काव्यशिल्प Digital Media: Nagpur

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label Nagpur. Show all posts
Showing posts with label Nagpur. Show all posts

Monday, January 28, 2019

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी  विदर्भातील १५७१ शेतकऱ्यांचे  अर्ज

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी विदर्भातील १५७१ शेतकऱ्यांचे अर्ज

वाशीम जिल्ह्यातून सार्वधिक अर्ज 

  भंडारा जिल्ह्यातून २०० अर्ज 


नागपूर/प्रतिनिधी:

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत सहभागी होण्यासाठी विदर्भातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऑनलाईन अर्ज केले आहेत. आज दिनांक २८ जानेवारीपर्यंत नागपूर जिल्ह्यातील ७९ तर वर्धा जिल्ह्यातील ६७ शेतकऱ्यांसह राज्यातील ७,२०४  शेतकऱ्यांनी  मागील दहा दिवसात अर्ज केले आहेत. नागपूर परिक्षेत्रात येणाऱ्या सर्व जिल्ह्यात १,५७१   शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. 

महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार वाशीम जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ६५६ अर्ज महावितरणकडे मागील दहा दिवसात करण्यात आले आहेत. त्यानंतर भंडारा जिल्ह्यातील १९३ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. मार्च- २०१९ पर्यन्त आपल्या शेतात सौर कृषी पंप लागावा यासाठी शेतकरी ऑनलाईन अर्ज करतो आहे किंवा महावितरणच्या जवळच्या कार्यालयात माहितीसाठी जातो आहे. 

शेतकऱ्यांना सौर कृषिपंपासाठी अर्ज करणे सोयीचे व्हावे व वीजजोडणीच्या प्रक्रियेत पारदर्शकता असावी, या उद्देशाने महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईटवर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. या पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना सौर कृषिपंपासाठी अर्ज करणे, अर्जासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय या वेबपोर्टलवर मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेची संपूर्ण माहिती, ऑनलाईनद्वारे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सौर कृषिपंपाची क्षमता ठरविणे, अर्जाची सद्यस्थिती बघणे आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सोबतच शेतकरी बांधवाना या योजनेमध्ये सौर कृषिपंपासाठी कंत्राटदार निवडण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली असून शेतकरी या पोर्टलद्वारे कंत्राटदाराची निवड करून त्या कंत्राटदाराकडून सौर कृषीपंप बसवून घेऊ शकतात.

या सौर कृषीपंप योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार असून अपारंपारिक ऊर्जेमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. तसेच शेतकऱ्यांचा वीजबिलांचा खर्च वाचेल. शेतकऱ्यांच्या शेतात दोन एलईडी बल्ब, मोबाईल व बॅटरी चार्जिंगकरिता ईलेक्ट्रीक सॉकेट बसवून देण्यात येणार असल्यामुळे शेतातील वस्तीमध्ये शेतकऱ्यांना राहण्याची सुविधा उपलब्ध होणार असून हिंस्त्र पशू, प्राण्यांपासून स्वत:चे संरक्षण करणे शक्य होईल. अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली. 

 

Tuesday, January 08, 2019

Manisha Malu Verma awarded

Manisha Malu Verma awarded


“Champion of Change” at hands of
Hon. Vice President of India Shri. M Venkaiah Naidu

Manisha Malu Verma, social activist and wedding planner from the city was chosen as one of the awardees for ushering in change in their district under the “Transformation of Aspirational District “programme, a brain child of the NITI Aayog, which aims to quickly and effectively bring about transformational changes in the chosen 115 districts of India.
Manisha received this award for her work in the field of Children Education, hygiene, cleanliness and upliftment of the less fortunate. The award selection jury was led by Former Chief Justice Shri K.G. Balakrishnan and comprised of Justice Gyan Sudha Mishra, former Supreme Court Judge, Dr. S Y Quraishi, former Chief Election Commissioner of India; Sonal Mansingh, Padma Vibhushan; Anil Kumar Sinha, Former CBI director; Pahlaj Nihalani, former Chairman of Central Board of Film Certification; Yaduvendra Mathur, Additional Secretary, NITI Aayog and President, Aditya Birla Group, Amit Bajaj.
35 prominent citizens including senior political leaders, bureaucrat and social activists from around the country were selected for this prestigious award. The Awards were presented at a glittering ceremony at the Vigyan Bhavan at New Delhi on 26th Dec at the hands of Honourable Vice President
Shri. M Venkaiah Naidu in the presence of all the jury members and dignitaries including film maker Shri. Subhash Ghai, Bollywood Actor Govinda, CEO of Power Corridors Shri. Nandan Jha, Dr. Ved Prakash Vedik, Veteran Journalist and other dignitaries. The other prominent awardees included Shri. N Biren Singh, Hon. CM of Manipur, Union Minister of State for Tribal Affairs, Sudarshan Bhaga, Member of Parliament, Nishikant Dubey, Superintendent of Police, Commissioners of Police and many other known personalities from their different facets of life and region.

