সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, January 31, 2012

मराठी साहित्य संमेलनची तयारी

मराठी साहित्य संमेलनची तयारी

चंद्रपुरात होत असलेल्या ८५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनची तयारी जवळपास पूर्ण होत आली आहे. सरदार पटेल सोसायटी आणि सर्वोदय शिक्षण मडळाच्या वतीनं आयोजित हे संमलन येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात तीन ते पाच फेब्रुवारी दरम्यान होत आहे.  अध्यक्ष ज्येष्ठ सक्षक- वसंत आबाजी डहाके- आहेत, तर उद्‌घाटन न्या. चंद्रशेखर धर्ङ्काधिकारी यांच्या हस्ते होणार आहे.
व्ही. ओ.  संङ्केलनाची तारीख जसजशी जवळ येऊ- लागली, तसतशी राजीव गांधी अभियांत्रिकी ङ्कहाविद्यालयातील व्यवस्थाही पूर्णत्वाक-डे जाऊ- लागली. महाविद्यालयाच्या संपूर्ण परिसराचं सुशोभीक-रण सुरू- आहे. संमेलनस्थळाच्या तयारीसाठी जवळपास दररोज चारशे ते पाचशे कामगार राबत आहेत. व्यासपीठ अठराशे चौरस मी मध्ये तयार केलं जात आहे. या व्यासपीठाचं बांधकाम आहे. त्यालाच लागून 'ग्रीन रू-ङ्क'ची व्यवस्था क-रण्यात आली आहे. मुख्य संमैलनस्थळ ५० हजार चौरस मि मध्ये आहे. या ठिकाणी आठ ते दहा हजार श्रोत्यांच्या बसण्याची व्यवस्था आहे. हे आता अंतिम  टप्प्यात आलं आहे. तसंच या संङ्केलनस्थळी येणार्‍या प्रत्येकाला संमलनाच्या परिसरातील कोणत्याही ठिकाणाहून कार्यक्रम  बघता यावा, यासाठी जागोजागी 'एलसीडी'ची व्यवस्था क-रण्यात येणार आहे. ग्रंथप्रदर्शनासाठी २२० स्टॉल्सची नोंदणी झाली आहे. हा परिसरही जवळपास तीस हजार चौरस मी, राहणार आहे. भोजन सभागृह १२ हजार चौरस मी आहे.

Wednesday, January 18, 2012

ग्रामपंचायतीतून "निशाणी डावा अंगठा' गायब!

ग्रामपंचायतीतून "निशाणी डावा अंगठा' गायब!

देवनाथ गंडाटे - सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर - सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य म्हटले, की ते "निरक्षर'च असेल, अशीच कल्पना डोक्‍यात येते; मात्र चंद्रपूर तालुका याला अपवाद ठरला आहे. या एकमेव तालुक्‍यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकारी 99 टक्के साक्षर आहेत. यातील काही उच्चविद्याविभूषित आहेत. सरपंचपदी असलेल्या सर्व 21 महिला साक्षर आहेत.
सत्तेच्या विक्रेंद्रीकरणात ग्रामपंचायतची महत्त्वाची भूमिका आहे. शासनाशी थेट संपर्क असलेला तो दुवा आहे. गावपातळीवर काम पाहणारी ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महत्त्वाचा भाग आहे. शासनाच्या विविध योजना जिल्हापरिषदेमार्फत ग्रामपंचायतकडून राबविण्यात येतात. पूर्वी ग्रामपंचायतमध्ये अंगठेबहाद्दर सरपंच असायचे. त्यामुळे अनेक योजना सरपंचांना ग्रामसेवकाकडून समजून घ्याव्या लागत असे. अशावेळी दिशाभूल होण्याचे प्रकार घडायचे. महिला सरपंच यांचा कारभार त्यांचे पतीदेवच चालवायचे. त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत अनेकदा त्यांची ग्रामसेवकांकडून फसवणूकसुद्धा व्हायची. याच कारणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण लागू झाल्यानंतर विरोधी सूर उमटला होता; मात्र साक्षरतेचे प्रमाण वाढत असल्याने सत्तेची चावी सांभाळण्यात महिलाही यशस्वी होऊ लागल्या आहेत. हे आता सिद्ध झाले आहे. विशेषत: या जिल्ह्यातील चंद्रपूर तालुका हा यासाठी प्रेरणादायी ठरला आहे.

