সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, December 28, 2015

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

मेहा जंगलातील घटना

सावली ः सरपण गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना सोमवारी (दि. 28) दुपारी एकच्या सुमारास पाथरी उपक्षेत्रातील मेहा बुजरुक बिटात घडली. मृताचे नाव शांताबाई गिरिधर भोयर (वय 40) असे आहे.
गावातील 10 ते 12 जण सकाळी गावालगतच्या जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेले होते. मेहा बिटातील कक्ष क्रमांक 159 येथे सरपण सरपण गोळा करीत असतानाच वाघाने हल्ला चढविला. यात शांताबाई भोयर यांना प्रथम लक्ष्य केले. घटनास्थळापासून जवळपास पाचशे मीटर त्यांना ओढत नेले. यावेळी सोबत असलेल्या आत्राम नामक एका महिलेवर हल्ला केला. यात ती जखमी झाली. घाबरलेल्या अन्य सहकाऱ्यांनी गावात पळ काढून घटनेची माहिती दिली. गावातील नागरिकांनी वन कर्मचाऱ्यांना कळवून शोध घेतला. तेव्हा शांताबाई ही मृतावस्थेत, तर आत्राम जखमी होती. येथील जंगलात पाच ते सात वाघांचे वास्तव्य आहे. गेल्या 10 वर्षात गावातील शेकडो जनावरे वाघाने मारली. मानवावर हल्ला करण्याची ही पहिलीच घटना आहे. यापूर्वी वाघाने गावात येवून जनावरांची शिकार केली होती. शिवाय शेतशिवारात वाघाच्या एका बछड्याचा मृत्यूही झाला होता.

थंडी आणि दूध न मिळाल्याने चंद्रपुरातील बछड्यांचा मृत्यू

थंडी आणि दूध न मिळाल्याने चंद्रपुरातील बछड्यांचा मृत्यू

चंद्रपूर : चंद्रपुरातल्या सावली तालुक्यात वाघाच्या चार बछड्यांचा मृत्यू थंडी आणि दूध न मिळाल्याने झाल्याचं समोर आलं आहे. चारपैकी दोन बछड्यांच्या पोस्टमॉर्टेम अहवालातून हे निष्पन्न झालं आहे. त्यामुळे इतर दोन बछड्यांचा अंतही आईची ऊब आणि उपासमारीमुळे झाल्याचं म्हटलं जात आहे.
 सावलीतल्या नवेगाव मार्गावर फिरायला गेलेल्या लोकांना शनिवारी ही चार वाघांची पिल्लं मृतावस्थेत आढळून आली. याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर सुरुवातीला हद्दीवरुन वनविभाग कर्मचाऱ्यांनी हात झटकण्याचेही प्रयत्न केले. परंतु मोठा गाजावाजा करुन सुरु झालेल्या व्याघ्र मोहीमेला या घटनेने धक्का बसला आहे.
तालुक्यात झालेल्या वाघाच्या 4 बछड्यांच्या मृत्यूचं गूढ कायम आहे. वन अधिकाऱ्यांच्या मते भुकेपोटी या चारही बछड्यांचा अंत झाला आहे, तर वाघिणीची शिकार होऊन आईपासून ताटातूट झाल्यानं या पिल्लांचा मृत्यू झाल्याचा दावा प्राणीप्रेमी करत आहेत.  
मात्र या प्रकारामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या बछड्यांची आई म्हणजेच वाघिण कुठे आहे? तिची शिकार झाली का? या भागात चार बछड्यांना जन्म दिलेली वाघिण आहे, याची माहिती वनखात्याला नव्हती का?
दरम्यान या मृत्यूप्रकरणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Saturday, December 19, 2015

सेंद्रिय शेतीसाठी 65 कोटी रुपयांची तरतूद

सेंद्रिय शेतीसाठी 65 कोटी रुपयांची तरतूद


नागपूर, दि. 18 डिसेंबर :-राज्यात सेंद्रिय शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतुने राज्य शासनाने 65 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पन्नास शेतकरी एकत्र येऊन समुहाने सेंद्रिय शेती करणार असल्यास त्यांना शासनाचे प्रोत्साहन राहील. आवश्यकता भासल्यास या 65 कोटी रुपयांच्या तरतुदीमध्ये आणखी वाढ करण्याचा शासनाचा प्रयत्न राहील, असे कृषी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज विधान परिषदेत सांगितले. ‍
नझुल भूखंड धारकांना मालकी हक्क

नझुल भूखंड धारकांना मालकी हक्क

नागपूर, दि. 18 डिसेंबर :- विदर्भातील नझुल भूखंड धारकांना त्यांच्या भूखंडाचेसंपूर्ण मालकी हक्क देण्याबाबत या भूखंड धारकांकडून शासनाससातत्याने विनंती करण्यात येत होती. त्यामुळे आतालिलावाव्दारे किंवा अन्य प्रकारे भाडेतत्वावर दिलेल्या नझुलजमिनी फ्री होल्ड (भोगवटादार वर्ग-1) करण्यासंदर्भात सर्वंकषअभ्यास करुन शासनास शिफारस करण्यासाठी प्रधान सचिव(महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येतआहे. या समितीमध्ये वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्यसचिवांनी नामनिर्देशित केलेले प्रधान सचिव अथवा सचिवदर्जाचे अधिकारी, नागपूर व अमरावतीचे विभागीय आयुक्त हेसदस्य असतील. तर महसूल व वन विभागाचे उप सचिव हेसदस्य सचिव असतील.

ही समिती लिलावाव्दारे किंवा अन्य प्रकारे भाडेतत्वावरदिलेल्या नझुल जमिनी फ्री होल्ड (भोगवटादार वर्ग-1) केल्यानेत्याचे राज्याच्या आर्थिक हितावर तसेच अन्य क्षेत्रात कोणतेदुर्गामी परिणाम होतील आणि या जमिनी फ्री होल्डकरण्यासंदर्भात सर्वंकष अभ्यास करील. या समितीने तीनमहिन्यात आपला अहवाल सादर करणे अपेक्षित आहे. येत्यामार्च अखेरपर्यंत समितीच्या अहवालावर निर्णय घेतला जाईल.

विदर्भातील नझुल जमिनीच्या भाडेपट्टयाचे दर
विद्यमान दराच्या एक पंचमांश होणार

Tuesday, December 08, 2015

आदिवासी अधिकाऱ्‍याला मिळाला न्याय.

आदिवासी अधिकाऱ्‍याला मिळाला न्याय.

एकनाथराव खडसे यांचेकडून
10 वर्षाची ससेहोलपट संपली

नागपूर, दि.8 डिसेंबर : स्वत:ची काही चूक नसतांना शासकीय अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे अन्याय सहन करणाऱ्या राज्य शासनाच्या सेवेतील वरिष्ठ पदावरून सेवानिवृत्त झालेल्या बा.गो.तिरानकर या आदिवासी अधिकाऱ्याला मा.राज्यपाल सी.विद्यासागर राव आणि कृषी व महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी नुकताच न्याय मिळवून दिला.

Friday, December 04, 2015

आयुक्तांच्या ‘हजेरी’साठी CCTV

आयुक्तांच्या ‘हजेरी’साठी CCTV

चंद्रपूरच्या नगरसेवकांची अनोखी शक्कल

चंद्रपूर : चंद्रपूर महापालिकेच्या आयुक्तांवर नजर ठेवण्यासाठी नगरसेवकांनी आयुक्तांच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवला आहे. गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर महापालिकेचे आयुक्त सुधीर शंभरकर आणि पदाधिकारी यांच्यातला वाद विकोपाला गेला आहे.
आयुक्त गैरहजर राहतात, फाईल्स क्लिअर होत नाहीत, आयुक्त नगरसेवकांना भेटत नाहीत, असे आरोप करण्यात येत आहेत. यावरुन सर्वसाधारण सभेत गदारोळही माजला होता. यावेळी मी गैरहजर राहतो याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे, असा प्रतिप्रश्न आयुक्तांनी नगरसेवकांना केला आहे. त्यावर उपाय म्हणून पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी चक्क आयुक्तांच्या केबिनमध्येच सीसीटीव्ही कॅमेरा बसवला आहे विशेष म्हणजे सीसीटीव्हीचा सर्व खर्च नगरसेवकांनी स्वत:च्या खिशातून केला आहे.

Wednesday, December 02, 2015

 'इ-इंडिया' पुरस्काराने गौरव

'इ-इंडिया' पुरस्काराने गौरव

  • महापालिकेच्या 'स्मार्टभरती प्रक्रियेचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
  • ऑनलाईन परीक्षेद्वारे ७१,८१६ उमेदवारांमधून करण्यात आली होती ९४२ कर्मचा-यांची निवड
  • राज्यातील १४ केंद्रांवर एकाच वेळी घेण्यात आली होती ऑनलाईन परीक्षा

बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे संपूर्णपणे ऑनलाईन पध्दतींचा वापर करीत राबविण्यात आलेल्या 'स्मार्ट'भरती प्रक्रियेला 'इ – इंडिया' या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. कर्मचारी निवड प्रक्रियेसाठी संपूर्णपणे ऑनलाईन पध्दतीचा वापर करुन राबविण्यात आलेली 'स्मार्ट' भरती प्रक्रिया ही केवळ ०७ महिन्यात यशस्वीरीत्या व पारदर्शकपणे पूर्ण करणारी बृहन्मुंबई महानगरपालिका ही देशातील पहिलीच महापालिका ठरली आहे. याच वैशिष्टयपूर्ण बाबीची दखल आता राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. मुंबईतील ताज प्रेसिडेंट (विवांता) या तारांकित हॉटेलमध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या 'इ – इंडिया' शिखर परिषदेच्या दिमाखदार सोहळ्यादरम्यान 'इ – इंडिया' या पुरस्काराने गौरविण्यात आल्याने महापालिकेच्या शिरपेचात मानाचा आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

१४ जिल्ह्यांमध्ये तात्काळ दारूबंदी जाहीर करा

१४ जिल्ह्यांमध्ये तात्काळ दारूबंदी जाहीर करा

यवतमाळ, १ डिसेंबर- बिहार सरकारने एप्रिल १६ पासून बिहारमध्ये संपूर्ण दारूबंदीची केलेली घोषणा हा एक क्रांतिकारी निर्णय ठरला आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यानेही कोणतीही आर्थिक वा महसुली तुटीची चिंता न करता शेतकरी आत्महत्याग्रस्त विदर्भ व मराठवाड्याच्या १४ जिल्ह्यांमध्ये तात्काळ दारूबंदी जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्री व कृषी मंत्री यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्र सरकारने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी स्थापन केलेल्या वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष व यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी करण्यात यावी, यासाठी २०१० पासून सतत जनआंदोलन करणारे किशोर तिवारी यांनी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय आणि राणी बंग यांच्या जाहीर मागणीचा दाखला दिला आहे. आपण मागील दोन वर्षांत ग्रामीण भागात जनतेच्या भावनांचा अभ्यास केल्यावर अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांना समाज व सरकारशी संवाद न होण्यासाठी दारू हेच प्रमुख असल्याचे सत्य समोर आले आहे, असे तिवारी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
शेतकरी आत्महत्याग्रस्त विदर्भ व मराठवाड्याचा १४ जिल्ह्यातील महिलांनी आपल्या बळावर काही खेड्यांमध्ये दारूबंदी केली आहे. मात्र तालुक्याच्या ठिकाणी व लगतच्या मोठ्या गावात सरकारी दारूच्या दुकानामुळे ही खेड्यातील दारूबंदी कुचकामी ठरली आहे. या दारूच्या महापुराला सरकारी अधिकारी, पोलिस व अबकारी विभागाचे ‘जास्तीत जास्त दारू विका आणि सरकारला महसूल द्या’ हे धोरणच जबाबदार असल्याची टीकासुद्धा त्यांनी केली आहे.
सरकारच्या तिजोरीला जर या दारूबंदीमुळे तोटा होत असेल तर सरकारने दारूमुक्ती कर सुरू करावा, अशी सूचनाही किशोर तिवारी यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या समतोल प्रादेशिक विकासाच्या प्रश्‍नांवरील अभ्यासासाठी नेमलेल्या डॉ. विजय केळकर उच्चस्तर समितीच्या अहवालातसुद्धा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये तात्काळ दारूबंदीची शिफारस केली आहे. ग्रामीण भागातील प्रचंड अडचणी, आर्थिक संकट व अभूतपूर्व कृषी संकट यावर केळकर समितीने दारूबंदीचा प्रस्ताव सरकारला दिला असल्याची आठवणही त्यांनी करून दिली आहे.
३० जानेवारी २०११ ला यवतमाळ जिल्ह्यातील हजारो महिलांनी जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदीसाठी पांढरकवडा येथे मेळावा आणि २०१२ मध्ये मार्च महिन्यात यवतमाळ येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देऊन आपली मागणी रेटून धरली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी संजय देशमुख यांनीही यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदीची शिफारस केली होती. त्यामुळे शासनाने यवतमाळ जिल्ह्यात मद्यविक्री व मद्यपान यावर बंदी घालण्याचे धोरण स्वीकारले पाहिजे, अशी अपेक्षा तिवारी यांनी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधी पक्षात असताना जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदीच्या मागणीला पाठिंबा दिला होता. आता तात्काळ संपूर्ण दारूबंदी लागू करावी, अशी विनंती किशोर तिवारी यांनी केली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात महिलांनी संपूर्ण दारूबंदीसाठी आंदोलन सुरू केले आहे. महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनीदेखील यवतमाळ व बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये दारूबंदी करण्याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे सरकारने वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली येथील दारूबंदीच्या धर्तीवर दारूबंदी करणे गरजेचे झाले आहे.
तरुण पिढीत व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत आहे. मुले दारूच्या आहारी जात आहेत. दारूमुळे सुखी संसाराची राखरांगोळी होत आहे. सहज उपलब्ध होणारी कमी पैशातील दारू हे यामागील प्रमुख कारण आहे. लगतच्या दारूबंदी असलेल्या जिल्ह्यांमध्ये सरकारी यंत्रणेच्या आशीर्वादाने वाहात असलेल्या दारूच्या महापुराचा अनुभव लक्षात घेता, केरळप्रमाणे सर्व पक्ष, सर्व धर्म व सरकार यांच्या सहकार्याने संपूर्ण राज्यात दारूबंदी करणे काळाची गरज झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पोलिस व प्रशासनाने संरक्षण दिल्याने गावागावात दारूच्या भट्ट्या पेटविल्या जात आहेत. या दारूच्या विरोधात गावागावातील महिलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. परंतु ज्यांनी कारवाई करायची त्यांचेच छुपे पाठबळ असल्याने न्याय कुणाकडे मागावा, असा प्रश्‍न महिलांपुढे निर्माण झाला आहे. अखेर या महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. त्यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चे काढले आहेत. काही ठिकाणी तर महिलांनी स्वत:च दारूच्या भट्‌ट्या नेस्तनाबूत केल्या आहेत. दारूचे हे साहित्य ट्रॅक्टरमध्ये टाकून जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावर धडकही दिली आहे.
दारूविरुद्ध आंदोलन करणार्‍या या महिलांना दारू माफियांकडून धमक्याही दिल्या जात आहेत. काही ठिकाणी तर महिलांवर हल्लेही केले गेले आहेत. ही शोकांतिका किशोर तिवारी यांनी आपल्या निवेदनातून मुख्यमंत्र्यांसमोर मांडली आहे.
५ हजार पोलिसांचा ताफा

