काव्यशिल्प Digital Media: चंद्रपूर जिल्हा माहिती कार्यालय

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label चंद्रपूर जिल्हा माहिती कार्यालय. Show all posts
Showing posts with label चंद्रपूर जिल्हा माहिती कार्यालय. Show all posts

Thursday, October 18, 2018

28 आणि 29 ऑक्‍टोबर बेरोजगारांसाठी महामेळाव्‍याचे आयोजन

28 आणि 29 ऑक्‍टोबर बेरोजगारांसाठी महामेळाव्‍याचे आयोजन

21 ते 25 ऑक्टोबर या काळात ऑनलाईन नोंदणी अनिवार्य 

50 ख्यातनाम कंपन्यांकडून शेकडोंची जागेवरच होणार निवड 
चंद्रपूर जिल्‍हयातील सुशिक्षीत बेरोजगारांनी लाभ घेण्‍याचे आवाहन

चंद्रपूर/प्रतिनिधी:
Image may contain: 1 person, smiling
 राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने दिनांक 28 आणि 29 ऑक्‍टोबर 2018 रोजी चंद्रपूर जिल्हयातील युवकांसाठी युथ एम्‍पॉवरमेंट समीट अर्थात रोजगार महामेळाव्‍याचे आयोजन बल्‍लारपूर तालुक्‍यातील बामणी येथे करण्‍यात आले आहे. पारदर्शी निवड प्रक्रीयेचा आदर्श या मेळाव्यातून उभा राहिला पाहिजे. यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन, डिजीटल सर्टिफिकेट, जागेवरच अपाँईंटमेट लेटर आणि प्लेसमेंट प्रक्रीया पूर्ण केल्या जाईल. त्यामुळे या मेळाव्याच्या आयोजनाची शिस्त प्रत्येक कार्यकर्त्याने, विभागाने व आयोजकांनी पाळावी, असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केले.
स्थानिक हॉटेलमध्ये आयोजित बैठकीत ते आज बोलत होते. मार्गदर्शन, प्रशिक्षण, कार्यशाळा, मुद्रा कर्ज उपलब्धता, याशिवाय 50 प्रतिष्ठीत कंपन्याकडून शेकडो युवकांची निवड या ठिकाणी होणार आहे. या मेळाव्यात सहभागासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे. त्यामुळे 21 पासून सुरू होणाऱ्या या नोंदणी प्रक्रीयेवर तरुणांना लक्ष केंद्रीत करायला सांगा. ज्याच्यात प्रावीण्य असेल, कौशल्य असेल, गुणवत्ता असेल अशी तुमच्या व माझ्या जिल्हयातीलच मुलांची निवड होणार आहे. आपला जिल्हा रोजगार युक्त व्हावा, ही भावना ठेऊन यामध्ये सहभागी व्हा, आपल्या गावातील, तालुक्यातील, गटातील मुलांना मोठया कंपन्यांचे आकर्षक पॅकेज मिळावे. मुंबई, पुणे याप्रमाणे संधी मिळावी यासाठी कंपन्याच आपण हजार किलोमिटर अंतरावरील बल्लारपूरला आणल्या आहेत. या ठिकाणी फक्त नोकरीच भेटणार नसून ख्यातीप्राप्त मार्गदर्शक रोजगार, स्वयंरोजगार व अन्य क्षेत्रामध्ये करिअर घडवण्यासाठी मदत करणार आहे, जिल्हयाच्या कायम स्मरणात राहील असा हा मेळावा असेल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी नागपूर येथील फॉर्च्यून फाऊडेशनचे अध्यक्ष आमदार अनील सोले यांनी या मेळाव्यातून आपल्या मुलाला, नातेवाईकाला नोकरी लावायची नसून या जिल्ह्यातल्या हजारो युवकांना नोकरी देण्यासाठी हे आयोजन आहे. ऑनलाइन रजिस्ट्रेशन आणि प्रख्यात कंपन्यांना गुणवान मुलांची उपलब्धता करणे, त्यांना बल्लारपूरच्या आयोजन स्थळावर पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे व त्यासाठी संपूर्ण यंत्रणेने काम करावे. अतिशय पारदर्शी अशी निवड प्रक्रिया या ठिकाणी मुलांसमोरच केली जाणार आहे. राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री यांनी पुढाकार घेतल्यामुळे मुंबई, पुणे आणि औरंगाबाद येथील प्रख्यात कंपन्या चंद्रपूर सारख्या ठिकाणी येत आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून हजारो लोकांना आपला आयुष्य घडविण्याची संधी आम्हा सर्वांना या आयोजनातून मिळणार आहे हे लक्षात घ्या, असेही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना स्पष्ट केले.
यावेळी काही समित्यांचे गठन करण्यात आले. 21 तारखेपासून सुरू होणाऱ्या ऑनलाइन रजिस्ट्रेशनला सर्वाधिक महत्त्व देण्याचे आवाहन यावेळी आमदार सोले यांनी केले. आमदार सोले यांच्या नेतृत्वातील फॉर्च्यून फाउंडेशन हे या मेळाव्याच्या आयोजकांतर्फे एक आहे. याशिवाय जिल्‍हा कौशल्‍य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय चंद्रपूर, प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना, जिल्हा समन्वय समिती, चंद्रपूर यांच्‍या वतीने हे आयोजन करण्‍यात आले आहे.
चंद्रपूर जिल्‍हा रोजगारयुक्‍त बनविण्‍याच्‍या दृष्‍टीने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मिशन सेवा, मिशन स्‍वयंरोजगार, मिशन कौशल्‍य विकास, मिशन फॉरेन सर्विसेस, मिशन उन्‍नत शेती, मिशन सोशल वर्क हा सहा सुत्री कार्यक्रम हाती घेतला आहे. युथ एम्‍पॉवरमेंट समीट हा या सहा सुत्री कार्यक्रमाचा प्रमुख भाग आहे.

इयत्‍ता 10 वी पासुन पदवी, पदव्‍युत्‍तर, अभियांत्रीकी, आय.टी.आय. अशा सर्वच प्रकारचे शिक्षण घेतलेले चंद्रपूर जिल्‍हयातील तरूण-तरूणी या मेळाव्‍यात सहभागी होवू शकतील. यासाठी www.yeschandrapur.com /register.aspx या माध्‍यमातुन ऑनलाईन नोंदणी इच्‍छूक तरूण, तरूणी करू शकतील. दिनांक 21 च्या सकाळी 10 वाजतापासून ते 25 ऑक्‍टोबरच्या सायं.6 वाजेपर्यंत 5 दिवस ऑनलाईन नोंदणी सुरू राहणार आहे.

सेवानिवृत्ती वेतन धारकांना सूचना

सेवानिवृत्ती वेतन धारकांना सूचना

निवृत्त वेतनधारक साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी:
 चंद्रपूर कोषागारांतर्गत बॅकेद्वारे निवृत्तीवेतन घेणा-या सर्व निवृत्ती वेतन धारकांनी 1 नोव्हेबर 2018 रोजी हयात असल्याचे प्रमाणपत्र (life Certificate) सादर करण्याची यादी सबंधीत बॅकेत पाठविण्यात आलेली आहे. त्या यादीतील आपले नावाचे समोर 30 नोव्हेबर 2018 पूर्वी स्वत: उपस्थित होऊन स्वाक्षरी करावयाची आहे. त्या यादीत निवृत्तीधारकांनी स्वाक्षरी केल्यानंतर संबंधीत बँक ती यादी या कार्यालयाकडे सादर करणार असून त्या यादीनुसार निवृत्तीधारकांना डिसेंबर 2018 चे निवृत्तीवेतन बँकेकडे पाठविल्या जाईल.
तसेच जे निवृत्तवेतन धारक मनिऑर्डर द्वारे निवृत्तवेतन घेतात त्यांनी आपले हयात प्रमाणपत्र राजपत्रित अधिकाऱ्यांची स्वाक्षरी घेवून 15 डिसेबर 2018 पूर्वी कोषागारात सादर करावे. तसेच जे निवृत्तवेतन धारक कुटुंबनिवृत्तवेतन घेत आहेत. त्यांनी हयात असल्याचे प्रमाणपत्रासोबत शासकीय सेवेत असल्यास अथवा नसल्यास तसे प्रमाणपत्रावर निवृत्तवेतन व कुटुंबनिवृत्तवेतन घेणाऱ्यांनी दोन्ही ठिकाणी आपले नावाचे समोर स्वाक्षरी करावी.
हयात प्रमाणपत्र 15 डिसेबर 2018 पूर्वी कोषागारात प्राप्त न झाल्यास त्यांचे माहे डिसेबर 2018 पासूनचे निवृत्तीवेतन बॅकेकडे पाठविले जाणार नसल्याने याची कृपया नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी चंद्रपूर यांनी केले आहे.

चंद्रपूरची मुले मिळविणार भारतासाठी ऑलिम्पिक पदक

चंद्रपूरची मुले मिळविणार भारतासाठी ऑलिम्पिक पदक

2024 मध्ये भारतासाठी ऑलिम्पिक पदक मिळविणारे 
चंद्रपूरची मुले मिशन शक्ती मधून पुढे येतील :ना. मुनगंटीवार
राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेचा चंद्रपुरात समारोप
चंद्रपूर /प्रतिनिधी:
मिशन शक्ती मधून 2024 मध्ये चंद्रपूरची मुले ऑलिम्पिक पदकासाठी सज्ज व्हावीत, यासाठी जिल्हाभरात क्रीडा संकुल अद्ययावत करण्यात येत आहे. प्रशिक्षणासाठी औद्योगिक घराण्यांची मदत घेतली जाणार आहे. ख्यातनाम चित्रपट अभिनेते आमिर खान यांच्या हस्ते मिशन शक्ती ची सुरुवात होणार आहे, अशी माहिती राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिली. चंद्रपूर येथे आयोजित राज्यस्तरीय शालेय स्पर्धेतील महाराष्ट्रातील विजेत्यांना मुनगंटीवार यांनी पुरस्कार प्रदान केले.
जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत या समारोपीय सत्राचे आयोजन करण्यात आले होते. राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील मुले व मुली 17 वर्षाखालील मुले व मुली व 19 वर्षाखालील मुले व मुली यांच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या सर्व स्पर्धा व क्रीडा प्रबोधिनीचे वर्चस्व कायम राहिले. सर्व विभागांना संमिश्र यश देणाऱ्या हा स्पर्धा गेल्या चार दिवसांपासून चंद्रपूरच्या जिल्हा क्रीडा संकुलामध्ये उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनासाठी जिल्हा क्रीडाधिकारी अनंत बोबडे व त्यांच्या चमूचे पालकमंत्र्यांनी यावेळी स्वागत केले.
महाराष्ट्राच्या सर्वदूर भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना या वेळी शुभेच्छा देताना पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबई पुण्यापासून ते अमरावती नाशिकच्या सर्व विद्यार्थ्यांनी ताडोबाचे वाघ बघून जावे यासाठी त्यांची व्यवस्था करत असल्याची गोड बातमी या भाषणादरम्यान दिली. सध्या आयोजित होत असलेल्या चंद्रपूर येथे काही दिवसानंतर ऑलंपिकपटू सोबत तुमच्या मुलाखती होतील,असे सूतोवाच त्यांनी केले. यावेळी मिशन शक्ती संदर्भात माहिती दिली. मिशन शक्ती अंतर्गत सहा निवडक ऑलिम्पिकच्या क्रीडा प्रकारामध्ये चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील सर्व स्तरातील गुणवान खेळाडूंची निवड करून त्यांना 2024 च्या ऑलम्पिक साठी सिद्ध करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाभरात सर्व तालुक्याच्या ठिकाणी अद्ययावत क्रीडा संकुल तयार होत आहे. या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देण्यासाठी रिलायन्स या उद्योग घराण्याने मदत देण्याची मान्यता दिली आहे. तर लगान व दंगल या सिनेमातून क्रीडा प्रकाराला वाव देणाऱ्या अमीर खान यांनी मिशन शक्ती ही संकल्पना उचलून धरली असून त्यांच्या हस्ते मिशन शक्तीची सुरुवात चंद्रपूर मध्ये लवकरच करत असल्याचे त्यांनी सांगितले. भारताला आतापर्यंत केवळ 28 मेडल ऑलिम्पिकमध्ये मिळाले असून आता क्रीडा क्षेत्रामध्ये काटक, गुणवान अशा सर्व स्तरातील ग्रामीण भागातील मुलांना योग्य संधी देऊन ऑलिम्पिक मेडलची संख्या वाढवण्याची मनीषा असल्याचे त्यांनी सांगितले. मिशन शौर्य अंतर्गत सतरा -अठरा वर्षाचे आदिवासी विद्यार्थी एवरेस्ट सर करू शकले. त्यामुळे योग्य ट्रेनिंग दिल्यास चंद्रपूर-गडचिरोली भागातील तरुण क्रीडा प्रकारात चमक दाखवू शकतात, अशी शाश्वती आपणास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी महापौर अंजलीताई घोटेकर यांनी देखील खेळाडूंशी संवाद साधला. तत्पूर्वी चंद्रपूरचे आमदार नानाभाऊ शामकुळे यांनी देखील विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. व्यासपीठावर जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर राजेश नायडू, कुंदन नायडू, प्राध्यापक वसंतराव अकुलकर आदींची उपस्थिती होती. 
राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये विभागवार विजेत्यांची नावे गटानुसार पुढीलप्रमाणे आहे
या क्रीडा स्पर्धेचे प्रथम, व्दितीय व तृतिय क्रमांकाचे विजय संघ पुढील प्रमाणे- 14 वर्ष वयोगटातील मुले प्रथम बक्षिस क्रीडा प्रबोधिनी, व्दितीय पुणे व तृतिय नाशिक, 14 वर्षाखालील मुली प्रथम क्रीडा प्रबोधिनी, व्दितीय मुंबई व तृतिय अमरावती, 17 वर्षे वयोगटातील मुले प्रथम मुंबई, व्दितीय क्रीडा प्रबोधिनी व तृतिय नाशिक, 17 वर्षाखालील मुली प्रथम मुंबई, व्दितीय क्रीडा प्रबोधिनी व तृतिय नागपूर, 19 वर्षे वयोगटातील मुले प्रथम क्रीडा प्रबोधिनी, व्दितीय मुंबई व तृतिय कोल्हापूर आणि 19 वर्षाखालील मुली प्रथम मुंबई, व्दितीय पुणे व तृतिय कोल्हापूर या संघानी पहिल्या दिवशीच्या खेळामध्ये 17 वर्ष वयोगटात नाशिक, क्रीडा प्रबोधिनी नागपूर, औरगांबाद, 19 वर्ष वयोगटातील मुलांच्या संघात मुंबई, लातूर, 14 वर्ष मुलांच्या गटात कोल्हापूर, क्रीडा प्रबोधिनी पुणे, अमरावती, नागपूर, 14 वर्ष मुलींच्या गटात पुणे, क्रीडा प्रबोधिनी मुंबई व अमरावती संघानी प्रावीण्या प्राप्त केलेले आहेत.
 अखर्चीत निधी खर्च   करण्‍यासाठी मुदतवाढ