This award was bestowed upon Manisha by the “Interactive Forum on Indian Economy”. Manisha received this prestigious award at the hands of Honourable Vice President of India Shri. M. Venkaiah Naidu. The Vice President of India, Shri. M. Venkaiah Naidu said, “Ultimate aim of good governance and reforms was to empower the last man in the queue and providing a say for such persons in the process of development should be the ultimate aim of governance.”

Wednesday, December 12, 2018

नागपूरच्या 11000  ग्राहकांचा  पुरवठा  केला  महावितरणने  खंडित

नागपूरच्या 11000 ग्राहकांचा पुरवठा केला महावितरणने खंडित

विजबिलांचा नियमित भरणा करण्याचे महावितरणचे आवाहन
नागपूर/प्रतिनिधी:

 पाठपुरावा करुनही वीजबिलांचा भरणा करण्यास टाळाटाळ करणा-या महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रातील तब्बल 11 हजार 18 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून ग्राहकांनी वीजबिलांचा नियमितपणे भरणा करून वीजपुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रात तीनशे रुपये व त्यावरील अधिक थकबाकी असलेले घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीतील तब्बल 1 लाख 62 हजार 133 वीज ग्राहकांकडे सुमारे 81 कोटी 14 लाख रुपयांची थकबाकी असून यापेकी बहुतांश ग्राहकांनी दोन महिन्यांपासून त्यांच्या वीजबिलांचा भरणा केलेला नाही, महावितरणने सप्टेबर महिन्यापासून संपुर्ण राज्यभर सुरु केलेल्या केंद्रीकृत बिलींग प्रणालीमुळे बिलींग़ची संपुर्ण प्रक्रीया महावितरणच्या सांघिक कार्यालयामार्फ़त राबविण्यात येत असून थकबाकीदार ग्राहकांवरही सांघिक कार्यालयाकडून विशेष लक्ष देण्यात येत आहे. थकबाकीचा वाढता बोझा लक्षात घेता महावितरणला आपला आर्थिक गाढा खेचणे तारेवरची कसरत ठरत आहे, वीज खरेदी, कर्मचा-यांचे वेतन, विविध विकास कामांसाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज देण्यात महावितरणची बहुतांश रक्क्म खर्च होत असल्याने देखभाल व दुरुस्ती यासाठी महावितरणकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने शंभर टक्के थकबाकी वसुलीसाठी महावितरण आग्रही आहे. ही वसूली करण्यासाठी नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या संपुर्ण विदर्भात थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची व्यापक मोहीम हाती घेण्यात आली असून या मोहीमेत आतापर्यंत 7865 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. शुन्य थकबाकीचे लक्ष्य निर्धारीत करीत ही मोहीम दिवसेंदिवस अधिक आक्रमक करण्याच्या स्पष्ट सुचना प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी सर्व क्षेत्रिय अधिका-यांना दिल्या आहेत.

महावितरणच्या या विशेष मोहिमेत आत्तापर्यंत एकूण 1 लाख 62 हजार 133 थकबाकीदार वीज ग्राहकांपैकी 46 हजार 162 ग्राहकांकडून 15 कोटी 5 लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे तर 7865 थकबाकीदारांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात आणि 3153 थकबाकीदारांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला असून उर्वरीत थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे काम सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरु आहे. पाच हजारावरील आणि एक हजारावरील थकबाकी असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यास प्राधान्य देत महावितरणने ही मोहीमेची अंमलबजावणी अधिक आक्रमकपणे राबविणे सुरु केले असून ग्राहकांनी नियमितपणे वीजबिलांचा भरणा करीत सहकार्य करावे आणि वीजपुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई टाळण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