५ हजार पोलिसांचा ताफा

हिवाळी अधिवेेशन

नागपूर, - ७ डिसेंबरपासून सुरू होणार्‍या हिवाळी अधिवेशनासाठी संपूर्ण राज्यातून पोलिस बोलविण्यात आले असून ५ हजार पोलिस अधिकारी आणि शिपायांचा ताफा तैनात करण्यात येणार आहे.
या बंदोबस्तासाठी बाहेरून २ अप्पर पोलिस आयुक्त, १५ पोलिस अधीक्षक, २९ सहायक पोलिस आयुक्त, ७५ पुरुष पोलिस निरीक्षक, १० महिला पोलिस निरीक्षक, ३०० फौजदार, ७० महिला फौजदार, २७०० पुरुष शिपाई आणि ५०० महिला शिपाई येणार आहेत. यांच्या मदतीला गृहरक्षक दलाचे १२०० जवान, राज्य राखीव बलाच्या ६ कंपन्या, फोर्स वनची तुकडी राहणार आहे. याशिवाय शहरातील २ ते २५०० अधिकारी आणि शिपायांना तैनात करण्यात येणार आहे.
वरिष्ठ अधिकार्‍यांची वीज मंडळ, केंद्रीय राखीव पोलिस बल, कृषिकुंज येथील विश्रामगृहात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सहायक पोलिस आयुक्तांची अमरावती मार्गावरील निंबूवर्गीय वसतिगृह, सातपुडा, वेणा, ओराई प्रशिक्षण केंद्र येथे व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षकांची राष्ट्रीय अग्निशमन दलाच्या वसतिगृहात व्यवस्था केली आहे. बंदोबस्ताला आलेल्या महिलांना मानकापूर येथील क्रीडा संकुलात थांबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शिपायांसाठी २७ मंगल कार्यालये बुक करण्यात आली आहेत. प्रत्येक मंगल कार्यालयात ५० ते ७५ शिपायांना थांबविण्यात येणार आहे. बंदोबस्ताला येणार्‍या पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूलभूत गरजा लक्षात घेता ही व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ४५० वाहनांची मागणी करण्यात आली असून अजूनपर्यंत वाहने मिळाली नाहीत. परंतु, दोन-तीन दिवसात ही वाहने मिळतील अशी आशा आहे.
पोलिस कर्मचार्‍यांना ४० रुपयात जेवण मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी काही कंत्राटदारांशी बोलणी करून त्यांना जेवणाचे कंत्राट दिले आहेत. बंदोबस्ताला जाणार्‍या आणि बंदोबस्ताहून येणार्‍या कर्मचार्‍यांना हे कंत्राटदार जेवणाचे पाकिटे देणार आहेत. त्याचप्रमाणे त्यांना आंघोळीसाठी गरम पाणी आणि शौचालयाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. थंडीचे दिवस असल्याने कर्मचार्‍यांना गादी, उशी, चादरी आणि ब्लँकेट देण्यात येणार आहेत. बंदोबस्ताला येणार्‍या कुणाही कर्मचार्‍यांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
दरवर्षीप्रमाणेच यंदाही शहरातील ५ मोर्चे पॉईंट ठेवण्यात आले आहेत. मोर्चेकर्‍यांनी काही गडबड करू नये यासाठी खाजगी गणवेशात पोलिसांना तैनात करून मोर्चेकर्‍यांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. याशिवाय मोर्चास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसविण्यात येणार आहेत.
मागील वर्षी शेवटच्या दिवसापर्यंत ९९ मोर्चे विधानभवनावर काढण्यात आले होते. आतापर्यंत १८ संघटनांनी मोर्चाची परवानगी मागितली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कॉंग्रेस आणि आदिवासींचे मोर्चे विधानभवनावर धडकणार आहेत. याशिवाय अपंग, अंगणवाडी, विना अनुदानित शाळा, शिक्षक, मजदूर, झोपडपट्टीधारक, रॉकेल विक्रेते यांचेही मोर्चे विधानभवनावर धडकणार आहेत.

Tuesday, December 01, 2015

 सावलीत काँग्रेस, चिमूर, पोंभुर्ण्यात भाजपचे नगराध्यक्ष

सावलीत काँग्रेस, चिमूर, पोंभुर्ण्यात भाजपचे नगराध्यक्ष




चंद्रपूर, ता.३०: जिल्हयातील तीन नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी आज पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेसला एक, तर भाजपला दोन ठिकाणी सत्ता मिळाली.
सावली नगरपंचायतीच्या निवडणुकीत १० जागा जिंकून काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. तेथे राष्ट्रवादीला ५, तर बसपा व अपक्षास प्रत्येकी एक जागा मिळाली होती. पोंभुर्ण्यात भाजपने १० जागा जिंकून सर्वांना चीत केले होते.चिमूर नगरपंचायतीत भाजपला ६ जागेवर विजय संपादन करता आला होता. काँग्रेसला ५ , शिवसेना २ तर अपक्षांना ४ जागा मिळाल्या होत्या.
भारतीय क्रिकेटर चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांनी आपल्या परिवारासह नुकतीच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देऊन जंगल सफारीचा आनंद लुटला, तो क्षण

Saturday, November 28, 2015

राज्यात दारू विक्रीवर बंदी होणार नाही : शासन

राज्यात दारू विक्रीवर बंदी होणार नाही : शासन

मुंबई - दारू विक्रीवर कधीही लवकरच  बंदी होणार नाही, असे राज्य सरकारने म्हटले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमध्ये दारू बंदी घोषणा केल्यानंतर एकसमान बंदी महाराष्ट्रातील लागू करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अभय बंग, शिवसेना आमदार नीलम गो-हे, भाजपचे आशिष देशमुख यांनी केली होती
तथापि, महाराष्ट्र सरकारने दारू विक्रीतून सशक्त महसूल मिळतो म्हणून राज्यात अंमलबजावणी होण्याची शक्यता नाही, असे सांगितले आहे.

"राज्य फक्त दारू विक्रीतून सुमारे Rs18,000 कोटी महसूल प्राप्त करतो. सरकारने दारू विक्री बंदी साठी म्हणून, शक्य होणार नाही. महसूल पर्यायी स्रोत आढळल्यास दारू विक्री प्रतिबंध शक्य असल्याचे "राज्याचे महसूल आणि अबकारी मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले.

बिहार सरकारने 1 एप्रिल पासून राज्यातील दारू बंदी निर्णय घेतला. मात्र चालू आर्थिक वर्षात किमान, तो बंदी शक्य होणार नाही, "ते म्हणाले. राज्य आर्थिक स्थिती अतिशय नाजूक आहे. "
चंद्रपूर, वर्धा व गडचिरोलीत गेल्या काही वर्षांपासून दारू विक्री प्रतिबंधित आहे. ती कायम राहणार आहे
अबकारी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दारू विक्रीवर राज्य व्यापी बंदी लागू करण्यासाठी प्रस्ताव आली नाही असे स्पष्ट केले.
तथापि, गाव पातळीवर दारू विक्रीवर घालण्यात आलेली बंदी स्थानिक संस्था मध्ये एक ठराव पास करता येते. महिला सक्षम करण्यासाठी प्रक्रिया सोपी करण्यासाठी प्रशासन निर्देश दिले. महिला बहुसंख्य या ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर दारू विक्री गावांमध्ये बंदी घातली जाईल.

Wednesday, November 18, 2015

दगड घालून खून

दगड घालून खून


आज सकाळी सोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्रिमूर्तीनगरच्या मागच्या बाजूला असलेल्या बाजारपेठेत जुगार, दारु आणि पैशाच्या वादातून दोन युवकांच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. रवि प्रकाश डुले (२६) रा. गोपालनगर आणि बंटी उर्फ संदीप शरद आटे (२९) अशी मृतकांची नावे आहेत. या प्रकरणात पोलीसांनी आरोपी मनोज भारद्वाज (२५) यास अटक केली आहे. रवि हा बर्डीवर ऑटोरिक्षा चालवितो. तर आरोपी मनोज आणि बंटी हे सेन्ट्रींगचे काम करतात. काही दिवसांपूर्वी मनोजने रविकडून हिरो प्लेजर कंपनीची दुचाकी मागितली होती. रविने आपल्या नातेवाईकाची दुचाकी मनोजला दिली. परंतु मनोजने रविकडून घेतलेली दुचाकी स्वत:च्या फायद्याासाठी दुसºयाकडे तारण ठेवली होती. याची माहिती मिळताच रवि हा मनोजला दुचाकी परत करण्याचे किंवा दुचाकी सोडविण्यासाठी पैशाची मागणी करीत होता दरम्यान काल, मंगळवारच्या रात्री ९ च्या सुमारास रवि हा बंटी, मनोज आणि इतर पाच ते सहा मित्रांसह इंद्रप्रस्थनगर परिसरातील बाजाराच्या ठिकाणी विदेशी दारु पित आणि जुगार खेळत बसला होता. रात्री ११.३० पर्यंत ते दारु पित होते. त्यानंतर एक-एकजण घरी जाऊ लागले. त्या सुमारास त्यांची दारुही संपली. शेवटी रवि, बंटी आणि मनोजच त्या ठिकाणी थांबले होते. तिघांनाही पुन्हा दारुची आवश्यकता होती. त्यामुळे दारु कोण आणणार याच्यातून रवि आणि मनोजमध्ये वाद झाला. या वादातून दुचाकीचा मुद्दा आला असता मनोजने दुचाकी आणली आणि रविला दिली. परंतु त्यानंतरही भांडण सुरुच होते. त्यामुळे ११.३० च्या सुमारास मनोजने दारुच्या नशेत शेजारचे सिमेंटचे पत्रे घेऊन रविच्या डोक्यावर मारले. यात रवि रक्तबंबाळ झाला असता बंटी आरडाओरड करु लागला. त्यामुळे मनोजने बंटीच्या डोक्यातही दगड घातला. यानंतर रवि आणि बंटी गतप्राण झाले असता मनोजने त्याना संपविण्याच्या उद्देशाने पुन्हा त्यांच्या डोक्यात दगड घातले. रवि आणि बंटीचा मृत्यू झाल्यानंतर मनोज हा दुचाकी घेऊन घटनास्थळावरुन पळून गेला. सकाळी नैसर्गिक क्रियेसाठी जाणाºया रहिवाशांना बाजारपेठच्या रस्त्यांवर रक्ताचा सडा दिसला आणि काही अंतरावर दोन मृतदेह पडले होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी प्रचंड गर्दी केली होती. गर्दीतील एका युवकाने नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करुन खुनाविषयी माहिती दिली. यानंतर सकाळी ६ वाजता सोनेगाव, राणाप्रतापनगर येथील पोलीस घटनास्थळी पोहाचले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले. त्यानंतर मृतदेहांची ओळख पटविण्यात आली आणि आरोपी मनोजला सकाळी ९.३० च्या
सुमारास त्याच्या घरुन अटक केली. मनोजने एकट्यानेच खून केला की त्याच्यासोबत कुणी होते, याचा तपास पोलीस करीत आहेत. त्यांच्यासोबत दारु पिणाºया काहींना पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. परंतु मनोजने आपण एकट्यानेच दोघांनाही संपविल्याची कबुली पोलीसांना दिली.

Saturday, November 14, 2015

जटपुरा गेट, वाहतुकीची कोंडी

जटपुरा गेट, वाहतुकीची कोंडी

चंद्रपूर-  चंद्रपुरातील जटपुरा गेटच्या वाहतुकीची कोंडी फोडण्याचा श्रीगणेशा शेवटी शनिवारी गेटजवळच आयोजित जनसभेने झाला. राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत जटपुरा गेटची वाहतूक सुरळीत करण्याचे दीर्घकालीन, तसेच तात्पुरत्या स्वरूपाचे उपाय चर्चिले गेले. तात्पुरत्या उपायांवर लगेच कार्यवाही करण्याचे निर्देशही मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर आणि जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप दिवाण यांना दिले.
मुख्य रस्त्याचे पथमार्ग लहान करणे, रामनगरच्या वनवेबाबत विचार करून तशा सूचना मागवणे, नो पार्किंग झोन तयार करून पर्यायी वाहनतळ उपलब्ध करून देणे, शहरातून बाहेर पडणारे अन्य वळण मार्ग शोधणे, रस्त्याचे दुभाजक तोडून ते वाहतुकीला सुव्यवस्थित होईल, असे करणे आदी विषयांवर सूचना देण्यात आल्या. या सार्‍या बाबींवर विचार करण्यासाठी एक समिती गठित करण्यात आली. 
शिवाय दीर्घकालीन उपायायोजना करण्यासाठी पुरातत्व विभागाच्या प्रमुखांना येत्या सोमवारी जिल्हाधिकार्‍यांमार्फत पत्र लिहून त्यांना पाचारण करणे आणि प्रत्यक्ष जटपुरा गेट दाखवणे, त्यांच्यासोबत ही समस्या सोडविण्यासाठी चर्चा करणे, असे ठरले. 
सुधीर मुनगंटीवार हे स्वत: या कामासाठी पुढाकार घेणार आहेत. ते म्हणाले, जटपुरा गेट तोडणे हा काही शाश्‍वत मार्ग नाही. कारण किल्ला ही या शहराची ओळख आहे. या मार्गावरची वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी सारे मार्ग शोधून त्यावर काम करावे लागेल. रस्त्यांवरील विजेचे खांब काढून वाहिन्या भूमिगत कशा करता येईल, ते बघावे लागेल. 
तत्पूर्वी, चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे रमणिकभाई चव्हाण यांनी, गेटच्या शेजारची भिंत तोडण्यासाठी पुरातत्व विभागाला परवानगी देण्यास काही हरकत नसावी. कारण आम्ही या वास्तूचे विद्रुपीकरण करीत नसून, उलट त्याचे सौंदर्यीकरणच करणार आहोत. त्यामुळे लवकरात लवकर ती परवानगी घ्यावी, अशी सूचना केली. तर, डॉ. गोपाल मुंधड यांनी, जटपुरा गेटवरील वाहनांची कोंडी लक्षात घेता जटपुरा गेटची भिंत तोडावी आणि मनपाच्या मालकीच्या दुकानलाईनचा काही भाग तोडून त्या दुकानदारांना मागचा भाग देण्यात यावा, असे सूचवले. विनोद दत्तात्रय यांनी, अद्ययावत स्थापत्य तंत्रज्ञानाचा वापर करून तुकड्यामध्ये गेट उचलून बाजूला उभा करावा, जेणेकरून तो रस्त्याच्या मधे येईल आणि सुुंदरही दिसेल, असे सांगितले. मेघनाद जानी, तसेच सदानंद खत्री यांनी, जटपुरा गेटची भिंत तोडून दहा व चौदा फूट रुंदीचे दोन रस्ते तयार करावे. गेटच्या मधून चारचाकी जातील आणि उर्वरित रस्त्यावरून दुचाकी आणि ऑटो जातील, अशी व्यवस्था तयार करावी, असे सूचवले. रामनगर माार्गावरील अतिक्रमण हटविण्यात यावे आणि या मार्गाला वनवे करावे, अशीही सूचना आली. या सार्‍या सूचनेनंतर सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित अधिकार्‍यांसोबत प्रत्यक्ष गेट आणि रस्त्याची पाहणी केली.यावेळी आ. नाना श्यामकुळे, आ. संजय धोटे, महापौर राखी कंचर्लावार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रा. अतुल देशकर, जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर, पोलिस अधीक्षक संदीप दिवाण यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. 