अखर्चीत निधी खर्च करण्‍यासाठी मुदतवाढ

सुधीर मुनगंटीवार यांचा महत्‍वपूर्ण निर्णय
चंद्रपूर/प्रतिनिधी:
 पुर्व विदर्भातील माजी मालगुजारी तलावांचे पुनरूज्‍जीवन करण्‍याच्‍या कार्यक्रमाअंतर्गत चंद्रपूर जिल्‍हा परिषदेला सन 2016-17 मध्‍य वितरीत केलेल्‍या रू.34.46 कोटी निधीपैकी अखर्चीत रू.13.52 कोटी निधी दिनांक 31 मार्च 2019 पर्यंत खर्च करण्‍याच्‍या प्रस्‍तावाला राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी मान्‍यता दिली आहे.
पूर्व विदर्भातील माजी मालगुजारी तलावांचे पुनरूज्‍जीवन करण्‍याच्‍या कार्यक्रमाला शासन निर्णय दिनांक 16.5.2016 अन्‍वये मान्‍यता देण्‍यात आली असून हा कार्यक्रम सन 2016-17 ते सन 2018-19 या तीन वर्षामध्‍ये पूर्ण करण्‍याचे उद्दिष्‍ट आहे. चंद्रपूर जिल्‍हयामध्‍ये 51.91 कोटी रू. दायीत्‍वाची 520 कामे आहे. त्‍यापैकी 349 कामे भौतिकदृष्‍टया पूर्ण झाली असून त्‍यासाठी रू.20.94 कोटी निधी खर्च झाल्‍यानंतरही अंदाजे 10 कोटी रू. रकमेचे दायीत्‍व प्रलंबित आहेत. यासंबंधीची देयके प्रलंबित असल्‍यामुळे प्रगतीपथावरील 165 कामे पूर्ण करण्‍यासाठी वारंवार निविदा काढून देखील कंत्राटदारांकडून प्रतिसाद प्राप्‍त होत नाही. तसेच तलावामध्‍ये पाणी असल्‍यामुळे व काही दुरूस्‍ती दगडी अस्‍तराचे काम असल्‍यामुळे सदरची दुरूस्‍तीची कामे शक्‍य झाली नाही. या कार्यक्रमामुळे पुर्व विदर्भातील तलावांची सिंचन क्षमता तुलनेने कमी निधीमध्‍ये पुनःर्स्‍थापित होवून धान उत्‍पादक शेतक-यांना संरक्षीत सिंचनाची सोय होणार आहे. त्‍यामुळे जलयुक्‍त शिवार अभियानाच्‍या उद्देशाप्रमाणे गाव जल परिपूर्ण होण्‍यास मदत होणार आहे.
सन 2016-17 मध्‍ये वितरीत केलेला निधी दिनांक 31.3.2018 पर्यंत खर्च करता येईल असे शासन निर्णयात नमूद असल्‍यामुळे यासाठी एक वर्ष मुदतवाढ देण्‍याचा निर्णय अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. या माध्‍यमातुन माजी मालगुजारी तलावांच्‍या पुनरूज्‍जीवनाच्‍या कार्यक्रमाची उद्देशपुर्ती होण्‍यास मदत झाली आहे.

Friday, October 12, 2018

 पोंभुर्णा पोल्‍ट्री प्रोडयुसर्स कंपनी माझ्या भगिनींची कंपनी असल्‍याचा अभिमान:मुनगंटीवार

पोंभुर्णा पोल्‍ट्री प्रोडयुसर्स कंपनी माझ्या भगिनींची कंपनी असल्‍याचा अभिमान:मुनगंटीवार

चंद्रपूर/प्रतिनिधी:
 नवरात्र हा आदिशक्‍ती, मातृशक्‍तीचा उत्‍सव आहे. मातृशक्‍ती सुदृढ व सशक्‍त करायची असेल तर महिलांचे सक्षमीकरण अत्‍यंत गरजेचे आहे. पोंभुर्णा येथे आदिवासी महिलांद्वारे संचालित कुक्‍कुटपालन प्रकल्‍प हा दुर्गम भागातील महिला सक्षमीकरणाचे प्रभावशाली उदाहरण आहे, असे कौतुकोदगार राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी काढले. हा प्रकल्‍प माझ्या मतदार संघातला त्‍यातही माझ्या भगिनींचा आहे. याचा मला सार्थ अभिमान असल्‍याचेही ते यावेळी बोलताना म्‍हणाले.
12 ऑक्टोंबर रोजी पोंभुर्णा येथे आदिवासी महिलांद्वारे संचालित कुक्‍कुटपालन संस्‍थेच्‍या पहिल्‍या वार्षीक सर्वसाधारण सभेत ना.सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्‍हणाले, साधारणतः कंपनी असे म्‍हटले तर टाटा, बिर्ला अशी मोठी नावे डोळयासमोर येतात. पोंभुर्णा महिला पोल्‍ट्री प्रोडयुसर्स कंपनी लिमी. ही कंपनी माझ्या भगिनींची कंपनी आहे. याचा मला खरोखर अभिमान आहे, असेही ते म्‍हणाले.
या मतदार संघात रोजगार व स्‍वयंरोजगाराला चालना देणारे अनेक प्रकल्‍प आपण राबवित आहोत. चिचपल्‍ली येथील बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्राची दखल सिंगापूरच्‍या प्रसार माध्‍यमांनी घेतली आहे. मत्‍स्‍यपालन, दुग्‍धव्‍यवसाय आपण या भागात राबविणार आहोत. 15 नोव्‍हेंबर पर्यंत टुथपिक तयार करण्‍याचा प्रकल्प आपण कार्यान्‍वीत करणार आहोत. पोंभुर्णा येथे मॉडेल पंचायत समिती आपण उभारत आहोत. युवक-युवतींना स्‍पर्धा परिक्षांच्‍या तयारीसाठी साहित्‍य उपलब्‍ध करण्‍याच्‍या दृष्‍टीने अद्ययावत वाचनालय उभारत आहोत. पोंभुर्णा येथे पोलिस प्रशिक्षण केंद्र निर्माण होत आहे. शेतक-यांचे उत्‍पन्‍न वाढविण्‍याच्‍या दृष्‍टीने मुल आणि पोंभुर्णा तालुक्‍यात टाटा ट्रस्‍टच्‍या सहाय्याने सधन शेतकरी प्रकल्प आपण राबवित आहोत. पोंभुर्णा येथे सुसज्‍ज अशी ग्रामीण रूग्‍णालयाची इमारत उभी होत आहे. चिचडोह सिंचन प्रकल्‍प आपण पूर्ण केला आहे. लवकरच हा प्रकल्‍प शेतक-यांच्‍या सेवेत रूजु होणार आहे. विशेष बाब म्‍हणून मुल व पोंभुर्णा तालुक्‍यातील शेतक-यांना विहीरी आपण उपलब्‍ध करून दिल्‍या आहेत, असेही त्‍यांनी सांगीतले. 
पंतप्रधानांसमोर आपल्‍या प्रकल्‍पाचे निर्भीडपणे सादरीकरण करणा-या श्रीमती कुंतीबाई धुर्वे यांचे कौतुक करत ना.सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, मिशन शक्‍तीच्‍या माध्‍यमातुन जिल्‍हयातील आदिवासी विद्यार्थ्‍यांनी माऊंट एवरेस्‍टवर झेंडा फडकविला. 28 आणि 29 ऑक्‍टोंबरला बल्‍लारपूर येथे युथ एमपॉवरमेंट समीट आपण आयोजित करीत आहोत. त्‍या माध्‍यमातुन मिशन सेवा, मिशन स्‍वयंरोजगार, मिशन कौशल्‍य विकास, मिशन फॉरेन सर्विसेस, मिशन सोशल वर्क, मिशन उन्‍नत शेती या सहा मिशनची सुत्री आपण अमलात आणत आहोत. हा जिल्‍हा रोजगार व स्‍वयंरोजगारयुक्‍त व्‍हावा हेच आपले ध्‍येय असल्‍याचे ना.सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले.
यावेळी जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे, पोंभुर्णा पंचायत समितीच्‍या सभापती अल्‍का आत्राम, नगर पंचायत अध्‍यक्षा श्‍वेता बनकर, गजानन गोरंटीवार, अविनाश परांजपे, जि.प. सदस्‍य राहूल संतोषवार, न.प. उपाध्‍यक्ष रजिया कुरैशी, जिल्‍हा परिषद सदस्‍य गौतम निमगडे, पंचायत समिती उपसभापती विनोद देशमुख, न.प. सदस्‍य अजित मंगळगिरीवार, ईश्‍वर नैताम, माजी सरपंच राजू मोरे, पोंभुर्णा महिला पोल्‍ट्री प्रोडयुसर्स कंपनी लिमी. च्‍या अध्‍यक्षा यमुना जुमनाके, कुंतीबाई धुर्वे, तहसिलदार श्रीमती टेमकर आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

