काव्यशिल्प Digital Media: आत्महत्या

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label आत्महत्या. Show all posts
Showing posts with label आत्महत्या. Show all posts

Tuesday, September 25, 2018

नागपुरात विद्यार्थ्याची आत्महत्या

नागपुरात विद्यार्थ्याची आत्महत्या

नागपूर/प्रतिनिधी:
नागपुरात दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने स्वत:ला खोलीत बंद करून गळफास लावत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली.नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इसापूर येथे हि घटना घडली.दर्शन संजय कडू वय १४ वर्ष इसापूर, ता. सावनेर असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून सिक्रेट हार्ट अकॅडमी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत तो १० विचे शिक्षण घेत होता .काही दिवसा अगोदर शिक्षके त्याला सर्व विध्याथ्यांसमोर रागावल्या होत्या. पेपरला (परीक्षा) बसू देणार नाही, अशी तंबीही त्यांनी दिली होती. या प्रकारामुळे दर्शने टेन्शन घेतले असल्याचे समजते आहे. दर्शनचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आत्महत्येचे कारण स्पष्ट नसून खापरखेडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.



  

Saturday, August 04, 2018

अशोक अग्रवाल आत्महत्या प्रकरण;चारही आरोपींना जामीन मंजूर

अशोक अग्रवाल आत्महत्या प्रकरण;चारही आरोपींना जामीन मंजूर

ramnagarps-700चंद्रपूर/प्रतिनिधी:
स्वामी फ्युएल कंपनीत लेखापाल अशोक अग्रवाल यांच्या आत्महत्या प्रकरणातील चार आरोपींना न्यायालयाने शनिवारी जामीन मंजूर केला. अशोक अग्रवाल यांच्या आत्महत्तेनंतर हे सर्व आरोपी फरार होते.पोलीस त्यांच्या मागावर होती. त्यांनी जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती पोलिसांच्या हाती लागण्यापूर्वी या चारही जणांना जामीन मिळाला.या चारही जणांवर गुन्हे दाखल झाले तेव्हापासून हे चारही आरोपी फरार होते. अतिरिक्त सत्र न्यायाधीश मोडक यांच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला सरकारी वकील आणि आरोपीच्या वकिलांचा  युक्तिवाद संपल्यानंतर शनिवारला न्यायालयाने या चारही जणांना जामीन मंजूर केला आहे.या प्रकरणात न्यायालयाने आरोपींना ८ ऑगस्ट परियंत  रामनगर पोलीस स्टेशन येथे उपस्थित राहत पोलीस कारवाईत मदत करण्याचे व साक्षीदारावर कोणताही दबाव आणू नये अशे आदेश दिले असल्याची माहिती आहे,या प्रकणात झालेल्या अटकपूर्व जमिनेकडे सर्वांचे लक्ष लागले.

