সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, September 30, 2018

शिकाऊ उमेदवारांनी कागदपत्रे सादर करावी:मुख्य अभियंता

शिकाऊ उमेदवारांनी कागदपत्रे सादर करावी:मुख्य अभियंता

कोराडी वीज केंद्रात इलेक्ट्रिशियन व फिटर पदासाठी अर्ज केलेल्या शिकाऊ उमेदवारांनी कागदपत्रे सादर करावी: मुख्य अभियंता
कोराडी/ प्रतिनिधी:
महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्राच्या आस्थापनेवर २०१८ या सत्रामध्ये इलेक्ट्रिशियनच्या २२ जागा व फिटरच्या १३ जागा शिकाऊ उमेदवार म्हणून भरण्याकरिता कोराडी वीज केंद्र परिपत्रक १८३ दि. ११ जानेवारी २०१८ अन्वये ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या सूचना प्रसारित करण्यात आल्या होत्या. त्यास ट्रेडनिहाय अनुक्रमे २८६१ व १३९७ इतके ऑनलाईन अर्ज करण्यात आले आहेत. 
तरी ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांनी त्यांची आय.टी.आय. गुणपत्रिका, आधार कार्ड व आरक्षण अंतर्गत असल्यास जात प्रमाणपत्र इत्यादी मुख्य अभियंता कोराडी औष्णिक विद्युत केंद्र कोराडी यांचे उर्जाभवन प्रशासकिय कार्यालयातील मानव संसाधन विभागात संबंधित कागदपत्रे सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत सादर करावी.

तारीखनिहाय कागदपत्रे सादर करण्याकरिता तपशील पुढीलप्रमाणे : सर्वसाधारण उमेदवार ६ ऑक्टोबर, महानिर्मितीचे प्रकल्पग्रस्त ७ ऑक्टोबर, प्रकल्पबाधित गावातील उमेदवार ८ ऑक्टोबर, महानिर्मिती कर्मचाऱ्यांचे पाल्य ९ ऑक्टोबर २०१८ निश्चित करण्यात आली आहे. कागदपत्रे सादर न करणाऱ्या उमेदवाराचा निवड प्रक्रियेत विचार करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी असे कोराडी वीज केंद्र प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

Saturday, September 29, 2018

फुटाळ्या लगतच्या भूमिगत रस्त्याला हेरिटेज समितीची तत्त्वत:मंजुरी

फुटाळ्या लगतच्या भूमिगत रस्त्याला हेरिटेज समितीची तत्त्वत:मंजुरी

फुटाळा भूमिगत रस्ता साठी इमेज परिणामनागपूर/प्रातिनिधी:
फुटाळा तलावालगत होणाऱ्या सौंदर्यीकरणांतर्गत भूमिगत रस्ता आणि प्रेक्षकदीर्घेच्या बांधकामाला हेरिटेज संवर्धन समितीने तत्त्वत: मंजुरी प्रदान केली आहे. नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील नगर रचना विभागाच्या कक्षात शनिवारी (ता. २९) पार पडलेल्या बैठकीत सदर मंजुरी देण्यात आली होती. 
महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेडचे अतिरिक्त महाव्यवस्थापक (नियोजन) यांनी फुटाळा तलावालगत भूमिगत रस्ता आणि प्रेक्षकदीर्घा बांधकामाला हेरिटेज संवर्धन समितीचे ना-हरकत पत्र मिळण्यासाठी पत्र सादर केले होते. या पत्राच्या अनुषंगाने हेरिटेज संवर्धन समितीच्या बैठकीत सदर विषय चर्चेला आला होतो. महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सदर बांधकामासंदर्भातील सर्व कागदपत्रे समितीकडे सादर केले. यावेळी सदर बांधकामाचे सादरीकरणही त्यांनी केले. या बांधकामामुळे हेरिटेज वास्तूंच्या यादीत असलेल्या फुटाळा तलावाला कुठलाही धोका निर्माण होणार नाही. त्यासंदर्भात संबंधित सर्व विभागांशी पत्रव्यवहार झाल्याची माहिती मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली. शहराच्या सौंदर्यात भर घालणारा आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या या विषयाला समितीने तत्त्वत: मंजुरी प्रदान केली. 
बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रभारी अध्यक्ष तथा नागपूर महानगरपालिकेचे उपायुक्त राजेश मोहिते होते. समितीचे सदस्य स्ट्रक्चरल अभियंता पी. एस. पाटणकर, एल.ए.डी. महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. नीता लांबे, नागपूर विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या प्र-पाठक डॉ. शुभा जोहरी, नागपूर वस्तु संग्रहालयाचे क्युरेटर विराग सोनटक्के, नगररचना विभाग नागपूर शाखेच्या सहायक संचालक सुप्रिया थूल, नागपूर सुधार प्रन्यासचे अधीक्षक अभियंता सुनील गुज्जलवार, नगररचनाकार श्री. प्रवीण सोनारे उपस्थित होते. 
जीपीओमधील बांधकामाच्या निरीक्षणासाठी उपसमिती 
सिव्हील लाईन्स येथील जनरल पोस्ट ऑफिस इमारत परिसरात करण्यात आलेल्या बांधकामाबाबत हेरिटेज संवर्धन समितीने आक्षेप घेतल्यानंतर सदर विभागाने जागेची आवश्यकता असल्याने बांधकाम केल्याचे स्पष्टीकरण दिले होते. बांधकामाचे इस्टिमेट, नकाशे आदी सादर करून बांधकामास मान्यता देण्याची विनंती केली होती. त्या अनुषंगाने शनिवारच्या बैठकीत विषयावर चर्चा झाली. पोस्ट ऑफिस प्रशासनातर्फे मंजुरीसाठी नगररचना विभागाकडे प्रस्ताव सादर करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले. या बांधकामाच्या निरीक्षणासाठी आणि त्यावर अंतिम अहवाल सादर करण्यासाठी तीन सदस्यीय उपसमिती यावेळी नेमण्यात आली. उपसमितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल.
‘सर्जिकल स्ट्राईक’ येणाऱ्या प्रत्येक पिढीला प्रेरणा देणारी बाब : महापौर नंदा जिचकार

‘सर्जिकल स्ट्राईक’ येणाऱ्या प्रत्येक पिढीला प्रेरणा देणारी बाब : महापौर नंदा जिचकार

अंबाझरी उद्यानात ‘पराक्रम पर्व’ साजरे 
नागपूर/प्रतिनिधी:

 देशातील वाढते आतंकवादी हल्ले, परकीय राष्ट्रांमधून होणारी घुसखोरी या सर्व कारवायांसाठी सर्जिकल स्ट्राईक हे चोख उत्तर ठरले. भारतीय सैन्याच्या या पराक्रमामुळे देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा उंचावली. सर्जिकल स्ट्राईक ही येणाऱ्या प्रत्येक पिढीला प्रेरणा देणारी बाब आहे, असे गौरवोद्‌गार महापौर नंदा जिचकार यांनी काढले. 
पाकिस्तान विरोधात भारतीय सैन्यामार्फत करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकला दोन वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने शहरातील अंबाझरी उद्यानात ‘पराक्रम पर्व’ साजरा करण्यात आला. यावेळी महापौर नंदा जिचकार यांच्यासह सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, विजय होले, रवि हलकंदर, गुंडूभाऊ मसुरकर, मनिष गेडाम, विनोद चवरे, संगीता चंद्रायण, कविता देशमुख, रश्मी नसीने, योगिता धार्मिक, अनुसया गुप्ता आदी उपस्थित होते. 

२९ सप्टेंबर २०१६ ला दोन वर्षापूर्वी भारतीय सैन्याने आपल्या देशात घुसखोरी करून देशात आतंकवादी कारवाया करीत देशाच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्यांचे तोंड बंद केले. सीमेवर अहोरात्र देशाचे रक्षण करणाऱ्या सैन्याने केलेली ही कामगिरी प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. सैन्याच्या या पराक्रमामुळे अनेक तरुणांच्या मनात देशरक्षणाची बिजे रोवली गेली. देशाच्या भवितव्याची धुरा असणाऱ्या तरुणाईने आपण भारतीय असल्याचा अभिमान बाळगावा व आपल्या कार्यामुळे देशाचे नाव लौकीक होईल, असेच कार्य करावे, असे आवाहनही महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी केले. 

देशाच्या सीमेवर शत्रुकडून येणारी गोळी झेलून त्याला प्रत्युत्तर देण्यास तत्पर असणाऱ्या सैन्यामुळे आपण घरामध्ये सुखाने राहू शकतो. भारतीय सैनिक हेच देशातील खरे हिरो आहेत. तिरंग्याच्या सन्मानासाठी प्राण पणाला लावणाऱ्या आपल्या सैन्यांचा प्रत्येकाने आदर राखावा, असेही महापौर नंदा जिचकार यावेळी म्हणाल्या. कार्यक्रमाला अंबाझरी परिसरातील नागरिकांसह, उद्यानातील कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. 

सर्जिकल स्ट्राईक भारताने जगाला दिलेला इशारा आहे: अहीर

सर्जिकल स्ट्राईक भारताने जगाला दिलेला इशारा आहे: अहीर

चंद्रपूरमध्ये माजी सैनिकांच्या सत्कारात शौर्य दिन साजरा
चंद्रपूर/प्रतिनिधी:
कोणावर कधीही आक्रमण न करणारा भारत, गरज पडल्यास शत्रूच्या सिमेत घुसून आंतकवादयांचा नायनाट करु शकते, असा धडकी भरवणारा संदेश भारताने सर्जिकल स्ट्राईक माध्यमातून जगाला दिला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर यांनी आज येथे केले.

चंद्रपूर येथील आयएमए सभागृहात 29 सप्टेंबर, शौर्य दिनानिमित्त जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, चंद्रपूर व माजी सैनिक संघटना चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने एका देशभक्तीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलतांना त्यांनी भारताच्या संयमीवृत्तीचे जबाबदार उत्तर म्हणून सर्जिकल स्ट्राईक पुढील अनेक काळ देशवासियांच्यासह लक्षात राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. भारताला गृहीत धरु नये. शांततावादी असणारा हा देश गरज पडल्यास सिमेमध्ये घुसून शत्रूवर प्रहार करण्याची हिंमत ठेवू शकतो. हा इशारा व त्याची प्रत्यक्ष कृती म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या काळात झालेली ही लष्करी कारवाई आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाच्या व्यासपिठावर त्यांनी चंद्रपूरच्या भुमीतून भारत मातेसाठी शहीद झालेल्या सुपूत्रांच्या विरमाता व विरपत्नींचा सत्कार केला. यावेळी व्यासपिठावर ब्रिगेडीयर सुनील गावपांडे, कॅप्टन सोहदा, सुभेदार शंकर मेंगरे शौर्यचक्र प्राप्त, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थाई समिती सभापती राहुल पावडे, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सिध्दार्थ डांगे, जिल्हा सैनिक कल्याण संघटक व जनमाहिती अधिकारी (निवृत्त) सुभेदार मेजर दिनेशकुमार गोवारे, विजय राऊत यांची उपस्थिती होती. यावेळी श्रीमती व्यंकमा गोपाल भिमनपल्लीवार, श्रीमती छाया बालकृष्ण नवले, श्रीमती पार्वती वसंतराव डाहुले, सुभेदार गणपती मेंगरे या वीरमाता, वीरपत्नी व शौर्यचक्र प्राप्त सैनिकांचे सत्कार करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनेशकुमार गोवारे यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी बोलतांना आजचा दिवस तमाम भारतीयांसाठी गौरवाचा दिवस असल्याचे प्रतिपादन केले. डॉ.महेशर रेड्डी यांनी सर्जिकल स्ट्राईक मध्ये सहभागी होणे किती कष्टाचे असते, याची माहिती दिली. तर ब्रिगेडीयर सुनील गावपांडे यांनी सर्जिकल स्ट्राईक म्हणजे शत्रूच्या भागात जावून तेथे नेमकी कारवाई करत आंतकवांदी हालचाली करणा-या यत्रणेचा संपूर्ण नायनाट करणे होय. या कार्यवाहीमध्ये सामान्य नागरिकांच्या व तेथील इमारती व अन्य बाबींचे नुकसान न करता केवळ अतिरेकी कार्यवाया करणा-यांचा बिमोड केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नगरसेविका सविता कांबळे यांनी केले.

