সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, January 26, 2014

चंद्रपुरात गुरुवारपासून बाल साहित्य संमेलन

चंद्रपुरात गुरुवारपासून बाल साहित्य संमेलन

चंद्रपूर : लोकमान्य टिळक स्मारक समितीतर्फे बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे स्मृतिप्रीत्यर्थ शहरात पहिल्यांदाच ३0 जानेवारी ते १ फेब्रुवारीपर्यंत बाल साहित्य समेलनाचे आयोजन करण्यात आले.
 लोकमान्य टिळक विद्यालय (सिव्हील लाईन) येथे आयोजित समेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिध्द लेखक (बिर्‍हाडकार) अशोक पवार होते.
आपल्या संस्कृतीची, साहित्याची आवड तसेच त्याबद्दलची माहिती बालवयापासूनच व्हावी. महाराष्ट्रातील संतश्रेष्ठ, कवी, लेखक यांच्या साहित्याचा प्रभाव त्यांच्यावर व्हावा . व यातूनच त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण व्हावी, या हेतूने बाल सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार ३0 जानेवारीपासून सुरू होणार्‍या या साहित्य संमेलनानिमित्त दुपारी ३ ते ४.३0 वाजेपर्यंत संपूर्ण नगरात ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५.३0 वाजता डॉ. शरदचंद्र सालफळे यांच्या हस्ते सम्मेलनाचे उद््घाटन होणार आहे. यावेळी स्वागताध्यक्ष डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार, प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, रा.स्व.संघाचे मुख्य कार्यवाह अँड. रवींद्र भागवत उपस्थित राहणार आहेत. शुक्रवार ३१ जानेवारीला सकाळी ९ वाजता पाहिल्या सत्राला सुरवात होणार असून यामध्ये हिंदी व इंग्रजी भाषेत कथाकथन व कविसम्मेलन आयोजित करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी डॉ. सुनीता बन्सोड राहणार आहेत. सकाळी ११ वाजता 'कसा मी? असा मी' या विषयाला अनुसरुन सुप्रसिद्ध लेखक, कवी,नाटककार डॉ. राजन जयस्वाल तसेच नाट्य कलावंत व दिग्दर्शक प्रा. जयश्री कापसे-गावंडे यांची प्रगट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. तिसर्‍या सत्रात दुपारी १.४५ वाजता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी 'आधुनिक काळात वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे का? या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून अध्यक्षस्थानी डॉ. परमानंद बावनकुळे राहणार आहेत. सत्र ४ दुपारी ३.१५ वाजता शिक्षकांकरिता कविसंमेलन आयोजित करण्यात आले असून याचे अध्यक्षस्थानी डॉ. पद्मरेखा धनकर वानखेडे भूषविणार आहे. दुपारी ४.३0 पासून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, १ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता मराठी व संस्कृत या भाषेत कथानिर्झर सादर करण्यात येणार असून अध्यक्षस्थानी मो. बा. देशपांडे राहणार आहे.
सकाळी १0.१५ वाजता 'काव्यफुलोरा' या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून अध्यक्षस्थानी इरफान शेख राहणार आहे. तिसर्‍या सत्रात दुपारी १२.३0 वाजता 'मोबाईल आणि संगणक यामुळे मी व माझ्या घरातील संवाद संपला आहे काय?' या विषयावर आधारित परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून अध्यक्षस्थानी डॉ. इसादास भडके राहणार आहे. दुपारी १.४५ वाजता गीतगंगेचे आयोजन करण्यात आले असून दुपारी ३.३0 पासून समारोप सत्राला प्रारंभ होणार आहे. या सत्रात प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा परिषदेच्या कार्यपालन अधिकारी संपदा मेहता व प्रमुख वक्ते डॉ. शाम मोहरकर उपस्थित राहणार आहेत. या बाल साहित्यसंमेलनाला जिल्ह्य़ातील साहित्यप्रेमींनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे ,असे आवाहन लोकमान्य टिळक स्मारक समितीचे उपाध्यक्ष अँड. चंद्रकांत देशमुख, सहसचिव दत्तप्रसन्न महादाणी, कोषाध्यक्ष श्रीपाद मुनगंटीवार, प्राचार्य आर.पी.राठोड, मुख्याध्यापक अर्चना रोडे व रश्मी कावडकर यांनी केले आहे

Saturday, January 25, 2014

विदर्भाच्या बाजूने ९७ टक्के कौल

विदर्भाच्या बाजूने ९७ टक्के कौल

मतदान      १,९५,0५५
बाजूने         १,८८,१९८
अवैध         १३२
तटस्थ       ३,१0१
विरोधात    २,६२४

चंद्रपूर : ज्येष्ठ नागरिक संघाच्या पुढाकाराने वेगळया विदर्भ राज्यासंदर्भात घेतलेल्या जनमत चाचणीतून चंद्रपूरकरांनी विदर्भाच्या बाजून कौल दिला. ९७ टक्के चंद्रपूरकरांनी वेगळ्या विदर्भ राज्याच्या बाजूने मतदान केले. अमरावती, नागपूर व त्यानंतर चंद्रपुरात जनमताचा कानोसा घेण्यासाठी हा उपक्रम राबविला होता. तो यशस्वी ठरल्याचे चित्र यातून पुढे आले आहे.
स्थानिक एफईएस गर्ल्स महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी ९ वाजेपासून मतमोजणीला सुरूवात झाली. तब्बल ११ फेर्‍यांनतर सायंकाळी ४.१५ वाजता ही प्रक्रिया पूर्ण झाली. चंद्रपूर महानगर पालिकेच्या हद्दीतील एक लाख ९२ हजार ५५ नागरिकांनी गुरूवारी झालेल्या जनमत चाचणी प्रक्रियेत भाग घेतला. आजच्या मतमोजणीत एक लाख ८८ हजार ८२२ मते वैध, तर १३२ मते अवैध ठरली. एक लाख ८८ हजार १९८ मतदारांनी विदर्भ राज्याच्या बाजूने कौल दिला. ही टक्केवारी एकूण मतदानाच्या ९६.९५ टक्के आहे. तर विरोधात २ हजार ६२४ मते पडली. ३ हजार १0१ मतदारांनी मतदान केले मात्र मतपत्रिका कोरी ठेवून या विषयावर तठस्थता दर्शविली.
ज्येष्ठ नागरिक संघाने या उपक्रमासाठी निवडणूक आयुक्त म्हणून अँड. विजय मोगरे, उपआयुक्त म्हणून डॉ. गोपाल मुंधडा तर, मतमोजणी प्रमुख म्हणून प्राचार्य प्रभू चोथवे यांची नियुक्ती केली होती. मतदानादरम्यान प्रा. योगेश दुधपचारे, बंडू धोतरे, अशोक मुसळे, प्रा. सुधाकर अडबाले, रत्नमाला बावणे यांची निवडणूक विभाग प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली होती. आज या सवारंची उपस्थिती होती.
मतमोजणीदरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना निवडणूक आयुक्त अँड. विजय मोगरे म्हणाले, सर्वारनी चोखपणे जबाबदारी बजाविल्याने हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडता आल्याचे सांगितले. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रामदास रायपुरे यांनी या उपक्रातील सहभागाबद्दल चंद्रपूरकरांचे आभार मानले.

1 गेल्या महिनाभरापासून या चाचणीसाठी तयारी सुरू होती. ज्येष्ठ नागरिक संघाने या कामी पुढाकार घेतला. त्याला शहरातील सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, युवक, विद्यार्थ्यांनी पाठिंबा देत ही चाचणी यशस्वी केली. त्यासाठी २३ जानेवारीला मतदान पार पडले.

2चंद्रपूर शहराच्या हद्दीत एकूण २७५ मतदान केंद्र उभारण्यात आले होते. मोबाईल बुथचीही व्यवस्था होती. एसएमएस पाठवून या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत एक हजार ३४३ जणांनी एसएमएस पाठवून मतदान केले. त्यातील फक्त एक मत विरोधातील होते.

3चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. डॉ. अशोक जिवतोडे, फिमेल एज्युकेशन सोसायटीचे अँड. विजय मोगरे यांनी विशेष पुढाकार घेतला. त्या पाठोपाठ डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचाही सहभाग महत्वाचा होता.

मतमोजणीलाही प्रचंड प्रतिसाद
एफईएस गर्ल्स महाविद्यालयात शुक्रवारी सकाळी ९ वाजता सुरू झालेली मतमोजणी सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू होती. यात ६0 शिक्षक-प्राध्यापकांसह २0 विद्यार्थी सहभागी होते.

Thursday, January 23, 2014

चिमुकल्याने वाचविले  प्राण

चिमुकल्याने वाचविले प्राण

साडेचार वर्षीय चिमुकल्याने वाचविले
अडीच वर्षीय चिमुकल्याचे प्राण

MORU.jpg प्रदर्शित करत आहे SAHIL.jpg प्रदर्शित करत आहे

नागपूर - महावितरणच्या आर्वी विभागातील कारंजा उपविभागिय कार्यालयात कार्यरत कारकुन राजेश पेंदामकर यांच्या फक्त साडेचार वर्षीय मुलाने दाखवलेल्या धैर्याचे कौतूक सर्वत्र होत आहे. साडेचार वर्षीय साहिलने त्याच्यापेक्षा लहान असलेल्या अडीच वर्षीय लहानग्याचा जीव वाचविले.
20 जानेवारी 2014 रोजी कारंजा येथील दाभा रोड वरील महावितरणच्या कार्यालया मागे असलेल्या संतोशी ले-आउट येथील श्री. मानमोडे यांच्या घरासमोरील टाक्यात अडीच वर्षीय मोरेश्वर ताटे खेळत असतांना तोल जावून टाक्यात पडला. 7 ते 8 फुट खोल असलेल्या टाक्यात मोरेष्वर ताटे गटांगळया खात होता. जवळच खेळत असलेल्या साहिलला हे दिसले व त्याने क्षणाचाही विलंब करता मोरेष्वरकडे धाव घेतली. प्रसंगावधान दाखवत साहिल याने लहानग्या मोरेष्वरचे केस पकडून त्याला पाण्यात बुडण्यापासून वाचविले. मोरू पाण्यात पडला. मोरू पाण्यात पडला ’, अशी आर्त हाक देत मदतीची हाक दिली. तेवढयात काही लोक धावुन गेले व लहान मोरूचा जीव वाचला.

साहिलने दाखवलेल्या साहसाचे सर्वत्र कौतूक होत आहे. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनी स्थानिक तहसिल कार्यालयाद्वारे साहिलचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. श्री. दत्ता मेघे फाउडेषनतर्फे साहिलचा सत्कार करण्यात आला आहे. महावितरणच्या नागपूर परिमंडळ कार्यालयाद्वारेही या साहसी चिमुकल्याचा सत्कार करण्यात येणार आहे. चिरंजीव साहिल हा स्थानिक राजीव गांधी मेमोरियल कान्व्हेंटचा के. जी. टूचा विद्यार्थी आहे.
राहुल गांधी उद्या वर्धेत

राहुल गांधी उद्या वर्धेत

सेवाग्राम रुग्णालयाच्या मैदानावर शुक्रवारी (२४ जानेवारी) राज्यातील काँग्रेस पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत तळागळातलया कार्यकर्त्यांची मते जाणून जाहीरनामा तयार करण्याच्या दृष्टीने आयोजित बैठकीत काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी येणार असल्याचे संकेत आहेत.
बैठकीला राज्यभरातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, जि. प., पं. स. व नगरपरिषद सदस्य आणि प्रदेशचे पदाधिकारी अशा निवडक लोकांना आमंत्रित केले जाणार आहे. तत्पूर्वी सेवाग्राम पंचायत राज शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात देशभरातील २५0 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. पंचायत राज शिबिराला सकाळी ११ वाजता खा. राहुल गांधी उपस्थित राहतील. या ठिकाणी सुमारे एक तास शिबिरार्थींशी चर्चा करतील. यानंतर ते पदाधिकार्‍यांच्या बैठकीला उपस्थित राहून त्यांच्याशी संवाद साधतील.
विदर्भ राज्यासाठी चंद्रपुरात जनमत चाचणी

विदर्भ राज्यासाठी चंद्रपुरात जनमत चाचणी

२४0 बुथ : मोबाईल बुथही राहणार, २४ ला मोजणी

चंद्रपूर : विदर्भ राज्याच्या बाजूने असलेले जनमत अजमाविण्यासाठी गुरूवारी विदर्भ जनमत चाचणी घेतली जात आहे. ज्येष्ठ नागरिक संघाच्या पुढाकाराने होणार्‍या या जनमत चाचणीसाठी तयारी पूर्ण झाली आहेत.
चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रामध्ये हे जनमत घेतले जाणार आहे. त्यासाठी २४0 बुथ उभारले जाणार आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक ही जबाबदारी पार पाडतील. गुरूवारी सकाळी ९ वाजेपासून या जनमत चाचणीला सुरूवात होईल. ती सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालेल. आवश्यक्ता भासल्यास गरजेनुसार ही वेळ वाढविली जाईल, असे आयोजकांनी सांगितले आहे.