Tuesday, July 31, 2018

 गोंडखैरीत तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या

गोंडखैरीत तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या

बाजारगाव/गजेंद्र डोंगरे:
 कळमेश्वर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर असलेले गोंडखैरी येथे स्वःताच्या घरीच तरुणाने विष घेऊन केली आत्महत्या सविस्तर वृत्त असे की मृतक चिंटू ऊर्फ जयंता शंकर अत्करी वय २२ वर्षे राहणार वार्ड क्रंमाक ३ हा मद्यपान करुण नेहमीप्रमाणे रात्री उशीरा साडेदहाच्या सुमारास घरी यायचा व वडीलाला पैशाची मागणी करायचा अगर पैशे दिले नाही तर आत्महत्या करण्याची धमकी नेहमीच वडीलांना द्यायचा. असेच सोमवार ला रात्री साडेदहाच्या दरम्यान मद्य प्राशन करुण आला व बडबड करु लागला. घरच्यांनी त्यांचेवर लक्ष न देता, त्याला तसेच सोडून त्याच्या खोलीमध्ये बडबड करु लागला व आतमधून दरवाजाची कडी बंद करुन झोपला.
नेहमीप्रमाणे वडील मंगळवार (दि.३१/जूलै) ला सकाळी पाचच्या दरम्यान झोपून उठले असता खिडकीतून पाहले तर निद्रा अवस्थेत आढळून आला. व आतमधून दरवाजाची कडी बद असून त्याला आवाजाने उठवण्याचा प्रयत्न केला पण तो उठलाच नाही. घरा लगत स्थानिक सरपंचाला व परिसरातील पोलीस पाटिल आणी स्थानिकांच्या मदतीने खिडकीतून दरवाजाची कडी काढण्यात आली. तर काय गार झोपीच गेला व काळाने झडपच घेतली. त्यांच्या तोंडातून फेस वाहत होता. स्थानिकांच्या मदतीने त्याला हलचल करुण उठवण्याचा प्रयत्न केला.पण त्याआधीच काळाने झडप घेतली.
ताबडोब कळमेश्वर पोलीसांना सूचना देण्यात आली. मंगळवार सकाळी ६.३० वाजता उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे मृतकाला रवाना करण्यात आले. दुपारी १.००वाजता त्याचे स्थानिक मोक्षधाम येथे अत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास कळमेश्वर पोलीस करीत आहे.त्यांच्या पच्छात आई-वडील व भाऊ असा आप्त परिवार आहे.





Wednesday, June 20, 2018

 चंद्रपुरात माजी संघ प्रचारकाची आत्महत्या

चंद्रपुरात माजी संघ प्रचारकाची आत्महत्या

Former RSS pracharak Santosh Dikshit suicides | चंद्रपुरातील माजी प्रांत प्रचारक संतोष दीक्षित यांची आत्महत्याचंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर येथील समाधी वॉर्डातील रहिवासी संतोष दीक्षित यांनी स्वत:च्या घरातच झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. संतोष दीक्षित हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक व धर्म जागरण समितीचे सदस्य होते.
गेल्या एप्रिल महिन्यात संतोष दीक्षित यांची पाच वर्षांची मुलगी समिधाला कुलरचा शॉक लागल्याने तिचा मृत्यू झाला होता. मुलीच्या विरहात आपण गोळ्या खाऊन आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी मृत्यूपुर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे, असे सांगण्यात येत आहे.



Wednesday, June 06, 2018

 नागपुरात व्यापाऱ्याची उड्डाणपुलावरून उडी घेऊन आत्महत्या

नागपुरात व्यापाऱ्याची उड्डाणपुलावरून उडी घेऊन आत्महत्या

nagpur govari bridge साठी इमेज परिणामनागपूर/प्रतिनिधी:  
 इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या एका वितरकाने आर्थिक कोंडीमुळे उड्डाणपुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली. सोमवारी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास शहीद गोवारी आदिवासी उड्डाणपुलावर लोकमत चौकाजवळ हा थरारक प्रकार घडला.
शिरीष लक्ष्मणराव मोघे (वय ५१) असे मृताचे नाव आहे. ते पांडे लेआऊट खामला येथील गणेशपौर्णिमा अपार्टमेंटमध्ये राहत होते. मोघे टीव्ही, फ्रीज आणि अन्य विजेवर चालणाऱ्या उपकरणांचे वितरक होते. सूत्रांच्या माहितीनुसार त्यांना गेल्या काही दिवसांपासून व्यवसायात मोठे नुकसान झाले. त्यामुळे ते आर्थिक विवंचनेत होते. या पार्श्वभूमीवर ते त्यांची कार क्रमांक एमएच ३१/ सीएस ७४३६ ने झिरो माईलकडून शहीद गोवारी आदिवासी उड्डाणपुलावर चढले. त्यांनी लोकमत चौकाजवळ आपली कार उभी केली आणि कठड्यावर चढून त्यांनी पुलावरून खाली उडी घेतली. ते खाली रक्ताच्या थारोळ्यात पडले. यावेळी प्रत्यक्षदर्शीनी आरडाओरड केली. लगेच पोलिसांना कळविण्यात आले. काही वेळेतच गस्तीवरील पोलीस वाहन पोहचले. मोघेंना उचलून धंतोलीतील एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. धंतोलीच्या उपनिरीक्षक सरिता यादव आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचल्या. कारमधील कागदपत्रांवरून ती शिरीष मोघे यांच्या नावे असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या परिवारातील सदस्यांसोबत संपर्क केला. दरम्यान, उपचार सुरू असताना आज पहाटे ४ च्या सुमारास मोघे यांनी प्राण सोडला. त्यांचे बंधू श्रीकांत मोघे यांच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.


