काव्यशिल्प Digital Media: संमेलन

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label संमेलन. Show all posts
Showing posts with label संमेलन. Show all posts

Wednesday, August 15, 2018

चंद्रपूरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे छात्र नेता संमेलन संपन्न

चंद्रपूरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे छात्र नेता संमेलन संपन्न

छात्रशक्ती ही बलाढय राष्ट्रनिर्मीतीची महाशक्ती बनण्यासाठी अभाविपचा प्रत्येक सदस्य कार्यरत - श्री. निलेष शिंदे, प्रो कबड्डी मधील बंगाल वारीयर्स संघाचे कर्णधार
चंद्रपूर/प्रतिनिधी:-

छात्रशक्ती ही महाशक्ती असून बलाढय राष्ट्रनिर्मीतीची संकल्पना विद्याथ्र्यांच्या एकीकरणातूनच घडेल यात दुमत नसून अखिल भारतीय विद्यार्थी परिशदेचा प्रत्येक सदस्य देश सेवेच्या संस्काराचे बीज आत्मसात करून कार्य करित असतो याचा आपल्याला सार्थ अभिमान वाटतो असे प्रतिपादन प्रो कबड्डी मधील बंगाल वारीयर्स संघाचे कर्णधार श्री. निलेश  शिंदे यांनी स्थानिक कन्यका परमेष्वरी सभागृह येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिशद, चंद्रपूर तर्फे आयोजित छात्र नेता संमेलनाच्या माध्यमातून केले.
सदर छात्र संमेलनाच्या मंचावर प्रो कबड्डी मधील बंगाल वारीयर्स संघाचे कर्णधार श्री. निलेश शिंदे  यांच्या प्रमुख उपस्थितीसह प्रमुख वक्ते म्हणून अभाविप प्रांत संघटन मंत्री शैलेन्द्राजी  दळवी, रवी दांडगे, आकाश  पोकल मुंडे, रघुविर अहीर, योगेश येनारकर , स्नेहीत लांजेवार यांची उपस्थिती होती. 
आपल्या संबोधनातून निलेष षिंदे यांनी पुढे सांगीतले की, आज विद्याथ्र्यांच्या अनेक समस्यांचे निवारण अभाविप तर्फे होत असून विद्याथ्र्यांची षैक्षणीक वाटचाल सुकर करण्याचे श्रेश्ठ कार्य अभाविप चा प्रत्येक सदस्य जबाबदारीने पार पाडत आहे. ज्ञान, षिल व एकता या त्रिसूत्रीवर अभाविपचे संपूर्ण कार्य होत आहे याचाही गर्व यावेळी निलेष शिंदे यांनी व्यक्त केला. खेळ हा व्यक्तीच्या जिवनाचा भाग असल्यास जिद्द व चिकाटी निर्माण होत असते म्हणूनच विद्याथ्र्यांनी खेळाला सुध्दा वाव दयायला हवा. कबड्डी हा खेळ देशात पुर्वीपासून खेळला जात असून एकाग्रता हा या खेळातील प्रभावी वैषीश्टय असल्याचे सांगीतले. तसेच प्रो कबड्डीमुळे क्रीडा क्षेत्रात खेळांडूंना चांगला वाव आलेला असून कबड्डीचे अच्छे दिन आलेले आहे. 
शैश्निक अभ्यासक्रमासोबतचा खेळांचीही आवड जपणे अत्यंत आवष्यक असल्याचे यावेळी प्रस्ताविक भाशणातून ते म्हणाले. 
या कार्यक्रमाला विविध महाविद्यालयातील विद्यार्थी - विद्यार्थीनींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यषस्वीततेसाठी जिल्हा संयोजक शुभम दयालवार, विभाग संघटन मंत्री सौरभ कावळे, जिल्हा संघटन मंत्री तेजस मोहतूरे, माजी नगर मंत्री प्रज्वल गर्गेलवार यांनी परिश्रम घेतले. प्रसंगी श्री. निलेश शिंदे यांच्या हस्ते मिथून या मराठी चित्रपटाला संगीतबध्द करणाऱ्या अक्षय वालके व स्वप्निल वालके या भावंडांचा तर खेलो इंडिया खेलो या मध्ये सक्रीय सहभाग घेणाऱ्या वैभव मेश्राम यांचा सन्मान करण्यात आला. 
या कार्यक्रमाच्या माध्यमातून अभाविप चे विदर्भ प्रांत संघटन मंत्री रघुवीर अहीर यांनी चंद्रपूर महानगरातील विविध महाविद्यालयातील अभाविप कार्यकारीणी घोशीत केली. यात नगर अध्यक्ष योगेश येनारकर, नगर मंत्री स्नेहीत लांजेवार, सहमंत्री गौरव होकम, सहमंत्री यश बांगडे, महाविद्यालय प्रमुख आकाश लुक्कावार, विद्यार्थिनी प्रमुख एकता खेडकर, विद्यार्थिनी सहप्रमुख स्नेहल देशमुख, एसएफडी व एसएफएस प्रमुख मनिश पिपरे, कार्यालय प्रमुख कुर्श्ना पिपरे, क्रिडा प्रमुख प्रतिक काकडे, जनजाती प्रमुख अंकीत कोडवते, कनिश्ठ महाविद्यालय प्रमुख साकेत सोनकुसरे, टिएसव्हीपी प्रमुख शुभम मुद्दावार, सोशल मिडीया/प्रसिध्दी प्रमुख प्रमुख प्रविण गिलबीले, नगर कार्यकारीणी सदस्य सुरज रागीट यांचा समावेश आहे. 
.