Thursday, November 12, 2015

राज्य नाटय स्पर्धेत यंदा 13 नाटकं

राज्य नाटय स्पर्धेत यंदा 13 नाटकं

मेजवाणी 18 नोव्हेंबर पासुन प्राथमिक फेरीला प्रारंभ

शासनाच्या सांस्कत्रतिक कार्य संचालनालयच्या वतीने आयोजित 55 व्या हौशी मराठी नाटय स्पर्धाचे आयोजन दिनांक 18 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान होत असुन यंदा एकुण 13 नाटकं चंद्रपुर केंद्रावर, प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कत्रतिक सभागत्रहात सादर होत असुन दिनांक 18 नोव्हेंबर पासुन प्राथमिक
पफेरीला प्रारंभ होणार आहे.
येत्या 18 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत हि स्पर्धा रंगणार असुन रोज सायंकाळी 7 वाजता नाटकाचे प्रयोग होणार आहे. स्पर्धेचे वेळापऋाकाप्रमाणे दिनांक 18 नोव्हेंबर, बुधवार, सायंकाळी 7 वाजता श्री. सिध्दीविनायक प्रतिष्ठान, यवतमाळ या संस्थेचे नाटक १अभिनेऋाी२, लेखक - गिरीश जोशी, दिग्दर्शक - कल्पना जोशी, दिनांक 19 नोव्हेंबर, गुरफवार, सायंकाळी 7 वाजता समुत्कर्ष बहुउद/देशीय संस्था, गडचिरोजी या संस्थेचे नाटक १परिवर्तन२, लेखक, दिग्दर्शक - राजरतन देवीदास पेटकर, दिनांक 20 नोव्हेंबर, शुक्रवार, सायंकाळी 7 वाजता समुत्कर्ष बहुउद/देशीय संस्था, यवतमाळ या संस्थेचे नाटक १तप्त दाही दिशा२, लेखक
- डाॅ. राजेन्द्र धामणे, दिग्दर्शक - राजाभाउफ भगत, दिनांक 21 नोव्हेंबर, शनिवार, सायंकाळी 7 वाजता डाॅ. श्यामाप्रसाद सार्वजनिक वाचनालय, चंद्रपुर या संस्थेचे नाटक १हणम्याची मरीमाय२, लेखक - विजय खानविलकर, दिग्दर्शक - श्रीनिवास मुळावार, दिनांक 22 नोव्हेंबर, रविवार, सायंकाळी 7 वाजता कामगार मनोरंजन केंद्र, चंद्रपुर या संस्थेचे नाटक १देवाशपथ खोट सांगेन२, लेखक - डाॅ. मोहन पानसे, दिग्दर्शक - मोहन जोशी, दिनांक 23 नोव्हेंबर, सोमवार, सायंकाळी 7 वाजता कलावैभव नाटय व सांस्कत्रतिक संस्था, यवतमाळ या संस्थेचे नाटक १खेळ२, लेखक - अनिल दांडेकर, दिग्दर्शक - अविश वत्सल, दिनांक 24 नोव्हेंबर, मंगळवार, सायंकाळी 7 वाजता कलाश्रय ज्ञान व कला संवर्धन मंडळ, यवतमाळ या संस्थेचे नाटक १आसरफबा२, लेखक - सुनिल देशपांडे, दिग्दर्शक - प्रशांत गोडे, दिनांक 25 नोव्हेंबर, शनिवार, सायंकाळी 7 वाजता अस्मिता रंगायतन, यवतमाळ या संस्थेचे नाटक १माझाा खेळ मांडु दे२, लेखक - सई परांजपे, दिग्दर्शक - अशोक आष्टीकर, दिनांक 26 नोव्हेंबर, गुरफवार, सायंकाळी 7 वाजता पफुलोरा सामाजिक विकास
संस्था, वर्धा या संस्थेचे नाटक १घर तिघांचं हवं२, लेखक - रत्नाकर मतकरी, दिग्दर्शक - विकास पफटिंगे, दिनांक 27 नोव्हेंबर, शुक्रवार, सायंकाळी 7 वाजता नवोदिता, चंद्रपुर या संस्थेचे नाटक १ज्याचा त्याचा प्रश्न२, लेखक - अभीराम भडकमकर, दिग्दर्शक - डाॅ. जयश्री कापसे-गावंडे, दिनांक 28 नोव्हेंबर, बुधवार, सायंकाळी 7 वाजता कल्पतरफ बहुउद/देशीय संस्था, यवतमाळ या संस्थेचे नाटक १हीच तर प्रेमाची गंमत आहे२, लेखक - अशोक पाटोळे, दिग्दर्शक - विलास राखे, दिनांक 29 नोव्हेंबर, रविवार, सायंकाळी 7 वाजता अध्ययन भारती, वर्धा या संस्थेचे नाटक १श्रीकांत प्रभुणेची प्रेमकथा२, लेखक - श्याम पेठकर, दिग्दर्शक - चैतन्य आठले, दिनांक 30 नोव्हेंबर, सोमवार, सायंकाळी 7 वाजता आदिवासी लोकरंग कलामंच बहुउद/देशीय संस्था, वणी, जिल्हा यवतमाळ या संस्थेचे नाटक १कातरवेळ२, लेखक - डाॅ. माणिक वडयाळकर, दिग्दर्शक - आनंद गेडाम
तरी 18 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत स्पर्धा रंगणार असुन रसिकप्रेक्षकांनी मोठया संखेने आपली उपस्थिती दर्शवावी असे आव्हाहन महाराष्ट! शासनाच्या सांस्कत्रतिक कार्य संचालनालयच्या वतीने समन्वयक सुशील सहारे यांनी केले आहे.

Thursday, October 29, 2015

माजी सभापतींमध्ये धक्काबुक्की!

माजी सभापतींमध्ये धक्काबुक्की!

चंद्रपूर - स्थायी समितीच्या माजी सभापतींनी एक-दुसर्‍यांवर शिव्यांची लाखोळी वाहत धक्काबुक्की केल्याचा प्रकार बुधवार, २८ ऑक्टोबरला मनपाच्या आमसभेत घडला. यावेळी अन्य नगरसेवकांनी मध्यस्थी करीत दोन्ही सभापतींची समजूत काढल्याने प्रकरण निवळले. मात्र, या प्रकारामुळे सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Saturday, October 17, 2015

द्धाने केला पत्नाी, भाचाचा खून

द्धाने केला पत्नाी, भाचाचा खून

नागपूर-चारित्र्यावरील संशयातून ६० वर्षीय वृद्धाने पत्नाी आणि मेहुण्याच्या मुलाचा कुर्हाडीचे घाव घालून खून केल्याची घटना जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तक्षशीलानगर येथे शुक्रवारच्या रात्री ३ च्या सुमारास घडली. या घटनेमुळे वस्तीमध्ये शोककळा पसरली आहे. पोलिसांनी आरोपी शरनू उर्फ अन्नाजी कांबळे यास अटक केली आहे.
गोपीबाई शरनू उर्फ अन्नाजी कांबळे (५०) आणि चेतन मधुकर रामपुरे (१०) अशी मृतकांची नावे आहेत. अन्नाजी कांबळे यास दारुचे व्यसन असून तो हातमजुरीचे काम करतो. तर गोपीबाई बाजारांमध्ये भाजीपाला विकण्याचा व्यवसाय करायची. त्यांना तीन मुली असून तिघिंचेही लग्न झाले आहे. त्यांच्या तीनही मुली पुणे येथे राहतात. घरात दोघेच म्हातारे असल्याने गोपीबाई यांनी त्यांचा भाऊ मधुकर रामपुरे रा. उमरगांव (उस्मानाबाद) यांचा मुलगा चेतन यास दोन वर्षांपूर्वी नागपुरात आणले. तो नारी वस्ती येथील महापालिकेच्या उच्च प्राथमिक शाळेत चौथ्या वर्गात शिकत होता. अन्नाजी हा दररोज दारु पिऊन दररोज घरी यायचा आणि गोपीबाई यांच्याशी भांडण करायचा. काल शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास गोपीबाई भाचा चेतनसोबत वस्तीतील दुर्गादेवीच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. त्यानंतर ते घरी परतले असता अन्नाजी याने गोपीबाईशी भांडण केले. आज पहाटे पाचच्या सुमारास शेजारचे काही परिवार कोराडी येथील देवीच्या दर्शनाला जाणार होते. त्यांच्यासोबत गोपीबाई ‘ाा चेतनला घेऊन जाणार होत्या. त्याची माहिती रात्रीच अन्नाजीला दिली होती. त्यामुळे अन्नाजी हा गोपीबाईवर रागावलेला होता. दरम्यान पहाटे तीन वाजेच्या सुमारास सर्वजन झोपेत असताना अन्नाजीने गोपीबाईच्या मानेवर कुर्हाडीचे घाव घातले. त्यामुळे गोपीबाई किंचाळली असता चेतन झोपेतून उठला. त्यानंतर चेतनही किंचाळून दरवाजा उघडून बाहेर पळण्याचा प्रयत्ना करीत असताना अन्नाजीने त्याच्यावरही कुर्हाडीने वार केला. कुर्हाडीच्या घावाने दोघेहीजण जागीच ठार झाले. गोपीबाई आणि मुलाच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून शेजारचा अमित गणेश भगत (२५) आणि त्याच्या घरातील सदस्य उठले. त्यांनी गोपीबाईचा दरवाजा ठोठावला असता अन्नाजीने दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच अमित हा घरात शिरला असता त्याला गोपीबाई आणि चेतन जमीनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते आणि अन्नाजीच्या हातात कुर्हाड होती. अन्नाजी अशात अवस्थेत घराच्या उंबरठ्यावर बसून काही वेळ बसून होता. त्यानंतर अमितने ताबडतोब जरीपटका पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून खुनाचा गुन्हा नोंदविला आणि अन्नाजीला अटक केली. गोपीबाईच्या मुली, जावई आणि चेतनचे आईवडिल रात्री उशीरा नागपुरात पोहोचले. तोपर्यंत त्यांचे मृतदेह मेयो रुग्णालयाच्या शवविच्छेदन केंद्रातच पडून होते.
चंद्रपूर दारूबंदीचा निर्णय एका महिन्यात

चंद्रपूर दारूबंदीचा निर्णय एका महिन्यात

चंद्रपूर - राज्य शासनाने चंद्रपूर जिल्हा दारूबंदीची घोषणा केली. त्यानंतर येथील जिल्हा लिकर असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. 16) सुनावणीदरम्यान दारूबंदी निर्णयाला स्थगिती देण्यास नकार देत एका महिन्यात या संदर्भात निर्णय घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाला दिले. त्यामुळे दारूबंदीचा चेंडू आता उच्च न्यायालयात पोहोचला.

चंद्रपूर जिल्हा दारूबंदीची घोषणा करून 1 एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. शासनाच्या या निर्णयाविरोधात चंद्रपूर जिल्हा लिकर असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात उच्च याचिका दाखल केली. तथापि, उच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली नाही. त्यामुळे लिकर असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र, या संदर्भातील सुनावणी दोन-तीन महिने लांबणीवर गेल्याने दारूविक्रेत्यांसह जिल्ह्यातील जनतेचे न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष लागले होते. शुक्रवारी दारूबंदी याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या वेळी ऍड. सुब्रमण्यम यांनी जिल्हा लिकर असोसिएशनची बाजू मांडली. न्यायालयाने दारूबंदी निर्णयाला स्थगिती देण्यास नकार देत या संदर्भात एका महिन्यात निर्णय घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाला दिले.

Thursday, October 08, 2015

 नातीसमोरच आजीची हत्या

नातीसमोरच आजीची हत्या

नागपूर-  घरात चिमुकल्या नातीसोबत असलेल्या एका आजीची अज्ञात मारेकर्‍याने गळा आवळून हत्या केली. ही अंगावर शहारे आणणारी घटना प्रतापनगर पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्‍या तात्या टोपे नगरातील प्लॉट नं. २६ गुरुकृपा अपार्टमेंट येथे बुधवार ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास घडली.
वसुंधरा आनंद बाळ (वय ६९ वर्षे) रा. तात्या टोपेनगर असे मृत आजीचे नाव आहे. नीरीत शास्त्रज्ञ म्हणून कार्य केलेल्या डॉ. आनंद बाळ यांच्या त्या पत्नी होत्या. डॉ. आनंद बाळ यांच्या निधनानंतर वसुंधरा बाळ या त्यांचा मुलगा आदित्य आनंद बाळ, सून नीलम आदित्य बाळ व ९ महिन्याची आद्या नावाच्या नातीसोबत गुरुकृपा अपार्टमेंटमध्ये राहत होत्या. त्यांचा दुसरा मुलगा पत्नीसह मुंबईत राहतो. तर आदित्य बाळ हा बुटीबोरी येथील एका खाजगी कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. तर त्याची पत्नी नीलम ही मारुती सेवा शोरूममध्ये नोकरी करते. घटनेच्या दिवशी नेहमीप्रमाणे आदित्य आणि त्याची पत्नी कामावर निघून गेले. त्यावेळी घरी वसुंधरा आनंद बाळ आणि त्यांची नात उपस्थित होती. चिमुकली नात नेहमीच आजीला आवडती होती म्हणून वसुंधरा बाळ तिच्यासोबत खेळत मग्न व्हायच्या. बुधवारला सकाळी १०.१५ च्या सुमारास आदित्य बाळ यांच्याकडे घरकाम करणारी शीला इंगळे आली. तेव्हा घराचा दरवाजा बंद होता. तिने आवाज दिला परंतु घरातून कोणीही प्रतिसाद दिला नाही. म्हणून शीलाने ग्रीलमधून हात टाकला आणि दरवाजा उघडला. आता नेहमीचेच घर असल्याने शीला बिनधास्त घरात घुसली आणि आता काम करायचा विचार करीत होती. पण आत गेल्यावर वसुंधरा बाळ किचनरूम ते बेडरूमच्या पॅसेजमध्ये निपचित पडून दिसल्या. तर चिमुकली नात आजीला अशी निपचित पडल्याचे पाहून ओक्साबोक्सी रडत असल्याचे दिसले. ते दृश्य पाहून शीलाच्या पायाखालची जमीनच सरकली आणि भेदरलेल्या अवस्थेत तिने आजूबाजूच्या लोकांना बोलावले. तातडीने बाळ यांच्या फॅमिली डॉक्टरला सांगण्यात आले. तेव्हा प्रतापनगर पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली.

Friday, October 02, 2015

विकासकामावरून भाजपा-कॉंग्रेस आमने-सामने

विकासकामावरून भाजपा-कॉंग्रेस आमने-सामने

राजुरा शहरातील समस्या व विकास कामावरून आजी-माजी आमदारांत आरोप प्रत्यारोप बघायला मिळत आहे. शहर कॉंग्रेस कमेटी व राजुरा भारतीय जनता युवा मोर्चाने लावलेल्या बॅनरमुळे सध्या शहरात राजकीय वातावरण  तापले आहे.

शहर कॉंग्रेस कमेटीने काही दिवसांपूर्वी शहरात ‘कुठे नेऊन ठेवलाय राजुरा माझा?’ या शिर्षकाखाली शहरातील समस्यांना वाचा फोडली आहे. त्यामध्ये ‘पावसाचा थेंब जमिनीवर पडत नाही, तर लाईट जाते, झाडाच पान हालत नाही, तरी लाईट जाते’, ‘राजुरा ते बामणी फक्त ७ कि. मी. रस्ता परंतु सध्या तो इतका सुंदर आहे, की तो पार करायलाच अर्धा तास लागतो’, ‘वर्धा नदीवरील पूल, तर सध्या तेथील खड्ड्यांमुळे स्विमिंग पूल झाला आहे, मासे नदीत राहण्याऐवजी त्या पुलावरील खड्ड्यातच राहतात’, ‘रेल्वे ओवरब्रिज, तर विचारूच नका पूल बनवत आहे, की जगातल आठवा आश्‍चर्य हेच कळत नाही’, अशा वेगवेगळ्या विषयांना घेऊन शहरात महत्त्वाच्या चौकांमध्ये हे बॅनर लावले आहेत. कॉंग्रेसने या विविध समस्यांवर केलेल्या टिकात्मक प्रश्‍नांना भाजयुमोनेही बॅनरच्या माध्यमातूनच चोख उत्तर दिले आहे. त्यावर माजी आमदारांच्या कार्यकाळात त्यांनी खर्च केलेल्या ५०० कोटींच्या निधीवर आक्षेप घेतला आहे. ‘५०० कोटी खर्च केले असते, तर रस्त्याची ही हालत झाली नसती’ या शिर्षकाखाली चक्क माजी आमदारांच्या विकासकामांना आव्हान दिले आहे. राजुर्‍याची वाढती विज पुरवठ्याची मागणी लक्षात घेता फक्त राजुरा शहरासाठी वेगळे विद्युत केंद्र उभे केले असते, विद्युत अधिकारी व कर्मचारी दिले असते, तर वार्‍याने लाईन गेली नसती, असा टोला लगावला आहे. रस्ते दुरुस्ती व विजेची कामे आम्ही अवश्य करू असेही या बॅनरमध्ये नागरिकांना आश्‍वासन देण्यात आले आहे.

