সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, August 30, 2010

चंद्रपूर जिल्ह्यात साथीच्या रोगाचे थैमान

चंद्रपूर जिल्ह्यात साथीच्या रोगाचे थैमान

Tags: chandrapur, diseases, vidarbha

Monday, August 30, 2010 AT 12:00 AM (IST)

सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर - जिल्ह्यातील नागरिक सध्या साथीच्या रोगाने ग्रासले असून, उपचारासाठी आरोग्य केंद्र आणि रुग्णालयात मोठ्या संख्येने भरती होत आहेत. मात्र, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातच औषधांचा तुटवडा आहे. डायरिया प्रतिबंधक औषधे आणि सलाईन नसल्याने रुग्णांना खासगी औषधालयातून खरेदी करावे लागत आहे. शहरातील सर्व खासगी दवाखाने ताप आणि साथीच्या रोगाने हाउसफुल्ल आहेत. शिवाय आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीच्या दवाखान्यात रुग्ण दिसून येत आहेत.
पावसाची उघडीप सुरू असतानाच वातावरणात झालेल्या बदलाचा परिणाम नागरिकांवर होऊ लागला आहे. रस्त्यावरील खड्डे, घरासमोरील घनकचरा आणि नाल्यातील सांडपाण्यातून डासांची उत्पत्ती होऊन पावसाळा रोगराईस आमंत्रण देत आहे. जिल्ह्यात सध्या साथीच्या रोगाचे थैमान असून, रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रात उपचार घ्यायला खाट उपलब्ध नाहीत, इतकी गर्दी झाली आहे.
पावसाळा सुरू झाला की, हळूहळू साथीचा रोग पाय पसरू लागतो आणि मलेरिया, ग्रॅस्टो, हगवण, उलटी, कावीळ यांसारखे रोग अख्ख्या कुटुंबाला आपल्या कवेत करतात. त्यामुळे कुटुंबच्या कुटुंबे रुग्णालयात हलविण्याची पाळी येत आहे. चंद्रपूर शहरातही हगवण, उलट्यांचे रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले आहेत. दररोज 300 ते 400 रुग्ण तपासणीसाठी येत असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांची तारांबळ उडत आहे. रुग्णालयात 200 ते 300 खाटांची व्यवस्था आहे. मात्र, येथे साडेचारशे रुग्ण भरती झाल्याने उर्वरित रुग्णांना खाली झोपून उपचार घ्यावा लागत आहे.
नागभीड तालुक्‍यातील अनेक गावांत कावीळ रोगाची लागण झाली असून, रुग्णालये हाउसफुल्ल झाली आहेत. तालुक्‍यातील आरोग्यसेवा सुरळीत ठेवण्यासाठी नवेगाव पांडव, मौशी, बाळापूर, तळोधी, वाढोणा येथे रुग्णालये आहेत. परंतु, मागील अनेक दिवसांपासून येथे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी गैरहजर राहत असल्याने रुग्णांची हेडसांळ होत आहे. तालुक्‍यातील मोहाळी, मांगली, कोरंभी आणि अन्य गावात काविळीची लागण झाली आहे.
मूल पावसाने दडी मारल्यानंतर वातावरणात बदल झाला असून, मलेरिया, कावीळ आणि ग्रॅस्टोची साथ पसरत आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची मोठ्या संख्येने गर्दी झाली आहे. उपजिल्हा रुग्णालयात 50 खाटांची व्यवस्था आहे. त्या संपूर्ण हाउसफूल असून, रुग्णांना बाहेरून उपचार घ्यावा लागत आहे. रुग्णांना भरतीसाठी आता जागा उपलब्ध नसल्याने खाली गादी टाकून उपचार घेताना रुग्ण दिसत आहेत. दुसरीकडे स्थानिक रुग्णांना घरूनच ये-जा करून उपचार घ्यावा लागत आहे. शहरात आणि ग्रामीण भागात उघड्यावरच्या घाणीमुळे ही साथ पसरली असून, डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी फवारणी केली जात नाही. दूषित पाण्यामुळेही हगवण, उलटी, कॉलरा, ग्रॅस्टोची लागण होत आहे.

मादी डास घातक
गाढ झोप लागते तेव्हा थव्याने येऊन गुणगुणत झोपेचे खोबरे करणाऱ्या मादी डासांमुळे तापाचा संसर्ग पसरतो. "सॅण्डफ्लॉय' माशी चावल्यानंतरच चंडीपुरा मेंदूज्वर होतो. "एडीस इजिप्टाय' ऍनाफेलीस, क्‍यूलेक्‍स डासाची मादी चावल्यानंतर डेंग्यूची शक्‍यता बळावते. फायलेरियामध्ये हीच स्थिती असते.



