সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, February 28, 2018

मनसेच्या ९ कार्यकर्त्याची न्यायालयातून निर्दोष सुटका

मनसेच्या ९ कार्यकर्त्याची न्यायालयातून निर्दोष सुटका


चंद्रपूर/प्रतिनिधी:
                महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ९ कार्यकर्त्यांनी डिसेंबर 2013 ला कन्याका नागरिक बैक कार्यालयावर एका महिला बैंक कर्मचाऱ्यांची छेडखानी केल्या प्रकरणी आंदोलन केले होते या आंदोलन ना दरम्यान बैंकचे अध्यक्ष प्रफुल भास्करवार यांच्यावर काळीशाई फेकून त्याना मारहाण केल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यावर करून त्यांचेवर गंभीर गुन्हे चंद्रपूर येथील शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले होते, सदर प्रकरण चंद्रपुर न्यायालयात तब्बल चार वर्ष चालल्यानंतर अखेर दिनांक २८ फेब्रुवारी २०१८ ला विद्द्यमान् न्यायाधीश खोत यांनी मनसे कार्यकर्त्यांच्या विरोधात सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली, यामधे मनसेचे राजू कुकडे, सुनीता गायकवाड़,मनोज ताम्बेकर माया मेश्राम,संदीप शिडम.भारत गुप्ता, प्रकाश चंदनखेडे,सुजय अवथरे व योगिता कुंभारे इत्यादिचा समावेश आहे, त्यांच्या सुटकेमुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्सवाचे वातावरण आहे.
  मनसैनिकवर लागलेले गुन्हे न्यायालयाने ख़ारिज करुण न्याय दिल्याबद्दल मनसेचे राजू कुकडे यांनी न्यायाधीशयाचे आभार मानले.  
श्रीदेवी ; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

श्रीदेवी ; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मुंबई : अभिनेत्री श्रीदेवींच्या पार्थिवावर आज सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांसह सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीसाठी मोठा जनसमुदाय लोटला.
अंधेरीच्या सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये श्रीदेवींचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. दुपारी दीडच्या सुमारास पांढऱ्या शुभ्र फुलांनी सजवलेल्या ट्रकवरून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. त्यानंतर पवनहंसजवळील विलेपार्ले स्मशानभूमीत श्रीदेवी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
श्रीदेवींच्या अकाली निधनाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. त्यामुळे आपल्या आवडत्या अभिनेत्रीचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. संपूर्ण परिसर अत्यंत भावुक झाला होता.

करिष्मा कपूर, काजोल, अजय देवगण, करण जोहर, जया बच्चन, ऐश्वर्या राय, दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, शक्ती कपूर, जॅकी श्रॉफ, तब्बू, सोनाली बेंद्रे, सुष्मिता सेन, सुनील शेट्टी, विद्या बालन, आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, सुभाष घई, रोहित शेट्टी यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली.
तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, युवाप्रमुख आदित्य ठाकरे, काँग्रेस मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी उपस्थिती लावली.

दरम्यान, सुमारे साडेचार किलोमीटरच्या या प्रवासादरम्यान पोलिस आणि एसआरपीएफने कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. श्रीदेवींचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी चाहत्यांची अलोट गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली होती. त्यामुळे जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
 गार्गी सिंग, गुंजन शर्मा, अनिकेत बारई चित्रकला स्पर्धेत प्रथम

गार्गी सिंग, गुंजन शर्मा, अनिकेत बारई चित्रकला स्पर्धेत प्रथम

  • चिल्ड्रेन ट्राफिक पार्कचा वर्धापन दिन सोहळा : 
  • सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
नागपूर,ता.२८ : ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार चिल्ड्रेन ट्राफिक पार्कच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी (ता. २७) आयोजित चित्रकला स्पर्धेत पहिली ते चवथीच्या गटात बिशप कॉटनची विद्यार्थिनी गार्गी सिंग, पाचवी ते सहावीच्या गटात वाल्मिकीनगर हिंदी शाळेची विद्यार्थिनी गुंज़न शर्मा, तर आठवी ते नववीच्या गटात लालबहादूर शास्त्री विद्यालयाचा अनिकेत बारई यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
नॉर्वेच्या शिष्टमंडळांची मनपाला भेट

नॉर्वेच्या शिष्टमंडळांची मनपाला भेट

  • महापौर नंदा जिचकार यांच्याशी विविध विषयावर चर्चा

नागपूर,ता.२८ : नार्वे देशाच्या एका शिष्टमंडळाने मंगळवारी (ता. २८) नागपूर महानगरपालिकेला भेट दिली आणि नागपुरात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांविषयी माहिती जाणून घेतली.
मनपातील १६ कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार

मनपातील १६ कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार

नागपूर,ता.२८ : अतिरिक्त आयुक्त डॉ. आर.झेड. सिद्दीकी यांच्यासह नागपूर महानगरपालिकेच्या सेवेत असलेले १६ कर्मचारी मंगळवारी (ता. २८) सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व तुळशी रोप देऊन सत्कार करण्यात आला.
आर्वी, पुलगाव , वर्धा व भंडारा  येथील दूरदर्शन रिले केंद्राचे प्रसारण 12 मार्च पासून बंद होणार

आर्वी, पुलगाव , वर्धा व भंडारा येथील दूरदर्शन रिले केंद्राचे प्रसारण 12 मार्च पासून बंद होणार

नागपूर दि. 28 फेब्रुवारी 2018

अ‍ॅनालॉग टेरिस्ट्रीअल टी. व्ही. ट्रान्समिशनच्या डीडी नॅशनल चॅनेल व प्रादेशिक वाहिनीच्या अंतर्गत आर्वी (चॅनेल-11), पुलगाव (चॅनेल-27) तसेच वर्धा (चॅनेल-31) व भंडारा (चॅनेल-11) या दूरदर्शन रिले केंद्रांचे प्रसारण दिनांक 12 मार्चच्या मध्यरात्रीपासून बंद करण्यात येणार असून संबंधित केंद्राची सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार नाही.

दूरदर्शन डीडी फ्री डिश डी.टी.एच ( डिरेक्ट टू होम) सेवा यावर सदर चॅनेल इतरही चॅनेल्ससोबत उपलब्ध आहेत. यासाठी आवश्यक असलेली उपकरणे उदा. सेट टॉप बॉक्स, डिश अॅन्टीना आणि अन्य उपकरणे स्थानिक बाजारात उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी जवळच्या दूरदर्शन कार्यालय किंवा दूरदर्शनच्या www.ddindia.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. असे आवाहन दूरदर्शन अनुरक्षण केंद्र, नागपूरच्या अभियांत्रिकी विभागाचे संचालक श्री.अधीर गडपाले यांनी नागरिकांना केले आहे.
शिवसेना भडकली;पहिले स्वताच्या प्रभागातील परकोटांवरील अतिक्रमण काढा नंतरच बोला

