সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, December 31, 2017

सर्वांगिण विकासाकरिता भावी पिढी सक्षम करा - जितेंद्र पापळकर

सर्वांगिण विकासाकरिता भावी पिढी सक्षम करा - जितेंद्र पापळकर


पिपर्डा गावात स्वच्छता महोत्सव साजरा
चंद्रपुर(प्रतिनिधी)दिनांक- 31/12/2017 गावाचा ख-या अर्थाने विकास करायचा असेल तर, गावातील लहान मुल उद्याचे भावी नागरिक होणार आहे. यांना सर्वांगाने सक्षम केल्यास गावांचा सर्वांगाने विकास करता येतो . असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कोरपना तालुक्यातील पिपर्डा गावात आयोजित स्वच्छता महोत्सव कार्यक्रमात व्यक्त केले.
स्वच्छता महोत्सवाचे प्रास्ताविक कोरपना पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी धनंजय साळवे यांनी केले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार ॲड. संजय धोटे,कार्यक्रमाचे उदघाटक म्हणुन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर,प्रमुख अतिथी म्हणुन जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) रविंद्र मोहिते ,सामाजिक कार्यकर्ता सय्यद आबिद अली प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर पुढे बोलतांना म्हणाले की, मुलांचा विकास करावयाचा असेल तर स्वच्छतेच्या सवयीसह कुपोषणमुक्त ग्राम होणे गरजेचे आहे. यासोबतच स्पर्धेच्या युगात गावातील तरुण समोर येण्या साठी तरुणांनी वाचणाची सवय लावली पाहिजे. वाईट व्यसना पासुन दुर राहिले पाहिजे. उल्वल जीवन घडविण्यासाठी  लहान पणा पासुनच चांगल्या सवयीचा स्विकार केला पाहिजे. पिपर्डा गावातील शाश्वत स्वच्छता ,गुडमार्निंग पथक सह गावात राबविलेल्या सर्व उपक्रमांचे मनापासुन कौतुक करतो .असे मत व्यक्त केले. राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार ॲड. संजय धोटे यांनी जीवनमान उंचावण्या करीता सर्वांनी स्वच्छता राखणे गरजेचे आहे. हे सर्व गावांनी ठरविले तेव्हाच घडुन येते. अशाप्रकारचा आदर्श पिपर्डा ग्रामस्थांनी दाखवुन दिला आहे. गावाची ताकद सर्वात मोठी असुन, गावक-यांनी एकत्र येवुन केलेला प्रत्येक संकल्प हा पुर्णत्वास जातो असे मत व्यक्त केले. जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) रविंद्र मोहिते यांनी एकत्र येवुन गावाला आदर्शवत करणारे सर्व ग्रामस्थ गावविकासाची प्रमुख भुमिका पार पाडत असुन, सकारात्मक दृष्टीने सर्वांनी विचार केल्यामुळेच आज गावात शाश्वत स्वच्छता निर्माण झाली आहे. असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाला प्रामुख्याने नायब तहसिलदार मडावी, कृषी अधिकारी देवनाडे, स्वच्छ भारत मिशनचे  माहिती शिक्षण संवाद तज्ञ कृष्णकांत खानझोडे, पिपर्डा ग्रामपंचायतचे सरपंच चंद्रभान मडावी, धानोली ग्रामपंचायतचे सरपंच विजय रणदिवे, विस्तार अधिकारी जिवन प्रधाण, प्रविण मस्के, खुशाल राठोड, कोरपना नगरपंचायतचे नगरसेवक सोयल अली, रमेश पाटिल मालेकर तथा गावातील व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..
कार्यक्रमात गावात शाश्वत स्वच्छता राखणारे जेष्ठ नागरिकांचा व गुडमोर्णिंग पथक उपक्रम राबविणा-या तरुणांचा भव्य  सत्कार करण्यात आला. शादीखाना सभागृह, प्रधानमंत्री आवास योजनेचे भुमिपुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे यशस्वी सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन पिपर्डा गावचे सामाजिक कार्यकर्ता सय्यद आबिद अली यांनी केले.

कृषीपंप धारकाचे तक्रार निवारण जन संपर्क कार्यक्रम संपन्न

कृषीपंप धारकाचे तक्रार निवारण जन संपर्क कार्यक्रम संपन्न

ब्रम्हपुरी ग्रामिण प्रतिनिधी :- 
ब्रम्हपुरी तालुक्यातील दक्षिण परिसराअंतर्गत येणाऱ्या आवळगाव येथे कृषीपंप धारकाचे तक्रार निवारण कार्यक्रम ग्राम पंचायत येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमात मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजने अंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांना याचा लाभ होईल.
ज्या शेतकऱ्यांच वीज बिलांची थकबाकी असलेल्या कृषी पंपधारक शेतकऱ्यांना मनाला दिलासा देणारी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-2017 जाहीर करण्यात आली होती. या योजनेत शेतकऱ्यांना  दंड आणि व्याज बाजूला ठेवून मूळ थकबाकीचे पाच समान हप्ते भरण्याची संधी शासनातर्फे उपलब्ध करून शेतकऱ्यांनी ३१डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली असून त्वरित भरना करावा व ज्यानी या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच सन्मान करण्यात आला.जे शेतकरी आपल्या विधुत बिलाच भरना करत नसेल तर त्यांची विधुत खंडित केला जाईल.
तसेच कृषि पंप धारकांच्या तक्रारी असतील त्यानी त्वरित माहिती कनिष्ट सहाय्यक अभियंता कार्यालयाला द्यावे. अशी माहिती कृषीपंप शेतकऱ्यांना मा .श्री.लिखार साहेब उपविभागीय अभियंता ब्रम्हपुरी यानी  दिली.
या कार्यक्रमाला सौ.ज्योती अश्वजीत जनबंधु सरपंच ग्राम पंचायत कार्या.आवळगाव, कनिष्ठ सहा.अभियंता मा.श्री.रामटेक्कर साहेब गांगालवाड़ी.डोंगरे साहेब ब्रम्हपुरी वरिष्ट तंत्र.मसराम व गावातील कृषिपंप  धारक.यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
दुर्गा मेश्राम हत्या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन

दुर्गा मेश्राम हत्या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन

ब्रम्हपुरी ग्रामीण प्रतिनिधी:- 
कु.दुर्गा मेश्राम वय रा .खेड (ब्रम्हपुरी )अंदाजे २० हिचे प्रेत विहीरीत  दिसले असता  ही आत्महत्या नसून हत्या आहे असा खुलासा शव विच्छेदन केल्यानंतर वैधकीय अहवालानुसार विष देवून विहिरीत फेकल्या गेले अशी माहिती झाल्यास पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे तक्रार नोंदवली गेली. तरीही पोलिसांनी आरोपीला अटक न करता अभयदान दिले व  सांगण्यात आले की या मुलींनी आत्महत्या केली अशी सूचना मय्यत कुटुंबाला दिली.
 सदर घटना रा.खेड  गावामध्ये नाटकाच आयोजन दी.७/१२/२०१७ ला मध्ये मय्यत मुलगी आपल्या वहिनी सोबत नाटक पाहायला गेली असता नाटकामध्ये  सांस्कृतिक कार्यक्रमाचसुद्धा आयोजन करण्यात आले होते.सांस्कृतिक कार्यक्रम बंद झाल्यानंतर मय्यत मुलगी नाटकाच्या मंडपातून बाहेर लघुशंकेसाठी निघाली असता गोल्डि नामक युवकाने तिची छेडखाणी  केली असता  मय्यत मुलीनी आणि तिच्या वहीनीनी आरडाओरडा केला असता मय्यत मुलीच्या भावानी छेड़खाणी करणाऱ्या गोल्डि नामक युवकाला मारहाण केली.
 दुसऱ्या दिवशी म्हणजे ८ तारखेला झालेल्या प्रकाराबाबत मय्यत मुलीला घरच्यालोकांनी शिवीगाळ केली असता रागाच्या भरात मय्यत मुलगी घरून निघून गेली.आणि ही मुलगी छेड़खाणी करणाऱ्या गोल्डि ला दुपारी १२:३० वा .मिळाली तिला गोल्डि ने जेवण दुसऱ्या मुलाला सांगून आणायला सांगितले त्या मुलाने जेवण आणून गोल्डि ला दिले व जेवण त्या मय्यत  मुलीला खायला दिले.मय्यत मुलीने अन्न प्राशन केले.
 मय्यत मुलगी घरी आली नाही म्हणून घरच्यानी शोधा शोध केला पण मुलगी त्या दिवशी मिळाली नाही. तिसऱ्या दिवशी ९ तारखेला मुलीची शोध घेत  असता गावाबाहेरील विहिरी जवळ मय्यत मुलीची ओढणी दिसली अशी माहिती तेथील ग्रामस्थानी दिली लगेच मय्यत मुलीचे कुटुंब घटनास्थळी गेले आणि विहिरीत बघितले तेव्हा मय्यत मुलगी विहिरीच्या पाण्यात तरंगत दिसली तिला लगेच गराच्य साह्याने बाहेर काढून शव विच्छेदणासाठी मृतदेह नेण्यात आले.शव विच्छेदन केल्यानंतर १८ तारखेला  मुलीचा विष प्राशन  केल्यामुळे झाला अशी माहिती वैधकीय अहवालानुसार प्राप्त झाली. मुलीच्या कुटुंबाला संशय आला असता?  पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे तक्रार दिली की मय्यत मुलीला विष देवून तिला विहिरित फेकले हे कृत्य गोल्डि नामक युवकाने केले अशी तक्रार नोंदविले.पोलिसांनी गोल्डि नामक युवकाला अटक केली आणि विचारपूस करू लागले त्या मध्ये आरोपी नी  माहिती दिली की मि स्वता जेवण दुसऱ्या मुलाच्या हाताने आणायला सांगितले. मय्यत मुलींनी ते अन्न प्राशन सुद्धा केले.अशी माहिती पोलीस अधिकारी याना दिली  आणि त्याला सोडून दिले .सर्व माहिती पोलीसांना  असून की सदर मय्यत मुलगी ही पाण्यात बुडुन मृतु झाला नसून विष देवून विहिरित फेकल्या गेल्याने  झाला तरी पण पोलिसांनी आरोपी याला मोकाट सोडले.
आरोपिला अटक व्हावी यासाठी उपवीभागीय पोलीस अधिकारी याना    निवेदन देतांना श्री.यशवंत दीघोरे cdcc.बँकउपाध्यक्ष चंद्रपूर, मिलिंद भनारे एकलव्य सेना जिल्हाध्यक्ष चंद्रपूर , स्वप्निल अलगदेवे तालुकाध्यक्ष ब्रम्हपुरी, बंडुभाऊ हजारे माजी नगरसेवक चंद्रपूर बाबुरावजी बावणे मत्स्य व्यवस्थापण संघ वर्ग गडचिरोली तसेच ढिवर समाज बहूसंख्यने उपस्थितीत दिले.वा तात्काळ आरोपिला अटक करून मय्यत दुर्गाला न्याय मिळवून द्यावा अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनामार्फत देण्यात आला.
प्रमोदभाऊ चिमुरकर यांचे कडून दुमाने कुटुंबाला आर्थिक मदत