Tuesday, May 22, 2018

प्रेमीयुगुलाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

प्रेमीयुगुलाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

चंद्रपूर/प्रतिनिधी:
 एका प्रेमीयुगुलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास चंद्रपूर तालुक्यातील बोर्डा येथे उघडकीस आली. अजय प्रकाश मंगाम (२६) रा. सादागड ता. सावली, पूजा मुर्लीधर टेकाम (२४) रा. बोर्डा ता. चंद्रपूर असे आत्महत्या करणाऱ्या प्रेमीयुगुलाचे नाव आहे.
येत्या ५ जून रोजी पूजाचे लग्न ठरले होते. अजय  एका खासगी कंपनीमध्ये काम करीत होता. पूजाच्या घराशेजारी अजयचा मामा अनिल कुंभरे हा वास्तव्यास आहे. अजयचे आपल्या मामाच्या घरी नेहमी जाणे-येणे होते. अशातच त्याची पूजाशी ओळख झाली. नंतर भेटीगाठी वाढल्या. दोघेही एकमेकांना भेटून भावी आयुष्याची स्वप्ने रंगवत होती. त्यांनी प्रेमात आणाभाकाही घेतल्याचे समजते. या प्रेमाची चुणुक घरच्या मंडळींना लागली. मात्र त्यांना या दोघांच्या प्रेमाला विरोध होता.अशातच पूजाच्या वडिलाने तिच्यासाठी स्थळ शोधून तिचे लग्न ठरविले. ५ जून अशी लग्नाची तारीख निश्चित झाली होती. मात्र त्यांचे चोरून भेटणे सुरूच होते. अशातच १६ मेपासून ते दोघेही अचानक बेपत्ता झाले.अशातच आज सकाळी बोर्डा येथीलच एका विहिरीत या प्रेमीयुगालाचे मृतदेह तरंगताना आढळले. घटनेची माहिती होताच चिचपल्ली पोलीस चौकीचे राजू मडावी व रामनगर पोलीस स्टेशनचे कर्मचारीसुद्धा घटनास्थळवर पोहचले. गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे हलविले. दोघांचेही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होते. यावरून १६ मे रोजीच त्यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली असावी, असा संशय आहे. अधिक तपास रामनगर पोलीस करीत आहेत. 