शिवसेना भडकली;पहिले स्वताच्या प्रभागातील परकोटांवरील अतिक्रमण काढा नंतरच बोला

आदिवासी समाज व चंद्रपूरची जनता किशोर जोरगेवारांन सोबत - सुरेश पचारे
चंद्रपूर (ललित  लांजेवार):   
shivsena bhajap साठी इमेज परिणाम
                       राज्याच्या राजकारणात भाजप शिवसेना यांच्यातला वाद काही नवीन नाही,खांद्याला खांदा लाऊन सत्तेत बसेले दोघेही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप दररोज करतात,तुझ माझ जमेना, तुझ्या वाचुन करमेना अशी स्थिती  राज्यात या पक्षाची आहे.
                   मात्र चंद्रपूरच्या राजकारणात देखील आज परीयंत कधी न झालेला  शिवसेना भाजप वाद आता शहराच्या राजकारणात जोर पकडू लागल्याचे चिन्ह दिसु लागले आहे. सोमवारी चंद्र्पूर येथे शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांनी जनतेची मूख्य समस्या असलेल्या जटपूरा गेटचा मुद्दा हाती घेत वाहतुकीची कोंडी होत असणाऱ्या जटपूरा गेट येथून वाहतुकीचा मार्ग मोकळा करा व नंतरच सौंदर्यीकरण करा यासाठी आंदोलन केले, तसेच जिल्हाधिकारी यांना माहितेचे निवेदन देत सूचनाही सुचविल्या,हे आंदोलन होत नाही तर लगेच चंद्रपूर महानगर पालिकेच्या भाजप नगरसेविका शितल कुळमेथे यांनी या आंदोलनावर आक्षेप घेत एक प्रेस नोट माध्यमांत प्रकाशित केली. जटपूरा गेटला धक्का जरी लागला तर आदिवासी समाज चूप बसणार नाही.  असा घानाघात करत शिवसेनेच्या आंदोलनाला विरोध दर्शविला.
                     याच भाजप व शिवसेनेच्या तू-तू मै-मै मध्ये आता चंद्रपूरचे शिवसेनेचे नगरसेवक व शहर प्रमुख सुरेश पचारे यांनी एक प्रेस नोट काढत भाजपला थेट प्रतिउत्तर देत धारेवर धरले आहे. पहिले स्वताच्या प्रभागातील परकोटांवरील अतिक्रमण काढा नंतरच बोला असा खोचक उत्तर शिवसेना नेते किशोर जोरगेवार याची बाजू राखत सुरेश पचारे यांनी भाजप नगरसेविका शितल कुळमेथे यांना दिले आहे. 
                   याच सोबत प्रसिद्धी पत्रकात शिवसेने भाजप नगरसेविका शितल कुळमेथे यांच्यावर बराचश्या प्रश्नांची भडीमार केली आहे.  शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांनी जनतेची मूख्य समस्या असलेल्या जटपूरा गेटचा मुद्दा हाती घेतल्या नंतर भाजपाच्या नगर सेविका शितल कुळमेथे यांना आदिवासी समाजाच्या पुरातन वास्तुंचा साक्षात्कार झाला आहे. जेव्हा महानगर पालीकेने गिरनार चौकातील विर बाबूराव पुल्लेश्वर शेडमाके यांच्या नावाचा फलक काढून तो कच-यात टाकला तेव्हा त्या परदेशात होत्या का? असा टोला हाणत किशोर जारगेवार यांच्या लोकोपयोगी आंदोलनाला आदिवासी समाजाचा पाठींबा असल्याचे शिवसेनेचे शहर प्रमुख तथा नगर सेवक सुरेश पचारे यांनी स्पष्ट केले आहे. 
शिवसेनेचा विकासकामांना कधिच विरोध नव्हता ना तो असेल मात्र नको त्या गोष्टीवर खर्च करुन मुळ समस्या जैसे तेच ठेवली जात असेल तर त्याला मात्र शिवसेना तिव्र विरोध आहे असे देखील या पत्राच्या माध्यमातून म्हटल्या गेले आहे , सौंदर्यीकरनाला आमचा विरोध नाही मात्र पहिले येथील वाहतुक कोंडीचा प्रश्न सोडवा व नंतर हे सौंदर्यीकरण करा अशी भुमीका किशोर जोरगेवार यांनी घेतली आहे.
                         यात गोंड कालीन जटपूरा गेटचे अतिस्व मिटण्याचा प्रश्नच येत नाही. आणि शिवसेना असे पर्यंत तरी चंद्रपुरातील ऐतिहासिक वारसा असलेले गोंड कालीन वास्तूंना हात लावण्याची कोणाची हिम्मत नाही. आदिवासी समाज हा चंद्रपूर जिल्ह्याचे वैभव आहे या समाजाचा मोठा वारसा जिल्ह्याला लाभला आहे मात्र त्याच्या वीर पुत्रांचे एकही  स्मारक शहरात नाही. त्यामुळे जटपुरा गेट समोर विर बाबुराव शेडमाके यांचे भव्य स्मारक व्हावे अशी सेनेची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. मात्र आता नगरसेविका शितल कुळमेथे यांनी प्रेसनोट प्रकाशित करुन यात जातीय राजकार घोडण्याचा प्रयत्न केला आहे. याला आदिवासी समाज कधीही स्विकारणार नाही. गोंड कालीन वास्तुंची दशा आजघडीला अतिशय बिगट झाली आहे. त्यासाठी कूळमेथे यांनी आजवर किती निवेदण दिलेत? पहिले  हे सांगावे ,त्याच्या स्वताच्या भानापेठ प्रभागात नागरिकांनी गोंड कालीन परकोटांवर अतिक्रम केले आहे. त्यांना ते दिसत नाही का ? ईक्रो प्रो संघटणेच्या वतीने परकोट स्वच्छता मोहीम  राबवली जात असतांना शितल कुळमेथे यांनी कितीदा उपस्थिती लावली पाहिले हे सांगावे केवळ राजीकय हेतुतून समाजाच्या नावाचा गैरवापर करून उघीच  बडबड करु नये, आदिवासी समाज हा जागरुत आहे. आणि भाजपाने या समाजासाठी काय केले हेही या समाजाला चांगल्याने कळते त्यामूळे अश्या नगर सेवीकांच्या मागे हा समाज कधिच उभा राहणार नाही.  हे आदिवासी समाजाचे नेते तसेच आदी जनचेतना जागर या संस्थेचे अध्यक्ष अशोक तुमराम यांनी किशोर जोरगेवार यांच्या धरणे आंदोलनात उपस्थित राहून दाखऊन दिले आहे. त्यामुळे कुळमेथे यांनी पहिले त्यांच्या प्रभागातील परकोटांवर नारिकांनी केलेले अतिक्रमण काढावे त्यात भाजप त्यांना मदत करत नसेल तर तसेही सांगावे आम्ही गोंड कालीन वसा वाचवीण्यासाठी प्रयत्नशील असुन हे अतिक्रमण काढण्यात आम्ही तुम्हाला मदत करु असा सल्लाही पचारे यांनी शितल कुळमेथे यांना दिला आहे. 
                        याअगोदर पाच ठिकाणी गोंड कालीन परकोट तोडल्या गेले ते कुणाला विचारून तोडण्यात आले व त्यावेळेस कोणते अधिकारी होते? तसेच २.५० कोटी रुपये जटपुरा गेटच्या सौदर्याकरीता सरकारकडून दिले आहे जटपुरा गेट येथे वाहतूक कोंडी हि खूप मोठी समस्या आहे आणि इथल्या लोकप्रतीनिधीकडून तिथे सौंदर्यीकरणासाठी २.५० कोटी रुपये खर्च करीत आहेत ते पैसे तिथे खर्च करण्याची काही गरज नाहि तेच २.५० कोटी रुपये परकोटाच्या डागडुजी करीता खर्च करावे. या जटपुरा गेटच्या सौंदर्याकरीता शहरातील मोठे व्यापारी तसेच अनेक कंपन्या करायला तयार आहे पण त्यांना हे शासन करू देत नाही.  आणि तेच काम फुकट होत असताना त्याठिकाणी २.५० कोटी रुपये खर्च करण्याची काही गरज नाही आहे या संपूर्ण विषयाकडे नगरसेविका शितल कुळमेथे यांनी लक्ष द्यावे आणि विनाकारण दोषारोपण करू नये.  असा सवाल देखील पचारे यांनी करत भापला चांगलच सवालाच्या घेऱ्यात उभे केले.  त्यामुळे दररोज होणाऱ्या भाजप शिवसेना वादात नक्कीच चंद्रपूरच्या नागरिकांच्या समस्या मार्गी लागणार का ? कि हे दोन्ही पक्ष दररोज आप-आपल्या कार्यालयातून प्रसिद्धी पत्रक काढून एकमेकांवर टीका करतच राहणार हे मात्र योग्य ती वेळच ठरवेल.त्यामुळे शिवसेनेच्या या खोचक सावलांचे उत्तर भाजप कोणत्या पद्धतीने देते ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे. 
shivsena bhajap साठी इमेज परिणाम
जिल्हा क्रीडा भारती चंद्रपूर तर्फे आयर्नमॅन डॉ.विश्वास झाडे यांचा सत्कार

जिल्हा क्रीडा भारती चंद्रपूर तर्फे आयर्नमॅन डॉ.विश्वास झाडे यांचा सत्कार

चंद्रपूर:ललित लांजेवार 
कोलंबो (श्रीलंका) येथे रविवार २५ फेब्रुवारी २०१८ रोजी पार पडलेल्या ट्रायथलॉन स्पर्धेत डॉ. विश्वास झाडे यांनी विक्रम करत आयर्नमॅन हा बहुमान पटकाविला आहे. हा बहुमान पटकविणारे डॉ. विश्वास झाडे हे चंद्रपुर जिल्ह्यातील प्रथमच स्पर्धक ठरले आहे.या ट्रायथलॉन या स्पर्धेसाठी विदर्भातून चंद्रपूर येथील डॉ. विश्वास झाडे आणि नागपूरचे डॉ.अमित समर्थ यांनी भाग घेतला होता. हे दोघेही या स्पर्धेसाठी श्रीलंका येथे गेले होते.डॉ.विश्वास झाडे यांनी केलेल्या यशस्वी कामगिरी बद्दल सोमवारी जिल्हा क्रीडा संकुल येथे क्रीडा भारती व जिल्हा क्रीडा संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने आयर्नमॅन डॉ. विश्वास झाडे यांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी क्रीडा भारतीचे जिल्हा प्रमुख डॉ.योगेश सालफळे,शहर प्रमुख डॉ.पंत,जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे,उपस्थित होते.
या स्पर्धेत २ किलोमीटर पोहणे यास वेळ १ तास , 90 किलोमीटर  सायकलीग ४ तास, 21 किलोमीटर धावणे ३ तास असा वेळ घेत हि स्पर्धा डॉ. विश्वास झाडे यांनी पूर्ण केली, या स्पर्धेचे वेळ ८ तास ३० मिनिटे  ठरविण्यात आले होते. तसेच डाँ विश्वास झाडे यांनी सदर स्पर्धा ८ तासातच पुर्ण केली. व आयर्नमॅन हा बहुमान पटकाविला आहे.
या सत्कार कार्यक्रमात पोलीस भरतीतील व जिल्ह्यातील सर्व खेळाळूनसाठी मोफत वैद्यकीय मार्गदर्शन शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. या मार्गदर्शन कार्यक्रमात डॉ.सालफळे म्हणाले चंद्रपूर जिल्ह्यात अनेक खेळाडू आहेत ज्यांना आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना समोर आणण्यासाठी अनेक अडचणी येतात,या संपूर्ण अडचणी सोडविण्यास क्रीडा भारती चंद्रपूर विभाग नेहमी तत्पर राहणार असून जिल्ह्यातील प्रत्तेक खेळाडूंना  कोणत्याही वैद्यकीय अडचणी असतील तर क्रीडा भारती व शहरातील तद्य डॉक्टरांकडून माफक दारात उपचार होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.या माफक उपचाराने खेळाडुंची चिंता कमी होणार  असून यातून आपल्याला चांगले खेडाळू निर्माण करण्यास मदत होणार आहे.

यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी क्रीडा भारतीचे सदस्य व्हावे असे आव्हाहन देखील केले.या कार्यक्रमाला जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे यांनी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुलन येथे रबरी सिंथेटीक ट्रॅकची देखील लवकरात लवकर भर पडणार असून असा प्रस्ताव जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.अशी माहिती दिली.यावेळी सत्कार समारंभासाठी चंद्रपूर शहरातील तद्य डॉ. रवी आलूरवार,डॉ.हर्ष मामिडवार,डॉ.उमेश अग्रवाल,डॉ.प्रसाद पोटदुखे, डॉ.गुरुराज कुलकर्णी,डॉ.अनुराधा सालफळे क्रीडा भारती नागपूरचे कुंभारे सर,हेमंत घीवे,प्रकाश सुर्वे,मकरंद खाडे,प्रवीण चवरे,क्रीडा मार्गदर्शक मनीषा मानकर,रोषण भुजाडे,अॅथलेटीक असोशिएशन चंद्रपूरचे सचिव सुरेश अडपेवार संदीप वझे, यासह अनेक खेळाडू विद्यार्थी विध्यार्थिनी उपस्थित होते.
ट्रायथलॉन म्हणजे काय? 
ट्रायथलॉन म्हणजे वेगवेगळ्या अॅथलेटीक क्रीडा प्रकारांचा समावेश असलेली स्पर्धा. यात मुख्यतः धावणे, पोहणे आणि सायकल चालवणे या स्पर्धांचा समावेश असतो. हे तिन्ही क्रीडाप्रकार सलग पार पाडायचे असून त्याचं अंतर ठरलेलं असतं. कोलंबो येथे आयोजित  ट्रायथलॉन स्पर्धेत २ किलोमीटर स्विमिंग, ९० किलोमीटर सायकलिंग, २१ किलोमीटर धावण्याचा समावेश होता.‘आयर्नमॅन’ हा किताब जिंकण्यासाठी स्पर्धकांना ही ट्रायथलॉन स्पर्धा ८.३० तासांमध्ये पूर्ण करणं गरजेचं असतं.
कोण आहेत विश्वास झाडे
डॉ. विश्वास झाडे हे चंद्रपुरातील प्रसिद्ध ह्दयरोग तद्य असून मागिल २ वर्षापासून चंद्रपुर शहरातील विविध भागात ते रियाजासाठी जातात शहरातील जमनजट्टी तलाव परिसर , जिल्हा स्टेडिअम , सायकलने जाम पर्यतचा प्रवास तर धावण्याकरिता बल्लारशाह रोड व नागपुर रोड वर दूरपर्यंत नेहमी सराव करायचे तसेच व्यायाम करीत जिममध्ये सुध्दा जाणे असा नित्यक्रम त्यांचा होता. पहाटे सकाळीच ५ वा. सुरूवात करुन रात्री सर्व रुग्ण तेवढ्याच नम्रपणे हसुन - समजावून तपासण्याचे काम करणारे अतिशय जिद्द बाळगुण मनातला ध्यास पुर्णत्वास नेण्याचे काम करणारे डॉ.विश्वास झाडे  यांनी केला यांच्या भरिव कामगिरी बद्दल त्यांच्या या विक्रमसाठी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.डॉ.विश्वास झाडे यांनी केलेल्या भरिव कामगिरी बद्दल काव्यशिल्पचाचा सलाम... 

