সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, November 12, 2016

वाघांसह शेतकरी संरक्षणही महत्वाचे

वाघांसह शेतकरी संरक्षणही महत्वाचे

- बंडू धोतरे

गोंडपिंपरी तालुक्‍यात घनदाट जंगल आहे. कुशीत अनेकांच्या उपजिविकेची शेती आहे. त्यात राबून उत्पन्न घेतले जाते. मात्र, जंगलाच्या शेजारची ही शेती वन्यप्राण्यांमुळे नष्ठ होत आहे. रात्रीच्या वेळी वन्यजीव शेतात येतात. पिकांची नासाडी करतात. हे नुकसान भरून निघत नाही. त्यामुळे शेतकरी त्रासला, वैतागला. वन्यप्राण्यापासून या पिकाचे रक्षण करण्यासाठी त्याने शेतीभोवती वीजतारांचे कुंपण केले. त्यास वीज प्रवाह सोडतात. एक नोव्हेंबरच्या रात्री वीजप्रवाह सुरू करून शेतकरी घरी परतला. आतातरी वन्यजीव नासधूस करणार नाहीत, या आशेनं तो रात्रभर निवांत झोपला. पण, एक चिंत वारंवार सतावत होती. कुण्या मनुष्याला वीजेचा धोका होऊ नये, म्हणून वीजप्रवाह सकाळीच बंद करणे गरजेचे होते. त्यासाठीच तो सकाळीच उठला. त्याने शेत गाठले. धुऱ्यावर गेला. येथील चित्र बघून धक्का बसला. हा नुसता धक्का नव्हता, तर त्याच्या हातून झालेला खून होता. कुंपणच्या जवळच जंगलाचा राजा पडला होता. तो मृतावस्थेत होता. इतक्‍यात व्यायामासाठी निघालेले तरुण आले. त्यांना हकीगत सांगितली. त्या वाघास रस्त्याच्या कडेला झाकून ठेवले. नंतर, दिवसभरात शेतातच गड्डा खोदला. रात्रीच्या वेळेस सदर युवक व शेतमालकाचे दोन नातेवाईकांच्या मदतीने मृत वाघास ओढत नेले. खड्डयात पुरले. पुरावे नष्ट करून गुन्ह्यापासून दूर पळण्यासाठी ते वाट शोध होते.
तीन नोव्हेंबरच्या दुपारी परिसरात काणकुण सुरू झाली. वाघ मेला, वाघ मेला बायामाणसं बोलू लागले. चर्चा गावभर झाली. पण, खात्रीशिर माहिती नव्हती. चार नोव्हेंबरला गावाचे नावे चर्चेत आले. वनविभाग खळबळून जागे झाले. इकडे शेतमालकाची धाकधूक वाढली होती. उद्या घटना उघड झाली, तर आपले काही खरे नाही, याची कल्पना त्याला आली. तो वनविभागाच्या कार्यालयात आला. छातीवर हात ठेवत हिंमत केली. घटनेची कबुली दिली. वीजप्रवाहाने वाघ मेला जी!, असे तो सांगत होता. वनाधिकारी घामघूम झाले. आता चौकशी लागणार, पंचनामा होणार? अगदी तसेच झाले. अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बुजविलेला खड्डा खोदला. माती बाहेर काढली. बघतात तर काय वाघाचा मृतदेह होता. आरोपी शेतकऱ्यास ताब्यात घेतले. गुन्हा नोंद केला. वाघाचे शव वैद्यकीय तपासणीसाठी पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.

विज प्रवाहाने वन्यप्राणी मारण्याच्या घटना चंद्रपूर जिल्ह्याचा इतिहासात नव्या नाहीत. पण, अशा पद्धतीने अवैधरित्या विज प्रवाह सोडण्याच्या कृत्याचे कुणीही समर्थन करणार नाही. परंतु, अश्‍या घटनेत वाघ काय, कुठलेही वन्यप्राणी मारले जाणार नाही याकरीता प्रयत्न केले जाणे गरजेचे आहे. जिल्ह्यात वाघ आणि शेतकरी दोन्ही वाचविण्यासाठी सामूहिक प्रयत्न झाले, तरच जिल्ह्यात व्याघ्र संवर्धनाची चळवळ यशस्वी होऊ शकते.
काही फायदेशीर मुद्दे
  • 1. शेतकरी शेतपिक नुकसानीच्या समस्येपासून मुक्त होतील
  • 2. मोठ्‌या प्रमाणात शेतपिक वाटपाची गरज वनविभागास पडणार नाही
  • 3. वन्यप्राणी मृत्यूच्या घटना घडणार नाहीत
  • 4. शेतपिक नुकसानी वाचल्याने पीक उत्पन्न दुपटीने वाढ होण्याची शक्‍यता
  • 5. शेतपिक सुरक्षित राहत असल्याने काही शेतकरी बांधवाना दुबार पीक घेण्याची संधी मिळणार
  • 6. वाघ-वन्यप्राणी आणि वनविभाग कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास मदत मिळेल.

Saturday, June 04, 2016

दोन शब्द..   राजीनाम्याविषयी...

दोन शब्द.. राजीनाम्याविषयी...