Saturday, March 31, 2018

कामावरून काढलेल्या कामगाराने केली आत्महत्या

कामावरून काढलेल्या कामगाराने केली आत्महत्या

Worker suicide committed by work | कामावरून काढलेल्या कामगाराची आत्महत्याचंद्रपूर/प्रतिनिधी:
जीएमआर पॉवर प्लॅन्ट या कंपनीत कार्यरत असलेल्या व नंतर त्याला कामावरून कमी केलेल्या कामगाराने गळफास लावून आत्महत्या केली. सदर घटना गुरुवारी रात्री घडली.अक्षय आंबटकर (२३) रा. बाबुपेठ असे सदर कामगाराचे नाव आहे.
न्याय मागण्यासाठी आंदोलन केले, याची शिक्षा म्हणून वरोरा येथीलजीएमआर पॉवर प्लॅन्ट व्यवस्थापनाने तब्बल ८६ कामगारांना कामावरुन काढून टाकले. कंपनीच्या या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात लढा देणाऱ्या जीआर पॉवर प्लॅन्ट कामगार संघटनेच्या तक्रारीवरुन हे प्रकरण मंत्रालयात पोहचले होते. ८६ कामगारांना एकाच वेळी कामावरुन कमी करुन टाकल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. या विरोधात अनेकदा जिल्हाधिकारी, जिल्हा कामगार आयुक्तांकडे जीएमआर पॉवर प्लांट कामगार संघटनेचे अध्यक्ष दिनेश चोखारे यांच्या नेतृत्वात दाद मागितली. मात्र कुणीही कामगारांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. यासंबंधीची तक्रार विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्याकडे देण्यात आली आहे. दरम्यान, या कामगारांपैकी अक्षय आंबटकर याने गुरुवारी रात्री गळफास लावून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच जीएमआर पॉवर प्लांट कामगार संघटनेचे अध्यक्ष दिनेश चोखारे यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. पोलिसांनी याप्रकरणी मर्ग दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Wednesday, February 21, 2018

कर्जाला कंटाळुन आणखी एका शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या

कर्जाला कंटाळुन आणखी एका शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या

चंद्रपूर/ब्रम्ह्पुरी: 
ब्रम्हपुरी तालुक्यातील कोथुळना नवेगाव येथील शेतकरी  प्रविण वामन ठाकुर वय 36 वर्ष यांनी 21फरवरीच्या पहाटे सकाळी 04 वाजताच्या सुमारास उटुन सकाळी डब्बल फसल धानरोवनी करीता मोटार पंपाचे पाणी लावण्यासाठी जातो असे घरच्या कुटुंबीयांना सांगून गावालगत असलेले अरविंद नाकतोडे यांच्या शेताशिवात असलेल्या कडु लिंबू च्या झाडाला गळफास लावून आत्महत्या करुन आपली जिवन याञा संपवली ही घटना बुधवारी सकाळी  07:00 वाजताच्या सुमारास  येथील शेतमजुर शेतात काम करण्याकरिता गेला असता समोर आली.
मृतक शेतकरी प्रविण वामन ठाकुर याला अडीच एकर शेती असुन त्यावर सेवा सहकारी संस्था मधुन 40 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते,व श्तातील पिकांवर मावा,अळी, तूळतुळा रोगांनी शेतात नापिकी झाली आहे.गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी प्रविण वामन ठाकुर हा आर्थिक विवंचनेत दिसत होता.मुत्यक शेतकरी प्रविण वामन ठाकुर यांच्या पाठीमागे आई,पत्नी,एक मुलगी,एक मुलगा,एक भाऊ असा बराच मोठा आपत्य परीवार आहे.सदर मुत्यक शेतकरी प्रविण वामन ठाकुर यांनी गळफास लावून आत्महत्या केल्या ने कोथुळना नवेगाव येथील जनतेत शोककळा पसरली आहे.शासनाकडून सदर पिढीत कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात याव्ही अशी मागणी  सामाजिक कार्यकर्ते विनोद झोडगे,गोविंदराव भेंडारकर,ड्रा .प्रेमलाल मेश्राम विनोद राऊत यांनी भेट देऊन पोलीस निरीक्षक चव्हाण तहसीलदार चव्हाण साहेब यांना फोन केले व पंचनामा करून त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी अशी विनंती केली.
महाराष्ट्र शासनाने जरी कर्ज माफी केली असली तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्तेवर उपाययोजना सुचविल्या नसल्याने विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्म्हत्तेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे, यात मात्रालायातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या असोत व शेतकऱ्यांनी शेतीसाठी केलेली आत्महत्या असो हे आत्मह्तेचे प्रकरण सरकारच्या भविष्यात  चांगलाच जिव्हारी लागू शकते,त्यामुळे आणखी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी सरकारने लवकरात लवकर उपाययोजना व सूचना करणे गरजेचे झाले आहे.
 

