
Saturday, October 27, 2018

Sunday, December 10, 2017
लाटणे मोर्चा घेऊन मुन्ना यादवला पकडून देऊ
![]() |
#हल्लाबोल पदयात्रेच्या नवव्या दिवशी बुटीबोरीकडे मार्गक्रमण करताना आसोलाजवळ #धनगर समाजाच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. खासदार @supriya_sule यांना शाल-श्रीफळ भेट देत धनगर समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करा, अशी मागणी त्यांनी केली. |
बुटिबोरी सभा- राष्ट्रवादी हल्लाबोल
बुटिबोर/ प्रतिनिधी -
मुन्ना यादवला अटक होत नाही याला जबाबदार
मा. शरद पवार मुख्यमंत्री होते तेव्हा मी दरवर्षी हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपूरला येत असे. मी लहान होते तरीही नागपूरमध्ये फिरताना कधीच भीती वाटली नव्हती. पण आता नागपूरमध्ये महिलांना सुरक्षित वातावरण वाटत नाही, असेही त्या म्हणाल्या

राज्य सरकार जाहिरातींवर वारेमाप खर्च करत असल्याची बाब समोर आली. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील स्मारकाची जाहिरात जोरात केली. मात्र दोन्ही स्मारकांचे काम सुरू झालेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका गोष्टीसाठी दाद द्यावी लागेल. ते सफाईनं खोटं बोलतात. 'मी लाभार्थी'च्या कॅम्पेनमध्ये सर्व खोट्या जाहिराती केल्या गेल्या होत्या. त्यामुळेच ते कॅम्पेन बंद करावे लागले. विदर्भात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. इथल्या महिलांची पांढरी कपाळं पाहून पोटाला पिळ बसतो. मला प्रश्न पडलाय इतकं सगळं विदर्भात होत असताना मुख्यमंत्र्यांना झोप तरी कशी लागते, असा हल्ला त्यांनी चढविला.
हल्लाबोल पदयात्रेच्या निमित्ताने गेले नऊ दिवस आम्ही विदर्भाचे हाल पाहत आहोत. दुष्काळ, अवकाळी पाऊस यामुळे झालेले नुकसान नैसर्गिक असते. मात्र विदर्भात सरकारच्या नाकर्त्या वृत्तीमुळे अनेक संकटे उभी राहिली आहेत.
-@supriya_sule#हल्लाबोल बुटिबोरी सभा
फसव्या योजना आणि@narendramodi यांचा फोटो जनतेला दाखवण्यासाठी@BJP4India ने साडेतीन हजार कोटी खर्च केले आहेत.@CMOMaharashtra@Dev_Fadnavis यांनीही ३५० कोटी जाहिरातींवर खर्च केले.
-@Jayant_R_Patil#हल्लाबोल बुटिबोरी सभा
नोटाबंदीनंतर जीएसटीचा झटका सरकारने दिला. सुरुवातीला जीएसटी कसा भरायचा हे व्यापाऱ्यांना न कळल्यामुळे व्यवहार करणेच त्यांनी बंद केले होते. -
बोंड अळीचे संकट नैसर्गिक असले तरी हा प्रश्न सोडवता आला असता. योग्य वेळीच बियाणे तपासून बदलले गेले असते तर आज विदर्भातील जनतेला अश्रू ढाळण्याची परिस्थिती आली नसती.
कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न आहे. ज्यांच्यावर रक्षण करण्याची जबाबदारी आहे ते पोलिसच माणसांना जाळून मारत असतील तर सामान्य जनतेने कुणाकडे न्याय मागायचा? त्यामुळे जनतेने आता १२ डिसेंबर रोजी नागपूर येथे
विदर्भातील लोकांचा भ्रमनिरास झालाय. शेतकरी देशोधडीला लागलाय. बेरोजगारी वाढली. जुन्याजाणत्या लोकांना माझं सांगणं आहे की विदर्भातील जनता एकटी नाही. सर्व महाराष्ट्र विदर्भातील जनतेच्या पाठीशी उभी आहे. त्यासाठीच हा
Tuesday, December 05, 2017

भाजपने जनतेचा विश्वासघात केला
विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे*
वर्धा/प्रतिनिधी - विश्वासाने जनतेने भाजपला निवडून दिले परंतु या सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहेच शिवाय शेतकरी राजाही उध्वस्त करण्याचे काम या सरकारने केल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सेलसुरा जिल्हा वर्धा येथील सभेत केला.