- एकनाथराव खडसे

  • Ø माझ्यावर ज्यांनी आरोप केले, मात्र त्यांनी पुरावे दिले नाहीत.
  • Ø गेल्या ४० वर्षाच्या राजकीय जीवनात मी अनेक पदं भूषविली,
  • पण यापूर्वी असा ‘मिडीया ट्रायल’ चा अनुभव कधी घेतला नव्हता.
  • Ø पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या जमिनीचा बनावट कागदपत्रांच्या आधारे केलेला टी.डी.आर. घोटाळा उघडकीस आणला. एफ्.आय.आर. दाखल करायला लावला शासनाची गेलेली टी.डी.आर. वगैरे धरून रु.४०० कोटी मुल्याची जमीन शासनास परत मिळवून दिली.
  • Ø मंत्री झाल्यानंतर मंत्रीमंडळ तसेच विधी मंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत जनहिताचे ११९ निर्णय घेतले.
  • Ø भोसरी, पुणे येथील एमआयडीसी च्या जमिनीचा मोबदला ४८ वर्षानंतर या क्षणापर्यंत मूळ मालकाला दिला गेला नाही. या जमिनीचा निवाडा झालेला नसल्याचे व भूसंपादन अपूर्ण असल्याने भूसंपादन प्रक्रिया नव्याने राबविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, एम.आय.डी.सी. यांच्या अहवालात नमूद आहे. सदरचा व्यवहार बेकायदा व नियमबाह्य नव्हे; तर, तो दोन व्यक्तीमधील (Person to Person) असा कायदेशीर व्यवहार आहे. या संबंधीचे सर्व पुरावे सविस्तरपणे दिले. मात्र, त्याला प्रसिध्दी न देता माझ्यावर एकांगी आणि निराधार आरोप करण्यात आले.
  • Ø येरवडा, पुणे येथील खाजगी बिल्डरने हडप केलेली १० एकर जमीन शासनास परत मिळवून दिली.
  • Ø वक्फ बोर्डाच्या जमिनीवर झालेली बेकायदा अतिक्रमणे काढून ती जमीन वक्फ बोर्डाकडे परत मिळावी म्हणून निर्णय घेतला.
  • त्यामुळे अनेक जण दुखावले गेले.
  • Ø महाराष्ट्रात भाजपाच्या हितासाठी, पक्षाच्या विस्तारासाठी मी काम केलं आहे.
  • Ø माझ्यावरील आरोप सिध्द झाल्यास मी मंत्रीपदावरच काय, राजकीय जीवनातून माघार घेईन. पण अधिकृत पुरावे सादर करा. बिनबुडाचे, निराधार आरोप करु नका, असे मी वारंवार म्हटले आहे. निराधार आरोपांमुळे भाजपा आणि राज्य सरकार बदनाम होत आहे.
  • Ø हॅकर म्हणजे चोर. त्यावर प्रसार माध्यमांनी विश्वास ठेवला, पण माझ्यावर नाही. मी दिलेल्या पुराव्यावर त्यांचा विश्वास नाही.
  • Ø मला बदनाम करणाऱ्यांचीही चौकशी करा. मा.मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.
  • Ø माझ्यावरील आरोपांच्या बातम्या देतांना माध्यमांनी पुरावे छापले असते, तर मला आनंदच झाला असता.
  • Ø मी भरपूर लेखी पुरावे दिले. माझ्या web site (www.nathabhau.com) वर ते उपलब्ध करुन दिले. लेखी खुलासे केले. मात्र, ते न छापता, प्रसिध्दी माध्यमांनी कट केल्याप्रमाणे मला बदनाम करण्यासाठी माझ्यावर शरसंधान केले.
  • Ø भाजपानं नैतिक मूल्यांचं नेहमीच पालन केलं आहे.
  • Ø माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपातून जोपर्यंत मी मुक्त होत नाही, तोपर्यंत मी मंत्री पदावर राहणार नाही.
  • Ø आरोप करणाऱ्यांना केवळ माझा मानसिक छळ करायचा आहे. भाजपाला आणि मला बदनाम करण्याचं त्यांचं षडयंत्र आहे. Ø या सर्व घडामोडीत भाजप माझ्या पाठीशी राहिला, त्याबद्दल भाजपचे आभार. आणि यापुढेही पक्ष माझ्या पाठिशी राहील, असा मला विश्वास आहे.

Friday, May 27, 2016

आत्याच्या जमिनीवर भाच्याने केला बळजबरीने ताबा

आत्याच्या जमिनीवर भाच्याने केला बळजबरीने ताबा

चंद्रपूर - आत्याच्या शेतजमिनीवर भाच्याने बळजबरीने ताबा घेतला असून, दरम्यान, याची तक्रार पोलिसांत करण्यात आली. याप्रकरणी मोहन पावडे त्याच्या दोन साथीदाराविरोधात वरोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