Saturday, February 17, 2018

काजळसर येथील इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

काजळसर येथील इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

शंकरपूर (प्रतिनिधी): 
           चिमुर तालुक्यातील शंकरपूर जवळ असलेल्या काजळसर या गावातील शंकरराव तुळशीराम खोब्रागडे यांनी स्वतःच्या राहत्या घरी सायंकाळ सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. 
        सविस्तर वृत्त असे की काल दि 15 फेब्रुवारीला शंकरराव तुळशीराम खोब्रागडे अंदाजे वय 60 वर्षे शेतावर काम करण्यासाठी गेले होते तसेच त्यांच्या कुटूंबातील सर्व सदस्य  शेती वर त्याच्या सोबत काम करीत होते दुपार नंतर ते एकटेच घरी आले तेव्हा घरी कुणीही नव्हते. त्यांनी घरात आत जाऊन  स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली.
        सायंकाळी शेतावरून काम आटोपून त्याची पत्नी घरी आली आणि आतमधील दृश्य पाहताच त्या बेशुद्ध झाल्यात. काही क्षणात स्वतःला सावरत त्यानी आरडाओरडा करायला सुरुवात केली. त्यामुळे लगेच लोकांचा जमाव घराभोवती झाला.    या आत्महत्या चे नेमके कारण अजूनपर्यंत कळू शकले नाही.

Tuesday, January 16, 2018

 शेतकऱ्याची विषप्राशन करून आत्महत्या

शेतकऱ्याची विषप्राशन करून आत्महत्या

कोरपना/प्रतिनिधी:
कोरपना तालुक्यातील रूपापेठ  येथील एका युवा शेतकऱ्यांने आत्महत्या  केल्याची घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. अमोल मेश्राम वय (35) असे या मृतक शेतकऱ्यांचे नाव असून शेतातील फवारणीचे विषयी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.
अमोलच्या जाण्याने परिसरात चांगलीच हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत अमोल हा क्रिकेटचा उत्तम फलांदाज होता.त्यामुळे त्याच्या जाण्याने त्याच्या मित्र वर्गात चांगलीच शोककळा पसरली आहे.मृत्युचे कारण अद्यापही कळू शकले नसून पूढील तपास ठानेदार परघने करीत आहेत.



Monday, January 15, 2018

कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या


वरोरा/प्रतिनिधी: 
रोगराईने पिके नष्ट झाल्याने तसेच कर्जाचे डोंगर असल्याने कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेत असणाऱ्या एका शेतकऱ्याने जंगलातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वरोरा तालुक्यातील ताडगव्हाण येथे घडली. सदानंद दादाजी सूर वय ४४ असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
सध्या शेतकऱ्यांच्या पिकांवर अनेक रोगांनी घात घातला असून शेतकरी आस्मानी संकटात सापडला आहे. 
वरून शेतीसाठी कर्ज घेतलेले परत कसे करायचे यामुळे ते अस्वस्थ असायचे. त्यातच पिकांवर अनेक प्रकारची लागण झाल्याने संपूर्ण पीक नष्ट झाले होते याच विवंचनेत गेल्या काही दिवसांपासून सदानंद हे चिंतेत असायचे .सोमवारी सकाळी उठून शेताकडे गेले व परिसरातील जंगलात झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. या घटनेची माहिती शेगाव पोलिसांना मिळताच घटनेचा पंचनामा केला व आकस्मित मृत्यूची नोंद केली.