ताप येण्यास कारणीभूत घटक
-सॅण्डफ्लय
-एडीस इजिप्टाय
-ऍनाफेलीस
-क्‍यूलेक्‍स



जिल्हा सामान्य रुग्णालय

खाटांची संख्या-300


सध्या रुग्ण-340


साथीचे रुग्ण-20


आतापर्यंत मृत्यू-सात


जुलैअखेरपर्यंत चंडीपुरा रोगाचे 133 नोंद झाली होती.



प्रशासनाची बेपर्वाही
ग्रामीण भागात आजही शुद्ध पाणी मिळत नाही. त्यामुळे रोगांचा फैलाव प्रामुख्याने होतो. घनकचरा आणि नाल्यांची साफसफाई करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची आहे. मात्र, तसे काहीही केले जात नाही. आरोग्य यंत्रणेच्या इमारती गावोगावी आहेत. मात्र, औषधांचा साठाच नाही. त्यामुळे गरिबांच्या वाट्याला रोगराईचा सामना कायम आहे.

"पावसाळ्यामुळे डबक्‍यांमध्ये पाणी साचून अळ्या निर्माण होतात. त्याचे रुपांतर डासांमध्ये होते. मागील 15 दिवसांपासून साथीचा आजार दिसून येत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात 20 रुग्ण भरती आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. औषधांचा साठा संपला असून, वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू आहे.''


-डॉ. रमेश बांडेबुचे, जिल्हा शल्यचिकित्सक, चंद्रपूर

http://www.esakal.com/

लाच प्रकरणातील शल्यचिकित्सकजिल्हा सामान्य रुग्णालयाची प्रतिमा रुग्णांच्या गैरसोयीसोबतच आर्थिक गैरव्यवहाराने डागाळलेली आहे. सुमारे 25 वर्षांपूर्वी डॉ. खुरपे यांना लाचप्रकरणात अटक करण्यात आली होती. 1990 नंतर डॉ. गोटेफोडे यांना तीन हजार रुपये घेताना, तर 2004 मध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. उमाकांत अणेकर यांना 25 हजार रुपयांची लाच घेताना वरोरा येथे पकडण्यात आले होते. त्यानंतर तब्बल सहा वर्षांनी डॉ. रमेश बांडेबुचे हे दोन हजार 800 रुपये घेतल्याप्रकरणी लाचप्रकरणात अडकले आहेत. रुग्णालयाच्या इतिहासात डॉ. स्वामी, डॉ. अय्यर या अधिकाऱ्यांनाही अटक करण्यात आली होती.

Tuesday, August 24, 2010

तरुणांनी केली 300 कुष्ठरोगीबांधवांची कटिंग-दाढी

तरुणांनी केली 300 कुष्ठरोगीबांधवांची कटिंग-दाढी

Tuesday, August 24, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: social work, youth, malnutirican, chandrapur, vidarbha
सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर - साठ वर्षांच्या कालवधीमध्ये आनंदवन येथे बाबा आमटे यांनी कुष्ठरोगीबांधवांना येथे आणले. त्यांना स्वत: केस कापणे, दाढी करून देणे, अंघोळ घालून देत असत. ते त्यांना नवीन कपडे घालून देत असत. तेव्हा त्यांच्याजवळ कोणीही यायला तयार नव्हते. लोकांमध्ये आता सुद्धा काही प्रमाणात गैरसमज आहे. अशातच चंद्रपूर नाभिक समाजातील युवकांनी तेथे जाऊन 300 कुष्ठरोगीबांधवांची कटिंग-दाढी करून दिली.
महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा शाखा चंद्रपूर, सलून असोसिएशन चंद्रपूरतर्फे आनंदवन येथे मोफत कटिंग- दाढीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्‌घाटन साधनाताई आमटे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी श्री. प्रभू होते. प्रमुख पाहुणे म्हणून ओबीसी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष नंदू नागरकर, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे श्‍याम राजूरकर, मनोज पिंजदुरकर, अशोक गोलगुंडेवार, विलास बडवाईक, दत्तू कडूकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात नगाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली. कार्यक्रमाचे संचालन दिनेश एकवनकर यांनी केले. मान्यवरांच्या मनोगतानंतर रुग्णांच्या कटिंग-दाढी कार्यक्रमाला सुरवात झाली. यात मूकबधीर विद्यालय, अंध विद्यालय, अपंग विद्यालय, संधी शाळा, दवाखाने आदी ठिकाणी विद्यार्थी व रुग्णबांधवांची जवळपास 300 लोकांची कटिंग- दाढी करण्यात आली. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता अरविंद नक्षिणे, राजू कडवे, राजू कोंडस्कर, रोशन चातके, पांडुरंग, चौधरी, विठ्ठल चौधरी, रवि वानकर, नीलेश चल्लीवार, विजय कोंडस्कर, नानाजी कडूकर, रत्नाकर वानकर, पुरुषोत्तम घुमे, दीपक, चिंतामणी मांडवकर, संतोष अतकरे, मालचंद्र शेंडे, सुनील नक्षणे, दीपक नक्षणे, प्रकाश चांदेकर, सुभाष निंबाळकर यांनी सहकार्य केले.


