সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, December 29, 2011

मराठी साहित्य संमेलनस्थळी साकारणार गोंडकालीन वैभव

मराठी साहित्य संमेलनस्थळी साकारणार गोंडकालीन वैभव

चंद्रपूर - फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होऊ घातलेल्या 85 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनस्थळी गोंडकालीन वैभवाचे दर्शन घडविण्यात येणार आहे. चारही परकोट आणि महत्त्वपूर्ण वास्तूंच्या प्रतिकृती साकारण्यात येतील.
येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात हे संमेलन होत असून, मुख्य संमेलनस्थळाला "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यनगरी' असे नाव देण्यात येणार आहे. शहराच्या रचनेनुसार प्रवेशाच्या ठिकाणी चार दिशांना चार प्रवेशद्वार उभारण्यात येणार आहेत. मुख्य प्रवेशद्वारास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव राहणार असून, अन्य प्रवेशद्वारांना लोकनेते दादासाहेब देवतळे, बॅ. राजाभाऊ खोब्रागडे, चंद्रपूर जिल्हापरिषदेचे पहिले अध्यक्ष तथा माजी खासदार अब्दुल शफी यांचे नाव देण्यात येणार आहे.
मुख्य सभामंडपास महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री लोकनेते मा. सा. ऊर्फ दादासाहेब कन्नमवार यांचे नाव देण्यात येणार असून, मंडपाच्या दोन्ही द्वारांना दिवंगत राज्यमंत्री वामनराव गड्डमवार व दिवंगत आमदार नामदेवराव पोरेड्डीवार, तर दुसऱ्या सभामंडपास श्रीमती लताबेन छोटूभाई पटेल यांचे नाव देण्यात येणार आहे.
मुख्य सभामंडपाच्या व्यासपीठास 1857 नंतर गोंडवनातील स्वातंत्र्यसमराचे अग्रणी वीर बाबूराव शेडमाके यांचे नाव देण्यात येणार आहे. 1979 साली चंद्रपुरात संपन्न झालेल्या 53 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठास वीर बाबूराव शेडमाके यांचेच नाव देण्यात आले होते, हे विशेष!
संमेलनात ग्रंथप्रदर्शन प्रमुख आकर्षण असून, त्याला दिवंगत कवयित्री श्रीमती कमलादेवी दीक्षित यांचे नाव देण्यात येणार आहे. पत्रकार दालनास अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष विद्यावाचस्पती राम शेवाळकर यांचे नाव, भोजन दालनास दिवंगत नगराध्यक्ष राजमलजी पुगलिया यांचे नाव, कवी कट्ट्यास दिवंगत राज्यमंत्री यशोधरा बजाज यांचे, तर प्रकाशन कट्ट्यास दिवंगत राजे विश्‍वेश्‍वरराव महाराज यांचे नाव देण्यात येणार असल्याची माहिती संमेलनाच्या आयोजन समितीतर्फे देण्यात आली आहे.

Wednesday, December 21, 2011

विकास आमटे यांना चंद्रपूर भूषण

विकास आमटे यांना चंद्रपूर भूषण

आनंदवन - वरोरा ( चंद्रपूर) , महारोगी सेवा समितीचे सचिव विकास आमटे यांना यंदाचा चंद्रपूर भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आत्मसन्मानाचा हुंकार जागवून त्यांना जगण्याचे नवे बळ देणारे बाबा आमटे आता आपल्यात नाहीत. पण त्यांची स्वप्ने, त्यांनी दिलेली प्रेरणा आजही विकास आमटे पुढे नेत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना नाशिक येथे केसरी टूर तर्फे पुरस्कार प्रदान करण्यात आला. चंद्रपूर भूषण पुरस्कार येत्या १ जानेवारीला समाज सेविका मेधा पाटकर यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात येईल.


Friday, December 09, 2011

जन्मदिनाच्या आनंदावर मृत्यूची छाया

जन्मदिनाच्या आनंदावर मृत्यूची छाया

देवनाथ गंडाटे - सकाळ वृत्तसेवा
गोंदिया - एक डिसेंबर रोजी मनोज बिंझाडे यांचा 31 वा वाढदिवस होता. पत्नीने सकाळीच फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पोलिस सेवेत यश येवो, अशी ईश्‍वरचरणी प्रार्थनाही केली. मात्र, नियतीला त्यांच्या जन्मदिनाचा आनंद मान्य नव्हता. अवघ्या दोन-तीन तासांतच पुन्हा फोन खणखणला आणि पोलिस ठाण्यातून आलेल्या निरोपाने सर्वांच्या काळजाचे तुकडे झाले. मनोज शहीद झाल्याची बातमी कानावर पडली अन्‌ पत्नी अरुणासह कुटुंबीयांनी हंबरडाच फोडला.



देवरी तालुक्‍यातील धमदीटोला-गणूटोलाजवळील जंगलात माओवाद्यांनी केलेल्या गोळीबारात मनोज आत्माराम बिंझाडे (वय 31) हा जवान गुरुवारी शहीद झाला. मनोज मूळचे गोंदिया तालुक्‍यातील चांदणीटोला येथील रहिवासी होते. चांदणीटोला हे गाव गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा येथून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे. चार वर्षांपूर्वी मनोज पोलिस सेवेत दाखल झाले. कवलेवाडा येथील अरुणासोबत त्यांनी काही वर्षांपूर्वीच विवाह केला होता. वडील आत्माराम बिंझाडे हे पोलिस मुख्यालयाच्या शेजारीच चप्पल दुरुस्तीचे काम करतात. आई आणि अन्य दोन भावंडे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांचा जन्म एक डिसेंबर 1980 रोजी झाला. बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या मनोजला वायरिंग, जनरेटरचे काम अवगत होते. 29 सप्टेंबर 2007 मध्ये ते गोंदिया पोलिस दलात रुजू झाले. 26 मार्च 2010 रोजी सशस्त्र दूरक्षेत्र गणूटोला येथे नेमणूक झाली. नक्षलविरोधी अभियानात ते उत्कृष्ट दर्जाचे पायलट म्हणून कर्तव्य बजावत होते. बुधवारी (ता. 30) मनोज गावी येऊन गेले. तेथून कवलेवाडा येथे सासरीही गेले. दुसऱ्याच दिवशी एक डिसेंबर रोजी त्यांचा वाढदिवस होता. त्यामुळे वाढदिवसानिमित्त रजा घ्या, अशी विनंती पत्नी अरुणाने केली. मात्र, ड्यूटीमुळे त्यांना थांबता आले नाही. गुरुवारी वाढदिवसानिमित्त पत्नीने मनोजला फोन केला. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आई आणि वडिलांसोबतही ते बोलले. आपली खुशाली कळविली. मी लवकरच रजा घेऊन गावाकडे येईन, असे आश्‍वासन देत त्यांनी फोन ठेवला. वाढदिवसानिमित्त सर्वत्र आनंद असताना त्याच दिवशी काही विपरीत घडेल, असे कुणाच्याही ध्यानीमनी नव्हते. मात्र, नियतीने आपला खेळ अखेर खेळला. देवरी तालुक्‍यातील गणूटोला येथील आउटपोस्ट चौकीवर कार्यरत मनोज आणि त्यांचे सहकारी शाळेवर लावलेले नक्षलपत्रक काढण्यासाठी गेले होते. यावेळी जंगलात दबा धरून बसलेल्या सशस्त्र नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. यात ते जागीच शहीद झाले. या घटनेची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात देण्यात आली. ही दु:खद बातमी कानी पडल्यानंतर शहरापासून जवळच राहणाऱ्या चांदणीटोला येथील कुटुंबीयांना धक्काच बसला. मनोजच्या मागे पत्नी अरुणा (वय 25), आई मेहतरीन (वय 50), वडील आत्माराम (वय 55), मोठा भाऊ मयनलाल, लहानभाऊ चैनलाल, विवाहित बहीण सत्यशीला तरवरे असा परिवार आहे.



वडिलांचे स्वप्न

शहीद मनोजचे वडील आत्माराम बिंझाडे हे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या शेजारी चप्पल दुरुस्तीचे काम करतात. गेल्या अनेक वर्षांपासून ते खाकीवर्दीतील पोलिसांच्या बुटांना पॉलिश करताना आपलाही मुलगा पोलिस व्हावा, असे त्यांना वाटायचे. मनोजने ते स्वप्न पूर्ण केले. मात्र, बुटांना पॉलिश करीत असतानाच जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातून मनोज शहीद झाल्याची बातमी कानावर पडली आणि वृद्ध वडिलाच्या काळजाचे तुकडेच झाले. संबंधित बातम्या

गोंदिया जिल्ह्यात पोलिस-माओवाद्यांत चकमक
पोलिस चकमकीत दोन माओवादी ठार
मशानझुरवाच्या जंगलात पोलिस-माओवादी चकमक
खोटी माहिती देऊन साधला गेम
पोलिस- माओवाद्यांच्या चकमकीत एक जवान शहीद, पाच गंभीर



प्रतिक्रिया

On 03/12/2011 09:57 AM amit babhulkar said:

देशासाठी शहीद झालेल्या मनोज बिझांडे यांना सलाम वंदे मातरम

 
manoj binzade
गोंदिया जिल्ह्यात विशेष पथकाचे छापे

गोंदिया जिल्ह्यात विशेष पथकाचे छापे

सकाळ वृत्तसेवा
Tags: gondia, illegal business, vidarbha

गोंदिया - अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वात मागील पाच महिन्यांपासून कार्यरत विशेष पथकाने मोठी कामगिरी केली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नेतृत्वात 12 कर्मचाऱ्यांच्या विशेष पथकाने नोव्हेंबर महिन्यात मोठे गुन्हे उघडकीस आणले आहेत. अवैध दारू, जुगार, वाळूचोरी, प्राण्यांची विक्री अशा सामाजिक गुन्ह्यांच्या संबंधित गैरप्रकारांवर आळा बसत असल्याने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
नोव्हेंबर महिन्यात तीन ठिकाणी जुगार अड्ड्यांवर छापे घालून पंचवीस आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक लाख 43 हजार 465 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. गायत्रीनगर येथे आठ जणांना अटक करून 38 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. डांगोर्ली येथे आठ जुगाऱ्यांकडून दुचाकीसह 96 हजार रुपयांचा माल, एकोडी येथे नऊ आरोपींना अटक करण्यात आली.
जिल्ह्यात अवैध दारूची विक्री मोठ्या प्रमाणात होते. त्यावर आळा घालण्यासाठी 14 ठिकाणी छापे घालण्यात आले. यात 14 आरोपींकडून 57 हजार 532 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. जिल्ह्यातील जांभळी, पाटेकुर्रा, कामठा, भवानी चौक, सिंधी कॉलनी, आंबेडकर चौक, सिल्ली, गांगला, म्हसगाव, बनाथर, पारडीबांध, नवेझरी येथे छापा घालण्यात आली होती. यात काही महिला आरोपीही सापडल्या.