विदर्भामध्ये पदयात्रेमधून जात असताना जनता या सरकावर रोष व्यक्त करत आहेत. कापूस उत्पादक शेतकरी बोंडअळीने त्रस्त झाला आहे. मोदी सरकारने जाहीर केलेल्या मुद्रा योजनेचा लाभही इथल्या जनतेला मिळालेला नाही. सगळयाच बाबतीत सरकार अपयशी ठरत असून सर्वसामान्य जनता असंतोष व्यक्त करताना दिसत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनतेवर होणारा अन्याय सहन करणार नाही.सरकारला जाब विचारण्यासाठीच आम्ही हा एल्गार पुकारला असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.
या सभेला प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे,विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे,माजी मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार विदया चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, सुरेखा ठाकरे आदींसह स्थानिक ग्रामस्थ,शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
यात्रेचा आजचा पाचवा दिवस आहे. आज एकूण 14 किलोमीटर प्रवास करून संध्याकाळी यात्रा वर्धा येथे जाणार आहे.
#हल्लाबोल मोर्चाच्या आजच्या पाचव्या दिवसाची सुरुवात देवली येथून झाली. एका जिनिंग मध्ये जाऊन शेतक-यांशी संवाद साधला. सरकारची कापूस खरेदी केंद्र आणखी सुरू झाली नसल्याने बेभावाने व्यापा-यांना कापूस विकावा लागत असल्याच्या तक्रारी शेतक-यांनी केल्या.
Thursday, November 30, 2017
शुक्रवारपासून हल्लाबोल पदयात्रा
यवतमाळ - नाकर्त्या सरकारविरुद्ध जनतेचा रोष व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 1 डिसेंबर पासून सुरु होत असलेल्या यवतमाळ ते नागपूर हल्लाबोल पदयात्रेची माहिती देण्यासाठी आज यवतमाळ येथे आदरणीय खा. सौ. सुप्रियाताई सुळे यांच्यासह पत्रकारांशी संवाद साधला. ही यात्रा विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर या 3 जिल्ह्यातून जाऊन 12 डिसेंबर रोजी नागपूरच्या विधानभवनावावर धडकणार आहे.
राज्याचे कृषी खाते झोपले आहे. बोंडअळीच्या संकटासंदर्भात सरकारला कळवूनही दखल घेतली नाही. या संकटास राज्य सरकार, मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री हेच जबाबदार आहेत.
बोंडअळीच्या संकटामुळे मराठवाडा आणि विदर्भात कापूस उत्पादक शेतक-यांचे 25 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या भरपाई पोटी शेतक-यांना हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी आमची मागणी आहे.
Thursday, November 16, 2017
सत्ताधाऱ्यांना काँग्रेसची भीती वाटत आहे: शरद पवार
चंद्रपूर/प्रतिनिधी:
दारूबंदी उठवा; लिकर असोशिएशनचे शरद पवारांना निवेदन
जिल्ह्यातील दारूबंदीमुळे अनेक लोकांचे परिवार रस्त्यावर आले. अनेक लोकांच्या हातून काम गेले त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला,राज्यशासनाच्या कोट्यवधींचा महसूल बुडाला, त्यामुळे हि फसवी दारूबंदी उठविण्यासाठी चंद्रपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लिकर असोशिएशनच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले.शरद पवार हे दोन दिवसीय चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे.त्यावेळी शासकीय विश्रामगृहात हे निवेदन देण्यात आले.
