काव्यशिल्प Digital Media: आंदोलन

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label आंदोलन. Show all posts
Showing posts with label आंदोलन. Show all posts

Thursday, October 11, 2018

सत्ता पक्षातील आमदारावर आली मुंडण आंदोलन करण्याची वेळ

सत्ता पक्षातील आमदारावर आली मुंडण आंदोलन करण्याची वेळ

सत्ता पक्षातील आमदारावर आली मुंडण करण्याची वेळ 
चंद्रपूर/प्रतिनिधी:

शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर यांनी चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना टॉवर लाईनच्या कामामुळे झालेल्या नुकसानीचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे यासाठी केले चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन...

जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांना वारंवार निवेदने दिली मात्र मंत्री महोदयांनी शेतकऱ्यांच्या या मागणीकडे लक्ष दिले नाही त्यामुळे शिवसेना सत्ता मित्रपक्ष असले तरी आंदोलन करण्याची वेळ आली आहे असे धानोरकर म्हणाले...

जोपरीयंत बळीराजाला भाव मिळणार नाही तो परियंत सरकार विरोधात बेमुदत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आमदार बाळू धानोरकर यांनी सांगितले... 

शेतकऱ्यांवर व बेरोजगारांवर अन्याय होत असेल तर आम्ही सत्तेत नाही:धानोरकर 

Sunday, July 08, 2018

पत्रकारों का जेल भरो आंदोलन

पत्रकारों का जेल भरो आंदोलन

  • 12 जुलाई को नागपुर अधिवेशन में होगा "चड्ढी-बनियान" मोर्चा

पालघर । पालघर में पत्रकारों का जेल भरो आंदोलन से सहमे पुलिसकर्मी। इस आंदोलन में सैकड़ों पत्रकारों ने सड़क पर उतर कर पुलिस प्रशासन और सरकार की लापरवाही का जमकर विरोध किया। पालघर जिला के SP मंजूनाथ शिंगे के दो तरफा रवैये की सभी पत्रकार संघो ने तीव्र निंदा की।

गत दिनों पालघर पुलिस द्वारा दो पत्रकार राम परमार व मोहम्मद हुसैन पर झूठा केस दर्ज कर उन्हें गलत तरीके से गिरफ्तार किए जाने के मामले में आज पालघर, ठाणे ग्रामीण, मुंबई सहित कई दूसरे शहरों और राज्य के पत्रकार संघो ने मिलकर एक साथ जेल भरो आंदोलन किया।

श्रमजीवी संगठना के अध्यक्ष विवेक पंडित ने इस आंदोलन का समर्थन करते हुए कहा कि साल 2017 में नए संसोधन के तहत धारा 353 में हुए उलटफेर की कड़ी निंदा की। धारा 353 के तहत पुलिस कर्मी अब अपने मनमानी को अंजाम दे रहे है क्योंकि इस धारा के तहत जमानत नही मिल पाती। पहले इस धारा के तहत ज़मानत मिल जाती थी। आगे उन्होंने कहा जी यही कारण है की 2 पत्रकार इनके शिकार हुए है। पत्रकार स्वतंत्र भारत के चौथे आधार स्तम्भ है उनकी आज़ादी कोई नही छीन सकता।

आंदोलन में शामिल हुए पत्रकारों ने बताया कि दोनों पत्रकार खबर की जानकारी हासिल करने गए थे लेकिन पालघर पुलिस के अधिकारियों को यह रास नही आ रहा था इसलिए उन्हें जानबूझकर जेल में ठूसा गया। आज इस आंदोलन का छोटा रूप पालघर पुलिस ने देखा। आगे इस आंदोलन का बड़ा रूप नागपुर के अधिवेशन सत्र में दिखेगा। जब चौथा स्तंभ अपने हक़ व न्याय के लिए अर्धनग्न अवस्था मे अपना विरोध प्रदर्शन करेगा।

नागपुर अधिवेशन में 12 तारीख़ के दिन देशव्यापी आंदोलन में हजारों की संख्या में पत्रकारों के पहुँचने वाले है। महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को इस मामले को गंभीरता से लेते हुए तत्काल ड्यूटी पर मौजूद उन पुलिसकर्मियों को निलंबन करने की मांग पत्रकारों एवं संघ ने की।