60 वर्षांत आनंदवनात कटिंग-दाढीचा कार्यक्रम कधीही झाला नाही. चंद्रपूरच्या नाभिक समाजातील युवकांनी येथे येऊन रुग्णबांधवांची कटिंग- दाढीचा कार्यक्रम राबवून खूप मोठे धाडस केले आहे.


- साधनाबाई आमटे, ज्येष्ठ समाजसेविका

Monday, August 23, 2010

चंद्रपुरातील अतिवृष्टिग्रस्तांना शासनाकडून नुकसानभरपाई

चंद्रपुरातील अतिवृष्टिग्रस्तांना शासनाकडून नुकसानभरपाई

मुख्य पान

ऍग्रो स्पेशल
^^^^^^^^^^^^^^
Sunday, August 22, 2010 AT 12:00 AM (IST)

Tags: rain, chandrapur

चंद्रपूर - यंदाच्या पावसाळ्यातील पहिल्या तीन महिन्यांत जिल्ह्यात अतिवृष्टी, वीज आणि अन्य घटनांत १५ लोकांचे बळी गेले असून, २४ जनावरांचा मृत्यू झाला. याशिवाय एक हजार घरांची पडझड झाली असून, अतिवृष्टिग्रस्तांना शासनाच्या वतीने १४ लाखांची नुकसानभरपाई देण्यात आली.
काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने जिल्ह्यातील इरई, झरपट, वर्धा, वैनगंगा, पैनगंगा या प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. जुलैअखेरीस तसेच पाच ते सात ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीत जिल्ह्यात नुकसान झाले. नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा जिल्ह्यात आतापर्यंत पंधरा लोकांचा मृत्यू झाला आहे, तर २४ जनावरे मृत्युमुखी पडली. यामध्ये वीज पडून १२ लोकांचा, आगीने एकाचा तर पुरात वाहून गेल्याने आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. याशिवाय सहा बैल, चार गाई, तीन म्हशी व सात बकऱ्या अशी वीस जनावरे मृत्युमुखी पडली.
वीज पडून मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख असे बारा लाख व पशुपालकांना प्रत्येकी दहा हजार असे आतापर्यंत चौदा लाखांचे वाटप जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पाच ते सात ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीत एका व्यक्तीचा व चार बैलांचा मृत्यू झाला. पावसामुळे घरांची पडझड आणि पूल व रस्त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. चंद्रपूर-बल्लारपूर, चंद्रपूर-नागपूर, चंद्रपूर- मूल, चंद्रपूर-गडचिरोली या प्रमुख रस्त्यांचीही बरीच हानी झाली आहे.
या वर्षी अतिवृष्टीने सिंदेवाही, चिमूर, बल्लारपूर व चंद्रपूर या चार तालुक्‍यांत घरांची सर्वाधिक पडझड झाली आहे. ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत ६९७ घरे पूर्णपणे पडली होती. दरम्यान, नुकसानग्रस्तांना विविध योजनेअंतर्गत मदत देता यावी, यासाठी जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांनी अतिवृष्टीचा अहवाल तयार करून नागपूर येथे आयुक्त कार्यालयात पाठविला आहे.



पिकांचे नुकसान पाच टक्के

यंदा अतिवृष्टीमुळे पिकांचेही नुकसान झाले आहे; मात्र कृषी विभागाने हे नुकसान अवघे पाचच टक्के असल्याचा अहवाल तयार केल्याने सर्वेक्षणावर शंका उपस्थित केल्या जात आहेत. या वर्षी नदीकाठावरील अनेक शेतातील पिके नष्ट झाली. दरम्यान, पिकांवर झालेल्या लष्करी अळी व उंट अळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Agrowon - India's First Agro DailyAbout Us

Contact Us

http://www.agrowon.com/
epaper.agrowon.com

Thursday, August 12, 2010

श्रावण आला हं!

श्रावण आला हं!