Tuesday, October 09, 2018

मुद्रा योजनेतून 10 हजार व्यक्तींना   स्वयंरोजगार उपलब्ध करण्याचे नियोजन

मुद्रा योजनेतून 10 हजार व्यक्तींना स्वयंरोजगार उपलब्ध करण्याचे नियोजन

मुद्रा योजनेतून चंद्रपूर जिल्हयात 10 हजार व्यक्तींना 
स्वयंरोजगार उपलब्ध करण्याचे नियोजन करा : ना.सुधीर मुनगंटीवार 
चंद्रपूर/प्रतिनिधी:

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना असणा-या मुद्रा योजनेतून जिल्हयामध्ये मोठया प्रमाणात उद्योग व्यवसायाला चालना मिळतांना सुशिक्षित बेरोजगारांची संख्या कमी झाली पाहिजे. मुद्रा योजनेचे उद्दिष्ट गाठतांना सामाजिक भान ठेवण्यासाठी यंत्रणेने समाजाच्या आर्थिक व औद्योगिक जाणीवांचे भान ठेवले पाहिजे. चंद्रपूर जिल्हा या योजनेत आदर्श जिल्हा म्हणून पुढे आणतांना या वर्षामध्ये किमान 10 हजार व्यक्तींना स्वयंरोजगार उपलब्ध करण्याचे नियोजन करा, असे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिले. 
स्थानिक नियोजन भवनात आयोजित मुद्रा बँक योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. मुद्रा बँक योजना राबवितांना बँकांना पाहिजे तेवढे यश मिळाले नाही. यासाठी परिसरातल्या लोकप्रतिनिधीनी देखील यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. खानापूर्ती करण्यासाठी ही योजना नसून यातून खरोखर उद्योजक उभे झाले पाहिजे. गुजरात मध्ये हा प्रयोग यशस्वी झाला आहे. प्रत्येक सुशिक्षित बेरोजगाराला नौकरी मिळू शकत नाही. त्यामुळे ज्यांना उद्योग धंदयाची आवड आहे त्या सर्वांना यातून संधी दिली गेली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 
या कार्यक्रमाच्या व्यासपिठावर आमदार अनिल सोले, आमदार नानाभाऊ शामकुळे, महापौर अंजलीताई घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय काकडे, अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, जिल्हा अग्रणी बॅंकेचे महाव्यवस्थापक एस.एन.झा आदी मान्यवर उपस्थित होते. 
चंद्रपूर जिल्हयातील उपलब्ध असणा-या सर्व राष्ट्रीयकृत बँकांनी आपआपल्या भागातील उद्दिष्ट निश्चित करावे. मुद्रा बँक कर्ज देणारा, त्याची परतफेड करणारा आणि त्यातून उद्योग उभारणारा उमेदवार देण्याचे काम सार्वजनिक क्षेत्रातील मान्यवरांनी पुढे येवून केल्यास मुद्रा मधील योग्य उमेदवारांना लाभ मिळणे व या योजनेचा योग्य वापर होणे शक्य आहे. यासाठी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदाधिका-यांनी पुढाकार घ्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली. यासोबतच या योजनेच्या प्रचार प्रसिध्दीसाठी सर्व यंत्रणांनी पुढे येण्याबाबतही त्यांनी सांगितले. 
यावेळी आमदार नानाभाऊ शामकुळे यांनी जिल्हयातील सार्वजनिक सहभागाच्या उद्योग धंद्याना तसेच अनेक लोकांना एकाचवेळी मोठया प्रमाणात रोजगार मिळणा-या सर्व व्यापक उद्योगांना या योजनेतून लाभ मिळावा. त्यासाठी अशा लाभार्थ्यांच्या यशकथा मांडण्याचे आवाहन केले. यावेळी मुद्रा योजना यशस्वी करण्यासाठी चंद्रपूर जिल्हयातील कोणते उद्योग उपयोगी पडू शकतात. त्यासाठी अन्य विभागाची मदत देखील घ्यावी, असे आवाहन आमदार अनिल सोले यांनी केले. 

मुद्रा योजनेचे चंद्रपूर जिल्हयातील योगदान 
बैठकीच्या सुरुवातीला जिल्हा अग्रणी बँकेचे महाव्यवस्थापक एस.एन.झा यांनी चंद्रपूर जिल्हयामध्ये गेल्या दोन वर्षात मुद्रा योजनेतून वाटप करण्यात आलेल्या कर्ज पुरवठयाबाबतही माहिती दिली. मुद्रा योजनेतून 2018-18 या आर्थिक वर्षामध्ये चंद्रपूर जिल्हयात 17 हजार 500 खातेदारकांना 160 कोटी रुपयाचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. तर 1 एप्रिल 2018 पासून सप्टेंबर महिना अखरेपर्यंत 70 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहे. या योजनेसाठी तीन गट असून कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेतून यासाठी सुलभतेने कर्ज उपलब्ध केल्या जाते. 

Sunday, October 07, 2018

माध्यमांवरील विश्वार्हता आजही कायम : आवटे

माध्यमांवरील विश्वार्हता आजही कायम : आवटे

चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या कर्मवीर पुरस्काराचे वितरण
चंद्रपूर : 
अलीकडे माध्यम बदलत आहेत़ आता प्रत्येकांच्या हातात मोबाईलरुपी माध्यम आले आहे़ सोशलमीडियामुळे माध्यमांची कक्षा रुंदावली मात्र, या माध्यमात मुद्रित आणि इलेक्ट्रानिक माध्यमांचे महत्त्व आजही आहे़ लोकशाहीचे चार स्तंभ आहेत़ यातील तीन स्तंभाची विश्वार्हता धोक्यात आली आहे़ मात्र, वृत्तपत्र माध्यमाची विश्वार्हत आजही कायम आहे, असे ज्येष्ठ पत्रकार, विश्व मराठी संमेलनाचे पूर्वसंमेलनाध्यक्ष संजय आवटे यांनी व्यक्त केले़ चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते़
चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या कर्मवीर पुरस्कारासह विविध स्पर्धा पुरस्काराचे वितरण रविवारी येथील सीडीसीसी बँकेच्या कन्नमवार सभागृहात करण्यात आले होते़ अध्यक्षस्थानी वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार होते़ यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ़ महेश्वर रेड्डी, पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय तुमराम, कर्मवीरपुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार अरुण दिवाण, विजय बनपूरकर उपस्थित होते़
आवटे म्हणाले, पत्रकारांनी उजेडात बातम्या शोधू नये, तर अंधारात बातम्या शोधाव्यात़ अंधारात बातम्या शोधाव्यात़ म्हणजेच आजच्या समस्यांवर, समाजाच्या सुखदुखावर बातम्या शोधल्या पाहिजेत हीच खरी पत्रकारिता आहे़ पत्रकारांचा काय रोल हे पत्रकारांनी ओळखले पाहिजे़ पत्रकारांनी सर्वसामान्यांच्या सुखदु:खाची मांडणी करतानाच त्यांच्या आकांक्षा तेवढ्याच प्रकर्षाने मांडव्यात अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली़ माध्यमं बदलत राहणार, माध्यमांचा आशय बदलता कामा नये, असेही ते म्हणाले़
यावेळी अतिथीचा पत्रकार संघाच्या वतीने सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला़ तर अतिथींच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार अरुण दिवाण, विजय बनपूरकर यांना कर्मवीर पुरस्कार सन्मापूर्वक प्रदान करण्यात आला़ ग्रामीणवार्तासाठी दिला जाणारा पुरस्कार जितेंद्र सहारे, आशिष दरेकर, नीळकंठ ठाकरे, राजकुमार चुनारकर, प्रा़ धनराज खानोरकर यांना प्रदान करण्यात आला़ मानवी स्वारस्य अभिरुची कथा पुरस्कार चुन्नीलाल कुडवे, उत्कृष्ट वृत्तांकन टिव्ही पुरस्कार अन्वर शेख, शुभवार्ता पुरस्कार हितेश गोहोकार, हौशी वृत्त छायाचित्र पुरस्कार संदीप रायपुरे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला़ स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ आणि रोख राशी असे पुरस्काराचे स्वरुप आहे़
यावेळी स्पर्धेचे परीक्षक प्रशांत आर्वे, प्रा़ योगेश दुधपचारे, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांचाही मान्यवराच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ कार्यक्र माचे प्रास्तविक संजय तुमराम, संचालन प्रशांत विघ्नेश्वर यांनी केले़ तर जितेंद्र मशारकर यांनी आभार मानले़ कार्यक्रमाला ज्येष्ठ रिपाइं नेते व्ही़ डी़ मेश्राम, किशोर पोतनवार, प्रा़ सुरेश चोपणे, संजय वैद्य, बंडू लडके़ नंदा अल्लूरवार, प्रा़ विमल गाडेकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती़.

Monday, October 01, 2018

सावली खादी चळवळीची माऊली

सावली खादी चळवळीची माऊली

                                     इंग्रजांचा युनियन जॅक ज्या प्रदेशावर कधीच फडकला नाही, असा भाग म्हणजे दंडकारण्यातील चंद्रपूर-गडचिरोली जिल्हा जंगलव्याप्त भूभाग. हा गोंड राज्याच्या अधिपत्याखालील प्रदेश म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याला स्वतःचा इतिहास आहे. स्वातंत्र्य लढयातील चिमूर - आष्टीचा क्रांतीकारी उठाव सर्वानाच स्मरणात आहे. मात्र खादीच्या स्वावलंबनाचा मूलमंत्र देणारा प्रदेश म्हणूनही या जिल्हयाचे नाव इतिहासात नमूद आहे. पूर्वीच्या मध्यप्रांतातील चांदा जिल्हातील सावली येथून महात्मा गांधींनी ग्रामोव्दाराचा संकल्प भारताला दिला आहे. चंद्रपूरपासून 45 किलोमिटर पूर्वेकडे असणारे सावली हे गाव स्वातंत्र्यपूर्व काळातील ग्रामोद्योग चळवळीचे केंद्र होते. या गावामध्ये 1936 मध्ये अखिल भारतीय गांधी सेवा संघाचे अधिवेशन घेण्यात आले होते. महात्मा गांधींनी स्वातंत्र्यपूर्व काळात दोन वेळा या गावाला भेट दिली. 
आपल्या व्यस्तेत सात दिवस मुक्काम केला. त्‍यांनी सात दिवस या छोटया गावात मुक्काम ठेवावा असे नेमके या गावात काय असेल असा प्रश्न नेहमी पडायचा ? सावलीत यासाठी भेट दिली आणि ‘ सावली खादी चळवळीची माऊली ’ ही नवी ओळख डोळ्यापुढे आली. ग्रामोद्योगाच्या चैतन्याचे अग्नीकुंड डोळ्यापुढे आले. चरख्याचा आवाज, खादी घातलेल्यांची गर्दी आणि अहिंसा व असहकाराच्या आयुधाने जग हलवणा-या महात्मा गांधींचा संयत स्वर मनात गुंजला.







सावलीच्या नाग विदर्भ चरखा संघाच्या आवारात या भारावलेल्या वातावरणाची कुणालाही अनुभूती येईल. सावलीच्या भूमीत ठिकठिकाणी समर्पण आणि त्यागाची उदाहरण बघायला मिळाली. 82 वर्षाच्या राजाबाळ संगडीवार यांच्या थरथरत्या हाताला हाती घेत येथील इतिहास जाणता आला. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार कार्यालयाच्या पुढ्यातच तेव्हा उभ्या असलेल्या आम्रवृक्षाखाली महात्माजींचे नातू कृष्णदास गांधी व मनोज्ञा यांचा विवाह झाल्याचीही माहिती त्यांनी दिली. 
गांधीजींच्या सोबत सरदार वल्लभ भाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, आचार्य विनोबा भावे, डॉक्टर करिअप्पा, जमनालाल बजाज, सरोजिनी नायडू, सुशीला नायर आदी नेतेही या काळात सावलीमध्ये मुक्कामी होते. येथील चरखा संघाच्या प्राचीन वास्तू मध्ये गांधीजी आणि त्यांच्या कार्याचा शोध घेताना या महात्म्याने आयुष्यभर "खेड्याकडे चला "असा नारा का दिला हे लक्षात आले. दीड-दोनशे चरख्यावर काम करणारे असंख्य हात आजही सावलीत सूत कताई करतात. सावलीच्या चरखा संघात अधिकही चरख्याची घरघर सुरू असून यावर महिला- पुरूष सूत काततात. या सुतापासून सावली मध्ये उत्तम प्रतीची खादी देखील तयार होते. अखिल भारतीय खादी ग्रामोद्योग कमिशनचा हा चरखा संघ ऐतिहासिक वास्तू आहे. 100 वर्षांपासून सावली मध्ये सूतकताई आणि खादी तयार करण्याचे कार्य चालू आहे.

