काव्यशिल्प Digital Media: विदर्भ

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label विदर्भ. Show all posts
Showing posts with label विदर्भ. Show all posts

Monday, October 01, 2018

गांधी जयंती पर विदर्भवादी करेंगे आत्मक्लेश अनशन आंदोलन

गांधी जयंती पर विदर्भवादी करेंगे आत्मक्लेश अनशन आंदोलन

विदर्भ साठी इमेज परिणामराजुरा/प्रतिनिधी:
 विदर्भ राज्य आंदोलन समिति की ओर से विदर्भ राज्य की मांग के लिए गांधी जयंती पर 2 अकटूबर को तहसील स्तर पर आत्मक्लेश अनशन आंदोलन किया जाएगा. सुबह 10 से शाम 5 बजे तक होने वाले आंदोलन में नागरिकों से बड़ी संख्या में शामिल रहने की अपील समिति ने की है.
राजुरा, कोरपना, जिवती और गोंडपिपरी तहसील कार्यालय के सामने सुबह 10 बजे से आंदोलन की शुरुआत होगी. लगभग 110 वर्ष पुरानी विदर्भ राज्य की मांग है.
राजुरा में आंदोलन का नेतृत्व प्राचार्य अनिल ठाकुरवार, रमेश नले, प्रभाकर ढवस, भाऊ किन्नाके, दिलीप देरकर, मधुकर चिंचोलकर, दीपाली हिंगाणे, नरेंद्र काकड़े, कपिल इद्दे, कोरपना में प्रभाकर दिवे, अरुण नवले, नीलकंठ कोरांगे, अविनाश मुसले, रमाकांत मालेकर, सुभाष मालेकर, रवींद्र गोखरे, मदन सातपुते, गोंडपिपरी में मुकेश वानोडे, राजेश कवठे, व्यंकटेश मल्लेलवार, रमेश धुडसे, अरुण वासलवार, भारत खामनकर और जिवती में शब्बीर शेख, देवीदास वारे, नारायण माने, नरसिंह हामने, रमेश पुरी, सायसराव कुंडगिर आदि नेता करेंगे.
2 अक्टूबर को गांधी जयंती के अवसर पर विदर्भ के सभी 11 जिलों की 120 तहसीलों में एक दिवसीय आत्मक्लेश आंदोलन किया जाएगा.

Monday, June 11, 2018

 ४ जुलैला नागपूर बंद

४ जुलैला नागपूर बंद

The closure of Nagpur on 4th July to protest the monsoon session | पावसाळी अधिवेशनाच्या निषेधार्थ ४ जुलैला नागपूर बंदनागपूर/प्रतिनिधी:
 स्वतंत्र विदर्भ राज्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे हिवाळी अधिवेशन असो की, पावसाळी अधिवेशन, त्याला आमचा विरोध आहे. तेव्हा पावसाळी अधिवेशनाच्या निषेधार्थ येत्या ४ जुलै रोजी नागपूर बंद करीत भाजपा सरकारचा निषेध करण्यात येईल, असा निर्णय विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या बैठकीत सर्वसंमतीने घेण्यात आला.विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोअर कमिटीची बैठक रविवारी आमदार निवास येथील सभागृहात पार पडली. धनंजय धार्मिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, राम नेवले, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, अरुण केदार, राजकुमार नागुलवार, गोविंद भेंडारकर, माया चवरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. पावसाळी अधिवेशनात विदर्भ विरोधी नेत्यांविरुद्ध ‘गो बॅक’चे होर्डिंग लावण्यात येतील. ४ जुलैनंतर विदर्भ राज्य आंदोलन समितीची घरोघरी जाऊन सभासद नोंदणी करून संघटनात्मक बांधणी केली जाईल, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीला अ‍ॅड. सुरेश वानखेडे, अ‍ॅड. टेकचंद कटरे, प्रा. पुरुषोत्तम पाटील, विष्णूपंत आष्टीकर, अर्चना नंदघरे, दिगंबर डोंगरे, ताराबाई बारस्कर, रंजना मालपे, विजया धोटे, दीपक एम्बडवार, मुकेश मासुरकर, रियाज खान, डॉ. जी.एम. ख्वाजा, बाबा राठोड, कपिल इद्दे, भय्यालाल माकडे, प्रा. अनिल ठाकूरवार, नितीन भागवत, कृष्णराव भोंगाडे, दामोदर शर्मा, अ‍ॅड. अजय चमेडिया, रमेश नळे, अनंता येरणे, बंडू देठे, गुलाबराव धांडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
येत्या निवडणुकीत भाजपला हरवणार
बैठकीत भाजपाने दिलेल्या स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आश्वासनावर विशेष चर्चा झाली. भाजपाने निवडणुकीपूर्वी आपले आश्वासन पाळले नाही, तर येत्या २०१९ च्या निवडणुकीमध्ये भाजपाचा सफाया करावा, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. भाजपासोबत काँग्रेसही विदर्भ विरोधी आहे, तेव्हा २०१९ च्या निवडणुकीसंबंधी तिसऱ्या पर्यायाचा विचार करण्यासाठी ११ सदस्यांची एक समिती स्थापन करण्याचा निर्णय सुद्धा बैठकीत घेण्यात आला.