12 जुलाई को नागपुर अधिवेशन में "चड्डी बनियान आंदोलन" कर विरोध प्रदर्शन की तैयारी मे सभी पत्रकार जुटे है ताकि पुलिस वालों द्वारा पत्रकारों पर IPC की धारा 353 का गलत इस्तेमाल कर उन्हें गिरफ्तार किए जाने के मामले पर रोक लग सके और पालघर पुलिस द्वारा कि गई कार्यवाई की निष्पक्ष जांच कर दोनों पत्रकारों के खिलाफ दर्ज मामलों को वापस लिया जा सके। सभी दोषी पुलिस अधिकारियों के खिलाफ कड़ी से कड़ी कार्यवाई की जाए।

पालघर जिल्हा पत्रकार समन्वय समिति के साथ संलग्न होकर इस आंदोलन में कई अखबारों एवं न्यूज़ चैनल के पत्रकार जिनमे प्रमुख रूप से प्रभाकर कुडालकर, रामाकांत पाटिल, जय सिंह, महेश गुप्ता, अरुण कुमार गुप्ता, प्रासंजीत इंगले,राजा मयाल, प्रतीक ठाकुर, शशि शर्मा, आर एस यादव, विजय गायकवाड़, बसंत अग्रहरि, प्रवीण नलावाड़े सहित सैकडों पत्रकारों ने भाग लिया।

पालघर जिल्हा पत्रकार संघ, युवा पत्रकार संघ, मराठी पत्रकार परिषद, दि प्रेस क्लब ऑफ वसई विरार, वसई विरार महानगर पत्रकार संघ, क्राइम रिपोर्ट्स वेलफेयर एसोसिएशन के साथ-साथ कई सामाजिक संगठन जिनमे प्रमुख श्रमजीवी संगठन, आदिवासी दलित सेना एवं वकीलों की बार काउंसिल ने भी जाहिर समर्थन दिया।

Friday, May 04, 2018

बीआरएसपीचे मनपासमोर आंदोलन

बीआरएसपीचे मनपासमोर आंदोलन

BRSP Manpasamora Movement | बीआरएसपीचे मनपासमोर आंदोलनचंद्रपूर/प्रतिनिधी:

 मनपाने अन्यायकारक लादलेला कर आणि शिवशंकर होंडा शोरूम संचालकांकडून सुरू असलेल्या अन्यायाविरुद्ध बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाच्या वतीने गुरुवारी आंदोलन करण्यात आले.
मनपाने अन्यायकारक कर लागू करून ग्राहकांची फसवणूक करीत आहेत. शोरूम संचालक व मनपा अधिकारी व सीएच्या संगनमताने गैरव्यवहार करण्यात आला. याचे पुरावे देऊनही मनपा अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही, असा आरोप बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाने केला आहे. आंदोलनाचे नेतृत्व विदर्भ प्रदेश महासचिव राजू झोडे, मोनल भडके यांनी केली. या आंदोलनात संजय बोधे नभिलास भगत, संजय मगर, अनुकुल शेंडे, गुरू भगत, राजु रामटेके,अशोक रामटेके, जे. डी. रामटेके, महेंद्र झाडे, चंद्रकांत माझी,विजय गोंडाने आदींसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Wednesday, March 14, 2018

रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) चे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) चे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

चंद्रपूर/प्रतिनिधी:
विविध मागण्यांना घेऊन आज रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्रिपुरा येथील क्रांतिकारक लेनिन यांच्या पुतळ्याची विटंबना, मेरठ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना व तामिळनाडू येथील पेरियार स्वामी नायकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाज कंटकांना त्वरित अटक काण्यात यावी. भीमा कोरेगाव येथे जातीय दंगल घडविणाऱ्या संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना तात्काळ अटक करावी, राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज बिनशर्त माफ करण्यात यावे, शासकीय कार्यालयातील नोकरभरती ठेकेदारी पद्धतीने बंद करण्यात यावी,पेट्रोल डिझेल वर जीएसटी लागू करण्यात यावी,वीज बिलातील विजेशिवाय इतर आकारणी कमी करण्यात यावी.चार वर्षांपासून बंद केलेली विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती पुन्हा सुरु करण्यात यावी. यासह इतर विविध मागण्यांना घेऊन आज  रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनात देशक खोब्रागडे, सत्यजित खोब्रागडे, जीवन बागडे,संतोष रामटेके यांच्या सह इतर नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी आंदोलनकर्त्या शिष्टमंडळांनी जिल्ह्याधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