नागरी येथील नारायण श्रावण पावडे यांनी आपल्या दोन मुलींना नागरी येथील भूमापन क्र. २४४ ची जमीन मुलगी पुष्पा सुरेशराव झाडे चंद्रपूर आणि सिंधु बाबारावजी पिसे हिंगणघाट यांना बक्षीसपत्र करून दिली. या जमिनीवर मोहन बंडू पावडे याने बळजबरी करीत जमिनीवर ताबा करून ठेवला आहे. २१ मे रोजी जमीनमालक पुष्पा झाडे आणि सिंधु पिसे जमिन ताब्यात घेण्यासाठी शेतावर गेल्या. तेव्हा मोहन बंडू पावडे व त्याच्या इतर दोन साथीदाराने शेतमालक पुष्पा आणि सिंधु यांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. झाडे, पिसे यांनी याची पोलिसांत तक्रार केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पावडे आणि त्याच्या दोन साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वडिलांनी बक्षीसपत्र करून दिलेल्या जमिनीचा सातबारा पुष्पा झाडे आणि सिंधु पिसे यांच्या नावाने आहे. प्रत्यक्षात जमिनीच्या मालक दोन्ही बहिणी आहेत. मात्र, त्यांच्या जमिनीचा भाचा मोहन बंडू पावडे याने ताबा घेतला. त्याची वहिवाटही तो करीत आहे. शेती मालक असल्याची आवश्यक कागदपत्रे घेऊन त्या दोन बहिणी शेतजमिनीवर कब्जा करण्यासाठी शेतावर गेल्या. तेव्हा मोहन बंडू पावडे, त्याचे साथीदार अंकुश शेलोकर, गजानन सातपूते यांनी शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली होती.

Wednesday, April 27, 2016

मंडळ अधिकारी कार्यालयांची निर्मितीस मान्यता

मंडळ अधिकारी कार्यालयांची निर्मितीस मान्यता

मुंबई दि.२६ एप्रिल : गेल्या ३० वर्षात महाराष्ट्रात वाढलेली लोकसंख्या, खातेदारांची संख्या, महसुली गावे, तलाठ्यांकडे वेळोवेळी मोठ्या प्रमाणात सोपविण्यात आलेली कामे इत्यादींमुळे राज्यातील तलाठ्यांवर मोठ्या प्रमाणात कामाचा बोजा वाढला आहे. त्या अनुषंगाने राज्यातील वाढीव तलाठी साझा व मंडळ अधिकारी कार्यालयांची निर्मिती करण्यास आज मंत्रिमंडळाने तत्वत: मान्यता दिली असल्याची माहिती महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज येथे दिली.

     खडसे पुढे म्हणाले की, तलाठी साझा पुनर्रचना समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने पुढील निर्णय घेण्यासाठी महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात यावी व या समितीचा अहवाल मंत्रिमंडळाच्या अंतीम निर्णयासाठी सादर करण्यात यावा, असाही आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

     महसूल विभाग लोकाभिमुख विभाग असून प्रशासकीय सुविधेसाठी राज्याचे एकूण सहा महसूली विभागात विभाजन करण्यात आले आहे. या विभागांच्या अधिनस्त एकूण ३६ जिल्हे, १८४ उपविभाग, ३५८ तालुके, २,०९३ मंडळ अधिकारी कार्यालये आणि १२,३२७ तलाठी साझे आहेत. तलाठी हा गाव पातळीवरील महत्वाचा कर्मचारी आहे. राज्यातील तलाठी साझा निर्मितीसाठी निकष निश्चित करण्याच्या उद्देशाने १९७४ साली डी.एन.कपूर समिती गठित करण्यात आली होती. या समितीने निश्चित केलेल्या निकषानुसार १९८३ साली तलाठी साझांची निर्मिती करण्यात आली. आजमितीस राज्यात १२,३२७ तलाठी साझे अस्तित्वात आहेत. मात्र, वर उल्लेख केल्याप्रमाणे तलाठ्यांवर कामाचा बोजा मोठ्या प्रमाणात वाढलेला असल्यामुळे तसेच यासाठी तलाठ्यांच्या संघटनेने तलाठी साझांची पुनर्रचना करावी अशी मागणी केली होती. त्या अनुषंगाने १८ फेब्रुवारी, २०१४ रोजी राज्य शासनाने नागपुरच्या विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तलाठी साझा पुनर्रचना समिती गठीत केली होती. या समितीने गेल्या ऑगस्ट मध्ये आपला अहवाल शासनास सादर केला होता. त्यानुसार नवीन तलाठी साझा निर्मितीबाबत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला.
वेंडर अॅक्टची अमंलबजावणीसाठी निर्देश