 महावितरण आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धा 3 ऑक्टोंबरपासून

महावितरण आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धा 3 ऑक्टोंबरपासून

महावितरणची नाट्य रसिकांना मेजवानी 
  नागपूर/प्रतिनिधी:
महावितरणच्या प्रादेशिक स्तरावरील आंतरपरिमंडलीय दोन दिवसीय नाट्यस्पर्धेचे आयोजन कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशिमबाग, नागपूर येथे बुधवार दि. 3 ऑक्टोबर 2018 पासून करण्यात येत आहे. या स्पर्धेत महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या पाचही परिमंडलांतर्फ़े नाट्यप्रयोगांचे सादरीकरण होणार आहे. 
या स्पर्धेचा शुभारंभ बुधवार दि. 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 8.30 वाजता महावितरणचे कार्यकारी संचालक (पायाभुत आराखडा) प्रसाद रेशमे यांच्या हस्ते करण्यात येईल, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत हे राहतील, याप्रसंगी अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे, मुख्य अभियंता (गुणवत्ता नियंत्रण) सुहास रंगारी, चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर, अमरावती परिमंडलाच्या मुख्य अभियंता सुचित्रा गुजर आणि गोंदीया परिमंडलाचे मुख्य अभियंता सुखदेव शेरेकर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहतील. 

या स्पर्धेत बुधवार दि. 3 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी 9 वाजता चंद्रपूर परिमंडलातर्फ़े अशोक बुरबुरे लिखित ‘आग्टं’ हा नाट्यप्रयोग सादर करण्यात येईल, दुपारी 2 वाजता हेमंत ऎदलाबादकर यांनी लिहीलेले ‘ती रात्र’ हा नाट्यप्रयोग अमरावती परिमंडलातर्फ़े सादर करण्यात येईल, तर सायंकाळी 6.30 वाजता प्रशांत दळवी लिखित ‘चारचौघी’ हा नाट्यप्रयोग गोंदीया परिमंडलातर्फ़े सादर करण्यात येईल. गुरुवार दि. 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता अकोला परिमंडलातर्फ़े चंद्रकांत शिंदे लिखित ‘बाबा मी तुमचीच मुलगी आहे’ हा नाट्यप्रयोग तर दुपारी 1.30 वाजता दिपेश सावंत यांनी लिहिलेले ‘ओय लेले’ चा नाट्यप्रयोग नागपूर परिमंडलातर्फ़े सादर केला जाईल. 

या नाट्यस्पर्धेचे पारितोषिक वितरण गुरुवार दि. 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेत होणा-या या कार्यक्रमाला कार्यकारी संचालक (मानव संसाधन) चंद्रशेखर येरमे आणि प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांची प्रमुख उपस्थिती राहील. या स्पर्धेत सादर करण्यात येणारे सर्व प्रयोग विनामुल्य आहेत. नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने या प्रयोगांना उपस्थित राहून महावितरणच्या कलावंतांना प्रोत्साहित करण्याचे आवाहन नाट्यस्पर्धेचे स्वागताध्यक्ष तथा नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी केले आहे.
चंद्रपूर मनपाच्या आमसभेत काँग्रेस-भाजपाचे गटनेते भिडले

चंद्रपूर मनपाच्या आमसभेत काँग्रेस-भाजपाचे गटनेते भिडले

पाणी व अनुसूचित जाती जमाती निधी वरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये झाला वाद
चंद्रपुर/विशेष प्रतिनिधी:

चंद्रपूर शहर महानगर पालिकेत आज आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. या आमसभेत पाण्याच्या विषयावरून विरोधी पक्षांनी चांगलाच गदारोळ केला.दरम्यान पाण्याच्या विषय सुरु असतानाच दलित नगरोत्थान अर्थात अनुसूचित जाती जमाती निधीवरून काँग्रेसचे नगरसेवक नन्दु नागरकर आणि नगरसेवक वसंता देशमुख यांच्यात चांगलीच जुंपली .हे दोन्ही नगरसेवक एकमेकांविरोधात आक्रमक झाल्याची माहिती समोर आली आहे.


सभागृहात कांग्रेसच्या नगरसेवकांनी मटके हातात घेत महापौरांना पाण्याची मागणी करीत मटके सभागृहात फोडण्यात आले.अचानक भाजपचे नगरसेवक वसंता देशमुख यांनी नंदू नागरकर यांना धक्कामुक्की करण्यास सुरुवात केली, दोघात जणू हाणामारी होणार हे लक्षात येताच बाकी नगरसेवकांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला.
बसच्या धडकेत युवक जागीच ठार

बसच्या धडकेत युवक जागीच ठार

नारा रोडवर ARC कॉन्व्हेंट जवळ भयानक अपघात
प्रतिनिधी:कारंजा (घाडगे)
काटोल कारंजा मार्गे नरखेड जाणाऱ्या बसच्या धडकेत एक युवक जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी 9:30 च्या सुमारास नारा रोडवर ARC कॉन्व्हेंट जवळ घडली.रोशन गोविंदराव टिपले राहणार पारडी ता.आष्टी जिल्हा वर्धा असे या मृत व्यक्तीचे नाव आहे.
रोषण हा MH 32 Ac 0517 होंडा shine ने नेहमी प्रमाणे आपल्या कामावर जात होता. काटोल डेपोच्या MH 40 8389 ही बस काटोल डेपोतून कारंजा वरून नरखेड जात असताना दुचाकी स्वार रोशनला बसची जबर धडक लागल्याने तो धडकेत दूर फेकला गेला त्यात त्याच्या मेंदूला जबर मार लागला,व त्याचा जागीच मृत्यू झाला.तो प्रवर्धन सिड्स pvt.ltd मध्ये काम करत होता,अपघातानंतर घटनास्थळी चांगलीच गर्दी जमली होती.तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

श्री साई सेवासंकल्प प्रतिष्ठाना मार्फत पोलिस अधीक्षक व स्थायी समिती अध्यक्षांचा सत्कार

श्री साई सेवासंकल्प प्रतिष्ठाना मार्फत पोलिस अधीक्षक व स्थायी समिती अध्यक्षांचा सत्कार

 प्रतिष्ठानने मानले प्रशासनाचे आभार 
चंद्रपूर/प्रतिनिधी:
नुकत्याच निर्विघ्न, सुरक्षीतेत व स्वच्छतेत पार पडलेल्या गणेश विसर्जनात सर्वात मोठा वाटा असणाऱ्या पोलिस प्रशासण व महानगरपालिका यांच्या संयुक्त प्रशासनामुळे चंद्रपूर शहरातील सर्वात मोठा उत्सव जिल्हातील  जनतेला उपभोगायला मिळाला,त्याच प्रमाणे सर्व सेवाभावी संस्थांना सर्वतोपरी मदत करून सेवेचा सुध्दा  लाभ घेतला. याच अनुशंगाने कृतज्ञता व्यक्त करण्याकरीता श्री साई सेवासंकल्प प्रतिष्ठान चंद्रपूरच्या तर्फे जिल्हाचे पोलिस अधीक्षक मा.श्री. महेश्वर रेड्डी सर यांच्या जन्मदिनाच्या अनुशंघाने व उत्कृष्ठ शहर स्वच्छतेचे स्वप्न बाळगनारे चंद्रपूर महानगरपालीकेचे स्थायी समिती अध्यक्ष मा.श्री. राहूल पावडे यांचे 28 सप्टेंबर रोजी प्रतिष्ठानच्या वतिने शाल व वृक्ष तसेच सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले व त्यांना साई सेवासंकल्प प्रतिष्ठानाला शहरातील होणाऱ्या सार्वजनिक उपक्रमात सहभागी करण्याकरीता निवेदन दिले.

या प्रसंगी प्रतिष्ठानचे शिष्टमंडळ अध्यक्ष श्री सचिन गाटकिने, सचिव श्री नविन कपुर,सहसचिव श्री विनोद गोवारदिपे,कोशाध्यक्ष श्री प्रमोद वरभे, सदस्य श्री प्रदिप रणदिवे, श्री सचिन इमले,श्री दिघराज पें-सजयारकर,श्री तुशार राहुड,श्री गणेश साबळे, श्री प्रतिक लाड,श्री रवि त्रिनगरवार,श्री नितेश खामनकर,श्री कृणाल खनके उपस्थित होते.
 S.E.A तर्फ़े मंगळवारी अभियंता दिनाचे आयोजन

S.E.A तर्फ़े मंगळवारी अभियंता दिनाचे आयोजन

नागपूर/प्रतिनिधी:
सबऑर्डीनेट इंजिनियर असोसिएशन (एमएसईबी), नागपूर परिमंडलाच्या विद्यमाने भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांच्या सामाजिक उत्थानासाठी केलेल्या कार्याला अभिवादन करण्यासाठी ‘अभियंता दिन’ कार्यक्रमाचे आयोजन कवी कुलगूरु कालीदास सभागृह, आयटी पार्क, उत्तर अंबाझरी मार्ग, नागपूर येथे मंगळवार दि. 2 ऑक्टोबर 2018 रोजी सायंकाळी 5.30 वाजता करण्यात आले आहे. यावेळी इंडीया स्मार्ट ग्रीड फ़ोरमचे सदस्य सुहास धापारे हे प्रमुख वक्ते म्हणून ‘स्मार्ट ग्रीड आणि स्मार्ट मीटर’ या विषयावर मार्गदर्शन करतील.
राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणा-या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सबऑर्डीनेट इंजिनियर असोसिएशन (एसईए) चे अध्यक्ष संजय ठाकूर हे राहणार असून याप्रसंगी महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, महापारेषणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता विकास बढे, महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांचेसह एसईए चे उपाध्यक्ष संजय पाटील, महासचिव सुनिल जगताप, आयोजन सचिव देदार रेळेकर आदी मान्यवर उपस्थित राहतील असे आयोजन समितीचे अविनाश लोखंडे, भुपेंद्र रंध्ये आणि राजेंद्र पैठे यांनी कळविले आहे. 


डेंग्यूच्या नावावर पैसे उखळणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करा

डेंग्यूच्या नावावर पैसे उखळणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करा

आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांचे निर्देश : सतरंजीपुरा व लकडगंज झोनमध्ये आढावा बैठक 
नागपूर/प्रतिनिधी:
डेंग्यूमुळे नागरिकांच्या मनात भीती असून साधारण तापाच्या उपचारासाठी खासगी दवाखान्यात जाणाऱ्या रुग्णांना डेंग्यूची भीती दाखवून रुग्णांकडून पैसे उकळणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करा, असे निर्देश आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांनी दिले. 
आरोग्य समितीच्या झोननिहाय बैठकीअंतर्गत शुक्रवारी (ता. २८) सतरंजीपुरा व लकडगंज झोन कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांच्यासह सतरंजीपुरा झोनच्या सभापती यशश्री नंदनवार, नगरसेवक संजय महाजन, संजय चावरे, नगरसेविका अभिरुची राजगिरे, शकुंतला पारवे, वंदना चांदेकर, सतरंजीपुरा झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, लकडगंज झोनमध्ये नगरसेवक प्रदीप पोहाणे, अनिल गेंडरे, नगरसेविका मनिषा धावडे, सरिता कावरे, जयश्री रारोकर, झोनचे आरोग्य अधिकारी डॉ. मोवाडे उपस्थित होते. 
खासगी रुग्णालयांकडून मोठ्या प्रमाणात डेंग्यूच्या भीतीचा प्रचार केला जात आहे. रुग्णांकडून जास्तीत जास्त पैसे उकळण्यासाठीचा हा खासगी रुग्णालयांचा फंडा आहे. साधारण तापासाठी तपासणीकरिता खासगी रुग्णालयात रुग्ण गेल्यास त्याला डेंग्यूचे लक्षण असल्याचे सांगून भरती केले जाते. त्यानंतर महागड्या चाचण्या करून रुग्णांची आर्थिकदृष्ट्या लूट केली जाते. मात्र खासगी रुग्णालयांमधून ज्या प्रकारे भीतीचा प्रचार केला जात आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये अधिकच भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. अशा खासगी रुग्णालयांकडून डेंग्यूबाबत महानगरपालिकेला अहवालही सादर केला जात नाही. या खासगी रुग्णालयांना अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात यावे व डेंग्यूच्या नावावर नागरिकांची लूबाडणूक करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करण्यात यावे, असे यावेळी आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांनी निर्देशित केले. 

