मनाच्या अधोराज्यावर आधारलेले साहित्य दुरगामी परिणामकारक ठरते
विजया मारोतकर यांचे प्रतिपादन - सुरेश डांगे यांचा चारोळीसंग्रह
चिमूर /प्रतिनिधी - साहित्य हे मनातून यावं लागतं.मनातील सा-या आशा,आकांक्षा, वेदना या काव्यातून व्यक्त होत असतात.साहित्य हे विविधांगी फुलो-याने फुलत असतं.ते सर्वत्र मनसोक्त विहार करतं. सुरेश डांगे यांनी आपल्या चारोळीसंग्रहातून हसण्याच्या विविध पैलूंना उजागर केले आहे.हसण्याने निसर्ग,नदी- नाले,वृक्षवेली,चंद्र,सूर्य,तारे या सर्वांवर होणारा परिणाम अभिव्यक्त केला आहे.निसर्गावरच नाही तर समाजमनावर,आयुष्यावर आणि शेअर मार्केटवरही हसण्याने परिणाम होतो, हे सुरेश डांगे यांनी आपल्या चारोळीसंग्रहातून विषद केला आहे. तू हसलीस म्हणजे हा हास्योत्सवच असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक आचार्य विजया मारोतकर यांनी केले.
विजया मारोतकर यांचे प्रतिपादन - सुरेश डांगे यांचा चारोळीसंग्रह
चिमूर /प्रतिनिधी - साहित्य हे मनातून यावं लागतं.मनातील सा-या आशा,आकांक्षा, वेदना या काव्यातून व्यक्त होत असतात.साहित्य हे विविधांगी फुलो-याने फुलत असतं.ते सर्वत्र मनसोक्त विहार करतं. सुरेश डांगे यांनी आपल्या चारोळीसंग्रहातून हसण्याच्या विविध पैलूंना उजागर केले आहे.हसण्याने निसर्ग,नदी- नाले,वृक्षवेली,चंद्र,सूर्य,तारे या सर्वांवर होणारा परिणाम अभिव्यक्त केला आहे.निसर्गावरच नाही तर समाजमनावर,आयुष्यावर आणि शेअर मार्केटवरही हसण्याने परिणाम होतो, हे सुरेश डांगे यांनी आपल्या चारोळीसंग्रहातून विषद केला आहे. तू हसलीस म्हणजे हा हास्योत्सवच असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक आचार्य विजया मारोतकर यांनी केले.