Thursday, March 08, 2018

"राष्ट्रवादी"च्या महिला आक्रमक;महिला सुरक्षिततेसाठी महिलादिनी आंदोलन

"राष्ट्रवादी"च्या महिला आक्रमक;महिला सुरक्षिततेसाठी महिलादिनी आंदोलन

चंद्रपूर/प्रतिनिधी: इकीकडे जगभरात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा केला जात असतांना मात्र दुसरीकडे चंद्रपूर येथे प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौकात राष्ट्रवादी महिला काँग्रेस वतीने राज्यात महिलांवरचे वाढते अत्याचाराच्या विरोधात राज्यशासनाचा मूकपने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनमध्ये राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा  बेबीताई उईके यांच्यासह शेकडो महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
या मूक मोर्चामध्ये वेगवेगळ्या नामफलक हातात घेऊन मूकपणे राष्ट्रवादीकाँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे. यामध्ये महिलांविरोधात अत्याचार बंद करा, लगातार बलात्कार फडणवीस सरकार गुन्हेगार, असे फलक हातात घेऊन राज्यशासनाच्या निषेध करण्यात आला.दरम्यान मूक मोर्चा संपन्न झाल्यानंतर राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके म्हनाल्याकी  आज देखील महिला सुरक्षित नाहीये. महिलांवरील अत्याचारात वाढ झाली असून ३ वर्षाच्या मुलीपासून तर ६५ वर्षाच्या म्हातारीपरीयंत    
अत्याचार होतांना दिसत आहे.
 कायद्याचा कुणालाही धाक राहिलेला नाही. कारण कायद्याची अंमलबजावणी होतांना दिसत नाही. आपण राज्याचे जबाबदार गृहमंत्री या नात्याने जो कोणी  बलात्कारासारखे वाईट कृत्य करत असेल त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे अशी तरतूद कायद्यात करणे आवश्यक आहे. जर पुन्हा असा प्रकार घडला  तर  राष्ट्रवादी महिला काँग्रेस स्वतः कायदा हातात घेऊन त्या नराधमाला  जनतेसमोर शिक्षा देऊ असे देखील त्या निवेदानामार्फात म्हणाले,सदर निवेदन चंद्रपूर जिल्हाधिकारी आशितोष सलील यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे.





Thursday, March 01, 2018

  विदर्भ राज्य आंदोलन समितीचे होळीच्या पर्वावर ‘डिग्री जलाओ’ आंदोलन

विदर्भ राज्य आंदोलन समितीचे होळीच्या पर्वावर ‘डिग्री जलाओ’ आंदोलन

चंद्रपूर/प्रतिनिधी:
भाजपाने निवडणुकीच्या वेळी दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देण्याची घोषणा केली होती. मात्र, नोटाबंदी व जीएसटीनंतर दोन कोटींहून अधिक लोक बेरोजगार झाले. याच्या निषेधार्थ विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा आघाडीतर्फे होळीच्या पर्वावर आज विदर्भातील अकराही जिल्हास्तरावर तसेच तालुका स्तरावर ‘डिग्री जलाओ’ आंदोलन केले.
महाराष्ट्रात सरकारी नोकऱ्यातील १९ लाख ५० हजार पदे रिक्त आहेत. यापैकी २ लाख ५९ हजार पदे पाच वर्षात न भरल्यामुळे नेहमीसाठी निरस्त झाली आहेत. पगार द्यायला पैसे नाहीत म्हणून तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती बंद केली आहे. आता तर पुन्हा ३० टक्के नोकरीची पदे कमी केली जाणार आहेत. सरकारचे असेच धोरण राहिले तर सुशिक्षित बेरोजगार युवकांनी त्यांच्या डिग्रीचे काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे बेरोजगार युवक रस्त्यावर उतरून डिग्रीची होळी करून दोन कोटी नोकऱ्या कुठे आहेत, असा सवाल भाजपाला विचारला आहे.