1927 पासून चरख्याची घरघर
1927 मध्ये नर्मदा प्रसाद अवस्थी यांच्या पुढाकाराने खादी भंडाराची सुरुवात झाली. पुढे 1958 पासून खादी ग्रामोद्योग कमिशन अंतर्गत नाग विदर्भ चरखा संघातंर्गत हे कार्यालय आले. 100 वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यातील हे तालुक्याचे गाव खादी परिवाराची जुळले असून या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व नामवंत व्यक्तींनी या छोट्याशा गावाला भेट दिली आहे. मात्र हे गाव इतिहासात अजरामर झाले ते महात्माजींच्या दोन भेटीमुळेच. सावली या गावाला महात्मा गांधी यांनी दोन वेळा भेट दिली. त्यांची प्रथम भेट 14 नोव्हेंबर 1933 रोजी झाली. तर दुसरी भेट 27 फेब्रुवारी 1936 रोजी झाली. 27 फेब्रुवारी ते 5 मार्चपर्यंत महात्मा गांधी याठिकाणी मुक्कामी होते. थोडक्यात सात दिवस सावली ही देशाची राजकीय राजधानी झाले होते. सावली या गावांमध्ये आज असणाऱ्या चरखा संघातील इमारतीमध्ये या महामानवाचे वास्तव्य होते. आजही या इमारतीत महात्माजींच्या वास्तव्याच्या आठवणी अनेक वस्तू करून देतात. चरखा संघ उत्तम रितीने आजही कार्यरत आहे. जीर्ण झालेल्या, अर्धवट उभ्या असलेल्या आजूबाजूच्या अनेक इमारती आपल्या वैभवशाली इतिहासाच्या खाणाखुणा मात्र मूकपणे सांगत असतात. अडगळीत पडलेल्या जुन्या चरख्यांकडे बघितल्यानंतर शेकडो परिवाराला रोजगार देण्याची ऊर्मी, एकतेची कळकळ, अस्पृश्यता निवारणाची चळवळ आणि स्वावलंबत्वाची मशाल कधीकाळी या चरख्यामध्ये पेटत होती, जाणवते.

सावलीतच चरखा संघ का ?
सावली परिसरात पूर्वापार मोठ्या प्रमाणात सूतापासून विणकर खादीचे कपडे, पासोड्या आदी तयार करीत होते. या भागात त्या काळामध्ये उत्तम प्रतीच्या धानाचे उत्पन्न व्हायचे तर वणी पासून पुढे लागणाऱ्या वऱ्हाड प्रांतात मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादित व्हायचा. त्यामुळे उच्च प्रतीचे तांदूळ वऱ्हाडात आणि व-हाडातला कापूस विणकरांच्या घरात, अशा पद्धतीची व्यापाराची रचना पूर्वापार होती. धानाचे पीक घेतल्यानंतर वर्षभर सूतकताईचे काम या परिसरात सुरू असायचे. तसेच या परिसरातील पद्मशाली समाज देखील लुगडे, धोतर तयार करण्याचे काम करत होते. येथील केवट समाजाने कोशाच्या किड्यांपासून कोशाच्या धाग्याची निर्मिती केली आहे. त्यापासून कोशाचे कापड, कोशाचे फेटे विणले जात होते या समाजाला को शाकारी म्हणत या समाजातील व्यापारी लोकांची भेट त्या काळातील प्रसिद्ध उद्योजक आणि महात्मा गांधींचे स्नेही जमनालाल बजाज यांच्याशी झाली. पुढे त्यांची भेट महात्मा गांधीजींची झाली. त्यावेळेस महात्मा गांधीची ग्रामस्वराज्य कल्पनेने भारलेले होते. सावली परिसरातील पूरक वातावरण बघता याठिकाणी खादी उद्योगाला बळकट करण्याचे जमनालाल बजाज यांच्या मनात आले. त्यांनी नर्मदा प्रसाद अवस्ती यांच्याकडे या भागाची जबाबदारी सोपवली. 1927 मध्ये खादी भांडार याची सावली येथे स्थापना झाली. नर्मदा प्रसाद हे या भंडाराचे चे पहिले व्यवस्थापक होय, आता बाळू पवार हे व्यवस्थापक म्हणून काम करतात. त्यापूर्वी जगजीवन बोरकर यांनी सुद्धा या ठिकाणी काम केले आहे.

सावली भारताच्या नकाशावर
सावली त्या काळात पूर्ण देशांमध्ये अतिशय प्रसिद्ध असेल खादी निर्माण करणारे गाव होते. खादीच्या स्वयंपूर्णतेने सावली या गावांमध्ये एकेकाळी 2700 चरख्यावर हजारोंच्या संख्येने हात सूतकताईचे काम करत होते. एव्हढेच नव्हे तर आसपासच्या जिबगाव, नांदगाव, बेंबाळ, भेंडाळा, व्याहाळ बुज, गडचिरोली या प्रमुख गावांमध्ये चरखा उपसंघ उभारण्यात आले होते. या ठिकाणावरून खादी बनवण्यासाठी सूत पुरवले जात होते... हे सारे ऐकूनच आज नवल वाटते. सावली खादी धोतर, टॉवेल, लुंगी, साड्या, कोसा धोतर, सूती पॅन्ट, कापड शुभ्र व रंगीत शर्टाचे कापड, मच्छरदाणी कापड इत्यादी ब्रांड सावलीने मध्य भारतामध्ये रुजवले होते. मुंबई पर्यंत सावली वरून तयार केलेले खादीचे कपडे विशेष करून वापरल्या जात होते. आजही या ठिकाणी सूतकताईचे काम चालते याठिकाणी हातमागाचे अद्याप अत्यंत सुद्धा आहे. गावातील अनेक महिला सध्या सूतकताईसाठी या ठिकाणी येतात. या ठिकाणच्या कार्यालयाला भेट दिल्यावर अनेक महिला या ठिकाणी काम करत असल्याचे दिसून आले. आजच्या काळातही परवडले इतका रोजगार सूतकताईतून दिल्या जातो. अनेक महिला फावल्या वेळात याठिकाणी न्यूज सूतकताईचे काम करतात. सावली सारख्या भागामध्ये अशा पद्धतीचे कामकाज गेल्या शंभर वर्षांपासून सुरू असल्याचे ऐकून आनंद वाटला.

चरख्याचा शोध आणि ग्रामोद्योग
चरख्याचा शोध 1915 मध्ये महात्मा गांधी भारतात परतले. त्यांनी कोचरब येथे सत्याग्रह आश्रमाची स्थापना केली. या काळात त्यांनी संपूर्ण वर्षभर भारतभ्रमण केले. ग्रामीण भारताला त्यांनी या काळात जवळून बघितले. गांधीजी ईश्वरवादी होते, परंतु त्यांचा मोक्ष हा सेवेमध्ये होता. त्यांचा ईश्वरप्राप्तीचा मार्ग जनतेची सेवा होते. चालत्या बोलत्या रूपात असणाऱ्या सामान्य माणसाला ते ईश्वर मानत भारताचे स्वातंत्र्य म्हणजे त्यातल्या सात लाख खेड्यांचे स्वातंत्र्य ही त्यांची धारणा होती. त्यामुळे खेडी अर्थात गाव आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्याशिवाय स्वातंत्र्याच्या नैतिक लढाईला बळ येणार नाही. याबाबत त्यांच्या मनात शंका नव्हती. त्यामुळेच शेती हा मुख्य व्यवसाय असणाऱ्या ग्रामीण जनतेला उद्योग व्यवसायासाठी दुसऱ्या एखाद्या सर्वमान्य पूरक धंद्याची आवश्यकता त्यांच्या मनात आली. या काळातच संपूर्ण भारत इंग्रजांनी तलम कपड्याची बाजारपेठ बनवली होती. दुसरीकडे स्वस्त कपडा नसल्याने लोकांच्या अंगावर पुरेसे कपडे देखील नव्हते. दारिद्र्यात खितपत पडलेल्या जनतेसाठी अशावेळी खादी सारखा पर्याय पुढे आणण्याचा गांधीजी विचार करत होते. त्यांच्या आश्रमात खादी तयार होत होती. मात्र सूत तयार होत नव्हते. अशावेळी त्यांना आठवला चरखा मात्र तोपर्यंत आपल्या गावागावातील चरखा अडगळीत पडला होता. गांधीजींनी चरख्याला जिवंत केले. बडोदा संस्थानमधील विजापूर या गावी 1915 साली गांधीजींनी अडगळीत पडलेला चरखा शोधून काढला. पुढे चरख्याने इतिहास घडवला. अडगळीत पडलेल्या चरखा बाहेर पडून थेट काँग्रेसच्या झेंड्यावर आला. सूतकताईला गांधीजींनी ग्रामीण भागातील आर्थिक स्वातंत्र्याचा दर्जा दिला. घराघरात चरखा फिरायला लागला. खादी घालेल तोच काँग्रेसचा कार्यकर्ता असा दंडक त्यांनी प्रसंगी घातला. महात्मा गांधींचे वलय त्यांच्या शब्दाला असणारा मान यामुळे संपूर्ण ग्रामीण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात खादीची चळवळ सुरू झाली. देश कापडाच्या दृष्टीने स्वावलंबी झाला. एका महात्म्याने ग्रामीण भागातील जनतेच्या आर्थिक स्वावलंबिता व व संपन्नतेवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे देशातील हजारो खेडी कोणत्याही संपर्क व्यवस्थेशिवाय गांधीजींच्या पाठीशी उभी राहिली. सावली सारख्या चंद्रपूर जिल्हयातील छोटयाशा गावाने चरख्याच्या अग्नीकुंडातून देशाच्या स्वातंत्र्य लढयाला, ग्रामोध्दाराला अशी चालना दिली.

                                                                          प्रवीण टाके
                                                                     जिल्हा माहिती अधिकारी
                                                                        चंद्रपूर-9702858777

