काव्यशिल्प Digital Media: बल्लारपूर

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label बल्लारपूर. Show all posts
Showing posts with label बल्लारपूर. Show all posts

Tuesday, February 13, 2018

विदर्भातील पहिले डायमंड कटिंग केंद्र चंद्रपुरात

विदर्भातील पहिले डायमंड कटिंग केंद्र चंद्रपुरात

चंद्रपूर/प्रतिनिधी:
 हिऱ्याला पैलू पाडून त्याला आकर्षक आकार देण्याचे प्रकार देणारे प्रशिक्षण केंद्र बल्लारपुरात साकार झाले आहे. हे प्रशिक्षण केंद्र विदर्भातील बेरोजगार तरुणांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. या डायमंड कटींग प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन रविवारी राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले.
उदघाटनीय कार्यक्रमात बोलताना ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यातील तरूणांना मोठया प्रमाणावर रोजगार उपलब्ध करणे ही आपली प्राथमिकता आहे. त्यादृष्टीने रोजगाराभिमुख विविध उपक्रम आपण सुरू करीत आहोत. बल्लारपुरात डायमंड कटींग प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून दर महिन्याला प्रशिक्षणार्थ्याला २० हजारावर रोजगार देण्याचा व तीन वर्षात तीन हजार तरूण त्या माध्यमातून प्रशिक्षित करण्याचा आमचा मानस आहे. प्रतिवर्ष एक हजार तरूण या प्रशिक्षण केंद्रातून बाहेर पडतील.
तरूणांसाठी आर्थिक स्वातंत्र्याच्या अभियानाला सुरूवात आम्ही या जिल्ह्यात केली आहे. चांदा ते बांदा हा उपक्रम रोजगाराभिमुख आहे. याचे कौतुक निती आयोगाने सुध्दा केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा येथे विमानतळ विकासासाठी १२०० एकर जागा उपलब्ध झाली आहे. बल्लारपूर येथे पोलीस प्रशिक्षण केंद्रसुध्दा सुरू होणार आहे. हिंगणघाटचे मोहता यांच्या मदतीने बल्लारपूर येथे महिलांना कापड निर्मिती करण्याचे प्रशिक्षण व त्यांना रोजगार देण्याचा करार करण्यात आला आहे, असेही ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.
यावेळी मंचावर महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, उपाध्यक्षा मिना चौधरी, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, शिवचंद द्विवेदी, भय्याजी येरमे, रेणुका दुधे, एन.डी. जेम्स या संस्थेचे प्रमुख निलेश गुल्हाने आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी निलेश गुल्हाने म्हणाले, डायमंड उद्योगामध्ये मी गेले १५ वर्षे काम करीत आहे. डायमंड कटींग प्रशिक्षण केंद्र उभे करण्याची माझी तीव्र इच्छा होती. सुरत, मुंबईमध्ये हिऱ्यांचे व्यापारी मोठया संख्येने आहेत. मात्र त्यांना प्रशिक्षित तरुण मिळत नाही. रोजगारांची शंभर टक्के हमी असून किमान २० हजार रुपये वेतनाचा रोजगार मिळू शकतो. ना. सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रक्रियेत मला दिलेल्या पाठिंब्यामुळे व सहकायार्मुळे हे केंद्र उभे राहू शकले.
बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा म्हणाले, गेल्या तीन वर्षात १३८ कोटीहून अधिक निधी बल्लारपूरच्या विकासासाठी ना. मुनगंटीवारांनी खेचून आणला आहे. आरोग्य सेवा बळकट करण्यावर त्यांनी प्रामुख्याने बळ दिले आहे. संचालन काशिनाथ सिंग यांनी केले तर आभार स्वप्ना पंचलवार यांनी मानले.
काय आहे डायमंड कटींग ?
डायमंड कटींग आणि प्रोसेसिंग याबाबतचे रहिवासी प्रशिक्षण चार महिन्यात देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणादरम्यान भोजन व निवास व्यवस्था नि:शुल्क आहे. एन.डी. जेम्स ही कंपनी मुलांना हिऱ्यांना पैलू पाडण्याचे प्रशिक्षण देणार आहे. सोबतच या ठिकाणी प्रशिक्षण घेतल्यानंतर सुरत तसेच मुंबई येथे रोजगार देण्याची हमीसुध्दा देणार आहे. पुढील तीन वर्षात तीन हजार मुलांना प्रशिक्षण व रोजगार देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारे हमी देऊन प्रशिक्षण देणारा हा पहिलाच प्रयोग आहे.