Saturday, February 17, 2018

युवक काँग्रेसचे 'पकोडा' आंदोलन

युवक काँग्रेसचे 'पकोडा' आंदोलन

चंद्रपूर/प्रतिनिधी:   पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अमित शहा यांच्या बेरोजगारांना पकोडे विकण्याच्या सल्ल्याचे पडसाद चंद्रपुरात देखील बघायला मिळाले आहे. पोलिस भरतीसाठी हजारो युवक-युवतींनी तयारी केली. मात्र, या जिल्ह्यासाठी अवघ्या ५१ जागांची जाहिरात निघाली. पोलिस भरतीचा आजवरचा हा निच्चांक़ आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या बेरोजगारांनी येथिल गांधी चौक येथ माजी खासदार नरेश पुगलीया व युवा नेता राहूल पूगलीया यांचा मार्गदर्शनात एन एस यु आय ( NSUI ) चा वतीने भाजप चा पकोडे तळून निषेध केला. 

निवडणुकीदरम्यान युवकांना विशेष करून सुशिक्षीत बेरोजगारांसाठी वर्षाकाठी २ कोटी रोजगार निर्मिती करण्याचे आश्वासन भाजपाचे नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्याच अन्य नेत्यांनीही युवकांना देत त्यांना प्रभावीत केले. मात्र, साडेतीन वर्षाच्यावर केंद्रात आणी राज्यात भाजप सरकारच्या सत्तेचा कार्यकाळ उलटला आहे. तरीही देशात रोजगार निर्मितीत वाढ होणे दुरच, प्रत्यक्षात रोजगार निर्मिती घटून बेरोजगारांची फौज तयार झाली आहे. मेहनत करून विद्यापीठाच्या उच्च पदव्या मिळविणाऱ्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याऐवजी त्यांना पकोडे विकण्याचा सल्ला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी देऊन बेरोजगाराच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. यामुळे भाजप सरकारच निषेध करण्यासाठी शनिवारी संतप्त झालेल्या बेरोजगारांनी येथिल गांधी चौक येथ माजी खासदार नरेश पुगलीया व युवा नेता राहूल पूगलीया यांचा मार्गदर्शनात एन.एस.यु आय.( NSUI ) चा वतीने भाजपचा पकोडे तळून विद्यमान सरकारचा प्रतिकात्मक निषेध करण्यात आला. 
 या आंदोलनाला एन.एस.यु आय.( NSUI ) चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात उपस्थित  होते. सोबत उच्चशिक्षित असलेल्या बेरोजगार युवक-युवतींची मोठी गर्दी होती. बेरोजगारीची मोठी समस्या आहे. अनेक शिक्षित युवकांच्या हाताला काम नाही. सरकारच्या धोरणामुळे युवकांवर ही वेळ आल्याचा आरोप कुशल पुगलीया यांनी यावेळी केला.