Tuesday, February 27, 2018

 उपाध्यक्षपदाचा वाद चिघळला;बजेट सभेवर सत्ताधारी नगरसेवकांचा बहिष्कार

उपाध्यक्षपदाचा वाद चिघळला;बजेट सभेवर सत्ताधारी नगरसेवकांचा बहिष्कार

अध्यक्षांनी केली सभा रद्द ;वर्षभराचा कालावधी होवूनही राजीनामा न दिल्याने वादंग
रामटेक तालुका प्रतिनिधी:

रामटेक  नगरपालीकेत सत्ताधारी भाजपाचे नगरसेवकांनी दिनांक  27 फेब्रु 2018 रोजी नगरपालीकेच्या बजेट मीटिंगला या अनुपस्थित राहून घरचा अहेर दिल्याने रामटेकच्या राजकीय वर्तुळात प्रचंड  खळबळ उडाली.
दुसरीकडे भाजपाचे नगरसेवक रामटेक शहराच्या विकासाच्या आगामी नियोजनाच्या सभेला अनुपस्थित राहीले यामागे नेमके काय कारण आहे व त्यासाठी कोण जबाबदार आहे याचीही यानिमीत्ताने शहरांत चर्चा होत आहे.सत्ताधारी 13 पैकी  उपाध्यक्ष असलेल्या सौ कविता मुलमुले व सौ पद्मा ठेंगरे  याच उपस्थित होत्या. 
अन्य 11 नगरसेवक उपस्थित नसल्याने नगराध्यक्षांनी ही सभाच रद्द केली. याबाबत सविस्तर वृत्त असे की रामटेक नगरपालीकेत भाजपाचे 17 पैकी 13 नगरसेवक निवडून आले आहेत. यापैकी सौ कविता मुलमुले यांना उपाध्यक्ष करण्यात आले आहे.उपाध्यक्ष करते वेळी  दरवर्षी एका महीला नगरसेविकेला उपाध्यक्ष करण्यात येईल असे त्यांनी आपसांत ठरविले होते.याबाबत रामटेकचे आमदार डी.मल्लिकार्जुन  रेड्डी व नागपुर जिल्हा भाजपाचे अध्यक्ष राजीव पोतदार या दोन महत्वपूर्ण  नेत्यांच्या उपस्थितीत उपरोक्त विषय  ठरला तरीही उपाध्यक्षा कविता मुलमुले या राजीनामा देत नसल्यामुळे सर्व च नगरसेवकांमध्ये नाराजी आहे.
या सर्व नगरसेवकानी जिल्हाध्यक्ष पोतदार यांची भेट घेतली मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही त्यामुळे या नगरसेवकांनी नगरपालीकेच्या कामकाजावर बहिष्कार  टाकल्याचे चित्र यानिमीत्ताने दिसून येत आहे.आपले नांव न छापण्याच्या अटीवर अनेक नगरसेवकांनी सांगीतले की,दरवर्षी  उपाध्यक्ष बदलला जाईल असे पक्षांतर्गत ठरले  असतांना तसे न झाल्याने नगरसेवक नाराज आहेत.शिवाय या समस्येवर तोडगा काढण्यासाठी वेळ लागत असल्याने जोपर्यंत उपाध्यक्षा राजीनामा देत नाहीत तोपर्यंत नगरपालीकेच्या कामकाजात सहभागी व्हायचे नाही असा निर्णय या नगरसेवकांनी घेतला आहे.उपरोक्त पार्ष्वभूमीवर पुढे  काय होते याकडे रामटेक वासीयांचे लक्ष लागले  आहे.
वृक्ष लागवडीसंदर्भात विश्वास जागवा

वृक्ष लागवडीसंदर्भात विश्वास जागवा

कमांड रुमच्या माध्यमातून लोकांच्या मनात
 -  सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. २७ :  वृक्ष लागवड हा वन विभागासाठी एखादा कार्यक्रम किंवा उपक्रम नाहीते एक मिशन आहे हे लक्षात घेऊन वृक्ष लागवडीचे सर्व काम पारदर्शकपणे झाले पाहिजे असे सांगतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कमांड रुमच्या माध्यमातून लोकांच्या मनात वृक्ष लागवडीसंदर्भात विश्वास जागवागुगल सर्चद्वारे त्यांना करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीची सविस्तर माहिती उपलब्ध करून द्याअशा सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या
        सह्याद्री अतिथीगृहात काल झालेल्या ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा वनमंत्र्यांनी आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस वन विभागासह इतर सर्व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी  उपस्थित होते.
   वन विभागाने सन २०१७ मध्ये ४ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले होते. या कार्यक्रमात व्यापक लोकसहभाग मिळाल्याने दि. १ जुलै ते ७ जुलै २०१७ या कालावधीत राज्यात  ५ कोटी ४३ लाख वृक्ष लागवड झाली. आता २०१८ साली सर्व शासकीय विभाग तसेच लोकांच्या सहकार्याने राज्यात १३ कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प आहे. यामध्ये वन विभाग ७.५ कोटी वृक्ष लावणार आहे. तर २.५० कोटी वृक्ष इतर शासकीय विभाग३ कोटी वृक्ष ग्रामपंचायतींमार्फत लावले जाणार आहेत. एवढ्या मोठ्याप्रमाणात वृक्ष लागवड करण्यासाठी राज्यातील सार्वजनिक जागांची माहिती एक‍त्रित केली जावीराज्यात वृक्ष लागवडीसाठी एकूण किती जागा उपलब्ध आहे याचीलॅण्ड बँक तयार केली जावी अशा सूचनाही वनमंत्र्यांनी यावेळी दिल्या.मनरेगाअंतर्गत १०० दिवसांऐवजी १५० दिवस काम उपलब्ध करून देण्याबाबतची मागणी करणारे पत्र केंद्रीय मंत्री महोदयांकडे पाठवले जावे तसेच या विषयाचा राज्यातील लोकप्रतिनिधींना केंद्रीयस्तरावर पाठपुरावा करता यावा यासाठी त्यांनाही या प्रस्तावाची माहिती देण्यात यावी असेही श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.  २०१८ च्या पावसाळ्यात होणाऱ्या १३ कोटी वृक्ष लागवडीसाठी वनमंत्र्यांनी रोप निर्मितीवृक्ष लागवडीसाठी करावयाचे खड्डेमनुष्यबळाची उपलब्धता यासारख्या विविध विषयांचाही आढावा घेतला.