जेथे कॉंगेसने बॅनर लावले आहे, तेथे भाजपानेही आपले बॅनर लावले आहे. त्यामुळे बॅनरच्या माध्यमातून आजी-माजी आमदार आमने-सामने आल्याचे चित्र दिसत आहे. माजी आमदार सुभाष धोटे यांनी राजुरा शहर विकासासाठी १०० कोटींचा निधी २००९ ते २०१४ मध्ये खर्च केल्याचा दावा केला आहे. यामध्ये प्रामुख्याने ६६६ कुटुंबीयांना घरकुल मंजूरी, राजुरा-बल्लारपूर मार्गावरील रेल्वे उड्डाणपूल, राज्य सरोवर व संवर्धन योजनेंतर्गत न. प. राजुरा तलाव सौंदर्यीकरण, वनोद्यान सौंदर्यींकरण, प्रशासकीय इमारत बांधकाम, मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह बांधकाम, सोमेश्‍वर मंदिराचे जतन व दुरुस्ती, ११ खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, राजुरा शहराच्या विविध विकासकामांकरिता कोट्यवधीचा निधी तसेच राजुरा विधानसभेत ५०० कोटी निधींचा खर्च एवढे विकासकामे पाठिशी असूनही राजुरा विधानसभेत कॉंग्रेसला दुसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्या तुलनेत राजुरा विधानसभेत पहिल्यांदा सत्तेत आलेल्या भाजपाची कासवगतीने विकासकामांकडे वाटचाल होत आहे. कामांना गती देण्याचे आश्‍वासन पूर्णत्वास नेण्याचे आमदार ऍड. संजय धोटे यांचे म्हणणे आहे. सध्या शहरात मोठ्या प्रमाणात समस्या आहेत, त्यात कॉंग्रसने केलेल्या दाव्यात काही अंशी सत्यता असली तरी पहिल्यांदा सत्तेत आालेल्या भाजपाने या सर्व समस्या दूर करण्याचे आश्‍वासन दिले आहे.

एकूणच राजुरा विधानसभेत माजी आमदार सुभाष धोटे यांच्या विकासकामांचा झंझावात असताना अचानक सत्ता परिवर्तनानंतर समोर आलेल्या समस्यांमुळे रंगलेली ‘पोस्टर’वॉर सध्या शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. दुसरीकडे नुकत्याच सत्तेत आलेल्या भाजपाने कासवगतीने केलेली सुरुवात कॉंग्रेसच्या रडारवर आहे. त्यामुळे पुढेही अशीच ‘पोस्टर’वॉर मोठ्या प्रमाणात रंगणार असल्याची चर्चा शहरात जोमाने सुरू आहे.

Tuesday, September 22, 2015

 शरद पवार दौरा

शरद पवार दौरा

  • राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार दौरा
सकाळी नऊ वाजता मुकुल वासनिक यांच्या घरी भेट, 9.45 ला काटोल तालुक्‍यातील हातला गावातील जुनघरे यांच्या संत्रा बगीच्याला भेट, साडेबारा वाजता हॉटेल रेडिसनमध्ये संपादकांसोबत चर्चा, दुपारी तीन वाजता यवतमाळला रवाना

  • पाण्याच्या वादातून युवकाचा खून @नरसाळ्यातील घटना

  • सुमोच्या धडकेत दोघे दुचाकीस्वार ठार उमरेड-धुरखेडा मार्गावरील घटना 
  • सेलचा स्फोट झाल्याने तीन वर्षीय मुलगा ठार शहजाद जावेद अली शेख (रा. शिवकृष्ण धाम सेक्‍टर, कोराडी)
  • भीषण कार अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू - वर्धा मार्गावरील घटना
  • सीबीएसई, आयसीएसई, आयबी @ शाळांमध्येही पायाभूत चाचणी
  • भूषण शिंगणे सुधार प्रन्यासचे नवे विश्‍वस्त 
  • "ए' पॉझिटिव्ह रुग्णाला "बी'चे रक्त - गोंदिया जिल्हा रुग्णालयातील प्रकार 
  • विद्यार्थ्यांना प्रश्‍नपत्रिकेची झेरॉक्‍स - गणिताचे पेपर मिळालेच नाही पायाभूत चाचणीत तुटवडा
  • कळमेश्‍वरात आज ऍग्रोवनतर्फे शेतकरी चर्चासत्र 
  • जरीपटक्‍यात आढळला मोठा शस्त्रसाठा 

Sunday, September 20, 2015

  • ग्रामविकास अधिकारी, कनिष्ठ अभियंता निलंबित 
        दलित वस्तीतील सिमेंट नाली बांधकामातील गैरप्रकार
  • गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पुढील वर्षाअखेर - विभागीय आयुक्त अनुपकुमार 
  • वनविभागाच्या प्रमुखपदी प्रधान मुख्य वनसंरक्षक ए. के. निगम
  • मिशन रक्षक' अभियानास प्रारंभ 
  • काटोल फेस्टिव्हलमध्ये तनिष्कांचे "संस्कृती दर्शन' ठरले लक्षवेधी
  • चौराई धरण ठरणार पेंचला धोकादायक 
  • जुलै 2016 पासून पाणी अडणार : सिंचन, वीज प्रकल्पाचे होणार नुकसान 
  • डॉ. प्रकाश खरात यांच्या यशोधरा कादंबरीचे प्रकाशन
  • डॉ. आंबेडकर स्मारक समितीच्या अध्यक्षपदावर भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई
  • केवळ साडेतीन हजार गावांची पैसेवारी कमी 
  • स्मार्ट सिटी : आराखडा नोव्हेंबरअखेर केंद्राकडे 

Saturday, September 19, 2015

 घरोघरी महालक्ष्मीचे आगमन व स्वागत

घरोघरी महालक्ष्मीचे आगमन व स्वागत

  • शनिवारी (ता. 19) घरोघरी महालक्ष्मीचे आगमन व स्वागत 
  • नागपूर पोलिसांचे आता "मिशन रक्षक' 
  • मुलींना सक्षम बनविण्यासाठी आणखी एक पाऊल 
  • शेतकरी आत्महत्या पात्रतेच्या निषकांचे अध्यादेशच नाही
  • एक हजार 481 प्रकरणे मदतीला मुकले 
  • पुण्यातील दाम्पत्याच्या अडीच कोटींच्या फसवणूकप्रकरणी 
  • गुन्हे शाखेच्या आर्थिक शाखेने आरोपी कंपनीमालकाच्या सलून आणि घरी "सर्च' 
  • नोकरीसाठी फसगत झाल्याने आत्महत्या 
  • ठकसेनाने विकली ग्रामीण पोलिसांच्या जमीन
  • घोटीटोक येथे पोटच्या मुलीवरच बापाने केला अत्याचार
  • धापेवाडा, घुरखेडा, उमरेड, पिपळा येथे जुगारअड्ड्यांवर 
  • पोलिसांनी छापा घालून 29 जणांना अटक
  • बोलेरोच्या धडकेत तरुण जखमी मौदा येथे वीज प्रकल्पात मुलाखतीला जाताना अपघात 
  • शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू अध्यापक विद्यालय प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप
  • दहेगाव परिसरात युवकाचा मृतदेह हत्या झाल्याचा कुटुंबीयांना संशय 
  • येरखेड्यातील नाली बांधकामात गैरप्रकार दलित वस्तीतील बांधकाम पूर्ण न करता दिले दाखले 
  • विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे आज आंदोलन

Friday, September 18, 2015

उत्साहात बाप्पांचे आगमन

उत्साहात बाप्पांचे आगमन

  • रिमझिम पावसात आणि आभाळभर उत्साहात बाप्पांचे आगमन 
  • ध्वनी, वायू प्रदूषण केल्यास कारवाई, फटाके, आतषबाजीवर विघ्न
  • चोरीची वीज नको रे बाप्पा! विशेष पथक करणार देखरेख 
  • बाप्पासाठी चॉकलेट मोदक, मिठाईची दुकाने सजली
  • पूर्व विदर्भातील जलसाठे 73 टक्केच भरले
  • परतीच्या पावसाचा पिकांना दिलासा 
  • नासुप्र विश्‍वस्तपदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच 
  • मधुमेहतज्ज्ञ आणि सुनील डायबिटीज केअर ऍण्ड रिसर्च सेंटरचे डॉ. सुनील गुप्ता यांना दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार 
  • गजानन महाराज मानसपूजा व्हीसीडीचे आज लोकार्पण

Thursday, September 17, 2015

नागपूर बातम्या

नागपूर बातम्या

- इसासनी टेकडी परिसरात शाळकरी मुलीचा गळा आवळून खून
प्रेमसंबंधातून घडले हत्याकांड ः आरोपीला अटक

- अंबाझरीतील गॅंगवॉर, खुनाचा प्रयत्न गुन्ह्यात "वॉंटेड' दोन आरोपींना अटक

- रेल्वेत चढताना कोसळून तिकीट निरीक्षकाचा मृत्यू

सरकारी धोरणांमुळे हार्डवेअर इंडस्ट्रीचे नुकसान - नारायण मूर्ती

डीजीसीए, एएआयकडून अधिकाऱ्यांची चौकशी -
विमानतळावरील राष्ट्रपती सुरक्षा प्रकरण कर्मचाऱ्यांवर भोवणार

"नाम फाउंडेशन'चे विदर्भातील प्रतिनिधी नियुक्त
अधिकृत खात्यात मदत भरावी ः नाना, मकरंद यांचे आवाहन

आनंदवन येथील कुष्ठरोगी, मूकबधिर व अंध कलावंतांचा शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता सिव्हिल लाइन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृह येथे "स्वरानंदवन'

अजनी ते प्राईड "टू टायर एलिव्हेटेड' उड्डाणपूल
सोमलवाड्यात दुसऱ्या माळ्यावर रेल्वेस्थानक

Wednesday, September 16, 2015

पोलिस ठाण्यांना ऑनलाइन न्यायालयांशी जोडणार

पोलिस ठाण्यांना ऑनलाइन न्यायालयांशी जोडणार

मुख्यमंत्री फडणवीस ः राज्यपालांच्या हस्ते सीसीटीएनएस प्रकल्पाचे लोकार्पण

नागपूर-  राज्यातील पोलिस ठाण्यांसह न्यायालये आणि कारागृहांना सीसीटीएनएस प्रकल्पांशी जोडण्यात येणार असून, यामुळे गैरप्रकाराला आळा बसेल, गुन्हेगारांवर वॉच ठेवणे सोपे जाईल, झटपट निकाल लागेल तसेच नागरिकांना ऑनलाइन तक्रार नोंदवता येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
नागपूर बातम्या

नागपूर बातम्या

  • पतीचे निधन झाल्यामुळे पतीच्या विरहात पत्नीची  
  • गळफास घेऊन आत्महत्या - अनिता कन्हैयालाल शाहू (वय 32, रा. गुरू तेजबहाद्दूरनगर) 
  • वाहन निरीक्षकाला ऑटोरिक्षा चालकाकडून धमकी 
  • बुद्धपत्नी यशोधरेचा संघर्ष मराठीतून! - डॉ. प्रकाश खरात यांची कादंबरी 
  • आनंदवन आदर्श "स्मार्ट खेडे'! - विकास आमटे, नागभूषण पुरस्कार प्रदान 
  • विदर्भात तीन दिवस मुसळधारेचा इशारा
  • पोलिस ठाण्यांना ऑनलाइन न्यायालयांशी जोडणार - मुख्यमंत्री फडणवीस
  • उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील भ्रमणमार्गाच्या अभ्यासासाठी "जय' वाघाला लावली "रेडिओ कॉलर' 
  • सफाई कामगारांसाठी लवकरच महामंडळ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • शैक्षणिक संस्थांनी उद्योजक घडवावे - राष्ट्रपती प्रणब मुखर्जी
  • माजी मंत्री देशमुख यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट , रजत जयंती समारोहासाठी दिले आमंत्रण
  • संशयित माओवादी मारोती कुरवटकरच्या अटकेप्रकरणी पोलिसांना नोटीस
आनंदवन 160 कोटींची उलाढालीचे आदर्श "स्मार्ट खेडे'!

आनंदवन 160 कोटींची उलाढालीचे आदर्श "स्मार्ट खेडे'!

डॉ. विकास आमटे यांना  नागभूषण पुरस्कार प्रदान

नागपूर-   एकेकाळी माझ्या आईने काढलेले गाईचे दूधही तुच्छ मानले जायचे, अशा कुष्ठरोग्यांच्या आनंदवनात आज वर्षाला दीड कोटी रुपयांच्या दुधाची विक्री होते. देशातील सर्वांत मोठा बायोगॅस प्रकल्प येथे आहे. याच ठिकाणी 139 उद्योग चालतात आणि 160 कोटींची उलाढाल वर्षाला होते. आनंदवन आज आदर्श "स्मार्ट खेडे' म्हणून उदयास आले, अशा भावना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विकास आमटे यांनी व्यक्त केल्या.
नागभूषण फाउंडेशनच्या वतीने डॉ. विकास आमटे यांना आज नागभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. शंकरनगर येथील श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला केंद्रीय रासायनिक खते मंत्री हंसराज अहीर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. माजी खासदार दत्ता मेघे अध्यक्षस्थानी होते. यावेळी माजी न्यायमूर्ती व्ही. एस. सिरपूरकर, प्रसिद्ध उद्योजक प्रभाकरराव मुंडले, फाउंडेशनचे प्रमुख गिरीश गांधी यांची उपस्थिती होती.
विकास आमटे म्हणाले, आनंदवन स्वेच्छा तुरुंग आहे आणि तुरुंगाच्या जेलरला कधीही पुरस्कार मिळत नसतो. बाबांनादेखील पुरस्कार आवडायचे नाहीत. त्यांनी पद्मश्री आणि पद्मभूषणही परत केले. हा पुरस्कार नाकारणे देशद्रोह मानला जातो, म्हणून बाबा गेल्यावर त्यांना सोमनाथ चटर्जी वगळता कुणीही श्रद्धांजली अर्पण केली नाही. ते सामान्य नागरिक होते. पण, सामान्यांतील असामान्य व्यक्तिमत्त्वही होते. "आमटे भामटे' अशी अवहेलना करणारेच नंतरच्या काळात बाबांपुढे नतमस्तक झाले. पण, कुष्ठरोग्यांना जगण्याचा अधिकार देणारे बाबा आनंदवन ही जगातील सर्वांत वाईट जागा मानायचे. गावसकर, कपिल देव, सचिन यांची ओळख क्रिकेट आहे, तशीच बाबा आमटे यांची ओळख महारोग अशी झाली, अशी खंत बोलून दाखवतानाच त्यांच्या इतर कामांकडे कधीही कुणीच लक्ष दिले नाही, असेही ते म्हणाले. यासोबतच हा पुरस्कार आनंदवनासाठी अहोरात्र झटणाऱ्यांच्या वतीने स्वीकारत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हंसराज अहीर यांनी आनंदवनातील प्रकल्प देशात राबविण्यासारखे असल्याचे म्हटले. सिरपूरकर म्हणाले, विकास आमटे हे बाबा आमटे यांचे प्रतिरूप आहे. हिमालयाची उंची गाठणाऱ्या बाबा आमटेंचा मुलगा होण्याचे सामर्थ्य विकास यांनी योग्य पद्धतीने पेलले आहे. दत्ता मेघे यांनी विकास आमटेंमुळे पुरस्काराचे महत्त्व वाढल्याचे सांगितले. यावेळी सुरेश शर्मा, डी. आर. मल, किशोर अग्रवाल, सत्यनारायण नुवाल यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. संचालन शुभदा फडणवीस यांनी केले.