Thursday, February 08, 2018

उच्चशिक्षित युवक-युवतीचे शिवसेनेच्या नेतृत्वात "पकोडा" आंदोलन

उच्चशिक्षित युवक-युवतीचे शिवसेनेच्या नेतृत्वात "पकोडा" आंदोलन

चंद्रपूर/प्रतीनिधी:
भाजपने 2 कोटी युवकांना रोजगार देऊ, असे आश्‍वासन निवडणुकीदरम्यान दिले होते. मात्र, अद्यापही रोजगार उपलब्ध झालाच नाही. त्याचे पडसाद चंद्रपूरमध्ये देखील बघायला मिळाले .भाजप सरकार विरोधात नाराजी व्यक्त करत चंद्रपुरातील तुकूम परिसरात शेकडो उच्चशिक्षित युवक-युवतीनी सरकारच्या विरोधात थेट रस्त्यावरच ठेला उभा करत अनेक उच्च शिक्षित विद्यार्थ्यांनी पकोडे तडून नाराजी व्यक्त केली. 
लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान 2 कोटी युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याची घोषणा भाजपने केली होती. या घोषणेचे काय झाले असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित करण्यात आला होता.पंतप्रधानांनी पकोडा विकून कुणी 200 रुपये रोज कमावत असेल, तर तो चांगला व्यवसाय असल्याचे मत व्यक्त केले होते. तसेच पकोडे विकणे हा एक मोठा रोजगार असल्याचे म्हटले होते. आमच्या पालकांनी आर्थिक ताण सहन करत आम्हाला पदवीपर्यंतचे शिक्षण दिले आहे. ते यासाठीच का? पंतप्रधानांनी चहा विकून स्वत:चा उदरनिर्वाह केला. तीच स्वप्न ते देशातीले उच्च शिक्षित तरुणांना दाखवित तर नाही ना? असे प्रश्‍न यावेळी आंदोलक तरुणांनी उपस्थित केले. तसेच अद्यापही रोजगार उपलब्ध होत नसल्याने सरकारचा निषेध केला.  
उच्चशिक्षण घेतलेल्या युवक-युवतींना रोजगार नसल्याने सरकारने त्यांच्यावर पकोडे विकण्याची वेळ आल्याची टीका शिवसेनेने केली आहे. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक सुरेश पचारे यांचे सोबत शेकडो उच्चशिक्षित युवक-युवती  उपस्थित होते. 

Monday, January 22, 2018

मराठी शाळा बंद करण्यात येऊ नये: मनसेचे  हाप पॅन्टवर आंदोलन

मराठी शाळा बंद करण्यात येऊ नये: मनसेचे हाप पॅन्टवर आंदोलन

चंद्रपूर/प्रतिनिधी:
    मराठी माणसाचे हित जोपासत आता मनसे सरकारविरोधात आक्रमक झाली आहे चंद्रपुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हाप पॅन्टवर शिक्षण अधिकारी कार्यालयात तब्बल एकतास विध्यार्थी म्हणून बसून शिक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे , गोरगरिबांचे शिक्षण हिस्कावू देणार नाही, अश्या प्रकारचे नारे देत चंद्रपूर मनसे शहर अध्यक्ष मनदीप रोडे यांच्या नेतृत्वात  अनोखे आंदोलन पुकारले आहे ,
यावेळी  मनदीप रोडे यांनी शिक्षण अधिकारी यांनाच धारेवर धरत करोडो रुपये शासन शिक्षकांवर खर्च करते मात्र शाळेचा दर्जा कमी कसा होतो सोबतच मुलांची पटसंख्या कमी कशी काय होते याचे उत्तर मागितले. 
 
 गुणवत्तेमुळे कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील १३१२ शाळांना कुलूप लागणार आहे. या शाळांतील विद्यार्थी अन्य ठिकाणी समायोजित केले जाणार असल्याचा दावा सरकार करत असली तरी  डोंगराळ, दुर्गम भागातील शाळांतील शेकडो मुलांना याचा फटका बसणार आहे. बंद होणाऱ्या अनेक शाळा दोन किमीपेक्षाही अधिक अंतरावर आहेत. नदी नाले ओलांडून, जंगलवाटांनी मुलांनी शाळांपर्यंत पोहचावे अशी अपेक्षा करणेच अमानवी आहे. त्यामळे मराठी शाळा बंद   करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यास मनसे आपल्या स्टाईलने आंदोलन करेल असे देखील शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयात मनसेचा सूर होता . 
यावेळी आंदोलनात मनसे शहर उपाध्यक्ष राहुल चव्हाण,व्यंकटेश मुत्कलवार ,शहर सचिव सचिन कोतपल्लीवार , सुमित खेडनकर , सुमित करपे ,नितीन बावणे,नितीन कुमरे, नागाजी गंफाडे , यासह आदी मनसे आंदोलक कार्यकतें उपस्थित होते. 

Monday, December 04, 2017

जिल्हापरिषदे समोर आंदोलनाचा सपाटा..

जिल्हापरिषदे समोर आंदोलनाचा सपाटा..