पाऊस पडतो झिरीमिरी ओल्या झाल्यात कामिनी



भाकरीच्या पाट्या शेतात जातात घेऊनी


पाऊस पडतो पडतो थांबेना गं पागोळी


धरणीमाय हिरवी चोळी घालीतसे


पाऊस पडतो पडतो सये पडतो मुसळधार


गंगेला आला पूर दुही थडी "
ग्रामपंचायत निवडणुकांचा भार लिपिकांच्या खांद्यावर

ग्रामपंचायत निवडणुकांचा भार लिपिकांच्या खांद्यावर

अग्रोवन मुख्य पान


Thursday, August 12, 2010 AT 12:00 AM (IST)

Tags: agro, chandrapur, grampanchyat election
चंद्रपूर - नायब तहसीलदार, तहसीलदार आणि उपजिल्हाधिकाऱ्यांसारखी 45 अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या लिपिकांना निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडावी लागत आहे. जिल्ह्यातील 15 तालुक्‍यांतील 651 ग्रामपंचायतींच्या निवडणुका तोंडावर असून, हा भार लिपिकांना पेलावा लागत आहे.
ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पंचवार्षिक कालावधी पूर्ण होणाऱ्या 651 ग्रामपंचायतींच्या निवडणुका दोन टप्प्यांत होऊ घातल्या आहेत. पहिल्या (22 ऑगस्ट) व दुसऱ्या टप्प्यात (5 सप्टेंबर) अनुक्रमे 325 आणि 326 ग्रामपंचायतींसाठी मतदान होईल. या निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार आदी अधिकारी सांभाळतात; मात्र तब्बल 45 पदे रिक्त असल्याने मोठी गैरसोय होत आहे.
उपजिल्हाधिकारी जाधव यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी एम. एच. सोनगावकर यांची नियुक्ती करण्यात आली; मात्र ते अद्यापही रुजू झालेले नाहीत. त्यामुळे हे पद अनेक दिवसांपासून रिक्त आहे. अतिक्रमण विभागाचे उपजिल्हाधिकारी बावणे यांचीही बदली झाली असून, त्यांच्या जागी महिन्याभरापासून नवीन नियुक्ती करण्यात आली नाही. भूसंपादन विभागातील उपजिल्हाधिकाऱ्यांची चार पदे रिक्त आहेत. येथेही एकाही अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली नाही. उपजिल्हाधिकारी पदाच्या सहा जागा रिक्त असल्याने कार्यालयीन कामकाज हाताखालच्या कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे. तहसीलदारांच्या सहा जागा रिक्त आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल, सामान्य प्रशासनातही रिक्त जागा आहेत. जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांचा कारभार प्रभारी तहसीलदारांच्या खांद्यावर आहे. नायब तहसीलदारांच्या सर्वाधिक 33 जागा रिक्त असल्याने ग्रामीण भागातील कामकाज खोळंबले आहे. मोठ्या तालुक्‍यात नायब तहसीलदारांच्या चार, तर छोट्या तालुक्‍यात तीन जागा मंजूर आहेत. ब्रह्मपुरी तालुका वगळता बहुतांश तालुक्‍यांत केवळ एक ते दोन नायब तहसीलदार कार्यरत आहेत. ब्रह्मपुरीत नायब तहसीलदारांची चार पदे मंजूर असून, ती भरण्यात आली आहेत. चंद्रपूरसारख्या जिल्ह्याच्या मुख्यालयी केवळ सात जागा मंजूर असून, त्यापैकी केवळ दोन पदे भरण्यात आली आहेत. मूल तालुक्‍यात चारपैकी दोन, सावलीत दोन, राजुरा, कोरपना, जिवती येथे तीन, गोंडपिंपरी एक, पोंभुर्णा दोन, बल्लारपूर दोन, सिंदेवाही तीन, नागभीड दोन, चिमूर, भद्रावती, वरोरा येथे प्रत्येकी दोन जागा रिक्त आहेत. या रिक्त पदांचा कार्यभार लिपिकवर्ग सांभाळत असून, निवडणुकीच्या कामाचा बोजा त्यांच्यावर आला आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामांकन अर्ज भरणे सुरू आहे; मात्र लिपिकांना कोणतेही प्रशिक्षण देण्यात न आल्याने अनेक चुका होण्याची भीती राजकीय पक्षांकडून व्यक्त केली जात आहे.

http://www.agrowon.com/

Sunday, August 08, 2010

बोगस बिलांतून 25 लाखांचा गैरव्यवहार

बोगस बिलांतून 25 लाखांचा गैरव्यवहार

सकाळ वृत्तसेवा

Friday, August 06, 2010 AT 12:00 AM (IST)