बैठकीमध्ये आरोग्य सभापती मनोज चापले यांनी सतरंजीपुरा व लकडगंज झोनमधील डेंग्यूच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. फवारणीसाठी वेळापत्रक तयार करण्यात यावे व फवारणी आधी नगरसेवकांना माहिती देऊन त्यांच्या सूचनेवरून ठराविक भागांमध्ये फवारणी करण्यात यावी. डेंग्यूमुळे शहरात निर्माण झालेल्या वातावरणाचा फायदा घेत काही जण राजकारण करीत आहेत. मात्र या रोगावर मात करण्यासाठी राजकारणापेक्षा जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे व त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचेही सभापती मनोज चापले म्हणाले. 
परिसरात अस्वच्छता, घरी, छपरावरील टायर, ड्रम आदी साधनांमध्ये साचणारे पाणी व परिसरात असणारा कचरा यामुळे डेंग्यूच्या डासांची पैदास वाढते. हे सर्व आपल्याच निष्काळजीपणामुळे होते. डेंग्यूवर मात करण्यासाठी प्रत्येकाने निष्काळजीपणा सोडून स्वच्छता ही आपली जबाबदारी असल्याचे निश्चित करणे आवश्यक आहे. डेंग्यूबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे. यासाठी नगरसेवकांनी पुढाकार घेउन जनजागृती करणारे पत्रक छापून आपापल्या प्रभागात घरोघरी वितरीत करावे. याशिवाय झोनमधील मनपासह, शासकीय व खासगी अशा सर्व शाळांमध्ये जनजागृती कार्यक्रम घेण्यात यावेत. चिमुकल्या मुलांमार्फत होणारा प्रचार हा प्रभावी ठरत असल्याने शाळांमध्ये जनजागृतीवर भर द्या, असेही सभापती मनोज चापले यांनी यावेळी निर्दशित केले.
 अपघात प्रवण क्षेत्रावरील अपघाताचे प्रमाण कमी करा:हंसराज अहीर

अपघात प्रवण क्षेत्रावरील अपघाताचे प्रमाण कमी करा:हंसराज अहीर

चंद्रपूर/प्रतिनिधी:
 चंद्रपूर जिल्हयातील वाहनांची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे. हे एक ऐतिहासिक शहर असून या ठिकाणी रस्त्यांच्या काही भागात मर्यादा पडतात. त्यामुळे शहरातील वाहन व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी अपघात प्रवण क्षेत्राची (ब्लॅक स्पॉट) निवड करण्यात यावी व त्या ठिकाणी अपघात होणार नाही, अशा पध्दतीच्या उपाय योजना करण्यात याव्यात यावी, अशी सूचना केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर यांनी केली.
केंद्र सरकारच्या अधिसुचनेनुसार जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्षपद जिल्हयाचे लोकसभा सदस्य म्हणून ना. हंसराज अहीर यांच्याकडे आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक आज 28 सप्टेंबर रोजी पोलीस मुख्यालय, चंद्रपूर येथे पार पडली. 
जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष म्हणून पहिल्या सभेचे कामकाज पार पाडतांना अधिका-यांना अपघात प्रवण क्षेत्रा (ब्लॅक स्पॉट) निवडलेल्या ठिकाणी तातडीच्या उपाययोजना दोन महिन्यांत करून अपघाताचे प्रमाण कमी करण्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहीर यांनी निर्देश दिले. 
यावेळी महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, मनपाचे आयुक्त संजय काकडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंबर शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंत्या सुषमा साखरवडे, कार्यकारी अभियंता मनोज जयस्वाल व एस.आर.जाधव, राष्ट्रीय महामार्गाचे सहाय्यक अभियंता व अन्य अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. 
समोर आलेल्या माहितीनुसार सन 2015 ते 2017 या वर्षात चंद्रपूर जिल्हयात अपघात व मृत्यू यांचे प्रमाण सतत वाढत आहे. भारतात वर्षाला दीड लक्ष लोकांचा अपघाती मृत्यू होत आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी करण्याची गरज भासली असून यावर उपाययोजना म्हणून जिल्हयात एकुण 28 ठिकाणी अपघात पवण क्षेत्रा म्हणून अभ्यासपूर्ण निवड परिवहन विभागाने केली असून त्यावर उपाययोजना सुचविलेल्या आहेत. बैठकीत काही उपाययोजना दोन महिन्यांच्या कालावधीत तर काही दोन महिन्यांच्या कालावधीत होण्यासारख्या असल्याने दोन महिन्यात काम पूर्ण करण्याचे ना. अहीर यांनी निर्देश दिले. महानगराच्या महापौर अंजली घोटेकर यांनी वाहतूक नियमनासाठी स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांची विनामुल्य मदत घेण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यावर ना.अहीर यांनी दुजोरा देवून असा प्रयोग करता येईल अशा सुचना केल्या. 
जिल्हयात अवैध बस वाहतूक, वेकोलि व सिमेंटच्या ओवरलोड ट्रक व त्यांच्यामुळे होणारे प्रदुषण याकडे सभेचे लक्ष वेधून त्यावर चर्चा केली व अशा वाहतुकीवर कडक कार्यवाही करावी असे निर्देश दिले. चंद्रपूर जिल्हयात 5 लक्ष 74 हजार वाहने असून त्यात दुचाक्या 4 लक्ष 70 हजार इतक्या आहेत. इतक्या मोठया प्रमाणात वाहणे असल्याने परिवहन नियमन करणे जिकरीचे होत आहे. जिल्हयातून 107 कोटी इतका मोठा महसुल परिवहन विभागाकडून राज्य सरकारला जात असल्याने परिवहन विभागाचे सक्षमिकरण दर्जोन्नती करण्यावर यापुढे भर देण्यात येईल असे श्री. अहीर यांनी सांगितले. 
साधारणपणे ही बैठक तीन महिन्यातुन एकदा घ्यावयाची असली तरी ब्लॅकस्पाॅटवर करावयाच्या उपाययोजना व अपघाताचे प्रमाण कमी तातडीने उद्दीष्टय डोळयासमोर असल्याने पुढील बैठक दोन महिन्यांच्या आत घेण्यात येईल असे विभागास सांगून तोपर्यंत सर्व विभागाने दोन महिन्यांच्या आत सोपविलेली कामे पूर्ण करावीत असे सक्त निर्देश दिले.
  सर्जिकल स्ट्राईकच्या समर्थनार्थ शौर्यदिन कार्यक्रमाचे आयोजन

सर्जिकल स्ट्राईकच्या समर्थनार्थ शौर्यदिन कार्यक्रमाचे आयोजन

serjical strike साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी:
  29 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय सैन्य दलाने पाकिस्तान हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईक करून अतिरेक्यांचा खात्मा केला. भारतीय जवानांची ही अभिमानास्पद कामगीरी जनतेपर्यंत पोहचविण्याकरिता 29 सप्टेंबर हा शौर्य दिवस पूर्ण भारतात साजरा करण्यात येत आहे. या शुरवीर सैनिकांच्या सन्मानार्थ चंद्रपुरातही शौर्य दिवस दि. 29 सप्टेंबर 2018 रोजी आयएमए हाॅल, गंजवार्ड येथे सायं. 5.00 वाजता साजरा होणार आहे. या कार्यक्रमास भारताचे केंद्रीय गृह राज्यमंत्राी मा.ना.श्री. हंसराजजी अहीर, महाराष्ट्र राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्राी मा.ना.श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार, आमदार श्री. नानाभाऊ शामकुळे, महापौर अंजलीताई घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, जिल्हाधिकारी श्री. कुणाल खेमणार, जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. महेश्वर रेड्डी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पापडकर, आयुक्त श्री. संजय काकडे आदी मान्यवर सदर कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे. 
या कार्यक्रमाला सर्व मनपा सदस्य, जि.प. सदस्य, पं.स. सदस्य, न.प. सदस्य तसेच सर्व चंद्रपूर शहरातील नागरिकांनी शौर्यदिन कार्यक्रमास उपस्थित राहून शुरवीर भारतीय जवानांच्या कार्याचा सन्मान करण्यास उपस्थित रहावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजकानी प्रसिध्दीस दिलेल्या पत्राकातून केले आहे. 
नागपूर पोलिसांची बॉलीवूड स्टाईल जनजागृती;मिम्स पे चर्चा

नागपूर पोलिसांची बॉलीवूड स्टाईल जनजागृती;मिम्स पे चर्चा

नागपूर/ललित लांजेवार:
नागपूरकरांमध्ये वाहतूक जागृती करायची तर नागपूरकरांच्या पद्धतीनेच त्यांना समजावायला हवे. त्यासाठी नागपूर पोलिसांनी एक अनोखी शक्कल लढवली असून शहरातील विविध चौकात वाहतूकीच्या नियमांबाबत जनजागृती करणारे बॉलीवूड स्टाईल अंदाजात जनजागृतीपर अंदाजात फ्लेक्स लावण्यात आले आहे.

दिवसेंदिवस नागपूरची वाढती वाहनांची संख्या व नियमांचे पालन न केल्याने अपघातात होणारी वाढ रोखण्यासाठी नागपूर पोलीस त्यांच्या अनोख्या सध्या जनजागृतीमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. नागपूर पोलिसांची चर्चा व्हायलाच पाहिजे त्याला कारणही तसेच आहे.नागपूरकरांमध्ये वाहतूक जागृती करायची तर नागपूरकरांच्या पद्धतीनेच त्यांना समजावायला हवे. 

त्यासाठी नागपूर पोलिसांनी अमिताभ बच्चन यांचा कोण बनेगा करोडपती, १९७५ साली प्रदर्शित झालेला भारतामधील हिंदी भाषिक चित्रपटांच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी मानला गेलेला चित्रपट शोले,सलमान खान,अमीर खान,अमरीश पुरी, बोमन इराणी,यांच्या सह फिल्म इंडस्ट्री मधील अनेक चित्रपटांच्या मनावर कोरणाऱ्या डॉयलॉगचा वापर करत जनजागृती करत आहेत, तर सोशल मिडीयावर या जनजागृतीचे मिम्स देखील व्हायरल केले आहे.



विना हेल्मेट गाडी चालवणे,ट्रिपल सीट वाहन चालवणे,अवैध प्रवासी वाहतूक, राँग साईड ड्रायव्हिंग, फॅन्सी नंबर,सिटबेल्ट न लावता वाहन चालविणे, अश्या आशयाचे बॉलीवूड इंडस्ट्रीमधील फोटो व डॉयलॉग वापरून नागपूर पोलीस नागपूरकरांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. नागपूर पोलिस सोशल मिडिया वरून फेसबुक व ट्वीटरच्या माध्यमातून हि जनजागृती तर करतच आहेत.

 सोबतच शहरातील चौकाचौकात फ्लेक्सच्या माध्यमातून देखील हि जनजागृती करत आहे.सध्या असे अनेक मिम सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्यामुळे अनेकजण ह्या ट्वीटकडे उत्सुकतेने पाहत आहेत. तर अशा प्रकारचे ट्वीट विनोदी ढंगाने करून नागरिकांपर्यंत पोहचवत असते त्यात ह्या ट्वीटवरून नागपूर पोलीस हेल्मेट संदर्भात जनजागृती करत आहे.