चंद्रपूर तालुक्‍यात एकूण 48 ग्रामपंचायती असून, सदस्यसंख्या 431 आहे. यापैकी 21 ग्रामपंचायतींवर महिला सरपंच आहेत. यात एकही निरक्षर महिला नाही. चौथीपर्यंत शिकलेल्या केवळ दोन महिला वगळता उर्वरित सर्व सरपंच बारावीपर्यंत शिकलेल्या आहेत. साक्षरतेचे प्रमाण वाढत असल्याने स्थानिक राजकारणात मोठा फायदा होऊ लागला आहे. एकूण 431 ग्रामपंचायत सदस्यांपैकी 37 सदस्य उच्चशिक्षित असून, केवळ पाच सदस्य निरक्षर आहेत. ऊर्जानगर ग्रामपंचायतीत एकूण 17 सदस्यांपैकी नऊ जण उच्चशिक्षित आहेत. यात बीए, एमकॉम, बीकॉम, डीएडचे शिक्षण घेतलेले आहेत. बीएचे शिक्षण घेतलेल्या सरपंचांमध्ये कोळशाचे सुनील सोयाम, नागाळाचे रंजित कुमरे, छोटा नागपूरचे उमेश्‍वर काथवटे, पिपरीचे गणेश आवारी, तर वरवट येथील रोशन जुमडे यांचा समावेश आहे. ग्रामपंचायतमधील सदस्य आणि पदाधिकारी 99 टक्के साक्षर असलेला चंद्रपूर हा एकमेव तालुका आहे.

Wednesday, January 11, 2012

वैद्यकीय महाविद्यालयाने वाढविला राजकीय ज्वर

वैद्यकीय महाविद्यालयाने वाढविला राजकीय ज्वर

Tags: medical college, politics, chandrapur, vidarbha

चंद्रपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूरला व्हावे, यासाठी येत्या 12 जानेवारीला माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात शहरात मानवी साखळी तयार करण्यात येणार आहे; मात्र या साखळीतील "कडी' जुळविण्याचे प्रयत्न सुरू असतानाच यावर आरोप-प्रत्यारोपांचे घाव घालणे सुरू झाले आहे. भाजप-सेनेनंतर आता राष्ट्रवादीनेही कॉंग्रेसवर टीका केली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि माजी जिल्हाध्यक्ष या दोघांनीही स्वतंत्रपणे पक्षाची बाजू मांडली आहे. एकाचा सूर थेट आरोपाचा आहे, तर दुसऱ्याने मात्र मध्यम मार्ग निवडला आहे.



खासदार असताना काय केले?
महाराष्ट्रात चार नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना राज्य मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली. यापूर्वी चंद्रपूरचे वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे पळवून नेल्याचा आरोप कॉंग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादींच्या नेत्यांवर केला होता; परंतु आता त्याच वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा झाल्यावर सातारा येथे मंजूर झालेले महाविद्यालय हे चंद्रपूरचेच असल्याची दिशाभूल करणे सुरू केले आहे. सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालयासाठी मुख्यमंत्री यांनी शक्ती खर्ची घातली. त्यामुळे ओरड करायची असेल तर मुख्यमंत्र्यांविरुद्ध करा, असा सल्ला जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी माजी खासदार पुगलिया यांना दिला आहे. पुगलिया दोन वेळा आमदार, एक वेळा राज्यसभेत आणि लोकसभेत खासदार होते. तेव्हा त्यांनी महाविद्यालय का आणले नाही? असेही वैद्य यांनी म्हटले आहे. स्वत:चे अपयश लपविण्यासाठी कॉंग्रेसचे नेते राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोप करीत आहेत. जिल्ह्यातील उद्योगांच्या माध्यमातून अद्ययावत चॅरिटेबल हॉस्पिटल उभारता आले असते. भाजप आणि कॉंग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी या उद्योगांना जाणीवपूर्वक आर्थिक भुर्दंडापासून दूर ठेवले आहे. राजकारणातील सततच्या अपयशामुळे कॉंग्रेसच्या नेत्यांना वैफल्य आले आहे. त्यामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप केले जात आहेत. वरोरा नाक्‍यावरील दोषपूर्ण रेल्वे उड्डाणपुलामुळे चंद्रपूर शहरातील निष्पाप 50 नागरिकांचा, तरुण, तरुणींचा अपघातात बळी गेला. हे दोषपूर्ण बांधकाम विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या दबावाखाली झाले. त्यातील दोष दूर करून या पुलाची विस्तारित डिझाईन तयार करून लवकरच बांधकाम सुरू होणार आहे. शहराच्या विकासात भर घालणाऱ्या तसेच अपघात टाळण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या वरोरा नाक्‍यावरील या पुलाला कॉंग्रेस पक्षाने विरोध करणे म्हणजे विकासात अडथळे आणण्याचा हा प्रकार आहे, असा आरोपही वैद्य यांनी केला आहे.