सरकारी कर्मचार्‍यांना मतदान करणे सोईचे व्हावे यासाठी शासकीय कार्यालयांपुढे मोबाईल बुथ ठेवले जातील. एका वाहनावर ही यंत्रणा बसविलेली असून ते वाहन दिवसभर कार्यालयासमोर ठेवले जाणार आहे. या सोबतच उद्या गुरूवार असल्याने मंदीरात होणारी गर्दी लक्षात घेता तिथेही दिवसभर मोबाईल बुथ ठेवले जाणार आहे. यासोबतच मस्जिद, बौद्ध विहार याठिकाणीसुद्धा बुथ ठेवले जाणार आहे.

अन्य निवडणुकामध्ये मतदारांच्या बोटावर शाई लावली जाते त्या धर्तीवर मतदारांना मतदारांची खुण पटविली जाणार आहे. मतपत्रिका तयार केली असून त्यावर होय अथवा नाही असा शेरा मतदारांना नोंदवायचा आहे. नागरिकांनी आपला कौल दर्शवावा, अशी विनंती आयोजकांनी केली आहे.

Wednesday, January 22, 2014

उद्दिष्ट ३६ कोटींचे; वसुली ४१ कोटी

उद्दिष्ट ३६ कोटींचे; वसुली ४१ कोटी

पंकज मोहरीर, चंद्रपूर 

चंद्रपूर महापालिका हद्दी क्षेत्रात एलबीटी (स्थानिक संस्था कर) लागू होऊन एक वर्षाहून जास्त काळ झाला. यंदाच्या वर्षी एलबीटीतून ३६ कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात ४१ कोटी ६१ लाख ८९ हजार ९०० रुपयांची वसूली झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान एलबीटी दरात घट झाल्याने आगामी काळात वसुलीत घटीची शक्यता वर्तविली जात आहे. 

चंद्रपूर महापालिका क्षेत्रात स्थानिक व्यापाऱ्यांनी एलबीटीला सुरुवातीला प्रखर विरोध केला. त्यासाठी बेमुदत बंद मोर्चे काढले. परिणामी एक जुलै २०१२ पासून लागू होणारा एलबीटीस मुदतवाढ मिळाली. एक नोव्हेंबर २०१२ पासून चंद्रपूरसह लातूर व परभणी महापालिका क्षेत्रात स्थानिक संस्था कर लागू करण्यात आला. मात्र यात चंद्रपूर महापालिकेने आघाडी घेतली आहे. १ नोव्हेंबर २०१२ पासून ३० नोव्हेंबर २०१३ पर्यंत ३६ कोटींचे उद्दिष्ट महापालिकेने निश्चित केले होते. मात्र प्रत्यक्षात त्यात मोठी वाढ दिसून आली असून ४१ कोटी ६१ लाख ८९ हजार ९०० रुपयांची एलबीटीची वसुली झाली. सध्या महापालिका क्षेत्रात ३ हजार १६५ व्यापाऱ्यांनी एलबीटीसाठी नोंदणी केली आहे. वर्षभरात सर्वाधिक एलबीटी मार्च २०१३ मध्ये वसूल झाला. या महिन्यात ७ कोटी १२ लाख ३४ हजार ८७९ कोटी रुपये एलबीटीपोटी मिळाले. यातील ४ कोटी एकट्या महाऔष्णिक विद्युत केंद्राकडून मिळाले असल्याची माहिती एलबीटी अधिकारी देवानंद कांबळे यांनी मटा शी बोलताना दिली. एलबीटी बुडविणाऱ्या चार जणांकडून दंड वसुली करण्यात आली. दंड व वसुलीपोटी १ लाख ३१ हजार १९५ रुपये प्राप्त झाल्याचेही त्यांनी सांगितले. 

१० सप्टेंबर २०१२ पासून एलबीटीचे मुख्य वस्तूंवरील दर ५० टक्क्यांनी तर उर्वरित वस्तूंवरील दर २५ टक्क्यांनी कमी झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात एलबीटीत घटीची शक्यता आहे. पण व्यापारी नोंदणीच्या संख्येत वाढ होत असून एलबीटी वसुलीत घटीची शक्यता महापालिका आयुक्त प्रकाश बोखड यांनी फेटाळून लावली. 

महापालिकेचे उपायुक्त राजेश मोहिते एलबीटी अधिकारी देवानंद कांबळे यांच्या नेतृत्वात महापालिकेने एलबीटी थकबाकी संदर्भात धडक मोहीम सुरू केली असून मागील आठवडाभरात १५ ते २० लाखांची थकबाकी वसूल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यात मुंबई वगळता बहुतांश महापालिकेत एलबीटी लागू झाला आहे. मात्र यासंदर्भात नोंदणी व कर न भरणाऱ्यांवर धाड टाकून जप्तीचे अधिकार महापालिकेला नाहीत. सरकारच्या मंजूरीनंतरच सदर कारवाई होऊ शकते. त्यामुळे एलबीटी न भरणाऱ्या व व्यापाऱ्यांची नावे पत्रासह महापालिकेने पाठविली आहेत.
आज प्रहारचे एसीसी विरोधात  आंदोलन

आज प्रहारचे एसीसी विरोधात आंदोलन

चंद्रपूर,: नकोडा येथील एसीसी सिमेंट कंपनी व्यवस्थापनाच्या अन्यायकारक भुमिकेविरोधात प्रहार संघटनेतर्फे बुधवार, २२ जानेवारीला सकाळी ११ वाजता नकोडा ते नायब तहसीलदार कार्यालय घुग्घूसपर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्थानिक बेरोजगार युवकांना या उद्योगामध्ये रोजगार देण्याचे निर्देश देण्यात यावे, यापूर्वीच्या नोकरभरतीमध्ये स्थानिकांना डावलून परप्रांतीयांना रोजगार देण्यात आला. या प्रकरणाची चौकशी करून दोषी व्यवस्थापनावर कठोर कारवाई करण्यात यावी, या उद्योगामुळे वर्धा नदीचे पाणी तसेच वायू प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे या व्यवस्थापनावर प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश प्रदूषण नियंत्रण विभागाला देण्यात यावे, या उद्योगामुळे नकोडा ग्रामवासीयांना वर्षानुवर्षे आरोग्य व अन्य समस्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र, व्यवस्थापनाने नकोडा गाव वगळून दूरच्या इतर गावांना दत्तक घेवून कल्याणकारी योजना राबविल्या आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, या उद्योगाच्या वेल्फेअर, सीएसआर निधीतून नकोडा गावाला रुग्णवाहिका, ऑटो व बसस्टँड आदी सुविधा देण्यात याव्यात, या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी, पोलिस निरीक्षक घुग्घूस, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक, विभागीय प्रदूषण नियंत्रण कार्यालयाचे प्रादेशिक अधिकारी यांना देण्यात येणार आहे.
या मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने भाग घ्यावा, असे आवाहन प्रहारचे जिल्हाध्यक्ष पप्पू देशमुख, जिल्हा संघटक फिरोज खान पठाण, नकोडा येथील प्रहारचे कार्यकर्ते विनोद कांबळे, सतीश चोपणे, किशोर बांदूरकर आदी कार्यकर्त्यांनी केले आहे.

Tuesday, January 21, 2014

पतीचा गळा आवळून खून

पतीचा गळा आवळून खून

व्यसनाला कंटाळून काढला प्रवीणचा काटा

पत्नी व सासरा अटकेत : धानोरा येथील घटना

घुग्घुस : पित्याच्या मदतीने आपल्याच पतीचा गळा आवळून खून केल्याची घटना धानोरा येथे सोमवारी उजेडात आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मृताची पत्नी व सासर्‍याला अटक केली आहे. प्रवीण जनार्दन निखाडे (३५) असे मृताचे नाव असून तो चंद्रपूर येथील बालाजी वॉर्डातील रहिवासी आहे.
घुग्गूसजवळील धानोरा येथील रहिवासी वासुदेव धर्मा वासाडे याच्या मंदा नामक मुलीशी झाला होता.
प्रवीण चंद्रपूरवरून सासुरवाडी धानोरा येथे शनिवारी रात्री गेला. तेथे त्याचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाला. दारू पिवून तो अंगणात पडला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला, अशी बतावणी प्रवीणची पत्नी मंदा व सासरा वासुदेव वासाडे या दोघांनी केली. मात्र मृताचा भाऊ अशोक निखाडे याने संशय व्यक्त करून घुग्घूस पोलिसांकडे तक्रार केली.
त्यावरून ठाणेदार अजित लकडे यांनी तपासचक्रे फिरविली आणि अवघ्या २४ तासात खुनाचा प्रकार उघडकीस आणला.
वासुदेववासाडे व मंदा निखाडे यांना चंद्रपूर येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ठाणेदार लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वाठणकर तपास करीत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन, विभागीय पोलीस अधिकारी राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अजित लकडे, पी.एस.आय. वाठणकर, डी.बी.चे पंडीत वराटे, बंडू मोहुर्ले, स्वप्नील गुरीले, महिला पोलीस तब्बू कुरेशी, विद्या गेडाम, वैशाली खाडे, लोकेश्‍वरी मोदक, वैशाली पाटील यांची या प्रकरणाच्या तपासात महत्वाची भूमिका बजावली.

 प्रवीण नेहमी दारू पिवून पत्नीला मारहाण करीत असे. याबाबत सासरा वासुदेव वासाडे याने अनेकदा समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रवीणकडून होणारा छळ थांबला नाही. हा प्रकार असहाय्य झाल्याने शनिवारी रात्री पत्नी मंदा व सासरा वासुदेव या दोघांनी संगनमत करून त्याचा गळा आवळून केला. ही बाब तपासात उघड झाली. त्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून दोघांनाही अटक केली. प्रवीणच्या व्यसनाला कंटाळून काढला काटा घुग्घुस कॉलरी परिसरात तलवारी निघाल्या ■ येथील घुग्घुस कॉलरी परिसरातील शास्त्रीनगर परिसरात गेल्या अनेकांनी पक्के घर बांधून अतिक्रमण केले. याकडे वन खात्याचे दुर्लक्ष झाल्याने दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत असून त्यातून वाद निर्माण होत आहे. जुने व नविन अतिक्रमणधारकांमध्ये भांडणे होत आहेत. यातूनच आज या ठिकाणी तलवारी निघाल्या. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरणनिर्माण झाले होते. हा प्रकार गंभीर असला तरी पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. ही घटना सोमवारी (दि. २0) दुपारी १ वाजताच्या दरम्यान घडली. एका नागरिकाने सदर घटनेची माहिती घुग्घुस पोलीस ठाण्यात दूरध्वनी वरून दिली. हा गंभीर प्रकार असला तरी घटनास्थळी पोलीस उशिरा पोहचले. सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर रोष व्यक्त केला जात आहे.
दु:खितांच्या हाती दिली मशाल..

दु:खितांच्या हाती दिली मशाल..

दु:खितांच्या हाती दिली मशाल..