Monday, December 04, 2017

 विहिरीत उडीघेवून आत्महत्या

विहिरीत उडीघेवून आत्महत्या

चंद्रपूर /प्रतिनिधी:
चंद्र्पुर येथील दुर्गापूर वार्ड क्र, 2 एकता चौक येथे जिल्हा परिषद शाळे जवळ राहणाऱ्या एक व्यक्तीने सोमवारी रातरी १२.३० वाजता परिसरातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.  संदीप  मन्साराम गायकवाड़ असे मृतकाचे नाव असून  संदीप गायकवाड़ हा नोव्हेंबर महिन्यापासून तेथील व्यंकटराव दुर्योधन यांच्या घरी आपल्या दोंन मुलांसोबत व पत्नीसोबत किरायाने राहत होता. हा परिसरात असलेले मजुरी सारखे छोटेमोठे काम करून आपल्या उदर्निवाह भागवत होता .   

रविवार रात्री  10:30 वाजताच्या सुमारास संदीप हा घराबाहेर पडला मात्र उशिरापरीयंत घरी न आल्याने परिसरात शोधाशोध केली तितक्यात परिसरातील नागरिकांना  विचारणा केली असता  आज़ाद चौक येथील पिंपळाच्या झाडाखाली बसलेला लोकांनी त्याला बघितले होते . सोमवारी सकाळी विहिरीवर पाणी भरायची केलेल्या महिलेवर शुद्ध विहिरीच्या पाण्यात २ चप्पल तरंगतांना दिसल्या हे बघून नागरिकांना शंका आली व नागरिकांनी पाण्यात हुक टाकून शोधण्याचा प्रयत्न केला असता पाण्यातून मृतदेह तरंगत बाहेर आल्याने  घटनेची माहिती दुर्गापूर स्टेशनला देण्यात आली. मृतदेहाला पाण्याबाहेर काढून जिल्हा सामान्य रुग्णालयात शविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून पुढील तपास दुर्गापूर पोलीस करत आहे Image result for आत्महत्या

Thursday, November 23, 2017

कर्जापायी शेतक-याची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या

कर्जापायी शेतक-याची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या

मूल: तालुक्यातील गांगलवाडी येथिल शेतकरी परशुराम सकाराम बोलमवार वय 42 या शेतक—याने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. 
  मृतक शेतकरी परशुराम बोलमवार याला तीन मुली, पत्नी व आई असा परीवार असुन अनु्क्रमे मोठी मुलगी 5 व्या वर्गात, 2 —या वर्गात व पहिल्या वर्गात आहे. त्याला दीड एकर शेती असून शेतीसाठी त्याने कर्ज घेतले होते.या मृतक  शेतक—याने 2008—9या वर्षात कर्ज घेतले होते अशी माहिती आहे. यावर्षी पाणी पाऊस नसून धानाला मावा,तुळतुळा,खोड किडी या रोगाने ग्रासले असून शेतक—याचे पिकही झाले नाही. त्यामुळे शेतकरी संकटात आला असतांनाच शेतकरी आत्महत्या करीत आहे. सरकारने सरसकट कर्जमाफी केली असल्याने शेतक—याला ना​हक त्रास सहन करावा लागत आहे. या घटनेची माहिती मिळताच मूल पंचायत समितीचे माजी सभापती तथा सदस्य संजय पाटील मारकवार व मूल नगर परीषदेचे नगरसेवक विनोद कामडे यांनी लगेच घटनास्थळी भेट घेतली व घटनेचा रोष व्यक्त करत शेतक—याच्या कुटंबाला सरकारने भरीव मदत करावी असे मत व्यक्त केले.  मूल तालुका अर्थमंत्री व जिल्हृयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे क्षेत्र असून त्यांचे क्षेत्रात या शेतक—याची आत्महत्या होत असल्याने रोष व्यक्त केल्या जात आहे.