वीजबिल भरण्याचे अनेक पर्याय आणि भरघोस सवलत

विदर्भातील बहुतांश ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली असल्याने वीजबिलांची अद्ययावत माहिती ग्राहकांना एसएमएसच्या माध्यमातून नियमितपणे उपलब्ध करून दिल्या जात आहे. हा एसएमएस वीज भरणा केंद्रावर दाखवून ग्राहकाला त्याच्या बिलाचा भरणा करणे शक्य असून एसएमएसच्या आधारे बील स्विकृतीस नकार देणा-या बील भरणा केंद्राची तक्रार नजीकच्या महावितरण कार्यालयाकडे करण्याची मुभाही ग्राहकाला देण्यात आली असून, त्यांच्या तक्रारीची शहानिशा करून संबंधित बील भरणा केंद्रांवर कारवाई करण्यात येत असल्याने आता वीजबिल घरी येण्याची वाट न बघता बिल भरणा केंद्रावर एसएमएस दाखवून किंवा ऑनलाईन पद्धतीनेही वीजबिल भरणा करण्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध आहे, याशिवाय ‘गो ग्रीन’ च्या माध्यमातून कागदी बिलाएवजी ईमेल च्या माध्यमातून वीज बिल स्वीकारण्याच्या पर्याय स्विकारल्यास ग्राहकाला दहा रुपयांची सवलतही देण्यात येत आहे, याशिवाय एसएमएस मिळताच वीजबिलाचा भरणा केल्यास ग्राहकाला प्रॉम्प्ट पेमेंट्च्या माध्यमातूनही सवलत देण्यात येत असल्याने ग्राहकांनी उपलब्ध पर्यायांचा लाभ घेत वीजबिलाचा भरणा करण्याचे आवाहनही महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

Sunday, December 09, 2018

दवलामेटीत रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी

दवलामेटीत रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी

वाडी ( नागपूर ) / अरूण कराळे 

मेडिट्रिना मल्टीस्पेशालिटी सिटी लाईन हॉस्पीटल येथे सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत आरोग्य शिबिरात दवलामेटीवासियांनी गर्दी केली होती. याप्रसंगी सरपंच आनंदाताई कंपनीचोर, उपसरपंच गजानन रामेकर, ग्रामविकास अधिकारी विष्णू पोटभरे तसेच ग्रा. पं. सदस्य प्रभा थोरात ,प्रशांत केवटे यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मेणबत्ती अगरबत्ती लावून त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आरोग्य शिबिराला सुरुवात करण्यात आली. आरोग्य शिबिरात हृदय रोग तपासणी व मार्गदर्शन, रक्त तपासणी, शुगर, डायबीटीज, स्त्रि रोग तज्ज्ञांकडून स्त्रीयांना मार्गदर्शन व सल्ला तसेच रक्तदान शिबिर घेण्यात आले. ग्रामविकास अधिकारी विष्णू पोटभरे यांनी रक्तदानाला सुरुवात केली. राज शेंडे, राम घडोले अशा १०२ लोकांनी रक्तदान केले आहे. याप्रसंगी माजी सरपंच संजय कपनीचोर, भीमराव मोटघरे, यादव गडपाल, प्रमोद केवटे, डॉ. उपेन्द्र कुमार, डॉ .समीर पालतेवार, डॉ .शिरीष जोशी तसेच परिचारिका उपस्थित होत्या.
नागपुरात ट्रेलर-स्कुल बसची धडक:५० विद्यार्थी किरकोळ जखमी 

नागपुरात ट्रेलर-स्कुल बसची धडक:५० विद्यार्थी किरकोळ जखमी 

 ट्रेलर चालकाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला

अरुण कराळे/वाडी (नागपूर) : - 
पोलीस स्टेशन वाडी अंतर्गत येणाऱ्या वडधामना येथील  भारत गर परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर स्कुल-बस व ट्रेलर मध्ये जोरदार  धडक झाली असता ट्रेलर चालकाच्या प्रसंगावधाने मोठा अनर्थ टळून ५० विद्यार्थ्यांचे प्राण वाचले.

प्राप्त माहितीनुसार काटोल तालुक्यातील पारडसिंगा येथील  स्कुल ऑफ स्कॉलर शाळेची शैक्षणिक सहल वडधामना येथील  हायलँड पार्क येथे स्वतःच्या चार बसेस मध्ये एकूण १७०  विद्यार्थी व २४ शिक्षक व शिक्षकेत्तर  कर्मचाऱ्यासह ठरल्याप्रमाणे निघाली असता तीन बसेस समोर निघून सहलीच्या नियोजित स्थळी पोहचल्या परंतु बस क्रमांक  एम . एच .३१ एफ सी ०६९५  मागे होती बस चालक सुरेंद्र महादेव टेकाडे वय ५२ राहणार , सदमा नगर , काटोल याला सहलीचे नेमके स्थळ माहीत नसल्याने तो वडधामना ओलांडून समोर आल्याचे लक्षात येताच रस्ता दुभाजकाच्या गॅपमधून विरुद्ध बाजूने( राँग साईड)बस वळवीत असतांनायाच सुमारास अमरावती कडून नागपूरकडे येणाऱ्या ट्रेलर क्रंमांक एन . एल .०२ एल २६७४ भारी मेट्रोच्या कामाचे गर्डर क्र.एस २ / १o घेऊन नागपूरच्या दिशेने येत असतांना बस विरुद्ध दिशेनी येत असल्याचे ट्रेलर चालक सुखसिंग घरदेवसिंग वय ३३ राहणार  फिरोजपुर (पंजाब ) यांच्या लक्षात येताच परिस्थितीचे गांभीर्य क्षणात लक्षात घेऊन स्कुल बस सोबत होणारी धडक वाचविण्याकरिता रस्त्याच्या बाजूला असलेल्या गायत्री ट्रेडर्सच्या दुकानाकडे ट्रेलर वळवून होणारा मोठा अनर्थ प्रसंगावधाने टाळला.