शहरातील अनेक हॉटेल्समध्ये घरगुती वापराचे गॅस वापरण्यात येते. बेकायदेशीररीत्या वापरण्यात येणाऱ्या या सिलिंडरवर आळा घालण्यासाठी दोन हॉटेल्सवर छापे घालून दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक लाख 22 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. मागील महिन्यात स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ काळ्याबाजारात विकत असल्याची माहिती मिळाली होती. विशेष पथकाने पांजरा येथे छापा घालून तो माल जप्त केला. रॉकेलचा काळाबाजार रोखण्यासाठी छापे घालण्यात आले.
जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यांशी जोडून असल्याने येथून जनावरांची अवैध वाहतूक होते. जनावरांची कत्तल रोखण्यासाठी पथकाने मुंडीपार, कोहमारा येथे गस्त घालून दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दहा जनावरे जप्त करण्यात आली. शहरात वाहन चोरट्यांचेही प्रमाण मोठे आहे. त्यावरही नियंत्रण ठेवण्याचे काम हे विशेष पथक करीत आहे. विनापरवाना चालणाऱ्या चायनीज, नुडल्स, चिरंजी कारखान्यावर छापे घालण्यात आले. तिथून 72 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
गोंदियाचे माजी नगराध्यक्ष आजही झोपडीतच

गोंदियाचे माजी नगराध्यक्ष आजही झोपडीतच

देवनाथ गन्डते
गोंदिया - चारदा नगरसेवक आणि 12 महिने नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळून शहरात अनेक विकासात्मक योजना राबविल्या. मात्र, स्वतःच्या मोडक्‍या-तोडक्‍या झोपडीची कधी डागडुजी केली नाही. आजही त्याच कैलारू छपराच्या निवाऱ्यात आई आणि पत्नीसह जीवन जगत आहे. रमेश ठवरे असे या निःस्वार्थी राजकारणी पुढाऱ्यांचे नाव आहे. यंदाच्या पालिका निवडणुकीत ते प्रभाग नऊमधून उमेदवार असून, संपत्तीच्या घोषवाऱ्यात त्यांनी रोख किंवा बॅंकेत कोणतीही रक्कम नसल्याची माहिती दिली आहे.



राजकारण एक व्यसन आहे. त्यामुळे राजकारणात येणारा प्रत्येक माणूस आर्थिकदृष्ट्या संपन्नच असावा लागतो. निवडणूक काळात होणारा खर्च अनेक पुढारी सत्तेच्या खुर्चीवरून काढत असतात. शिवाय मत्तेदारी वाढवून छप्पराच्या घरांना सिमेंटचा थर चढवितात. राजकारणामुळे गरिबीतून गर्भश्रीमंत झालेले अनेक उदाहरण आहेत. मात्र, येथील माजी नगराध्यक्ष रमेश ठवरे अपवाद ठरले आहेत. 1984-85च्या काळात ते तरुण होते. पंचविशीतील तरुणांच्या आग्रहाखातर त्यांनी पहिल्यांदा पालिकेची निवडणूक अपक्ष लढविली. त्यात त्यांना यश आले. येथूनच त्यांच्या राजकीय कार्याला सुरवात झाली. पाच वर्षे वॉर्डातील नागरिकांच्या समस्या सोडविल्याने पुन्हा निवडणूक लढविण्याचा आग्रह झाला. अशी 20 वर्षे त्यांनी सतत एक रुपयासुद्धा खर्च न करता विजय मिळविला. यादरम्यान त्यांना राष्ट्रवादीने तिकीट दिली होती. 1995 मध्ये नगराध्यक्षपदी विराजमान करण्यात आले. इतकी वर्षे सत्तेत राहूनही त्यांनी राजकारणाचा बाणा अंगी बाळगला नाही. केवळ समाजकारण हेच उद्देश ठेवून मतदारांचे प्रेम जिंकले आहे. शास्त्री वॉर्डात त्यांचे जुने घर आहे. ते आजही त्याच कौलारू झोपडीत आई आणि पत्नीसह राहतात. नगरसेवक, सभापती आणि नगराध्यक्षपद भूषविल्यानंतरही त्यांनी कधी पैशाची लासला बाळगलेली नाही. त्यामुळे ते सतत विजयी होत राहिले. मात्र, घराची डागडुजी तशीच राहून गेली. त्यांच्याकडे कोणतेही वाहन नाही. नगराध्यक्ष असतानादेखील शासकीय वाहनाचा खासगी कामासाठी वापर केलेला नाही. सक्रिय राजकारणातील हा आदर्श पाहून यंदाच्या पालिका निवडणुकीत भाजपने तिकीट दिली आहे. यातही ते कोणताही पैसा खर्च न करता प्रचार करीत आहेत.



पालिकेत इतकी वर्ष नगरसेवक, नगराध्यक्ष राहिले. मात्र, घराची दुरुस्ती, चैनीच्या वस्तू, दुचाकी घेण्याचा विचार त्यांनी केलेला नाही. त्यांच्या निःस्वार्थी समाजकार्यामुळे मी खूश आहे.


- अनुपमा ठवरे (पत्नी)

Sunday, November 06, 2011

शताब्दीतील कृषी संशोधन केंद्र

शताब्दीतील कृषी संशोधन केंद्र

1911मध्ये सिंदेवाही येथे कृषी संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली. सुरवातीला ऊस लागवड व संशोधन हा केंद्राच्या स्थापनेमागील उद्देश होता. मात्र, त्यानंतर कृषी हवामान, पर्जन्य
मान यांचा विचार करून विभागाच्या निकडीप्रमाणे भात बीजोत्पादन व संशोधनाचे कार्य 1922पासून सुरू करण्यात आले. 1970पासून हे केंद्र डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात आले. विदर्भातील भात संशोधनाचे हे मुख्य केंद्र आहे.


पूर्व विदर्भ विभागाकरिता 1984पासून राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पांतर्गत विभागीय कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही येथे स्थापन करण्यात आले आहे. या केंद्रांतर्गत कृषी संशोधन केंद्र, सिंदेवाही, साकोली, नवेगांवबांध, आमगांव व सोनापूर केंद्राचा समावेश आहे.

विभागीय कृषी संशोधन केंद्रात पूर्व विदर्भ विभागास उपयुक्‍त भात (धान) जातींची निर्मिती करणे, धान व धानावर आधारित पीक पद्धतीचे संशोधन करणे व मशागत तंत्रज्ञान विकसित करणे, धानाच्या निरनिराळा जातीची रोग व किडी बाबत प्रतिकारकता पडताळून पाहणे, धानावरील रोग व किडीसाठी नियंत्रणाचे उपाय शोधून काढणे, मूलभूत, पायाभूत व सत्यप्रत धान बीजोत्पादन करणे, विकसित कृषी तंत्रज्ञानाचा विस्तार करणे आदी उपक्रम घेतले जातात.

संशोधन केंद्रावर सध्या भात पिकात एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, युरिया डीएपी ब्रिकेट्‌सचा वापर, गिरीपुष्प व गराडी पाल्याचा उपयोग, रासायनिक खताचा संतुलित वापर, अधिक उत्पादनासाठी "श्री' पद्धतीचा वापर करून निरनिराळा वाणांचा प्रतिसाद पडताळून पाहणे, भाताच्या नवीन सुधारित व संकरित अधिक उत्पन्न देणाऱ्या जाती विकसित करणे त्यावर आधारित पीक पद्धतीचे संशोधन, भाताच्या निरनिराळ्या जातीची रोग व कीड प्रतिकारकता पडताळून पाहणे, सेंद्रिय, जैविक व रासायनिक खताचा उपयोग, धानानंतर दुबार पिकासाठी पूरक सिंचनाच्या वापराबाबत संशोधन, विद्यापीठाने शिफारस केलेले तंत्रज्ञान अवलंबनामध्ये शेतकऱ्यांच्या अडचणींचा अभ्यास, इत्यादी संशोधनाचे कार्य सुरू आहे. याव्यतिरिक्‍त कृषी मेळावे, शिवार फेरी, प्रदर्शन, चर्चासत्रे, विविध पिकांची प्रात्यक्षिके, प्रशिक्षणाचे आयोजन, शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी व मार्गदर्शन, त्याचप्रमाणे वृत्तपत्र, शेतकरी मदत वाहिनी दूरध्वनीद्वारे, आकाशवाणी, दूरदर्शन इत्यादी प्रसार माध्यमाद्वारे येथील शास्त्रज्ञांद्वारे सुधारित कृषी तंत्रज्ञान विस्ताराचे कार्य या विभागात सुरू आहे.



कृषी हवामान सल्ला सेवा योजना

कृषी हवामान सल्ला सेवा योजनेची सुरवात डिसेंबर 1995 मध्ये विभागीय कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही येथे झाली. या योजनेस भारत सरकारच्या विज्ञान आणि प्राद्योगिक विभाग, राष्ट्रीय मध्यम कालावधी हवामान अंदाज केंद्र, नोयडा नवी दिल्लीमार्फत अर्थसाहाय्य पुरविले जाते. कृषी हवामान सल्ला सेवा योजनेअंतर्गत प्रत्येक आठवड्याच्या दर मंगळवारी विभागीय कृषी संशोधन केंद्रामार्फत हवामान अंदाजावर शेतकऱ्यांसाठी शेतीविषयक विविध कामाबाबतचा संदेश प्रसारित केला जातात.



भात पैदास

भाताच्या विविध जाती निर्माण करणे, विविध वाणाच्या चाचण्या घेणे व बियाणे उत्पादन करणे इत्यादी कार्य या केंद्रावर सुरू आहेत. त्याचप्रमाणे भात पिकाचे बीजोत्पादन व लागवड तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचे कार्य येथील शास्त्रज्ञांमार्फत सुरू आहे. विद्यापीठाद्वारे सुधारित धान जातींचा विकास केला आहे. यात सिंदेवाही, साकोली, पीकेव्ही एचएमटी, पीकेव्ही मकरंद, पीकेव्ही गणेश, पीकेव्ही खमंग आदी यांचा समावेश आहे.



कृषी विस्तार उपक्रम

सिंदेवाही कृषी विज्ञान केंद्र फेब्रुवारी 2000पासून पुर्नगठित व एप्रिल 2004पासून स्थायी स्वरूपात कार्यरत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कृषी विस्ताराचे कार्य केंद्राद्वारे केले जाते. यामध्ये शेतकऱ्याच्या शेतावर प्रथमरेषीय प्रात्यक्षिके, शेतीदिन, प्रर्दशनीचे आयोजन, शेतकरी, ग्रामीण युवक व युवती, विस्तार कर्मचारी यांना कृषी विषयक प्रशिक्षण देणे, स्वयंरोजगार संबंधी प्रशिक्षण, चर्चासत्रे, किसान मेळावा, शिवार फेरी व किसान गोष्टी इत्यादींचे आयोजन करण्यात येते. शेतकऱ्यांसाठी "किसान हेल्प लाइन' पाच वर्षापासून कार्यरत आहे.