महाराष्ट्राच्या वृक्षाच्छादनामध्ये २५६ चौ.कि.मी ची वाढ
वृक्षाच्छादनामध्ये महाराष्ट्र देशात अग्रगण्य राज्य
वनेत्तरकांदळवन आणि बांबू क्षेत्रात भरघोस वाढ
काल झालेल्या सादरीकरणात भारत सरकारने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या  स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट २०१७ मधील काही ठळक बाबींची माहिती देण्यात आली.  या  अहवालानुसार वन आच्छादनाचे (Forest Cover) क्षेत्र हे ५०,६९९ चौ.कि.मी होते ते २०१७ च्या अहवालात ५०६८२ इतके म्हणजे १७ चौ.कि.मी ने कमी झाल्याचे नमूद केले आहे. असे असले तरी याच अहवालात वृक्षाच्छादनात (Tree Cover) २७३ चौ. कि.मीची वाढ झाल्याचे नोंदविण्यात आले आहे.  वनाच्छादनाची १७ चौ.कि.मी ची घट वजा करता महाराष्ट्रातील वृक्ष आच्छादनामध्ये २५६ चौ.कि.मीची वाढ  झाली आहे.  वृक्षाच्छादनाच्या एकूण क्षेत्राचा विचार करता महाराष्ट्र राज्य हे देशात अग्रगण्‍य राज्य आहे. वनेत्तर क्षेत्रातील वृक्षाच्छादन (Tree Cover on Non Forest Area) क्षेत्र एकूण भुभागाच्या ३.१९ टक्के इतके  आहे.
महाराष्ट्र राज्य हे विधिवत वनक्षेत्राच्या बाहेरील वनेत्तर क्षेत्रामधील वृक्ष आच्छादनामध्ये (Tree Cover in Non Forest Area ) देशामध्ये अग्रगण्य राज्य आहे. राज्यामध्ये कांदळवन तसेच बांबू क्षेत्रात भरघोस वाढ झाली आहे हे देखील भारतीय वन सर्व्हेक्षण संस्थेने नुकत्याच प्रकाशित केलेल्या २०१७ च्या अहवालात नमूद केले आहे 
घनदाट जंगलात  ५१ चौ.कि.मी ची वाढ
याच अहवालात सन २०१५ च्या तुलनेमध्ये २०१७ साली  महाराष्ट्र राज्यामध्ये घनदाट जंगल म्हणजे ७० टक्क्यांपेक्षा जास्त घनतेची जंगले यामध्ये ५१ चौ.कि.मी ची वाढ दर्शविली आहे. २०१५ मध्ये घनदाट जंगलाचे क्षेत्र ८६८५ चौ.कि.मी होते ते २०१७ मध्ये ८७३६ चौ.कि.मी इतके झाले आहे.
कांदळवन क्षेत्रात ८२ चौ कि.मी ची वाढ
भारतीय वनस्थिती अहवाल २०१५ नुसार राज्याचे कांदळवन क्षेत्र २२२  चौ. कि.मी होते ते २०१७ मध्ये वाढून ३०४ चौ.कि.मी इतके झाले आहे. यामध्ये ८२ चौ कि.मी ची भरघोस वाढ नोंदवण्यात आली आहे. ही वाढ प्रामुख्याने रायगडमुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात आहे.
शासनाने कांदळवनक्षेत्राची पुननिर्मिती आणि संगापेनासाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती केली आहे तसेच त्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ आणि संससाधने उपलब्ध करून दिली आहेत.त्यामुळे कांदळवन क्षेत्रात वाढ होण्यास मदत झाली आहे.
जलव्याप्त क्षेत्रात ४३२ चौ.कि.मीची वाढ
२०१५ च्या भारतीय वन स्थिती अहवालात एकूण जलव्याप्त क्षेत्र १११६ चौ कि.मी होते ते २०१७ मध्ये वाढून १५४८ चौ.कि.मी इतके झाले आहे. जल व्याप्त क्षेत्रातील ही वाढ ४३२ चौ कि.मी इतकी आहे. जलयुक्त शिवार,जलसंधारणाच्या हाती घेतलेल्या कामांमुळे ही वाढ शक्य झाली आहे. वनयुक्त शिवार करतांना जलयुक्त वन कार्यक्रमास वन विभागाने गती दिली आहे.
बांबू क्षेत्रात ४४६२ चौ कि.मीची  वाढ
भारतीय वन स्थिती अहवाल २०१५ मध्ये बांबू प्रवण क्षेत्र ११४६५ चौ.कि.मी होते. ते २०१७ मध्ये १५९२७ चौ.कि.मी इतके झाले म्हणजे २०१५ च्या तुलनेत राज्यातील बांबू क्षेत्रात ४४६२ चौ.कि.मी म्हणजे ४ लाख ४६ हजार २०० हेक्टने वाढ झाली आहे. देशामध्ये बांबू पुननिर्मिती मध्ये राज्याचा दुसरा क्रमांक लागतो तर घनदाट बांबू (Dense Bamboo) प्रवण क्षेत्रामध्ये राज्याचा तिसरा क्रमांक लागतो. राज्यात बांबूचा व्यावसायिक वापर वाढावा,यातून रोजगार निर्मिती व्हावीत्यासाठी उत्तम दर्जाचा बांबू उपलब्ध व्हावा यासाठी शासनाने चंद्रपूर जिल्ह्यात चिचपल्ली येथे  बांबू प्रशिक्षण आणि संशोधन केंद्राची स्थापना केली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य बांबू विकास मंडळाची स्थापनाही यासाठीच करण्यात आली आहे. याद्वारे लोकांना प्रशिक्षण देऊन कुशलता वाढवण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. बांबूला वन विभागाच्या वाहतूक परवान्यातून मुक्त करण्यात आले आहे.बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यामुळे ही बांबू प्रवण क्षेत्रात वाढ झाली आहे.
मराठी विद्यापीठ मंजूरीसाठी पाठपुरावा करणार

मराठी विद्यापीठ मंजूरीसाठी पाठपुरावा करणार

                                   - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईदि. 27 राज्यात स्थापन करण्यात येणाऱ्या पहिल्या मराठी भाषा विद्यापीठाचा प्रस्ताव लवकरच केंद्र शासनाकडे पाठवून मंजुरीसाठी पाठपुरावा करण्यात येईलअशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.
            मराठी भाषा विद्यापीठासाठी वांद्रे येथील जागेच्या हस्तांतरणाची कागदपत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रंथाली प्रकाशन तथा वाचक चळवळीचे संस्थापक दिनकर गांगण यांच्याकडे सुपूर्त केली.
            मुख्यमंत्री यावेळी म्हणालेमराठी अभिजात आहेच मात्र तिच्यावर राजमुद्रा उमटविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यासाठी ग्रंथालीने घेतलेला पुढाकार महत्त्वपूर्ण आहे. मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठी भाषा विद्यापीठासाठी जागा हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम पार पडत असल्याचा आनंद आहे.
            ते पुढे म्हणालेमराठी भाषा समृद्ध आहे. तथापिपुढील पिढीला मराठीचे महत्व समजावे यासाठी ग्रंथाली आणि अशा अन्य चळवळींचे योगदान महत्वाचे आहे. ज्ञानाच्या क्षेत्रातील कक्षा रुंदावणारी चळवळ असलेली ग्रंथाली चळवळ पुन्हा रुजण्यासाठी शासनाने मदतीची भूमिका घेतलीअसेही ते म्हणाले.
            विधान भवनातील समिती कक्षामध्ये झालेल्या या कार्यक्रमात यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडेआमदार आशिष शेलारआमदार प्रसाद लाडआमदार नरेंद्र पवारज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिकग्रंथालीचे कार्यकारी विश्वस्त सुरेश हिंगलासपूरकरसंपादक आणि विश्वस्त पद्मभूषण देशपांडेसंपादक अरुण जोशीधनश्री धारवलतिका भानुशाली,डिजिटल आवृत्तीचे संपादक धनंजय गांगणसाहित्यिक महेश केळुस्कर आदी उपस्थित होते.
मुंबई - अहमदाबाद हायस्पीड रेल्वे टर्मिनससाठी  ‘बीकेसी’मधील जमिनीचे हस्तांतरण

मुंबई - अहमदाबाद हायस्पीड रेल्वे टर्मिनससाठी ‘बीकेसी’मधील जमिनीचे हस्तांतरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  व रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत कागदपत्रे सुपूर्त

मुंबईदि. 27 : मुंबई -अहमदाबाद हायस्पीड (बुलेट ट्रेन) रेल्वेसाठी वांद्रे कुर्ला संकुल येथे उभारण्यात येणाऱ्या हायस्पिड टर्मिनससाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाची जमीन नॅशनल हायस्पिड रेल्वे कार्पोरेशन लिमिटेडला हस्तांतरित करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे आज हा कार्यक्रम झाला. 
            मुंबई-अहमदाबाद हायस्पिड रेल्वे प्रकल्पांतर्गत बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे भुयारी हायस्पीड टर्मिनस उभारण्यात येणार आहे. यासाठी भू गर्भाखाली 4.6 हेक्टर तर त्याच्यावर 0.9 हेक्टर जमीन नॅशनल हायस्पिड रेल्वे कार्पोरेशन लिमिटेडलाएमएमआरडीएच्यावतीने देण्यात आली आहे. यासंबंधीची कागदपत्रे आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस व रेल्वे मंत्री श्री. गोयल यांच्या उपस्थितीत एमएमआरडीएचे महानगर आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी नॅशनल हायस्पिड रेल्वे कार्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अचल खाडे यांच्याकडे सुपूर्त केली. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरेरेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेनजपानचे वाणिज्यदूत रिओजी नोडाखासदार कपिल पाटीलआमदार आशिष शेलार यांच्यासह जपानच्या सल्लागार कंपनीचे अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
            मुंबई अहमदाबाद हायस्पिड रेल्वे प्रकल्पाअंतर्गत बांद्रा कुर्ला संकुल येथे हायस्पिड टर्मिनल उभारण्यात येणार आहे. यामध्ये जमिनीच्या आत 25 मीटर खोल त्रिस्तरीय टर्मिनल उभारण्यात येणार आहे. तसेच या टर्मिनसच्या वरील भागातील जमिनीवर इमारतीचे बांधकाम असणार आहे.
मुख्यमंत्री व रेल्वेमंत्र्यांनी केला लोकलमधून प्रवास
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथील कार्यक्रम संपल्यानंतर परळ येथील रेल्वे पादचारी पुलाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसरेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी लोकलमधून परळ रेल्वेस्थानकापर्यंतचा प्रवास केला. यावेळी त्यांच्यासोबत रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेनसंरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरेखासदार अरविंद सावंत आदी उपस्थित होते.
रेल्वे स्थानकांतील पादचारी पुलांचे लोकार्पण

रेल्वे स्थानकांतील पादचारी पुलांचे लोकार्पण

मुंबईकरांचे जीवन सुखदायी करण्याची सुरुवात
मुख्यमंत्री फडणवीस

एल्फिन्स्टन-परळसहकरी रोडआंबिवली स्थानकावरील पादचारी पुलांचे लोकार्पण
लष्कराची विक्रमी वेळेत कामगिरीमुंबईसाठी सुरक्षित-सुविधायुक्त रेल्वेसाठी प्रयत्न
रेल्वेमंत्री
मुंबईदि. २७ :- मुंबईकरासाठी उपनगरीय रेल्वे ही लाईफ लाईन आहे. त्यामुळे मुंबईकराचे जीवन सुखदायी करण्याची सुरवात आज रेल्वे पादचारी पुलांच्या लोकार्पणातून सुरु झाली आहेअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. मध्य रेल्वेच्या एल्फिन्स्टन-परळकरी रोड आणि आंबिवली स्थानकांवरील पादचारी पुलांचे उद्घाटन तसेच लोकार्पण एल्फिन्स्टन-परळ दरम्यानच्या पादचारी पुलावर संपन्न झाले. त्यानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

·         भारतीय लष्कराने या तीनही पुलांचे काम विक्रमी वेळेत पुर्ण केले आहे.
·         एल्फिन्स्टन-परळ पुलाचे आणि अन्य दोन्ही पुलांचे उद्घाटन तसेच लोकार्पण मुंबईकरांचे प्रतिनिधी म्हणून मुंबईचे डब्बेवालेकोळी बांधव अशा मूळ निवासी नागरिकांच्या हस्ते साधेपणाने करण्यात आले.
·         यावेळी त्यांच्या हस्ते भारतीय लष्कराचे आभार मानणाऱ्या फलकांचे अनावरण करण्यात आले. 