मुद्दा चांगला; मानसिकता नकारात्मक
माजी खासदार पुगलिया यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन झाले. या आंदोलनात काही चांगले मुद्दे मांडण्यात आले. या मुद्द्यांचे स्वागत झाले पाहिजे; परंतु काही अवास्तविक व नकारात्मक मानसिकतेचेही मुद्दे यात होते, असा सूर राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद दत्तात्रेय यांनी पत्रपरिषदेत लावला. वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी पुगलिया यांनीच केली होती; मात्र आपल्या जिल्ह्यातील राजकीय नेतृत्व यात कमी पडले. विकासाच्या मुद्द्यावर सर्वच नेत्यांनी एकत्र आले पाहिजे. राष्ट्रवादीचा कुठल्याही विकासकामात अडथळा नसतो. राज्य शासनाचे निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मनाने होत असतील, तर पडद्यामागचे मुख्यमंत्री पवार आहेत, असा यातून समज निर्माण करता येईल. पवार निर्णय घेत असतील, तर मुख्यमंत्र्यांऐवजी त्यांच्याकडे महाविद्यालयाचा रेटा लावला पाहिजे, असे दत्तात्रेय म्हणाले. जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या नेत्यांनी स्वत:चा कमकुवतपणा लपविण्यासाठी राज्याच्या कार्यक्षम नेत्यांवर चिखलफेक करू नये, असा सल्लाही दत्तात्रेय यांनी दिला. वरोरा नाका चौकातील पुलाचेही त्यांनी समर्थन केले. यामुळे जैन स्तंभाला कुठलीही बाधा पोचणार नाही. दीक्षाभूमीच्या अस्तित्वालाही बाधा पोचणार नाही. या पुलाचे स्वागत करून बायपास निर्मितीसाठी प्रयत्न केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.



नेते तुमचेच आहेत
राष्ट्रवादीच्या नेत्यांचे पश्‍चिम महाराष्ट्रावर जास्त प्रेम आहे. त्यांनी नेहमीच विदर्भातील विकासाचा निधी पळविला आहे. आता वैद्यकीय महाविद्यालयसुद्धा त्यांनी आपल्या क्षेत्रात नेले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कॉंग्रेस नेत्यांवर आरोप करण्यापेक्षा आपल्याच नेत्यांकडे महाविद्यालयासाठी गळ घालावी.


- विनायक बांगडे, जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस कमिटी



गोंडवाना शासकीय वैद्यकीय विद्यापीठ व्हावे, यासाठी विधानसभेत मी ठराव मांडला होता. यासाठी आजवर सहा पत्रेही दिली आहेत. शासनाकडून उत्तरही मिळाले आहे. त्यात चंद्रपूरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. खासगी संस्थेने, व्यक्तीने वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी केली, तर त्यावर विचार करता येईल, असे मात्र उत्तरात कळविले आहे.


- आमदार नाना श्‍यामकुळे, चंद्रपूर

Tuesday, January 10, 2012

झाडीपट्टीतील 'घायाळ पाखरा'ची दिल्लीवारी

झाडीपट्टीतील 'घायाळ पाखरा'ची दिल्लीवारी

Tags: ghayal pakhara drama, international drama bharat mahotsav, chandrapur, vidarbha

चंद्रपूर - गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात जीवन जगताना अन्याय-अत्याचार होऊनही हातात कोणतेही शस्त्र न घेता लेखणी आणि संविधानाचा अस्त्र मानून झटणाऱ्या एका तरुणाच्या सत्यकथेवर आधारित "घायाळ पाखरा' या नाटकाची निवड दिल्ली येथे आयोजित आंतरराष्ट्रीय नाट्य भारत महोत्सवात झाली आहे. या नाटकाचा प्रयोग 12 जानेवारी रोजी सादर केला जाणार आहे.

