Showing posts with label वन्यजीव. Show all posts
Showing posts with label वन्यजीव. Show all posts
Tuesday, October 23, 2018
Sunday, December 10, 2017

वाघाने घेतला निर्मलाचा बळी
by खबरबात
सिन्देवाही -येथील निर्मला मुखरुजी निकोडे (वय ५२ ) ही महीला शेतावर एकटीच गेली. सांयकाळ झाली परंतु घरी वापस आली नाही. तिचा सांयकाळी शोध घेतला असता मिळाली नाही. मग सकाळी पुन्हा शोध घेतला असता नाल्यामध्ये छिन्नविचीन्न अवस्थेत वाघाने खाल्लेले आढळले.
Thursday, November 23, 2017
वन्यप्राण्यांची शिकार करण्याच्या प्रयत्नात चार जण वनविभागाच्या ताब्यात
by खबरबात
भद्रावती/वरोरा (प्रतिनिधी) : वरोरा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सलोरी येथील कक्ष ९२९ परिसरातून काही इसमानी जंगलात पहाटे दोन च्या सुमराज जाळे लावले होते जाळयात वन्यप्राणी अडकविण्याच्या प्रयत्नात असतांना यावेळी वनविभागाचे कर्मचारी गस्त घालीत असतांना हा प्रकार लक्षात आल्याने वन्यप्राण्यांची शिकार झाली नाही पाहिजे या आशेने त्या कक्ष परिसरात कसून शोध घेतला तर जंगलात जाळे लावून चार व्यक्ती बसून असलेले आढळले. यामध्ये विनोद मगरे(२६), निकेश पाटील(२७), शैलेश पाटील(३०), शंकर रंडई(५०) रा. सलोरी असे आरोपींची नावे असून यांच्या कडून भाले, जाळे ताब्यात घेतले . त्यांच्यावर कलम १९७२ भारतीय वन्यजीव अधिनियम ०२ सप्टेंबर १९५१ नुसार कारवाही करून ताब्यात घेतले. ही कारवाही वरोरा वनपरिक्षेत्र अधिकारी के. आर. आक्केवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी एम. एम. लांडे, वनकर्मचारी एन. एल. सिडाम यांनी केली
Friday, November 17, 2017
37 हजार हेक्टर झुडपी जंगल क्षेत्र राखीव वन
by खबरबात
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार
नागपू/ प्रतिनिधी - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने नागपूर विभागातील
37 हजार हेक्टरहुन अधिक झुडपी जंगल क्षेत्र राखीव वन म्हणून अधिसूचित
करण्यात आले आहे.
नागपूर विभागातील झुडपी जंगल क्षेत्राबाबत केंद्र शासनाने गठीत केलेल्या
उच्चाधिकार समितीच्या अहवालात 1,78,525 हेक्टर झुडपी जंगल क्षेत्रापैकी
वनव्यवस्थापनास योग्य असलेले 92,116 हेक्टर क्षेत्र भारतीय वन अधिनियम,
1927 मधील कलम 4 व 20 अंतर्गत राखीव / संरक्षित वन म्हणून घोषित करण्याची
शिफारस केली होती. भारतीय वन अधिनियम, 1927 मधील कलम 4 व 20 अंतर्गत राखीव
वनक्षेत्र म्हणून अधिसूचित करण्याचे अधिकार राज्य शासनास आहेत.
Wednesday, November 15, 2017
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफरमध्ये आणखी एका वाघाचा मृत्यू
by खबरबात
चंद्रपूर / प्रतिनिधी:
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन अंतर्गत मुल वन परिक्षेत्रात जनाळा नियतक्षेत्रात वाघ मृत अवस्थेत आढळला.
