সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, February 17, 2018

युवक काँग्रेसचे 'पकोडा' आंदोलन

चंद्रपूर/प्रतिनिधी:   पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अमित शहा यांच्या बेरोजगारांना पकोडे विकण्याच्या सल्ल्याचे पडसाद चंद्रपुरात देखील बघायला मिळाले आहे. पोलिस भरतीसाठी हजारो युवक-युवतींनी तयारी केली. मात्र, या जिल्ह्यासाठी अवघ्या ५१ जागांची जाहिरात निघाली. पोलिस भरतीचा आजवरचा हा निच्चांक़ आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या बेरोजगारांनी येथिल गांधी चौक येथ माजी खासदार नरेश पुगलीया व युवा नेता राहूल पूगलीया यांचा मार्गदर्शनात एन एस यु आय ( NSUI ) चा वतीने भाजप चा पकोडे तळून निषेध केला. 

निवडणुकीदरम्यान युवकांना विशेष करून सुशिक्षीत बेरोजगारांसाठी वर्षाकाठी २ कोटी रोजगार निर्मिती करण्याचे आश्वासन भाजपाचे नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्याच अन्य नेत्यांनीही युवकांना देत त्यांना प्रभावीत केले. मात्र, साडेतीन वर्षाच्यावर केंद्रात आणी राज्यात भाजप सरकारच्या सत्तेचा कार्यकाळ उलटला आहे. तरीही देशात रोजगार निर्मितीत वाढ होणे दुरच, प्रत्यक्षात रोजगार निर्मिती घटून बेरोजगारांची फौज तयार झाली आहे. मेहनत करून विद्यापीठाच्या उच्च पदव्या मिळविणाऱ्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याऐवजी त्यांना पकोडे विकण्याचा सल्ला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी देऊन बेरोजगाराच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. यामुळे भाजप सरकारच निषेध करण्यासाठी शनिवारी संतप्त झालेल्या बेरोजगारांनी येथिल गांधी चौक येथ माजी खासदार नरेश पुगलीया व युवा नेता राहूल पूगलीया यांचा मार्गदर्शनात एन.एस.यु आय.( NSUI ) चा वतीने भाजपचा पकोडे तळून विद्यमान सरकारचा प्रतिकात्मक निषेध करण्यात आला. 
 या आंदोलनाला एन.एस.यु आय.( NSUI ) चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात उपस्थित  होते. सोबत उच्चशिक्षित असलेल्या बेरोजगार युवक-युवतींची मोठी गर्दी होती. बेरोजगारीची मोठी समस्या आहे. अनेक शिक्षित युवकांच्या हाताला काम नाही. सरकारच्या धोरणामुळे युवकांवर ही वेळ आल्याचा आरोप कुशल पुगलीया यांनी यावेळी केला.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.