Saturday, September 29, 2018

 अपघात प्रवण क्षेत्रावरील अपघाताचे प्रमाण कमी करा:हंसराज अहीर

अपघात प्रवण क्षेत्रावरील अपघाताचे प्रमाण कमी करा:हंसराज अहीर

चंद्रपूर/प्रतिनिधी:
 चंद्रपूर जिल्हयातील वाहनांची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे. हे एक ऐतिहासिक शहर असून या ठिकाणी रस्त्यांच्या काही भागात मर्यादा पडतात. त्यामुळे शहरातील वाहन व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी अपघात प्रवण क्षेत्राची (ब्लॅक स्पॉट) निवड करण्यात यावी व त्या ठिकाणी अपघात होणार नाही, अशा पध्दतीच्या उपाय योजना करण्यात याव्यात यावी, अशी सूचना केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर यांनी केली.
केंद्र सरकारच्या अधिसुचनेनुसार जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्षपद जिल्हयाचे लोकसभा सदस्य म्हणून ना. हंसराज अहीर यांच्याकडे आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक आज 28 सप्टेंबर रोजी पोलीस मुख्यालय, चंद्रपूर येथे पार पडली. 
जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष म्हणून पहिल्या सभेचे कामकाज पार पाडतांना अधिका-यांना अपघात प्रवण क्षेत्रा (ब्लॅक स्पॉट) निवडलेल्या ठिकाणी तातडीच्या उपाययोजना दोन महिन्यांत करून अपघाताचे प्रमाण कमी करण्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहीर यांनी निर्देश दिले. 
यावेळी महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, मनपाचे आयुक्त संजय काकडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंबर शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंत्या सुषमा साखरवडे, कार्यकारी अभियंता मनोज जयस्वाल व एस.आर.जाधव, राष्ट्रीय महामार्गाचे सहाय्यक अभियंता व अन्य अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. 
समोर आलेल्या माहितीनुसार सन 2015 ते 2017 या वर्षात चंद्रपूर जिल्हयात अपघात व मृत्यू यांचे प्रमाण सतत वाढत आहे. भारतात वर्षाला दीड लक्ष लोकांचा अपघाती मृत्यू होत आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी करण्याची गरज भासली असून यावर उपाययोजना म्हणून जिल्हयात एकुण 28 ठिकाणी अपघात पवण क्षेत्रा म्हणून अभ्यासपूर्ण निवड परिवहन विभागाने केली असून त्यावर उपाययोजना सुचविलेल्या आहेत. बैठकीत काही उपाययोजना दोन महिन्यांच्या कालावधीत तर काही दोन महिन्यांच्या कालावधीत होण्यासारख्या असल्याने दोन महिन्यात काम पूर्ण करण्याचे ना. अहीर यांनी निर्देश दिले. महानगराच्या महापौर अंजली घोटेकर यांनी वाहतूक नियमनासाठी स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांची विनामुल्य मदत घेण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यावर ना.अहीर यांनी दुजोरा देवून असा प्रयोग करता येईल अशा सुचना केल्या. 
जिल्हयात अवैध बस वाहतूक, वेकोलि व सिमेंटच्या ओवरलोड ट्रक व त्यांच्यामुळे होणारे प्रदुषण याकडे सभेचे लक्ष वेधून त्यावर चर्चा केली व अशा वाहतुकीवर कडक कार्यवाही करावी असे निर्देश दिले. चंद्रपूर जिल्हयात 5 लक्ष 74 हजार वाहने असून त्यात दुचाक्या 4 लक्ष 70 हजार इतक्या आहेत. इतक्या मोठया प्रमाणात वाहणे असल्याने परिवहन नियमन करणे जिकरीचे होत आहे. जिल्हयातून 107 कोटी इतका मोठा महसुल परिवहन विभागाकडून राज्य सरकारला जात असल्याने परिवहन विभागाचे सक्षमिकरण दर्जोन्नती करण्यावर यापुढे भर देण्यात येईल असे श्री. अहीर यांनी सांगितले. 
साधारणपणे ही बैठक तीन महिन्यातुन एकदा घ्यावयाची असली तरी ब्लॅकस्पाॅटवर करावयाच्या उपाययोजना व अपघाताचे प्रमाण कमी तातडीने उद्दीष्टय डोळयासमोर असल्याने पुढील बैठक दोन महिन्यांच्या आत घेण्यात येईल असे विभागास सांगून तोपर्यंत सर्व विभागाने दोन महिन्यांच्या आत सोपविलेली कामे पूर्ण करावीत असे सक्त निर्देश दिले.

Wednesday, September 26, 2018

 चंद्रपूरमध्ये आयुष्यमान योजनेचा शानदार शुभारंभ

चंद्रपूरमध्ये आयुष्यमान योजनेचा शानदार शुभारंभ

प्रधानमंत्री जन आरोग्य या योजनेच्या माध्यमातून
गावागावात उत्तम आरोग्याचे आंदोलन राबवा : ना.मुनगंटीवार
ना.अहिर, ना. मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत
चंद्रपूरमध्ये आयुष्यमान योजनेचा शानदार शुभारंभ
चंद्रपूर /प्रतिनिधी:
ज्या देशाचे आरोग्य उत्तम असेल त्या देशाच्या प्रगतीला कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळे आयुष्यमान भारत या योजनेच्या माध्यमातून गावागावात उत्तम आरोग्याचे आंदोलन राबवण्याचे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रांची येथे या योजनेचे लोकार्पण केले. त्याचवेळी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ना.मुनगंटीवार यांच्यासह केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत एका भव्य व शानदार कार्यक्रमाचे आयोजन आज नियोजन भवनात करण्यात आले.
 चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद, मेडिकल कॉलेज ,महानगरपालिका, जिल्हा आरोग्य यंत्रणा, स्थानिक जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय,इंडीया मेडीकल असोशीएशन यासह संपूर्ण आरोग्य यंत्रणा, वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर यांच्या लक्षणीय उपस्थितीत रांची येथील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण नियोजन भवनात दाखविण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या या योजनेसंदर्भातील भाषणानंतर उपस्थित मान्यवरांच्याहस्ते गोल्डन ई-कार्डचे वितरण देखील करण्यात आले. या योजनेमध्ये चंद्रपूर जिल्हयातील 2 लाख 74 हजार कुटूंब येणार आहे.
दुपारी साडेबारा वाजता पासून सुरू झालेला कार्यक्रम चार वाजेपर्यंत सुरू होता. या कार्यक्रमाला ना.सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहिर, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, चंद्रपूरच्या महापौर अंजली घोटेकर,आमदार नानाभाऊ शामकुळे, आमदार ॲड. संजय धोटे, सभापती ब्रिजभूषण पाझारे , सभापती अर्चना जिवतोडे, स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल पावडे ,जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार,आयुक्त संजय काकडे ,अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी सचिन कलंत्रे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मोरे आदी उपस्थित होते 
यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले की, सर्वांसाठी आरोग्य या उद्दिष्टपूर्तीसाठी आयुष्यमान भारत योजना महत्त्वपूर्ण पाऊल आहे. सध्याची उपलब्ध स्थिती म्हणजे 80 टक्के लोकांसाठी 20 टक्के तोकडी आरोग्य यंत्रणा आहे. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून खासगी आरोग्य यंत्रणा देखील सामान्य लोकांच्या सेवेत येणार आहे. ही योजना राज्यातील दुर्गम ,आदिवासी भागातील बांधवांसाठी उपयोगाची ठरणार आहे. महाराष्ट्रात या योजने सोबतच महात्मा फुले जन आरोग्य योजनाही एकत्रित राबविली जाणार आहे.त्यामुळे जवळपास सगळ्या लोकांना आरोग्य विम्याचे कवच मिळणार आहे. या सर्व उपक्रमासाठी आवश्यकता पडली तर आकस्मिक निधीतून पैसे देऊ असे ,आपण आरोग्य विभागाला सांगितले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


यावेळी त्यांनी आरोग्य, शिक्षण ,पेयजल याकडे आपण लक्ष वेधल्याचे सांगितले. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राला निधी उपलब्ध केला आहे.जिल्ह्यांमध्ये अत्याधुनिक मेडिकल कॉलेजची इमारत उभी राहत आहे .या भागातील नागरिकांना उत्तम प्रतीचे उपचार मिळावे यासाठी टाटा ट्रस्ट च्या मदतीने कॅन्सर हॉस्पिटल उभे राहत आहेत. शिर्डीच्या साईसंस्थानच्या मार्फत जिल्ह्यांमध्ये एमआरआय मशीन मिळाली आहे. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ॲम्बुलन्स उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. पुढील सहा महिन्यात आणखी नव्या ॲम्बुलन्स दिल्या जातील,असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर निवृत्ती राठोड यांनी 30 खाटांचे आयुष केंद्र उभारण्याचा प्रस्ताव पुढे ठेवला आहे. याबाबतही आपण पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी नव्या यंत्रणेमध्ये उभ्या राहणाऱ्या वेलनेस सेंटर मध्ये चंद्रपूरच्या वेलनेस सेंटरचे वेगळेपण ठासून उठून दिसायला हवे असेही आरोग्य यंत्रणेला बजावले.
यावेळी बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहिर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेमुळे भारताच्या या योजनेची जगभरात चर्चा होईल व यातून ग्रामीण भारताच्या आरोग्याचा प्रश्न सुटेल अशी आशा व्यक्त केली. आजचा दिवस देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या सोबत ही योजना सुरू होत असल्यामुळे महाराष्ट्रासाठी ही योजना अधिक उपयोगी ठरणार असल्याचे ते म्हणाले. देशभरात दहा कोटी लोकांना याचा लाभ होणार आहे. आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा आहे. त्यामुळे या व्यवसायाशी संबंधित असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी समर्पित होऊन या योजनेचा यशस्वीतेसाठी प्रयत्न करावा,असे आवाहनही त्यांनी केले. समाजातील वंचित घटकाला लक्षात ठेवून या योजनेची रचना करण्यात आली आहे. राज्यात आयुष्यमान भारत योजना सोबतच महात्मा फुले जन आरोग्य योजना ही एकत्रित राबवली जाणार आहे. त्यामुळे जवळपास 90 टक्के लोकांना याचा लाभ मिळणार आहे ,असेही त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार नानाभाऊ श्यामकुळे यानीदेखील संबोधित केले .एका महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ आज असून आम्ही सगळे त्याचे साक्षीदार असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड यांनी केले. तर आभार प्रदर्शन जिल्हा आरोग्य अधिकारी प्रकाश साठे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सोनाली रासपायले यांनी केले.
यावेळी कार्यक्रमासाठी जनआरोग्य, संसर्गजन्य, आरोग्य ‍नियंत्रण, ‍ जिल्हा हिवताप, अर्ष, जिल्हा क्षय रोग, सिकल सेल, नर्सिग, आदि विभागाने ‍ परीश्रम घेतले नियोजन भवनात लावण्यात आलेली आरोग्य प्रदर्शनी व नर्सिग विभागाच्या विद्यार्थीनीनी आयोजीत संदेश मोहिम उल्लेखनीय ठरली

Monday, September 24, 2018

चंद्रपूरच्या लाडक्या नेतृत्वाला अखेरचा निरोप

चंद्रपूरच्या लाडक्या नेतृत्वाला अखेरचा निरोप

शांताराम पोटदुखे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

       चंद्रपूर/प्रतिनिधी:
 कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, राजकारण, समाजकारण, पत्रकारिता आदी सर्व क्षेत्रात उल्लेखनिय योगदान मागे ठेवत. ज्येष्ठ काँग्रेस नेते देशाचे माजी केंद्रीय राज्यमंत्री शांताराम पोटदुखे आज अनंतात विलीन झाले. आज दुपारी 2 वाजताच्या सुमारास बिनबा गेट शांतीवन येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.  चारवेळा चंद्रपूरचे खासदार राहीलेल्या या लोकनेत्याला हजारोच्या समुदायानी साश्रूनयनांनी निरोप देण्यात आला.
 चंद्रपूर शहराच्या विकासासाठी सतत झटणा-या या अजात शत्रूच्या व्यक्तिमत्वाच्या अंत्ययात्रेमध्ये सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. त्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी सकाळपासून साईमंदिर सिव्हील लाईन स्थित घरामध्ये चंद्रपूरकरांची रिघ लागली होती. वटवृक्ष झालेल्या शैक्षणिक संस्था आणि हजारोच्या आयुष्यात आपल्या कर्तृत्वाने बदल घडवून आणणा-या या हसतमुख व्यक्तिमत्वाला निरोप देण्यासाठी सर्व वयोगटातील अनेक पिढयांनी सिव्हील लाईन परिसरात गर्दी केली होती. दुपारी 12 नंतर  सजवलेल्या रथातून शहराच्या मुख्य मार्गावरुन अंत्ययात्रा काढण्यात आली.

            23 सप्टेंबर रोजी दुपारी 3.23 मिनीटांनी नागपूरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांची प्राण ज्योत मालवली. मृत्यूसमयी त्यांचे वय 86 वर्षे होते. त्यांनी 1980 ते 1984, 1984 ते 1988, 1989 ते 1991, 1991 ते 1996 असे सलग चारवेळा लोकसभेमध्ये चंद्रपूर जिल्हयाचे प्रतिनिधीत्व केले. पी.व्ही.नरसिंहराव सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते. डॉ.मनमोहनसिंग हे अर्थमंत्री होते. तर त्यांच्यासोबत अर्थराज्यमंत्री म्हणून शांताराम पोटदुखे यांनी काम बघितले. त्याच्या पश्चात पत्नी सुधा, मुलगा भरत, स्नुषा रमा गोळवलकर, मुलगी भारती चवरे, जावई व नातवंड असा मोठा परिवार आहे.
  राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या निधनाचे वृत्त आल्यानंतर आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले. त्यांनी रात्री मुंबईला निघण्याचा दौरा रद्द केला. रात्री त्यांनी निवासस्थानी जावून भेट दिली. केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर यांनी देखील आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले. राज्य शासनातर्फे जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी त्यांना पुष्पचक्र अर्पण केले. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांनी देखील 11 वाजताच्या सुमारास त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शन घेतले. जिल्हा परिषदचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, आमदार नानाभाऊ शामकुळे, आमदार ॲड.संजय धोटे, काँग्रेसचे माजी खासदार नरेश पुगलीया, माजी खासदार नानाभाऊ पडोळे, आमदार विजय वडेट्टीवार, माजी मंत्री संजय देवतळे, माजी मंत्री रंजीत देशमुख, माजी खासदार विजयराव मुडे, माजी खासदार सुरेश वाघमारे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर, माजी नगराध्यक्ष गयाचरण त्रिवेदी आदी मान्यवर उपस्थित होते.