करोडोचे कर्ज परवाना धारक बार मालकावर आहे,दारूबंदी झाल्यानंतर प्रत्येक महिन्यात पोलीस करोडो रुपयाची दारू जप्त करत आहे.यावर दारूबंदी पूर्णतः फसली आहे,अशी हि फसवी दारूबंदी उठविण्यासाठी व शासनाचा कोट्यावधीचा महसूल भरून काढण्यासाठी चंद्रपूर जिल्यातील दारूबंदी उठविण्यासाठी हे निवेदन देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक दीपक जयस्वाल,यांच्यासह लिकर असोशिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
सरकारने जनतेचे प्रश्न सोडवावे;शरद पवार यांचे चंद्रपुरात वक्तव्य
Wednesday, November 15, 2017
शरद पवार धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला
अपघातग्रस्त कारचा दरवाजा उघडला जात नसल्यामुळे जखमींना बाहेर काढायला त्रास होत होता. यावेळी स्वतः पवारांनी जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. जखमींना जवळील हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अपघातग्रस्तांना मदत केल्यानंतर पवार आपल्या दौऱ्यावर रवाना झाले
Sunday, November 12, 2017

राष्ट्रवादी आेबीसी सेलचे जनजागृती अभियान
नागपूर/प्रतिनिधी- प्रदेशाध्यक्ष आमदर सुनील तटकरे, विधिमंडळाचे गटनेते अजीत दादा पवार यांच्या सुचनेनुसार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी संघटनात्मक समन्वयासाठी व ओबीसी जनजागृती अभियान रथयात्राी तयारी, नियोजनासाठी खालील मान्यवरांची निरीक्षक म्हणून नियुक्ति केली कृपया नोंद घ्यावी • गडचिरोली - श्री वामनराव झाडे - ९४२२१३६६९९ • चंद्रपुर - श्री सतीश ईटकेलवार - ९९२३०११९९९ • यवतमाळ - श्री हिराचंद बोरकुटे - ९४०५१५४४४३ • वर्धा - श्री उत्तम गुल्हाणे - ९८५०९१३५३३ • गोंदिया - श्री नरेश अरसडे - ९४२२११७२४१ • भंडारा - श्री अविनाश गोतमारे - ९८११३१५७१ • ऩागपुर - श्री ईश्वर बाळबुधे - ९८२२२२५५८१ • अमरावती - श्री गोविन्द भेराणे - ९४२१८३६१२५ • अकोला - श्री मंगेश भटकर - ७७६९८०४६७८ • वाशीम - श्री राजु गुल्हाणे • अहमदनगर - अॅड सचिन औटे - ९९२१९१२७४२ • धुळे - श्री उमेश सोनवने ९८९०९३४९६२
Tuesday, November 07, 2017
राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्यावतीने राज्यभर जनजागृती रथयात्रा काढणार - ईश्वर बाळबुधे
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसापासून सुरु होणार जनजागृती रथयात्रा...
नागपूर/प्रतिनिधी
ओबीसी समाजाला भाजप सरकारनं फक्त आश्वासनांची गाजरंच दाखवली आहेत. भाजप सरकारला त्यांची जागा दाखवण्यासाठी आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्यावतीने राज्यभर जनजागृती रथयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष Ishwar Balbudhe यांनी दिली. आज राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या प्रमुख पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये पार पडली.
ही जनजागृती रथयात्रा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसापासून सुरु करण्यात येणार आहे. या जनजागृती रथयात्रेमध्ये ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. ही रथयात्रा नागपूरहून सुरु करण्यात येणार आहे.
त्यामध्ये ओबीसींची जातनिहाय जनगणना जाहीर करा, राज्यमागासवर्ग आयोगावर ओबीसी समाजाचा अध्यक्ष असावा, ओबीसी विदयार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर वसतीगृह, ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला ४ हजार कोटी भागभांडवल दया, ओबीसी दाखले सुलभरित्या मिळावेत, क्रिमीलेअरची अट रद्द करा, शेतमालाला खर्चावर आधारीत भाव दया, स्वामीनाथन समितीच्या शिफारशी अमलात आणा, मंडल कमिशनची शंभर टक्के अंमलबजावणी करा, विधानपरिषद,विधानसभा,लोकसभेमध्ये ओबीसी आरक्षण दया, शेतकऱ्यांची फसवी कर्जमाफी, महिलांना सबलीकरण अशा मागण्यांचा समावेश असणार आहे.
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष भगवान कोळेकर, दत्तात्रय घाडगे, नानासाहेब राऊत, राज राजापूरकर, सचिन आवटे उपस्थित होते.
#NCP #OBCCell #RathYatra