भटक्या विमुक्त जातीतले साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या अशोक पवार यांनी पीडित, शोषित समाजाच्या वेदना आपल्या कादंब-यांतून मांडल्या. या समाजाचं दु:ख कवितेतून मांडणा-या ढसाळ यांना त्यांनी केलेला सलाम-
१९९५ मध्ये परभणीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. तिथे मी आणि माझे मित्र गंडले गेलो होतो. संमेलनात पुस्तकाच्या दुकानात पुस्तकं चाळता चाळता, बघता बघता ढसाळ यांचं ‘गोलपिठा’ हाती लागलं. तीन दिवस साहित्य संमेलनात राहून घरी गेलो ‘गोलपिठा’चं पान उघडलं. पहिल्या ओळीपासून सुरुवात केली अधाशासारखं ‘गोलपिठा’ वाचलं. ‘गोलपिठा’ने फार अस्वस्थ केलं. हादरून गेलो. जगात आपल्यासारखे अनेक लोक जगतात. आपण कुठल्या युगात जगतोय, असे न सुचणारे प्रश्न मला ‘गोलपिठा’वाचून व आपलं आयुष्य भोगून पडलेले. नंतरच्या काळात जवळजवळ मी त्यांची पुस्तकं वाचली. १९९७ मध्ये मुंबईत एका कार्यक्रमात ढसाळांची भेट झाली. बोललो काहीच नाही. पुढे नागपूरलाही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होते. तेथे ढसाळ यांची मुलाखत बघितली. मुलाखतकार सतीश काळसेकर होते. कादंबरीमध्ये अरुण साधू व भालचंद्र नेमाडे मला आवडतात. नागनाथ कोतापल्ले ही माझे आवडते लेखक आहेत, तर कविता मला नारायण सुर्वे व नामदेव ढसाळांचीच आवडली. सुर्वेच्या व ढसाळांच्या कवितांचा बाज कोणीच तोडलेला मला आठवत नाही व तसं माझ्या वाचण्यात आलं नाही, नामदेव ढसाळांनी शोषित, पीडित, दलित, मोडलेल्या माणसांचं जगणं आपल्या साहित्यात मांडलं.
ढसाळ यांचं लेखन सर्वहारा परिवर्तनाचे विचार पावलोपावली ठेवत जगण्याचं आत्मभान देतं. हे आत्मभान समाजपरिवर्तन, मानवी जीवनातील परिवर्तन आणि वैचारिकतेशी निरगाठ बांधणारं आहे, त्यामुळे त्यांचं लेखन दलित साहित्य प्रवाहातील एक बहुआयामी आणि मैलाचा दगड ठरतो. लेखनासाठी शासनाने त्यांना अनेक वेळा पुरस्कृत केलं तर साहित्य अकादमीने त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानीत केलं. भारत सरकारने त्यांना साहित्यासाठी पद्मश्री दिलं. सोव्हिएत लँड नेहरू हा पुरस्कारही त्यांना प्राप्त आहे. नकार विद्रोह व माणूसपणाची बिजं त्यांच्या साहित्यात ठासून भरलेली होती. मानवमुक्तीच्या लढय़ासाठी अमेरिकेत ब्लॅक पँथरची निर्मिती करण्यात आली. दलित पँथरच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. ढसाळ ‘दलित पँथर’शी अखेपर्यंत एकनिष्ठ राहिले. जातीयवादाच्या विषवल्लीत भारतात माणसाला काहीच किंमत नाही, राजकारणाच्या मैदानात हा कलावंत निवडून आला असता किंवा त्याने संधी दिली असती तर कदाचित चित्र वेगळं राहिलं असतं. त्यांची पुस्तकं जगभरात शिकविली जातात. वाचली जातात, त्या माणसाला राजकारण्यात फेल केलं जातं. पुढे येऊ दिलं जात नाही. विचारवंत, दृष्टी असणारा माणूस राजकारणात यशस्वी होणार नाही, तोपर्यंत समूळ परिवर्तन कसं शक्य आहे, असं मला वाटल्यावाचून राहत नाही व त्यात सत्यताही आहे.
शोषितांच्या वास्तव जीवनाची जाणीव नामदेव ढसाळांनी भौतिकवादी आशयाच्या अंगाने आविष्कृत केली आहे. वीतभर पोटाला भरण्यासाठी जीवनभर जी कष्टप्रद संघर्षाची पायवाट चालावी लागते, त्याच जीवनानुभवाची जाणीव नामदेव ढसाळ यांनी मांडलेली दिसते, त्यामुळे कधी अर्धपोटी, तर कधी उपासमार करत जगणा-या शोषित लोकांचं चित्र त्यांनी प्रभावीपणे आपल्या लेखनात चित्रित केलं आहे. व्यक्तिस्वातंत्र्य हा मानवाचा मूलभूत अधिकार असला तरी विषमतावादी समाजव्यवस्थेने तो त्यांच्या वाटय़ाला घातलेला नाही. साहित्यात नामदेव ढसाळांनी त्याच्या विरोधात हाक दिली. आयुष्याने नेहमी अस्वस्थ ठेवलेल्या ढसाळ यांची या व्यवस्थेने नेहमी फसगत केली आहे. ती त्यांची एकटय़ाची फसगत नाही, तर पिढय़ान् पिढय़ा शोषणाच्या गर्तेत खितपत पडलेल्या जातीपातीच्या उतरंडीत त्याची बीजे पेरली गेलेली होती आणि आहेत यात दुमत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यांच्यावर अढळ श्रद्धा ठेवून त्यांचा लेखनप्रवास सुरू होता. बुद्धाने सांगितले, जे निर्माण झाले ते नष्ट होणार आहे. सर्वानाच एकना एक दिवस मृत्यू आहे. पण नामदेव ढसाळांना आयुष्य कमी मिळाले. अवघ्या ६४व्या वर्षी ते गेले. त्यांच्या जाण्याने दलितच नव्हे तर एकूणच मराठी साहित्याची फार मोठी हानी झाली. ती आता कधीही भरून निघणार नाही एवढे मात्र खरे. साहित्यात परंपरागत साहित्याच्या विरोधात बंड करणा-या कवींच्या जाण्याने माझ्यासह अनेकांच्या मनाला चटका लागलेला आहे. बंड करूनच ते शिवसेनेकडे वळले, तेव्हा अनेक जण हादरले होते.
सामाजिक विषमतेच्या मुळावरच घाव घालून मानवी समतेचा जीवनाशय फुलवण्यावर ढसाळ यांची नजर होती. आत्मपिडेचे वेदनामयी गाणे अधोरेखित करताना सामाजिक स्तरावरील विषमतेकडे ते दुर्लक्ष कधीच करत नसत. तो त्यांच्या लेखनाचा गाभा होता. जातीजातीत, वाटलेल्या वाडय़ांत, वस्त्यांत, झोपडपट्टय़ांत विभाजित झालेल्या शोषित समाजाचा ढसाळ एक घटक होते. त्या दलित, पीडित जीवनातूनचत्यांचे जीवन आकाराला आलेले आहे. जातीपातीच्या वणव्यात पिचत चाललेला आर्थिक कुचंबणेने गुदमरलेला, जीवनावश्यक गोष्टींच्या किमान पूर्तीला महागलेला व्यथित, शोषित, पीडित ढसाळांच्या लेखनाच्या केंद्रस्थानी होता, हे विशेष आहे. त्यांचे लेखन नेहमी शोषितांच्या बाजूनेच राहिले, त्यापासून तसूभरही ढळले नाही.
माणूस हा नामदेव ढसाळांच्या लिखाणाचा एक जिवंत, जातिवंत घटक आहे. या घटकावर त्यांचा पूर्णपणे विश्वास असल्यामुळे जातिभेदविरोधात व शोषित-पीडितवर्गाचे प्रतिनिधित्व करताना दिसते.लोकशाही कोणत्या गाढविणीचे नाव आहे, अशी पहिली किंकाळी फोडून नामदेव यांनी येथली व्यवस्था हादरून टाकली. अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजा माणसाला पूर्ण करता येत नाही ते स्वातंत्र्य, ती लोकशाही काय कामाची, हे नामदेव ढसाळांनी आम जनतेला पटवून सांगितले. ‘शेवटी तुझे बोट धरून चाललो आहे मी’ या काव्यसंग्रहात बाबासाहेबांनी हजारो वर्षाच्या इतिहासाला वैचारिक नेतृत्वाने पालथे करून सन्मार्गाने जगायला शिकविले. ज्यांनी कालपर्यंत गुलामीचा, क्रॉस खांद्यावर घेऊन अंधारयात्री होऊन शतकांचा प्रवास गाठला, त्यांना क्रांतिकारी उजेडाची मशाल बहाल करून जगण्याचे नवे आकलन दिले. हे बाबासाहेबांचे कार्यकर्तव्य विषद करताना नामदेव म्हणतात,
कळीकाळाची आव्हाने स्वीकारून
कित्येक शतकांचा काळोख ओलांडून
तु घेऊन आला आम्हाला सुरक्षित स्थळापर्यंत
आज आमचे जे काही आहे
ते सर्व तुझेच आहे.
दीनदु:खितांचा हात मशाल देणा-या व बहुआयामी व्यक्तिमत्त्व असणा-या नामदेव ढसाळ नावाच्या पँथरला माझा सलाम.
PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS
http://prahaar.in/collag/175876

Friday, January 17, 2014

 शनिवारीला ‘लिटील चॅम्प्स’ची सुरेल मैफल रंगणार

शनिवारीला ‘लिटील चॅम्प्स’ची सुरेल मैफल रंगणार

चंद्रपूर,
सुप्रसिद्ध दूरचित्र वाहिन्यांच्या ‘लाईव्ह’ कार्यक्रमांतील ‘लिटील चॅम्प्स’ पहिल्यांदाच चंद्रपूर शहरात येत असून, शनिवारी सायंकाळी चांदा क्लब मैदानावर आयोजित ‘चंद्रपूर फेस्टीव्हल १४’ या संगीताच्या सुरेल मैफलीत ते रंग भरणार आहेत. संकल्प लोकसेवा प्रतिष्ठानच्या या नि:शुल्क कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. सुभाष धोटे, तर उद्घाटक म्हणून पालकमंत्री संजय देवतळे राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलिस अधीक्षक राजीव जैन, जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष कुंभरे, माजी आमदार रामदास तडस, ज्येष्ठ विधिज्ज्ञ ऍड. रवींद्र भागवत, उपमहापौर संदीप आवारी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, कॉंगे्रसचे ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रय, मनपा स्थायी समिती सभापती रितेश तिवारी, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष हर्षवर्धन सिंघवी, चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोक जिवतोडे, मनसेचे जिल्हाध्यक्ष विजय मराठे प्रभृती उपस्थित राहणार आहेत.
संकल्प लोकसेवा प्रतिष्ठानच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त ‘लिटील चॅम्प्स’ चा हा कार्यक्रम होऊ घातला आहे. या कार्यक्रमात मुग्धा वैशंपायन (मुंबई), अजमत हुसैन (जयपूर), बरनाली (भुवनेश्‍वर) व समृध्दी इंगळे (चंद्रपूर) हे लहानगे ‘चॅम्पीयन’ गायन करणार आहेत. त्यांच्या सोबतील नागपूर येथील अनिरुध्द जोशी असणार आहेत. या कार्यक्रमाला लहानमोठ्या सर्वांनीच मोठ्या संख्येत उपस्थित रहावे, असे आवाहन संकल्प लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश मेंढे, उपाध्यक्ष संजय रामगिरवार, सचिव सुभाष कासनगोट्टूवार तथा सदस्य संजय वैद्य, भारती नेरलवार, ऍड. वर्षा जामदार व मंजुश्री कासनगोट्टूवार यांनी केले आहे.

Thursday, January 16, 2014

श्री श्रींच्या प्रवचनात मोदींचा प्रचार

श्री श्रींच्या प्रवचनात मोदींचा प्रचार

चंद्रपूर : 'व्होट फॉर बेटर इंडिया' असा फलक आपल्या मंचावर झळकावीत आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते गुरू श्री श्री रविशंकर यांनी सरकार चालविण्यासाठी अनुभवी आणि सक्षम नेतृत्व हवे असल्याचा राजकीय संदेश बुधवारी आपल्या प्रवचनातून दिला. स्थानिक चांदा क्लब मैदानावर त्यांचे प्रवचन झाले. दरम्यान, श्री श्रींच्या प्रवचनात मोदींचाच प्रचार झाल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती.
01.jpg प्रदर्शित करत आहे

राहुल गांधी आपणास कधी भेटले नाही. नरेंद्र मोदी भेटले असल्याने त्यांना मी चांगले ओळखतो, असे सांगत मोदी यांनी गुजरातचा चांगला विकास केला, असेही ते म्हणाले. श्री श्री पुढे म्हणाले, एवढा मोठा देश चालविण्यासाठी खिचडी सरकार नसावे. सत्ताधारी व विरोधी या दोन्ही बाकावरील राजकीय माणसे परिपक्व असावी. देश चालविण्यासाठी अनुभवी पक्षाने पुढे यावे आणि जनतेने त्यांच्या पाठीशी उभे राहावे. भ्रष्टाचाराविरोधात उभे राहण्याचा संदेश देत त्यांनी 'व्होट फॉर बेटर इंडिया'चा नाराही दिला.

१२ कोटींची लोकसंख्या असलेल्या देशात केवळ ३0 ते ४0 टक्के मतदान होते, ही बाब योग्य नव्हे. सरकार ही माणसांनीच निर्माण केलेली व्यवस्था आहे. त्यामुळे ती मजबूत करा. भेदभाव करणारे, स्वार्थपणा जोपासणारे, काळा पैसा विदेशात नेणारे सरकार काय कामाचे, राजकारण शुद्ध असावे. जनमानसाची स्पंदने सरकारमध्ये दिसायला हवी. त्यासाठी उमेदवारी देण्यापूर्वी माणसे पडताळली जावी, असेही ते म्हणाले.

सत्संगदरम्यान श्री श्री रविशंकर यांनी उपस्थित श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. पारधी समुदायासाठी काम करणार्‍या यवतमाळातील दीनदयाल संस्थेला त्यांनी मदत दिली.

सोबतच तीन गावांसाठी बजरंगबलीची मूर्ती भेट दिली. विविध ठिकाणांवरुन सुमारे ३५ ते ४0 हजार भक्तसमुदाय उपस्थित होता. प्रवचनादरम्यान कुण्याही पक्षाचे नाव न घेता राजकीय मांडणी केली. श्री श्री रविशंकर यांनी कुणाचाही प्रचार केला नसला तरी त्यांचा अंगुलिनिर्देश मात्र मोदींकडेच होता.




पत्रकार परिषदेत आम आदमी पार्टीवर टिप्पणी करताना ते म्हणाले, लर्निंग लायसन्स असणार्‍या व्यक्तीला हिमालयातून वाहन चालविण्यासाठी सांगणे योग्य नव्हे. आम आदमी पार्टीला दिल्लीत संधी मिळाली आहे. त्यामुळे आता लोकांनी त्यांचे तेथील कार्य पाहिले व पारखले पाहिजे.

आसारामबापूंविषयीच्या एका प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, सीतेचे अपहरण करतानाही रावणाने साधूचे रुप घेतले होते. मात्र यामुळे सर्व संतांकडे अंगुलिनिर्देश करणे योग्य नाही. शंकराचार्य व साध्वी प्रज्ञा यांच्यावरही आरोप करण्यात आले होते. मात्र नंतर ते निर्दोष असल्याचे स्पष्ट झाले. लाच न घेणे आणि न देणे याविषयीची भक्तांना आपण शपथ देत असतोच, असेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेला गुरू वैश्यपायन, महापौर संगीता अमृतकर उपस्थित होते.