Tags: crime, bribe, chandrapur, vidarbha

चंद्रपूर - कंत्राटी कर्मचाऱ्यांना अग्रीम रक्कम देता येत नसतानादेखील प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी बोगस बिले जोडून सर्वशिक्षा अभियानातील 25 लाखांचा गैरव्यवहार केल्याची माहिती आहे. वर्षभर प्रभार सांभाळणाऱ्या या शिक्षणाधिकाऱ्यांची नुकतीच बदली झाल्यानंतर हा घोळ लक्षात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात मागील दीड वर्ष कायमस्वरूपी शिक्षणाधिकारी नव्हते. त्यामुळे उपशिक्षणाधिकारी पदावरील अधिकारीच ही खुर्ची सांभाळत होते. जिल्हा परिषदेच्या सभा किंवा मोठ्या अधिकाऱ्यांच्या दौऱ्यादरम्यान हे प्रभारी अधिकारी नेहमीच गायब राहायचे. त्यांच्या दीड वर्षाच्या कार्यकाळात हजेरीपटावर आजारी रजा, दौरा, तातडीच्या कामाची नोंद आहे. सभांमध्ये उत्तर देणे जमत नसल्याने आणि आपला भोंगळ कारभार उघड होऊ नये म्हणून कनिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविणे, हा प्रकार त्यांच्या कार्यकाळात चालला. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांची बदली नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी येथे गटशिक्षणाधिकारी म्हणून झाली. त्यानंतर त्यांच्या जागी आलेल्या नव्या अधिकाऱ्याला मागील कार्यकाळात झालेला गैरव्यवहार लक्षात आला. मात्र, त्यांनी याची कुठे वाच्यता केलेली नाही. विश्‍वसनीय सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, कंत्राटी कर्मचाऱ्यांना अग्रीम रक्कम देता येत नाही. याउपरही प्रभारी शिक्षणाधिकाऱ्यांनी एक ते दीड लाखांचे अग्रीम राशी वितरित केली. त्याची कुठेही नोंद नसून, बोगस बिले जोडण्यात आली आहेत. सर्वशिक्षा अभियानांतर्गत येणाऱ्या अपंग एकात्म शिक्षण, पर्यायी शिक्षण, शैक्षणिक गुणवत्ता कार्यक्रम आदींची बिलेही बोगस असल्याची माहिती आहे. सात ते 10 जूनपर्यंत पंचायतराज कमिटीकरिता शिक्षण विभागाची एक चमू पाठविण्यात आली. त्यासाठी त्यांनी खासगी बस भाड्याने केल्याचे दाखविले. यात 20 ते 25 हजारांचे बिले जोडण्यात आली आहेत. वस्तुत: बस भाड्याने करण्यात आलेली नव्हती. जर केली असेल तर डिझेल किंवा टोलटॅक्‍सच्या पावत्या जोडलेल्या नाहीत. शिवाय कंत्राटी साधनव्यक्तीच्या नियुक्ती आणि बदलीतही आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती आहे.
सात लाखांच्या गुंतवणुकीत 15 लाखांची कमाई

सात लाखांच्या गुंतवणुकीत 15 लाखांची कमाई

सकाळ वृत्तसेवा
Friday, May 14, 2010 AT 12:15 AM (IST)

देवनाथ गंडाटे - सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर - कुष्ठरोग्यांचे नंदनवन असलेल्या आनंदवनात श्रमाचे मोल शिकायला मिळते. ज्येष्ठ समाजसेवक स्व. बाबा आमटे यांच्या स्वप्नातून साकारलेल्या या गावाची यशोगाथा जगापुढे आहे. त्याच आनंदवनात "आमच्या गावात आम्ही सरकार'च्या माध्यमातून गावकऱ्यांनी सात लाखांच्या गुंतवणुकीतून 15 लाखांची कमाई केली. सिमेंट, मातीच्या विटा आणि रोपविक्रीतून हा आदर्श घडविला आहे.