प्रमोदभाऊ चिमुरकर यांचे कडून दुमाने कुटुंबाला आर्थिक मदत

ब्रम्हपुरी ग्रामीण प्रतिनिधी:
 दिन,  अंध,  अपंग,  अशा गरजू व्यक्तीची गरज आेळखुन  त्यांना तत्परतेने मदत करने ही गांगलवाडी व मेडंकी जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य प्रमोदभाऊ चिमुरकर यांची विशेषतः आहे .गांगलवाडी व मेडंकी जिल्हा परिषद क्षेत्रातील नवेगाव (मेंडकी)येथील सौ.रसिका बक्षी दुमाने हीला दोन्ही डोळ्याना अंधत्व आले .व शेती असुनही नसुन असल्यासारखी एकरी दोन पोते झाले असल्याचे सांगत असुन त्यांना आर्थिक चणचण जाणवत होती.तेव्हा त्यांना मा .प्रमोदभाऊना कार्यकत्यामार्फत हि बाब कळली .त्यांनी त्वरित यांची दखल घेत  स्व:ता ब्रम्हपुरी तालुक्यातील आमदार जनसंर्पक कार्यालय येथे अंध बाईला पाचारण करून त्याना  आर्थिक मदत प्रधान करण्यात आली. . यावेळी मा.प्रमोदभाऊ चिमुरकर जि. प.सदस्य चंद्रपूर  आर्थिक मदत देतांना मा .अमरभाऊ गाडगे युवक क्रॉग्रेस तालुका उपाध्यक्ष ब्रम्हपुरी, मा .बबलु मडावी आदीवासी सेलचे तालुका अध्यक्ष ,मा.कपिल राऊत युवक क्रॉग्रेस तालुका उपाध्यक्ष चिमुर,मा .मंगेश दिवटे,मा .सुरज धोंगडे,मा .संदिप बगमारे युवक क्रॉग्रेस तालुका सचिव चिमुर, व आदी कार्यकतेगण उपस्थित होते.
संविधान बदलण्याच्या केलेल्या वक्तव्यावर बीआरएसपी ने केला जाहीर निषेध

संविधान बदलण्याच्या केलेल्या वक्तव्यावर बीआरएसपी ने केला जाहीर निषेध

चंद्रपूर/प्रतिनिधी:  
कर्नाटक राज्यातील कोप्पल जिल्ह्यात ब्राम्हण युवा परिषदे मध्ये बोलतांना केंद्रातील राज्यमंत्री यांनी भारताचे संविधान बदलण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे सरकार मध्ये आलेले आहे. असे वक्तव्य करून भाजपा चे अंतस्थ हेतू स्पस्ट केले आहेत. भारताचे संविधान हे सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, समाजवादी, प्रजासत्ताक, गणराज्य या तत्वावर उभे आहे. या तत्वाचा अपमान करणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेडगे यांचा बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, भद्रावती कडून जाहीर निषेध करण्यात आला. 
     तसेच केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेडगे यांनी केलेल्या  वक्तव्याबद्दल केंद्रीय कायदामंत्री व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तात्काळ केंद्र सरकाची या बाबत त्यांची भूमिका जाहीर करावी व समस्त भारतीयांची अशा बेजबाबदार व्यक्यव्या बद्दल माफी मागावी. तसेच अशा बेजवाबदार मंत्राची केंद्रीय मंत्रिमंडळातून ताबळतोड हकालपट्टी करावी असे झाले नाही तर बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी संविधान विरोध केंद्र सरकारच्या विरोधात मोठं जन आंदोलन करील असे आव्हान बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, भद्रावती कडून करण्यात आले व याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. 
अखेर त्या रुग्णाचा मृत्यू

अखेर त्या रुग्णाचा मृत्यू

चंद्रपूर/प्रतिनिधी:
 काही दिवसांपूर्वी सावली व्याहाड येथील युवक भुपींदर सलूजा या युवकांचा अपघात झाला होता, त्यांच्या नातेवाईकांनी भूपिंदरला मानवटकर हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले  होतं , पण हॉस्पिटलच्या चुकीच्या उपचारामुळे त्या रुग्णाचा 1 डोळा निकामी झाला. व त्याला गँगरीन सारख्या आजाराला सामोरे जावे लागले, नातेवाईकांनी तात्काळ रुग्णाला नागपूरला हलवले पण रुग्णाची परिस्थिती बघता डॉ ने पण उपचार करू पण शक्यता कमी असे सांगितले.
आज पहाटे भूपिंदरचा नागपूर मध्ये मृत्यू झाला, 24 वर्षाचा ह्या युवकाचा अपघाती मृत्यू झाला की डॉ च्या चुकीच्या उपचाराचा बळी ठरला ? हे आणखी समजू शकले नाही . 
आज त्या युवकाची पत्नी 7 महिन्याची गर्भवती आहे घरात नवीन बाळ येणार या आशेने त्यांनी आपल्या संसाराची स्वप्न बघत होती, पण काळ की डॉ याने ते स्वप्न सलूजा परिवारापासून सारे सुख हिरावून घेतले.ज्या दिवशी मानवटकर हॉस्पिटल मध्ये रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉ च्या चुकीच्या उपचारविरोधात आवाज उचलला तेव्हा शहरातील काही नामवंत डॉक्टर्स हे डॉ. मानवटकर यांच्या  बाजूने होते.  पण रुग्णाच्या बाजूने मात्र कुणी बोलले नाही.त्यामुळे आता हे प्रकरण नेमके कोणते वळण घेणार तसेच आयएमए या प्रकरणाची गंभीर दखल घेणार की त्या चुकीच्या उपचारांचे समर्थन करतील का हा प्रश आता उपस्थित झाला आहे, त्यामुळे या प्रकरणाकडे आता सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे. 

 जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस शिक्षा

जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस शिक्षा

court order साठी इमेज परिणाम
चंद्रपूर/प्रतिनिधी:

पोलीस स्टेशन पाथरी अंतर्गत पिडीत जखीम फियार्दीला जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस दिनांक 29/12/2017 रोजी श्री. नि.रा. नाईकवाडे, जिल्हा सत्र न्यायाधीश  -3 यांनी शिक्षा ठोठावली आहे.पोलीस स्टेशन पाथरी अतंर्गत मौजा चिखली येथे पिडीत जखमी फिर्यादी व आरोपी नामे रंजनगुणाजी घुबडे वय 24वर्षे रा. चिखली ता. सावली, जि. चंद्रपूर याचेसोबत प्रेमसंबधाच्या वादाचा कारणावरून पिडीत जखमी हि गावातील तलावाकडे कपडे धुण्यासाठी जात असता नमुद आरोपीने सायकलने पाठलाग करून तिला अश्लील शब्दात षिवीगाळ केली. परत कपडे धुवुन पिडीत जखमी फिर्यादी येत असतांना आरोपीने तिला शिवीगाळ करून काडीने व सतुरने वार गंभीर जखमीकरून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. अशा  फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन पाथरी येथे अप.क्र.131/20164 कलम 307, 323, 504 भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहा. पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी पुर्ण करून आरोपी विरूध्द न्यायालयात दोशारोपपत्र सादर केले.
न्यायालयाचे सुनावणी दरम्यान सदर प्रकरणात न्यायालयाने साक्षीदार तपासले व योग्य पुराव्याच्या आधारे दिनांक 29/12/2017 रोजी आरोपी नामे रंजन गुणाजी घुबडे वय 24 वर्षे  रा.चिखली ता. सावली, जि. चंद्रपूर यास कलम 307 भादंवि मध्ये 7 वर्षे  सश्रम कारावास शिक्षा  व 7,000/-रु दंड, दंड न भरल्यास 6 महीने शिक्षा, कलम 323 भादंवि मध्ये 1 वर्षे  सश्रम कारावास शिक्षा व 1000/-रु दंड, दंड न भरल्यास 1 महीना शिक्षा, कलम 504 भादंवि मध्ये 2वर्षे शिक्षा व 2,000./-रु दंड, दंड न भरल्यास 02 महिने शिक्षा, श्री. नि.रा. नाईकवाडे, जिल्हा सत्र न्यायाधीश -3 यांनी ठोठावली आहे. सदर प्रकरणात सरकार तर्फे अॅड. श्री. आसिफ शेख, सरकारी अभियोक्ता, चंद्रपुर तर कोर्ट पैरवी म्हणुन नापोशि  गुणाजी सिडाम पोस्टे पाथरी यांनी काम पाहीले आहे.

 विनयभंग करणाऱ्या आरोपीस शिक्षा

विनयभंग करणाऱ्या आरोपीस शिक्षा

court order साठी इमेज परिणाम
चंद्रपूर/प्रतिनिधी:

पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी अंतर्गत पिडीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस दिनांक 29/12/2017 रोजी श्रीमती. मोनिका आरलॅन्ड, जिल्हा सत्र न्यायाधीश -1 यांनी शिक्षा  ठोठावली आहे.
        पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी अतंर्गत मौजा खेडमक्ता येथे पिडीत अल्पवयीन फिर्यादी ही आपले घरी खोलीत अभ्यास करीत असता आरोपी नामे हिरामन विठोबा गुरफुडे वय 54 वर्षे  रा. खेडमक्ता ता.ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर पिडीत असलेल्या खोलीत जावुन ‘ तुझी आई कुठे गेली म्हणुन विचारले, तेव्हा तिने आईबाबा शेतात गेले असे म्हणाली असता आरोपीने अश्लील शब्दात शीवीगाळ करून पिडीत फिर्यादीचा विनयभंग केला. अशा  फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे अप.क्र. 124/2014 कलम 354, 448 भादंवि सहकलम 8 बाल लैेगीक प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहा. पोलीस निरीक्षक सोनकुसरे यांनी पुर्ण करून आरोपी विरूध्द न्यायालयात दोशारोपपत्र सादर केले.
                                   न्यायालयाचे सुनावणी दरम्यान सदर प्रकरणात न्यायालयाने साक्षीदार तपासले व योग्य पुराव्याच्या आधारे दिनांक 29/12/2017 रोजी आरोपी नामे हिरामन विठोबा गुरफुडे वय 54 वर्षे  रा.खेडमक्ता ता. ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर यास कलम 354 (अ)भादंवि मध्ये 3 वर्षे  सश्रम कारावास शिक्षा  व 10,000/-रु दंड, दंड न भरल्यास 2 महीने शिक्षा, कलम 448 भादंवि मध्ये 1 वर्षे सश्रम कारावास शिक्षा व 1000/-रु दंड, दंड न भरल्यास 1 महीना शिक्षा, सहकलम 8 बाल लैगीक प्रतिबंधाक कायदा  मध्ये 5 वर्षे शिक्षा व 20,000./-रु दंड, दंड न भरल्यास 03 महिने शिक्षा, श्रीमती. मोनिका आरलॅन्ड जिल्हा सत्र न्यायाधीश  -1 यांनी ठोठावली आहे. सदर प्रकरणात सरकार तर्फे अॅड. श्री. एस.आर. डेगावार, सरकारी अभियोक्ता, चंद्रपुर तर कोर्ट पैरवी म्हणुन पोहवा राजु सबळ पोस्टे ब्रम्हपुरी यांनी काम  पाहीले आहे.
 जबरी संभोग करणाऱ्या आरोपीस शिक्षा

जबरी संभोग करणाऱ्या आरोपीस शिक्षा

court order साठी इमेज परिणाम
चंद्रपूर/प्रतिनिधी:

पोलीस स्टेशन भिसी अंतर्गत पिडीत अल्पवयीन मुलीवर जबरी संभोग करणाऱ्या  आरोपीस  दिनांक 29/12/2017 रोजी श्री. गौतम, सत्र न्यायाधीश, कोर्ट वरोरा डिजे-1 यांनी शिक्षा ठोठावली  आहे.
पोलीस स्टेशन भिसी अतंर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र भिसी येथे आरोपी नामे गणेश भगवान खडसे वय (32) हा कर्मचारी या पदावर कार्यरत असतांना पिडीत अल्पवयीन फिर्यादीसोबत ओळख  वाढविले त्यादरम्यान तिचे पुस्तक परत करण्याकरीता तिला आरोग्य केंद्रातील क्वार्टरवर बोलावुन ती  अल्पवयीन आहेत हे माहीत असुन सुध्दा पिडीत अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती करून तिच्यावर जबरी  संभोग केला. अशा  फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट व मेडीकल रिपोर्टवरून पोलीस स्टेशन भिसी येथे अप.क्र.10/2016 कलम (354 )ड  भादंवि सहकलम क, (ई)6 बाल लैेगीक प्रतिबंधक कायदा  अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहा. पोलीस निरीक्षक चहांदे यांनी पुर्ण करून आरोपी विरूध्द न्यायालयात दोशारोपपत्र सादर केले.न्यायालयाचे सुनावणी दरम्यान सदर प्रकरणात न्यायालयाने साक्षीदार तपासले व योग्य  पुराव्याच्या आधारे दिनांक 29/12/2017 रोजी आरोपी नामे गणेश भगवान खडसे वय (३२)रा.प्राथमिक आरोग्य केंद्र भिसी यास कलम 376 भादंवि सहकलम क, (ई), 6 बाल लैगीक प्रतिबंधक कायदा मध्ये 10 वर्ष शिक्षा  व 5000./-रु दंड, दंड न भरल्यास 06 महिने शिक्षा श्री. गौतम, सत्र न्यायाधीश, कोर्ट वरोरा डिजे-1 यांनी ठोठावली आहे. सदर प्रकरणात सरकार तर्फे अॅड. श्री. मिलींद देशपांडे, सरकारी अभियोक्ता, चंद्रपुर तर कोर्ट पैरवी म्हणुन पोहवा भास्कर किन्नाके पोस्टे भिसी यांनी काम पाहीले आहे.

Saturday, December 30, 2017

प. पु. सदगुरू  दादाश्री महाराजांचा  मुक्तेश्वरी गुरुपीठाचे उत्तराधिकारी

प. पु. सदगुरू दादाश्री महाराजांचा मुक्तेश्वरी गुरुपीठाचे उत्तराधिकारी

*  ह..प सुभाष महाराज बावनकर यांच्या हस्ते विधीवत पार पडला 
* आमदार बाळु धानोरकर यांची प्रामुख्याने  उपस्थिती