पोलिसांच्या अश्या नवीन संकल्पनेसह जरी जनजागृती जरी सुरु असली तरी मात्र शहरात अनेक ठिकाणी मोठ मोठ्या आवाजाच्या गाड्या कर्ण कर्कश आवाजाचे हॉर्न,व दुचाकीने गाडी हवेत उडविण्याचे प्रकार हे मोठ्या प्रमाणवर सुरूच आहे. अश्या या प्रकाराला पोलिसांनी लवकरात लवकर आळा घालणे गरजेचे आहे,

Friday, September 28, 2018

कोरपना तालुक्यात औषधी विक्रेतेचा कड़कडीत बंद

कोरपना तालुक्यात औषधी विक्रेतेचा कड़कडीत बंद

ऑनलाईन औषधी विक्रीबाबत औषधी विक्रेते आक्रमक
चंद्रपुर/कोरपना/प्रतिनिधी:  

शुक्रवारला ऑनलाईन फार्मसी विरोधात औषध विक्रेत्यांनी देशव्यापी बंद आंदोलन पुकारन्यात आले होते. या अनुषंगाने कोरपना तालुक्यातील कोरपना,गड़चांदुर,नान्दा,
वनसडी,पारडी,कवठाळा येथिल सर्व औषध विक्रेत्यानी मेडिकल बंद ठेऊन बंद यशस्वीरित्या पाळला. यासंबंधी केमिस्ट ऍन्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या सदस्यांनी तहसिलदार आणि ठाणेदार यांची भेट घेऊन त्यांच्या मार्फत शासनास निवेदन सादर केले. 
यामधे ई-फार्मसीला अधिकृत मान्यता देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने नुकताच ई-फार्मसीचा अंतिम मसुदा प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार ई-फार्मसीवर शिक्कामोर्तब झालं आहे. या ऑनलाईन औषधी खरेदीमुळे औषध विक्रेत्यांचे व्यावसायिक नुकसान तर होणार आहे.शिवाय आनलाइन औषधी विक्रीमुळे नशेच्या तसेच प्रतिबन्धित औषधी सहज प्राप्त करता येणार आहे. तसेच यातून चुकीची औषधं दिली जाण्याची शक्यता नकारता येत नाही याद्वारे रूग्णांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची चिन्हे आहे. याबाबत शासनाने नागरिकांचे हित लक्षात घेवून ऑनलाईन औषधीच्या विक्रीला परवानगी नाकारावी अशी मागणी निवेदनात कऱण्यात आली आहे.तहसीलदार व ठाणेदार कोरपना याना निवेदन देतेवेळी कोरपना तालुका केमिस्ट अण्ड ड्रगिस्ट असोशियनचे अद्यक्ष पराग जकाते,सचिव विनोद चटप , जेष्ठ केमिस्ट.दिलीप जेनेकर ,सुरेश माहुरे,सुरेश कपले,अजय मुनगिलवार,सतीश डाहुले,सुरेन्द्र ठवसे,दिवाकर कवरासे,नीलेश ताजने,नितिन डोर्लिकर,दिवाकर वडस्कर,ईश्वर खनके,राहुल राजुरकर व कोरपना तालुक्यातील सर्व केमिस्ट बांधव उपस्थित होते.
बस स्टापेज देने की मांग को लेकर ABVP ने निकाला मोर्चा

बस स्टापेज देने की मांग को लेकर ABVP ने निकाला मोर्चा

ब्रम्हपुरी:
ABVP ने निकाला मोर्चा ग्रामीण क्षेत्र में स्कूल-कालेज में पढ़नेवाले विद्यार्थियों के लिए बस का स्टापेज देने की मांग को लेकर गुरुवार को अखिल भारतीय विद्यार्थी परिषद की ओर से मोर्चा निकाला गया. मोर्टे ने ब्रम्हपुरी डिपो पर दस्तक दी. पश्चात अधिकारियों को निवेदन सौंपाकर बस स्टापेज देने की मांग की गई. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय ब्रम्हपुरी में नागभीड़, आरमोरी, भिवापुर, वड़सा, तलोधी, सिंदेवाही जैसे स्थानों से लगभग 200-250 विद्यार्थी पढ़ने के लिए आवागमन करते हैं. बस से यात्रा के दौरान कुछ स्थानों पर सुपरफास्ट बसों का स्टापेज नहीं होने से विद्यार्थियों को काफी परेशानियों का सामना करना पड़ रहा है. विद्यार्थियों को काफी समय तक सामान्य बस की प्रतीक्षा करनी पड़ती है या विद्यार्थियों को पैदल ख्रिस्तानंद चौक तक आना पड़ता है. इससे उन्हें काफी परेशानी होकर पढ़ाई पर असर हो रहा है.
1 अक्टूबर से फिर खुलेंगे ताड़ोबा के द्वार

1 अक्टूबर से फिर खुलेंगे ताड़ोबा के द्वार

Image result for ताडोबा होणार सुरुचंद्रपूर/प्रतिनिधी:
ताड़ोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प के द्वार 1 अक्टूबर से फिर शुरू होने जा रहे हैं. जिससे अब पर्यटक अगले वर्ष मानसून तक सफारी का भरपूर मचा उठा सकेंगे. मानसून के 3 महीनों जुलाई, अगस्त व सितंबर में व्याघ्र प्रकल्प को पूरी तरह से बंद कर दिया जाता है. हालांकि अच्छे रास्तों के चलते बफर जोन में कुछ स्थानों पर सफारी शुरू रखी गई थी. जबकि सम्पूर्ण कोअर क्षेत्र में पर्यटन बंद होने से पर्यटक पर्यटन का लाभ नहीं उठा पा रहे थे.
शुक्रवार से शुरू होगी तत्काल बुकिंग
सोमवार से ताड़ोबा अभयारण्य पर्यटकों के लिए शुरू हो रहा है. लिहाजा 3 दिन पूर्व शुक्रवार से तत्काल बुकिंग प्रारंभ हो जाएगी. साधारणत: ऑनलाइन बुकिंग के लिए 60 गाड़ियों का आरक्षण होता है. 6 प्रवेशद्वारों से प्रवेश दिया जाता है. सर्वाधिक गाड़ियां मोहुर्ली गेट से प्रतिदिन 32 वाहनों को प्रवेश दिया जाता है. कोलारा से 12, नवेगांव से 06, खुटवंडा से 04, झरी से 04, पांगडी से 02 वाहनों को प्रतिदिन प्रवेश दिया जाता है.
तत्काल बुकिंग के लिए कुल 18 गाड़ियों को प्रतिदिन प्रवेश दिया जाता है. इसमें मोहुर्ली से 08, कोलारा से 06, नवेगांव से 02,खुटवंडा से 02 वाहनों को प्रवेश दिया जाता है. सप्ताह में केवल मंगलवार को कोअर बफर में पर्यटन नहीं होता है. शेष दिनों के लिए अभयारण्य पर्यटन के लिए शुरू रहता है. सुबह 6 बजे और दोपहर 2.30 बजे 2 टाइम में प्रवेश दिया जाता है. साधारणत: 6 घंटे तक पर्यटक सफारी कर सकते हैं. प्रवेश शुल्क के रुप में 120 से 60 दिन पूर्व ऑनलाइन बुकिंग के लिए प्रतिवाहन 4,000 रूपये जो कि सोमवार से शुक्रवार तक लिए होता है. वहीं सप्ताहांत के दिन शनिवार और रविवार को प्रतिवाहन 8 हजार शुल्क लिया जाता है. 59 दिन पूर्व की बुकिंग के लिए सोमवार से शुक्रवार का शुल्क अग्रिम 1000 रूपये और शनिवार से रविवार का अग्रिम शुल्क 2000 रुपये लिया जाता है. तत्काल बुकिंग के लिए यह राशि 4,000 रुपये है.
(स्त्रोत;नवभारत)
मनपा कर्मचाऱ्यांना कार्यक्षमता वृद्धीचे प्रशिक्षण

मनपा कर्मचाऱ्यांना कार्यक्षमता वृद्धीचे प्रशिक्षण

ऑक्टोबर अखेरपर्यंत होणार ४२५ कर्मचारी प्रशिक्षित 
नागपूर/प्रतिनिधी:

दररोज नागरिकांशी संबंध येणाऱ्या नागपूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वृद्धींगत व्हावी, व्यक्तिमत्त्व विकास व्हावा, सोबतच कायदा आणि सुव्यवस्थेचे ज्ञान मिळावे यासाठी राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत नागपूर महानगरपालिकेतील सुमारे ४२५ कर्मचारी आक्टोबर अखेरपर्यंत प्रशिक्षित होणार आहेत. ४५ कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या तुकडीचे पाच दिवसीय प्रशिक्षण सध्या येथील वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेत (वनामती) येथे सुरू आहे. यात लिपिकीय तथा तांत्रिक संवर्गातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 
सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्‌घाटन मनपा स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांच्या हस्ते पार पडले. तर पहिल्या तुकडीच्या समारोपाला उपमहापौर दीपराज पार्डीकर यांच्यासह प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे, अपर आयुक्त राम जोशी, अझीझ शेख, उपायुक्त नितीन कापडणीस उपायुक्त रवींद्र देवतळे, राजेश मोहिते, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा यांची उपस्थिती होती. नागपूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी पहिल्यांदाच अशा प्रकारच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून दररोज संपर्कात येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधताना तो कसा असावा, त्यातून नागरिकांचे समाधान कसे होईल, याचे प्रशिक्षण महानगरपालिकेकडे नागरिकांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलण्यात सहाय्यभूत ठरेल, असे प्रतिपादन सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी केले. उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनीही अशा प्रशिक्षणासाठी पुढाकार घेतल्याबद्दल महापालिका प्रशासनाचे अभिनंदन केले. 
दुसऱ्या तुकडीचे प्रशिक्षण २५ ते २९ ऑक्टोबरदरम्यान सुरू आहे. या प्रशिक्षण शिबिराला गुरुवारी (ता. २७) विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे, अपर आयुक्त राम जोशी, धरमपेठ झोन सभापती प्रमोद कौरती, स्थापत्य व प्रकल्प समितीचे सभापती संजय बंगाले, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा यांनी भेट देऊन प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधला. अशा प्रकारच्या प्रशिक्षणाने आमच्यातील कार्यक्षमता नक्कीच वाढेल, सोबतच कामाकडे बघण्याचा आमचा दृष्टीकोन यामुळे बदलला असल्याचे मत प्रशिक्षणार्थ्यांनी मांडले. याप्रसंगी प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधताना विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे म्हणाले, मनपात कार्य करताना नागरिकांशी सरळ संबंध येतो. कधी-कधी संयमाचा बांधही फुटतो. मात्र अनुभवातून माणूस शिकत जातो. अनुभवाला प्रशिक्षणाची जोड मिळाली तर कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढून मनपाच्या सेवा अधिक प्रभावीपणे नागरिकांना मिळतील. प्रशिक्षणानंतर कर्मचारी अधिक ऊर्जेने काम करेल, असे प्रतिपादन त्यांनी केले. 
प्रभारी आयुक्त तथा वनामतीचे संचालक रवींद्र ठाकरे म्हणाले, शहरातील नागरिकांचे जीवन सुसह्य व्हावे, चांगल्या सेवा त्यांना देता याव्यात अशी आपली भूमिका असायला हवी. नागरिक आहेत म्हणून ही व्यवस्था आहे. ज्यांच्यासाठी ही व्यवस्था आहे त्यांना चांगल्या सोयी, सेवा अधिक प्रभावीपणे पोहचविण्यासाठी असे प्रशिक्षण सहाय्यभूत ठरतात, असे ते म्हणाले. रस्ते, पाणी, वीज ह्या सोयी म्हणजे विकासाची प्रक्रिया आहे. आता महानगरपालिका चिरंतर विकासाच्या दृष्टीने पाऊल टाकते आहे. शिक्षण, आरोग्य, महिला हे घटक असाता चिरंतर विकासाच्या दृष्टीने विचारात घेतले असल्याचे त्यांनी सांगितले. कारकून ते अधिकाऱ्यांना सर्वच दृष्टीने सक्षम करण्यासाठी ऑक्टोबर अखेरपर्यंत ४२५ कर्मचारी प्रशिक्षित होतील, अशी माहितीही त्यांनी दिली. 
स्थापत्य समितीचे सभापती संजय बंगाले यांनीही अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची आवश्यकता बोलून दाखविली. अपर आयुक्त राम जोशी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. 
प्रशिक्षणात ध्यान आणि योगाचाही समावेश 
दररोज १० ते ५.४५ कर्तव्य बजावणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना रोजच्या धकाधकीच्या जीवनात योग आणि चिंतन मनुष्याला कसे निरोगी आणि सुदृढ ठेवते, हे प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे. प्रशिक्षणादरम्यान दररोज सकाळी ६ ते ७ योगा, त्यानंतर ध्यान, राष्ट्रगीत, प्रार्थना यामाध्यमातून लाभार्थ्यांना मन:शांतीचे धडेही गिरविले जात आहे. यानंतर आदल्या दिवसाची उजळणी करून सकाळी १० वाजता प्रशिक्षणाला सुरुवात होते. रात्री ७ वाजता त्या दिवशीचे सत्र संपते. 

राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांकडून प्रशिक्षण 
सदर प्रशिक्षण वर्गात विविध विषयांतील राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात येत आहे. माहिती अधिकार क्षेत्रातले तज्ज्ञ प्रशांत चौधरी, अन्य विषयांतील तज्ज्ञ अनिरुद्ध चौधरी, पद्‌मनाथ वऱ्हाडपांडे यासारखे प्रशिक्षक प्रशिक्षण देत आहेत. प्रशिक्षणात तणावमुक्ती व्यवस्थापकन, वैयक्तिक मूल्ये व संस्थात्मक मूल्ये, माहितीचा अधिकार, प्रभावी संवाद व संवाद कौशल्य, सेवेच्या सर्वसाधारण अटी व शर्ती आणि सेवापुस्तकातील नोंदी, अभिलेख व्यवस्थापन, भावनिक बुद्धीमत्तेच्या दृष्टिकोनातून व्यक्तिमत्त्व विकास आदी विषयांसंदर्भात प्रशिक्षण देण्यात येत आहे. सत्र संचालक संदीप खोडवे, सुवर्णा पांडे, सुषमा देशमुख आदी प्रशिक्षणाची रूपरेषा सांभाळीत आहेत. प्रशिक्षणाची तिसरी तुकडी १ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून त्यात तांत्रिक कर्मचारी-अधिकारी सहभागी होतील. चौथी तुकडी ८ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून त्यात लिपिकीय आणि तांत्रिक संवर्गातील कर्मचारी सहभागी होतील, अशी माहिती सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा यांनी दिली.
चिमुकल्यानी दिला रक्तदानाचा संदेश ;तांडा वस्तीत २० युवकांनी केले रक्तदान

चिमुकल्यानी दिला रक्तदानाचा संदेश ;तांडा वस्तीत २० युवकांनी केले रक्तदान

आवाळपूर/प्रतिनिधी:
रक्तादानामुळेे अनेकांना जीवनदान मिळाले, हे सर्वाना कळत असेल तरी यासाठी मोजकेच लोक समोर येेेत असतात स्वत: रक्तदान करुन इतरांना रक्तदान करण्यास प्रवृत्त करणारे बोटावर मोजन्या इतके आहेेेत. 
त्यात धंतोली तांडा येथील चिमूल्य विद्यार्थ्यांनी भर टाकत रॅली काढून रक्तदानाचा संदेश गावभर दिला.
रक्तदान ही आज काळाची गरज बनली आहे. रोज कुणाला ना कुणाला रक्त हवे असते तरी देखील नागरिक रक्तदान करण्यास दिरंगाई किंवा टाळाटाळ करतात. त्यामुळे रक्ताची अत्यंत गरज भासत आहेत. हे गावातील युवकाचा लक्षात येताच त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले मात्र रक्तदानाचा संदेश युवका पर्यन्त कोणत्या माध्यमातून पोहोचवायचा. ही गोस्ट शिक्षकाला कळताच त्यांनी "रक्तदान हेच जीवनदान" घोषवाक्य देत विद्यार्थ्यांची रॅली काढून जनजागृती करण्यत आली. तसेच रक्तदानाचे महत्व सुद्धा त्यांनी पटवून दिले.
यावेळी संत सेवालाल मंडळा मार्फत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांचा हाकेला साथ देत गावतील तरूण मंडळी धावून आली व तांडा सारख्या वस्ती मध्ये पहिल्यांदाच 20 युवकांनी रक्तदान केले.. 
सदर कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रल्हाद पवार,ओम पवार,सरपंच विजयजी रणदिवे नारायण राठोड, सुपडा वानखेडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, मंडळातील सर्व सदस्यांनी सक्रिय सहभाग घेत रक्तदान शिबिरास परिश्रम घेतले तसेच रक्तपेढी चंद्रपूर यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी गावातील नागरिक उपस्थित होते.
महावितरणच्या प्रादेशिक संचालकांनी दोन दिवसात पिंजून काढ़ला नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हा

महावितरणच्या प्रादेशिक संचालकांनी दोन दिवसात पिंजून काढ़ला नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हा

15 ऑक्टॉबर पर्यंत लाभार्थ्यांना वीजजोडणी देण्याचे नियोजन
सौभाग्य योजनेतील उर्वरीत वीज जोडण्यांचा मार्ग मोकळा
नागपूर/प्रतिनिधी:
ऊर्जा क्रांतीचे प्रतिक ठरणाऱ्या सौभाग्य योजनेमुळे देशातील प्रत्येक घरांना वीज जोडणी देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘प्रधानमंत्री सहज बिजली, हर घर योजना – सौभाग्य’ ला यशस्वी करण्यासाठी येत्या 15 ऑक्टोंबर पर्यत गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक संभाव्य लाभार्थ्यांना वीज जोडणी देण्याचे निर्देश महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक, भालचंद्र खंडाईत यांनी दिले आहेत. ह्या योजनेच्या यशस्वीतेसाठी प्रादेशिक संचालकांनी मागिल दोन दिवसांत संपूर्ण गडचिरोली जिल्हा पिंजून काढित जिल्ह्याच्या कानाकोप-यातील दुर्गम भागांना भेटी देत वीज जोडणीच्या संभाव्य कामांची पाहणी करून संबंधित अधिका-यांना याबाबत दिशानिर्देश दिले आहेत.

प्रादेशिक संचालक यांच्या नेतृत्वात नागपूर प्रादेशिक कार्यालयातील वरिष्ठ अधिका-यांसमवेत चंद्रपूर परिमंडल आणि गडचिरिली मंडलातील काही निवडक अधिका-यांनी मंगळवार आणि बुधवारी जिल्ह्यात सर्वत्र भेटी देत तेथे सुरु असलेल्या सौभाग्य योजनेच्या कामांची पाहणी केली, तेथील गावक-यांशी आणि संबंधित अधिका-यांशी संवाधही साधला. येत्या 15 ऑक्टोबर पर्यंत जिल्ह्यातील सर्व संभाव्य लाभार्थ्यांना वीजजोडणी देण्यासाठी एका विशेष कृती पथकाची स्थापना करण्यात आली आहे. सोबतच प्रादेशिक स्तरावरही एका विशेष समितीचे गठन करण्यात आले असून ही समिती गडचिरोली जिह्यात होणा-या सौभाग्य योजनेच्या दैनंदिन कामांचा आढावा घेणार आहे.

सौभाग्य योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील ऊर्वरीत वीज जोडण्या देण्यात येत असलेल्या अडचणींवर मार्ग काढून नियोजित वेळात ही कामे पुर्ण व्हावीत याअनुषंगाने त्यांचे नियोजनही सर्व संबंधित अधिका-यांसोबत घेतलेल्या बैठकीचे वेळी करण्यात आले असूनही कामे वेळीच पुर्ण करण्यासाठीस्थानिक कंत्राटदारांचा ही कामे वाटपात समावेश करण्याच्या सुचनाही यावेळी देण्यात आल्या. देशाच्या ऊर्जा क्रांतीचे प्रतिक ठरणाऱ्या सौभाग्य योजनेमुळे प्रत्येक घरांना वीज जोडणी देण्यात येत आहे, या योजनेअंतर्गत ज्या गावात अद्याप वीज पोहचली नाही, तेथे वीज पोहचविण्याचे काम गतीने सुरु आहे. त्यासाठी विद्युत वितरण यंत्रणेचे सक्षमीकरण केले जात आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार हे स्वत: प्रयत्नरत असून राज्यातील अतिदुर्गम असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक घरात वीज पोहचावी यासाठी महावितरण युद्धस्तरावर कार्यरत आहे.
यावेळी प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांच्यासमवेत महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर, गडचिरोली मंडलाचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे, गडचिरोली मंडल आणि नागपूर प्रादेशिक कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते
कसे कराल आपल्या वीज बिलातील नावात बदल;बघा संपूर्ण विडीओ

कसे कराल आपल्या वीज बिलातील नावात बदल;बघा संपूर्ण विडीओ

राज्याच्या शहरी भागात नवीन वीजजोडणी व ग्राहकांच्या नावातील बदलाचे अर्ज दि. १ नोव्हेंबर २०१८ पासून केवळ ऑनलाईनद्वारेच स्वीकारण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.
Related image

आता MSEB च्या चकरा होणार बंद;महावितरणचा ऑनलाईन सेवांवर भर

आता MSEB च्या चकरा होणार बंद;महावितरणचा ऑनलाईन सेवांवर भर

महावितरणची नवीन वीजजोडणी;नावांतील बदल होणार ऑनलाईन मार्फत  
नागपूर/प्रतिनिधी:
राज्याच्या शहरी भागात नवीन वीजजोडणी व ग्राहकांच्या नावातील बदलाचे अर्ज दि. १ नोव्हेंबर २०१८ पासून केवळ ऑनलाईनद्वारेच स्वीकारण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. याबाबतचे आदेश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी दिले असून तसे परिपत्रकही जारी करण्यात आले आहे.
नवीन वीजजोडणी व नावातील बदल करणे यात पारदर्शकता आणण्यासाठी तसेच जोडणीच्या संपूर्ण प्रक्रियेची सद्यस्थिती ग्राहकांना कळावी यासाठी महावितरणने ही प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. महावितरणच्या शहरी भागातील कोणत्याही कार्यालयात नवीन वीजजोडणी व नावातील बदल करण्याचे अर्ज ऑफलाईन स्वीकारले जाणार नाही.
महावितरणचे मोबाईल ॲप व संकेतस्थळ www.mahadiscom.in याद्वारे ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. या सेवेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे.
------------------------------------------------------------------------------

नया बिजली कनेक्श्न, नाम में बदलाव अब ऑनलाइन

चंद्रपुर:
राज्य के शहरी क्षेत्र में नए बिजली कनेक्शन एवं ग्राहकों के नाम में बदलाव के आवेदन एक नवंबर से केवल ऑनलाइन ही स्वीकारने का निर्णय महावितरण ने लिया है. इस संदर्भ में आदेश महावितरण के अध्यक्ष व प्रबंधकीय संचालक संजीव कुमार ने दिया है. नए बिजली कनेक्शन एवं नाम में बदलाव करने में पारदर्शकता लाने के लिए साथ ही कनेक्शन की सम्पूर्ण प्रक्रिया की वर्तमान स्थिति ग्राहकों को सूचित करने के लिए महावितरण ने यह प्रक्रिया ऑनलाइन की है. महावितरण के शहरी क्षेत्र के किसी भी कार्यालय में नए कनेक्शन और नाम में बदलाव के आवेदन ऑफलाइन स्वीकारें नहीं जाएंगे. महावितरण मोबाइल एप एवं वेबसाइट द्वारा आवेदन करने की सुविधा ग्राहकों को उपलब्ध कराई गई है. इस सेवा का ग्राहकों से लाभ लेने की अपील महावितरण ने की है.