वेंडर अॅक्टची अमंलबजावणीसाठी निर्देश

केंद्रिय राज्यमंत्री हसंराज अहिर 

नागपूर - वेंडर अॅक्ट कायदयांची अमंलबजावणी करण्यांचे दृष्टीने तातडीने कारवाई करावे असे निर्देष केंद्रिय रसायन व खते राज्यमंत्री हसंराज अहिर यांनी नागपूर विभागीय आयुक्तांना दिले. श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी ना. अहिर यांची भेट घेवून, वेंडर अॅक्टची राज्यात अमंलबजावणी होत नसल्यांचे निदर्शनास आणून देत या कायदयाची अमंलबजावणी करण्यांची मागणी केली होती. या कायदयाची अमंलबजावणी होत नसल्यांने ना. अहिर यांनी नाराजी व्यक्त करीत, अमंलबजावणीच्या सुचना दिल्यात.
नाम. अहिर यांचे आदेश प्राप्त होताच, नागपूर विभागाचे आयुक्त तथा प्रादेशीक संचालक, नगर परिषद प्रशासन नागपूर यांनी त्यांचे क्षेत्रातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोलीचे जिल्हाधिकारी यांना दिनांक 17/3/2016 रोजी कार्यालयीन आदेश पाठवून, अमंलबजावणी करण्यांचे निर्देश दिले आहे.
देशात ‘द स्ट्रिट वेंडर्स प्रोटेक्षन आॅफ लाईव्हलीहूड अॅंड रेग्युलेशन आॅफ स्ट्रिट वेंडीग अॅक्ट 2014 पारित केले आहे. या कायदयामुळे देशातील फुटपाथवर किरकोळ व्यवसाय करणा—यास सरंक्षण देण्यात आले आहे. महानगर पालिका, नगर पालीका व नगर पंचायतीच्या क्षेत्रात हा कायदा लागू असून, प्रत्यक्षात मात्र हा कायदा अजूनही अमंलात आणल्या न गेल्यांने अनेक नगर पालीकाचे क्षेत्रात फुटपाथ हटावच्या नावाखाली किरकोळ व्यवसाय करणा—या गरीबांना हुसकावून लावले जात आहे. या पाष्र्वभूमीवर श्रमिक एल्गारने वेंडर अॅक्ट कायदयाची अमंलबजावणी करावी अशी मागणी लावून धरली असून, या कायदयाची सोप्या भाषेत माहिती देणारे पुस्तक प्रकाशीत केले व फुटपाथ व्यावसायीकांचा मेळावाही घेण्यात आला.
केंद्रीय राज्यमंत्री ना. हसंराज अहिर यांनी वेंडर अॅक्टच्या अमंलबजावणीसाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल श्रमिक एल्गारच्या अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी त्यांचे आभार मानून, यामुळे किरकोळ व्यावसायीकांना लाभ मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

Friday, April 22, 2016

तेलंगानात कामासाठी गेलेल्या युवकांची सुटका

तेलंगानात कामासाठी गेलेल्या युवकांची सुटका

- श्रमिक एल्गारच्या प्रयत्नाला यश

सावली -  युवक मागील 2—3 महीण्यापासुन तेलंगाना येथील कंपनीत कामावर गेले असता त्यांची मजुरी न देता परत येऊ देत नसल्याची तक्रार श्रमिक एल्गारच्या माध्यमातुन मजुरांच्या पालकांनी पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांचेकडे केली होती.त्यानंतर चंद्रपूर पोलीसांनी तेलंगाना पोलीसांशी संपर्क साधुन सर्व मजुरांची मजुरीसहीत सुटका होऊन घरी परतले
सावली तालुक्यातील चारगांव येथील चंद्रशेखर गजानन गावतुरे, समिर शामकुमार मडावी, जयपाल अरूण गेडाम, नागेश कपिल कुमरे, राकेश शांताराम गुरगुले, मोसम पत्रू आत्राम, शरद वेटे, रामा भैयाजी मोहुर्ले हे युवक 7 फरवरी 2016 पासून तेलंगानातील येमुलवाडा येथिल श्रीराम कोरी या दगडाच्या खदानीत काम करीत होते. 2 महीण्याचा कलावधी लोटल्यानंतरही मात्र मजुरांना गावाकडे परत येण्यासाठी मनाई केल्या जात होते, मजुरांचा छळ केल्या जात होते व मजुरीही दिल्या जात नसल्याने याबाबत पालकांनी श्रमिक एल्गारकडे तक्रार केली होती. नेहमीप्रमाणे मजुरांची अडचण लक्षात घेता ठेकेदाराचे तावडीतुन मजुरीसह सुटका करण्याचे निवेदन श्रमिक एल्गारचे माध्यमातून पालकांनी चंद्रपूरचे पोलीस उपअधिक्षक राजपूत यांचेकडे सादर केले. या प्रकरणाची दखल घेत राजपूत यांनी युवकांना सोडविण्यासाठी प्रयत्न करुन येमुलवाडा पोलीसांकडे संपर्क साधला यामुळे 8 मजूरांची सूटका होऊन 90 हजार रुपये मजुरीसह गावाकडे परत आले. यामुळे मजूर व पालकांनी श्रमिक एल्गार व चंद्रपूर पोलीसांचे आभार मानले आहे

Wednesday, April 20, 2016

Tuesday, March 01, 2016

शासनातर्फे नुकसान भरपाई जाहीर

शासनातर्फे नुकसान भरपाई जाहीर

मुंबई दि.1 मार्च : राज्यात 27 फेब्रुवारी ते 1 मार्च 2016 पर्यंत झालेला अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीची माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज मंत्रालयात पत्रकारांना पुढीलप्रमाणे दिली.

  • नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना दोन हेक्टरपर्यंत प्रतिहेक्टरी कोरडवाहू शेतीसाठी 6,800 रुपये, फळपिकासाठी प्रतिहेक्टरी 13,500 रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी प्रतिहेक्टरी 18 हजार रुपये याप्रमाणे शासनातर्फे मदत देण्यात येणार आहे.
  • · नैसर्गिक आपत्तीमुळे पशुधनाचे नुकसान झाल्यास, मृत्यु झाल्यास प्रती गाय किंवा प्रती म्हैस रुपये 30 हजार, प्रती बैल 25 हजार रुपये, प्रती गाढव रुपये 15000, प्रती शेळी/मेंढी/डुक्कर रु.3,000 याप्रमाणे प्रती कुटुंब पाच जनावरांच्या मर्यादेपर्यंत नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. व्यक्तीचा मृत्यु झाल्यास मृताच्या वारसांना प्रतीव्यक्ती चार लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. नुकसानभरपाईसाठी असलेली पूर्वीची वयाची अट काढून टाकण्यात आली आहे.
  • · पाणी टंचाई लक्षात घेता नदी, नाले इत्यादी स्त्रोतांपासून विद्युत मोटारीद्वारे अवैध पाण्याचा उपसा होत असल्यास अशा मोटारी जप्त करण्याचे तसेच इलेक्ट्रीक कनेक्शन काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रती व्यक्ती 40 लिटर या हिशेबाप्रमाणे उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात येणार असून येत्या 4 मार्च पासून मी स्वत: मराठवाड्याच्या दौऱ्यावर चाऱ्याची, पाण्याची व पिकाची स्थिती यांचा अंदाज घेण्यासाठी जाणार आहे, असे मंत्री खडसे यांनी पत्रकारांना सांगितले.
  • · औरंगाबाद विभाग या विभागात नांदेड जिल्ह्यात एका व्यक्तीचा मृत्यु झाला. तर याच जिल्ह्यात 9 लहान आणि 3 मोठी जनावरे मिळून 12 जनावरे मृत पावली. बीड जिल्ह्यात 2 मोठी, लातूर जिल्ह्यात 1 मोठे उस्मानाबाद जिल्ह्यात 1 लहान व 6 मोठी मिळून 7 जनावरे मृत्युमुखी पडली. मृत्युमुखी पडलेल्या जनावरांची एकूण संख्या 22. घरे अथवा मालमत्तेचे कोणतेही नुकसान नाही.
  • · औरंगाबाद विभागात एकूण आठ जिल्ह्यांमध्ये वरील काळात पडलेला पाऊस असा. औरंगाबाद 0.04, जालना 0.46, परभणी 6.86, हिंगोली 10.36, नांदेड 9.07, बीड 8.11, लातूर 19.13, उस्मानाबाद 12.15 .
  • · नाशिक विभागामध्ये मालेगांव शहरात आंगावर झाड पडल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यु तर ग्रामीण भागात एका बैलाचा वीज पडल्यामुळे मृत्यु, धुळे तालुक्यात एका बैलाचा मृत्यु, अहमदनगर जिल्ह्यात अकोला तालुक्यात वीज पडल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यु. धुळे व गारबरडी येथे वीज पडल्यामुळे दोन व्यक्तींचा मृत्यु झाला.
  • · नाशिक जिल्ह्यात पडलेला पाऊस मालेगांव-2, नांदगांव-5, धुळे-6, यावल-4.3, मुक्ताईनगर-0.7, नगर अकोले-35, राहूरी -8.4, अहमदनगर-2, पाथर्डी-21, जामखेड-2.3
  • · नागपूर विभागात अवकाळी पाऊस व गापीटीमुळे वर्धा जिल्ह्यात सात घरांचे तर गोंदिया जिल्ह्यात 21 घरांचे अंशत: नुकसान. भंडारा जिल्ह्यात वीज पडल्यामुळे म्हशीचे रेडकू व 22 शेळ्या मृत. · अमरावती विभागात वरील काळात एकूण 14 मी.मी. पाऊस पडला. वादळी पाऊस व गारपीटीमुळे अमरावती, अकोला व यवतमाळ जिल्ह्यात रब्बी पिकांचे व फळ पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले. 17 गावे बाधीत झाली आहेत. वाशिम जिल्ह्यात 5 गावांमध्ये नुकसान झाले आहे. अमरावती विभागात 61, यवतमाळ जिल्ह्यात 59 व वाशिम जिल्ह्यात 13 गावांचे नुकसान झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यात 1 गाय व 1 वासरु वीज पडल्यामुळे मृत्युमुखी पडले.
  • नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान
  • शासनातर्फे नुकसान भरपाई
  • मुंबई दि.1 मार्च : राज्यात 27 फेब्रुवारी ते 1 मार्च 2016 पर्यंत झालेला अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीची माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज मंत्रालयात पत्रकारांना पुढीलप्रमाणे दिली.
  • · नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना दोन हेक्टरपर्यंत प्रतिहेक्टरी कोरडवाहू शेतीसाठी 6,800 रुपये, फळपिकासाठी प्रतिहेक्टरी 13,500 रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी प्रतिहेक्टरी 18 हजार रुपये याप्रमाणे शासनातर्फे मदत देण्यात येणार आहे.
  • · नैसर्गिक आपत्तीमुळे पशुधनाचे नुकसान झाल्यास, मृत्यु झाल्यास प्रती गाय किंवा प्रती म्हैस रुपये 30 हजार, प्रती बैल 25 हजार रुपये, प्रती गाढव रुपये 15000, प्रती शेळी/मेंढी/डुक्कर रु.3,000 याप्रमाणे प्रती कुटुंब पाच जनावरांच्या मर्यादेपर्यंत नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. व्यक्तीचा मृत्यु झाल्यास मृताच्या वारसांना प्रतीव्यक्ती चार लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. नुकसानभरपाईसाठी असलेली पूर्वीची वयाची अट काढून टाकण्यात आली आहे.
  • · पाणी टंचाई लक्षात घेता नदी, नाले इत्यादी स्त्रोतांपासून विद्युत मोटारीद्वारे अवैध पाण्याचा उपसा होत असल्यास अशा मोटारी जप्त करण्याचे तसेच इलेक्ट्रीक कनेक्शन काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रती व्यक्ती 40 लिटर या हिशेबाप्रमाणे उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात येणार असून येत्या 4 मार्च पासून मी स्वत: मराठवाड्याच्या दौऱ्यावर चाऱ्याची, पाण्याची व पिकाची स्थिती यांचा अंदाज घेण्यासाठी जाणार आहे, असे मंत्री खडसे यांनी पत्रकारांना सांगितले.
  • · औरंगाबाद विभाग या विभागात नांदेड जिल्ह्यात एका व्यक्तीचा मृत्यु झाला. तर याच जिल्ह्यात 9 लहान आणि 3 मोठी जनावरे मिळून 12 जनावरे मृत पावली. बीड जिल्ह्यात 2 मोठी, लातूर जिल्ह्यात 1 मोठे उस्मानाबाद जिल्ह्यात 1 लहान व 6 मोठी मिळून 7 जनावरे मृत्युमुखी पडली. मृत्युमुखी पडलेल्या जनावरांची एकूण संख्या 22. घरे अथवा मालमत्तेचे कोणतेही नुकसान नाही.
  • · औरंगाबाद विभागात एकूण आठ जिल्ह्यांमध्ये वरील काळात पडलेला पाऊस असा. औरंगाबाद 0.04, जालना 0.46, परभणी 6.86, हिंगोली 10.36, नांदेड 9.07, बीड 8.11, लातूर 19.13, उस्मानाबाद 12.15 .
  • · नाशिक विभागामध्ये मालेगांव शहरात आंगावर झाड पडल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यु तर ग्रामीण भागात एका बैलाचा वीज पडल्यामुळे मृत्यु, धुळे तालुक्यात एका बैलाचा मृत्यु, अहमदनगर जिल्ह्यात अकोला तालुक्यात वीज पडल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यु. धुळे व गारबरडी येथे वीज पडल्यामुळे दोन व्यक्तींचा मृत्यु झाला.
  •  नाशिक जिल्ह्यात पडलेला पाऊस मालेगांव-2, नांदगांव-5, धुळे-6, यावल-4.3, मुक्ताईनगर-0.7, नगर अकोले-35, राहूरी -8.4, अहमदनगर-2, पाथर्डी-21, जामखेड-2.3
  •  नागपूर विभागात अवकाळी पाऊस व गापीटीमुळे वर्धा जिल्ह्यात सात घरांचे तर गोंदिया जिल्ह्यात 21 घरांचे अंशत: नुकसान. भंडारा जिल्ह्यात वीज पडल्यामुळे म्हशीचे रेडकू व 22 शेळ्या मृत. 
  • अमरावती विभागात वरील काळात एकूण 14 मी.मी. पाऊस पडला. वादळी पाऊस व गारपीटीमुळे अमरावती, अकोला व यवतमाळ जिल्ह्यात रब्बी पिकांचे व फळ पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले. 17 गावे बाधीत झाली आहेत. वाशिम जिल्ह्यात 5 गावांमध्ये नुकसान झाले आहे. अमरावती विभागात 61, यवतमाळ जिल्ह्यात 59 व वाशिम जिल्ह्यात 13 गावांचे नुकसान झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यात 1 गाय व 1 वासरु वीज पडल्यामुळे मृत्युमुखी पडले.

