काव्यशिल्प Digital Media: बंद

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label बंद. Show all posts
Showing posts with label बंद. Show all posts

Saturday, October 27, 2018

सलग ५ दिवस बँका बंद

सलग ५ दिवस बँका बंद

खबरबात/ऑनलाईन:
दसरा संपल्यानंतर आता नागरिकांना दिवाळीचे वेध लागले आहेत. सणासुदीचे दिवस म्हटले की, खरेदी ही आलीच. घर खर्च तसेच दिवाळी खरेदीचे आर्थिक नियोजन करायचे असल्यास बँकेतून लवकरात लवकर पैसे काढून घ्या. कारण ऐन दिवाळीत चार दिवस बँक बंद राहणार आहेत. त्यामुळे दिवाळी खरेदीसाठी पैशांची जुळणी करायची असेल तर त्याचे नियोजन नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्याआधी करून घ्या.
ऐन दिवाळीत चार दिवस बँकांना सुट्टी असल्याने नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. बुधवारी, ७ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन, गुरुवारी ८ नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडवा असे दोन दिवस बँका बंद असतील. त्यानंतर शुक्रवारी येणाऱ्या भाऊबीजेनंतर शनिवारी, ९ नोव्हेंबर व रविवार ११ नोव्हेंबर अशी दोन दिवस सुट्टी असेल.

या कालावधीत बँकांचे व्यवहार बंद असल्याने पैशाची कमतरता निर्माण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांना आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. रोखीच्या पैशासाठी नागरिक मोठ्या प्रमाणातून एटीएममधून पैसे काढण्यावर भर देण्याची शक्यता असल्याने एटीएममध्येही रोख पैशाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो.




Thursday, September 27, 2018

आज भारत बंद

आज भारत बंद

करोडोच्या व्यवसायाला कात्री
traders call bharat bandh on september 28नागपूर/प्रतिनिधी:
कॉन्फडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) भारतात विदेशी गुंतवणूक आणि वॉलमार्ट-फ्लिपकार्ट कराराला केंद्र सरकारने मान्यता दिल्याच्या विरोधात भारत बंदचे आवाहन केले आहे. बंदला देशातील सर्व व्यापारी संघटनांनी समर्थन दिले आहे. कॅटच्या आवाहनार्थ २८ सप्टेंबरला नागपुरातील सर्व प्रमुख बाजारपेठा बंद राहणार असून त्यामुळे कोट्यवधींचा व्यवसाय ठप्प होणार आहे.फार्मसी संघटनेच्या आवाहनानुसार २८ सप्टेंबरला देशातील सर्व फार्मसी बंद राहणार आहेत. तसेच विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने संपाला समर्थन देताना दुपारी १२ ते ४ या वेळात पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.


Monday, September 10, 2018

महाराष्ट्र-तेलंगाना मार्गपर अज्ञात लोगो द्वारा टायर जलाकर रास्ता बंद करने की कोशिश

महाराष्ट्र-तेलंगाना मार्गपर अज्ञात लोगो द्वारा टायर जलाकर रास्ता बंद करने की कोशिश

चंद्रपूर/प्रतिनिधी:
पेट्रोल और डीजल के दामों में लगातार हो रही बढ़ोत्तरी को देखते हुए कांग्रेस ने सोमवार को भारत बंद का ऐलान किया है। कांग्रेस को भारत बंद के लिए 21 पार्टियों का साथ मिला है जिसमे राज ठाकरे की मनसे भी शामिल है.इस भारत बंद के दौरान महाराष्ट्र के चंद्रपूर जिल्हे के बल्लारपुर तालुका में महाराष्ट्र तथा तेलंगाना को जोड़ने वाले मुख्य रास्ते पर भारत बंद का असर दिखने लगा.अज्ञात लोगो द्वारा टायर जलाकर रास्ता बंद करने की कोशिश की गई यह रास्ता बल्लारपुर के बामनी होकर तेलंगाना के हैदराबाद को जोड़ता है.
  • चंद्रपूर जिल्हे के बल्लारपुर तालुका में महाराष्ट्र तथा तेलंगाना को जोड़ने वाले मुख्य रास्ते पर भारत बंद का असर दिखने लगा 
  • अज्ञात लोगो द्वारा टायर जलाकर रास्ता बंद करने की कोशिश की गई यह रास्ता बल्लारपुर के बामनी होकर तेलंगाना के हैदराबाद को जोड़ता है.   
  •   