Thursday, September 27, 2018

आज भारत बंद

आज भारत बंद

करोडोच्या व्यवसायाला कात्री
traders call bharat bandh on september 28नागपूर/प्रतिनिधी:
कॉन्फडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) भारतात विदेशी गुंतवणूक आणि वॉलमार्ट-फ्लिपकार्ट कराराला केंद्र सरकारने मान्यता दिल्याच्या विरोधात भारत बंदचे आवाहन केले आहे. बंदला देशातील सर्व व्यापारी संघटनांनी समर्थन दिले आहे. कॅटच्या आवाहनार्थ २८ सप्टेंबरला नागपुरातील सर्व प्रमुख बाजारपेठा बंद राहणार असून त्यामुळे कोट्यवधींचा व्यवसाय ठप्प होणार आहे.फार्मसी संघटनेच्या आवाहनानुसार २८ सप्टेंबरला देशातील सर्व फार्मसी बंद राहणार आहेत. तसेच विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने संपाला समर्थन देताना दुपारी १२ ते ४ या वेळात पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.


गोंङकालीन इतिहासाची महती ऐकून भारावले भामरागङचे आदिवासी

गोंङकालीन इतिहासाची महती ऐकून भारावले भामरागङचे आदिवासी

रानावनातील आदिवासी बांधवांनी पहिल्यांदाच बघितला पूर्वजाचा किल्ला
जागतिक पर्यटन दिन - लोकबिरादरी प्रकल्प व इको-प्रो चा उपक्रम
चंद्रपुर/प्रतिनिधी:
 शिक्षणाचा गंध नाही, इतिहासाची कल्पना नाही, विकासाचा पत्ता नाही.... बदलत्या जगाच्या घडामोडीपासून कोसोदूर राहिलेल्या या भामरागडसारख्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातील आदिवासी बांधवांनी पहिल्यांदा चंद्रपूर शहर बघितले. इतकेच नव्हे तर गोंडकालीन त्यांच्याच पूर्वजांनी बांधलेला किल्ला आणि वास्तू बघून मन भारावून गेले होते. इतिहासाची माहिती जाणून घेताना आपल्याच पूर्वजांनी येथे राज्य केल्याचा अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
Image may contain: 2 people, people standing, sky and outdoorआज जागतीक पर्यटनदिनाचे औचित्य साधत गडचिरोली जिल्हयातील हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प अंतर्गत आदीवासी बांधवाची इको-प्रो संस्थेच्या माध्यमाने चंद्रपूर शहरातिल ऐतिहासिक गोंडकालीन किल्ला व इतर वास्तु स्थळी भेट देण्यात आली.इको-प्रो संस्थेचे गोंडकालीन ऐतिहासिक वारसा असलेला किल्लाचे स्वच्छता अभियान सुरू असुन सोबतच आदीवासीचा वारसा असलेला गोंडकालिन इतिहासाचे साक्षीदार अनेक वास्तु येथे आहेत. आज जागतीक पर्यटन दिनाचे औचित्य साधत गडचिरोली जिल्हातिल डाॅ. प्रकाश आमटे यांचे कार्यस्थळ असलेले लोकबिरादरी प्रकल्प येथिल आदीवासी बांधव तसेच आजुबाजच्या गावातील गावकरी यांची आज सहल चंद्रपूर शहरात किल्ला पर्यटनासाठी आलेली होती. यांसदर्भात इको-प्रोच्या पुरातत्व विभागच्या वतीने या सर्व आदीवासी बांधवाना चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक वारसा आणी त्यांचा इतिहासाची माहीती यावेळी देण्यात आली.
Image may contain: 6 people, including Harish Sasankar, people standing and outdoor
चंद्रपूर पर्यटनासाठी आलेल्या आदीवासी बांधवाना चंद्रपूर शहराचा वैभवशाली गोंडकालीन इतिहास आणी विवीध गोंडराजे यांची माहीती पठाणपुरा गेट, अंचलेश्वर गेट, जटपुरा गेट, विर बाबुराव पुलेश्वर शेडमाके, गोंडराजे राजमहल-कारागृह, बगड खिडकी जवळील देखना बुरूज, गोंडराजे समाधीस्थळ, पुरातन विहीर, अंचलेश्वर मंदीर व महाकाली मंदीर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देत या संपुर्ण वास्तुचा इतिहास इको-प्रो चे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी सर्व उपस्थित आदीवासी बांधवाना सांगीतला. हा संपुर्ण इतिहास ऐकुन आदीवासी बांधव हरकुन गेले. त्यांनी उपक्रमाचे मनापासुन स्वागत केले. इतके वर्षापासुन हा वारसा असुन आम्ही अजुन बघितला नव्हता यांची खंत सुध्दा व्यक्त केली.
या उपक्रमाचे आयोजन लोकबिरादरी प्रकल्पाचे अनिकेत आमटे आणी इको-प्रो चे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी केले होते. यामुळे चंद्रपूरचा ऐतिहासिक वारसा हेमलकसा सारख्या दुर्गम भागातील आदीवासी बांधवाना जवळुन बघता आला, अनुभवता आला. यावेळी लोकबिरादरी प्रकल्पाचे मनोहर अंपलवार, मुंशी दूर्वा, राहुल भसारकर, जोगा गोटा इको-प्रो संस्थेचे अनिल अडगुरवार, अमोल उटटृलवार, हरीश मेश्राम, अक्षय खनके सहभागी होते.
नागपूरचा तांदूळ जाणार चीनला

नागपूरचा तांदूळ जाणार चीनला


नवी दिल्ली/नागपूर :
चीनला रवाना होण्यासाठी 100 टन बिगर बासमती तांदूळाचा माल सज्ज असून उद्या नागपूरहून हा पहिला माल रवाना होणार आहे. चीनच्या सरकारी मालकीची अन्न प्रक्रिया कंपनीची होल्डिंग कंपनी असलेली सी.ओ.एफ.सी.ओ. ही कंपनी हा तांदूळ घेणार आहे. केंद्र सरकारच्या प्रयत्नामुळे 19 भात गिरण्या आणि प्रक्रिया कारखान्यांनी चीनला बिगर बासमती तांदूळ निर्यात करण्यासाठी नोंदणी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनमधल्या क्विंदाओला या वर्षाच्या 9 जूनला भेट दिली होती त्यावेळी उभय देशातल्या संबंधित खात्यांमध्ये यासंदर्भात करार झाला होता.
१० गुगल मॅप्स टीप्सच्या साह्याने नागपूरचा वेध घ्या नव्याने

१० गुगल मॅप्स टीप्सच्या साह्याने नागपूरचा वेध घ्या नव्याने

१० गुगल मॅप्स टीप्सच्या साह्याने नागपूरचा वेध घ्या नव्याने
दुकाने आणि रेस्तराँ चटकन शोधण्यापासून तुम्हांला हव्या त्या
ठिकाणी जाण्याचा सर्वात वेगवान मार्ग शोधण्यासाठी आणि तुमच्या शहरातल्या
अनेकविध गोष्टी सहज आणि सुरक्षितपणे शोधण्यासाठी करा या वैशिष्ट्यांचा वापर
नागपूर: गुगलने आज गुगल मॅप्स मध्ये उपलब्ध असलेली अत्याधुनिक वैशिष्ट्य सादर करून कोणताही पत्ता शोधणे अधिक सोपे केले आहे. टू व्हिलर मोड, प्लस कोड्स, मॅप्स गो, मॅप्सवर स्थानिक भाषा, स्थानिक जागा शोधणे, रिअल टाईम लोकेशन शेअरिंग, मल्टी स्टॉप डायरेक्शन, रिअल टाईम वाहतूक परिस्थिती (वाहतूक संदेशांसह) आणि स्थानिक गाईड्स अशा सगळ्या वैशिष्ट्यांमुळे नागपूर मध्ये फिरणे आता अधिक वेगवान आणि सोयीचे होणार आहे.
नागपूर मध्ये माध्यमांशी बोलताना गुगल मॅप्स इंडियाचे प्रोग्रॅम मॅनेजर अनल घोष आणि प्रॉडक्ट मॅनेजर नेहा वाईकर म्हणाले, “अ बिंदुपासून ब पर्यंत पोहोचणे म्हणजेच केवळ गुगल मॅप्स नाही. खास भारतासाठी रचना करताना आणि इथे भेडसावणाऱ्या आव्हानांचा सामना करत संधींशी जुळवून घेत गुगल मॅप्स अधिकाधिक समग्र, अचूक आणि विश्वासार्ह बनवणे हे आमचे एकमेव उद्दिष्ट आहे.त्यामुळे याचा वापर करणाऱ्यांना अधिक प्रभावी माहिती आणि दिशादर्शन करणे शक्य होईल. गुगल मॅप्स आता तुम्हांला तुमच्या प्रवासाचे नियोजन करण्यासाठी, तुम्हांला हवे असलेले ठिकाण शोधण्यासाठी, तुम्हांला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि तुमच्या प्रवासाचा अनुभव अधिक सुखकारक करण्यासाठी मदत करू शकेल.”

प्रो टीप १: भारतात प्रथमच गुगल मॅप्समध्ये टू व्हिलर मोड
भारत ही दुचाकीमधील जगातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे. लाखो मोटरसायकल आणि दुचाकी चालकांना वेगवेगळे मार्ग जाणून घेण्याची गरज असते. मॅप्स मधील दुचाकी मोडमुळे चालकांना मोटर,बस आणि ट्रक साठी नसलेले मार्ग कळू शकतील. त्या त्या ग्राहकानुसार वाहतूक आणि पोहोचण्याच्या वेळेचा अंदाज मिळू शकेल. अनेक भारतीय दिशादर्शनासाठी स्थानिक महत्वाच्या जागांवर विसंबून राहत असल्यामुळेटू व्हीलर मोड मध्येही खुबीने त्यांच्या मार्गावरील महत्वाच्या स्थानिक जागांचा समावेश करण्यात येणार आहे. 
त्यामुळे चालक सुरुवात करण्याआधी त्यांच्या प्रवासाचे नीट नियोजन करू शकतील आणि गाडी चालवताना 
त्यांना स्वतःचा फोन तपासावा लागणार नाही. केवळ ८ महिन्यात भारतात दरमहा २ कोटी हून अधिक ग्राहक
या टू व्हीलर मोड (दुचाकी मोड) चा वापर करत आहेत!

मी ते कसे मिळवू शकतो? असं समजा की तुम्हांला हनुमान नगर पासून नागपूर मधील व्हिएनआयटीमध्ये
जायचे आहे. गुगल मॅप्स मध्ये तुमच्या सुरुवातीच्या ठिकाणापासून “व्हिएनआयटी मुख्य प्रशासकीय इमारत”
असे टाईप करा. मग “गेट डायरेक्शन्स” हे बटण दाबा आणि मग “टू व्हीलर” आयकॉन सिलेक्ट करा. मग
तुम्हांला सर्वात कमी वेळेत तुम्हांला जायचे असलेल्या ठिकाणाचा मार्ग दिसू लागेल.

प्रो टीप २: रिअल टाईम ट्रॅफिक प्रमाणे खरोखरच वाहतूक सुरु आहे का हे बघणे
वाहतूक कोंडीत अडकणे हा खूप वाईट प्रकार असतो. त्यातही असं किती वेळ अडकून पडावं लागेल हे माहीत
नसणं तर आणखी त्रासदायक असतं. रिअल टाईम ट्रॅफिक वैशिष्ट्यामुळे गुगल मॅप्समधून तुम्ही सध्या असलेली
वाहतुकीची परिस्थिती बघू शकता आणि कोणकोणते वेगवेगळे मार्ग तुम्ही अवलंबू शकता याची तुलना करू 
शकता. या वैशिष्ट्यामध्ये भारतातील सगळे राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्ग समाविष्ट आहेत आणि ३४ 
शहरांमध्ये हे उपलब्ध आहे.
गुगल मॅप्सवर गुगल वाहतुकीचे संदेशही पुरविते. सर्वात कमी वेळात तुम्हाला हव्या असलेल्या ठिकाणी 
पोहोचण्याचा सर्वोत्तम मार्ग शोधायला गुगल मॅप्स तुम्हांला मदत करू शकेल आणि जोडीला गुगल मॅप्सवरील
वाहतूक संदेशांमुळे तुम्हांला कोठे कोठे वाहतूक कोंडी व्हायची शक्यता आहे याची आगाऊ सूचनाही मिळू शकेल.आता जेव्हा तुम्ही स्वतःच्या इच्छित स्थळाची माहिती द्याल गुगल तुम्हाला आगामी वाहतूक कोंडीची माहिती देईल. त्यातून सर्वात जलद मार्ग शोधायला मदत होईल. तुम्ही रस्त्यावरून जात असताना अचानकपणे वाहतूक कोंडीचीपरिस्थिती उद्भवली तर गुगल मॅप्स तुम्हांला मार्गदर्शन करेल आणि त्यामुळे किती उशीर होऊ शकेल हेही सांगेल. दुसऱ्या एखाद्या मार्गाचा वापर करण्याचा पर्यायही तुम्हांला मिळेल. मग तो पर्याय सर्वाधिक जलद आहे का केवळ वाहतूक कोंडी टाळण्याचा पर्याय आहे याचे स्पष्टीकरणही देण्यात येईल.

