण्याचा उल्लेख केला. आमदार अॅड. संजय धोटे यांनी परिसरातील वरोडा, कवठाळा सबस्टेशनच्या कामाचा उल्लेख करीत गडचांदूर, भोयगांव रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले. 
कार्यक्रमाला परिसरातील शेकडो महिला व पुरूष नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग होता. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृष्णा गेडाम, अॅड. प्रशांत घरोटे, वैभव जमदाडे, संजय चैधरी, सुदर्शन बोबडे, संदीप कावळे, संजय कोहपरे, दिलीप येलमुले, लक्ष्मण थेरे, संतोष भोयर, गणेश खोकले, स्नेहल बोबडे, श्री. राखुंडे, आशिष वानखेडे, श्री. मडावी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन अॅड. प्रशांत घरोटे यांनी तर आभार प्रदर्शन वसीम खान यांनी केले.