সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

वर्धा

वर्धा जिल्हा हा चारही बाजूंनी महाराष्ट्रातीलच इतर चार जिल्ह्यांनी वेढलेला आहे. जिल्ह्याची कोणतीही सीमा दुसऱ्या राज्याला लागून नाही. पूर्व व उत्तरेस नागपूर जिल्हा, पश्चिमेस अमरावती जिल्हा आणि दक्षिणेस यवतमाळ जिल्हा व चंद्रपूर जिल्हा आहे. वर्धा नदी ही अमरावती जिल्हा, यवतमाळ जिल्हा व चंद्रपूर जिल्हा या जिल्ह्यांना वर्धा जिल्ह्यापासून वेगळे करते.

बापू कुटीचे सेवाग्राम
वर्धा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्थापन केलेले सेवाग्राम हे वर्धा शहरापासून केवळ ८ कि.मी अंतरावर आहे. १९२१ साली या सेवाग्राम आश्रमाची स्थापना करण्यात आली. आश्रम स्थापन करण्यात जमनालाल बजाज, विनोबा भावे यांचा सहभाग होता. बापूजींचा ‘सेवाग्राम’, आचार्य विनोबा भावे यांचा पवनार येथील ‘परमधाम’ आश्रम व आष्टीचा स्वातंत्र्य संग्राम या तीन गोष्टींमुळे वर्धा या जिल्हयाला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. 

शेतीव्यवसाय
वर्धा जिल्हा कृषीप्रधान असल्याने अनेक प्रकारची पिके या जिल्ह्यात घेतली जातात. ज्वारी, कापूस, मूग, तूर, तांदूळ, भुईमूग आदी पिके खरीप हंगामात, तर गहू, हरभरा ही पिके रब्बी हंगामात जिल्ह्यात घेतली जातात.

व्यक्तीमत्वे
आचार्य विनोबा भावे – आचार्य विनोबा भावे यांचे याच जिल्ह्यातील गोपुरी येथे अनेक वर्ष वास्तव्य होते. त्यांच्या कार्यामुळे वर्धा जिल्हा सतत प्रकाशात राहिला. जमनालाल बजाज – महात्मा गांधीजींचे शिष्य प्रसिद्ध उद्योजक जमनालाल बजाज यांचेही वास्तव्य

लोकजीवन
वर्धा शहरात सर्वच धर्म-संस्कृतींचे लोक आढळतात. येथे हिंदू, मुस्लीम आणि बौद्धांची संख्या तुलनेने जास्त असली तरी ख्रिश्चन, जैन, शीख, या पंथाचे नागरिक ही येथे आहेत. जिल्ह्यात प्रामुख्याने मराठी आणि हिंदी भाषा बोलली जाते.


भौगोलिक माहिती
वर्धा जिल्हा हा चारही बाजूंनी महाराष्ट्रातीलच इतर चार जिल्ह्यांनी वेढलेला आहे. पूर्व व उत्तरेस नागपूर जिल्हा, पश्चिमेस अमरावती जिल्हा आणि दक्षिणेस यवतमाळ जिल्हा व चंद्रपूर जिल्हा आहे. वर्धा जिल्ह्याच्या ईशान्येला (उत्तर व पूर्व) नागपूर जिल्हा

पर्यटनस्थळे
बोर अभयारण्य – हिंगणी येथील ६१.१० चौ. कि .मी. क्षेत्रावर पसरलेले बोर अभयारण्य अनेक वन्य जीवांचे आश्रयस्थान आहे. पर्यटनाच्या दृष्टीने हे स्थळ झपाट्याने विकसित होत आहे. या अभयारण्यात असलेले वाघ, रानगवे, नीलगाई, चितळ, सांबर, मोर

दळणवळण सोयी
धुळे-कोलकाता (राष्ट्रीय महामार्ग क्र.६) व वाराणसी-कन्याकुमारी (राष्ट्रीय महामार्ग क्र.७) हे राष्ट्रीय महामार्ग या जिल्ह्यातून जातात. मध्य रेल्वेचे मुंबई-कोलकाता व चेन्नई-दिल्ली (ग्रँड ट्रंक दक्षिण-उत्तर लोहमार्ग) हे लोहमार्ग जिल्ह्यातून जातात. या दोन्ही लोहमार्गांवरील वर्धा हे महत्त्वपूर्ण जंक्शन

उद्योगव्यवसाय
या जिल्ह्यात कापसाचे उत्पादन अधिक प्रमाणात घेतले जात असल्याने कापसावर आधारीत उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे व जमनालाल बजाज यांच्या या जिल्ह्यातील वास्तव्यामुळे व त्यांच्या विशेष प्रयत्नांमुळे जिल्ह्यात ग्रामोद्योगांचा विकास


इतिहास
वर्धा या नदीच्या नावावरूनच ‘पालकवाडी’ या छोट्या गावापासून विकसित झालेल्या भागाला ‘वर्धा’ हे नाव देण्यात आले. या जिल्ह्याच्या परिसरावर मौर्य, शुंग, सातवाहन, वाकारम, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव व गोंड या राजवटींची सत्ता असल्याचे उल्लेख ऐतिहासिक दस्तावेजातंत


जिल्ह्यातील तालुके
आर्वी
आष्टी
सेलू
समुद्रपुर
कारंजा (घाडगे)
देवळी
वर्धा
हिंगणघाट


जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ
वर्धा,
हिंगणघाट,
देवळी,
आर्वी

साभार
http://www.marathisrushti.com/cities/category/wardha/