मी ते कसे मिळवू शकतो?
तुमच्या सेटिंग्ज मेनू मध्ये जा आणि ट्रॅफिक लेयर सुरू करा. एकदा
  • का हे सुरू केले की तुम्हांला वेगवेगळ्या रंगातील मार्ग दिसतील. त्यातून या रस्त्यांवरील वाहतुकीचा 
वेगवेगळा दिसणारा वेग सूचित होत असेल. हिरवा रंग म्हणजे रस्त्यावर सुरळीत वाहतूक सुरू आहे,
केशरी रंग म्हणजे मध्यम प्रमाणात वाहतूक सुरू आहे तर लाल रंग म्हणजे प्रचंड वाहतूक कोंडी
असल्याचे सुचविले जाते.
गुगल मॅप्स होम स्क्रीन वरून तुम्ही जवळपासची वाहतूक थेटही बघू शकता. तुमच्या फोनवर गुगल
मॅप्स सुरू करा. स्क्रीनच्या तळाशी असलेला ‘ड्रायव्हिंग’ आयकॉन सिलेक्ट करा आणि ‘ट्रॅफिक
नियरबाय’ असं चेक करा.

प्रो टीप ३: कमी आधुनिक अँड्रॉईड फोन्सवर देखील सुरळीत अनुभूती
मिळवण्यासाठी ‘मॅप्स गो’चा वापर करा!
गुगल मॅप्स गो हे मूळ गुगल मॅप्स अॅपचे हलके प्रगतीशील व्हर्जन आहे. मॅप्स गोसाठी गुगल क्रोमची आवश्यकता असते आणि त्यामुळे तुमच्या फोनच्या स्टोअरेजमधील अतिरिक्त जागा अजिबात व्यापली जात नाही. मर्यादित मेमरी (१जीबी रॅमपेक्षा कमी) असलेल्या, प्रोसेसरचा वेग मर्यादित (१ ते १.५ जीएचझेड) असलेल्या अँड्रॉईड उपकरणांवर आणि बेभरवशाच्या नेटवर्क्सवर देखील अतिशय सुलभतेने चालावे यादृष्टीने याची रचना करण्यात आलेली आहे. यामध्ये वेगाबाबत कुठलीही तडजोड केली जात नाही आणि तुम्हांला तुमचे लोकेशन, अद्ययावत अचूक वाहतुकीची परिस्थिती, दिशा आणि सार्वजनिक वाहतुकीची माहिती पुरविली जाते. मॅप्स गोची होमस्क्रीन ही खास भारतीय वापरकर्त्यांच्या गरजा ध्यानात घेऊन त्यानुसार तयार करण्यात आली आहे. यावर विविध पर्यायांचे शॉर्टकट्स देण्यात आले आहेत, ज्यामध्ये सार्वजनिक वाहतुकीच्या विविध प्रकारांचाही समावेश करण्यात आला आहे. आणि अलीकडेच, आम्ही मॅप्स गोवर प्रत्येक वळणावरील व्हॉईस नेव्हिगेशन सुविधा देखील सादर केली असून त्यामुळे आता मॅप्स गोमधून देखील गुगल मॅप्स इतकाच सुरळीत अनुभव मिळू शकणार आहे. त्याजोडीला वापरकर्त्यांना लक्षावधी ठिकाणे, दूरध्वनी क्रमांक, पत्ते, छायाचित्रे, श्रेणी, मानांकन, परीक्षणे इत्यादीची माहिती शोधणे आणि मिळवणे शक्य होणार आहे.
मी हे कसे मिळवू शकतो? 
गुगल प्ले स्टोअरमधून मॅप्स गो डाऊनलोड करून घ्या किंवा तुमच्या क्रोम ब्राउझर अॅपवरती maps.google.co.in येथे जा. एकदा मॅप्स लोड झाले की तिथे होमस्क्रीनला शॉर्टकट जोडण्याचा पर्याय उपलब्ध होईल. जर तुमच्याकडे अँड्रॉईड गो स्मार्टफोन असेल तर त्यामध्ये मॅप्स गो आधीपासूनच इंस्टॉल असेल

प्रो टीप ४: प्लस कोडचा वापर करून ठिकाणे शोधा आणि शेअर करा

भारतासारख्या देशात, पत्ते हे विस्कळीत स्वरुपात असतात आणि पत्ते सापडणं ही एक अशी गोष्ट आहे जी लोक गृहीत धरतात. पण तुम्ही कुठे राहता, किंवा काम करता किंवा प्रवासाला जात आहात या साध्या सोप्या माहितीच्याव्यतिरिक्त अनेक लोकांना महत्वाच्या सेवा जसे की टपाल, डिलिव्हरीज किंवा अगदी अत्यावश्यक, आणीबाणीच्या गोष्टी देखील कशा पोचवायच्या हे ठाऊक नसते. या आव्हानाला उत्तर देण्याचा प्रयत्न म्हणून अलीकडेच आम्ही ‘प्लस कोड्स’ सादर केले आहेत. हे कोड्स ज्यांच्याकडे प्रत्यक्ष स्थायी पत्ता नाही असे लोकअथवा ठिकाण यासाठी डिजिटल पत्ता म्हणून काम करतात. अगदी साध्या आणि नियमीत पत्ता व्यवस्थेवर आधारित असलेली ही यंत्रणा भारतात आणि जगभरात उपयुक्त ठरते आहे. या कोड्समध्ये केवळ ६ अक्षरे आणि शहर एवढीच माहिती असते, जी कधीही तयार करता येते, शेअर करता येते आणि कोणीही ती शोधू शकते.त्यासाठी तुमच्याकडे फक्त स्मार्टफोनवर गुगल मॅप्स असले की काम झाले. प्लस कोड्सचे खुले मुक्त (ओपन सोर्स) प्रकारचे स्वरूप असल्याने ही लोकेशन सेवा अगदी सहजपणे कोणीही आपल्या उपकरण व्यासपीठावर विनामूल्य समविष्ट करून घेऊन शकतात.
मी हे कसे मिळवू शकतो? 

तुमच्या अँड्रॉईड फोन किंवा टॅबलेट्सवर गुगल मॅप्स अॅप उघडा.गुगल मॅप्सवर पिन निर्माण करण्यासाठी त्या ठिकाणावर बोट दाबून धरा. तळाशी, पत्ता किंवा वर्णन टाईप करा. प्लस कोड शोधण्यासाठी खाली स्क्रोल करा. जसे की ४३ एमएफ + एफ६ नागपूर

प्रो टीप ५: तुमचे घर आणि कामाचे ठिकाण अतिशय सुलभतेने सेट
करा आणि सुरळीतपणे दळणवळण करा
आपले घर आणि कामाचे ठिकाण या दरम्यानचा प्रवास असा असतो, जो आपण सगळेजण दैनंदिन करत असतो. जर दररोज तुम्हाला घराचे किंवा कामाचे ठिकाण टाईप करावे लागत असेल, तर ते मोठे वैतागवाणे ठरते. 
त्यामुळे कमीतकमी टायपिंग करायला लागावे आणि आपली दिशा अधिक जलद सापडावी यासाठी आम्ही 
अधिक सहकार्य पुरवले असून तुम्ही आता आपल्या घराचे आणि कामाच्या ठिकाणाचे लोकेशन गुगल मॅप्सवर
सेट करून ठेवू शकणार आहात. तुम्ही हे करता क्षणीच आम्ही आपोआप त्या दोन्ही ठिकाणांच्या भोवतीचा
ऑफलाईन नकाशा डाऊनलोड करून घेऊ जेणेकरून समजा कधी अचानक नेटवर्क खंडित झाले तरीही मॅप्स विना अडथळा काम करतील.आम्ही मॅप्सच्या होमस्क्रीनवरती नुकताच नवीन “ड्रायव्हिंग” टॅब जोडला असून त्यामुळे हा अनुभव अधिक सुकर होणार आहे. आता जेव्हा कधी तुम्ही घरून कामावर जाण्यासाठी किंवा कामावरून घरी परतण्यासाठी वाहन चालवत असाल तुम्हांला काहीही टाईप करायची गरज नाही. फक्त “ड्रायव्हिंग” या टॅबवर क्लिक करा आणि त्यावेळेचा सर्वोत्तम मार्ग आपोआप तुम्हाला दिसू लागेल.


  • मी हे कसे मिळवू शकतो?


तुमच्या अँड्रॉईड फोन किंवा टॅबलेटसवर गुगल मॅप्स अॅप उघडा. ‘मेनू’वर क्लिक करा आणि ‘युवर प्लेसेस’वर जा. त्यातून ‘घर’ किंवा ‘काम’ अशी निवड करा आणि पत्ता नोंदवा. किंवा गुगलमॅप्सच्या सर्च बारमध्ये जा आणि तुम्हांला आपोआप ‘होम’ किंवा ‘वर्क’ लोकेशन सेट करण्यासाठी सहाय्य मिळेल.
गुगल मॅप्स वापरून सर्वोत्तम दळणवळण अनुभव मिळवण्यासाठी ‘होम’ किंवा ‘वर्क’ लोकेशन सेट केल्यानंतर तळाशी असणाऱ्या ‘ड्रायव्हिंग’ टॅबचा उपयोग करा.


प्रो टीप ६: नेव्हिगेट करा आणि स्थानिक भाषांचा धांडोळा घ्या
गुगल मॅप्समधील स्थानिक भाषांच्या माहितीने दररोज लक्षावधी लोकांना उत्तम ठिकाणे शोधण्यासाठी आणि
शेअर करण्यासाठी सहाय्य पुरवलेले आहे. गुगल मॅप्स नकाशावरील सर्व ठिकाणे दोन भाषांत दाखवते.हे दुहेरी लेबल हिंदी, कन्नड, पंजाबी, मल्याळम, गुजराती, मराठी तमिळ, तेलुगु, बंगाली आणि नेपाळी अशा दहा स्थानिक भाषांत उपलब्ध असून तुमच्या स्थानानुसार गुगल मॅप्स आपोआप ठिकाणाचे नाव स्थानिक 
भाषेत दुहेरी लेबलमध्ये दाखविते. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात तुम्ही इंग्रजी आणि मराठीमध्ये नावे पाहू शकता.
व्हॉईस नेव्हिगेनच्या साह्याने तुम्ही ट्रॅफिक अलर्ट्स पाहू शकता. कुठे वळायचे, कोणत्या मार्गावर जायचे, एखादा अधिक चांगला मार्ग आहे का अशी माहिती तुम्हाला मिळू शकते. गुगलने सात भारतीय भाषांमध्ये व्हॉईस नेव्हिगेन आणले आहे : हिंदी, बंगाली, गुजराती, कन्नड, तेलुगु, तमिळ आणि मल्याळम.

 
मी हे कसे मिळवू शकतो? 
तुमच्या अँड्रॉईड फोन किंवा टॅबलेट्सवर गुगल मॅप्स अॅप उघडा. ‘मेनू’वर क्लिक करा आणि ‘सेटिंग्ज’मध्ये जा. सेटिंग्जमध्ये ‘नेव्हिगेशन सेटिंग्ज’मध्ये जा आणि ‘व्हॉईस सिलेक्शन’ची आणि तेथून हव्या त्या भाषेची निवड करा.