Sunday, April 29, 2018

१ मे रोजी विधानभवनावर स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकणार

१ मे रोजी विधानभवनावर स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकणार

नागपूर/प्रतिनिधी:
भारतीय जनता पक्षांने सत्तेत येणाऱ्यापुर्वी वेगळ्या विदर्भाचे आश्‍वासन दिले. आता सत्तेवर आल्यानंतर आश्‍वासनाला केराची टोपली दाखवली आहे. यामुळेच भाजपाचा निषेध करण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे एक मे रोजी विधानभवनावर विदर्भाचा झेंडा फडकवणार आहे. या आंदोलनात हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी होणार आहे. हे आंदोलन चिंता करणाऱ्यांचे नव्हे तर चिडलेल्यांचे आहे, अशी माहिती आंदोलनाचे नेते माजी आमदार ऍड. वामनराव चटप यांनी पत्रपरिषदेत दिली. 

दिनांक एक मे रोजी दुपारी बारा वाजेपर्यत संपूर्ण विदर्भातून मोठया संख्येने कार्यकर्ते यशवंत स्टेडीयम येथे एकत्र येतील. दुपारी साडे बारा वाजता विदर्भ मार्च निघेल. यशवंत स्टेडीयम - मुंजे चौक - राण्धी झॉंशी चौक, व्हेरायटी चौक, लोखंडी पूल, रेल्वे स्टेशन, कस्तुरचंद पार्क, रिझर्व बॅंक चौक मार्गे मोर्चा विधानभवनावर जाईल. हजारोंच्या उपस्थितीत विधानभवनावर विदर्भाचा झेंडा फडकवण्यात येईल. देशाला स्वातंत्र मिळण्यापूर्वीची वेगळया विदर्भ राज्याची मागणी आहे. 1947 पासून कॉग्रेस पक्षाने सत्ता असताना काही लहान राज्ये निर्माण केली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजयेपी यांनी पाच वर्षाच्या कारकिर्दीत छत्तीसगढ, उत्तरांचल, व झारखंड ही तीन लहान राज्ये निर्माण केली. राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी विद्यमान भाजपा सरकानेही वेगळा विदर्भ देण्याचे आश्वासन दिले. मात्र, ते देण्यास आता टाळत आहेत. त्यामुळेच एक मे रोजी विधानभवनावर विदर्भाचा झेंडा फडकवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दोन्ही नेते आपल्या आश्‍वासनाला बगल देत आहेत. त्यामुळेच आगामी काळात हे आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला समितीचे निमंत्रक राम नेवले, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, प्रबिरकुमार चक्रवर्ती , ऍड. नंदा पराते, रंजना मामर्डे, विष्णू आष्ठीकर, अरूण केदार, अरविंद देशमुख, राजकुमार नागुलवार, अरविंद देशमुख यांचा समावेश होता.