झाडीपट्टीचे नायक, गायक व अभिनेता अनिरुद्ध वनकर लिखित व दिग्दर्शित "घायाळ पाखरा'ची निर्मिती लोकजागृती रंगभूमी वडसाने केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथे राहणारा गौतम हा "एम.ए.'पर्यंत शिक्षण झालेला तरुण आहे. त्याच्या नावाचे साधर्म्य साधून एक तोतया तरुण नोकरी हिसकावून घेतो. नक्षल्यांच्या अन्याय-अत्याचारालाही तो बळी पडतो. मात्र, त्यांचा प्रतिकार करण्यासाठी त्याने कधी हातात शस्त्र घेतले नाही. भारतीय संविधानाने दिलेली लोकशाही, कायदा आणि लेखणी यांनाच अस्त्र मानून अन्यायाविरुद्ध लढा पुकारतो. व्यवस्थेला बळी पडलेल्या तरुणाला "घायाळ पाखरा' अशी उपमा देत श्री. वनकर यांनी सत्यकथेवर नाटकाचे लेखन केले. झाडीपट्टीतील नाट्य हंगामात या नाटकाचे 148 प्रयोग झाले.
संस्कृती मंत्रालयाच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामातर्फे आंतरराष्ट्रीय भारत रंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, यात जर्मन, पोलंड, कॅनडा, लंडन, द. कोरिया, द. आफ्रिका या देशांसह भारतातील अनेक राज्यांतील नाटकाचे प्रयोग भारत रंग नाट्य महोत्सवात होत आहे. 12 जानेवारी 2012 रोजी संगीत नाटक अकादमी नई दिल्ली येथील मेघदूत ऑडिटोरिअम येथे नाट्यप्रयोग सादर होईल.
"घायाळ पाखरा' हे झाडीपट्टीतील गाजलेले नाटक असून, या महोत्सवात विदर्भातून प्रथमच निवड झाली आहे. नाटकात प्रमुख भूमिकेत अनिरुद्ध वनकर, तेजश्री बापट, संजय रामटेके, परमेश्‍वर पवार, रूपेश परतवाघ, भारत रंगारी, आसावरी तारे, विद्या भागवत, रजनी देशभ्रतार, अनिल ओव्हळ, राम मराठे, बालकलावंत शेषराव जिबकाटे, अरविंद वानखेडे, नितीन गणवीर, अनिल डोंगरे, मोरेश्‍वर बोरकर यांचा समावेश आहे. नाटकातील संगीत आदेश राऊत, आनंद वाकडे यांनी दिले असून, रंगमंच सजावट राजू सावरकर, आनंद सराटे यांची आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग

Tags: abmss, preparation, chandrapur, vidarbha
चंद्रपूर - येत्या तीन ते पाच फेब्रुवारीदरम्यान होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहा परिसंवाद, दोन कविसंमेलन, कथाकथन, मुलाखत आदी कार्यक्रमांची रूपरेषा आखल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे यांनी पत्रपरिषदेत दिली.
महाराष्ट्र राज्याचा सुवर्णमहोत्सव आणि चंद्रपूर महानगराच्या पंचशताब्दी वर्षानिमित्त आयोजित 85 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन तीन फेब्रुवारी रोजी दुपारी चारला होईल. समारंभाला अध्यक्ष प्रा. वसंत आबाजी डहाके, पूर्वाध्यक्ष उत्तम कांबळे राहतील. उद्‌घाटन न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हस्ते होईल. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. महिपसिंग उपस्थित राहणार आहेत. समारंभाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री संजय देवतळे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय आईंचवार उपस्थित राहतील. संमेलनात एकूण सहा परिसंवाद होतील. यात "नक्षलवाद, लोप पावत चाललेली आदिवासी संस्कृती आणि मराठी साहित्य', "आधुनिक तंत्रज्ञान आणि मराठी साहित्य व्यवहार', "आजचे प्रश्‍न आणि प्रबोधनकारी संत साहित्य', "समकालीन कृषी उद्योग आणि पर्यावरण यांचे चित्र आजच्या मराठी साहित्यात पुरेसे प्रतिबंधित होत नाही', "मराठीच्या दुरवस्थेला प्रसारमाध्यमेसुद्धा कारणीभूत आहेत काय?', "मराठीचे संवर्धन यापुढे बोलीभाषाच करतील' आदी विषयांचा समावेश आहे. याशिवाय दोन कविसंमेलन आणि कथाकथन होईल. पाच फेब्रुवारी रोजी कविवर्य फ. मु. शिंदे यांची मुलाखत आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा सत्कार होईल. पाच फेब्रुवारीला सायंकाळी सहाला समारोप आणि खुले अधिवेशन होईल. यावेळी अध्यक्ष प्रा. वसंत आबाजी डहाके, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री संजय देवतळे, स्वच्छता व पाणीपुरवठामंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांची उपस्थिती राहणार आहे.