Wednesday, September 19, 2018

 जिल्हयातील सर्व गॅस धारकांना सूचना

जिल्हयातील सर्व गॅस धारकांना सूचना

Related imageचंद्रपूर/प्रतिनिधी:चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व गॅस धारकानी त्यांच्याकडे असलेल्या गॅस कनेक्शनची नोंद आपल्या रेशन कार्डवर करुण घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. 
त्याबाबत मा.उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ नागपूर यांचे निर्देश असल्याने सर्व गॅस एजन्सीना त्यांचेकडील सर्व गॅस धारकांच्या रेशन कार्डवर शिक्के मारण्याच्या सूचना जिल्हा पुरवठा विभागतर्फे देण्यात आल्या आहेत. त्यामुळे घरी गॅस सिलेंडर घेऊन येणाऱ्या डिलीवरी बॉयला रेशन कार्ड दाखवून त्या कार्डवर शिक्का मारून घेण्यात यावे. तसेच जे गॅसधारक एजंसीमधून सिलेंडर घेत असतील त्यानी रेशन कार्डवर एजंसीकडून शिक्का मारून घ्यावा, असेही कळविण्यात आले. 
ज्या रेशन कार्डधारकाकडे गॅस असून त्याना सवलतीच्या दराने वितरीत होणारे केरोसिन मिळत आहे. अशा कार्ड धारकानी गॅस असताना केरोसिनची उचल केल्यास त्यांचे विरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदयाचे कलम 3 व 7 अन्वये गुन्हा दाखल करण्याचे शासनाचे आदेश आहेत. तसेच ज्या रेशन कार्डधारकाकडे गॅस नसेल त्यानी केरोसिन परवानधारकाकडे उपलब्ध असलेले हमीपत्र भरून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व गॅस धारकाना या शासकीय कामामध्ये सहकार्य करून केरोसिन वरील व्यर्थ होणाऱ्या सबसिडीची बचत करण्यास हातभार लावावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी राजेन्द्र मिस्कीन यानी केले आहे.

 राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेच्या जिल्हास्तरीय बैठकीचा आढावा

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेच्या जिल्हास्तरीय बैठकीचा आढावा

चंद्रपूर/प्रतिनिधी:
 जिल्हयामधील सर्व घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्रामध्ये शिष्यवृत्ती अभावी कोणतीही अडचण येणार नाही. या संदर्भात आवश्यक उपाय योजना करण्यात याव्यात. तसेच राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत करावयाच्या उपाय योजनाबाबत सर्व शैक्षणिक संस्थांनी काटकोरपणे अमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी आज दिले. 
जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क योजना अमलबजावणीची जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हाधिकारी अध्यक्ष असून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एस.नेहे सदस्य सचिव आहेत. तसेच सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर प्राचार्य डॉ.राजेश इंगोले, वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक अविनाश टेकाडे, सिंदेवाही येथील कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक व्ही.जी.नागदेवते, राष्ट्रपिता महात्मा गांधी विज्ञान व कला महाविद्यालय नागभिडचे प्राचार्य अनिल कोसेवार, जनता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.सुभाष, शासकीय तंत्रनिकेत ब्रम्हपूरीचे प्राचार्य डॉ.मनोज गायगव्हाने, राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर सहयोगी प्राध्यापक व्ही.बी.वैद्य, निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी, जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक संचालक भैयासाहेब येरमे आदींची उपस्थिती होती. या नव्या योजनेच्या अमलबजावणीमध्ये येणा-या अडचणींना दूर करण्यासाठी तसेच यातील तांत्रिक व अतांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी कार्यशाळा घेण्यात येणार आहे. आज या संदर्भात नेमकी शिष्यवृत्ती किती मुलांना लागू होईल, या संदर्भात जिल्हयातील शैक्षणिक संस्थांनी आकडेवारी सादर करण्याबाबत निर्देश देण्यात आले. याशिवाय डॉ.पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना याबद्दलही आढावा घेण्यात आला.
 मुक्तीसंग्राम लढ्यातील हुतात्म्याचे बलीदान वाया जावु देणार नाही :हंसराज अहीर

मुक्तीसंग्राम लढ्यातील हुतात्म्याचे बलीदान वाया जावु देणार नाही :हंसराज अहीर

जिवती व कोरपना येथे ना. अहीर यांच्या हस्ते ध्वजारोहन 
चंद्रपूर/प्रतिनधी:
1947 साली देश स्वतंत्र झाला असला तरी नांदेड, हैद्राबाद सह चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, कोरपना व जिवती तालुके हे निजाम साम्राज्याचे भाग होते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल 13 महिन्यांनी म्हणजेच 17 सप्टेंबर, 1948 रोजी हा भाग स्वतंत्र झाला. या लढ्याला बराच मोठा इतिहास साक्षीदार असुन तत्कालीन गृहमंत्री लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकारातून ’आॅपरेशन पोलो’ राबवुन राजुरा तालुक्यातील निझामाच्या तावडीतून मुक्त करण्यात आले. या लढ्यात अनेकांना हुतात्म्य पत्कारावे लागले. हे बलीदान कायम लक्षात ठेवुन देशाच्या विकासात सर्वसामान्याने सहभाग घेणे गरजेचे असल्याचे मत केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले.
जिवती व कोरपना येथे आयोजीत राजुरा मुक्तीसंग्राम दिन ध्वजारोहन कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते. राजुरा उपविभागतील राजुरा, कोरपना व जिवती येथे ’राजुरा मुक्तीसंग्राम दिन’ मोठ्या उत्साहात साजरा होत असतो.
  यानिमीत्त जिवती येथे बस स्थानक चैकात तर कोरपना येथे मुख्य चैकात ध्वजारोहन समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दोन्ही तालुक्यात ना. हंसराज अहीर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहन करण्यात आले. प्रसंगी भाजपाचे राजुरा विधानसभा प्रमुख तथा लोकसभा विस्तारक खुशाल बोंडे, जिल्हा सचिव अरून मस्की, जि.प. सभापती गोदावरी केंद्र, जि.प. सदस्या कमलाबाई राठोड, किसान आघाडी जिल्हा राजु घरोटे, जिवतीचे पं.स. सभापती सुनिल मडावी, उपसभापती महेश देवकते, तालुका अध्यक्ष केशव गिरमाजी, नगराध्यक्षा पुष्पा नैताम, सुरेश केंद्रे, कोरपनाचे तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर, मध्यवर्ती बॅंकेचे संचालक विजय बावणे, पं.स. सदस्य नुतन जिवने, संगायोचे अध्यक्ष संजय मुसळे, नगरसेवक सतीश उपलेंचवार, रमेश मालेकर, कवडु जरिले, सचिन डोहे यांसह प्रमुख पदाधिकाÚयांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
हा देश शेतकÚयांचा असुन सरकार कडुन शेतकरी हिताच्या अनेक योजना राबविण्यात येत आहे. प्रत्येक घराला शुध्द पाणी, गॅस, घर देण्याचा सरकारचा मानस असुन त्यादृष्टीने सकारात्मक प्रयत्न शासन करित आहे. जिवती तालुक्यातील वन पट्ट्याच्या प्रकरणात शासन सकारात्मक कार्य करित आहे. आणि हे वन पट्टे मिळवुन देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्नरत असल्याचे यावेळी ना. अहीर यांनी सांगीतले. केंद्र सरकार कडुन ’स्वच्छता ही सेवा’ अभियान 15 सप्टेंबर ते 02 आॅक्टोंबर पर्यंत राबविले जात आहे. यात सर्वानी सहभाग नोंदवुन आपला गांव, आपला परिसर स्वच्छ करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन ना. हंसराज अहीर यांनी याप्रसंगी केले.
’नागरी महाराष्ट्र हागणदारी मुक्त’ संकल्पपुर्तीमध्ये जिवती नगरपंचायतीच्या योगदानाबद्दल महामहिम राष्ट्रपती कडुन सन्मान करण्यात आला. या अभियानात चांगले कार्य केल्याबद्दल जिवती नगर पंचायतच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाÚयांसह मुख्याधिकारी डाॅ. विशाखा शेरकी यांचा ना. हंसराज अहीर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या समारोहासाठी जिवतीचे राजेश राठोड, दत्ता राठोड, येमले तर कोरपनाचे पुरूषोत्तम भोंगळे, अरूण मडावी, राकेश राठोड, जुबेर भाई, रामभाऊ होरे आदींची उपस्थिती होती.

 स्क्रब टायफस,मलेरिया,डेंगू,सारख्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करा :मुनगंटीवार

स्क्रब टायफस,मलेरिया,डेंगू,सारख्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करा :मुनगंटीवार

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली उच्चस्तरीय बैठक; मोहीम राबविण्याचे निर्देश
चंद्रपूर /प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विविध इस्पितळात व सरकारी रुग्णालयांमध्ये मलेरिया, डेंग्यू व अन्य किटकजन्य आजार वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आरोग्य यंत्रणेला सोबत घेऊन या आजारावर नियंत्रण मिळविणारी मोहीम सक्रियतेने राबवावी, असे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिले. मुंबईवरून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलतांना त्यांनी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांना याबाबतचे निर्देश दिले आहेत.
जिल्ह्यामध्ये किटकजन्य आजार नियंत्रण करणे गरजेचे असल्याचे वातावरण तयार झाले असून काही लोकांना डेंगू सदृश्य आजार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याशिवाय हिवताप लागण झालेल्या रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यामधील वेगवेगळ्या क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी ग्रामीण व शहरी भागांमध्ये यासंदर्भातील उपाययोजना आखण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्र्यांनी आजच्या बैठकीत केले. आजार पसरू नये यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, आजार ज्यांना झाला असेल त्यांच्यावर उपचार करणाऱ्या उपाययोजना आणि आजार होऊ नये यासाठी सार्वत्रिक स्वरूपात करायच्या प्रसिद्धी मोहिमेला आखण्याचे आवाहन ना.मुनगंटीवार यांनी आजच्या बैठकीत केले.
जिल्हाधिकार्‍यांनी घेतली बैठक
पालक मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या संबोधनापूर्वी जिल्‍हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी जिल्ह्यातील किटकजन्य आजाराबाबत सद्यस्थिती जाणून घेतली. पावसाळा संपण्यापूर्वी जिल्ह्यामध्ये मलेरिया, डेंग्यू आणि स्क्रब टायपस या आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यामध्ये एकही रुग्ण औषधोपचार मिळाला नाही असा असता कामा नये, असे त्यांनी या यंत्रणेला बजावले. तसेच गरिबातील गरीब केवळ पैसे नाहीत म्हणून कुठल्याही औषध उपचाराअभावी गंभीर होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. यासोबतच जिल्ह्यातील जनतेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा लाभ घ्यावा. जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये मलेरिया, डेंगू व अन्य आजाराबाबत इलाज करणारा प्रशिक्षित वर्ग असून सर्व सुविधा जिल्ह्याच्या सामान्य रुग्णालयांमध्ये उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे खाजगी रुग्णालयात देण्याइतपत पैसे नाही म्हणून कोणीही उपचाराविना राहू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. जिल्हा सामान्य रुग्णालयात यासंदर्भात मोफत सर्व सुविधा उपलब्ध केल्या असून जनतेने यासाठी या सुविधांचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
यावेळी त्यांनी जिल्ह्यांमध्ये हिवताप, डेंग्यू, चिकून गुनिया,, स्क्रब टायफस आदी आजाराबाबत जिल्हाभरात खाजगी व शासकीय रुग्णालयांमध्ये करण्यात आलेल्या रुग्ण संख्येच्या माहिती घेतली. कीटकजन्य शास्त्रीय सर्वेक्षण करण्यात आलेल्या गावांची संख्या व त्याबाबतच्या अहवाल याबद्दलही चौकशी केली. या आजारासाठी आवश्यक असणाऱ्या प्रतिबंधित उपाय योजनांची अंमलबजावणी न करणाऱ्या शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना जागरुक करावे व गरज पडल्यास अस्वच्छता ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

शासकीय यंत्रणा एकीकडे उपाय योजना करीत असताना नागरिकांनी देखील आपले स्वच्छतेचे कर्तव्य निष्ठेने पार पडणे आवश्यक असल्याचे आवाहन त्यांनी केले. डास मारण्यावर उपायोजना, गप्पी मासे पैदास केंद्रामध्ये वाढ करणे, मच्छरदाणीचा मोठ्या संख्येने वापर करणे, स्वच्छता मोहिमेची आखणी करणे, शिक्षकांची व पंचायतराज सदस्यांची कार्यशाळा घेणे, प्रसिद्धी साहित्य वाटप करणे आदी उपाययोजना करण्याबाबत आरोग्य यंत्रणेला सांगितले
या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.साठे, जिल्हा हिवताप हत्तीरोग अधिकारी डॉ.अनिल कुकडपवार, महानगरपालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अंजली आंबटकर, स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, पालकमंत्र्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय इंगोले या सहा आरोग्य यंत्रणेतील अनेक अधिकारी उपस्थित होते.