--

Devnath Gandate

Reporter Sakal Newspaper

chandrapur

9922120599



http://kavyashilpa.blogspot.com













Wednesday, November 02, 2011

चंद्रपूर जिल्ह्यात सरासरी 75 टक्के जलसाठा

चंद्रपूर जिल्ह्यात सरासरी 75 टक्के जलसाठा

चंद्रपूर - यंदा उशिरा आणि अनियमित पडलेल्या पावसामुळे जलसाठ्यांची पातळी दरवर्षीपेक्षा खालावलेली आहे. गत पाच महिन्यांत सरासरीपेक्षा कमी म्हणजेच केवळ 82. 6 टक्केच पाऊस झाला. त्यामुळे ऑक्‍टोबर अखेरपर्यंत सिंचन प्रकल्पात 75 टक्केच जलसाठा आहे. यामुळे रब्बी हंगामावर परिणाम होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.
जून-जुलै महिन्यात पावसाने दगा दिल्याने पेरणी आणि रोवणीची कामे खोळंबली होती. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात कोरडी पडलेली जलाशये भरून निघाली नाहीत. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोनच महिन्यात पाऊस झाला. जिल्ह्यात सरासरी 1194.3 मिमी. पावसाची अपेक्षा असते. मात्र, प्रत्यक्षात 996 मिमी. इतका पाऊस झाला. ऑगस्टमध्ये आसोला, इरई, घोडाझरी हे प्रकल्प तुडुंब भरले होते. मात्र, त्यानंतर पावसाने दगा दिल्याने ऑक्‍टोबर अखेरपर्यंत जलसाठे 75 टक्‍क्‍यांच्या पुढे गेलेले नाहीत. इरई धरणाची जलक्षमता 160 दशघमी इतकी आहे. सद्य:स्थितीत 155 दशघमी म्हणजेच 97 टक्के पाणी उपलब्ध आहे. यातून महाऔष्णिक वीज केंद्र आणि चंद्रपूर शहराची तहान भागविली जाते. याच जलसाठ्यावर 2012 मधील उन्हाळ्यातील तहान भागवायची आहे. 56 दशघमी क्षमता असलेल्या सावली तालुक्‍यातील आसोला मेंढा तलावात 35 दशघमी (61 टक्के) जलसाठा उपलब्ध आहे. या तलावावर रब्बीची भिस्त असून, सावली, मूल, पोंभूर्णा तालुक्‍यातील शेतकरी अवलंबून आहेत. याच तलावात गतवर्षी 41 दशघमी इतका जलसाठा होता. 2009 मध्ये केवळ 7 दशघमी इतका अल्पसाठा राहिल्याने कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागला होता.
जिल्ह्यात एकूण आठ मध्यम प्रकल्प आहेत. 140 दशघमी सिंचनक्षमता असून, आजच्या स्थितीत 106 दशघमी जलसाठा आहे. मागील आठवड्यात 118 दशघमी जलसाठा होता. त्यात 12 दशघमी पाण्याची घट झालेली आहे. 2009 मध्ये कोरडा दुष्काळ पडल्याने केवळ 45 दशघमी इतका कमी साठा शिल्लक होता. याशिवाय 88 लघू प्रकल्प असून, 103 दशघमी क्षमता आहे. आज 67 दशघमी पाणी शिल्लक आहे.

प्रकल्प........क्षमता........उपलब्ध साठा

(दशघमीमध्ये)

इरई..........160.........155

आसोलामेंढा.....56.......34

मध्यम प्रकल्प....140......106

लघू प्रकल्प..........103........67

Tuesday, November 01, 2011

फॅन्सीचे आकर्षण; घोंगडीनिर्मात्यांवर उपासमार

फॅन्सीचे आकर्षण; घोंगडीनिर्मात्यांवर उपासमार

चंद्रपूर - नव्या आकर्षक डिझाईनची वस्तू बाजारात आल्या की जुन्या कितीही चांगल्या असल्यातरी अर्थ उरत नाही. हिवाळ्याच्या दिवसात थंडीपासून बचाव करणारे लोकरी कपडेही प्रत्येकाला नवे कोरे पाहिजे आहे. बाजारात तिबेटीयननिर्मित लोकरी वस्तू विकू लागल्या आहेत. त्यामुळे लोकरीपासून कापड तयार करणाऱ्या धनगरांवर आता उपासमार आली आहे.

वाढते औद्योगिकीकरण कुटीर उद्योगांना ग्रहण ठरत आहे. एकेकाळी मागणी असणाऱ्या घोंगडी उद्योग यांत्रिकीकरणामुळे हतबल ठरला आहे. मेंढीच्या लोकरीपासून घोंगडी, मफलर, स्वेटर, बसण्याच्या पट्ट्या तयार केल्या जातात. मेंढीपासून मिळणारी लोकर पिंजून काढल्यानंतर कुटुंबातील सदस्य चरख्यावर धागे काढून सुताच्या कांड्याना पाटी, ताना म्हणून पसरवीत. त्यावेळी ती 10 फूट लांब असते. नंतर ती मागावर लावून लांबीचे थान तयार होतात. याला पट्टी म्हटले जाते. दोन पट्ट्यांना जोडून एक घोंगडी तयार होते. ग्रामीण भागात घोंगडीला मागणी आहे. मात्र, शहरी भागात रेडिमेडची मागणी असल्याने विक्रीत मोठी घट झाल्याचे नवरगाव येथील व्यावसायिक शंकर कन्नावार यांनी सांगितले.



जिल्ह्यातील नवरगाव, नागभीड, वाढोणा, चांदापूर, खेडी, चिचबोळी, चांदली, गडीसुर्ला, जुनासुर्ला, नांदगाव, बेंबाळ, भंगाराम तळोधी, मूल शहरात, गडचिरोली जिल्ह्यातील आमगाव, कोटगल, इंदाळा, रामाळा, सगणापूर, चामोर्शी, तर भंडारा जिल्ह्यातील चिंचाळ, जैतपूर, नेरला, गोसे, रोहा, सिलेगाव, सिहोरा, मांढळ, मिटेवानी, खैरी, दांडेगाव, खापरी, पाथरी, तिरोडी येथे धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे. यातील बोटावर मोजण्याइतकेच कुटुंब घोंगडी उद्योग करतात. नवरगाव आणि खेडी येथे स्वेटर आजही तयार होत आहेत. मात्र, फॅन्सी आणि रेडिमेड कपड्यांमुळे व्यवसायाची गती मंदावली आहे. नवरगाव येथे सुकरू सिंगिरवार, जुनासुर्ला येथे मारुती कोरेवार, भंगाराम तळोधी येथील बिरा येग्गेवार, गडचिरोली येथील सुकरू कंकलवार आजही याच व्यवसायावर जीवन जगत आहेत.

Wednesday, September 28, 2011

आता कचऱ्यापासून वसतिगृहात लखलखाट

आता कचऱ्यापासून वसतिगृहात लखलखाट



चंद्रपूर - महाविद्यालयातील वसतिगृहातून निघणारा कचरा एरवी रस्त्यावर फेकून दिला जायचा. या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, हा मोठाच प्रश्‍न होता; मात्र प्राचार्यांच्या सुपीक डोक्‍यात एक कल्पना आली आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातील पहिला प्रयोग साकार झाला. विद्यार्थ्यांनीच फेकलेल्या कचऱ्यातून त्यांच्याच वसतिगृहातील खोल्यांमध्ये आता लखलखाट होत आहे.
येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये हा प्रयोग साकार झाला आहे. "बायोमॉस टू इलेक्‍ट्रिसिटी' हा कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प तीन वर्षांआधी या महाविद्यालयात सुरू करण्यात आला. पूर्ण क्षमतेने तो सुरू आहे. 15 किलोवॉट वीजनिर्मिती सध्या होत आहे. या विजेचा उपयोग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी होत आहे. यासाठी वसतिगृहातील केरकचरा आणि शौचालयातील मलमूत्राचा वापर केला जात आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर काही दिवसांपूर्वीच शंभर किलोवॉटचा प्रकल्प येथे लावण्यात आला आहे. यासाठी 121.5 टन कचऱ्याची रोज आवश्‍यकता आहे. याला चंद्रपूर नगरपालिका पूर्ण सहकार्य करीत आहे. रोज न चुकता शहरातील गोळा केलेला कचरा महाविद्यालयात आणून टाकला जात आहे. या कचऱ्यातून "वेस्ट' वेगळे करण्यासाठी मजुरांची व्यवस्था करण्यात आली आहे. हा 25 लाख रुपयांचा प्रकल्प आहे. डॉ. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प सुरू आहे. यावर स्वत: महाविद्यालयाचे प्राचार्य कीर्तिवर्धन दीक्षित लक्ष ठेवून आहेत. अशाप्रकारचा प्रकल्प सुरू करणारे विदर्भातील हे एकमेव महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाला महिन्याकाठी तीन लाख रुपये वीजबिल येते. आता हा आकडा कमी होईल, असे दीक्षित यांनी सांगितले. यासोबतच एकट्या वसतिगृहाचे वीजबिल 15 हजार रुपयांच्या घरात होते. आता ते शून्यावर आले आहे. विशेष असे की, काही वर्षांपासून या महाविद्यालयात अक्षय ऊर्जा पार्क सुरू करण्यात आला होता. येत्या काही दिवसांत येथे सहा किलोवॉटचा सोलर प्रोजेक्‍ट उभा केला जाणार आहे.
आता कचऱ्यापासून वसतिगृहात लखलखाट

आता कचऱ्यापासून वसतिगृहात लखलखाट



चंद्रपूर - महाविद्यालयातील वसतिगृहातून निघणारा कचरा एरवी रस्त्यावर फेकून दिला जायचा. या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, हा मोठाच प्रश्‍न होता; मात्र प्राचार्यांच्या सुपीक डोक्‍यात एक कल्पना आली आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातील पहिला प्रयोग साकार झाला. विद्यार्थ्यांनीच फेकलेल्या कचऱ्यातून त्यांच्याच वसतिगृहातील खोल्यांमध्ये आता लखलखाट होत आहे.
येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये हा प्रयोग साकार झाला आहे. "बायोमॉस टू इलेक्‍ट्रिसिटी' हा कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प तीन वर्षांआधी या महाविद्यालयात सुरू करण्यात आला. पूर्ण क्षमतेने तो सुरू आहे. 15 किलोवॉट वीजनिर्मिती सध्या होत आहे. या विजेचा उपयोग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी होत आहे. यासाठी वसतिगृहातील केरकचरा आणि शौचालयातील मलमूत्राचा वापर केला जात आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर काही दिवसांपूर्वीच शंभर किलोवॉटचा प्रकल्प येथे लावण्यात आला आहे. यासाठी 121.5 टन कचऱ्याची रोज आवश्‍यकता आहे. याला चंद्रपूर नगरपालिका पूर्ण सहकार्य करीत आहे. रोज न चुकता शहरातील गोळा केलेला कचरा महाविद्यालयात आणून टाकला जात आहे. या कचऱ्यातून "वेस्ट' वेगळे करण्यासाठी मजुरांची व्यवस्था करण्यात आली आहे. हा 25 लाख रुपयांचा प्रकल्प आहे. डॉ. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प सुरू आहे. यावर स्वत: महाविद्यालयाचे प्राचार्य कीर्तिवर्धन दीक्षित लक्ष ठेवून आहेत. अशाप्रकारचा प्रकल्प सुरू करणारे विदर्भातील हे एकमेव महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाला महिन्याकाठी तीन लाख रुपये वीजबिल येते. आता हा आकडा कमी होईल, असे दीक्षित यांनी सांगितले. यासोबतच एकट्या वसतिगृहाचे वीजबिल 15 हजार रुपयांच्या घरात होते. आता ते शून्यावर आले आहे. विशेष असे की, काही वर्षांपासून या महाविद्यालयात अक्षय ऊर्जा पार्क सुरू करण्यात आला होता. येत्या काही दिवसांत येथे सहा किलोवॉटचा सोलर प्रोजेक्‍ट उभा केला जाणार आहे.
दहा कोटींसाठी नऊ पर्यटनस्थळे '"भकास'