जय्यत तयारी
सरदार पटेल मेमोरियल सोसायटी आणि सर्वोदय शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित मराठी साहित्य संमेलनासाठी येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात जय्यत तयारी केली जात आहे. एकूण 50 हजार स्क्वेअर फुटाच्या प्रांगणात भव्य शामियाना तयार करण्यात येत आहे. पाच हजार प्रेक्षक बसतील, इतकी आसन व्यवस्था करण्यात येणार आहे. सोमवारी (ता. नऊ) समितीतील प्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर मुख्य संमेलन स्थळाच्या व्यासपीठाचे भूमिपूजन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय आईंचवार यांच्या हस्ते झाले. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. डॉ. उषा तांबे, महामंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे व गुरुनाथ दळवी, विदर्भ साहित्य मंडळाचे अध्यक्ष म्हैसळकर, स्वागताध्यक्ष शांताराम पोटदुखे यांची उपस्थिती होती.

Monday, January 02, 2012

आनंदवनच्या कार्यासाठीचा हा पुरस्कार ः डॉ. आमटे

आनंदवनच्या कार्यासाठीचा हा पुरस्कार ः डॉ. आमटे


चंद्रपूर - चंद्रपूरभूषण पुरस्काराने जो गौरव होत आहे, तो वैयक्तिक नाही. आनंदवनच्या कार्यासाठीचा हा पुरस्कार आहे. बाबांच्या चळवळीचा आपण "ठेकेदार' आहे. त्यांचे कार्य पुढे नेण्याचे काम करीत आहे, असे उद्‌गार डॉ. विकास आमटे यांनी काढले.



लोकाग्रणी स्व. ऍड. बळवंत राघव उपाख्य बाबासाहेब देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लोकाग्रणी स्मृती प्रतिष्ठानतर्फे स्नेहांकितच्या व्यासपीठावरून दिला जाणारा यंदाचा नववा "चंद्रपूरभूषण' पुरस्कार आनंदवन व महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे यांना रविवारी (ता. एक) सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या सत्कारप्रसंगी ते बोलत होते.



प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृहात आयोजित सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे होते. यावेळी मंचावर प्राचार्य झाकिर शेख, प्राचार्य मदन धनकर, ऍड. चंद्रकांत देशमुख यांची उपस्थिती होती. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या हस्ते डॉ. विकास आमटे यांना सन्मानपत्र, शाल-श्रीफळ आणि 11 हजार रुपये रोख देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शहरातील काही नागरिकांनी आनंदवन संस्थेला मदत म्हणून एक लाख 20 हजारांचा निधी जाहीर केला. सन्मानपत्राचे वाचन प्राचार्य मदन धनकर यांनी केले. प्रास्ताविक जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. चंद्रकांत देशमुख यांनी केले. संचालन राजाभाऊ बोझावार यांनी केले. यावेळी सभागृहात माजी आमदार ऍड. एकनाथराव साळवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.



राष्ट्रव्यापी लोकशक्ती अभियान राबवू : मेधा पाटकर

देशातील भ्रष्टाचार थांबविण्यासाठी अण्णा हजारेंच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे. मात्र, शासनाने जनलोकपालला मंजुरी दिलेली नाही. लोकपाल कायदा अमलात आणण्यासाठी सर्वांत मोठी लढाई सुरू असतानाही शासन झुकलेले नाही. आता राष्ट्रव्यापी लोकशक्ती अभियान राबवू, अशी घोषणा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केली.