चंद्रपूर जिल्हयातील सात गावांचा डॉ.शामप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेमध्ये समावेश

चंद्रपूर जिल्हयातील सात गावांचा डॉ.शामप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेमध्ये समावेश

चंद्रपूर/प्रतिनिधी:

वनावरील अंवलबीत्व कमी करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या डॉ.शामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्हयातील सात गावांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये विचोडा, छोटा नागपूर, आंबोरा, चारगांव, पडोली, ताडाळी, मोरवा आदी गावांचा समावेश आहे.
वना लगतच्या गावामध्ये तेथील जन, जल, जंगल, जमिन या संसाधनाचा शाश्वत विकास साधून उत्पादकता वाढविणे. गावक-यांची वनावरील निर्भरता कमी करणे, शेतीला जोड धंदे निर्माण करणे, पर्याय रोजगार उपलब्ध करुन देणे या माध्यमातून मानव व प्राणी संघर्ष कमी करणे, यासाठी राज्य शासनाने डॉ.शामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना सुरु केली आहे. चंद्रपूर तालुक्यात अनेक गावांमध्ये वाघ व अन्य हिस्त्र वन्य प्राणी यांचा वावर वाढल्यामुळे शेतीतल्या कामावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे या गावांचे वनावरील अंवलबींत्व कमी करणे आवश्यक आहे. त्यासाठी या गावांचा डॉ.शामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेअंतर्गत समावेश करण्यात आला आहे.

Sunday, September 16, 2018

चंद्रपुरच्या ऐतिहासिक वारसा संवर्धनसाठी केंद्र सरकार गंभीर:हंसराज अहीर

चंद्रपुरच्या ऐतिहासिक वारसा संवर्धनसाठी केंद्र सरकार गंभीर:हंसराज अहीर

हंसराज अहिर यांची केंद्रीय मंत्री डाॅ. महेश शर्मा यांचे सोबत सकारात्मक चर्चा
चंद्रपूर/प्रतिनिधी:
 चंद्रपुर चा ऐतिहासिक वारसा जतन करण्यास केंद्र सरकार गंभीर असून ना. हंसराज अहीर यांच्या पुढाकाराने केंद्रीय सांस्कृतीक व पर्यटन मंत्राी डाॅ. महेश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय पुरातत्व विभागाचे केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात महत्वाची बैठक पार पडली. चंद्रपुर मधील ऐतिहासिक वारसा संवर्धन करण्यास नागरिकांचा पुढाकार उल्लेखनीय असून सरकार सर्वोतोपरी सहकार्य करणार असे आश्वासन ना. डाॅ. महेश शर्मा यांनी दिले.
चंद्रपुर जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाची ठरलेल्या या बैठकीत चंद्रपुर किल्ला परकोट, गोंडराजे समाधी स्थळ सौंदर्यीकरण, ऐतिहासिक गोंडराजे राजमहल सद्याचे जिल्हा कारागृह, सराय इमारत, रामाळा तलाव, पुरातत्व विभागाचे संग्रहालय, जूनोना जलमहल, भद्रावती विजासन लेणी, संसद आदर्श ग्राम चंदनखेड़ा येथील किल्ला आदि विषयावर सकारात्मक निर्णय झाले.
चंद्रपुर येथील 500 दिवसा पासून सुरु असलेल्या किल्ला स्वच्छता अभियानाच्या अनुषंगाने तुटलेल्या किल्ला भिंत व बुरुजे यांची त्वरित दुरस्ती करण्याकरिता टप्पा-टप्पाने बांधकाम करण्याचे निर्देश देण्यात आले, किल्ल्याच्या सभोवताल सुरु असलेले संरक्षण भिंतीचे बांधकामास गति देण्यास दोन टप्प्यात 34 कोटिचा निधि मंजूर करण्यात आल्याचे यावेळी सांगितले, किल्ला व संरक्षण भिंत यामधुन पाथ वे , सायकल ट्रैक चा प्राकलन तयार करण्याच्या सूचना ही देण्यात आल्या, गोंडराजे समाधी स्थळ येथे उद्यान आणि लाइट, साउंड शो करिता आवश्यक कामे विभाग करेल व गरज असल्यास इतर संस्थेस काम करण्यास परवानगी देण्यात येईल असेही या बैठकीत ठरले. शहरातील कारागृह इतरत्रा हलवून गोंडराजे राजमहल संवर्धन करून पर्यटन दृष्टया संपूर्ण परिसर विकास करण्याबाबत लवकरच केंद्रीय समिति पाहणी करणार आहे, सोबतच ही समिती इको-प्रो किल्ला स्वच्छ्ता अभियान, जटपुरा गेट, जूनोना जलमहल, सराय इमारत, संग्रहालय पाहणी करेल. जूनोना जलमहल विभागाकड़े घेणे आणि सौंदर्यीकरण करणे, सराय इमारतीच्या जतन करण्यास तांत्रिक सहकार्य भारतीय पुरातत्व विभाग देणार असे ठरले. पुरातत्व विभागाचे बांधकाम करण्यात येणार असल्याचे संग्रहालयाच्या कामास गती देण्याचे निर्देश देण्यात आले.
विशेषतः चंद्रपुर मधील गोंड़कालीन ऐतिहासिक वारसा संवर्धन करिता या महत्वपूर्ण बैठकीस ना. हंसराज अहीर यांचेसह सांस्कृतिक पर्यटन मंत्राी डाॅ. महेश शर्मा, खात्याचे सचिव, भारतीय पुरातत्व विभाग च्या महानिदेशक डाॅ. उषा शर्मा, इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे, बिमल शहा, जानबीज शर्मा, जाॅइंट डायरेक्टर, टी जे अलोने, निदेशक, स्मारक, नागपुर सर्कल पुरातत्व अधीक्षक डाॅ. इजराइल हाशमी, प्रशांत शिंदे उपस्थित होते.

Saturday, September 15, 2018

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला चंद्रपूर वीज केंद्राचा दौरा

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला चंद्रपूर वीज केंद्राचा दौरा

चंद्रपूर वीज केंद्राचे कार्य उत्तम 
शून्य डॅमरेजचे व्यवस्थापन करा
ईज ऑफ डुइंग बिजनेस संकल्पना साकारा
चंद्रपूर/प्रतिनिधी:
 चंद्रपूर वीज केंद्राचा देशात नावलौकिक आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संचलन व देखभाल दुरुस्तीची कामे अधिक योग्य रीतीने केल्यास संयंत्र वीज वापरात घट होऊन,महत्तम वीज उत्पादन व आर्थिक बचत होण्यास मोठा हातभार लागेल. उप मुख्य अभियंता स्तराच्या अधिकाऱ्याने वीज उत्पादनासाठी चांगला कोळसा मिळविण्याकरिता कसोशीने पाठपुरावा करावा शून्य डॅमरेजचे व्यवस्थापन करावे. वीज उत्पादनाच्या दैनंदिन कामकाजात अधिक व्यावसायिक सुलभतेची अंमलबजावणी करून अधिकाराचे विकेंद्रीकरण करण्यासंबंधी त्यांनी वीज अधिकाऱ्यांना निर्देश दिले. 
बंद झालेल्या दोन संचाच्या जागेवर ऊर्जा प्रकल्प
वयोमानपरत्वे चंद्रपूर वीज केंद्राच्या बंद केलेल्या प्रत्येकी २१० मेगावाट संच क्रमांक १ व २ च्या जागेवर सुमारे १००० मेगावाट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प किंवा ६६० मेगावाट क्षमतेचा औष्णिक वीज प्रकल्प उभारता येईल काय यादृष्टीने तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश माननीय उर्जामंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी वीज केंद्राच्या अधिकाऱ्यांना दिले. संच क्रमांक १ व २ साठी आरक्षित असलेल्या राख बंधारा परिसरात १०० मेगावाट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठीची स्वारस्य अभिरुची सूचना प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
राज्याचे ऊर्जावान उर्जामंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी महानिर्मितीच्या चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राची प्रत्यक्ष पाहणी केली, आढावा बैठक घेतली व अधिकारी-अभियंते-कामगार, संघटना प्रतिनिधी, कंत्राटदार-कंत्राटी कामगार व स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधींशी संवाद साधला. ऊर्जामंत्र्यांची चंद्रपूर वीज केंद्राला प्रथमच भेट असल्याने येथील अधिकारी-कामगारांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण होते. उर्जामंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची पाहणी केली त्यानंतर ५०० मेगावाट क्षमतेच्या संच क्रमांक ८ व ९ प्लांट कंट्रोल रूम, ई.एस.पी. परिसर, उपाहार गृह, कुलिंग टॉवरला भेट दिली व तंत्रज्ञ आणि कंत्राटी कामगारांशी थेट संवाद साधला. त्यानंतर, ५०० मेगावाट सेवा इमारत येथील सर्च सभागृह येथे आयोजित वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत वीज केंद्राच्या दैनंदिन कामकाजाचा आढावा घेतला. मागील वर्षी पाउस कमी झाल्याने पाणी बचतीसह वीज उत्पादन कायम राखल्याबद्दल त्यांनी वीज अधिकाऱ्यांचे कौतुक केले व चंद्रपूर वीज केंद्राचे कार्य उत्तम असल्याचे गौरवोद्गार काढले. मुख्य अभियंता जयंत बोबडे यांनी याबाबतचे संगणकीय सादरीकरण केले. ज्यामध्ये संचालक पाच सूत्री कार्यक्रम अंतर्गत केलेल्या अभिनव तथा कल्पक कार्यावर त्यांनी प्रकाश टाकला.
हिराई अतिथीगृह येथील बैठकीत आमदार नाना श्यामकुळे प्रामुख्याने उपस्थित होते. सदर दौऱ्यात महानिर्मितीचे संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे, संचालक(प्रकल्प) विकास जयदेव, सल्लागार तथा संचालक(खनिकर्म) श्याम वर्धने, कार्यकारी संचालक विनोद बोंदरे, राजू बुरडे, प्रदीप शिंगाडे, मुख्य अभियंते जयंत बोबडे, अनंत देवतारे, ज्ञानोबा मुंडे, मुख्य महाव्यवस्थापक दत्तात्रय पाटील तसेच वीज केंद्राचे उप मुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
(बातम्यांच्या अधिक माहितीसाठी संपर्क करा ९१७५९३७९२५)