चंद्रपूर दि.३० (प्रतिनिधी):
सत्संगाच्या माध्यमातून सामाजिक क्रांती घडविणारे सिद्धमहायोगी शक्तीपाताचार्य प. पु. सदगुरू  प्रियानंद महाराजांचा सोळाष्टी सोहळा तसेच त्यांचे सुपुत्र प. पु. सदगुरू  दादाश्री महाराज यांचा उत्तराधिकारी  सोहळा  मुक्तेश्वरी  गुरुपीठ निमगाव, वर्धा येथे  २८ डिसेंबर २०१७ रोजी  ह.भ.प सुभाष महाराज बावनकर यांच्या हस्ते विधीवत पार पडला असुन यावेळी  भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार बाळु धानोरकर यांची प्रा‘ुख्याने उपस्थिती  होती.
भगवान नित्यानंद बाबांचे कृपाधिष्टीत तसेच सिद्ध परंपरेतील महान संत, शक्तिपात, ध्यानसाधना, व सिद्धयोगाची दीक्षा तसेच सत्संगाच्या माध्यमातून सामाजिक क्रांती घडविणारे सिद्धमहायोगी शक्तीपाताचार्य प. पु. सदगुरू  प्रियानंद महाराज १३ डिसेंबर २०१७ रोजी ब्रम्हलीन झाले, त्या पाश्र्वभूमीवर २८ डिसेंबर २०१७ रोजी प. पु. सदगुरू प्रियानंद महाराजांचा सोळाष्टी सोहळा तसेच त्यांचे सुपुत्र प. पु. सदगुरू  दादाश्री महाराज यांचा उत्तराधिकारी सोहळा मुक्तेश्वरी गुरुपीठ निमगाव, वर्धा येथे संपन्न झाला.
सोहळ्याची सुरुवात दादाश्रींच्या मंगलंमयस्नानाने झाली, त्यावेळी साधनरत असलेल्या सोळा ब्राम्हणांचा यथोचित सत्कार करून, दादाश्रींनी प. पु. सदगुरुंच्या समाधीचे तसेच  सदगुरूंच्या आणि भगवान नित्यानंद बाबांच्या पादुकांचे पूजन केले.तर प्रतिभाताई घोंगे यांनी दादाश्री महाराजांच्या पादुकांचे पूजन केले.उपस्थित ब्राम्हणांच्या वतीने महामंत्राचा जयघोष,  वेदपठण,तसेच गायत्री मंत्रजप करण्यात आले.
ह.भ.प सुभाष महाराज बावनकर यांच्या हस्ते उत्तराधिकारी  सोहळा विधीवत पार पडला. तसेच गुरुपीठातील ज्येष्ठ साधक रविंद्र इंगोले आणि समीर शेंडे यांच्या हस्ते दादाश्रीना पवित्र आसनावर विराजमान करून एकवीस साधकांच्या वतीने दादाश्रींचे माल्यार्पण करण्यात आले. या सर्व विधीनंतर दादाश्रींना मुक्तेश्वरी  गुरुपीठातील सर्व साधकांच्या वतीने पदभार सोपविण्यात आला त्याचबरोबर सर्व साधकांच्या वतीने प. पु. सदगुरू   दादाश्री  महाराज असे नामकरण करण्यात आले. मुक्तेश्वरी  गुरुपीठावर यापुढे  शक्तिपात दीक्षेचा प्रचार, प्रसाराचे कार्य दादाश्री  महाराजांच्या आज्ञेनुसार पार पडेल असे सर्वानुमते ठरविण्यात आले.
यावेळी आ. बाळु धानोरकरसह हजारोंच्या संख्येने साधक वर्ग उपस्थित होता.

अमोल कोंडबतुनवार यांचे निधन

अमोल कोंडबतुनवार यांचे निधन

सच्चा कार्यकर्ता हरपला- सुधीर मुनगंटीवार. 
चंद्रपूर/प्रतिनिधी:
 भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया सेल, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य , तथा जिल्हा संयोजक श्री अमोल कोंडबत्तूनवार यांचे चंद्रपूर नागभीड-नागपूर मार्गावरील भुयार येथे अत्यंत दुर्दैवी अपघाती निधन झाले.सावली मार्गे आपल्या तीन मित्रांसोबत अमोल चारचाकी गाडीने जात होते मात्र भुयार येथे रस्त्यावर एक बर्फाची लादी पडली होती. या लादीला  कट मारून जाण्याच्या गडबडीत समोरूनयेणाऱ्या ट्रक ला जोरदार धडक बसली. यात अमोल यांचा जागीच मृत्यू झाला. 

भाजपा चंद्रपूर जिल्हा संयोजक अमोल कोंडबतुनवार यांचे अपघाती निधन ही मनाला चटका लावणारी घटना असून त्यांच्या निधनाने पक्षाची मोठी हानी झाली आहे. एक सच्चा कार्यकर्ता हरपल्याची प्रतिक्रिया अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे . भारतीय जनता पार्टी अमोलच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असेही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे .
आजचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
आज पिपर्डा येथे स्वच्छता महोत्सव

आज पिपर्डा येथे स्वच्छता महोत्सव


चंद्रपूर (प्रतिनिधी)  - मागील वर्षापासून ग्रामस्थांच्या सहभागातून वर्षाच्या अखेर विविध ग्रामविकासाच्या कामातून करण्याचा निर्धार कोरपना तालुक्यातील पिपर्डा येथील ग्रामस्थांनी केलेला आहे. यावर्षी सुध्दा पिपर्डा येथील सामाजिक कार्यकर्ते आबीद अली यांच्या मार्गदर्शना खाली ग्रामस्थांनी दिनांक 30 डिसेंबर 2017 रोजी संध्याकाळी ठिक 7.00 वाजता गावात भव्य स्वच्छता महोत्सवाचे आयोजन केलेले आहे.
पिपर्डा येथील आयोजित स्वच्छता महोत्सवास अध्यक्ष म्हणून राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार ॲङ संजय धोटे, कार्यक्रमाचे प्रमुख उदघाटक म्हणून जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदचे अध्यक्ष देवराव भोंगळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) रविंद्र मोहिते, राजुराचे उपविभागीय अधिकारी दयानिधी, कोरपना तहसिलदार हरीश गाडे, पंचायत समिती कोरपनाचे गट विकास अधिकारी डॉ. संदिप घोन्सीकर, तालुका कृषी अधिकारी वानखेडे, पोलीस निरिक्षक परघने कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रम दरम्यान ग्रामस्थांना ग्रामविकासावर मार्गदर्शन केले जाणार असून, मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपन, शादीखाना सभागृहाचे भूमिपूजन, सिमेंट रस्ता कामाचे भूमिपूजन, प्रधानमंत्री व रमाई आवास योजना घरकूल कामाचे भूमिपूजन, गोमाता पूजन, पंडित दिनदयाल उपाध्याय वाचनालय लोकार्पण, ग्रामस्वच्छतेत योगदान दिलेल्या जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात येणार येत असल्याचे पिपर्डा ग्रामपंचायतीचे सरपंच चंद्रभान तोडासे, सामाजिक कार्यकर्ता आबीद अली यांनी कळविले आहे.

Friday, December 29, 2017

अपघातात वाघ ठार

अपघातात वाघ ठार

कोंढाळी पासुन 17कि मि अंतरावरील बाजारगाव नजीक    बाजारगाव ते नागार्जूना काॅलेज या  भागात तिन वर्षिय वाघाचा  अज्ञात वाहनाचे धड़किने मृत्यू  झाला।  ही घटना 29डिसेंबर चे रात्री सात वाजताचे दरम्यान घडली अशी माहिती स्थानिकांनी  दिली आहे । हे घटनास्थळ  कळमेश्वर वन परिक्षेतातिल बाजारगाव उपवन परिक्षेत्रात येत आहे . रात्री वन विभागाने मृत वाघाला आपल्या ताब्यत घेतले  आहे.
गोंडखैरी परिसरात दोन अपघात..!
 जिवीतहानी नाही....!

गोंडखैरी परिसरात दोन अपघात..! जिवीतहानी नाही....!


बाजारगाव
- राष्ट्रीय अमरावती-नागपूर महामार्गावर टोलटँक्स येथे महाराष्ट्रराज्य परिवहन महामंडळाची गणेशपेठ डेपोची शिवशाही बस-ट्रक अपघात.तसेच  येथून जवळच  असलेल्या कळमेश्वर वळन रस्त्यावर दोन ट्रेलर-ट्रक चा अपघात.
          येथून जवळच गोंडखैरी येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या  अपघातात तिन ट्रक व एक शिवशाही बसची मोठी हानी झाली. पहिला अपघात गोंडखैरी ते कळमेश्वर वळन रस्त्यावर गुरुवार (दि.२८/डिसेंबर सकाळी  साडे नऊ) च्या सुमारास टिनूप लाँजिस्टीक पार्क सामोर सिताराम रोडलाईन्सचा ट्रक क्रंमाक एमएच-३१-एपी-२१४० तर लोखंडी पाईप भरलेला ट्रेलर क्रंमाक जिजे-१६-डब्ल्यु-१२५० यांची अमोरासमोर जोरदार धडक झाली असता कोणतिही जिवीतहानी न होता अपघात घडला.या अपघातात ट्रेलरचा  चालक-मालक ईच्छापुर सुरत निवासी अब्दुल गफ्फार शहा वय ३४ वर्षे तसेच ट्रक चालक हसनबाग नागपुर निवासी अली मिर मोहम्मद हसन वय ५१ वर्षे दोघेही किरकोळ जखमी झाले.
      दुसऱ्या अपघातात गोंडखैरीच्या राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यावर नागपुर वरुन अमरावतीला जात   असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बस क्रंमाक एमएच-०९-ईएम-१४७८ ला ट्रक क्रंमाक केए-४०-ए-११८१ ने  धडक दिली. याबाबत सविस्तर वृत्त असे की सदर ट्रकला हैद्राबादकडे जायचे होते.तो रस्ता चुकून अमरावती  महामार्गानी निघाला असता  टोलनाक्यावर रांगेत लागल्यावर त्याने हैद्राबाद रस्त्याची विचारणा केली असता माघारी फिरण्यास  सांगण्यात आले.ट्रक चालक महेश ने ट्रक रांगेतूनच मागे घेण्याचा प्रयत्न करतांना मागाहून रांगेत येत असलेल्या बसला धडक बसली.त्यात बसच्या काचा फुटल्या सुदैवाने दोन्ही अपघातात कोणतिही प्राणहानी झाली नाही.
    कळमेश्वर पोलीसांनी घटनेची नोंद करुन पिएसआय सुनिल कामडी एनपिसी गणेश मूतमाळी यांचेसह पुढील तपास सुरु केला आहे.