Saturday, September 12, 2015

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबाला मदत

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबाला मदत


मौदा तालुक्यातील (जि. नागपूर ) निहारवाणी येथील देवराव तुलाराम दंढारे वय 38 वर्ष या युवा शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज व नापिकीमुळे कंटाळून राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना सोमवार ता. 7 ला घडली. मृतकाची पत्नी चंद्रकला देवराव दंढारे यांना चंद्रपूर निवासी श्री शशिकांत गोपाळकृष्ण आक्केवार यांनी पोळ्याच्या दिवशी आर्थिक मदत केली 

Wednesday, September 09, 2015

पोलीस उपनिरीक्षकासह सहा पोलीस निलंबित

पोलीस उपनिरीक्षकासह सहा पोलीस निलंबित

रोहीत बोथरा मारहाण प्रकरण
चंद्रपूर : एका निरपराध व्यापारी युवकाला अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप दिवाण यांनी एक पोलीस उपनिरीक्षक व पाच पोलीस शिपायांना सोमवारी निलंबित केले, तर मारहाण करताना उपस्थित असलेले स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी निरीक्षक सुधाकर अंभोरे यांना घुग्घूस येथे पूर्वपदावर रवाना करण्यात आले.
विशेष म्हणजे अंभोरे हे घुग्घूस पोलीस ठाण्याचे निरीक्षक होते. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रभाकर टिक्कस यांना नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी रवाना करून त्यांचा प्रभार घुग्घूसचे पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांना देण्यात आला होता. चंद्रपुरातील व्यापारी रोहीत बोथरा हा ३१ ऑगस्टच्या रात्री इंडिका कारने चिमूर येथून व्यापारातील वसुली करून चंद्रपूरकडे परत येत असताना घोडपेठलगत एका क्रमाक नसलेल्या वाहनातील विना गणवेशधारी पोलिसांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला होता. मात्रते लुटारू असावेत, अशा भितीने रोहीत वेगाने चंद्रपूरकडे निघाला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा सिनेस्टाईल पाठलाग सुरू केला. काही ठिकाणी अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र रोहीतने भितीपोटी आपल्या वाहनाचा वेग वाढवत कसेबसे चंद्रपूर गाठले व सुरक्षेच्या दृष्टीने तो रामनगर पोलीस ठाण्याकडे निघाला. मात्र वाहतूक नियंत्रण कार्यालयासमोर काही पोलीस शिपाई दिसल्याने त्याला धीर आला. त्याने लगेच तेथे आपले वाहन थांबविले. मात्र याचवेळी विना क्रमांकाच्या टाटासुमोतून उतरलेल्या पोलीस कर्मचार्‍यांनी रोहीतला वाहनाखाली ओढून बेदम मारहाण सुरू केली. त्यानंतर त्याला फरफटत वाहतूक नियंत्रणकार्यालयातील संगणक कक्षात नेऊन पुन्हा बेशुद्ध होईस्तोवर मारहाण केली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक महेंद्र इंगोले यांनी रोहीतला पायातील बुटाने अक्षरश: चेपले. हा प्रसंग अंगावर काटे आणणारा होता. इंगोलेंच्या मारहाणीत रोहीतच्या कानाचा पडदा फाटला.

Friday, September 04, 2015

पारशिवनी तालुक्‍यात पाच ठार

पारशिवनी तालुक्‍यात पाच ठार

अस्थिविसर्जनासाठी रामटेककडे जाणाऱ्या मध्य प्रदेशातील प्रजापती कुटुंबीयांवर काळाने घाला घातला. दहेगाव फाटा येथे ट्रक व जीपच्या अपघातात या कुटुंबातील दोन चिमुकल्यांसह महिलेचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत सावळी येथे गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास दुचाकी व जीप अपघातात दोन जण जागीच ठार झाले, तर एक गंभीर जखमी झाला. मृतात भारत सरीले, भूमेश्‍वर सरीले या दोघा भावंडांचा समावेश आहे.

Tuesday, September 01, 2015

चंद्रपूर मेडिकल कॉलेजचा दुय्यम मुकाबला

चंद्रपूर मेडिकल कॉलेजचा दुय्यम मुकाबला

चंद्रपूर मेडिकल कॉलेजचा दुय्यम मुकाबला

देवनाथ गंडाटे
अनेक वादविवादानंतर चंद्रपूर मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळाली. त्यासाठी लागणाऱ्या सुविधांची पूर्तता करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न झाले आणि एक सप्टेंबर हा दिवस चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांसाठी "मेडिकल दिन' ठरला. या बहुप्रतिक्षीत वैद्यकीय महाविद्यालयाला एक सप्टेंबरला प्रारंभ झाला.
महाविद्यालय सुरू होण्यापूर्वी अनेक नाट्यमय घडामोडी झाल्या. गेल्या चार-पाच वर्षांत या मेडिकल कॉलेजसाठी अनेक पक्षांनी प्रयत्न केले. माजी खासदार नरेश पुगलिया यांनी आधीपासूनच प्रश्‍न लावून धरला होता. प्रहारचे प्रदीप देशमुख यांनीही विविध आंदोलने, उपक्रमाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले. तात्पूर्ती मंजूरी जेव्हा मिळाली होती, तेव्हा कॉलेज कुठे असावे, यावरून वाद सुरू झाला होता. भलेही कॉलेज चंद्रपुरला होणार होते. पण, ते पूर्वेला की दक्षिणेला यावरूनच "भूवाद' रंगला. काहीजण दाताळा मार्गावरील जागेसाठी हट्ट धरून होते. काहीजण वनराजीक महाविद्यालयाच्या जागी, तर काही बल्लारपूर मार्गावरील डम्पिंग यॉर्डच्या जागेला पसंती दिली होती.
सर्वांच्या प्रयत्नांना यश आले असतानाच निकष पूर्ण होत नसल्याचे कारण पुढे करून वैद्यक अधिकाऱ्यांनी नामंजुरी दिली. तेव्हा मेडिकलची आशाच मावळली. त्यामुळे कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांना न्यायालयाची पायरी चढावी लागली. अखेर न्याय मिळाला. जो तो श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, सत्य कुठे लपत नाही, हेदेखील स्पष्ट झाले. आता मेडिकल कॉलेज प्रत्यक्षात सुरू झाले आहे. मेडिकल कॉलेजचे बारसे व्हावे, असे अनेकांना वाटते. त्यासाठी अनेक पुढाऱ्यांची नावे पुढे येत आहे. त्यामुळे नामकरणाचा वाद पुढे येण्याची शक्‍यता आहे. काहींना माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार, राणी हिराई, फुले- आंबेडकर, सावित्रीबाई फुले, तर काहींनी संताजी जगनाडे महाराजांचे नाव रेटून धरले. प्रत्येक नामामागे अनेकांच्या भावना, आदर आणि प्रेम जुळला आहे. त्यामुळे अनेक नावातून एक नाव निश्‍चित करताना काहींच्या भावना दुखावतील.त्यावर सामूहिक भावनेचा आदर जोपासण्याची गरज आहे. अन्यथा मेडिकलवरून दुय्यम मुकाबला होईल. त्यामुळे चंद्रपूर मेडिकल कॉलेज हेच नाव संयुक्तिक ठरेल, असेही वाटते. 
 जोगी दाम्पत्याचा खून

जोगी दाम्पत्याचा खून

चंद्रपुर – नांदा फाटा येथील प्रतिष्ठित समाजसेवक गुरुदेव मंडळ चे अध्यक्ष डॉ. जोगी व त्यांची पत्नी यांचा राहत्या घरी खून झाल. कोरपना तालुक्यातील नांदा फाटा येथील डॉ जोगी व त्यांच्या पत्नी यांचा सोमवारी रात्री च्या सुमारास काही अज्ञात आरोपींनी खून केला.
मंगळवारी सकाळी या घटनेची माहिती मिळताच डॉ जोगी यांच्या घरासमोर बघ्यांनी गर्दी केली पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ताबडतोब त्यांनी घटनास्थळ गाठले व तपास सुरु केला
घरातील अस्त व्यस्त सामान बघता पैश्याच्या व्यवहाराने किंवा चोरीच्या घटनेने हा खून झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे
औरंगाबाद शहराचे नाव बदलण्यास नाथाभाऊचा पाठिंबा

औरंगाबाद शहराचे नाव बदलण्यास नाथाभाऊचा पाठिंबा

मुंबई दि.१ सप्टेंबर :- सन १९९५ ते १९९९ या कालखंडात भाजपा-शिवसेना युतीचे शासन महाराष्ट्रात सत्तेवर असतांना औरंगाबाद या शहराचे संभाजीनगर असे नामकरण करण्याचा प्रस्ताव संमत करण्यात आला होता. याबाबतीत औरंगाबाद येथे उच्च न्यायालयाच्या खंडपीठात खटला दाखल करण्यात आला होता. नंतर राज्यात काँग्रेस पक्षाचे शासन सत्तेवर आले असतांना त्यांनी हा खटला मागे घेतला. त्यामुळे युती शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकली नाही. औरंगजेब हा अत्यंत जुलमी, अन्यायी आणि अत्याचार करणारा मोगल होता. अशा जुलमी राजाचा आदर्श राज्यातील जनतेपुढे नसावा म्हणुन औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामकरण करण्याला माझा पूर्ण पाठींबा आहे, असे स्पष्ट मत राज्याचे महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज मंत्रालयात प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना व्यक्त केले.

एका प्रश्नाला उत्तर देतांना खडसे पुढे म्हणाले की, सर्वांना विचारात घेऊन एखाद्या शहराचे नाव बदलण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे. त्यासाठी केंद्राच्या परवानगीची आवश्यकता नाही. मात्र, अद्याप संभाजीनगर असे नाव बदलण्याची प्रक्रिया सुरु झालेली नाही. ही प्रक्रिया सुरु करावी व यासंबंधीचा ठराव मंत्रिमंडळासमोर आणावा, अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना करणार आहे. तसे झाल्यास हा प्रस्ताव जनतेला खुला होईल व त्‍यामुळे या प्रश्नासंदर्भात जनतेच्या अनुकूल आणि प्रतिकूल अशा दोन्ही प्रतिक्रिया आजमावता येतील, असे खडसे यांनी शेवटी सांगितले.

Saturday, August 29, 2015

अपंग मुलीला "शौचालय'ची रक्षाबंधन भेट

अपंग मुलीला "शौचालय'ची रक्षाबंधन भेट

चंद्रपूर : दोन्ही पायांनी अपंग असलेल्या एका मुस्लीम मुलीची व्यथा ऐकून चंद्रपूर महापालिकेचे माजी उपमहापौर आणि शिवसेना पदाधिकारी संदीप आवारी यांनी तिला स्वखर्चाने शौचालय बांधून दिले. एका मुस्लिम बहिणीचे खऱ्या अर्थाने रक्षण करून "या' भावाने रक्षाबंधनाची आगळीवेगळी भेट दिली आहे.

येथील इंदिरानगर भागात रुकसाना गनिशेख ही विधवा महिला मागील 22 वर्षांपासून वास्तव्यास आहे. दोन मुलींचा विवाह झाल्याने त्या सासरी आहेत. तर, उर्वरित दोन मुली आणि एक मुलगा तिच्याजवळ आहेत. कमरजहॉं.या 38 वर्षांच्या मुलीला जन्मापासूनच अपंगत्व आहे. त्यामुळे या मुलीच्या सर्व विधी आईलाच कराव्या लागत आहेत. या मुलीसाठी घरी शौचालय बांधावे असे वाटत होते. परंतु, घरची आर्थिक विवंचना आड येत होती. मुस्लिम समाजासाठी शौचालयाची कोणतीही योजना नसल्याचे सांगून सर्वांनीच हात वर केले.
पाच महिन्यांपूर्वी ही वृद्ध महिला पुन्हा महापालिकेत गेली. आयुक्तांना भेटली. पण नकारच मिळाला. त्यावेळी तेथे उपमहापौर असलेले शिवसेनेचे नेते संदीप आवारी पोहोचले. आयुक्तांनी त्यांना ही अडचण सांगितली. वृद्ध महिलेनेची करुण कहानी ऐकताच आवारी यांचं मन द्रवले. लगेच त्या महिलेला शौचालय स्वखर्चाने बांधून देण्याचा शब्द दिला. एरवी राजकारण्यांचा शब्द म्हणजे हवेतील तीर असतात. पण आवारी यांनी दिलेला शब्द पाळला. लगेच कंत्राटदारांशी संपर्क साधून बांधकामाला सुरवात करण्यास सांगितले. आज हे शौचालय बांधून तयार झाले आहे. त्यामुळे रुकसाना अतिशय भावुक झाली आहे. एका गरीब बहिणीच्या मदतीला देवदूत धावून आल्याची भावना त्यांच्या मनात आहे.
जातीपातीची बंधनं तोडून केवळ सामाजिक दायित्वाच्या भावनेतून केलेले आवारी यांचे हे कार्य निश्‍चितच प्रेरणादायी आहे. रक्षाबंधनाच्या औचित्यावर एका भावाने दिलेली ही भेट या निर्धन बहिणीसाठी लाखमोलाची ठरली. तिने आवारी यांना राखी बांधून आपली कृतज्ञता व्यक्त केली. मदत करणारे हात हिंदूंचे की मुस्लिमाचे, हे आपण पाहात नाही. मदत करणारा हा नेहमीच धर्माच्या पलीकडचा असतो, यावर या बहिणीचा विश्‍वास आहे. धर्मनिहाय गणनेवरून देशात विखारी चर्चा सुरू असताना या घटनेने त्यावर विराम घालण्याचा प्रयत्न केला आहे. एका छोट्याशा शहरातील ही छोटीशी घटना असली, तरी त्याचे मूल्य आणि महत्त्व सर्वव्यापी असेच आहे.

Wednesday, August 26, 2015

अशी गर्दी पुन्हा व्हावी!

अशी गर्दी पुन्हा व्हावी!

देवनाथ गंडाटे 
अशी गर्दी पुन्हा व्हावी, असे मला वाटते. पण, चांगल्या कामासाठी. अनेक तरुण मुलं अल्प पगारावर पत्रकार म्हणून काम करतात. कुटुंब पोसता येईल, इतकीदेखील रक्कम हाती येत नाही. कधी उसनवारी, तर कधी पोट मारून ही पोरं काम करतात. शिक्षण घेऊनही नोकरी न लागल्यानं या बातम्यांच्या ते धंद्याकडे वळले आणि कधी परत जाणार नाहीत, अशा दलदलीत येवून सापडलेत. आयुष्यभर दुसऱ्यांच्या पगारासाठी, किमान वेतनासाठी, तर कधी सेवानिवृत्ती, महागाई भत्ता, तर नक्षलभत्त्याच्या बातम्या मोठमोठ्या प्रकाशित करतात. पण, स्वत:च्या पगाराची अन्‌ सुविधांची मागणी कोणत्या पेपरात प्रकाशित होणार? की आयुष्यभर बातमी प्रकाशित करणे किंवा प्रकाशित न करण्याचेच पैसे घेत राहणार? जग स्मार्ट झालाय. ज्यांच्याकडे मोबाइल आला. तोदेखील पत्रकार झाला. तो आपली व्यथा सहजपणे आता जगापुढे मांडू शकतो. त्याला वाचकही मिळाला. पत्रकारितेचे विश्‍व बदलत आहे. बातम्यांची मार्केटींग, कामाची मार्केंटीग सुरू झाली. सामान्य माणूसदेखील स्मार्ट फोनच्या आधारे बातमी विकू लागला आहे. त्यामुळे सांगावेसे वाटते "जग बि घडलाय, तुम्ही बी घडाणा'. चंद्रपुरात निघालेला मोर्चा उर्त्स्फुत होता. अशी गर्दी पुन्हा व्हावी, ती आपल्या न्यायहक्‍कासाठी....