Tuesday, February 06, 2018

 महागाईविरुद्ध काँग्रेसचा तहसीलवर मोर्चा

महागाईविरुद्ध काँग्रेसचा तहसीलवर मोर्चा

बल्लारपूर/प्रतिनिधी: 
भाजपाच्या केंद्र व राज्य सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅस दरात मोठी वाढ करून महागाईला प्रोत्साहन देत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने सोमवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निषेध नोंदविला. दरम्यान, तहसीलदार विकास अहिर यांना निवेदन सादर करण्यात आले.

दिलीप टॉकीज समोरील मैदानातून मोर्चाला सुरूवात झाली. सरकारविरोधी घोषणाबाजी करीत नगरपालिका चौकातील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. केंद्र व राज्यातील सरकार जनतेच्या जीवावर उठले. शिष्टमंडळात काँग्रेसचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष प्रकाश देवतळे, तालुका ग्रामीण अध्यक्ष सुनूल बावणे, डॉ. रजनी हजारे, नरेश मुंदडा, देवेंद्र आर्य, विनोद बुटले, कोठारी येथील सरपंच मोरेश्वर लोहे, दहेलीचे सरपंच ज्ञानेश्वर टेकाम, किन्ही येथील उपसरपंच वासुदेव येरगुडे, धीरज निरंजने, शांता बहुरिया, शहर काँग्रेस अध्यक्ष अब्दुल करीम, नांदगाव (पोडे) येथील माजी सरपंच मधुकर पोडे, शिवा राव, राजू बहुरिया, निशांत आत्राम, सचिन जाधव, अमीत पाझारे आणि शहरातील शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश होता.



Saturday, January 27, 2018

पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रातून रोजगाराची संधी

पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रातून रोजगाराची संधी

चंद्रपूर/प्रतिनिधी:

इमेज परिणाम बल्लारपूर मतदार संघात शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी व रोजगार विविध विकास कामे केली जात आहेत़ परिसरातील युवकांना सैन्य व पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण मिळावे़ या मतदार संघातील युवकांचे प्रतिनिधीत्व पोलीस भरतीमध्ये ठळकपणे उमटावे, यासाठी पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे़, अशी माहिती वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. पोंभूर्णा येथे पाण्याच्या एटीएम मशीन लोकार्पण व डस्टबीन वितरण व इको पार्क लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते़
यावेळी वनविकास महामंडळ अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, आमदार अ‍ॅड़ संजय धोटे, नगराध्यक्ष हरीश शर्मा, पोंभूर्णा नगर पंचायतचे अध्यक्ष गजानन गोरंटीवार, उपाध्यक्ष ईश्वर नैताम, पंचायत समिती सभापती अल्का आत्राम, उपसभापती विनोद देशमुख, पंचायत समिती सदस्य ज्योती बुरांडे, गंगाधर मडावी, नगर पंचायत सभापती पुष्पा बुरांडे, नेहा बघेल, किशोर कावळे, अतिक कुरेशी, विजय कस्तूरे, मोहन चलाख, श्वेता वनकर, सुनिता मॅकनवार, रजिया कुरेशी,शारदा कोडापे, अमरसिंह बघेल, कल्पना गुरनुले, सविता गेडाम, जयपाल गेडाम, माधुरी चांदेकर,मुख्याधिकारी विपीन मुधदा, अभियंता राजेश सोनोने,प्रमोद कडू आदी उपस्थित होते.
ना़ मुनगंटीवार म्हणाले, पोंभूर्णा नगर पंचायतीच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला़ यातून विकासकामे गतीमान झाली आहेत़ सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी यापुढेही निधी देण्यात येणार असून, विकासापासून कोणताही समाजघटक वंचित राहणार नाही़ या मतदार संघाने मला मतरूपी आशिर्वाद दिल्यामुळे पाचव्यांदा विधानसभेत गेलो. मंत्री झालो. मला महाराष्ट्रभर सन्मान मिळत आहे. याची जाणीव ठेवून या मतदार संघातील प्रत्येक शहर व गावातील विकासासाठी प्रयत्न करीत आहे, असेही ना़ मुनगंटीवार यांनी नमूद केले़
पोंभूर्णा नगर पंचायतीचे महाराष्ट्रात नावे व्हाव़े अशी अपेक्षा व्यक्त करून पुढे म्हणाले, जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी अभ्यासिका निर्माण केली जात आहे़ यातून गरीब व हुशार युवक-युवतींना तरुण विविध क्षेत्रात उच्च पदावर जाण्याची संधी मिळणार आहे़ या भागातील उमेदवारांनी सैन्यदल, पोलीस दल आणि अन्य विभागात भरती व्हावे, यासाठी लवकरच पोलीस प्रशिक्षण केंद्राची सुरुवात बल्लारपूर मतदार संघात करणार आहे़ सैन्य व पोलीस भरतीत या भागातील तरुणांची निवड व्हावी, यामागची आपली भूमिका असून रोजगार निर्मितीसाठी चांगल्या प्रशिक्षण संस्था उभारणार आहे, अशी ग्वाही पालकमंत्री मुनगंटीवार यांनी दिली़
पाटबंधारे विभागाच्या तलाव सौंदर्यीकरणाचे भूमीपूजनही यावेळी पार पडले़ मतदार संघात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावाही घेतला़ परिसरातील नागरिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या़ कार्यक्रमाप्रसंगी नगर पंचायतीच्या पदाधिकाºयांनी स्थानिक समस्या सोडविण्यासाठी जादा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली़ विकासकामांच्या लोर्कापणप्रसंगी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत आणि विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते़

Monday, January 15, 2018

बल्लारपूर शहरातून १५० हुन अधिक डुक्करांची हकालपट्टी

बल्लारपूर शहरातून १५० हुन अधिक डुक्करांची हकालपट्टी

बल्लारपूर/प्रतिनिधी:
शहरातील रस्त्यांवर मोकाट फिरत असलेल्या डुकरांच्या समस्येवर तोडगा काढत बल्लारपूर नगरपरिषदेने शहरातून जवळपास १५० हुन अधिक डुकरांची हकालपट्टी शहराच्या बाहेर करण्यात आली आहे. 
               विविध प्रकारच्या समस्यांनी ग्रासलेल्या या शहरात सध्या डुक्कर एक गंभीर समस्या बनलेआहेत. शहरातील प्रत्येकच भागात डुक्कर आढळत असून यावरूनच त्यांची संख्या किती असावी याचा अंदाज लावता येतो. गल्ली असो वा मुख्य मार्ग डुकरांचा मोकाट वावर प्रत्येकच भागात दिसत असून दिवसेंदिवस हा प्रकार वाढतच चालला आहे. एवढेच नव्हे तर घरांसमोरही डुक्कर फिरत असताना बघावयास मिळतात. 
                              घाण पसरवणारा हा प्राणी आजारांसाठीही कारणीभूत ठरत असल्याने शहरवासी त्रस्त व तेवढेच दहशतीत वावरत आहेत. यासाठी डुकरांच्या समस्येवर तोडगा काढण्याची बल्लारपूर नगरपरिषदेनें आता परीयंत १५० हुन जास्त डुकरांना शहराबाहेर सोडल्याचे सांगितल्या जात आहे. सध्या बल्लारपूर नगर परिषद स्वच्छ भारत सर्वेक्षणाच्या आखाड्यात उतरल्याने शहराला सुंदर शहर कसे बनवता येईल याकडे लक्ष देत या सर्व खटाटोप सुरु असल्याचे समते आहे. 