जनाळा येथील रहिवासी आत्माराम बापू पोरटे यांची गाय दिनांक १४/११/२०१७ रोजी वाघाने ठार मारल्याचा अर्ज क्षेत्र सहाय्यक जानाळा यांना देण्यात आले होते. त्या अनुषंगाने आज क्षेत्र सहायक आणि वन कर्मचारी यांनी घटन्स्थळी भेट दिली. मृत गायीचे पंचनामा केल्यानंतर सदर परिसराची पाहणी केली असता, जवळच मृत वाघाचे शव आढळून आले. सदर घटना मुल वनपरिक्षेत्र अंतर्गत जानाला उपशेत्रातील जनाला नियातक्षेत्रात कक्ष क्रमाक ३५५ मधे घडलेली आहे. मृत झालेला वाघ अवयस्क असून दुसरया वाघाच्या हल्य्यात मृत्यू झाल्याचे निदर्शनास येत आहे. वाघाचे शरीराचा मागील भाग अन्य प्राण्याकडून खाण्यात आले असून, वाघाचा मागचा पाय व शेपूट शरीरापासून दुसऱ्या वाघाने वेगळा केलेला आढळला.
घटनेची माहिती मिळताच श्री मुकुल त्रिवेदी, क्षेत्र संचालक, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, श्री गजेंद्र नरवणे, उप संचालक, बफर, ताडोबा, श्री पी एस शेळके, सहायक वनसंरक्षक प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव चे प्रतिनिधी बंडू धोत्रे, मानद वन्यजीव रक्षक, राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण चे प्रतिनिधी योगेश दुधपचारे व वनपरिक्षेत्र अधिकारी श्री शेषराव बोबडे यांनी घटना स्थळ गाठून पाहणी केली. वाघाचे शव विच्छेदन डॉ संदीप छोन्कर, पशुधन विकास अधिकारी, मुल डॉ रविकांत खोब्रागडे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प डॉ निलेश खलाटे, पशुधन विकास अधिकारी यांनी केले.
वाघाचे मागील भाग वन्यप्राणी कडून खाण्यात आले असल्याने लिंग कळू शकले नाही. वाघाचा मृत्यू चे प्राथमिक अंदाज दोन वाघातील आपापसातील झुंज असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. शव विच्छेदन दरम्यान व्हीसेरा पुढील तपासासाठी घेण्यात आलेला आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन अंतर्गत मुल वन परिक्षेत्रात जनाळा नियतक्षेत्रात वाघ मृत अवस्थेत आढळला.
जनाळा येथील रहिवासी आत्माराम बापू पोरटे यांची गाय दिनांक १४/११/२०१७ रोजी वाघाने ठार मारल्याचा अर्ज क्षेत्र सहाय्यक जानाळा यांना देण्यात आले होते. त्या अनुषंगाने आज क्षेत्र सहायक आणि वन कर्मचारी यांनी घटन्स्थळी भेट दिली. मृत गायीचे पंचनामा केल्यानंतर सदर परिसराची पाहणी केली असता, जवळच मृत वाघाचे शव आढळून आले. सदर घटना मुल वनपरिक्षेत्र अंतर्गत जानाला उपशेत्रातील जनाला नियातक्षेत्रात कक्ष क्रमाक ३५५ मधे घडलेली आहे. मृत झालेला वाघ अवयस्क असून दुसरया वाघाच्या हल्य्यात मृत्यू झाल्याचे निदर्शनास येत आहे. वाघाचे शरीराचा मागील भाग अन्य प्राण्याकडून खाण्यात आले असून, वाघाचा मागचा पाय व शेपूट शरीरापासून दुसऱ्या वाघाने वेगळा केलेला आढळला.
घटनेची माहिती मिळताच श्री मुकुल त्रिवेदी, क्षेत्र संचालक, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, श्री गजेंद्र नरवणे, उप संचालक, बफर, ताडोबा, श्री पी एस शेळके, सहायक वनसंरक्षक प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव चे प्रतिनिधी बंडू धोत्रे, मानद वन्यजीव रक्षक, राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण चे प्रतिनिधी योगेश दुधपचारे व वनपरिक्षेत्र अधिकारी श्री शेषराव बोबडे यांनी घटना स्थळ गाठून पाहणी केली. वाघाचे शव विच्छेदन डॉ संदीप छोन्कर, पशुधन विकास अधिकारी, मुल डॉ रविकांत खोब्रागडे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प डॉ निलेश खलाटे, पशुधन विकास अधिकारी यांनी केले.