दहा कोटींसाठी नऊ पर्यटनस्थळे '"भकास'

चंद्रपूर - जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिलेली जिल्ह्यातील नऊ पर्यटनस्थळे आणि 13 तीर्थस्थळे अद्याप उपेक्षितच आहेत. याच्या विकासासाठी जवळपास दहा कोटींची आवश्‍यकता आहे; मात्र यातील 20 टक्केसुद्धा निधी खर्च झालेला नाही. यामुळे जिल्ह्यातील प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा काळाच्या पडद्याआड जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. पर्यटनस्थळे विकसित झाली असती, तर अनेकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या असत्या.
जिल्हा नियोजन समितीने 2007 मध्ये जिल्ह्यातील नऊ पर्यटनस्थळांच्या विकासाची योजना हाती घेतली. यात चंद्रपूर तालुक्‍यातील रामाळा तलाव, जुनोना तलाव, मूल तालुक्‍यातील सोमनाथ, भद्रावती शहरातील प्राचीन मंदिरासह डोंगरगाव (खडी), मोहुर्ली (ताडोबा), ब्रह्मपुरी तालुक्‍यातील घोडाझरी प्रकल्प, राजुरा तालुक्‍यातील माणिकगड किल्ला आणि चिमूर तालुक्‍यातील आसोला (मेंढा) सिंचन प्रकल्पाचा समावेश होता. या स्थळांना पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी दहा कोटी रुपयांची आवश्‍यकता होती. त्यांपैकी एक कोटी 86 लाख रुपयांचा निधी आतापावेतो मिळाला आहे. विकासाच्या नावावर थातूरमातूर डागडुजी करण्यात आली. तेव्हापासून याकडे लक्ष देण्यात आले नाही. सोमनाथ येथे धबधबा आहे. तिथे दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात; मात्र सोयीसुविधांचा अभाव असल्याने आता पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. आसोलामेंढा येथेही मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. माणिकगड किल्ल्याची तर वाईट अवस्था आहे. भग्नावस्थेतेतील किल्ला आता चोरांचे माहेरघर झाले आहे; मात्र नियोजन समितीने याच्या विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार केला. त्यानंतर त्यांनाही याचा विसर पडला.
याच बैठकीत तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत 13 तीर्थस्थळांना मंजुरी दिली आहे. यात महाकालीमंदिर, वढा, रामदेगी, अड्याळ टेकडी, आळगाव येथील त्रिवेणी संगम, नागभीड येथील शिवमंदिर टेकडी, जोगापूर, मराई पाटण, कोंडय्या महाराज देवस्थान, सात बहिणी जंगल, चिमूर घोडायात्रा, बालाजी देवस्थान, तपोवन भूमी गोंदेडा याचा समावेश आहे. यातील बहुतांश तीर्थस्थळी दरवर्षी यात्रा भरते; मात्र पुरेशा सोयी नसल्याने भाविकांची मोठी गैरसोय होते. गोंडपिंपरी तालुक्‍यातील धाबा येथील कोंडय्या महाराजांच्या देवस्थानात तर आंध्रप्रदेशातील भाविक येतात. महाकाली यात्रेसाठीही राज्याच्या कानाकोपऱ्यातून भक्त येथे येतात. त्यांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागतो.
या तीर्थस्थळांच्या विकासासाठी जवळपास चार कोटी रुपयांची आवश्‍यकता आहे. आतापर्यंत केवळ 15 लाख रुपयेच प्राप्त झाले आहेत. पर्यटनस्थळे आणि तीर्थस्थळांच्या विकासासाठी सन 2007 मध्ये 14 कोटींचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. आजघडीला ही किंमत आणखी वाढली आहे. यासाठी मिळणारा निधी केंद्र पुरस्कृत योजनांवर आधारित असतो. त्यामुळे यासाठी पुरेसा निधी प्राप्त होऊ शकत नाही. राज्य शासनाने हा निधी उपलब्ध करून दिल्यास जिल्ह्यातील पर्यटनस्थळे व तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी चालना मिळेल, असे प्रशासनातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी सांगत असतात; मात्र यासाठी प्रयत्न कोण करणार, याचे उत्तर मात्र कुणाकडे नाही
दहा कोटींसाठी नऊ पर्यटनस्थळे '"भकास'

दहा कोटींसाठी नऊ पर्यटनस्थळे '"भकास'

चंद्रपूर - जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिलेली जिल्ह्यातील नऊ पर्यटनस्थळे आणि 13 तीर्थस्थळे अद्याप उपेक्षितच आहेत. याच्या विकासासाठी जवळपास दहा कोटींची आवश्‍यकता आहे; मात्र यातील 20 टक्केसुद्धा निधी खर्च झालेला नाही. यामुळे जिल्ह्यातील प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा काळाच्या पडद्याआड जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. पर्यटनस्थळे विकसित झाली असती, तर अनेकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या असत्या.
जिल्हा नियोजन समितीने 2007 मध्ये जिल्ह्यातील नऊ पर्यटनस्थळांच्या विकासाची योजना हाती घेतली. यात चंद्रपूर तालुक्‍यातील रामाळा तलाव, जुनोना तलाव, मूल तालुक्‍यातील सोमनाथ, भद्रावती शहरातील प्राचीन मंदिरासह डोंगरगाव (खडी), मोहुर्ली (ताडोबा), ब्रह्मपुरी तालुक्‍यातील घोडाझरी प्रकल्प, राजुरा तालुक्‍यातील माणिकगड किल्ला आणि चिमूर तालुक्‍यातील आसोला (मेंढा) सिंचन प्रकल्पाचा समावेश होता. या स्थळांना पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी दहा कोटी रुपयांची आवश्‍यकता होती. त्यांपैकी एक कोटी 86 लाख रुपयांचा निधी आतापावेतो मिळाला आहे. विकासाच्या नावावर थातूरमातूर डागडुजी करण्यात आली. तेव्हापासून याकडे लक्ष देण्यात आले नाही. सोमनाथ येथे धबधबा आहे. तिथे दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात; मात्र सोयीसुविधांचा अभाव असल्याने आता पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. आसोलामेंढा येथेही मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. माणिकगड किल्ल्याची तर वाईट अवस्था आहे. भग्नावस्थेतेतील किल्ला आता चोरांचे माहेरघर झाले आहे; मात्र नियोजन समितीने याच्या विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार केला. त्यानंतर त्यांनाही याचा विसर पडला.
याच बैठकीत तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत 13 तीर्थस्थळांना मंजुरी दिली आहे. यात महाकालीमंदिर, वढा, रामदेगी, अड्याळ टेकडी, आळगाव येथील त्रिवेणी संगम, नागभीड येथील शिवमंदिर टेकडी, जोगापूर, मराई पाटण, कोंडय्या महाराज देवस्थान, सात बहिणी जंगल, चिमूर घोडायात्रा, बालाजी देवस्थान, तपोवन भूमी गोंदेडा याचा समावेश आहे. यातील बहुतांश तीर्थस्थळी दरवर्षी यात्रा भरते; मात्र पुरेशा सोयी नसल्याने भाविकांची मोठी गैरसोय होते. गोंडपिंपरी तालुक्‍यातील धाबा येथील कोंडय्या महाराजांच्या देवस्थानात तर आंध्रप्रदेशातील भाविक येतात. महाकाली यात्रेसाठीही राज्याच्या कानाकोपऱ्यातून भक्त येथे येतात. त्यांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागतो.
या तीर्थस्थळांच्या विकासासाठी जवळपास चार कोटी रुपयांची आवश्‍यकता आहे. आतापर्यंत केवळ 15 लाख रुपयेच प्राप्त झाले आहेत. पर्यटनस्थळे आणि तीर्थस्थळांच्या विकासासाठी सन 2007 मध्ये 14 कोटींचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. आजघडीला ही किंमत आणखी वाढली आहे. यासाठी मिळणारा निधी केंद्र पुरस्कृत योजनांवर आधारित असतो. त्यामुळे यासाठी पुरेसा निधी प्राप्त होऊ शकत नाही. राज्य शासनाने हा निधी उपलब्ध करून दिल्यास जिल्ह्यातील पर्यटनस्थळे व तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी चालना मिळेल, असे प्रशासनातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी सांगत असतात; मात्र यासाठी प्रयत्न कोण करणार, याचे उत्तर मात्र कुणाकडे नाही

Tuesday, September 13, 2011

शासकीय दुग्ध योजनेला परभणीच्या टॅंकरचा टेकू

शासकीय दुग्ध योजनेला परभणीच्या टॅंकरचा टेकू

श्रीकांत पेशट्टीवार
चंद्रपूर - राज्यात दूधसंकलन कमी झाले आहे. त्यातच दुग्ध सहकारी सोसायट्यांनीही पाठ फिरवल्याने शासकीय दुग्ध योजना अडचणीत आली आहे. सध्या परभणी येथून येणाऱ्या दुधावरच काम चालविले जात आहे. तेथील टॅंकर आल्यानंतरच चंद्रपूरकरांची दुधाची तहान भागते.
शहरातील शासकीय दूध डेअरीमार्फत दररोज 15 हजार लिटर दुधाचा पुरवठा केला जात आहे. यातील दहा हजार लिटर दूध एकट्या परभणीतून मिळते. उर्वरित पाच हजार लिटर दूध गोंदिया जिल्ह्यातील कोहमारा, नागभीड येथील काही दुग्ध सहकारी संस्थांमार्फत मिळत आहे. गेल्या काही वर्षांत दूधसंकलन कमी झाले आहे. त्यामुळेच जिल्ह्यास पाहिजे तसा दुधाचा पुरवठा होत नसल्याचे विभागाकडून सांगण्यात येत आहे. 17 ते 18 हजारांहून अधिक लिटरची जिल्ह्यात दुधाची आवश्‍यकता दररोज असते; परंतु हा पुरवठा होऊ शकत नाही. परिणामी बऱ्याच जणांना दूध मिळत नाही.