Sunday, April 15, 2018

महाराष्ट्र दिनी विदर्भ राज्याचा झेंडा फडकवणार : चटप

महाराष्ट्र दिनी विदर्भ राज्याचा झेंडा फडकवणार : चटप

गडचांदूर/प्रतिनिधी:
 वेगळा विदर्भ राज्याचा लढा ११५ वर्षांपासून सुरू आहे. आता प्रतीक्षा संपली आहे. सद्याचे राज्य सरकार व केंद्र सरकार वेगळा विदर्भ राज्यासाठी अनुकूल परिस्थिती असूनही विरोधात आहे. त्यामुळे १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचा विरोध करत नागपूर विधान भवनावर विदर्भ राज्याचा झेंडा फडकवला जाईल. त्यासाठी सर्व जाती-धर्म, पक्ष, पंथ विसरून विदर्भ राज्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन विदर्भवादी नेते अ‍ॅड. वामनराव चटप यांनी केले.
स्वतंत्र विदर्भ राज्य मुस्लीम संघर्ष समितीच्या वतीने गडचांदूर येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध अर्थतज्ञ आ. डॉ. श्रीनिवास खांदेवाले, महाराष्ट्र राज्य मुस्लिम आरक्षण समितीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. फरहत बेग, पुरातत्व विभाग केंद्राचे माजी प्रमुख डॉ. सय्यद ख्वॉजा गुलाम (रब्बानी) यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व मान्यवरांनी भाजप सरकारच्या धोरणांचा चांगलाच समाचार घेतला.
रजा मस्जिद कमिटीचे अध्यक्ष शेख ख्वाजाभाई, नुराणी मित्र मंचचे सय्यद अली, मदिन मस्जिदचे हाजी जुबेर, मोहमदीया मस्जिदचे शेख सादीक यांनी सभेचे आयोजन केले होते. मंचावर माजी उपसभापती रऊफ खान, माजी उपसरपंच शेख सरवर , माजी सरपंच शेख रउफ, हसन रमेश नळे, मदन पाटील सातपुते, माजी जि. प. सभापती निळकंठ कोरांगे, अरुण निमजे, रफीक निझामी, प्रवीण गुंडावार, मुमताज अली, संतोष पटकोटवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी विदर्भ राज्याचा लढा आता तीव्र केल्याशिवाय पर्याय नसल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे संचालन रफीक शेख यांनी केले. प्रास्ताविक नासीर खान यांनी केले तर आभार रफीक निझामी यांनी मानले. यावेळी सर्व जाती धर्माचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Saturday, January 06, 2018

राज्यासाठी ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’

राज्यासाठी ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’


नागपूर : विदर्भातील सिंचनाचा अनुशेष, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी , उद्योगांचा अभाव, वीज भारनियमन,कुपोषण व नक्षलवाद अशा समस्या मार्गी लागव्यात, तसेच विदर्भाचा सर्वांगीण विकास हवा असेल तर स्वतंत्र विदर्भ राज्याशिवाय पर्याय नाही. विदर्भ राज्याबद्दल जनजागृती करण्यासाठी तसेच जनतेची मते जाणून घेण्यासाठी ७ जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ काढणार असल्याचे भाजपाचे आमदार आशिष देशमुख यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
केंद्रात सत्ता आल्यास विदर्भाचे स्वतंत्र राज्य होईल, असे आश्वासन भाजपा नेत्यांनी निवडणुकीपूर्वी दिले होते. गेल्या साडेतीन वर्षापासून केंद्रात सत्ता असूनही विदर्भाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. भाजपा नेत्यांना आपल्या आश्वासनाचा विसर पडला आहे. दुसरीकडे राज्य सरकारवर तब्बल ४.५० लाख कोटींचे कर्ज आहे. राज्याची आर्थिक स्थिती विचारात घेता संयुक्त महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास शक्य नाही. नव्याने निर्माण झालेले उत्तराखंड राज्य प्रगतीच्या बाबतीत देशात सर्वात पुढे आहे. याचा विचार करता स्वतंत्र राज्य झाल्यास विदर्भाचा विकास होईल. आजवर विदर्भासाठी राखून ठेवण्यात आलेला निधी पश्चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी वळविण्यात आला. यामुळे विदर्भ मागास राहिला. परिणामी विदर्भ शेतकरी आत्महत्यात सर्वात पुढे असल्याचे आशिष देशमुख म्हणाले.