जलस्वराज्य प्रकल्पाच्या वतीने "आमच्या गावात आम्ही सरकार' या योजनेंतर्गत जिल्ह्यातील 14 गावांची निवड करण्यात आली होती. यापैकी आनंदवन ग्रामपंचायतीने ही योजना यशस्वीरीत्या राबविली. एप्रिल 2004 पासून या योजनेच्या कामांना सुरवात झाल्यानंतर सहा वर्षांमध्ये विविध उद्योगांतून यश मिळविले आहे. ग्रामपंचायतीला प्रोत्साहन क्षमता निधी 50 हजार रुपये वितरित करण्यात आल्यानंतर ग्रामसभा घेण्यात आली. गावनिहाय विकास समिती, सामाजिक लेखा परीक्षण समिती गठित करण्यात आली. या समितीने यवतमाळ जिल्ह्यातील जामगाव, सेंद्रिय (डोलारी) या हागणदारीमुक्त गावांना भेटी दिल्या. बुलडाणा जिल्ह्यातील दत्तापूर येथील दूधसंकलन केंद्राची पाहणी करण्यात आली. या अभ्यासदौऱ्यातून गावकऱ्यांना उद्योगविषयक माहिती मिळाली. अभ्यासगटाची चमू गावात परतल्यानंतर गावविकास आराखडा आणि पंचायत विकास आराखडा तयार करण्यात आला. यात गाव विकासासाठी सात लाख रुपये आणि पंचायत विकासासाठी एक लाख 74 हजार 200 रुपये मिळाले. लोकवाट्यातून दीड लाख रुपये जमा झाल्यानंतर एकूण 10 लाख रुपयांच्या निधीतून विकासकामांना सुरवात झाली. गावविकास आराखड्यात सिमेंट वीटभट्टी आणि सिमेंट खांब निर्मितीचा उद्योग सुरू झाला. यात दोन लाख 48 हजार 400 रुपयांची गुंतवणूक करून उद्योगाची पायाभरणी करण्यात आली. 100 विटांना दोन हजार रुपये असा खर्च यायचा. तयार झालेला माल आनंदवन संस्थांसाठी दोन हजार 200 रुपयांना, तर अन्य लोकांसाठी दोन हजार 200 रुपयांना 100 विटांप्रमाणे विक्री करण्यात आली. आठ मजुरांच्या भरवशावर एक दिवसात आठ हजार विटांची निर्मिती होते. आतापर्यंत पाच लाख 12 हजार 432 रुपयांचे उत्पन्न झाले आहे. सिमेंटशिवाय मातीच्या लाल विटाही तयार करण्यात आल्या. यासाठी तीन लाख 50 हजार 600 रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. एक हजार विटांसाठी एक हजार 200 रुपये खर्च यायचा. त्याची विक्री एक हजार 600 ते दोन हजार रुपयांपर्यंत करण्यात आली. उद्योगात 25 मजूर कामाला आहेत. डिसेंबर ते मे अखेरपर्यंत सहा लाख 13 हजार 603 रुपयांचे उत्पन्न मिळाले. चार मजुरांच्या भरवशावर रोपविक्री केंद्र सुरू झाले. यात एक लाखांची गुंतवणूक होती. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या काळात तीन लाख 94 हजार 840 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. रोपविक्री केंद्रातून सायपाम, एरिकापॉम, विद्यालहान, टेबलपॉम, आवळा, जाम, डाळिंब, फणस, अशोका मोठा, चाफा, सुपारीपॉम, ड्रेसिनया, सदाफुली, गुलाब आदी फुलाफळांच्या जाती घेण्यात आल्या.

पंचायत विकास आराखड्यात एक लाख चार हजारांच्या गुंतवणुकीतून झेरॉक्‍स मशिन सुरू करण्यात आली. अवघ्या चार महिन्यांत 29 हजार रुपयांचे उत्पन्न झाले. या कामाशिवाय गावाच्या विकासासाठी सांडपाणी नालीद्वारा तलावात सोडून मत्स्यपालन, चारा उत्पादन, भाजीपाला घेण्यात आला. मासेमारीतून तीन लाख, तर भाजीपाल्यातून दीड लाखापर्यंत उत्पन्न मिळाले आहे. मिळालेल्या एकूण नफ्यातील 80 हजार रुपये खर्चून आनंदवन येथे पथदिवे लावण्याचा संकल्प ग्रामपंचायतीने केला आहे

प्रतिक्रिया
On 5/14/2010 5:57 PM sarang said:
या बातमी मुले लोकांमुळे समूह भावना निर्माण होऊन गाव विकासाची वाट शोधण्यास मदत झाली आहे. अशाच प्रकारे शाशकीय योजनामध्ये यशस्वी झालेल्या कामांना प्रशिद्धी दिल्यास लोकांमध्ये विकासाची भावना जागृत झाल्याशिवाय राहणार नाही. कृष्णकांत खानझोडे -९८५०६१२९१३ सारंग काकडे जलस्वराज्य प्रकल्प जिल्हा परिषद -चंद्रपूर
सावली तहसील

