काव्यशिल्प Digital Media: साहित्यिक

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label साहित्यिक. Show all posts
Showing posts with label साहित्यिक. Show all posts

Friday, September 07, 2018

माझ्यातला कवी मरत चाललाय.....

माझ्यातला कवी मरत चाललाय.....

प्रतीक्षा संपली......
माझ्यातला कवी मरत चाललाय..... कवितासंग्रह चंद्रपुरात उपलब्ध....


युवा जाणिवांचे सक्षम कवी इरफान शेख यांचा संवेदना प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेला आणि वाचकांना प्रतीक्षा असलेला नवीन कवितासंग्रह आता चंद्रपुरात उपलब्ध

माझ्यातला कवी मरत चाललाय...
सध्याच्या परिस्थितीवर प्रातिनिधिक प्रश्न...


   मान्यवरांच्या प्रतिक्रिया....


."इरफान शेख ची कविता म्हणजे समकाळातल्या मराठी कवितेच्या सृजनशील भूमीत उगवलेले मानुष अभिव्यक्तीचे सहजोद्गारातून आणि स्वानुभवाच्या प्रातिभ मुशीतून साकार होणारे सुंदर काव्यस्वप्न आहे...."
- डॉ किशोर सानप, नागपूर, ज्येष्ठ साहित्यिक,

इरफान शेख ची कविता सामान्य माणसाच्या जगण्याचे प्रातिनिधिक चित्र आहे....
-डॉ राजेश इंगोले, प्राचार्य सरदार पटेल महाविद्यालय
माझ्यातला कवी मरत चाललाय का ही इरफान ची चिंतनशीलता केवळ महनीय नाही तर जिला आपण कविता वगैरे म्हणतो तिच्या रूप , स्वरूपाचे प्रवाही विवेचन आहे. कवी म्हणून हा प्रश्न इरफान ला अस्वस्थ करतो हे चिंतनशील आहे...
- डॉ जगदीश कदम, नांदेड, ज्येष्ठ कवी


आजच प्रति राखून ठेवा....
युवा कवी इरफान शेख यांच्या सामान्य लोकांच्या जगण्याच्या अस्वस्थ करणाऱ्या कवितांचा नवीन कोरा कवितासंग्रह...


माझ्यातल्या कवी मरत चाललाय....

इरफान शेख यांचा वाचक वर्ग ज्या आतुरतेने त्यांच्या कवितासंग्रहाची वाट पाहत होता अश्या निवडक कवितांचा संग्रह.....



आजच आपली प्रत राखीव ठेवा...
प्रकाशनपूर्व सवलत
१४०/- रुपये किमतीचा हा कवितासंग्रह
केवळ 100/- रुपयात

  • कवितासंग्रह मिळण्याचे ठिकाण ....
  • 1. समर्थ बुक डेपो, गांधी चौक चंद्रपूर
  • 2. ज्ञानगंगा पुस्तकालय, पठाणपूरा मार्ग, बावीस चौक, चंद्रपूर 
  • 3. इरफान शेख. 9665413821
  • संवेदना प्रकाशन, पुणे*

Saturday, November 18, 2017

16, 17, 18 फेब्रुवारीला बडोद्यात होणार साहित्य संमेलन

16, 17, 18 फेब्रुवारीला बडोद्यात होणार साहित्य संमेलन

-  91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तारखा जाहीर

-  साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी बडोद्यात पत्रकार परिषद घेऊन केली तारखांची घोषणा

16, 17, 18 फेब्रुवारीला बडोद्यात होणार साहित्य संमेलन

Monday, November 06, 2017

तू हसलीस म्हणजे " चारोळीसंग्रहाचे प्रकाशन व कवीसंमेलन

तू हसलीस म्हणजे " चारोळीसंग्रहाचे प्रकाशन व कवीसंमेलन

मनाच्या अधोराज्यावर आधारलेले साहित्य दुरगामी परिणामकारक ठरते

विजया मारोतकर यांचे प्रतिपादन - सुरेश डांगे यांचा चारोळीसंग्रह

चिमूर /प्रतिनिधी - साहित्य हे मनातून यावं लागतं.मनातील सा-या आशा,आकांक्षा, वेदना या काव्यातून व्यक्त होत असतात.साहित्य हे विविधांगी फुलो-याने फुलत असतं.ते सर्वत्र मनसोक्त विहार करतं. सुरेश डांगे यांनी आपल्या चारोळीसंग्रहातून हसण्याच्या विविध पैलूंना उजागर केले आहे.हसण्याने निसर्ग,नदी- नाले,वृक्षवेली,चंद्र,सूर्य,तारे या सर्वांवर होणारा परिणाम अभिव्यक्त केला आहे.निसर्गावरच नाही तर समाजमनावर,आयुष्यावर आणि शेअर मार्केटवरही हसण्याने परिणाम होतो, हे सुरेश डांगे यांनी आपल्या चारोळीसंग्रहातून विषद केला आहे. तू हसलीस म्हणजे हा हास्योत्सवच असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक आचार्य विजया मारोतकर यांनी केले.