शहरात शासकीय दूध डेअरीचे 60 वितरक आहेत. या वितरकांना स्टेजनुसार कमिशन दिले जाते. त्यांच्याकडून दररोज वाढीव मागणी केली जात आहे; मात्र कमी दुधामुळे त्यांनाही कमीच दूध देण्यात येत आहे. खासगी दूध कंपन्या जास्त भाव देतात. त्यामुळे दुग्ध उत्पादक संस्था त्यांनाच दूध देतात. खासगी दूध कंपन्या वितरकांनाही जास्त कमिशन देतात. त्यामुळे हे वितरक शासकीय दुधासोबतच खासगी दुधाची मोठ्या प्रमाणावर विक्री करीत आहेत. जिल्ह्यात दोनशेच्या घरात दुग्ध सहकारी संस्था आहेत; मात्र यातील अर्ध्याअधिक बंद आहेत. सद्य:स्थितीत नागभीड येथील दहा आणि चंद्रपूर तालुक्‍यातील सहा दुग्ध सहकारी संस्था सुरू आहेत; मात्र या दुग्ध सहकारी सोसायट्यांकडून पाहिजे तसे दूध मिळत नाही. पाच वर्षांपूर्वी येथे 30-32 हजार लिटर दुधाची निर्मिती केली जात होती. आता मात्र 15 हजार लिटरची निर्मिती केली जात आहे. पूर्वी जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यांत दुधाचा पुरवठा केला जात होता. आता मात्र राजुरा आणि बल्लारपूर तालुक्‍यातच दुधाचा पुरवठा केला जात आहे. एकूणच शासकीय दुग्ध योजनेतून दूध कमी मिळत असल्याने खासगी दूध विक्रेत्यांची चांदी होत आहे.

कनेरीचे शीतसंकलन केंद्र कुलूपबंद
गडचिरोली जिल्ह्यातील कनेरी येथे दुग्ध शीतकरण केंद्र आहे; मात्र ते वर्षभरापासून बंद आहे. दुधाचा पुरवठा कमी आणि वाहतूक खर्च जास्त असल्यानेच हे संकलन केंद्र बंद करण्यात आले. आता फक्त चार चौकीदार या केंद्राची राखण करीत आहेत. 

Thursday, September 08, 2011

16 लाख 17 हजार 709 रुपयांची पीकहानी

16 लाख 17 हजार 709 रुपयांची पीकहानी

चंद्रपूर - मागील चार महिन्यांत वन्यप्राण्यांनी शेतकऱ्यांना त्रस्त करून सोडले आहे. एकट्या चंद्रपूर वनविभागामध्ये 16 लाख 17 हजार 709 रुपयांची पीकहानी झाली आहे. शेतकऱ्यांना एवढ्या रकमेची नुकसानभरपाईसुद्धा देण्यात आली आहे. हा आकडा शासकीय आहे. हे नुकसान कोट्यवधींच्या घरात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच दोन मानवांचा जीवही श्‍वापदांनी घेतला असून, तब्बल 128 पाळीव जनावरांनाही त्यांनी ठार केले.
चंद्रपूर वनविभागामध्ये वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, मोहर्ली, चिचपल्ली, मूल, शिवणी व पळसगाव परिक्षेत्राचा समावेश आहे. हे क्षेत्र ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या क्षेत्राला लागून आहे. या वनविभागाचे बरेचसे क्षेत्र बफरझोनअंतर्गत समाविष्ट आहे. त्यामुळे या विभागात वन्यप्राण्यांचा वावर फार मोठ्या प्रमाणात आहे. विशेषत: पट्टेदार वाघ, बिबटे आणि रानडुकरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जंगलालगत राहणारे नागरिक सरपण वा इतर कारणांसाठी जंगलात जातात. त्यामुळे वन्यप्राण्यांद्वारे मानवांवर हल्ले झाले आहेत. गुराखी जनावरे जंगलात चरायला नेतात, तेव्हाही जनावरांवर हल्ले झाले आहेत. तसेच एप्रिल आणि मे महिन्यात जंगलातील नैसर्गिक जलसाठे कोरडे होतात. त्यामुळे जंगलातील वन्यप्राणी शिकार आणि पाण्यासाठी गावांकडे आपला मोर्चा वळवितात. तेव्हाही त्यांच्याकडून हल्ले झाल्याच्या घटनाही या काळात झाल्या आहेत. एप्रिल- 2011 ते जुलै- 2011 या कालावधीत चंद्रपूर वनविभागाला वन्यप्राण्यांच्या धुडगुसामुळे 31 लाख रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागला. या काळात श्‍वापदांच्या हल्ल्यांत दोन व्यक्तींचा जीव गेला. त्यांना नुकसानभरपाई म्हणून चार लाख रुपये देण्यात आले. तसेच सहा जण जखमी झाले. त्यांनाही दोन लाख 66 हजार 525 रुपयांचे वाटप करण्यात आले. या चार महिन्यांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत तब्बल 128 पाळीव जनावरांचे बळी गेले. त्यापोटी आठ लाख 75 हजार 675 रुपये जनावरांच्या मालकांना आर्थिक मदत देण्यात आली. तृणभक्षक प्राण्यांचाही उपद्रव या काळात मोठा होता. पिकांच्या हानीच्या जवळपास एक हजार 87 घटना या काळात घडल्या. त्यासाठी शेतमालकांना वनविभागाने 16 लाख 17 हजार 709 रुपये दिले.

या घटना अलीकडे वाढायला लागल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर वन्यप्राण्यांद्वारे हानी झाल्यास त्याची माहिती जवळच्या वनाधिकारी यांच्याकडे 48 तासांच्या आत लिखित द्यावी लागते. तरच मदत मिळू शकते. प्रतिबंधित क्षेत्रात व संरक्षित क्षेत्रात एकट्याने जाऊ नये, असे आवाहन वनविभाग नेहमीच करतो; मात्र या प्रतिबंधित क्षेत्रात गावकरी जातात कसे, याचे उत्तर वनविभागाकडे नाही.

या हेल्पलाइनवर साधा संपर्क
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत काही अनुचित घटना घडल्यास त्याची माहिती 48 तासांच्या आत द्यावी लागते; तरच मदत मिळू शकते. सोबत वन्यप्राण्यांच्या शिकारीवर आळा बसावा, यासाठी वनविभागाने हेल्पलाइन तयार केली आहे. यानुसार, 155314 या क्रमांकार थेट संपर्क साधता येऊ शकतो.

Sunday, September 04, 2011

सात वर्षांत साडेतीन लाख पर्यटक

सात वर्षांत साडेतीन लाख पर्यटक


चंद्रपूर - जागतिक नकाशावर नाव असलेल्या येथील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात मागील सात वर्षांत तीन लाख 84 हजार 923 पर्यटकांनी भेट दिली असून, नऊ कोटी 36 लाख सात हजार 824 रुपयांचा महसूल ताडोबा व्यवस्थापनाला प्राप्त झाला आहे. मागील सात वर्षांत "वाघोबा'च्या दर्शनासाठी पर्यटकांची संख्या दरवर्षी वाढतच गेली आहे. यावर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंत 78 हजार 881 पर्यटकांनी भेट दिली आहे. आता बफरझोनमध्ये निसर्ग पर्यटनाची सोय होणार असल्याने येथे पर्यटकांची संख्या आणखी वाढणार आहे. या भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. 
यावर्षी या ताडोबा प्रकल्पास 78 हजार 881 पर्यटकांनी भेट दिली आहे. या आर्थिक वर्षापर्यंत हा आकडा एक लाखाच्या घरात जाईल, अशी शक्‍यता आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफरझोनमध्ये पुढील मोसमापासून निसर्ग पर्यटन सुरू केले जात आहे. सध्या त्याची जोरात तयारी सुरू आहे. यासाठी निवडलेल्या 11 रस्त्यांच्या सुधारणेसाठी जिल्हा विकास नियोजन मंडळाने निधीही मंजूर केला आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान व अंधारी अभयारण्य यांचे एकूण क्षेत्र 625 चौरस किलोमीटर आहे. या प्रकल्पाला लागून वनविभागाचे तीन विभाग आहेत. त्यांच्या ताब्यात सध्या एक हजार 150 चौरस किलोमीटर एवढे क्षेत्र आहे. हाच भाग बफरझोन म्हणून जाहीर झाला आहे. या झोनमध्ये 79 गावे वसली आहेत. या गावांतील लोकांना निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून आता रोजगार उपलब्ध होणार आहे. निसर्ग पर्यटनासाठी एकूण 50 किलोमीटरचे रस्ते निर्माण केले जात आहेत. यामध्ये केसलाघाट ते सोमनाथ हा 25 किलोमीटरचा, तर नवरगाव चौकी-देवाडा-मोहर्ली हा 15 किलोमीटरचा मार्ग झपाट्याने विकसित केला जात आहे. निसर्ग पर्यटन सुरू करण्यामागे बफरझोनमधील गावांचा विकास करणे, हा एकमेव उद्देश आहे. पर्यटनाच्या माध्यमातून जो निधी शासनाकडे जमा होईल, त्यातून गावांतील पायाभूत सोयीसुविधा निर्माण करणे, हे महत्त्वाचे कार्य असणार आहे. यामुळे या व्याघ्र प्रकल्पातील पर्यटकांची संख्या आता आणखी वाढणार आहे.