याप्रसंगी केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयलकेंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॅा. सुभाष भामरे, राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते,खासदार अरविंद सावंतखासदार गोपाळ शेट्टीखासदार कपिल पाटीलआमदार आशिष शेलारआमदार नरेंद्र पवार, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्तालष्कराचे अधिकारी कर्नल विश्वंभरगौतम तनेजाविनायक रामास्वामी आदींची उपस्थिती होती.
उद्घाटन व लोकार्पणानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस व रेल्वेमंत्री श्री. गोयल यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेआपत्तीच्या काळात लष्कर मदतीसाठी धावते. पण अशा प्रकारच्या कामांसाठीही लष्कराने पुढे येऊन हे काम वेळेत पूर्ण केले आहे. भारतीय लष्कराने विक्रमी वेळेत या तीनही पुलांचे काम पूर्ण केले आहे. त्यांची ही कामगिरी महत्त्वपूर्ण अशीच आहे. पादचारी पुलांची अत्यावश्यकता ध्यानात घेऊनलष्कराला पाचारण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तो लष्कराने आपल्या कामगिरीने योग्य ठरविला आहे. मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सुविधांसाठी रेल्वे मंत्रालयाने सर्वतोपरी सहकार्य देऊ केले आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात चाळीस हजार कोटींची तरतूद केली आहे. तर यापूर्वीच अकरा हजार कोटी रुपयेही मिळाले आहेत. मुंबईची उपनगरीय रेल्वे सेवा ही मुंबईकरांची लाईफ लाईन आहे. त्यामुळे मुंबईकराचे जीवन गैरसोयमुक्त करण्याचा प्रयत्न आहे. त्याची सुरुवात आज या लोकार्पणातून झाली आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. गोयल म्हणालेभारतीय लष्कराने ही तीनही पुल विक्रमी वेळेत पुर्ण केले आहेत. त्याचबरोबर रेल्वेच्या यंत्रणेनेही सतरा पुलांचे काम पूर्ण केले आहे. याशिवाय जून २०१८पर्यंत आणखी बावीस पूल पूर्ण होतील.  तर आणखी ५६ पुलांच्या कामांसाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबईकरांसाठी शंभरहून अधिक असे पादचारी पूल उपलब्ध होतील. एकूणच मुंबईसाठी एकावन्न हजार कोटींचा एकात्मिक विकास आराखडा रेल्वेने तयार केल्याचे श्री. गोयल यांनी सांगितले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नव भारताचे स्वप्न पाहिले आहेत्यामध्ये नव महाराष्ट्र आणि त्यातही मुंबईतील रेल्वे सुविधांवर भर देऊन मुंबईकरांसाठी सुरक्षित व सुविधांनीयुक्त अशी रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न असल्याचेही श्री. गोयल यांनी सांगितले
 शिवसेनेचे आंदोलन म्हणजे राजकीय नौटंकी:भाजपचा घणाघाती आरोप

शिवसेनेचे आंदोलन म्हणजे राजकीय नौटंकी:भाजपचा घणाघाती आरोप

विकासाला बगल देत राजकारण
bjp logo साठी इमेज परिणाम चंद्रपूर(ललित लांजेवार)
सोमवारी जटपुरा गेट येथे शिवसेनेने केलेल आंदोलन म्हणजे राजकीय नौटंकी आहे असा अनाघाती आरोप आता चंद्रपूर महानगर पालिकेच्या भाजपच्या  महिला नगरसेविका कु.शीतल कुळमेथे यांनी केला आहे,  चंद्रपूर शहराला ५००  वर्षांचा इतिहास आहे. चंद्रपूर जिल्ह्याला ऐतिहासिक वैभव लाभलेले असल्याची नोंद आहे.  येथील परकोट,किल्ले,मंदिर,  समाधी स्थळे, हे गुंड राज्याचे वैभव दर्शविणारे केंद्र आहे.  त्यांच्या सौंदर्यात लाइटिंगमुळे  भर पडणार आहे.  वाहतुकीची कोंडी आणि लाइटिंग हा सबंध सामान्यांच्या बुद्धीला न पटणारा आहे.त्यामुळे जोरगेवार हे  राजकीय हेतूने पूर्वजांनी 500 वर्षांपासून जतन केलेल्या पुरातत्त्व संपत्तीला संपवण्याचा डाव खेळात आहेत असा आरोप  भाजपच्या  महिला नगरसेविका कु.शीतल कुळमेथे यांनी शिवसेनेवर केला आहे. या जटपुरा गेटला धक्का जरी लागला तर आम्ही आदिवासी समाज रस्त्यावर उतरू असा ईशारा यावेळी नगरसेविका कु.शीतल कुळमेथे यांनी दिला  आहे,
                चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी समाज 500 वर्षांपासून गोंड राजांनी उभारलेल्या वैभवाचे जतन करत आलेला आहे.  या संपत्तीला अधिक वैभव लाभण्यासाठी व पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने लावण्यासाठी भरीव निधी देऊन मदत केली आहे.  इतिहासाला आपण जपायला हवे परंतु विकासापोटी असंतुष्ट प्रवृत्तीचे लोकी  ऐतिहासिक वारसा जतन न करता तो नष्ट करण्याच्या मागे लागलेले आहे हे आम्ही आदिवासी समाज कदापी खपवून घेणार नाही, 

 ५००  वर्षांचा पुरातत्त्व गोंड राजाचा इतिहास आम्ही फक्त पुस्तकाद्वारे पुढच्या पिढीला न सांगता तो प्रत्यक्षात जतन करून ठेवू, या सौंदर्यीकरण आला कुठलाही विरोध केल्यास आम्ही रस्त्यावर उतरून याचा जाहीर  निषेध करू असे देखील म्हणाले. 
पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न 
अशा प्रकारचे पुरातन वस्तू यांचे जतन करण्यासाठी दिल्ली,औरंगाबाद येथे अशा प्रकारची लाइटिंग लावण्यात आलेली आहे. याच प्रकारची लाइटिंग चंद्रपूरच्या ऐतिहासिक वैभवात वाढ करण्याकरिता लावण्यात येणार आहे यामुळे चंद्रपूर आकर्षणाचे केंद्र बनेल व  गोंड राज्याच्या ऐतिहासिक पुढची पिढी  माहिती करून घेण्याचा प्रयत्न करेन.  की आमच्या आदिवासी समाजासाठी अभिमानाची बाब आहे त्यामुळे विकासाला साथ देत विकासासोबत राहायला हवे असा सल्ला देखील यववेली देण्यात आला
सरकारविरोधात जिल्हाभरातील १४ संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

सरकारविरोधात जिल्हाभरातील १४ संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

चंद्रपूर/प्रतिनिधी:
राज्यसरकारच्या कंत्राटी कामगारविरोधी धोरणाविरोधात राज्यभरातील कंत्राटी कामगारांमध्ये संतापाची लाट पसरली असून आज दोन हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले तसेच जिल्हाभरातील १४ संघटनांनी मिळून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
    सकाळी ११ वाजता जिल्हापरिषदेसमोर सर्व कर्मचारी एकवटले होते. त्यानंन्तर १२ वाजता जिल्हापरिषदेपासून मोर्चा काढत गांधी चौक, जटपुरा गेट मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकला. या मोर्चात हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
राज्याच्या विविध विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पात राज्यात ३  लाख १६ हजार तर जिल्ह्यात २ हजारावर कर्मचारी आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान प्रकल्पात सर्वाधिक कंत्राटी कर्मचारी आहेत. गेल्या १५ वर्षांपासून हे कर्मचारी शासकीय सेवेत कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत.मात्र अलीकडेच शासनाने कंत्राटी पद्धतीने निर्माण केलेल्या पदावरील नेमणुकीचा अटी व शर्ती बाबत तसेच या पदावर निरुक्त कर्मचाऱ्यांचा सेवा नियमित न करण्याचे परिपत्रक काढले आहे. हे परिपत्रक संपूर्ण कंत्राटी कामगारांवर अन्याय करणारे असल्याचा आरोप करत विविध मागण्यांना घेऊन आज दोन हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले तसेच जिल्हाभरातील १४ संघटनांनी मिळून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. त्यानंतर मोर्चतील एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले
अतिदुर्गम भागातील आदिवासींच्या जीवनात"महावितरणने"पेरला प्रकाश

अतिदुर्गम भागातील आदिवासींच्या जीवनात"महावितरणने"पेरला प्रकाश

चंद्रपूर/विशेष प्रतिनिधी:
गडचिरोली जिल्हयातील अतिदुर्गम व प्रगतीपासून दूर असलेल्या, दिवसभर शेतात,रानात उपजिविकेसाठी राबून घरी परतलेल्या थकलेल्या तसेच प्रकाशासाठी तेलाच्या दिव्यांवर अवलंबून असणाऱ्या कोकामेटा टोला या गावाच्या गावकऱ्याच्या जीवनात 29.01.18 हा दिवस केवळ प्रकाशच घेवून नव्हे तर प्रगतीचा सुगंध घेवूनआला.
गडचिरोली सारख्या अतिदुर्गम जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील आतापर्यंत विदयुतिकरण न झालेल्या या गावाचे विद्युतीकरण दि 29.01.18 रोजी महावितरण चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री. दिलीप घुगल यांचे हस्ते झाले व संपूर्ण गाव चेहऱ्यावर एक आनंदाची नवी किरण बघायला मिळाली. शेती व वन रोजगारांवर अवलंबून असलेल्या केवळ 11 घरांची वस्ती असलेल्या सर्व सर्वांना महावितरणने सौभाग्य योजने अंतर्गत मोफत विजजोडण्या करून दिल्या. गडचिरोली जिल्हयातील आलापल्ली व गडचिरोलीमधील एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 610 गरीब आदिवासी बांधवांच्या घरातील तेलाच्या दिव्यांची जागा आता एलईडी दिव्यांनी घेतली आहे.
सौभाग्य योजनेच्या माध्यमातूनच गडचिरोली व आलापल्ली या दोन विभागातील एकदंरीत 610 कुटुंबांना सौभाग्य योजनेच्या माध्यमातून वीजजोडणी सुविधामहावितरण कडून प्राप्त झाली आहे. यात आलापल्लीतील 509 घरकुलांना तर गडचिरोलीतील 101 गरीब आदिवासी बांधवांच्या कुटूंबांचा समावेश आहे.
प्रकाशमान आदिवासी साठी इमेज परिणामया सर्व गावात जाण्यासाठी रस्ते नाही, त्यामुळे केवळ कच्च्या रस्त्यांचा मार्ग क्रमत, मैलो न मैल रानवाटा चालत महावितरणच्या आलापल्ली व गडचिरोली विभागातील कर्मचारी व अभियंत्यांनी या वीजजोडणींसाठी पायाभूत सुविधा -वीजेची रोहित्रे, वीजेची खांबे व वीजवाहिण्या उभ्या करत आलापल्ली, एटापल्ली, सिरोंचा, भामरागड व धानोरा उपविभागांतर्गत येणाऱ्या 40 गावातील गरीब आदिवासींच्या जीवनात प्रकाशाची वाट उपलब्ध करून दिली. 
आलापल्ली विभागांतर्गत येणाऱ्या 33, भामरागड उपविभागात 110, एटापल्ली उपविभागात 136, सिरोंचा उपविभागात 230 अशा एकूण 509 दारिद्र रेशेखालील कुटूंबे तर गडचिरोली विभागांतर्गत येणाऱ्या धानोरा उपविभागातील 101 घरात महावितरणचा प्रकाश सौभाग्य योजनेच्या माध्यमातून पोहोचला आहे.
वर्षानुवर्षे रानावनात भटकून भाकरीचा चंद्र कमावणे तर चंद्रांच्या चांदण्यात उद्याच्या उदयाची स्वप्ने रंगविणे, कुडाच्या-मातीच्या घरात तेलाच्या दिव्याच्या प्रकाशात जीवन जगतांना घराच्या कौलातून येणारा चंद्रप्रकाश तेलाचा दिवा हिच प्रकाशाची साधने असतांना सौभाग्य योजनेमधून जेव्हा ६१० आदिवासींच्या जीवनात प्रकाशाची किरणे पेाहोचली तेव्हा समाधानाचा सुर्य त्या आदिवासींच्या चेहऱ्यावर उगवला. 