श्रमिक
पत्रकार विरुद्ध एल्गार
बापूजी ने कहा घर छोड दो, मां ने कहा पारो को छोड दो और पारो ने कहा दारू को छोड दो, हे वाक्‍य ऐकले की आठवतोय देवदास. मद्यपींना अनेक लेखकांनी वेगवेगळी नावे दिली. राम गणेश गडकरींनी त्याला तडीराम म्हटले. आमच्या गावाकडे हे दोन्ही शब्द नाहीत. पण, बेवडा म्हणतात. काहीजण दारुडे संबोधतात. शब्द काहीही असोत. नशा डोलणारीच असते. म्हणून देवदासमध्ये डोला रे... हे गाणं हिट झालं. पण, या दारुमुळे सारे बिघडले, तर काहींचे घडले. पिणारे, न पिणारे देखील नशेबद्दल मनसोक्त बोलतात. ज्यांनी आयुष्यात दारु प्राशन केली नाही, ते देखील दारुची नशा वाईट आहे, असे सांगतात. प्रत्येकांचा अनुभव वेगळा असलातरी जे सांगायचे ते सांगतात. देवदास हा मद्यपी. त्याला दारुपासून परावृत्त करण्यासाठी खटाटोप करणारी पारो. हे कथानक जरी चित्रपटातील असलेतरी परिणाम खऱ्याखुऱ्या आयुष्यातही दिसते. याच दारुपासून मुक्तता मिळविण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदीची मागणी रेटून धरल्यानंतर ती पूर्ण होईपर्यंत लढा देणाऱ्या श्रमिक एल्गारने "जया'चे श्रेय घेतले. ज्यांनी परिश्रम घेतले त्यांनी श्रेय घेतले. पण, आता दारुबंदीच्या पाच महिन्यांनी विदारक स्थिती निर्माण झाली. पहिल्या महिन्यात सिमारेषेवर झडती व्हायची. दारु पकडली जायची. कारवाई व्हायची. अवैध दारु नेणाऱ्यांत भिती निर्माण झाली. पण, आता कुणाला विचारल्यास, "भाऊ कोटी भेटते का गा.' तो सहज सांगतो, भेटत्ते काज्जी न. पण, एका निपले तिनशे रुप्पये. साऱ्यांचेच व्यवस्थित सुरू आहे. पण, ते लपून. आता ही दारु कोणी पकडून द्यावी आणि कोणाला पकडून द्यावी, हा प्रश्‍न आहे. कारण, ज्यांना पकडून दिली, ते गांधी नोट खिशात टाकून मोकळे होतात आणि ज्यांची पकडून दिली ते वैर करतात. मारण्याची धमकी देतात. पाहून घेण्याची भाषा करतात. मग, कशाला उगीचच कटकट.
चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून श्रमिक पत्रकार विरुद्ध श्रमिक एल्गार असा वाद रंगतोय. मला त्यात खोलवर बोलायचे नाही. पण, दोन्ही संघाना एकत्र केल्यास "श्रमिक पत्रकारांचा एल्गार' असा एकवाक्‍य होतो. वृत्तपत्रात बातमी छापून आली. ती खोटी आणि चुकीची असल्याचा एल्गारचा युक्तीवाद आणि बातमीवर पोलिसात तक्रार का दिली, हा पत्रकारांना आलेला राग. या वाद आणि रागातून मुकमोर्चा निघाला. जिल्ह्यातील शेकडो गावचे पत्रकार जिल्ह्याच्या ठिकाणी आले. खिशाला काळ्याफिती लावल्या. एल्गारविरुद्ध नारे दिले. चौथ्या स्तंभाला असलेल्या अधिकाराचा वापर वार्ताहराने केला आणि नागरिक म्हणून असलेला अधिकार एल्गारने वापरला. "कोण बरोबर, कोण चुक', हे आपणच ठरविले पाहिजे. जिल्ह्यात नवे पोलिस अधीक्षक आले. दारुबंदीवर आळा घालणे हा एकच उद्देश नव्या पोलिस अधीक्षकांना येथे आणण्याचा होतो, हे छातीठोकपणे सांगणे चुकीचे आहे. भलेही दारुबंदीचे आव्हान त्यांच्यापुढे होते. पण, केवळ दारु हाच एकच गुन्हेगारीतील विषय नाही. दारुबंदी झाल्यानंतरही दारु विकली जात असेलतर ज्या ज्या लोकांनी या यशस्वी लढ्याचे श्रेय लाटले असेल हा त्यांचा नाकर्तेपणा आहे का? की त्यांनीही आता दुसऱ्यावर खापर फोडावे.


बोगस पत्रकारांचा सुळसुळाट कधी थांबणार?
पत्रकार असल्याचे सांगून अधिकारी, कर्मचारी, तर कधी राजकीय पुढाऱ्याकडून पाचशे रुपये देखील घेणाऱ्या पत्रकारांची संख्या गावात कमी नाही. वस्तुस्थिती बघितली तर महिन्याला चारही अंक न काढणारा पत्रकार (स्वत:ला मालक समजून घेणारे) राज्यशासनाचा अधिस्वीकृती पत्र घेऊन फिरतो. एसटी बसमध्ये मोफत प्रवास करतो (आरक्षित आसनावर). विश्रामगृहात खोली बूक करतो आणि वाट्टेल ते रंगेल धंदे करतो, अशा बोगस पत्रकारांचा सुळसुळाट कधी थांबणार आहे. अशा निर्लज्ज प्रकारामुळे चांगल्या माणसांची मान शमनेनं खाली जात आहे, त्याचे काय? 
देहविक्रीच्या आर्थिक व्यवहारातून महिलेचा खून

देहविक्रीच्या आर्थिक व्यवहारातून महिलेचा खून

तरुणीसह दोघांना अटक : गोंडखैरी टोलनाक्‍याजवळ सापडला होता मृतदेह

कळमेश्‍वर : राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 वरील गोंडखैरी टोलनाक्‍याजवळ पाल पेट्रोलपंपाच्या विरुद्ध बाजूला नऊ ऑगस्ट रोजी 35 वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला होता. तपासांत मृतदेहाची ओळख पटली. राणू ऊर्फ सुरेखा देवेंद्र बोरकर असे तिचे नाव आहे. ती इंदोरा, जरिपटका, नागपूर येथील रहिवासी होती. तिचा खून झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. हा खून देहविक्री व्यवसायाच्या आर्थिक व्यवहार व व्यवसायातील चढाओढीतून झाल्याचे स्पष्ट झाले.
गोंडखैरी टोलनाक्‍याजवळ सापडलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेने वेगवेगळी पथके नेमली. सहायक पोलिस निरीक्षक अजबसिंग जारवाल व सहकाऱ्यांनी नागपूर शहर व आसपासच्या परिसरात महिलेच्या फोटोच्या साहाय्याने शोध घेतला. वाडी येथे मृत महिलेचा मानलेला भाऊ सावन ऊर्फ भारत याने बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती. त्यात तिचे नाव राणू ऊर्फ सुरेखा देवेंद्र बोरकर असल्याचे उघड झाले. ओळख पटल्यानंतर मृत महिला सुरेखा हिच्या जवळच्या नातेवाइकांचा शोध घेण्यात आला. सायबर सेलचे नायब पोलिस शिपाई अजय तिवारी यांनी अधिक माहिती मिळविली. त्यात सुरेखा बोरकर हिची मैत्रीण पद्मा (काल्पनिक नाव) व तिचा प्रियकर राहुल टाके (रा. कळमेश्‍वर ह. मु. दाभा, वाडी) यांचा घटनेत संबंध असल्याचे उघड झाले. देहव्यापाराच्या आर्थिक वैमनस्यातून सुरेखा व पद्मा यांच्यात शाब्दिक बाचाबाची होऊन ताणतणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी पद्मा व राहुल यांची वैयक्तिक माहिती संकलित केली. त्यांचा मूळ निमजी, फेटरी व सध्या राहत असलेल्या वाडी येथील आंबेडकरनगर, दाभा या परिसरात तपास करण्यात आला. घटनेनंतर दोघेही नागपुरात असल्याचे कळले. राहुल टाके याची मानलेली बहीण निर्मला राऊत (रा. सावनेर) यांच्या संपर्कात राहुल व पद्मा असल्याचे समजले. याच माहितीच्या आधारे सहायक पोलिस निरीक्षक अरविंद सराफ हे पथकासह 24 ऑगस्ट रोजी सावनेरला गेले. निर्मला राऊत यांना विश्‍वासात घेऊन त्यांच्याकडून पद्मा व राहुल संदर्भात माहिती घेतली. तेव्हा ते दोघेही मालीपुरा (ता. आश्‍टा, जि. सिहोर, मध्य प्रदेश) येथे राहत असल्याचे समजले. मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने राहुल व पद्मा यांचा शोध घेण्यात आला. तेव्हा आष्टा येथील जगन्नाथ नारायणसिंह मेवाडा (वय 60) यांच्या घरी ते वास्तव्यास असल्याचे समजले. निवासस्थानी छापा घालून पद्मा व राहुल यांना ताब्यात घेतले. देहविक्री व्यवसायाच्या आर्थिक व्यवहार व व्यवसायातील चढाओढ या द्वेषापोटी खून केल्याची त्यांनी कबुली दिली.
पोलिसांनी राहुल व त्याची प्रेयसी पद्मा या दोघांनाही ताब्यात घेतले आहे. पुढील तपास कळमेश्‍वर पोलिस करीत आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक सतीश गोवेकर, सहायक पोलिस निरीक्षक अजबसिंग जारवाल, अरविंद सराफ, कर्मचारी बनसोड, अविनाश राऊत, राजेश सनोढिया, शैलेश यादव, चेतन राऊत, अमोल वाघ, रोहणकर, बाबाराव केचे, लक्ष्मीप्रसाद दुबे, सूरज परमार, अजय तिवारी, ज्ञानेश्‍वर पाटील, संगीता वाघमारे यांनी केली.
----------------

अशी केली हत्या
आरोपी राहुल मुरलीधर टाके हा प्रकाश गीते यांच्या घरी किरायाने दाभा वाडी नागपूर येथे राहायचा. त्याची प्रेयसी पद्मा (वय 19) या दोघांनी संगनमत करून सुरेखा बोरकर हिला विश्‍वासात घेतले. आठ ऑगस्ट रोजी दुपारी देहव्यवसायासाठी आपल्या दाभा येथील राहत्या घरी बोलाविले. चहामध्ये झोपेची गोळी मिसळवून दिली. त्यामुळे सुरेखा बोरकर हिला गुंगी आल्यानंतर दोघांनी तिचा गळा आवळून खून केला. वास येऊ नये म्हणून नाकात कापसाचे बोळे टाकून रात्री अकराला पल्सर दुचाकी (क्र. एमएच- 40/एई - 5510) वर दोघांनी आपल्या मधोमध बसवून वाडीमार्गे गोंडखैरी येथे नेले. टोलनाका दिसल्यामुळे रस्त्याच्या कडेला सुरेखाचा मृतदेह फेकून दिला. तिच्याजवळील बॅग जवळच्या नाल्यात फेकण्यात आली.

मोबाईल, दगिने विकले
सुरेखा हिच्या जवळचा सॅमसंग मोबाईल, बोटातील दोन आर्टीफिशियल अंगठ्या व गळ्यातील सोन्याचा गोफ स्वतःजवळ ठेवून घेतला. त्यानंतर कळमेश्‍वर येथे सोन्याचा गोफ विकून मुंबई, पचमढी या ठिकाणी पळून गेले. काही दिवसांनी आष्टा (मध्य प्रदेश) येथे कामधंद्यानिमित्त खोटे कारण सांगून निर्मला राऊत यांच्या सासरी आश्रय घेतला. गुन्ह्यात वापरलेली पल्सर दुचाकी सावनेर येथील नातेवाइकाकडे ठेवली.

Sunday, August 23, 2015

 स्पर्धक संपविण्यासाठी केली हत्या

स्पर्धक संपविण्यासाठी केली हत्या

नागपूर- वैरण विक्रीच्या व्यवसायातील स्पर्धा संपविण्यासाठी व्यापाऱ्याच्या मुलाने प्रतिस्पर्धी व्यावसायिक व त्याच्या मेहुण्याचा गळा चिरून हत्या केल्याचे तपासांत उघड झाले. रॉकी ऊर्फ अंकुश प्रभाकर शेंद्रे (वय 27) असे आरोपीचे नाव आहे. या दुहेरी हत्याकांडाचा 24 तासांत तपास करण्यात गुन्हे शाखेला यश आले.

Saturday, August 22, 2015

११ प्रजातीचे बेडूक आढळले

११ प्रजातीचे बेडूक आढळले

चंद्रपूर जिह्ल्यातील बेडकांवर प्राथमिक अभ्यास पूर्ण 

उन्हाळा संपताच सगळीकडे पावसाची वाट आतुरतेने बघतात,तसेच उभयचर प्राणी म्हणजेच बेडूक सुद्धा पावसाची वाट बघत असतात.बेडकांचे जीवनच पावसावरच अवलंबून असल्यासारखे आहे असे म्हटले तरी चालेल,पावसामुळे जीवसृष्टी अगदी न्हाऊन निघतात,सगळीकडे हिरवळ पसरते,झाडांना नवी पालवी फुटते.नद्या नाले,डबक्यात पाणी साचण्यास सुरवात होते व त्याच प्रमाणे बेडकांच्या कारकिर्दीची नव्याने सुरवात होते.

"शिव-प्रतिष्ठा ढोल ताशा पथक"

"शिव-प्रतिष्ठा ढोल ताशा पथक"

गणपति बापाच्या आगमनासाठी सर्व नागरिक जोरदार उत्साहाने तयारीत लागले आहेत या सगळ्यां बरोबरच नागपुरात "शिव-प्रतिष्ठा ढोल ताशा पथक" पण त्या साठी बजाज नगर येथे जोरदार तयारी करत आहे

आपल्या दैनंदिन जीवनातनुं थोडा वेळ समाजा साठी काढ़ने आणि महाराष्ट्राची एक जुनि परम्परा व संस्कृति जी नाहिशी होत चालली आहे तिला आपल्या येणाऱ्या युवा पीढ़ी पर्यन्त पोहचवने हाच या पथकचा उद्देश आहे.

Friday, August 21, 2015

विद्यापीठातील सिनेट निवडणुका पुढे ढकलल्या

विद्यापीठातील सिनेट निवडणुका पुढे ढकलल्या

नवीन प्रस्तावित विद्यापीठ कायद्यामुळे सरकारने काढला अध्यादेश

राज्यातील सर्व पारंपारिक विद्यापीठांसाठी सध्या असलेला महाराष्टÑ विद्यापीठ कायदा १९९४ हा रद्द करून नवीन सर्वसमावेशक असा कायदा राज्य सरकारकडून डिसेंबरमध्ये आणला जाणार असल्याने यापार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठासह राज्यातील अनेक विद्यापीठांमध्ये सुरू असलेल्या सिनेट, विद्यापीठ प्राधिकरणे, मंडळे आदींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यासाठी राज्य सरकारने नवीन अध्यादेश जारी केला आहे. या महाराष्टÑ विद्यापीठे (विद्यापीठ प्राधिकरणे व इतर मंडळे यांच्या सदस्यांच्या निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे) अधिनियम, २०१५ असे या अध्यादेशाचे नाव आहे. या अध्यादेशामुळे मुंबई विद्यापीठाकडून सुरू असलेल्या सिनेटच्या निवडणूक प्रक्रियेवरही परिणाम होणार असून ही प्रक्रिया विद्यापीठाला आपोआपच थांबवावी लागणार आहे. तर विद्यापीठातील ज्या सिनेट सदस्यांची ३१ आॅगस्ट रोजी मुदत संपणार होती, त्यांनाही पुढील पाच ते सहा महिन्यांचा कालावधी मिळण्याची शक्यताही यातून निर्माण झाली आहे.

सिनेटच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याने विद्यमान सदस्यांना मुदत वाढवून मिळणार असून त्यासाठी नवीन कायदा संमत होईपर्यंत कोणत्याही प्रकारच्या निवडणुका विद्यापीठांमध्ये घेतल्या जाणार नाहीत. अथवा त्यासाठीचा कार्यक्रमही जाहीर केला जाणार नाही.
राज्य विधिमंडळाच्या डिसेंबरमध्ये होणाºया हिवाळी अधिवेशनात नवीन प्रस्तावित विद्यापीठ कायदा सरकारकडून आणला जाणार असून यामुळे नवीन अधिनियमांच्या तरतुदींनुसार विद्यापीठाची निरनिराठी प्राधिकरणे व मंडळे स्थान करण्याची आवश्यकताही उरणार नसल्याचेही या नवीन अध्यादेशात म्हटले आहे.

Saturday, August 15, 2015

नागपूरात पुरामुळे २५ हजार घरे प्रभावित

नागपूरात पुरामुळे २५ हजार घरे प्रभावित

-जिल्ह्यात ७, शहरात ४ लोकांचा मृत्यू

-नाल्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी विशेष मोहीम

-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

नागपूर, १४ -बुधवार आणि गुरुवारी धो धो पाऊस बरसल्याने शहरातील ४ तर जिल्ह्यातील ७ लोकांचा मृत्यू झाला असून पुरामुळे २० ते २५ हजार घरे प्रभावित झाली आहेत. यासंदर्भात नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश मनपा, नासुप्र व महसूल प्रशासनाला दिले असून नुकसानभरपाईचा अंतिम अहवाल सोमवारी प्राप्त होईल, अशी माहिती ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली.