वर्ष पर्यटक
03-04.........
35,944
04-05........ 36,325
05-06............... 35,640
06-07............... 43,345
07-08............... 61,790
08-09............... 68,183
09-10.............. 1,03,593
10-11.................. 78,881............ (ऑगस्ट महिन्यापर्यंत)
36 जागांसाठी चालणार तीन हजार दोनशे उमेदवार

36 जागांसाठी चालणार तीन हजार दोनशे उमेदवार


चंद्रपूर - चंद्रपूर वनवृत्तात सध्या वनरक्षकपदाकरिता भरतीप्रक्रिया सुरू असून, या प्रक्रियेत 36 जागांसाठी तीन हजार 200 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यंदा प्रथम पुरुषांना 25 किलोमीटर, तर महिलांना 16 किलोमीटर पायी चालावे लागणार आहे.
चालण्याची चाचणी 12 सप्टेंबरला होत असून, या चाचणीतून एका पदास तीन उमेदवारांची निवड करण्यात येणार आहेत. जे उमेदवार कमीत-कमी वेळात चाचणी पूर्ण करतील, त्यांचीच निवड होणार असल्याने ही चाचणी स्पर्धात्मक स्वरूपाची होणार आहे. ही चाचणी सुरू असताना पारदर्शकता आणण्यासाठी व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येईल. चालण्याच्या चाचणीत निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची ठरवून दिलेल्या मापदंडाच्या अधीन राहून शारीरिक मोजमाप शासकीय वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून घेण्यात येणार आहे. चालण्याच्या चाचणीत व शारीरिक मोजमापामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची मौखिक चाचणी 19 सप्टेंबरला होईल. चाचणीसाठी 12.50 एवढेच गुण ठेवण्यात आलेले आहेत. या मौखिक चाचणीचीदेखील व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येणार आहे. 
अर्हता परीक्षेतील प्राप्त गुणांना 87.50 टक्‍के एवढे भारांकन देण्यात आलेले आहे. अर्हता परीक्षेतील 87.50 गुण व मौखिक चाचणीचे 12.50 गुण याप्रमाणे गुणवत्तायादी तयार करून उमेदवारांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात येईल. या सर्व चाचण्यांमध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांचीच रिक्‍तपदांच्या प्रमाणात अंतिम यादी तयार होईल.
भरतीदरम्यान कोणाच्याही आमिषाला बळी न पडता आपली फसवणूक होणार नाही, याची काळजी घ्यावी; तसेच अशाप्रकारे वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी किंवा इतर कुणीही पैशाची मागणी केल्यास पोलिस ठाणे किंवा लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदवावी.
-पी. कल्याणकुमार, उपवनसंरक्षक 
उमेदवारांना मिळणार चाचणीची चित्रफीत
भरतीप्रक्रियेदरम्यान नोकरीकरिता मोठ्या प्रमाणात चढाओढ असते. अशावेळी आमिष दाखवून खोटी माहिती देऊन फसवणूक केली जाते. भरतीप्रकियेत संपूर्ण चित्रीकरण होणार आहे. एखाद्या उमेदवाराने सत्यता पडताळण्यासाठी चित्रफितीची मागणी केल्यास ती अल्प किमतीत उपलब्ध होईल

Monday, August 22, 2011

व्यस्ततेत अडला दारूबंदीचा अहवाल!

व्यस्ततेत अडला दारूबंदीचा अहवाल!


चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी करण्यासाठी शासनाने गठित केलेल्या समितीला दुसऱ्यांदा मुदतवाढ मिळविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या समितीची मुदत उद्या (ता. 22) ऑगस्टला संपणार आहे. या समितीतील सदस्यांच्या व्यस्ततेमुळे अहवाल तयार होऊ शकला नाही. त्यामुळे आता मुदतवाढ दिल्याशिवाय पर्याय नसल्याचे या समितीतील सदस्यांचे सांगणे आहे.
जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी व्हावी, यासाठी वेगवेगळ्या सामाजिक संघटना एकत्र आल्या. त्यांनी राष्ट्रसंत दारूबंदी अभियानाची मुहूर्तमेढ 5 जून 2010 रोजी रोवली. डिसेंबर 2010 मध्ये हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर येथील विधानभवनावर महिलांचा मोर्चा नेण्यात आला. या मोर्चाची दखल शासनाने घेतली. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही सभागृहात हा प्रश्‍न लावून धरला. त्यानंतर शासनाने चंद्रपूर जिल्हा दारूबंदी अभ्यास समिती गठित करण्याचे आश्‍वासन दिले. त्यानुसार राज्याचे सांस्कृतिक व जिल्ह्याचे पालकमंत्री संजय देवतळे यांच्या अध्यक्षतेखाली ता. 22 फेब्रुवारीला 2011 रोजी या समितीचे गठण झाले. या समितीचे निमंत्रक उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक फुले आहेत. या समितीत डॉ. अभय बंग, मदन धनकर, मनोहर सप्रे, डॉ. विकास आमटे व सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य ए. जे. शेख यांचा समावेश होता. या समितीचे गठण झाल्यानंतर समितीत महिलांना स्थान दिले नाही, याकारणावरून वाद निर्माण झाला होता. या समितीत एका गटाच्या लोकांचा समावेश असल्याचा आरोपही झाला होता. चार मार्च 2011 रोजी पहिली बैठक या समितीची झाली. या समितीला तीन महिन्यांत आपला अहवाल शासनाला सादर करायचा होता. परंतु, समिती तीन महिन्यांत अहवाल तयार करू शकली नाही. एकमेव बैठक वगळता फारसे गांभीर्य या समितीमध्ये जाणवले नाही. सदस्यांच्या कामाच्या व्यस्ततेमुळे अहवाल आणि बैठका होऊ शकल्या नाही, असे सांगण्यात आले. दरम्यानच्या काळात दारूविक्रेत्यांनी शक्तिप्रदर्शन केले. जवळपास दहा हजार दारूविक्रेते आणि त्यावर अवलंबून असलेले कामगार मोर्चात सहभागी झाले होते. ता. 22 मे रोजी या समितीची मुदत संपली. त्यानंतर पालकमंत्र्यांनी शासनाकडे विनंती करून समितीला मुदतवाढ मिळवून घेतली. यावेळीही तीन महिन्यांचीच मुदतवाढ देण्यात आली.

Sunday, August 21, 2011

नवजात शिशू चोरण्याचा प्रयत्न फसला

नवजात शिशू चोरण्याचा प्रयत्न फसला


चंद्रपूर - नवजात बालकांना पळविण्याच्या हेतूने जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन अनोळखी व्यक्ती आले. ते वॉर्ड क्रमांक 10 मध्ये जाऊन संशयास्पदरीत्या फिरत होते. जवळ कुणीही नसल्याचे पाहून त्यांनी हालचाली सुरू केल्या. मात्र, कक्षात कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेने वेळेच भान राखून पोलिसांना बोलाविले. यावेळी बालक पळविण्याचा प्रयत्न फसल्याने ते दोघेही पसार झाले. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी एका बालकाला पळविल्याची घटना घडली होती. या घटनेने पुन्हा एकदा रुग्णालयातील सुरक्षेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक कक्षाच्या मार्गावर प्रसूतीपूर्व कक्ष, नवजात बालक आणि प्रसूती झालेल्या महिलांसाठी वॉर्ड क्र. नऊ, दहा आणि अकरामध्ये व्यवस्था आहे. प्रसूतीनंतरच नवजात बालके तेथे असतात. तिथे महिला परिचारिका आणि एक सुरक्षा कर्मचारी तैनात असतो. शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्ती जिल्हा सामान्य रुग्णालयात आले.

त्यांनी प्रसूतिगृहातील बालकांच्या कक्षेत प्रवेश केला. ज्या बालकाजवळ कुणीही नव्हते, त्या बेडजवळ जाऊन पळविण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. ते संशयास्पदरीत्या कुजबूज करताना परिचारिकेच्या लक्षात आले. यासंदर्भात माहिती देण्यासाठी कक्षातील दूरध्वनी उचलला. मात्र, तो बंद होता. त्यामुळे तिने चौकी गाठून पोलिसांना बोलाविले. पोलिस येत नाही तोच ते पसार झाले होते. बालकांची चौकशी करण्यात आली. त्यात सर्व बालके सुरक्षित होती. पोलिसांनी रुग्णालयाच्या आवारातही चौकशी सुरू केली. मात्र, ते दोघे पळून गेले होते.

सीसीटीव्ही कॅमेरे "शोपीस'
गत दोन वर्षांपूर्वी घडलेल्या बालकचोरीच्या घटनेनंतर हुशार झालेल्या रुग्णालयाने चोरट्यांना पकडण्याच्या दृष्टीने प्रत्येक कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. मात्र, या कॅमेऱ्यातून चित्रीकरणच होत नसल्याची माहिती प्रत्यक्षभेटीतून दिसून आली. 

Wednesday, August 17, 2011

चंद्रपूरच्या खड्ड्यांमुळे "देव'ही झाले हतबल

चंद्रपूरच्या खड्ड्यांमुळे "देव'ही झाले हतबल

देवनाथ गन्डते : सकाळ वृत्तसेवा
Wednesday, August 17, 2011 AT 03:15 AM (IST)
चंद्रपूर - मराठी नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांची एका कार्यक्रमानिमित्त नागपूरहून चंद्रपूरला येत असताना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रकृती बिघडली. त्यांना येथील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. दिवसभर विश्रांती घेतल्यानंतर यांना बरे वाटू लागले. दरम्यान, रस्त्याच्या दुरवस्थेसंदर्भात त्यांनी थेट कार्यक्रमातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांची कानउघाडणी केली.
येथील ज्येष्ठ नाट्यकलावंत शिवप्रसाद उपाख्य बाबू कक्कड यांचा सहस्र चंद्रदर्शन सोहळा 14 ऑगस्टला नवोदिता संस्थेतर्फे प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात झाला. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेते रमेश देव मुंबईहून विमानाने नागपूरला आले. तिथून खासगी वाहनाने चंद्रपूरकडे निघाले. जाम ते चंद्रपूर या मार्गावर अनेक खड्डे पडले आहेत. त्यामुळे त्यांना नीट प्रवास करता आला नाही. शिवाय खड्ड्यांमुळे प्रकृतीवर परिणाम झाला. चंद्रपुरात पोचल्यानंतर त्यांना बरे वाटत नव्हते. त्यामुळे खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान त्यांनी रस्त्याच्या दुरवस्थेचा उल्लेख करून "आपण संपूर्ण महाराष्ट्र बघता, जरा जिल्ह्याकडेही लक्ष द्या,' असे म्हणत आमदार सुधीर मुनगंटीवार यांची कानउघाडणी केली.

Thursday, August 11, 2011

आरोपी आत; 'मास्टर माइंड' मोकाट!

आरोपी आत; 'मास्टर माइंड' मोकाट!