Monday, December 11, 2017

विदर्भासाठी अडविली बस

विदर्भासाठी अडविली बस

काटोल - विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार व विदर्भवादी नेते डॉ आशिषजी देशमुख यांच्या विदर्भ वेगळा होण्यासाठी मुंख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस ला पाठाविलेल्या पत्राच्या समर्थनात कोंढाळी येथे विदर्भ राज्य वेगळा व्हायलाच पाहिजे या विदर्भातील सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी महाराष्ट्र सरकार चे लक्ष वेधन्यासाठी बसेस अडवून व गावातील व्यापारी प्रतीष्ठाने बंद ठेऊन निषेध नोंदविला या आंदोलनाचे नेतुत्व प्रमोद धारपूरे यांनी केले या आंदोलनात काटोल पंचायत समिती उपसभापती योगेश शे चाफले,माजी प समिती सदस्य पप्पू( जावेद)पठान,ग्रामपंचायत कोंढाळी चे सदस्य प्रमोद शे चाफले,धर्मराज पाटील,विनोद रणनवरे,वैभव लाड,गुणवंता खवसे,कुणाल भांगे,वैभव जयपूरकर,प्रमोद चाफले,प्रविण सावरकर,लोकेश लोही व असंख्य विदर्भवादी कार्यकते उपस्थित होते

Sunday, December 10, 2017

वेगळ्या विदर्भाच्या लढ्यात इको-प्रोची उडी

वेगळ्या विदर्भाच्या लढ्यात इको-प्रोची उडी

चंद्रपूर/प्रतिनिधी
मागील अनेक वर्षापासून रेंगाळत असलेल्या आणि राजकीय पक्षांनी दुर्लक्षित केलेल्या विदर्भ राज्याच्या लढ्यात सक्रीय उडी घेण्याचा निर्णय इको- प्रोच्या कार्यकारिणीने घेतला आहे. त्यानुसार विविध संघटनांनी पुकारलेल्या 11 डिसेंबरच्या विदर्भ बंद मध्ये संस्था सहभागी होणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष बंडू धोतरे यांनी दिली.
महाराष्ट्र विधानसभेच्या नागपूर येथिल हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विदर्भ राज्य आंदोलन समीती व सर्व विदर्भवादी संघटनानी ‘विदर्भ बंद’ ची हाक दिलेली आहे. या ‘विदर्भ बंद’ ला चंद्रपूर जिल्हयातील इको-प्रो संस्थेचा पुर्ण पाठींबा आहे.
स्वंतत्र विदर्भ राज्य निर्माण झाल्याशिवाय विदर्भातील समस्या सुटणार नाही. विदर्भाचा विकास करायचा असेल तर स्वंतत्र विदर्भ राज्य हेच एकमेव पर्याय असून, या बंद मध्ये सर्व जनतेने सहभागी व्हावे. तसेच सर्व व्यापारी  प्रतिष्ठाने, शाळा, महाविदयालय, तसेच खाजगी वाहतूक व्यावसायीक, युवक-युवती, विदयार्थी आदीनी शातंतामय रितीने कडकडीत बंद पाळावे. या बंद दरम्यान कोणीही सार्वजनीक शांतता भंग करणार नाही. तसेच कायदा व सुव्यवस्था राखल्या जाईल, याची काळजी घ्यावी, असे आवाहन इको-प्रो चे संस्थापक अध्यक्ष बंडू धोतरे यांनी केले आहे.