Wednesday, January 15, 2014

पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे निधन

पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे निधन

प्रख्यात कवी, विचारवंत आणि दलित पँथरचे संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे आज (बुधवारी) पहाटे चारच्या सुमारास निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. आतड्याच्या कर्करोगाने त्रस्त असलेल्या ढसाळ यांच्यावर बॉम्बे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ढसाळ यांच्या निधनाबद्दल सामाजिक, साहित्यिक व राजकीय क्षेत्रातून तीव्र दु:ख व्यक्त होत आहे. गेली अनेक वर्षे नामदेव ढसाळ मायस्थेनिया ग्रॅव्हीज या दुर्धर आजाराने ग्रस्त होते. त्या आजाराशी झुंजतच त्यांची वाटचाल सुरू होती. अलीकडे त्यांना कॅन्सरचा आजारही जडला होता. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्या प्रकृतीत सातत्याने चढउतार होत होते. सोमवारी प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र, त्यात यश आले नाही. ढसाळ यांचे पार्थिव उद्या (गुरुवारी) सकाळी ११ वाजता आंबेडकर महाविद्यालयाच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर चैत्यभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. *अल्पपरिचय* ढसाळ यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९४९ रोजी पुणे जिल्ह्यातील एका खेडेगावात झाला. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. त्यामुळे लहाणपणीच ते वडिलांसोबत मुंबईला आले. पुढे मुंबईतील गोलपीठा या रेड लाइट भागात त्यांचं बालपण गेलं. डॉ. आंबेडकरांवर नितांत श्रद्धा असलेले नामदेव ढसाळ ऐन तारुण्यातच दलित चळवळीकडे आकर्षित झाले. काव्य असो, गद्य असो की वृत्तपत्रांतील स्तंभलेखन असो, आपल्या साहित्यातून आंबेडकरांचे क्रांतिकारी विचार तितक्याच प्रखरपणे मांडण्याचे काम ढसाळ यांनी केले. अनियतकालिकांच्या चळवळीतही ते अग्रभागी होते. त्यांच्या क्रांतिकारी साहित्याची दखल जागतिक पातळीवरही घेतली गेली.

Tuesday, January 14, 2014

सुपर लॉजवर एलसीबीची धाड

सुपर लॉजवर एलसीबीची धाड

लॉजवर वेश्या व्यवसाय: ग्राहकांसह दोन महिलांना पकडले
चंद्रपूर : येथील जटपुरा वॉर्डातील सुपर लॉजवर आज सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास पोलीस अधीक्षक राजीव जैन यांच्या आदेशावरून रामनगर पोलिसांनी धाड घातली. या धाडीत वेश्या व्यवसाय करणार्‍या दोन महिला व दोन पुरुष ग्राहकांना ताब्यात घेतले.
अनिल किसन वैद्य (४0) रा. बाबुपेठ वॉर्ड व सुखदेव धनलाल पारधी (३0) रा. दुर्गापूर अशी आरोपीची नावे आहेत. त्यांच्याविरुध्द भादंविच्या कलम ११0, ११७ अन्वये गुुुुन्हा दाखल केला आहे. चंद्रपूर शहरातील जटपुरा वॉर्ड येथील सुपर लॉज येथे गेल्या अनेक दिवसांपासून वेश्या व्यवसाय सुरू होता. याबाबत पोलीस अधीक्षक राजीव जैन यांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यांनी याची दखल घेत रामनगर पोलिसांना ताबडतोब कारवाई करण्यास सांगितले. त्यानुसार रामनगर पोलिसांनी सोमवारी दुपारी सुपर लॉजवर धाड टाकली. धाडीत पोलिसांना दोन महिला व दोन पुरुष रूममध्ये आढळून आले. यावेळी पोलिसांनी लॉजमधील नोंदवहीचीसुद्धा तपासणी करण्यात आली. अलीकडे चंद्रपुरात काही लॉज व हॉटेल्समध्ये वेश्या व्यवसाय जोरात सुरू आहे. पोलिसांनी आज केलेल्या या कारवाईमुळे लॉजिंग व हॉटेल्समध्ये वेश्या व्यवसाय करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून सुपर लॉज येथे वेश्या आणल्या जात होत्या. फक्त दोन तासाकरिता या लॉजची रूम किरायाने मिळायची. तसेच चंद्रपूर तालुक्यातील लहान मोठय़ा गावामधूनसुध्दा वेश्या या ठिकाणी यायच्या.
यापूर्वी पोलिसांनी रात्रीच्या वेळी धाड टाकली होती. तेव्हा काहीच आढळले नव्हते. तेव्हापासूनच पोलिसांनी लॉजवर नजर ठेवली होती. विशेष म्हणजे, यापूर्वी याच वॉर्डातील लॉजमध्ये तीन वेश्या आढळून आल्या होत्या. त्यानंतर पोलिसांची कारवाई झाली नाही. त्यामुळे अलीकडच्या काळात पुन्हा हा व्यवसाय शहरात फोफावला होता.
ब्रह्मपुरी न. प. निवडणुकीत भाजपाची आघाडी

ब्रह्मपुरी न. प. निवडणुकीत भाजपाची आघाडी

भाजपा १०, तर स्वतंत्र विकास आघाडीला ९ कॉंग्रेसला अवघ्या एका जागेवर मानावे लागले समाधान तर राष्ट्रवादीला भोपळा
ब्रह्मपुरी, : ब्रम्हपुरी नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपाने उत्तम कामगिरी करून १० जागी विजय संपादन केला. अशोक भैयाप्रणीत स्वतंत्र विकास आघाडीला ९ जागा, तर आ. विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात पंजा चिन्हावर लढलेल्या कॉंग्रेसला केवळ एक जागा मिळाली. संदीप गड्डमवार, अशोक रामटेके यांच्या नेतृत्वात लढलेल्या राष्ट्रवादी-रिपाइं युतीला तर भोपळाही फोडता आला नाही.
गेल्या अनेक वर्षांपासून नगरसेवक असलेले रिपाइंचे अशोक रामटेके यांना विद्यमान न. प. उपाध्यक्ष स्वतंत्र विकास आघाडीचे सतीश हुमने यांनी पराभूत केले. तर स्वतंत्र विकास आघाडीच्या विद्यमान नगराध्यक्ष संदीप आमले यांना भाजपाचे प्रशांत ताम्हण यांनी पराजित केले. आ. विजय वडेट्टीवार यांचा पंजा चिन्हावर लढण्याचा आग्रह व अशोक भैया यांचा आघाडी करून लढण्याचा निर्णय कॉंग्रेसला पराजयाकडे घेऊन गेला.
सकाळी ११ वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर प्रभाग एक कुर्झा-बोंडेगावमधील चारही गटातील जागी भाजपा विजयी झाल्याने भाजपा गोटात उत्साह निर्माण झाला. भाजपा तालुका अध्यक्ष दीपक उराडे यांच्या पत्नी रिता दीपक उराडे नामाप्र गटातून २०२५ असे विक्रमी मतदान घेऊन विजयी झाल्या. त्यांनी स्वतंत्र विकास आघाडीच्या संगीता दिनकर खेत्रे (१०६५) यांना पराभूत केले. याच प्रभागात अनुसूचित जाती महिला गटातून स्वर्णलता किशोर बडोले, सर्वसाधारण क गटात भाजपाचे संजय मणिराम बावनकुळे यांनी अपक्ष उमेदवार व सध्या गुंठेवारीत अटकेत जेलमध्ये असलेले विलास विखार यांना पराभूत केले. बावनकुळे ११५८ तर विखार यांना ११५३ मते मिळालीत.
प्रभाग दोनमधील सर्वसाधारण ड गटात भाजपाचे विक्रम रामचंद्र कावळे यांचा विजय झाला. त्यांना ११२२ मते मिळाली. येथे द्वितीय स्थानावरील अपक्ष उमेदवार एकनाथ विखार यांना ६१२ मते मिळालीत. १० उमेदवार रिंगणात असलेल्या या गटात कॉंग्रेस उमेदवाराला फक्त २६७ मते मिळाली. प्रभाग क्रमांक २ टिळकनगर-धुमनखेडा (नामाप्र) प्रभागात भाजपाचे सुधीर रघुनाथ राऊत १३७७ मते घेऊन विजयी झाले. स्वतंत्र विकास आघाडीचे सुरेश रामचंद्र करंबे यांना १०१ मते मिळाली. कॉंग्रेसचे राकेश पडोळे ९१७ मते घेऊन तिसर्‍या स्थानावर गेले. राष्ट्रवादीचे वासुदेव सोंदरकर यांना ५१० मते मिळालीत. प्रभाग २ मधील सर्वसाधारण गटात भाजपाचे प्रशांत प्रभाकर ताम्हण यांनी अपक्ष उमेदवार दीनकर ऊर्फ बाला शुक्ला यांना पराभूत केले. ताम्हण यांना ९८९, तर शुक्ला यांना ९०० मते आहेत. विद्यमान नगराध्यक्ष संदीप आमले (स्व.वि.आ.) यांना ८०३, कॉंग्रेसचे दिघोरे यांना ७४२, तर राष्ट्रवादीचे आकरे यांना ५९३ मते आहेत.
सर्वसाधारण महिला गटात भाजपाच्या यास्मीन बहाद्दूर लाखाणी यांनी १४८३ मते घेऊन कॉंग्रेसच्या उमेदवार व माजी न. प. अध्यक्षा वनिता ठाकूर (१०१४) यांचा पराभव केला. सर्वसाधारण महिला गटात भाजपाच्या अनघा अविनाश दंडवते यांनी १४६४ मते घेऊन स्वतंत्र विकास आघाडीच्या कमल शंकरराव कावळे (११५५) यांचा पराभव केला. कॉंग्रेसच्या मेघना कार यांना ८३२ मते मिळालीत.
प्रभाग ३ रेणुका मातामधील चारही जागा स्वतंत्र विकास आघाडीने जिंकल्या. प्रतिभा फुलझेले (१२२७), योगिता बनपूरकर (१०८१), नरेंद्र कामथे (११२७), अशोक किसनलाल भैया (१३२८) अशी मते त्यांना मिळाली. प्रभाग ४ देलनवाडी येथे सतीश हुमने (१४९८, स्व.वि.आ.), रश्मी कैलास पेशने कॉंग्रेस ११९४, गिरीधर बोरकर स्व.वि.आ. ८९८, भाजपाच्या हेमलता अरविंद नंदूरकर १०७६ मते घेऊन विजयी झाले. प्रभाग ५ पेठवॉर्ड येथील विजयी उमेदवार नामाप्र भाजपाचे मनोज भुपाल, स्वतंत्र विकास आघाडी अंजली उरकुडे, विजय ढोक, अर्चना खंडाते असे आहेत. दरम्यान, प्रभाग ४ अनुजाती गटातील भाजपाचे अनिल गराडे १० मतांनी पराभूत झाल्याने त्यांनी फेर मतमोजणी मागितली. तसेच गुंठेवारीत अडकलेले विलास विखार (प्रभाग १) यांनी पाच मतांनी पराभूत झाल्याने फेर मतमोजणी मागितली. मात्र त्यातही त्यांना पराभव स्वीकारावा लागला.



Monday, January 13, 2014

दारुमुक्तीचा निश्चय करून चांगला माणूस बनावे : राणी बंग

दारुमुक्तीचा निश्चय करून चांगला माणूस बनावे : राणी बंग

कोरपना :-     दारूमुळे मेंदूवर अधिक परिणाम होत असतो परिणामात विवेकशक्तीचा नाश होतो, कॅन्सर चे प्रमाण वाढते मेणबत्ती सारखी दिसणारी शरीरयष्टीउदबत्ती सारखी होते, काही पुरुष व्यसनधीनतेमुळे अनैतिक संबधाकडे वळत आहे तेव्हा दारुमुक्तीचा निश्चय करून प्रत्येकाने चांगला माणूस बनण्याचा निश्चय केला पाहिजे असे मत समाजसेविका महाराष्ट्रभूषण डॉ राणी बंग यांनी गडचांदूर येथील दारू व्यसन मुक्ती मेळाव्यात व्यक्त केले .
     कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथे शेषराव महाराज समिती कोरपना द्वारा आयोजित दारू मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या या वेळी अध्यक्ष म्हणून भ्रष्टाचार समितीचे विश्वस्त डॉ शिवराज कुंभारे ,प्रमुख मार्गदर्शक शेषराव महाराज दारू व्यसन संस्थेचे उतराधिकारी संतोष महाराज अबीद अली,जिल्हा  परिषद चे कृषी सभापती अरुण निमजे,शैख रउफ भाई, अविनाश आंबेकर,गोपाल मालपाणी,डॉ संजय भोयर, सोपान नागरगोजे,आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
    बंग म्हणाल्या निवडनुकीमध्ये मतासाठी दारूचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो त्यामुळे विरोधी पक्षातील मतदारांना दारू पाजून मतदानापासून वंचित ठेवता येते असे काही राजकीय पक्षातील मोठे नेते विनोदाने बोलतात मात्र यामुळे सामाजिक स्वास्थ भिघडत असून दारूचे प्रलोभन देणा-र्यांना  नाकारले पाहिजे  शेषराव महाराजांनी व्यसनमुक्तीसाठी कार्य सुरु केले आहे त्यमुळे चांगल्या मार्गाने जो नेतो तोच खरा देव ठरतो माणूस दारू पिला कि पोपटा सारखा बोलतो,कोल्ह्यासारखा लबाड वागतो वाघासारखा डरकाळी फोडतो आणि दुकारासारखा लोळायलालागतो, असा विनोदात्मक दृष्टान्त देत त्यांनी दारूचे दुष्परिणाम सांगितले.
     गडचिरोली पासून दारूमुक्ती आंदोलनाची सुरु झालेली लढाई चंद्रपूर जिल्ह्यात आजही सुरु आहे सरकारने आश्वासन दिले मात्र आजही लढा कायम ठेवावा लागत आहे. या लढ्यात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे सांगत त्यांनी ‘दारू दुकाने हात्लीच पाहिजे दारूची बाटली फुटलीच पाहिजे ‘ अशा घोषणा दिल्या, दारूमुक्तीच्या दुसर्या स्वातंत्र्य लढ्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे अशी विनंती या वेळी केली.

