काव्यशिल्प Digital Media: जनजागृती

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label जनजागृती. Show all posts
Showing posts with label जनजागृती. Show all posts

Wednesday, January 17, 2018

वाहतूकी बद्दल विद्यार्थ्यांना जनजागृतीचे धडे

वाहतूकी बद्दल विद्यार्थ्यांना जनजागृतीचे धडे

 चंद्रपूर पोलिसांचा उपक्रम 
चंद्रपूर/प्रतिनिधी: 
           चंद्रपूर वाहतूक शाखेतर्फे विध्यार्थ्यांना लहान वयापासूनच वाहतूक-रहदारी बद्दल माहिती मिळावी त्यांना वाहतुकीचे नियम समजावे. व इतर बाबींचे ध्यान मिळावे या अनुशंघाने चंद्रपूर वाहतूक विभागाने शहरातील  विविध शाळेत शिकत असलेल्या विध्यार्थ्यांना वाहतुक व्यवस्थे बद्दल जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.

                या वाहतूक जनजागृती मोहिमेअंतर्गत वाहतुकीचे नियम पाळण्यासंदर्भात वाहतूक शाखेच्या पोलीसांनी हा चिमुकल्या विध्यार्थ्यांच्या  हातात विविध मजकूर लिहिलेले बोर्ड दिले यात   हेल्मेट घाला, सीटबेल्ट लावा, सिग्नल तोडू नका, नो-पार्कींगमध्ये गाडी उभी करू नका, वाहतुकीचे नियम तोडू नका अश्या प्रकारचा मजकूर लिहून होता,या चिमुकल्यांच्या हातातला मजकूर बघून रस्त्याने जाणाऱ्या अनेक दुचाकीस्वार अवाकपणे बघू लागले. 
                      विध्यार्थी हा शाळेत जायला लागल्या पासूनच त्याला घराबाहेर पडावे लागते, अश्यावेळी त्याला वाहतुकीचे संपूर्ण ध्यान असणे आवश्यक असल्याने वयाच्या लहानपणापासूनच म्हणजे शालेय वयापासूनच वाहतुकीचे ध्यान  असणे आवश्यक समजत चंद्रपूर पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांच्या मार्गदशनात वाहतूक पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी या उपक्रमाची सुरवात केली आहे, यावेळी वाहतूक कार्यालय चंद्रपूर येथून विद्यानिकेतन शाळेच्या  विद्याथ्यांची जनजागृतीपर रॅली काढण्यात आली. हि रॅली प्रियदर्शनी ईंदिरा गांधी चौकात आल्यानंतर विध्यार्थ्यांना   सिग्नल बद्दल माहिती, लाल, पिवळा,हिरवा लाईट सिंगलवर केव्हा लागतो, वाहतूक पोलिसांशी हुज्जतबाजी करू नये, दारू पिऊन वाहन चालू नये,वेगवान गाडी चालविणे हा एक नशा  आहे,  सोबत पादचाऱ्यांनी कुठून चालावे. वाहतूकदार दंडित केव्हा होतो, वाहन कोणत्या साईडने चालवावे यासह अनेक गोष्टीबद्दलचे मार्गदर्शन वाहतूक पोलिसांतर्फे  विध्यार्थ्यांना करण्यात आले. विज्ञार्थ्यांनी देखील मनलाऊन संपूर्ण नियम ऐकून घेतलॆ. या जनजागृतीपर रॅलीमध्ये अनेक विध्यार्थी ,शिक्षक शिक्षिका व पोलीस अधिकारी व वाहतूक कर्मचारी उपस्थित होते.   






  

Tuesday, November 07, 2017

राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्यावतीने राज्यभर जनजागृती रथयात्रा काढणार -  ईश्वर बाळबुधे

राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्यावतीने राज्यभर जनजागृती रथयात्रा काढणार - ईश्वर बाळबुधे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसापासून सुरु होणार जनजागृती रथयात्रा...

नागपूर/प्रतिनिधी
ओबीसी समाजाला भाजप सरकारनं फक्त आश्वासनांची गाजरंच दाखवली आहेत. भाजप सरकारला त्यांची जागा दाखवण्यासाठी आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्यावतीने राज्यभर जनजागृती रथयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष Ishwar Balbudhe यांनी दिली. आज राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या प्रमुख पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये पार पडली.

ही जनजागृती रथयात्रा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसापासून सुरु करण्यात येणार आहे. या जनजागृती रथयात्रेमध्ये ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. ही रथयात्रा नागपूरहून सुरु करण्यात येणार आहे.

त्यामध्ये ओबीसींची जातनिहाय जनगणना जाहीर करा, राज्यमागासवर्ग आयोगावर ओबीसी समाजाचा अध्यक्ष असावा, ओबीसी विदयार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर वसतीगृह, ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला ४ हजार कोटी भागभांडवल दया, ओबीसी दाखले सुलभरित्या मिळावेत, क्रिमीलेअरची अट रद्द करा, शेतमालाला खर्चावर आधारीत भाव दया, स्वामीनाथन समितीच्या शिफारशी अमलात आणा, मंडल कमिशनची शंभर टक्के अंमलबजावणी करा, विधानपरिषद,विधानसभा,लोकसभेमध्ये ओबीसी आरक्षण दया, शेतकऱ्यांची फसवी कर्जमाफी, महिलांना सबलीकरण अशा मागण्यांचा समावेश असणार आहे.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष भगवान कोळेकर, दत्तात्रय घाडगे, नानासाहेब राऊत, राज राजापूरकर, सचिन आवटे उपस्थित होते.

#NCP #OBCCell #RathYatra