Friday, December 01, 2017

विदर्भ बंदसाठी आज बैठक

विदर्भ बंदसाठी आज बैठक

चंद्रपूर - 1 डिसेंबर रोजी विदर्भ राज्य आंदोलन समितीची चंद्रपूर जिल्हा बैठक दिनूजी भवन साईबाबा मंदिर जवळ जनता कॉलेज येथे 12 ते 4 या वेळेत होत आहे.  विदर्भ बंद संदर्भांत चर्चा व नियोजन होणार आहे.

Thursday, November 16, 2017

सत्ताधाऱ्यांना काँग्रेसची भीती वाटत आहे: शरद पवार

सत्ताधाऱ्यांना काँग्रेसची भीती वाटत आहे: शरद पवार


चंद्रपूर/प्रतिनिधी:
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. 2019 ची काँग्रेसच्या निवडणुकीची तयारी बघता राज्यकर्त्यांना राहुल गांधी यांची भिती वाटू लागली आहे.त्यामुळे राजीव गांधी यांच्या काळात बंद झालेल्या प्रकरणाची फाईली पुन्हा उगदून काढून काँग्रेसची प्रतिमा ऐन निवडणुकीच्या तोंडावर मलिन करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे.  ज्या इटालियन माणसावर ठपका होता तोही आता जिवंत नाही.राहुल गांधींवर बोफोर्स प्रकरणाचा ठपका ठेवण्याचा सीबीआयच्या माध्यमातून केंद्र सरकार प्रयत्न करत आहे असा थेट आरोप पवार यांनी मेळाव्यात बोलताना केला.
शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकर न केल्यास हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही - शरद पवार

शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकर न केल्यास हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही - शरद पवार

चंद्रपूर -राज्य सरकारने फसवी कर्जमाफी केली असून रोज नवनवीन सूचना ते करत आहेत. राज्यातील सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सत्तेपूर्वी भाजपाने अनेक आश्वासने दिली. मात्र या आश्वासनांची पूर्तता करण्याऐवजी दिशाभूल करण्याचे प्रकार सुरू आहेत. असे माजी केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. 
चंद्रपूर हा कामगार व कष्टकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.    जिल्ह्यातील एकूण उद्योगांपैकी अनेक उद्योग बंद पडलेले दिसत आहेत. या समस्येकडे राज्यकर्त्यांनी वेळीच लक्ष दिले नाही तर भविष्यात ही परिस्थिती अधिक बिकट होईल असे परखड मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी येथे व्यक्त केले. यावेळी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला व नंतर न्यू इंग्लिश ग्राऊंडवर त्यांचा कार्यकर्ता मेळावा पार पडला.
सरकारने जनतेचे प्रश्न सोडवावे;शरद पवार यांचे चंद्रपुरात वक्तव्य

सरकारने जनतेचे प्रश्न सोडवावे;शरद पवार यांचे चंद्रपुरात वक्तव्य

चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा आणि गडचिरोली हा मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. गडचिरोलीत नक्षलवाद मोठ्या प्रमाणावर आहे.सरकारने येथील बंद उद्योगधंद्यांकडे लक्ष दिले पाहिजे.  ह्या  जिल्ह्यातील लोकांचे ,रोजगार व आर्थिक प्रश्न सरकारने  सोडवले नाही आणि युवकांच्या हाताला काम दिलं नाही तर या जिल्ह्यातील लोक नक्षलवादाकडे कसे वळतात, हे आजच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे . त्यामुळं सरकार कोणतीही असो लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी गंभीर असलं पाहिजे.- शरद पवार
sharad pawar साठी इमेज परिणाम