सावली तहसील

चंद्रपुर जिले में सावली तहसील है. मूल गढ़चिरोली रोड पर स्थित है, के बारे में 11.26 किलोमीटर है.1961 में जनसंख्या 4,871 थी. सावली में सबसे जादा धान की खेती के तहत किया जा रहा है. सरासरी चौथाई गांवों में चावल के उत्पादन का है. इसके ठीक दो भूमि टैंक, आसोला मेंढा तलाव  और कई सिंचाई कुओं से सिंचित कर रहे हैं. कुछ परिवारों तसर  रेशम की बुनाई में लगे हुए हैं और एक बार उद्योग एक बहुत ही समृद्ध हालत में था. यह कमी आई है. और अब विलुप्त हो सकता है. अगर कोई प्रोत्साहन दिया जाता है. अन्य स्थानीय उल्लेख के लायक उद्योग चप्पल के विनिर्माण के लिए जो जगह इतनी अच्छी तरह से जाना जाता है. 1894 में गांव को गंभीरता से एक आग है कि निराश और 800 से अधिक घरों की राख करने के लिए कम से प्रभावित किया गया था. हालांकि, गांव झटका है कि पहले से बरामद किया है लंबी और अब अच्छी तरह से अपनी समृद्धि के लिए रास्ता है. Saoli एक स्कूल, एक औषधालय और एक पोस्ट कार्यालय है. एक साप्ताहिक बाजार में गुरुवार को आयोजित है. उद्योग न होने से तहसील के युव शहर में रोजगार के लिए आते है.
चंद्रपुरात सरासरी 116.5 मि.मी. पाऊस!

चंद्रपुरात सरासरी 116.5 मि.मी. पाऊस!

Sunday, August 08, 2010 AT 12:00 AM (IST)
चंद्रपूर - गेल्या 24 तासांत झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील वैनगंगा, वर्धा आणि इरई नदी दुथडी भरून वाहत आहे. शुक्रवारी (ता. 6) ब्रह्मपुरी तालुक्‍यातील नांदगाव (जानी) येथे भिंत कोसळून मुकरू बांगरे हा तरुण ठार झाला. या पावसात चंद्रपूर, कुनाडा, राजुरा, ब्रह्मपुरी, कोठारी येथील घरांची पडझड झाली.
जिल्ह्यात मागील 48 तासांत सरासरी 116.5 मि.मी. पावसाची नोंद झाली. यात सावली, गोंडपिंपरी, पोंभुर्णा, चंद्रपूर, राजुरा, बल्लारपूर, जिवती, सिंदेवाही, कोरपना, मूल आणि ब्रह्मपुरी तालुक्‍यांत मुसळधार पाऊस झाला. इरई धरणातील पाण्याची पातळी वाढल्याने संभाव्य धोका लक्षात घेता सहा दरवाजे उघडण्यात आले. 207 दश. घ.मी. क्षमता असलेल्या इरई धरणात 206.4 दश. घ.मी. जलसाठा भरला आहे. एकूण सात दरवाजे असलेल्या धरणातील साठा वाढल्याने सुरवातीला दोन दरवाजे उघडण्यात आले. त्यानंतर दुपारी तीन आणि सायंकाळी सहा दरवाजे उघडण्यात आले. सर्व दरवाजे तीन मीटरने उघडण्यात आले असून, इरई नदी दुथडी भरून वाहत आहे. चंद्रपूर ते दाताळा जाणारा मार्ग इरई नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने बंद झाला होता. या पावसामुळे शुक्रवारी सायंकाळपर्यंत लाठी-कोठारी, वणी-माजरी आणि घुग्घुस-वणी या प्रमुख मार्गांचा संपर्क तुटला होता. त्यामुळे परिवहन महामंडळाने अनेक बसफेऱ्याही रद्द केल्या होत्या. जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्ना जोशी आणि दिवाणी न्यायाधीश खांडडहाले यांच्या शासकीय निवासस्थानावरही झाड कोसळल्याने बरीच हानी झाली. याशिवाय पोलिस मुख्यालय चौकातील मोठे झाड उन्मळून पडल्याने नागपूर-मूल मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली.
चंद्रपूर जिल्हा :
सावली : 161, गोंडपिंपरी : 154.2, पोंभुर्णा : 153, चंद्रपूर : 140, राजुरा : 136.2, बल्लारपूर : 128.4, जिवती : 127, सिंदेवाही : 123, कोरपना : 113, मूल : 106.2, ब्रह्मपुरी : 103.2, नागभीड : 97.6, भद्रावती : 93,90 मि.मी.पेक्षा कमी पावसाचे तालुके ः वरोरा- 62.4, चिमूर- 49.5


^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
तुमची प्रतिक्रिया लिहा

* नाव:
* ई-मेल:
* प्रतिक्रिया:

Saturday, August 07, 2010

आठवडाभरातच सीडी रस्त्यावर

आठवडाभरातच सीडी रस्त्यावर

पायरसी रोखणारा अधिकारी बेपत्ता

सकाळ वृत्तसेवा
Thursday, August 05, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: pirated CD, chandrapur, vidarbha
चंद्रपूर - "सकाळ'ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर आठ दिवस गायब राहिलेल्या बनावट सीडी पुन्हा रस्त्यावर आल्यात. जटपुरा गेट ते प्रियदर्शिनी चौकापर्यंत हातगाड्यांवर सीडी विकताना दिसून आले. शहरात अश्‍लील सीडीचे प्रकरण गाजत असतानाच हा प्रकार खुलेआम सुरू असल्याने प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. यात कारवाई करण्यासाठी पोलिसांचे हात कमी पडत असून, पायरसी रोखणारा अधिकारीच मुळात बेपत्ता झाला आहे.
चित्रफितींच्या बनावट सीडी बाजारात येऊ नयेत, याची जबाबदारी पायरसी रोखणाऱ्या कंपन्यांना दिली जात; मात्र आता उलट झाले आहे. शहरातील प्रमुख वितरक पायरसी रोखणाऱ्या अधिकाऱ्याला हाताशी धरून बनावट सीडीचा गोरखधंदा सुरू झाला आहे. हा प्रकार मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. "अग्रवाल आणि शाहा' नामक व्यक्ती सीडीकिंग असल्याचे प्रकरण पुढे आले होते. त्यावेळी तब्बल अडीच लाखांच्या सीडी जप्त करण्यात आल्या होत्या. यातील अनेक सीडी अश्‍लील आणि बनावट असल्याचे पोलिसांना मिळालेल्या अहवालातून स्पष्ट झाले. याउपरही कारवाई करण्यात आलेली नाही.
हातगाडीवर विकल्या जाणाऱ्या सीडी चित्रपट गाण्यांच्या असतात, असे प्रथमदर्शनी भासविले जात होते; मात्र एखाद्या ग्राहकाने हळू आवाजात अश्‍लील चित्रफितीची मागणी केल्यास तीसुद्धा त्याला पुरविण्यात येते.
बोगस बिलांतून 25 लाखांचा गैरव्यवहार

बोगस बिलांतून 25 लाखांचा गैरव्यवहार

सकाळ वृत्तसेवा

Friday, August 06, 2010 AT 12:00 AM (IST)

Tags: crime, bribe, chandrapur, vidarbha

चंद्रपूर - कंत्राटी कर्मचाऱ्यांना अग्रीम रक्कम देता येत नसतानादेखील प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी बोगस बिले जोडून सर्वशिक्षा अभियानातील 25 लाखांचा गैरव्यवहार केल्याची माहिती आहे. वर्षभर प्रभार सांभाळणाऱ्या या शिक्षणाधिकाऱ्यांची नुकतीच बदली झाल्यानंतर हा घोळ लक्षात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात मागील दीड वर्ष कायमस्वरूपी शिक्षणाधिकारी नव्हते. त्यामुळे उपशिक्षणाधिकारी पदावरील अधिकारीच ही खुर्ची सांभाळत होते. जिल्हा परिषदेच्या सभा किंवा मोठ्या अधिकाऱ्यांच्या दौऱ्यादरम्यान हे प्रभारी अधिकारी नेहमीच गायब राहायचे. त्यांच्या दीड वर्षाच्या कार्यकाळात हजेरीपटावर आजारी रजा, दौरा, तातडीच्या कामाची नोंद आहे. सभांमध्ये उत्तर देणे जमत नसल्याने आणि आपला भोंगळ कारभार उघड होऊ नये म्हणून कनिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविणे, हा प्रकार त्यांच्या कार्यकाळात चालला. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांची बदली नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी येथे गटशिक्षणाधिकारी म्हणून झाली. त्यानंतर त्यांच्या जागी आलेल्या नव्या अधिकाऱ्याला मागील कार्यकाळात झालेला गैरव्यवहार लक्षात आला. मात्र, त्यांनी याची कुठे वाच्यता केलेली नाही. विश्‍वसनीय सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, कंत्राटी कर्मचाऱ्यांना अग्रीम रक्कम देता येत नाही. याउपरही प्रभारी शिक्षणाधिकाऱ्यांनी एक ते दीड लाखांचे अग्रीम राशी वितरित केली. त्याची कुठेही नोंद नसून, बोगस बिले जोडण्यात आली आहेत. सर्वशिक्षा अभियानांतर्गत येणाऱ्या अपंग एकात्म शिक्षण, पर्यायी शिक्षण, शैक्षणिक गुणवत्ता कार्यक्रम आदींची बिलेही बोगस असल्याची माहिती आहे. सात ते 10 जूनपर्यंत पंचायतराज कमिटीकरिता शिक्षण विभागाची एक चमू पाठविण्यात आली. त्यासाठी त्यांनी खासगी बस भाड्याने केल्याचे दाखविले. यात 20 ते 25 हजारांचे बिले जोडण्यात आली आहेत. वस्तुत: बस भाड्याने करण्यात आलेली नव्हती. जर केली असेल तर डिझेल किंवा टोलटॅक्‍सच्या पावत्या जोडलेल्या नाहीत. शिवाय कंत्राटी साधनव्यक्तीच्या नियुक्ती आणि बदलीतही आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती आहे.