आज भारत बंद;घराबाहेर पडलात तर सहन करावा लागेल

आज भारत बंद;घराबाहेर पडलात तर सहन करावा लागेल

Image result for भारत बंद
मुंबई/प्रतिनिधी:
पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेस आणि डाव्यांनी हाक दिलेल्या उद्याच्या ‘भारत बंद’मध्ये राष्ट्रवादी, मनसे, शेकाप आणि समाजवादी पार्टी सहभागी होणार आहे. या बंदमध्ये मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन ‘भारत बंद’ला पाठिंबा देतील,देशात इंधन दरवाढीचा भडका उडाल्यामुळे काँग्रेसने ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घट या प्रश्नांवर काँग्रेसने मोदी सरकारविरोधात आंदोलन छेडले आहे.
‘पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे आम्ही उद्याच्या भारत बंदला संपूर्ण पाठिंबा देत आहोत आणि या बंदमध्ये आम्ही सक्रिय सहभाग घेत आहोत’, असे राज ठाकरे यांनी ट्विट केले आहे.  या बंदचा त्रास मात्र गणपतीत घरी जाणाऱ्या लोकांना होणार आहे.कारण ऐन पोळ्याच्या दिवशी अन गणपतीची तयारी सुरु असतांना हा संपूर्ण त्रास सहन करावा लागणार आहे.

Saturday, June 30, 2018

 चंद्रपूर वीज केंद्रातील संच होऊ शकतात बंद

चंद्रपूर वीज केंद्रातील संच होऊ शकतात बंद

संबंधित इमेजचंद्रपूर/प्रतिनिधी:
 चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरण कोरडे पडल्यामुळे येत्या 15 जुलैपासून ते बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे.तीन हजार मेग़ावॅट वीज निर्मिती क्षमता या केंद्राची आहे. ते बंद झाल्यास राज्यात वीजेचे संकट निर्माण होऊ शकते. याचा धरणावरून चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा केला जातो. ते एकमात्र स्त्रोत आहे. परिणामी शहरात सुद्धा पाणी टंचाई होऊ शकते. सध्या धरणात १८ दलघमी पाणीसाठा आहे. वीज केंद्राच्या व्यवस्थापनाने सुद्धा १५ जुलैपर्यंत पाऊस न आल्यास वीज केंद्र बंद करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. मान्सून सुरू होऊन जवळपास २५ दिवसांचा कालावधी लोटला. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात सरासरी १५० मि.मी.च्यावर पाऊस पडला आहे.


Monday, June 11, 2018

 ४ जुलैला नागपूर बंद

४ जुलैला नागपूर बंद

The closure of Nagpur on 4th July to protest the monsoon session | पावसाळी अधिवेशनाच्या निषेधार्थ ४ जुलैला नागपूर बंदनागपूर/प्रतिनिधी:
 स्वतंत्र विदर्भ राज्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे हिवाळी अधिवेशन असो की, पावसाळी अधिवेशन, त्याला आमचा विरोध आहे. तेव्हा पावसाळी अधिवेशनाच्या निषेधार्थ येत्या ४ जुलै रोजी नागपूर बंद करीत भाजपा सरकारचा निषेध करण्यात येईल, असा निर्णय विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या बैठकीत सर्वसंमतीने घेण्यात आला.विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोअर कमिटीची बैठक रविवारी आमदार निवास येथील सभागृहात पार पडली. धनंजय धार्मिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, राम नेवले, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, अरुण केदार, राजकुमार नागुलवार, गोविंद भेंडारकर, माया चवरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. पावसाळी अधिवेशनात विदर्भ विरोधी नेत्यांविरुद्ध ‘गो बॅक’चे होर्डिंग लावण्यात येतील. ४ जुलैनंतर विदर्भ राज्य आंदोलन समितीची घरोघरी जाऊन सभासद नोंदणी करून संघटनात्मक बांधणी केली जाईल, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीला अ‍ॅड. सुरेश वानखेडे, अ‍ॅड. टेकचंद कटरे, प्रा. पुरुषोत्तम पाटील, विष्णूपंत आष्टीकर, अर्चना नंदघरे, दिगंबर डोंगरे, ताराबाई बारस्कर, रंजना मालपे, विजया धोटे, दीपक एम्बडवार, मुकेश मासुरकर, रियाज खान, डॉ. जी.एम. ख्वाजा, बाबा राठोड, कपिल इद्दे, भय्यालाल माकडे, प्रा. अनिल ठाकूरवार, नितीन भागवत, कृष्णराव भोंगाडे, दामोदर शर्मा, अ‍ॅड. अजय चमेडिया, रमेश नळे, अनंता येरणे, बंडू देठे, गुलाबराव धांडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
येत्या निवडणुकीत भाजपला हरवणार
बैठकीत भाजपाने दिलेल्या स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आश्वासनावर विशेष चर्चा झाली. भाजपाने निवडणुकीपूर्वी आपले आश्वासन पाळले नाही, तर येत्या २०१९ च्या निवडणुकीमध्ये भाजपाचा सफाया करावा, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. भाजपासोबत काँग्रेसही विदर्भ विरोधी आहे, तेव्हा २०१९ च्या निवडणुकीसंबंधी तिसऱ्या पर्यायाचा विचार करण्यासाठी ११ सदस्यांची एक समिती स्थापन करण्याचा निर्णय सुद्धा बैठकीत घेण्यात आला.