Tuesday, November 14, 2017

आता विदर्भ लांबणीवर

आता विदर्भ लांबणीवर


नागपूर - विदर्भ आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याशिवाय वेगळं राज्य घेणं योग्य होणार नाही, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केलं.
निवडणुकीपूर्वी भाजपने स्वतंत्र विदर्भ राज्याचं आश्‍वासन दिलं होतं. पण जवळपास तीन वर्षं झाल्यानंतरही भाजप सरकारने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीबद्दल कोणतंही पाऊल उचललेलं नाही. त्यामुळे फडणवीस सरकारच्या भूमिकेबाबत विदर्भवाद्यांमध्ये संभ्रम आहे.
स्वतंत्र विदर्भाबाबत बोलताना केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी म्हणाले, "विदर्भातील शेतकरी सक्षम झाला पाहिजे. विदर्भात अनेक प्रकल्प सुरू आहेत. विदर्भ सक्षम झाल्याशिवाय वेगळं राज्य घेणं योग्य होणार नाही."
vidarbh साठी इमेज परिणाम

Thursday, November 09, 2017

विदर्भात वाघासाठी धोक्याची घंटा

विदर्भात वाघासाठी धोक्याची घंटा

 वनालगतच्या शेतातील विद्युत तारेचे कुंपन ठरतेय वाघासाठी 'काळ'


वीज प्रवाहामुळे  होणारे वाघांचे मृत्यु थाबविण्यासाठी तात्काळ पावले उचलण्याची मागणी*

*शेतपिक संरक्षणकरिता हवी प्रभावी उपाय योजना....
ताडोबा-बफरच्या धर्तीवर 'व्यक्तिगत सौर ऊर्जा कुंपन'
अनुदान तत्वावर पुरविण्याची मागणी...*


चंद्रपूर : विदर्भात वर्षभरात वीज प्रवाहामुळे मृत्यूच्या घटना घडत असल्यामुळे भविष्यातील व्याघ्र संवर्धनाची चिंता निर्माण झाली आहे. त्यावर वेळीच सावध होऊन योग्य उपाययोजना न केल्यास ही मोठी समस्या उभी राहील. विदर्भातील वाढती वाघांची संख्या आणी शेतपीक वाचविण्याकरिता शेतकरी बांधवांकडून होणारे प्रयत्न म्हणजे शेतकरी विरूध्द वाघ पर्यायाने वनविभाग असा नवा संघर्ष उभा होत आहे.



विदर्भात विदयुत प्रवाहामुळे होणारे वाघ मृत्यु ची त्वरित दखल घेऊन थाबविण्याच्या दृष्टीने योग्य पावले उचलण्याची मागणी एका निवेदनद्वारे वनमंत्री सुधीर मुुनगंटीवार यांच्याकडे इको-प्रो संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी केली आहे. सोबतच वाघाचे मृत्यू आणि शेतपीक नुकसान थांबविण्याकरीता बफरच्या धर्तीवर ‘व्यक्तीगत पातळीवर सौर उर्जा कुंपन अनुदान तत्वावर’ देण्याची मागणी केली आहे.



मागील सप्ताहात 4 नोव्हेंबर 2017 ला चपराळा येथे रेडीओ काॅलर लावुन सोडण्यात आलेली वाघीण अशाच विदयुत प्रवाहाच्या धक्काने मारली गेली. 7 नोव्हे 2017 चिमुर वनक्षेत्रातील आमडी शेतशिवारातील वाघ मृत अवस्थेत आढळला. तिथेही विज तारेचे कुंपन लावण्यात आलेले होते. यासोबत मागील 13 आॅक्टोबर 2017 ला ब्रम्हपुरी येथुन सोडण्यात आलेली वाघीण सुध्दा शेतातील वीज प्रवाहाने बोर व्याघ प्रकल्प लगत वर्धा जिल्ह्यात मृत झाली होती. नागपुर जिल्ह्यात सुद्धा अशीच घटना आहे. प्रसिद्ध श्रीनीवास वाघ रेडीओ काॅलर असलेला ब्रम्हपुरी वनविभागात 27 एप्रील 2017 रोजी मृत अवस्थेत आढळला. त्यापुर्वी मध्य चांदा कोठारी अंतर्गत 3 नोव्हे 2016 ला एक वाघ मेलेला आहे. यांनतर 3 डिसें 2016 ला बाजुच्या तेलगांणा राज्यात कागजनगर येथे मध्य चांदा वनविभागातुनच स्थलांतरीत झालेला वाघ सुध्दा तिथेही याच कारणानी मेला.