Tuesday, November 21, 2017

४४० हायटेंशन इलेक्ट्रिक पोलला लावला गळफास

४४० हायटेंशन इलेक्ट्रिक पोलला लावला गळफास

 गजेंद्र डोंगरे
बाजारगाव:- मोहन अजाबराव धारपुरे (वय 30 वर्ष राहणार गोंदिया जि. आमगाव) येथील रहिवासी असून, त्याने घरगुती कलहातून ४४० हायटेंशन इलेक्ट्रिक पोलला गळफास लावल्याचे  निष्पन्न झाले. गणेश नगर वार्ड क्रमांक 1 डांबर प्लांटच्या मागील परिसरात 440 हाईटेंशन पावर लाइन आहे.

Saturday, November 18, 2017

सहाय्यक अभियंत्याने घेतली मुख्यालयावरून उडी

सहाय्यक अभियंत्याने घेतली मुख्यालयावरून उडी

वरोरा-भद्रावती/(प्रतिनिधी)
वेकोली वणी क्षेत्रातील भद्रावती तालुक्यायील ताडाळी( उर्जाग्राम) येथील मुख्यकार्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून सहाय्यक अभियंता अशोक नरडे (५६) रा. दुर्गापूर कॉलनी चंद्रपूर यांनी आत्महत्या केली. नरडे यांना मानसिक त्रासाला कंटाळले असल्याचे कडले. नरडे यांनी  आत्महत्या केल्याचे कळताच उर्जाग्राम परिसरात एकच खळबळ उडाली.

Sunday, November 12, 2017

कुटुंबीयांच्या धाकामुळे बारावीतील दोन मुलींची आत्महत्या

कुटुंबीयांच्या धाकामुळे बारावीतील दोन मुलींची आत्महत्या

- दोन दिवसांपूर्वी शाळेतून निघून गेल्या होत्या


नागपूर/प्रतिनिधी : मित्राला भेटण्याकरिता शाळा बुडवून निघून गेलेल्या दोन मुलींनी घरी परतल्यास आईवडील व भाऊ रागावतील, मारहाण करतील या धास्तीने दोन मुलींनी कोराडी तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. मुलींनी मृत्यूपूवी एक चिठ्ठी लिहून आत्महत्या करण्यामागचे कारण लिहून ठेवले. आशना रवींद्र रोकडे (17) रा. मार्टिननगर आणि मनीषा पटले (17) रा. जरीपटका पोलीस ठाण्याच्या मागे अशी मृत मुलींची नावे आहेत.
दोघीही जरीपटका येथील दयानंद आर्य कन्या महाविद्यालयात मुली बाराव्या वर्गात वाणिज्य शाखेत शिकत होत्या. गुरुवारी सकाळी शाळेत जाण्यासाठी त्या निघाल्या होत्या. मात्र, शाळेत न जाता त्या शिकवणी वर्गातील मित्र निशिकांत नागपुरे याच्यासह अंबाझरी उद्यान व फुटाळा येथे गेल्या होत्या. त्या ठिकाणी आशनाला भेटण्यासाठी छिंदवाडा येथून तिच्या नात्यातील रजत नावाचा मुलगा येणार होता. मात्र, रजतची गावाकडे परीक्षा सुरू असल्याने तो नागपुरात आलाच नाही. रात्री उशीरापर्यंत आशनाने त्याची वाट बघितली. त्यामुळे त्यांना फुटाळयावर 8 वाजले. निशिकांत हा दोन्ही मुलींना घरी परतण्याची विनंती करीत होता. मात्र, तोपर्यंत मुली शाळेत न जाता फिरायला निघून गेल्याची कळले होते. त्यामुळे दोघिंनाही भीती वाटत होती. त्यामुळे दोघीही निशिकांतला परतण्यास नकार देत होत्या. त्याच्या दुचाकीने त्या रात्रभर इकडे तिकडे भटकत होत्या.
निशिकांतलाही घरी जाण्यास मज्जाव करीत होत्या. निशिकांतमुळेच आपण शाळेत न जाता फिरायला गेलो, अशी माहिती पोलिसांना देऊ, अशा शब्दात त्याला धमकावत होत्या. त्यामुळे मुलींमुळे फसल्याचे समजून तो त्यांच्यासोबत फिरत होता. त्यानंतर ते कोराडी परिसरात फिरत होते. त्याच दिवशी मुले घरी न परतल्याने मुलींच्या पालकांनी कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर मुली आता घरी परतण्यात अर्थ उरला असून जीवनयात्रा संपविण्याची भाषा करू लागल्या. त्यामुळे निशिकांत घाबरला व त्याने आपल्या आईवडिलांशी संपर्क केला. मुलींच्याही पालकांना कळविले. मात्र, मुली परतण्याच्या तयारीत नव्हत्या. शुक्रवारी ते कोराडी तलाव परिसरात पोहोचल्या. मुलींनी आत्महत्या करू नये म्ळणून रात्री 8 वाजेपर्यंत तो त्यांच्यावर नजर ठेऊन होता. त्यानंतर पोलिसांना व कुटुंबियांना माहिती देण्यासाठी तो तलाव परिसरातून निघाला. घरी पोहोचून त्याने सर्वांना माहिती दिली. त्यानंतर सर्वजन कोराडी पोलिसांसह तलाव परिसरात मुलींचा शोध घेतला. मात्र, रात्री काहीच सापडले नाही. तलावाच्या बांधावर मुलींच्या चपला दिसल्या. आज शनिवारी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास तलावात मुलींचे मृतदेह सापडले आणि रोकडे व पटले परिवारावर शोककळा पसरली.