रविभवनात पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, नागपूर शहरातील अंबाझरी तलाव, गोरेवाडा तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे पिवळी नदी, नागनदी, नाले तुडुंब भरली. नदीकाठाजवळील नारी, नारा, टेकानाका, गड्डीगोदाम, सुंदरबन, गोरेवाडा तलावाजवळील भाग, हुडकेश्‍वर, नरसाळा, महेशनगर, समतानगर, कामगारनगर, गुलशननगर, वनदेवी नगर, भरतवाडा, कळमना, बर्डी, झांशी राणी चौक, मोरभवन, नंदनवन झोपडपट्टी आदी भागात पाणी शिरले. २०११-१२ च्या मनपा, नासुप्रच्या नकाशावर असलेल्या शहरातील ९० टक्के नाल्यावर अतिक्रमण झाल्याने शहरात ही पूर परिस्थिती निर्माण झाली. भविष्यात आणखी गंभीर परिस्थिती उद्‌भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्यात येईल. शहर व जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश मनपा, नासुप्र व महसूल प्रशासनाला दिले आहेत. १५ ऑगस्ट रोजी शासकीय सुटी असून शासकीय यंत्रणा या कामात राहील. सोमवारपर्यंत अंतिम अहवाल प्राप्त होईल. त्यानंतर सायंकाळी उच्चस्तरीय बैठक घेऊन नुकसानभरपाई मिळण्याबाबतचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला जाईल, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

४ तासाच्या पावसात नागपूरची दैनावस्था झाली. २४ तास पाऊस पडल्यास शहरातील एकही घर वाचणार नाही. हा भविष्यातील धोका लक्षात घेऊन गुगल मॅपनुसार शहरातील नाल्याचा शोध घेतला जाईल. नाल्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाईल. याशिवाय रस्ते रुंदीकरण, नाले साफसफाई मोहीमही राबविली जाईल. मानकापूर येथे रेल्वे उड्डाण बांधताना ओरिएंटेट कंपनीच्या चुकीमुळे नाल्याचा प्रवाहही बंद करण्यात आला. त्याचा फटका या भागातील घरांना बसला आहे. अनेक लोक रस्त्यांवर आले आहेत. त्यांच्या भोजनासाठी छावण्या लावण्यात आलेल्या आहे. नुकसानग्रस्तांना तातडीने खावटी स्वरूपात मदत केली जाईल. पुरामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबीयांना ४ लाखांची तातडीने मदत केली जाईल. तसेच घरांची पडझड झालेल्या लोकांना अधिकाधिक मदत मिळावी म्हणून शासनाकडे प्रस्ताव पाठविणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत मदतीची रक्कम निश्‍चित अधिक असेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

२००० पूर्वीच्या अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे २००० पूर्वीचे नाल्यावरील अतिक्रमण काढण्यात येईल. पण त्यांची पर्यायी व्यवस्था करण्यात येईल. केंद्रीय परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी कालच दिल्ली येथे बैठक घेऊन २००० पूर्वीच्या अतिक्रमणासाठी घरकुल योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे, याकडे ना. बावनकुळे यांनी लक्ष वेधले.

पत्रपरिषदेला आ. सुधाकरराव देशमुख, डॉ. मिलिंद माने, सुधाकर कोहळे, विकास कुंभारे, महापौर प्रवीण दटके, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे, नासुप्र अधीक्षक अभियंता सुनील गुज्जलवार आदी उपस्थित होते.

कळमेश्‍वर, सावनेर तालुक्यात पिकांना फटका

जिल्ह्यातील अतिवृष्टीचा धान पिकांना फायदा झालेला आहे. रोवणीसाठी आवश्यक असलेला पाऊस झाल्याने रोवणीच्या कामाला गती येईल. पण कळमेश्‍वर आणि सावनेर तालुक्यातील इतर पिकांना फटका बसलेला आहे. सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. कळमेश्‍वर तालुक्यातील धापेवाडा बु. येथील घर पडल्यामुळे संदीप दंदरे (वय ३२) यांचा मृत्यू झाला.. उमरेड तालुक्यातील वायगाव येथे १५० ते २०० लोकांना समाज मंदिर व पंचायत भवनात हलविण्यात आले असून त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे. सावनेर तालुक्यातील २०० व्यक्तींना नगर परिषद शाळेत हलविण्यात आले असून भोजनासाठी मसाले भाताची व्यवस्था केली आहे. कामठी तालुक्यातील ४ हजार घरांमध्ये पाणी शिरले. मोहप्याचे कृष्णा चापके हे गुमथी नाल्यात वाहून गेले. मौदा तालुक्यातील १५ ते २० गावांत पूरपरिस्थिती निर्माण झाली असून तेथील विस्थापितांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

Monday, August 03, 2015

चंद्रपूर जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदी पाऊणकर

चंद्रपूर जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदी पाऊणकर

चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मनोहर पाऊणकर यांची अविरोध निवड झाली. उपाध्यक्षपदी संजय सिंगम निवडून आले. त्यांनी गजानन पाथोडे यांचा अवघ्या एका मताने पराभव केला. बॅंकेचे अध्यक्ष शेखर धोटे, उपाध्यक्ष डॉ. प्रभा वासाडे यांनी 21 जुलै रोजी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर नव्या अध्यक्षांसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली. 27 संचालक असलेल्या या बॅंकेत धोटे गटाकडे बहुमत होते. त्यांनी पाऊणकर यांचे नाव अध्यक्षपदासाठी निश्‍चित केले. उपाध्यक्षपदासाठी त्यांच्याकडून गजानन पाथोडे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, पाऊणकर यांच्या गटाचे पाथोडे यांच्या उपाध्यक्षपदाला संजय सिंगम यांनी आव्हान दिले. सिंगमसुद्धा सुरुवातीला धोटे गटाकडेच होते. ते अध्यक्षपदासाठी इच्छुक होते. मात्र, पाऊणकर यांचे नाव निश्‍चित झाल्यानंतर त्यांनी दुसऱ्या गटाशी घरोबा केला. त्यामुळे उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पाथोडे आणि सिंगम अशी लढत झाली. सिंगम यांना 14 मते मिळाली, तर पाथोडे यांना 13 मते मिळाली. पाऊणकर हे चंद्रपूरचे माजी नगराध्यक्ष आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती होते. 
 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

नागपूर : सप्टेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील 129 ग्रामपंचायतींसाठी उद्या, मंगळवारी (ता. 4) मतदान होत आहे. त्यासाठी 42 झोनअंतर्गत 484 मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत.
जिल्ह्यातील उमरेड, भिवापूर, कुही, मौदा, रामटेक, पारशिवनी, सावनेर, नरखेड, काटोल, कळमेश्‍वर, हिंगणा, कामठी व नागपूर ग्रामीण या तालुक्‍यांतील 129 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मंगळवारी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होईल. संपूर्ण ग्रामपंचायत निवडणूक बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी म्हणून अपर पोलिस अधीक्षक अमित काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोणत्याही मतदार केंद्रावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्‌भवू नये, याकरिता पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. बंदोबस्तादरम्यान पोलिस ठाणेनिहाय प्रत्येक मतदान केंद्रावर पाळत ठेवण्यासाठी गस्त घालण्यात येईल. एकूण 22 पोलिस ठाण्यांतर्गत सुरक्षेसाठी कर्मचारी तैनात करण्यात येतील. यात सहा उपविभागीय पोलिस अधिकारी, 15 पोलिस निरीक्षक, 51 सहायक व पोलिस उपनिरीक्षक, 771 पोलिस कर्मचारी, एसआरपीएफचा समावेश आहे.



चंद्रपूर 610 ग्रामपंचायतींत मतदान
11 हजार 134 उमेदवार रिंगणात

जिल्ह्यातील 610 ग्रामपंचायतींत उद्या (ता. 4) निवडणूक होत आहे. तब्बल 11 हजार 134 उमेदवार रिंगणात असून, त्यांचा भाग्याचा फैसला शुक्रवारी (ता. चार) लागणार आहे.
जिल्हा प्रशासनाने निवडणुकीसाठी दोन हजार 150 मतदान केंद्रांची व्यवस्था केली आहे. निवडणूक काळात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलिस विभागाने मतदानासाठी 3 हजार पोलिस, 800 होमगार्ड, एसआरपीएफच्या सहा तुकड्या आणि जिल्ह्याबाहेरून 800 कर्मचारी आणि 50 अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. जिल्ह्यात सात उपविभाग तयार करण्यात आले असून, या ठिकाणी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. राजुरा, कोरपना व जिवती तालुक्‍यात सुमारे 76 असंवेदनशील केंद्रे आहेत. यासाठी वेगळे पथक तयार केले आहे. तसेच 74 सेक्‍टर आणि 28 ट्रॅकिंग फोर्स गठित करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार नामनिर्देशन मागविण्यात आले होते. 13 हजार 567 उमेदवारांनी सादर केलेल्या नामनिर्देशनाची छाननी करण्यात आली. त्यात 358 अर्ज अपात्र ठरले. दोन हजार 561 उमेदवारांनी आपले नामांकन मागे घेतले. सध्या 11 हजार 134 उमेदवार रिंगणात आहेत. अर्ज मागे घेतल्याच्या तारखेनंतर प्रचाराला चांगलाच जोर चढला होता. उमेदवारांनी मतदारांना विविध आमिषे दाखवून आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात होईल.

Saturday, August 01, 2015

गतीमान वैरण विकास कार्यक्रम राबविणार

गतीमान वैरण विकास कार्यक्रम राबविणार

पन्नास टक्केपेक्षा कमी पाऊस झालेल्या तालुक्यात
२५ कोटी रुपये निधी मंजूर. लाभार्थ्याला मिळणार हेक्टरी रु.१५००


मुंबई, दि.१  :- महाराष्ट्रात आज अखेर पावसाची असमाधानकारक परिस्थिती पहाता आगामी काळात चारा टंचाईवर मात करण्यासाठी राष्ट्रीय कृषी योजनेंतर्गत गतीमान वैरण विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणीस शासनाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली असल्याचे कृषी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज विधान परिषदेत सांगितले.

खडसे पुढे म्हणाले की, राज्यातील ज्या तालुक्यांमध्ये ३१ जुलै, २०१५ अखेर सरासरी पावसाच्या तुलनेत पन्नास टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे, अशा तालुक्यामध्ये – विशेषत: विदर्भ आणि मराठवाड्यातील गावांमध्ये हा कार्यक्रम प्राधान्याने राबविण्यात येईल व नंतर इतरत्र तो राबविला जाईल.

हा कार्यक्रम राबविण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत रुपये २५ कोटी (रु.पंचवीस कोटी) एवढा निधी मंजूर करण्यात आला असून किमान ०.२ हेक्टर ते कमाल १ (एक) हेक्टर क्षेत्रावर चारा पिकाच्या लागवडीकरीता प्रती हेक्टरी रुपये १,५००/- (रुपये एक हजार पाचशे) याप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. पशुधन असलेल्या अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्राधान्याने या कार्यक्रमांतर्गत निवडण्यात येणार आहे, असेही खडसे यांनी सभागृहात सांगितले.
कट ऑफ डेट सात ऑगस्ट पर्यंत वाढविली

कट ऑफ डेट सात ऑगस्ट पर्यंत वाढविली

राष्ट्रीय कृषी विमा योजना: कृषी मंत्री एकनाथराव खडसे

जळगाव, दि.01 ऑगस्ट: राष्ट्रीय कृषी विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाच्या हप्त्याच्या मुदतीला (कट ऑफ डेट) केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी 7 (सात) ऑगस्ट 2015 पर्यंत मुदत वाढ दिली आहे, अशी माहिती कृषी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज जळगांव येथे दिली.

खडसे यांनी पुढे सांगितले की, राज्य शासनाने केंद्राला लेखी पत्र पाठवून शेतकऱ्यांना विम्याचे हप्ते भरण्यासाठी किमान 15 दिवस मुदत वाढवून मिळावी, अशी विनंती केली होती. मात्र, केंद्राने काल 31 जुलै राजी पत्र पाठवून ही मुदत अर्थात कट ऑफ डेट 07 (सात) ऑगस्ट पर्यंत वाढवल्याचे पत्र पाठवून कळविले आहे. या पत्रात स्पष्ट केले आहे की, एक विशेष बाब म्हणून आणि राज्यातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन काही अटींच्या अधिन राहून ही मुदत वाढ देण्यात आली आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी वाढीव मुदतीच्या काळात पीक विम्यासंबंधीचे प्रस्ताव संबंधित बँकेकडे आणि संबंधित यंत्रणेकडे नेहमी प्रमाणे पाठवावेत. तसेच, त्या सोबत संबंधित प्राधिकाऱ्याने दिलेले पेरणीसंबंधीचे प्रमाणपत्रही जोडावे.
केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी राष्ट्रीय कृषी विमा योजने अंतर्गत भरावयाच्या विमा हप्त्यांना दिलेली मुदतवाढ लक्षात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे कृषी मंत्री खडसे यांनी आवाहन केले.

Thursday, July 30, 2015

फाशी

फाशी

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आज (गुरुवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास फाशी देण्यात आलेल्या याकूब मेमनची आपल्या मुलीसोबत बोलण्याची शेवटची इच्छा होती. त्याच्या इच्छेनुसार त्याचे आणि मुलीचे संभाषण दूरध्वनीहून घडवून आणण्यात आले. 
पहाटे 5 वाजता याचिका फेटाळल्यानंतर नागपूर तुरुंगात याकूबला नवीन कपडे देण्यात आले.

पहाटे 5.30 वाजता याकूबला प्रार्थना करण्यात सांगितले. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

सकाळी 6.00 वाजता याकूबला फाशीच्या ठिकाणी नेण्यात आले. फाशी का देण्यात येत आहे, हे त्याला सांगण्यात आले.

सकाळी 6.35 वाजता याकूबला फाशीवर लटकवण्यात आले. त्यावेळी 8-10 जण हजर होते.

Saturday, July 25, 2015

रा. सू.गवई यांचे निधन

रा. सू.गवई यांचे निधन

नागपूर : ज्येष्ठ दलित नेते रा.सू.गवई यांचे  प्रदीर्घ आजाराने निधन झाले. रा.सू.गवई हे ८६ वर्षांचे होते. रा.सू गवई यांनी शनिवारी दुपारी १ वाजून ५ मिनिटांनी शेवटचा श्वास घेतला. 
बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष असलेल्या गवई यांनी बिहार व केरळचे राज्यपाल पद भूषविले होते. अमरावती लोकसभा मतदारसंघातून रिपब्लिकन पक्षातर्फे १९९८ साली ते सर्वप्रथम निवडून गेले होते.रा.सू.गवई यांच्यावर उद्या अमरावतीत अंत्यसंस्कार होणार आहेत. रा. सू. गवई यांचे अंतिम दर्शन नागपूरच्या दीक्षा भूमीवर घेता येणार आहे. रा.सू गवई यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. 

Monday, July 20, 2015

एका वर्षासाठी गुटखा बंद

एका वर्षासाठी गुटखा बंद

निर्मिती, साठवणुक, वितरण आणि विक्री यावर प्रतिबंध

– एकनाथराव खडसे

मुंबई दि.२० जुलै –गुटखा, पान मसाला, सुगंधी / स्वादिष्ट तंबाखु व सुपारी, अपमिश्रकेयुक्त उत्पादित चघळण्याची तंबाखु इ. पदार्थांची निर्मिती, साठवणुक, वितरण आणि विक्री करण्यावर दिनांक २० जुलै, २०१५ पासून महाराष्ट्र शासनाने एक वर्षाकरीता प्रतिबंध घातला आहे. याबाबतचे निवेदन आज राज्याचे महसुल मंत्री एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदेत नियम ४६ अन्वये केले.
खडसे यांनी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनेक देशांतर्गत आणि जागतिक पातळीवर झालेल्या शास्त्रीय संशोधनावरुन हे निष्पन्न होते की, गुटखा आणि पानमसाला हे किंवा तत्सम पदार्थांचे स्वातंत्र घटक या पदार्थांचे सेवन केल्यामुळे तोंडाचा सबम्युकम फायब्रोसिस, कर्करोग, ॲक्युट हायपर मेग्नेशिया, हृदयरोग, पोटाचा कर्करोग, प्रजनन व्याधी, आतडे, श्वसनाचे रोग होतात. असे पदार्थ सेवन करणाऱ्या राज्यातील जनतेच्या आरोग्यावर आणि विशेषत: तरुण पिढीवर त्याचे प्रचंड दुष्परिणाम संभवतात. बऱ्याच वैज्ञानिक व सामाजिक संस्थांच्या अहवालांमध्ये सुध्दा तंबाखु व सुपारी सेवनामुळे घातक आजार होतात, हे नमूद केले आहे. त्यामुळे अशा पदार्थांवर बंदी आणणे ही बाब वैज्ञानिक आणि सामाजिकदृष्ट्या गरजेचे आहे.