Thursday, August 11, 2011 AT 04:00 AM (IST)
चंद्रपूर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष नंदू सूर यांच्या खुनामागे एका राष्ट्रीय पक्षाच्या बड्या नेत्याचा हात असल्याचा आरोप मनसे पदाधिकाऱ्यांनी केला. चार दिवसांत त्याचे नाव समोर करू, अशी वल्गना त्यांनी केली होती; मात्र आठवडा उलटूनही त्यांनी आपली चुप्पी तोडली नाही. त्यामुळे या खूनप्रकरणाकडे लक्ष असलेल्या नागरिकांमध्ये तो नेता कोण? याबाबत संभ्रम निर्माण झाला असून, जिल्ह्यातील बड्या नेत्यांकडे संशयाने बघणे सुरू झाले आहे.
सूर यांचा गोळ्या घालून खून केल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला होता. माजरी, वरोरा आणि वणी परिसरात जाळपोळ झाली. परप्रांतीयांना मारहाण करण्यात आली. या खुनाचे पडसाद कमीअधिक प्रमाणात जिल्हाभरात उमटले. या प्रकरणात आतापर्यंत लुकडी यादव, सचिन यादव, शंकर सिंग, राकेश सिंग, फिरोज कय्यामुद्दीन यांना अटक करण्यात आली आहे. लुकडी यादव व सचिन यादव हे खुनाचे सूत्रधार आहेत. ते मुख्य आरोपी आहेत. त्यांना पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली. या दोन्ही यादव बंधूंना 16 पर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे. पोलिस तपासात कदाचित खूनप्रकरणाची नेमकी पार्श्‍वभूमी समोर येईल; मात्र मुख्य आरोपी आत झाले असताना मनसेच्या सांगण्यानुसार यातील "मास्टर माइंड' अद्याप बाहेरच आहे. या खूनप्रकरणातील आरोपींची एका राजकीय पक्षाशी जवळीक होती. तोच धागा पकडून मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, उपाध्यक्ष सूरज ठाकरे यांनी खूनप्रकरणानंतर दुसऱ्याच दिवशी घेतलेल्या पत्रपरिषदेत राष्ट्रीय पक्षाचा एक बडा नेता सूर यांच्या खुनामागे असल्याचा आरोप केला होता. चार दिवसांत त्याचे नाव जनतेसमोर आणू, अशी गर्जनाही त्यांनी केली होती. या पत्रपरिषदेला आठवड्याभराचा कालावधी होऊनसुद्धा त्याचे नाव मनसेने समोर आणलेले नाही. आता या प्रकरणात ते बोलायलाही तयार नाहीत; मात्र त्यांच्या आरोपामुळे राजकीय पक्षांमध्ये प्रचंड अस्वस्थता माजली होती. जनतेमध्येही तो नेता कोण? याविषयी तर्कवितर्क लावणे सुरू झाले. जिल्ह्यातील प्रत्येक बड्या नेत्याकडे नागरिक संशयाने बघायला लागले; मात्र जसजसा कालावधी लोटायला लागला, तशी या आरोपातील हवा निघणे सुरू झाले. केवळ सवंग प्रसिद्धी मिळविण्यासाठी मनसेच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी हा खोडसाळपणा केला, अशी चर्चा सुरू झाली. त्यांच्या या खोडसाळपणामुळे मात्र चांगल्या लोकप्रतिनिधींना संशयाच्या पिंजऱ्यात काही कालावधीसाठी उभे व्हावे लागले. त्यांच्यावरील संशयाचे मळभ अद्याप दूर झालेले नाही. सूर यांचा खून अवैधरीत्या चालविल्या जाणाऱ्या धंद्यांतील वर्चस्वातून झाला होता. राजकीय पक्षाचे पाठबळ घेऊन अवैध धंदे चालविण्याची अनेक उदाहरणे या जिल्ह्यात आहेत. अनेक नेत्यांनी अशा प्रकारच्या टोळ्या पाळल्या आहेत. त्यामुळेच सूर यांच्या खुनामागे एखादा बडा नेता असावा, या मनसेच्या आरोपावर वरकरणी तथ्यही दिसून आले; मात्र त्यांनी अद्याप नाव समोर न केल्याने त्यांच्या या आरोपातील गांभीर्य आता कमी होत आहे. 

'आम्ही उगाच कुणावर आरोप केले नाहीत. एका बड्या नेत्याचा हात सूर यांच्या खुनात असल्याचा दाट संशय आम्हाला आहे. त्याचे नाव आम्ही नक्कीच जाहीर करणार. त्याला आणखी थोडा वेळ लागेल. यासंदर्भातील पुरेसे पुरावे आमच्याकडे आलेले नाहीत. ते गोळा करणे सुरू आहे. पोलिस तपासातही मुख्य आरोपींकडून नाव समोर येऊ शकते.'
- सूरज ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष, मनसे, चंद्रपूर

कुठल्याही गुन्ह्यात कुणावर संशय असल्यास त्याची रीतसर तक्रार पोलिसांत करावी. गुन्हेगारांचा आणि गुन्ह्याचा शोध लावण्यास पोलिस यंत्रणा सक्षम आहे; मात्र विनाकारण कुणाच्या नावाने समाजात संशय निर्माण करू नये. त्यामुळे यात चांगली माणसंही भरडली जातात. आरोप करणाऱ्यांना मात्र प्रसिद्धी मिळते.
-नितीन बन्सोड, कार्यकर्ता, भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन 

Tuesday, August 09, 2011

महाऔष्णिकच्या राखेचे तीन कोटी शिल्लक

महाऔष्णिकच्या राखेचे तीन कोटी शिल्लक


Tuesday, August 09, 2011 AT 02:45 AM (IST)
चंद्रपूर - चंद्रपूर महाऔष्णिक वीजकेंद्रातून सिमेंट कारखान्यांना राखेचा पुरवठा अत्यल्प दरात करण्यात येत आहे. त्यानंतरही या प्रकल्पांकडून राखेची देयके अदा केलेली नसल्याची बाब समोर आली आहे. कोरपना तालुक्‍यातील माणिकगड सिमेंट आणि अंबुजा सिमेंटकडून जवळपास तीन कोटी 30 लाख रुपये येणे बाकी आहे. येथील वीजकेंद्रात दररोज 35 हजार मेट्रिक टन कोळसा जाळला जातो. या कोळशापासून हजारो मेट्रिक टन राख तयार होते. या राखेची विल्हेवाट कशी लावायची, हा प्रश्‍न नेहमीच वीजकेंद्राच्या व्यवस्थापनासमोर असायचा. यासाठी ऍश बंड तयार केले आहेत; मात्र राखेची विल्हेवाट लागत नव्हती. या राखेचा उपयोग सिमेंट उत्पादनासाठी करता येतो, हे स्पष्ट झाल्यानंतर ही राख सिमेंट उद्योगांना देणे सुरू केले. सुरवातीला ही राख मोफत दिली जात होती; मात्र त्यानंतर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने एक नोटीस काढले. त्यानुसार राखेसाठी प्रतिटन 50 रुपये दर आकारण्यात यावा, असे सुचविले होते; परंतु वीजकेंद्राच्या व्यवस्थापनाने याकडे साफ दुर्लक्ष केले. राख मोफत देणे सुरू होते. यासंदर्भात मध्यंतरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद दत्तात्रेय यांनी ऊर्जामंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली होती.

हाच मुद्दा घेऊन चंद्रपूरचे आमदार नाना श्‍यामकुळे यांनी विधानसभेच्या चालू अधिवेशनात प्रश्‍न उपस्थित केला होता. या प्रश्‍नाला उत्तर देताना ऊर्जामंत्री पवार यांनी सांगितले, की माणिकगड व अंबुजा सिमेंट प्रकल्पाने तीन नोव्हेंबर 2009 ते जून 2011 या कालावधीत आठ लाख 13 हजार मेट्रिक टन राखेची उचल केली आहे. त्याची किंमत तीन कोटी 38 हजार 985 इतकी आहे. या रकमेचा भरणा या दोन्ही कंपन्यांनी चंद्रपूर महाऔष्णिक वीजकेंद्राला अद्याप केलेला नाही. यासंदर्भात दोन्ही प्रकल्पांना कळविले आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले 

Saturday, August 06, 2011

पत्रकार संपर्क

पत्रकार संपर्क

पत्रकार            वृत्तपत्र             मोबाईल         
चंद्रपूर शहर

  • सुनील देशपांडे               THE HITVAD             9822737841

  • बाळ हुनगुंद                   (PTI)-                          9326641177 
  • Deven gavande             LOKSATTA               9822467714
  • प्रमोद काकडे                 SAKAL                       9922540074
  • gopal krush mandawkar  lokmat                     9850207011
  • अरुण सहाय                  LKMT SAMACHR    9922919459
  • Gajannan tajne             SAKAL                      9881156188
  • पंकज मोहरीर               महाराष्ट्र टाईम्स            ९८२२४६५७५६
  • पंकज शर्मा                   DAINIK BHASAKR   9823350111
  • संजय तायडे                 navbharat                    9822237638
  • महेंद्र ठेम्स्कर               PUNYANAGARI        9422838911
  • prashant Vigheswar     lokshahi varta            8975755466
  • मजहर अली                 TIMES OF INDIA       9422137199
  • संजय रामगीवार           tarun bharat                9881717832
  • मंगेश खाटिक               PUNYANAGARI        9011043653
  • प्रमोद उंदिरवाडे            DESHONNATI            9921009653
  • देवनाथ गंडाटे             सकाळ                            ९९२२१२०५९९
  • श्रीकांत पेशट्टीवार          सकाळ                        9921671701
  • मुकेश वाळके               DAINIK BHASKAR     9421993900
  • प्रवीण बतकी                DESHONNATI            9881750655
  • Prshant devtale           PUNYANAGARI         8888828027
  • रमेश kalepalli             the hitdwad                   9960033592
  • रवी जवळे                  lokmat                              9850050811
  • रवी जुनारकर             loksatta                           9423117394
  • साईनाथ सोनटक्के      tarunbharat                  8007347925
  • Sushli nagrale            lokshahi varta                9923838961
  • Yashvant mullemwar  Mahavidarbha              9890331996
  • गोविल मेहरकुरे           sakal                               9689988282
  • बाळू रामटेके               Deshonnati                     9403866996
  • इर्शाद शेख               lo. samachar                     9860273759
  • जितेंद्र मशारकर      mahasagar                           9552550315 /  9325242852
  • प्रकाश शर्मा              eX reoprter                       9423117393
  • मंगेश भांडेकर          सकाळ                                ८२७६२८६७१५ 


 Meadia                                               
  • संजय तुमराम   saam marathi       9922903292 
  • आशिष आंबाडे  ZEE MEADIA     9422891334
  • सुनील तायडे   jai maharastra       9422140045
  • अनिल ठाकरे  साम टीव्ही मराठी    9011015626 
  • निलेश डहाट      TV9                    9860774567
  • प्रकाश हांडे        ANI                     9422946649
  • विशाल टोकेकर live chandrapur   9421812456
  • सुशांत घाटे india tV                     9422131588
      photographer                                         

देवानंद  साखरकर                                  9423619976

गोलू बाराहाते                                         ९३२५२९९२०८
तेजराज भगत                                        ९४२२१३७८३७
चिन्ना बामनएंटी                                    9923388418

चंद्रपूर जिल्हा
Anand chalakh               RAJURA                   9923928596
Anil munde                    KOTHARI                  9421880030
CHANDRAKAT Gedam  SAVLI                       9403915388
Arvind Chunarkar           BRAMHAPURI           9420142254
Ganpat khobre            CHIMUR                       9421720774
SIDHARDH Gosavi     KORPANA                    9890411695
ATIK Kureshi             POMBHURNA               9422135175
RAMESH  Mahurpawar   MUL                         9421812992
Manoj gore                  GOVRI                        9923358970
Manoj tajane                GHODPETH                9822920250
VASANT ManuSmare   VARORA                   9423419418
SHASHANK Namewar GADCHANDUR          9890673127 
Nilesh zade                  DHBA                        9404101098
Rahul dube                   MARADA                 9226751587
Ramdas allewwar         NAVARGAO              9423417753
Ravikant hore                                              9923928575
VINAYAK  Rekalwar       MUL                     9421723041
Sandip raipure                 GONDPIPRI         7350236236
Sanjay lambhe            BRAMHAPURI           9421782701
SUDHAKAR SHRIRAME   NAGBHID           9421721616
Subhash shende          PELORA                   9226788727
Vijay channe                 NAGARI                 9657954655
Vijay sorte                      BALLARPUR         9370321119
Vikas kumbhare          RAJURA                    9881386342
Vilas dulewar            SINDEWAHI               9421815330