वाघाचे मागील भाग वन्यप्राणी कडून खाण्यात आले असल्याने लिंग कळू शकले नाही. वाघाचा मृत्यू चे प्राथमिक अंदाज दोन वाघातील आपापसातील झुंज असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. शव विच्छेदन दरम्यान व्हीसेरा पुढील तपासासाठी घेण्यात आलेला आहे.
Monday, November 06, 2017
सिर्सीत बिबट्याचा चिमुकलीवर हल्ला
by खबरबात
सावली/प्रतिनिधी:
सीर्शी या गावामध्ये सोमवारी संध्याकाळी 6 वाजता अचानक बिबट्याने हल्ला करून जितेंद्र हजारे यांच्या 4 वर्ष्याच्या मुलीला अंगणात आजीसोबत शेकोटी शेकत असताना उचलून नेले आहे. त्यामुळे गावात बिबट्याची भीती निर्माण झाली आहे.
त्यानंतर गावकऱ्यांनी मुलीचा शोध सुरू केला आहे मात्र वृत्त लिहेपर्यंत मुलीचा शोध लागलेला नाही. फक्त तिचे रक्ताने माखलेले कपडे मिळाले आहेत .स्थानिक वनविभागाचे अधिकारी,पोलिस व गावकरी यांच्या मदतीने मुलीचा शोध सुरु आहे.
Sunday, November 05, 2017
वन्यजीवामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानाची त्वरित भरपाईचा प्रशन शासनदरबारी लावून धरणार -- आमदार अँड संजय धोटे
by खबरबात
उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची घेतली भेट
चंद्रपूर/प्रतिनिधी:
दिवसेंदिवस जंगल नष्ट होत असल्यामुळे वन्यजीव शेतशिवारात घुसून शेतकऱ्यांच्या जीविताचे व शेतमालाचे मोठया प्रमाणात नुकसान करतात परंतु वन्यजीवांची हत्या झाल्यास होणाऱ्या शेतमालाची नुकसानभरपाई मात्र अत्यल्प दिले जाते शिवाय ही भरपाई देखील बऱ्याच कालावधी नंतर दिली जाते.
ह्या अन्यायाविरोधात राजुरा तालुक्यातील शेतकरी किसान क्रांती मोर्चाच्या बॅनर खाली मागील ८ दिवसापासून वनविभागाच्या कार्यालया समोर उपोषणाला बसले असून आमदार अँड संजय धोटे ह्यांनी ह्या उपोषणकर्त्याची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.ह्यावेळी बोलताना आमदार अँड संजय धोटे म्हणाले की उपोषणकर्त्या शेतकऱ्यांचे प्रशन योग्य असून पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार ह्यांच्या निदर्शनास ह्या मागण्या आणून देवून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देवू व आगामी अधिवेशनातही शेतकऱ्याच्या मागण्या शासनाच्या लक्षात आणून देवू.
शेतकऱ्यावर अन्याय होवू न देण्याचीच शासनाची भूमिका असल्यामुळे शेतकऱ्यांनी उपोषण मागे घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले.ह्यावेळी वनविभागाचे उपविभागीय वन अधिकारी अमोल गरकल,भाजपा किसान आघाडी जिल्हा उपाध्यक्ष भाऊराव चंदनखेडे,भाजपा तालुका महामंत्री दिलीप वांढरे,भाजयुमो तालुका महामंत्री रवि बुरडकर, भाजपा शहर महामंत्री सय्यद कुरेशी,मंगेश श्रीराम,बाबुराव जीवने,अनिल दुबे,कैलास कार्लेकर उपस्थित होते.
उपोषणकर्त्याच्या वतीने उपोषणकर्ते व माजी जि.प.सदस्य गणेश झाडे ह्यांनी शेतकऱ्याच्या मागण्या आमदार मोहदया समोर मांडल्या.ह्यावेळी तालुक्यातील शेतकरी व वनविभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.