गुटखा व पानमसाला यांच्या सेवनाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी देशातील २६ राज्यांतील आणि ५ केंद्रशासित प्रदेशातील अन्न सुरक्षा आयुक्तांनी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत प्रतिबंधित अंमलबजावणीचे आदेश काढले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या दिनांक १६ डिसेंबर २०१४ च्या सर्वेक्षणानुसार राज्यांनी घातलेल्या प्रतिबंधामुळे गुटख्याची उपलब्धता आणि सेवन कमी झाल्यामुळे भारतीय युवकांच्या आरोग्यावर चांगला परिणाम झाला आहे.

मागील वर्षाच्या (२०१४) आदेशाची मुदत १९ जुलै, २०१५ रोजी संपली असुन त्यामुळे पुढील एक वर्षासाठी नविन आदेश तातडीने काढणे आवश्यक होते. त्यामुळे वरीलप्रमाणे प्रतिबंध घालण्याचा निर्णय झाला आहे, असेही खडसे यांनी सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
heavy rainfall

heavy rainfall

Nagpur, Jul 20- Following is the combined weather summary for Madhya Pradesh, Chhattisgarh and Vidarbha issued by the Nagpur Regional Meteorological centre here today. Summary:Very light to rather heavy rainfall occurred at most places over west Madhya Pradesh and at many places over east Madhya Pradesh, Chhattisgarh and Vidarbha. Maximum temperatures appreciably fell over Vidarbha and fell over south west Madhya Pradesh and changed little over east Madhya Pradesh, north west Madhya Pradesh....

Sunday, July 19, 2015

ट्रक-ट्रेलर अपघातात दोन ठार

ट्रक-ट्रेलर अपघातात दोन ठार

बुटिबोरी  : नागपूर-वर्धा मार्गावरील बुटीबोरीवरून 5-6 किमी अंतरावर टाकळघाट फाट्याजवळ सकाळी अकराच्या सुमारास ट्रक व ट्रेलरच्या धडकेत दोघेजण जागीच ठार झाले.
साखर घेऊन जाणारा ट्रक (क्र. सीजी 04 डीजी 8112) वर्ध्याकडे जात होता. या ट्रकचा टाकळघाट फाट्याजवळ टायर फुटल्याने समोरून भरधाव येणाऱ्या ट्रेलर (क्र सीजी 07 सीए 4151)ला जोरदार धडक बसली. ट्रेलरमध्ये 16 लोखंडी खांब बुटीबोरीकडून जबलपूरला नेण्यात येत होते. अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही वाहनांचा दर्शनी भाग पूर्ण चेंदामेंदा झाला. घटनेत दोन्ही वाहनांच्या चालकांचा जागीच मृत्यू झाला. 

Friday, July 17, 2015

रामदास निंगाली.... रेवस बंदरावरीऽऽऽ

रामदास निंगाली.... रेवस बंदरावरीऽऽऽ

रामदास निंगाली.... रेवस बंदरावरीऽऽऽ

१७ जुलै १९४७ चा तो काळाकुट्ट दिवस. रामदास बोटीला याच दिवशी जलसमाधी मिळाली. हे एक कठोर वास्तव, कठोर सत्य आहे. सारा दैवाचा खेळच म्हणावा लागेल. आजही त्या दिवसाची आठवण जरी झाली, तरी अनेकांचा काळजाचा ठोका चुकतो. जवळपास ७५०हून अधिक प्रवाशांना यात जलसमाधी मिळाली. शुक्रवारी या घटनेला ६७ वर्षे पूर्ण होत आहेत. याआधी अनेक लेखकांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून या मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. पण, अलिबागच्या रोहित पाटील या गायक-संगीतकाराने आपल्या सहकार्‍यांची सोबत घेऊन सूरबद्ध केलेल्या गाण्यातून या दुर्घटनेतील प्रवाशांना भावनिक साद घालत श्रद्धांजली वाहिली आहे. हे गाणे शुक्रवारी रिलीज होत आहे.
वैद्यकिय महाविद्यालयाची जिल्हाधिका-याकडून पाहणी

वैद्यकिय महाविद्यालयाची जिल्हाधिका-याकडून पाहणी

चंद्रपूर दि.17- चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय 2015 च्या सत्रापासून सुरु होणार असल्याने जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर यांनी आज महाविद्यालयाची पाहणी करुन त्यांना काही त्रृटी दिसून आल्या त्यावर त्वरीत अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या. 


अखेर चंद्रपूरला "मेडिकल'

अखेर चंद्रपूरला "मेडिकल'

चंद्रपूर - उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशाला मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने (एमसीआय) सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने नागपूर खंडपीठाच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे केंद्र सरकारने गुरुवारी (ता. 16) चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भातील आदेश जारी केला.

Thursday, July 16, 2015

नागपूर कारागृहात २३ जणांना फाशी

नागपूर कारागृहात २३ जणांना फाशी

सन १८६४ मध्ये नागपुरात मध्यवर्ती कारागृहाची स्थापना झाली. राज्यात येरवडा व नागपुरातच फाशी देण्याची व्यवस्‍था असून, १९५० मध्ये पहिल्यांदा पंथेयाऊ नंदाल या कैद्याला नागपुरात फाशी देण्यात आली तर, डिसेंबर १९५२ मध्ये पुण्याच्या येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली. राज्यात आतापर्यंत ५८ जणांना फाशी देण्यात आली असून, नागपूर कारागृहात २३ जणांना फाशी देण्यात आल्याची माहिती आहे. 


कारागृहात महिलेसह १६ कैदी 

मध्यवर्ती कारागृहात एका महिलेसह १६ कैदी फाशीची शिक्षा झालेले आहेत. सर्व फाशी यार्डात आहेत. याकूबला फाशी होणार असल्याचे वृत्त बुधवारी आल्याने कारागृहाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. याकूबवरही प्रशासन पाळत ठेऊन आहे. तो असलेल्या यार्डाची दर १५ मिनिटांनी चौकशी करण्यात येत असल्याची माहिती आहे. 

याकूबनंतर वसंता 

याकूबला फाशी दिल्यानंतर याच कारागृहात वाडीतील एका बालिकेवरील बलात्कार-खुनातील आरोपी वसंता दुपारे यालाही फिशी दिली जाऊ शकते. या आरोपीचीही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. त्याने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला आहे. 

'सर' याकूब 

मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी आणि फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेला याकूब याला कारागृहातील बंदीवान 'सर' व 'भाई' या नावाने संबोधतात. २००७पासून तो नागपूर कारागृहात आहे. तो अत्यंत नम्रपणे वागतो. गतवर्षी त्याने एम.ए. इंग्रजी विषयात पदवी घेतली. कारागृतील बंदीवानांना तो शिकवतो. अफजल गुरू याला फाशी दिल्यानंतर याकूब काही दिवस शांत होता. तो कोणाशीही बोलत नव्हता. एम.ए.सह याकूब याने विधी पदवी संपादित केली असून सी.ए.ची परीक्षाही उत्तीर्ण केली आहे. 

दृष्टिक्षेपात (दिनांक , फाशी देण्यात आलेले कैदी) 
  1. २ सप्टेंबर १९५० - जकिया नारायण 
  2. २० फेब्रुवारी १९५०- सीपाराम नुहो याला 
  3. २६ जून १९५१- सीताराम परय्या 
  4. ३ ऑगस्ट १९५१- इरामन्न उपयोरसी 
  5. ४ ऑक्टोबर १९५१- भाम्या गोडा 
  6. १२ जानेवारी १९५२- सरदार 
  7. ३ ऑगस्ट १९५२ - नियतो कान्हू 
  8. ५ ऑगस्ट १९५२- अब्दुल रहेमान इम्रानखान 
  9. २ सप्टेंबर १९५२- गणपत सखराम 
  10. २४ सप्टेंबर १९५२- सखराम फोकसू 
  11. १९ मार्च १९५३- विन्सा हरी 
  12. १९ जून १९५३- जागेश्वर मारोती 
  13. ४ जुलै १९५३- प्रेमलाल अमरीश 
  14. १५ सप्टेंबर १९५३- लोटनवाला 
  15. ३ फेब्रुवारी १९५६- , दयाराम बालाजी 
  16. २८ ऑगस्ट १९५९- अब्बासखान वजीरखान 
  17. १५ फेब्रुवारी १९६० - बाजीराव तवान्नो 
  18. ८ जुलै १९७०- श्यामराव पांडुरंग 
  19. १९ जानेवारी १९७३- नाना गंगाजी 
  20. १७ एप्रिल १९७३ - मोरीराम शाद्याजी गोदान 
  21. ५ नोव्हेंबर १९८४- वानखेडे बंधू.
World Youth Skill Day

World Youth Skill Day

“National World Youth Skill Day” celebrate by National Skill Development Corporation(Ministry of Skill Development & Entrepreneurship, Government of India), Garware Institute of Career Education and Development, Mumbai University, Nehru Yuva Kendra, Mumbai and Aquvakraft Pvt. Ltd in Mambai on July 15, 2015.                         
 Shri Sudhir Mungatiwar, Finance Minister(Government of Maharashtra), Dr. Sanjay Desmukha, Vice Chancellor, Mumbai University, Shri Upendra Thakur, Zonal Director, NYKS, Maharashtra & Goa, Smt. Rani Dwivedi, Member, Board of Governor, NYKS(Government of India), Shri Yaswant Mankhedkar, DYC NYKS, Maharashtra & Pune presented at function.

“SWACHH Center of Excellence” at celebration of “National World Youth Skill Day” celebrate by National Skill Development Corporation(Ministry of Skill Development & Entrepreneurship, Government of India), Garware Institute of Career Education and Development, Mumbai University, Nehru Yuva Kendra, Mumbai and Aquvakraft Pvt. Ltd in Mambai on July 15, 2015

Saturday, July 11, 2015

गुरूजी बनणार स्मार्ट

गुरूजी बनणार स्मार्ट

विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती संकलीत करणे, माहितीचे आदान-प्रदान करून सर्वंकक्ष माहिती एकत्रित करताना शिक्षकांसह कर्मचारी व अधिकार्‍यांची दमछाक आता टळणार आहे. शिक्षण विभागाने यासाठी 'सिस्टीमॅटीक अँडमिनिस्टेटीव्ह रिफार्मस अचिव्हिंग लर्नींग फॉर स्टुडंट्स' (सरल) या कार्यप्रणालीचा अवलंब केला आहे.
397 वर महिलांसाठी आरक्षण

397 वर महिलांसाठी आरक्षण

नागपूर : जिल्ह्यातील 772 ग्रामपंचायतींच्या आरक्षणाची सोडत आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यात 772 पैकी 397 ग्रामपंचायतींवर "महिला राज‘ आले आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या 22ने जास्त आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्गात महिलांचे आरक्षण प्रमाण जास्त आहे. 
सरासरीपेक्षा पाऊस तरीही शेतकरी व्याकूळ

सरासरीपेक्षा पाऊस तरीही शेतकरी व्याकूळ

नागपूर : नागपूर शहरासह सर्व 13 तालुक्‍यांत जूनअखेर 191.46 मिमी पाऊस अपेक्षित असतो. यंदा मात्र, 308 मिमी पावसाची नोंद झाली असून, सरासरीपेक्षा जास्त म्हणजे 161 टक्‍के पाऊस झाला. पण, त्या मानाने जिल्ह्यातील जलायशे भरलेली नाहीत. त्यामुळे शेतकरी व्याकूळ आहे.

Saturday, July 04, 2015

कोळसा वाहतूक नियमानुसारच : महानिर्मितीचा खुलासा

कोळसा वाहतूक नियमानुसारच : महानिर्मितीचा खुलासा

महानिर्मितीच्या चंद्रपूर आणि कोराडी वीज प्रकल्पाकरिता कोळसा वाहतूकीची एकत्रित निविदा सुधारीत निकषांसह दोन जुलै 2015 रोजी महानिर्मितीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात कुठेही महानिर्मितीतर्फे नियमाचा भंग झालेला नाही, असे महानिर्मितीतर्फे कळविण्यात आले आहे. शुक्रवारी महानिर्मितीच्या कोळसा खरेदीत घोटाळ्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर हा खूलासा करण्यात आला. महानिर्मितीच्या चंद्रपूर वीज प्रकल्प कार्यालयातर्फे कोळसा वाहतुकीची निविदा काढण्यात आली होती. त्यात पात्रता निकष हे महानिर्मितीच्या प्रचलित पद्धतीप्रमाणे होते. वीजदर आटोक्‍यात राहावा, यासाठी वीजनिर्मितीचा खर्च कमी करणे गरजेचे असल्याने महानिर्मिती मुंबई मुख्यालयाने अंतर्गत सुधारणांचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून कोळसासंबंधी सर्व कंत्राटांत रिव्हर्स बिडींग प्रोसेस या अभिनव संकल्पनेचा अवलंब करण्यास सुरूवात झालेली आहे. त्यानुसार सदर निविदा उघडल्यानंतर पुढील निर्देशासाठी महानिर्मितीच्या मुख्यालय मुंबई येथे विचारणा केली असता मुख्यालयाने चंद्रपूर व कोराडी वीज प्रकल्प कल्पांमध्ये एकाच प्रकारचे असे हे काम असल्याने निविदेमध्ये एकसूत्रता आणून त्याची अंमलबजावणी मुख्यालयामार्फत करण्यात येईल असे सांगितले.
बंदिवानांना बंदिवानाकडून इंग्रजीचे धडे

बंदिवानांना बंदिवानाकडून इंग्रजीचे धडे

आयुष्यात माणूस म्हणून जगण्यासाठी धडपड
गोविल मेहरकुरे
चंद्रपूर : नकळत हातून चूक झाली; होत्याचे नव्हते झाले. नशिबी बंदिवानाचे जिणे आले. क्रोधातून घडलेल्या कृत्याच्या पश्‍चातापाचे भोग भोगताना पुढील आयुष्यात माणूस म्हणून जगण्यासाठी धडपड सुरू आहे. या धडपडीला विधायकतेचा आधार मिळावा, यासाठी कारागृहातील एका बंदिवानाने दुसऱ्या बंदिवानांना इंग्रजीचे धडे देणे सुरू केले आहे.
जिल्हा कारागृहात ए. बी. नक्कलवार सध्या शिक्षा भोगत आहे. राजुरा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये ते 15 वर्षे शिक्षक होते. नक्कलवार यांना एका मुलीच्या विनयभंगाच्या आरोपाखाली शिक्षा सुनावली आहे. कारागृहात असताना कारागृह निरीक्षक जाधव यांना त्यांच्या भूतकाळाविषयी माहिती मिळाली. ते इंग्रजी विषय शाळेत शिकवीत असल्याचे कळले. त्यानंतर बुद्धपौर्णिमेचा दिवस साधून नक्कलवार यांनी इतर कैद्यांना इंग्रजीचे धडे देण्यास सुरुवात केली. कैद्यांकडून मिळालेल्या प्रतिसादाने खूश होत नक्कलवार यांनी स्वत: तीस वह्या आणि पेन बंदिवानांना दिल्या. तब्बल 15 कैदी सध्या इंग्रजीचे धडे गिरवीत आहेत. खून, दरोडा, अत्याचार यासारख्या गुन्ह्यांमधील आरोपींचा यात समावेश आहे. हे सर्व कच्चे कैदी आहेत. रोज सकाळी नऊ वाजता कारागृहातील ग्रंथालयामध्ये इंग्रजीचे वर्ग ते घेतात. त्यांना गृहपाठदेखील देण्यात येतो. कारागृहातील कामे आटोपून कैदी आपला गृहपाठ पूर्ण करतात. इंग्रजी प्रशिक्षणामुळे येथून सुटल्यानंतर समाजात वावरताना आत्मविश्‍वास येईल, असे या कैद्यांना वाटत आहे. अशा उपक्रमामुळे कैद्यांची नकारात्मक मानसिकता दूर होण्यास मदत होते, असे कारागृह शिक्षक ललित मुंडे यांनी सांगितले. न्यायालयाचे आदेश इंग्रजी भाषेतच निघतात. इंग्रजी भाषेचा उपयोग कच्च्या कैद्यांना त्यांच्यावरील आरोपांची स्थिती समजून घेण्यास सोईस्कर होते, असे कारागृह अधीक्षक जी. के. महल्ले यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.