     डॉ शिवराज कुंभारे यांनी जेष्ट समाजसेवक अण्णा हजारे यांच्या कार्याचा परिचय देत अन्नाची प्रकृती ठीक नसल्याने ते आज उपस्थित राहू शकले नाही राळेगणसिद्धीत अण्णांनी  दारूबंदी केली याच प्रमाणे प्रत्यक गावात दारू बंदी झाली पाहिजे असे यावेळी सांगितले. प्रास्ताविक प्रमोद खडसे यांनी केले तर संचालन सचिन देशमुख तर आभार लक्ष्मीकांत धानोरकर यांनी मानले.

Sunday, January 12, 2014

समाज कार्याला राजकारणाची जोड हवी

समाज कार्याला राजकारणाची जोड हवी


प्रा. सूर्यकांत खनके  : तेली समाजाचा चंद्रपुरात उपवर-वधु परिचय मेळावा
चंद्रपूर : समाज कार्याला जोपर्यंत राजकारणाची जोड मिळत नाही, तो पर्यत समाजाचा विकास शक्य नाही, असे मत प्रा. सूर्यकांत खनके यांनी व्यक्त केले.
तेली युवक मडळाच्या वतीने रविवारी (ता. १२) तुकूम येथील मातोश्री सांस्कृतिक सभागृहात आयोजित वधू-वर परिचय मेळाव्यात ते बोलत होते.
मेळाव्याचे उद्घाटन संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पूजन करून झाले. अध्यक्षस्थानी प्रा. वासुदेवराव रागिट होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. विद्या बागडे, युवा उद्योजक नितीन पोहाणे, प्रा. रमेश पिसे, अ‍ॅड. रवी खनके, नगरसेवक आकाश साखरकर, अनिल खनके, डॉ. राहुल मोगरे, रवींद्र जुमडे, रेखाताई वैरागडे यांची मंचावर उपस्थिती होती. मेळाव्यात वर-वधुंची माहिती असलेली ‘प्रेरणा या स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले. यात सुमारे सातशे उपवर-वधूचे नाव, शिक्षण, जन्मतारीख, मामेकूळ, नोकरी, व्यवसाय, अपेक्षा आदी माहिती आहे.
यावेळी प्रा. विद्या बागडे म्हणाल्या, अनिष्ट रूढी, परमपरा व हुड्यांची प्रथा यावर वधू-वर परिचय मेळाव्याने आळा घातला जातो. मेळावे समाज हिताचे असल्याचे त्यांनी सांगितले.  प्रास्ताविक बी. डी. बिजवे यांनी तर आभार संध्या वाढई यांनी मानले. यावेळी सुनील बुटले, गोविल मेहरकुरे, प्रशांत देवतळे, शिरीष तपासे, कैलास रहाटे, रमेश कुयटे, ‘मनोज झाडे, विकास टिपले, संतोष झाडे, योगेश देवतळे आदी उपस्थित होते.

अंजली दमाणीया यांची अलिबागेत सभा

अंजली दमाणीया यांची अलिबागेत सभा

राष्ट्रवादीकडे लुटमार करून काढलेला पैसा ; आरोप 

। अलिबाग । प्रतिनिधी ।

शरद पवार अजित पवार ही मंडळी मोठी नसून सर्वात भ्रष्ट आहेत. त्यांच्याकडे असलेला पैसा सर्व सामान्य जनतेच्या घामाचा आहे. यांचा कोणताही व्यवसाय नसून जनतेची लुटमार करून काढलेला पैसा आहे.अशी टीका आम आदमी पार्टीच्या अंजली दमाणीया यांनी केली

यांच्या अध्यक्षतेखाली अलिबागेत जाहिर सभा आयोजित केली होती. मार्गदर्शन करताना अंजली दमाणीया म्हणाल्या की, आम आदमी हा पक्ष नसून एक चळवळ आहे. सर्व भ्रष्टाचार मुळापासून काढला पाहिजे, त्यासाठी आपण बदलले पाहिजे, आपणच आपले संरक्षण केले पाहिजेत, तरच ही नेते मंडळी ठिकाणावर येतील, त्यांची जागा त्यांना दाखवून दिली पाहिजेत.तसेच पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, दिल्लीतील जनतेने आम आदमी पक्षावर विश्वास ठेवूना निवडणूकीत राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाला नेस्तनाबुत करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे सगळयांचे धाबे दणाणून गेले आहेत.


बनावट जाहिरातींना बळी पडू नका

बनावट जाहिरातींना बळी पडू नका

महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त राहुल मोरे यांचे आवाहन

राज्य सरकारच्या विविध पदांसाठी येणाऱ्या प्रत्येक जाहिरातीची त्या-त्या विभागातील तालुका- जिल्हा पातळीवरील कार्यालयात जाऊन उमेदवारांनी शहानिशा करावी. कोणत्याही सरकारी नोकरीसाठी प्रशिक्षण वा कोणत्याही कारणास्तव पैसे घेतले जात नाहीत, त्यामुळे अशा बनावट जाहिरातींना बळी पडून तरुणांनी पैसे भरू नयेत, असे आवाहन महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त राहुल मोरे यांनी केले आहे.

महाराष्ट्र सरकारची नोकरी देतो, असे सांगून देशभरातील तरुणांना गंडा घालणाऱ्या टोळीचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची पथके दोन राज्यांत पाठविण्यात येणार आहेत. ही टोळी ज्या राज्यातून आपले नेटवर्क चालविते, त्याची ठोस माहितीही समोर आली आहे. 

महाराष्ट्र सुकन्या बालविकास योजनेच्या कॉल सेंटरसाठी "ग्राहक सेवा प्रतिनिधी' म्हणून नोकरी देतो, असे आमिष दाखवून प्रत्येक उमेदवाराकडून 13 हजार 200 रुपये उकळणाऱ्या टोळीविरोधात महिला व बालविकास विभागाने शुक्रवारी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती, त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.  पोलिस आयुक्‍त गुलाबराव पोळ, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त शहाजी सोळुंके यांनी पुढील तपासासाठीच्या सूचना दिल्या आहेत. या फसवणुकीच्या प्रकारात जो मोबाईल नंबर वापरला आहे, त्याची सर्व माहिती घेण्यात आली असून, ही टोळी परराज्यांतून सर्व सूत्रे हलवीत असल्याचे निदर्शनास आले आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या ज्या खात्यावर हे पैसे भरून घेण्यात येत होते, हे खाते रोहित सिंग या नावाने गेल्या महिन्यातच उघडण्यात आले आहे. या खात्यावरून महाराष्ट्रातील व्यवहार झाले असल्याचा अंदाज असून, आणखी काही बॅंक खाती असण्याचाही संशय पोलिस तपासात व्यक्त करण्यात आला आहे. 

या गुन्ह्याच्या तपासासाठी पुणे पोलिसांची पथके इतर राज्यांत पाठविण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी दिली. या टोळीने आपले मुख्यालय गोव्याला असल्याचा पत्ता दिला आहे. मात्र, "सकाळ'ने केलेल्या तपासात हा पत्ताही बनावट असल्याचे उघड झाले. या टोळीची कार्यपद्धती लक्षात घेऊन तपासाची यंत्रणा निश्‍चित करण्यात आली असून, लवकरच ही टोळी पोलिसांच्या हाती लागेल, असा विश्‍वास कांबळे यांनी व्यक्त केला. ज्या तरुणांची फसवणूक झाली आहे, त्यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 
बहाद्दर हरिदासने दिली वाघाशी झुंज

बहाद्दर हरिदासने दिली वाघाशी झुंज

वरोरा : शेतातून बैल घेऊन सायंकाळी परत येत असताना पायवाटेलगतच्या झुडपामधून अचानक वाघ एका २८ वर्षीय युवकासमोर आला. युवकाने प्रसंगवधान दाखवून धाडसाने वाघाचा पहिला वार चुकविला. हातात काठी घेऊन प्रतिकार करु लागला. १0 ते १५ मिनिटे त्यांच्या ही झुंज सुरू होती. अखेर युवकाच्या धाडसामुळे वाघाला माघारी वळावे लागले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास सावरी शेतशिवारात घडली. यामध्ये युवक जखमी झाला.
वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या सावरी (बी.) गावातील युवक हरिदास यादव शेंडे हा १0 जानेवारी रोजी बैल घेऊन शेतात गेला. शेतातील दिवसभराची कामे आटोपून हरिदास सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास बैल घेऊन घराकडे परत येत होता. दरम्यान, सुभाष कारेकार यांच्या शेतालगतच्या झुडुपामधून अचानक वाघ निघाला. तेव्हा हरिदासचे लक्ष नव्हते. वाघ दिसताच हरिदासच्या बैलांनी अचानक धूम ठोकल्याने हरिदास थोडा थबकला. समोर पट्टेदार वाघ दिसताच प्रारंभी हरिदासही घाबरला. मात्र त्यानंतर त्याने प्रसंगवधान दाखविले. वाघाने हरिदासवर उडी घेतली. मात्र हरिदासने हा वार चुकविला. हरिदास आरडाओरड करीत हातातील काठी फिरवू लागला. वाघाने अनेकदा हरिदासवर हल्ल्याचा प्रयत्न केला. परंतु हरिदासाने मोठय़ा धैर्याने वाघाचा प्रयत्न हाणून पाडला. वाघ आणि हरिदासमधील ही झुंज सुमारे १५ मिनिटे सुरू राहिली. हरिदासची आरडाओरड सुरूच असल्याने अखेर वाघाने तिथून धूम ठोकीत जंगलात पसार झाला. यापूर्वीही वाघाने सावरी या गावालगतच्या शेतात हल्ला करुन दोघांचा बळी घेतला होता. या घटना विस्मरणात जाण्यापूर्वीच शुक्रवारी वाघाने हरिदासवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने ग्रामस्थांमध्ये भीती व्यक्त केली जात आहे. हरिदासला उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने रुग्णालयात जाऊन हरिदासची भेट घेतली असता त्याने त्याने आपबिती कथन केली. याबाबत वनपरिमंडळ अधिकारी संजय पडवे यांच्याशी संपर्क साधला असता घटनेची माहिती मिळाली असून वनकर्मचारी घटनास्थळी गेल्याचे सांगितले.
अस्वलाच्या हल्ल्यात युवक ठार

अस्वलाच्या हल्ल्यात युवक ठार

चंद्रपूर
जिल्ह्य़ातील गोंडपिपरील तालुक्यातील धाबा गावाजवळ आज शनिवारी ११ जानेवारीला सकाळच्या सुमारास दोन पिल्लासह वावरणार्‍या अस्वलाने 'मॉर्निग वॉक' करणार्‍या सतीश कोटूकवार (३0) या युवकाला हल्ला करून जागीच ठार केले.
या नंतर अस्वल जंगलाच्या दिनेशे पळ काढला. तर एक पिल्लू मृतदेहाजवळच आढळले. वनविभागाने ते पिल्लू तालुक्यात घेतले असले तरी पिल्लाच्या शोधात अस्वल गावात येण्याची दाट शक्यता असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
सतीश कोटूकवार हा मूकबधिर होता व गावातच कपड्यांना इस्त्री करण्याचे दुकान चालवित होता. आज सकाळी गावाबाहेरील मार्गावर तो फिरायला गेला असताना अचानक त्याच्यावर अस्वलाने हल्ला चढविला. त्यात ज्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे हा हल्ला चढविल्यानंतर अस्वल जंगलात निघून गेली. पण, अस्वलाचे एक पिल्लू तिथेच राहिले. चार ते पाच महिन्याच्या या पिल्लाला वनविभागाने आपल्या ताब्यात घेतले आहे. या पिल्लामुळे युवकावर हल्ला करणारी अस्वल मादा असल्याचे स्पष्ट झाले आहे. मादा अस्वलाचे पिल्लू लहान असताना ती अतिशय आक्रमक व्यवहार करते व त्यातूनच हा हल्ला झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र हल्ला करणार्‍या मादा अस्वलाची तिच्या पिल्लापासून वेगळी झाल्यामुळे ती या भागात परत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे व त्यामुळे वनविभागाने या भागात आपली गस्त वाढवली आहे.   

Saturday, January 11, 2014

मराठा सिमेंटला शास्वता पुरस्कार

मराठा सिमेंटला शास्वता पुरस्कार

कोरपना - मराठा सिमेंट वर्क्स च्या अंबुजा सिमेंट उद्योग उप्परवाही ला त्याच्या केलेल्या चांगल्या कामाची पावती म्हणून त्यांना सलग दुस-र्यांदा सी आय आय आय टी सी शास्वता पुरस्कार नुकताच दिल्ली येथे कंपनी कामकाज मंत्री सचिन पायलट यांच्या हस्ते मराठा सिमेंट वर्क्स चे अध्यक्ष सुशील ठाकूर यांना प्रदान करण्यात आला.या प्रसंगी उर्जा पर्यावरण पाणी समितीचे अध्यक्ष सुरेश प्रभू, सलागर समितीचे अध्यक्ष वाय.सी.देवेश्वर कार्यकारी संचालक सीमा अरोरा इत्यादी मान्येवर उपस्थित होते.