Thursday, December 28, 2017

टाटा सुमोने दुचाकी ला दिली धडक १ ठार  २गंभीर

टाटा सुमोने दुचाकी ला दिली धडक १ ठार २गंभीर

खरकाडा येथील घटना
चिमूर/शहर प्रतिनिधी
चिमूर वरून ६ कि.मी. अंतरावर खरकाडा समोरील वळणावर सुसाट वेगाने परतीचा मार्गावर असलेल्या टाटा सुमो क्र. एम.एच. ३१ ए.एच. ५०३७ वाहनाने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली असल्याने अपघातामध्ये श्रावण जांभुळे (खरकाडा वय ५५), याचा चिमूर रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तसेच गंगाबाई श्रावण जांभुळे (वय ४५) व नशीब बलवत्तर असल्याने उत्कर्ष प्रवीण जांभुळे (वय 5) वर्ष अपघातात त्याचा पाय फॅक्चर झाला आहे.

     तसेच उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे दाखल केले असता श्रावण जांभुळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघात झालेले व्यक्ती खरकाळा येथील असून ते पिंपळगाव वरून गावाकडे येत असतांना गावालगतच त्यांचा अपघात झाला. तसेच धडक देणारा आरोपी हा गाडीसह पळ काढला असून त्याला भिसी पोलीस स्टेशन हद्दीत पकडण्यात आले आहे. पवन शामराव मुनघाटे (वय २४ रा. हिरापूर) असून तो साक्षगंध कार्यक्रमाला मुरपार येथे गेला होता. त्याला चिमूर पोलिसांचा स्वाधीन करण्यात आले असून समोरील तपास चिमूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश लबडे यांचे मार्गदर्शनाखाली पी.एस.आय. सोनूले करीत आहे.
टाटा सुमोने दुचाकी ला दिली धडक १ ठार  २गंभीर

टाटा सुमोने दुचाकी ला दिली धडक १ ठार २गंभीर

खरकाडा येथील घटना
चिमूर/शहर प्रतिनिधी
चिमूर वरून ६ कि.मी. अंतरावर खरकाडा समोरील वळणावर सुसाट वेगाने परतीचा मार्गावर असलेल्या टाटा सुमो क्र. एम.एच. ३१ ए.एच. ५०३७ वाहनाने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली असल्याने अपघातामध्ये श्रावण जांभुळे (खरकाडा वय ५५), याचा चिमूर रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तसेच गंगाबाई श्रावण जांभुळे (वय ४५) व नशीब बलवत्तर असल्याने उत्कर्ष प्रवीण जांभुळे (वय 5) वर्ष अपघातात त्याचा पाय फॅक्चर झाला आहे.

     तसेच उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे दाखल केले असता श्रावण जांभुळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघात झालेले व्यक्ती खरकाळा येथील असून ते पिंपळगाव वरून गावाकडे येत असतांना गावालगतच त्यांचा अपघात झाला. तसेच धडक देणारा आरोपी हा गाडीसह पळ काढला असून त्याला भिसी पोलीस स्टेशन हद्दीत पकडण्यात आले आहे. पवन शामराव मुनघाटे (वय २४ रा. हिरापूर) असून तो साक्षगंध कार्यक्रमाला मुरपार येथे गेला होता. त्याला चिमूर पोलिसांचा स्वाधीन करण्यात आले असून समोरील तपास चिमूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश लबडे यांचे मार्गदर्शनाखाली पी.एस.आय. सोनूले करीत आहे.
टाटा सुमोने दुचाकी ला दिली धडक १ ठार  २गंभीर

टाटा सुमोने दुचाकी ला दिली धडक १ ठार २गंभीर

खरकाडा येथील घटना
चिमूर/शहर प्रतिनिधी
चिमूर वरून ६ कि.मी. अंतरावर खरकाडा समोरील वळणावर सुसाट वेगाने परतीचा मार्गावर असलेल्या टाटा सुमो क्र. एम.एच. ३१ ए.एच. ५०३७ वाहनाने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली असल्याने अपघातामध्ये श्रावण जांभुळे (खरकाडा वय ५५), याचा चिमूर रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तसेच गंगाबाई श्रावण जांभुळे (वय ४५) व नशीब बलवत्तर असल्याने उत्कर्ष प्रवीण जांभुळे (वय 5) वर्ष अपघातात त्याचा पाय फॅक्चर झाला आहे.

     तसेच उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे दाखल केले असता श्रावण जांभुळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघात झालेले व्यक्ती खरकाळा येथील असून ते पिंपळगाव वरून गावाकडे येत असतांना गावालगतच त्यांचा अपघात झाला. तसेच धडक देणारा आरोपी हा गाडीसह पळ काढला असून त्याला भिसी पोलीस स्टेशन हद्दीत पकडण्यात आले आहे. पवन शामराव मुनघाटे (वय २४ रा. हिरापूर) असून तो साक्षगंध कार्यक्रमाला मुरपार येथे गेला होता. त्याला चिमूर पोलिसांचा स्वाधीन करण्यात आले असून समोरील तपास चिमूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश लबडे यांचे मार्गदर्शनाखाली पी.एस.आय. सोनूले करीत आहे.
चंद्रज्योती च्या बिया बाबत इको-प्रो चे जनजागृती अभियान

चंद्रज्योती च्या बिया बाबत इको-प्रो चे जनजागृती अभियान

चंद्रज्योती-जेट्रोफा बिया लहान मुलांना अधिक संवेदनशील
दरवर्षी ग्रामीण भागातील विदयाथ्र्याना होतेय विषबाधा - जनजागृती साठी मुख्य कार्यपालन अधिकारी यांना निवेदन

चंद्रपूर: ग्रामीण भागात चंद्रज्योतीच्या बिया खाल्याने होणारी विषबाधा संदर्भात इको-प्रो संस्थेच्या वतीने काल (27 डिसे) सिंदेवाही तालुक्यातील नांदगाव या गावात जनजागृती पदयात्रा व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गेल्या अनेक वर्षापासुन चंद्रपूर जिल्हयात तसेच संपुर्ण राज्यात सुध्दा चंद्रज्योतीच्या बिया ग्रामाीण भागातील विदयार्थी खाल्याने विषबाधा होत असल्याच्या बातम्या नेहमीच वृत्तपत्रात छापुन येत असतात. यंदा सुध्दा चंद्रपूर जिल्हयात नागभीड तालुक्यातील कोर्धा, सिंदेवाही तालुक्यातील नांदगांव, रत्नापूर तर चंद्रपूर शहरातील एका शाळेत चंद्रज्योतीच्या बिया खाल्याने शाळेतील विदयार्थाना विषबाधा झालेली आहे. सातत्याने अशा घटना जिल्हा तसेच राज्यात घडत असतांना सुध्दा अजुनही शाळा स्तरावर, ग्रामीण भागात याबाबत जनजागृती नसल्याने वारंवार हया घटना कुठल्या ना कुठल्या गावात घडत असतात.
याकरीता अशाच एका घटनेच्या गावातुन इको-प्रो संस्थेच्या शिक्षण विभाग व आपातकालीन व्यवस्थापन विभाग समीतीच्या वतीने सिंदेवाही तालुक्यातील नांदगाव या गावातील जिल्हा परीषद उच्च प्राथमीक शाळेपासुन जनजागृती अभियान सुरू करण्यात आले. सोबतच नांदगाव गावातुन जनजागृती पदयात्रा सुध्दा काढण्यात आली. या पदयात्रेत शाळेचे विदयार्थी, शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समीतीचे सदस्य आणी इको-प्रो चे सदस्य सहभागी झाले होते. रॅली संपुर्ण गावात फिरून विदयार्थी हातात जनजागृती बोर्ड घेऊन घोषणा करीत होते. ‘खाऊ नका, खाऊ नका, चंद्रज्योतीच्या बिया खाऊ नका’ ‘चंद्रज्योतीच्या बिया आम्ही खाणार नाही, कुणाला खाऊ देणार नाही’ अशा घोषणानी संपुर्ण गांव दुमदुमुन गेले होते. यावेळी गावकरी रस्त्याच्या दोन्ही बाजुस जमा झालेले होते, याबाबत कार्यकर्ते सर्व गावकरीना माहीती देत होते.
यावेळी आयोजीत जनजागृती कार्यक्रमात इको-प्रो चे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी चंद्रज्योतीच्या बिया बाबत माहीती देत विदयाथ्र्याना असे कोणतेही फळ जे आपणास नवे आहे किंवा माहीती नसेल अशी फळे खाऊ नये. तसेच शाळेत असतांना शिक्षकांना विचारावे, घरी असाल तर पालकांना विचारल्याशिवाय अनोळखी फळे, वनस्पती खाऊ नये असे आवाहन केले. यावेळी मुख्याध्यापीका व शिक्षण समीतीचे अध्यक्ष यांनी विदयार्थाना मार्गदर्शन केले.