Sunday, January 07, 2018

चंद्रपूर,बल्लारपूर, मूल व पोंभूर्ण्यात वायफायसेवा

चंद्रपूर,बल्लारपूर, मूल व पोंभूर्ण्यात वायफायसेवा

चंद्रपूर/प्रतिनिधी:
mungantiwar साठी इमेज परिणाम
 चंद्रपूर जिल्हा ‘स्मार्ट’ होण्याकडे वाटचाल करीत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून यात आणखी भर पडणार आहे. चंद्रपूरसह बल्लारपूर, मूल आणि पोंभुर्णा ही शहरे लवकरच वायफाययुक्त होणार आहे. यासाठी जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा अभ्यास करून तीन आठवड्यात यासंबंधीचा प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.

मुंबईत शनिवारी सिस्कोच्या वतीने यासंबंधीचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. वन विभागाचे सचिव विकास खारगे यांच्यासह सिस्कोचे वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. जगभरातील बेस्ट प्रॅक्टीसेसचा अभ्यास करून या माध्यमातून कोणत्या सेवा नागरिकांना देता येतील, यासाठी किती खर्च येईल, याची माहिती देणारा प्रस्ताव सादर करावा, अशा सूचनाही यावेळी ना. मुनगंटीवार यांनी दिल्या. कौशल्य विकास, ई-मेडीसीन, ई-लर्निंग, जनजागृतीचे कार्यक्रम, वनउपजावर प्रक्रिया करून करता येणाऱ्या गोष्टी, यासंबंधीचे विश्वातील ज्ञान या सेवेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवता आले पाहिजे. कौशल्य विकास, मुद्रा बँक व रोजगार संधीच्या विकासासाठी या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अतिशय प्रभावीपणे वापर करून घेता आला पाहिजे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांना याचा लाभ देऊन कौशल्य विकासाच्या संधींचा विस्तार करता आला पाहिजे. याचा विचार करून युनिक मॉडेलची यासाठी निवड करावी. सर्वसामान्य माणसांच्या हातातील स्मार्ट फोन हाच या माध्यमातून सुसंवादाचा आणि विकासाचा दुवा झाला पाहिजे, अशी अपेक्षाही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली.

Wednesday, November 15, 2017

बल्लारपूर नगरपरिषदेत दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन

बल्लारपूर नगरपरिषदेत दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन

बल्लारपुर/प्रतिनिधी:
 महाराष्ट्र शासनाचे धोरनानुसार व केंद्र सरकारच्या अथक सहकार्यातुंन दिव्यांग बांधवासाठी अनेक शासकीय योजना राबविल्या जातात व यातूनच दिव्यांग बांधवासाठी कल्याणकारी योजनेची अंमलबजावणी केली जाते त्याच अनुशंगाने महाराष्ट्र शासनाच्या धोरनानुसार नगर परिषद  बल्लारपुर च्या माध्यमातून बल्लारपुर शहरातील व आसपास च्या दिव्यांग बांधवासाठी नगर परिषद बल्लारपुर येथे स्वतंत्र नोंदणी कक्ष स्थापन करण्यात आले आहे तरी नगर परिषद क्षेत्रातील दिव्यांग बांधवानी दिव्यांग असल्याबाबतची नोंदणी करून घ्यावी तसेच यासंबधी मिळणाऱ्या सर्व सेवा सवलतिचा प्राप्त करुण घ्यावा असे जाहिर आव्हान मा. हरीश शर्मा अध्यक्ष नगर परिषद बल्लारपुर व मा. विपिन मुद्दा मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपुर यांनी केली आहे.