बसमध्ये ५o विद्यार्थ्यासह ६ शिक्षक सहभागी होते. ट्रेलरचे कॅबीन पूर्णपणे तूटल्या गेली असून गायत्री ट्रेडर्सची सरंक्षण भिंत तुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत .तर बसमधील अनेक विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.नियमाप्रमाणे शाळेची सहल काढतांना शिक्षण विभागाची तसेच आवश्यक बाबीची पूर्तता केली काय?यासंदर्भात माहिती घेतली असता परवानगी घेतली असे फोनवर सांगितले तर सहलप्रमुख रवींद्र भामकर यांचेशी संपर्क केला असता त्यांनी समाधान कारक व्यवस्थित माहिती सांगीतली नाही.
वाडी पोलिसांनी बस चालकांवर गुन्हा दाखल करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनात पुढील  तपास करीत आहे.

Saturday, December 01, 2018

मराठा आरक्षण निर्णयाचे स्वागत:वाडीत भाजपाचा जल्लोष

मराठा आरक्षण निर्णयाचे स्वागत:वाडीत भाजपाचा जल्लोष

फुटले फटाके , उधळला गुलाल
वाडी /अरूण कराळे:

महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षणाचा कायदा एकमताने मंजुर केला आहे त्या निमीत्याने भाजपा वाडी मंडळ , भाजपा वाडी शहर व भाजपा युवा मोर्चा यांच्या संयुक्त सहकार्याने आदर्शवाडीतील छत्रपत्री शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून , गुलाल उधळून मिठाई वाटून जल्लोष साजरा केला . सर्वप्रथम छत्रपत्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून हारार्पण केले . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सरकारचे अभिनंदन केले . यावेळी नगराध्यक्ष प्रेम झाडे,पुरुषोत्तम रागीट, माजी उपनगराध्यक्ष नरेश चरडे,पं .स. उपसभापती सुजित नितनवरे,भाजप वाडी मंडळ अध्यक्ष आनंदबाबू कदम, भाजपावाडी अध्यक्ष तथा नगरसेवक केशव बांदरे , भाजपा जिल्हामहामंत्री तथा नगरसेवक दिनेश कोचे ,आरोग्य सभापती शालिनी रागीट, राकेश मिश्रा,मनोज रागीट, प्रकाश जुनघरे , संजय पिसे ,जर्नाधन भगत, मनोज मेश्राम,कमलाकर इंगळे,राकेश चिल्लोरे ,गणेश राठोड,प्रकाश डवरे,मधुकर बर्वे,राजेश शेळके,यश शेळके,संजय पिसे,मंगेश खोरगडे,बबन हिरुडकर,युवा मोर्चा अध्यक्ष महेश रागीट,ईशांत राऊत, नितीन फटिंग,राकेश ठाकरे,अमोल भोयर, महिला आघाडीचे महामंत्री राजूताई भोले ,उर्मिला चौरसिया, पुष्पा वरगंटीवार ,प्रमिला नाईकवाडे ,प्रभा खोब्रागडे,पुष्पा पारधी, पार्वती मोरया,नंदा कदम , श्रीमती सोनवाने आदी प्रामुख्याने उपस्थित होते.मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी सुद्धा धाडसी निर्णय घेतला त्याबद्दल युवासेनेतर्फे महाराष्ट्र शासनाचे युवासेना जिल्हाप्रमुख हर्षल काकडे यांनी युवासेनेच्या वतीने आनंदोत्सव साजरा केला.
जाहिरात 