वरील काही घटनात वाघांना रेडीओ काॅलर असल्याने व कुणी माहिती दिल्याने या घटना बाहेर आलेल्या आहेत. जे वाघ विदयुत प्रवाहाने मृत झाले असतील आणि जमिनीत पुरले गेले असतील अशा काही घटना नाकारता येत नाहीत. वाघांसोबतच चंद्रपूरात 3 रानगवे एकसाथ विदयुत प्रवाहाने मेलेत, एका शेताच्या कुंपनात अनेक वन्यप्राण्यांचे हाडांचे सापळे काढण्यात आले यावरून तृणभक्षी प्राणी सुध्दा मोठया प्रमाणात मृत्युमुखी होत असल्याचे एकदंरीत चित्र आहे.



विदर्भातील शेतकरी कोरडवाहु शेती करणारा मोठा वर्ग आहे. जेमतेम एक पिकावर शेतकरीचे वर्षभराचे अर्थशास्त्र अवलंबुन आहे. उभे पिक वाचविण्यासाठी अनेक प्रयत्न शेतक-यांकडून केले जाते. वन्यप्राण्यांपासून शेतपीक वाचविण्याकरीता शेतकरीकडुन अशा पध्दतीने तारेचे कुंपन शेताभोवती करून त्यात जिंवत वीज प्रवाह सोडला जातो. कारण, विदर्भातील शेतकरीची ‘अस्मानी आणी सुलतानी’ संकटातुन वाचलेले पिक वन्यप्राण्यापासुन वाचविण्याकरीता स्वतःच्या जिवाची पर्वा न करता शेतात जिवंत वीज प्रवाह सोडतात. अशा चुकीच्या पध्दतीने आपला जिव जाईल, हे माहीती असताना सुध्दा असे प्रयत्न सुरू आहेत. विदयुत प्रवाहाने शेतकरीच मरण्याच्या घटना जिल्हयात व विदर्भात घडलेल्या आहेत. अशा चुकीच्या पध्दतीने विदयुत प्रवाह शेतात सोडणे हे नक्कीच समर्थनीय नाही. परंतु, ही सर्व धडपड वन्यप्राण्यापासून उभे पिक वाचविण्यासाठी असते. यावर विदयुत विभागाचे व वनविभागाचे कुठलेही नियंत्रण नसते. वाघांच्या शेतात येण्यावर सुध्दा कुणाचेच नियंत्रण नसल्याने अनेक वाघ आणी वन्यप्राणी मृत्युमुखी होत आहेत.





विदर्भातील वाढलेली वाघांची संख्या, त्यांचे होणारे स्थलांतर, स्थंलातर होताना वन्यप्राण्याचे भ्रमणमार्ग हे फक्त जंगल नसल्याने शेतशिवार, गावे, रस्ते-हायवे, नदया-नाले हे सर्व ओलांडुन पुढील वनक्षेत्राचा शेकडो किमीचा प्रवास पुर्ण करतात. तसेच वनव्याप्त गावातील शेती, वनालगत असलेले शेतशिवार म्हणजे येथे वाघांचा वावर असतोच. शेतशिवारातील पाळीव प्राण्याची शिकार करण्यास किंवा शेतशिवारात येणारे रानडुक्कर, निलगाय व इतर तृणभक्षी प्राणी यांची शिकार करण्यास वाघ येतो अशावेळी तिथे अशा पध्दतीने शेतक-याने तारेचे कुंपन करून त्यात जिवंत विदयुत प्रवाह सोडण्यात आलेला असल्यास तिथे वाघांसाठी धोका संभवतो. वनविभाग सोबतच विद्युत् विभागने अश्या घटना घडणार नाही, विजेचा चुकीचा वापर होणार नाहीं याकडे लक्ष देने अत्यंत गरजेचे आहे.