यातच चंद्रपूर गडचिरोली जिल्याच्या सीमेवर असलेल्या चंद्रपूर परिमंडळांतर्गत बल्लारशाह विभागातील जिवती उपविभागातीतील दुर्गम अशा घाटरायगुडा, गावातील 8, पाटागुडा गावातील 11 व आंबेझरी गावातील 12 व सेवादासनगर येथिल 29 अशा एकंदरीत ६० दारीद्रय रेशेखालील गावकऱ्यांच्या जीवनात महावितरणने वीजजोडणी देवून गरीब आदिवासींच्या जीवनात प्रकाशाच्या किरणांना वाट उपलब्ध करून दिली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत जाणाऱ्या आता लहानग्या विध्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी तेलाच्या दिव्याच्या प्रकाशाची जागा आता एलईडी बल्बचा प्रकाशाने घेतली आहे. जीवती तालुक्यातील घाटरायगुडा, पाटागुडा सेवादानगर व आंबेझरी हि गावे तालुक्याच्या शेवटच्या टोकावर दूर्गम व डोंगरव्याप्त भागात महाराष्ट्र व तेलंगणाच्या सिमेवर वसलेली आहेत. गावातील लोक आदिवासी कोलाम असून त्यांचा उदरनिर्वाह हा शेती तसेच जंगलातून मध गोळा करणे आदीवर होतो. तालुक्यापासून 15 ते 20 किमी दुर असणारी ही चारही गावे अनुक्रमे 13-14 घरांची वस्ती असलेले आहे.
चंद्रपूर मंडलाचे अधिक्षक अभियंता श्री. हरिश गजबे व जिवती उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री. मांगिलाल राठोड व कनिष्ठ अभियंता श्री. विनोद भलमे, यांनी या घाटरायगुडा गावातील 8, पाटागुडा गावातील 11, सेवादासनगर गावातील 29 व आंबेझरी गावातील 12 अशा 50 कुटूंबांच्या जीवनात प्रकाश किरणे पोहोचवून समाजाचाच भाग असलेल्या परंतु प्रगतीपासून दूर असलेल्या बांधवाना प्रकाशाची भेट देवून त्यांना प्रगतीची वाट दाखवली.
भामरागड तालुक्यातील आतापर्यंत विदयुतिकरण न झालेल्या या गावाचे विद्युतीकरण दि 29.01.18 रोजी महावितरण चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री. दिलीप घुगल यांचे हस्ते झाले व तेव्हा संपूर्ण गाव आनंदमय झाले.कोकामेटा टोला गाव हे जिल्हा मुख्यालयापासून जवलपास 200 कि.मी व तालुका मुख्यालया पासुन जवळपास 15 कि.मी.अंतरावर असुन अतिशय दुर्गम भागात स्थित आहे. गावात जाण्यासाठी रस्ते नाही त्यामुळे केवळ कच्च्या रस्त्यांचा मार्ग क्रमत डोंगर दरीतून वाट काढत, जंगलातून महावितरणच्या आलापल्ली विभागांतर्गत भामरागड उपविभागातील कर्मचाऱ्यांनी तसेच कंत्राटदारांनी वीजेचे एक 63 केव्हीएचे रोहित्र, वीजेची खंबे 2.5 किमी उच्चदाब वाहिनी व 1 किमी लघूदाब वीजवाहिनीचे प्रयोजन करत कोकामेटा टोला वासियांच्या जीवनात प्रकाषाची वाट उपलब्ध करून दिली व मुख्य अभियंता श्री. दिलीप घुगल यांनी वीजेची कळ दाबताच सर्व गावात सुर्य, चंद्राच्या व तेलाच्या दिवाच्या प्रकाशानंतर महावितरणद्वारा प्रकाश पेरला गेला.
शेती व वन अवलंबित वन रोजगारांवर अवलंबित केवळ 11 घरांची वस्ती असलेल्या सर्व 11 घरांना सौभाग्य योजने अंतर्गत मोफत विजजोडण्या देण्यात आल्या. गोंगलू देवू कोसामी, लालसू इरपा वड्डे, चैते मंजूरू वड्डे, राकेश मुरा मडावी, कटीया पेका कुसामी,राजे देबू दुर्वे, चैतू पेका मडावी, सोमा चुक्कू महाका, इरपा कटीया पुंगाटी, केये देउ कुरसामी,सैनू पेका मडावी यांना या वीजजोडण्या देेण्यात आल्या , त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रकाश -प्रगतीची दारे उघडली जाण्यात महावितरणचा हातभार लागला. 
मुख्य अभियंता श्री. दिलीप घुगल व गडचिरेाली मंडलाचे अधिक्षक अभियंता श्री. अषोक म्हस्के यांच्या मार्गदर्षनात गडचिरेाली विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. विजय मेश्राम व आलीपल्ली विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. अमित परांजपे यांनी या वीजजोडण्या देण्याचे नियेाजन करीत गरीब आदिवासी कुटूंबांना प्रकाशाची भेट दिली आहे.
ज्या घरात अजूनही वीज पोहोचली नाही, अशा कुटुंबात मोफत वीज देण्याची घोषणा पंतप्रधानांनी सोमवारी केली असून, त्यानुसार महाराष्ट्रात अजून ३ लाख ६४ हजार कुटुंबांत या 'सौभाग्य' योजनेतून वीजपुरवठा करण्याचे आव्हान 'महावितरण'समोर आहे. 'महावितरण'ने मार्च २०१५ पासून तब्बल १६ लाख कुटुंबांच्या घरांत उजेड पेरण्याचे काम केले आहे.
देशात अजूनही वीज पोहोचली नाही अशी जवळ पास चार कोटी कुटुंबे आहेत. त्यांना मार्च २०१९ पर्यंत वीज देण्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले आहे. त्यासाठी केंद्र सरकार १६ हजार ३२० कोटी रुपये खर्च करणार आहे. सन २०११ च्या सामाजिक व आणि आर्थिक जनगणनेमध्ये नोंदविण्यात आलेल्या गरिबांना मोफत कनेक्शन देण्याची ही 'सौभाग्य' योजना आणली आहे















जटपुरा गेटच्या समस्सेविषयी शिवसेनेचे जिल्हाधिका-यांना सुचविल्या उपाय योजना

जटपुरा गेटच्या समस्सेविषयी शिवसेनेचे जिल्हाधिका-यांना सुचविल्या उपाय योजना

चंद्रपूर/प्रतिनिधी:
पहिले जटपूरा गेटवर होत असलेली वाहतुकीची कोंडी सोडवा नंतर सौंदर्यीकरण करा या मागणी करीता जटपूरा गेट येथे किशोर जोरगेवार यांच्या तर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. सध्या चंद्रपुरात नको त्या कामावर पैश्याची उधडपट्टी करण्याचे काम सुरु असून जनतेच्या मुळ समस्या जैसे थे आहेत. त्यामूळे चंद्रपूरकरांना नाहक समस्यांना समोर जावे लागत असून जनतेमध्ये सत्ताधा-यांविषयी तिव्र रोष आहे. यातच जटपुरा गेटची वाहतूक कोंडी सोडविण्यापेक्षा या ठिकाणी दोन कोटीहून अधिक खर्च करुन सौंदर्यीकरनाचे वेड लोकप्रतिनीधींना लागले आहे. ही जनतेच्या संयमतेची थट्टा असून हा प्रकार आता आम्ही चालू देणार नाही. जो पर्यंत येथील वाहतूककोंडीचा प्रश्न सोडविल्या जात नाही तोवर या ठिकाणी सौंदर्यीकरणाचे काम करु देणार नाही असा सक्त ईशारा सोमवारी किशोर जोरगेवार  यांनी दिला आहे. 

                  या धरणे आंदोलन आंदोलनाचे संचालन  इरफान शेख यांनी केले, यावेळी माजी जिल्हा प्रमुख दिलीप कपूर, दीपक बेले, शहर प्रमुख सुरेश पचारे, जिल्हाप्रमुख भारती दुधानी, माजी नगरसेवक आकाश साखरकर, राजेश नायडू, वंदना हातगावकर, अमोल शेंडे, नगरसेवक विशाल निंबाळकर, कलाकार मल्लारप, संदीप कष्टी, अब्बासभाई, इरफान शेख, अजय कोंडलेवार, चिराग नथवानी, प्रकाश चंदनखेडे, चंद्रराज बाथो, विलास वनकर, दीपक पद्म्गीरीवार, रुपेश पांडे, विनोद अनंतवार, मुन्ना जोगी, शंकर दंतुलवार, राशीद हुसैन, दिलीप बेन्डले, वैभव माकडे, गौरव जोरगेवार,टिकाराम गावंडे, बबलु पुण्यवर्धन, मंगेश अहिरकर, बादल हजारे, मुकेश डाखोरे, राजेश मांगुळकर, प्रीतम लोणकर, माला तुरारे, सुजाता बल्ली, महादेव अडबाले, राहुल मोहुर्ले, अरुण येणप्रेद्दीवार, अशपाक खान, इरफान शेख, रवी करमरकर आदिंची उपस्थिती होती. 