अंगणवाडी सेविकांचे जिल्हापरिषदेसमोर धरणे आंदोलन

चंद्रपूर/प्रतिनिधी:
आपल्या विविध प्रलंबित व न्यायिक मागण्यांना घेऊन आज अंगणवाडी सेविकांनी जिल्हापरिषद समोर धरणे आंदोलन केले . १ हजार पेक्षा जास्त अंगणवाडी सेविकांना गेल्या ५ महिन्यांपासून मानधन मिळालं नाही. सरकारने सांगितल्या प्रमाणे प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला ऑनलाईन मानधन देण्यात येईल असे आश्वासन दिले होते.जून महीपासून ते आज पर्यंत अंगणवाडी सेविकांचे मानधन मिळाले नाही. या मुळे अंगणवाडी मदतनीस व सेविकांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. दिवाळीमध्ये सरकारने आश्वासन दिल होत तुम्हाला मानधन २ हजार रुपये वाढवून दिल्या जाईल आणि आता नवीन जीआर काढून फक्त १ हजार दिल्या जाईल असे नमूद केले आहे. त्यामुळे हि अंगणवाडी सेविकांची व मदतनीसांची फसवणूक असल्याचे हि यावेळी सांगण्यात आले. या सरकारने खोटी आश्वासने देऊन आम्हाला अंधारात ठेवले असेही या वेळी आदोलनकर्त्यांनी सांगितले. या धरणे आंदोलनात जिल्हाभरातील शेकडो अंगणवाडी मदतनीस व सेविकांची उपस्थिती होती.

------------------------------------------------------------------------------------------------------------ 
सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाचे जि.प.समोर धरणे आंदोलन  


विविध मागण्यांना घेऊन आज सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले आहे. जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाच्या ठराव क्र. ७ दिनांक ८ ऑक्टोबर २०७ नुसार सेवानिवृत्त शिक्षकांच्या प्रलंबित विविध समस्या ( विशेषतः निवडश्रेणी मंजूर करणे ,वरिष्ठश्रेणी मंजूर करणे, खंडित सेवा चालू करणे) अश्या विविध मागण्यांचेआता पर्यंत अनेक वेळा निवेदने दिले. परंतु या समस्या त्वरित सोडवाव्या या करिता हे धरणे आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात जिल्हाभरातील शेकडो सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक उपस्थित होते

Sunday, November 26, 2017

चंद्रपूरात मनसे आक्रमक:इंग्रजीतील दुकानावरील फलके फाडून फेकली

चंद्रपूरात मनसे आक्रमक:इंग्रजीतील दुकानावरील फलके फाडून फेकली

चंद्रपूर प्रतिनिधी :
चंद्रपुरात मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे.शहरातील तुकूम परिसरात दुपारच्या सुमारास मराठी पाट्यासाठी आंदोलन करत मनसे शहर अध्यक्ष मनदीप रोडे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी दुकान चाळीतील इंग्रजी पाट्यांना काळफासत इंग्रजीतील दुकानावरील फलके फाडून टाकली.

शहरातील नागपूर-चंद्रपूर मार्गावर दुपारी हा प्रकार घडला.तुकूमपरिसरात दुपारी मनसे कार्यकर्ते जमा झाले होते. त्यांच्या हातात मनसेचे झेंडे देखील होते. मराठी पाट्यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात येत होत्या. यानंतर या कार्यकर्त्यांनी अचानक इंग्रजी पाट्यांना लक्ष करत काळफ़ासले आणि काही इंग्रजी बॅनरही फाडले.अचानक घडलेल्या प्रकारामुळे परिसरात भितीचे वातावरण  निर्माण झाले होते. काही दुकानदारांनी तात्काळ दुकाने बंद केली.
चंद्रपुरात मनसेने नवीन शाखेचे उदघाटन केल्या नंतर मराठीचा मुद्दा उचलून धरला आहे. यापूर्वीही मनसेने मराठी पाट्यांसाठी अनेकवेळा आंदोलने केले होते.आता पुन्हा एकदा मनसेने मराठी पाट्यांसाठी आक्रमक झाली आहे.



Tuesday, November 07, 2017

दारूच्या बाटलीवर भाजपच्या 'कमळ'चा लोगो

दारूच्या बाटलीवर भाजपच्या 'कमळ'चा लोगो


नागपूर/प्रतिनिधी :  दारूला महिलांचे नाव दिले तर दारूची अधिक विक्री होईल असं म्हणणाऱ्या गिरीश महाजनांचा नागपूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने महाजन यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. दारूच्या बाटलीवर कमळ चिन्ह लावून कलेक्टर ला दारूच्या बाटल्या दिल्या.