Thursday, February 25, 2016

समारंभासाठी मद्य अनुज्ञप्ती शुल्कात कपात

समारंभासाठी मद्य अनुज्ञप्ती शुल्कात कपात

 एकनाथराव खडसे

मुंबई : राज्यातील मद्य निर्माण करणाऱ्या निर्माण्यांकडून मिळणारे अनुज्ञप्ती शुल्क आकारण्याची पध्दत सध्या उत्पादनाच्या टप्प्यावर आहे. या पध्दतीत मद्याचे कमी उत्पादन करणाऱ्या व्यक्तीस जास्त अनुज्ञप्ती शुल्क व जास्त मद्य उत्पादन करणाऱ्या व्यक्तीस फारच कमी प्रमाणात अनुज्ञप्ती शुल्क आकारण्यात येते. परीणामी लहान उद्योजकांचे नुकसान होत होते. त्यामुळे या पध्दतीत बदल करुन आता मद्य निर्माता तो उत्पादित करीत असलेल्या प्रत्येक बॉक्स मागे अनुज्ञप्ती शुल्क आकारण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यामुळे जास्त मद्य उत्पादन करणाऱ्या निर्मात्यास सध्याच्या तुलनेत अधिक प्रमाणात शुल्क भरावे लागेल. तर, कमी उत्पादन करणाऱ्या मद्य उत्पादकास कमी शुल्क भरावे लागेल. यामुळे महसुलामध्ये वाढ होईल, अशी माहिती उत्पादन शुल्क मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज मंत्रालयात दिली.