चंद्रपूर जिल्हा

  • Abrara ali                              9923232420
  • Anand bhende                       9226153839
  • Anirudh bhasarkar                 9422908088
  • Ankeswar meshram               9922930140
  • Ashish derkar                        9922930133
  • Ashok bhagat                        9421723477
  • Ashok ghadage                      9422579209
  • Ashok yenurkar                     9421722960
  • B u bordewar                        9922904125
  • Baburav parsawar                  9403242551
  • Bal nimbalkar                        9637202984
  • Balu nimgade                        9421725193
  • Bhimrav meshram                 9405533554
  • Chandrashekhar noukakr       9850394496
  • D l mathankar                       9595013595
  • Dhyanesh sidam                    9370042193
  • dilip mesram                         9423676447
  • Farukh sekh                         9921171224
  • Gajann mandhare                 9822364806
  • Gangadhar kunghadkar          9423419012
  • Haridas radke                       9764772204
  • Jagdish madhankar               9923397313
  • Janardhar dhale                    9960121215
  • Keshav lanjewar                   9822292845
  • Krutika sontakke                  9922930151
  • Madhukar meshram             9049093251
  • Narendra khobragade           9637859767
  • Nitin musale                        9822728877
  • Pradip bijave                       9423676745
  • Prakash kale                       9423403064
  • Pralhad kohpre                   9423691339
  • Pravin katait                       9850534946
  • Pravin khiratkar                  9763453174
  • Rajesh madurwar               9049983448
  • Raju gedam                        9922475663
  • Rakesh borkundawar          9421719388
  • Ramesh nane                     9421724503
  • ratnakar chatap                  9421877910
  • Ratnakar thombare            9637707531
  • Ravi khade                       9922504602
  • Sachin fulzele                   9421814096
  • Saghrakshit tawade            9850666180
  • Sanajy varghane               9423419326
  • Santosh kundojawar          9823043973
  • Shahu narnavare              9420138539
  • Shankar bharde               9420446072
  • Sharad dewade               9423413908
  • Shashikant ganvir           9922540512
  • Shital pawar                  9422838384
  • Sunil ghate                    9764578494
  • Suresh komawar           9420753776
  • Suresh rangari               9421880028
  • Swami godpalliwar        9422566822
  • Uday gadkari               9423620140
  • Vanita ghume             9922930131
  • Vasant khedakar        9922930135
  • Vilas shende               9527562057
  • Vinayak yesekar           9225844534
  • Vinod tupat                 9764027289
सकाळ नागपूर जिल्हा
  • रामटेक तालुका 
  • वसंत डामरे- 8605378727 
  • राजू कापसे -देवलापार - 9422822924 
  • चेतन अमृते- मुसेवाडी- 8600547005 
  • राहूल पिपरोदे- 9960333659 
  • क्रिष्णा भाल- हिवरा बाजार 8855867383 

  • नरखेड 
  • हरीश रेवतकर- तालुका प्रतिनिधी 9730641718 
  • मनोज खुटाटे- जलालखेडा 9823472985 
  • मनोहर बेल - 997019214 
  • योगेश गिरडकर - सावरगाव- 9421779534 
  • सुनील रेवतकर- भिष्णूर- 9765029737 

  • विजय वानखेडे- वाडी 9975051701 
  • समाधान चोरपगार- दवलामेटी- 9890239238 
  • संतोष भोयर- बुटीबोरी- 9372338742 
  • गजेंद्र डोंगरे - बाजारगाव- 9922171382 
  • धनराज राऊत - बोकारा- 9049279576 
  • संजय खांडेकर- धामना- 8888722315 
  • प्रशांत झाडे- बुटीबोरी- 9763949636 

  • सावनेर 
  • उज्ज्वल बागडे- 9822717155 
  • पांडूरंग भोंगाडे- 9960958575 
  • अशोक डहाके-केळवद9822269308 
  • हिराजी रामटेके नांदा गोमुख - 9923887636 
  • कपिल वानखेडे - खापरखेडा- 9423740262 
  • दिलीप गजभिये- खापरखेडा- 9657886152 
  • किशोर गणवीर - खापा- 7875873726 
  • शांताराम ढोके - वाघोडा - 9975788148 
  • अरविंद सरोदे - दहेगाव - 9850793344 
  • विश्‍वास दलाल - पाटणसावंगी - 9822793435 
  • अहमद हुसेन शेख - भानेगाव - 9881380607 
  • धनराज शिवरकर - पिंपळा डाग बंगला - 9158510895 
  • राजेश ढोरे - सिल्लेवाडा - 9960956171 

  • हिंगणा 
  • अजय धर्मपुरीवार - 9763062050 
  • सोपान बेताल - 9763060078 
  • जितेंद्र वाटकर - टाकळघाट 7620721370 
  • विनायक इंगळे - हिंगणा - 9422503121 

  • कुही 
  • हंसदास मेश्राम - 9921438865 
  • गुरूदेव वनदुधे - पचखेडी - 9767582644 
  • दिलीप चव्हाण- मांढळ -9763470323 
  • शरद शहारे - वेलतूर - 9579207319 

  • काटोल 
  • सुधीर बुटे- तालुका प्रतिनिधी 7507097407 
  • चंद्रशेखर कडू - काटोल 9850271745 
  • सुरेंद्र भाजीखाये - कोंढाळी - 9527127449 
  • सचिन बडघरे - 9890778456 

  • कामठी 
  • सतिशकुमार दहाट - 9960121771 
  • मिलिंद गाडेकर- कोराडी - 8055482721 

  • पारशिवनी - देवानंद शेंडे- 8793492905 
  • राकेश कभे- पारशिवणी शहर - 9823707426 
  • सुनील सरोदे - कन्हान- 9921146027 
  • खिमेश बढीये- कन्हान- 9545697757 

  • कळमेश्‍वर 
  • चंद्रकांत श्रीखंडे - प्रतिनिधी 9371906330 
  • मनीष गोतमारे, मोहपा - 9764794582 
  • वीणा पोखले ब्राम्हणी - 9860784990 
  • आशिष देशमुख ब्राम्हणी 9850370088 
  • आनंद गाणार, वडोदा 9637774847 

  • उमरेड 
  • विनोद पिल्लेवान- 9850333544 
  • तुषार मुढाळ बेला 9326592240ै 

  • मौदा 
  • राजेंद्र रावते- 9422816996 
  • संदीप गौरखेडे- कोदामेंढी 9764784099 
  • सुनील आरभी, अरोली 9823104592 
  • संतोष सेलोटे, 9860248068 
  • अरुण शेन्दरे, 8888030288 
  • तुकाराम लुटे, 9970058743 
  • क्रिष्णा पुरी, तारसा 9158977982 

  • भिवापूर 
  • दिलीप जाधव, 9823493004 


News photografar Nagpur
  • Ajay bansod                  9371441098
  • Ajay vaitage                  9890955706
  • Ajit singh bhalla             9422122051
  • Anand nirbhavne           9850332177
  • Anant muley tarun bh..  9881717841
  • Ashok sawane              9822364283
  • Avishkar deshmukh      9850209727
  • Badu nagbidkar            9850304013 
  • Chotu vaitage               9225224822
  • Jeevak gajbhiye loks.    9527755680
  • Kunal jaiswal baskar     9860441898
  • Kundan hate                9822737806
  • Lalit agnihotri              9960601407
  • Monica chaturvedi       9850716921
  • Mukesh kukade           9822936153
  • Niranjan atre tarun ..    9881717842
  • Prakash saikedkar bh.. 9850599015
  • Prashant bhoot            9326927945
  • Rajesh bansod            9823108343
  • Rajesh tickley             9922914991
  • Ranjit deshmukh         9890585182
  • Ravikant sane             9822466020
  • Sandip soni                9922930168
  • Sanjay lachuria          9423679401
  • Sanjib ganguly           9422146029
  • Satish raut                9890414355
  • Shailesh mishra         9822715072
  • Shankarrao mahakalka. 9970121026
  • Shekhar soni                9422805353
  • Sudarshan sakharkar    9850361009
  • Sunny shende              9850388618
  • Tarunjeet singh bhal..  9422860271
-----------------------------
नागपूर जिल्हा 
लोकशाही 

  • bhivapur      - amar mokashi      - 9272340855
  • kuhi  -       prdip ghumadwar           - 7385736361
  •                       sudhir bhagat             - 9420565223
  • veltur            - jaypal avze                - 9730288102
  • mouda             - dilip ingole             - 9960094560
  • dhanala         - ajay mate                - 9579081647
  • chacher         - omkar mahadule         - 9421802901
  • wadoda            - yogesh kardbhajane    - 9765021284
  • ramtek             - purushottam meshram    - 8698124224 
  • devalapar         - purushottam dadmal     - 8275292839
  • kodamendhi        - amol mohurle            - 8055222416
  • dharmapuri        - raju madankar            - 9403016385
  • dahegaon joshi     - arvind tandulkar         - 9960561284
  • kanhan             - yogesh wadibhasme     - 9175156810
  • kamathi         - sunil chalape             - 9765300618
  • koradi             - milind gadekar             - 8055482721
  • gumathi         - sushant sheware         - 9372446161
  • gumthala         - mukul raise             - 9545793581
  • saoner            - laxmikant divate        - 9822369370
  • vaghoda         - anil adkine             - 9822724136
  • khapa            - suresh marotkar        - 9595978175
  • nandagomukh     - hira ramteke             - 9975815917
  • bhagimahari     - gajanan wasnik          - 8888056433
  • mohali             - mahendra chakole         - 9764989655
  • umarinanda        - yashawant patil         - 9921249164
  • khaparkheda     - dilip gajbhiye             - 9657886152
  •                 - rajesh khandate         - 9623017422
  • sillewada         - sunil jalandhar             - 9921860259
  • sillori             - sachin raut             - 7875464636
  • kalmeshwar        - arvind dhole             - 9372168934
  •                 - rajhans gurande        - 9923986819
  • mohapa            - dilip ganorkar            - 8855079480
  • katol             - surendra raut (bute)     - 8275553812
  • kondhali         - khalik shekh             - 9922733608
  • dorli bhingare     - kailash raut             - 9145253873
  • narkhed         - ramesh gavaikar         - 8983239417
  • savargaon         - kiran balpande             - 9923572201
  • hingana         - atul lamsonge             - 7798370068
  • kanholibara         - narayan pimpale         - 9821347272
  • umred             - shrikant suryawanshi     - 9764094310
  • umred             - suresh borkar             - 9921683622
  • bela             - vilas tembhare             - 9960922136
  • makardhokada     - fulchand meshram         - 8308413305
  • wadi             - gajanan talmale         - 9881001760
  • vihigaon         - dhiraj patil                 - 9765266411
  • kanhan             - dhanajay kapsikar         - 9021195882
  • hingana         - anil ingale                 - 9860259155
  • wanadongari    - madhukar rajdharkar     - 9673043616
  • wagdhara (gumgaon) - namdeo aamnerkar - 9689243710