केंद्रात आणि राज्यात भाजप ची सरकार आहे, त्यामुळे भाजप चे फॉलोवर अधिक आहे त्यामुळे बाटली वर मोदी किंवा कमळ लावले तर अधिक विक्री होऊ शकते अस राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या शहर अध्यक्ष अलका कांबळे यांनी सांगितले. तसेच हा महिलांचा अपमान असून गिरीश महाजन यांनी राजीनामा द्यावा. ते राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्र्यानी त्यांना राजीनामा मांगवावा असे अलका कांबळे यावेळी म्हणाल्या.  

दारूची विक्री वाढविण्यासाठी दारूला महिलांची नावे द्यावीत असा अजब सल्ला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिल्याचे वृत्त सर्वत्र गाजले होते. बाजारात ज्या उत्पादनांना महिलांचे नाव दिले आहे. त्यांची विक्री अधिक होते, ही वस्तुस्थिती आहे. तंबाखूजन्य पदार्थांनाही विमल, सुमन अशी बहुतांशी महिलांचीच नावे दिल्या गेली आहे. त्यामुळं सातपुडा साखर कारखान्याने मद्य विक्री वाढवण्यासाठी दारूचं नाव 'महाराजा' ऐवजी 'महाराणी' करावे असे गिरीश महाजन म्हणाले होते.  

Sunday, November 05, 2017

वन्यजीवामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानाची त्वरित भरपाईचा प्रशन शासनदरबारी लावून धरणार -- आमदार अँड संजय धोटे

वन्यजीवामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानाची त्वरित भरपाईचा प्रशन शासनदरबारी लावून धरणार -- आमदार अँड संजय धोटे


उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची घेतली भेट
चंद्रपूर/प्रतिनिधी:
दिवसेंदिवस जंगल नष्ट होत असल्यामुळे वन्यजीव शेतशिवारात घुसून शेतकऱ्यांच्या जीविताचे व शेतमालाचे मोठया प्रमाणात नुकसान करतात परंतु वन्यजीवांची हत्या झाल्यास होणाऱ्या शेतमालाची नुकसानभरपाई मात्र अत्यल्प दिले जाते शिवाय ही भरपाई देखील बऱ्याच कालावधी नंतर दिली जाते.

ह्या अन्यायाविरोधात राजुरा तालुक्यातील शेतकरी किसान क्रांती मोर्चाच्या बॅनर खाली मागील ८ दिवसापासून वनविभागाच्या कार्यालया समोर उपोषणाला बसले असून आमदार अँड संजय धोटे ह्यांनी ह्या उपोषणकर्त्याची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.ह्यावेळी बोलताना आमदार अँड संजय धोटे म्हणाले की उपोषणकर्त्या शेतकऱ्यांचे प्रशन योग्य असून पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार ह्यांच्या निदर्शनास ह्या मागण्या आणून देवून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देवू व आगामी अधिवेशनातही शेतकऱ्याच्या मागण्या शासनाच्या लक्षात आणून देवू.

शेतकऱ्यावर अन्याय होवू न देण्याचीच शासनाची भूमिका असल्यामुळे शेतकऱ्यांनी उपोषण मागे घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले.ह्यावेळी वनविभागाचे उपविभागीय वन अधिकारी अमोल गरकल,भाजपा किसान आघाडी जिल्हा उपाध्यक्ष भाऊराव चंदनखेडे,भाजपा तालुका महामंत्री दिलीप वांढरे,भाजयुमो तालुका महामंत्री रवि बुरडकर, भाजपा शहर महामंत्री सय्यद कुरेशी,मंगेश श्रीराम,बाबुराव जीवने,अनिल दुबे,कैलास कार्लेकर उपस्थित होते.

उपोषणकर्त्याच्या वतीने उपोषणकर्ते व माजी जि.प.सदस्य गणेश झाडे ह्यांनी शेतकऱ्याच्या मागण्या आमदार मोहदया समोर मांडल्या.ह्यावेळी तालुक्यातील शेतकरी व वनविभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.