Thursday, February 22, 2018

शासनाने टाळे ठोकलेल्या जिल्हा परीषद शाळाचे कुलूप गावकऱ्यानी तोडले;अन् केली शाळा सुरु

शासनाने टाळे ठोकलेल्या जिल्हा परीषद शाळाचे कुलूप गावकऱ्यानी तोडले;अन् केली शाळा सुरु

शासनाने बंद केलेल्या शाळेचे कुलूप तोडतांना गावकरी व विध्यार्थी
ब्रम्हपुरी /प्रतिनिधी:  शासनाने राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या १३१४ शाळा गुणवत्ता व कमी पटसंख्येच्या कारणाने बंद करण्याचा निर्णय घेतला होता , या निर्णयाला विविध स्तरातून विरोध होत असतांना मात्र दुसरीकडे शासनाचे अश्या शाळांना टाळे ठोकण्याचे काम केले ब्रम्हपुरी तालुक्यातील झिलबोडी - परसोडी या गटग्राम पंचायत अंतर्गत परसोडी गावातील हि  शाळा देखील  शासनाने बंद केली ,शासन व अधिकाऱ्यांच्या या अफलातून निर्णयाने शाळा बंद झाली तेव्हा पासून गावकऱ्यांत मोठा रोष निर्माण झाला होता.मात्र या शाळेचे कुलूप आता गावकर्यांनीच तोडून गावातील विध्यार्थ्यांना हि शाळा सुरु करून देण्यात आली आहे. शाळा बंदल्यानंतर शाळेतील मुलांना झिलबोडीला येथे जाऊन शिक्षण घ्यावे,असे सांगण्यात आले होते.शाळा बंद होणार हे माहित होताच गावातील सुजन शिक्षित नागरिक व विद्यार्थ्यांनी शासन दरबारी निवेदने देण्यात आली, पञकार परिषद घेण्यात आली, विविध शिक्षणप्रेमींनी आंदोलने केली परंतु शासनाला जाग आली नाही.
प्रत्येक बालकाला प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यात असतांना देखील शासनाने हि शाळा बंद केली मात्र 
खेड्यात आजही शिक्षणासाठी लागणाऱ्या परिपूर्ण सोयी नसल्याने आमचे चिमुकली दुस-या गावी शिकणार तरी कशी? असा प्रश्न गावकर्यांनी उपस्थित केला. आंम्ही दुसरीकडे जाणार नाही, असा सूर देत ग्रामवासियांचा उद्रेक झाला अन् गावक-यांनीच शाळेचे  कुलूप तोडले. ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील फक्त परसोडी या गावातिलच शाळा हि शासनाने बंद केली होती. ता यावेळी शिक्षणप्रेमी अॅड.गोविंदराव भेंडारकर,विनोद झोडगे,मंदा तुपट, देवकन्याताई लांडेकर ग्रा. प.सदस्या,नामदेव दमके,प्रेमलाल मेश्राम,वामन मंडपे,नारायण खरकाटे,भिवाजी खरकाटे, हिरालाल तुपट,लक्ष्मण तुपट,दिलीप कार,मधुकर लांडेकर,किशोर खरकाटे,आशा गाडगे,वच्छला तुपट,शामलाल लोखंडे,रघुनाथ लांडेकर,आशा कार आदी गावकरी मंडळींनी सहकार्य केले.