Monday, February 22, 2016

फुटपाथ व्यवसायीकांचा मेळावा आज

फुटपाथ व्यवसायीकांचा मेळावा आज

चंद्रपूर - शहरातील अतिक्रमणदारांना सरंक्षण आणि त्यांचे व्यवसायाला संवर्धन देणारा 'वेंडर अॅक्ट' केंद्र सरकारने मंजूर केला असून, या कायदयाची अमंलबजावणी करण्यात यावी यादृष्टीने जनजागृती करण्यासाठी फुटपाथ व्यवसायीकांचा मेळावा आज (दिनांक 23 फेब्रु.)घेण्यात येत आहे.
चंद्रपूर येथील प्रियदर्शनी सभागृहात श्रमिक एल्गारचे वतीने दुपारी 12 वाजता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी श्री. दिपक मैसेकर राहणार आहे. या निमीत्ताने 'वेंडर अॅक्ट' या पुस्तिकेचे प्रकाशन चंद्रपूर मनपाच्या महापौर राखी कंचर्लावार यांचे हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमास चंद्रपूर मनपाचे आयुक्त सुधिर शंभरकर, कामगार नेते विलास भोंगाडे, प्रा. डॉ. जयश्री कापसे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
केंद्र सरकारने 2014 मध्ये शहरातील फुटपाथ व्यावसायीकांसाठी 'वेंडर अॅक्ट' मंजूर केला आहे, मात्र या कायदयाची अमंलबजावणी अजूनपर्यंत झाली नाही. विशेष म्हणजे या कायदयाची माहीतीही फुटपाथवरील व्यावसायीकांना अजूनपर्यंत नाही. ही माहिती या व्यावसायीकांना मिळावी तसेच या कायदयाचे अमंलबजावणीच्या दृष्टीने महानगर पालीका, नगर पालिका प्रशासनाने निर्णय घ्यावे यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, जिल्हयातील फुटपाथवरील व्यावसायीकांनी मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अॅड. पारोमिता गोस्वामी, उपाध्यक्ष विजय सिध्दावार, महासचिव विजय कोरेवार यांनी केले आहे.

Thursday, February 04, 2016

दोषींना फाशी

दोषींना फाशी

युग चांडक अपहरण आणि हत्येप्रकरणी

नागपूर : नागपुरातील युग चांडक या 8 वर्षीय चिमुकल्याच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयाने, आरोपी राजेश दवारे आणि अरविंद सिंग यांना दोषी मानत दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली.

शहरातील एका 8 वर्षीय युग चांडक असे हत्या झालेल्या बालकाचे नाव आहे. त्याच्या हत्येप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली होती.  
एक सप्टेंबर 2014 रोजी युगचे संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास छापरू नगर भागातील गुरु वंदन अपार्टमेंट समोरून अपहरण करण्यात आले होते. युगचे वडील मुकेश चांडक हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. युग शाळेतून परतला आणि आपल्या राहत्या गुरुवंदन अपार्टमेंटमधील वॉचमेनकडेच आपली बेग ठेऊन, लगेच बाहेर धावत गेला.
इमारतीच्यासमोर एका दुचाकीवर दोघे जण उभे होते. त्यांच्यासोबत युग काही क्षण बोलला आणि त्यानंतर त्यांच्याच सोबत दुचाकीवर बसून निघून गेला. उशिरापर्यंत तो न परतल्यामुळे त्याच्या पालकांनी त्याचा शोध सुरू केला. त्यानंतर त्याचे अपहरण झाल्याचे समोर आले.
ज्या पद्धतीने युग शांततेने दोन्ही अपहरणकर्त्यांसह गेला होता, त्याचा विचार करता कोणीतरी ओळखीच्याच व्यक्तीने त्याचे अपहरण केल्याची शंका व्यक्त केली जात होती. त्यामुळे काल संध्याकाळ पासूनच नागपूर पोलिसांचे अनेक पथक नागपूर आणि आजू बाजूच्या परिसरात युगचा शोध घेत होते.
या घटनेनंतर सर्वत्र नाकेबंदीही करण्यात आली होती, मात्र तरीही युगचा शोध लागू शकला नाही. त्यानतंर काल संध्याकाळी नागपूर पासून 25 किलोमीटर अंतरावर लोणखैरी गावाजवळ एका निर्जनस्थळी पुलाच्या खाली पाईपमध्ये युगचा मृतदेह सापडला. अपहरणाची घटना समोर आल्यापासूनच पोलिसांनी अनेक संशयितांना पकडून चौकशी केली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे.

राजेश डावरे आणि अरविंद सिंग अशी या दोघांची नावं आहेत. यातील धक्कादायक बाब म्हणजे राजेश हा युगचे वडील डॉ. मुकेश चांडक यांच्या रुग्णालयात अकाऊंटटण्ट म्हणून कामाला होता. मात्र त्याने अकाऊंट्समध्ये काही घोळ केल्याने काही दिवसांपूर्वी त्याला डॉ. चांडक यांनी कामावरून काढले होते. त्याचा राग मनात ठेवून त्याने युगचे अपहरण केले.