या जनजागृती पदयात्रा दरम्यान बंडु धोतरे अध्यक्ष इको-प्रो संस्था, शाळेच्या मुख्याधापीका सौ सरीता गजलवार, इको-प्रो शिक्षण विभाग प्रमुख रवी गुरनुले, आपातकालीन व्यवस्थापन विभाग प्रमुख अभय अमृतकर, शाळा व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष अरूण सहारे, शाळेचे शिक्षक अनील लोणबले, शालीकराम नागापूरे, शालीनी कोचे, सवीता कावडकर, संरपच अर्चनाताई नन्नावरे, माजी संरपच दादाजी नन्नावरे, नांदगाव येथील शाळा समीतीचे सदस्य नम्रता चांदेकर, वर्षा गहाणे, वृंदाताई गहाणे, अर्चना कुमरे पोलीस पाटील जयाताई बोरकर, भगवान मेश्राम यावेळी जनजागृती पदयात्रा व कार्यक्रमात सहभागी झाले होते.
जनजागृती व पदयात्रा कार्यक्रमात इको-प्रो चे नितीन बुरडकर, धर्मेद्र लुनावत, अनिल अडगुरवार, रवींद्र गुरनुले, विजय हेडाऊ, संजय सब्बनवार, सुमीत कोहळे, अभय अमृतकर, राजु काहीलकर, बिमल शहा, हरीश मेश्राम, वैभव मडावी, रोशन धोतरे आदी सहभागी झाले होते.

चंद्रज्योती-जेट्रोफा वनस्पती बाबत
सामान्यपणे चंद्रज्योती, रतनज्योत किंवा रान एंरड म्हणुन ओळखले जाणारे जेट्रोफा हे संपुर्ण भारतातील विशेषतः दक्षिणेकडील भागात आढळणारे एक सदाहरीत वनस्पती आहे. पुर्वीपासुन हे औषधीय उपयोगासाठी वापरले जात होते, पण अलीकडे जैवीक-इंधन म्हणुन प्रोत्साहन दिले जाताना आपण पाहतो. सदर फळ लहान मुलांना परीणामकारक ठरले आहे. सर्वत्र या फळाच्या सेवनाने लहान मुलांना विषबाधा होत असल्याचे दिसुन आले आहे. सदर वनस्पतीचे फळ खाल्यानंतर लहान मुलांना वारंवार उलटया, ओटी-पोटीत वेदना होतात, तोंडातुन फेस येतो. 
या सर्व घटना चंद्रज्योती या वनस्पतीच्या बिया पासुन होत आहेत. याचे शास्त्रीस नाव ‘जेट्रोफा कॅरकस’ असे आहे. ग्रामीण भागात मुलांना जेट्रोफा वनस्पतीच्या बिया खायचे फळ असल्याचा गैरसमज आहे. रस्ताच्या कडेला किंवा शाळेमागे, परीसरात झुडुपांसारखे मोठया प्रमाणात वाढलेल्या या वनस्पतीचे फळे आकर्षक असल्याने लक्ष वेधुन घेत असते. शाळेच्या मधल्या सुटीत, किंवा शाळा संपल्यावर उत्सुकता म्हणुन सहजपणे  किंवा काजुच्या बिया समजुन लहान मुले ते फोडुन खातात आणी यामुळे या मुंलाना विषबाधा होउन उलटया सुरू होतात, पोटदुखीचा त्रास सुरू होतो. ही सर्व परीस्थीती अत्यंत भितीदायक आणी घाबरवणारी असते. शिक्षक आणी पालक घाबरून त्वरीत मुलांना नजीकच्या प्राथमीक आरोग्य केंद्रात भरती करतात. स्थानीक पातळीवर एवढया साÚया मुलांना एकेवेळी उपचार करणे सुध्दा शक्य होत नाही. डाॅक्टर आणी कर्मचारी सोबतच औषधांची उपलब्धता नसल्याने मोठी तांराबळ उडते. या सर्व अनपेक्षीत घटनेमुळे शिक्षक आणी पालक सुध्दा हादरलेले असतात. अशावेळी, या मुलांना जिल्हा ठिकाणच्या रूग्णालयात पाठवावे लागते. आदी बाबीचा विचार केला तर ग्रामीण भागात चंद्रज्योतीच्या बिया मुंलाकडुन खाल्ले जाणे हीच मोठी समस्या गेल्या कित्येक वर्षापासुन राज्यात सुरू आहे.

जिल्हा परीषद चंद्रपूर कडे इको-प्रो ची मागणी
जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी जितेंद्र पापळकर यांना इको-प्रो तर्फे निवेदन सादर करून चंद्रज्योतीच्या बिया विदयाथ्र्यानी खाऊ नये याकरीता जनजागृती शाळां-शाळात करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत त्यांनी सकारात्मक प्रतीसाद देत यासंदर्भात जिल्हा परीषदेतर्फे त्वरीत कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

संपुर्ण राज्यात व्हावी जनजागृती... बंडु धोतरे
चंद्रज्योती-जेट्रोफा बियाची विषबाधा लहान मुलांकरीता संवेदनशील असुन ते ग्रहण केल्यास विषबाधेस बळी पडतात.  चंद्रज्योतीच्या बिया न खाण्याबाबत राज्यातील सर्वच शाळातुन जनजागृती होण्याची गरज असल्याची सांगुन त्याबाबत शासनाने तसे निर्देश राज्यातील सर्व जिल्हा परीषदांना दयावे तसेच ज्या परीसरात सदर वनस्पती असेल तिथे सुध्दा ग्रामपंचायती मार्फत सुचना फलक लावण्याचे निर्देश दयावे अशी मागणी एका निवेदनातुन मा. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री व मा. सुधीरभाऊ मुनंगटीवार, पालकमंत्री तथा अर्थ नियोजन व वनमंत्री यांचेकडे इको-प्रो चे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी केली आहे.

Wednesday, December 27, 2017

Mscit वसुली च्या विरोधात पुरोगामी संघटना न्यायालयात दाद मागणार

Mscit वसुली च्या विरोधात पुरोगामी संघटना न्यायालयात दाद मागणार


चंद्रपूर-
चंद्रपूर जिल्ह्यात Mscit हा संगणक कोर्स उत्तीर्ण न केल्यामुळे अनेक शिक्षकांचे 10 वर्षापर्यंत ची लाखो च्या घरात असलेली रक्कम वसुली करण्याची कार्यवाही जिल्हा परिषदेने सुरु केली आहे, त्याबाबत न्याय मागण्यासाठी पुरोगामी शिक्षक संघटनेने न्यायालयाचे दार ठोठावण्याचे ठरवले आहे.
   Mscit हा तांत्रिक कोर्स आहे व शिक्षकांची सेवा ही तांत्रिक सेवेत मोडत नाही तसेच 1.1.2008 किंवा त्यापूर्वी व त्यानंतर कधीही प्रशासनाने अश्या कोर्स करण्याची वा वसुलीबाबतची सूचना शिक्षकांना दिली नाही तसेच नियमानुसार 2008 पूर्वी सदर कोर्स केला नाही तर पुढील वेतनवाढी बंद करायला पाहिजे होत्या त्याही बंद न करता सुरूच ठेवल्या व आता एव्हड्या वर्षांनी वसुली होत आहे हे चुकीचे आहे, त्यातल्या त्यात दरम्यानच्या काळात सेवानिवृत्त व मृत झालेल्या शिक्षकांकडूनही आता वसुली करण्यात येत आहे. राजुरा येथील मृत शिक्षक शांताराम मोरे यांच्याकडूनही अशीच 3लाख 92 हजार वसुली करण्याचे आदेश दिले आहे, त्यांच्या परिवाराला मिळणाऱ्या 4लाख निवृत्ती उपदानातून हि रक्कम कपात करण्यात येणार आहे त्यामुळे त्या कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. याविरोधात सर्व अधिकाऱ्यांकडे दाद मागूनही न्याय मिळत नसल्याने महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती अन्यायग्रस्त शिक्षकांसह मा.न्यायालयाकडे दाद मागणार आहे.
   अश्या प्रकारची वसुली कोणाकडून होत असेल तर पुरोगामी शिक्षक संघटनेशी संपर्क करावा असे आवाहन विजय भोगेकर, नारायण कांबळे, दीपक वर्हेकर, हरीश ससनकर, प्रतिभा उदापुरे, सुनीता इटनकर, शालिनी देशपांडे, पौर्णिमा मेहरकुरे व अन्य पदाधिकारी यांनी केली आहे.
हरीश ससनकर
जिल्हा सरचिटणीस, चंद्रपूर