मराठा सिमेंट वर्क्स उप्परवाही ची सदर पुर्स्काराकारिता निवड सी आय आय च्या प्रत्येक्ष अंकेक्षण व आंतरराष्ट्रीय दर्ज्याच्या चौदा सद्येशीय समिती द्वारा करण्यात आली कंपनीने विविध चांगल्या गोष्टींचा अवलंब केला असून त्यामध्ये टाकाऊ प्लास्टिकचा तसेच कचऱ्यांचा इंधनाकरिता वापर,आंतरराष्ट्रीय पर्यावरण मापदंडाचा अवलंब,कार्बनडाय ऑक्साईड चा कमीत कमी नित्सारण, पाण्याचे संवर्धन, वृक्ष लागवड इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. कंपनीने सर्वात जास्त प्राधान्य कामगाराची सुरक्षा तसेच सी एस आर द्वारा समुदाय विकासाच्या कामाला दिलेले आहे समुदाय विकासाचे काम ८५ गावांमध्ये जवळजवळ ४५ हजार लोकसंखे सोबत चालू असून यामध्ये आरोग्य,कृषी विकास,पाण्याचे संवर्धन युवक युवती करिता कौशल्य शिक्षण, महिलांचा सर्वांगीण विकास व गुणवत्ता पूर्ण शिक्षण,आय.टी.आय. कौशल्ये शिक्षण घेतलेल्या जवजवळ ८५ टक्के मुलांना रोजगार उपलब्ध झाला आहे.सदर पुरस्कारा सोबतच वर्ष २०१२-१३मधे १२ वार्षिक ग्रीनटेक पुरस्कार गोल्ड काटागिरीध, आशिया पाशीफिक एच.आर.एम.कॉंग्रेस पुरस्कार २०१३,व सृष्टी जी कूब इत्यादी चा समावेश आहे असे एका आयोजित केलेल्या पत्रकार परिषेदत सुशील ठाकूर यांनी सांगितले ते पुढे म्हणाले कि,कंपनीने व्यवसाय शास्वत करण्याकरिता कंपनी स्तरावर दोन कमेठीची स्थापना केली असून त्याद्वारे निरंतर कामाचे नियोजन व अंमलबजावणी केली जात आहे सदर पुरस्कार कंपनीने विविध क्षेत्रात उद्योग शास्वत पद्धतीने चालविण्या करिता केलेल्या प्रयत्नाचे फलित असल्याचे सांगितले.या पत्रकार परिषदेप्रसंगी वरिष्ठ उपाध्यक्ष एन.एल शर्मा,अरुण शर्मा,देवेंद्र त्रिपाठी,प्रमोद खडसे,इत्यादी अधिकारी उपस्थित होते.



..................................................................
गतिमान पाणलोट कार्यक्रम निकृष्ट दर्ज्याचे काम

गतिमान पाणलोट कार्यक्रम निकृष्ट दर्ज्याचे काम

कोरपना - महाराष्ट्र शासनाने अनेक जिल्ह्यात गतिमान पाणलोट कार्यक्रम तसेच महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील दुर्गम भागात हा प्रकल्प राबविण्यात आला परंतु निकृष्ट दर्ज्याचे काम करून,शेतकऱ्यांचे प्रशिक्षण कागदोपत्रीच दाखवून कृषी विभागाने या योजनेचा फजाच उडविला असल्याचे गावात शेतकऱ्यांची चर्चा आहे.

पकडीगुडम लाभ क्षेत्रातील बेलगाव,कारगाव,धनोली,पिपारडा,सोनुर्ली या भागात शासनांनी महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्प तसेच गतिमान पाणलोट कार्यक्रम गावातील पाण्याची अली वाढावी शेतकर्यांच्या जनावरांना मुबलक पिण्याचे पाणी मिळावे, गाव ट‍‍कर मुक्त व्हावे या उदात्त हेतूने हे दोन्ही कार्यक्रम राबवण्यात आले.या करिता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला मात्र कामच झालेच नाही अशी ओरड बळीराजा करू लागला आहे.

या कार्यक्रमा अंतर्गत शेतक-र्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देणे पाण्याचे नियोजन, पाणी पुरवठा समित्या बळकट करणे,गाव गावात समित्या स्थापन करून सभा घेणे,बँकेत समित्याचे खाते उघडणे मागणी नुसार विकासात्मक कामे काणे इत्यादी कामे होणे अपेक्षित होते परंतु हिकामे झालेच नाही अशी चर्चा दिसून येते.

· निधी उपलब्ध असूनही शेतकऱ्यांचे प्रशिक्षण देण्यात आले नाही पाणीपुरवठा समित्या बळकट करण्यात आले नी उद्योजक व प्रक्रिया करणारे शेतकऱ्यांचे समूह तयार करण्यात आले नाही शेतकऱ्यांच्या समूह मंडळ स्थापन करून नोंदणी करण्या करिता चर्चा करण्यात आली मात्र प्रत्येक्ष कृती कृषी विभागाने किलीच नाही फक्त गावात नाममात्र शेतकरी समूह गट,महिला समूह गट, बनवून बोर्ड लावण्यात आले.मात्र या गावातील एकही शेतकरी समूह गट नोंदणीकृत झालाच नाही.यावर मोठ्याप्रमाणात खर्च झाला परंतु ज्या गावात या योजना राबविण्यात आल्या त्या गावातील शेतकऱ्यांना शासनाच्या योजनेची जाण नसल्याची चर्चा आहे.कागदोपत्री समित्या दाखविण्यात आल्या मात्र आल्या मात्र प्रतेक्षात काम झालेच नाही निधी खर्चाचे नियोजन किंवा आराखडा तयार करण्यात आले नसल्याचे व जमाखर्चाचा हिशोब  आला नाही फक्त बँकेचे खाते उघडण्यासाठी समितीची सभा झाल्याचे बोले जात आहे तुळशी,टागारा,जेव्हरायेथील.शेतकऱ्यांन प्रशिक्षन देण्याकरिता करिता प्रगती नावाच्या संस्थेची निवड करण्यात अली होती मात्र शेतकऱ्यांच्या प्रगती न करता प्रशिक्षण न देता आपलीच प्रगती केल्याचे सांगण्यात येत आहे हि संस्था एका कृशिविभागाच्या अधिकाऱ्याच्या नातेवाहीकाची असल्याचे बोले जात आहे या योजनेतील संपूर्ण कामाचा आढावा घेतल्यास विस्तार व शेतीशाळा कार्यक्रमाचा प्रताप लक्षात येईल असे प्रकार कोरपना तालुक्यात मोठ्या प्रमाणत घडत असून विदर्भ पाणलोट विकास कार्यक्रम अंतर्गत उमरहीरा व मांडवा या ठिकाणी निकृष्ट दर्ज्याचे बांधकाम केले असून दोन कोटी सत्तर लाख खर्चून दोन्ही गावे दुष्काळाचा सामना करताना दिसत आहे. कामे करून शासनाच्या निकषानुसार मांगलहिरा या गावात पाच वर्षात विविध योजनेतून दुष्काळावर मत करण्यासाठी लाखो रुपयाचा निधी संबधित विभागाने खर्च केला मात्र दुष्कावर मत करता अली नाही त्यमुळे कृषी विभागाचे मोठे अपयश पहावयास मिळते.किडनीयंत्रण सापडे शेतकर्यांना न वाटता ते यंत्र शाशकीय गोदामात डूल खात असल्याचे बोले जात आहे.
श्रमिक एल्गारचा बल्लारपुरात मोर्चा

श्रमिक एल्गारचा बल्लारपुरात मोर्चा

balarpur1.jpg प्रदर्शित करत आहेबल्लारपूर शहरातील नागरीकांच्या समस्या घे न श्रमिक एल्गारच्या संस्थापिका अॅड.पारोमिता गोस्वामी यांचे नेतृत्वात तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
बल्लारपुरात अनेक कुटुुंबाकडे शिधापत्रिका नाही व नविन दिल्या जात नाही, बिपिएल धारकांना बिपिएलचे कार्ड बनवुन दिल्या जात नाही, बिपिएल उत्पन्न प्रमाणपत्राचे अट लावुन पन्नास हजाराचे वरील उत्पन्न दाखविणे, निराधार योजनेची अमलबजावणी केल्या जात नाही अशा रविंद्रनगर येथिल लोकांच्या समस्यांना घेऊन श्रमिक एल्गारचे वतीने अॅड. पारोमिता गोस्वामी यांचे नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. मोर्चा तहसिल कार्यालयावर पोहचल्यानंतर शिष्ठमंडळासोबत तहसिलदार बि.डी.टेळे यांनी चर्चा केली परंतु मोर्चेÚयांना समाधानकारक उत्तर न देता आमच्याकडे कर्मचारी नसल्याचे उत्तर देऊन हात झटकलेे. त्यामुळे मोर्चेकरीत महीला संतापुन तहसिलदारचा निषेध करीत कॅबीनमधुन निघाले व नागपूरचे आयुक्त बि.वेणुगोपाल रड्डीे हे जिल्हाधिकारीे  कार्यालयात असल्याने महीला चंद्रपूर गाठुन व त्यांना भेटुन समस्या मांडल्या यावर रेड्डी व जिल्हाधिकारी डाॅ.म्हैसेकर यांनी या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. 
या मोर्चात महासचिव विजय कोरेवार, फरजाना शेख, संगिता गेडाम, सलमा शेख, प्रविण चिचघरे, सुर्यकांत भूरसे, फातीमा शेख, जमीना शेख, प्रेमदास उईके, कपिला भसारकर, फिरोजा पठाण, हसीना पठाण, शमीना पठाण आदींसह शेकडो महीला सहभागी होते.

Friday, January 10, 2014

युपीएच्या प्रधानमंत्री व कोळसा मंत्र्यांनी राजीनामा द्यावा : खा. हंसराज अहीर

युपीएच्या प्रधानमंत्री व कोळसा मंत्र्यांनी राजीनामा द्यावा : खा. हंसराज अहीर

६-७ वर्षांपूर्वी हे पुराव्यानिशी तक्रारी केल्या होत्या त्या खèया ठरल्या
कोळसा ब्लॉक आवंटनात घोटाळा प्रकरण
चंद्रपूर:- कोळसा खाणी वाटपात घोटाळा झाल्याचे आपण मागील 6-7 वर्षांपासून सबळ पुराव्यासह सतत सरकारला सांगत होतो. परंतू कोल ब्लॉक आवंटनात कोणत्याही प्रकारचा घोटाळा झाला नाही असे सातत्याने खोटे वक्तव्य करणाÚया युपीए सरकारने अखेर कोल ब्लॉक आवंटनात घोटाळा झाल्याचे मान्य केले. सरकार पक्षाकडून अॅटर्नी जनरल यांनी घोटाळा झाल्याची सर्वोच्च न्यायालयात कबुली दिल्याने 2006 पासून कोल ब्लॉक आवंटनामध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप सरतेशेवटी सिध्द झाला असल्याचे प्रतिपादन कोळसा ब्लॉक आवंटन घोटाळा सर्वप्रथम उघडकीस आणण्याचे श्रेय असणारे खा. हंसराज अहीर यांनी केले आहे.
या कबुली जबाबानंतर प्रतिक्रीया व्यक्त करतांना खा. हंसराज अहीर यांनी म्हटले आहे की, देशाची कोटयवधी रूपयांची प्रापर्टी सरकारने काही उद्योगपतींना फुकटात वाटप करून देशाचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान केले होते. परंतू या सरकारचे दुर्दैव असे की, वारंवार या घोटाळयाची सिध्दता होवूनही सरकारने घोटाळा केल्याचे मान्य केले नाही. याउलट देशाचे पंतप्रधान, अर्थमंत्राी, न्यायमंत्राी, व कोळसा मंत्राी यांनी या कोल ब्लॉक वाटपाची जी बेकायदेशीर प्रक्रीया होती तिचे पाठराखण केली होती हे सर्वश्रृत आहे व याची जाणीव संपूर्ण देशभरातील जनतेला आहे. असे असतांनाही व आपण सुरूवातीपासून कोल ब्लॉक वाटपात प्रचंड प्रमाणात महाघोटाळा झाला असल्याचे सिध्द करण्याचा प्रयत्न केला. याबाबत आपण केलेल्या तक्रारींची दखल व याबाबतची सत्यता पाहून कॅग ने ही वस्तुस्थिती सर्वप्रथम जगासमोर ठेवली. त्यानंतर केंद्रीय सतर्कता आयोग (सीवीसी), सीबीआय, आंतरमंत्रालयीन कमिटी ग्रुप (आयएमजी) व सर्वोच्च न्यायालय आदींनी कोळसा ब्लॉक आवंटनात घोटाळा झाल्याचे वारंवार संकेत देत सरकारची या प्रकरणात भर्त्सना केली. सीबीआयने या प्रकरणता एमआयआर दाखल केले, कॅग ने एकंदर नुकसानीची आकडेवारी दिली. असे असतांनाही केंद्रातील कॉग्रेस प्रणित युपीए सरकारने हे मान्य केले नव्हते. आज शेवटी सरकार पक्षाने कोळसा ब्लॉक आवंटनात घोटाळा झाल्याचे कबुल करून आपल्या अपराधाला मान्यता दिली आहे.
आपण केलेले आरोप सत्य असल्याचे या कबुली जबाबानंतर सिध्द झाले याचा आपणांस आनंद आहे. देशाची खरबो रूपयांची मालमत्ता ज्यात जवळपास 50 खासगी कंपन्यांचे ब्लॉक रद्द केले. व जे कोळशाचे ब्लॉक विनामुल्य वाटप केले होते ते पुन्हा सरकारच्या खात्यात जमा होण्याकरिता मार्ग सुकर झालेला आहे. मा. सर्वोच्च न्यायालयासह चौकशी व लेखापरीक्षण करणाÚया सर्व सरकारी एजन्सींनी या घोटाळयात प्रचंड परीश्रम घेवून कार्य केले आहे. त्यांच्या या अविश्रांत परीश्रमातूनच या घोटाळयातील महासत्य बाहेर आले आहे. आता मा. पंतप्रधान आणि केंद्रीय कोळसा मंत्रयांनी या कोळसा ब्लॉक आवंटन घोटाळयाची नैतिक जबाबदारी स्विकारून व देशवासीयांची माफी मागुन राजिनामा द्यावा व रद्द केलेले सर्व कोल ब्लॉक व अन्य मोफत दिलेले ब्लॉक कोल इंडियाच्या स्वाधिन करावे असेही खा. हंसराज अहीर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्राकात म्हटले आहे.
वाघाच्या हल्ल्यात इसम ठार