Monday, February 26, 2018

28 फेब्रुवारी, रोजी वर्धा येथे पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्‌घाटन

28 फेब्रुवारी, रोजी वर्धा येथे पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्‌घाटन

वर्धा/नागपूर दि 26 फेब्रुवारी 2018

वर्धा येथील पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्‌घाटन 28 फेब्रुवारी, 2018 बुधवार, रोजी सकाळी10.00 वाजता खासदार श्री. रामदास तडस यांच्या हस्ते होणार आहे . हे पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र प्रधान डाकघर सिव्हिल लाईन्स, वर्धा येथे आहे.

या केंद्रात पासपोर्ट प्रक्रियेसंदर्भातील कामकाजाकरिता ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे. वर्धा जिल्ह्यातील अर्जदारांना या संधीचा लाभ घेण्यासाठी त्यांचे अर्ज www.passportindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदवून व पासपोर्टसाठी लागू असणारे शुल्क भरुन ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. 26 फेब्रुवारी 2018रोजी दुपारी 3 वाजतापासून सदर केंद्रासाठी नोंदणी सुरू झाली आहे.

वर्धा येथील पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रावर अन्य पासपोर्ट एजेंटना प्रवेश मिळणार नाही. अर्जदारांना स्वतः पासपोर्ट प्रक्रियेसाठी हजर राहणे आवश्यक आहे. तत्‍काल आणि पी.सी.सी. (पोलिस क्लियरन्स सर्टिफिकेट)या संवर्गातील अर्ज सद्यस्थितीत केंद्रावर स्‍वीकारले जाणार नाहीत , अशी माहिती उप-पारपत्र अधिकारी, नागपूर यांनी दिली आहे. या केंद्राचा उद्घाटन सोहळा सर्वांसाठी खुला असून याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही उप-पारपत्र अधिकारी, नागपूर यांनी केले आहे.
आणखी एका वाघाचा मृत्यू:वन्यजीव प्रेमी नाराज

आणखी एका वाघाचा मृत्यू:वन्यजीव प्रेमी नाराज

चंद्रपूर /ललित लांजेवार 
वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यात आणखी एका छावा मादीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी उजेडात आली. 
ब्रह्मपुरी वनविभागाच्या तळोधी (बा.) वनपरिक्षेत्रातील गंगासागर हेटी बिटात मंगळवारी आढळलेल्या दोन महिन्यांच्या वाघाच्या बछड्याचा रविवारी रात्री येथील वन्यजीव उपचार केंद्रात मृत्यू झाला. 
तळोधी वनपरिक्षेत्रातील गट क्रमांक १७४ (गंगासागर हेटी) मध्ये वाघाचा एक मादी बछडा उपाशी व अशक्त अवस्थेत मंगळवारी दुपारच्या सुमारास आढळून आला होता.तेव्हापासून वनकर्मचारीव अधिकारी या वाघाच्या बछड्या लक्ष ठेवून होते.हा बछडा आपल्या आई पासून दुरावल्याने सतत दोन दिवस  परीक्षेत्रातले वनकर्मचाऱ्यांनी बछड्याला अशक्त अवस्थेत असलेल्याच ठिकाणी ठेऊन त्या वाघिणीची वाट बघत होते. मात्र  दोन दिवस लोटूनही  ती न आल्याने गुरुवारी मध्यरात्री बछड्याला चंद्रपूर येथील वन्यजीव उपचार केंद्रात आणण्यात आले. येथे आवश्यकतेनुसार पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. पी.एस. दामले, डॉ. निलेश खलाटे, डॉ. कुंदन पोडचलवार, डॉ. रविकांत खोब्रागडे यांच्याकडून बछड्यावर उपचार करण्यात येत होते. मात्र बछड्याचा प्रकृतीत सुधारणा न झाल्याने रविवारी रात्री त्याचा मृत्यू झाला.बछड्याचे शवविच्छेदन करून शरिराचे काही अवयव उत्तरीय तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे, अशी माहिती चंद्रपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी दिली. यावेळी विभागीय वनाधिकारी अशोक सोनकुसरे, विभागीय वन अधिकारी (दक्षता) बी.पी. ब्राम्हणे उपस्थित होते.
गेल्या चार दिवसांपासून  चिमूर वन परिक्षेत्रातील मुरपार उपक्षेत्रा अतंर्गत येणाऱ्या भान्सुली बिट कक्ष क्रमांक ५ मधील जखमी वाघाचा रविवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास अखेर मृत्यू झाला.
हा वाघ मागील चार दिवसांपासून गाव तलावा शेजारी बसला होता,  त्याच्या  डोक्यावर व उजव्या पायाला जखमा असल्याचे आढळून आले होते,त्यामुळे अश्या जखमी वाघाची प्रकृती अतिशयखालावत असतानाही  वनविभागाकडून त्याच्यावर उपचार केला जात नसल्याने संताप व्यक्त केला जात होता.
या आधी चिमूर तालुक्यातील आमडी बेगडे शेतशिवारात शेतीच्या कुंपणात वीज प्रवाह सोडल्यामुळे ८ नोव्हेंबर  २०१७ ला  वाघाचा मृत्यू झाला होता.  गेल्या काही दिवसा अगोदर चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव बिटात दोन पट्टेदार वाघाच्या झुंजीत एक वाघ मृतावस्थेत आढळून आल्याची घटना घडली होती.याच घटने पासून तब्बल १०  दिवसातच तेथून जवळच असलेल्या तळोधी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या परिसरातील गंगासागर हेटी बिट जंगल परिसरात वाघिणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे वारंवार होत असलेल्या वाघांचा मृत्यू वनविभागाच्या चांगलाच जिव्हारी लागू शकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पर्यटकांना दिल खुलास दर्शन देऊन पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फेडणाऱ्याच वाघांचे एक-एक करून होणारे मृत्यू हा चिंतेचा विषय आहे.असा सुर येथे येणाऱ्या अनेक पर्यटकांन कडून ऐकायला मिळत आहे. मागील काही वर्षात वाघ दर्शनाच्या निमित्ताने येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत याठिकाणी बरीच वाढ झाली होती. यानिमित्तानं वाढता पर्यटकांचा ओघ पाहता वन विभागाने प्रवेश शुल्क आदीत ही दुपटीने वाढ केली होती. अश्यातच दिवसेंदिवस वाघांचा एकापाठोपाठ अरे मृत्यू चिंतेची बाब आहे

एका पाठोपाठ एक अश्या प्रकारे होणारे वाघाचा मृत्यू तसेच एकाच दिवशी जखमी वाघ आणि बछड्याचा मृत्यू झाल्यामुळे वन्यजीवप्रेमींमध्ये नैराश्य पसरले आहे.दिवसेनदिवस होणारे वाघाचे मृत्यू हा विषय अतिशय संवेदनशील बनत चालला असून यावर चिंता व्यक्त केली जात आहे .

त्या वाघाच्या मृत्यूची चौकशी करा;मनगंटीवारांचे आदेश 
चंद्रपूर/ललित लांजेवार:
चंद्रपूर जिल्हयातील चिमूर वनपरिक्षेत्रातील भान्सुली वन बीट मध्ये झालेल्या वाघाच्या मृत्यु प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर कडक कारवाई करावी असे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वरिष्ठ वनाधिकार्यांना दिले आहेत.

जखमी वाघावर तातडीने उपचार करण्याची आवश्यकता असताना उपचार करण्यात आले नाही तसेच ट्रॅक्युलायझेशनची परवानगी देण्यासाठी विलंब करण्यात आला या बाबी अतिशय गंभीर आहेत. वन विभागातर्फे व्याघ्र संवर्धन व संरक्षण या संदर्भात प्रभावी उपाययोजना करण्यात येत असताना अशा घटना घडणे ही दुर्देवी बाब आहे. या प्रकरणी चौकशीअंती दोषींवर कारवाई करावी व अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन विभागाचे सचिव तसेच वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना दिल्या आहेत.
रंगोत्सव साजरा करा जपून

रंगोत्सव साजरा करा जपून

होलीका दहन, धुळवडीसाठी मोकळ्या मैदानाचा वापर करा
; महावितरणचे आवाहन 
                                छायाचित्र -  सचिन वाकडे मूल                    

नागपूर दि. 26 फ़ेब्रुवारी 2018:-
होळीच्या उत्सवाला विजेच्या अपघाताने गालबोट लागू नये यासाठी होळी पेटवितांना संभाव्य अपघात टाळण्याकरिता आवश्यक ती खबरदारी घेत होळीचा आनंद व्दिगुणित करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.
होळी पेटवितांना सभोवताली वीजवाहिन्या किंवा वितरण रोहीत्रे नाहीत याची खातरजमा करून घ्या, अन्यथा होळीच्या ज्वाळांनी वीजवाहिन्या वितळून जीवंत तार खाली पडून भिषण अपघात होण्याची शक्यता असते. याशिवाय अनेक ठिकाणी वीजवाहिन्या हया भुमिगत असल्याने, त्यापासून लांब अंतरावरच होळी पेटवावी जेणेकरून होळीच्या उष्णतेपासून भुमिगत वीजवाहिन्या सुरक्षित राहतील, होळी पेटवितांना शक्यतो मोकळया जागेचा वापर करा, ट्रक किंवा इतर वाहनांतून होळी आणतांना होळीचा स्पर्श रस्त्यालगतच्या वीजवाहिन्यांना होणार नाही याची खबरदारी घ्या, विजेचे अपघात हे प्राणघातक असल्याने एक चूकही प्राणांकीत अपघातास कारणीभूत ठरू शकते.
त्याचप्रमाणे रंगोत्सव साजरा करतांना पाण्याचे फवारे वीजवाहिन्यापर्यत उडणार नाही याची काळजी घ्या. रंग भरलेले फुगे फेकतांना ते वीजेचे खांब आणि वीजवाहिन्या यांना लागणार नाही याची खबरदारी घ्या. विज वितरण यंत्रणेचे रोहीत्रे व तत्सम वितरण उपकरणे बसविलेल्या जागेपासून लांब अंतारावरच रंग खेळा. रंग खेळतांना ओल्याचिंब शरीराने वीज खांबाला स्पर्श झाल्यास अपघाताचा संभाव्य धोका असल्याने वीजेचा खांबांना स्पर्श करू नका. वीजेच्या खांबा सभोवती पाण्याचा निचरा होणार नाही याची खबरदारी घ्या. घरात होळी खेळतांना वीज मिटर, वीजेचे प्लग, वीजतारा आणि वीज उपकरणांचा पाण्यापासून बचाव करा, ओल्या हाताने वीजेच्या बटनांना स्पर्श करू नका.
होळीचा सण हा आनंदाचा रंगोत्सव असल्याने महावितरणच्या आवाहनाप्रमाणे खबरदारी घेऊन होळीचा आनंद व्दिगुणित करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
हे लक्षात ठेवा:-
·        वीज वितरण यंत्रणेपासून लांब अंतरावर होळी पेटवा
·        होळी आणतांना तीचा स्पर्श वीज वाहिन्यांना होऊ नये
·        वीज वाहिन्या, वितरण रोहीत्रांवर पाणी फ़ेकू नका
·        ओल्या शरीराने वीज उपकरणांना स्पर्शकरू नका
·        वीज खांबासभोवती पाण्याचा निचरा करु नका
वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