‘सुंदर मी होणार नाही, तर सुंदर मी करणार’

‘सुंदर मी होणार नाही, तर सुंदर मी करणार’

वरोरा: ‘सुंदर मी होणार नाही, तर सुंदर मी करणार’ या वाक्यातून प्रेरणा घेवून जगभर अनेकजन सामाजिक भान जपत आहेत. अनेक व्यक्ती कुष्ठरोगाच्या आनंदात सहभागी होतात तसेच दु:खतही सहभागी व्हावे, असे प्रतिपादन महारोगी सेवा समिती आनंदवनचे सचिव डॉ. विकास आमटे यांनी कर्मयोगी बाबा आमटे यांच्या जयंतीनिमित्त आनंदवनात आयोजित समाज दिन कार्यक्रमात मंगळवारी केले.

कर्मयोगी बाबा आमटे यांचा जन्म दिन समाज दिन म्हणून साजरा केला जातो. आज आनंदवनात अनाम वृक्षांची स्मरणशीला आणि अनाम मूक कळ्यांचीस्मरण शिला तसेच कर्मयोगी बाबा आमटे व साधना आमटे यांच्या समाधीला मान्यवरांच्या हस्तेपुष्पचक्र अर्पण करुन कर्मयोगी बाबा यांच्या १०३ व्या जयंती कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. आनंदवन निर्मित स्वरानंद आर्केष्ट्राच्या चमूने बाबांची गीते सादर करुन बाबांच्या आठवणी ताज्या केल्या. यावेळी संचिताचे कवडसे या लेख मालिकेतील डॉ. विकास आमटे यांच्या लेखाचे आणि कर्मयोगी बाबा आमटेच्या कवितांचे वाचन करण्यात आले. यावेळी निलकृष्ण देशपांडे लिखित महामानव गीत वंदना या काव्यसंग्रहाचे प्रकाशनही करण्यात आले. कार्यक्रमाला डॉ. विकास आमटे, डॉ. भारती आमटे, गुलानी, सुधाकर कडू, डॉ. विजय पोळ, सदाशिव ताजने, गौतम करजगी, पल्लवी आमटे, सोमनाथ रोडे, प्रा. श्रीकांत पाटील, आनंद निकेतन महाविद्यालय वरोराचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे, शेखर नाईक, माधव कविश्वर, सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी, जोडो भारत अभियानात सहभागी मंडळी, आनंदवन मित्र मंडळ वरोरा, आनंदवनातील कार्यकर्ते सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे संचालन रवींद्र नलगरीवार यांनी केले. कार्यक्रमाची सांगता ‘जोडो भारत’ या गिताने झाली.

Tuesday, December 26, 2017

6 जानेवारीपासून नागपुरातखासदार सांस्कृतिक महोत्सव

6 जानेवारीपासून नागपुरातखासदार सांस्कृतिक महोत्सव


दर्जेदार कार्यक्रमांची नागपूरकरांना मेजवानी

नागपूर-येत्या 6 जानेवारीपासून नागपुरात खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून या निमित्त 28 जानेवारीपर्यंत विविध दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी शहरातील रसिकांना मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत आयोजन समितीचे आ. प्रा. अनिल सोले यांनी कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली.
या बैठकीला वनराईचे गिरीश गांधी, भाजपाचे शहर अध्यक्ष सुधाकर कोहळे, जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, खा. डॉ. विकास महात्मे, खा. अजय संचेती भाजपाचे विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, दक्षिण पश्चिम विधानसभेचे  प्रभारी प्रा. राजीव हडप, आ. सुधाकर देशमुख, आ. समीर मेघे, बैद्यनाथचे सुरेश शर्मा, देवेंद्र पारेख, महापौर नंदा जिचकार, आ. डॉ. मिलिंद माने, आ. विकास कुंभारे, आ. ना. गो. गाणार, जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, जयप्रकाश गुप्ता आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
या महोत्सवाचे उद्घाटन 6 जानेवारी रोजी सायंकाळी 7.30 वाजता ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर होईल. 
शनिवार दिनांक 6 जानेवारी रोजी प्रसिध्द गायक सुदेश भोसले यांचा गाण्याचा कार्यक्रम होईल. दिनांक 7 जानेवारी रोजी अभिजित भट्टाचार्य यांचा गाण्याचा कार्यक्रम होईल. या दोन्ही दिवसांचे कार्यक्रम ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर होईल. दिनांक 11 जानेवारीपासून होणारे सर्व कार्यक्रम सुरेश भट सभागृह रेशीमबाग येथे होतील. दिनांक 11 जानेवारी रोजी सायंकाळी सच्चिदानंद शेवडे यांचे सावरकरांवर उद्बोधन होईल. दिनांक 12 जानेवारी रोजी विवेकानंद जयंतीनिमित्त प्रख्यात व्याख्याते मुकुल कानिटकर यांचे व्याख्यान होईल. दिनांक 13 रोजी इस्कॉनचे गोपालप्रभू महाराज यांचे युवकांना मार्गदर्शन होईल.
दिनांक 14 रोजी राहूल देशपांडे यांचा संगीत कार्यक्रम, 20 जानेवारी रोजी चाण्यक्य मालिकाफेम मनोहर जोशी यांचे नाट्यमंथन, दिनांक 21 जानेवारी रोजी मधुप पांडेय यांचे राष्ट्रीय हिंदी कवी संमेलन, दिनांक 27 जानेवारी रोजी शेखर सेन यांचा ‘कबीर’ हा एकपात्री प्रयोग सादर करण्यात येईल आणि 28 जानेवारी रोजी प्रसिध्द अभिनेत्री व खा. हेमामालिनी यांचे द्रौपदी साकार करणार्‍या नृत्याचा कार्यक्रम होईल. या दरम्यान 11 ते 14 जानेवारी फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे.

समाज घडविणाऱ्या शिक्षण क्षेत्राच्या दुरावस्थेची खंत

समाज घडविणाऱ्या शिक्षण क्षेत्राच्या दुरावस्थेची खंत

  • नागो गाणार ;
  • वेध तर्फे शिक्षक गौरव पुरस्कार वितरित

पारशिवणी तालुका प्रतिनिधी ::
शिक्षका पेक्षा समाजात कुणीच वरचढ नाही कारण एक शिक्षक हा समाजातील एक पिढी घडवितो,तेव्हा शासकिय स्तरावर या शिक्षण क्षेत्राकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असताना देखील त्या कडे कानाडोळा होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.ज्याला कारणीभूत म्हणजे शिक्षन क्षेत्राचे सपाट्याने होत चाललेले खाजगीकरन.देशातील नावाजलेल्या प्रतिष्ठानांच्या हातात शिक्षन क्षेत्राची दोरी गेलेली असल्या मुळेच एक चांगला समाज व देशाला नावलौकिक मिळवून देणारे देशहिताचे कर्णधार घडविणाऱ्या शिक्षण क्षेत्राची सध्या दुरावस्था झालेली असल्याची खंत शिक्षक आमदार ना.गो.गाणार यांनी वेध प्रतिष्ठान तर्फे आयोजित शिक्षक गौरव पुरस्कार कार्यक्रमा दरम्यान व्यक्त केली.

विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन सभागृह सीताबर्डी,नागपूर येथे वेध प्रतिष्ठान तर्फे आयोजित शिक्षक गौरव पुरस्कार कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रकाश एदलाबादकर हे होते.तर प्रमुख अतिथी मध्ये शिक्षक आमदार नागो गाणार,दिपेंद्र लोखंडे शिक्षणाधिकारी जी.प.नागपूर यांची प्रमुख उपस्थिती होती.दरम्यान वेध प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी प्रमाणे पाच शिक्षकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.यावेळी योगेश माणिकराव वासाडे राहणार टेकाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोर्डा,रामटेक पंचायत समिती येथे शिक्षक म्हणून कर्त्याव्यावर असून वेध प्रतिष्ठान तर्फे साने गुरुजी शिक्षक गौरव पुरस्काराने सपत्नीक गौरविण्यात आले तर वैशाली गेडाम यांना शिक्षनतज्ञ जे.पी.नाईक शिक्षक गौरव,हसीना शेख यांना साने गुरुजी शिक्षक गौरव पुरस्कार,मीना खाडे यांना शिक्षन वेध कार्यकर्ता पुरस्कर्तेना शॉल श्रीफळ व सम्मान चिन्ह प्रदान करून शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
निसर्गाची समर्थन लढा देणारी स्त्री अंधश्रद्धा मुळे दुर्बल बनली

निसर्गाची समर्थन लढा देणारी स्त्री अंधश्रद्धा मुळे दुर्बल बनली

  • प्रज्ञा राजूरवाडे
चिमूर/तालुका प्रतिनिधी
निसर्गाने स्त्रीला निर्मितीक्षम बनविले आहे व त्या आंतरिक क्षमतांचा उपयोग तिने जेव्हा तिला संधी मिळाली तेव्हा तिने या संधीचा उपयोग करून आपले कर्तृत्व दाखवून या राष्ट्राची उध्दारशक्ती बनवली परंतु इथल्या काही मनूप्रणित व्यवस्थेने तिचे अस्तित्व कवडीमोलाने केले व तिला दिनदुबळे बनविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महिलांची उन्नती व्हावी यासाठी महिलांचे सम्मेलन घडवून आणावे, त्यांनी आपले विचार, सुख, दुःख मांडावेत त्यांची वाचनालये असावीत जातीभेद, आंध्रश्रद्धा दूर सारून त्या संघटीत व्हाव्यात यासाठी सर्व सोयी पुरुषाकरिता स्त्रियांसाठी सर्व व्यथा हे कोण बोलते शास्त्र आता द्यावे हात झुगारोनी असा इशारा राष्ट्रसंतांनी दिला होता. महिलांचे सबलीकरण व ग्रामगीता या विषयावर श्री गुरुदेव सेवा मंडळ चिमूर क्रांतिभूमी येथे राष्ट्रसंतच्या ४९ व्या पुण्यतिथी निमित्य महिलांच्या सबलीकरणाची अजूनही आवश्यकता का आहे ? हे मांडत असतांना बार्टी समतादूत प्रज्ञा राजूरवाडे बोलत होत्या.
     तसेच या कार्यक्रमाचे उदघाटक चिमूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा शिल्पाताई राचलवार तसेच अध्यक्ष नेहरू कनिष्ठ महिविध्यलय चिमूरच्या प्राचार्य श्रीमती रेखाताई जोशीराव मार्गदर्शक म्हणून नगरसेविका छायाताई कंचर्लावार, डॉ शोभाताई नवले, वेणूताई सहारे, रेखाताई शिंगरे तसेच आदी मंचावर उपस्थित होते.
     तसेच प्रज्ञा राजूरवाडे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले कि, आजही स्त्री भाकडकथा, खोट्या काल्पनिक, निराधार, आंध्रश्रद्धा व जातीयतेच्या मानसिकतेतून बाहेर निघाली नाही म्हणून तिच्या या अज्ञानामुळे तिच्या प्रगतीपथावर असलेली पावले फारशी पुढे न जात जगाच्या जागी सुटून बसली आहे असे प्रकारचे मार्गदर्शन या ठिकाणी " बार्टी समतादूत प्रज्ञा राजूरवाडे बोलत होते."
लेखनस्पर्धेचा निकाल जाहीर

लेखनस्पर्धेचा निकाल जाहीर

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ यांच्यावतिने मागील ४ वर्षापासून विश्वस्तरीय लेखनस्पर्धा यशस्वीरित्या आयोजित केली जात आहे. विश्वस्तरीय लेखनस्पर्धेचे यंदाचे हे चवथे वर्ष.
        अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम म्हणून ०३ सप्टेंबर २०१७ ते ०२ ऑक्टोबर २०१७ या कालावधीत www.baliraja.com या संकेतस्थळावर विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१७ जाहिर करून यशस्वीरित्या पार पाडली होती. 
       शेतीशी निगडीत विषय साहित्यामध्ये हाताळणार्‍यांची संख्याच उणीपुरी असल्याने आणि लेखनाचा विषय "शेतकरी आत्महत्त्या" असा जटिल असल्याने  या स्पर्धेला कितपत प्रतिसाद मिळेल या विषयीची धाकधूक मनात होतीच. परंतु यंदा उदंड प्रतिसाद मिळाला आणि देशविदेशातून मराठी भाषिकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला, ही बाब खचितच आनंद देणारी ठरली. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिक्षक मंडळाने परिश्रम घेऊन ही स्पर्धा यशस्वी करून दाखविली, त्याबद्दल अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ त्यांची अत्यंत ऋणी आहे.
         लेखनस्पर्धा परिक्षक मंडळ : बदीऊज्जमा बिराजदार (सोलापूर), प्रा. मनिषा रिठे (वर्धा), प्रा. भुजंग मुटे (नागपूर), श्री राजीव जावळे (जालना), प्रा. अविनाश अवचट (नागपूर), श्री हेमंत वकारे (वर्धा), श्री बाबासाहेब अवचार (परभणी)
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१७ : निकाल
लेखनस्पर्धेचा विषय : शेतकरी आत्महत्त्या
 
 
अनु
लेखनविभाग
 
लेखक/कवी
जिल्हा
लेखाचे/कवितेचे शिर्षक
कथा
प्रथम
क्रमांक
गंगाधर मुटे 
वर्धा
कथा
व्दितिय
क्रमांक
अर्चना लाड
सांगली
कथा
प्रथम
क्रमांक
सिद्धेश्वर इंगोले
बीड 
अनुभवकथन
प्रथम
क्रमांक
रामेश्वर अवचार
परभणी
ललितलेख 
प्रथम 
क्रमांक
डॉ विशाल इंगोले
बुलडाणा
ललितलेख
व्दितिय
क्रमांक
विनिता माने पिसाळ
पुणे
ललितलेख
तृतीय 
क्रमांक
संयोगिता चव्हाण
सांगली 
वैचारिक लेख
प्रथम
क्रमांक
रवींद्र कामठे
पुणे
वैचारिक लेख
व्दितिय
क्रमांक
पंकज गायकवाड
पुणे 
१०
वैचारिक लेख
तृतिय
क्रमांक
किरण डोंगरदिवे
बुलडाणा
११
पोवाडा
प्रथम
क्रमांक
रंगनाथ तळवटकर
वर्धा
१२
गझल
प्रथम
क्रमांक
संध्या पाटील
सातारा
१३
गझल
व्दितिय 
क्रमांक
निलेश कवडे
अकोला
१४
गझल
तृतिय
क्रमांक
आत्माराम जाधव
परभणी
१५
गीतरचना
प्रथम
क्रमांक
रविपाल भारशंकर
वर्धा
१६
गीतरचना
व्दितिय
क्रमांक
महेश देसले
नाशिक
१७
गीतरचना
तृतिय
क्रमांक
चित्रा कहाते
नागपूर
१८
छंदमुक्त
कविता
प्रथम
क्रमांक
रवींद्र दळवी
नासिक
१९
छंदमुक्त
कविता
व्दितिय 
क्रमांक
केशव कुकडे
बीड
२०
छंदमुक्त
कविता
तृतिय
क्रमांक
राजेश जौंजाळ
वर्धा
२१
छंदोबद्ध
कविता
प्रथम
क्रमांक
संदीप गुजराथी
नासिक
२२
छंदोबद्ध
कविता
व्दितिय
क्रमांक
रावसाहेब जाधव
नासिक
२३
छंदोबद्ध
कविता
तृतिय
क्रमांक
प्रदीप थूल
बीड
२४
पद्यकविता
प्रथम
क्रमांक
रमेश बुरबुरे
यवतमाळ
२५
पद्यकविता
व्दितिय 
क्रमांक
के.एन.साळुंके
धुळे
२६
पद्यकविता
तृतिय
क्रमांक
सुशांत बाराहाते
वर्धा
२७
कविता
प्रथम
क्रमांक
धीरजकुमार ताकसांडे
वर्धा
२८
कविता
व्दितिय
क्रमांक
डॉ. शरयू शहा
मुंबई
२९
कविता
तृतिय
क्रमांक
अनिकेत देशमुख
अकोला
३०
अभंग
प्रथम
क्रमांक
श्रीकांत धोटे
वर्धा
३१
कविता
उत्तेजनार्थ
स्वरुपाराणी उबाळे
डोबिंवली
३२
कविता
उत्तेजनार्थ
किशोर झोटे
औरंगाबाद
 
३३
वैचारिक
लेख
उत्तेजनार्थ
रमेश खांडेभराड
जालना
शेतकरी आत्महत्त्या : कारणे आणि उपाय






 
 
 
 
 
१. ३१ जानेवारी २०१८ मध्ये आयोजित मुंबई येथे आयोजित चवथ्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात पारितोषिक वितरण केले जाईल.