वाघाच्या हल्ल्यात इसम ठार

चिमूर :
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेल्या कोलारा गावातील विठोबा नागोसे (वय ५५ वर्षे) हा दिनांक ९ जानेवारीला सकाळी सरपण जमा करण्याकरीता जंगलात गेला असता दबा धरुन बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक हल्ला करुन नरडीचा घोट घेतला.
२०१४ या नववर्षातील मानव-वन्यजीव संघर्षातील बळीची ही दुसरी घटना असून पहिली घटना  लोहारा येथील मंगला गुलाब शेंडे ही महिला बुधवारी, दुपारच्या सुमारास लोहारा जवळील वनविकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक ३९६ मध्ये सरपन गोळा करण्यासाठी गेली होती. सरपन गोळा करीत असताना झुडूपात दबा धरुन बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला केला होता. यात तिचा जागीच मृत्यू झाला होता.
प्राप्त माहितीनुसार दिनांक ९ जानेवारीला सकाळी मृतक गावातील सहकार्यासोबत सरपणाकरीता जंगलात गेला असता दबा धरुन बसलेल्या पट्टेदार वाघाने त्याच्यावर अचानक हल्ला केल्याने आरडाओरड झाली. तेव्हा मृतकाचे सहकारी गावाकडे परत आल असता नागरिकांनी मृतकाचा शोध घेण्याकरीता घटनास्थळाकडे धाव घेतली. तेव्हा  मृतक विठोबा नागोसे यांचा मृतदेह छिन्नविछन्न अवस्थेत आढळुन आला.घटनेच्या काही वेळानंतर पोलीस व वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचुन पंचनामा केला. पुढील तपास ठाणेदार विखे पाटील तसेच वनपरिक्षेत्र विभागाचे अधिकारी करीत आहेत.
तीन वर्षात ३८ सायबर गुन्हे

तीन वर्षात ३८ सायबर गुन्हे

चंद्रपूर: फेसबुक, वाटसर्प, आकरुट यासारखे संचार माध्यम मानवाच्या सुविधांसाठी तयार केले आहेत. मात्र या माध्यमांचा दुरुपयोग वाढला आहे. सोशल नेटवकर्र्ींगचा विद्यार्थ्यांकडून दूरुपयोग होत असल्याने चिंता वाढली आहे. २0११ मध्ये सायबर क्राईमचे पाच गुन्हे दाखल आहेत. २0१२ मध्ये १२ गुन्हे तर २0१३ मध्ये तब्बल २१ असे एकूण ३८ साईबर क्राईमचे प्रकरण पोलिसांनी उजेडात आणले आहेत.

येथील पोलीस विभागाच्या सायबर सेलने दिलेल्या माहितीनुसार, २0११ मध्ये सायबर क्राईमचे पाच प्रकरणे नोंदविण्यात आली. यातील चार प्रकरणे केवळ फेसबुकशी संबंधित होते. २0१२ मध्ये एकूण १२ सायबर गुन्हे दाखल करण्यात आले. यातील पाच प्रकरणे सोशल नेटवकर्र्ींगच्या प्रकारात मोडते. २0१३ मध्ये हा आलेख आणखी चढला. या वर्षात तब्बल २१ सायबर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून यात सहा गुन्हे फेसबुकशी संबंधित आहेत. तीन वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता जिल्ह्यात सायबर क्राईम वाढत असल्याचे दिसून येते. यातील सर्वाधिक प्रकरणात महाविद्यालयीन विद्यार्थीच आरोपी असल्याचे स्पष्ट झाले आहे. मोबाईलवरून अश्लिल फोटो, चित्रफित पाठविणे, अश्लिल एसएमएस, एमएमएस पाठविणे यासारख्या ९ गुन्ह्यांची २0१३ या वर्षात नोंद करण्यात आली आहे. याशिवाय कोणाचा ईमेल हॅक करणे, ऑनलाईन ट्रांजेक्शन फ्राड, दुसर्‍याच्या एटीएममधून परस्पर रक्कम काढणे यासारख्या सायबर गुन्ह्यांचीही या वर्षात नोंद झाली आहे. 

शिक्षेची तरतूद
  • ■ कलम ६६-ए नुसार सोशल नेटवकर्र्ींगच्या दुरुपयोगासाठी तीन वर्ष शिक्षा
  • ■ कलम ६६ नुसार संगणकातील डाटाचे नुकसान करण्यासाठी तीन वर्ष शिक्षा
  • ■ कलम ६६-बी नुसार मोबाईल किंवा संगणक चोरीप्रकरणी तीन वर्ष शिक्षा
  • ■ कलम ६६-सी नुसार पासवर्ड चोरणे, कुणाच्या नावाचा उपयोग करून अपराध करण्यासाठी तीन वर्ष शिक्षा व एक लाख रुपये दंड
  • ■ कलम ६६-एफ नुसार सोशल नेटवकर्र्ींगद्वारा दहशतवाद पसरविण्यासाठी आजन्म कारावास.
  • ■ कलम ६७ नुसार अश्लिल चित्रीकरण करून त्याचे प्रसारण करण्यासाठी पाच वर्ष शिक्षा.



Thursday, January 09, 2014

महापौर चषक नागपूरने जिंकला

महापौर चषक नागपूरने जिंकला

चंद्रपूर : चंद्रपूर पंचशताब्दी महोत्सव समिती, महानगरपालिका तथा चांदा जिल्हा फूटबॉल संघटनेच्या वतीने स्थानिक पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर विदर्भस्तरीय फुटबॉल सामने घेण्यात आले. यात १२ फूटबॉल संघांनी भाग घेतला. आज अंतिम सामना यंग अंसार क्लब नागपूर व सीडीएफए चंद्रपूर संघादरम्यान अत्यंत चुरशीचा झाला. ट्रायबेकरमध्ये चौथ्या प्रयत्नात यंग अंसार क्लब विजेता ठरुन महापौर चषकाचा धनी ठरला.
बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचशताब्दी महोत्सव समितीचे संयोजक माजी खासदार नरेश पुगलिया होते. प्रमुख पाहुणे म्हणून महापौर संगीता अमृतकर, उपमहापौर संदीप आवारी, स्थायी समितीचे सभापती रामू तिवारी, आयुक्त प्रकाश बोखड, उपायुक्त राजेश मोहिते, रवींद्र देवतळे, विलास कंदेवार, अशोक नागापुरे, प्रविण पडवेकर, हिंदकेसरी अमोल लुथडे, फूटबॉल संघटनेचे अध्यक्ष के. के. सिंग, सचिव दीपक दीक्षित, सरवर खान यांची उपस्थिती होती.
विदर्भस्तरीय फूटबॉल सामन्यात अंतीम लढत होण्यापूर्वी ईगल क्लब नागपूर व बिग बेन क्लब नागपूर संघादरम्यान महिलांचा सामना झाला. यावेळी बीग बेन महिला संघाने ईगल क्लबवर २-0 अशी मात केली. फूटबॉलच्या अंतीम सामन्यात विजेता यंग अंसार क्लब नागपूरला महापौर चषक, रोख ३१ हजार रुपये प्रदान करुन सन्मानित करण्यात आले तर उपजिवेता सीडीएफए संघाला चषक व रोख २१ हजार रुपये बक्षिस देण्यात आले.
अंत्यत चुरशीच्या सामन्यात निर्धारीत वेळात १-१ अशी बरोबरी साधली. ट्रायबेकरच्या माध्यमातून उत्कंठावर्धक सामन्याचा निकाल जाहीर करण्यात आला. 
श्री श्री रविशंकर १५ ला चंद्रपुरात

श्री श्री रविशंकर १५ ला चंद्रपुरात

चंद्रपूर: लिव इन रिलेशनशिपला सर्वोच्च न्यायालयाने कायदेशीर मान्यता दिली असली तरी ही व्यवस्था भारतीय संस्कृतीला अनुरुप नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आपण विरोध करीत नाही. मात्र दुसर्‍या बाजूने विचार करता ही व्यवस्था भारतीय संस्कृतीला घातक आहे. यामुळे माणसाचे आयुष्य वा संसार चिरकाल सुखी राहू शकत नाही. ही व्यवस्था विदेशात आहे. आपण अनेकवेळा विदेशाचा दौरा केला. त्यात अशा व्यवस्थेतून तिथेही चिरकाल सूख मिळाल्याचे दिसले नाही. त्यामुळे भारतातही अशी स्थिती निर्माण होऊ शकते, असे मत आर्ट ऑफ लिव्हींगचे गुरु आनंद वैश्यपायन यांनी पत्रकारपरिषदेत व्यक्त केले.
यावेळी ते पुढे म्हणाले, पंडित श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हींगमागे नागरिकांना सुखी आणि आनंदी बनविणे, हा उद्देश आहे. आध्यात्मद्वारा स्वत:च्या आत्माचा स्वत:लाच परिचय करून देऊन त्याद्वारे दुसर्‍यांना सहकार्य करायला लावणे, हाही एक उद्देश आहे. आपण चांगले काम नेहमीच पोस्टपोंड करतो. वाईट काम असले की ते प्रकर्षाने करतो. मात्र हे योग्य नाही. चांगले काम कधीही पोस्टपोंड करू नये. तेच प्रकर्षाने करावे, असेही त्यांनी सांगितले.पत्रकार परिषदेला आर्ट ऑफ लिव्हींगचे भाई सलील, महापौर संगिता अमृतकर, गोपाल अमृतकर, दामोदर सारडा व आर्ट ऑफ लिव्हींगचे पदाधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी) श्री श्री रविशंकर १५ ला चंद्रपुरात आर्ट ऑफ लिव्हींगचे संस्थापक पंडित श्री श्री रविशंकर यांचे १५ जानेवारी रोजी चंद्रपुरात आगमन होत आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. उद्या ९ जानेवारीला सकाळी ९ वाजता महानगरपालिका व आर्ट ऑफ लिव्हींग संस्थेद्वारा गांधी चौकात स्वच्छता अभियान
पट्टेदार वाघाच्या हल्लात महिलेचा जागीच मृत्यू

पट्टेदार वाघाच्या हल्लात महिलेचा जागीच मृत्यू


चंद्रपूर : जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलेवर पट्टेदार वाघाने हल्ला चढविला. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना आज बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास लोहाराजवळच्या मामला वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ३९६ मध्ये घडली. मंगला ऊर्फ पूनम गुलाब शेंडे (४३) असे मृत महिलेचे नाव आहे.
चंद्रपूर-मूल मार्गावरील लोहाराला लागून असलेल्या एफडीसीएमच्या जंगलात आज बुधवारी दुपारी दहा महिला सरपण आणण्यासाठी गेल्या होत्या. लाकडे गोळा करीत असताना दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक मंगला शेंडे हिच्यावर हल्ला चढविला. तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो निष्फळ ठरला. वाघाने तिला काही अंतरापर्यंत फरकटत नेले. हे दृष्य बघून मंगलासोबत असलेल्या इतर महिला घाबरल्या. त्यांनी लगेच गावाकडे धूम ठोकली व गावकर्‍यांना या घटनेची माहिती दिली. गावकर्‍यांनी घटनास्थळी जाऊन मंगलाचा शोध घेतला असता जंगलातील एका झुडुपात तिचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. वनविभागाला याची माहिती देण्यात आली. वनाधिकार्‍यांनी घटनास्थळावर पंचनामा केला. येथील उपविभागीय वनाधिकारी चौधरी यांनीही या परिसरात पट्टेदार वाघाचे ठसे आढळल्याचे सांगितले. उल्लेखनीय असे की चंद्रपुरातील टॉवर टेकडी परिसरातही काही दिवसांपूर्वी एका बालिकेला बिबट्याने ठार केले होते.