नागपूरातील हत्या आणि अपहरणाच्या घटना-
  1. आदित्य पारेख- 2003 साली वर्मा ले-आऊट परिसरातून अपहरण
  2. हरेकृष्णा ठकराल- 2004 साली इतवारी भागातून अपहरण
  3. कुश कटारिया- 2011 साली छापरू नगर भागातून अपहरण
  4. यश बोरकर- 2012 साली खापरी परिसरातून अपहरण

शिक्षा?
*लहान मुलाचे अपहरण केल्याने फाशी
*अपहरण करून हत्या – फाशी
*अपहरण-हत्येचा कट – जन्मठेप
*पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न – 7 वर्षांची शिक्षा
*दोन्ही आरोपी राजेश दवारे आणि अरविंद सिंग यांना फाशी आणि जन्मठेपेची शिक्षा


न्यायालयाने नोंदवलेलं निरीक्षण

  • जरी पहिलाच गुन्हा असला, तरी हा गुन्हा अपघाताने नाही. आरोपींनी अत्यंत शांत डोक्याने, विचारपूर्वक केलेलं हे क्रूर कृत्य आहे.
  • फक्त वय कमी आहे म्हणून दोषींना मोकळं सोडणे चुकीचं आहे. त्यामुळे या गुन्ह्याची तीव्रता कमी होत नाही.
  • दोषींनी 8 वर्षाचा बालक जो स्वसंरक्षण करण्यास असमर्थ होता, अशा युगचं अपहरण केलं. त्यानंतर त्याची हत्या केली. त्यामुळे हा गुन्हा माफ करण्यासारखा अजिबात नाही.
  • आरोपींचं कृत्य पाहता, पालक वर्गात भयभीतता आहे. त्यामुळेच आरोपींना जरब बसण्यासाठी दोषींना कठोर शासन आवश्यक आहे, असं न्यायालयाने म्हटलं आहे.

Monday, February 01, 2016

मुरुडला 13 पुण्याचे विद्यार्थी बुडाले

मुरुडला 13 पुण्याचे विद्यार्थी बुडाले

9 मुली, 4 मुलांचा समावेश


मुरुड, - पुण्यातील कॅम्प परिसरातील अबिदा इनामदार महाविद्यालयातील सहलीसाठी गेलेल्या 20 ते 22 विद्यार्थ्यांपैकी 14 विद्यार्थी बुडाले. त्यापैकी काहींना वाचविण्यात स्थानिकांना यश आले तर 14 हुन अधिक विद्यार्थी समुद्रात बेपत्ता झाले. स्थानिकांच्या मदतीने 13 विद्यार्थ्यांचे मृतदेह समुद्रात बाहेर काढण्यात यश आले असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मृतांत 9 मुली व 4 मुलांचा समावेश आहे.

पुण्यातील कॅम्प परिसरातील अबिदा इनामदार ज्युनिअर कॉलेजमधील इयत्ता अकरावी व बारावीतील सुमारे 126 विद्यार्थी आज सकाळी पुण्यातून तीन लक्झरी बस क्रमांक एमएच 12, जीटी 3456, एमएच 12 केए 1687, एमएच 12, एफडी 3456 या तीन लक्झरी बसमधून आले होते. करून रायगडमधील मुरूड बीचवर फिरायला गेले होते. आज सकाळी पुण्यातून निघाल्यानंतर दुपारी 12 च्या सुमारास तेथे ते पोहचले. दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर तीनच्या सुमारास हे विद्यार्थी मुरूड किना-यावरील समुद्रात पोहायला उतरले. अनेक मुले एकाच वेळी समुद्रात पोहायला गेली. अनेक मुले समुद्रात पुढे पुढे पोहत गेली. मात्र, अनेकांना पाण्याचा अंदाज न आल्याने व दमल्याने बुडू लागले. काय घडतयं हे कोणालाच कळेना. अनेक मुले बुडू लागल्याने आरडाओरड सुरु झाला व एकच गोंधळ उडाला. यात अनेक मुले समुद्रात खेचली गेली व बुडाली.
त्यांचा आक्रोश पाहून सभोवतालची लोक जमा झाले पण खोलवर पाण्यात गेल्याने त्यांना वाचवणे खूप मुश्कील झाले. यातील 9 मुली व चार मुले यांचे मृतदेह सापडले आहेत. यातील काही जणांना समुद्रात जाणार्‍या बोटीने वाचवल्याने 7 जणांना जीवनदान लाभले आहे. अद्याप समुद्रकिनारी गर्दी असून यातील काही मुलांचा शोध सुरु आहे. तीन लक्झरी बसमधील नेमकी किती मुले समुद्रात गेली याचा तपास सुरु आहे. ग्रामीण रुग्णालयात या सर्वांचे शव असून अत्यवस्थ असणार्‍यांवर इलाज सुरु आहे. मदत कार्यासाठी सर्व हिंदू मुस्लीम लोक एकवटले होते. मृतांमध्ये सर्वात जास्त मुली आहेत. सदरील घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. शिफा काझी, सुमय्या अन्सारी, सफिया काझी, युसुफ अन्सारी, फरीद सय्यद, इफ्तेकार शेख, साजिद चौधरी, समरीन शेख, शफी अन्सारी, रफिया अन्सारी, राज तंजनी, स्वप्नाली संगत, सुप्रिया पाल, एकाचे नाव समजले नाही. एकजण अत्यवस्थ आहे.