मानव वाघ संघर्ष सुरूच 

चंद्रपूर/ललित लांजेवार

मानव वाघ संघर्ष दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.चंद्रपूर शहरालगत लागून असेलल्या चंद्रपूर परिक्षेत्रातील एपीजे अब्दुल कलाम बगीच्याच्या मागील बाजूला सोमवारी सकाळी मंजुळा केराम वय (३५ वर्षे) याच्यावर वाघाने हल्ला केला या हल्यात त्या जागीच ठार झाल्या. एपीजे अब्दुल कलाम बगीच्याच्या मागील बाजूस कंपाउंड नंबर 484 येथे हा अमृतदेह आढळून आल्याने परिसरात चांगलीच खडबड उडाली.हा मृतदेह याच परिसरातील हिंग्लज भवानी वार्डात राहणाऱ्या महिलेचा असल्याचे सांगितल्या जात आहे. सोमवार सकाळी लाकूड गोळा करण्यासाठी सदर महिला गेली असता वाघाने मागून तिच्यावर हमला केला. या हल्यात महिला जागीच ठार झाली आहे.हा परिसराला जुनोना जंगल लागून असल्याने इथे मागील 5,ते 6 दिवसापासून वाघ फिरत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.मिळालेल्या माहिती वरून वनविभागाचे अधिकारी व स्थानिक पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई सुरु असल्याचे सांगितले जात आहे.नुकताच उन्हाळा सुरु झाला आहे.त्यामुळे शिकार आणि पाण्याच्या शोधात वाघ सर्वत्र फिरत असतो,त्यामुळे अश्यावेळी माणसाचे जंगलात जाणे म्हणजे मुठीत जीव घेऊन सरपण आजम करणे असेच आहे,या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.                     

बस नाल्यात कोसळून २२ प्रवासी जखमी

बस नाल्यात कोसळून २२ प्रवासी जखमी

गडचिरोली - चामोर्शी मार्गावरील दर्शनीजवळील घटना
गडचिरोली - अहेरीवरून गडचिरोलीकडे येणाºया राज्य परिवहन महामंडळाच्या बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस नाल्यात कोसळून झालेल्या अपघातात चालक-वाहकासह २२ प्रवासी जखमी झाल्याची घटना काल रात्री ७.३० वाजताच्या सुमारास गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील दर्शनी गावाजवळ घडली.
प्राप्त माहितीनुसार राज्य परिवहन महामंडळाची अहेरी आगाराची एमएच-४० एक्यू- ६१११ या क्रमांकाची बस अहेरीवरून गडचिरोलीकडे येत होती. दरम्यान सायंकाळच्या सुमारास दर्शनी गावालगत असलेल्या वळणाजवळील नाल्यावर येताच बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यामुळे बस नाल्यात जाऊन कोसळली. या अपघातात सुदैवाने २२ प्रवासी बचावले असले तरी ते किरकोळ जखमी झाले आहेत.
जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले. बस नाल्यात कोसळल्याची माहिती मिळताच दर्शनी व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या मार्गावरून ये-जा करणाºया नागरिकांनी मिळेल त्या वाहनाने बसमधील जखमी प्रवाशांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती केले.

Sunday, February 25, 2018

जटपुरा गेटच्या समस्सेसाठी जोरगेवारांचे आज धरणे आंदोलन

जटपुरा गेटच्या समस्सेसाठी जोरगेवारांचे आज धरणे आंदोलन

जटपूरा गेटची वाहतुक कोंडीची समस्या मार्गी काढा नंतर सौंदर्यीकरण करा
चंद्रपूर/ललित लांजेवार:
 जटपुरा गेटवर होत असलेल्या सततच्या वाहतुक कोंडीमूळे जनता त्रस्त असली तरी येथील लोकप्रतिनीधींना गेटच्या सौंदर्यीकरणाचे वेड लागले आहे. त्यामूळे जनतेमध्ये रोष असून या विरोधातशिवसेना नेते किशोर जोरगेवार यांच्या वतीने उद्या सोमवारी जटपूरा गेट येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

चंद्रपूरातील मूख्य समस्यांपैकी एक समस्या असलेल्या जटपुरागेटच्या वाहतूक कोंडीमुळे चंद्रपूरकरांना या मार्गावरुन वाहणे चालवीतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याच मार्गावर (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय) जिल्हासामान्य रुग्णालय तसेच ईतर खाजगी रुग्णालये असल्याने रुग्णवाहीकांनाही या वाहतूक कोंडीचा फटका जाणवत आहे. परिनामी या वाहतूक कोंडीमुळे रुग्णांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे. तसेच या ठिकाणी तासंनतास वाहणांना रेंगाळत कासवगतीने चालावे लागत असल्याने अतिरिक्त इंधन खर्च होत असून प्रदुषणाचा प्रश्नही निर्माण झाला आहे. असे असतांनाही या प्रश्नाकडे शासन-प्रशासनाचे जानीवपुर्ण दुर्लक्ष होत आहे. ही समस्या सोडविण्या एवजी आता येथे सौदर्यीकरन करण्याचे नियोजन शुन्य वेळ सत्ताधा-यांना लागले आहे. त्यासाठी २.५० कोटीहून अधिकचा निधी खर्च करण्यात येणार असून जटपूरा गेटवर थिम लायटींक लावण्यात येणार आहे.
मात्र या सौंदर्यीकरणामुळे येथील वाहतुकीचा प्रश्न सुटणार आहे का? असा प्रश्न किशोर जोरगेवार यांनी उपस्थित केला असून पहिले वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवा अशी मागणी करत या सौदर्यीकरणाला विरोध करत उदया सोमवारी जटपूरा गेट येथे धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे आंदोलन किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात सोमवारी दुपारी २ वाजता  होणार असून या आंदोलनाला शिवसैनिकांनी तसेच जनतेनी मोठयात-मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना चंद्रपूर शहराच्या वतीने करण्यात आले आहे.
अखेर त्या वाघाचा मृत्यू

अखेर त्या वाघाचा मृत्यू

चंद्रपूर (ललित लांजेवार) :
गेल्या चार दिवसांपासून  चिमूर वन परिक्षेत्रातील मुरपार उपक्षेत्रा अतंर्गत येणाऱ्या भान्सुली बिट कक्ष क्रमांक ५ मधील जखमी वाघाचा रविवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास अखेर मृत्यू झाला.

हा वाघ मागील चार दिवसांपासून गाव तलावा शेजारी बसला होता,  त्याच्या  डोक्यावर व उजव्या पायाला जखमा असल्याचे आढळून आले होते,त्यामुळे अश्या जखमी वाघाची प्रकृती अतिशयखालावत असतानाही  वनविभागाकडून त्याच्यावर उपचार केला जात नसल्याने संताप व्यक्त केला जात होता.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पापासून २० किमी अंतरावरील भान्सुलीच्या जंगलात हा वाघ जखमी अवस्थेत होता. गुरूवारी वनाधिकाऱ्यांनी कॅमेरा ट्रपिंगच्या माध्यमातून  त्याच्या हालचाली टिपल्या गेल्या होत्या या जखमी वाघाची संपूर्ण माहिती  मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे पाठविण्यात आल्याचे वन विभागाकडे पाठविण्यात आले होते. हा वाघ दोन वाघाच्या जखमी झाला असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले होते,वाघावर उपचार करण्यासाठी वाघाला बेशुध्द करण्याची परवानगी पी.सी.सी.एफ. नागपूर यांच्याकडे  करण्यात आली होती मात्र चार दिवस लोटले तरीही वाघाला बेशुध्द करण्याची परवानगी देण्यात आलेली नसल्याने वन्यप्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
शुक्रवारी दुपारी घटनास्थळावर मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, सहायक उप वनसंरक्षक आर.एम.वाकडे, वन्यजीवप्रेमी अमोद गौरकार यांनी जखमी वाघाची पाहणी केली. जखमी वाघाच्या सुरक्षेसाठी ४० कर्मचारी पहारा ठेवला . मागील चार दिवसांपासून वाघाने काही खाल्ले नसल्याने तो अशक्त झाला होता. लवकर उपचार न झाल्यास वाघाचा मृत्यु होण्याची शक्यता वन्यजीव प्रेमींकडून वर्तविली जात आहे. वाघ जखमी असल्याने त्याला शिकार करणे शक्य नव्हते,त्यामुळे तो गेल्या ४ दिवसांपासून उपाशी होता, त्या जखमी वाघाचा रविवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास मृत्यू झाला.
या आधी चिमूर तालुक्यातील आमडी बेगडे शेतशिवारात शेतीच्या कुंपणात वीज प्रवाह सोडल्यामुळे ८ नोव्हेंबर  २०१७ ला  वाघाचा मृत्यू झाला होता.  गेल्या काही दिवसा अगोदर चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव बिटात दोन पट्टेदार वाघाच्या झुंजीत एक वाघ मृतावस्थेत आढळून आल्याची घटना घडली होती.याच घटने पासून तब्बल १०  दिवसातच तेथून जवळच असलेल्या तळोधी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या परिसरातील गंगासागर हेटी बिट जंगल परिसरात वाघिणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे वारंवार होत असलेल्या वाघांचा मृत्यू वनविभागाच्या चांगलाच जिव्हारी लागू शकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पर्यटकांना दिल खुलास दर्शन देऊन पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फेडणाऱ्याच वाघांचे एक-एक करून होणारे मृत्यू हा चिंतेचा विषय आहे.असा सुर येथे येणाऱ्या अनेक पर्यटकांन कडून ऐकायला मिळत आहे. मागील काही वर्षात वाघ दर्शनाच्या निमित्ताने येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत याठिकाणी बरीच वाढ झाली होती. यानिमित्तानं वाढता पर्यटकांचा ओघ पाहता वन विभागाने प्रवेश शुल्क आदीत ही दुपटीने वाढ केली होती. अश्यातच दिवसेंदिवस वाघांचा एकापाठोपाठ अरे मृत्यू चिंतेची बाब आहे