Wednesday, January 08, 2014

धुके वाढल्याने रेल्वेगाड्या लेट

धुके वाढल्याने रेल्वेगाड्या लेट

नागपूर - दाट धुक्‍यांमुळे रेल्वेगाड्यांची गती मंदावली आहे. परिणामी अनेक रेल्वेगाड्या निर्धारित वेळेपेक्षा तासन्‌तास उशिरा धावत आहेत.
थंडीचा जोर वाढत असून, दिवसेंदिवस पार खालीखाली जात आहे. हवेतील गारव्यामुळे अंगार हुडहुडी भरत आहे. परिणामी दाट धुक्‍यांमुळे रेल्वेगाड्यांची गती मंदावली आहे. नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्‍स्प्रेस सुमारे 10.45 तास, न्यू दिल्ली सिकंदराबाद एक्‍स्प्रेस 12 तास, हजरत निजामुद्दीन-बंगलोर सिटी एक्‍स्प्रेस 8 तास, न्यू दिल्ली चेन्नई एक्‍स्प्रेस 8 तास, न्यू दिल्ली-चेन्नई एक्‍स्प्रेस 6 तास, हैद्राबाद-न्यू दिल्ली आंध्र प्रदेश एक्‍स्प्रेस, यशवंतपूर-गोरखपूर एक्‍स्प्रेस 3 तास आणि हजरत निजामुद्दीन-सिकंदराबाद सुपरफास्ट एक्‍स्प्रेस 5.30 तास उशिराने धावत आहेत. परिणामी वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांना रेल्वेगाड्यांची तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागत आहे.

Tuesday, January 07, 2014

श्री श्री रविशंकरजीचे आगमन चंद्रपूरचे अहोभाग्य

श्री श्री रविशंकरजीचे आगमन चंद्रपूरचे अहोभाग्य

एक विराट आध्यात्मिक विश्व निर्माण करण्याची अभिप्सा बाळगणा-या कोटी कोटी लोकांना वाटणारे आशा आणि श्रद्धास्थान तसेच विश्वविख्यात आर्ट ऑङ्क लिव्हींग संंस्थेचे संस्थापक श्री श्री रविशंकरजी (गुरूजी) यांचा परिचय करून देण्याची मुळीच आवश्यकता नाही. परंतु या क्षेत्रात अनभिज्ञ असलेल्यांना देखील ह्या रति अतिस्थी आणि महारथी व्यक्तीमत्वाचा परिचय व्हावा म्हणून हा प्रपंच.
श्री श्री रविशंकरजी यांचा जन्म १३ मे १९५६ रोजी बंगळूर जवळ असलेल्या पापनासम ह्या एका लहानशा खेड्यात झाला. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. ह्या म्हणीप्रमाणे त्यांच्यातील तल्ल्लख बुद्धी व अद्भूत सामथ्र्यांंचा परिचय त्यांच्या कुटुंबियांना आणि इतरांना बालपणापासूनच होऊ लागला. अनेक घटनापैकी त्यांच्या जीवनातील दोन तीन घटनांवर प्रकाश टाकला असता ह्याचा प्रत्यय येतो.गुरूजी अवघ्या ४ वर्षाचे असतांना त्यांना भगवतगिता शिकविण्यासाठी त्यांच्या मातापित्यांनी एक विचशेष प्रशिक्षकाची नेमणूक केली आणि अहो आश्चर्यम! त्या प्रशिक्षकाने भगवत्गीताने पहिला श्लोक म्हणावा तर हे लहानसे मूल त्यापुढील दुसरा श्नोक अस्ख्रलीत संस्कृतमध्ये धडधड म्हणून दाखवित असे. हयाच क्रमाने जेव्हा तिसरा श्लोक प्रशिक्षक उच्चारीत असे तर हे मूल चोथा श्लोक आपोआप म्हणत असे ह्या मुलांनी अद्भुत किमया बघून प्रशिक्षकाला असे वाटले की, ह्या मुलास त्यास मातापित्यांनी भगवगितेत पहिलेच प्रविण करून ठेवले आहे व त्याला शिकविण्यासाठी हकनाक नेमलेले आहे. परंतु प्रशिक्षकांचे म्हणणे ऐकून गुरूजींचे आईवडील देखील चाट पडले कारण त्यांनी त्यापूर्वी कधीही त्यामुलास भगवतगिता कोणास मार्फत शिकविली नव्हती.
दिव्यआत्मे पूर्वजन्माचे संस्कार ज्ञान घेऊन विशेष कार्यासाठी अवतरीत होत असतात. ही जी आपल्या हिंदु धर्माची धारणा आहे त्याला पृष्टी देणारा हा जिवंत पुरावाचा म्हणावा लागेल.
वयाच्या सहाव्या वर्षी हे बालक बालसुलभ प्रवृत्तीच्या क्रीडांमध्ये मग्न होण्याऐवजी ध्यान, धारणा आणि समाधी मध्ये तासन्तास गुंतून असे. सवंगडी म्हणतात तु हे काय करीत आहेस.चल खेळुया! त्यावेळी हे तेजस्वी बालक गर्जून सांगत असे की
"The Whole World is waiting for me,I have to reach there'
संपूर्ण विश्व माझी वाट आहे आणि मला तेथे पोहचायचे आहे. हे उद्गार ऐकून मित्रमंडळी त्याची थट्टा करीत व त्यांचेसमोर विविध देशांची नावे लिहीत परंतु त्या बिचाèया अज्ञ मुलांना काय माहित की गुरूजीच्या मुखातून त्यांचा येवू घातलेला भविष्यकाळच परमात्मा परमात्मा वदवत आहे. आज गुरूजींचे अध्यात्मिक प्रशिक्षक आणि योग कार्यार्ने ४९ पेक्षा अधिक देशांचा लपेटून टाकले आहे. याला म्हणतात द्रष्टा! ही झालीत त्यांच्या अद्भूत दैवी शक्तीची उदाहरणे आता त्यांच्या तल्लेख बुद्धीकडे वळु या! वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी एका बाजुस भौतीक शस्त्र आणि दुसèया बाजुस वैदीक वाड:मय् या दोन्ही विषयात त्यांनी पदवी प्राप्त केली. तथा कथीत बुद्धीवादी विज्ञान अध्यात्म जणू एकमेकांचे शत्रु आहेत. असा सर्वत्र प्रचार व प्रसार करीत असतात. परंतु विज्ञान आणि अध्यात्माची एकत्रीत सांगड घालुन एका नव्या विचाराकडे, एका नव्या जगाकडे, एका नव्या युगाकडे घेऊन जाण्याचे सामथ्र्य गुरूजत मुळातच होते. व ते त्यांनी प्राप्त करूनही देखील दाखविले. गुरूजींनी त्यांच्या जिवनात योग कार्य करीत असतांना जूने सोडले नाही. नवे पकडले व जुन्याला नव्याचा सोनेरी मुलामा चढवून विश्वाचे सोने करण्याचा चंग बांधला.
वयाच्या २४ व्या वर्षी १० दिवसाचे खडतर ध्यान करूप समाधी अवस्था प्राप्त केली. व त्यात परमात्याने जगदोध्दाशंसाठी आवश्यकत असलेले सुदर्शन क्रिया त्यांना शिकवली त्याच आधारे पुढे त्यांनी साधना, सेवा आणि सत्संग या आर्ट ऑङ्क लिव्हींग च्या त्रिसुत्रीसाठी आपले जीवन झोकुन दिले. आणि हा हा म्हणता त्यांच्या कार्याचा पसारा भव्य वटवृक्षाप्रमाणे जगभर पसरत गेला.
ध्यान, धारणा, समाधी, अधात्मा हे सर्व विषय पेंशनीत निघालेल्या लोकांसाठी असतात. असा (गैर) समज सर्वत्र पसरलेला आढळतो. परंतु प्रत्यक्षात ही स्थिती विरूद्ध असते कारण वृद्धांसाठी नाना रोगांचे माहेर घर झालेल्या शरीराकडून कोणते ध्यान व साधना होवू शकेल! म्हणून आत्मोन्नतीसाठी प्रत्येकाने अल्पवयातच साधना सुरू करणे अपरिहार्य असते. हे लक्षात घेवून बालवयापासूनच सर्व स्त्री-पुरूष ध्यान धारणेत सामील व्हावे या हेतुने गुरूजींनी विवधि प्रकारच्या योग प्रशिक्षण शाखा निर्माण केल्यात जसे... आर्ट एक्सेल वयोगट (८ ते १३) यस वयोगट (१३ ते १७) यस प्लस वयोगट (१८ ते ३०) पार्ट वन-आनंद अनुभूती शिबिर (१८ च्यावर.....) हे प्रशिक्षण प्राप्त करतांना प्रशिक्षणार्थींना होणारा आनंद आणि परमानंद अवर्णनीय असतो. त्याने केवळ अध्यात्मिक उन्नतीच होत नाही तर भौतिक जीवन यशस्वी होण्याची गुरूकिल्ली देखील लाभते. आजच्या धावत्या युगात प्रत्येकला असलेला मानसिक ताणतणाव, त्यातून निर्माण होणारे नैराश्य, आत्मविश्वासाचा अभाव, आत्मघातकी प्रवृत्ती ह्या सर्व व्याधीवर हुकूमी मात करण्याची प्रभावी संसाधन म्हणजे वरील प्रशिक्षण त्यामुळे तुम्ही विद्यार्थी असा, नोकरदार असा, व्यापारी असा, उद्योजक असा, अथवा अन्य कोणत्याही क्षेत्रात कार्य करणारे असा, तुमचे दैनंदिन जीवन आणि कामकाज सुरळीत आणि यशस्वी होण्यासाठी तुम्हाला आत्मविश्वास, धैर्य आणि व्यापकता त्यांची नितांत गरज असते. वरीलपैकी कोणतेही प्रशिक्षण घेतलेला माणूस निश्चितच तुम्हाला ग्वाही देईल की त्याला त्या प्रशिक्षणाने ह्या सर्व बाबी प्राप्त झाल्या. ङ्करक एवढाच की नियमीत योगक्रिया प्रक्रिया करून त्या त्याने टिकवून वाढविल्या की नाही.
गुरूजींनी भौतीक जीवन यशस्वी करण्यासाठी उपाय ध्यान ध्यारणेतून शोधला आणि त्यामुळेच त्यांचे लाभार्थी करोडोच्या संख्येत जगभर पसरलेले आहेत. हे प्रशिक्षण घेण्यासाठी जगभर  शाखा निर्माण करण्यात आल्या आहेत. प्रशिक्षण शिबिरात घेणाèया बालमुलामुलांची व तरूणतरूणीची गर्दी बघून भलेभलेही अचंभित होतात.... अमृताचे सेवन कुणाला नाही आवडणार?
येत्या भविष्यकाळात संपूर्ण विश्वसच एक मंगलमय आनंददायक आणि आध्यात्मिक विश्वच बनणार आहे आणि त्याची सुरूवात ऋषीमुनीच्या काळा पासुन पावन झालेल्या ह्या भरतभूमीतूनच होणार आहे. ह्या विषयी सर्व आध्यात्मिक पुरूषामध्ये एकवाक्यता आहे. ह्या परमेश्वरी कार्यासाठी आपल्या अद्भूत शक्ती, मार्गदर्शन आणि कार्याने गुरूजींनी आपले जीवन समर्पित केले व भविष्यकाळात त्याचे अमृतमय ङ्कळ सर्वांना बघावयास नव्हे तर अनुभवास मिळेल.
अशी ही विभूती १५ जानेवारी २०१४ ला चंद्रपूरच्या इतिहासात प्रथमच चंद्रपूरात भेट देत आहे. हा दुर्मिळ योग आहे.
श्री श्री रविशंकरजी ह्याचे उत्कट स्वागत करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा व परिसरातील लाखो नागरिक सज्ज झाले आहेत. त्यांची चंद्रपूर भेट ह्या विभागास देखील एक नवा विचार, एक नवी दिशा, एक नव परिवर्तन, घडविण्यास सहाय्यभूत ठरेल असा दृढ विश्वास वाटते.

................................

चंद्रपूर : आर्ट ऑङ्क लिव्हिंग संस्थेचे संस्थापक श्री. श्री. रविशंकर यांचे चंद्रपूरात प्रथमच आमगन होत असून त्याच्या आगमनानिमीत्त विविध कार्यक्रामचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक १३ जानेवारी २०१४ रोजी सकाळी ८ वाजता शहरातील मध्यभागी असलेल्या आझाद गार्डन येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यात सर्व शाळेतील वर्ग ८ ते वर्ग १० वी शिकवणाèया विद्याथ्र्यांचा सहभाग राहणार आहे.
तसेच दिनांक १४ जानेवारी २०१४ रोजी सकाळी ८ वाजता गांधी चौक येथे रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले असून यात एक हजारच्या वर नागरिक रक्तदान करणार आहे.
आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे संस्थापक श्री. श्री. रविशंकरजी यांच्या पावन सानिध्यात दिनांक १५ जानेवारी रोजी चांदा क्लॅब मैदानावर सायकाळी ६ वाजता सुदर्शन क्रिया आणि महासंत्सगाचे आयोजन करण्यात आले आहे. ते सर्व उपस्थितांना सुदर्शन क्रिया काय आहे या सदर्भात मार्गदर्शन करणार असून सदर कार्यक्रमाचा जिल्ह्यातील सर्व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.