                     प्रो टीप ७: कलेक्शन आणि फोटो यांच्याद्वारे स्थानिक ठिकाणांचा धांडोळा घ्या

तुम्ही आता तुमच्या गुगल मॅप्सच्या सहयोगाने तुमच्या अवतीभोवतीच्या ठिकाणांचा धांडोळा घेऊ शकता आणिआपले अनुभव इतरांसोबत शेअर करू शकता. याला अधिक सुलभ बनविण्यासाठी गुगल मॅप्स आपोआप सुसंगत श्रेणींची निवड करेल ज्या तुम्ही तिथल्या तिथे क्लिक करून अगदी सहज बघू शकाल. रेस्टॉरंटस, हॉटेल्स, फार्मसीज, ग्रोसरी दुकाने आणि अन्य कित्येक ठिकाणे धुंडाळा आणि ती कधी सुरू असतात, त्यांचे मानांकन काय आहे, फोटोज इत्यादी पाहा. दिवसाच्या कोणत्या वेळात तिथे सर्वाधिक गर्दी असते याचीही माहिती तुम्हांला मिळू शकेल आणि त्यांच्या नकाशा नोंदणीतूनच तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकाल किंवा त्यांच्या व्यावसायिक संकेतस्थळाला भेट देऊ शकाल.
मी हे कसे मिळवू शकतो?

 तुमच्या अँड्रॉईड फोन किंवा टॅबलेटसवर गुगल मॅप्स अॅप उघडा. होम स्क्रीनवर ‘एक्सप्लोर’वर क्लिक करा आणि रेस्टॉरंटस, कॅफेज, पेट्रोल पंप, एटीएम केंद्रे,फार्मसीज आणि ग्रोसरी दुकाने यांच्यासह विविध पर्याय निवडा.

प्रो टीप ८: तुमचे स्थानिक खास वैशिष्ट्य शेअर करा
स्थानिक व्यक्तीइतके ते ठिकाण अन्य कोणालाच चांगले माहिती नसते. जर तुम्ही तुमच्या भागातील तज्ञजाणकार असाल, तर तुम्ही गुगल मॅप्सवर परीक्षण, माहिती, छायाचित्रे इत्यादी योगदान देऊन किंवा गुगल मॅप्सवर नवीन ठिकाणांची भर घालून स्थानिक गाईड म्हणून भूमिका बजावू शकता. स्थानिक गाईड्स हामु शाफिर लोकांचा एक जागतिक समुदाय आहे, जे गुगल मॅप्सवरती परीक्षण लिहितात, छायाचित्रे शेअर करतात, प्रश्नांना उत्तरे देतात, ठिकाणांची भर घालतात किंवा माहितीची दुरुस्ती करतात, तथ्ये तपासून बघतात. कुठे जायचे आणि काय करायचे याचा निर्णय घेण्यासाठी तुमच्या सारखे लक्षावधी लोक या माहितीच्या योगदानावर विसंबून राहतात. तुम्ही दिलेले माहितीचे योगदान अन्य लोकांना गुगल मॅप्सची अधिक चांगली अनुभूती मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरतील. आता तुम्ही स्थानिक रस्त्यामधील वाहतूक कोंडी, बंद असलेले मार्ग, नवीन अनोळखी मार्ग यांची माहिती तसेच व्हिडीओज आणि ३६० अंशातील छायाचित्रे आदी अपलोड करून गुगल मॅप्सला अधिक उपयुक्त,अधिक व्यवहार्य, संयुक्तिक आणि समावेशक बनवू शकता. जागतिक स्तरावरील स्थानिक गाईड समुदायात भारताचा तिसरा क्रमांक आहे.एक स्थानिक गाईड या भूमिकेतून तुम्ही गुगल मॅप्सवर परीक्षण, माहिती, छायाचित्रे इत्यादी योगदान देऊ शकता.यामुळे तुम्ही या कार्यक्रमाच्या वरच्या पातळीवर पोहोचू शकता, जिथे तुम्हांला गुगल फीचर्स इतरांपेक्षा जलदमिळणे आणि भागीदारांकडून खास सुविधा मिळणे आदी लाभ होऊ शकतात. चौथ्या पातळीवर तुम्हांला स्थानिक गाईड असा बिल्ला प्राप्त होतो, ज्यामुळे तुम्ही दिलेले योगदान अधिक चटकन इतरांकडून पहिले जाण्यास सहाय्य होते.


    मी नोंदणी कशी करू शकतो?
     तुम्ही थेट गुगल मॅप्स अॅपमध्ये जाऊन नोंदणी (साईन अप) करू शकता आणि गुगल मॅप्सवर शहरातील तज्ञ जाणकार बनू शकता. 
                                                                   हे कसे मिळवू शकतो?
  • तुमच्या अँड्रॉईड फोन किंवा टॅबलेटसवर गुगल मॅप्स अॅप उघडा. 
  • ‘मेनू’वर क्लिक करा आणि ‘युवर कॉन्ट्रीब्युशन्स’मध्ये जा. तुमच्या नावावर क्लिक करा 
  • आणि तुमच्या प्रोफाईलमध्ये तुमचे जमा पॉईंटस दिसू लागतील. तुम्ही योगदान दिल्यानंतर 
  • तुमच्या प्रोफाईलमध्ये तुमचे जमा पॉईंटस दिसण्यासाठी साधारण २४ तासांचा कालावधी लागू शकतो.

प्रो टीप ९: तुमचे नेमके ठिकाण इतर लोकांना अगदी अचूक कळू द्या
रिअल टाईम लोकेशन शेअरिंग या सुविधेमुळे तुम्ही स्वतःचे नेमके स्थान/ठिकाण अगदी अचूकपणे तुम्हाला हव्या त्या व्यक्तीपर्यंत पोचवू शकणार आहात. आणि ज्यांना तुम्ही हे कळवाल ते लोक अँड्रॉईड उपकरण किंवा आयफोन काहीही वापरत असले तरीही ते तुमचे नेमके स्थान कुठे आहे ते पाहू शकतील.
पुढच्या वेळी तुम्ही प्रवासात असाल आणि उशीर होत असेल, तर तुमचे अचूक वेळेचे ठिकाण तसेच नेव्हीगेशनच्या माध्यमातून प्रवास कुठून कसा सुरू आहे तो तपशील इतरांसोबत शेअर करा. तुमच्या पुढच्या ट्रीपमध्ये नेव्हीगेशन स्क्रीनवर तळात असलेले “मोअर” हे बटन दाबा आणि त्यानंतर “शेअर ट्रीप”वर क्लिक करा. जेव्हा तुम्ही आपला प्रवास इतरांसोबत शेअर कराल, त्यांना तुमची पोचण्याची अंदाजे वेळ कळू शकेल आणि तुम्ही आपल्या नियोजित ठिकाणी पोचत असताना ते तुमच्या प्रवासावर लक्ष ठेवू शकतील. गुगल मॅप्समधील रिअल टाईम लोकेशन शेअरिंगद्वारे तुमच्या ठिकाणावर कोण लक्ष ठेवू शकते, आणि किती वेळासाठी ठेवू शकते याचे संपूर्ण नियंत्रण सर्वस्वी तुमच्या हातात असणार आहे. जेव्हा तुम्ही आपल्या नियोजित ठिकाणी पोहोचाल, शेअरिंग सुविधा आपोआप बंद होईल.
  • मी हे कसे करू शकतो?
  • “शेअर लोकेशन”वर क्लिक करा. आणि मग कोणाला लोकेशन शेअर करायचे ते निवडा आणि किती 
    वेळ शेअर करत राहायचे तो कालावधी निवडा – आणि काम फत्ते झालं! तुमचे गुगल कॉन्टॅकट्स 
    वापरून तुम्ही अचूक रिअल टाईम लोकेशन शेअर करू शकता किंवा, तुमच्या आवडत्या मेसेंजर 
    अॅपवर आपले मित्र किंवा कुटुंबीय यांना लिंक पाठवू शकता. जेव्हा तुम्ही स्वतःचे लोकेशन शेअर करता, 
    तुम्ही निवडलेले लोक त्यांच्या मॅपवर तुम्हाला पाहू शकतात.

प्रो टीप १०: एकाचवेळी अधिकाधिक दिशांचे थांबे निवडून तुमचा प्रवास आखा आणि नियोजित
नसलेल्या गरजांसाठी मार्गावरून जाता जाता हवी ती ठिकाणे शोधा
तुम्ही आपल्या मित्रांना विविध ठिकाणांहून पिकअप करण्याची योजना आखत असला किंवा एकटेच भ्रमंतीला 
निघून शहराच्या विविध कानाकोपऱ्यातील ठिकाणे धुंडाळण्याच्या विचारात असाल, तर गुगल मॅप्स निश्चितपणे
तुम्हाला मार्गदर्शन करेल, आपल्या मल्टी स्टॉप डायरेक्शन या फिचरच्या सहाय्याने! त्यामुळे तुम्हाला तोच एव्हाना अंगवळणी पडलेला पूर्वीसारखा विनासायास, विनाअडथळा भ्रमंती करण्याचा अनुभव मिळेल, आणि तुम्ही एकाच प्रवासात १० विभिन्न ठिकाणांची भर घालू शकाल! 
प्रवास सुरु असताना इंधन भरण्यासाठी, कॉफीपानासाठी, पोटोबा करण्यासाठी किंवा अन्य कशाहीसाठी तुम्ही 
थांबलात तरीही मूळ मार्गाचा धागा कायम राहील. उदाहरणार्थ, जर तुम्ही गाडी चालवत आहात, आणि अचानक
लक्षात आलं की इंधन अगदीच कमी होत चाललं आहे, तर गाडी वळवून वाटेत दिसलेल्या पेट्रोल पंपाकडे पुन्हा 
मागे फिरायचं की पुढच्या येऊ घातलेल्या पंपापर्यंत जायचं, याचा नेमका निर्णय कधी कधी तुम्हाला घेता येत नाही. 
“सर्च अलोंग युवर रूट” या सुविधेमुळे केवळ काही क्लिक्स करून तुम्हाला हा निर्णय आता सुकरपणे घेता येणार
आहे.


मला एकाचवेळी अधिक डायरेक्शन्स कशी मिळू शकतील? 
अॅप उघडा, जिथे जायचे ते ठिकाण टाका,
कडेच्या मेनूवर क्लिक करा आणि मग त्यामध्ये “अॅड स्टॉप”वर क्लिक करा. तुमच्या ठिकाणांची फेरआखणी
करण्यासाठी “अॅड स्टॉप”च्या डाव्या बाजूला असलेली तीन ठिपक्यांची खूण दाबून धरा आणि इच्छित
ठिकाणी ती ओढून आणा – तुम्ही ठिकाणांचे प्रकार जसे की पेट्रोल पंप, एटीएम किंवा रेस्टॉरंट आदी जे 
तुम्ही वरचेवर शोधता ते देखील शोधू शकता. तुम्हाला हवे तेवढे थांबे यामध्ये समाविष्ट करू शकता 
(पण जास्तीत जास्त १० हे लक्षात असू द्या!) आणि एकदा काम झालं की “फिनिश्ड”वर क्लिक करा 
जेणेकरून तुमचे एकावेळी अधिक थांबे शोधण्याचे कार्य पूर्णत्वास जाईल. 

मी मार्गाने जात असताना शोध कसा घेऊ शकतो? 
जेव्हा नेव्हीगेशन मोडमध्ये असाल, तळातील बार ओढा आणि “सर्च अलोंग रूट” निवडा. यामुळे तुम्हाला पेट्रोल पंप, रेस्टॉरंट, ग्रोसरी स्टोअर, कॉफी शॉप्स अशी सर्वात लोकप्रिय, प्रसिद्ध ठिकाणांची यादी आपोआप दिसू लागेल. एकदा तुम्ही निवड केलीत, की त्या ठिकाणापाशी गेल्याने तुमच्या अंतिम नियोजित ठिकाणापाशी जाण्याचा मार्ग ध्यानात घेऊन एकंदर प्रवासातील किती वेळ वाढेल हे गुगल मॅप्स तुम्हाला सांगेल.