आशनाचा शेवटचा संवाद बहिणीशी
घरातून बाहेर निघून गेल्यानंतर शुक्रवारी आशनाने मोठी बहिण रोशनीला भ्रमणध्वनी केला. रोशनी विवाहीत असून ती छिंदवाडा येथे राहते. यावेळी आशनाने "माझ्‌याकडून मोठी चूक झाली आहे. ही चूक सुधारण्यासारखी नाही. मी आईवडीलांशी डोळे मिळवू शकत नाही. माझा शेवट जवळ आला आहे. हा माझा शेवटचा फोन आहे. यानंतर मी दिसणार नाही. मी आत्महत्या करीत आहे.' अशा शब्दात आपल्या बहिणीशी संवाद साधला. त्यानंतर रोशनीने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. तू घरी परत जा, तुला कुणीही काही बोलणार नाही, असे तिला सांगितले. त्यानंतर आशनाने भ्रमणध्वनी ठेवून दिला. तर रोशनीने आपल्या आईवडिलांना भ्रमणध्वनी करून सर्व माहिती दिली. दुसक्तया दिवशी मुलींच्या मृत्यूचाच निरोप घरी पोहोचला.

Monday, November 06, 2017

'विद्या मला माफ कर' - कंत्राटदाराची आत्महत्या

'विद्या मला माफ कर' - कंत्राटदाराची आत्महत्या

ठाणे/ प्रतिनिधी-
गोडबंदर रोडवरील एका कंत्रटदाराचा कारमध्ये मृतदेह आढळून आला आहे. मयत झालेल्या व्यक्तीचे नाव संकेत जाधव असे आहे. घटनेची माहिती पोलिसांना ंमिळताच पोलिसांनी घटना स्थळी धाव घेऊन कारमधील मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. गाडीमध्ये एक रिव्हाल्वर आणि एक चिट्टी मिळाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार स्वताच्याच  रिव्हाल्वरने आत्महत्या केली असवी असे प्रथमीक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.गाडीत संकेतच्या मृतदेहाजवळ पोलिसांना चिट्टी मिळाली आहे. या चिट्टीमध्ये “विद्या मला माफ कर, मला धंद्यात नुकसान झालं” अशा वाक्याचा उल्लेख असल्याची माहिती मिळाली.

जाधव हा ठाण्याच्या पाचपाखाडी परिसरात कुटुंबासोबत राहत होता. कासारवडवली पोलिस त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेत आहेत.