Monday, June 25, 2018

कविता म्हणजे संध्याकाळची दिवेलागण''

कविता म्हणजे संध्याकाळची दिवेलागण''

झिरोमाईल प्रतिष्ठान आयोजित 'काव्यऋतु' ने रसिकांची मने जिंकली 

नागपूर, ता. 23 :  ''विश्रब्ध मनाच्या कातरवेळी, एखाद्या प्राणाची दिवेलागण'' किशोरी अमोणकरांच्या या हळव्या ओळींनी कवीसंमेलनाला सुरुवात झाली. साहित्य आणि कला क्षेत्रातील कलावंतांना वाव देण्यासाठी व्यासपीठ निर्माण करुन देण्याच्या दृष्टीने स्थापन करण्यात आलेल्या ‘झिरो माईल’ कला साहित्य प्रतिष्ठानच्या 'काव्यऋतु-२०१८' कार्यक्रमाच्या निमित्ताने हिंदी साहित्य संमेलन मोरभवन येथील सभागृहात कवींचे काव्य दुमदुमत होते.

उद्‌घाटन कार्यक्रमाला व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मा. प्रसेनजीत गायकवाड, अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कवियित्री मा. नेहा भांडारकर, संस्थेच्या अध्यक्ष धनश्री पाटील यांची उपस्थिती होती, तर मार्गदर्शक म्हणून अनंत नांदुरकर-खलीश यांनी कवितेवर चिंतनात्मक भावपूर्ण मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन मंजुषा अनिल यांनी केले तर प्रस्तावनेतून संस्थेबद्दल माहीती संयोजिका वर्षा पतके थोटे यांनी दिली. किरण पिंपळशेंडे यांनी आभार प्रदर्शन केले.

यानंतर आयोजित कविसंमेलनात विदर्भभरातुन आलेल्या एकूण ३५ कवींनी रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळविली. ''आत काळजाशी हलले जरासे, लाजला जसा तो पदर पावसाळी'' असा कल्पना विलासी पाऊस तर ''जीव टांगणीले आला नाही पावसाच्या सरी, म्हणे बायको धन्याले कवा बरंसल पाणी ?'' असा भावनाप्रधान पाऊस बरसात राहिला. 'सध्या ती काय करते?' 'सांगा मी कधी ऑनलाईन दिसते?' पासून ते 'धर्मा तू का मेलास बाबा?' असे प्रश्नही कोसळले. ''कोणता  माणूस  आहे  आत  माझ्या, मी  म्हणूनच  आत  नाही  जात  माझ्या'' अशी आत्ममग्न करणारी गझल गाजली, तर हास्यकवितांतून  हास्याचा खळखळाटही होत राहिला. झिरो माईलच्या व्यासपीठावरवरून या कार्यक्रमात अनेकांनी  'पहिल्यांदा कविता सादर केल्या...तसेच समाजात दुर्लक्षित असणाऱ्या कलाकारांना प्रकाशझोतात आणणे या झिरोमाईलचा संकल्प प्रत्यक्षात उतरताना दिसला.

लोकनाथ यशवंत, निरंजन मार्कंडेयवर सारखे दिग्गज कवी तसेच गझल समीक्षक देवदत्त संगेप, गझलकार अझीजखान पठाण, वैश मिर्झापुरे आणि रश्मी पदवाड मदनकर यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.

Saturday, November 18, 2017

16, 17, 18 फेब्रुवारीला बडोद्यात होणार साहित्य संमेलन

16, 17, 18 फेब्रुवारीला बडोद्यात होणार साहित्य संमेलन

-  91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तारखा जाहीर

-  साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी बडोद्यात पत्रकार परिषद घेऊन केली तारखांची घोषणा

16, 17, 18 फेब्रुवारीला बडोद्यात होणार साहित्य संमेलन