Wednesday, November 28, 2018

युवक काँग्रेसचा पाण्यासाठी मोर्चा

युवक काँग्रेसचा पाण्यासाठी मोर्चा

                    वाडी नगर परीषदेवर मटका फोड आंदोलन

भीषण पाणीटंचाईच्या  विरोधात  नागरिकांचा आक्रोश
वाडी / अरूण कराळे :

येथील डॉ .आंबेडकर नगर मध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात  टंचाई निर्माण झाली असून पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी शेकडो महीला व पुरुष हिंगणा विधान सभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अश्विन बैस यांच्या नेतृत्वात बुधवार २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ११ वाजता वाडी नगर परिषद वर हल्लाबोल केला . या आंदोलनाला पिपल्स रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया व भारीप बहुजन महासंघ यांनी  पाठींबा दिला होता .वाडी नगरपरिषद क्षेत्रातील डॉ .आंबेडकर नगर मध्ये  सामान्य व गोरगरीब कुटूंब राहत असून बहुतेकांचा व्यवसाय,मजुरी खाजगी काम करणे  आहे .१५ दिवसांपासून या परिसरात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. आंदोलना दरम्यान नागरीकांनी लाठी काठी खायेंगे , पाणी लेके जायेंगे  अशा प्रकारचे नारे देऊन परिसर दणाणून सोडला . काही  महीला मटका घेऊन आल्या होत्या त्यांनी  प्रशासनाविरोधात मटका फोडून निषेध केला . अनेक दिवसांपासून येथील नागरीकांच्या घरी  पाणी येथे बंद झाले आहे कामधंदे सोडून पाण्यासाठी त्यांना वणवण भटकावे लागत आहे.पंधरा दिवसापासून पाण्याची टंचाई असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून वाडी  नगर परिषद  व महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या विरोधात असंतोष पसरलेला दिसून आला . या अगोदर  नगरपरिषद प्रशासनाला पाण्याच्या टंचाई बद्दल माहीती देऊनही कुठलीच उपाययोजना केली नसल्याचे आंदोलनकर्त्यचे म्हणणे होते . मुख्याध्याधिकारी राजेश भगत यांना हिंगणा विधान सभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अश्विन बैस,पिरीपाचे तालुका अध्यक्ष  कंटीराम तागडे भारीप बहुजन महासंघाचे जिल्हा सल्लागार राजेश जंगले,कांग्रेसचे निर्मला नागपुरकर,गौतम तिरपुडे,किशोर नागपुरकर,भीमराव कांबले,अशोक गडलिंगे,वंदना कांबले,किरण पवार,सिमा कांबले,गीता उके,प्यारेलाल पवार आदींनी निवेदन देऊन समस्या निकाली काढण्याची मागणी दिली .आदोंलनादरम्यान वाडीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या नेतृत्वात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला . याविषयी मुख्याधिकारी राजेश भगत यांना विचारले असता त्यांनी सांगीतले की वाडीतील पाणी टंचाईच्या समस्येवर शुक्रवार ३० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या अधिकाऱ्या सोबत  बैठक घेण्यात येईल व पाण्याच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे .

Thursday, November 22, 2018

महावितरणचे डॉ.मुरहरी केळे यांची त्रिपुरा विद्युत मंडळाच्या अध्यक्षपदी निवड

महावितरणचे डॉ.मुरहरी केळे यांची त्रिपुरा विद्युत मंडळाच्या अध्यक्षपदी निवड

नागपूर/प्रतिनिधी:
महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे यांची त्रिपुरा राज्याच्या विदयुत मंडळ अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकपदी निवड झाली आहे. त्यांची निवड ही महावितरणच्या कार्याची दखल देशपातळीवर घेतल्या जात असल्याची पावती आहे.
अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणुन डॉ. केळे यांनी आपल्या साडेचार महिन्याच्या कार्यकाळामध्ये वितरण पेट्यांची झाकणे लावण्याची मोहीम, स्वच्छता मोहीम, शुद्ध व स्वच्छ पाण्यासाठी शुद्धीकरण यंत्रणेचे (आर.वो.) कार्यान्वयन, लिफ्ट सुविधा, केंद्रीय देयक प्रणाली कार्यशाळा, एच.व्ही.डी.एस. योजनेच्या निविदा प्रकियेमध्ये गतिमानता, खेळाडूना प्रोत्साहन, परिमंडळाचे नाट्य प्रादेशिक स्पर्धेत प्रथम, ग्राहक जनमित्र व अधिका-यांसोबत थेट संवाद अशा अनेक आघाड्यांवर यश संपादीत केले. त्यांची निवड ही महावितरणच्या कार्याचा गौरव आहे, इतर राज्यामध्ये सेवा करण्याची संधी ही महावितरणमुळेच मिळत असून, ऊर्जा क्षेत्राच्या माध्यमातून महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि आता त्रिपुरा येथे सुद्धा शेवटच्या घटकापर्यंत उच्च दर्जाची सेवा देण्यासाठी प्रयत्नरत राहू अशी ग्वाही डॉ. मुरहरी केळे यांनी दिली आहे.
पुर्वाश्रमीच्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात कनिष्ठ अभियंता पदापासून अकोला परिमंडलाच्या मुख्य अभियंतापदी रुजू होण्यापूर्वी ते मध्यप्रदेश पश्चिम क्षेत्र विद्युत वितरण कंपनी येथे संचालक (तांत्रिक) पदावर कार्यरत होते. नागपूर शहर मंडलाच्या अधीक्षक्पदी कार्यरत असतांना त्यांनी वीज वितरण क्षेत्रात नागपूर शहारात अनेक नवनवीन योजना यशस्वीपणे राबविल्या. याशिवाय तथा टोरॅट पॉवर, भिवंडी येथेही त्यांनी आपल्या विशेष कार्याची चुणूक दाखविली आहे. महावितरणच्या मुंबई येथील मुख्यालयात वितरण व वाणिज्यिक विभागात मुख्य अभियंता म्हणून त्यांचे कार्य कौतूकास्पद राहिले आहे. सोबतच कार्यकारी संचालक (मानव संसाधन) पदाचा प्रभार सुद्धा त्यांनी यशस्वीरित्या सांभाळला आहे. वीज वितरण फ़्रॅन्चाइज़ी या विषयावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने त्यांना आचार्य पदवी बहाल केली असून वितरण फ़्रॅन्चाइज़ी विषयावरील त्यांच्या लेखनाचा वापर अनेक ठिकाणो संदर्भ आणि मार्गदर्शक म्हणून वापरल्या जात आहेत. एक यशस्वी अभियंता असलेले डॉ. मुरहरी केळे हे अनेक सामाजिक आणि साहित्यीक संस्थांशी प्रत्यक्ष निगडीत असून त्यांनी मराठी चित्रपटात अभिनय सुद्धा केला आहे. डॉ. केळे यांची ५ मराठी व २ इंग्रजी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय स्तरावर अनेक रिसर्च पेपर्सही प्रसिध्द झाली आहेत, यात प्रामुख्याने हॉवर्ड विद्यापीठ बोस्टन येथे ‘स्मार्ट मीटर’ या विषयावरील पेपरचा समावेश आहे. संत साहित्याचे गाढे अभ्यासक असलेल्या डॉ. केळे यांचे अनेक वृत्तपत्र आणि नियतकालिकांमधून विविध विषयांवर शंभरहून अधिक लेख प्रकाशित झाले आहेत. सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक व प्रशासकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मध्य प्रदेश शासनातर्फ़े ई-गव्हर्नन्स पुरस्कार, इंडीयन चेंबर ऑफ़ कॉमर्सतर्फ़े परफ़ोर्मन्स इम्र्पूवमेंट, मराठवाडा विकास संघातर्फ़े मराठवाडा भुषण पुरस्कारासमवेत अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
डॉ.ॲड.अंजली साळवे विटणकर यांना ‘समाजरत्न’ पुरस्कार

डॉ.ॲड.अंजली साळवे विटणकर यांना ‘समाजरत्न’ पुरस्कार

नागपूर/प्रतिनिधी:

डॉ. ॲड. अंजली साळवे विटणकर यांना राष्ट्रीय झिरो माइल 'समाजरत्न' पुरस्कार प्रदान करतांना डॉ. सुधीर तारे, श्रीमती गीता जैन, ॲड. डी एम काळे, डॉ. समीर पालतेवार.
महिला व बाल हक्क क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी डॉ. ॲड. अंजली साळवे विटणकर यांना झिरो माईल फाउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फ़े तर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठीत राष्ट्रीय झिरो माइल 'समाजरत्न' पुरस्काराने गौरवण्यात आले. 
नागपूर जिल्हा बाल कल्याण समितीच्या सदस्य असलेल्या डॉ. ॲड. अंजली साळवे विटणकर ह्या मागिल अनेक वर्षांपासून महिला व बाल हक्क क्षेत्रात कार्यरत असून केंद्र शासनाच्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी समुपदेशिका आहेत. यावेळी त्यांनी अनिवासी भारतीय महिलांवर होणा-या अत्याचाराची अनेक प्रकरणे यशस्वीरित्या हाताळली आहेत. याशिवाय अनेक वृत्तपत्रांतून महिला व बाल हक्कांविषयी नियमित लिखाण व अनेक सामाजिक तसेच शासकीय संस्थांमार्फ़त महिला व बाल कल्याण आणि त्यांचे हक्क याविषयी जनजागृतीचे कार्य निरंतरपणे चालविले आहे. त्यांच्या ‘एक्सप्लॉयटेशन ऑफ़ चिल्ड्रेन ॲन्ड ह्युमन राईट्स परस्पेक्टीव विथ स्पेशल रेफ़रन्स टू सेक्शूअल एक्सप्लॉयटेशन ऑफ़ चिल्ड्रेअन इन इंडीया’ या शोधप्रबंधाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. नागपूर विद्यापीठाने आचार्य पदवीही बहाल केली आहे. बालकामगार आणि मुलांवर होणा-या लैगिक शोषणाच्या अनेक प्रकरणांचा सविस्तर अभ्यास करून त्यासंबंधीत कायद्यातील त्रुट्या याशिवाय शासकीय योजना व त्यांची अंमलबजावणी आणि त्यांचा टीकात्मक अभ्यास त्यांनी यात सादर केला आहे. ग्रामिण पाणी पुरवठा योजना, स्वच्छ भारत अभियान, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय ग्रामिण जीवनरेखा अभियान, इंदीरा आवास योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम, एकात्मिक वॉटरशेड व्यवस्थापन योजना, राष्ट्रीय ग्रामिण पेयजल योजना, पर्यावरण संतुलीत सम्रुद्ध ग्राम योजना यासारख्या राष्ट्रीय तसेच राज्यपातळीवरील विविध मंत्रालये आणि विभागाच्या योजनांवर सामाजतज्ञ म्हणून नॅशनल लेवल मॉनिटर, संसाधन समन्वयक म्हणूनही त्यांनी उल्लेखनिय कार्य केले आहे.
नुकतेच नागपूर येथील हॉटेल हेरीटेज येथे झालेल्या झिरो माईल फ़ाऊंडेशनच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमा प्रसंगी वर्ल्ड कॉन्स्टिट्यूशन ऍण्ड पार्लमेंट (अमेरिका) चे सदस्य डॉ. सुधीर तारे, मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या माजी महापौर आणि नगरसेविका श्रीमती गीता जैन, जेष्ठ अधिवक्ता ॲड. डी एम काळे, ज्येष्ठ न्यूरोलॉजिकल सर्जन डॉ. समीर पालतेवार यांच्या हस्ते डॉ. ॲड. अंजली साळवे विटणकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. माजी राज्यमंत्री आणि जेष्ठ नेते श्री दत्ता मेघे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या कार्यक्रमाला नागपूर च्या महापौर श्रीमती नंदा जिचकार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. याप्रसंगी सामाजिक, पर्यावरण, खेळ, आरोग्य, विज्ञान, कला, साहित्य, लेखन, पत्रकारिता आणि रोजगार याक्षेत्रात विशेष योगदान दिलेल्या विविध राज्यातील व्यक्तींना गौरविण्यात आले.
यापुर्वीही डॉ. ॲड. अंजली साळवे विटणकर यांना स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीतर्फ़े ‘सामाजिक अभिसरण’ पुरस्कार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातर्फ़े ‘ग्लोरी ऑफ़ वुमनहुड’ पुरस्कार, युनिव्हर्सिटी वुमेन्स असोसिएशन, नागपूर आणि इतरही अनेक सामाजिक संस्था आणि विभागांतर्फ़े त्यांच्या या कार्याची दखल घेत गौरविण्यात आले आहे.