पूर्व विदर्भाला होणार पूर्ण दाबाने वीजपुरवठा

पूर्व विदर्भाला होणार पूर्ण दाबाने वीजपुरवठा

पारेषणच्या 5 उपकेंद्रांना संचालक मंडळाची मान्यता
ऊर्जामंत्र्यांच्या निर्देशामुळे भविष्यात योग्य दाबाने वीज मिळणार
Image result for वीज पुरवठानागपूर/प्रतिनिधी:
पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि वर्धा या पाचही जिल्ह्यांतील नागरिक, शेतकरी आणि औद्योगिक ग्राहकांना भविष्यातही पूर्ण दाबाने वीजपुरवठा करता यावा म्हणून कोलारी, रामटेक, रोहना, येनवा आणि पाचगाव या पाच ठिकाणी 220/33 आणि 132 केव्हीचे उपकेंद्र उभारण्यास महापारेषणच्या संचालक मंडळाने मान्यता दिली आहे.
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार पारेषणच्या 2017-18 ते 2022-23 या पाच वर्षाच्या विकास आराखड्यात या उपकेंद्रांचा समावेश करण्यात आला आहे. लवकरच या पाचही उपकेंद्रांची कामे सुरु होणार आहेत. पूर्व विदर्भातील शेतकरी, औद्योगिक ग्राहकांना आजही योग्य दाबाने वीजपुरवठा होत असतानाच भविष्यातही कमी दाबाने वीजपुरवठा होऊ नये म्हणून हे उपकेंद्र उभारण्यात येत आहे. परिणामी पूर्व विदर्भाच्या पारेषण क्षमतेत वाढ होईल.
कोलारी येथे 132/33 क्षमतेचे उपकेंद्र उभारण्यात येत आहे. येथील भंडारा, मोखेबर्डी वाहिनीला वीजपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच 132 केव्ही लिंकलाईन नागभीडपर्यंत नेण्यात येणार आहे. यातून चिमूर तालुक्यातील भुयार आणि मोखाबर्डी या चंद्रपूर जिल्ह्यातील भागाला लाभ होणार आहे.
कुही तालुक्यात पाचगाव 220/33 केव्ही उपकेंद्र उभारण्यात येईल. सध्या 33/11 केव्ही पाचगाव उपकेंद्राला या 220/33 मधून वीजपुरवठा होईल. पाचगाव आणि कुहीच्या परिसरातील भागाला योग्य दाबाने वीजपुरवठा या उपकेंद्रामुळे होणार आहे. यामुळे कमी दाबाचा वीजपुरवठ्याची समस्या निकाली निघणार आहे. या भागात येणार्‍या टेक्सटाईल उद्योग आणि अन्य उद्योगांनाही याचा फायदा होईल.
कडोली 220/33 केव्ही उपकेंद्र- सध्या पारडी 132/33 आणि मौदा 132/33 केव्ही उपकेंद्राअंतर्गत अनेक उद्योग आहेत. या सर्वांना गुमथळा फीडरवरून वीजपुरवठा केला जातो. या 8 ते 10 स्टील रोलिंग मिल्सचाही समावेश आहे. भविष्यात आणखी मोठे उद्योग या भागात येऊ घातले आहे. हे लक्षात घेता कडोली येथे 220/33 केव्ही उपकेंद्र उभारण्यात येत आहे. यामुळे वीजपुरवठा सुरळीत आणि पूर्ण दाबाने होण्यास मदत होईल.
येनवा 220/33 केव्ही उपकेंद्र-आगामी काळात काटोल-येनवा या भागात एमआयडीसी होऊ घातली आहे. त्यामुळे साहजिकच उद्योगांचे प्रमाण वाढणार. महावितरणच्या मागणीनुसार येनवा 220/33 केव्ही उपकेंद्र पारेषणतर्फे उभारण्यात येत आहे. या उपकेंद्रामुळे कळमेश्वर आणि वरूड लाईनवरही वीजपुरवठा करता येणार आहे.
रोहना 220 केव्ही खापरखेडा उपकेंद्राची क्षमता वाढविण्याचे काम यातून होणार आहे. सध्या 33/11 केव्ही रोहना उपकेंद्राला अत्यंत कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. खापरखेडा उपकेंद्राची क्षमता वाढविल्यानंतर कमी दाबाची समस्या संपणार आहे. सध्या भागीमहारी (सावनेर) या 132/33 केव्ही उपकेंद्रातून वीजपुरवठा करण्यात येतो. या वाहिनीची लांबी 45 किमीपर्यंत आहे. कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे इएचव्ही उपकेंद्राची या भागातून सतत मागणी होती. 220 केव्ही खापरखेडाची क्षमता वाढविण्यामुळे या भागातील ही समस्या संपणार आहे.
रामटेक तालुका 132/33 केव्ही घोटीटोक उपकेंद्र- यामुळे अरोली, मनसर व भंडारा नजीकच्या भागाला कमी दाबाच्या वीजपुरवठ्याची तक्रार होती. घोटीटोक उपकेंद्रामुळे ही समस्या निकाली निघणार आहे.
नवीन 5 उपकेंद्रे हे नागपूर जिल्ह्यात असली तरी या उपकेंद्रातून पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यातील काही तालुक्यांना वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे. नागभीड कोलारीवरून चिमूरला वीजपुरवठा होणार आहे. गडचिरोलीतील चामोर्शी भागातील ग्रामीण भागाला वीजपुरवठा होईल. यामुळे आदिवासी भागाला सक्षम आणि योग्य दाबाने वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे. सिरोंचा येथे 132/33 केव्हीचे उपकेंद्र विचाराधीन आहे. तेलंगणा शासनाने या लाईनसाठी परवानगी दिली आहे. किस्मतपेठ येथून 132 केव्हीची लाईन भविष्यात उभारण्यात येणार आहे.
वर्धा जिल्ह्यातील 220/33 केव्ही उपकेंद्राची क्षमता वाढविण्यात आली असून कारंजा घाडगे येथील 220/132/33 केव्ही उपकेंद्राचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे आर्वी, आष्टी या भागातील कमी दाबाची वीजपुरवठ्याची समस्या संपणार आहे. महापारेषणच्या या पाच वर्षाच्या आराखड्यात पूर्व विदर्भातील जिल्ह्याने योग्य दाबाने वीजपुरवठा होईल.
स्वच्छता अभियानात लोकसहभाग महत्वाचा:हंसराज अहिर

स्वच्छता अभियानात लोकसहभाग महत्वाचा:हंसराज अहिर

चंद्रपुर/प्रतिनिधी:

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती पर्वावर त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वच्छता ही सेवा मोहिमेचा पंधरवाडा देशभर साजरा केला जातो आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे भिवापूर वॉर्डातील मां तुळजा भवानी मंदिर परिसरात झरपट नदी स्वच्छता अभियान मा. ना. श्री. हंसराज अहिर, केंद्रीय गृह राज्य मंत्री यांच्या उपस्थितीत दि. १५-०९-१८ रोजी राबविण्यात आले. 

याप्रसंगी बोलतांना केंद्रीय गृह राज्य मंत्री मा. ना. श्री. हंसराज अहिर म्हणाले की स्वच्छता हा कार्यक्रम आपण सर्वांना नवीन नाहीये. देशातील १० कोटी लोक आज या मोहिमेत सहभागी आहेत. स्वच्छता मोहिमेसाठी आपल्यापुढे राष्ट्रपिता महात्मा गांधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगेबाबा यांचा आदर्श आहे. आजपासून २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती पर्यंत दररोज स्वच्छता मोहीम राबविण्याचा हा देशपातळीवरील कार्यक्रम आहे. हा शासकीय कार्यक्रम जरी असला तरी आजपर्यंत झालेल्या यशस्वी स्वच्छता मोहिमेचे श्रेय केवळ केंद्र सरकारला, राज्याला, महानगरपालिकेला नाही तर लोकसहभागाला आहे. घरोघरी शौचालय बांधणे सोपे काम नव्हते, सरकारने देशातील लोकांना शौचालये घरोघरी बांधण्यास सरसकट मदत केली. लोकांनी सहभाग नोंदविला विशेषतः महिला शक्तीचे यात मोठे योगदान आहे. संस्कारी भारतात प्रगतीच्या दृष्टीने या अनेकविध मोहीम आपण यशस्वीपणे पार पाडतो आहे.

झरपट - इरई नदी ही आपली शहराची जीवनवाहिनी आहे. या नदीला पुनर्जीवित करावी ही भावना आपण सर्वांची आहे. या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरु आहेत. किल्यांच्या दुरुस्ती तसेच देखभालीकरिता केंद्राने ३४ कोटी निधी देण्याचे मान्य केले आहे. हा निधी टप्याटप्याने मिळेल. याचप्रमाणे महाकाली मंदीर, अंचलेश्वर मंदिर, गोंड राजांची समाधी याकरिताही केंद्राने निधी द्यावा यासाठी पाठपुरावा सुरु आहे. चंद्रपूर महानगरपालिका स्वच्छतेबाबत चांगले काम करत आहे. चांदा फोर्टची जागा रेल्वेनी महानगरपालिकेला दिली असून तिथे झाडे लावण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरु आहे.. महानगरपालिका अधिकारी व नगरसेवक यांच्या समन्वयाने शहराचा विकास साधणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
मा. आमदार श्री. नानाभाऊ शामकुळे मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी आरोग्याचे महत्व समजून देशाला स्वच्छतेचे आवाहन केले. त्याला देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला. आपल्या शहरात महानगरपालिकेने शासकीय योजना प्रभावीपणे राबवून उत्तम काम करून उघड्यावर शौच करण्याचे प्रमाण शून्यावर आणले. आज घरोघरी शौचालये आहेत. मा. केंद्रीय गृह राज्य मंत्री व मा. पालकमंत्र्यांच्या प्रयत्नाने अमृत योजनेत चंद्रपूर शहराचा समावेश झाला. शहराचा दूषित पाण्याचा प्रश्न लवकरच संपुष्टात येणार आहे. बऱ्याचशा कल्याणकारी योजना लवकरच अमलात आणल्या जाणार आहेत. आपले शहर निरोगी कसे राहील यासाठी आपण सर्वानी प्रयत्न करायचा आहे.
याप्रसंगी बोलतांना मा. महापौर सौ. अंजली घोटेकर म्हणाल्या की आजपासून स्वच्छता मोहीम देशभरात राबविली जात आहे. केंद्रीय गृह राज्य मंत्री मा. ना. श्री. हंसराज अहिर याकामी स्वतः पुढाकार घेतला आहे.
स्वच्छ भारत सुदृढ भारत ही संकल्पना पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी मांडली. स्वच्छतेचे महत्व त्यांनी देशाला समजावून सांगितल्याने ही मोहीम देशव्यापी झालेली आहे. चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे दरवर्षी स्वच्छता मोहीम अतिशय चांगल्या पद्धतीने राबविल्या जात असल्याने शहर स्वच्छ व सुंदर राहायला सुरवात झाली आहे. आज देशातले १० कोटी लोक या उपक्रमात सहभागी आहेत. जसे आपण आपले घर स्वच्छ ठेवतो तसेच आपला परिसर व शहर स्वच्छ ठेवावा. पालिका स्वच्छतेचे कर्तव्य करतेच परंतु जनतेनेही यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. 
याप्रसंगी स्वच्छता राखण्याची शपथ घेण्यात आली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदींनी देशभरातील विविध ठिकाणी साधलेला संदेश व संवाद दाखविण्यात आला. तसेच मंत्री महोदयांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले
याप्रसंगी मा. आमदार श्री. नानाभाऊ शामकुळे, मा. महापौर सौ. अंजली घोटेकर, उपमहापौर श्री. अनिल फुलझेले, गटनेता श्री. वसंत देशमुख, स्थायी समिती सभापती श्री. राहुल पावडे, जिल्हाधिकारी श्री.कुणाल खेमनार, आयुक्त श्री. संजय काकडे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री. हेमसिंग राजपूत, अतिरिक्त आयुक्त श्री. भालचंद्र बेहेरे, श्री. विजय देवळीकर, सर्व नगरसेवक, नगरसेविका, उपायुक्त श्री. गोस्वामी, श्री. बोकडे उपस्थित होते.