Tuesday, November 20, 2018

आतील अतिक्रमण जैसे थे; वाडी नगर प्रशासनाचा दुटप्पीपणा

आतील अतिक्रमण जैसे थे; वाडी नगर प्रशासनाचा दुटप्पीपणा


दुकानदारांना अतिक्रमण काढण्यासाठी नोटीस

पर्यायी जागा द्या; मगच अतिक्रमण काढा , फुटपाथधारकांची मागणी 


वाडी / अरूण कराळे
वाडी नगरपरिषदेतर्फे वाडी ते आठवा मैल पर्यंत महामार्गाच्या किनार्‍यावर शासकीय जागेवर अतिक्रमण करून विविध स्वरूपाचे व्यवसाय करणार्‍यांना अतिक्रमण हटविण्याच्या सूचना जारी केल्याने या व्यावसायिक दुकान मालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. वाडी परिसरातून जाणार्‍या अमरावती-नागपूर महामार्गाच्या दोन्ही बाजुला अनेक व्यावसायिकांनी शासकीय जागेवर अतिक्रमण करून विविध व्यवसाय सुरू करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. हळू हळू अतिक्रमण वाढत गेले.
ग्रामपंचायत काळापर्यंत त्यांना असे अतिक्रमण काढण्याचे अधिकार मर्यादीत असल्याने महामार्ग प्राधिकरण अधूनमधून महामार्ग किनार्‍यावरील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करते. मात्र काही काळानंतर स्थिती पूर्वरत होते. वाडीत २०१४ ला नगरपरिषदेची स्थापना झाली व वाडी विकासाच्या दृष्टीने नियोजन सुरू झाले. यांत महामार्गावरील अतिक्रमणामुळे विकास कामे, वाहतुकीला अडथळे आदी. बाबी निर्माण होत असल्याचे निदर्शनात आले. यापूर्वी सब्जी मार्केटमधील विद्युत डी.पी.ला मध्यरात्री लागलेल्या आगीत तेथील रस्त्यावर थाटलेले दुकाने जळून खाक झाली होती. त्यामुळे ही बाब नगर परिषदच्या विचाराधीन होतीच.
अखेर नगर परिषद प्रशासनाने नगरपरीषद ला प्राप्त नगरपालिका अधिकार अधिनियम १९६५ कलम १७९, १८० , १८१ चा वापर करीत वाडी ते आठवा मैल भागात महामार्ग किनाऱ्यावरील अतिक्रमणाचे सर्वेक्षण करण्यात आले. व नगर परिषद ने १५ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्यात डॉ. आंबेडकर समोरील महामार्गाच्या शासकीय एन. प. च्या जागेवर पक्क्या स्वरूपाचे बांधकाम करून व्यवसाय करणार्‍याना स्वतंत्र इशारा पत्र जारी करून ३ दिवसांच्या आत स्व:खर्चाने अतिक्रमण हटविण्याचे सूचित केले आहे. छोटया व्यावसायीका सोबतच मोठ्या व्यावसायिकांनी अतिक्रमणाचा सपाटा सुरू करीत आपला व्यवसाय थाटला.शहरातील ले आउट मधुन गेलेल्या नागनदीवर स्वतःच संरक्षण भिंत टाकून आपले क्षेत्रफळ वाढविले .अनेक ले आऊट मधील शासकीय जागेवर विविध धार्मिक संस्थांनी मंदिराच्या नांवावर मर्यादेपेक्षा अतिक्रमण केले असले तरी स्थानिक प्रशासन मुग गिळून बसले आहे.विविध भागातील घराच्या सरंक्षण भिंतीं रस्त्यावर आलेल्या आहेत .काहींनी तर रस्त्यावरच अतिक्रमण केले असताना स्थानिक प्रशासनाच्या नजरेत कसे येत नाही.यासंदर्भात कुठलीही कार्यवाही करीत नसून छोटे-मोठे व्यवसाय करून आपल्या संसाराचा उदरनिर्वाह करणाऱ्या छोट्या दुकांदाराना अतिक्रमण काढण्यासाठी नोटिसा पाठवून बेरोजगार करणार आहेत काय? ही कार्यवाही करण्यापूर्वी या व्यावसायिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून दयावी,तसेच शहरातील अतिक्रमण धारकांवर प्रथम कार्यवाही करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे. शहराचा विकास आराखडा तयार करतांना शहरातील अतिक्रमण काढण्यासंबंधी सर्वेक्षण करण्याचा विचार केला नाही काय? वाडी शहरात अतिक्रमणाचा प्रश्न अत्यंत जटिल असून तो सर्वप्रथम सोडविणे गरजेचे असताना प्रशासनाचे गुडघे कुठे टेकले,ठोस कार्यवाही का होत नाही,कुणाच्या दबावाखाली कोणतीही ठोस कार्यवाही करतांना प्रशासन हतबल होते.नियमापेक्षा कोणी मोठा आहे काय,शासकीय आदेशाचे पालन का होत नाही?असे अनेक प्रश्न स्थानीक नागरीकांच्या मनात निर्माण होऊन कर्तव्यदक्ष,अभ्यासू शासनाचे विश्वस्त शहराचा विकासात्मक दृष्टिकोन ठेऊन काम करणारे कार्यरत मुख्याधिकारी यांच्या कार्याप्रणालीवर शंका उत्पन्न होऊ लागल्या आहेत तर स्थानिक लोकप्रतिनिधी काय करतात.अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यात ताळमेळ नाही काय अशा अनेक चर्चेला शहरात उधाण आले आहे.